मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅक्टर आणि वेटिंग रूम… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ डाॅक्टर आणि वेटिंग रूम… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

माणूस आजारी पडला, की त्याला दहा दवाखाने फिरायला लागतात. दहा डॉक्टरांच्या दहा तर्‍हा. एकाच एक मत, तर दुसर्‍याचं बरोबर त्याच्या विरुद्ध. प्रत्येक जण वेगवेगळ्या चाचण्या करून घ्यायला सांगतो. एकाचा रिपोर्ट दुसर्‍याला चालत नाही. खरं तर दोन दिवसांपूर्वी सुद्धा रक्त आपलेच असते बरं का! पण तरीही त्याचे आलेले रिपोर्ट दोन दिवसांनंतर दुसर्‍या डॉक्टरांना चालत नाहीत. तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं आणि मला अनेक डॉक्टरांच्या तसेच तिथे असणार्‍या वेटिंग रूमच्या अनेक तर्‍हा अनुभवायला मिळाल्या.

मी माझ्या नेहमीच्या डॉक्टर काकांच्या क्लिनिक मधे माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले होते. नेहमी प्रमाणे दवाखाना खचाखच भरलेला होता. काहींना टेस्टचे रिपोर्ट दाखवायचे होते तर काहींना तपासून घ्यायचे होते. काहीजण आपल्या पेशंट बरोबर आले होते.

जे बरोबर आले होते ते उगीचच इकडून तिकडे कर नाहीतर मोबाईल बघ, ओळखीचे कोण असेल तर इकडच्या तिकडच्या गप्पा मार असं काहीतरी करत बसले होते. एका लहान आजारी मुलाला घेऊन त्याची आई आली होती, तिच्या मात्र जिवाची घालमेल चाललेली होती.

सारखं, त्याच्या डोक्याला हात लावून किती ताप आहे पहात होती. एक आजी खूप अस्वस्थ वाटत होती ती सारखी आपल्या नवऱ्याला काय आला असेल हो रिपोर्ट असं विचारतं होती.

एक गृहस्थ मात्र उगीचच केबिन च्या आत डोकावून डॉक्टर दिसतात का ते पहात होते. त्यांना एकदाचे ते दिसले आणि त्यांनी चक्क उठून त्यांना नमस्कार केला आणि आपल्या सौ ला म्हणाले बरीच वर्ष झाली ओळखतो मी ह्यांना अगदी देव माणूस.

दोन आज्या एकमेकांना आपापली व्यथा सांगून आपला आजार दुसरी पेक्षा किती सौम्य किंवा गंभीर आहे ह्याची खात्री करून घेत होत्या. त्यातलं फारस दोघींना ही कळत नव्हते ही गोष्ट वेगळी.

एका कोपर्‍यात दोघी मैत्रिणी आजार आणि त्यावरचे घरगुती उपाय ह्यावर चर्चा करत होत्या, तर दुसरीकडे दोघी जणी कोणत्यातरी भाजीची रेसीपी सांगण्यात गर्क होत्या. इतक्या की त्यांचा नंबर आलेला ही त्यांना कळले नाही. थोडक्यात काय दवाखाना असला तरी वातावरण गंभीर नव्हते.

मी ही तशी इथे रिलॅक्स असते. भीती नसते मनात ना दडपण असते. कारण हे माझे डॉ काका म्हणजेच डॉ शिवानंद कुलकर्णी खूप शांत आणि प्रेमळ आहेत. विनाकारण एखाद्या आजाराचं खूप मोठं चित्र उभ करत नाहीत, ना टेंशन देतात. चेहर्‍यावर नेहमी हास्य असते मग तुम्ही अगदी दवाखाना उघडल्या उघडल्या जा किंवा बंद व्हायच्या वेळी. काही होत नाहीगं एवढ्या गोळ्या घे, बरी होशील… एवढ्या त्यांच्या वाक्यांनेच निम्मे बरे व्हायला होते.

मला नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे ते एकाच वेळी सहा, सहा पेशंट आत घेतात. त्या पेशंटची बडबड, गलका चालू असतो तरीही ते एवढे शांत कसे काय राहू शकतात ? प्रत्येकाचा आजार वेगळा, कोण खोकत असतो, कोण कण्हत असतो कोणाचे इंजेक्शन असते, कोणाचे ड्रेसिंग, तर कोणाचे आणि काय. तरी काका आपले प्रत्येकाशी तितक्याच आपुलकीने चौकशी करत असतात. म्हणून तर ते प्रत्येकाला आपले वाटतात…

असो इथली तपासणी करून मी orthopedic दवाखान्यात गेले. तिथे तर पेशंटचा समुद्रच होता. समुद्र म्हणल्यावर ओळखले असलेच तुम्ही. हा समुद्र म्हणजे मिरजेचे नामांकित आणि तज्ञ डॉक्टर G. S. कुलकर्णी. आता आपल्याला किती वेळ वाट पहावी लागेल ह्या विचारानेच निम्मे दमायला झाले. मनात आले कशाला लोकं इतकी धडपडून आपली हाडं मोडून घेतात काय माहीत.

आधीच टेंशन आलेलं त्यात आजूबाजूला सगळेच पेशंट मोडक्या अवस्थेत. कोणाचा हात बांधला होता तर कोणाचा पाय फ्रॅक्चर होता .कोणाच्या मानेला पट्टा, तर कोणाच्या कंबरेला.

एकीकडे एक्सरे साठी गर्दी होती तर दुसरीकडे MRI साठी. कोण ड्रेसिंग साठी आले होते तर कोणाचे प्लास्टर घालणे चालू होते. थोडक्यात काय तर दवाखान्याचे वातावरण गंभीर होते. इथे कोणीच relaxed नव्हते.

मी एका कोपर्‍यात माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले. तिथेच बाजूला एक लहान मुलगा आपल्या प्लास्टरवर चित्र काढत बसला होता. ते पाहून मला खूप छान वाटले आणि माझ टेंशन कुठल्या कुठे पळून गेलं. मोठी माणसं विनाकारण एखाद्या गोष्टीचा जास्त बाऊ करतात असं मला वाटलं.

तिथला नंबर माझा झाला आणि मला काही व्यायाम करण्याचा सल्ला दिला गेला. नशिबाने मला मानेचा दागिना लागला नव्हता. म्हणुन तिथून मी physiotherapist कडे गेले.

तिथे ही बाहेर बरेचजण बसले होते आपला नंबर कधी येणार ह्याची वाटं बघत. मीही वाट पाहू लागले. तिथे एक गृहस्थ त्यांचे व्यायाम दुसर्‍या गृहस्थांना शिकवत होते जणू त्यांची आता त्यात पीएचडी झाली होती. मला तर हे बघून हसूच येत होते. तेवढ्यात तिथे एक आई आपल्या तान्हुल्याला घेऊन आली. त्याला कोणतातरी गंभीर आजार झाला होता. बाळाला मानही वर करता येत नव्हती. हातात ही काहीतरी दोष होता. आईच्या चेहर्‍यावर काळजी दाटली होती. ते पाहून मात्र मला खूप वाईट वाटले. देवाकडे मनोमन प्रार्थना केली की ह्या बाळाचा आजार लवकर बरा होऊदे रे बाबा.

शेवटी एकदाचा नंबर आला माझा.

बरेच व्यायाम आणि सूचना घेऊन मी बाहेर पडले. मला जरा शंका जास्त असतात, त्यामुळे मी खूप शंका त्या डॉक्टरांना विचारल्या. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक शंकेचे निरसन जितक्या वेळा मी विचारेन तितक्या वेळा न चिडता सांगत होते. त्यांनी मला शांत पणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हे म्हणजे माझे physiotherapist डॉक्टर सुनील होळकर. प्रत्येक व्यायाम दोन दोनदा दाखवला आणि माझ्याकडून तो करून ही घेतला. त्यामुळे मनातली भीती नाहीशी झाली, आणि आपण लवकरच बरे होऊ ह्याची खात्री पटली.

अश्या तर्‍हेने अनेक दवाखाने फिरून मी घरी पोहोचले. घरी पोचले तेव्हा खूप दमून गेले होते. पण आज मला अनेकांची आजारपणे, तक्रारी, हाल, वेदना पहायला, अनुभवायला मिळाल्या होत्या. अनेक प्रश्न होते लोकांचे, ज्याची उत्तर शोधण्यासाठी ते दवाखाने फिरत होते. काहींना उत्तर मिळाली होती तर काही उत्तर मिळायच्या प्रतिक्षेत होते.

ह्या सगळ्यात आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जितक्या व्यक्ति तितक्या तक्रारी असतात. प्रत्येकांचे डॉक्टर वेगवेगळे असतात.

काही डॉक्टर उग्र, गंभीर, तर काही शांत, प्रेमळ असतात.

प्रत्येक डाॅक्टरांना रोज तेच तेच आजार आणि असंख्य पेशंट तपासायचे असतात. तेच तेच निदान अणि त्याच त्याच टेस्ट सांगायच्या असतात, रोज तेच प्लास्टर आणि रोज तेच तेच व्यायाम शिकवायचे असतात.

त्यांना तेच तेच असतं पण पेशंट साठी मात्र प्रत्येक गोष्ट नवीन असते. कारण ती त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत असते. जे डॉक्टर हे लक्षात ठेऊन पेशंटशी न दमता, न थकता आपुलकीने बोलतात ते आपलेसे वाटून जातात. आपल्या मनात त्यांच्या बद्दल एक आदर, एक विश्वास निर्माण करतात आणि नकळत मनात एक वेगळं घर बनवून जातात.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ७ जून : जागतिक पोहा दिन… संकलन : मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ७ जून : जागतिक पोहा दिन… संकलन : मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

७ जून हा जागतिक पोहा दिन म्हणून साजरा केला जातो. पोह्यांचा नाश्ता माहित नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही. प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविष्ट तसेच आरोग्यदायी देखील आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात पोह्याच्या नाश्त्याला पंसती आहे. जे लोक डायटिंग करतात. त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता अत्यंत आरोग्यदायी समजला जातो.

महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान मध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. भारतात पोह्याचा शोध नेमका कुठे लागला हे कोणाला माहिती नाही. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस आणि २३.१ टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात. 

आज या लेखात जागतिक पोहे दिनानिमित्त पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

कार्बोहायड्रेटस चा उत्तम स्त्रोत :

पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात २३ टक्के फॅट्स असतात. कार्बोहायड्रेटस मुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.

शरीराला लोहाचा पुरवठा होता :

पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

पचनास हलके :

पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि खूप कमी लागते.

लठ्ठपणा येत नाही :

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

प्रस्तुती : बिल्वा अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- “त्ये झालंच. पन सायब, मास्तर द्येवमानूस हाय हो. त्येंच्या जावयानं पुरता धुतलाय बघा त्येनला. तुमचा मेल्याला कर्जदार म्हणजे जावईच की येंचा. जाताना पार धुळीला मिळवून गेलाय यानला. येंच्या पोरीचीबी कशी दशा करुन टाकली बघताय न्हवं?दोन पोरींच्या पाठीवरचं ह्ये एक लेकरु पदरात हाय बगा. सैपाकाची चार घरची कामं करती म्हणून चूल तरी पेटती हाय इथली. मास्तरांच्या पेन्शनीत त्येंचं सोताचं औषदपानीबी भागत न्हाई बगा.. ” बेलीफ सांगत होता. ते ऐकून मी सून्न होऊन गेलो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या  लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरून राहिलेला कळकट अंधार आणि माझ्या मनात भरून येऊ पहाणारं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला होता… !)

विचार करायला वेळ होताच कुठं? मी न बोलता आत आलो. एक कागद घेतला. त्यावर पेन टेकवले. दोन परिच्छेद न थांबता लिहून काढले. खाली सहीसाठी फुली मारली. कागद मास्तरांच्या पुढे सरकवला. थरथरत्या हातानी मास्तरांनी न वाचताच त्यावर सही केली. कागदाची घडी करुन मी ती खिशात ठेवली. जाण्यासाठी वळणार तोच कान फुटक्या दोन कपात घोटघोटभर चहा घेऊन, थकून गेलेल्या चेहऱ्याची मास्तरांची मुलगी समोर उभी होती. तिच्या थकलेल्या मनावरचं ओझं उतरवण्याचा मोह मला आवरता आला नाही. म्हणालो,

“हा व्याज आणि कोर्टखर्च माफीसाठी मी अर्ज लिहून घेतलाय. हेड आॅफीसला हा अर्ज मी रेकमेंड करीन. कांहीतरी मार्ग नक्की निघेल.. ” कृतज्ञतेने भरलेल्या नजरेने माझ्याकडे पहात तिने हात जोडले.

“पोरी, आण तरी तो अर्ज इकडे. त्यांचं शुद्धलेखन एकदा तपासून तरी पहातो.. “

केविलवाणं हसत मास्तर म्हणाले. मी अर्जाची घडी मास्तरांच्या हातात दिली. उलगडून न वाचताच त्यांनी ती एका झटक्यांत फाडून टाकली. मी चमकलो. काय होतंय मला समजेचना.. !

“या उतार वयात एवढं ओझं पेलवायचं कसं हो मला?अहो या वाळक्या कुडीत जीव तग धरुन ठेवलाय तो सगळ्यांची सगळी देणी फेडण्यासाठीच. मी म्हातारा आहे. कंगाल कफल्लकही आहे. पण.. पण.. मला खऱ्या अर्थाने ऋणमुक्त होऊन मगच ‘राम’ म्हणायचंय. “

हे बोलता बोलता मास्तरांच्या विझू लागलेल्या नजरेत अचानक वीज चमकून गेल्याचा मला भास झाला….!

“साहेब, आजवर चालवलेले, माझ्या या चिमुकल्या नातवाचे वारसदार म्हणून नाव लावलेले माझे पोस्टात एक बचत खाते आहे. दात कोरुन, पोटाला चिमटे घेऊन जमवलेले किडूक-मिडूक आहे त्यात‌. नवऱ्याच्या दारूच्या वासापासून वाचवलेले, लपवून बाजूला जपून ठेवलेले पैसेही माझ्या या पोरीने त्यात वेळोवेळी जमा केलेले आहेत. त्या खात्यावर माझ्या नातवाचे नव्हे तर माझ्या त्या कर्मदरिद्री जावयाचेच नाव वारसदार म्हणून लावले होते असे

मी समजतो आणि तुमचं सगळं कर्ज फेडून टाकतो. पोरी, ते पासबुक आण बघू इकडे.. “

काॅटखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढून त्यातलं जिवापाड जपलेलं ते पासबुक मुलींनं मास्तरांकडे सोपवलं. मुलीबरोबर पूर्ण रक्कम बॅंकेत पाठवायचं त्यांनी आश्वासन दिलं. कुणीतरी हाकलून दिल्यासारखी त्यांची मुलगी खालमानेनं आत त्या

विझलेल्या चुलीपुढे जाऊन बसली. मास्तरांकडून पंधरादिवसांची मुदत मागणारा अर्ज घेऊन मी बाहेर पडलो. माझ्याबरोबर बेलीफही.

बेलीफ गप्पगप्पच होता. मी कांही बोलणार तोच खिशातून एक घामेजलेली, कळकट, शंभरची  नोट काढून त्यानी माझ्या हातात कोंबली.   

“.. हे.. पैसे. मास्तरांचे.. “

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे मी येण्यापूर्वीच सकाळी आगाऊ वर्दी द्यायला जाऊन याने त्या गरीब माणसाकडून बक्षिसी उकळली होतीच तर.. !नुसत्या कल्पनेनेच मला. त्या माणसाची विलक्षण किळस आली.

“सायब, ताईस्नी कर्जाचा हिशेब सांगशीला तवा शंबर रुपै कमी सांगा न् ह्ये त्येंच्या कर्जात आज जमा करुन टाका.. “त्याचा आवाज कळेल न कळेल इतपत ओला झाला होता.

“आवं, आज सकाळच्याला ह्यीच नोट घिऊन मी मास्तरांकडं आलोतो. ह्ये सायेबाना द्यून मुदत मागा म्हण्लंतं. पन त्येनी या पैक्याला हाय बी लावला न्हाई. आवो माज्या ल्हानपनीचं माजं मास्तर ह्ये. मला बुकं शिकायची लई हाव हुती. पन वक्ताला दोन घास खायला मिळायची मारामार असायची. तवा या देवमानसाच्या घरातल्या उरलंल्या अन्नावर दिवस काढलेते आमी. ह्ये पैकं त्येनी घेत्लेतर नाहीतच, पन मला वळख सांगूनबी वळखलं न्हाई. आवं, त्येच्यावानी वाळकुंडा म्हातारा मानूस बी कुणाचं उपकार न ठिवता कर्ज फेडतू म्हनतोय, मंग धडधाकट शरीरपिंडाच्या मी त्येंच्या अन्नाच्या रिणातून कवा न् कसं मोकळं व्हायचं सांगा की… “

मी पैसे ठेऊन घेतले. त्याच्या प्रश्नाचं हेच तर एकमेव उत्तर त्याक्षणी माझ्याजवळ होतं! या माणसाबद्दल माझ्या मनात डोकावून गेलेल्या शंका, संशयाची आठवण होऊन मला माझीच लाज वाटू लागली.

दारिद्र्याशी झगडताना  आयुष्याच्या अखेरच्या  क्षणीही मनाचा कणा ताठ ठेऊ पहाणारे मास्तर आणि खाल्लेल्या अन्नाचं ऋण फेडायला धडपडणारा बेलीफ यातलं मोठ्ठं कोण याचा निर्णय मला घेता येईना.

वसुलीची कांहीही शक्यता नसणाऱ्या कर्जाची पूर्ण वसूली होत असल्याचं खूप विरळाच मिळणारं समाधान का कुणास ठाऊक पुढे कितीतरी दिवस दुर्मुखलेलंच राहीलं होतं!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

अनेक दिवसांपासून ठरलेला एखादा प्रवास… आव्हानात्मक, साहसी असेल तर त्यासाठी काही दिवसांपासून रोजचा दिनक्रम सांभाळून सुरु केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी… प्रवासासाठी लागणार्या साधन सुविधांची जमवाजमव, कपडे-खाऊची बांधाबांध ,प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागताच आप्त आणि मित्रांच्या शुभेच्छानी वाढू लागलेली उत्सुकता…काही दिवसांसाठी बंद रहणार्या घराची व्यवस्था….अशा सगळ्या धामधुमीत केलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचेच प्रवास खूप छान आठवणी गाठीला बांधतात. निसर्गरम्यतेमुळे मनाला तजेला आणि चिरंतन आन्तरीक समाधान देऊन जात असतात.म्हणून तर प्रत्येक जण अशा प्रवासाची आतुरतेने वाट पहात असतो आणि तेथून आल्यावर त्या क्षणांना इतरांसोबत  वाटून पुन्हा पुन्हा तो आनंद उपभोगत असतो. फोटोरुपाने ते क्षण जपत आणि जगत रहातो ; पण काही प्रवास वेगळ्या अर्थी अविस्मरणीय ठरतात….

अशाच एका अविस्मरणीय प्रवासाची अधुरी कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटली.

तर झालं असं..

चार सहा महिन्यांपूर्वी ‘एवरेस्ट बेस कैंप’ला जायचा बेत ठरला. आमच्या कुटुंबातील आम्ही सहाही जण (तीन भाऊ आणि त्यांच्या पत्नी) या प्रवासाची आपापल्या परीने तयारी करत होतो.आमचे नवरे यात उत्साहाने सामिल झालेले असल्याने आम्ही तिघी जावा प्रवासाच्या आखणीबाबत अगदी निश्चिंत होतो.निदान मी तरी प्रवासाच्या मार्गक्रमणाबाबत अगदीच गाफिल होते. चाळीस तज्ञ आणि सूज्ञ लोकांबरोबर प्रवास करताना ‘आपण केवळ प्रवासाचा आनंद लुटावा ‘अशी माझी साधी सोपी धारणा!!

कमीत कमी संख्येने कपडे आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याच्या सूचनांचे आम्ही पालन करण्याचे ठरवले.19000 फुटांवरचे जग आणि तिथले जगणे पहिल्यांदा अनुभवण्यासाठी आमची तयारी झाली होती.

29 एप्रिलला मुंबईहून आम्ही दोघे आणि इतर तीन जण विमानाने दिल्लीला पोहोचलो.तिथे इतर दहा बारा पुणेकर आम्हाला भेटले.संध्याकाळी चार पर्यंत काठमांडूला पोहोचल्यावर उरलेल्या पंचवीस तीस भारतीय सहप्रवाशांची भेट झाली.चाळीस लोकांच्या या चमूत भारतीयांबरोबर काही अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवासीही होते.ग्रुपमधील जवळ जवळ सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि  पूर्वाश्रमीचे घट्ट मित्र!त्यांच्या साठी हे एक अनोखे कौटुंबिक reunion होते.आम्हीच यामध्ये थोडे नवखे होतो. सगळ्यांशी ओळखी होण्याकरता काही दिवस नक्कीच लागले असते.या चमूमध्ये बरेच प्रवासी पहिल्यांदाच गिर्यारोहणाचा अनुभव घेणार होते.चोवीस वर्षांच्या तरुणांपासून पासष्टीपर्यंतच्या वयोगटातील सगळे या साहसी यात्रेसाठी उत्सुक होते.प्रवासी कंपनीची सगळी मदतनीस माणसे, गाईड्स यानी मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले आणि उद्यापासून सुरु होणार्या प्रवासाबाबत सूचनाही दिल्या. एकंदरीत वातावरणात उत्साह आणि उत्सुकता भरल्याचे जाणवत होते.येत्या काही दिवसात आंघोळीची गोळी घ्यावी लागणार असल्यामुळे मस्त अंघोळ करुन घेतली आणि साद देणार्या हिमशिखरांची स्वप्ने बघत लवकरच झोपी गेलो….

दुसर्या दिवशी बांधून दिलेली न्याहारी सोबत घेऊन 15 जणांच्या  गटाला घेऊन जाणार्या लहानश्या विमानाने ‘ लुक्ला ‘ नावाच्या विमानतळी उतरलो.आसमंतातील गारवा, शुद्ध ताजी प्रदुषणरहित हवा मनाला उत्तेजित करत होती.नवीन ओळखी करत, गप्पा टप्पा मारत, हसत खिदळत, रस्त्यात भेटणार्या देशी परदेशी गिर्यारोहकाना ‘नमस्ते’ या शब्दानी अभिवादन करत चाळीस जणांचा आमचा चमू आणि इतर 10 नेपाळी शेर्पा मदतनीस पुढे निघालो.पाइन वृक्षांच्या 

हिरवाइने नटलेल्या डोंगररांगा, नागमोडी वळणाच्या कच्च्या पाऊलवाटा , अखंड सोबत करणारा खळखळता नदीप्रवाह, मधूनच दूरदर्शन देणारी हिमशिखरे, सुखद गारवा आणि  मस्त उत्साही गप्पा….प्रवासाची सुरुवातच इतकी छान झाली…रोज साधारण पाच सहा तासांचे चालणे अपेक्षित होते. माझ्या आतापर्यंतच्या इतर जुन्या ट्रेकच्या अनुभवावरुन ‘दुपारच्या जेवणानंतर विश्रांती ‘असे गणित माझ्या मनात बसले होते.परंतु या ट्रेकची गणिते थोडी वेगळी आहेत हे हळू हळू लक्षात येऊ लागले.

त्या दिवसाच्या प्रवासाचा टप्पा ‘फाकडिंग’ या गावापर्यंत होता.तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 7 तास लागले.प्रत्येकाचा वेग, क्षमता, शारिरीक आणि मानसिक तयारी वेगवेगळी! शिवाय 2500 मीटर  उंचीवरची विरळ हवा प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होती.दिवसाअखेरी ,प्रचंड थकल्यानंतर आयता मिळणारा साधा ‘डाळ भात’ही गोड लागत होता.

बिछान्यावर पडताच झोप लागली.

दुसर्या दिवसाची सुरुवात भरपेट न्याहारीने होणे गरजेचे असले तरी ग्रुपमधील अनेकाना म्हणावी तशी भूक नव्हती.पाठीवरच्या सैक मध्ये काही पौष्टिक खाऊ आणि दोन लिटर पाणी घेऊन  आमचा प्रवास सुरु झाला.गिर्यारोहणात शारिरीक तयारी इतकीच मानसिक तयारी गरजेची असते,हे जाणवत होते.थकलेल्या शरीराला सोबतचा निसर्ग जोजवत होता.दिवसाअखेरी जडावलेले पाय आणि डोळे साध्याश्या अंथरुणावरही निवांत होत होते.

दर दिवशी जसजसे आम्ही अधिक उंची गाठू लागलो तसतशी  परिस्थिती अधिक आव्हानात्मक  होत चालल्याचे जाणवू लागले.काहींचे पोट बिघडले,काहींची डोकी जड झाली, काहींची झोप हरवली तर काहीना प्रचंड थकवा जाणवू लागला.चालताना धाप लागणे तर सहाजिकच होते. पण एखाद दोन दिवसात परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. आम्ही या नवख्या वातावरणाला सरावत होतो. कोणालाही मेडिकल imergency  लागली नाही.

रोज सात आठ तासांचे चालणे होत होते.कधी ग्रुपबरोबर आणि बर्याच वेळा एकल असा हा प्रवास होत होता.स्वत:शी गप्पा मारायची, वाद घालायची, समजावणीची, चुचकारायची खूप संधी मिळाली.नव्या लोकांकडे बघून खूप शिकायला मिळाले.प्रतिकूल परिस्थितीमधील स्वत:च्या  गरजा आणि क्षमता नव्याने कळल्या.निसर्गाची अपरिमित ताकद तर पावलगणिक जाणवत होती.पंचमहाभुतांनी व्यापलेल्या वातावरणाचा आपणही एक भाग आहोत याची संवेदना होत होती.निसर्गशक्ती धीरगंभीरतेने आम्हा सर्वांच्या अस्तित्वाला साथ करत होती. 

एका प्रवासात तर डोले नावाच्या गावी मुकामी पोहोचायचे होते.त्या दिवशी आम्ही 14 तास चाललो.शरीराने प्रवास पूर्ण करण्यासाठी बंड पुकारले.पण  डोंगरदर्यात, जंगलात, रात्र दाटत  असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

 क्रमशः…

लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’ आवडते यावर निबंध लिहायला दिला.

प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई…!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.

मला एक “अशिक्षित” आई हवी आहे, जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्या बरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

मला “आई” हवी, पण “ऑफलाइन” हवी. तिला “माझ्यासाठी” आणि माझे बाबांसाठी “मोबाईल” पेक्षा  “जास्त वेळ” असेल.

ऑफलाईन “आई” असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.

जेंव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.

आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नको, घरी काहीही बनव. मी आणि बाबा आनंदाने खाऊ.

मला फक्त ऑफलाइन “आई” पाहिजे आहे.

इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका  संपूर्ण वर्गात ऐकू आला.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वर्ग शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

आयांनो, आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते मोबाईल च्या नादाला लागून हिरावून घेऊ नका! ते परत कधीच येणार नाही. 

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भाव वात्सल्याचा … ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  भाव वात्सल्याचा …  ?  श्री प्रमोद जोशी ☆

तिच्या डोक्यावर वीट,

झोळीमध्ये पांडुरंग!

त्याच्या नैवैद्याकारणे,

आई श्रमामधे दंग!

तिच्या येरझाऱ्यामधे,

चाले पंढरीची वारी!

तिचे बाळाशी अद्वैत,

तिला नको मुक्ती चारी!

तुळशीच्या जागी वीट,

आणि वहातुक दिंडी!

झोळीमधे पहा मूर्ती,

दारिद्र्यात राजबिंडी!

गंधफुलांजागी हिच्या,

नशिबात विटा,वाळू!

झोळी झालेली पाळणा,

झोक्यावीण झोपे बाळू!

दारिद्र्यात मातृत्वाला,

येते वेगळी चमक !

रडण्यावाचुनी बघे,

कुतुहल टकमक!

तिची अद्भूत चिकाटी,

त्यांचे बाल्य समंजस!

बघा,सजण्यावाचून,

किती दृश्य हे लोभस!

उन्हालाही स्वतेजाचा,

येतो मनोमनी रग!

त्याच्या इशाऱ्यावरुन,

येते झुळुकीला जाग!

भाव वात्सल्याचा कधी,

कसा असेल गरीब?

दशदिशा वणव्याच्या,

तिचे ऊर चिंबचिंब!

चित्र – अनामिक  

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#135 ☆ लघुकथा – सच तो कह रही है फूलमती… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक विचारणीय लघुकथा “लघुकथा – सच तो कह रही है फूलमती…”)

☆  तन्मय साहित्य # 135 ☆

☆ लघुकथा – सच तो कह रही है फूलमती… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

खेत खलिहान से फसल घर में लाते ही मोहल्ले के पंडित जी के फेरे शुरू हो जाते। मौसम के मिज़ाज के अनुसार कभी पँसेरी दो पंसेरी गेहूँ, ज्वार, दालें कभी सब्जी-भाजी और कभी ‘सीधे’ में पूरी भोजन सामग्री की माँग इन पंडित जी की पूरे वर्ष बनी रहती।

इस वर्ष खरीफ की फसल सूखे की चपेट में आ गई और बाद में बेमौसम की बारिश व ओले आँधी की चपेट में आने से रबी की फसल भी आधे साल परिवार के खाने लायक भी नहीं हुई।

खाद, बीज व दवाईयों के कर्ज के बोझ से लदे कृषक रामदीन पत्नी फूलमती के साथ आने वाले समय की शंका-कुशंकाओं में डूबे बैठे थे, उसी समय पंडितजी काँधे पर झोला टाँगे घर पर पधार गए।

“कल्याण हो रामदीन! नई फसल का पहला हिस्सा भगवान के भोग के लिए ब्राह्मण को दान कर पुण्यभागी बनो और अपना परलोक सुधार लो यजमान”।

पहले से परेशान फूलमती अचानक फूट पड़ी – “पंडित जी बैठे-बिठाए इतने अधिकार से माँगते फिरते हो, क्या हमारे खेत की मेढ़ पर  आज तक भी आपके ये पवित्र चरण कभी रखे हैं आपने! आँधी-पानी, ओलों और सूखे  से पीड़ित  हम लोगों के दुख की घड़ी में हालचाल भी जानने की कोशिश की है कभी, ठंडी गर्मी व बरसात के वार झेलते खेत में मेहनत करते किसी किसान के श्रम को आँकने की भी कोशिश की है कभी आप ने? फिर किस नाते हर तीज त्योहार, परब-उत्सव पर हिस्सा माँगने चले आते हो”।

“पंडित जी!…पूरी जिंदगी बीत गई हाड़तोड़ मेहनत कर दान-पुन करते, फिर भी हमारा यह लोक ही नहीं सुधर रहा है और परलोक का ,झाँसा देकर इधर, आप हमें सब्जबाग दिखाते रहते हो और दूसरी तरफ सेठ-साहूकार और सरकारी साब लोग”।

“जाओ पंडित जी, थोड़ी मेहनत कर के रोटी कमाओ और खाओ तब असल में रोटी और मेहनत का सही स्वाद और महत्व समझ पाओगे”।

पंडित जी हतप्रभ से कुछ क्षण शांत रहे और फिर करुणाभाव से फूलमती की ओर एक नजर डाल कर वापस हो गए। आगे गली के एक कोने में काँधे का झोला फेंकते हुए मन ही मन कुछ बोलते हुए अपने घर की ओर लौट पड़े।

“सच तो कह रही है फूलमती”

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

अलीगढ़/भोपाल   

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से # 29 ☆ विश्व पर्यावरण दिवस विशेष – वृक्ष की पुकार…… ☆ डॉ. सलमा जमाल ☆

डॉ.  सलमा जमाल 

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 25 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक 125 से अधिक राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।  

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज विश्व पर्यावरण दिवस पर प्रस्तुत है एक विचारणीय कविता वृक्ष की पुकार… ”। 

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 29 ✒️

🌿 विश्व पर्यावरण दिवस विशेष 🦚 वृक्ष की पुकार… — डॉ. सलमा जमाल ?

रुकती हुई ,

सांसो के मध्य ,

कल सुना था मैंने ,

कि तुमने कर दी ,

फिर एक वृक्ष की ,

” हत्या “

इस कटु सत्य का ,

हृदय नहीं ,

कर पाता विश्वास ,

” राजन्य “

तुम कब हुए ,नर पिशाच ।।

 

अंकित किया ,एक प्रश्न ?

क्यों ? केवल क्यों ?

इतना बता सकते हो ,

तो बताओ ?क्यों त्यागा ,

उदार जीवन को ?

क्यों उजाड़ा ,

रम्य वन को ?क्यों किया ,

हत्याओं का वरण ?

अनंत – असीम ,जगती में

क्या ? कहीं भी ना ,

मिल सकी ,तुम्हें शरण ? ।।

 

अच्छा होता

तुम ,अपनी

आवश्यकताएं ,

तो बताते ,

शून्य ,- शुष्क ,

प्रदूषित वन जीवन ,

की व्यथा देख ,

रोती है प्रकृति ,

जो तुमने किया ,

क्या वही थी हमारी नियति ?।।

 

शैशवावस्था में तुम्हें ,

छाती पर बिठाए ,

यह धरती ,

तुम्हारे चरण चूमती ,

रही बार-बार ,

रात्रि में जाग – जाग

कर वृक्ष ,

तुम्हें पंखा झलते रहे बार-बार,

तब तुम बने रहे ,

सुकुमार ,

अपनी अनन्त-असीम ,

तृष्णाओं के लिए ,

प्रकृति पर करते रहे

अत्याचार ।।

 

हम शिला की

भांति थे ,

निर्विकार ,

तुम स्वार्थी –

समयावादी,

और गद्दार ,

तभी वृद्ध ,

तरुण – तरुओं,

पर कर प्रहार ,

आयु से पूर्व ,

उन्हें छोड़ा मझधार ,

रिक्त जीवन दे ,

चल पड़े

अज्ञात की ओर ,

बनाने नूतन ,

विच्छन्न प्रवास ।।

 

किस स्वार्थ वश किया ,

यह घृणित कार्य ?

क्या इतना सहज है ,

किसी को काट डालना ,

काश !

तुम कर्मयोगी बनते ,

प्रकृति के संजोए ,

पर्यावरण को बुनते ,

प्रमाद में  विस्मृत कर ,

अपना इतिहास ,

केवल बनकर रह

लगए ,उपहास ।।

 

काश !तुमने सुना होता ,

धरती का ,करुण क्रंदन ,

कटे वृक्षों का ,

टूट कर बिखरना ,

गिरते तरु की चीत्कार ,

पक्षियों की आंखोंका ,सूनापन ,

आर्तनाद करता , आकाश ,

तब संभव था ,कि तुम फिर ,

व्याकुल हो उठते ,

पुनः उसे ,रोपने के लिए ।।

 

अपना इतिहास ,

बनाने का करते प्रयास ,

तब तुम ,वृक्ष हत्या ,

ना कर पाते अनायास ।।

© डा. सलमा जमाल

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – ज़र, जोरू, ज़मीन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – लघुकथा – ज़र, जोरू, ज़मीन ??

यह ज़मीन मेरी है,…नहीं मेरी है,..तुम्हारी कैसे हुई, मेरी है।….तलवारें खिंच गईं। जहाँ कभी खेत थे, वहाँ कई खेत रहे।

ये संपत्ति मेरी है,…पुश्तैनी संपत्ति है, यह मेरी है,..खबरदार ! यह पूरी की पूरी मेरी है।..सहोदर, शत्रुओं से एक-दूसरे पर टूट पड़े। घायल रिश्ते, रिसते रहे।

यह स्त्री मेरी है,…मैं बरसों से इसे चाहता हूँ, यह मेरी है,…इससे पहली मुलाकात मेरी हुई थी, यह मेरी है।… प्रेम की आड़ में देह को लेकर गोलियाँ चलीं, प्रेम क्षत- विक्षत हुआ।

यह ईश्वर हमारा नहीं है,…हम तुम्हारे ईश्वर का नाम नहीं लेते,…हम भी तुम्हारे ईश्वर को नहीं मानते,…तुम्हारा ईश्वर हमारा ईश्वर नहीं है।…हिस्सों में बंटा ईश्वर तार-तार होता रहा।

आदमी की नादानी पर ज़मीन, संपत्ति और औरत ठठाकर हँस पड़े।

© संजय भारद्वाज

(प्रातः 8:01बजे, 31.5.2019)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – संस्कार ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆

डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

(आज  प्रस्तुत है  डॉ कामना कौस्तुभ जी की एक विचारणीय लघुकथा संस्कार। आप इस लघुकथा की प्रस्तुति इस यूट्यूब लिंक पर क्लिक कर भी देख – सुन सकते हैं  👉  लघुकथा – संस्कार …बहुत कुछ है सीखने के लिये…..डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

 ☆ कथा कहानी ☆ लघुकथा – संस्कार ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆ 

“कल तुम मेरे बेटे को नाम से पुकार रहे थे। तुम्हें कोई मैनर्स है कि नहीं। कोई संस्कार है कि नहीं। यही सिखाया है तुम्हारे माँ-बाप ने। जब मैं तुम्हारा बॉस हूँ तो मेरा बेटा भी तुम्हारा बॉस ही हुआ।“ श्याम लाल जी ने अपने ऑफिस के एंप्लॉय केदार को जोर-जोर से डांटते हुए यह कहा|

तभी पापा पापा कहकर 13-14 साल का बच्चा अंदर दाखिल होते हुए अपने माली की तरफ देखते हुए बोला “पापा इस बूढ़े  खूसट  को निकाल क्यों नहीं देते नौकरी से। मुझे पाल पोस कर बड़ा किया है, तो इसकी इतनी हिम्मत कि यह मुझ पर हुकुम चलाएगा। किसी बात को करने से मना करेगा।“ अब श्याम लाल जी की नजरें केदार के सामने ऐसी झुकी की वे उठाने की हिम्मत ही नहीं कर पाए|

© डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

मो 9479774486

जबलपुर मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares