मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली.) — इथून पुढे —  

माझे कर्तव्य पुर्ण झाले होते. आता याविषयी कुणाला काही बोलायची आवश्यकता नव्हती. मला हवा असणारा आनंद मला मिळाला होता. पण एका जवळच्या डॉक्टरांकडे आॕपरेशनसाठी गेल्यानंतर उरी चित्रपटाविषयी बोलता बोलता सर्व बोलून गेलो. त्या डॉक्टरांनी सुद्धा लगेच माझ्यासारखाच संकल्प केला. माझ्या संकल्पाने आणखी काही लोक प्रेरित होऊ शकतात याची जाणीव मला त्या दिवशी झाली. मग लाज बाजूला ठेवून ज्यांच्याकडे आॕपरेशनला जातो त्या प्रत्येक डॉक्टरला मी माझा संकल्प सांगितला. बहुतेक डॉक्टरांनी स्वतः हून National Defence Fund मध्ये दर वर्षी काही रक्कम भरण्याचा संकल्प केला. 

आपला शत्रू ताकदवान आहे. माझा सैनिक मात्र जुन्या पुराण्या साधनांनी अशा शत्रूचा सामना करत आहे. उरी वा पुलवामा सारख्या भ्याड हल्ल्यांमुळे ते माझ्या सैन्याचे मनोबल तोडू शकणार नाहीत याची मला खात्री आहे. पण सैन्याच्या मागे जनता खंबीरपणे उभी आहे हे सैन्याला कळणे गरजेचे आहे. सर्व भारतीय आपल्या कामाचा प्रचंड आदर करतात हे प्रत्येक सैनिकाला कळणे गरजेचे आहे. सैनिक देशासाठी मोठा त्याग करतात. थोडाफार त्याग त्याचे देशबांधव त्याच्यासाठी करायला तयार आहेत हे प्रत्येक सैनिकापर्यंत पोहचले पाहिजे. त्यातून आपण करत असलेला त्याग वाया जात नाही अशी भावना सैनिकांमध्ये नक्कीच वाढीला लागेल. त्यांचे मनोबल नक्कीच वाढेल. पण त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी पुढे येऊन NDF मध्ये दान करणे गरजेचे आहे. हा मेसेज सैनिकांपर्यंत पोहचवणेही गरजेचे आहे.

मग मी एक निर्णय घेतला. सोशल मेडियावर याच आशयाची एक पोस्ट तयार करून टाकली. शेवटी ‘NDF ला पैसे पाठवताना काही अडचणी आल्या तर मला फोन करा’ असा मेसेज टाकून खाली माझा नंबर दिला. पुढील एक दोन महिने मला महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून फोन येत होते. मी जवळपास हजार लोकांचे फोन घेतले. 

आता फक्त रक्षाबंधनला सैनिकांना राख्या पाठवून वा स्वातंत्र्यदिनी सोशल मेडियावर देशभक्तीपर मेसेज पाठवून जनतेचे कर्तव्य संपणार नाही. सैनिकांना उच्च दर्जाचे बुलेटप्रुफ जॕकेट, हेल्मेट, रायफल्स आणि नाईट व्हिजन सारखे अत्याधुनिक साधने देण्याची गरज आहे. सरकार त्याच्या परीने काम करतच आहे. पण आपल्यालाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही.  

प्रत्येकाने दर महिन्यात सरासरी फक्त 100 रूपये बाजूला टाकले तर National Defence Fund मध्ये दर वर्षी कमीत कमी सव्वा लाख कोटी रुपये जमा होतील. आपल्या सैन्यदलांचे वार्षिक बजेट साडे चार लाख कोटी आहे. त्यातील बहुतेक पैसा सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या पगारात जातो. लोकवर्गर्णीतून जमा पैशातून आपले सैनिक जगातील सर्वोत्तम युद्ध तंत्रज्ञान वापरू शकतील. आपल्या जवानांचे मनोबल वाढेल. शत्रूची आपल्या बलवान सैनिकांशी लढण्याची खुमखुमी आपोआप नष्ट होईल. शांततेतून स्थिरता, स्थिरतेतून व्यापार-उद्योग-गुंतवणूक वाढून आर्थिक सुबत्ता, आर्थिक सुबत्तेतून बलवान सेनादले आणि बलवान सेनादलातून पुन्हा शांतता स्थापित होईल. 

सर्वात महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया थांबता कामा नये. ‘एकदा पैसे दिले म्हणजे संपले’ असे करता येणार नाही. भविष्यामध्ये स्थैर्य असावे म्हणून आपण जसे आयुष्यभर PF वा विम्यामध्ये गुंतवणूक करत असते तसेच देशात स्थैर्य रहाण्यासाठी सैन्यदलामध्ये गुंतवणूक करावी लागेल. कारण या स्थैर्यातूनच सुबत्ता येणार आहे आणि या सुबत्तेतून प्रत्येकाला त्याचा वाटा गुंतवणुकीच्या अनेक पटींमध्ये परत मिळणार आहे. हा फायद्याचा व्यवहार आहे. 

कुणीतरी म्हणाले होते की “डोळ्यासाठी डोळा” या न्यायाने सर्व जग लवकरच आंधळे होईल. पण आपल्या डोळ्याकडे वाईट नजर ठेवायची कुणाची हिंमत होणार नाही इतके स्वतःला मजबुत केले तरच युद्ध टळतात हा आजवरचा इतिहास आहे. तुमची कमजोरी शत्रूची लढण्याची हिंमत आणि खुमखुमी वाढवते. पण राष्ट्र सैनिकदृष्ट्या प्रबळ असेल तर शत्रू उघड लढण्याचे धाडस सुद्धा करत नाही. अमेरिका आणि रशियातील शीतयुद्ध हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. 

“जे इतिहासाला विसरतात ते नष्ट होतात” हे त्रिकालबाधीत सत्य आहे. ते कुणी विसरता कामा नये. सोन्याचा धुर निघणारा देश सुदृढ सैन्यशक्ती अभावी गुलामगीरीत गेला तर भुके-कंगाल व्हायला वेळ लागत नाही. हजार वर्षांच्या गुलामगिरीत भारताला मोठे आर्थिक, सामाजिक, धार्मिक शोषण भोगवे लागले आहे. सामरीक दृष्ट्या कमजोर झालेल्या देशाच्या गुलामगीरीला वा शोषणाला त्या देशातील निद्रिस्त जनताच जबाबदार असते. कमजोर लोकांच्या प्राक्तनात गुलामगिरी तसेच आर्थिक आणि धार्मिक शोषणच लिहलेलेच असते. ते स्वतःच त्याला जबाबदार असतात.

चला तर मग, देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याचा आज संकल्प करू या. दर महिन्याला थोडी रक्कम देशाच्या म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी वेगळी काढून ठेवा. कुटुंबाच्या संरक्षणासाठी जसा विम्याचा हप्ता वेगळा ठेवता तसाच देशाच्या संरक्षणासाठी छोटा हप्ता दर महिन्याला बाजूला काढून ठेवा. वर्षाच्या शेवटी ही सर्व रक्कम National Defence Fund मध्ये जमा करा. 

आपल्या गरजा आणि आणखीची हाव कधीच संपणार नाहीत. सर्व दुःखाच कारण हाव आहे असे कुठतरी वाचले होते. फक्त दानाने हाव कमी होऊ शकते असेही कुण्या महानुभवाने लिहून ठेवले आहे. 

दान आणि त्यातही देशसेवेसाठी केलेले दान! यापेक्षा जास्त आनंद आणखी कशात मिळेल? आपण सर्व गोष्टी आनंदासाठी करतो. देशावर उपकार करण्यासाठी नाही तर  स्वतःच्या आनंदासाठी प्रत्येकाने राष्ट्र मजबुतीचा संकल्प केलाच पाहिजे. गेली पाच वर्षे मी हा प्रचंड मोठा आनंद उपभोगतो आहे. 

स्वातंत्र्यदिनी फक्त सोशल मीडियावर देशप्रेम दाखवण्याऐवजी लष्करासाठी काहीतरी भरीव करु या. 

Ref : https://www.pmindia.gov.in/en/national-defence-fund/

प्रत्येक 15 आॕगस्टला या साईटवर जाऊन नेट बँकींग द्वारे वा NEFT करून जमेल तसे पैसे भरण्याचा संकल्प करा. NEFT केले तर त्याची माहिती   [email protected] या  email id वर मेल करा. आयकर सवलत मिळण्यासाठी ते लगेच तुम्हाला 80G ची पावती पाठवतात. या NDF मधील दानासाठी सरकारने 100% कर सवलत दिलेली आहे. 

काही अडचण असेल तर तुम्ही NDF च्या 011 2301 0195 या नंबर वर फोन करू शकता. 

केवळ स्मार्ट नागरिक राष्ट्र मजबूत करण्याला प्राधान्य देतात. त्यांना त्यांचे खरे हित कशात आहे हे कळते. चला तर मग, आपणही स्मार्ट होऊ या. या स्वातंत्र्यदिनी राष्ट्र मजबुतीचा संकल्प करू या.

– समाप्त – 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग २ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग २ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

आपले दोन्ही हात उंचावत अथर्व ओरडला, “हेऽऽ किती छान. आजी, आई आता मला कोणी डिस्टर्ब करू नका हं. बाईंनी सांगितलंय त्याचा मी विचार करणार आहे” आणि हाताची घडी घालून डोळे मिटून विचार करायला लागला. प्रत्येकाच्या घरी तीच अवस्था. अथर्वला वाटलं, खरंच मी हत्तीचं पिल्लू झालो तर मला क्रिकेट खेळता येईल का? प्रत्येक बाॅलला सिक्सर हाणीन. वाॅव केवढा स्कोअर होईल माझा. सचिन आणि कोहलीपेक्षा जबरदस्त! पणऽ पण हत्ती झालो तर ह्या घरी कसं राहता येईल मला? आई, बाबा, आजी कसे भेटतील? माझ्या बर्थडे ला आई केक कसा देणार? बाबा नवीन शर्ट कसे आणतील? नको रे बाबा, मी आहे तो अथर्वच चांगला.

तिकडे रमाही स्वप्नामध्ये रमली. “आहाऽऽ मासा झाले तर मला सारखे पोहायला मिळेल. पाण्यातले इतर मासे माझे मित्र-मैत्रिण होतील. ओऽ पण खायचे काय? आईनं इडली, लाडू केले तर मला कसे खायला मिळणार? आणि पाण्यात सारखं राहून सर्दी झाली तर? ताप आला तर? नको रे बाबा, कोरोनाचं संकट नकोच आपल्याला. त्यापेक्षा बाबा सांगतात तसे घरी राहू आणि स्वस्थ राहू. शिवाय गाणी म्हणता येणार नाहीत. पुस्तकं वाचायला मिळणार नाहीत. नको बाई, मी आपली रमाच बरी.”

आर्यनच्या डोळ्यांपुढे सगळ्या हायस्पीड गाड्यांपुढे आपण पांढराशुभ्र घोडा होऊन सुसाट धावतोय, हे चित्र दिसायला लागले. क्षणात त्याच्या मनात विचार आला, ओऽ, पण दमल्यावर खायचे काय? ओन्ली ग्रीन ग्रास?! ओ, नो नेव्हर! पटकन त्याने आपल्या पळत्या पायांना ब्रेक लावला. नको रे बाबा, घोडा झालो तर नो बॅडमिंटन, नो स्कूल आणि हो, त्या आजी-आजोबांकडेही जायला मिळणार नाही. तिकडे झाडावर चढता येणार नाही. धमाल करता येणार नाही. आपले फ्रेंड्स भेटणार नाहीत. आपण घोडा झालो तर आई रडेल, बाबा कुठे शोधतील? नाना-नानी किती काळजी करतील? आपण आहोत तसेच चांगले आहोत.”

राधाही खुशीखुशीत आपल्या अंगाचं वेटोळं करून आपलं मऊ मऊ पांढरं शुभ्र अंग चाटत मनीमाऊ होऊन कोपर्यात बसली. पटकन डोळे मिटून गेले आणि झोपही लागली तिला. थोड्या वेळानं काठी घेऊन आई आली आणि “शुक शुक, जा गं मने” म्हणून तिच्यावर उगारली. “म्याऊ, नको गं आई, मारू नको मला” म्हणून रडायला लागली. आईनं हलवून जागं केलं राधाला. “राधा, उठ आज बाईंना लिहून द्यायचंय ना? उठ” “ओऽ म्हणजे मी राधाच आहे तर. देवा, मला राधाच राहू दे हं! मनी माऊ नको.” म्हणत राधा उठली.

खिडकीतून टक लावून बाहेर बघत असलेली अवनी एकदम सुंदरसे फुलपाखरू होऊन या फुलावरून त्या फुलावर भिरभिर उडायला लागली. आपले नाजूक नाजूक रंगीबेरंगी पंख तिला खूप आवडले. आऽहाऽ किती छान वाटतंय. फुलांवर अलगद बसायला मस्त वाटतं, पण गुलाबाच्या झाडाचा टोकदार सुईसारखा काटा बोचला तर? पंख फाटला तर? बापरे, काय करायचे? घरी कसे जायचे? अरेच्चा, आजीने आपल्याला बिस्कीटे बरणीत भरायला सांगितलीत ना? पण आता तर हात नाहीत! कशी भरू बिस्कीटं? “आगं अवनी, किती तंद्री लावून बसलीस! एक काम आजीचं करत नाहीस.” आई पाठीत धपाटा घालत म्हणाली. भानावर येत अवनी आपल्या हातांकडे पाहात हसत म्हणाली, “अगं, नो प्रॉब्लेम, भरते मी आता. बागेत उडून आले गं जराशी, पण पुन्हा नाही हं जाणार.” अवनीच्या या असल्या येडपट बोलण्याकडे आई आश्चर्याने पाहातच राहिली.

क्रमशः…

© अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? मनमंजुषेतून ?

☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

माझ्या घरट्यात त्यांचं घरटं …….. 

दोन वर्षे  उलटली आता या गोष्टीला. १७ ऑगस्ट २०२१ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यानच्या काळात आम्ही एक  सुंदर जीवनपट अनुभवला. कुतूहल, दया, काळजी,बालपण,पालकत्व, उत्साह ,भीती,आनंद अशा अनेक भावनांनी युक्त असा तो काळ होता आमच्यासाठी. 

२२ तारखेला मी आमच्या घराच्या गॅलरीमधल्या हँगीग कुंडीमध्ये पक्षी बसलेला पाहिला. गॅलरीचे दार उघडल्यावर भुर्रकन उडून गेला. साधा नेहमीचाच प्रसंग, त्यामुळे मी लक्ष दिले नाही. तो पक्षी जोडीने अधून मधून दर्शन देत राहतच होता. या जोडीने मला अजिबात थांगपत्ता न लागू देता हँगिंग कुंडीमध्ये त्याचा प्रशस्त बंगलाच  बनवून टाकला होता. सहज शंका आली म्हणून स्टूलवर चढून पाहिले तर सुंदर जीवांची वाट पाहत असणारं एक सुरेख घरटं तयार होतं. म्हटलं चला एक सुंदर अनुभव मिळेल आता. आणि त्या घरट्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला. 

आता माझ्यातील मातृत्व जागे झाले, कारण ही कुंडी होती, त्यालाच लागून ग्रीलमध्ये कपडे वाळत घालायची दोरी बांधली होती. कपडे वाळत घालताना, काढताना त्या दोरीमुळे ती कुंडी हलत होती. धक्का लागून पक्षांची अंडी किंवा पक्षांचे पिल्लू खाली पडेल याची भीती जाणवली. त्यामुळे ती दोरी सोडून थोडीशी खाली बांधावी, जेणेकरून त्या पक्षांना त्रास होणार नाही असा विचार मनात येताच मी लगेचच अंमलबजावणीसाठी स्टूलवर चढून दोरी सोडू लागले. दोन मिनीटे देखील झाली नसतील तोवर ते दोन्ही पक्षी काही केल्या मला तेथे हात लावून देत नव्हते. मी मग ‘ थोडा वेळ जाऊ दे. मग पुन्हा आपले कार्य 

साधू ‘असा विचार करून मोर्चा किचनकडे वळवला. पक्षी जवळपास नाहीत याचा अंदाज घेऊन पुन्हा मोहीमेवर रुजू झाले. 

त्या दोरीच्या दोनतीन गाठी सोडून होईपर्यंत काहीतरी क्षेपणास्त्राप्रमाणे माझ्याकडे झेपावत आहे असे वाटले. तो पक्षी अक्षरश: सूर मारून येऊन मला हुसकावून लावत होता. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत हा कुठून आला कळलेच नाही. एकदम स्टूलवरचा एक पाय हलून तोल जाऊन मी पडते की काय असे वाटत असताना माझ्या प्रिय ग्रीलने मला वाचवले आणि पुन्हा एका short break साठी मी थांबले. ती दोरी सोडून खाली पुन्हा बांधण्याच्या पाच मिनिटांच्या कामाला अनेक व्यत्ययाने मला दोन तास लागले. पण शेवटी मोहीम फत्तेच केली. आणि एक आत्मिक समाधान मिळाले.

आता रोज उठल्याउठल्या स्टूलवर चढून पक्षाच्या घरटयाचं अवलोकन सुरु झालं. मी आणि माझा मुलगा रोज न चुकता हे काम उठल्याउठल्या करत असू. अर्थातच घरमालक आणि घरमालकीणबाई जवळपास नसताना.थोड्या दिवसांच्या  प्रतिक्षेनंतर घरट्यामध्ये एक अंडं आम्हाला दिसलं. दुसऱ्या दिवशी दुसरे आणि तिसऱ्या दिवशी तिसरे अशी तीन अंडी त्यांच्या घरट्यात विराजमान झालेली बघून मन अगदी लहान मुलां प्रमाणे बागडू लागलं. झाले.  आता आतुरता होती त्या नवीन पिल्लांची. मग रोज न चुकता आमच्याकडून फोटोसेशन चालू झालं. अकरा दिवसांनी एका अंड्यातून एका पिल्लाचे आगमन झाले. बाराव्या दिवशी तीनही जिवांची हालचाल बघून खूप आनंद झाला. 

ती गोंडस पिल्ले वाढताना बघणे म्हणजे एक अतिशय आनंददायी अनुभव होता. एका जीवनपटाचे आम्ही साक्षीदार झालो होतो. रोजच ते उत्सुकतेने घरटयात बघणे आम्ही आनंदाने करत होतोच. पण एक बालपण मी स्वत: देखील अनुभवत होते. अशातच एके दिवशी पक्षीणबाई रस्ता चुकून चक्क घरातच आल्या. अचानक तिचे असे घरात येणे मला एकदम घाबरवूनच गेले.. मी चटकन आधी पंखा चालू नाही ना हे चेक केले. तिच्या बाहेर पडण्यासाठीच्या घिरटया चालू होत्या पण तिला बाहेर जाण्याचा मार्ग काही सापडेना. ती किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली. पण खिडकी बंद असल्याने बाहेर जाता येईना. मग खिडकी उघडल्यानंतर भुर्रकन उडून गेली. पण दोन मिनीटे घरात उच्छाद मांडला होता तिने. तेव्हापासून गॅलरीचं दार जास्त वेळ उघडून ठेवलेच नाही.

जसजशी अंड्यांमधून पिल्ले बाहेर येऊ लागली तसतशी ही पक्षाची जोडी आक्रमक होऊ लागली. गॅलरी म्हणजे आमचं साम्राज्य आहे आणि इथे कोणीही पाऊल ठेवायचं नाही असा धमकीवजा इशारा आम्हाला मिळू लागला. आम्ही मात्र आमच्याच घरात (गॅलरीत ) चोरासारखं वावरू लागलो. कपडे वाळत घालताना तर घरट्यापासून लांबच घालायचे. जरा म्हणून घरटयाच्या जवळ कोणी दिसले की कुठूनही ही जोडी प्रगट व्हायची. आता फोटो काढणंही खूप अवघड झाले होते. मी आणि माझा मुलगा हे दिव्य कसेबसे म्हणजे एकाने पहारा द्यायचा आणि दुसऱ्याने फोटो काढायचा असे करत होतो.

तर अशा रीतीने आमचं सहजीवन चालू होतं. यात खूप भावलेली एक गोष्ट म्हणजे पक्षी जेव्हा जेव्हा पिलांना खाऊ घेऊन येत तेव्हा जर आम्ही कोणी तिथे असू तर ते घरट्याजवळच घुटमळत. पिलांचा आवाज आल्यावर आम्ही लगेचच बघायला जात असू. पण आम्ही नजरेआड झाल्यावरच ते पिलांना खाऊ घालत. पूर्वीच्या आजीबाई लेकी- सुनांना सांगायच्या ना ..  सगळ्यांसमोर बाळाला खायला द्यायचं नाही, तो सल्ला आठवायचा. आणि मग मी पण गॅलरीचे दार बंद करून घ्यायचे. मग ते पक्षी पिलांना चिमणचारा खाऊ घालत. पक्षी असो जनावरे असोत की माणूस…  सर्वत्र मातृ-पितृभाव सारखाच ना ! शक्यतो दोन्ही पक्षी एकाच वेळी बाहेर जात नसत. एक जण पहारा द्यायचा आणि एक जण पिलांना चिमणचारा आणण्यासाठी जायचा. दोघांनी आपापली कामे वाटून घेतली होती.

अशा रितीने १४ दिवस कसे गेले काही समजलेच नाही. आम्हाला वाटले होते, जसा अंड्याचा क्रम होता तशी त्यांची वाढ होईल. पण सर्व पिल्ले बहुदा एकाच वेळी उडून गेली. बराच वेळ झाला पक्षी आणि पिलांचा आवाज का नाही म्हणून वर चढून बघितलं तर घरटे रिकामे होते. आनंद झाला होता पिलं आता आपल्या पंखांनी सर्वत्र हुंदडतील म्हणून….  पण काहीतरी हरवल्यासारखं पण वाटत होतं .

चला … एक जीवनपट सुफळ संपूर्ण झाला याचे समाधान घेऊन मी जवळजवळ २०-२२ दिवसांनी त्या कुंडीतल्या रोपाला पाणी घातलं.  मला वाटले होते ही वेल आता वाळते की काय. पण त्या वेलीनेही 

बिनपाण्याचा एवढे दिवस तग धरला होता. तीही त्या पक्षांना सहाय्य करीत होती. तिला पण मायेचा ओलावा मिळाल्यामुळे ती देखील बहरली होती….. 

दEurek(h)a

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने…🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने 🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

“फाळणीमुळे भारत- पाकिस्तान हे दोन देश फक्त भौगोलिक दृष्ट्या विभक्त झालेत असे नाही, तर हजारो वर्षांपासून नांदत असलेली संस्कृती विभागली गेली. या दोन देशात एक दिलाने राहणाऱ्या कोट्यावधी नागरिकांची मने दुभंगली, त्यामुळे फाळणी ही अश्वत्थामाच्या जखमेप्रमाणे भळभळणारी एक जखम म्हणून या विशाल खंडप्राय देशात राहणाऱ्या लोकांच्या काळजात ठसठसत राहिली आणि त्याचे प्रतिबिंब सहाजिकच साहित्यात उमटले. कृष्णाजी वामन पेंडसे हा सव्वाशे वर्षांपूर्वी कोकणात जन्मलेला माणूस, तारुण्यात धाडसाने कराचीला नोकरीसाठी जातो. आपल्या कर्तबगारीने तेथे अधिकार पद मिळवतो, पण फाळणीच्या जबरदस्त तडाख्याने कोकणात माघारी येतो. या दैव दुर्विलासात त्याला त्याची सहधर्मचारिणी खंबीरपणे साथ देते.” —– 

— प्रदीप गांधलीकर यांनी मंगला काकतकर यांच्या “आनंदाचे डोही आनंद तरंग” या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतील हा काही भाग आहे.

(कै) मंगला काकतकर ही माझी आत्त्या, जन्मापासून कराचीत राहिलेली आणि फाळणीनंतर भारतात येऊन जिने खडतर आयुष्याला तोंड दिले. संगमनेर येथे शिक्षिकेची नोकरी केली व राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षिका हा पुरस्कार मिळवला ,अशी अतिशय कर्तृत्ववान ! तिच्या सांगण्यातून आणि लेखनातून त्यांनी अनुभवलेली फाळणी आम्ही पाहिली !

एकेकाळी आलिशान बंगल्यात राहणाऱ्या व फाळणी झाल्यावर अचानक राहायलाही जागा नाही अशी परिस्थिती ! पण ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून परत जन्म घेतो त्याप्रमाणे सर्व कुटुंबाने भरारी घेतली व नव्या आयुष्याला सुरुवात केली.

तिच्या पुस्तकाची सुरुवातच “8 फेब्रुवारी 1947 ,या दिवसाची !” गौरी सदन “कराची येथे नवीन घराची वास्तुशांती ! पण वास्तुशांतीला फक्त घरचे लोक व दोन भटजी ! देशातील वातावरणच अस्थिर होते. तेव्हा जे अनुभवले ते तिने शब्द रूप केले, पुढील पिढीला ते कळावे म्हणून !

“फाळणी नंतरचे काव्य” या लेखात ती सांगते, ” आमच्या जन्मापासून कराचीचे आणि आमचे नाते होते. कराची कधी सोडावी लागेल असे मनातही आले नव्हते. कराचीत दंगली उसळल्यावर सर्व कुटुंब मनोरा (कराची पासून जवळच असलेले बेट,जिथे आजोबांनी observatory त नोकरी केली ! ) येथे उदास व खिन्न मनस्थितीत गेले, केवळ दोन बॅगा बरोबर घेऊन ! त्यानंतर मिळेल तसे हे सर्व कुटुंब भारतात परतले. आत्त्या  सांगायची, ” वडिलांना फाळणीमुळे असे काही घडेल याची कल्पनाच आली नव्हती. इंग्रजी राजवट गेली, पाकिस्तानची येईल !सर्वसामान्य लोकांना काय त्रास होणार?” पण घडले भलतेच ! पाकिस्तानी लोकांनी त्यांना घराबाहेर काढले । सामानाची लुटालूट केली. त्यानंतर सर्व कुटुंब जसं येता येईल तसा प्रवास करून (पाच दिवस बोटीचा)   मुंबईला आले, तिथून पुण्याला आले आणि काही काळाने कोकणात जाऊन स्थिरावले !

७५ वर्षे होऊन गेली या कालखंडाला ! पण माझ्या माहेरच्या पेंडसे कुटुंबाने भोगलेल्या फाळणीच्या आठवणी स्वातंत्र्यदिनी जाग्या होतात आणि नकळत आपण हे सगळे भोगणाऱ्या कुटुंबाच्या साखळीची एक कडी आहोत ही जाणीव मनाला बोचत राहते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्री .. एक सिस्टिम… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्री .. एक सिस्टिम… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का ?

– भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

– फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

– गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं? 

– पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

– एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

– ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

– प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

– दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

– मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

– पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?

– उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

– वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे  बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे 

Involvement…. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं ….  

….. प्रसंगी पूर्ण अशिक्षित असूनही  स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या  हुशारीला आपण दाद किती वेळा देतो?

निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. 

… किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी, दिवसातुन एकदा तरी, निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत..

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुलना थांबवा… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तुलना थांबवा… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

स्वतःची इतरांशी,

आपल्या मुलांची इतर मुलांशी,

आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी,

 आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्यांशी,

आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी

तुलना थांबवा…

 

एक छोटीशी गोष्ट…

एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो. त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात. त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो, याचा अभिमान असतो.

एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते, “हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही?”

तो पोपटाला जाऊन तसे सांगतोदेखील. पोपट म्हणतो, “जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते, तोपर्यंत मलासुद्धा असेच वाटायचे, की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही.”

मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो,” तू किती सुंदर आहेस आणि नशीबवानसुद्धा. तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला.”

तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, “मला तर वाटते, सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तूच असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेऊ शकत नाही. तू स्वतंत्र आहेस.” हे ऐकून कावळ्याला कळते, तो किती नशीबवान आहे ते.

असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं. पाच लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्र- मैत्रीण बारा लाख कमावतात, त्यांची असूया वाटते. बारा लाख कमावणाऱ्या व्यक्तीला चोवीस लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो, ‘पैसा तर खूप मिळतोय. पण शरीर साथ देत नाही. यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती, पैसा कमी कमावला असता, तर शरीर चांगल असतं.’ ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे.

 

एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो, माझा नाही. पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल.

कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते.  पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते, याचं कौतुक त्याला वाटत नसतं.

मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला, यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असतं, पण आजारपणात आपला मुलगा एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो, याचा विचार ती कधी करतच नसावी.

 

तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति तणावाखाली जगतात.

 

थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं,की ‘तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही. आम्ही शाळेतून त्याच नाव कमी करत आहोत.’

दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले, “मी शाळेत का जाऊ शकत नाही?” तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की , “तुझ्याएवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही. म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तो ही स्वतःच करावा लागेल.” आणि हे उत्तर ऐकल्या पासून एडिसन स्वतः ला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले.

जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडली असती, तर ते एवढे महान झाले नसते.

 

जे आपल्याला मिळतं, त्याला काहीतरी कारण नक्की असतं. ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही. पण जे मिळालंय, त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो.

इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात. खूप त्रास होत असतो.

आपण दिसायला सुंदर नसू, पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल.

आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू.

आपण लाखात कमवत नसू,पण आपलं आरोग्य उत्तम असेल.

आपण बाहेर देशात नसू, पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू.

आपल्याकडे खूप पैसा नसेल, पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील.

जे त्याला मिळालं, ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा, ‘हे मला का मिळालंय? यातून मी काय उत्तम करू शकतो?’ याचा विचार करा.

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

प्रेम रंगे, ऋतू संगे

कवी: सुहास रघुनाथ पंडित

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन आणि वितरण

प्रथम आवृत्ती:१ मे २०२३

श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रेम रंगे ऋतूसंगे हा नुकताच प्रकाशित झाला. या संग्रहातल्या कविता वाचताना प्रेम या सुंदर भावनेचा एक विस्तृत, नैसर्गिक आणि शिवाय अतिशय सुंदर शब्दात व्यक्त झालेला भाव अनुभवायला मिळाला. 

श्री सुहास रघुनाथ पंडित 

पुस्तक हातात घेतल्यानंतर माझं पहिलं लक्ष गेलं ते अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अशा मुखपृष्ठावर.  हिरव्या धरणीच्या पार्श्वभूमीवर सुंदर बहरलेला लाल गुलमोहर आणि एक मानवी हात ज्यावरचे तर्जनी आणि अंगठा यातलं अंतर हे फारच बोलकं आहे.  कुठलाही चित्रकार जेव्हा समोरच्या दृश्याचं चित्र कागदावर रेखाटतो तेव्हा रेखाटण्यापूर्वी तर्जनी आणि अंगठा उघडून त्या अंतरातून एक माप घेत असतो. ते समोरचं  दृश्य त्याला त्या तेवढ्या स्केलमध्ये चितारायचं असतं.  कवी हा ही चित्रकारच असतो नाही का?  फक्त त्याच्यासाठी रंग, रेषा हे शब्दांच्या रूपात असतात आणि जे जे अवतीभवती घडत असते, दिसत असते ते सारे तो मनाच्या एका स्केलमध्ये टिपत असतो.  मुखपृष्ठावरचा हात आणि ही दोन बोटे अशी रूपकात्मक आहेत.  अवाढव्य पसरलेल्या निसर्गाच्या नजराण्याला मनाच्या कागदावर टिपणारं माप.  खरोखरच सुंदर, अर्थपूर्ण, बोलकं असं हे मुखपृष्ठ!

या काव्यसंग्रहाला लाभलेली डॉक्टर विष्णू वासमकर यांची प्रस्तावनाही अतिशय सुंदर, काव्याभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय आहे.  प्रस्तावनेत काव्यशास्त्र, त्याची सहा प्रयोजने, काव्याचे लक्षण, स्वरूप, तसेच काव्यशरीर या संकल्पनेत शब्द, अर्थ, रसोत्पत्ती, अलंकार, वक्रोक्ती, व्युत्पत्ती यांचे महत्त्वाचे स्थान याविषयीचे मुद्दे सुलभपणे उलगडले आहेत.  काव्यशास्त्रातील अलंकार, रस ,वृत्त ही काव्य कारणे किती महत्त्वाची आहेत हे या प्रस्तावनेत सूचकपणे सांगितलेले आहे.  सुरुवातीलाच ही प्रस्तावना वाचताना पुढच्या काव्य वाचनाला मग एक दिशा मिळते.  चांगल्या काव्याची ओळख होण्यास मदत होते. आणि जेव्हा मी पंडितांच्या  प्रेमरंगे ऋतुसंगे काव्यसंग्रहातील एकेक कविता वाचत गेले तेव्हा कवितेतला अभिजात दर्जा, त्यातले अलंकार, रस, वृत्त, छंद त्याचबरोबर प्रतिभा आणि अभ्यास या काव्य कारणांचा ही नितांत सुंदर असा अनुभव आला.  अत्यंत परिपक्व अशा या कविता आहेत.  उच्च कोटीची शब्दकळा यात आहे. काव्य म्हणजे नेमकं काय याचाच या कविता वाचताना खरा अर्थ कळतो.

या संग्रहात एकूण ६६ कविता आहेत. या सर्व कवितांमध्ये प्रेम हा स्थायीभाव आहे.  प्रेमाचे अनंत रंग यातून उलगडलेले आहेत. पंडितांनी त्यांच्या मनोगतात म्हटले आहे की ‘ प्रेम, निसर्ग आणि माणूस यांना एकमेकापासून कसे वगळता येईल?’ आणि हे किती खरे आहे याची जाणीव त्यांच्या या निसर्ग कविता वाचताना होते.

“प्रेमरंगे ऋतुसंगे”  या शीर्षकातच निसर्गाच्या बदलणाऱ्या ऋतुंसोबत उलगडणार्‍या प्रेम भावनेचे अनेक सूक्ष्म पदर दडलेले आहेत. सर्वच कवितांमध्ये गीतात्मकता, भावात्मकता, रसात्मकता आहे.  पंडितांची प्रतिभा, प्रज्ञा, अभ्यास वाचकाला थक्क करून सोडतो.  कवितांना दिलेली सुंदर आणि चपखल शीर्षके हे आणखी एक वैशिष्ट्य.

 प्रत्येक कवितेत प्रेमाचा मंत्र मिळतो, संदेश मिळतो.

       पाण्यामधली अवखळ झुळझुळ

       करात बिलवर करती खळखळ …

 

      शब्द होतील पक्षी आणि गातील गाणी तव दारी..

      लाटेवरती लाटा झेलत तूही आणिक मीही आलो

 

     खूप जाहले खपणे आता

     जपणे आता परस्परांना 

     खूप जाहला प्रवास आता

     गाठू विश्रांतीचा पार जुना.

…  अशा गेयता असलेल्या अनेक सुरेख काव्यपंक्ती पुन्हा पुन्हा वाचाव्यात असेच वाटते.

  उष्ण रश्मीचे सडे,

  कुरळे कुरळे मेघ .

  गर्भिताच्या गुहेतून अर्थवाही काजवे… यासारख्या शब्दरचना किती संपन्न, समृद्ध आहेत तेही जाणवते.

या काव्यसंग्रहातल्या ६६ही  कवितांवर खूप काही लिहिण्यासारखे आहे.  एकेक कवितेचे रसग्रहण करावे इतक्या त्या विलोभनीय आहेत, ताकदीच्या आहेत. मात्र “रात्र काळी संपली…” या एकाच कवितेबद्दल मी जरा सविस्तरपणे लिहायचं ठरवलेलं आहे.  अतिशय सुंदर, मला आवडलेली ही कविता आहे.  पण लिहिण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की कवी, कविता, वाचक यांचं नातं जुळत असताना कवीच्या मनातले अर्थ आणि वाचकाच्या मनात उलगडलेले अर्थ भिन्न असू शकतात.  विचारांची फारकत होऊ शकते. 

“रात्रकाळी संपली”  हे गीतात्मक काव्य आहे. 

       आसमंती सूर येता नूर सारा पालटे

       रात्र काळी संपली किरण किरण सांगते ।।धृ 

 

      चांदण्याचे नुपूर लेऊन निघून गेली निशा 

      केशराचे वस्त्र ल्यायलेली  अंबरी आली उषा

      पाठशिवणीचा खेळ तयाचा वसुधा पाहते 

      रात्र काळी संपली..

 

      हिरवे दवही तांबूस झाले स्पर्शून जाता रविकिरणे 

      शेपूट हलवीत सुरू जाहले मुक्या जीवांचे बागडणे

      घरट्यामधुनी उडून जाता पहा पाखरू चिवचिवते

     रात्र काळी संपली…

 

     पूर्व दिशेला विझून गेल्या नक्षत्रांच्या ज्योती

     रांगोळीपरी फुले उमलली झाडां-वेलींवरती 

     तबकासम हे गगन सजले हळद कुंकवाने

     रात्र काळी संपली…

 

     गिरणीमधुनी,  रस्त्यामधुनी चक्र गरगरा फिरे

     जागी झाली गुरे वासरे जागी झाली घरे

     क्षणाक्षणाने काळाचेही पाऊल पुढे पडते

     रात्र काळी संपली किरण किरण सांगते …

तसे हे वर्णनात्मक गीत आहे.  “घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला”  या भूपाळीची आठवण ही कविता वाचताना होते. 

.. रात्रकाळी संपलेली आहे आणि सुंदर सकाळ उगवत आहे हा या गीतामधला एक आकृतीबंध.  अतिशय सुंदर, चपखल उपमा आणि उत्प्रेक्षांनी परिपूर्ण असलेलं हे काव्य.

.. चांदण्यांचे नपुर घातलेली निशा, केशराचे वस्त्र ल्यायलेली उषा आणि उषा निशाचा पाठशिवणीचा खेळ पाहणारी वसुंधरा.. पहिल्या कडव्यातले  हे वर्णन म्हणजे शब्दरूपी कुंचल्याने रेखाटलेलं  सकाळचे वास्तविक चित्र.

दुसऱ्या कडव्यातले रविकिरणाच्या स्पर्शाने तांबूस झालेले दव, बागडणारे  मुके प्राणी आणि घरट्यातून उडून जाणारे पाखरू…हे वर्णन पृथ्वीवरची जागी होणारी पहाट अलगद उतरवते.

.. पूर्व दिशा उजळते आणि नक्षत्रांच्या ज्योती विझत आहेत, झाडांवर वेलींवर फुलांची रांगोळी सजली आहे आणि गगन कसे तर तबकासारखे आणि रविकिरणांच्या तांबूस पिवळ्या प्रकाशास हळद-कुंकवाची उपमा देऊन जणू हळद कुंकवाचे हे आकाशरुपी तबक उषेचं स्वागत करत आहे.  या तिसऱ्या कडव्यातलं हे कल्पना दृश्य कसं सजीवपणे शब्दांतून आकारले आहे. या संपूर्ण गीतात हळूहळू उलगडणारी ही सकाळ अतिशय मनभावन आहे.

शेवटच्या आणि चौथ्या कडव्यात जागं झालेलं मानवी जीवन, घरे दारे,गुरे, वासरे यांचं वाहतं वर्णन वास्तव घेऊन उतरतं. आणि शेवटच्या दोन ओळी…

..  क्षणाक्षणांनी काळाचेही पाऊल पुढती पडते

    रात्र काळी संपली किरण सांगते…

या ओळी वाचल्यानंतर या संपूर्ण वर्णनात्मक गीतातला गर्भित आत्माच उघडतो.  संपूर्ण गीताला वेगळ्याच अर्थाची कलाटणी मिळते.  मग मला हे गीत रूपकात्मक वाटले. रात्र काळी संपली हे शब्द आश्वासक  भासले. निसर्गचक्रामध्ये जे अव्याहत, नित्यनेमे घडत असते त्याचा मानवी जीवनाशी, भावविश्वाशी संदर्भ असतो. रोजच येणाऱ्या आणि जाणाऱ्या उषा आणि निशा या माणसाच्या जीवनातल्या सुखदुःखाशी रूपक साधतात.  काळ म्हणजे आलेली परिस्थिती आणि किरण म्हणजे मार्गदर्शक गुरु किंवा आशावाद.  काळाचे पाऊल पुढती पडते म्हणजेच आजची परिस्थिती उद्या नसणार आहे हे सत्य. स्थित्यंतर हे नैसर्गिकच आहे.  त्यामुळे संकटाची, दुःखाची, नैराश्याची काळी रात्र संपून केशराची वस्त्रे लेऊन सकाळ होणार आहे. ही केशरी वस्त्रे म्हणजे आनंदाची प्रतीके. नवा दिवस,नवी स्वप्ने. तमाकडून प्रकाशाकडे होणारी वाटचाल.

ज्यावेळी या अर्थाने मी हे गीतात्मक काव्य वाचले तेव्हा मला शब्दाशब्दामध्ये दडलेलं एक सकारात्मक तत्व सापडलं आणि मग हे गीत केवळ वर्णनात्मक न राहता जीवनाला खूप मोठा रचनात्मक संदेश देणारं ठरतं.  एक लक्षात आलं की या सर्वच सहासष्ट कवितांमध्ये निसर्ग आणि मानवाचं एक अतूट भावात्मक नातं शब्दांनी रंगवलेलं आहे.

खरोखरच पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा या कविता देव्हाऱ्यातली एखादी पोथी वाचताना जी प्रसन्नता आणि ऊर्जा मिळते तद्वतच या कविता वाचताना मन प्रफुल्लित होते.  वाचकांनी या काव्यवाचनाचा जरूर आनंद घ्यावा हे मी आवर्जून सांगते.

सुहास पंडितांनी त्यांच्या अर्पण पत्रिकेत म्हटलं आहे,

       रसिका तुझ्याचसाठी हे शब्द वेचले मी 

       रसिका तुझ्याचसाठी हे गीत गुंफले मी..

कवी आणि वाचकाचं नातं हे किती महत्त्वाचं असतं याची जाण त्यांच्या या शब्दातून व्यक्त होते.  या सुंदर काव्यरचनांबद्दल मी  श्री सुहास पंडित यांचे मनापासून अभिनंदन आणि वाचकांना दिलेल्या या सुंदर भेटीबद्दल धन्यवाद देऊन  त्यांच्या या सुरेल  काव्यप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते.

परिचयकर्त्या : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #196 ☆ ख्वाब : बहुत लाजवाब ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख ख्वाब : बहुत लाजवाब। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 196 ☆

ख्वाब : बहुत लाजवाब 

‘जो नहीं है हमारे पास/ वो ख्वाब है/ पर जो है हमारे पास/ वो लाजवाब है’ शाश्वत् सत्य है, परंतु मानव उसके पीछे भागता है, जो उसके पास नहीं है। वह उसके प्रति उपेक्षा भाव दर्शाता है, जो उसके पास है। यही है दु:खों का मूल कारण और यही त्रासदी है जीवन की। इंसान अपने दु:खों से नहीं, दूसरे के सुखों से अधिक दु:खी व परेशान रहता है।

मानव की इच्छाएं अनंत है, जो सुरसा के मुख की भांति निरंतर बढ़ती चली जाती हैं और सीमित साधनों से असीमित इच्छाओं की पूर्ति असंभव है। इसलिए वह आजीवन इसी उधेड़बुन में लगा रहता है और सुक़ून भरी ज़िंदगी नहीं जी पाता। सो! उन पर अंकुश लगाना अनिवार्य है। मानव ख्वाबों की दुनिया में जीता है अर्थात् सपनों को संजोए रहता है। सपने देखना तो अच्छा है, परंतु तनावग्रस्त  रहना जीने की ललक पर ग्रहण लगा देता है। खुली आंखों से देखे गए सपने मानव को प्रेरित करते हैं करते हैं, उल्लसित करते हैं और वह उन्हें साकार रूप प्रदान करने में अपना सर्वस्व झोंक देता है। उस स्थिति में वह आशान्वित रहता है और एक अंतराल के पश्चात् अपने लक्ष्य की पूर्ति कर लेता है।

परंतु चंद लोग ऐसी स्थिति में निराशा का दामन थाम लेते हैं और अपने भाग्य को कोसते हुए अवसाद की स्थिति में पहुंच जाते हैं और उन्हें यह संसार दु:खालय प्रतीत होता है। दूसरों को देखकर वे उसके प्रति भी ईर्ष्या भाव दर्शाते हैं। ऐसी स्थिति में उन्हें अभावों से नहीं; दूसरों के सुखों को देख कर दु:ख होता है–अंतत: यही उनकी नियति बन जाती है।

अक्सर मानव भूल जाता है कि वह खाली हाथ आया है और उसे खाली हाथ जाना है। यह संसार मिथ्या और  मानव शरीर नश्वर है और सब कुछ यहीं रह जाना है। मानव को चौरासी लाख योनियों के पश्चात् यह अनमोल जीवन प्राप्त होता है, ताकि वह भजन सिमरन करके अपने भविष्य को उज्ज्वल बना सके। परंतु वह राग-द्वेष व स्व-पर में अपना जीवन नष्ट कर देता है और अंतकाल खाली हाथ जहान से रुख़्सत हो जाता है। ‘यह किराये का मकान है/ कौन कब तक रह पाएगा’ और ‘यह दुनिया है एक मेला/ हर इंसान यहाँ है अकेला’ स्वरचित गीतों की ये पंक्तियाँ एकांत में रहने की सीख देती हैं। जो स्व में स्थित होकर जीना सीख जाता है, भवसागर से पार उतर जाता है, अन्यथा वह आवागमन के चक्कर में उलझा रहता है।

जो हमारे पास है; लाजवाब है, परंतु बावरा इंसान इस तथ्य से सदैव अनजान रहता है, क्योंकि उसमें आत्म-संतोष का अभाव रहता है। जो भी मिला है, हमें उसमें संतोष रखना चाहिए। संतोष सबसे बड़ा धन है और असंतोष सब रोगों  का मूल है। इसलिए संतजन यही कहते हैं कि जो आपको मिला है, उसकी सूची बनाएं और सोचें कि कितने लोग ऐसे हैं, जिनके पास उन वस्तुओं का भी अभाव है; तो आपको आभास होगा कि आप कितने समृद्ध हैं। आपके शब्द-कोश  में शिकायतें कम हो जाएंगी और उसके स्थान पर शुक्रिया का भाव उपजेगा। यह जीवन जीने की कला है। हमें शिकायत स्वयं से करनी चाहिए, ना कि दूसरों से, बल्कि जो मिला है उसके लिए कृतज्ञता ज्ञापित करनी चाहिए। जो मानव आत्मकेंद्रित होता है, उसमें आत्म-संतोष का भाव जन्म लेता है और वह विजय का सेहरा दूसरों के सिर पर बाँध देता है।

गुलज़ार के शब्दों में ‘हालात ही सिखा देते हैं सुनना और सहना/ वरना हर शख्स फ़ितरत से बादशाह होता है।’

हमारी मन:स्थितियाँ परिस्थितियों के अनुसार परिवर्तित होती रहती हैं। यदि समय अनुकूल होता है, तो पराए भी अपने और दुश्मन दोस्त बन जाते हैं और विपरीत परिस्थितियों में अपने भी शत्रु का क़िरदारर निभाते हैं। आज के दौर में तो अपने ही अपनों की पीठ में छुरा घोंपते हैं, उन्हें तक़लीफ़ पहुंचाते हैं। इसलिए उनसे सावधान रहना अत्यंत आवश्यक है। इसलिए जीवन में विवाद नहीं, संवाद में विश्वास रखिए; सब आपके प्रिय बने रहेंगे। जीवन मे ं इच्छाओं की पूर्ति के लिए ज्ञान व कर्म में सामंजस्य रखना आवश्यक है, अन्यथा जीवन कुरुक्षेत्र बन जाएगा।

सो! हमें जीवन में स्नेह, प्यार, त्याग व समर्पण भाव को बनाए रखना आवश्यक है, ताकि जीवन में समन्वय बना रहे अर्थात् जहाँ समर्पण होता है, रामायण होती है और जहाल इच्छाओं की लंबी फेहरिस्त होती है, महाभारत होता है। हमें जीवन में चिंता नहीं चिंतन करना चाहिए। स्व-पर, राग-द्वेष, अपेक्षा-उपेक्षा व सुख-दु:ख के भाव से ऊपर उठना चाहिए; सबकी भावनाओं को सम्मान देना चाहिए और उस मालिक का शुक्रिया अदा करना चाहिए। उसने हमें इतनी नेमतें दी हैं। ऑक्सीजन हमें मुफ्त में मिलती है, इसकी अनुपलब्धता का मूल्य तो हमें कोरोना काल में ज्ञात हो गया था। हमारी आवश्यकताएं तो पूरी हो सकती हैं, परंतु इच्छाएं नहीं। इसलिए हमें स्वार्थ को तजकर,जो हमें मिला है, उसमें संतोष रखना चाहिए और निरंतर कर्मशील रहना चाहिए। हमें फल की इच्छा कभी नहीं करनी चाहिए, क्योंकि जो हमारे प्रारब्ध में है, अवश्य मिलकर रहता है। अंत में अपने स्वरचित गा त की पंक्तियों से समय पल-पल रंग बदलता/ सुख-दु:ख आते-जाते रहते है/ भरोसा रख अपनी ख़ुदी पर/ यह सफलता का मूलमंत्र रे। जो इंसान स्वयं पर भरोसा रखता है, वह सफलता की सीढ़ियाँ चढ़ता जाता है। इसलिए इस तथ्य को स्वीकार कर लें कि जो नहीं है, वह ख़्वाब है;  जो मिला है, लाजवाब है। परंतु जो नहीं मिला, उस सपने को साकार करने में जी-जान से जुट जाएं, निरंतर कर्मरत रहें, कभी पराजय स्वीकार न करें।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 128 ⇒ बुनियाद… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “बुनियाद।)  

? अभी अभी # 128 ⇒ बुनियाद? श्री प्रदीप शर्मा  ? 

 

बुनियाद को हम नींव भी कह सकते हैं, नींव के पहले पत्थर को हम शिलान्यास कहते हैं। सबसे बड़ी नींव होती है, शुभ संकल्प ! किसी के कल्याण अथवा हित के लिए जो पहला कदम उठाया जाता है, बस वहीं से उस कार्य की नींव पड़ जाती है।

एक पक्षी भी नीड़ का निर्माण करता है, सर्दी, पानी, ठंड से बचने के लिए घोंसले का निर्माण करता है, एक चूहे को भी बिल की तलाश होती है और एक शेर को भी अपनी मांद अथवा गुफा की। और तो और जहरीले सांप भी अपनी सुरक्षा और संवर्धन के लिए पाताल तक जाने के लिए तत्पर हो जाते हैं।।

जितना बड़ा जीवन उतनी ही अधिक सुरक्षा की तैयारी। किसी देश अथवा संस्कृति का जन्म यूं ही नहीं हो जाता। सदियां लगती हैं उसको बनने और संवरने में। कई उतार चढ़ाव, उथल पुथल और उत्थान पतन के नियति चक्र से गुजरने के बाद ही उसका अस्तित्व कायम रह पाता है। Rome was not built in a day.

हमारे स्वर्णिम अतीत पर भी कई बार ग्रहण लगा, लेकिन जहां बुनियाद मजबूत होती है, वहां मुसीबतें आंधी और तूफान की तरह आती रहती हैं, हमें लगातार झकझोर और कमजोर करने की कोशिश भी करती रहती है, लेकिन हम जिस परिश्रम, पसीने और बलिदान की मिट्टी से बने हैं, उसे देखते हुए वह थक हारकर वापस चली जाती है।।

हमारी आज की सफलता, सुरक्षा और मजबूती का श्रेय भी हमारी मजबूत बुनियाद को ही जाता है, जो तब रखी गई थी, जब हम पैदा भी नहीं हुए थे। आप जीवन में कितने भी आगे बढ़ जाएं, पढ़ लिख जाएं, भले ही देश के राष्ट्रपति बन जाएं, लेकिन अपने खुद के बाप नहीं बन सकते। जबकि लोग आपके पिताजी को अवश्य कह सकते हैं, यह देखो, राष्ट्रपति का भी बाप जा रहा है।

राष्ट्र आपकी धरोहर है, बपौती नहीं, क्योंकि ऐ मां, तेरे बच्चे कई करोड़। सबका इस देश पर उतना ही अधिकार है जितना आपका और मेरा। एक संयुक्त परिवार के जिम्मेदार सदस्य की भांति आप भी परिवार की देखभाल कीजिए और अपना उत्तरदायित्व निभाइए, लोकतांत्रिक व्यवस्था का हिस्सा बनिए, और नि:स्वार्थ रूप से देश की सच्ची सेवा कीजिए।।

इतनी भी सावधानी जरूरी है कि कोई अवांछित तत्व आपकी लोकतंत्र की नींव को कमजोर अथवा खोखली ना कर दे। जब तक हमारे इरादे बुलंद है, हमारी इमारत भी बुलंद है। इसके रहनुमा बनें, रहगुजर बनें, आका अथवा अधिनायक नहीं क्योंकि यह भोली भाली जनता जिसे कभी सिर पर बैठाती है, समय आने पर उसे धूल भी चटा देती है।

अगर हमारे दिलों में एक दूसरे के लिए प्यार और परवाह है, तो बांटने के लिए बहुत है। लेकिन जहां दिलों में नफरत और वैमनस्य है, वहां सिर्फ दिलों का बंटवारा ही होता है, लोकतंत्र और इंसानियत की नींव हिल जाती है, केवल कोई देश ही नहीं, पूरी मानवता भी खतरे में पड़ जाती है।

हमारी इंसानियत जड़ें बहुत गहरी हैं, इन्हीं जड़ों ने हमें पूरे विश्व से जोड़ रखा है, क्योंकि पूरी वसुधा ही हमारी कुटुंब है। जय हिंद, जय जगत।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – भूमिकाएँ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – भूमिकाएँ ??

नहीं देना चाहता

कोई दोष तुम्हें,

तुम न छलते तो

कोई और छलता,

एक साधन बना,

एक निमित्त हुआ,

देह की अवधि

बीत जाने पर,

जब मिलेंगे विदेह,

अपने-अपने

अभिनय पर

आप इतराएँगे,

अपनी-अपनी

भूमिका के निर्वहन का

साझा उत्सव मनाएँगे!

© संजय भारद्वाज 

5:50 प्रात: 1.08.2022.

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares