(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है “विश्वास पर दोहे…”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ भारताचा प्रजासत्ताक दिन व महत्व… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
आला आला दिन सोनियांचा
प्रजासत्ताक दिन बहुमोलाचा
खरेच भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिन हा दिन म्हणजे भारतीय इतिहासाचे एक सुवर्ण दालन.
दिडशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर आमच्या भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन तोडल्या.भारत मातेच्या म्लान मुखावर चे करूण अश्रू त्यांना पाहवले गेले नाही. ते देशभक्त भारत मातेला म्हणाले. कुसुमाग्रजांच्या शब्दात
“कशास आई भिजविली डोळे
उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल”
खरोखरच देशभक्तांच्या अविरत व भगिरथ प्रयत्नांनी 15 आगस्ट 1947 ला भारतमाता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्याच्या तेजाने तिचे मुख मंडल उजळले.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार केली. व 26 जानेवारी जा 1950 पासून तिची अंमलबजावणी झाली. 26 जानेवारी हाच आपला प्रजासत्ताक दिन होय. हयाला गणराज्य दिन व इंग्रजीत Republic day असे म्हणतात. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.
एकाधिकार नाही, हुकूमशाही नाही, राजेशाही नाही. हा दिन स्वतंत्र भारताचा मानबिंदू तर आहेच पण राष्ट्रीय सण आहे. मोठया उत्साहाने, जोमाने, दिव्यांची रोषणाई करण्यात येते. तिरंगा मोठ्या दिमाखात डोलत असतो. प्रेसिडेंटचे भारत वासियांना उद्येशून भाषण होते.देशभक्तीपर गीतांनी आसमंत भारावला जातो.
स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन आज 74वर्षाचा झाला आहे. आजपर्यंत च्या कालावधीचा विचार केल्यास, सिंहावलोकन केल्यास आपल्या ला कळेल खरेच आपला देश प्रगत देशात का समर्थ नाही?
देशापुढै आज निरनिराळ्या समस्या मगरी सारख्या मागे लागल्या आहे. अंतस्थ व बाह्य शत्रूंची चुरस लागली आहे.देशाची एकता भंग पावली जणू. स्वार्थ, भ्रष्टाचार, देशद्रोही वृत्ती सतत वाढत आहे.
भौतिक समस्या, नैसर्गिक समस्या, वैज्ञानिक समस्या, आरोग्यविषयक समस्यांचे डोंगर वाढत आहे.
पूर्वजांनी कमावलेल्या स्वातंत्र्याची व देशभक्तांची जाण असणे हे स्वतंत्र भारताच्या नागरिकांचे व मतदारांचे मुख्य कर्तव्य आहे. घटनेने आपल्याला हक्क दिले म्हणजे कर्तव्य आलीच.
प्रो.लाॉस्की यांच्या मताप्रमाणे हक्क व कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आजचे तरुण हे उद्याचे देश निर्माते आहेत. प्रकर्षाने त्यांनी प्रजासत्ताक दिनाचा मतितार्थ समजून वागल्यास पुढला अनर्थ टळला जाईल. मला देशाने काय दिले हे म्हणण्यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे नव्हे काय?
प्रजासत्ताक दिन योग्य अर्थाने साजरा करायचा असेल तर मतदार व सुजाण नागरिकांनी देशहिताचा विचार केला पाहिजे. poverty in the land of plenty हे अजुनहीआहे. याचा विचार केला पाहिजे. सेतू बांधायला एक एक दगड लागला.
दुसऱ्या महायुध्दात हिरोशिमा व नागासाकी ह्यांची काय गत झाली हे सर्व श्रृत आहे.हा देशभक्तीचा विजय आहे.
भारताचे प्रजासत्ताक यशस्वी होण्यासाठी जाज्वल्य देशाभिमान जागृत असण्याची गरज आहे.
“साथी हाथ बढाना” या गीताची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
सरतेशेवटी
चमका बनकर अमन का तारा
प्रेम की धरती देश हमारा
जय जय हिंदुस्थान, जय जय गणराज्य दिन
स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून शुभेच्छा व्यक्त करते प्रजासत्ताक दिन चिरायू होवो या अपेक्षेत लिखाणाला विराम देते.🌷
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तो परत आला होता? – भाग 1 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर☆
१९६५ मधे मी २३ वर्षाचा होतो. भाषा आणि साहित्य या विषयाचा शिक्षक होण्यासाठी मी शिकत होतो. त्या वर्षी, वसंताचा गंध सप्टेंबरमध्येच हवेत दरवळू लागला होता. एका सकाळी, खरं तर पहाटेच म्हंटलं पाहिजे, मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. आमची बहुमजली इमारत होती आणि मी सहाव्या मजल्यावर रहात होतो. मी थोडासा आळसावलो होतो आणि थोड्या थोड्या वेळाने खिडकीतून बाहेर बघत होतो. तिथून मला आमची गल्ली दिसत होती. आणि रस्त्यावरच्या फूटपाथच्या बगलेत मला म्हातार्या डॉन सिज़ेरियोचा बगीचा दिसत होता. त्यात भरपूर खत घातलेलं होतं. त्याचं घर गल्लीच्या कोपर्यावर तिरकं असं होतं. त्यामुळे त्याचं घर कसल्या तरी अनियमित आकाराचं पंचकोनी असं काही तरी दिसत होतं.
डॉन सिज़ेरियोच्या घराच्या बगलेत बर्नेस्कोनी परिवाराचं सुंदर घर होतं. ते सगळे अतिशय चांगले, उदार, हवेहवेसे वाटणारे लोक होते. त्याला तीन मुली होत्या आणि मी, त्यांची सगळ्यात मोठी मुलगी एड्रियाना हिच्यावर प्रेम करत होतो. अधून मधून मी त्याच्या घराकडे जाणार्या रस्त्याकडे बघत होतो. अर्थात इतक्या सकाळी सकाळी एड्रियाना दिसण्याची शक्यता नव्हतीच.
गल्लीत आता कोणीच नव्हतं त्यामुळे माझं लक्ष आपोआप त्या माणसाकडे गेलं. घरांच्या पुढच्या रस्त्यावर तो दिसत होता. तो आमच्या सोसायटीकडेच येत होता. हा रस्ता डॉन सिज़ेरियो आणि बर्नेस्कोनीच्या घराच्या समोरून जात होता. माझं त्याच्याकडे आपसूकच लक्ष गेलं. तो कुणीतरी भिकारी किंवा भटक्या असावा. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या चिंध्यात तो लपेटलेला होता.
तो दाढीवाला माणूस अतिशय अशक्त आणि दुबळा दिसत होता. त्याने एक मोडकी तोडकी कडब्याची टोपी घातली होती. उकडत असतांनाही त्याने धूसर रंगाचा एक फाटका ओव्हरकोट घातला होता. त्याचबरोबर त्याच्याकडे एक घाणेरडी झोळी होती. माझा अंदाज होता, की त्या झोळीत भीक म्हणून मिळालेल्या गोष्टी किंवा इकडे तिकडे मिळालेल्या खाण्याच्या वस्तू तो ठेवत असणार.
मी त्याच्याकडे बघत होतो. तो भिकारी डॉन सिज़ेरियोच्या घराच्या समोर थांबला आणि लोखंडी कुंपणातून त्याने घरमालकाला काही तरी भीक देण्याचा आग्रह केला. म्हातारा डॉन सिज़ेरियो एक कंजूष माणूस होता. त्याचे एकूणच व्यक्तिमत्व अप्रीय, तिरस्कार निर्माण करणारं होतं. भिकार्याकडे न बघता , त्यांनी हातानेच त्याला निघून जाण्याची खूण केली. भिकारी मंद आवाजात त्याला सतत काही तरी देण्याविषयी आर्जव करत होता. इतक्यात मी त्या म्हातार्या माणसाच्या ओरडण्याचा आवाज स्पष्ट ऐकला,
‘मला त्रास देऊ नको. चालता हो इथून…’
तरीही तो भिकारी सारखा आग्रह करत राहिला. तो दगडाच्या तीन पायर्या चढला आणि ते लोखंडी फाटक उघडण्याचा प्रयत्न करू लागला. डॉन सिज़ेरियोच्या सहनशक्तीचा आता अंत झाला. ते पुढे झाले आणि त्यांनी त्या भिकार्याला जोरात धक्का दिला. भिकारी ओल्या पायरीवरून घसरला. त्याने फटकाची लोखंडी सळी पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर धडाम असा जोरदार आवाज आला. तो फरशीवर उताणा पडला. त्याचे पाय आकाशाकडे उठलेले मला दिसले. त्या क्षणार्धात दगडाच्या पहिल्या पायरीला धडकून, त्याचं डोकं फुटलल्याचा आवाज मी ऐकला. डॉन सिज़ेरियो पळत पळत बाहेर आला. जमिनीवर पडलेल्या भिकार्यावर तो झुकला. त्याच्या हृदयाची धडधड ऐकण्याचा त्याने प्रयत्न केला. ती त्याला ऐकू आली नाही. मग डॉन सिज़ेरियो घाबरला. त्याने हाताच्या पंजाने त्या भिकार्याला पकडून दुसर्या टोकाला दगडांजवळ ओढत नेले. मग घरात जाऊन घराचे दार लावून टाकले. त्याच्या अनैतिक अपराधाचा कोणी साक्षी नाही, यबद्दल तो आश्वस्त होता. पण साक्षीदार मी होतो. लवकरच त्या बाजूने जाणारा एक माणूस त्या शवाजवळ थांबला. मग हळू हळू अनेक लोक तिथे जमा झाले. आणि तोपर्यंत पोलीसही तिथे पोचले. त्या मृत भिकार्याला अॅम्ब्युलंसमध्ये घालून घेऊन गेले. ही गोष्ट इथेच संपली आणि यावर नंतर कुणीही काहीही बोलले नाही.
माझ्याबद्दल बोलायचं झालं, तर या घटनेबद्दल मी अतिशय सावध होतो आणि मी माझं तोंड कधीही उघडलं नाही. कदाचीत माझं वागणं चुकीचं असू शकेल पण त्या म्हातार्यावर दोषारोप ठेवून मला काय मिळणार होतं? त्याने माझं कधीच काही बिघडवलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा इरादा त्या भिकार्याला जीवे मारण्याचा मुळीच नव्हता. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी त्याला कोर्टात चकरा मारायला लागण्याचे कष्ट पडावेत, हे मला उचित वाटलं नाही. मला वाटलं, त्याला त्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत एकटंच सोडावं.
हळू हळू ती घटना मी विसरून गेलो. पण जेव्हा जेव्हा मी डॉन सिज़ेरियोला बघतो, तेव्हा तेव्हा मला अजब अशी अनुभूती येते. त्याला ही गोष्ट माहीत नाही, की या सार्या दुनियेत मी असा एकमेव माणूस आहे, की जो त्याचं भयानक रहस्य जाणून आहे. तेव्हापासून का कुणास ठाऊक, मी त्याच्यापासून दूर राहायला लागलो आणि त्याच्याशी बोलण्याची मी कधीच हिंमत केली नाही.
*** *** *** *** *** ***
हळू हळू मी ही घटना विसरत चाललो, पण जेव्हा जेव्हा डॉन सिज़ेरियो मला दिसतो, तेव्हा तेव्हा, मला एक अजब अशी अनुभूती होते की सार्या दुनियेत, मी असा एकमात्र माणूस आहे, जो त्याचं भयानक असं रहस्य जाणून आहे
*** *** *** *** *** ***
१९६९मधे मी २६ वर्षाचा झालो. मी एव्हाना स्पॅनिश भाषा आणि साहित्य यात डिग्री मिळवली होती. एड्रियाना बर्नेस्कोनीने माझ्याशी नाही, अन्य कुणाशी विवाह केला होता. ती व्यक्ती तिच्या योग्य होती की नाही, मी प्रेम करत होतो, तेवढंच प्रेम तीही व्यक्ती तिच्यावर करत होती की नाही, कुणास ठाऊक? त्या वेळी एड्रियाना गर्भवती होती आणि तिने केव्हाही बाळाला जन्म दिला असता. ती आताही पहिल्यासारखी त्याच सुंदर घरात रहात होती आणि दररोज, पाहिल्यापेक्षा जास्तच सुंदर दिसत होती. सकाळी लवकर मी काही मुलांना व्याकरण शिकवून येणार्या परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेत होतो. सवयीनुसार मी रस्त्याच्या पलिकडे एक उदास दृष्टिक्षेप टाकत असायचो.
त्या दिवशी अचानक माझं काळीज जोरजोराने धडधडू लागलं. मला वाटलं, मला दृष्टिभ्रम झालाय. तीन-चार वर्षापूर्वीचा तो भिकारी, ज्याला डॉन सिज़ेरियो ने धक्का देऊन मारून टाकलं होतं, तो त्याच रस्त्यावरून चालत येत होता. त्याच चिंध्यात लपेटलेला. एक फटका ओव्हरकोट त्याच्या अंगावर होता. कडब्याने बनवलेली एक मोडकी –तुटकी टोपी त्याच्या डोक्यावर होती आणि त्याच्या हातात एक घाणेरडी झोळी होती.
आपल्या विद्यार्थ्यांना विसरून मी खिडकीशी पोचलो. त्याची गती मंद झाली. तो आपल्या अपेक्षित इमारतीशी पोचणारच होता.
‘अरे, तो मृत भिकारी पुन्हा जिवंत झाला—‘ मी विचार करू लागलो. ‘डॉन सिज़ेरियोचा बदला घेण्यासाठी आला की काय?’ पण तो डॉन सिज़ेरियोच्या फटकापासून पुढे गेला. मग तो, एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरासमोरच्या फटकाशी थांबला. मग तो फाटक उघडून आत गेला.
‘मी आलोच इतक्यात…’ असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी लिफ्टने खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो.
क्रमश: भाग १
मूळ लॅटिन कथा – मूळ लेखक फ़र्नांडो सोर्रेंटीनो
हिन्दी अनुवाद – वापसी – हिन्दी अनुवादक – श्री सुशांत सुप्रिय
मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(हे सूक्त व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ ! नथ एक सौंदर्य आभुषण ! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
पारंपरिक स्त्री अलंकार आभुषणात नथीचा थाट न्याराच असतो. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत विवाहच्या वेळी सालंकृत कन्यादान करतांना पायाच्या बोटातील जोडवी पासून डोक्यावरच्या बिंदीपर्यंत सर्व प्रकारच्या विविध नक्षी कलाबुतीने सजलेले अलंकार नि आभुषणाने नटलेली चि.सौ.का. आपण पाहात आलो आहोत. यात नाकातील नथ हा आगळा वेगळा आकाराने छोटेखानी पण तितकाच तो नाजूक नजाकतीने घडवलेला दागिना ,तो त्या स्त्रीच्या सौंदर्यात भरच घालतो. काही वेळा असाही प्रश्न पडतो की नथीमुळे सौंदर्य खुलले आहे कि मुळच्या स्त्री सौंदर्याने नथीची शोभा वाढली. थोडसं खट्याळ पणे बोलण्याची मुभा घेतली तर असं म्हणता येईल की नाक कसे का असेना… चपटं,नकटं,बसकं,बाकदार, धारदार, अपरं, चाफेकळी, वगैरे वगैरे….चेहऱ्याचा रंग कुठला का असेना…गौरवर्ण, गहूवर्ण,काळासावळा, ….पण नाकात ती अडकवलेली नथ मात्र तो चेहरा छान सजवून टाकतो…
नथीचा तो आकडा,एक सोनेरी तार आणि त्यात जडावलेले ते नाजूक लोभस मोती, हिरे,निलमणी,त्यांना एकमेकांना बांधून घेणारे ते छोटे छोटे लाल पिवळे मणी आणि सर्वात मेरु म्हणजे चमचम करणारा तो पाचुचा डाळिंबी वा हिरा म्हणजे क्या कहना ?…
स्त्रियांचा मुळात नटण्यामुरडण्या चा स्थायीभाव आहे. तशातच नाकातील नथीमुळे भर पडली नाही तरच नवल. मुरकणे म्हणजे काय असते स्त्रियांना सांगावे लागत नाही पण नाकातील नथीचा तो लडिवाळ मारलेला मुरका बघून ….
तसे बघायला गेलं तर नथीसाठी आधी नाक टोचून घेणं आवश्यक ठरतं.. नाजूक नजाकतीच्या सौंदर्याखाली सुद्धा एक वेदना दडलेली असते पण ती आनंददायी असते.. आता आजकाल चापाच्या सुद्धा नथ बाजारात उपलब्ध आहेत…नथीचं वजन हलकं असलेलं पाहिले जातं म्हणून तर नाकाला झेपेल इतकेच मोती, पाचूची जडणघडण बघतली जाते नाहीतर नाका पेक्षा मोती जड झाला तर नाक ओघळले म्हणून समजा…आणि ही म्हण रुढ झाली..
…तिकडे उत्तर भारतात नथीनी ,राजस्थान मेवाडात मोठ्या रिंगा असलेले नथीचे प्रकार प्रचलित आहेत…और क्या सौंदर्य खुल जाता है..?
…मला वाटतं आता नथ पुराणास पूर्ण विराम द्यावा .नाहीत तर तुम्ही म्हणाल एव्हढा नथीतुन तीर मारून आम्हाला नवीन ते काय सांगितले?…
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “भाषा का विज्ञान”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 132 ☆
☆ भाषा का विज्ञान☆
मन की बात को समझने हेतु नयनों को पढ़ना जरूरी होता है। दिमाग में क्या चल रहा है, इसे माइंडरीडर आसानी से बता देते हैं। मौन जब मुखरित होता है तो अनकहा भी सुनाई देने लगता है। जरा सोचिए सुनने- सुनाने से क्या होगा? आपको समाधान की ओर जाना चाहिए। हम आसानी से दूसरों के मन को समझ लेते हैं, किंतु कहीं वो कुछ माँगने न लगे इसलिए जान बूझ कर अनजान बनने का नाटक करते हैं।
अब सोचिए कि क्या जरूरत है सब के विचारों को पढ़ने की? हम स्वयं को समझे बिना सब को ज्ञान बाँटने चल देते हैं। देखा- अनदेखा सब कुछ नजर अंदाज करते हुए व्यर्थ का गाल बजाने लगते हैं। हर तर्क विज्ञान की कसौटी पर कसा जा सकता है बस प्रयोगशाला कैसी होगी इसका ध्यान जरूर रखना चाहिए।
मन के भावों को शब्दों से व्यक्त करना उतना आसान नहीं होता जितना हाव- भाव को देखकर समझना सरल होता है। हर चेहरा मुस्कराए इसके लिए एक ही उपाय लागू नहीं किया जा सकता है। जैसे हर मर्ज की दवा अलग- अलग होती है, वैसे ही मनोभाव आवश्यकता अनुसार बदलते रहते हैं। जिसको जिस तरीके से समझ में आए वैसा समझाने में कोई हर्ज नहीं होना चाहिए।
धर्म की कसौटी पर खुद को परखना बहुत सरल होता है, क्योंकि जब से समझ शुरू होती है, हम कोई न कोई विचारधारा के साथ जुड़ते चले जाते हैं। श्रद्धा और विश्वास के सहारे अपने सभी कार्यों को प्रार्थना द्वारा आसानी से पूर्ण करते जाते हैं। बस यहीं से हमारी आस्था धार्मिक विचारों के प्रति सुदृढ़ होती जाती है। क्या फर्क पड़ता है कि हम किस तरह से स्वयं को विकसित कर पाते हैं? जो भी हमें मानसिक सुकून दे उस भाषा को पढ़ना, समझना आना ये भी तो एक कला है। सच्चाई के साथ जुड़कर सर्वमंगल का भाव रखते हुए कार्यों को करते कराते रहें एक न एक दिन सत्य सब को समझ में आएगा।