मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक लगीनगाठ…” भाग १ – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग १ – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

श्रीकांत कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात होता. साल होते १९७४. त्याची पाचवी सेमिस्टर झाली व दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या. ड्रॉईंग, सबमिशन आणि स्टडीच्या जंजाळातून थोडासा मोकळा झालेला श्रीकांत आपल्या गावी म्हणजे वडगावला परतला. त्याला खरे म्हणजे या सुटीत  पाच-सहा दिवस मस्त झोप, खूपशी विश्रांती आणि शिवारातील शेतात मनसोक्त हुंदडायचे होते व अभ्यासाचा थकवा उत्साहात बदलायचा होता. तसे तो ठरवूनच गावी आला होता. पण ‘माणूस घडवितो आणि देव बि-घडवितो’ अशी एक इंग्रजी म्हण श्रीकांतने वाचली होती. त्याचे प्रत्यंतर त्याला आपल्या घरी नेमके याच दिवाळीला येईल , ही अपेक्षा नव्हती.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुगंधी तेल व उटणे लावून अंघोळ झाली , फराळ झाला आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे आप्पानी त्याला विचारले,

“श्री, किती दिवस सुट्टी आहे रे ?”

“आप्पा , परीक्षा संपवून आलोय. त्यामुळे चांगले तीन आठवडे सुट्टी आहे . सुट्टीत मी शेतात काम करायचे म्हणतोय. ” श्रीकांत बोलला.

“ते ठीक आहे. पण परवा भाऊबीजेला तुझ्या आक्काकडे जाऊन ये. तिच्यासाठी व तुझ्या भाचरांसाठी कपडे आणलेत, तेच ओवाळणीला टाक. वाटल्यास एखादा दिवस रहा व लगोलग परत ये. माझा बडोद्याचा दोस्त यशवंता आजारी आहे व त्याला भेटायला मला जावे लागणार आहे. लांबचा पल्ला आहे व मी रेल्वेतून प्रवास नाही केलेला. तुला माझ्या सोबत यावे लागेल. तुझी आई तयार असंल तर तिला पण घेऊन जाऊ या. आलं का लक्षात ? “

” होय आप्पा, जाऊ या की. पण खर्च खूपच होईल. मी येईन बरोबर.” श्रीकांत बोलला.      

“आधी ते भाऊबीज तर करून ये. मग बघू कधी निघायचं ते .” आप्पा बोलले व तो विषय तिथेच थांबला.

श्रीकांत भाऊबीजेला आक्काकडे जाऊन आला. तिथे भाऊजीसकट सर्वांना त्याने कपडे दिले. आक्काने पण दुपारी गोडधोड आणि रातच्याला मस्त मटणाचा बेत केला. दुपारी आणि संध्याकाळी आग्रह करायला आक्काची नणंद सुरेखा होती. नुकतीच बारावी झालेली व नाकीडोळी नीटस , पण सावळ्या रंगातही उठून दिसणारी ती श्रीकांतच्या बळेच पुढे पुढे करीत होती. त्याची आक्कापण त्यासाठी तिला प्रोत्साहन देत होती. सगळ्यांच्या आग्रहाखातर तो भाचे कंपनीला घेऊन तिच्याबरोबर भाऊजींचे शिवार देखील बघून आला. थोडक्यात त्याचा वेळ झकास गेला. दुसऱ्या दिवशी त्याने आक्काला बाय बाय केले, पण बाकीच्यांच्या पेक्षा सुरेखाच जास्त वेळ हात हलवीत होती हे कांही त्याच्या नजरेतून सुटले नाही. बोलण्याचा ओघात त्याने आक्काला सांगून टाकले होते की आठवड्याच्या शेवटी माई आणि आप्पांच्या बरोबर तो बडोद्याला आजारी यशवंत काकाकडे जाणार आहे.

त्याच्या बहिणीला त्याबद्दल फार आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. ती काकांना श्रीकांतपेक्षा अधिक ओळखत होती व तिला ते काका आवडत ही होते. तिच्या लग्नात याच काकांनी पुढे होऊन आप्पाना खूप आर्थिक मदत केल्याचेही तिला माहीत होते. त्यामुळे सगळेजण काकांचा मनापासून आदर करीत होते.

श्रीकांत परत गावी आला व त्याने आक्काची , भाऊजींची खुशाली आप्पाना , माईला सांगितली. त्यावेळी आप्पा बोलले, ” यशवंत काका आजारी आहेत. तुझ्या आक्काच्या लग्नात यशवंत ने पुढे होऊन मला रुपये दहा हजार दिले होते. त्यामुळे तर आक्काचे हे मालदार स्थळ मला निभावता आले व तिच्या आयुष्याचे सोने झाले. यशवंतला त्याचे पैसे परत करण्यासाठीच आपण जातोय. त्याच्या बऱ्याच ऋणातून मला मोकळे व्हायचे आहे.”

श्रीकांतला बऱ्याच ऋणाचा अर्थ नाही समजला पण हे पैशाचे डिटेल्स आजच समजले. आक्काच्या लग्नावेळी तो दहावीत होता व पैशाचे व्यवहार त्याला कोणी सांगीत नव्हते. त्यावेळी नुकतीच दहावीची परीक्षा झाली असल्याने आक्काच्या लग्नात त्याने भरपूर मजा केल्याचे त्याला आठवत होते. यशवंत काकाही त्याला बाबांचे एक चांगले दोस्त म्हणून व लग्नात त्यांनी आप्पाना मदत केली होती म्हणून आवडत होते. काकांची सासुरवाडी बडोदा होती. तिथल्या गायकवाड वाड्यात त्यांचे सासरे कामाला होते व त्यांनी यशवंत काकांनादेखील तिथे नोकरी लावली होती. आता त्यांचे  सासरे नव्हते व त्या सर्व कुटुंबाचा भार यशवंत काकांवर होता. जे थोडेफार त्याच्या कानावर होते ते एवढेच होते. बडोद्याला माई-आप्पाना घेऊन जायचे म्हणजे पुण्याहून डायरेक्ट अहमदाबाद रेल्वे नव्हती. पुना ते मुंबई आणि मुंबई ते बडोदा असा प्रवास करणे आवश्यक होते. रिझर्वेशन करून गेल्यास कांही त्रास नव्हता. श्रीकांतने आप्पाना विचारून घेतले व पुण्याच्या मित्राला सांगून चार दिवसानंतरची तीन तिकिटे रिझर्व्ह केली. थोडक्यात सर्वांचा बडोदा प्रवास निश्चित झाला.

