☆ मध्य प्रदेश साहित्य अकादमी द्वारा श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ “श्री हरेकृष्ण देवसरे पुरस्कार” से सम्मानित – अभिनंदन ☆
भोपाल, 25 जुलाई 2023: मध्य प्रदेश साहित्य अकादमी ने श्री ओमप्रकाश क्षत्रिय प्रकाश को उनकी पुस्तक “बच्चों! सुनो कहानी” के लिए “श्री हरेकृष्ण देवसरे पुरस्कार” से सम्मानित किया है. यह पुरस्कार उन्हें बच्चों के साहित्य के क्षेत्र में उनके उत्कृष्ट योगदान के लिए दिया गया है.
श्री प्रकाश एक जाने-माने साहित्यकार हैं. उन्होंने कई पुस्तकें लिखी हैं, जिनमें से कई बच्चों के साहित्य से संबंधित हैं. उनकी पुस्तकें बच्चों के बीच बहुत लोकप्रिय हैं. वे बच्चों को ज्ञान, मनोरंजन और प्रेरणा प्रदान करती हैं.
श्री प्रकाश को यह पुरस्कार रविंद्र भवन भोपाल के अंजलि सभागार में आयोजित एक समारोह में दिया गया. इस समारोह में मशहूर अभिनेता और साहित्यकार आशुतोष राणा, नीमच जिला प्रभारी एवं संस्कृति मंत्री आदरणीय सुश्री उषा ठाकुर, साहित्य निदेशक मध्य प्रदेश आदरणीय डॉक्टर विकास दवेजी के कर कमलों से पुरस्कार प्राप्त हुआ. समारोह में देशभर के सुप्रसिद्ध और विख्यात साहित्यकार उपस्थित थे.
समारोह में सुश्री उषा ठाकुर ने श्री प्रकाश को पुरस्कार प्रदान करते हुए कहा कि वे एक प्रतिभाशाली साहित्यकार हैं और उन्होंने बच्चों के साहित्य को समृद्ध किया है. उन्होंने कहा कि श्री प्रकाश की पुस्तकें बच्चों को ज्ञान, मनोरंजन और प्रेरणा प्रदान करती हैं.
श्री प्रकाश ने पुरस्कार प्राप्त करते हुए कहा कि यह उनके लिए एक सम्मान की बात है. उन्होंने कहा कि वे साहित्य अकादमी के इस सम्मान से प्रेरित होकर और भी बेहतर रचनाएं लिखेंगे.
यह पुरस्कार श्री प्रकाश के लिए एक बड़ी उपलब्धि है. यह पुरस्कार उनके साहित्यिक योगदान को मान्यता देता है. यह पुरस्कार अन्य साहित्यकारों को भी प्रेरित करेगा कि वे भी बच्चों के साहित्य के क्षेत्र में अपना योगदान दें.
श्री हरेकृष्ण देवसरे पुरस्कार के बारे में
श्री हरेकृष्ण देवसरे पुरस्कार,मध्य प्रदेश सरकार द्वारा दिया जाने वाला एक साहित्यिक पुरस्कार है. यह पुरस्कार बच्चों के साहित्य के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान के लिए दिया जाता है. इस पुरस्कार के लिए पात्रता मानदंड हैं:
उम्मीदवार को भारतीय नागरिक होना चाहिए.
उम्मीदवार को कम से कम एक पुस्तक लिखी होनी चाहिए, जो बच्चों के साहित्य से संबंधित हो.
उम्मीदवार की पुस्तक को कम से कम एक वर्ष पहले प्रकाशित होना चाहिए.
यह पुरस्कार 51,000 रुपये, प्रतीक चिन्ह और अंग वस्त्र के रूप में दिया जाता है.
💐 ई- अभिव्यक्ति परिवार की और से श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ जी को इस विशिष्ट सम्मान के लिए हार्दिक बधाई 💐
– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
खायला, रहायला, आणि अंगावर घालायला मिळालं की माणसाच्या गरजा संपत नाहीत. वरच्या गोष्टी मिळाल्यावर किंवा मिळवताना माणसाला माणूसच लागतो. माणसाला महत्वाची गरज असते ती माणसाचीच. आणि हा त्याला सतत हवा असतो.
वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, इतकंच काय पैशाने देखील माणूस मोठा होतो. पण माणसाला मोठं करण्यात सहभाग असतो तो माणसाचाच. कोणताही माणूस एकटाच, आणि आपला आपलाच मोठा होत नाही.
बरेच कार्यक्रम हे कोणाच्या तरी नावाने होतात. अशा कार्यक्रमात साधारण तीन माणसं मोठी होतात. एक ज्याच्या नावाने कार्यक्रम आहे तो. या कार्यक्रमाला ज्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आहे तो दुसरा. आणि अशा कार्यक्रमात ज्यांच कौतुक होणार आहे तो तिसरा.
यातले तिघंही आधीच मोठे असू शकतात. पण अशा कार्यक्रमामुळे त्यांचा मोठेपणा वाढतो आणि अशा प्रत्येक कार्यक्रमानंतर तो वाढत जातो. पण कार्यक्रम यशस्वी करायला गरज असते ती माणसांची.
मनातलं दुःख सांगायला माणूस नसला तरी चालतो. पण आनंद व्यक्त करायला मात्र साथ लागते ती माणसाचीच. दु:ख वाटल्याने कमी होत, आणि आनंद वाटल्याने वाढतो अस म्हणतात. पण हे कमी करणारा आणि वाढवणारा फक्त आणि फक्त माणूसच असतो.
करमणूक म्हणून माणूस रेडिओ, टि.व्ही. यांचा आधार घेत असेल. यावर सुरू असणारे कार्यक्रम तो ऐकतो, बघतो. पण मनातलं तो यांना सांगू शकत नाही. आणि मग आपलं ऐकायला लागतो तो माणूस.
एखादी आनंदाची गोष्ट घडल्यावर ती कधी आणि कशी सांगू अशी घाई माणसाला होते. पण अशी गोष्ट वस्तूंना सांगून समाधान होत नाही. ते समाधान मिळवून देणारा असतो तो माणूस.
प्रवासातल्या काही वेळात सुध्दा माणूस सहप्रवाशाशी बोलत असतो. यात बऱ्याचदा प्रवास केव्हा संपतो ते कळत सुद्धा नाही.
स्पर्धेत सुध्दा कोणीतरी हरल्यामुळे जिंकणारा मोठा होतो. जिंकण्यासाठी सुध्दा हरवावं लागतं ते माणसालाच.
अनेक जण सकाळ, संध्याकाळ ठराविक वेळी, ठराविक रस्त्याने फिरायला जातात. यावेळी काही चेहरे नियमित दिसतात. पण आपसात ओळख मात्र नसते. असा ओळख नसलेला पण नेहमीचा चेहरा दिसला नाही तर थोड वेगळ वाटतंच. कारण… नेहमी दिसणारा माणूस आज दिसत नाही. यावेळी सुध्दा नजर शोधत असते ती त्या माणसाला.
माणसाला मोठं करण्यात माणसाचाच हात असतो. यातही सगळ्यात महत्वाचा हात असतो तो शिक्षक या माणसाचा. एक शिक्षक एकावेळी अनेकांना मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो. तो सुद्धा माणूसच घडवत असतो.
माणूस, भांडला तरी भांडतो माणसाशीच. यात चुकणारा, त्याला समजवणारा, आणि समेट घडवणारा असतो तो माणूसच.
आनंदाच्या वेळी मिठी मारत पाठीवर ठेवलेला, आणि संकटात खांद्यावर ठेवलेला एक हात बरंच काही सांगून जातो. तो हात असतो माणसाचा.
फक्त आपण माणूस आहे याची जाणीव ठेवायला हवी. कारण सोबत हवा असतो तो माणूस…
(मागील भागात आपण पहिले, – तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं. – आताइथून पुढे)
” काय म्हणतात आमचे जिजू?” एकीने विचारलं
“मजेत आहेत ” हर्षा उत्तरली ” सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी.म्हणून तर मी इकडे आले.दादा ,वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय.आई घरी एकटीच होती.म्हणून म्हंटलं आईलाही कंपनी आणि मुलंही बरेच दिवसात आजीला भेटली नव्हती.म्हणून मग आले इकडे”
” तुझ्या नवऱ्याला तुझा हा बालीशपणा आवडतो का गं?” दुसरीने टोचलं.हर्षाला जरा तिचा रागच आला पण तिला हे ही जाणवलं की प्रणव कधी तिला याबाबत बोलला नव्हता.वास्तविक ही जितकी चंचल,अवखळ तितकाच तो गंभीर आणि अबोल होता.तिच्या सासुबाईंनी तिच्या बालीशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील पण त्याने कधी त्याचा चुकूनही उल्लेख केलेला तिला आठवत नव्हता.
“काय माहीत!कधी बोलले तर नाहीत. कदाचित आवडतही असेल” ती जरा खट्याळपणेच म्हणाली.मैत्रीण चुप बसली.
हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रीणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचनमध्ये गेली.तिने झटपट शिरा भजी करुन प्लेट्स भरुन बाहेर आणल्या
“करुनच ठेवलं होतं की काय?”एकीने विचारलं
“नाही गं!आता केलंय.गरमच आहे बघ”हर्षा हसत म्हणाली.
“मग इतक्या झटपट?”
हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्तच होता.कधीकधी ती वेंधळेपणा करायची पण खुपदा फक्कड जमून जायचं
” खुप छान झालीहेत भजी आणि शिराही” एकजण म्हणाली
“चला याबाबतीत तरी आपली हर्षू मँच्युअर्ड आहे म्हणायची”दुसरीने टोमणा हाणला.तशा सगळ्या हसल्या.
“हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते.अगदी पाचवीत असल्यापासून ती पोळ्या करायची.अजूनही तिचं नवीननवीन पदार्थ करण्याचं वेड संपलेलं नाही. नोकरी करत असतांनाही ती सुटीच्या दिवशी काहीतरी नवीन करुन सर्वांना उत्साहाने खाऊ घालायची”
हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये.सदोदित उत्साहाने फसफसलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं.नोकरी करतांनाही ती आँफिसमध्ये कामात सर्वांच्या पुढे असायची.दिवसभराचं काम चारपाच तासात पूर्ण करुन ती बाँसकडे जाऊन दुसरं काम मागायची नाहीतर दुसऱ्यांना मदत करायची.तिच्या या वृत्तीमुळे ती बॉससकट सर्वांचीच लाडकी होती.म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिने राजीनामा दिला तेव्हा कंपनीने तिला ती मागेल तो पगार देण्याची तयारी दाखवली होती.अर्थातच तिने नकार दिला होता.
मैत्रिणी गेल्या तसं प्रियाला हायसं वाटलं.त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती.ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती.तिला त्याबद्दल खुप काही सांगायचं होतं पण मैत्रीणींना त्यात काडीचाही रस नव्हता.सध्या ती खुप पुस्तकं वाचत होती.त्याबद्दलही तिला बोलायचं होतं.पण मुलं,नवरा,सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रीणींना आवडत नव्हतं.
संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली.मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाहीये हे पाहून तिनेही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं.झोक्यावरुन उतरतांना तिथे मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघताहेत हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली.
तीन दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली.दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रांसहून परतला.
उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या होत्या.शाळेतली मुलं कॉलन्या कॉलन्यात क्रिकेट खेळायची.हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरु होतं.भाजीबाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले.तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असतांना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची.ती बँटिंग आणि बाँलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टिममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची.हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावीळ झाली.
“ए मी खेळू का रे तुमच्या सोबत?”
तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली
“काकू हा लेडीज गेम नाहिये.तुम्हांला बँट तरी हातात धरता येते का?”एक मुलगा चेष्टेने म्हणाला तशी हर्षा उसळून म्हणाली
” तुम्ही सगळे बँटिंग करा.तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बँटिंग करेन.चालेल?”
पोरं आनंदाने तयार झाली.
बऱ्याच वर्षांनी बाँल हातात घेतल्यामुळे तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते.पोरं ती मस्त चोपत होती.पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सपाटा लावला.सातही पोरांना आऊट करुन तिने बँटिंग करायला सुरुवात केली.चार पाच चेंडू सरळ खेळल्यावर तिने मग जोरदार फटके लगवायला सुरुवात केली.एक चेंडू तर तिने पार एका दोनमजली इमारतीवरुन भिरकावून दिला.पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली.
“काकू त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बाँल बसला.त्या बाँल देतच नाहीयेत.त्या तुम्हांला बोलवताहेत.तुम्ही जाऊन घेऊन या ना!”
हर्षा विचारात पडली.रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळ बाई होती.तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरुन तिला नाही नाही ते बोलणार हे नक्की होतं.
” जाऊ द्या मुलांनो.मी तुम्हांला पैसे देते तुम्ही नवा बाँल घेऊन या “मुलं खुष झाली. तिने आत जाऊन पैसे आणून मुलांना दिले.मुलं नवीन बाँल आणायला गेली.हर्षाने प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडला तर थोड्याच वेळाने रणदिवे मावशी उपटली.तिने हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चांगलंच फैलावर घेतलं.तिच्या बालिशपणावरुन हर्षाला नाही नाही ते बोलली.
“अगं तुला काही लाजबिज वाटत नाही का त्या लहान पोरांमध्ये खेळायला?आता तरी सुधर.तू काही लहान नाही.दोन मुलांची आई आहे तू”अशी ताकीद देऊन गेली.ती गेल्यावर हर्षाला रडू आलं.एक प्रकारची विचित्र उदासिनता तिला वाटू लागली.
संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसुम होती.केतकी आणि मिहिर काहीतरी खेळत बसले होते.हर्षा बेडरुममध्ये पुस्तक वाचत पडली होती.पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं.दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता.
“काय गं केतकी आज घरात इतकी शांतता का बरं?”प्रणवने विचारलं
” त्या मागच्या काँलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खुप बोलून गेल्या.म्हणून आई रडतेय”
” आईला बोलून गेल्या?पण का?”
केतकीने त्याला सगळा किस्सा त्याला सांगितला.प्रणवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.तो बेडरुममध्ये गेला.त्याला पाहून ती उठून बसली पण तिचा उदास,रडवेला चेहरा त्याच्या लक्षात आला.
“काय गं असा चेहरा पाडून काय बसलीयेस?”
“नाही. काही नाही असंच!”
” सांगितलं मला केतकीने सगळं.मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे?”हर्षा रडायला लागली.रडतारडता म्हणाली
“सगळेच मला म्हणतात की तू लहान आहेस का लहान मुलांमध्ये खेळायला?आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या.माझी आई,वहिनी,माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात.आता मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु?मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं”
जन्मगाव पाचगणी असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाई पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील निसर्गरम्य जागेवर जावून अनेक जलरंगातील चित्रे रेखाटनाचा नाद लहानपणापासून आहे. या परिसरातील पाच हजारांपेक्षा जास्त चित्रे रेखाटलेली आहेत. त्यांचे प्रदर्शन मुंबईच्या सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर मुंबई, ऑबेरॉय टॉवर्स, म्युझियम आर्ट गॅलरी येथे व पुण्यात बालगंधर्व येथे प्रदर्शने केलेली आहेत. अनेक प्रसिद्ध कलारसिक लोकांनी चित्रे विकत घेतलेली आहेत. लेखन, वाचन, चित्रकला, बागकाम, कॅलिग्राफी, फिरणे, रेखाटने करणे, गाणी ऐकणे, निसर्गात रममान होणे व शांत राहणे हे आवडीचे छंद आहेत.
मनमंजुषेतून
☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे☆
आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित, नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात… आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते… एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.
अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्तेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात… असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे…. माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण- धगधग मनात साठलेली असते .
1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्या काळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते. त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात….
मला वाई, पाचगणी , महाबळेश्वरचा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणीमध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती. या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्याजवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला. त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरीचे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही. तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली. अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली. मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यावसायिकरित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली …
मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला. पुढे पाचगणी क्लब, टेबल लँडवरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले. मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली जवळपास 200 ओरिजिनल जलरंगातील निसर्गचित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही. उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली… आणि पूर्ण देखील केली… आणि जी अवहेलना केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .
अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही, अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो. तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.
आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही.. सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ? कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.
पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते. दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो. ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला, या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवताच्या व काट्याकुट्यांच्या मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती .
मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो. मला कशाचेही भान राहिले नव्हते. कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो…. आणि… अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली. डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकने मला कडकडून मिठी मारली. माझे डोळे पुसले, माझे सांत्वन केले, आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली.
आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा. संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा . मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा. चालताना देखील धावत धावत चालायचा… आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता.
☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)
देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या ऋचा उषा देवातेला आवाहन करतात.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
☆
आ व॒ इंद्रं॒ क्रिविं॑ यथा वाज॒यन्तः॑ श॒तक्र॑तुम् । मंहि॑ष्ठं सिञ्च॒ इन्दु॑भिः ॥ १ ॥
देवेंद्राचे सामर्थ्य असे शतधेने चंड
सकलांना अति प्रीय जीवाला शचीवल्लभ इंद्र
ऋत्विजांनो हरवून जाता इंद्रस्तुती करिता
बावेसम त्या तुडुंब भरुनी सोमरसा पाजू त्या ||१||
☆
श॒तं वा॒ यः शुची॑नां स॒हस्रं॑ वा॒ समा॑शिराम् । एदु॑ नि॒म्नं न री॑यते ॥ २ ॥
क्षीरासह ते सहस्र वा शत शुद्ध सोम चमस
स्वीकारून घेई प्रेमाने प्रियबहु इंद्रास
सरितेच्या पाण्याला जैशी ओढ उताराची
शचीपतीला मनापासुनी आवड सोमरसाची ||२||
☆
सं यन्मदा॑य शु॒ष्मिण॑ ए॒ना ह्यस्यो॒दरे॑ । स॒मु॒द्रो न व्यचो॑ द॒धे ॥ ३ ॥
स्तो॒त्रं रा॑धानां पते॒ गिर्वा॑हो वीर॒ यस्य॑ ते । विभू॑तिरस्तु सू॒नृता॑ ॥ ५ ॥
अभिष्टस्वामी हे देवेंद्रा स्तुतीप्रीय असशी
आळविता स्तोत्रांना झणी तू धावूनिया येशी
पराक्रमी वीरा तव स्तोत्रांना आम्ही गातो
अखंड वैभव प्रसन्न होवुनी आम्हाला तू देतो ||५||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)