हिन्दी साहित्य – आलेख ☆ परदेश – भाग -10 – परदेश का मोहल्ला ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है नवीन आलेख की शृंखला – “ परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख ☆ परदेश – भाग – 10 – परदेश का मोहल्ला ☆ श्री राकेश कुमार ☆

मोहल्ला शब्द इसलिए चुना, क्योंकि वर्तमान निवास एक विदेश की आवासीय सोसाइटी में है, जिसमें करीब पंद्रह सौ फ्लैट्स हैं। अब तो हमारे जयपुर में भी ऐसी कई सोसायटी है जिसमें एक हजार से अधिक फ्लैट्स हैं, प्रमुख रूप से गांधी पथ के पास “रंगोली” है, जिसमें भी सोलह सौ से अधिक फ्लैट्स हैं।

यहां की सोसाइटी में सभी किराये से रहते हैं। कोई कंपनी इसको विगत साठ वर्षों से किराए पर चला रही हैं। आसपास इतनी बड़ी और पंद्रह मंजिल कोई और भवन ना होने से दूर से ही दृष्टि पड़ जाती हैं। हमारे जैसे प्रवासियों को ढूंढने में कठिनाई नहीं होती हैं। वैसे आजकल तो लोग पड़ोसी के घर जाने से पहले भी गूगल से ही रास्ता पूछते हैं।

भवन बड़ा होने के कारण नगर बस सेवा भी अंदर तक सुविधा देती है,वो बात अलग है, कि यहां बहुत कम लोग बस से यात्रा करते हैं। कार पार्किंग में दो गाड़ियां खड़ी रखने का कोई अतिरिक्त शुल्क नहीं हैं। बिना सोसाइटी के स्टिकर वाली गाड़ी अवश्य क्रेन द्वारा उठा दी जाती हैं। अतिथि के लिए भी अलग से पार्किंग व्यवस्था हैं। विशेष योग्य जन जिनकी गाड़ी में इस बाबत स्टिकर होता हैं, को  प्रवेश द्वार के पास आरक्षित स्थान मिलता हैं।

कार पार्किंग के लिए स्थान बहुत ही सलीके से चिन्हित किए गया हैं। कार रखना और निकलना अत्यंत सुविधा जनक हैं। कार एकदम सीधी लाइन में खड़ी देखकर अपने पाठशाला के दिन याद आ गए,जब रेखा गणित में हम स्केल की सहायता से भी सीधी रेखा नहीं खींच पाते थे। गुरुजन हमारे स्केल से ही हाथ  पर सीधी लाल लाइन खींच दिया करते थे।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान) 

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 142 – ग्रहण से मोक्ष ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ ☆

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है आपकी सामाजिक समस्या बाल विवाह पर आधारित एक प्रेरक लघुकथा “ग्रहण से मोक्ष”।) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 142 ☆

🌺लघु कथा 🌗ग्रहण से ोक्ष 🌕

नलिनी के जीवन में उस समय ग्रहण लग गया, जब 5 वर्ष की उम्र में धूमधाम से उसका बाल विवाह हुआ।

12 साल का उसका पति अभय नलिनी से ज्यादा समझदार दूल्हे होने की अकड़ और उम्र का बड़ा फासला, परंतु नलिनी इन सब बातों से अनजान खेलकूद, मौज – मस्ती, अपने मित्रों के साथ धमा-चौकड़ी, मोबाइल में गेम खेलना और समय पर पढ़ाई करना। यही उसकी दिनचर्या थी।

पढ़ाई लिखाई में कमजोर अभय हमेशा उस पर अधिकार जमाता रहता। मोहल्ला पड़ोस आस-पास होने की वजह से हर चीज की खबर रखता था। जो नलिनी को बिल्कुल भी पसंद नहीं आता था।

आज घर परिवार में ग्रहण की बात हो रही थी। इसकी राशि में शुभ और किसकी राशि में अशुभ। शुभ फल चर्चा का विषय बना था। पापा पेपर लिए बड़े ही तल्लीनता से पढ़ रहे थे। मम्मी पास में बैठी सब्जी काट रसोई की तैयारी करने में लगी थी।

अचानक दौड़ती नलिनी आई पापा के कंधे झूलते बोली…. पापा मेरी सखियां मुझे चिढ़ाती हैं कि मुझे तो ग्रहण लग गया है। पापा ग्रहण बहुत खतरनाक और भयानक होता है क्या? अभय भी मेरे साथ यही करेगा। पापा मुझे कब छुटकारा मिलेगा।

बिटिया की बातें सुन मम्मी-पापा हतप्रभ हो देखते रहे, उन्हें अपनी गलती का एहसास हो चुका था।

बहुत गलत फैसला है और तुरंत दूसरे कपड़े पहन, चश्मा लगा कुछ कागज, हाथों में ले बाहर जाने लगे।  मम्मी ने आवाज लगाई…. कहां चल दिए।

पापा ने कहा…. अपनी गलती के कारण अपनी बिटिया पर लगे ग्रहण के समय का मोक्ष निर्धारण करके आता हूँ। शायद यही समय उचित रहेगा।

नलिनी खुशी से झूम उठी…. अब मैं सभी फ्रेंड को बता दूंगी मेरा भी ग्रहण को मोक्ष मिल गया। अब कोई अशुभ प्रभाव नहीं पड़ेगा।

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येशील केव्हा पुन्हा परतुन… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ येशील केव्हा पुन्हा परतुन… 💐 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

(विरह काव्य)

ताजमहालचया वाटेने प्रिये

का?तू गेली मजला सोडून

बसलो आहे मी मात्र येथे

प्रणय गीतांचे सूर लावून

 

संगमरवरी स्वप्ना चे त्या

भंगलेले‌ अवशेष राहिले

भावनांचे प्रीती पुष्प ‌हे

कोमेजुन गंध हीन ़झाले

 

जलविण जैसा मीन तळमळे

तैसा तळमळे मी रात्रंदिन

तुझ्या प्रीतिचा असे पुजारी

अहोरात्र करी मी‌ तुझेच पूजन

 

येशील केव्हा पुन्हा परतुन

संगमरवरीचया कलाकृतीतुन

की यमुनेच्या या धुंद जलातुन

स्वर्गीय ते भोग सोडून

 

वाट पहातो तुझी प्रिये ग

पुन्हा मीलनाची आस धरुन

तुझ्याविणा मज नसे किनारा

तव‌ स्मृतीच्या श्रावणधारा 💐

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #164 ☆ अंधार रात्र आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 164 ?

☆ अंधार रात्र आहे… ☆

काळोख शमविण्याला येतात काजवे हे

घेऊन दीप हाती फिरतात काजवे हे

 

अंधार रात्र आहे पत्ता न चांदण्यांचा

त्यांचीत फक्त जागा घेतात काजवे हे

 

गुंफून हात हाती करतात नृत्य सारे

सुंदर प्रकाश गीते गातात काजवे हे

 

छळतो तिमिर तरीही थोडा उजेड आहे

आधार जीवनाचा होतात काजवे हे

 

नाजूक जीव आहे हलक्या मुठीत माझ्या

घेतो कधी कधी मी हातात काजवे हे

 

शेतात चोर रात्री येऊ नयेत म्हणुनी

घालून गस्त रात्री जातात काजवे हे

 

आहे स्वयंप्रकाशी इवला प्रकाश तरिही

निर्माण राज्य येथे करतात काजवे हे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जान है तो जहाँ है ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जान है तो जहाँ है ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात.