काकांचा आकरावीतील मुलगा रमेश त्यांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला आला होता. घरी जाण्यासाठी रमेशने टांगा ठरविला होता. टांग्यातून ते घरी निघाले. श्रीकांतसारखा उंच, गोरा व बडबड्या रमेश श्रीकांतला आवडून गेला. त्याच्याकडून सर्वाना समजले की काकांना दवाखान्यातून घरी आणले होते . घरी काका, काकी, काकीची आई, रमेश आणि त्याची एक वर्षांनी मोठी असलेली बहीण सुजाता असे पाचजण होते. त्याचे घर चांगले पाच खोल्यांचे होते. गायकवाड वाड्यात यशवंत काकांना मान होता. अर्थात त्याला कारण काकांचे सासरे व दोघांचे प्रामाणिक काम होते. सरकारांच्या नियमानुसार मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार करीत होते व त्यामुळे सुजाता आणि रमेश उत्तम शिकत होते. सुजाता आता कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. ती हुशार होती व घरी काकीना खूप मदतही करीत होती. तसे बडोद्यात मराठी बोलणारे लोक सरकार वाड्याच्या परिसरात बरेच होते. त्यामुळे तिथे कोणास परके वाटत नव्हते. हे सर्व श्रीकांतला रमेशने त्याच्या बडबड्या  व मोकळ्या स्वभावास अनुसरून टांग्याच्या घोड्याच्या टापांच्या आवाजात न विचारता सांगितले होते. श्रीकांतची व रमेशची गट्टी व्हायला त्यामुळे वेळ नाही लागला. टांग्यातून जाताना थोड्या अरुंद दहा-बारा फुटी रस्त्याने टांगा चालला होता. रस्त्याच्या बाजूला जुन्या पद्धतीच्या इमारती होत्या. जवळजवळ वीस मिनिटे झाल्यानंतर टांगा एका प्रशस्त रस्त्यावर आला. ही बहुतेक उच्चभ्रू लोकांची वस्ती असावी. चार-पाच मिनिटात टांगा एका प्रशस्त प्रवेशद्वारातून आत गेला. समोर दोनशे फूट अंतरावर एक वाडासदृश इमारत व त्याच्या दोन्ही बाजूला छान राहण्यासाठीच्या इमारती होत्या. त्यातील मोठ्या वाड्यापासून दूर असलेल्या इमारती जवळ टांगा थांबला. या इमारतीत देखील चार-पाच कुटुंबे रहात असावीत. इमारतीच्या बाहेर एक गोरटेली मुलगी साडीमध्ये उभी होती. रमेश बोलला, “माझी ताई तुम्हा सर्वांची बाहेर वाट पाहतेय . बहुतेक बाबांनी तिला पाठवले असावे “

टांग्यातून सगळेजण उतरले. रमेश व सुजाताने त्यांच्या सामानाच्या दोन बॅगा घेतल्या. श्रीकांतने दोन घेतल्या. माई आणि आप्पा सुजाताच्या मागोमाग निघाले. त्या इमारतीतील दोन नंबरच्या दरवाजातून सगळे आत गेले. आत यशवंत काका व काकी उभे होते. काकींच्या आई जुन्या लाकडी खुर्चीवर बसल्या होत्या. नमस्कार, क्षेम-कुशल झाल्यानंतर प्रवासाचा शीण घालवण्यासाठी हात-पाय धुणे झाले. चहा व कांदापोहे झाले. श्रीकांत आणि अप्पांची बॅग रमेशच्या खोलीत गेली. माईंची बॅग सुजाताच्या खोलीत गेली. काकीनी पाणी गरम करून ठेवले होते. आंघोळीची खोली एकच होती. त्यामुळे सर्वांची आंघोळ वगैरे आटोपायला चांगला दीड तास गेला. यशवंत काका व आप्पा बऱ्यापैकी बोलत बसले होते. श्रीकांतची आंघोळीची पाळी येईपर्यंत त्याने एक डुलकी घेतली, नंतर फ्रेश झाला , आंघोळ केली, नवीन स्वच्छ कपडे बदलले आणि तोही यशवंत काकाबरोबरच्या बोलण्यात सामील झाला. आता चांगले चार-पाच दिवस तिथेच काढायचे होते, ते कसे जाणार ही एकच चिंता त्याच्या मनात घर करून होती. बोलण्याच्या ओघात काकांना सौम्य हार्ट अटॅक आल्याचे व त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे समजले. कदाचित ऑफिसातील बैठ्या कामामुळे असेल, पण त्यांना दिलेल्या गोळ्यांवरून  त्यांची तब्येत नाजूक असावी असा कयास बांधता येत होता. सुजाता आणि रमेश दोघेही अभ्यासात हुशार होते. सुजाता बी कॉम.च्या पहिल्या वर्गात होती व रमेश आकरावीत होता. बारावीत मेरीटमध्ये येऊन त्याला इंजिनीअर व्हायचे होते. आप्पानी श्रीकांत समोर काकांना त्यांचे दहा हजार रुपये परत केले व त्यांनी मुलीच्या लग्नात केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. बडोद्याला आल्याचे मुख्य काम असे पूर्ण झाले होते. पहिला दिवस असा ओळखी, विश्रांती आणि एकमेकांचे क्षेमकुशल यातच गेला. यशवंत काकांची तब्येत सोडली तर घरातील वातावरण व सर्वांचे वागणे श्रीकांतला भावून गेले. त्या रात्री श्रीकांत रमेशच्या खोलीत लौकरच झोपी गेला. मात्र आप्पा, माई, काका आणि काकू बराच वेळपर्यंत गप्पा मारीत होते.

क्रमश: भाग १

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -4 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -4 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले,- आता आजीही नाहीत आणि त्यांचा वसा चालवणार्‍या जाऊबाईही नाहीत. मात्र त्यांनी आणि मी आजींचा वसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला आहे.- आता इथून पुढे)

आजींच्या व्यक्तिमत्वाच्या आणखी एका पैलूबद्दल लिहायला हवं. भावनिक जीवनात त्या अतिशय श्रद्धाळू होत्या. अंध:श्रद्ध म्हणता येईल इतक्या. करणी, भुतं- खेतं या सगळ्या गोष्टींवर पराकोटीचा विश्वास होता. कुणाला ताप आला, दोन –तीन दिवसात नाही उतरला, तर निघाल्याच त्या त्यांच्या  क्षेत्रातील डॉक्टरकडे, म्हणजे कुणी चिप्रिकर आजी होत्या, किंवा ताई कोल्हटकर यांच्याकडे. काय झालं, कुणी करणी केली का? काही बाहेरची बाधा आहे का? वगैरे विचारून त्यांनी सांगितलेले उपचार सुरू होत. मात्र ते सारे उपचार त्या स्वत: करत. इतरांना त्याची तोशीस नसे. त्याचप्रमाणे त्यांचेच उपचार करायचे, डॉक्टरकडे जायला नको, असाही आग्रह नसे. तुम्ही डॉक्टरकडे जा. मला हवे ते उपचार मी करीन, हे धोरण. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेमुळे नि अंध:श्रद्धेमुळे घरात वादावादी, भांडण असे काही झाले नाही. त्यांच्या श्रद्धा आणि अंध:श्रद्धा त्यांच्यापुरत्या होत्या. त्यासाठी जे काही करायचं, ते त्या स्वत:च करत. त्यासाठी त्यांनी कधी इतरांना वेठीला धरले नाही. तू मंगळवारचे उपास कर, किंवा शंकराला प्रदक्षिणा घाल, असे काही त्यांनी कुणाला संगितले नाही. आपल्याला मात्र जे वाटते ते त्यांनी बदलत्या काळातही केले आणि आपले व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखले.                      

त्यांच्या विचारातला आधुनिकपणा घरात घडलेल्या एका घटनेमुळे सगळ्यांच्या पुढे आला. आमचे एक जवळचे नातेवाईक होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आणि वर्षभराच्या आत तिचे यजमान पोटात अ‍ॅपेंडिक्स बर्स्ट होऊन गेले. बावीस-तेवीस वय असेल तिचं. पुढे वर्षभराने कुणी तरी तिच्यासाठी एक स्थळ सुचवले. तेही विधुर होते. पसंती, बोलणी सगळं झालं, पण तिचे वडील मोठे कर्मठ. ते काही या गोष्टीला तयार होईनात. ते म्हणायचे, ‘मी समर्थ आहे तिच्याकडे पहायला .’ शेवटी आजींनी जाऊन त्यांची समजूत घातली. त्या म्हणाल्या, ‘काळाप्रमाणे आपण बदलायला हवं. तुम्ही तिला आयुष्यभर पुरणार आहात का? ‘असं खूप काही बोलल्यानंतर, नकाराची त्यांची भूमिका, ‘काय हवं ते करा!’ यावर येऊन ठेपली. त्यांचं हे वाक्य म्हणजेच त्यांचा होकार असं गृहीत धरून बाकीच्यांनी पुढाकार घेऊन तिचे लग्न लावून दिले. आज ती मुले-नातवंडे अशा परिवारात सुखाने नांदते आहे. या सगळ्या घडामोडीत मला सगळ्यात विशेष वाटतं, ते सोवळ्या असलेल्या आजींनी, त्या आपल्या कर्मठ, जुन्या विचारसरणीच्या नातेवाईकाची समजूत घातली होती.

आजी सोवळ्या होत्या. त्यांचं सोवळं- ओवळंदेखील होतं. पण त्याचं अवडंबर त्यांनी कधी माजवलं नाही. त्यांचं सोवळं त्यांच्यापुरतं असे. त्याचा व्याप-ताप कधी दुसर्‍याला झाला नाही.

१९६५ मध्ये माझं लग्नं झालं. तेव्हा घरात इतकी माणसं होती की सगळी नाती लक्षात यायला मला महिनाभर लागला. लग्नानंतर १५-२० दिवसात एक नणंद बाळंत झाली. त्यानंतर दोन महिन्यांनी दुसरी. घरात डोहाळजेवण, बाळंतपण, बारशी, पुढे माझे सणवार असे कार्यक्रमावर कार्यक्रम. त्या काळात आजींच्या दोन चुलत, मावस जावा इंदिराकाकू आणि ताई सोमण जवळ जवळ वर्षभर आमच्याकडे रहात होत्या. एकदा सहज बोलता बोलता त्या मला  म्हणाल्या,’ तुझे दीर आणि सासू नंबर एकची माणसे आहेत. शंभर नंबरी सोनं. ‘ आज मागे वळून बघताना माझ्या लक्षात येते, त्या बोलल्या, त्याची मला प्रचिती आलीच, पण अनेकदा असंही वाटतं की , कुणाला ठेवून घेण्याचे, मदत करण्याचे, त्यांची गरज भागवण्याचे         निर्णय माझ्या दिरांचे आणि सासुबाईंचे असले, तरी त्यांना तेवढीच समर्थ साथ वहिंनींची ( माझ्या जाऊबाईंची) होती. म्हणून सगळ्या गोष्टी सहजतेने होऊ शकल्या. कुणीही राहिले, तरी प्रत्यक्ष परिश्रम, कष्ट वहिनींनाच करावे लागायचे. एका दृष्टीने आजी, दादा, वाहिनी हा त्रिवेणी संगम होता. आमचं घर म्हणजे, ‘तीर्थ’ हा शब्द वापरत नाही मी, पण अनेकांच्या आधाराचं, आणि विसाव्याचं ठिकाण होतं. कुणी तिथे क्षणभर पहुडलं, कुणी दीर्घकाळ स्थिरावलं.

एकदा बोलता बोलता, मोठ्या वन्संची  नात मेधा म्हणाली, ‘कॉलेजमध्ये गेल्यावर मदर टेरेसांचा फोटो मी प्रथम पाहिला आणि मनात आलं ’अरे, ही ‘मदर’ तर आपल्या घरी आहेच. माधवनगरची आजी. (म्हणजे प्रत्यक्षात तिची पणजी.) तशीच पांढरी साडी, डोक्यावरून पदर, चेहर्‍या-मोहर्‍यातही खूप साम्य आणि दुसर्‍याला मदत करायची, दुसर्‍याचं दु:ख दूर करण्यासाठी तन-मन-धनाने झटण्याची तीव्र इच्छा, आंतरिक ऊर्मीही दोघींची सारखीच. मदर टेरेसांच्या कामाचा परीघ मोठा असेल, माझ्या आजीचे, नव्हे पणजीचे , कामाचे क्षेत्र, नातेवाईक, गाववाले, परिचित लोक एवढ्यापुरतंच मर्यादित असेल, पण कामना, ‘दुरितांचे तिमीर जावो, हीच!’

आजींनी जे जे दुसर्‍यांसाठी केलं, कधी सहानुभूती, कधी मदत, कधी योग्य सल्ला, त्यात त्यांचा इवलाही स्वार्थ नसे. त्या अर्थाने त्या खरोखरच संसारात राहूनही संत झाल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाच्या किती किती गोष्टी आठवताहेत. सगळं सांगायला गेलं, तर पुस्तकच होईल. आता त्या प्रत्यक्षात नाहीत, पण माझ्या मनात मात्र त्या रुजून राहिल्या आहेत.

                      त्या नसतात, तरीही स्मृतीमध्ये त्या टकटक करत रहातात. 

                      थंडीत उबेसारख्या, जाणिवेत स्पर्शासारख्या

                      प्रत्येक क्षण त्या असतात… 

                      आपल्या नसण्यातही आपल्या असण्याचं

                      भान जागवत त्या असतात… 

                      त्या असतात…

— समाप्त —

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – kelkar1234@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

श्वानांच्या  गुणांच्या बाबतीत महाभारतातली एक गोष्ट सांगितली जाते. पांडव स्वर्गात जाताना ,’ सरमा ‘ ही कुत्री त्यांच्याबरोबर होती. जो खोटे बोलला नाही ,खोटे वागला नाही, निस्वार्थ सेवा, आज्ञाधारकता, आणि  निष्ठावंत सेवक असा राहिला, त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार होता .या अटींमध्ये  ‘सरमा ‘ पास झाली . तिच्या गुणवैशिष्ट्यांमुळे तिला स्वर्गाचे दार सहजगत्या खुले झाले.

आपण इतिहासात वाचतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर , त्यांचा लाडका कुत्रा  ‘ वाघ्या ‘ महाराजांच्या चितेवर धन्यासाठी झेपावला होता. या निष्ठेचे वर्णन करायला शब्दही तोकडे आहेत खरोखर.

गुजरातमधील पालमपुर तालुक्यात काही कुत्रे इतके श्रीमंत आहेत की, ते पाच कोटींचे मालक आहेत. काही वर्षांपूर्वी नवाबाने गावकऱ्यांच्या नावावर केलेली जमीन, त्यांनी आपल्या कुत्र्यांच्या नावाने केली. त्या कुत्र्यांची जमीन वीस  बिघा, म्हणजे त्याची किंमत जवळजवळ पाच-सहा कोटीहून जास्त आहे.  पहा ही कुत्र्याची श्रीमंती !

 एखाद्याचं नशीब पहा कसं असतं ते. अंतराळयानातून सजीव म्हणून ‘ लायका ‘ या कुत्रीलाच पाठवले होते. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या सजीवाचा मान या कुत्रीला मिळाला. काय म्हणावं तिचं नशीब !

आत्तापर्यंत श्वानांवर सर्वात जास्त पुस्तके लिहिली गेली आहेत. श्वानांचा एक विश्वकोशही आहे .जी व्यक्ती प्राण्यांना प्रेमाने सांभाळते, तिच्यापेक्षा पाळीव प्राणी त्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतात. त्या प्रेमाला माणूसच कमी पडतो, असं म्हणायला हरकत नाही .काही श्वान आपलं सुंदर रूप आणि आज्ञाधारकपणा या गुणांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही  गाजतात.  थायलंडमधील बँकॉक येथे डॉग शो मध्ये आशिष लिमये यांची ‘ माया ”  ‘ (दोन वर्षे वयाची, बेल्जियम मेनोलीज जातीची ) हिने “सेव्हन बेस्ट ऑफ ब्रीड “, आणि ” सेव्हर चॅलेंज सर्टिफिकेट”  अशी दोन मानाची पदके मिळविली.  कॅनल क्लब ऑफ इंडियाच्या स्पर्धेतही ती चॅम्पियन ठरलेली आहे. खरंच किती कौतुक करावे?

ऑलिंपिक सारख्या सामन्याच्या वेळी ,काही मोजकेच श्वान, प्रेक्षकांमध्ये दंगा होऊ न देण्याचे काम 

करतात . लोक पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतात. व्यवस्थापनात पोलिसांपेक्षा कुत्र्यांची संख्या कमी चालते.

श्री. गिरीश कुबेर यांनी ” पंचकन्या  स्मरे नित्यम “, या लेखामध्ये, घरातल्या पंचकन्यांचे (कुत्र्यांचे ) व्यक्तिमत्व इतके छान अधोरेखित केले आहे की, ते पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. ते लिहितात की या पंचकन्यांनी हेच शिकवलेलं की — “चांगला माणूस होण्याचा मार्ग प्राण्यांच्या अंगणातून जातो”. पहा बरं काय वाटतं त्यांना ते.  

” मी आणि माझी ३१ बाळं “, हा ममता रिसबूड यांनी लिहिलेला लेख वाचताना त्यांनी त्या बाळांसाठी (प्राण्यांसाठी ) घेतलेले कष्ट आणि त्याग खरोखरच वाखाणण्याजोगा आहे असे वाटते.

चित्रपटांबद्दल तर काय सांगावे? ” हम आपके है कौन” मधला ‘टफी ‘, “सच्चा झूठा” मधला ‘ मोती’, 

“माँ “मधील ‘डॉगी’, “बेताब “मधला ‘बोझो’, ” वॉटर” मधला ‘ काळू’ —  किती नाव सांगावीत तितकी 

कमीच !  या श्वानांचा अभिनय आपण हौसेने आणि आवडीने पाहतो ना!

पूर्वीचे मुंबई येथील श्वान शिक्षक श्री. शां ना दाते यांचा २५ वर्षे, चार श्वानांबरोबर सहवास होता. त्यांनी मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या ‘ प्रिन्स ‘ या कुत्र्यासह, मुलाखती आणि मार्गदर्शन केले होते. ‘ प्रिन्स ‘ चे अत्युत्तम काम असलेल्या  ” फुल और कलियाँ”” ( १९६० साली) या बोलपटाला पंतप्रधान पुरस्कार मिळाला. ते अभिमानाने सांगत असत की, “मी मोठा झालो नाही. ‘प्रिन्सने ‘, मला मोठं केलं.” तो स्वर्गवासी झाल्यानंतर त्याचा स्मरणविधीही ते करत असत.

पोलीस खात्यातील श्वान निवृत्तीनंतर कोणीही दत्तक घेऊ शकतात .गुन्हेशोधक ,बॉम्बशोधक ,नारकोटिक्स शोधक ,रेस्क्यू टीम, फॉरेस्ट, असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे श्वान पूर्ण प्रशिक्षित आणि लसीकरण केलेले असतात .रात्री गस्त घालणे, गुन्हेगारांना पकडणे, विमानतळ, गोद्या या ठिकाणी पहारा आणि तपासणी ,लपवून आणलेले मादक पदार्थ शोधणे, अशी कामे पोलीस दलातील श्वानांना करावी लागतात. काही वेळा पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, अशावेळी श्वान ते काम बिनचूक करतो. परदेशात काही ठिकाणी प्रेमापोटी कुत्र्याची स्मारकंही उभी केली गेली आहेत.

आमच्याच घरातल्या कुत्र्यांच्या इमानदारीचे किती कौतुक आणि अनुभव सांगावे तितके कमीच ! ओसाड रानात केवळ कुत्र्यांच्या जीवावर आम्ही निर्धास्तपणे राहत होतो. वेगवेगळ्या टोनमध्ये आवाज काढून कितीतरी साप, विंचू, अगदी चोरही त्यांनी पकडून दिले आहेत. न फिटणारे आणि अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावर ! कर्मयोग , ज्ञानयोग आणि भक्ती योगाच्या मार्गातून मी त्यांच्यातल्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते.

ही श्वानांची गौरव गाथा वाचताना काही जणांचे आक्षेपही असणार. निरपराध्यांना भटकी कुत्री चावतात, त्याचे काय? पण एक कुत्रा चावला तर उरलेल्या पंचवीस कुत्र्यांना मारून टाकायचे का? मारून टाकणे, हा त्यावरचा उपाय नव्हे. पोटाची भूक भागत नसेल तर ते आक्रमक होतात. कित्येक ग्रुप सध्या वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या जनावरांना खाद्य देण्याचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ त्यांची संख्या वाढू नये म्हणून, आकडा न सांगता प्रामाणिकपणे त्यांचे निर्बिजीकरण व्हायला हवे .कुत्रा पाळायचा असेल तर भटक्यातला पाळला ,तर एक जीव जगेल. आणि तुमच्यावर अनंत उपकार करेल.  श्वानांची ही गाथा कितीही लिहिली तरी न संपणारी आहे. ती अशीच कौतुकाची गाथा चालतच राहणार.

— समाप्त —

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

खरे तर त्याच मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता, प्रतीक्षा असते. दोन्ही कार्डांवर बारकाईने नजर टाकून तो वेटरला ऑर्डर देतो. थोड्या वेळाने तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि सोबत एका सुंदर तरुणीला घेऊन येतो. समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते. ‘हॅव ए गुड टाइम.. एन्जॉय !’ अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.

 टेबलावर ते दोघेच. अनोळखी. अपरिचित. काही क्षण नि:शब्द जातात. मग दोघेही एकमेकांचा परिचय करून देतात. या जुजबी ओळखीपाळखीनंतर ‘ति’च्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते. दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद हळुवारपणे रंगत जातो. उभयतांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगलेला असतानाच वेटर बिल घेऊन येतो. दोघांचाही हिरमोड होते. ‘पुन्हा भेटू’, म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेलबाहेर पडतो!

‘लिसनर’ नावाच्या शॉर्टफिल्मचे हे संक्षिप्त कथानक. जगभर ही फिल्म दाखविली गेली आणि तितकीच नावाजलीही गेली. ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता-अमेरिकेतील वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या ‘ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख. ‘संवाद हरवलेली कुटुंबं’ हा त्या लेखाचा विषय. अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या कपल्सवर आधारित. ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं (सोशल मीडिया) जन्माला आली तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष. या ‘लिसनर’ शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, जिथे तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं! मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात! ते तुमच्यात गुंतत नाहीत; पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून तासभर संवाद साधायला ‘गिऱ्हायकं’ येतील की नाही, याबाबत हाॅटेलमालक थोडे साशंक होते. पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली. बघता-बघता अशा प्रकारची ‘टॉक-टाइम’ हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली!

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान उंचावले, पण कामाचा ताण, नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं आपल्या घरात आहेत. ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही.

विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत. मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. विशेषत: कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमागे संवादाचा अभाव हे कारण असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचे एक प्रमुख लक्षण. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे, पण ऐकणारेच कुणी नाही, अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. हा कोंडमारा जीवघेणा ठरतो आहे. परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी वाचून आई-वडिलांना धक्काच बसला. त्याने लिहिले, ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय; पण तुम्ही ऐकूनच घेत नाही. माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं, समजून घेणारं नसेल तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’ या मुलाने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराने आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे! अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आपल्याकडेही येऊ घातली आहेच!

सारांश : बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा, कुठेतरी मन मोकळे करा. मित्र, मैत्रिणी असो की नातलग

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

जिम कार्बेट ते रानीखेत हे अंतर तसं कंटाळवाणं आहे. रानीखेत हे भारतीय लष्करातील नावाजलेल्या कुमाऊँ रेजिमेंटचं मुख्य ठिकाण आहे. रानीखेतमधील कुमाऊँ रेजिमेंटच्या म्युझियममध्ये भारतीय लष्करातील धाडसी, निधड्या छातीच्या वीरांची यशोगाथा बघायला मिळते. दोन परमवीर चक्र व तीन अशोक चक्राचे मानकरी यात आहेत. रानीखेतहून कौसानीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावर सारख्या उंचीचा काळपट हिरवा गालिचा पसरल्यासारखे चहाचे मळे आहेत. कौसानीला चहाची फॅक्टरी पाहिली. तिथे विकत घेतलेला चहा मात्र आपल्याला न आवडणारा गुळमुळीत चवीचा निघाला. रानीखेत- कौसानी रस्त्यावर जंगलामध्ये लाल बुरांस म्हणजे होडोडेंड्रॉन वृक्षाची लालबुंद फुलं सतत दिसतात. या फुलांच्या गोडसर सरबताचा उन्हाळ्यात औषधासारखा उपयोग होतो अशी माहिती मिळाली. कौसानीतल्या आमच्या हॉटेलच्या बगीच्यात किंबहुना  तिथल्या बहुतांश बगीच्यात , हॉटेलात शोभेच्या जाड पानांची अनेक झाडे, कॅक्टसचे वेगवेगळे शोभिवंत प्रकार होते. यातील एका प्रकारच्या कॅक्टसच्या खोडांचा पल्प काढून त्यापासून प्लायवुड बनविले जाते असे तिथल्या हॉटेल मॅनेजरने सांगितले.

‘पृथ्वीचा मानदंड’ असे ज्याचे सार्थ वर्णन कवी कुलगुरू कालिदासाने केले आहे तो ‘हिमालयो नाम नगाधिराज’ म्हणजे भारताला निसर्गाकडून मिळालेलं फार मोठं वरदान आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल या साऱ्यांना हिमालयाचा वरदहस्त लाभला आहे. अशा अफाट हिमालयाच्या उत्तुंग पहाड रांगांना वेगवेगळी नावे आहेत. धौलाधार, पीरपांजाल, कुमाऊँ ,गढवाल अशा विविध रांगांच्या अनंत हातांनी हिमालय आपल्याला बोलावत राहतो. एकदा हिमालयाच्या प्रेमात पडलं की अनेक वेळा तिथे जायचे योग येतात.

साधारण वीस- पंचवीस वर्षांपूर्वी चारधाम यात्रेचा बेत केला. हरिद्वारपासून हरिद्वारपर्यंत असं चारधाम प्रवासाचे बुकिंग गढवाल निगमतर्फे केलं होतं. यात्रा सुरू होण्याआधी चार दिवस डेहराडून एक्सप्रेसने डेहराडूनला पोहोचलो. डेहराडून ही उत्तराखंडाची राजधानी गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यात वसली आहे. भरपूर पाऊस, आकाशाला भिडणारे वृक्ष, डोंगरउतारावरची छोटी छोटी घरं, नाना रंगांची फुलझाडं असणाऱ्या डेहराडूनमध्ये अनेक नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी, पेट्रोलियम रिसर्च इन्स्टिट्यूट, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जीऑलॉजी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट अशा संस्था तसेच लष्कराला अनेक प्रकारचे साहित्य पुरविणारी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. आम्हाला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बघायला मिळाली. तिथे पुरातन मजबूत वृक्षांचे ओंडके गोल कापून ठेवले होते. त्या खोडांच्या अंतरेर्षांवरून त्या झाडाचं वय कितीशे वर्ष आहे, त्याचे उपयोग, सध्या या जातीचे किती वृक्ष आहेत अशी माहिती तिथे सांगितली.

तिथून मसुरीला गेलो. साधारण साडेसहा हजार फुटावरील मसुरीला हिल स्टेशन्सची राणी म्हणतात. स्क्रूसारख्या वळणावळणांचा मसुरीचा रस्ता केव्हा एकदा संपतो असं झालं होतं. डोंगरकपारीतली एकावर एक वसलेली चढती घरे पाहत मसुरीला पोहोचलो. मसूरी हेसुद्धा शैक्षणिक व औद्योगिक केंद्र आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) मधील यशस्वी उमेदवारांना इथे ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’मध्ये ट्रेनिंग दिलं जातं. सुप्रसिद्ध डून स्कूल तसेच मोठी ॲग्रीकल्चर यूनिव्हर्सिटी आहे. रोपवेने गनहिलला गेलो. इथून संपूर्ण मसुरी, डून व्हॅली व दूरवर हिमालयाच्या शिवालिक रेंजेस दिसतात. मसुरीला मोठे बगीचे व मासेमारीसाठी तलाव आहेत. इथून हिमालयातील लहान- मोठ्या ट्रेकिंगच्या मोहिमा सुरू होतात. त्यांचे बेस कॅम्पस् व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथे आहे. आमचे सीडार लॉज खूप उंचावर होते. सभोवती घनदाट देवदार वृक्षांचे कडे होते. मसुरीहून दुसऱ्या दिवशी केम्प्टी फॉल्स बघायला गेलो. गोल गोल वळणांच्या रस्त्याने दरीच्या तळाशी पोहोचलो. खूप उंचावरून धबधबा कोसळत होता. त्याच्या थंडगार तुषारांनी सचैल स्नान झाले. हौशी प्रवाशांची गर्दी मुक्त मनाने निसर्गाच्या शॉवरबाथचाआनंद घेत होती.

मसुरीहून हरिद्वारला मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला गेलो. तिथल्या झुलत्या पुलावरून पलीकडे गेल्यावर अनेक आश्रम होते. साधू, बैरागी, शेंडी ठेवलेले परदेशी साधक यांची तिथे गर्दी होती. इथे गंगेच्या खळाळत्या थंडगार पाण्याला खूप ओढ आहे. गंगाघाटाच्या कडेने बांधलेल्या लोखंडी साखळीला धरून गंगास्नानाचा आनंद घेतला. संध्याकाळी हरिद्वारला गंगेच्या घाटावर आरती करून दीप पूजा केली.

उत्तराखंड भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 महादेव साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र दी जाएगी। 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि –   ??

 

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साक्षात्कार ☆ फिल्मों में सफलता के बावजूद थियेटर की जिद्द बरकार : हिमानी शिवपुरी ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ साक्षात्कार ☆ फिल्मों में सफलता के बावजूद थियेटर की जिद्द बरकार : हिमानी शिवपुरी ☆ श्री कमलेश भारतीय ☆

हम आपके हैं कौन, दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, परदेस जैसी अनेक सफल फिल्मों  की अभिनेत्री हिमानी शिवपुरी की थियेटर की जिद्द अभी तक बरकरार है । वे सिर्फ थियेटर ही करना चाहती थीं और इसके लिए अमेरिका में पढ़ाई के लिये स्कॉलरशिप मिलने के बावजूद एनएसडी में दाखिला लेकर दुनिया की नजर में अपने सुनहरे करियर को उस समय बर्बाद कर लिया ! अब भी हिमानी 22 फरवरी को दिल्ली के कमानी ऑडिटोरियम में ‘जीना इसी का नाम है ‘नाटक मंचन करने आ रही हैं, जो सिर्फ दो पात्रों वाला नाटक है और दूसरे पात्र हैं प्रसिद्ध एक्टर राजेंद्र गुप्ता !

हिमानी शिवपुरी मूलतः देहरादून की रहने वाली हैं और प्रसिद्ध लेखक डाॅ हरिदत्त भट्ट शैलेश की बेटी हैं । दून स्कूल,देहरादून की छात्रा रहते ही डांस व थियेटर से जुड़ीं और फिर आजीवन यह जुड़ाव चला आ रहा है । डी ए वी काॅलेज , देहरादून से एम एस सी की और स्कॉलरशिप के आधार पर अमेरिका जाने की बजाय एनएसडी में थियेटर पढ़ने चली गयीं !

-यह खूबसूरत मोड़ कैसे आया ?

-जब स्कूल में डांस, डिबेट आदि में  परफाॅर्म करती थी तब हमारे हैडमास्टर साहब की पत्नी ने कहा था कि तुम्हें तो फिल्मों में जाना चाहिए ! हालांकि उन दिनों इस बात पर गौर नहीं किया । बात आई गयी हो गयी । जबकि साइंस की ब्रिलियंट छात्रा थी, अच्छे मार्क्स लेती लेकिन थियेटर से लगाव बराबर जारी रहा ! जैसे जैसे काॅलेज में थियेटर करने लगी तब बहुत मज़ा आने लगा और सोच लिया कि इसी क्षेत्र में जाना है मुझे !

-जब अमेरिका की बजाय एनएसडी जाने का फैसला किया तब परिवार में क्या प्रतिक्रिया रही ?

-परिवार में  जैसे हाय तौबा मच गयी ! बस एक पापा को छोड़कर सबने इसका विरोध किया कि स्कॉलरशिप छोड़कर , बढ़िया करियर छोड़कर यह क्या नौटंकी करने जा रही है ! यह क्या ड्रामा ड्रामा लगा रखा है ! मैंने पापा से कहा कि मेरे मन में यह मलाल न रहे कि थियेटर नहीं किया और पापा चल दिये मुझे एनएसडी में दाखिल करवाने ! आखिरी कोशिश जरूर की जब बी बी कारंत से कहा कि इसे समझाइए कि पहले अमेरिका जाये और फिर थियेटर करे ! इस पर कारंत जी ने कहा कि जब वह थियेटर करना चाहती हो तो करने दीजिए न ! फिर पापा दाखिल करवा कर चले गये !

-दिल्ली में कब तक रहीं ?

-लगभग दस साल ! कोर्स करने के बाद खुद्दारी के चलते छह सौ रुपये की एप्रेंटिसशिप की ! फिर रेपेट्री में आई, ए ग्रेड आर्टिस्ट बनी और यहीं ज्ञानदेव शिवपुरी से मुलाकात हुई, निकटता बढ़ी और हम एक साथ मुम्बई तक पहुंचे !

-पहला अवसर या पहली बार नोटिस कब लिया गया आपका ?

-पहला अवसर ‘हमराही’ में मिला दूरदर्शन पर ! देवकी भौजाई को सफल कैरेक्टर के रूप में चहुंओर प्रसिद्धि मिली ।

-फिर ?

-आप हैरान होंगे कि लेखक तो ज्यादातर मनोहर श्याम जोशी होते थे तो उन्होंने मुझे ‘हम लोग’ सीरियल में छुटकी के रोल का ऑफर दिया लेकिन मैंने कहा कि थियेटर नहीं छोड़ूंगी और यह रोल नहीं किया । फिर हमराही का ऑफर आया तब ज्ञानदेव जी ने कहा कि देख लो ! और फिर देवकी भौजाई की धूम मच गयी !

-मुम्बई कब गये ?

-सन् 1990 के आसपास ।

-देवकी भौजाई के बाद क्या ?

-यही हम भी सोच रहे थे कि अब क्या होगा ? हमराही तो खत्म हो गया । इस बीच बेटा भी हो गया । तभी सूरज बड़जात्या ने मुझे ‘हम आपके हैं कौन’  का रोल ऑफर किया ! हालांकि बीच में जीटीवी में ‘हसरतें’ सीरियल भी किया । बस हम आपके हैं कौन सुपरहिट रही और मैं भी चल निकली !

-आगे का सफर ?

-फिर तो दिल वाले दुल्हनिया , कुछ कुछ होता है जैसी फिल्मों में आई और ये फिल्में हिट रहीं और मुझे लक्की माना जाने लगा ! परदेस, उमराव जान , आ अब लौट चलें आदि अनेक फिल्मों में अवसर मिलता गया !

-जीना इसी का नाम है नाटक में क्या रोल है ?

-यह विदेशी नाटक का रुपांतरण है । दो वृद्धों के अकेलेपन पर आधारित जो संयोगवश इकट्ठे होते हैं और राजेंद्र गुप्ता इसमें डाॅक्टर के रोल में हैं जहां हैल्थ रिवाइनिंग सेंटर में मैं जाती हूं पेशेंट जैसी ! परिस्थितियोंवश हम निकट आते हैं और एक दूसरे के अकेलेपन को महसूस करते हैं ! यह आज के समाज की बहुत बडी समस्या भी है और सच्चाई भी ! अभी पटना में मन्नू भंडारी की कहानियों पर भी मंचन करके आई हूं !

-देहरादून को कितना याद करती हैं ?

-बहुत बहुत मिस करती हूं देहरादून को । जब दिल्ली रही तब तक रोडवेज की बस में हर वीकेंड पर देहरादून पहुंच जाती थी । फिर पापा की पहली बरसी पर उनकी कहानी ‘सुनहरी सपने’ पर नाटक मंचन करने गयी थी । अब भी साल में दो तीन बार तो देहरादून जाना हो ही जाता है ! अब भी दिल्ली में नाटक के बाद देहरादून जाऊंगी !

-कौन सी एक्ट्रेस पसंद ?

-ऐसे कोई आइडिया नहीं लेकिन डांसर थी तो वहीदा रहमान बहुत अच्छी लगती थीं । बलराज साहनी और फिर डांस के चलते ही माधुरी दीक्षित भी । यहां तक कि कंगना रानौत भी !

-वह भी आपकी तरह पहाड़ से है , हिमाचल से !

-जी ।

-पसंदीदा नाटक ?

-कृष्णा सोबती के उपन्यास ‘मित्रो मरजानी’ पर आधारित नाटक जिसकी नायिका उस जमाने से आगे काफी बोल्ड थी लेकिन वह अद्भुत नाटक था । खुद कृष्णा सोबती देखने आईं और गले लगा कर कहा कि तुमने तो मेरी मित्रो को जीवंत कर दिखाया !

-परिवार के बारे में कुछ ?

-ज्ञानदेव शिवपुरी जी का निधन तब हुआ जब ‘दिल वाले दुल्हनिया’ का क्लाईमेक्स शूट होने जा रहा था और आप देखेंगे उसमें मैं नहीं हूं ! एक बेटा है कात्यायन जो फिल्म निर्देशन से जुड़ा है और शाॅर्ट फिल्में भी बनाता है !

-किन निर्देशकों के साथ कैसा लगा ?

-सूरज बड़जात्या बहुत प्यारे डायरेक्टर और कम बोलने वाले जबकि करण जौहर खूब बोलते हैं । डेविड धवन डायरेक्टर के तौर पर पूरी छूट देते हैं । उनके और गोविंदा के साथ बीबी नम्बर वन और हीरो नम्बर वन करके मजा आ गया ।

-कोई पुरस्कार ?

-अनेक । संगीत नाटक अकादमी अवाॅर्ड, श्रीकांत वर्मा स्मृति अवाॅर्ड, महाराष्ट्र सरकार सम्मान , उत्तराखंड गौरव और टीवी में आईटीए अवाॅर्ड, कलर्स अवाॅर्ड और ऑल इंडिया जर्नलिस्ट अवाॅर्ड सहित अनेक सम्मान !

-लक्ष्य ?

-थियेटर की जिद्द व सार्थक फिल्में ।

हमारी अनंत शुभकामनाएं हिमानी शिवपुरी को !

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 70 – गीत – हो सके तो स्वार्थ… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  गीत “हो सके तो स्वार्थ”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 70 – गीत – हो सके तो स्वार्थ… ☆

हो सके तो स्वार्थ, नफरत को जलाओ ।

फूल-सी मुस्कान, अधरों पर सजाओ ।।

 

राह में आती मुसीबत सर्वदा है,

पार करना यह हमारी भी अदा है।

लोग हों निर्भीक पथ ऐसा बनाओ।

फूल-सी मुस्कान अधरों पर सजाओ।।

 

जिंदगी कितने दुखों में जी रही है।

और दुख के घूँट कितने पी रही है।

दुश्मनों की आँधियों से लड़ रहे जो।

हो सके तो हाथ कुछ अपने बढ़ाओ,

 

खिंचतीं जातीं हैं दीवारें देश में ,

खुद गईं हैं खाइयाँ अब परिवेश में।

भारती-संस्कृति को अपनी न भुलाओ,

जो भरा है द्वेष दिल में वह हटाओ।

 

तिमिर छाया है घना, चहुँ ओर देखो,

मौत के पंजे फँसी है भोर देखो।

इस घड़ी में कुछ नया करके दिखाओ,

फूल-सी मुस्कान अधरों में सजाओ।।

 

जो समय के साथ आगे नित बढ़ेगा,

मंजिलों की सीढ़ियाँ निर्भय चढ़ेगा।

प्रगति के हर द्वार को मिलकर बनाओ,

फूल-सी मुस्कान अधरों पर सजाओ।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस पर-☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 महादेव साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र दी जाएगी  💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस पर-🍁??

🙏अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस पर देखिए विभिन्न भाषाओं की कविताओं पर आधारित हमारा आयोजन, भाषा कभी बाँधती नहीं🙏

आज अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस है। विभाजन के बाद पाकिस्तान ने उर्दू को अपनी राजभाषा घोषित किया था। पूर्वी पाकिस्तान (आज का बांग्लादेश) बांग्लाभाषी था। वहाँ छात्रों ने बांग्ला को द्वितीय राजभाषा का स्थान देने के लिए मोर्चा निकाला। बदले में उन्हें गोलियाँ मिली। इस घटना ने तूल पकड़ा। बाद में 1971 में भारत की सहायता से बांग्लादेश स्वतंत्र राष्ट्र बन गया।

1952 की घटना के परिप्रेक्ष्य में 1999 में यूनेस्को ने 21 फरवरी को अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित किया।

आज का दिन हर भाषा के सम्मान , बहुभाषावाद एवं बहुसांस्कृतिक समन्वय के संकल्प के प्रति स्वयं को समर्पित करने का है।

मातृभाषा मनुष्य के सर्वांगीण विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। मातृभाषा की जड़ों में उस भूभाग की लोकसंस्कृति होती है। इस तरह भाषा के माध्यम से संस्कृति का जतन और प्रसार भी होता है। भारतेंदु जी के शब्दों में, ‘ निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल/ बिन निज भाषा ज्ञान के, मिटत न हिय को सूल।’

हृदय के शूल को मिटाने के लिए हम मातृभाषा में आरंभिक शिक्षा की मांग और समर्थन सदैव करते रहे। आनंद की बात है कि करोड़ों भारतीयों की इस मांग और प्राकृतिक अधिकार को पहली बार भारत सरकार ने शिक्षानीति में सम्मिलित किया। नयी शिक्षानीति आम भारतीयों और भाषाविदों-भाषाप्रेमियों की इच्छा का दस्तावेज़ीकरण है। हम सबको इस नीति के क्रियान्वयन से अपरिमित आशाएँ हैं।

विश्वास है कि यह संकल्प दिवस, आनेवाले समय में सिद्धि दिवस के रूप में मनाया जाएगा। अपेक्षा है कि भारतीय भाषाओं के संवर्धन एवं प्रसार के लिए हम सब अखंड कार्य करते करें। सभी मित्रों को शुभकामनाएँ।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार, पुणे

सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Eternal Peace… ☆ Mr. M S Manuraj ☆

?~ Eternal Peace… ~?? ☆ Mr. M S Manuraj ☆

(Mr. M S Manuraj is a professional Helicopter Pilot with a passion for writing and reading. Whilst flying is close to his heart, he fills his soul from the surrounds of the pen and books. Here is one from ‘max’, a mild venture into the realm of spirituality.)

 

The seeker and the sought

    As the mind and soul fought

Lost in wandering thought

    Never was happiness brought

 

He, residing within, is heightened

    Kindles the joy with heart lightened

Bending the mind towards the soul

As the path of dharma, ain’t no foul

 

O’ seeker, I am eternally within you

    I’m full, I’m empty, I’m the absolute

Leave all desire, with Me within

    Tat-tvam-asi,  as  I’m  the resolute 

 

Eternal peace, with radiant mien

    As the Lord resides within the sapien

God’s blesses all creatures here below

   Throughout the world where’re they go!

 

© M S Manuraj

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar ≈ Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares