मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆ 

मैत्र क्षणांचे लिहून बरेच महिने उलटून गेले असतील. लोकलमध्ये भेटलेल्या काहीजणींच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. या भेटलेल्या प्रत्येकीमुळे माझ्यात काही ना काही बदल झाला हे नक्की. बावीस वर्षांचा रोज सरासरी साडेतीन तास एवढे माझ्या लोकल प्रवासाचे आयुष्य आहे. आपण अजून जिवंत आहोत ना हे बघायचे असेल तेव्हा मी सरळ उठते आणि लोकलने कुठे तरी जाऊन येते. जाताना गर्दी नसेल अशी वेळ निवडायचे पण येताना अगदी चेंगराचेंगरीत लोकलमध्ये चढायचे. असा प्रवास आणि लोकलमधले वातावरण याने पुढील काही महिने जगण्याची ऊर्जा मिळते. पण करोनाने सर्वसामान्यांसाठी ट्रेनचा प्रवास बंद होता. तेव्हा काही कारणाने रेल्वे स्थानकाच्या आसपास जावे लागले. ती ओकीबोकी स्टेशनं बघून खरच भडभडून आले. 

लोकल बंद मग त्यावर अवलंबून असलेल्या फेरीवाल्या कुठे गेल्या असतील हा विचार मनात येत असतानाच डोळ्यांसमोर उमा आली. तिला अगदी ती तीन-चार महिन्यांची असल्यापासून मी ओळखते. एका अंध जोडप्याची मुलगी. ते जोडपे लोकलमध्ये भीक मागायचे. त्या दोघांची प्रेमकहाणी आणि लग्न या सर्वांची मी साक्षीदार होते. पण ते दोघे जरा तिरसट असल्याने इतरांप्रमाणे त्यांच्याशी कधी संवाद व्हायचा नाही. त्यांना मुलगी झाली. मग ती बाई त्या छकुलीला घेऊनच लोकलमध्ये येऊ लागली. फार गोंडस मुलगी होती. सर्व प्रवासी महिलांसाठी अगदी कौतुकाचा विषय होती. तिची आई खूप प्रोटेक्टिव्ह होती. तुमची मुलगी खूप गोड आहे हो असे मी एकदा तिला म्हटलं त्या क्षणी तिने आपल्या मुलीभोवतीची मिठी अजूनच आवळली. उमा नाव ठेवल्याचे थोडे दिवसांनी तिने मला आपणहूनच सांगितले. एक दिवस उमाच्या वडिलांनी विचारले, आमची उमा गोरी आहे का काळी? ‘ छान गोरी आहे. आणि तिचे डोळे खूप बोलके आहेत.’ हे ऐकताच ते दोघेही खूप खूष झाले. उमा मोठी होत होती. दोन वर्षांची असल्यापासून ती आईवडलांना कोणते स्टेशन आले ते सांगू लागली होती. आम्हालाही फार गंमत वाटायची. ती अतिशय हुशार होती. तीन वर्षांची झाल्यावर लोकलमधल्याच प्रवाशांनी आग्रह करून तिला शाळेत घातले. दोन वर्षे नियमित शाळा सुरू होती. तिला भाऊ झाल्यानंतर आईवडलांच्या मदतीसाठी उमाची  शाळा सुटली. भाऊ झाल्याचा तिला खूप आनंद झाला होता. गणेश नाव ठेवल्याचे तिने पूर्ण डब्यातल्या बायकांना सांगितले होते. तिच्या वयापेक्षा जास्त मोठी बनून ती  आपल्या भावाला सांभाळत होती. सोबत आणलेल्या बाटलीतले दूध नासले नाही ना हेही ती तपासायची. उमा-गणेश लोकलमध्येच मोठे होत होते. उमा पुन्हा शाळेत जाऊ लागली. पण काही महिन्यात शाळा सुटली. नेरूळचे तिचे घर पडले. ते घणसोलीला रहायला गेले. मग शाळा सुटली ती सुटलीच. आईवडलांना तर शाळा हा विषय बिनमहत्त्वाचा होता. पण उमाला शिकायची आवड होती. ती जेवढं शिकली होती, त्याचा ती सारखा सराव करायची. एक दिवस मला म्हणाली, “ मॅडम मला एबीशी शिकवा ना. तिला मी ए टू झेड अक्षरे एका कागदावर लिहून दिली आणि मग गिरवून घेतली. दोन दिवसांनी भेटली तेव्हा तिला अक्षर येऊ लागली होती.  मग लोकलवर चिकटवलेल्या जाहिरातीतील अक्षर ओळखण्याचा तिला नादच लागला. तिचे पालक भीक मागत तेव्हा ती दारात शांतपणे बसून  असे. एक दिवस रुमाल विकायला आणले.  सात-आठच होते पण ती आनंदात होती. मी विचारले कुठून आणले ग. एका ताईने तिच्याकडचे दिले. मला पैसे देणार आहे. एवढं सांगून घाईने निघून गेली. परत भेटली तेव्हा म्हणाली मला सगळे भिकाऱ्याची पोरगी म्हणून चिडवतात. मला आवडत नाही. काही माल विकायचा तर पैसे नाहीत. मग मी असाच माल विकून पैसे जमवणार आणि मी पण  वेगवेगळा माल विकणार. त्यावेळी तिचे वय फक्त आठ होते. मला खूप कौतूक वाटले. उमा खूप दिवसांनी भेटली. गणेशला आश्रमशाळेत घालणार असल्याचे सांगितले. तळेगावच्या  आश्रमशाळेची  माहिती तिला गाडीतल्याच कोणी तरी दिली होती. खूप खूष होती. काही दिवसांनी मी पण शिकायला जाणार, असेही तिने सांगितले. मध्येच एकदा सगळे तळेगावला जाऊन आले. जूनपासून दाखला झाला होता. भावाचे शिक्षण मार्गी लागणार याचा तिला खूप आनंद झाला होता. आपलेही शिक्षण सुरू होईल ही आशा होती. काही दिवस ती गाडीला दिसायची. नंतर ते सर्वचजण गायब झाले. गाडीत येणे बंद झाले. नक्की कुठे गेले कोणत्याच फेरीवाल्यांना माहित नव्हते. गणेशचे शिक्षण सुरू झाले असेल का? उमाच्या स्वप्नाचे काय? या प्रश्नांनी मी अस्वस्थ होते. जरी शिक्षण सुरू झाले असले तरी लॅाकडाऊनमध्ये पुन्हा बंद पडलं असेल. खरंच एक हुषार मुलगी, आपल्या भावावर आईसारखी माया करणारी बहीण, आणि वयापेक्षा जास्त प्रगल्भ असलेली मुलगी परत कधीच बघायला मिळाली नाही. आता एकदा जाऊन उमाला शोधणार आहे हे नक्की.  

लेखिका – सुश्री  स्वाती महाजन -जोशी

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

रुक्मिणी कृष्णाला विचारते ,” आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही. असे का ? “

कृष्ण काहीही उत्तर देत नाही.

एकदा कृष्णाच्या छातीत जळजळ होत असते. कृष्ण अस्वस्थ असतात. सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही. वैद्यही हात टेकतात. रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. “आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही ताबडतोब अमलात आणू.”

श्रीकृष्ण म्हणतात, ” जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा. मला बरं वाटेल. “

महालातील सर्व जण आपल्या पायाची धूळ द्यायला नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते, ” मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ ? माझी योग्यताच नाही, सात जन्म मी नरकात जाईन.”

हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते. इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुख्मिणीसारखाच विचार करतात. आणि चरणरज राजवाड्यावर पोहचत नाही. 

दवंडी पिटणा-यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एक जण गोकुळात जातो.

दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात, “ काय करायला लागेल ते सांगा ! “

“ एका घमेल्यात बारीक रेती आणलेली आहे .त्यात उभे रहायचे आणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभूंच्या वक्षस्थळी लावू. मात्र माती तुडवणारा प्रभूंचा खरा  भक्त असला पाहिजे. यानेच दाह मिटेल.”

गोपी विचारतात, “ मग  रुख्मिणीमातेने असे नाही केले ?”

दवंडीवाला सांगतो,  ” प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल  असं त्या म्हणाल्या.”

सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या, ” जर  श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय, शंभर जन्मही नरकात राहू. द्या ती माती  इकडे.” आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.

पुढे ही माती श्रीकृष्णाच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो.

मित्रांनो हेच ते “गोपीचंदन”.  याने दाह कमी होतो.

संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव   आणि शेवटी तात्पर्य(लघुकथा संग्रह)

मूळ लेखिका     हंसा दीप

अनुवाद            उज्ज्वला केळकर

प्रकाशक           मिलिंद राजाज्ञा

पृष्ठे                  १८४

किंमत              रु. ३३०/-

नुकताच,  सौ उज्ज्वला केळकर यांचा, “आणि शेवटी तात्पर्य ..”हा अनुवादित कथासंग्रह वाचनात आला.

यात एकूण १७ कथा आहेत आणि त्यांच्या, मूळ हिंदी लेखिका, कॅनडास्थित डॉक्टर हंसा दीप या आहेत.

डॉक्टर हंसा दीप या मूळच्या भारतातल्याच. त्या आदिवासी बहुल परिसरात जन्मल्या, वाढल्या, शिक्षित झाल्या.  त्यांनी शोषण, भूक, गरिबीने त्रस्त झालेल्या आदिवासींचे, तसेच परंपरांशी झुंजत, विवशतांशी लढणाऱ्या मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून अनुभवले. त्यातूनच या कथा जन्माला आल्या.सृजन व संघर्षाचा अनुभव देणाऱ्या, या सुंदर कथांचं,  नेहमीप्रमाणेच उज्ज्वला ताईंनी केलेले अनुवाद लेखन, तितकंच प्रभावी आणि परिणामकारक आहे, हे या कथा वाचताना जाणवतं.

यातली पहिलीच, शीर्षक कथा ..”आणि शेवटी तात्पर्य ..”वाचताना, एक सहज वास्तव मनाला स्पर्शून जातं.  परदेशातले एक मंदिर आणि तिथे ध्यान धारणेसाठी जमलेली परदेशस्थित, भारतीय तरुण, वृद्ध, मध्यमवर्गीय माणसे. त्यांचे आपापसातले संवाद, चर्चा, आणि एकंदरच, वरवरचं  भासणारं वातावरण. या भोवती मंदिरातल्या पंडितांचही जोडलेलं, पोटासाठीचं भक्तिविश्व. केवळ एक व्यवसाय. आणि या सर्वांचे, शेवटी तात्पर्य काय तर मंदिरात येणारे भाविक आणि पंडित यांचा उथळपणा.

‘आपण काही क्षण तरी नतमस्तक झालो’, इतकेच श्रद्धेचे मापदंड.आणि त्यांच्या भावना एनकॅश करणारे पंडीत.  याचे सहज प्रतिबिंब, या कथेत उमटले आहे.

पोपटी पान पिवळं पान… या कथेत एका वृद्ध असहाय झालेल्या, एकेकाळच्या प्रख्यात डॉक्टरांची, एकाकी मानसिकता, त्याला बेबी सिटिंग च्या निमित्ताने सापडलेल्या, काही महिन्यांंच्या बाळासोबत झालेल्या दोस्तीमुळे, कशी बदलते, याचं अत्यंत भावस्पर्शी, अद्भुत वर्णन वाचायला मिळतं.

प्रतिबिंब…. ही कथा तर अत्यंत ह्रदयस्पर्शी आहे. नातीच्या आणि आजीच्या नात्याची ही कथा अतिशय भावपूर्ण, सहज बोलता बोलता लिहिली आहे.

जी आजी, नातीला लहानपणी  प्रॉब्लेम आजी वाटायची, तीच आजी, नात स्वतः मोठी झाल्यावर तिच्या अस्तित्वात कशी सामावून जाते, या प्रवासाची ही एक सुंदर कहाणी.

रुबाब… ही कथा लहान मुलांच्या विश्वाची असली तरी, माणसाच्या जीवनात पॉवर ही कशी काम करते, आणि त्यातूनच लाचखोरीची वृत्ती कशी बळावते, याचीच सूचना देणारी, काहीशी रूपकात्मक कथा वाटते.

मला नाही मोठं व्हायचंय… या कथेतील शेवटची काही वाक्यं मनाला बिलागतात.  कथेतल्या परीचे बालमन का दुखतं, त्याचं कारण हे शब्द देतात.

“मोठ्या लोकांना कळतच नाही की, जे तिने बघितले आहे,तिला आवडले आहे तेच काम ती करू शकेल ना? तिला पसंत असलेलं प्रत्येक काम ही मोठी माणसं रिजेक्ट का करत आहेत? तिच्या ‘मी कोण होणार’ या कल्पनेला का डावलतात?”

मग तिने मोठे होण्याचा विचारच मनातून काढून टाकला. वरवर ही बालकथा वाटत असली तरी, ती रूपकात्मक आहे, माणसाच्या जीवनाला एक महत्वाचा संदेश देणारी आहे.

छोटुली…  या कथेतल्या बालकलाकारावर, पालकांच्या प्रसिद्धी, पैसा, एका ग्लॅमरच्या मोहापायी होणारा आघात अनुभवताना, मन अक्षरशः कळवळते.

तिचं सामर्थ्य… ही कथा एका शिक्षण संस्थेत असलेल्या, द्वेषाच्या स्पर्धेवर प्रकाश टाकते.मिस हैली,एक प्राध्यापिका, तिच्यावरचे आरोप ती कशी परतवून लावते,आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करते याची ही ऊत्सुकता वाढवणारी  कथा ,खूपच परिणामकारक आहे.

प्रोफेसर …ही कथा फारशी परिणामकारक नसली तरीही प्रोफेसर, विद्यार्थी, शिक्षणाबद्दलची अनास्था, राजकारण आणि या पार्श्वभूमीवर अधिकार आणि कर्तव्य याची, उपरोधिक, उपहासात्मक केलेली उलगड, ही चांगल्या प्रकारे  झाली आहे.

पाचवी भिंत… ही कथा समता सुमन या निवृत्त होणार्‍या,शाळेत प्राचार्य असलेल्या व्यक्तीच्या राजकारण प्रवेशाची आहे. काही धक्के बसल्यानंतर, राजकारण की पुन्हा शांत जीवन, या द्वद्वांत सापडलेल्या मनाची ही कथा खूपच प्रभावी आहे. आणि शेवटी समताने स्वीकारलेले आव्हान, आणि तिचे खंबीर मन, या कथेत अतिशय सुंदररित्या चितारले आहे.

रुपेरी केसात गुंतले ऊन… ही कथा तशी वाचताना हलकीफुलकी वाटली तरी, त्यात मनाच्या गाभाऱ्यातलं एक गंभीर खोल सत्य जाणवतं. आठवणीत रमलेल्या चार वृद्ध बहिणींच्या गप्पा, या कथेत वाचायला मिळतात.

“आतलं दुःख आजच काढून टाकायचं. हसून ,घ्यायचं.”

कुंडीतील सुकलेली फुले, पुन्हा नव्याने ताजी होत होती …..ही काही वाक्यं अंतराचा ठाव घेतात.

बांधाच्या खांद्यावर नदी.. .या कथेत भावनिक आंदोलनात सापडलेली स्त्री, अखेर त्यातून स्वतःच कशी सावरते, याचे एक सकारात्मक भावचित्र रेखाटलं आहे.

मधमाशी…ही कथा उल्लेखनीय आहे. अतिशय तरल भावनेला, बसलेला धक्का,यात अनुभवायला मिळतो.

तिचं हसू …..ही कथा जाणीवा नेणीवांच्या पलीकडची आहे.  या कथेत एका अकल्पित प्रेमाची ओळख होते. चूक की बरोबर या सीमारेषांच्या पलीकडे गेलेली, ही कथा मनाला घट्ट धरून ठेवते.

समर्पण…. या कथेत कोरोनाचा तो एक भयाण असा विनाशकारी काळ ,एका वेगळ्याच मानवतेचं ही दर्शन देतो. एक वृद्ध रुग्ण, स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा, एका तरुण रुग्णाच्या,  संपूर्ण भविष्याचा विचार करून मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होते.

“त्याला या वेंटिलेटरची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. मी माझं आयुष्य जगले आहे. त्याचं जगणं महत्त्वाचं आहे.” असं डॉक्टरांना सांगून ती तिच्या जीवनाचे समर्पणच करते. अतिशय सुंदर कथा!

माझ्या घरच्या आघाडीवर….. ही कथा तशी हलकीफुलकी असली तरी परिवाराच्या सौंदर्याची मेख सांगणारी आहे. स्त्री सवलीकरणाच्या आंदोलनापासून, सुरुवात होणाऱ्या या कथेत, अंदोलनातला रुक्षपणा पटवून देणारी, काही वाक्यं मनाला फारच पटतात.

सविता, नेहा, एलिसिया, आणि यापूर्वी पाहिलेली आजी, आई, यांचा रुबाब सुयशच्या विचारांना नवी दिशा देतात. हे चेहरे त्याला आपले वाटतात. त्यांच्या धमकी भरलेल्या आवाजातही,प्रेम स्त्रवस्त असतं. ते संबंध परिवाराचा अर्थ शिकवतात. हे त्याला जाणवतं.थोडक्यात,या कथेत स्त्रियांच्या अनोख्या शक्तीत घेरलेलाच एक नायक आपल्याला भेटतो.

भाजी मंडई ….या कथेत एक विश्वस्तरीय समारंभात, देश विदेशी साहित्यिकांनी, स्वतःच्या सन्मानासाठी उठवलेला अभूतपूर्व गोंधळ अनुभवायला मिळतो. त्यातून प्रसिद्धीसाठी हापापलेल्यांचे मनोदर्शन अत्यंत वास्तविकपणे उभे रहाते.

अशा विविध विषयांवर हाताळलेल्या या सर्वच कथा मनोरंजना बरोबरच एक प्रकारचं ब्रेन वॉशिंगही करतात. आयुष्यात घडणाऱ्या बिन महत्वाच्या, साध्या, घटनातूनही आशय पूर्ण संदेश देण्याची, लेखिकेची क्षमता, कौतुकास्पद आहे.

आणि शेवटी तात्पर्य काय?.. तर एक अनोखे उत्कृष्ट कथा वाचनाचे समाधान!! उज्ज्वला ताईंची भाषांतर माध्यमांवर असलेली जबरदस्त पकड, याची पुनश्च जाणीव. त्यांचे अनुवादित लेखन, इतकं प्रभावी आहे की कुठेही मूळ कथा वाचनाचा, वाचकाचा आनंद, हिरावला जाऊच शकत नाही.  त्यासाठी आपल्याच संस्कृतीत रुजणाऱ्या कथांची, त्यांची निवड ही उत्तम आणि पूर्ण असते.

वास्तविक या कथा परदेशी वातावरणात घडलेल्या आहेत. पण तरीही त्या तिथल्या भारतीयांच्या आहेत. आपल्या संस्कृतीशी जुळणाऱ्या आहेत. म्हणून त्या वाचकाशी कनेक्ट होतात.

विचारांना समृद्ध करणाऱ्या या कथासंग्रहाबद्दल मूळ हिंदी लेखिका डॉक्टर. हंसा दीप (टोरांटो कॅनडा) आणि अनुवादिका सौ उज्ज्वला केळकर या दोघींचेही आभार आणि मनापासून अभिनंदन!!

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #142 ☆ दर्द की इंतहा ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख दर्द की इंतहा। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 142 ☆

☆ दर्द की इंतहा

‘दर्द को भी आधार कार्ड से जोड़ दो/ जिन्हें मिल गया है दोबारा ना मिले’ बहुत मार्मिक उद्गार, क्योंकि दर्द हमसफ़र है; सच्चा जीवन-साथी है; जिसका आदि-अंत नहीं। ‘दु:ख तो अपना साथी है’ गीत की ये पंक्तियां मानव में आस्था व विश्वास जगाती हैं; मन को ऊर्जस्वित व संचेतन करती है। वैसे तो रात्रि के पश्चात् भोर,अमावस्या के पश्चात् पूर्णिमा व दु:ख के पश्चात् सुख का आना निश्चित है; अवश्यंभावी है। सुख-दु:ख दोनों मेहमान हैं और एक के जाने के पश्चात् ही दूसरा दस्तक देता है।

समय निरंतर अबाध गति से चलता रहता है; कभी रुकता नहीं। सो! जो आया है अवश्य जाएगा। इसलिए ऐ मानव! तू किसी के आने की ख़ुशी व जाने का मलाल मत कर। ‘कर्म-गति अति न्यारी/ यह टारे नहीं टरी।’ इसके मर्म को आज तक कोई नहीं जान पाया। परंतु यह तो निश्चित् है कि ‘जैसा कर्म करता,वैसा ही फल पाता इंसान’ के माध्यम से मानव को सदैव सत्कर्म करने की सीख दी गयी है। 

अतीत कभी लौटता नहीं और भविष्य अनिश्चित् है। परंतु भविष्य सदैव वर्तमान के रूप में दस्तक देता है। वर्तमान ही शाश्वत् सत्य है,शिव है और सुंदर है। मानव को सदैव वर्तमान के महत्व को स्वीकारते हुए हर पल को ख़ुशी से जीना चाहिए। चारवॉक दर्शन में भी ‘खाओ-पीओ,मौज उड़ाओ’ का संदेश निहित है। आज की युवा पीढ़ी भी इसका अनुसरण कर रही है। शायद! इसलिए ‘वे यूज़ एंड थ्रो’ में विश्वास रखते हैं और ‘लिव इन’ व ‘मी टू’ की अवधारणा के पक्षधर हैं। वे पुरातन जीवन मूल्यों को नकार चुके हैं,क्योंकि उनका दृष्टिकोण उपयोगितावादी है। वे अहंनिष्ठ क्षणवादी सदैव हर पल को जीते हैं। संबंध-सरोकारों का उनके जीवन में कोई मूल्य नहीं तथा रिश्तों की अहमियत को भी वे नकारने लगे हैं,जिसका प्रतिफलन पति-पत्नी में बढ़ते अजनबीपन के एहसास के परिणाम-स्वरूप तलाक़ों की बेतहाशा बढ़ती संख्या को देखकर लगाया जा सकता है। सब अपने-अपने द्वीप में कैद एकांत की त्रासदी झेलने को विवश हैं,जिसका सबसे अधिक ख़ामियाज़ा उनके आत्मज भुगत रहे हैं। वे मोबाइल व मीडिया में आकण्ठ डूबे रहते हैं और नशे की लत के शिकार हो रहे हैं जिसका विकराल रूप मूल्यों के विघटन व सामाजिक विसंगतियों के रूप में हमारे समक्ष है। संयुक्त परिवार टूट रहे हैं,रिश्तों की अहमियत रही नहीं और अपहरण,फ़िरौती,दुष्कर्म व हत्या के हादसों में निरंतर इज़ाफा हो रहा है। चहुंओर संशय व अविश्वास का वातावरण व्याप्त है,जिसके कारण इंसान पल भर के लिए भी सुक़ून की साँस नहीं ले पाता। 

दूसरी ओर अमीर-गरीब की खाई सुरसा के मुख की भांति बढ़ती जा रही है और हमारा देश इंडिया व भारत दो रूपों में विभाजित परिलक्षित हो रहा है। एक ओर मज़दूर,किसान व मध्यमवर्गीय लोग,जो दिन-भर परिश्रम करने के पश्चात् दो जून की रोटी भी नहीं जुटा पाते और आकाश की खुली छत के नीचे अपना जीवन बसर करने को विवश हैं। दूसरी ओर बाल श्रमिक शोषण व बाल यौन उत्पीड़न का घिनौना रूप हमारे समक्ष है। एक घंटे में पांच बच्चे दुष्कर्म का शिकार होते हैं; बहुत भयावह व चिंतनीय स्थिति है। दूसरी ओर धनी लोग और अधिक धनी होते जा रहे हैं,जिनके पास असंख्य सुख-सुविधाएं हैं और वे निष्ठुर, संवेदनहीन, आत्मकेंद्रित व निपट स्वार्थी हैं। शायद! इसी कारण गरीब लोग दर्द को आधार-कार्ड से जोड़ने की ग़ुहार लगाते हैं,ताकि छल-कपट से लोग पुन: वे सुविधाएं प्राप्त न कर सके। उनके ज़हन में यह भाव दस्तक देता है कि यदि ऐसा हो जायेगा तो उन्हें जीवन में पुन: अभाव व असहनीय दर्द सहन नहीं करना पड़ेगा,क्योंकि वे अपने हिस्से का दर्द झेल चुके हैं। परंतु इस संसार में यह नियम लागू नहीं होता। भाग्य का लिखा निश्चित् होता है,अटूट होता है,कभी बदलता नहीं। सो! उन्हें इस तथ्य को सहर्ष क़ुबूल कर लेना चाहिए कि कृत-कर्मों का फल जन्म-जन्मांतर तक मानव के साथ-साथ चलता है और उसे अवश्य भोगना पड़ता है। इसलिए सुंदर भविष्य की प्राप्ति हेतू सदैव अच्छे कर्म करें ताकि भविष्य उज्ज्वल व मंगलमय हो सके।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

14 जुलाई 2022.

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Book-Review ☆ Garden of Fragility by Ms. Neelam Saxena Chandra ☆ Ms. Meera Bhansali ☆

(What’s life? It’s a garden of fragility. Nothing is permanent – be it murkiness, nothingness or happiness. Life is meant to take you through various paths during its journey, and you are ultimately meant to enjoy treading on them – for it is after all a garden and gardens are known for their fragrance. “The Garden of Fragility” is a collection of fifty poems written by Limca Book of Records Holder, Ms. Neelam Saxena Chandra, that make you understand the different facets of life.)

(Ms. Neelam Saxena Chandra)

☆ English Literature – Book-Review ☆ Garden of Fragility by Ms. Neelam Saxena Chandra ☆ Ms. Meera Bhansali ☆

Title : Garden of Fragility

Author : Neelam Saxena Chandra.

Publication : AKS publishing house.

Price : 175.00

Kindle Price: 49.00

Amazon Link – 👉  Garden of Fragility

Book review by Ms. Meera Bhansali

The Garden of Fragility is a collection of fifty heart whelming poems . The very first poem ” Poetry” touched me and I found an instant connection to it. The latter poems “Lovers”, “Carving a poem”, “A poet”, “Poetry”, “poems” resonated and defined what it is to be a poet. The poems are not in any particular sequence, they are like a bouquet of flowers that one would pluck from the wilderness and make an enchanting memento. The free verse  of the poems add to the free flowing thought process of the mind and there is a silent smoothness as one goes through them one after another. The poems are bounded, together in a very natural process by imagery of plants, garden and in general by nature.

Poems like ” The Sadhvi Speaks” brings out societies vulnerability due its superstitious beliefs. The poems all different but in unison driving home the point that as humans we are fragile and through up and downs , emotional roller coaster, one needs to go through it, face it head on and never give upon hope, the light that is within us. The collection ends with the apt poem “Sun in your soul”

“When the going gets tough,

Look within !”

After reading the poems, I did find my emotions fragile and understood the relevance of the title “The Garden of Fragility”

The language of the book is conducive for all age groups. The poetess has refrained from using bombastic language, making it a very simple yet impactful read. If you want to explore your own emotions then this monsoon, on a rainy day, with a hot cup of chai, this poetry book will definetly keep you melancholic company .

© Meera Bhansali

Email  – meerabhansali7@gmail.com

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विरोधाभास ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – विरोधाभास ??

सम्बंधों में खाई चोट का

दोष किसीको दूँ भी तो कैसे,

बटोरना उनका तंत्र रहा,

बाँटना मेरा मंत्र रहा,

पलड़े के एक ओर

दोनों साथ तुलते भी कैसे?

© संजय भारद्वाज

प्रात: 7:40 बजे , 16 जुलाई 2022

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #141 ☆ भावना के दोहे… ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं  “भावना के दोहे …।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 141 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे … ☆

पीड़ा मेरी समझ लो, धरती करे पुकार।

आकुल व्याकुल हो रही, डाल रहे क्यों भार।।

 

धरती कबसे कह रही, सुन लो मेरी बात।

हरियाली छीनों नहीं, छिन जायेगी रात।।

 

आँसू बहने लगे है, सहते सहते भार।

अब मैं तुमसे क्या कहूँ, लगी मानने हार।। 

 

समझ गए हैं आज हम, तेरी पीड़ा आज।

दूर करें हम गंदगी, तभी धरा पर राज।।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : bhavanasharma30@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #130 ☆ एक बुन्देली पूर्णिका ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत हैं आपकी  “एक बुन्देली पूर्णिका। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 130 ☆

☆ एक बुन्देली पूर्णिका ☆ श्री संतोष नेमा ☆

अब साँचो सो प्यार कितै है

माँ  को  प्रेम  दुलार  कितै है

 

पलना  घर  में  पलते  बच्चा

बचपन को  संस्कार  कितै है

 

धरम  पै  करते  चोट  अधर्मी

इनको    बंटाधार    कितै   है

 

गुडिमुड़ी   से   हो   रये   सबरे

इनमें  अब  फुफकार  कितै है

 

दुख   में   देखो   परे    अकेले

पहलऊं  सो व्यबहार  कितै  है

 

फाँसी  लगा  किसान  मरत  हैं

अब  हितुआ सरकार  कितै  है

 

हरई  काम   में   पूछत   तुम्हरो

“संतोष” अब  आधार  कितै  है

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मार्गदर्शक चिंतन॥ -॥ क्रोध ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ मार्गदर्शक चिंतन

☆ ॥ क्रोध ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

अनेकों प्रमुख मनोविकारों में क्रोध भी एक है। क्रोध मन मस्तिष्क और शरीर तथा व्यवहारों पर गहरा असर डालता है। सबको अनुभव होता है कि क्रोध से बनता हुआ काम भी बिगड़ जाता है। ये और बात है कि कभी क्रोध के कारण दूसरे के मन में उत्पन्न हुये भय से भयभीत होकर व्यक्ति, क्रोधी की कामना के आगे आत्मसमर्पण कर देता है किन्तु समर्पण करने वाले के मन में क्रोधी के प्रति दुर्भावना बढ़ जाती है एवं उससे बदला लेने की भावना भी जाग जाती है। कभी-कभी यह भावना बहुत तेज हो जाती है। जो वर्षों तक बनी रहती है। वर्षों बाद मौका मिलते ही बदला ले लिये जाने का प्रयास होता है। ऐसी घटनाओं से इतिहास भरा पड़ा है।

इच्छानुकूल कार्य न होने के कारण व्यक्ति के मन में क्रोध उत्पन्न होता है। क्रोध आने पर शरीर में जैसे आग लग जाती है, सोचने विचारने की शक्ति गायब हो जाती है। सही गलत की पहचान करने की शक्ति क्षीण हो जाती है। इसीलिये कभी देखा जाता है कि क्रोध में आदमी अपना सिर स्वयं दिवार पर पटक लेता है हाथ में कोई कीमती वस्तु हो तो भी उसे फेंक कर तोड़ डालता है। द्वेष में आकर अन्य व्यक्ति को मारता पीटता और सीमा से अधिक क्रोध में फंस कर मार डालने की न केवल बातें करता है वरन वैसा ही व्यवहार भी कर डालता है। क्रोध घोर अनर्थकारी होता है जो जीवन में अचानक उद्वेग लाकर प्राय: अनुचित व्यवहार करने की प्रबल प्रेरणा जगाता है। क्रोध का मनोविकार हर व्यक्ति या प्राणी में भिन्न-भिन्न वेग का होता है। मनुष्य में ही नहीं पशु पक्षियों में भी क्रोध का आवेग देखा जाता है। इसलिये उनमें आपस में लड़ाई होने लगती है। क्रोध के कारण ही दो देशों के बीच वैमनस्य और युद्ध होते हुये देखे जाते हैं। विश्वयुद्धों का मूल कारण एक राष्ट्र की इच्छा के अनुसार दूसरे का कार्य न करना ही रहा है और परिणामत: दूसरे विश्वयुद्ध में परमाणु बम के प्रयोग से जापान में याकोहामा और नागासाकी का घोर विध्वंस हुआ। जिसने मनुष्य जाति को दहला दिया है और युद्ध के विपरीत शांति की सोच की ओर मोड़ दिया है। इस समझदारी से 24 अक्टूबर 1945 को विश्व की महाशक्तियों ने मिलकर संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना की जिससे भविष्य में विश्वयुद्ध की पुनरावृत्ति न हो।

क्रोध सदा ही व्यक्ति, समाज, राष्ट्र या विश्व में मनुष्य जाति का अहित करता आया है। यदि मन में आवेग पर अधिकार रखा जा सके तो क्रोध को रोका जा सकता है। क्रोध को रोकने के लिये आत्मनियंत्रण को सबल बनायें। क्रोध आने के पहले ही समझदारी और चिंतन से ऐसा किया जाना संभव है। क्योंकि एक बार क्रोध का आवेश अचानक आ जाने पर तुरंत कोई उपाय काम नहीं करता। क्रोध में न सोच विचार किया जा सकता है न ही उसे तुरंत रोका जा सकता है। समझदारी जरूरी है। निम्न उपायों से क्रोध को रोकने का प्रयास किया जाना चाहिये।

  1. क्रोध बुरा है इसलिये इसे उत्पन्न ही न होने दें, ऐसे मनोभाव बनायें जावें। सुंदर सुखद काल्पनिक दृश्यों का व सुन्दर मनोअंकन किया जावे।
  2. क्रोध रोकने हेतु स्वत: को ऐसे प्रिय कार्य में व्यस्त रखने का प्रयास करें जिससे मन प्रसन्न हो अपनी हॉबीज में मन लगायें।
  3. मन को कुछ पढऩे या सुखद अनुभव दे सकने वाले कार्य करने की बात सोचें और मन को बहलाकर रखें।
  4. जहां अप्रिय क्रोधदायी घटना की संभावना दिखे वह स्थान छोडक़र किसी जलाशय, प्रिय प्राकृतिक स्थल या रमणीक कलात्मक कलावीथी की ओर जाकर मन के भाव को नया मोड़ दें।
  5. मित्रों सहयोगियों या संबंधियों के साथ सुखद वार्तालाप में लिप्त होकर क्रोध की संभावित स्थिति को टाल दें।
  6. पुराने इस कथन में भी बड़ी सच्चाई है कि क्रोध आने पर पानी पियें। दस तक गिनती गिने या जीभ को दबाकर मन में ईश्वर का ध्यान करें।

योग के द्वारा मन की चंचलता को रोककर बुराई से बचने का उपदेश बहुत सही और परिणामदायी कहा गया है। किसी भी स्थिति में क्रोध को उत्पन्न ही न होने देने का प्रयास करें।

 © प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

 ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, म.प्र. भारत पिन ४६२०२३ मो ७०००३७५७९८ apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

१. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा आज स्मृतीदिन.  ( इ.स. १९२९ – २२ जुलै २०११ )

सुरेशचंद्र नाडकर्णी  हे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. मराठी लेखक होते. गझलचे अभ्यासक होते आणि संगीततज्ज्ञही होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय क्रीडासमीक्षकही होते. गझल आणि रुबाई या दोन्ही प्रकारचा त्यांचा मुळापासून अभ्यास होता. मराठी आणि उर्दू दोन्ही भाषेत त्यांनी वरील दोन्ही प्रकारात विपुल काव्यरचना केली आहे. उर्दू काव्यावर त्यांनी पीएच. डी. मिळवली होती. ‘उंबराचे फूल ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह. तसेच  ‘गजल’ हे ‘गजल ‘ काव्यप्रकाराला वाहिलेले पुस्तक त्यांनी लिहिले. सुरेश भट या आपल्या मित्राच्या आग्रहामुळे त्यांनी मराठीत गजला व रुबाया लिहिल्या.

वाडिया कॉलेजमधे ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी अध्यापनाबरोबरच अनेक विषयांवर संशोधन व लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहेत. ‘साप्ताहिक स्वराज्य’मधे ते एके काळी हिन्दी गाण्यांचे रसग्रहण लिहीत असत। क्रीडासमीक्षाही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘ क्रीडा ज्ञानकोश ’,  ‘‘अ‍ॅथलॅटिक्समधील सुवर्ण पदकाच्या दिशेने ’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील नैपुण्याची साक्ष देतात.

सुरेशचंद्र नाडकर्णी यांची पुस्तके –

१.    ‘उंबराचे फूल’ (कविता संग्रह), 

२.    गजल,

३.   बहुरंग ( लेखसंग्रह ), 

४.  सदानंद – सुखी माणसाचा सदरा इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

याशिवाय विज्ञानाशी संबंधितही  त्यांची पुस्तके आहेत.

श्री. नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

२.  मराठी ग्रामीण कवी, बहुढंगी कथालेखक, चतुरस्त्र ग्रामीण कादंबरीकार म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा श्री. गजानन लक्ष्मण ठोकळ यांचा आज स्मृतीदिन. ( २६ मे १९०९ – २२ जुलै १९८४ ). 

ग.ल. ठोकळ यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव इथे झाला. त्यांचे गाव कायम दुष्काळी व कोरडवाहू शेती असलेले होते. त्यांच्या ग्रामीण कथा – कादंबर्‍यातून प्रामुख्याने हे वर्णन दिसून येते. त्यातून ग्रामीण माणसे साधी – भोळी, सरळ मनाची, आपुलकी- आत्मीयता जपणारी, आतिथ्यशील अशी दाखवलेली आहेत, तर शहरी माणसे बेरकी असल्याचे दाखवलेले आहे, हे सर्वात आधी सांगावेसे वाटते. 

त्यांच्या आईला वाचनाची आवड होती, आणि तिने आणलेली सगळी पुस्तके ते वाचून काढत असत. वयाच्या  १६व्या वर्षी त्यांची ‘आकाशगंगा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. आणि नंतर “ श्री लेखन वाचन भांडार “ हे दुकान सुरू केले, जे वाचकांचे आकर्षण ठरले होते . या जोडीनेच ‘ ४०० हून जास्त मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे प्रयोगशील प्रकाशक ‘ अशीही ख्याती त्यांनी मिळवली होती. 

ते अव्वल दर्जाचे कथालेखक तर होतेच, पण स्वतःची वेगळीच शैली जोपासणारे उत्तम कवीही होते . तेव्हा प्रसिद्ध असणाऱ्या रविकिरण मंडळातील कवींचा त्यांच्यावर जरी प्रभाव होता, तरीही कवी म्हणून त्यांचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य होते , आणि ते म्हणजे त्यांच्या कवितेत ठळकपणे दिसणारे ग्रामीण जीवनाचे अस्सल, गहिरे रंग . पण जनमानसात आणि साहित्यविश्वातही  “ कथाकार “ हीच त्यांची ठळक ओळख निर्माण झाली होती . कवयित्री शांता शेळके म्हणत की , “ ठोकळ यांनी निर्माण केलेले स्त्री-पुरूषांचे चित्रविचित्र जग हा वास्तव विश्वाचा एक छेद असतो .” वाचकाचे रंजन करतांना त्याला प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचा प्रत्यय देणारा समर्थ कथाकार अशी श्री. ठोकळ यांची सार्थ ओळख निर्माण झाली होती . 

 ग.ल. ठोकळ यांची पुस्तके –

१. कोंदण, २. गावगंड, ३. मत्स्यकन्या, ४. मीठभाकर, ५. कडू साखर, ६. ठोकळ गोष्टी ( याचे अनेक भाग आहेत.) ७. टेंभा, ८. ठिणगी, ९. क्षितिजाच्या पलीकडे, १०. सुगी (निवडक ठोकळ कथा) यापैकी ‘ टेंभा ‘ ही त्यांची आत्मचरित्रवजा कादंबरी आहे . 

“ गावगंड “ ही त्यांनी १९४२ च्या क्रांतिपर्वावर लिहिलेली कादंबरी इतकी गाजली की काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात तिचा समावेश केला गेला होता. 

त्यांच्या जानपदगीतांचा प्रातिनिधिक संग्रहसुद्धा खूप प्रसिद्ध होता, आणि त्याला श्री. वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली होती.  

ग.ल. ठोकळ यांच्यावर ‘ साहित्यश्रेष्ठ ग.ल. ठोकळ ‘  हे पुस्तक लिहिले गेले आहे. अनेक संस्था, साहित्यातील श्रेष्ठ कलाकृतींना ग.ल. ठोकळ यांच्या नावाचा पुरस्कार देतात.

आजच्या ‘ कवितेचा उत्सव ‘ सदरात वाचू या, सर्वांना शाळेच्या आठवणीत घेऊन जाणारी त्यांची एक ग्रामीण बाजाची कविता ..

श्री. ग. ल. ठोकळ यांना मनःपूर्वक श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

३. मराठवाड्यातील साहित्यिक म्हणून नावाजलेले श्री यशवंत कानिटकर यांचाही आज स्मृतीदिन. (१२/१२/१९२१ – २२/७/२०१५) 

लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. कानिटकरांची आणखी एक विशेष ओळख होती ती ‘ भाषातज्ञ ‘ म्हणून . चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैदराबाद राज्याच्या भाषा विभागात ‘ भाषांतरकार ‘ म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती . १९५६ मध्ये झालेल्या ‘ राज्य – पुनर्रचनेनंतर त्यावेळच्या मुंबई राज्यात त्यांची बदली झाली. मुंबईतील सचिवालयात ‘ भाषा संचालक ‘ म्हणून ते रुजू झाले. या भूमिकेतून त्यांनी भाषाविषयक प्रश्नावर , राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना, आदि स्वरूपाचे विपुल लेखन केले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर, सरकारी कारभाराची भाषा मराठी असेल असे सरकारने जाहीर केले. आणि त्यासाठी ‘ प्रशासनिक परिभाषा कोश ‘ व मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याचे काम श्री. कानिटकरांनी केले. भाषासंचालक या भूमिकेतून, राजभाषा मराठीविषयक धोरण राबवणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षांचे आयोजन, केंद्राच्या राज्यासाठी असणाऱ्या अधिनियमांचा अनुवाद , अशी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली. 

पण या सगळ्या शासकीय कामात अतिशय व्यस्त असूनही त्यांचे मराठी साहित्यावरचे प्रेम मात्र तसूभरही कमी झाले नव्हते. साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी शब्दकोशाचे मुख्य संपादक म्हणून ते काम करत होतेच, पण व्यक्त करण्यासारखे स्वतःचे खास असे खूप काही त्यांच्याजवळ असल्याचे त्यांना सतत जाणवत होते. काव्यकलेवर त्यांची हुकूमत होती, आणि काव्याच्या सामर्थ्याची उचित जाणही होती. त्यामुळेच ‘ मेनका ‘ हा त्यांचा कवितासंग्रह खूप प्रसिद्ध झाला होता. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या मते ‘ श्री. कानिटकरांच्या कवितांचे छंद, त्यांची भाषा, आकृतिबंध, आणि त्यांची प्रतिमासृष्टी, सगळेच वेगळे होते. त्यांच्या कवितेचे नाते मर्ढेकरांच्या कवितांशी जरी जोडता येत असले, तरी त्या परंपरेतील नवकाव्य त्यांनी हाताळलेले दिसत नाही.’ आयुष्यावरचे उत्कट प्रेम, अर्थपूर्ण जगणे, प्रेम, सृजनता, निसर्गसौंदर्याची अतिशय आवड, हे त्यांच्यातले कविता करण्यासाठी आवश्यक असणारे गुण, तेव्हाच्या हैदराबादमधल्या वातावरणात खूपच खुलले होते. पण मुंबईत आल्यावर माणसांचे तिथले जगणे पाहून, नंतरच्या त्यांच्या कवितांमधून नव्या जाणीव जागृत झाल्याचे स्पष्ट लक्षात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता —–

खाडीखाडीतील घाण, करी नाकाशी कालवा । गाडीगाडीत चोंदली , विश्वसंस्कृति हवा ।।

असा प्राणवायू भत्ता , आम्हा अवांछिता लाहे । घेतो श्वास परी आता, माझे नाक माझे नोहे ।।

अशी पोषिता काजळी, लागे ज्योतीलाही धाप । कशासाठी ओठांवर पौरुषाची तळटीप ।।

– ‘ खानावळीतील अन्न ‘, ‘ अंधाराला खडे मारिती ‘,’ नगरातील राजपथा ‘ ही अशा कवितांची आणखी काही उदाहरणे . 

श्री. कानिटकरांचे इतर प्रकाशित साहित्य—-

१. ‘आज इथे तर उद्या तिथे ‘ – मराठवाड्यातील अनुभवांवर आधारित ललित लेखांचा संग्रह . 

२. ‘ ते दिवस ती माणसे ‘

३. ‘ पश्चिमवारे ‘ 

४. ‘ मराठी भाषा : स्वरूप आणि उपयोजन ‘ 

५. ‘ लोकमान्य टिळकांचा भाषाविचार ‘

याव्यतिरिक्त ‘ लोकमान्य टिळक ‘ या आठ खंडांतील ग्रंथाच्या आठव्या खंडाचे संपादनही त्यांनी केले होते. तसेच ‘ प्रतिष्ठान ‘ मासिकाचे ते संपादक होते.    

श्री. यशवंत कानिटकर यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

४. मराठी नाटककार आणि कादंबरीकार श्री. पदमाकर गोवाईकर यांचा आज स्मृतीदिन. ( २४/४/१९३६ – २२/७/२००१ ) 

त्यांचे प्रकाशित साहित्य —-

१. नाटके : ‘ सांगू नये ते ‘, ‘ वय वेडं असतं ‘, ‘ वणवा ‘, ‘ बहरलेल्या हिवाळ्यात ‘, ‘ भिरभिरे ‘, ‘ ऐक ‘, ‘ देह देवाचे मंदिर ‘, ‘ जनमेजय ‘. 

२ कथासंग्रह : ‘ गोफ ‘, ‘ नायगारा ‘, ‘ ऋतुगंध ‘, ‘ देवगंधार ‘, ‘ पोपटपंची ‘, ‘ शहाण्यांची शाळा ‘, सांजवाणी ‘. 

“ कडकलक्ष्मी “ या चित्रपटात ते अभिनेते म्हणूनही रसिकांना दिसले होते. 

श्री. गोवाईकर रसिकांच्या कायम स्मरणात राहण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे सातासमुद्रापलीकडेही गाजलेली त्यांची सुंदर कादंबरी  “ मुंगी उडाली आकाशी “. ही कादंबरी श्राव्य माध्यमातूनही ते रसिकांसमोर सादर करायचे. म्हणजे हे “ एकपात्री अभिनव कादंबरी – वाचन “ त्यांनी स्वतः केलेले होते. निवेदन आणि विशेष म्हणजे त्याचे संगीत-संयोजनही त्यांनीच केलेले होते. या कादंबरी-वाचनाच्या कॅसेट्स प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या, आणि अजूनही आहेत. श्री संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्या जीवनावर रेखाटलेली ओघवत्या भाषेतली ही कादंबरी म्हणजे अंतःकरणाला पीळ पाडणारी खरोखरच एक अनमोल कथा आहे. 

श्री. गोवाईकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र प्रणाम. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares