एका कंपनीत ३० वर्षे काम केल्यानंतर असीस्टंट मॅनेजर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती.
शिक्षण – एम,काॅम पर्यंत.
विरंगुळा म्हणून लिहीणे. आज पर्यंत जवळपास ३५० हून अधिक पोस्ट.
दै. लोकमत, तरुण भारत जळगाव यात काही प्रकाशित. तसेच काही पोस्ट ऑडीओ बुक वर देखील घेतल्या होत्या.
विविधा
☆ “बोलणे…” ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे ☆
नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता:
बोलणे….कौस्तुभ परांजपे.
बोलणे……
बोलण्याबद्दल लिहिणे यातच एक गंमत आहे. किती प्रकारचे बोलणे असते….
बोबडे, गोड, लाडात, रागावून, गुळमुळीत, स्पष्ट, चांगले, वाईट, हळू, जोरात, कानात बोलणे इ… यातही बोलणे पण पाठीमागे बोलणे यावर बरेच बोलणे होत असावे. अशा या बोलण्यातल्या विविधता जवळपास प्रत्येकात आहेत.
आपले वय, अनुभव, अधिकार, जबाबदारी, प्रसंग, काळ या बरोबर बऱ्याचदा बोलणेही बदलते.
बोलण्या बाबत काहिंचा हातखंडा असतो. म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलावले जाते. आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर काहिंना आता गप्प बसायचं काय घेशील? असेही प्रेमाने विचारतात.
बोलणाऱ्याचा अभ्यास किती? यावरून देखील लोक बोलणाऱ्याची किंमत करत असतात. काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐक, असे सांगतात. तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असेही बोलून दाखवतात. काही बोलणे कानावर येते, तर काही आपण मनावर घेतो.
काहिंच्या बोलण्या बद्दल लिहिले जाते, तर काहिंच्या लिहिण्याबद्दल बोलले जाते. बोलण्याने माणसे जवळ येतात, तशीच लांब देखील जातात. प्रेम आणि कटुता, आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो.
राग, द्वेश, अहंकार, प्रेम, गर्व, अभिमान, कौतुक, भावना या गोष्टी वागण्या बरोबरच बोलण्यातून जाणवतात. बोलण्यात स्वाभिमान असतो, तसेच बोलण्यात नम्रता, ताठरपणा देखील असते. बोलतांना नकळत माणसाचे अंतरंग जाणवतात.
बोबडे बोलण्याच्या कौतुकापासून, आजकाल वयोमानाने त्यांचे बोलणे नीट समजत नाही या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पध्दतीने बोलत असतो. काही बोलून मोकळे होतात, तर काही मोकळेपणाने बोलत असतात. बऱ्याचदा कुणी आपल्याशी बोलावं किंवा आपल्या बद्दल (चांगले) बोलावं अशी इच्छा असते.
बोलण्यात ताकद आहे, “बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते.” असे म्हणतात. त्याच बरोबर “बोले तैसा चाले…” असेही म्हणतात. “लेकी बोले सुने…”, किंवा “बोलायची कढी…” हे देखील सर्वश्रुत आहे. “तिळगुळ घ्या… गोड बोला… ” असे सांगत आम्ही सण देखील साजरे करतो.
बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी समजतात. तर बऱ्याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात.
काही (राजकारणी) नुसतेच बोलत असतात. तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोधत असतात.
काही मोजके, मुद्याचे, नेमके, आणि वेळेवर बोलतात. तर काहींना मुद्यावर या, नमनाला घडाभर तेल कशाला? असे सांगावे लागते.
काही वेळा घरातील अबोला देखील बरेच काही बोलून जातो. नुसत्या डोळ्यांच्या हालचालीने देखील काय बोलायचे आहे याचा अंदाज येतो.
पण बोलणे हे होते आणि लागतेच. काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात. तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात.
मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. तर लहान तोंडी मोठा घास हे देखील बोलण्याबाबतच असते.
असो, लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो. मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात. तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात.
☆ ।।गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
लग्नानंतर अगदी दोनच महिन्यात दिवस गेले म्हणून सगुणाबाई अगदी नाराज झाली. तिला फार हौस, नटण्या मुरडण्याची, नवऱ्याबरोबर सिनेमाला जायची, जत्रेला जाऊन पाळण्यात बसायची ! हे सगळं आता दिवस गेल्यावर बंद पडणार, म्हणून तिला वाईटच वाटलं. सासू म्हणाली, ‘ का ग उगीच तोंड पाडून बसलीस? होतंय तर होऊ दे की लगेचच. शेजारची रखमी मूल मूल करतीय आणि तुला नको म्हणायचा माज आलाय व्हय.’
सगुणी काहीच बोलली नाही. मुकाट्यानं गेली परसात, कच्ची पपई खाल्ली, म्हणाली, ‘ जाईल पडून गर्भ. अजून तर दोन महिने पण नाही झाले.’ मग दुसऱ्या दिवशी चार अंडी खाल्ली. कोण जे सांगत होतं ते करत होती सगुणा. पण तो चिवट गर्भ काही पडेना. दिसामाशी तो वाढू लागलाच. नवराही शेवटी तिला रागावला, म्हणाला, ” काय ग चाललंय तुझं? दिलंय देवानं तर घे की मुकाट ! होतंय लवकर मान्य आहे पण तुला कुठं मोठं नोकरीला जायचंय ग? ”
सगुणा काही बोलायची नाही, पण मनोमन तिरस्कारच केला तिनं त्या गर्भाचा ! दिवस पुढे पुढे गेले,आणि त्या पोटातल्या बाळाने तिला खरोखर काहीच त्रास नाही दिला. योग्य वेळी सगुणा प्रसूत झाली. दवाखान्यात नर्सने डॉक्टरला बोलावून आणले. ‘ सर, तुम्हीच लवकर या. मला तर काही समजत नाहीये. ” डॉक्टर हा जगावेगळा निरोप ऐकून, तसेच रात्री दवाखान्यात आले. नर्स कोपऱ्यात उभी होती. ” सर,बाळ बघा ना ! “
डॉक्टरांनी बाळ उघडे करून बघितले. त्या दुर्दैवी बाळाची दोन्ही लिंगे अविकसित होती. मुलगा, का मुलगी, हे त्यांनाही नीट ठरवता येईना. त्यांना अतिशय वाईटच वाटले. सगुणासारखी विचारत होती,
” डॉक्टर, काय झालं मला? मुलगी असली तरी मला चालेल. नीट आहे ना माझं बाळ? “ डॉक्टराना तिला काय सांगावे हेच समजेना. होहो, छान आहे हं बाळ तुमचं, मग तुमचं आवरलं की देतो हं जवळ. ‘
मुलांचे डॉक्टरही आले. त्यांनीही बाळ बघितलं. त्यांनी सगुणाच्या नवऱ्याला बोलावलं, खरी परिस्थिती सांगितली आणि म्हणाले,’ तुम्ही दोघे अजून तरुण आहात, तुम्हाला आणखीही अव्यंग संतती होईल. हे मूल तुम्ही कसं सांभाळणार? माझा सल्ला असा की, काही संस्था अशी मुले फार चांगली सांभाळतात. त्यांना शिक्षण देतात. तिथे याची व्यवस्था होईल. विचार करा. तुमचे आणि त्यातही त्याचे आयुष्य त्याला घरी ठेवून वाया नका घालवू.”
सगुणा आणि तिचा नवरा म्हणाले, “ हे मूल असं झालं यात त्याचा काय दोष ? माझ्या बायकोला नकोच होता तो ! ती विषारी औषधे खाऊन तर नाही ना झालं असं?” डॉक्टर म्हणाले “ तसं काही नसतं. तुमच्या आणि त्याच्या नशिबात हे होतं. बघा,कसं काय करणार ?अवघड आहे हे. “
सगुणा खूप खूप रडली, स्वतःला दोष दिले, तिला खूप अपराधी वाटायला लागले. मूल आपलं दिवसामाशी मोठं होत होतं. लहानपणी काही लक्षात येत नव्हतं पण मोठा झाल्यावर काय? सगुणा आणि नवऱ्याला या प्रश्नाने रात्रंदिवस झोप यायची नाही.
नंतर सगुणाला पुन्हा दिवस गेले. यावेळी,ती शहाणी झाली. तालुक्याला जाऊन, सगळी नीट तपासणी करून आली. मूल छान निर्व्यंग आहे, कोणताही दोष नाही, हे डॉक्टरांनी सांगितले.सगुणाला याही वेळेस मुलगाच झाला. पण किती नॉर्मल खणखणीत मुलगा .. त्या दोघांचे डोळे आनंदाने भरून आले. नवीन बाळ बघायला, लहानगा श्यामही दवाखान्यात आला. आपला छोटा भाऊ बघून खूप आनंद झाला त्याला. याचे मात्र छान बारसे करून, राम नाव ठेवले, त्यांनी।
श्यामला शाळेत घातले. शाळेत आवडायचे श्यामला. मन लावून अभ्यास करायचा श्याम आणि पासही व्हायचा. जसजसा मोठा व्हायला लागला,तसतसा थोडा बायकी दिसायला लागलाच श्याम. पण तेही खूप लक्षात येण्यासारखा नाही. त्याला बायकी कपडे आवडत नसत., पण तरीही त्याच्यातले वेगळेपण लपत नसेच.
रामची वाढ नैसर्गिकरीत्या अगदी उत्तम होत होती. खेळात, मैदानावर अगदी उठून दिसायचा राम. श्याम स्वभावाने इतका चांगला होता, की त्याला कधी रामचा हेवा वाटला नाही की द्वेष.
श्याम घरी आईला मदत करायचा.त्याला स्वयंपाक करायला फार आवडायचा.चवही फार छान होती त्याच्या हाताला. सगुणाला अतिशय वाईट वाटे या मुलाचे. आपल्या मुळेच हे वैगुण्य आले या मुलात, असं म्हणत बसे ती. निदान या छोट्या खेडेगावात, श्यामची चेष्टा तरी करत नसत मुलं. त्याचा गोड स्वभाव आवडायचा मुलांना.
श्याम मनाने खंबीर होता. त्याला आपल्यातले वैगुण्य चांगलेच माहीत होते. मोठा होऊ लागला, तसतसे हे वाढत जाणार होते. हॉर्मोनल बदल तर होणार होतेच. श्याम शक्यतो आरशासमोर उभा राहून,आपण बायकी हावभाव करत नाही, तसे चालत नाही हे बघत असे. थोडेसे आपोआप तसे होत असेच. पण ते अगदी प्रकर्षाने लक्षात येण्यासारखे नव्हते.
सगुणाने शामला स्वयंपाक शिकवला. ती स्वतः फार सुगरण होती. गावात तिला खूपदा बायका कार्य असले की मदतीला बोलवायच्या. तिला पैसेही द्यायच्या. श्याम तिच्या हाताखाली तयार होऊ लागला. Ssc झाल्यावर श्याम म्हणाला, “ आई,मी पुण्याला जातो. तिकडेच बारावी करतो आणि मी कॅटरिंगचा डिप्लोमा घेतो.”
सगुणा ला अतिशय वाईट वाटले. पुण्यासारख्या महासागरात या आपल्या असे वैगुण्य असलेल्या मुलाचा निभाव कसा लागणार? सगुणाने मनाशी निश्चय केला,आपण त्याच्याबरोबर पुण्यात राहायचे. राम आणि त्याचे वडील राहतील इथेच .
सगुणाने गरीब वस्तीत भाड्याने खोली घेतली. ती लगेचच धुणीभांडी करू लागली. पुण्यासारख्या ठिकाणी तिला कामांना काय तोटा. हिला स्वयपाकाचीही चार कामे मिळाली. श्यामला केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. श्यामने पहिल्याच दिवशी वर्गात मुलांना सांगितले, “दोस्तहो! मी खूप ग्रामीण भागातून आलेला गरीब मुलगा आहे. मी तुमच्यातला नाहीये. मला समजून घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल, मी देवाने अन्याय केलेल्या त्या एक टक्क्यांपैकी आहे. यात माझा काय दोष? मलाही तुमच्यासारखे शिकू द्या. इतर किन्नर लोकांसारखी मला सिग्नलला भीक नाही मागायची. कोणीतरी होऊन दाखवायचंय मला. शाळेत मुलं करायची रे चेष्टा, ‘ फलक्या, गणपत पाटील,’ पण मी लक्ष नव्हतो देत. मला सहकार्य कराल ना? एखाद्याला जन्मतः डोळे नसतात, कोणी मुके असतात, तसा मीही एक दुर्दैवी आहे.” बोलतांबोलता श्यामच्या डोळ्यात पाणी आले. क्लासमधील मुलं अतिशय गंभीर होऊन हे ऐकत होती. हा साधा,पायजमा,शर्ट घातलेला मुलगा,आपण होऊन हे न लाजता सांगतोय, याने त्यानाही गलबलून आले.
तो खूप बायकी नव्हता. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे, हे लक्षात आल्याशिवाय कसे राहील? वर्गातला भोसले उठून उभा राहिला. मैदान गाजवलेला, खेळाडू होता भोसले.
“ शाबास रे श्याम. देतो आम्ही तुझ्या धीटपणाला आणि जिद्दीला. आम्ही सगळे तुझे मित्र आजपासून.काय ग पोरीनो,काय म्हणणे आहे तुमचे? ”
रेखा म्हणाली, “ भोसले, फार गोड आहे श्याम ! तुम्हीच त्याची पहिल्या दिवशी टिंगल केलीत, पण आम्ही कधीच करणार नाही, केलीही नाही. श्याम, हे जाहीर सांगायचे धैर्य तुझ्यात आहे, हे केवढे मोठे आहे रे. खूप पुढे जाशील तू. आजपासून तू आमचा दोस्त.”
शामला मनातून आनंद झाला. त्यांचा कोर्स सुरू झाला. पाठीमागे चर्चा होत असणार, हा मुलगा कोण, कसा.. पण श्यामने लक्ष द्यायचे नाही असंच ठरवलं होतं.
कमी त्रास नव्हता होत त्याला. वस्तीतही असा मुलगा आलाय,अशी बातमी पसरलीच. किन्नरांची टोळी टाळ्या वाजवत त्याला भेटायला आली. “ ए पोरा,कसलं करतो रे कालेज. ही दुनिया लै बेकार.. तुला काय जगू देणार व्हय. तू आमच्यातलाआहेस,आमच्यातच ये .बघ. ही रानी महिन्याला धा हजार कमावती. ही शबनम पन्द्रा. तू काय करतोस इथं? “
श्यामने त्यांच्या पुढारी बाई लक्ष्मीला नमस्कार केला.
“ मावशी, तुमचं खरं आहे. पण मला साडी नाही नेसावीशी वाटत. मला कोणत्याही अनैसर्गिक भावना नाहीत. मला समजून घ्या मावशी ! काही गरज लागली, तर मी तुमच्याशिवाय कुठं जाणार? मी तुमच्यातलाच एक आहे, पण बाई म्हणून नाही जगणार! “
☆ अण्णा उर्फ अरविन्द गजेंद्रगडकर – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆
आकाशवाणी, पुणे हा मोठमोठ्या कलाकारांनी बहरलेला, लगडलेला एक कल्पवृक्षच होता. बा.भ.बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव अशा अनेक मंडळींनी इथे काम केले. हेही त्यापैकीच. निर्माता या पदावर काम करणारे हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर एक उत्कृष्ट कलावंत-वादक-लेखक-संवादक अशा बहुगुणांनी नटलेले एक व्यक्तिमत्व होते . आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करताना अनेक दिग्गज संगीतकार आणि वादक त्यांच्या सहवासात आले. ते केवळ सरकारी बाबू नव्हते तर संगीताचे साधक आणि जाणकारही. त्यामुळे हरिप्रसाद चौरसिया असोत किंवा बेगम अख्तर, ही मंडळी यांच्या गुणग्राहकतेवर आणि संगीत साधनेवर खूश असायची. हरिप्रसाद यांना खूप मानायचे. धारवाड, नागपूर येथील आकाशवाणी केंद्रांवरची त्यांची कारकीर्दही गाजली.
ते गोष्टी वेल्हाळ होते. गोष्ट कशी सांगायची हे त्यांच्याकडून शिकावं. हा अनोखा गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक लोभस पैलू होता. हाडाचे शिक्षक होते ते. सायन्स पदवीधर. शिक्षण शास्त्राचाही रीतसर अभ्यास केलेले. माझे एक गृहितक आहे ते म्हणजे विज्ञान शाखेतील कोणत्याही विषयाचा अगदी साधा पदवीधर जरी असला तरी तो / ती वैचारिक दृष्ट्या एक विशिष्ट पातळी कधी सोडत नाहीत. वस्तुनिष्ठता हा गुण आणि no nonsense हा Approach त्यांचा वागणूकीचा भाग बनून जातो. अण्णाही त्या पठडीतले. संगीताचा गाढा अभ्यास ,व्यासंग इतका की केवळ संगीत साधना आणि वादन कौशल्य एवढ्यावर ते थांबले नाहीत. या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली.
पन्नालाल घोषांची शागिर्दी केलेल्या अण्णांची बासरी वादनावर तर हुकमत होतीच. पण स्वरमंडळ सारखे फारसे प्रचलित नसलेले वाद्य त्यांनी आपल्या अदाकारीने झंकारत ठेवले. संगीतावर व्याख्याने दिली. संगीत परीक्षा सुलभ व्हाव्यात म्हणून मार्गदर्शनपर पुस्तकेही लिहिली. वेगवेगळ्या पट्टीत गाणाऱ्यांसाठी त्यांनी तानपुरा वादनाच्या ध्वनीफिती बनवल्या. वर्तमानपत्रात लेख लिहिले. संगीतातल्या सर्वच क्षेत्रात अधिकार असलेले ते एक दुर्मीळ व्यक्तिमत्व होते.
अण्णांची (अरविंद गजेंद्रगडकर ) माझी ओळख त्यांचा मुलगा निखील याच्यामुळे झाली. तो माझ्या वर्गात होता; पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या. पण खरं सांगू का, त्यांचे माझे सूर अधिक जमले आणि खूप लवकरही. मी मुंबई दूरदर्शनला असताना ते आमच्याकडे कार्यक्रम करायला येत असत. कधी वादनासाठी तर कधी मुलाखती घ्यायलाही. माझ्या माहिमच्या मठीवरही ते अनेक वेळा येऊन गेले. दादा म्हणजे जी.एन.जोशी यांच्याकडे मी पेइंग गेस्ट म्हणून राहात होतो. अण्णांना तर त्यांच्याबद्दल विशेष आदर. मला वाटते दादाना भेटण्याच्या ओढीने ते माझ्याकडे येत असावेत. कारण काहीही असो. ते प्रेमाने येत. त्यांनी मला संगीत विश्वातील सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, पण प्रत्यक्ष घडलेल्या अनेक कथा सांगितल्या.
मुंबईत त्यांचे वास्तव्य बोरीवली इथे होते. पण संचार मात्र शहरभर असायचा. कुठे चांगले ध्वनिमुद्रण असले, एखादा दुर्मीळ गाण्याचा कार्यक्रम असला की यांची उपस्थिती ठरलेली. मला एक दोनदा त्यांनी चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही नेले होते . ‘माझा लवतोय डावा डोळा’.. शांताबाई यांच्या महानंदा चित्रपटातील लताबाई यांचे गाणे ध्वनिमुद्रित होताना मी यांच्याच सहवासात अनुभवले आहे .
स्वतःवर ज्याला विनोद करता येतो किंवा स्वतःची फजिती ज्याला ग्रेसफुली सांगता येते तो माणूस निर्मळ मनाचा असतो. अण्णा असे अनेक किस्से सांगत. त्यातील हा एक अफलातून किस्सा — ते अनेक दिवाळी अंकांसाठी लिहित असत. पण मानधनाची मात्र वाट पाहावी लागे. अशाच एका अंकाचे मानधन आले नाही म्हणून ते त्यांच्या कार्यालायात सदाशिव पेठेत गेले. थोड्या इतर गप्पा मारुन त्यांनी मानधनाचा विषय काढला. संपादकाने नेहमीप्रमाणे रडगाणे गायले . शेवटी हे म्हणाले मग असे करा मला पाच अंक द्या. मानधन नको. त्यावर संपादक म्हणाले ते परवडणार नाही, त्यापेक्षा मानधन देतो. यावरुन मानधनाचा आकडा किती अशक्त होता हे कळले आणि आमची हसून हसून पुरेवाट झाली .
१९८०च्या दशकात मुंबईत नुकतीच हॉटेलमध्ये लाईव्ह संगीत कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. गायक, संगीतकार यांना हॉटेलमध्ये सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करत. ३,४ तास गायन ,वादन यांच्या मैफिलींचा आनंद लुटत. ग्राहक खानपान सेवेचाही आस्वाद घेत असत. कलाकारांनाही उत्तम मानधन मिळे. वरळी व्हिलेज या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना करारावर आमंत्रित केले होते . या मंडळीना एक पाहुणा आणायला परवानगी होती. तो भाग्यवंत मीही एक दोनदा ठरलो . अण्णांची बासरी ऐकत , नयनरम्य माहोल असलेल्या त्या गार्डनमधल्या ओल्या संध्याकाळी कशा काय विसरता येतील ?
मी पुण्यात आल्यावर तर ते आमचे हक्काचे आर्टीस्ट झाले. माझ्या अनेक जाहिरातींच्या जिंगल्सचे संगीत त्यांनी दिले. युनायटेड बँक, केप्र मसाले ,शतायुषी मासिक, एवढेच नव्हे तर माझ्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘न्याय’ या फिल्मलाही त्यांचाच संगीतसाज लाभला होता.
‘सृष्टी’ या प्रशांत कोठडियाच्या संस्थेचे ते नियमित कलाकार होते. तिथल्या अनेक मैफिली त्यांनी आपल्या शब्द सुरांनी उजागर केल्या. अनेक बड्या कलाकारांशी त्यांचा घरोबा असल्यामुळे आणि त्यांच्या कलांचे नेमके मर्म ठाऊक असल्यामुळे त्यांचे लेखन अतिशय मनोवेधक होत असे. कुमार गंधर्व आणि बेगम अख्तर यांच्यावरील त्यांचे लेख म्हणजे व्यक्तीचे आस्वादक आणि सखोल मूल्यमापन कसे करावे याचे उत्तम नमुने आहेत.
’अंतर्नाद’ हे मासिक अल्पावधीत गाजले. त्या लोकप्रियतेत यांचाही मोठा वाटा होता. आपली पंचाहत्तरी त्यांनी अनोख्या रीतीने साजरी केली होती. दोन दिवसांच्या कार्यक्रमात बासरीवर त्यांनी ७७ राग वाजवून आपल्या आयुष्यात बासरीच्या सुरांचे असलेले महत्व अधोरेखित केले होते. एक अतिशय रसिक ,चाणाक्ष , चांगल्या अर्थाने चोख व्यावसाईक, गुणग्राहक आणि जिंदादिल व्यक्तिमत्व असलेले अरविंद गजेन्द्रगडकर हे माझ्या स्मरणकुपीत ऐशआरामात कायमचे विराजमान झालेले आहेत.
(जन्म ११ जानेवारी ,१९२८) त्यांच्या जयंती निमित्त विनम्रतापूर्वक आदरांजली !
एका रविवारी सकाळी, एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता, तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले. मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली होती.
त्या माणसाने तासाभराहून अधिक काळ ते पाहिलं. त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला विराम घेतल. वळसा घेतला.
आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली.
एका क्षणी या चिमुकल्या जीवालाअवघड जागग आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती.ती थोडावेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले, पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला.
मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला. त्या घटनेने माणूस घाबरून गेला आणि त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले.
त्याच्या डोळ्यांसमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता.
थोड्या वेळाने मनुष्याने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला आहे – जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमीगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते.
आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली —- ते मोठे पान मुंगी लहान छिद्रात कसे वाहून नेईल?
— ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही !
तो छोटा प्राणी मुंगी — खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून, वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून, आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली.
मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते.
त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे.
आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे.
— फक्त सोडून देण्याची चिंता नाही.
आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत. आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही….
कथा पुढे चालू ठेवत आहे…तुम्हाला याचा आनंद मिळेल…
तो श्रीमंत माणूस जरा अधीर झाला. अजून थोडा वेळ थांबला असता तर त्याने काहीतरी वेगळं पाहिलं असतं…
मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली. आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले.
बोध:
१. हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाहीत !
२. एक संघ म्हणून एकत्र, अशक्य काहीही नाही.
३. कमावलेली वस्तू तुमच्या भावांसोबत शेअर करा.
४. (सर्वात महत्त्वाचे!) तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्यानंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल. तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा.
— मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासूनही आपण किती शिकू शकतो.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ क्लिक ट्रिक – अर्चना देशपांडे जोशी ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆
लेखिका : अर्चना देशपांडे जोशी.
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : १२६
किंमत : रु. १७५/-
सध्याच्या मोबाईलच्या जगात सर्वच जण फोटो काढत असतात आणि लाईक मिळवत असतात. “फोटो काढणे” हा एक खेळ झाला आहे. अशावेळी मनात शंका येते, “फोटोग्राफी” ही कला म्हणून आता अस्तित्वात आहे का? याचे उत्तर आपल्याला अर्चना देशपांडे जोशी यांच्या ‘क्लिक ट्रिक’ या पुस्तकात मिळते. खरी फोटोग्राफी, मोबाईल फोटोग्राफी आणि आपले आयुष्य यांचा मेळ घालत, बत्तीस ललित लेखांची मालिका असलेले हे पुस्तक. ‘छायाचित्र कलेवरच सोप्पं भाष्य’ असे सांगत प्रस्तावनेलाच सुधीर गाडगीळसरांनी पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. तर विनायक पुराणिक सरांनी या पुस्तकाचे योग्य शब्दात वर्णन केले आहे. फोटो काढण्याची एक वेगळी नजर या पुस्तकातून मिळते, असे ते सांगतात. तर यापुढे जाऊन मला वाटते, फक्त फोटोच नाही, तर जीवनातील विविध प्रसंगाना वेगळ्या नजरेने बघण्याची दृष्टी यातून मिळते. ‘मनाला मुग्ध करणाऱ्या फोटोंचे मंत्र’ सांगतानाच लेखिकेने ‘आपल्या लक्षात न येणारे सध्याच्या मोबाईल फोटोग्राफीचे तोटे’ यावरही खरपूस भाष्य केले आहे.
हल्ली क्लिक करणे खूप सोप्पे झाले आहे. हवे तेवढे, हवे तसे दशसहस्र क्लिक सारेच सतत करत असतात. पण त्यातील उत्तम क्लिक कोणता झाला? या एका क्लिकचे महत्व आणि तो कसा घ्यायचा, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे .. प्रत्येक लेखातून याचा परिचय होत जातो.
सावली, प्रतिछाया, आपली प्रतिमा. एकच शब्द. अनेक वळणे घेत आपल्या समोर येतो. ‘आधीच उल्हास’ या लेखात फोटोच्या विषयाएवढेच, त्याच्या सीमारेखेचे महत्व सांगितले आहे. फोटोत जिवंतपणा आणण्यासाठी गरज असते थोडा विचार करण्याची आणि शोधक नजरेची. फोटो कंपोझीशनप्रमाणेच त्याच्या बॅकग्राऊंडचा देखील विचार केला पाहिजे. ट्रॅंगल कंपोझिशनची युक्ती स्टील लाईफ फोटोग्राफीप्रमाणे फूड फोटोग्राफीत देखील वापरली जाते. ‘झाले मोकळे आकाश’ या लेखातून वाईल्ड आणि टेली लेन्स मधला फरक सांगताना, लेखिका चिवड्याचे गंमतीशीर उदाहरण देते. कॅमेरा हा कॅनव्हास आणि लेन्स हा ब्रश आहे, हे जर लक्षात आले तर आपले आपणच कलात्मक, सुबक देखणे फोटो काढू शकतो. फोटो एकतर चांगला असतो किंवा नसतो. हल्ली बऱ्यापैकी फोटो सगळेच काढत असतात. फोटो तिथे आधीपासून असतो. तो काढण्यासाठी नजरेबरोबर आपल्या बुध्दीला श्रम घ्यावे लागतात. म्हणजे नेमका फोटो काढल्याचा आनंद आपल्याला मिळतो, असे ‘तो तिथे आहे’ यामधून समजते. ‘जाड्या-रड्या’ तून फोटोग्राफीमधील वेट बॅलन्स म्हणजे काय? हे लेखिकेने नमूद केले आहे. निसर्गात चौकट जागोजागी असते. त्याचा योग्य उपयोग फोटोची चौकट ठरवताना केला पाहिजे. ‘प्रत्येक फोटो काढताना आधी विचार करावा लागतो. हल्ली फोटो काढून झाल्यावर विचार करत बसतात.’ ‘आखीव रेखीव’ मधील लेखिकेचे हे वाक्य आपल्याला विचार करायला लावते. नियम बनवावे लागतात कारण कोणीतरी नियमबाह्य वर्तन केलेले असते म्हणून. ब्रेकींग रूल्स फक्त कुठे आणि किती करायचे असतात, हे सत्य फक्त फोटोग्राफीत नाही तर जीवनात देखील शिकणे आवश्यक आहे. याची जाणीव ‘नियमातील अनियम’ यातून होते. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथला गृहपाठ करणे जरुरीचे आहे. आपल्याला ट्रिपला जायचे असेल तर हे जितके आवश्यक, तितकेच फोटोप्रवासासाठी कोणती सावधगिरी बाळगायाची हे लक्षात घेतले पाहिजे. पावसाळयात फोटोग्राफी करताना कोणती काळजी घ्यायची, याबद्दल लेखिकेने टिप्स दिल्या आहेत. स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे घटनेपलिकडे बघण्याची दृष्टि. ॲग्रीकल्चरल, आर्किटेक्चर आणि इंटीरीयर, मॉडेल, कल्चरल फोटोग्राफी आणि टुरिझम, ऐतिहासिक वास्तू, शिल्प व जंगल असे फोटोग्राफीतील विविध प्रकार आहेत. फोटोक्राफ्ट व कॅन्डीड फोटोग्राफी वाचून आपल्याला आश्चर्य वाटते.
फोटो येण्यासाठी प्रकाशयोजना, कंपोझीशन, ॲंगल, लेन्स, उत्तम गृहपाठ, आपली बुध्दी, विचार, कल्पनाशक्ती आणि नशीबाची साथ लागते. तरीही सर्वोत्तम फोटोसाठी उत्तम कॅमेरा हाच फोटोग्राफरचा उजवा हात असतो, असे लेखिका नमूद करते.
काळ नेहमी पुढे धावत असतो, पण फोटोग्राफीच्या कलेमध्ये काळाला पकडून ठेवायची कला आहे. कलेने ‘आपल्याला श्रीमंत व्हायचे आहे की समृध्द’ असा विचार आपल्याला करायला लावत, लेखिका समेवर येते. प्रत्येक कलेचा मान राखायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे.
मोबईलला ठेवलेले फोटोबाईल हे नाव, योग्यच वाटते. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात कलेतील सौंदर्य लोप पावत आहे, याची खंत लेखिकेला आहे. यासाठी तिने कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंसाठी ‘फोटोफ्राय’ स्पर्धा सुरू केलेली आहे.
एखाद्या विस्तृत कुरणावर ससा मनसोक्त बागडत असतो तशी लेखिका आपल्या लेखात सर्वत्र पळताना दिसते. प्रत्येक लेखात एकेका शब्दांचे अर्थ लिहिताना अनेक अर्थ सहजपणे उलगडले आहेत. आणि त्यातून लेखिका अगदी नकळतपणे आयुष्यातील सत्य सांगून जाते. म्हणूनच फक्त फोटोग्राफी शिकणाऱ्या लोकांनी नव्हे तर आपण सर्व जण हे पुस्तक वाचू शकतो.
फोटोग्राफी इतकाच लेखिकेचा मराठी कविता, चित्रकला याविषयांवर भरपूर अभ्यास झालेला दिसतो.
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख अनुकरणीय सीख। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 170 ☆
☆ अनुकरणीय सीख ☆
‘तुम्हारी ज़िंदगी में होने वाली हर चीज़ के लिए ज़िम्मेदार तुम ख़ुद हो। इस बात को जितनी जल्दी मान लोगे, ज़िंदगी उतनी बेहतर हो जाएगी’ अब्दुल कलाम जी की यह सीख अनुकरणीय है। आप अपने कर्मों के लिए स्वयं उत्तरदायी हैं, क्योंकि जैसे कर्म आप करते हैं, वैसा ही फल आपको प्राप्त होता है। सो! आपके कर्मों के लिए दोषी कोई अन्य कैसे हो सकता है? वैसे दोषारोपण करना मानव का स्वभाव होता है, क्योंकि दूसरों पर कीचड़ उछालना अत्यंत सरल होता है। दुर्भाग्य से हम यह भूल जाते हैं कि कीचड़ में पत्थर फेंकने से उसके छींटे हमारे दामन को भी अवश्य मलिन कर देते हैं और जितनी जल्दी हम इस तथ्य को स्वीकार कर लेते हैं; ज़िंदगी उतनी बेहतर हो जाती है। वास्तव में मानव ग़लतियों का पुतला है, परंतु वह दूसरों पर आरोप लगा कर सुक़ून पाना चाहता है, जो असंभव है।
‘विचारों को पढ़कर बदलाव नहीं आता; विचारों पर चलकर आता है।’ कोरा ज्ञान हमें जीने की राह नहीं दिखाता, बल्कि हमारी दशा ‘अधजल गगरी छलकत जाय’ व ‘थोथा चना, बाजे घना’ जैसी हो जाती है। जब तक हमारे अंतर्मन में चिन्तन-मनन की प्रवृत्ति जाग्रत नहीं होती; भटकाव निश्चित् है। इसलिए हमें कोई भी निर्णय लेने से पूर्व उसके सभी पक्षों पर दृष्टिपात करना आवश्यक है। यदि हम तुरंत निर्णय दे देते हैं, तो उलझनें व समस्याएं बढ़ जाती हैं। इसलिए कहा गया है ‘पहले तोलो, फिर बोलो’ क्योंकि जिह्वा से निकले शब्द व कमान से निकला तीर कभी लौटकर नहीं आता। द्रौपदी का एक वाक्य ‘अंधे की औलाद अंधी’ महाभारत के युद्ध का कारण बना। वैसे शब्द व वाक्य जीवन की दिशा बदलने का कारण भी बनते हैं। तुलसीदास व कालिदास के जीवन में बदलाव उनकी पत्नी के एक वाक्य के कारण आया। ऐसे अनगिनत उदाहरण विश्व में उपलब्ध हैं। सो! मात्र अध्ययन करने से हमारे विचारों में बदलाव नहीं आता, बल्कि उन्हें अपने जीवन में धारण करने पर उसकी दशा व दिशा बदल जाती है। इसलिए जीवन में जो भी अच्छा मिले, उसे अपना लें।
अनुमान ग़लत हो सकता है, अनुभव नहीं। यदि जीवन को क़ामयाब बनाना है, तो याद रखें – ‘पांव भले ही फिसल जाए, ज़ुबान को कभी ना फिसलने दें।’ अनुभव जीवन की सीख है और अनुमान मन की कल्पना। मन बहुत चंचल होता है। पल-भर में ख़्वाबों के महल सजा लेता है और अपनी इच्छानुसार मिटा डालता है। वह हमें बड़े-बड़े स्वप्न दिखाता है और हम उनके पीछे चल पड़ते हैं। वास्तव में हमें अनुभव से काम लेना चाहिए; भले ही वे दूसरों के ही क्यों न हों? वैसे बुद्धिमान लोग दूसरों के अनुभव से सीख लेते हैं और सामान्य लोग अपने अनुभव से ज्ञान प्राप्त करते हैं। परंतु मूर्ख लोग अपना घर जलाकर तमाशा देखते हैं। हमारे ग्रंथ व संत दोनों हमें जीवन को उन्नत करने की सीख देते और ग़लत राहों का अनुसरण करने से बचाते हैं। विवेकी पुरुष उन द्वारा दर्शाए मार्ग पर चलकर अपना भाग्य बना लेते हैं, परंतु अन्य उनकी निंदा कर पाप के भागी बनते हैं। वैसे भी मानव अपने अनुभव से ही सीखता है। कबीरदास जी ने भी कानों-सुनी बात पर कभी विश्वास नहीं किया। वे आंखिन देखी पर विश्वास करते थे, क्योंकि हर चमकती वस्तु सोना नहीं होती और उसका पता हमें उसे परखने पर ही लगता है। हीरे की परख जौहरी को होती है। उसका मूल्य भी वही समझता है। चंदन का महत्व भी वही जानता है, जिसे उसकी पहचान होती है, अन्यथा उसे लकड़ी समझ जला दिया जाता है।
यदि नीयत साफ व मक़सद सही हो, तो यक़ीनन किसी न किसी रूप में ईश्वर आपकी सहायता अवश्य करते हैं, जिसके फलस्वरूप आपकी चिंताओं का अंत हो जाता है। इसलिए कहा जाता है कि परमात्मा में विश्वास रखते हुए सत्कर्म करते जाओ; आपका कभी भी बुरा नहीं होगा। यदि हमारी नीयत साफ है अर्थात् हम में दोग़लापन नहीं है; किसी के प्रति ईर्ष्या-द्वेष व स्व-पर का भाव नहीं है, तो वह हर विषम परिस्थिति में आपकी सहायता करता है। हमारा लक्ष्य सही होना चाहिए और हमें ग़लत ढंग से उसे प्राप्त करने की चेष्टा नहीं करनी चाहिए। यदि हमारी सोच नकारात्मक होगी, तो हम कभी भी अपनी मंज़िल पर नहीं पहुंच पाएंगे; अधर में लटके रह जाएंगे। इसके साथ एक अन्य बात की ओर भी मैं आपका ध्यान दिलाना चाहूंगी कि हमारे पाँव सदैव ज़मीन पर टिके रहने चाहिए। उस स्थिति में हमारे अंतर्मन में अहं का भाव जाग्रत नहीं होगा, जो हमें सत्य की राह पर चलने को प्रेरित करेगा और भटकन की स्थिति से हमारी रक्षा करेगा। इसके विपरीत अहं अथवा सर्वश्रेष्ठता का भाव हमें वस्तुस्थिति व व्यक्ति का सही आकलन नहीं करने देता, बल्कि हम दूसरों को स्वयं से हेय समझने लगते हैं। अहं दौलत का भी भी हो सकता है; पद-प्रतिष्ठा व ओहदे का भी हो सकता है। दोनों स्थितियाँ घातक होती हैं। वे मानव को सामान्य व कर्त्तव्यनिष्ठ नहीं रहने देती। हम दूसरों पर आधिपत्य स्थापित कर अपने स्वार्थों की पूर्ति करना चाहते हैं।यह अकाट्य सत्य है कि ‘पैसा बिस्तर दे सकता है, नींद नहीं; भोजन दे सकता है, भूख नहीं: अच्छे कपड़े दे सकता है, सौंदर्य नहीं; ऐशो-आराम के साधन दे सकता है, सुक़ून नहीं। सो! दौलत पर कभी भी ग़ुरूर नहीं करना चाहिए।’
अहंकार व संस्कार में फ़र्क होता है। अहंकार दूसरों को झुकाकर खुश होता है; संस्कार स्वयं झुक कर खुश होता है। इसलिए बच्चों को सुसंस्कृत करने की सीख दी जाती है; जो परमात्मा में अटूट आस्था, विश्वास व निष्ठा रखने से आती है। तुलसीदास जी ने भी ‘तुलसी साथी विपद् के विद्या, विनय, विवेक’ का संदेश दिया है। जब भगवान हमें कठिनाई में छोड़ देते हैं, तो विश्वास रखें कि या तो वे तुम्हें गिरते हुए थाम लेंगे या तुम्हें उड़ना सिखा देंगे। प्रभु की लीला अपरंपार है, जिसे समझना अत्यंत कठिन है। परंतु इतना निश्चित है कि वह संसार में हमारा सबसे बड़ा हितैषी है। इंसान संसार में भाग्य लेकर आता है और कर्म लेकर जाता है। अक्सर लोग कहते हैं कि इंसान खाली हाथ आता है और खाली हाथ जाता है। परंतु वह अपने कृत-कर्म लेकर जाता है, जो भविष्य में उसके जीवन का मूलाधार बनते हैं। इसलिए रहीम जी कहते हैं कि ‘मन चंगा, तो कठौती में गंगा।’
सो! संसार में मन की शांति से बड़ी कोई संपत्ति नहीं है। महात्मा बुद्ध शांत मन की महिमा का गुणगान करते हैं। ‘दुनियादारी सिखा देती है मक्कारियां/ वरना पैदा तो हर इंसान साफ़ दिल से होता है।’ इसलिए मानव को ऐसे लोगों से सचेत व सावधान रहना चाहिए, जिनका ‘तन उजला और मन मैला’ होता है।’ ऐसे लोग कभी भी आपके मित्र व हितैषी नहीं हो सकते। वे किसी पल भी आपकी पीठ में छुरा घोंप सकते हैं। ‘भरोसा है तो चुप्पी भी समझ में आती है, वरना एक-एक शब्द के कई-कई अर्थ निकलते हैं।’ इसलिए छोटी-छोटी बातों को बड़ा न कीजिए; ज़िंदगी छोटी हो जाती है। ‘गुस्से के वक्त रुक जाना/ ग़लती के वक्त झुक जाना/ फिर पाना जीवन में/ सरलता और आनंद/ आनंद ही आनंद।’ हमारी सोच, विचार व कर्म ही हमारा भाग्य लिखते हैं। कुछ लोग किस्मत की तरह होते हैं, जो दुआ की तरह मिलते हैं और कुछ लोग दुआ की तरह होते हैं, जो किस्मत बदल देते हैं। ऐसे लोगों की कद्र करें; वे भाग्य से मिलते हैं। अंत में मैं कहना चाहूंगी कि मानव स्वयं अपने कर्मों के लिए उत्तरदायी है और उस तथ्य को स्वीकारना ही बुद्धिमानी है, महानता है। सो! अपनी सोच, व्यवहार व विचार सकारात्मक रखें; वे ही आपके भाग्य-निर्माता व भाग्य-विधाता हैं।
(डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी एक संवेदनशील एवं सुप्रसिद्ध साहित्यकार के अतिरिक्त वरिष्ठ चिकित्सक के रूप में समाज को अपनी सेवाओं दे रहे हैं। अब तक आपकी चार पुस्तकें (दो हिंदी तथा एक अंग्रेजी और एक बांग्ला भाषा में ) प्रकाशित हो चुकी हैं। आपकी रचनाओं का अंग्रेजी, उड़िया, मराठी और गुजराती भाषाओं में अनुवाद हो चुकाहै। आप‘कथाबिंब ‘ द्वारा ‘कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार (2013, 2017 और 2019) से पुरस्कृत हैं एवं महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा “हिंदी सेवी सम्मान “ से सम्मानित हैं।)
☆ कथा-कहानी ☆ अतीत की खिड़की से रुपहली धूप – भाग – 1 ♥ ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी ☆
आखिर मौका मिल ही गया। घर में और कोई नहीं था। दोपहर के भोजन के बाद सास ससुर अपनी भतीजी को एम0 ए0 पास करने की बधाई देने चाचाजी के घर गये हुए हैं। बच्चों को स्कूल से लौटने में अभी देर है। मौका देख कर दोनों बहुओं ने माताजी की ड्रेसिंग टेबुलवाली अल्मारी खोली। ननद चाँदनी भी मैके आयी हुई हैं। कहती रह गयी, ‘‘भाभी, यह ठीक नहीं कर रही हो -। छिः!’’
‘‘इसमें छिः करने का क्या है ?’’ बड़ी भौजाई पूर्णिमा मुस्कराने लगी।
‘‘अम्माजी की चिठ्ठिओं को तुम लोग पढ़ोगी?’’ चाँदनी असमंजस में है कि इस षडयंत्र में उसे भागीदार बनना चाहिए या नहीं!
छोटी अनामिका कुछ मुँहफट है, ‘‘देखें तो सही – उस जमाने की स्टाइल क्या थी। बाबूजी चिठ्ठी की शुरुआत में अम्माजी को कौन सा सम्बोधन करते थे! और चिठ्ठी के अंत में -’’
‘‘छिः! भाभी!’’चाँदनी लाल हो गई।
‘‘तू तो ऐसे शर्मा रही है, जैसे खाली गंगा नहाने से ही तू और तेरे भाई अम्माजी के पेट में आ गये थे -’’। छोटी के मुँह में कुछ नहीं अटकता।
‘‘जाओ। मैं कुछ नहीं जानती। मरे। दोनों जने मिलकर।’’ ननद भागी। मगर फिर दरवाजे से झाँक कर देखने लगी ……
आखिर अल्मारी के भीतर – माँ की दीवाली बनारसी जो एक एक परत से फटने लगी थी – उसके नीचे पीतल के पान के डब्बे के अंदर मिल गया वह गुप्तधन!
‘‘हाय रे दइया! देखें देखें!’’ छोटी ऐसे उछली कि अल्मारी के खुले हुए पल्ले से पैर पर चोट लग गयी -‘‘उफ्!’’
‘‘पाप का फल हाथों हाथ! शर्म नहीं आती सास ससुर की चिठ्ठी पढ़ते हुए ?’’ चाँदनी फिर भाभिओं के पास फर्श पर बैठ गयी।
दो रंगीन रेशमी रुमालों में लपेटे हुए चिठ्ठिओं की दो गड्डियाँ। एक जो हृदय नारायण ने अपनी पत्नी को लिखी थीं। दूसरी वें जिनमें मानिनी ने उनको अपने आवेगों से अभिसिक्त किया था। तो जासूसी शुरू हो गई। पहले – पति का प्रेमपत्र पत्नी के नाम ……
‘‘यह क्या? सिर्फ डैश -! कोई संबोधन नहीं?’’बड़ी ने पहली वाली गड्डी के नीचे से सबसे पहला खत निकाला।
‘‘न प्रिये, न डार्लिंग। कुछ नहीं?’’अनामिका झुककर देखने लगी।
‘‘उस जमाने में ऐसा ही होता रहा।’’ चाँदनी मानो खुश हो गई।
‘‘तुझे कैसे मालूम? तू क्या साठ साल की नवेली है?’’ बड़ी ने अपनी गोद में बंडिल को सँभालते हुए कहा,‘‘वैसे तेरे वाले तुझको कौन सा संबोधन करते हैं ?’’
‘‘धत्। मैं क्यों बताऊँ ? तुम ही पूछ लेना अपने नंदोई से -’’
‘‘पढ़ो न दीदी। क्या साइगल की फिल्म में तुम हिमेश रेशमिया की बात कर रही हो ?’’
‘‘होली के ठीक पहले तुम चली गयी। जरा रुक जाती तो क्या बिगड़ जाता? भैया (स्साला!) आये और लिवा गये। कुछ तो कह सकती थी। शादी के बाद पहली होली है! यहीं रहना चाहिए था। उस साले से शर्म लग रही थी तो अपनी भाभी से कहना चाहिए था।
‘‘खैर, अब यहाँ मेरी भाभी मुझे रोज ताना मार रही है,-‘बलम गयो कलकत्ता, अब केसे खेलूँ होरी ?’’
इसी तरह नव दंपति की अनर्गल बातें। कुछ दिल की, तो कुछ समस्यायें भी। फिराक साहब की दो एक पंक्तियाँ। और अन्त में –
‘‘जाते समय मैके के नाम पर तुम इतनी खुश थी कि मुझे गुस्सा आ रहा था। सोचा था कमरे से सूटकेश उठाने के पहले तुम्हे दोनों बाहों में भींच कर एक जोरदार – वो ले लूँ। मगर तुम तो माँ और भाभी को प्रणाम करने के लिए रसोई में जा खड़ी रही।’’
‘‘तो बाबूजी ने चिठ्ठी में कुछ दिया कि नहीं? ’’अनामिका झाँक कर पढ़ने गयी, तो पूर्णिमा के सिर से उसका सर टकरा गया,‘‘उई माँ !’’
‘‘अच्छा हुआ। जैसा पाप वैसा ताप!’’ चाँदनी दोनों भाभिओं को उलाहना देने लगी।
अनामिका ने पूर्णिमा के हाथ से चिठ्ठी छीन ली,‘‘छिः! नाटक का अंत ऐसा ? यह वह कुछ नहीं। सिर्फ डैश और नीचे तुम्हारा -’’
‘‘तुम्हारा क्या ?’’
‘‘दिल का राजा! हृदयेश्वर!’’
‘‘ऐ भाभी, ससुर का नाम ले रही हो ?’’
‘‘नाम कहाँ लिया ? नारायण थोड़े ही कहा। मैं ने तो सिर्फ हृदयेश्वर कहा। क्यों?’’
‘‘अम्माजी ने इसका जबाब क्या भेजा ?’’
उनकी चिठ्ठिओं की बंडल के नीचे से पूर्णिमा ने मानिनी की पहली चिठ्ठी निकाल ली, ‘‘चालीस साल हो गये – कितने करीने से इन चिठ्ठिओं को सॅँभाल कर रक्खा है’’
‘‘इनके बेटों को कुछ सीखना चाहिए। मैके जाओ तो पूछते तक नहीं। एकबार फोन क्या कर लिया, बस।’’
‘‘आपकी चिठ्ठी मिली। चरणस्पर्श -।’’हाय रे दइया!’’ मानो अनामिका की चाय में मक्खी पड़ गई। ‘‘उस जमाने में तो गाने होते थे -‘‘पहला पहला प्यार है, जिआ बेकरार है। आ जा मोरे बालमा, तेरा इन्तजार है !’’
‘‘अरे मुई! चिठ्ठी के अंत में तो देख। दूसरे पन्ने पर -’’
‘‘अरे बाप रे! ये -?’’
‘‘क्या है भाभी?’ ’चाँदनी के मन में द्वन्द्व। नारी का स्वाभाविक कुतूहल और बेटी के फर्ज में।
पूर्णिमा ने चिठ्ठी के दूसरे पन्ने को दिखाया। आखिरी हिस्से में – सुन्दर से होंठ के निशान। धनुष की तरह।
‘‘यानी अम्माँजी ने होठों पर लिपस्टिक लगाकर – ’’अनामिका ने ऑँचल से मुँह ढक लिया।
‘‘छिः! चुड़ैल कहीं की! तुम लोग यह क्या कर रही हो ?’’चाँदनी ने छोटकी की पीठ पर एक मुक्का जड़ दिया।
पूर्णिमा ने हॅँसते हुए पढ़ा, नीचे लिखा है -‘‘ आपने जो कहा था – बाकी रह गया। अब इसीसे जितनी बार चाहे ……..’’
ऐसी ही चिठ्ठियॉँ …….इसी तरह अतीत की खिड़किआँ खुलती रहीं …..और ये तीनों – ननद और देवरानियाँ – अपनी अपनी मुठ्ठि्ओं में उजली धूप को उठा कर – हॅँसी ठिठोली करती हुई – एक दूसरे पर लुटाती रहीं …
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ आपदां अपहर्तारं ☆
हम श्रावणपूर्व 15 दिवस की महादेव साधना करेंगे। महादेव साधना महाशिवरात्रि तदनुसार 18 फरवरी तक सम्पन्न होगी।
💥 इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा, साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ भी करेंगे 💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है एक भावप्रवण गीत “धरा ने ओढ़ी है…”।)