(साहित्य की अपनी दुनिया है जिसका अपना ही जादू है । देश भर में अब कितने ही लिटरेरी फेस्टिवल आयोजित किये जाने लगे हैं । यह बहुत ही स्वागत् योग्य है । हर सप्ताह आपको इन गतिविधियों की जानकारी देने की कोशिश ही है – साहित्य की दुनिया)
राजकमल प्रकाशन की ओर से पांच दिवसीय किताब उत्सव और साहित्यिक विचार चर्चा – चंडीगढ़ मे राजकमल प्रकाशन की ओर से पांच दिवसीय किताब उत्सव और साहित्यिक विचार चर्चा का आयोजन किया गया। इसमें एक दिन बहुत ही विचारोत्तेजक विचार चर्चा की गयी जिसका विषय रहा –आजादी किस मोल पर ! इसमें प्रतिभागी रहे – तरसेम गुजराल, बलवंत कौर, गुरुदेव सिंह, सुमेल सिंह सिद्धू और कृष्ण कुमार। यह बात सामने आई कि – आजादी के समय विभिन्न हमारी मजबूरी रही लेकिन उसके बाद कितनी कीमत हमने चुकाई है या चुकानी होगी ? तब विभाजन एक था, अब विभाजन अनेक हैं और अनेक तरह के हैं, अनेक रूप हैं विभाजन के !
राजकमल प्रकाशन का यह किताब उत्सव सराहनीय प्रयास कहा जा सकता है जिसके माध्यम से शहर दर शहर पुस्तक संस्कृति से स्कूली छात्रों को भी जोड़ा जा रहा है। एक जानकारी के अनुसार किताबें भी खूब बिकीं। आखिर चंडीगढ़ की बात ही कुछ और है !
इंडिया नेटबुक्स एवं बीपीए फाउंडेशन की ओर से पुरस्कारों की घोषणा –चित्रा मुद्गल को शिखर सम्मान
साहित्य में पुरस्कारों का मौसम आया है। इंडिया नेटबुक्स एवं बीपीए फाउंडेशन की ओर से पुरस्कारों की घोषणा की गयी है। इसमें वेदव्यास शिखर सम्मान प्रसिद्ध कथाकार चित्रा मुद्गल को दिये जाने की घोषणा की गयी है।
पुरस्कारों के चयन के लिए इस वर्ष की चयन समिति में श्रीमती ममता कालिया, सर्वश्री हरिसुमन विष्ट, प्रेम जनमेजय, राजेश कुमार, लालित्य ललित, प्रभात शुक्ला, डा. मनोरमा आदि शामिल थे, जिसने इन पुरस्कारों की घोषणा कर दी है। पुरस्कारों के संयोजक डॉ संजीव कुमार ने बताया कि इस वर्ष का शिखर सम्मान-वेद व्यास सम्मान-श्रीमती चित्रा मुद्गल को दिया जायेगा और वागीश्वरी सम्मान के लिए श्री प्रताप सहगल को नामित किया गया है। इसके अतिरिक्त विभिन्न सम्मान हैं। जिनमें साहित्य विभूषण सम्मानों के लिए
सर्वश्री फारुक अफ़रीदी, गिरीश पंकज, राहुल देव, मुकेश भारद्वाज और प्रबोध कुमार गोविल का चयन किया गया है।
ये दुख का विषय है कि समाज रत्न पुरस्कार के लिए चयनित राजूरकर राज को दिये जाने की घोषणा की गयी लेकिन वे इस दुनिया से विदा हो गये। सम्मान समारोह नोएडा में 12 मार्च को आयोजित किया जायेगा।
ग्रामोद्योग महोत्सव , हिसार – ग्रामोद्योग में गांधी ही नदारद। हरियाणा के हिसार में ग्रामोद्योग महोत्सव का आयोजन किया गया। हर तरफ खादी, कुटीर उद्योग के स्टाॅल लगे लेकिन नहीं मिले तो गांधी जिनका बीज मंत्र ही ग्रामोद्योग का आधार है। कोई गांधी साहित्य नहीं ! क्या इस तरह ग्रामोद्योग महोत्सव की कल्पना की जा सकती है ? आयोजकों के इस रवैये पर हैरानी हो रही है।
साभार – श्री कमलेश भारतीय, पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी
(आदरणीय श्री कमलेश भारतीय जी द्वारा साहित्य की दुनिया के कुछ समाचार एवं गतिविधियां आप सभी प्रबुद्ध पाठकों तक पहुँचाने का सामयिक एवं सकारात्मक प्रयास। विभिन्न नगरों / महानगरों की विशिष्ट साहित्यिक गतिविधियों को आप तक पहुँचाने के लिए ई-अभिव्यक्ति कटिबद्ध है।)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
माणूस जन्मल्याबरोबर पहिलं प्रेम अनुभवतो ते म्हणजे आईचं. इथून पुढे प्रेम नावाची अडीच अक्षरे आयुष्यभर आपली साथसोबत करतात. स्त्रीची पुरुषाबरोबर प्रियकर प्रेयसी सोडून पंचवीस-तीस नाती आहेत. पण रस्त्याने एखादी जोडी बोलत निघाली की आपण उगी कुजबुज करीत रहातो. प्रेम अनेक प्रकारचं असतं पण आपण एकाच प्रेमाला धरून बसतो. ही आपल्या कमकुवत समाजाची मानसिकता आहे.
जशी पोटाची भूक असते तशीच प्रेमाचीही भूक असते हे आपण विसरून जातो. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळालं आणि प्रेम नाही मिळालं तर त्याचं जीवन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. प्रेम श्रीमंताचं असतं तसंच गरीबाचंही असतं. प्रेम राजाचं असतं तसंच शिपायाचंही असतं आणि भिका-याचंही प्रेमच असतं. थोडक्यात प्रेम कुणाचं कुणावरही असतं. जीवनात येऊन ज्यानं प्रेम केलं नाही त्यानं जीवनात येऊन काहीच केलं नाही असं म्हणता येईल. प्रेम आहे म्हणून तर या जगातला प्रत्येक माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. प्रेमच असा एक धागा आहे जो प्रत्येक जीवमात्रात गुंफला गेला आहे.
काॅलेज वयातलं प्रेम खूप वेगळं असतं. एखाद्या कसबी शिल्पकाराने मुर्तीला घाटदार कोरीव बनवत जावे तसा नुकत्याच वयात आलेल्या पोरीचा उमलत फुलत येणारा तो दैवी आकार. खरोखरच निसर्गाची किमया अफाट आहे. एखाद्या लहान शेंबड्या पोरीची घडत जाणारी सुंदरी बघत रहावी वाटते. त्रयस्तपणे पहाताना अँजेलोच्या अर्धवट गुढ पेंटींगची सर तिला येईल का? की मोनालिसाच्या गुढहास्य चित्रासारखं तेही गुपितच राहील कुणास ठाऊक? या सगळ्या कलाकृती निसर्गाने मानवाकडून करून घेतलेल्या. एका पोरीची बनलेली सुंदरी हीसुद्धा एक कलाकृतीच. आपोआप घडलेली. कुणाच्या मनात असो कुणाच्या मनात नसो न सांगता सवरता केलेली.
कधी कुरणात मोराचं नाचणं बघतो. प्रियेसाठी त्याचा तो नाच बघण्यासारखा असतो. कुठे बागेत फांदीवर चिमणा चिमणीशी गुलगुल करीत असतो. हिरव्यागार वनराईच्या कुशीत कुठेतरी दाट गवतात एकमेकाला घट्ट मिठी मारून विहार करणारी सापाची जोडी पाहिली की मन व्याकुळ होतं. स्वप्नातल्या जोडीदाराला हाका घालीत राहातं. धनुकलीनं कापूस पिंजावा तसं अंगातला कण नि् कण कुणीतरी पिंजत राहातं. मग एखादी गोरीगोमटी दिसली की मन तिच्यापाठी धावतं. तिचा एखादा नेत्रकटाक्ष झेलण्यासाठी अतुर होतं. नकळत मनातल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खतपाणी घातलं जातं. एखादी हसून बोललीच तर हीच माझी प्राणसखी असं वाटत राहातं. आतापर्यंत आपण हिलाच तर शोधत होतो. कुठं लपली होती ही? परत एकदा स्वप्नांचं पीक तरारून येतं. पण तात्पुरतंच. पुन्हा मनाला संस्कारांचा दोरखंड लावला जातो. आपल्याला शिकलं पाहिजे. घराचं दैन्य कमी केलं पाहिजे हा विचार मनाला भरकटू देत नाही.
शेक्सपियरच्या प्रेमात प्रश्न नसतात मग तुमच्या माझ्या प्रेमात का येतात? फक्त प्रश्न… पण त्याची उत्तरं कुठं आहेत? गंगेची गंगोत्री तशी प्रश्नांची गंगोत्री. एक करंगळीभर पाण्याची धार… पुढे पाण्याचा विशाल सागर. एक गुंता मग सगळी मनाची गुलाबी गुंतागुंत… कुमार वयात मनाला न सुटणारे प्रेमळ प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?
वि. स. खांडेकरांची ‘पहिलं प्रेम’ कादंबरी वाचली त्यावेळी पण असंच वाटलं, प्रेम हे खोटंच असतं, मग ते पहिलं असुदे अगर दुसरं. या जगातील स्वार्थी माणसं या प्रेमाचा तेवढीच मजा किंवा टाईमपास म्हणून उपयोग करीत असावीत. पण या जगात खरं प्रेम आहे बरंका. राधा-कृष्णासारखं आणि कृष्ण-मिरेसारखं सुद्धा प्रेम आहे. अाणि बायको बर्फासारखी पडली असताना तिच्यावर बलात्कार करणारेही या समाजात आहेत. पण हातावर बोटं मोजण्याइतकं का होईना खरंच खरं प्रेम आहे. मला एवढंच समजलं जे प्रेमासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात बाकी सगळे जगायचं नाटक करतात.
काय होतं, ज्यावेळी आपल्या मनातील प्रेमाला खुरडत जगावं लागतं त्यावेळी खुरडत जगायचीच त्याला सवय लागते. असं जगणं म्हणजेच जीवन असाच एक समज होतो. तोच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहिला जातो. हा भार आपण निर्विकारपणे वाहत असतो. आपण खऱ्या प्रेमाला मनाच्या कोनाड्यात दाबून टाकतो. मग जगणं आणि खरं जीवन यांची ताटातूट होते. अशा तर्हेने खरं जीवन आपण कधी जगतच नाही. खरं प्रेम कुणावर कधी करतच नाही. खरं प्रेम खूप थोडे लोक करतात हे प्रेम या गुलाबी अक्षरामागे दडलेलं एक सत्य आहे. ते तुम्हाला नाकारता येणार नाही… मला नाकारता येणार नाही… कुणालाच नाकारता येणार नाही..! पण तरीही खरं प्रेम खर्रच आहे हो..!!
☆ ।।गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(मी तुमच्यातलाच एक आहे,पण बाई म्हणून नाही जगणार !”) — इथून पुढे —
लक्ष्मी आणि इतर बायका बघतच बसल्या. “ अरे, तुला टोचा मारून मारून दुनिया जगू देणार नाही पोरा ! तुझ्यावर कधीतरी बलात्कार होणार, असे घाणेरडे आंबट शौकी लोक आहेत बाबा दुनियेत !”
“ मावशी, तुम्ही वाचवाल ना मला? तुमच्यातला एक काहीतरी वेगळं करू बघतोय, तर मला द्या ना संधी. नाहीच जमलं तर आहेच, भीक मागत फिरणं हो.” लक्ष्मी, शबनम गहिवरल्या. त्यांनी श्यामची अलाबला घेतली. “ कर पोरा काय हवं ते ! आहे आमची वस्ती तुझ्यामागं. चला ग ! ए पोरा, लक्ष आहे आमचं तुझ्यावर. मोकळा सोडणार न्हाय. न्हाय जमलं तर यावच लागलं झक मारत ! चला गं !’
श्यामने सुटकेचा निश्वास टाकला. सगुणा घाबरून त्या सगळ्यांकडे बघत होती. “ लेकरा,ह्याला मी जबाबदार आहे ! का घेतली मी असली औषधं आणि तुझा नाश केला रे.”
“ आई,असं म्हणू नको ! माझ्याच नशिबात हे होतं. एवढं होतं तर त्याच वेळी मारून टाकायचस गं. तुम्ही आणि मी सुटलो असतो.” उद्वेगाने श्याम म्हणाला. “ काय ग हे माझं आयुष्य. खेचराची जात आमची. धड बाई नाही की धड पुरुष नाही. काय आहे ग मला भावी आयुष्य?”
शामचा तोल सुटला. तो हुंदके देऊन रडायला लागला. “ आई,मी बाहेर शांत असतो, पण आत शंभर मरणं मरत असतो. मला लोकांसारखे साधे सरळ आयुष्य नाही. मरण सुद्धा नाही ग माझं नॉर्मल. कशाला मला जिवंत ठेवलंस? त्याच वेळी मारून टाकायचं ना!”
सगुणाने त्याला मिठीत घेतले. “नको लेकरा असं बोलू. कोणी नसेल तर मी जिवंत असेपर्यंत तुला आधार देईन. मला असं त्या लक्ष्मीसारख्या लोकांत नाही रे जाऊ द्यायचा तुला पोरा. निदान देवानं कला दिलीय हातात, तर उपयोग कर बाळा त्याचा. “
श्याम हळूहळू शांत झाला. त्याने डोळे पुसले, आणि कॉलेजला निघून गेला. श्याम सगळ्या परीक्षा उत्तम श्रेणीने पास झाला. त्याच्या हातात स्वयंपाकाची दैवदत्त कला होती. त्याने केलेले केक्स आणि त्याची डेकोरेशन्स भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावत.
अशीच शेवटच्या वर्षी कुकिंगची स्पर्धा होती. दिल्लीहून मोठे मास्टरशेफ आले होते.
सर म्हणाले, “ श्याम, तू का भाग घेत नाहीस? तुला नक्की बक्षीस मिळेल. नाही मिळाले तर निदान या मोठ्या लोकांशी ओळखी तर होतील ना? आता हे शेवटचे वर्ष तुमचे ! भविष्याचा विचार करायला हवा तुम्ही मुलांनी.”
श्याम खिन्न हसला.म्हणाला, “ सर,तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलेत हेच खूप आहे हो माझ्यासाठी.. माझी टवाळी,कुचेष्टा नाही झाली आपल्या कॉलेज मध्ये.”
सरांना भरून आले. “ श्याम,तू माझ्यासाठी एन्ट्री दे. कोणी काही का म्हणेनात. लक्षात ठेव, परीक्षकसुद्धा तुला हिणवतील, कुचेष्टा करतील, पण तू हरु नकोस. तुझ्या बोटातली जादू येऊ दे जगासमोर ! “
वर्गातील मुलांनीही आग्रह केला आणि श्यामने घाबरत एन्ट्री फॉर्म भरला. त्याच्या वर्गातली टॉपर शलाकाही होती फॉर्म भरायला. “ श्याम, तू भरलास फॉर्म म्हणजे मी कसली येणार रे फायनल राऊंड पर्यंत !”
श्याम निष्पापपणे म्हणाला, ” शलाका, मी नको का भरू फॉर्म? तुला पुढे खूप चान्सेस आहेत ग ! माझं काय, मला अंधारच आहे बघ सगळा.”
शलाकाने त्याचे डोळे पुसले.” वेड्या, सहज कौतुकाने म्हणाले रे मी ! तू जिंकतोस की नाही बघच ही स्पर्धा. मी आहे की तुझ्याबरोबर! “
श्यामची प्राथमिक फेरीत निवड झालीच. त्याने केलेले दोन पदार्थ केवळ लाजवाब होते. त्याला सिलेक्ट केले तिथल्या तिथे. श्यामची खरी स्पर्धा सुरू झाली. कधी नावे सुद्धा न ऐकलेले पदार्थ आणि त्या कृती. वर प्रात्यक्षिक चालू असताना, धैर्य खच्ची करणाऱ्या परीक्षकांच्याच कॉमेंट्स.
फिनालेपर्यंत पोचला श्याम. एव्हाना, टीव्हीवर बघणाऱ्या प्रेक्षकांना चांगलाच माहीत झाला होता श्याम.त्याचे उत्कृष्ट पदार्थ तर त्यांना आवडूच लागले. कोणालाही सुचणार नाहीत असे पदार्थ तो दिलेल्या मोजक्या सामानात आणि वेळात सहज करून दाखवी.
हळूहळू चेष्टा करणाऱ्या परीक्षकांचाही आवडता झाला श्याम. शेवटच्या तीन स्पर्धकात शलाकाही पोचली होती.
आज चार स्टार असलेल्या मिशेलिन शेफ कुणाल ने केलेला चार मजली केक करून दाखवायचा होता. ५० मिनिटात कुणालने तो करून दाखवला. सामान, कृती आजीबात लिहिलेली नव्हती. सगळे नुसते लक्षात ठेवूनच ९० मिनिटात, पॅन्ट्रीतून सामान आणण्यापासून सर्व काही करायचे होते.
बेल वाजल्याबरोबर सगळे धावत सुटले आणि सामान घेऊन आले. श्यामनेही कामाला सुरुवात केली.
शेफ कुणाल जवळ आले, म्हणाले, “ काय श्याम ! इथपर्यंत मजल मारली खरी,पण बाकीचे दोन कॉम्पिटीटर कमी नाहीत बरं का. जरा चूक झाली तर घरी जायचे लगेच !”
श्याम शांतपणे काम करत होता.
शेवटच्या पंधरा मिनिटात, मोठे मोठे शेफ स्पर्धा बघायला आमंत्रित केले होते. सगळीकडे बातमी पोचली होती — एक तृतीयपंथी मुलगा फायनलपर्यंत पोचलाय. कौतुकमिश्रित कुतूहलाने सगळे वरच्या गॅलरीतून तिघांचे फायनल टचेस बघत होते.
तिघांच्यात शलाकाचा केक केवळ अप्रतिम झाला होता. लोकांना खात्री होतीच, शलाकाच विनर होणार म्हणून.
फायनल आईसिंग करताना शलाकाच्या लक्षात आले की,आपण आईसिंग शुगर विसरलोय. ती हताश झाली. टीव्हीवर लाइव्ह प्रोग्रॅम दाखवत होते. श्यामने कुणाल सरांना विचारले “ सर माझं सगळं काम झालंय. मी देऊ का उरलेली शुगर त्यांना?”
कुणाल हसले. म्हणाले, ” नो.इथे कोणी कोणाचे नसते श्याम ! अशी मदत केलेली चालत नाही दुसऱ्या कँडीडेटला. सो स्वीट आर यू डिअर.”
वेळ संपल्यावर तिघांचेही केक ट्रॉलीवरून नेऊन परीक्षकांना दाखवले गेले. तीनही परीक्षकांनी खाऊन बघितले आणि कुणाल उठून उभे राहिले. ” श्याम मी कबूल करतो, तू आज हा केक माझ्यापेक्षा उत्तम करून दाखवला आहेस. तू जन्मजात शेफ आहेस खरा.”
तिन्हीही परीक्षकांनी एकमुखाने शामचा केक उत्कृष्ट ठरवला. होताच तो सर्वोत्तम. श्यामला मास्टरशेफचा मानाचा कोट कुणालने चढवला. पंचवीस लाख रुपये आणि एक टीव्ही शो असे भव्य प्राइझ त्याला मिळाले.
श्याम हुंदके देऊन रडायला लागला. त्याची खेडवळ आई, वडील, भाऊ, सगळे घाबरून,अंग चोरून प्रेक्षकांत बसले होते.
श्याम म्हणाला, ” मी तृतीयपंथी आहे, हे मी कधीही लपवून ठेवले नाही. देवाने आमच्यावर फार मोठा अन्याय केलाय, पण मी त्याला कधी दोष दिला नाही. आज त्याच देवाने, ही कला माझ्या हातात ठेवली आणि तुमच्यासारख्या लोकांनी माझे कौतुक केले. मला दुसरे काही नको. हे श्रेय माझ्या आईला देईन मी. मला ती लहानपणापासून बरोबर स्वयंपाक करायला न्यायची. माझी आई अतिशय सुगरण आहे. कदाचित त्याचमुळे मी केटरिंग करायचा निर्णय घेतला असावा. आणि सर्वात महत्वाचे, शेफ नेहमी हॉटेलमध्ये आत असतो, लोकांसमोर थोडाच येतो? मला लोकांसमोर यावे लागणार नाही आणि मी असा असल्याने सतत किचन मधेच असेन – हाही एक फायदाच की !”
साधा सरळ श्याम लोकांना मनापासून आवडला. शामच्या आईची पण एक मुलाखत घेतली गेली. तेव्हा तर ती रडलीच. म्हणाली, “ या माझ्या लेकराने लई सोसलय हो लोकानो. किती अपमान, किती चेष्टा. शाळेतून पळून यायचं पोरगं. इथपर्यंत तुम्ही मायबापानी आणलं. असंच लक्ष राहू द्या.”
श्यामचं नाव एका रात्रीत जगभर झालं. एक तर तो खरोखरच या सन्मानाला पात्र होता. आणि दुसरं म्हणजे, तृतीयपंथी लोकांप्रमाणे सहज हार न मानता, जिद्दीने त्याने कॉलेजशिक्षण पुरे केले होते.
—- आज ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला तृतीयपंथी होता.
आज श्याम भारतात रहात नाही. त्याला मास्टरशेफ किताब मिळाल्यावर देशोदेशी बोलावणी आली. श्यामने बँकॉक पसंत केले, जिथे त्याच्यासारख्या तृतीयपंथीयांना समाजात हीन लेखत नाहीत.
आज श्यामचे बँकॉकला मोठे स्टार हॉटेल आहे, आणि त्यात मॅनेजरपासून ते वेटरपर्यंत फक्त आणि फक्त तृतीयपंथी लोकच काम करतात.
☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
बर्याच दिवसांनी आम्ही सख्ख्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पांना रंग चढला होता. किती बोलू आणि काय बोलू, असं प्रत्येकीला झालं होतं. बोलता बोलता विषय निघला, ‘आपल्यावर कुठल्या व्यक्तीचा विशेष प्रभाव पडलाय?’
मी एकदम म्हंटलं, ‘मला वाटतं, माझ्यावर माझ्या सासुबाईंचा प्रभाव आहे.’ सगळ्या जणी काहीशा चकित मुद्रेने माझ्याकडे बघू लागल्या. कारण सासू-सुनेचे भावबंध तसे जगजाहीरच. जुन्या बायकांनी तर ओव्या-बिव्यातून ते शीलालेखासारखे शाश्वत केलेले. गाऊन जगजाहीर केलेले. त्यांनी म्हणूनच ठेवलय, ‘माय म्हणता म्हणता ओठालागी ओठ मिळे’ इती वर्षा. ‘आणि सासू म्हणता म्हणता काय ग?’ शुभदाची तत्पर विचारणा. ‘सासू म्हणता म्हणता ओठातून जाई वारे.’ वर्षाचं प्रत्युत्तर.
त्यातून माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सोवळ्या. दोन पिढ्यात असावं, तेवढं आमच्यात अंतर. त्यातही त्या श्रद्धाळू. अगदी अंधश्रद्ध म्हणाव्या, इतक्या पराकोटीच्या सश्रद्ध, तर मी आगदी पराकोटीची तर्कवादी. त्यामुळे मैत्रिणींना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मग मी म्हणाले, ‘सासू’ जर ‘माय’ झाली, तर ओठाला ओठ जुळतीलच ना! आणि ओठाला ओठ जुळल्यावर मायेचे भावबंदही तसेच घट्ट होतील! मग भले तोंडाने ‘माय’ म्हणून हाक थोडीच मारली पाहिजे? माझं लग्नं झालं, तेव्हा हल्लीसारखी सासूला ‘आहो आई’ असं म्हणायची पद्धत नव्हती. पण ही पद्धत मात्र चांगली आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या सासू-सून जास्त जवळ येत असतील, असं वाटतं.
‘मला असं वाटतं, माझे विचार,व्यवहार, वर्तन, दृष्टिकोन यावर माझ्या सासुबाईंचा खूप प्रभाव आहे. माझ्या लेखनावरही आहे, असं म्हंटलं, तर चूक ठरणार नाही. कारण लेखकाला काही लिहिताना व्यक्तींना खूप समजून उमजून घ्यावं लागतं. मग त्या प्रत्यक्षातल्या असोत किंवा मनाने सृजित केलेल्या असोत. व्यक्तीचं अंतरंग जाणून घेण्याची माझ्या सासुबाईंची शक्ती अजोड होती. अंतरंग जाणून त्यातील, ’सत्व ते घ्यावे, फोल टाकोनी द्यावे.’ या वृत्तीने त्या जागल्या, बोलल्या.
माझ्या सासुबाईंचं नाव लक्ष्मी. जुन्या पिढीतील थोर लेखिका लक्ष्मीबाई केळकर यांच्याशी नामसाम्य. माझ्या सासुबाईंनी लेखन केलं असतं, तर ‘माणुसकीचे गहिवर’ सारखं पुस्तक हातून लिहून झालं असतं.
‘ऐसी कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।।’ या तुकोबांच्या वचनाचं मूर्त रूप म्हणजे माझ्या सासुबाई. त्यातही त्यांचा ‘प्रीती’ करण्याचा परीघ घरातल्या माणसांपुरता मर्यादित नव्हता. सगळे जवळचे, दूरचे नातेवाईक, परिचयातले, गावातले असा तो व्यापक होता.
माझं लग्न १२ मे १९६५ ला झालं. माझे पुतणे-पुतण्या सासुबाईंना आजी म्हणत. होता होता माझे दीर – जाऊबाई, यजमान सगळेच त्यांना आजी म्हणू लागले. मग मीपण त्यांना आजीच म्हणू लागले. नाही तरी त्यांची नात यमुताई, त्यांच्या मोठ्या मुलीची, अक्काची मुलगी माझ्यापेक्षाच नव्हे, तर यांच्यापेक्षाही मोठी होती. म्हणजे तसा विचार केला, तर आमच्यात दोन पिढ्यांचं अंतर होतं. म्हणजे नात्याने नसेना का, पण वयाच्या अंतराने मी त्यांच्या नातीसारखीच झाले होते आणि त्यांनीही तशीच माया माझ्यावर केली. त्यामुळे या पुढील लेखात मी काही वेळा त्यांचा उल्लेख सासुबाई असा न करता ‘आजी’ असाच केला आहे.
माझं लग्न झालं आणि मी माधवनगरला केळकरांच्या घरात आले, तेव्हा केळकरांचं खातं-पितं घर ‘सुशेगात’ नांदत होतं. पण कधी काळी, अल्पकाळ का होईना, या घराने दारिद्रयाचे चटके सोसले होते. विपत्तीचा अनुभव घेतला होता. सासुबाईंचे यजमान गेल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना गरिबीत दिवस काढावे लागले होते.
माझ्या सासुबाईंना कुणी वय विचारलं की त्या सांगत , ‘साल तितकं वय’. माझे सासरे १९४१ साली निवर्तले. म्हणजे त्या अवघ्या ४१ वर्षाच्या होत्या तेव्हा. सासर्यांना घरात नाना म्हणत आणि ते गावात नारायणभट म्हणून ओळखले जात. ते गेले, तेव्हा सासुबाईंच्या पदरात तीन मुली आणि दोन मुले होती. मोठ्या मुलीचे म्हणजे आक्कांचे तेवढे लग्न झाले होते. त्यांचीही परिस्थिती म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशीच. नाना सांगली संस्थानच्या गणपती पंचायतनातील विष्णु मंदिराचे पुजारी होते. त्यांची भिक्षुकी वृत्ती ( व्यवसाय) होता.
नानांचे बिर्हाड सांगलीच्या गावभागातील तात्या केळकरांच्या वाड्यात होते. आता सात माणसांचे कुटुंब आणि आला-गेला सांभाळत असणार्या एखाद्या भिक्षुकाची मिळकत किती असणार? त्यात शिल्लक किती उरणार? आक्कांच्या पाठचे दादा. ते तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर सुशीला, कुसुम, उषा या बहिणी, नंतर माझे यजमान अनंत. त्यांना सगळे बाळू म्हणत. ते अवघे तीन वर्षाचे होते तेव्हा. आता पुढे काय? हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला. ‘ आता गंगाधराने (दादांनी) शिक्षण सोडून भिक्षुकी करावी, असेच अनेकांचे म्हणणे पडले. माझ्या सासुबाईंनी मात्र, ‘मुलाला भिक्षुक करायचे नाही. सध्या या व्यवसायाला मान-प्रतिष्ठा राहिली नाही,’ असे ठामपणे सांगितले. तरीही १० वी आणि ११वी अशी दोन वर्षे शिकत असताना दादांनी दोन देवळातली पूजा केली. देवळातला प्रसाद म्हणून दोन ताटातून भरपूर जेवण घरी यायचे. घरच्यांची एक वेळच्या का होईना, पण जेवणाची सोय व्हायची. नानांनी थोडी जमीन घेतली होती आणि ती खंडाने दिली होती. खंडाचा धान्य घरी यायचं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे सासुबाईंचं केशवपन झालं. त्याबद्दल मी पुढे केव्हा तरी दादांना विचारलं, ‘तुम्ही कसं होऊ दिलत केशवपन?’ त्यावर दादा म्हणाले, ‘ तो आजींचा स्वत:चा निर्णय होता.’ कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार, तो काळ, गावातलं वातावरण, सासरे करत असलेला व्यवसाय याचा तो एकत्रित परिणाम असेल.
‘कसं चाललं होतं तुमचं तेव्हा?’ मी एकदा आमच्या कुसुमवन्संना विचारलं होतं. ‘अपरंपार कष्ट आणि अपार काटकसर या दोन चाकांवर आमचा गाडा तेव्हा चालत होता.’ त्या म्हणाल्या.
त्यावेळी कुसुमताई दहा वर्षाच्या होत्या. सुशीताई बारा वर्षाच्या असतील. कुसुमवन्स पुढे म्हणाल्या होत्या, ‘शेजार्या-पाजार्यांच्या रेशनचं धान्य आम्ही आणून देत असू. त्यांच्या रेशनवरची बाजारी आम्ही घेत असू. आमच्या रेशनवरची बाजरीही आम्ही घेत असू. बाजरी उष्ण. त्यामुळे घरात आम्ही कुणी ती खात नसू. आमचे चुलत भाऊ गणुदादा यांना आम्ही ती देत असू. त्या बाजरीवर ते रुपयाला दहा आणे कमिशन देत असत. इतरांचं शिवण शिवून शिलाईचे पैसेही आम्ही मिळवत असू. प्रत्येक फ्रॉकला चार आणे शिलाई मिळायची. संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’
इंग्लंड मधील एका खेड्यातील घडलेली घटना. मध्यरात्री पोलीस गस्त घालत होते. बरोबर ‘ एरडेल टेरियर’, जातीचा ‘ ब्रूस ‘ हा कुत्रा होता. अचानक थांबून तो गुरगुरायला लागला . हुकूम मिळताच, तो जवळच्या झुडूपात गडप झाला. काही क्षणातच, एक माणूस डोक्यावर हात घेऊन ‘ ब्रुस ‘च्या पुढे आला. चपळाईने त्या माणसाने, खिशातून पिस्तूल काढले . ‘ ब्रूसच्या ‘ धोका लक्षात आला. आणि त्याने पटकन, माणसाचा पिस्तूल धरलेला हात पकडला. पिस्तूल गळून पडले त्याच्या हातातून !.आणि अखेर तो पकडला गेला. घरफोडीची बरीच हत्यारे त्याच्याजवळ सापडली. आणि अनेक गुन्हेही उघडकीस आले. ‘ ब्रूस ‘चे सर्वांनी कौतुक केले.
ग्वाटेमालाला बऱ्याच वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी मोठा भूकंप झाला. दिवस उजाडताच, पडलेल्या घरांखालील माणसे शोधायला सुरुवात झाली. तेव्हा लक्षात आले की, गावातली सगळी कुत्री गावाबाहेर पळून गेली होती. ती नंतर परत आली . आणि कुत्र्यांनीच मृत आणि जिवंत माणसांना शोधून काढले. लोकांना समजेना की, सगळी कुत्री गावाबाहेर कशी गेली? कुत्र्यांना भूकंपाची जाणीव अगोदर होते .आणि ती दूर दूर जाऊन भुंकत राहतात. नुकत्याच सीरिया आणि तुर्कीच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने इतर मदतीबरोबरच डॉग स्काँडही पाठवले आहे.
दुसऱ्या महायुद्ध काळात, जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षाव करीत होती. अनेकदा इमारती कोसळून अनेक जण त्याखाली गाडले जात होते. अशावेळी ‘ जेट ‘ नावाच्या कुत्र्याने अनेक जणांना वाचवले. एकदा एका ठिकाणी, ‘आता येथे कोणी सापडणार नाही’ असे म्हणून,’ जेटला ‘ घेऊन पोलीस परत निघाले. पण ‘जेट ‘ परत जायला तयार होईना. एका ठिकाणी उकरून भुंकायला लागला. पोलिसांनी तेथे जाऊन आणखी थोडे उकरून पाहिले तर, एका तुळईखाली बरेच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले .आणि सर्वजण शुद्धीवर आले .डोळ्यात पाणी आणून सर्वांनी ‘जेटचे ‘ खूप खूप कौतुक तर केलेच ,पण त्याचे आभार कसे मानावेत, यासाठी त्यांना शब्द सुचेनात. ‘ जेट ‘ सर्वांचा प्राण दाता ठरला.
‘रॉक अँड रोल ‘, संगीताचा भारलेला काळ होता तो. ते संगीत म्हणजे अक्षरशः वेड लावणारे होते. लंडनमध्ये सिनेमा पाहून झाल्यानंतर प्रेक्षक रस्त्यावर, मोठमोठ्याने ओरडून नाचत सुटले .जमाव बेभान झाला. जमावाने शोकेसेस आणि दुकाने फोडायला सुरुवात केली . स्कॉटलंड यार्डचे पोलीस कुत्र्यांना घेऊन आले. कुत्र्यांना जमावाच्या अंगावर सोडणे शक्य नव्हते. पण केवळ कुत्र्यांना पाहताक्षणीच जमाव शांत झाला. केवळ कुत्र्यांच्याच्या हजेरीने जमावावर केवढा परिणाम झाला पहा बरं ! किमयागार म्हणावे का त्याला?.
मुंबईच्या लोकलमध्ये, एका तरुण मुलीची, दागिन्यांसाठी हत्या झाली. कळवा स्टेशनवर गाडी थांबताच काही तरुण डब्यातून उतरून गेले. पोलिसांना पत्ता लागत नव्हता. कळवा स्टेशनवर एका झाडाखाली त्यांना एक चप्पल रोड दिसला. त्यावर खाऱ्या चिखलाचे थर होते. शोध आणि तपास घेण्यासाठी पुण्याहून ‘राणी ‘ या डॉबरमन कुत्रीला आणले. तिची मदत घेतली. कळवापासून जवळच दिवा गावाजवळ असा चिखल होता. पोलीस गावात चौकशी करू लागले. ‘राणी ‘ कुत्रीला पाहून तरुण आरोपी गडबडला. घाबरला. आरोपी हा पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतो. त्याप्रमाणे तो पकडला गेला. त्या मुलीचे दागिने त्याने घराच्या छपरात लपवून ठेवले होते. पुढे तो आणि त्याचे साथीदारही पकडले गेले .आणि त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. राणी कर्मयोगी झाली म्हणायची ना!.
सहारा विमानतळावर हेरॉईन, अफू, ब्राऊन शुगर अशी मादक द्रव्ये प्रवासी लपवून आणतात. ज्या बॉक्समध्ये अशी द्रव्ये असतात , तो बॉक्स पाहताच ‘हीरो’, हा निष्णात कुत्रा पेटीकडे पाहून मोठमोठ्यांना भुंकायला लागायचा. अशा द्रव्यांचा वास त्याला कसा येतो ? ही गोष्ट कस्टम अधिकाऱ्यांनाही समजत नसे. त्याच्या आठ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत ‘ हिरोने ‘, 200 कोटी रुपयांची मादक द्रव्ये शोधून काढून आपल्या ‘ हिरो ‘ या नावाचे सार्थक करून दाखवले.
अगदी अलीकडची गोष्ट. अगदी अभिमान वाटावा अशी. जम्मू कश्मीरमधील, बारामुल्ला भागात आतंकवाद्यांना पकडण्यासाठी जवानांच्या बरोबर आणखी एक जवान ( झूम नावाचा श्वान ) काम करीत होता. आतंकवादी एका घरात लपले होते . ‘ झूम ‘ च्या गळ्यातल्या पट्ट्यावर चीप बसविली होती. आतंकवाद्यांची माहिती घेण्यासाठी, प्रथम ‘ झूम ‘ला पाठवले गेले . जेणेकरुन ‘ झूम ‘ कोठे आहे ,हेही पट्ट्यावरील चीपमुळे कळणार होते. ‘ झूमने ‘ दोन आतंकवाद्यांना बरोबर ओळखले .आणि त्यांच्यावर हल्ला केला . त्यांना अगदी जेरीस आणले. आतंकवादी पकडले गेले. पण प्रतिकार करताना ,एका आतंकवाद्याने ‘ झूम ‘ वर गोळ्या झाडल्या . त्याला गोळ्या लागल्या. तरीही तो न हरता, आतंकवाद्यांशी झटतच राहिला. जखमी झाला. “. बचेंगे तो और भी लढेंगे ” असे जणू आपल्या कृतीने तो सांगत होता. त्याला श्रीनगरच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठ दिवस तो उपचारांना हळुवार प्रतिसाद देत होता. पण अखेर एक ज्वलंत देशभक्त मृत्यूच्या स्वाधीन झाला. अनंतात विलीन झाला. शहिद झाला. त्याला सन्मानाने निरोप दिला.
२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात, अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हॅन्ड ग्रेनेड पोलीस टीमने “मॅक्स ” या कुत्र्याच्या साहाय्याने शोधून काढला .आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी, त्याने बरीच थरारक कामे केली होती. हॉटेल ‘ताज ‘ च्या बाहेर तब्बल आठ किलो आरडीएक्सचा आणि २५ हँड ग्रेनेडचा शोध त्याने घेतला होता. आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचवले होते. ११ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटादरम्यान झवेरी बाजार येथील जिवंत बॉम्ब शोधून त्याने उल्लेखनीय असे कर्तव्य बजावले होते . सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘ मॅक्स ‘चा गौरव केला गेला. पोलीस दलातील प्रत्येकालाच ‘ मॅक्स ‘ चा लळा लागलेला होता. लाडक्या ‘ ‘मॅक्स ‘ च्या निधनाने पोलीस दलही खूप हळहळले .सर्वांनाच वाईट वाटले .