मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्टी – भाग १ – लेखक : शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ पार्टी – भाग १ – लेखक : शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मार्चचा महिना …..कडक उन्हाने सगळी जमीन भाजून काढली होती….तप्त उन्हाने यमाई पठारावरची हिरवळ जवळपास करपवून टाकली होती तरीही तिथल्या आजूबाजूच्या डेरेदार झाडांनी तिथला गारवा आणि निसर्गसौन्दर्य अजून टिकवून ठेवलं होतं…..नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले यमाई पठार पावसाळ्यात वेगवेगळ्या फुलांनी बहरून जायचे पण उन्हाळ्यात मात्र एखाद्या विस्तीर्ण वाळवंटासारखा त्या पठाराची दशा असायची…..तरीही आसपासच्या स्थानिक लोकांची तिथे बरीच रेलचेल असायची…  त्या थोड्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्रीच्या वेळी सगळ्या शहराचे एक विहंगम दृश्य दिसायचे…..त्यामुळे स्थानिक लोक तिथे रात्री पार्टी करण्यासाठी वैगेरे यायचे… त्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्री शहराचे दृश्य म्हणजे एखाद्या हॉलिवूड सिनेमात दाखवतात तश्या आकाशगंगे सारखे लूकलुकते दिसायचे….अनुपला तो एकांत आवडत असे तिथे तो अगदी तासन्तास बसून मित्रांच्या बरोबर रात्री गप्पा मारत असे…..अनुपच्या घरापासून यमाई पठार 10 km लांब होते त्यामुळे तिथे त्यांचे क्रिकेटचे सामने किंवा बर्थडे पार्टी होत असत…..पठारावर नगरपालिकेने दोन तीन मोठे लाईट्स आणि काही सिमेंटचे बेंच बसवल्यामुळे तशी रात्रीची कसलीच अडचण येत नसे…..

27 मार्च अनुपच्या मित्राचा म्हणजे प्रकाशचा वाढदिवस…..त्या दिवशी प्रकाशचा वाढदिवस मित्रांनी दणक्यात साजरा केला नेमका त्याच दिवशी अनुप काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता…..2 दिवसानंतर जेव्हा अनुप परत आला तेव्हा समोर प्रकाश दिसताच अनुपच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. ‘भावा “पार्टी”??’

प्रकाशने सुद्धा हातात हात देऊन स्मितहास्य करून मंजुरी दिली आणि रात्री यमाई पठारावर “बिर्याणी पार्टी” चे नियोजन लागले…..साहजिक अनुप आणि प्रकाश दोघेच जाणार होते….दोघे अगदी लहानपणापासूनचे मित्र आणि वाढदिवशी वैयक्तिक पार्टी करण्याची प्रथा त्यांनी अगदी लहानपणापासून जपली होती..त्या निमित्ताने अनेक जुन्या गोष्टीना उजाळा मिळायचा….ठरल्या प्रमाणे दोघेही 7 वाजता कामावरून आले आणि आपल्या आवडत्या क्लासिक बिर्याणी हाऊस मधून मस्त गरमागरम बिर्याणी आणि फ्राय चिकनचा डबा भरून घेतला…..आणि दोघे तिथून निघाले….वाटेत मस्त गाडीवर गप्पा मारत 20 च्या स्पीडने त्यांची बाईक चालली होती…..छोटी छोटी वेडीवाकडी वळणे पार करत करत त्यांची बाईक यमाई पठाराकडे चालली……साहजिक एक रंजक विषय निघाला होता त्यात दोघांच्या हसत खेळत गप्पा रंगल्या होत्या….

यमाई पठार एक पर्यटन स्थळ होत॰ त्यामुळे सुरवातीलाच एक कमान उभारली होती……गावापासून 3 की.मी.  तर मस्त गप्पा रंगल्या होत्या पण जस ती कमान पार केली दोघेही काही वेळ अचानक शांत झाले….पार्टी करायला ते सारखे यमाई पठारावर जात होते पण आता मात्र काहीसं वेगळं वातावरण त्या दोघांना जाणवत होतं…हवामानात बदल होऊन उष्ण हवामान कोंदट पावसाळी असल्यासारखं भासत होतं…आजूबाजूच्या परिचित टेकड्यांनी आपले आकार,जागा,रंग सगळं काही बदललं होत….अनुपला हा बदल लक्षात आला होता पण त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केले होते….अचानक एका दुनियेतून दुसऱ्या दुनियेत प्रवेश करावा अस काहीसं वाटत होतं ती कमान म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या दुनियांचा दरवाजा असेल कदाचित म्हणून तर तिकडून पलीकडे गेल्यावर अचानक आकाशातले तारे जणू गायबच झाले होते एक काळाकुट्ट अंधार आणि त्या अंधारात हेडलाईटीच्या दिव्याचा आधार घेत चालणारी बाईक….अनुपला तर कमालीचे अस्वस्थ वाटत होते कारण रोजच्या रहदारीतला हा रस्ता वेगळा वाटत होता… मानवनिर्मित बांधकाम त्या रस्त्याच्या आसपास कुठेच दिसत नव्हते…..रस्त्याच्या आजूबाजूला असणारी झाडे एकदम नाटकी वाटत होती एरव्ही यमाई पठार परिसरात जो थंड गार वारा वाहत असे तो वारा गायबच होता त्यामुळे न हलणारी ती झाडे एकदम नाटकी वाटत होती…..काहीतरी वेगळं आणि विचित्र वाटत होतं तिथे म्हणून तर त्या कमानीतून आत आल्यावर रंगलेल्या गप्पा अचानक बंद झाल्या…..अनुपला काहीतरी वेगळं वाटत होतं पण प्रकाश अगदीच शांत राहून गाडी चालवत होता हे बघून अनुप ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गदागदा हलवले.

“अरे पक्या…काय झालं एकदम शांत झालास??”

पाठीवर पडलेल्या हाताने प्रकाश भानावर आला.

“क…क…काय नाही. “

प्रकाशने विषय टाळला….नेमकं काय बोलावं प्रकाशला काहीच सुचत नव्हतं…..पठार जवळ येत होतं….प्रकाशचे नाटकी बोलणे आणि नाटकी हसू अनुप बरोबर ओळखत होता… सोबत अनुपला हे सुद्धा जाणवत होते की हा रोजचा रस्ता नाही…..काहीतरी वेगळं वाटत होतं….भकास शांत वातावरण आणि काळाकुट्ट अंधार…..बाजूची डेरेदार झाडे बाईकच्या लाईटीच्या उजेडात एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसासारखी वाटत होती…आता झडप घेऊन गिळंकृत करायला तयार आहेत की काय अशी भासत होती त्यामुळे अनुप घाबरून समोर रस्त्यावर बघत होता आणि प्रकाशशी काहीतरी विषय काढून चर्चा करून त्या वातावरणावर हावी होण्याचा प्रयत्न करत होता….इतक्यात बाईकने पठाराचा चढ पार केला आणि ते दोघे मोकळ्या मैदानात आले…..हौशी लोकांची रेलचेल रात्री ही तिथे असायची पण आज त्या पठारावर कुणीच दिसत नव्हतं… नगरपालिकेने लावलेला स्ट्रीट लाईट मर्यादित उजेड देत होता त्या उजेडात सिमेंटचा बसायचा बेंच दिसत होता अनुपला थोडं हायसं वाटलं कारण मगापासून ना ना शंकांनी त्याच्या मनात वादळ उठवले होते…..त्यातल्या एका शंकेला, “हुश्शहह आपण यमाई पठारावरच आहोत. “ह्या वाक्याने मनोमन उत्तर दिले होते…..पण सिमेंटच्या बेंचच्या आजूबाजूची हिरवळ गायब होती तिथे काळे खडक दिसत होते….दोघेही थबकले पण काही न बोलताच त्या बेंच जवळ आले….पुढचा धक्का मात्र त्या दोघांना जबर बसला….अनुपने तर प्रकाशचा दंड धरला…..त्या बेंच जवळून रात्री पूर्ण शहर लकाकताना दिसत होतं ….पण आता मात्र सगळीकडे काळोख…काळोख आणि फक्त काळोख दिसत होता….दोघांनी सगळ्या बाजूला नजर फिरवली…खाली असलेल्या शहरात एकही लाईटीचा दिवा दिसत नव्हता….फक्त उतरतिला एक चमकणारा लाईटीचा बिंदू टेकडीवरून दिसत होता…….नेमका प्रकार काय चालू आहे दोघांच्याही लक्षात येत नव्हतं.

“अरे अन्या…..काय रं हे…..सगळीकडे अंधार भुडुक कसं काय??”

अनुपने थोडा वेळ विचार करत उत्तर दिले, “आरं पक्या…..शहरात लाईट गेली असलं बघ…हा…तसच असलं…नुकतीच गेली असलं….ते जाऊ दे आपण बिर्याणी खाऊन घेऊ…उगच गार व्हायची….मग मज्जा नाही येत खाण्यात….काय म्हणतो??”

प्रकाशची नजर अनुपच्या हातातल्या पिशवी कडे गेली वास्तविक लाईट जाऊन सगळीकडे अंधार पडणे आणि वरून एकही दिव्याचा उजेड न दिसणे हे प्रकाशला पटत नव्हते तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत,

“व्हय व्हय….आधी मस्त खाऊन घेऊ मग बघूया पुढचं पुढं.”

बिर्याणी पार्टी निम्मित्त दोघे ह्या पठारावर आले की एक दोन तास तरी बेंच वर बसून दोघांच्या गप्पा रंगायच्या…..आधी वेळ असायचा पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यानीं त्यांच्याकडून वेळ ओरबाडून नेला होता त्यामुळे दोघेही महिन्यातून एकदा पठारावर येऊन लकाकणार्‍या शहराकडे बघत मस्त निवांत गप्पा मारायचे.  बिर्याणी खाऊन घरी यायचे पण आता मात्र कसल्या तरी भीतीने त्यांना घेरलं होत….आपल्या शिवाय इथे अजून कुणीतरी आहे आणि त्या अंधारातून आपल्याकडे बघत आहे असा काहीसा समांतर भास दोघांना होत होता त्यामुळे दोघांनी डब्बा उघडला आणि काहीही न बोलताच बिर्याणी खाऊ लागले…..त्यांचे हात चालत होते…बिर्याणी खायचे ठरलेले औपचारिक काम आटपून इथून निघून काय पळून जावे अस दोघांनी मनोमन ठरवलं होतं…बिर्याणी खाताना त्यांच्या माना आपोआप सगळीकडे फिरून खात्री करून घेत होत्या……सळसळ जाणवू लागली…..कुणीतरी दबक्या पावलांनी त्यांच्या दिशेने येत असल्याचा भास दोघांना झाला त्यानुसार दोघांच्याही माना त्या अंधारात त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागल्या.. लाईटीचा उजेड मर्यादित होता…..गडद अंधारात नेमकं काय चालू आहे काय आपल्या दिशेने येत आहे हे दोघांनाही कळत नव्हतं…..पण जे समोरून येत होतं ते बघून दोघांचाही घास हातातच राहिला…..चारी बाजूनी चार धिप्पाड कुत्री अगदी गुरगुरतच त्या अंधारातून बाहेर पडली….त्या चोघांचे एकत्रित गुरगरणे अनुप आणि प्रकाशच्या मनात धडकी भरवत होतं….नेमकी कुत्रीच होती की अजून काही?? असली भयानक कुत्री त्यांनी आयुष्यात कधीही पहिली नव्हती… काळे केसाळ चमकदार अंग पिवळेशार चमकदार डोळे आणि लांब सुळे दात….एखादी हिंस्र श्वापदे…..अनुप आणि प्रकाश प्रचंड घाबरले त्यांनी आपल्या बिर्याणीतले चिकनचे तुकडे त्यांच्या दिशेने भिरकावले… पण ते चारीही धिप्पाड कुत्रे त्या मासांच्या तुकड्याकडे न बघता गुरगुरत दबक्या पावलांनी दोघांच्या दिशेने येत होते….आता चारी दिशांनी त्या कुत्र्यांचे भुंकणे सुरू झाले आवाज अगदी घाम फोडणारा होता ती कुत्री ठराविक अंतरावरून भुंकत होती जराही जवळ येत नव्हती अंधारातून कुणाच्या तरी आदेशाचे पालन करीत आपला आवेश आवरत कधी पुढे मागे सरकत अविरत कर्कश आवाजात भुंकत होती…..दोघांच्याही अंगावर काटा आला….जास्त वेळ थांबणे म्हणजे त्या भयाण हिंस्र कुत्र्यांची शिकार होण्यासारखं होत….त्यामुळे दोघांनीही सगळं समान आहे असं टाकून बाईकला किक मारली….प्रकाशने गाडीचा स्पीड वाढवला…..गार वाऱ्यातही दोघांचे अंग घामाने भिजले होते आणि ती काळी हिंस्र कुत्री त्यांच्या गाडीच्या मागे लागली होती……रस्त्यावर पूर्ण अंधार होता बाईकच्या हेडलाईटच्या उजेडात समोरचा रस्ता आणि मागून त्या कुत्र्यांचे चमकदार डोळे आणि पांढरेफेक आसुसलेले दात स्पष्ट दिसत होते…..अनुपची नजर आजूबाजूला गेली….मगाशी जिथून आलो तो हा रस्ता नव्हताच….हा रस्ता वेगळा होता झाडेही पूर्ण वेगळी होती…डेरेदार झाडांची जागा आता उंच अश्या नारळीच्या झाडांची घेतली होती…..सगळं वातावरण क्षणार्धात बदललं होतं….टेकडीचा उतार गायब होऊन त्याची जागा एका सपाट न संपणाऱ्या रस्ताने घेतली होती….आजूबाजूला काही फलक दिसत होते पण त्यावरची भाषा मराठी नव्हतीच…कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतले ते फलक अनपेक्षित होते….सगळं काही अनपेक्षित भयानक घडत होतं..गाडी अविरत धावत होती….रस्ता संपत नव्हता आणि ती कुत्री काही केल्या पाठलाग सोडत नव्हती…गाडी थांबवून त्या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही…कारण थांबला की खेळच संपणार होता…अचानक मागून अनुप जोरात ओरडला, “पक्या…पक्या….ते बघ तिथं…तिथं घर दिसाय लागलं…चल लवकर तिथं!”

क्रमश: भाग १

लेखक : शशांक सुर्वे

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

ठराविक वयाच्या टप्प्यावर नाही म्हटले तरी…तीच ती घरकामे करून करून,नकोशी वाटू शकतात…. सर्वांनाच नाही लागू पडणार….पण मला तरी वाटत…..कुठे थांबावं हे समजणे आवश्यक….पूर्णपणे नाहीच.. अडीअडचणीला आपण निभावून नेलंच पाहिजे….

पण काही जणींचा अट्टाहास असेच पाहिजे तसेच पाहिजे.माझ्याच हाताला चव…माझे मलाच आवडते…

कामे,घरातील टापटीप मलाच त्यातच  रस वाटतो…. त्यानिमित्ताने व्यायाम होतो….

पण घरासाठी कितीही करा कमीच..पण खरच आपण घरासाठी की घर आपल्यासाठी….किती जीवापाड जपावं….स्वतःला मात्र गुंतवून त्याच त्या कामात कितपत योग्य आहे….स्वतःसाठी जगणे होते का? बरे खूप वर्ष मनलावून कामे केली…कुणी घरातील व्यक्ती शाब्बास,तरी म्हटलेले आठवत नाही…की घरकामासाठी  पुरस्कार पण देण्यात येत नाही….का करावी मनाची ओढाताण का घ्यावं इतके टापटीप , स्वच्छ्ता ह्यांचे वेड…जे मनास पटले नाही तरी करीत राहणार…कधीतरी ह्यावर विचार करण्याची गरज आहे….

काय बाई दोन तीन पोळ्या तर करायच्या म्हणून स्वतःच करतात….तीच ती कामे डोक्यात आज काय स्वयंपाक करायचा…पुन्हा रात्री भाजी काय करायची….

दुसऱ्या कुणाच्या कामाला नावे ठेवणे….काय बाई लगेच भांडी घासली कि हाता सरशी लगेच साफ होऊन जातात…तीच ती कामे त्यातच अडकून पडतात….

कितीतरी अजून जगण्याला वाव द्यायचा असतो इकडे लक्षच नसतं….. सार आयुष्य ह्यातच घालून पुन्हा वर म्हणायचं आता बाई होत नाही,पूर्वीसारखं…. शरीर पण कुरकुर करत असत…मन पण नको म्हणून सांगत असत…..पण सरळ दुर्लक्ष करत करण्याची तयारी दाखवतात….पण कुठेतरी थांबले पाहिजे हे कळतच नाही….मीच राबराब राहते …..माझी कदर नाही कुणाला.तूच कर ना तुझीच कदर….घे मोकळा श्वास कधीतरी….दे सोडून मनातील विचार  माझ्याशिवाय घराचे कसे होईल……मस्त चालत आपण नसलो तरी ,हा विश्वास हवा…..

किती  करणार तीच ती कामे…..नकोच गुंतवून घेऊ ना…केलीत की आतापर्यंत …  तूच वाहिलीस घरकामाची धुरा….. मान नाही का दुखत, दे झुगारून आता तरी…..हो घरकामातून रिक्त…..असेल आर्थिक स्थिती संपन्न तर मोलानी करवून घे ना.की त्यातही मला नाही आवडत बाई.कस ग सोड ना आता हट्ट… 

कर वेगळे हट्ट जगेन तर मस्तच… माझ्यावर नितांत प्रेम करणार…….मस्तच वेगळे काहीतरी जगणार नकोच तीच ती चाकोरी…..म्हण स्वतःला थांब ग बाई आतातरी….

जीवन जगायचं कसं तर भरभरून स्वतःला वेळ राखून ठेवला की मग स्वतः खरच जगलो म्हणून भारी वाटतं…..घरकामे करावीत ज्यांना आवड आहे त्यांनी…पण कामाचे योग्य नियोजन केले की त्यात अडकून न पडता…..अजून बरेचसे आवडीचे जगणे होते….फिरणे….मस्त रमतगमत, मैत्रिणी – त्यांच्यात रमणे….गप्पागोष्टी हक्काचे स्थान मन मोकळे मनमुराद जगणे होते…..

मैत्रिणी जमवणे ती मैत्री जोपासणे, टिकवणे ही सुध्दा कलाच आहे….ती अवगत करून, मस्त जीवन जगण्याचा आनंद मिळतो….मस्त आयोजन, नियोजन केले की स्वतः आनंदी असलो की घरदार पण आनंदी राहणार यात वादच नाही…..चला तर मस्त स्वतःसाठी वेळ राखून ठेवू आणि मस्त आनंदी आनंद घेत राहू….. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदमूर्ती स्वामी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदमूर्ती स्वामी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

मला दिनांक 31 मार्च२३ रोजी ब्रह्मनाळला व्याख्यानाला जाण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आनंदमूर्ति स्वामींची माहिती मिळाली .ती येथे देत आहे

आनंदमूर्ती स्वामींचे मूळ नाव अनंतभट होते. रघुनाथ स्वामी हे त्यांचे गुरु. रघुनाथ स्वामी एकदा परगावी गेले.आनंदमूर्तींना त्यांचा शोध घेण्यासाठी तीन वर्षे लागली. तीन वर्षानंतर ते भेटले तेव्हा दोघांना खूप आनंद झाला.  स्वामी म्हणाले, अनंता, तीन वर्षे बायको मुले एकटी सोडून माझे स्वतःसाठी तू वणवण फिरलास ही एक तुझी तपसाधना झाली. माझ्यावरची तुझी निष्ठा पाहून मला खूप आनंद झाला तू माझ्या अंतर्यामीच्या आनंदाची मूर्ती आहे. आज पासून आम्ही तुला आनंदभट न म्हणता आनंदमूर्ती असेच नाव ठेवत आहोत. आम्ही तीन वर्षे जी साधना केली त्याचे पुण्यफल तुझे पुढील सात पिढ्यांचे  योगक्षेम सुव्यवस्थित चालावेत म्हणून आशीर्वाद पूर्वक तुला अर्पण करीत आहे. यापुढे तुझ्या तोंडून जे शब्द निघतील ते सत्य होतील. आणि तसेच झाले. चिकोडीत सौ. कुलकर्णी बाई त्यांच्या दर्शनास आल्या. स्वामींनी आशीर्वाद दिला .”पुत्रवती भव”. बाई  म्हणाल्या स्वामी माझे वय 60 आहे.  स्वामी म्हणाले मी आशीर्वाद दिला तो सहजस्फूर्त होता.

अंतर्यामीच्या आत्म्याचे बोल आहेत. हे सत्य  होणारच. दुसरे असे की एखाद्याने शाप दिला तर त्याला उ:शापाचा उतारा देऊन मुक्त करता येते. परंतु दिलेला शुभाशीर्वाद परत घेता येत नाही .तुम्हाला एक वर्षाचे आत मुलगा होऊन वंश वाढेल हे निश्चित. त्याप्रमाणे त्या बाईंना मुलगा झाला. त्यांचा वंश पुढे वाढत गेला. 

रघुनाथ स्वामी आणि आनंदमूर्ती तीन वर्षांनी वसगडे येथे परत आले. अनेक भक्त स्वामींना गाई भेट देत. संध्याकाळचे स्नान संध्या करण्यासाठी स्वामी नदीवर जात. येताना दान मिळालेल्या गाई ,दुपारी रानात चरायला सोडलेल्या गाई स्वामी परत आणून गोठ्यात बांधीत.गाईंचे गोठ्याजवळ एक मोठी चतुष्कोनी शिळा होती. त्यावर बसून स्वामी ध्यानधारणा करत. पुढे त्या शिळेवर मारुतीची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. स्वामींचे समाधीनंतर त्या स्वयंभू मारुतीची शिळा ग्रामस्थानी आजच्या श्री लक्ष्मी मंदिरात स्थापन केली. त्या शिळेला श्री रघुनाथ स्वामी असे संबोधतात. त्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा करतात.रघुनाथ स्वामी आनंदमूर्तीना घेऊन संगमावर आले. स्वामी म्हणाले हे संगमस्थान पवित्रांमध्ये पवित्र आहे. देह त्यागास हे स्थळ उत्तम आहे.

स्वामी म्हणाले एका व्यक्तीने कितीही कार्य केले तरी ते अपुरेच असते .पुढच्या लोकांनी ते कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे. जगदोध्दाराचे जे कार्य अपुरे राहिले ते तू पुढे चालू ठेव. जनता जनार्दनाला जप ,तप, भक्ती मार्गाचा उपदेश करून आत्मोद्धाराचा मार्ग दाखव. स्वराष्ट्र आणि स्वधर्म याची जाणीव देऊन त्याच्या रक्षणाची त्यांच्या मनात प्रेरणा उत्पन्न कर. आनंदमूर्तीना उपदेश करून स्वामींनी देहत्याग केला. त्यांच्या इच्छेप्रमाणे देह दहनाकरता संगमावर आणला. पण ब्रह्मनाळचे ग्रामस्थांनी परगावचे प्रेत म्हणून आपल्या गावी दहन करण्यास नकार दिला. मग आनंदमूर्तिनी संगमाकाठी ४० हात लांब रुंद जागा पंधरा होन देऊन विकत घेतली. त्या ठिकाणी स्वामींच्या पार्थिव देहाचे यथाविधी  दहन केले. दहनस्थानी उत्तर कार्य करून स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. पादुकांवर आच्छादन म्हणून त्यावर वृंदावन बांधले. बांधकाम वरच्या थरापर्यंत येताच वृंदावन थरारले आणि वृंदावनाचा थर पूर्णपणे पडला. असे चार वेळा झाले. आनंदमूर्ती पादुकांसमोर एक दिवस एक रात्र निर्जली उपोषण करीत बसले. स्वामी, वृंदावन बांधण्याची आमची मनोमनीची इच्छा आहे. कृपावंता, कृपा करून बांधकाम पूर्ण होऊ द्या. लाडक्याची इच्छा जाणून स्वामींनी पहाटे स्वप्नात दृष्टांत दिला. यापुढे बांधकामात व्यक्त येणार नाही. वृंदावनाचे बांधकाम सुरू झाले. रंग दिला. एका बाजूस शिवपंचायतन  आणि दुसऱ्या बाजूस रामपंचायतनाची चित्रे रेखाटली. वास्तु्पूजा केली. आरती झाली. कीर्तन सुरू झाले आणि वृंदावन डोलले. फुलांचे हार हालले. वृंदावनाचा हा पहिला डोल.रघुनाथ स्वामींनी आनंदमूर्तींना निर्याणापूर्वी संगमस्थानी आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या जागृत अस्तित्वाची जाणीव दिली. श्री समर्थ रामदास स्वामींना हे कळले. ते ब्रह्मनाळला आले. पादुकांची पूजा केली आणि वृंदावनाचा डोल झाला. स्वामींना खूप आनंद झाला. ते म्हणाले

जळघी गिरिशिळांनी सेतु बांधी तयाचे |

नवल नच शिवाही  ध्यान ते योगियाचे ||

अभिनव जगी तुझी कीर्ती आनंदमूर्ती |

 अचळ दगड प्रेमे डोलती थोर ख्याती ||

रघुनाथ स्वामींच्या पहिल्या वर्षाची पुण्यतिथी होती. त्यादिवशी चाफळहून रामदास स्वामी, वडगाहून जयराम स्वामी, निगडीहून रंगनाथ स्वामी, कराडचे निरंजन स्वामी, अनेक अन्य  साधुसंत, स्वामी ,वैदिक ब्राह्मण ,कथा- कीर्तनकार, भक्त मंडळी आली. सर्वांनी शिधा आणला होता. तो एकत्र करून भात व वरण फळे करून तो दिवस “फळ पाडवा” म्हणून साजरा केला .भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा पुण्यतिथीचा दिवस उत्साहात संपन्न झाला. तिसरे दिवशी रामदास स्वामींच्या सांगण्यावरून गोपाळकाला केला. त्या दिवशी स्वतः रामदासांनी कीर्तन करून पहिला पुण्यतिथी उत्सव पूर्ण केला.

आनंदमूर्तींनी कांही आरत्या रचल्या. त्यातून बरीच माहिती मिळते. सध्या तिथे पाडवा ते दशमी उत्सव असतो. रहायला खोल्या बांधल्या आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी येऊन रहातात. सेवा करतात. दहा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. राम जन्माचे कीर्तन झाले की तिथे डोल होत असे. दगड चुन्यात बांधलेल्या वृंदावनाचा डोल हे लोकांना पटत नव्हते. अनेकांनी  प्रत्यक्ष पाहूनच खात्री केली होती. आनंदमूर्तींना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. एकदा चोर त्यांच्या मागे लागले पण त्या चोरांना यांच्याबरोबर दोन धनुर्धारी तरुण दिसले. त्यामुळे त्यांना चोरी करता आली नाही. त्यांनी सांगलीत पोचल्यावर आनंदमूर्तींना ते धनुर्धारी कोण असे विचारले. तेव्हा आनंदमूर्तींना काहीच कल्पना नव्हती. ते म्हणाले आमचे गुरु रघुनाथ स्वामींनी ही अघटित घटना घडवून आणली. धनुर्धारी रूपात तुम्हास त्यांचे दर्शन झाले. तुम्ही पुण्यवान आहात. आता हा व्यवसाय सोडा आणि चांगले आयुष्य जगा. चोरांनी ते ऐकले.

स्वामींना आपल्या अवतार समाप्तीची जाणीव होऊ लागली. थोरला मुलगा कृष्णाप्पा याला बोलावून त्यांनी माझ्यामागे गुरु रघुनाथ स्वामींच्या पादुकांची पूजा, ब्रम्हनाळ गावचे इनाम, मठ, शेती, स्थावर जंगम मालमत्तेची व्यवस्था, वार्षिक उत्सव, आल्या गेल्या भक्तांची वास्तव्य व भोजनाची कायम व्यवस्था करण्यास सांगितले. त्याला समोर बसवून कानात तत्वमसी-“सोऽहं”मंत्राचा उपदेश केला. भूमध्यावर अंगठ्याने दाब देताच त्याची समाधी लागली. काही वेळानंतर त्याच्या डोळ्यास पाणी लावून त्यांनी समाधी उतरवली‌. व सांगितले तू दिवसा संसार व देवस्थानचा व्यवहार व ब्राह्ममुहूर्ती जप ,तप, ध्यान  करत रहा. 

आनंदमूर्तींनी पूजा आटोपली. बाहेर भक्तमंडळींना सांगितले आज वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. या पुण्यदिवशी आम्ही देह त्याग करणार. देह त्यागानंतर सत्वर ब्रम्हनाळ येथे श्री गुरु  रघुनाथ स्वामींचे वृंदावनासमोर आमचा देह दहन करा. नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.

ब्रम्हनाळ मठाची उपासना श्रीरामाची. इथे रामनवमी ,महाशिवरात्र, रघुनाथ स्वामी व  आनंदमूर्तींचे पुण्यतिथी उत्सव व अन्य काही लहान उत्सव कार्यक्रम होतात. सज्जनगडचे श्रीधर स्वामी सुद्धा ब्रह्मनाळला आले होते . त्यावेळी डोल पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या ज्या वेळी वृंदावन समाधीसमोर वेद घोष होतो व भक्तिभावाने भजन, कीर्तन, नाम संकीर्तन,   प्रवचने, साधुसंत करतात व ब्रह्मनिष्ठ योगी ,तपस्वी पुरुष दर्शनास येतात त्यावेळी  वृंदावन डोलते असा अनुभव आहे.

 नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.

परम कठीण शीला- डोलवी वृक्ष जैसा |

जननी जठर कोषी जन्मला कोण ऐसा ||

हरिभजन प्रतापे ख्याती झाली दिगंती |

अनुदिनु स्मरचित्ता श्री आनंदमूर्ती ||

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

५२ पत्ते याबद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा. पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो- ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. 

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्याचा संच होतो.     

—  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा, याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

२) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु. 

प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

३) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) २ जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

२) तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश

३) चौकी म्हणजे चार वेद —  (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेद)

४) पंजी म्हणजे पंचप्राण —  (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षडरिपू —  (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये 

१०) गुलाम- मनातील वासना 

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

मित्रांनो, लहानपणापासून पत्ते बघितले. असतील काहींनी खेळले असतील.  परंतू त्या पत्त्यांच्या संचाबद्दल अशा प्रकारची माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.?

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला, तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते !!!

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे… श्री रमाकांत देशपांडे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे… श्री रमाकांत देशपांडे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव- न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे

लेखकाचे नाव- रमाकांत देशपांडे

प्रकाशक- अनिरुद्ध कुलकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन

प्रथम आवृत्ती- १ एप्रिल 20 19

किंमत- 450 रुपये.

“स्वामी” या रणजीत देसाई यांच्या कादंबरीतून ‘राम शास्त्री’ यांचे नाव वाचले, ऐकले होते परंतु त्यांच्याविषयी परिपूर्ण माहिती नव्हती. ती या पुस्तकातून चांगली मिळाली.

राम शास्त्री प्रभुणे यांचे गाव सातारा जवळ माहुली हे होते. विश्वनाथ शास्त्री प्रभुणे यांचे ते चिरंजीव होते. लहान असताना त्यांचे वडील गेले. बालपणी अतिशय हूड स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांची आई- पार्वती बाई यांना रामची खूप काळजी वाटत असे. लहानपणी शिक्षण घेण्यात त्यांनी खूप टाळाटाळ केली. त्यामुळे सर्वांच्याकडून बोलणी खावी लागत होती. शेवटी गाव सोडून बाहेर पडले. सातारला आले व तिथून पुढे पुण्यापर्यंत आले. त्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी काशीला जाण्याचा निर्धार केला. काशीला जाऊन विद्वान पंडित होऊन राम शास्त्री बारा वर्षांनी घरी आले. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी त्यांना पुणे येथे वेदशास्त्र संपन्न पंडित म्हणून बोलावून घेतले. तेथपर्यंत त्यांचा जीवन प्रवास वाचताना त्यांचा स्वाभिमान, बाणेदारपणा , निर्भीडपणा हे सर्व गुण दिसून येतात. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. न्यायी वृत्ती आणि चांगल्या गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचा स्वभाव हे सर्व कादंबरीकारांनी चांगले रंगवले आहे.

पुणे येथे पेशव्यांच्या दरबारात त्यांचा योग्य तो सन्मान झाला. राम शास्त्रींनी धर्मशास्त्र आणि राजकारण यांची सांगड घालून पेशव्यांच्या दरबारात स्वतःचे स्थान प्रस्थापित केले. नानासाहेबांनंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या दरबारात त्यांनी अतिशय चांगले कार्य करून न्यायासनाची प्रतिष्ठा राखली. त्यांना न्यायदानाचे सखोल ज्ञान होते.  राघोबा दादांनी नारायण रावांचा खून कसा करवला याविषयीचा सर्व तपशील या कादंबरीत वाचावयास मिळतो. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांचा बाणेदार पणा अनेक प्रसंगातून लेखकाने दाखवून दिला आहे. नारायणराव पेशव्यांच्या खुना संदर्भात सर्व पुरावे त्यांनी गोळा केले.आणि त्यानंतर  राघोबा दादांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली. त्यातून त्यांचा निर्भीडपणा दिसून येतो. कादंबरी वाचताना डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहतात. ऐतिहासिक कादंबरी लिहिताना सत्य तर हवेच पण रंजक पणा ही  हवा या दोन्ही गोष्टी कादंबरीत दिसून येतात. पुणे, शनिवार वाडा, पेशवाई याविषयीच्या सर्वच गोष्टी मराठी वाचकांना मनाला भावणाऱ्या असतात. त्यामुळे कादंबरी वाचताना आपण कथानकाशी  तद्रुप होऊन जातो.

राम शास्त्री प्रभुणे यांची व्यक्तिरेखा उलगडून दाखवण्यात लेखक अगदी यशस्वी झाले आहे असे या कादंबरी बद्दल मला वाटले!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #181 ☆ ख्वाब : बहुत लाजवाब ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख ख्वाब : बहुत लाजवाब। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 181 ☆

☆ ख्वाब : बहुत लाजवाब 

‘जो नहीं है हमारे पास/ वो ख्वाब है/ पर जो है हमारे पास/ वो लाजवाब है’ शाश्वत् सत्य है, परंतु मानव उसके पीछे भागता है, जो उसके पास नहीं है। वह उसके प्रति उपेक्षा भाव दर्शाता है, जो उसके पास है। यही है दु:खों का मूल कारण और यही त्रासदी है जीवन की। इंसान अपने दु:खों से नहीं, दूसरे के सुखों से अधिक दु:खी व परेशान रहता है।

मानव की इच्छाएं अनंत है, जो सुरसा के मुख की भांति निरंतर बढ़ती चली जाती हैं और सीमित साधनों से असीमित इच्छाओं की पूर्ति असंभव है। इसलिए वह आजीवन इसी उधेड़बुन में लगा रहता है और सुक़ून भरी ज़िंदगी नहीं जी पाता। सो! उन पर अंकुश लगाना अनिवार्य है। मानव ख्वाबों की दुनिया में जीता है अर्थात् सपनों को संजोए रहता है। सपने देखना तो अच्छा है, परंतु तनावग्रस्त  रहना जीने की ललक पर ग्रहण लगा देता है। खुली आंखों से देखे गए सपने मानव को प्रेरित करते हैं करते हैं, उल्लसित करते हैं और वह उन्हें साकार रूप प्रदान करने में अपना सर्वस्व झोंक देता है। उस स्थिति में वह आशान्वित रहता है और एक अंतराल के पश्चात् अपने लक्ष्य की पूर्ति कर लेता है।

परंतु चंद लोग ऐसी स्थिति में निराशा का दामन थाम लेते हैं और अपने भाग्य को कोसते हुए अवसाद की स्थिति में पहुंच जाते हैं और उन्हें यह संसार दु:खालय प्रतीत होता है। दूसरों को देखकर वे उसके प्रति भी ईर्ष्या भाव दर्शाते हैं। ऐसी स्थिति में उन्हें अभावों से नहीं; दूसरों के सुखों को देख कर दु:ख होता है–अंतत: यही उनकी नियति बन जाती है।

अक्सर मानव भूल जाता है कि वह खाली हाथ आया है और उसे खाली हाथ जाना है। यह संसार मिथ्या और  मानव शरीर नश्वर है और सब कुछ यहीं रह जाना है। मानव को चौरासी लाख योनियों के पश्चात् यह अनमोल जीवन प्राप्त होता है, ताकि वह भजन सिमरन करके अपने भविष्य को उज्ज्वल बना सके। परंतु वह राग-द्वेष व स्व-पर में अपना जीवन नष्ट कर देता है और अंतकाल खाली हाथ जहान से रुख़्सत हो जाता है। ‘यह किराये का मकान है/ कौन कब तक रह पाएगा’ और ‘यह दुनिया है एक मेला/ हर इंसान यहाँ है अकेला’ स्वरचित गीतों की ये पंक्तियाँ एकांत में रहने की सीख देती हैं। जो स्व में स्थित होकर जीना सीख जाता है, भवसागर से पार उतर जाता है, अन्यथा वह आवागमन के चक्कर में उलझा रहता है।

जो हमारे पास है; लाजवाब है, परंतु बावरा इंसान इस तथ्य से सदैव अनजान रहता है, क्योंकि उसमें आत्म-संतोष का अभाव रहता है। जो भी मिला है, हमें उसमें संतोष रखना चाहिए। संतोष सबसे बड़ा धन है और असंतोष सब रोगों  का मूल है। इसलिए संतजन यही कहते हैं कि जो आपको मिला है, उसकी सूची बनाएं और सोचें कि कितने लोग ऐसे हैं, जिनके पास उन वस्तुओं का भी अभाव है; तो आपको आभास होगा कि आप कितने समृद्ध हैं। आपके शब्द-कोश  में शिकायतें कम हो जाएंगी और उसके स्थान पर शुक्रिया का भाव उपजेगा। यह जीवन जीने की कला है। हमें शिकायत स्वयं से करनी चाहिए, ना कि दूसरों से, बल्कि जो मिला है उसके लिए कृतज्ञता ज्ञापित करनी चाहिए। जो मानव आत्मकेंद्रित होता है, उसमें आत्म-संतोष का भाव जन्म लेता है और वह विजय का सेहरा दूसरों के सिर पर बाँध देता है।

गुलज़ार के शब्दों में ‘हालात ही सिखा देते हैं सुनना और सहना/ वरना हर शख्स फ़ितरत से बादशाह होता है।’

हमारी मन:स्थितियाँ परिस्थितियों के अनुसार परिवर्तित होती रहती हैं। यदि समय अनुकूल होता है, तो पराए भी अपने और दुश्मन दोस्त बन जाते हैं और विपरीत परिस्थितियों में अपने भी शत्रु का क़िरदारर निभाते हैं। आज के दौर में तो अपने ही अपनों की पीठ में छुरा घोंपते हैं, उन्हें तक़लीफ़ पहुंचाते हैं। इसलिए उनसे सावधान रहना अत्यंत आवश्यक है। इसलिए जीवन में विवाद नहीं, संवाद में विश्वास रखिए; सब आपके प्रिय बने रहेंगे। जीवन मे ं इच्छाओं की पूर्ति के लिए ज्ञान व कर्म में सामंजस्य रखना आवश्यक है, अन्यथा जीवन कुरुक्षेत्र बन जाएगा।

सो! हमें जीवन में स्नेह, प्यार, त्याग व समर्पण भाव को बनाए रखना आवश्यक है, ताकि जीवन में समन्वय बना रहे अर्थात् जहाँ समर्पण होता है, रामायण होती है और जहाल इच्छाओं की लंबी फेहरिस्त होती है, महाभारत होता है। हमें जीवन में चिंता नहीं चिंतन करना चाहिए। स्व-पर, राग-द्वेष, अपेक्षा-उपेक्षा व सुख-दु:ख के भाव से ऊपर उठना चाहिए; सबकी भावनाओं को सम्मान देना चाहिए और उस मालिक का शुक्रिया अदा करना चाहिए। उसने हमें इतनी नेमतें दी हैं। ऑक्सीजन हमें मुफ्त में मिलती है, इसकी अनुपलब्धता का मूल्य तो हमें कोरोना काल में ज्ञात हो गया था। हमारी आवश्यकताएं तो पूरी हो सकती हैं, परंतु इच्छाएं नहीं। इसलिए हमें स्वार्थ को तजकर,जो हमें मिला है, उसमें संतोष रखना चाहिए और निरंतर कर्मशील रहना चाहिए। हमें फल की इच्छा कभी नहीं करनी चाहिए, क्योंकि जो हमारे प्रारब्ध में है, अवश्य मिलकर रहता है। अंत में अपने स्वरचित गा त की पंक्तियों से समय पल-पल रंग बदलता/ सुख-दु:ख आते-जाते रहते है/ भरोसा रख अपनी ख़ुदी पर/ यह सफलता का मूलमंत्र रे। जो इंसान स्वयं पर भरोसा रखता है, वह सफलता की सीढ़ियाँ चढ़ता जाता है। इसलिए इस तथ्य को स्वीकार कर लें कि जो नहीं है, वह ख़्वाब है;  जो मिला है, लाजवाब है। परंतु जो नहीं मिला, उस सपने को साकार करने में जी-जान से जुट जाएं, निरंतर कर्मरत रहें, कभी पराजय स्वीकार न करें।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी ⇒ अंगूठे का कमाल… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “अंगूठे का कमाल”।)  

? अभी अभी ⇒ अंगूठे का कमाल? श्री प्रदीप शर्मा  ? 

अंगूठी उंगलियों में शोभा देती है, अंगूठे में नहीं। कहने को हमारे हाथों में पांच पांच उंगलियां हैं, लेकिन उंगली, उंगली है और अंगूठा, अंगूठा। जब यह किसी कागज़ पर लगाया जाता है तब तो अंगूठा निशानी बन जाता है, लेकिन जब किसी को दिखाया जाता है, तो ठेंगा कहलाता है।

बड़े मोटे होते हैं ये अंगूठे, चाहे हाथ के हों, या दोनों पांव के। पतली पतली नाजुक उंगलियों की तुलना में आप इन्हें, मोटा

हाथी भी कह सकते हैं। बचपन में हमारा शरीर इतना लचीला होता है कि एक नन्हा सा बालक हाथ का ही नहीं, अपने दोनों पांवों का अंगूठा भी आसानी से चूस सकता है। ऐसा क्या है इस अंगूठे में, कि कुछ बच्चे पेट भरने के बाद भी अंगूठा ही चूसा करते हैं। अंगूठा, हमारे जमाने की चुस्की था। कोई हमें क्या बहलाएगा, हमारा अंगूठा ही हमारे काम आएगा। ।

निरक्षर को बोलचाल की भाषा में अंगूठा छाप कहते हैं। जहां पढ़े लिखे अपने हस्ताक्षर छोड़ते हैं, वहां एक अनपढ़ बड़े आत्म विश्वास के साथ, अपना अंगूठा निशानी छोड़ जाता है। जब वे इस संसार से गए, तो अपने बाद, कई कानूनी कागजों और दस्तावेजों पर अपने अंगूठे की छाप छोड़ गए।

साक्षरता अभियान में हमारे कई अनपढ़ लोगों ने अपने हस्ताक्षर करना सीख लिया। अब रामप्रसाद गर्व से अपने हस्ताक्षर करता है, अंगूठा नहीं लगाता। वैसे उसके लिए आज भी काला अक्षर भैंस बराबर ही है। उसका आज भी यही मानना है, कि ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पण्डित होय, जब कि रामप्रसाद तो ढाई नहीं, पांच अक्षर लिख और बांच सकता है, तो क्या वह महा पंडित नहीं हुआ। ।

हमारा केरल प्रदेश सौ प्रतिशत साक्षर है, लेकिन वहां के पढ़े लिखे लोगों को नौकरी करने अन्य प्रदेशों में जाना पड़ता है, जहां आज भी गांव गांव में आंगनवाड़ी और प्रौढ़ शिक्षा अभियान जारी है। आज भी याद आता है, अटल जी का आव्हान, चलो इस्कूल चलें। कितना ठंडा ठंडा, कूल कूल, हमारा स्कूल।

द्वापर युग में ही कौरव पांडवों के गुरु द्रोणाचार्य, अंगूठे का महत्व जान गए थे, तभी तो अपने ऑनलाइन शिष्य एकलव्य से गुरु दक्षिणा में अंगूठा मांग लिया। ये अंगूठा मुझे दे दे, सत् शिष्य ! कोई आज का शिष्य होता तो अपने गुरु को अंगूठा दिखा देता, अब तो गुरुजी सरकार तो मुझे स्कॉलरशिप दे रही है, और आपको दो कौड़ी की तनख्वाह। जाओ, कहीं और ट्यूशन करो। ।

जब से हमारा देश पेपर करेंसी से मुक्त हुआ है, वह पूरी तरह डिजिटल हो चुका है। कागज की महत्ता को देखते हुए, सभी शासकीय और अर्ध शासकीय कामकाज, पेपरलेस होते चले जा रहे हैं। दफ्तरों में हाजरी रजिस्टर नहीं, ई – हस्ताक्षर किए जा रहे हैं। संचार क्रांति आजकल डिजिटल क्रांति बन चुकी है।

हमने भी कब से कागज पत्तर और कलम दवात का मोह छोड़ दिया है। आज हमारे हाथ में भी स्मार्ट एंड्रॉयड फोन, लैपटॉप, डेस्क टॉप और कंप्यूटर है। लेकिन हम इतने लालची नहीं ! आज भी एक अदद 4-G एंड्रॉयड फोन से हम सभी लिखा पढ़ी, चिट्ठी पत्री और चैटिंग सफलतापूर्वक संपन्न कर लेते हैं, और इसमें हमारा एकमात्र सहारा और सहयोगी होता है, हमारा मात्र अंगूठा। ।

कभी जब हमारी उंगलियां टाइपराइटर पर चलती थी, तो दसों उंगलियों को रोजगार मिल जाता था। हम जब टाइप करते थे, तो लगता था, हम कोई हरमुनिया बजा रहे हैं। सारेगम, पधनीसा की जगह हमारा हिंदी कीबोर्ड होता था, बकमानजन, सपिवप।

अंग्रेजी कीबोर्ड आज भी यूनिवर्सल है, asdfg, hjkl इत्यादि इत्यादि।

अब मात्र चार अंगुल का तो हमारा एंड्रॉयड फोन का की -बोर्ड, कहां कहां उंगली रखी जाए ? आपको आश्चर्य होगा, हमारा केवल अंगूठा किस खूबी और दक्षता से पूरा की बोर्ड चला लेता है। एक हाथ में मोबाइल और दूसरे हाथ का केवल अंगूठा ही यह अभी अभी रोज इसी तरह आपकी सेवा में प्रस्तुत करता चला आ रहा है। मुझे नहीं पता, आप कौन से कर कमल से यह कार्य निष्पादित करते हैं। ।

मेरे मन मस्तिष्क ने महर्षि वेद व्यास की तरह, मेरे अंगुष्ठ रूपी श्रीगणेश को, विचारों की श्रृंखला को, एक कड़ी में पिरोकर, अग्रेषित किया और हमारे अंगुष्ठ महाराज, गणेश जी की तरह, फोन के की बोर्ड पर, उसे यथावत उतारते चले गए। इसमें हमारे अथवा मेरे मैं का कोई योगदान नहीं।

तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा। यह सिर्फ हमारे अंगूठे का कमाल है। अगर कुछ अच्छा है तो वह सब उसका है, अगर अच्छा नहीं, तो सब कुछ मेरा है।

थ्री चीयर्स एंड थम्स अप।।

    ♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – देहरी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – देहरी ??

आर या पार,

जानता हूँ ;

देहरी पर

सिमटा है संसार,

देवता या दानव,

देखता हूँ ;

देहरी पर

ठिठका है मानव…!

© संजय भारद्वाज 

प्रात: 11:45 बजे, 4 मई 2023

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक।

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #180 ☆ कैसे कहूं…? ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं  आपकी एक भावप्रवण रचना “कैसे कहूं…?।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 180 – साहित्य निकुंज ☆

☆ कैसे कहूं…? ☆

भाव मन में 

बहने लगे 

अनायास

कैसे कहूं।

 

कुछ न आता समझ

व्यक्त कैसे करूं

मन की बातें

कैसे कहूं।

 

दिल पर 

छाई है उदासी

बेवजह

कैसे कहूं।

 

उनके शब्दों में

 है जान 

मिलती है प्रेरणा

कैसे कहूं।

 

बिखरे शब्द 

लगे समिटने

मिला आकर

कैसे कहूं।

 

आयेगा वो पल

 चमकेगी किस्मत

समझोगे तब

कैसे कहूं।

 

है मंजिल सामने

वहीं है खास

हो जाती हूं नि:शब्द

कैसे कहूं।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #166 ☆ “संतोष के दोहे… कर्म पर दोहे” ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है – “संतोष के दोहे … कर्म पर दोहे”. आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 166 ☆

☆ “संतोष के दोहे …कर्म पर दोहे☆ श्री संतोष नेमा ☆

कर्मों पर होता सदा, कर्ता का अधिकार

कर्म कभी छिपते नहीं, करते वो झंकार

कर्मों से किस्मत बने, कर्म जीवनाधार

कभी न पीछा छोड़ते, फल के वो हकदार

जैसी करनी कर चले, भरनी वैसी होय

कर्मों की किताब कभी, बांच सके ना कोय

सबको मिलता यहीं पर, पाप पुण्य परिणाम

जो जिसने जैसे किये, बुरे भले सब काम

तय करते हैं कर्म को, स्व आचार- विचार

कर्मों से सुख-दुख मिलें, तय होते व्यबहार

पाप- पुण्य की नियति से, करें सभी हम कर्म

सदाचरण करते चलें, यही हमारा धर्म

अंत काम आता नहीं, करो कमाई लाख

साथ चले नेकी सदा, तन हो जाता राख

गया वक्त आता नहीं, समझें यह श्रीमान

करें समय पर काम हम, रखें समय का मान

कर्म करें ऐसे सदा, जिसमें हो “संतोष”

कोई कभी न दे सके, जिसकी खातिर दोष

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares