हिंदी साहित्य – कविता ☆ “गुलाबों की खेती” ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

सुश्री इन्दिरा किसलय

☆ कविता ☆ 🌹 गुलाबों की खेती 🌹 ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

– कोटि कोटि दीप जलते हैं

सुबह की पलकों पर

स्वप्न पलते हैं

अनगिनत–‘-

कल्पना के नीड़ में,

हाथ उठते हैं प्रार्थनाओं के लिए

अनवरत——

ब्रह्माण्ड की तरंगें

गुलाबों में तब्दील होती रहती हैं ।

इतनी सारी खुशबुएं

फिर भी नहीं पहुंच पातीं

मौत के सौदागरों तक—-

जो बारुद की फसलें उगाते हैं

बेगुनाहों के लहू से

श्रृंगार करते हैं

दानवी लिप्सा का !

उन्हें कोई तो समझाए

गुलाबों की खेती बेहद मुनाफेवाली है !

थोड़ी सी मशक्कत

और अपने हाथ

महकने लगते हैं

समूची कायनात के साथ !!!!

 

©  सुश्री इंदिरा किसलय 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ वेलेन्टाइन डे विशेष – लघुकथा – तेरी-मेरी कहानी ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे ☆

प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे

☆ वेलेन्टाइन डे विशेष – लघुकथा – तेरी-मेरी कहानी ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे ☆

(बीते कल के वेलेंटाइन डे की अप्रतिम लघुकथा)  

“हैप्पी वेलेन्टाइन डे, माय डियर,एंड आय लव यू।” कहते हुए सुनील ने एक रेडरोज अपनी पत्नी रत्ना के हाथ में दे दिया। 

“आय लव यू टू, माय लाइफ।” कहते हुए रत्ना ने अपनी खुशी व्यक्त की। 

 इस पर दोनों ठीक चार दशक पहले की कॉलेज की यादों में खो गए। 

“सुनील जी! क्या आपके पास यूरोपियन हिस्ट्री की बुक है?”

“हां! जी है।”

“मुझे कुछ दिन को देंगे, क्या?”

“जी ज़रूर।”

और सुनील ने यूरोपियन हिस्ट्री की किताब एम ए प्रीवियस की उसकी क्लास में आई नवप्रवेशित सुंदर,आकर्षक और शालीन लड़की रत्ना को दे दी।

फिर रत्ना ने नोट्स बनाने में सुनील की मदद की। सहपाठी तो वे थे ही,आपस में दोनों का मेलजोल बढ़ता गया। 

कक्षा में दोनों ही सबसे होशियार थे, इसलिए दोनों के बीच स्पर्धा भी थी, पर पूरी तरह स्वस्थ। धीरे-धीरे दोनों एक-दूसरे के दिल में समाते गए। रिजल्ट आया तो दोनों के ही नाम यूनीवर्सिटी की मेरिट लिस्ट में थे। 

और आज दोनों एक-दूसरे के जीवन की मेरिट लिस्ट में भी हैं।

अचानक उनकी तंद्रा टूटी, वे वर्तमान में वापस लौट आये, और एक-दूसरे की ओर देखकर मुस्कराने लगे। सुनील ने कहा, “तुम्हारी-मेरी कहानी भी ख़ूब है, डियर।”

“हां! है तो माय हार्ट।” रत्ना ने शरारती अंदाज़ में कहा।

© प्रो.(डॉ.)शरद नारायण खरे

प्राचार्य, शासकीय महिला स्नातक महाविद्यालय, मंडला, मप्र -481661

(मो.9425484382)

ईमेल – khare.sharadnarayan@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उसनी गाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ उसनी गाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

डोळ्यात वाचली मी               

             होती तुझ्या कहाणी

तेथे समर्पणाची

            मज भेटली निशाणी

 

निरखून डोह गहीरा

                अंदाज घेतला मी

मग खोल खोल पाणी

                 पोहून पाहिले मी

 

त्या काळजात दडले

               ते स्वप्न जाणले मी

स्वप्नात आशयाचे

              घर छान बांधले मी

 

तू शब्द दिलेला तेव्हा

              झेलून घेतला हाती

मजबूत कराया धजलो

           मी दोघा मधली नाती

 

शेवटच्या थांब्या साठी

           भरधाव धावणे नडले

घसरून तोल जाताना

           विपरीतच सारे घडले

 

आताही रोज फुला़ंचा

       मज काच जाचतो भारी

पण रोज तुझ्या स्मरणाची

          मन मारून घडते वारी

 

वठलेल्या झाडाला ही

        मी बसतो घालत पाणी

हट्टाने म्हणतो सारी

       दुस-यांची उसणी गाणी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 169 ☆ विसावा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 169 ?

☆ विसावा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कोठे तरी जिवाला

लाभो जरा विसावा

करतेय    ईश्वराचा

सर्वस्वी हाच धावा

 

संसार मांडला का

माझे मला कळेना

तारूण्य काय असते

तेव्हा कळले मुळीना

 

प्रवाहपतिता परि हे

आयुष्य पार पडले

जे नको घडाया ते

अवचित येथे घडले

 

जगरहाटीच असते ?

होते प्रारब्ध हेच?

 गा-या भिंगो-या की

नाच गं घुमा नाचच ??

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

परिचय  

उमेश मुरलीधर सूर्यवंशी, कोल्हापूर.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या मार्फत होणा-या सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रचे तीन वर्षे सहसंपादक म्हणून काम केले आहे. वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून 500 हून अधिक पत्रे प्रकाशित. सोशल मिडियावर विविध विषयांवरील 22लेखमाला प्रसिद्ध. तसेच विविध विषयांवरील व्याख्याने देऊन समाज प्रबोधन चालू आहे.

राजर्षी, निर्भय, बाईपण, विचार शलाका, एकटा ही पुस्तके प्रकाशित.

? विविधा ?

☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

शब्दांच्या महाजालात खूप काही गहिरे अर्थ दडलेले असतात. त्या अर्थाचा पायपोस देखील आपल्या जीवनात अथवा वर्तनात घडत नाही ही शोकांतिका आहे. शब्दाच्या अर्थाची जाणीव झाली तरच तो शब्दार्थ व्यवहारात उमटवण्याची ऊर्मी मनांत जागू शकते. हे शब्द एकत्रित व व्यवस्थित एका दिशेने बांधून एका ठराविक चौकटीत तयार होते ते असते ” पुस्तक “. मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे ..पुस्तक .

पुस्तक ….बहुतांशी हातात आयुष्यात एकदा तरी कोणते ना कोणते पुस्तक पडलेले असते. भले ते अभ्यासक्रम असणारे पुस्तक असेल अथवा एखादे रद्दीत टाकलेले किंवा अडगळीत पडलेले पुस्तक असेल. अभ्यासक्रम मधील पुस्तक जितके महत्त्वाचे असते तितकेच रद्दी अथवा अडगळीत पडलेले पुस्तक दुर्मिळ असू शकते. त्या पुस्तक नावाच्या घटकाची मुल्यता ठरते ती त्यामधील आशयावर. तो आशय ज्यांना समजतो त्यांना पुस्तक समजले . पुस्तक वाचण्याची क्रिया ही केवळ आनंददायी नसते तर ज्ञानदायी असते. आनंद + ज्ञान ….म्हणजे पुस्तक . केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकात रमलेली व्यक्ती भले जीवनात भौतिकदृष्ट्या यशस्वी होईल देखील पण अवांतर पुस्तकाचे वाचन नसेल तर त्या यशस्वी व्यक्तीच्या माणूस बनण्याची प्रक्रिया नक्कीच थांबली आहे असे निखालस समजावे. मनुष्य व प्राणी यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. मनुष्य पुस्तक वाचू शकतो, आनंद घेऊ शकतो, वेगवेगळ्या ज्ञानकक्षा कवेत घेऊ शकतो. प्राण्यांना हे शक्य नसते. याचकरीता ” पुस्तके वाचतो तोच मनुष्य ” अशी व्याख्या करणे अतिशयोक्ती ठरु नये. पुस्तकांचे जग हे सर्वाधिक विश्वासाचे जग आहे….त्या जगात आयुष्य शोधता आले पाहिजे .

पुस्तके नसतीत तर ?…केवळ या कल्पनेनेच मानवी जीवनातील रसहिनतेची, अज्ञानपणाची जाणीव तयार होते. पुस्तक हाती धरणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे ते पुस्तक समजून घेऊन आपल्या मेंदूमध्ये त्या पुस्तकीय जाणीवा विकसित करत राहणे अत्यावश्यक असते. “वाचाल तर वाचाल ” या वाक्याचा अर्थ तसाच घ्यावा . “पुस्तके जपा…आयुष्य जपा ” हा सुसंस्कृत मानवी जीवनाचा नवा मंत्र आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षमा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ क्षमा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

“क्षमा”…….!!!

पुण्याच्या आसपासचं गाव….कुटुंब ठिकठाक …एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन….. साहजीकच सुनेवर सर्व भार …. आधी किरकोळ कुरबुर…. मग बाचाबाची…. त्यानंतर कडाक्याची भांडणं…. सुनेचं म्हणणं…. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका….. काम करुन हातभार लावा संसाराला ….. पण बाबा थकलेले….. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं… मुलानेही अडवलं नाही…

आले पुण्यात….कुणी म्हातारा म्हणुन काम देईना  आणि भुक जगु देईना…. भिक  मागण्यावाचुन पर्याय उरला नाही….

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन  बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?

“बाळ” म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण “हिला” विचारुन सांगतो…..

पण ….या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही…..!

आता बाबा अट्टल भिकारी झाले…..

झाले कि त्यांना केलं गेलं….. ?

अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली….

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो…. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं…. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते…. कुणाचाच आधार नसतो म्हणुन…. तसंच हे म्हातारपण ….. झुकलेलं आणि वाकलेलं…. निष्प्राण वेलीसारखं…. !

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही…!

नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं….नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच…. तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले….

असं बोलुन ते हसायला लागतात….

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच  पिळ पाडुन जातं…..

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही… पण हे हसु खोटं आहे तुमचं… तर म्हणायचे… आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं…. हसण्याचं नाटकच केलं … आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु….???

मी निरुत्तर…. !

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं  आयुष्य झालंय… कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं…. टोपलीत ठेवतं…. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली…. नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय… सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा….?

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो….

काहीतरी काम करा बाबा , असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती…. बाबा कामाला तयार नव्हते !

म्हणायचे , आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं…किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील…. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील…

नाटक असतं हो सगळं आयुष्यच …. प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच…. !

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच…. बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली…. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता… भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता…. !

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले…. मला जरा बाजुला घेवुन गेले…. म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर …..

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो…. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, “हिने” तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते…. पाया पडुन माफी मागायला तयार आहे… बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु.”

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला  भिक मागायला लावली…. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली….?

डाॕक्टर काय करु सल्ला द्या…

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु….. !

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु ? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना…. चालेल तुम्हाला ?

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का ?अहो चुकतात तीच पोरं असतात….. माफ करतो तोच “बाप” असतो…..

अहो,  लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय , भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो….. त्यातुन तो किती शिकला माहिती नाही…. बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर…असो !

पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी “क्षमा” म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ….

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला “क्षमा” करणार नाही…..

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर …

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत…

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

२०१८च्या जून महिन्यात मी बाली इथं एका परिषदेत भाग घेण्यासाठी, तर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या एका परिषदेत सहभागी होण्यासाठी माॅरिशसला गेलो होतो. परिषदांमध्ये सहभागी होऊन मी माझे रिसर्च पेपर सादर केले. परिषदांच्या कामकाजानंतर दोन्ही देशांत साधारणत: एक एक आठवडा मुक्काम झाला. आयोजकांनी तिथल्या विविध सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील  अनेक संस्थांना आमच्या भेटी घडवून आणल्या. भरपूर साईट सिईंगही केले.निसर्गरम्य समुद्रकिनारे, रंगीबेरंगी मनमोहक फुलांच्या बागा,श्रममहात्म्याने विकास पावलेले समाज,सामाजिक सौदार्ह आणि शांतता असं  बरंच काही चांगलं पाहिलं..आपल्याकडं ज्या नाहीत, त्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी पाहून भारावून जायला नक्कीच झालं. रहाण्याची व्यवस्था, खाणंपिणं, प्रवास हेही नियोजनबद्ध आणि सुरेख होतं.

माझी मुलगी  इंग्लंडला एका नावाजलेल्या हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टर आहे. तिच्याकडं जायचं खूप दिवस चाललं होतं. पण माझ्या नोकरीच्या  काळात ते शक्यच झालं नाही. त्यात मधले काही दिवस कोरोनामुळे जमलंच नाही. जगभर सगळीकडंच सारं ठप्प झालं होतं. सप्टेंबर २०२१ ला मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो.आणि  पत्नीबरोबर  इंग्लंडला जायचं आम्ही ठरवलं. त्यात अनेक अडचणीही आल्या. सेवानिवृत्त होऊनदेखील बरेच दिवस पेन्शन आणि इतर आर्थिक बाबी मिळण्यास खूपच उशीर झाला. अनेक शारीरिक व्याधींनी मी त्रासून गेलो. तशाही अवस्थेत अनेक संबंधित ऑफिसांत जाऊन मी पायपीट करत होतो. “तुम्ही लवकर या” असा मुलीचा  लकडा चालूच होता.आम्हा दोघांचे पासपोर्ट हातात आले. इंग्लंडचा व्हिसा कित्येक दिवस झाले तरी मिळाला नाही. दिवसांमागून दिवस जात होते. इंग्लंडला जायचं नियोजन धूसर दिसत चाललं. रशिया- युक्रेन युद्धामुळं हा वेळ लागतो,असं सांगितलं गेलं. जाण्याची जय्यत तयारी करून आम्ही व्हिसाची वाट पहात बसलो.

असाच एक दिवस सायंकाळी मोबाईलवर मेसेज आला की,आम्हा दोघांचे पासपोर्ट तयार असून ते घेऊन जावेत. इंग्लंडला जायचा मुहूर्त एकदाचा मिळाला.

मुलीशी  फोनवरून बोलून जाण्याची आणि परत भारतात येण्याचीही तारीख ठरवली. व्हिसा मिळायला उशीर झाल्यामुळे फक्त दोन महिने तिच्याकडं रहाता येणं शक्य होतं. विमानाची तिकिटं तिनंच काढली.  १९ जूनला आम्ही मुंबईहून डायरेक्ट विमानाने इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावर पोहचलो. तेव्हा तिथं सायंकाळ झाली होती.

विमानतळावरून बॅगा घेऊन बाहेर आलो. हा सिझन तिथं तर उन्हाळ्याचा होता. पण तिथली थंडी सहन होत नव्हती. बाहेर रिमझिम पाऊसही पडत होता. जर्किन आणि कानटोपी चढवून छत्रीही उघडली. एका टॅक्सीनं आम्ही  लंडनच्या जवळ असलेल्या मुलीच्या फ्लॅटवर पोहोचलो.  पुस्तकांतून,  चित्रपटांतून दाखवलं जातं तसं जाताना अनुभवलं. खड्डे नसलेले सुबक रस्त्यावरून जाताना इतस्तत: सगळीकडं जाणवेल इतकी स्वच्छता होती. सगळं काही आखीव रेखीव होतं. रस्त्यावरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होती. पण तीही ट्रॅफिकचे नियम पाळून. आमच्या वास्तव्यात इंग्लंडमधील लंडन, केंब्रिज अशा अनेक शहरांत आम्ही जाऊन बरंच पाहिलं. लहानपणापासून मला  क्रिकेटची खूप आवड. गावी  मी खूप क्रिकेट खेळलो होतो. मला आठवतं एकदा तीन गावांची क्रिकेटची टुरनामेन्ट होती. त्यात मी सलग तीन विकेट घेऊन हॅटट्रिक केली होती.

लंडनमधील लाॅर्डसच्या ग्राऊंडला ‘क्रिकेटची पंढरी ‘म्हणतात. ते पहाण्याची संधी मला मिळाली. ते मला सोनेरी स्वप्नच वाटलं .या क्षणांना मी कवितेत गुंफले — 

पाहिलं मी लाॅर्डसचं  मैदान…

विस्तीर्ण रस्त्यांच्या महिरपींनी नटलेलं,

इंद्रधनु स्वप्नांसारखं, परिकथेतील सुंदर,

पाहिलं मी लाॅर्डसचं मैदान—

कपिलदेवसोबतच अनेक भारतीयांच्या तसबीरींनी आणि

विक्रमगाथांनी इथल्या ड्रेसिंगरूम सजल्या होत्या, 

सचिनचे प्रेरक शब्द तिथली एक भिंत अभिमानाने मिरवत होती,

१९८३ मधल्या भारताच्या विश्वविजयाचा प्रुडेनशीयल चषक 

तिथल्या म्युझियममध्ये पाहिला, आणि … 

बघता बघता लाॅर्डसचं मैदान शतपटींनी उजळून निघालं…

आपल्याकडं जत्रेत जसे पाळणे असतात तसाच एक अतिविशाल पाळणा थेम्स नदीकाठावर आहे.त्यातून लंडनमधील अनेक गोष्टी दाखवल्या जातात. त्याला ‘लंडन आय ‘म्हणतात. या लंडन आयमधून अनेक   सुंदर सुंदर बाबी आम्हाला दाखवल्या. नंतर पायी चालत लंडनमधून जाताना, लंडन आयमधून  जे दिसलं नव्हतं, त्या ब-याच बाबी पहायला मिळाल्या. हेही मी शब्दात मांडलय — 

दर्शन…

अतिभव्य पाळण्यावरच्या लंडन आयनं,

लंडनचं मनोहारी दर्शन मला दिलं ,

आकाशातल्या सूर्यकिरणांनी

चमचमणारे पाणी मला दाखवलं,

भव्य ब्रिटिश संसदेचे आणि युरोपातल्या अतिऊंच इमारतीचे 

दर्शन मला घडवलं,

जगाला भूषणावह अनेक विक्रमांच्या साक्ष असलेल्या टोलेजंग  इमारती दाखवल्या ,

त्या इमारतींच्या भवतालच्या पाचूंच्या बागांतून उमललेली रंगीबेरंगी फुलं दाखवली,

टाॅवर ब्रिजसकट अनेक सुंदर पूल दाखवले,

निखळ आनंदाने हसणारी, खिदळणारी माणसं दाखवली;

लंडनच्या रस्त्यावरून जाताना पाहिलं,

ठिकठिकाणी बोकाळलेले जुगारांचे बाजार,

खाऊन पिऊन झाल्यावर त्याचे रिकामे कागद रस्त्याच्या कडेला फेकून देणारी माणसं,

येणा-या जाणा-यांना गुलाबाची फुलं देऊन पैसे उकळणाऱ्या बायका

आणि– 

“हेल्प मी,गाॅड मे ब्लेस यू ” या पाटीआड डोकं खुपसून बसलेला मळलेल्या  कपड्यातला एक याचक— 

जगावर राज्य केलेल्या इंग्लंडमधील स्वच्छता, टापटीप, निटनेटकेपणा हे जितके भावले, त्याचबरोबर तिथल्या  समाजातील औपचारिकता मला मानवी जीवनातील कोरडेपणा जाणवून गेली. आपल्या समाजात अनेक उणिवा आहेत. त्या स्वीकारूनही इंग्लंडमधील  कुटुंबसंस्था ही मला चिंतेची बाब वाटली.आपल्या आणि इंग्लंडमधल्या समाजरचनेची तुलना करता आपल्याकडं सगळं आबादीआबाद आहे असं मला म्हणायचं नाही. तरीपण एक सांगावसं वाटतं….. आपल्याकडं प्रबोधन आणि परिवर्तनाच्या अनेक चळवळी   झाल्यात. अनेक कारणावरून त्या अनेकदा खंडितही झाल्या. या अधिक गतिमान केल्या तर — आपल्याकडील न्यूनता नक्कीच कमी होईल.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- sks.satish@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील, पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ….

त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे, कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा …

पण आज उलट झालंय.. प्लास्टिक व थर्मोकोलमुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे…

शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण, मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नाद्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत… कृपया वेळ आली आहे, 

“जुनं ते सोनं ” आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून  सिद्ध झाले आहे ..

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.

– केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

– केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.

– त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.   

सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते; ’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शास्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजूबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.

केरळमध्ये जेवणासाठी  व जेवण पॅकींगसाठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..

पण आपण कधी सुधारणा करणार ? वेळ कुणासाठी थांबत नाही..

लेखक : डॉ कल्याणकर किरण, M.D. (Ayu.)

आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ, -स्वायु कॅन्सर केयर सेंटर 

-श्री विश्व गणेश आयुर्वेद पंचकर्म, खारघर, नवी मुंबई. 

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

 मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?

व्यायाम हे औषध आहे.

सकाळ/संध्याकाळ चालणे हे औषध आहे.

उपवास हे औषध आहे.

कुटुंबासोबत जेवण हे औषध आहे.

हसणे आणि विनोद हे देखील औषध आहे.

गाढ झोप हे औषध आहे.

सर्वांशी मिळून वागणे हे औषध आहे.

आनंदी राहण्याचा निर्णय हे औषध आहे.

मनातील सकारात्मकता हे औषध आहे.

सर्वांचे भले हे औषध आहे

कधी कधी मौन हे औषध असते.

प्रेम हे औषध आहे.

मन:शांती हे औषध आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत

आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?

प्रत्येक चांगला मित्र हे एक परिपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.

निरोगी रहा आणि आनंदी रहा

दिवसाचा आनंद घ्या

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

शाळेत असताना हिंदीच्या पाठ्यपुस्तकात ‘चांदणी’ नावाची एक गोष्ट होती. अलमोडा पहाडात राहणाऱ्या अबूमियांची चांदणी नावाची एक खूप लाडकी बकरी होती. कापसासारख्या शुभ्र, गुबगुबीत चांदणी बकरीच्या कपाळावर एकच काळा ठिपका होता. एकदा चरण्याच्या नादात चांदणी एकटीच पहाडात दूर दूर जाते. चुकलेल्या चांदणीला अबूमिया हाकारत राहतात आणि शेवटी नाइलाजाने इतर बकऱ्यांना घेऊन उदास मनाने घरी परततात. पहाडात सैरभैर फिरणाऱ्या चांदणीची गाठ एका कोल्ह्याशी पडते. चांदणी प्राणपणाने कोल्ह्याशी झुंज देते. पण…….! चांदण्याने निथळलेला गुढरम्य अलमोडा पहाड, तिथली घनदाट वृक्षराजी, चांदणीची आर्त साद आणि एकाकी झुंज दीर्घकाळ स्मरणात राहिली. त्यानंतर खूप वर्षांनी हिमालयातील अलमोडा पर्वतराजी पाहण्याचा योग आला तेव्हा चांदणीची आठवण झाली.

पूर्वीच्या उत्तर प्रदेशचे २००० साली विभाजन करून उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. डेहराडून ही या राज्याची राजधानी. गढवाल आणि कुमाऊँ असे उत्तराखंडचे दोन भाग पडतात. गढवालचे टेहरी गढवाल आणि पौरी गढवाल असे दोन मोठे विभाग आहेत, तर कुमाऊँ टेकड्यांमध्ये नैनीताल, अलमोडा हा पूर्वेकडचा भाग येतो. उत्तराखंडाच्या उत्तरेकडे तिबेट, पूर्वेकडे नेपाळ आणि पश्चिम व दक्षिणेकडे उत्तर प्रदेश राज्य आहे.

आम्ही लखनौहून रात्रीच्या ट्रेनने काठगोदाम इथे सकाळी पोहोचलो. काठगोदामहून नैनीताल हा साधारण दोन तासांचा रस्ता अतिशय सुंदर आहे पण आमची बस अर्ध्यावाटेमध्ये बिघडल्याने मेकॅनिकची वाट पाहण्यात बराच वेळ गेला. शेवटी तिथेच उतरून पहाडाच्या माथ्यावरच बरोबर आणलेलं जेवण घेतलं. एका बाजूला खोल दरी होती. लांबवर कुमाऊँ पहाडांची रांग दिसत होती. सगळ्या दऱ्या डोंगरांवर साल, देवदार आणि पाईन वृक्ष ताठ मानेने उंच उभे होते. गाडी दुरुस्त होऊन थोडा प्रवास झाल्यावर डोंगर आडोशाच्या एका छोट्या टपरीत चहासाठी थांबलो. पण कसले काय? भन्नाट वाऱ्याने तिथे थोडा वेळसुद्धा थांबू दिले नाही. टपरीवाल्याचे टेबलांवरचे, छपरावरचे प्लास्टिक उडून गेले. टेबल- खुर्च्या थरथरायला लागल्या. पाऊसही सुरू झाला. धावत पळत कसेबसे गाडीत येऊन बसलो. नैनितालला पोहोचायला रात्र झाली.

आमचं हॉटेल नैनी लेकच्या समोरच होतं. लंबगोल प्रचंड मोठ्या नैनीतालच्या भोवती रमत- गमत एक फेरी मारली. तलावात बोटिंगची सोयही आहे. वातावरणात थंडी होती आणि डोक्यावर ऊन होते. मॉल रोडवर प्रवाशांना हाकारणारी शेकडो दुकाने आहेत. तिबेटी स्त्रियांच्या दुकानातील असंख्य स्वेटर्स, आकर्षक कपडे, परदेशी वस्तू, वस्तूंच्या भावावरून घासाघीस सारे हिल स्टेशनला साजेसे होते. नैना देवीचं दर्शन घेतलं. दुपारी भीम ताल, सात ताल  बघायला बाहेर पडलो. बसमधून घनदाट वृक्ष आणि कुमाऊँ रेंजची दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं न्याहाळत चाललो होतो. आमचा गाईड चांगला बोलका व माहीतगार होता. कालच्या  सोसाट्याच्या भन्नाट वाऱ्यात ठामपणे उभ्या असलेल्या वृक्षांबद्दल विचारलं. तर त्याने पाईनवृक्षाचे एक पडलेले फळ आणून दाखविले. त्या फळाच्या देठाशी जो चिकट द्रव होता तो म्हणजे राळ. या राळेपासून टर्पेंटाईन बनवलं जातं. इथल्या गावातून दिव्यात घालण्यासाठीसुद्धा राळ वापरली जाते. पाईनचे लाकूड पटकन पेट घेते म्हणून थंडीच्या दिवसात शेकोटीसाठी याचा वापर करतात. या लाकडापासून बनवलेली झाकणं स्वयंपाकाच्या भांड्यांवर ठेवतात. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत पदार्थ बराच वेळ गरम राहू शकतो अशी छान माहिती त्याने सांगितली. भीमतालवर जाण्यासाठी उतरलो पण तिथे पोहोचू शकलो नाही. मुसळधार पाऊस सुरू झाला. थंडीने हृदय काकडले. कसेबसे हॉटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान बघायला निघालो. जाताना खोल दऱ्यांमधील अनेक छोटेमोठे जलाशय दिसत होते. त्यात स्वच्छ निळ्याभोर आकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे ते नीलमण्यांसारखे भासत होते. पुढचा रामनगरपर्यंतचा रस्ता पहाडी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गव्हाची आणि मोहरीची मोठी शेती होती. भरपूर आम्रवृक्ष होते. आपल्याइथला हापूस आंब्याचा सिझन संपत आला की बाजारात येणारे दशहरी, केशर, नीलम, लंगडा आंबे हे उत्तराखंड, उत्तर प्रदेशचे असतात. थंडगार पहाडावरून सपाटीवर आलो होतो. भरपूर वृक्ष आणि हवेतला ओलसर दमटपणा यामुळे घामाघूम झालो होतो .एका धाब्यावर गरम चविष्ट पराठा खाऊन मोठा ग्लास भरून दाट मधुर लस्सी घेतली आणि पोटभरीचे जेवण झालं. अभयारण्यच्या आधी ‘जीम कॉर्बेट’ म्युझियम आहे. पुढे थोड्या अंतरावर छोटासा धबधबा आहे. रंगीबेरंगी पक्षी, सुगरणीची घरटी, हरणे, रान कोंबड्या यांचं दर्शन झालं. तीन-चार फूट उंच वारूळं रस्त्याच्या दोन्ही कडांना होती. ड्रायव्हरने जंगलवाटा धुंडाळल्या पण व्याघ्रदर्शन झाले नाही. दूरवर चरणारे जंगली हत्ती, मोर, गरुड दिसले. कडूलिंबाचे प्रचंड मोठे वृक्ष होते.

उत्तराखंड भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares