भारतीय इतिहासात ‛विजयनगर साम्राज्य’ असे म्हटले की साहित्य- कला- संस्कृती- पराक्रम अशा वेगवेगळ्या आयामानी परिपूर्ण संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. विजयनगरची राजसत्ता मुस्लिम आक्रमणे रोखून धरण्यास यशस्वी ठरली. त्यामुळे या काळात हिंदू संस्कृतीचा सर्वांगीण विकास झाला. म्हणूनच भारतीय संस्कृती व कलांचा हा भरभराटीचा काळ मानला जातो. साहित्याच्या विशेषतः संस्कृत भाषेच्या दृष्टीनेही हा सुवर्णकाळ मानला जातो. स्त्री- पुरुषांना शिक्षणाच्या पण समान संधी होत्या. त्यामुळे पुरुषलेखकांच्या बरोबरीनेच या काळात स्त्री लेखिकांनीही साहित्यक्षेत्रात आपले उत्तम योगदान दिलेले दिसून येते. चौदाव्या शतकातील कम्परायण याची पत्नी गंगादेवी, सोळाव्या शतकात अच्युतराय याची पत्नी तिरुमलांबा यांची नावे प्रामुख्याने यात घ्यावी लागतील. यातील गंगादेवीचा परिचय आपण या लेखात करून घेणार आहोत.
गंगादेवीच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ती सामान्य परिवारात जन्मली असे काही इतिहासकार सांगतात. ती धर्मशास्त्र, पुराण, न्यायशास्त्र, नीतीशास्त्र आणि संगीतशास्त्रात प्रवीण होती. तिच्या या पांडीत्यावरच खुश होऊन राजा कम्परायण यांनी तिच्याशी विवाह केला. एकदा पतीबरोबर ती युद्धासाठी दक्षिणेकडे गेली. त्या युद्धाचे आणि विजयाचे वर्णन करणारे ‘मधुराविजयम् ‘ हे काव्य गंगादेवीने संस्कृत भाषेत लिहिले.
या काव्याचा अभ्यास करतानाच आपोआप गंगादेवीचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता लक्षात येते. या काव्यात एकूण नऊ सर्ग आहेत. त्यात तिने कवी वाल्मिकी, कवी कालिदास अशा कवींना वंदन करून काव्याची सुरुवात केली आहे. त्यातून तिचा या सर्व कवींच्या साहित्याचा अभ्यास होता असे लक्षात येते.
संस्कृत भाषेत काव्यशैलीचे प्रकार आहेत. त्यातील वैदर्भीय या प्रकारात तिचे काव्य मोडते. शिवाय उपमा, अलंकार यांनी नटलेले पण सुबोध, सरल पदानी युक्त अशी तिची रचना आहे. त्यामुळे तिचा व्याकरणाचा अभ्यासही परिपूर्ण होता.
सूर्योदय, चंद्रोदय, जलचक्र, सहा ऋतूंचे वर्णन, तुंगभद्रा नदीचे वर्णन यातून तिचा भूगोलाचा अभ्यास दिसून येतो आणि कवी कालिदासाचाही थोडाफार प्रभाव तिच्यावर असावा असे वाटते.
पहिल्या काही अध्यायात गंगादेवी विजयनगर साम्राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजा बुक्क याचे उत्कृष्ट राज्यशासन, कुमार कंपन्नाचे बालपण आणि प्रारंभिक जीवनाचे वर्णन केले आहे. पुढच्या काही अध्यायात त्याच्या दक्षिणेकडील आक्रमणाचे आणि कांचीपुरम् च्या विजयाचे वर्णन आहे. आपले काव्य हे एक ऐतिहासिक पुरावा असेल याची जाणीव असल्यामुळे गंगादेवीने विस्ताराने येथे इतिहास मांडलेला दिसून येतो.
तिच्या काव्यातून त्या काळातील राजकीय परिस्थिती, समाजाची मानसिकता, त्या लोकांची आर्थिक – सामाजिक- शैक्षणिक स्थिती, युद्धनीती याचे वर्णन येते. त्यातून तिची सूक्ष्म निरीक्षण शक्ती जाणवते.
आजपर्यंत आपण संस्कृत साहित्यातील लेखक- कवींनी वेद- पुराण याचा संदर्भ घेऊन किंवा काहीवेळा स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेल्या स्त्रीपात्रांचा परिचय करून घेतला. पण आजच्या शेवटच्या भागात मुद्दाम एका अशा स्त्रीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे की जी कोणत्याही साहित्यकृतीतील पात्र नसून स्वतःच लेखिका होती. तिच्या एकाच काव्यातून ती आजपर्यंत जनमानसात आणि संस्कृत साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरली आहे. गंगा नदी ही भारताची मानबिंदू आहे तशीच गंगादेवी ही साहित्यातील स्त्रीलेखकांसाठी मानबिंदू आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच तिच्यातील या प्रतिभाशक्तीला सलाम!
(रेणू भूतकाळात डोकावून पाहत होती . मनासारखा जीवनसाथी आणि मनासारखे आयुष्य ती जगू शकत होती. याचा तिला थोडासा गर्वच वाटू लागला होता.) आता पुढे….
तिच्या चित्र प्रदर्शनाच्या तयारीनं जोर पकडला होता. सकाळी सकाळीच “आशा मावशी ,खूप भूक लागलीय… ब्रेकफास्ट…” तिनं जोरात आवाज दिला. शेवटी खाली येऊन पाहिलं तर सगळं सामसूम!तिनं खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिलं, तर तिला घराच्या उंबऱ्यापर्यंत सगळीकडे पाणीच पाणी दिसलं.
‘म्हणजे पूर आलेला दिसतोय….पण नो टेन्शन.’–ती नको नको म्हणत असतानाही आशा मावशीनं वरच्या स्टुडिओ शेजारच्या खोलीतला फ्रीज खाण्यापिण्याच्या पदार्थांनी गच्च भरून ठेवला होता. शेजारीच एक गॅसची शेगडी आणि सिलेंडर तसेच थोडी भांडीकुंडी, पाणी अशी सगळी इमर्जन्सीच्या काळातली तयारी पण केली होती.ती वर आली. सँडविच व कॉफी घेऊन ती आरामात सोफ्यावर बसली. तिचं मन आशा मावशीला धन्यवाद देत होतं.लाईट पण गेलेत हे तिला गिझर ऑन केल्यावर कळलं. ‘काही हरकत नाही …आज नो अंघोळ’… ती पुटपुटली. खिडकीतून पुन्हा ती खाली पाहू लागली तेव्हा तिला दिसले की घरात पाणी शिरलेय. दुपारी खाली जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली तेव्हा खालच्या सात आठ पायऱ्या पाण्यात बुडाल्यात,… आणि तिची ड्रॉइंग हॉलमधील पेंटिंग्स पण पाण्यात बुडालीत हे दिसलं. बेचैन झाली खरी,… पण विचलित न होता वाढलेलं पाणी, बुडणारी झाडं ,घरं निर्धास्तपणे ती बाल्कनीतून बघत राहिली. रात्री खाऊन पिऊन काळ्या कुट्ट अंधारात बिछान्यावर आडवी झाली.’ हेऽऽ एवढ्याशा संकटानं घाबरण्याइतकी लेचीपेची मी थोडीच आहे!’ आपल्या मनाचा अंदाज घेऊन स्वतःवरच खुष होत ती झोपली.
सकाळी पाणी आणखी वाढलेलं दिसलं. तशी ती गच्चीत आली. बाय चान्स तिला एक नाव दिसली. “हेल्प मी, हेल्प मी” ओरडत हातातला रंगीत रुमाल तिनं हवेत फडकवला. त्या नावेतल्या डिझास्टर मॅनेजमेंट टीमने खूप प्रयत्न करून तिला नावेत उतरवून घेतले. खरा प्रश्न पुढे उभा राहिला… आपला ओव्हर- कॉन्फिडन्स दाखवायचा नादात गच्चीतून आत खोलीत जाऊन मोबाईल बरोबर घ्यायलाही ती विसरली होती…कपडे वगैरे तर दूरची गोष्ट !…..ते लोक विचारू लागले कुठे जाणार? तेव्हा कोणाचाही फोन नंबर, घरचा पत्ता ती सांगू शकली नाही. “इतक्या पूरग्रस्त लोकांना तुम्ही कुठे ठेवलेय तिथेच मला सोडा… अशा रहाण्यातलं थ्रिल मला अनुभवायचंय”..ती बेफिक्रीनं उद्गारली…तिथे पोहोचल्यावर,” थँक्स गाईज! मी पुढचं सगळं छान मॅनेज करेन.” ती म्हणाली.
छान पैकी जेवली. खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची धावपळ एन्जॉय करत राहिली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव निरखत मनातच त्यांची स्केचेस बनवत राहिली.पण रात्री एका चटईवर.. बिना उशीचं झोपताना तिला अवघड वाटू लागलं….आणि रात्री अंधारात डासांचं नृत्य, संगीत आणि कडाडून चावणं दोन-तीन दिवस तिनं सहन केलं पण हळूहळू तिचा ताठा, स्वतःबद्दलच्या वल्गना… सगळं लुळं पांगळं झालं. एका अनामिक भीतीने मनाचा कब्जा घेतला.जोरजोरात थंडी वाजू लागली… आणि सपाटून ताप चढला. केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी औषध दिलं. ब्लड टेस्ट झाली. पण ताप उतरायची चिन्हे दिसेनात.तिची झोप उडाली….मनात नाही नाही ते विचार घोंगावू लागले… आपल्या भिजलेल्या पेंटिंग्जची दुरावस्था आठवून ती व्याकूळ झाली.
“अगोबाई मॅडम तुम्ही इथं?” ओळखीचा आवाज ऐकून तिने डोळे किलकिले केले. समोर आशामावशी उभ्या! रेणू एकदम हरकून गेली. त्या शेजारणी बरोबर त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आल्या होत्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे पुढाकार घेत त्या तिला म्हणाल्या ,”तुम्ही आत्ताच्या आत्ता चला माझ्या घरला. काय अवस्था झाली तुमची. आमच्याकडे पूर बीर नाहीये… रिक्षात घालून नेतो… वाटेत डॉक्टरला पण दाखवतो… तुमचं चांगल पथ्य पाणी पण करतो. तिथल्या व्यवस्थापकांची परवानगी घेऊन त्या रेणुला आपल्या घरी घेऊन आल्या. घरी तिची योग्य सेवा सुश्रुषा झाली. हळूहळू तिचा ताप उतरला. त्यापूर्वीचे एक दोन दिवस आशा मावशीने स्पंजींग करून तिला आपले जुने गाऊन घालायला देऊन तिचे अंगावरचे कपडे धुऊन टाकले होते.
“मॅडम पाणी गरम आहे. चार-पाच दिवसात तुमची अंघोळ झालेली नाहीये.आज तुम्ही अंघोळ करून घ्या.” आशा मावशीने सांगितले.,” मॅडम तुमची कापडं, गाऊन काहीच वाळलं नाहीय हो… बाहेर धो धो पाऊस आहे…. माझ्या साड्याही आंबट ओल्या आहेत… तर असं करा माझं तिथं ठेवलेलं परकर झंपर घाला. आणि हेही सांगतोय की दार पावसानं फुगलंय .आतनं कडी नाही बसणार …मी राहतो बाहेर उभी, तुमच्यासाठी साडी घेऊन. काळजी करू नका. अंघोळ करून घ्या तुम्ही. हातात एक कॅरीबॅग घेऊन आशा मावशी बाहेर पडल्या. त्या स्वयंपाक- घरातल्या छोट्याशा मोरीत रेणूनं कशीबशी आंघोळ आटोपली . ढगळा ब्लाऊज व परकर घातलाआणि दरवाजा खडखडवला.आशामावशी आत आल्या घडी मोडून निऱ्या केलेली एक साडी त्यांनी तिच्या खांद्यावर टाकली. आणि दरवाजा बंद करून बाहेर उभ्या राहिल्या. साडी बघून रेणूच्या मनात चर् र् झालं. ती,….’ती’ साडी होती. सासूचा बेदरकारपणे अपमान करत आशा मावशीच्या खांद्यावर टाकलेली साडी….आज ती साडी नेसणं भाग होतं.नियतीने तिला समझौता करायला… चलता है… म्हणायला भाग पाडलं होतं. तिच्या बेछूट, उर्मटपणे वागायच्या सगळ्या फंड्यांना जणू ती साडी वाकुल्या दाखवून हसत होती. आयुष्यातला हा असा पराभव पचवणं तिला शक्य नव्हतं. त्या स्ट्रॉंग, ओव्हर कॉन्फिडंट, आयुष्यात कधीही न रडलेल्या स्त्रीला त्या साडीनं ओक्साबोक्शी रडायला भाग पाडलं होतं. पण हे अश्रू खरंच पश्चातापाचे होते का?
“अगं संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला . नीट पूजा करू , तुझ्या वेळेनुसार बोलवू ” सासूबाई म्हणाल्या .
“आई , अहो भाव महत्वाचा ! पूजा केली काय आणि नाही केली काय….संध्याकाळी कंटाळा येतो खूप ” सायलीने चप्पल घालता घालता म्हंटलं .
“सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता ? ”
कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला . सासूबाई म्हणाल्या , ” शिरीष तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव भाव ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य विसरतोय असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही , शिरिषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही. पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हंटलं की तुम्हाला वेळ नसतो, थकलेले असतात . घरच्या आरतीलाही चार वेळा या रे म्हणावं लागतं . कुठलाही उपास म्हंटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही असं म्हणून मोकळे होता, पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…”
सायली म्हणाली , ” आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय “
” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे उपास तापास, देव धर्म म्हणजे स्वतःच्या मनाला, शरीराला लावून घेतलेलं बंधन. हे unproductive आहे असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय. आहेत, बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली तुला म्हंटलं आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल, तू म्हणालीस भाव महत्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन. अगं दे ना तू दान, पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील आजोबांना नमस्कार कर, तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील, तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत , त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला ‘भाव महत्वाचा’ ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो. उद्या अथर्व तुला, मला, शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला. परवाचंच घे, घरी भजन आहे म्हंटल्यावर तू नाक मुरडलं , वेळ नाही म्हणालीस. पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं त्यात रंगून गेलीस . फेरदेखील धरलास आमच्याबरोबर , हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .
” हो, हे मात्र खरं आई . इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच ! ” सायली म्हणाली .
” हो ना ? तू रे शिरीष, नाही सोवळं पण निदान आंघोळ करून आरती कर म्हंटलं की हेच– भाव महत्वाचा. अरे त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते, आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं. एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही, मग गोंधळ घालायचा का विचारलं की आई, ‘भाव महत्वाचा’ , ‘देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला. अरे देव-देवी काहीच म्हणत नाही, हे सगळं आपल्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आहे. एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना प्रथा जपा रे . हे बघ नेहेमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या तेवढं नाही करू शकले आणि सायली तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे. तरीही सारासार विचार करून जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत? भाव महत्वाचा– पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते . हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात. मनाचे डाएट म्हणा ना. ते किती जास्त प्रमाणात करायचं ते ज्याचं त्याने ठरवावं पण करावं असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं . आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो, पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून, मेकप करून आपण जातो. दांडिया खेळू नये असं नाही. पण आपलीही संस्कृती , परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्वाचं, तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना? मग श्रद्धा, अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू. सारखं ‘भाव महत्वाचा’ म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी…. उद्या असेन मी, नसेन मी …..” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .
शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते. असे शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .
—— असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !
लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – १ ते ३ इंद्र; ४ ते ६, ८, ९ मरुत्; ५ ते ७ इंद्रमरुत्; १० – इंद्र
—मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील सहाव्या सूक्तात इंद्र आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. तरीही हे सूक्त इंद्रसूक्त म्हणूनच ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल.
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय एवं भावप्रवण कविता ‘रिश्ते ये खून के’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस लघुकथा रचने के लिए सादर नमन।)
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “सम्मान को सम्मानित करना”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।
आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 126 ☆
☆ सम्मान को सम्मानित करना ☆
आज इसको कल उसको अपना गुरु बनाते हुए सम्मान बटोरते जाना ये भी एक कला है। जिस तरह हर कला की साधना,आराधना होती है वैसे ही इसकी भी कुछ साधकों द्वारा निरंतर साधना की जा रही है। एक हाथ लेना और दूसरे हाथ देना ये सब कुछ जायज है, बस नियत सच्ची होनी चाहिए। एक कार्यक्रम के दौरान दो इसी तरह के साधक आपस में बात कर रहे थे कि यहाँ से अब बहुत मिल चुका चलो अपना बसेरा कहीं और बनाते हैं। पहले ने कहा कहीं और जाने की जगह हम खुद ही अपना समूह बना कर संस्था के अध्यक्ष व सचिव बन जाते हैं। बस विज्ञापन निकालने की देर है, लोग खुद ही संपर्क करेंगे। जो संरक्षक बनना चाहेगा उसका स्वागत करेंगे।
दूसरे ने कहा सही बात है, संरक्षक ही कार्यक्रम को प्रायोजित करेंगे आखिर उनको हम पूरे समय मंचासीन रखेंगे। उन्हीं की फोटो पेपर में छपेगी।
पहले ने कहा अरे हाँ सबसे जरूरी तो मीडिया ही है, कोई आपकी पहचान का हो तो बताएँ, उसको प्रचार सचिव बनाकर सारे कार्य करवाने हैं।
ऐसा होना कोई नयी बात नहीं है ये तो जोड़- तोड़ है जो आगे बढ़ने हेतु करनी ही पड़ती है। आखिर ये भी एक गुण है, हमें खुद को तराशते हुए जुटे रहना चाहिए, रास्ता जितना नेक होगा परिणाम उतना सुखद होगा।
हर वस्तु चाहे वो सजीव हो या निर्जीव उसकी अपनी एक विशिष्टता होती है, और यही उसका गुण कहलाता है जैसे मछली में तैरने का गुण होता है तथा वो जल के बिना नहीं रह सकती, इसी तरह मेढक जल थल दोनों में रह सकता है। पंछी आसमान की सैर करते हैं तो बंदर एक डाल से दूसरी डाल तक छलाँग मार सकता है।
कुछ निर्जीव जैसे कोयला काला होता है तो वहीं मिट्टी अपनी उत्त्पति के अनुसार कहीं काली,लाल, रेतीली,आदि रूपों में मिलती है।
इन सबमें बुद्धिमान प्राणी की बात करें तो वो निश्चित रूप से मानव ही है जो निरन्तर गुणों की खोज में भटक रहा है, ये गुण कस्तूरी की तरह उसके भीतर ही समाहित है बस आवश्यकता है हीरे की तरह उसे तराशने की।
जो लोग उचित समय पर श्रेष्ठ गुरु का सानिध्य पा जाते हैं वे जल्दी ही अपने गुणों को पहचान सफलता को प्राप्त कर लेते हैं। वहीं कुछ ऐसे लोग भी होते हैं जिनका गुरु वक्त होता हैं, किसी ने सच ही कहा है वक्त से बड़ा कोई गुरु नहीं हो सकता।
ये सब तो केवल व्याख्या है वास्तविकता जिसके पास विद्या रूपी धन होता है उसमें सरलता व विनम्रता का गुण अपने आप ही विकसित हो जाता है। सम्मान के पीछे भागने की जगह यदि हम स्वयं को उपयोगी बनाकर समय के साथ- साथ बढ़ते रहें तो सम्मान भी सम्मानित होगा। तब चेहरे पर तालियों की गड़गड़ाहट से जो भाव आएगा वो अविस्मरणीय होगा।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ आपदां अपहर्तारं ☆
🕉️ मार्गशीष साधना🌻
आज का साधना मंत्र – ॐ नमो भगवते वासुदेवाय
आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जीका हिन्दी बाल -साहित्य एवं हिन्दी साहित्य की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य” के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है पुरस्कृत पुस्तक “चाबी वाला भूत” की शीर्ष बाल कथा –“चाबी वाला भूत”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 127 ☆
☆ पुरस्कृत पुस्तक “चाबी वाला भूत” की शीर्ष बाल कथा – चाबी वाला भूत☆
बेक्टो सुबह जल्दी उठा। आज फिर उसे ताले में चाबी लगी मिलीं। उसे आश्चर्य हुआ। ताले में चाबी कहां से आती है ?
वह सुबह चार बजे से पढ़ रहा था। घर में कोई व्यक्ति नहीं आया था। कोई व्यक्ति बाहर नहीं गया था। वह अपना ध्यान इसी ओर लगाए हुए था। गत दिनों से उस के घर में अजीब घटना हो रही थी। कोई आहट नहीं होती। लाईट नहीं जलती। चुपचाप चाबी चैनलगेट के ताले पर लग जाती।
‘‘ हो न हो, यह चाबी वाला भूत है,’’ बेक्टो के दिमाग में यह ख्याल आया। वह डर गया। उस ने यह बात अपने दोस्त जैक्सन को बताई। तब जैक्सन ने कहा, ‘‘ यार ! भूतवूत कुछ नहीं होते है। यह सब मन का वहम है,’’
बेक्टो कुछ नहीं बोला तो जैक्सन ने कहा, ‘‘ तू यूं ही डर रहा होगा। ’’
‘‘ नहीं यार ! मैं सच कह रहा हूं। मैं रोज चार बजे पढ़ने उठता हूं। ’’
‘‘ फिर !’’
‘‘ जब मैं 5 बजे बाहर निकलता हूं तो मुझे चैनलगेट के ताले में चाबी लगी हुई मिलती है। ’’
‘‘ यह नहीं हो सकता है,’’ जैक्सन ने कहा, ‘‘ भूत को तालेचाबी से क्या मतलब है ?’’
‘‘ कुछ भी हो। यह चाबी वाला भूत हो सकता है।’’ बेक्टो ने कहा, ‘‘ यदि तुझे यकीन नहीं होता है तो तू मेरे घर पर सो कर देख है। मैं ने बड़ वाला और पीपल वाले भूत की कहानी सुनी है। ’’
जैक्सन को बेक्टो की बात का यकीन नहीं हो रहा था। वह उस की बात मान गया। दूसरे दिन से घर आने लगा। वह बेक्टो के घर पढ़ता। वही पर सो जाता। फिर दोनो सुबह चार बजे उठ जाते। दोनों अलग अलग पढ़ने बैठ जाते। इस दौरान वे ताला अच्छी तरह बंद कर देते।
आज भी उन्होंने ताला अच्छी तरह बंद कर लिया। ताले को दो बार खींच कर देखा था। ताला लगा कि नहीं ? फिर उस ने चाबी अपने पास रख ली।
ठीक चार बजे दोनों उठे। कमरे से बाहर निकले। चेनलगेट के ताले पर ताला लगा हुआ था।
दोनों पढ़ने बैठ गए। फिर पाचं बजे उठ कर चेनलगेट के पास गए। वहां पर ताले में चाबी लगी हुई थी।
‘‘ देख !’’ बेक्टो ने कहा, ‘‘ मैं कहता था कि यहां पर चाबी वाला भूत रहता है। वह रोज चैनल का ताला चाबी से खोल देता है, ’’ यह कहते हुए बेक्टो कमरे के अंदर आया। उस ने वहां रखी। चाबी दिखाई।
‘‘ देख ! अपनी चाबी यह रखी है,’’ बेक्टो ने कहा तो जैक्सन बोला, ‘‘ चाहे जो हो। मैं भूतवूत को नहीं मानता। ’’
‘‘ फिर, यहां चाबी कहां से आई ?’’ बेक्टो ने पूछा तो जैक्सन कोई जवाब नहीं दे सकता।
दोपहर को वह बेक्टो को घर आया। उस वक्त बेक्टो के दादाजी दालान में बैठे हुए थे।
जैक्सन ने उन को देखा। वे एक खूंटी को एकटक देख रहे थे। उन की आंखों से आंसू झर रहे थे।
‘‘ यार बेक्टो ! ’’ जैक्सन ने यह देख कर बेक्टो से पूछा, ‘‘ तेरे दादाजी ये क्या कर रहे है ?’’ उसे कुछ समझ में नहीं आया था। इसलिए उस ने बेक्टो से पूछा।
‘‘ मुझे नहीं मालूम है, ’’ बेक्टो ने जवाब दिया, ‘‘ कभी कभी मेरे दादाजी आलती पालती मार कर बैठ जाते हैं। अपने हाथ से आंख, मुंह और नाक बंद कर लेते हैं। फिर जोरजोर से सीटी बजाते हैं। वे ऐसा क्यों करते हैं ? मुझे पता नहीं है ?’’
‘‘ वाकई !’’
‘‘ हां यार। समझ में नहीं आता है कि इस उम्र में वे ऐसा क्यों करते हैं। ’’ बेक्टो ने कहा, ‘‘ कभीकभी बैठ जाते हैं। फिर अपना पेट पिचकाते हैं। फुलाते है। फिर पिचकाते हैं। फिर फूलाते हैं। ऐसा कई बार करते हैं। ’’
‘‘ अच्छा !’’ जैक्सन ने कहा, ‘‘ तुम ने कभी अपने दादाजी से इस बारे में बात की है ?। ’’
‘‘ नहीं यार, ’’ बेक्टो ने अपने मोटे शरीर पर हाथ फेरते हुए कहा, ‘‘ दादाजी से बात करूं तो वे कहते हैं कि मेरे साथ घूमने चलो तो मैं बताता हूं। मगर, वे जब घूमने जाते हैं तो तीन चार किलोमीटर चले जाते हैं। इसलिए मैं उन से ज्यादा बात नहीं करता हूं। ’’
यह सुनते ही जैक्सन ने बेक्टा के दादाजी की आरे देखा। वह एक अखबार पढ़ रहे थे।
‘‘ तेरे दादाजी तो बिना चश्मे के अखबार पढ़ते हैं ?’’
‘‘ हां। उन्हें चश्मा नहीं लगता है। ’’ बेक्टो ने कहा।
जैक्सन को कुछ काम याद आ गया था। वह घर चला गया। फिर रात को वापस बेक्टो के घर आया। दोनों साथ पढ़े और सो गए। सुबह चार बजे उठ कर जैक्सन न कहा, ‘‘ आज चाहे जो हो जाए। मैं चाबी वाले भूल को पकड़ कर रहूंगा। तू भी तैयार हो जा। हम दोनों मिल कर उसे पकड़ेंगे ?’’
‘‘ नहीं भाई ! मुझे भूत से डर लगता है, ’’ बेक्टो ने कहा, ‘‘ तू अकेला ही उसे पकड़ना। ’’
जैक्सन ने उसे बहुत समझाया, ‘‘ भूतवूत कुछ नहीं होते हैं। यह हमारा वहम है। इन से डरना नहीं चाहिए। ’’ मगर, बेक्टो नहीं माना। उस ने स्पष्ट मना कर दिया, ‘‘ भूत से मुझे डर लगता है। मैं पहले उसे नहीं पकडूंगा। ’’
‘‘ ठीक है। मैं पकडूंगा। ’’ जैक्सन बोला तो बेक्टो ने कहा, ‘‘ तू आगे रहना, जैसे ही तू पहले पकड़ लेगा। वैसे ही मैं मदद करने आ जाऊंगा,’’
दोनों तैयार बैठे थे। उन का ध्यान पढ़ाई में कम ओर भूत पकड़ने में ज्यादा था।
जैक्सन बड़े ध्यान से चेनलगेट की ओर कान लगाए हुए बैठा था। बेक्टो के डर लग रहा था। इसलिए उस ने दरवाजा बंद कर लिया था।
ठीक पांच बजे थे। अचानक धीरे से चेनलगेट की आवाज हुई। यदि उसे ध्यान से नहीं सुनते, तो वह भी नहीं आती।
‘‘ चल ! भूत आ गया ,’’ कहते हुए जैक्सन उठा। तुरंत दरवाजा खोल कर चेनलगेट की ओर भागा।
चेनलगेट के पास एक साया था। वह सफेद सफेद नजर आ रहा था। जैक्सन फूर्ति से दौड़ा। चेनलगेट के पास पहुंचा। उस ने उस साए को जोर से पकड़ लिया। फिर चिल्लाया, ‘‘ अरे ! भूत पकड़ लिया। ’’
‘‘ चाबी वाला भूत !’’ कहते हुए बेक्टो ने भी उस साए को जम कर जकड़ लिया।
चिल्लाहट सुन कर उस के मम्मी पापा जाग गए। वे तुरंत बाहर आ गए।
‘‘ अरे ! क्या हुआ ? सवेरेसवेरे क्यों चिल्ला रहे हो ?’’ कहते हुए पापाजी ने आ कर बरामदे की लाईट जला दी।
‘‘ पापाजी ! चाबी वाला भूत !’’ बेक्टो साये को पकड़े हुए चिल्लाया।
‘‘ कहां ?’’
‘‘ ये रहा ?’’
तभी उस भूत ने कहा, ‘‘ भाई ! मुझे क्यों पकड़ा है ? मैं ने तुम्हारा क्या बिगाड़ा है ? ’’ उस चाबी वाले भूत ने पलट कर पूछा।
‘‘ दादाजी आप !’’ उस भूत का चेहरा देख कर बेक्टो के मुंह से निकल गया, ‘‘ हम तो समझे थे कि यहां रोज कोई चाबी वाला भूत आता है,’’ कह कर बेक्टो ने सारी बात बता दी।
यह सुन कर सभी हंसने लगे। फिर पापाजी ने कहा, ‘‘ बेटा ! तेरे दादाजी को रोज घूमने की आदत है। किसी की नींद खराब न हो इसलिए चुपचाप उठते हैं। धीरे से चेनलगेट खोलते हैं। फिर अकेले घूमने निकल जाते हैं। ’’
‘‘ क्या ?’’
‘‘ हां !’’ पापाजी ने कहा, ‘‘ चूंकि तेरे दादाजी टीवी नहीं देखते हैं। मोबाइल नहीं चलाते हैं। इसलिए इन की आंखें बहुत अच्छी है। ये व्यायाम करते हैं। इसलिए अँधेरे में भी इन्हें दिखाई दे जाता है। इसलिए चेनलगेट का ताला खोलने के लिए इन्हें लाइट की जरूरत नहीं पड़ती है। । ’’
यह सुन कर बेक्टो शरमिंदा हो गया,। वह अपने दादाजी से बोला, ‘‘ दादाजी ! मुझे माफ करना। मैं समझा था कि कोई चाबी वाला भूत है जो यहां रोज ताला खोल कर रख देता है। ’’
‘‘ यानी चाबी वाला जिंदा भूत मैं ही हूं, ’’ कहते हुए दादाजी हंसने लगे।
बेक्टो के सामने भूत का राज खुल चुका था। तब से उस ने भूत से डरना छोड़ दिया।
(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक 122 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। उत्तर प्रदेश हिंदी संस्थान द्वारा राष्ट्रीय स्तर पर बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिया जाना सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’(धनराशि ढाई लाख सहित)। आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।
आप “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 136 ☆
☆ बाल गीत – हवा – हवा कहती है बोल…☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