इकडे लगातार तीन दिवस तीन वेगवेगळ्या टोकाच्या हवामानाचा अनुभव सगळ्यांनी घेतला. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण,कुंद हवा, पाऊस तर दुसऱ्या दिवशी थंडी, बोचरे वारे,आणि तिस-या दिवशी अचानक सर्वत्र ऊन. ह्या अचानक बदलत्या हवामानाने सगळीकडे सर्दी, ताप,घसा खवखवणे आणि खोकला ह्यांच्या मा-याला आपल्याला तोंड द्यावं लागतयं.

खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना  शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.

त्यामुळे ह्या आजारपणाच्या काळात मात्र माणसाला माणसाची खरी किंमत कळायला लागते.सध्या ह्या आजारपणात घरात वा नोकरीच्या जागी तीन गट पडलेतं.पहिल्या गटात  संपूर्णपणे आजारी असलेल्या व्यक्ती, दुसऱ्या गटात थोडफार बरं वाटत नसलेल्या व्यक्ती आणि तिस-या गटात एकदम ठणठणीत व्यक्ती. ह्यापैकी तिसऱ्या गटातील व्यक्तींचे संख्याबळ अगदी कमी आहे.

काल परवापर्यंत ह्या आजारपणात मी दुसऱ्या गटात मोडत होते.नंतर मात्र अंगावर काढल्याने शेवटी तिसऱ्या फेज मध्ये प्रवेशकर्ती झालीय. आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.

त्यामुळे आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेऊन झाल्यावर ह्या आजारपणात आलेल्या चांगल्या अनुभवांविषयीची पोस्ट काही दिवसात लिहीनच.

औषधांपेक्षाही सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागतं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “माफी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “माफी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

नुकताच काॅलेजात जायला लागलेलो.

एकटाच रहायचो.

आजोबांची जागा होती मुंबईत.

तिथंच रहायचो.

आजोबा, आई, बाबा सगळे पुण्यात.

शोभामावशी.

आजी, आजोबांकडे गेली तीस पस्तीस वर्ष काम करायची.

धुणं ,भांडी,केर, लादी पुसणं, पोळ्या,सब कुछ.

कामाला चोख,अतिशय प्रामाणिक.

अगदी घरच्यासारखी.

आजी गेल्यानंतर आजोंबांना एकटं राहू द्यायचं नाही,

म्हणून बळजबरीनं पुण्यात आणलेलं.

तरी सुद्धा शोभामावशीकडे घराची किल्ली असायचीच.

एक दिवसाआड ती घर घासून पुसून लख्ख ठेवायची.

मी रहायला आलो तेव्हा आजोबा बरोबर आलेले.

आजोबांनी बजावलेलं, “नातवाला सांभाळून घे माझ्या”.

शोभामावशी मनापासून हसली फक्त.

फार कमी बोलायची ती.

आजोबा पुण्याला परत गेले अन् मी ऊधळलो.

ते दिवस, वय आणि मी.

रात्र रात्र वाचत बसायचो.

कथा, कादंबर्या, आत्मचरित्र.

अभ्यासाचं सोडून काहीही चालायचं.

पेटींगचं वेड लागलेलं.

सकाळी लवकर ऊठणं व्हायचं नाही.

घरभर पसारा.

इथं तिथं पसरलेली पुस्तकं.

कॅनव्हास, पॅलेट अन् रंगपंचमी.

कपड्यांचे बोळे.

विस्कटलेली चादर, फेकलेली पांघरूणं.

ओट्यावर सांडलेली खरकटी भांडी.

पूछो मत!

सकाळी शोभामावशी येऊन गेली की,

जादू व्हायची.

घर लख्ख.

ती बिचारी न बोलता, मान खाली घालून,

सगळं निमूट आवरायची.

पोळी भाजी करून डबा भरून ठेवायची.

जाता जाता मला हलकेच ऊठवून जायची.

बाबा, काका तिला शोभामावशी म्हणायचे म्हणून ,

मीही म्हणायचो.

खरं तर सख्ख्या आजीईतके लाड करायची माझे.

खरंच सांभाळून घेतलं तिनं मला.

सांगतो.

खरं तर माझीच मला लाज वाटतेय सांगायला.

तरीही सांगायलाच हवं.

माझ्या मुंजीत आजीनं मला एक गोफ केलेला.

तीन साडेतीन तोळ्याचा असेल.

ईतके दिवस लाॅकरमधेच होता.

मी काॅलेजमधे जायला लागलो तेव्हा आईनं घालायला दिला.

‘नेहमी शर्टाच्या आत, बनियनखाली लपवून ठेवायचा.

थोडं तरी सोनं अंगावर हवं .

अडी अडचणीला तेच ऊपयोगी पडतं’

आई ऊवाच.

रोज आंघोळीला जाताना गोफ टेबलवर काढून ठेवायचो.

आंघोळ झाली, डोक्याला तेल थोपटलं की पुन्हा गळ्यात.

रात्री वाचताना गळ्यातला गोफ दातानं सहज चघळायचो.

सवय.

एकदा रात्री वाचत होतो.

सहज गळा चाचपला.

रविवारच्या शाळेसारखा शून्यरिकामा.

मला पक्कं आठवतंय.

काल सकाळी आंघोळीआधी मी टेबलवर काढून ठेवलेला.

नंतर ?

शोभामावशी…

मी ताबडतोब घरी फोन लावला.

बाबांनी सोलून काढला मला.

“तुलाच सांभाळता येत नाहीत गोष्टी.

पाडला असशील कुठे तरी.

ऊगाचच आपलं पाप दुसर्याच्या माथी मारू नकोस…”

‘मी काय सांगू ?

आपलेच दात अन् आपलेच ओठ.

एखाद वेळी होतो मोह.

आपलं माणूस म्हणून सोडून द्यायचं.

तू मावशींना काहीही विचारू नकोस.

त्यांना ऊगाचच वाईट वाटेल…”

आई म्हणाली.

“शक्यच नाही.

घरातच असेल कुठे तरी.

नीट शोध.

मी येऊ का तिथे ?”

आजोबांचा सकाळी सक्काळी फोन.

‘नको, मी बघतो.’

सगळं घर शोधून झालं.

नाही….

शोभामावशी रोजच्यासारखी यायची.

निमूट काम करून निघून जायची.

माझ्या नजरेला संशयाचा मोतीबिंदू झालेला.

शोभामावशीला जाणवलं असावं.

“का रे पोरा काय बिनसलंय सद्द्या ?’

‘काही नाही’

मी ऊगाचंच म्हणलं.

गुंतून चालणार नव्हतंच.

ईलेक्ट्राॅनीक्सची ओरल आलेली तोंडावर.

आज रात्री अभ्यासाला मूहूर्त लागायलाच हवा.

रात्री व्हीके मेहता ऊघडलं अन् ,

पान चकाकलं.

वेटोळं घालून पहुडलेला गोफ दिसला.

लाज वाटली…

झोपच येईना.

सकाळी सकाळी आवरून तयार.

नाक्यावरच्या हलवायाकडनं पेढे आणले.

पूजा करून नैवेद्य दाखवला.

शोभामावशीची वाट बघत बसलो.

मावशी आल्याआल्या तिचे पाय धरले.

पेढे दिले.

” चुकलो मी !’

तिला काही कळेना.

सगळी हकीगत सांगितली.

ती नेहमीसारखी, मनापासून हसली फक्त.

‘रस्त्यावर सापडलं असतं तर एक वेळ मोह जाला बी असता.

ह्ये तर माजंच घर हाये.

माफी देणारा न्हाई,

मनापासून माफी माग्नाराच देवाला आवडतो.

ऊठा.

परीक्षा हाई ना आज…’

आजोबांना फोन केला.

ईनफाईनाईट टाईम्स साॅरी म्हणलं.

परीक्षाच होती.

काठावर पास झालो ईतकंच.

चुकीला माफी…आहेच.

मनापासून मागितली की झालं.

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती — मराठी भावानुवाद☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती 

मराठी भावानुवाद : जयलाभयशप्राप्ती स्त्रोत्र : डॉ. निशिकांत श्रोत्री 

श्रीगणेशाय नमः | श्रीसरस्वत्यै नमः| 

श्रीपादवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती श्रीगुरुदत्तात्रेय नमः||

दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।

प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ १ ॥

दत्तात्रेया ब्रह्मरूपा वरदायी भक्तवत्सला

संकटहारी हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||१||

दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम् ।

सर्वारक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ २ ॥  

दीनबंधू सिंधू कृपेचा कारण असशी विश्वाचा

सकल रक्षका हे  देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||२||

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणम् ।

नारायणं विभुं वंदे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ३ ॥

शरणागत दीनांची पीडा निवारण तू करिशी

नारायणा श्रेष्ठ देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||३||

सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगलम् ।

सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी नोऽवतु ॥ ४ ॥

सकलानर्थ हरण कर्ता करिशी सर्व मंगला 

सर्वक्लेशनिवारकदेवा स्मरणसाक्षी नमन तुला ||४||

ब्रह्यण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् ।

भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ५ ॥  

तू तत्वज्ञ ब्रह्मज्ञानी वर्धिशी भक्तकीर्तिला 

भक्तकल्याणी हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||५||

शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः ।

तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ६ ॥

शोषणकर्ता पापांचा तू दीप तेजवी ज्ञानाचा 

तापशामक हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||६||  

सर्वरोगप्रशनम् सर्वपीडा निवारणम् ।

आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ७ ॥

शमवुनी सर्व रोगांना सकल पीडा निवारिल्या

अरिष्टोद्धारक हे  देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||७||

जन्मसंसारबन्धघ्नं स्वरुपानंददायकम् ।

निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ८ ॥

जननमरण बंधघ्न चिदानंद मोक्षदायका

दिव्योद्धारा हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||८||

जयलाभयशःकाम-दातुर्दत्तस्य यः स्तवम् । 

भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत्स कृती भवेत् ॥ ९ ॥

दत्तस्तोत्र हे पवित्र जयलाभ नि यशकीर्ती

स्तवन श्रवण करी त्यासी लाभे भोगासवे मुक्ती ||९||

*****

॥ इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम् संपूर्णम् ॥   

||इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती रचित निशिकांत भावानुवादित जयलाभयशप्राप्ती स्त्रोत्र संपूर्ण||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

मो. ९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळीनंतरचा मऊ भात..आणि मेतकूट !… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ दिवाळीनंतरचा मऊ भात..आणि मेतकूट !… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित☆

आज चिवडा करू…. उद्या लाडू…. असं म्हणत दिवाळीआधीच फराळाचं वेळापत्रक बनतं खरं… पण ते सोयीनुसार बदलतही राहतं.  म्हणजे असं, दाणे भाजून झाले नाहीत म्हणून आजचा चिवडा उद्यावर ढकलला जातो आणि भाजणी लवकरच आणली म्हणून परवाची चकली आज होऊनही गेलेली असते. थोडक्यात, हे ‘सवडीचं’ वेळापत्रक असतं… आणि ते सवडीनुसार पाळलं किंवा बदललं जातं!

आता…’आवडीचं’ वेळापत्रक सुरु होतं…. आवडीचे पदार्थ संपण्याचं वेळापत्रक !

सवडीने दिवाळीचा फराळ कोणत्याही क्रमाने बनवला जावो… आवडीने संपण्याचा क्रम आमच्या घरात अगदी निश्चित ठरलेला असतो…. या वेळापत्रकात बदल नाही म्हणजे नाहीच!—-

सर्वात पहिला मान चकलीला ! त्यामुळे, सगळ्यात आधी ती संपलेली असते. “नेहमीपेक्षा जरा जास्तच खुसखुशीत झालीय नै चकली ” असं नेहमीपेक्षा जास्त कौतुक ऐकू आलं की समजावं… चकल्या संपत आल्यात  !

तिच्या पाठोपाठ करंज्या…. !! करतांना सर्वात शेवटी; पण संपताना मात्र या आघाडीवर असतात ! अर्थात, चूक त्यांची नाहीच… चार खाऊन एक आकडा मोजायचा असं ठरवल्यावर दुसरं काय होणार म्हणा..!!

चकल्या आणि करंज्या ही पहिली आघाडी संपल्यानंतरची दुसरी आघाडी बेसन लाडू आणि कडबोळी एकत्रितपणे पार पाडतात. दोनच दिवसात कडबोळ्यांच्या डब्याच्या तळाशी  तेलकट झालेला केविलवाणा टिश्यू पेपर उरलेला असतो आणि बेसन लाडवांच्या डब्यात लाडू वळतांना टोचलेले बेदाणे, दाताखाली खडा आल्यावर जसा बाजूला केला जातो, तशी उपेक्षा झाल्याने निपचित पडून असतात.– थोडक्यात, बिनीचे सर्व शिलेदार गारद झालेले असतात. चिवड्यातले काजू चाणाक्ष नजरांनी टिपलेले असतात. मग शेव-चिवडा, चहा-शंकरपाळे अशा जोड्या, किल्ला काही काळ लढवत ठेवतात.

मानाचे पाच गणपती यात्रेत आपापल्या क्रमाने गेल्यानंतर या आळीचा, त्या गल्लीचा असं करत सगळे सामील होतात तसं .. या क्रमाने फराळाचे मानाचे डबे संपल्यानंतर कुण्या काकूकडचे अनारसे, ताईकडून आलेले चिरोटे वगैरे सर्वांचा यथायोग्य समाचार घेतला जातो…

फराळाची ही भाऊगर्दी कमीच होती की काय !!! म्हणून अगदी ठरवून दिवाळीच्या या चार दिवसात, पहिल्या दिवशी नैवेद्याला बासुंदी, पाडव्याला छोले-भटुरे, घरातच एक वाढदिवस म्हणून गुलाबजाम आणि भाऊबीजेला भाऊ कित्येक दिवसांनी येणार म्हणून सूप, स्टार्टर्स, स्वीट, मेन कोर्स आणि डेझर्ट्स असं फाईव्ह कोर्स डिनर झालेलं असतं — आणि ……. 

हा अस्सा रविवार उजाडतो….अस्सा म्हणजे… आजच्यासारखा !!!

“आज मी फक्त मऊभात करणारे ” अशी घोषणा माझ्याकडून केली जाते… आणि सगळ्यांचे चेहेरे गेल्या चार दिवसांपेक्षा जास्त उजळतात ! 

पदार्थांच्या भाऊगर्दीत त्या गरमगरम मऊभाताला आणि त्यावर घेतलेल्या तूप-मेतकुटाला अमृताची चव येते. अगदी सकाळीच विरजलेलं दही आणि डावीकडचं लोणचं या आजच्या मेन्यूला फाईव्ह कोर्स डिनरच्या फाईव्ह स्टार मेन्यूपेक्षा जास्त स्टार दिले जातात… तळलेल्या पदार्थाचा खमंगपणा, मसालेदार फोडणीचा झणझणीत स्वाद, चीझ-बटर-क्रीमचा श्रीमंती थाट, तुपात तळलेल्या आणि साखरेत घोळलेल्या मिष्टान्नाची गोडी, काचेच्या प्लेट मधून आलेल्या डेझर्टची नजाकत… यातलं काही – काही नसतं त्या मऊभातात….. पण आजच्या दिवशी ‘तोच’ हवा असतो.. ‘ फक्त आणि फक्त तोच ‘ हवा असतो…… आणि हवं असतं त्याच्या साधेपणातलं समाधान….. 

–कित्येक दिवस परदेशातल्या झगमगाटात फिरून परत येतांना आपला देश दिसू लागल्यावर मनात असतं ते समाधान…… 

ब्रँडेड कपड्यांच्या दिखाऊपणानंतर एक जुनाच, पण मऊसूत कुर्ता घातल्यावर मिळतं ते समाधान….. 

पुस्तकांचं कपाट आवरतांना अचानक जुनी कवितांची वही मिळाल्यावर मिळतं ते समाधान….. 

सिल्कच्या गर्भरेशमी साड्यांच्या कपाटात आजीच्या साडीची गोधडी दिसल्यावर मिळतं ते समाधान…. 

महागड्या भेटवस्तूंच्या तळाशी आपल्यासाठी कुणीतरी हाती लिहिलेलं शुभेच्छापत्र सापडतं… त्यावेळचं समाधान…

आणि ……. आणि दिवाळीच्या पंचतारांकित मेजवान्यांनंतर रविवारच्या दुपारच्या मऊभाताचं समाधान……. 

खरं तर समाधान शोधावंच लागत नाही… ते आपल्या जवळपासच असतं !—– 

******

लेखक  . : अज्ञात. 

संग्रहिका : सुश्री स्मिता पंडित . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोठे व्हाल तसतसे अधिक बोला… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆  मोठे व्हाल तसतसे अधिक बोला… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

तुम्ही वयानं जसजसे मोठे व्हाल तसतसे अधिक बोला— असे डॉक्टर्स म्हणताहेत.. 

ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलले पाहिजे कारण स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही इतर मार्ग नाही.  अधिक बोलणे हा त्यातल्यात्यात प्रभावी मार्ग आहे. 

ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत—-

१) बोलण्याने मेंदू सक्रिय होतो आणि सक्रिय राहतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात,   विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक अबोल असतात, कमी बोलतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते.

२) बोलल्याने मनावरचा बराचसा ताण दूर होऊ शकतो, मानसिक आजार टळू शकतात. आपण बरेचदा काही बोलत नाही, पण आपल्या मनात मात्र असतं. अश्यानं आपला भावनिक कोंडमारा होऊ शकतो आणि आपण गुदमरतो. कुणी वयस्कर व्यक्ती बोलत असेल तर बोलू द्या.. 

३) बोलण्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम होतो, घशाचाही व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते. तसेच डोळे आणि कान खराब होण्याचा धोका, चक्कर वगैरे येण्यासारखे सुप्त धोकेही कमी होतात. 

थोडक्यात, ज्येष्ठ नागरिक – सेवानिवृत्त व्यक्तींना अल्झायमरसारख्या विकारांपासून स्वतःचा बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बोलणे – शक्य तितके बोलणे, इतरांशी संवाद साधणे.

म्हणून, आपण सारे अधिक बोलूया आणि इतर ज्येष्ठांनाही नातेवाईक अन  मित्रमंडळीसोबत अधिक बोलण्यास प्रवृत्त करूया…

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 113 – गीत – तुम कैसे सब सहती हो ? ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण गीत – तुम कैसे सब सहती हो ।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 113 – गीत – तुम कैसे सब सहती हो ✍

पल-पल विकल हुआ करता हूं तुम कैसे सब सहती हो।

कली सरीखी सुबह चटकती छा जाती है अरुणाई

एहसासों का सूरज सिर पर छाया करती पहुनाई

छाया कहां दहा करती है लगता तुम ही दहती हो।

लगता समय बहा जाता है कौन कहां पर ठहरा है

कामयाब क्या होगी मरहम गांव जहां पर गहरा है

नीर नयन से बहता रहता लगता तुम ही बहती हो।

क्षण भर भूल नहीं पाता हूं याद कहां से आएगी

भूल भटक कर आ भी जाए छवि अपनी ही पाएगी

ध्यान और धूनी में क्या है केवल तुम ही रहती हो ।

पल-पल विकल हुआ करता हूं तुम कैसे सब सहती हो।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares