(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना “सॉनेट – महर्षि महेश योगी”।)
(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा लोकमान्य तिलक जी की जयंती पर विशेष रूप से रचित “लोकमान्य तिलक…” का हिन्दी छंद बद्ध भावानुवाद । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ कविता लोकमान्य तिलक जयंती विशेष – “लोकमान्य तिलक …” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆
हे तिलक ! सच थे तिलक तुम माँ के उन्नत भाल के
थे हृदय सम्राट तुम भारत के अपने काल के ।
☆
सिखायी स्वातंत्र्य की तुमने सही आराधना
संकटों में भी सतत चलती रही तव साधना ।
☆
देश के प्रति प्रेम की औं’ त्याग की तुम मूर्ति थे
निडर, निश्छल, सत्य, दृढ़ता की सुदृढ़ प्रतिमूर्ति थे ।
(ॲनिमल फार्म ” आणि ” 1984 ” या दोन प्रसिद्ध साहित्य कृतीनी विसाव्या शतकात खपाचा उच्चांक गाठला होता. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. जॉर्ज ऑरवेलला केवळ 46 वर्षांचे इतके अल्प आयुष्य लाभले . 21 जानेवारी 1950 मध्ये लंडनमध्ये त्याचे निधन झाले.)
“ॲनिमल फार्म ” ही नुसती परिकथा किंव्हा मनोरंजनात्मक कादंबरी नसून तत्कालीन साम्यवादी व्यवस्थेवरील टीका, रशियामध्ये घडलेली बोलशेविक क्रांती ,आणि स्टॅलीनने केलेला सामान्यांचा विश्वासघात, आणि जुलूम केलेल्याचे ते रूपक आहे .शतकातील राजकीय उपहासात्मक आणि कलात्मक रितीने, प्रथमच लिहिलेल्या साहित्य प्रकारातील सर्वाधिक
प्रसिद्ध कादंबरी ! त्याने एका निबंधात म्हटले आहे,” मी जेव्हा लिहायला बसतो , तेव्हा माझ्यासमोर जे असत्य असते, ते मला लिखाणातून उघड करायचे असते “. आणि त्याने त्याप्रमाणे बोल्शेविक क्रांतीची भ्रामक बाजू उघडकीस आणली.
“Friends of fatherless, fountain of happiness —– – – – -like the sun in the sky. Comrade Nepoleon. झेंड्याचा रंगही बदलला .सगळं पहाताना प्राण्यांचा गोंधळ व्हायला लागला. पवन चक्की चा दगड ओढताना बॉक्सर जखमी झाला.
अत्यंत स्वाभिमानाने प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या बॉक्सरला “दवाखान्यात नेतो”असं खोटं सांगून कसायाकडे पाठवलं जातं .बेंजामिन गाढवाला सगळं कळत होत. पण गप्प बसून तो सगळं पाहत होता इतर प्राणी खवळले .” नेपोलियन महान आहे असं शेवटी बॉक्सर बोलला, आणि त्याला वीर मरण आले ” असं स्क्विलर ने सांगून सर्वांचा राग शांत केला.
हळूहळू डुकरे (बोलशेविक) पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागायला लागतात. सर्वसामान्यांना काहीच कळत नाही . जी तात्विक मू ल्ये दाखवून सत्तेवर आले , ती मूल्ये बदलून, पूर्वीचे आणि आत्ताचे सत्ताधारी मॅनोर फार्म वर गप्पा मारत असतात. सगळे प्राणी खिडकीतून पाहतात . त्यांना प्राणी आणि माणसात काहीच फरक कळत नाही. सर्वसामान्यांना गप्प बसण्या वाचून मार्ग नसतो. येथे कादंबरीचा शेवट होतो.
सध्या गृहिणी व व्यावसायिका दोन्ही भुमिकेत कार्यरत. सोशल मिडियावर विविध विषयांवर लेखन करण्याची आवड. १४ कथा लिहून पुर्ण.
जीवनरंग
☆ ऑनलाईन… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆
नयना आज जाम खुश होती.. ‘आजकल पाँव जमींपर नही रहते मेरे..’ असंच काहीतरी झालेले.. आरशात पाहतानाही ती गाणं गुणगुणत होती.. स्वतःचेच प्रतिबिंब न्याहाळतांनाही तिची गालावरची खळी अधिकच सुंदर दिसली तिला.. नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा झालेला तिचा. तिच्या दोन्ही मुलांनी छान प्लॅन करुन लाँग डिस्टिनेशनला ह्या दोघांना पाठवलेले..
सुभाष, तिचा नवरा मोठ्ठा बिझनेसमन.. रग्गड पैसा, ऐशोआराम असलेले कुटुंब.. सुभाष थोडा अहंकारी.. स्वयंकेंद्री.. ‘मी’ आणि ‘माझे’ हे शब्द जेव्हा बोलण्यात येतात.. तेव्हाच खरं तर अहंकाराचा दर्प यायला लागतो..
सुखात लोळत असलेली नयना.. काहीच कमी नव्हते तिला खरं तर.. स्मार्ट,राजबिंडा आणि श्रीमंत नवरा, दोन सोन्यासारखी मुलं.. मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला.. मुंबईच्या रेप्युटेड कॉलेजला.. मुलगी रिया ह्यावर्षी आर्किटेक्ट होणार होती.. दोघेही मित्र परिवारात रममाण..
नयना मुळातच सौंदर्यवती.. माहेरची परिस्थिती यथातथाच.. परिस्थितीशी तोंडमिळवणी करत मोठी झालेली.. सुभाषशी लग्न झाल्यानंतर तिचा उत्कर्ष झाला.. तसे सुभाषनेही शुन्यातनं जग निर्माण केलेले.. पण भरपूर कमावत होता.. यशशिखरे चढत होता..
लग्न झाले तसे नयनाला नोकरी न करण्याची सक्त ताकीदच देऊन टाकली त्यानं.. आता मी भरपूर कमावतोय.. तु फक्त घर आणि मुलं सांभाळ.. बस्स.. नयनानेही ठरवलं.. घरात रहायचे.. राजाची राणी होऊन राज्य करायचे.. रमली बिचारी संसारात..
लग्नानंतर अधिक सुंदर दिसायला लागली होती.. सुखाचे बाळसंही चढले होते तिच्यावर.. पण संसाराच्या रामरगाड्यात ती स्वतःला आरशात पहायलाही विसरली..
सुभाषही यशाच्या मागे धावत होता.. एक टिपिकल जोडपे झाले होते ते.. मुलं मोठी होत होती.. तसतशी नयनाला स्वतःसाठी वेळ मिळायला लागलेला.. समाजात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास आलेल्या सुभाषला बायको मेणाची बाहुली वाटायची.. पार्ट्या, मिटिंग्जमध्ये बिझी असलेला सुभाष नयनाला पार्टीपुरता बाहेर न्यायचा..
घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर.. फक्त घराकडे लक्ष द्यायचे काम नयनाकडे.. जेवण-खाणं उरकले की नयना वामकुक्षी घ्यायची.. संध्याकाळी किटी पार्टी, मैत्रीणींबरोबर शॉपिंग असा नित्यक्रम असे..
सुभाषचे हल्ली पिणंही वाढले होते.. पैसा भरपूर असला म्हणजे सुख असतेच असे नाही.. लक्ष्मीबरोबर अलक्ष्मी यायला कितीसा वेळ लागतो…
नयना आजकाल काहीशी विचारात गढली होती.. एकटेपण डाचत होते तिला.. जुने दिवस आठवत होते तिला.. जेव्हा नवीन लग्न झाले होते त्यांचे.. तेव्हाचे मोरपंखी दिवस.. हवेत उडत होती ती.. सुभाषचे कौतुकाने तिच्याकडे पहाणे.. मन बहरुन यायचे तिचे.. त्याच्या प्रेम भरल्या तुडुंब नजरेने तिचं आयुष्य सुखावून गेले होते..
मध्यंतरीचा एक प्रसंग तिला उध्वस्त करुन गेला.. रात्रीचे बारा वाजून गेले तरीही सुभाष घरी परतला नव्हता.. पहाटे चार वाजता गेटचा आवाज आल्याने ही ताड्कन उठली.. झिंगतच आला होता तो.. हिने विचारले का उशीर झाला तर श्रीमुखात भडकवली त्याने.. ‘तुला काय करायचे आहे..’ वगैरे वगैरे.. ‘तुला काय माहीत मला किती कामाचा ताण आहे ते… तु काय घरीच असतेस..’ हे असे पहिल्यांदा ऐकत होती ती.. तिला प्रकर्षांने तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली.. तिच्या मुलीनं हे पाहिले.. ‘सकाळी बोलू गं आई..’ म्हणून समजावलं.
सकाळी नयना दैनंदिन कामाला लागली.. पण मन उदासच होते.. तिचा भ्रमाचा भोपळा फुटला होता.. तिला आपण कमी शिकलो आहोत.. बाहेरचे काहीच व्यवहार ज्ञान नाही ह्याची जाणीव झाली होती..
मुलगी उठली तशी आईला येऊन बिलगली.. हिचाही केव्हाचा दाबून ठेवलेला अश्रुंचा बांध फुटला.. “आई रडू नकोस.. तुला मी आजपासून मोबाईल शिकवणार आहे.. शिकशील ना??” थोडे आढेवेढे घेत नयना तयार झाली..
मग काय, नयनाच्या अँड्रॉइड मोबाईल स्क्रीनवर फेसबुक, व्हाट्सअप विराजमान झाले.. छान रमली त्यात नयना.. फेसबुक तर तिचे फेवरेट झाले.. विविध माहिती, मित्र मैत्रीणी ह्यातच तिचा वेळ जाऊ लागला.. ते आभासी जग सत्यापेक्षाही छान होते तिच्यासाठी..
एक दिवस मेसेंजर किणकिणला.. आकाश काळे नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली.. आतापर्यंत नयना माहिर झाली होती फेसबुक हाताळण्यात.. आकाशचे प्रोफाइल चेक केले तिनं झटकन.. दिसायला हँडसम.. एम.बी.ए. झालेला तरुण.. एक दोन म्युच्युअल मित्र मैत्रिणी होते.. रिक्वेस्ट स्विकारली तिनं..
दहा मिनिटात मेसेंजर पुन्हा किणकिणला.. “हाय, मी आकाश.. कशा आहात??”
ही “मी मजेत.. तुला मी ओळखत नाही..”
“हो, पण मी तुम्हाला खुप दिवसांचे फॉलो करतोय..”
“अच्छा.. मग??”
“तुमच्याशी बोलायचे म्हणून…
तुम्ही खुप छान दिसता..”
“थँक्स..” इथपासून सुरू झालेला प्रवास पर्सनल गोष्ट शेअर करण्यापर्यंत कधी पोहचल्या हे समजलेच नाही..
आकाश तिचे जग बनला.. त्याचा मेसेज आला नाही तर ती अस्वस्थ व्हायची.. तिला एका कंप्यानिअनची गरज असताना आकाश तिच्या आयुष्यात आला आणि तिचे जग बदलले होते.. आरशात स्वतःला न्याहाळायला लागली होती.. एक नवी पालवी फुटली होती तिच्या आयुष्यवेलीवर..
आकाशच्या स्तुतीसुमनांनी ती आनंदी बनली होती.. सुभाषने दिलेल्या शब्दांच्या डागण्यांवर आकाश ने केलेली स्तुती मलमाचे काम करत होती.. पण तिला काय माहिती होते हे सर्व आभासी जग आहे.. हा पाण्याचा बुडबुडा आहे.. तो प्रवाहात नाहिसा होणारच..
त्यादिवशी सकाळीच तिनं नेट सुरु केले.. आकाशचा मेसेज होता.. ‘मला तुला भेटायचे आहे.. मला पैशाची गरज आहे खुप.. आई आजारी आहे खुप.. दहा हजार तरी हवेत..’
हिने विचार केला, मेसेज केला ‘मुलीला सांगून बघते..’ हे वाचताच.. आकाश offline झाला.. पुढचा मेसेज गायब झाला.. त्या दिवशीपासून रोज प्रेमकविता लिहिणारा आकाश इनबाँक्समधे फिरकलाच नाही.. नयना पुन्हा उदास झाली..
खरं तर कुठे गुंतायचे नाही हे ठरवले की अश्या समस्या उद्भवत नाहीत.. कुठे थांबायचे हे कळलं की मृगजळही कोसो दूर पळतय..
मुलीनं नयनाला असे दुःखी पाहिले तसे बाबाशी बोलायचे ठरवले.. “आई एकटी पडली आहे बाबा.. तिला आता तरी सावरा.. या फेजमधे तिला तुमची गरज आहे..”
सुभाषलाही त्याची चूक समजली.. नयनालाही तिची चूक समजली होती.. तिला चुकीचे प्रायश्चित्त हवं होतं.. सुभाषच्या साथीनं पुढे जायचे होते.. तिनं आता ठरवलं होते ऑनलाइन फ्रेंडशिप नॉट अलाऊडेड.. जे दिसते ते सोनेच असते असे नाही.. ऑनलाइनमधे सबकुछ दिखावा है हे तिला चांगलेच समजले होते..
संग्राहक : सुश्री प्रांजली लाळे
मो न. ९७६२६२९७३१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पहिली गोष्ट आहे चार चाकी गाडी चालवण्याच्या परवान्याची (लायसन्स) परीक्षा देणाऱ्या एका तरुणीची.
परीक्षक तिला विचारतात, “मी आज तुम्हाला परत तोच प्रश्न विचारतो – समजा तुम्ही एका अरुंद गल्लीतून गाडी चालवत आहात, गल्लीच्या दोन्ही बाजूला लागूनच इमारती आहेत, गाडीव्यतिरीक्त एकच माणूस जाऊ शकेल एवढीच जेमतेम जागा शिल्लक आहे आणि समोर रस्त्याच्या एका कडेला तुमचा नवरा आहे आणि दुसऱ्या साईडला तुमचा भाऊ आहे, तर तुम्ही काय माराल ? What will you hit ?”
गेल्या दोन परीक्षांत याच परीक्षकांनी तिला हाच प्रश्न विचारला होता, दोन्ही वेळा तिने “नवरा” असं उत्तर दिलं होतं आणि तिला नापास केले गेले होते. आज तिनं पवित्रा बदलला आणि ती म्हणाली, “मी विचार बदलला आहे. मी भावावर गाडी घालेन. I will hit him.”
ती आशेने परीक्षकांकडे पहात होती आणि परीक्षकांनी बोलायला सुरुवात केली …
दुसरी कथा आहे एका कारकीर्द समुपदेशकाची – करीअर कौन्सेलरची. संघ व्यवस्थापन – टीम मॅनेजमेंट शिकवण्यासाठी, त्याने आलेल्या सर्व प्रशिक्षार्थींच्या एका हातात प्रत्येकी एक छान टम्म फुगवलेला फुगा दिला आणि दुसऱ्या हातात एक टोकदार टाचणी.
समुपदेशक सांगत होते, सर्व प्रशिक्षार्थी कान देऊन ऐकत होते, “एक छोटीशी स्पर्धा आहे – दोन मिनिटांपर्यंत ज्याच्या हातातला फुगा फुगलेला राहील तो जिंकला.
and your time starts now !”
समुपदेशकांनी एवढं म्हटलं मात्र, इतका वेळ पूर्ण शांत असलेला तो हॉल, वीरश्रीयुक्त आरोळ्यांनी दुमदुमून गेला. जो तो दुसऱ्याचा फुगा फोडण्याच्या आणि स्वतःचा वाचवण्याच्या प्रयत्नांत मश्गूल होऊन गेला.
दोन मिनिटे संपली तेव्हा फक्त तिघा जणांच्या हातातले फुगे शाबूत होते, आता यातील कोणाचा पहिला क्रमांक येणार हे जाणण्यासाठी सर्व उत्सुक होते, आणि समुपदेशकांनी बोलायला सुरुवात केली …
तिसरी कथा आहे मानसशास्त्रात (psychology) पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या धनश्रीची. सध्या, महाविद्यालयीन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, ती न्यायवैद्यक मानसशास्त्र (forensic psychology) या विषयाचा एक online course करत होती.
आजची त्यांची नेमून दिलेली कामगिरी assignment दिलचस्प होती – तुम्हाला एक खून करायला सांगितला तर तुम्ही तो कसा कराल याचं एका मिनिटात उत्तर द्यायचे होते.
मग कोणी, ज्याचा खून करायचा आहे त्याला गाडीतून ढकलून दिले, किंवा त्याचा कडेलोट केला. काहींनी चालत्या रेल्वेसमोर कोणाला ढकललं, काहींनी गोळ्या घातल्या, काहींनी सुरा खुपसून कोथळा काढला. धनश्रीने झोपलेल्या माणसाच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा बोळा दाबून त्याला बेशुद्ध केलं आणि मग त्याचा प्राण जाईपर्यंत त्याच्या नाकातोंडावर उशी दाबून धरली.
कोणी सगळ्यात जास्त सराईतपणे खून केला हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते आणि कोर्स इंस्ट्रक्टरने बोलायला सुरुवात केली …
संयम राखत ड्रायव्हिंग परीक्षक सांगत होते, “मॅडम, थोडा कॉमन सेन्स वापरा हो. तुम्ही ब्रेक मारा, hit the breaks. नवऱ्याच्या आणि भावाच्या जीवावर का उठताय ?”
कारकीर्द समुपदेशक सांगत होते, “दोन मिनिटांपर्यंत फुगा फुगलेला राहील, तो जिंकला, असं सांगितलं होतं. दुसऱ्याचे फुगे फोडा असं कुठं म्हटलं होतं ? तुम्ही कोणीच एकमेकांचे फुगे फोडले नसतेत, तर सगळेच जिंकला असतात.”
फोरेन्सिक कोर्सच्या इंस्ट्रक्टरने सांगितलं, “कोणी कसा खून केला हे महत्त्वाचं नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणीच साधं विचारलंही नाही की मी हा खून का करू ? कोणी असं म्हटलं नाही की मी सैन्यात जाईन आणि शत्रूला मारेन.”
सध्याच्या या स्पर्धात्मक युगात, आपण जिंकायचं म्हणजे समोरच्याला हरवायचं अशी आपली विचारप्रक्रिया झाली आहे.
स्वतःच्या प्रगतीसाठी आपण आपल्या कुटुंबीयांचा – आप्तस्वकीयांचाही बळी घ्यायला किंवा द्यायला तयार आहोत, आपल्याच सहकाऱ्यांना पायदळी तुडवून आपला झेंडा उंच ठेवण्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही, कोणतेही कारण न जाणता आपण समोरच्याला आयुष्यातून उठवायलाही तयार आहोत.
आपली ही तामसी विचारप्रक्रिया बदलायला हवी, नाही का ? शेकडो वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी प्रार्थना केली आहे – आपली दुष्ट बुद्धी नाहीशी होवो, आपले सत्कर्म वाढो, आणि आपण एकमेकांचे शुभचिंतक होवो.
भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे .दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई जोशी भारतात परतल्यावर आजारी पडल्या व मृत्यू पावल्या .भारतातील पहिली व्यावसायिक स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमाबाईंची इतिहासात नोंद आहे.
रखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. रखमाबाईंच्या जन्मानंतर अल्पावधीतच त्यांचे वडील जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला . रखमाबाईंचे आजोबा हरिश्चंद्र चौधरी हे बांधकाम कंत्राटदार होते. आधुनिक विचारांचे असल्यामुळे, समाजविरोधात जाऊन त्यांनी रखमाबाईंच्या आईचा म्हणजे जयंतीबाईंचा पुनर्विवाह केला. सापत्य विधवेचा विधुरासोबत पुनर्विवाह हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता. जयंतीबाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम अर्जुन हे जे.जे. हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन होते. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या रखमाबाईंनी डॉक्टर सखाराम अर्जुन या आपल्या दुसऱ्या पित्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
जयंतीबाईंच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी दादाजी नावाच्या एका नात्यातील मुलाशी करून दिला. विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहून शिकत होत्या. त्यांचे विचार प्रगल्भ होत होते.
दादाजींनी सन १८८४ मध्ये, रखमाबाई या लग्न होऊनही नांदायला येत नाहीत यासाठी बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर कायदेशीर फिर्याद दाखल केली होती. सुशिक्षित, सुसंस्कृत, तडफदार रखमाबाईंनी न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर स्पष्ट निवेदन केले .त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे. अशिक्षीत ,सतत आजारी असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला, मामावर अवलंबून असलेला असा हा पती माझे पालन पोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीक वाटत नाही. नवरा म्हणून त्याला स्वीकारणे मला मान्य नाही.’
सर्व बाजूंनी सारासार विचार करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी रखमाबाईंच्या बाजूने निर्णय दिला. ‘बालवयात लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल असे मला वाटते.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
या निकालामुळे रखमाबाई आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली. हा निकाल आमच्या हिंदू धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. समाजजीवनास घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना स्त्रियांची संमती आवश्यक नाही. अशी जहरी टीका स्वतःला समाज सुधारक म्हणविणाऱ्या अनेकांनी केली. खटल्याचा निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागल्याने अस्वस्थ झालेल्या दादाजींनी या निकालाच्या फेर सुनावणीसाठी अपील केले. त्यांना धर्ममार्तंडांची साथ होती. शिवाय दादाजींना रखमाबाईंच्या नावे असलेल्या पंचवीस हजार रुपयांचा लोभ होता.
रखमाबाईंना साथ देण्यासाठी पंडिता रमाबाई व इतर अनेक विचारवंत, समाजसुधारक यांच्या पुढाकाराने ‘हिंदू लेडी संरक्षण समिती’ची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘हिंदू लेडी’ या नावाने पत्रे लिहून हिंदू धर्मातील अमानुष चालीरीतींवर घणाघात केला. बालविवाह, सतीची पद्धत, स्त्रियांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यावर लेख लिहिले. पती मेल्यानंतर स्त्रीने सती जावे असे म्हणणारा समाज, पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवत नाही? असे त्यांनी लिहिले. हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला .मृत्यू पावलेल्या पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना वेगळा न्याय असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कोणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. हा शंभर वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व लक्षात येते.
इंग्रजांना येथील धर्म, कायदे यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी, व्यापारीवृत्तीचे होते. त्यांनी राजकीय स्वार्थ साधला. अपिलीय खटल्यात न्यायमूर्ती फॅरन यांनी, ‘रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत पतीच्या घरी नांदायला जावे नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी’ असा रखमाबाईंच्या विरोधात निकाल दिला. रखमाबाईंनी या अन्यायकारक निकालाला निक्षून नकार दिला आणि तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखविली.
दादाजी व त्यांचे मामा यांच्या उलट तपासणीत, दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे कोर्टाच्या लक्षात आले. तेव्हा दादाजींनी रखमाबाईंना तडजोड करण्याची विनंती केली. दादाजींनी रखमाबाईंवरचा हक्क सोडावा आणि रखमाबाईंनी दादाजींना दोन हजार रुपये द्यावेत अशी तडजोड झाली. तसेही दादाजींना रखमाबाईंच्या संपत्तीमध्येच स्वारस्य होते. तडजोडीनंतर दादाजींनी लगेच दुसरे लग्न केले. हा खटला १८८७ मध्ये संपुष्टात आला.
नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरील खटल्याच्या वेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन पिची यांनी रखमाबाईंना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ १८८३ मध्ये मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या त्या सहकारी होत्या. त्यांचे पती फिप्सन स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते .या पती-पत्नींच्या प्रयत्नामुळे डफरीन फंडातून रखमाबाईंना आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाईंना इंग्लंडमध्ये राहण्यासाठी मॅक्लेरन दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई १८८९ मध्ये वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या.१८९४ मध्ये प्रसूती शास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत ऑनर्स पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतल्या.
काही दिवस कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केल्यावर त्या सुरत इथे गेल्या. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती सुधारण्यासाठी, बाळंतपणात होणारे मृत्यू रोखण्यासाठी रखमाबाईंनी खूप प्रयत्न केले .स्त्री शिक्षणासाठी ‘वनिता आश्रम’ ची स्थापना केली. १९१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी भारतात रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. आजन्म अविवाहित राहिल्या. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली.
रखमाबाईंच्या सुरत सेवेबद्दल शासनाने ‘कैसर ए हिंद ‘अशी पदवी त्यांना दिली. रेड क्रॉस सोसायटीने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या.२५ डिसेंबर १९५५ रोजी त्या देवत्वात विलीन झाल्या.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस म्हणून स्वतःचे अधिकार मिळविण्यासाठी कसा संघर्ष करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज २१ व्या शतकातही स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेत. समाज रुढी म्हणून किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याकडे अजूनही बालविवाह होतातच. शंभराहून अधिक वर्षांपूर्वीच्या त्या कठीण काळात, नको असलेल्या बालविवाहाचे संकट रखमाबाईंनी निग्रहाने परतवून लावले .रखमाबाईंचा एकाकी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तीदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. त्यांना विनम्र प्रणाम.👏