हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मानस के मोती॥ -॥ मानस में तुलसी के अनुपम उपदेश – भाग – 1॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

मानस के मोती

☆ ॥ मानस में तुलसी के अनुपम उपदेश – भाग – 1 ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

वीरगाथा काल की समाप्ति पर हिन्दी कविता राजाश्रयी क्षेत्र से हटकर जन जीवन की ओर मुड़ी और भक्ति भावना की ओर प्रवृत्त हुई। विदेशी आक्रमणों की देश में बाढ़ आ गई और जन जीवन दुखी तथा त्रस्त हो गया। दुर्दिनों में सबको ईश्वर की याद आती है। ईश्वर ही कठिन समय में त्राता और संरक्षक के रूप में दिखाई देता है। इसीलिये  ऐसे समय में भक्ति की भावना जागृत हुई। राम और कृष्ण की भक्ति भावना बढ़ी और रामभक्ति तथा कृष्ण भक्ति की धारा प्रवाहित हुई। राम की भक्ति में जिन कवियों ने रचनायें की उनमें महात्मा तुलसीदास और कृष्णभक्ति के कवियों में सूरदास अद्वितीय हैं। तुलसीदास जी ने विक्रम संवत् 1631 में रामनवमीं के दिन से अयोध्या में रामकथा का लिखना प्रारंभ किया जिसे रामचरितमानस नाम दिया गया। साहित्यकार की विचारधारा सदा अपने समय की परिस्थितियों से प्रभावित होती है। उस समय भारत में हिन्दू समाज दीनहीन अवस्था में था। अपनी धार्मिक और आर्थिक कठिनाइयों के कारण निराशा के गर्त में था। आडम्बरों की प्रधानता थी, जाति-पांति का भेदभाव था। सदाचार की समाज में कमी थी। शैव, वैष्णव, शाक्त मतों के प्रभाव से आपसी मतभेद और अलगाव थे। समाज में ढोंगी भक्तो ंकी बहुलता थी। सच्ची ईश्वर भक्ति का अभाव था। शिक्षा की कमी थी, अत: अधिक लोग निरक्षर थे और उन्हें अधिक ज्ञान की कमी थी। इसीलिये तुलसी दास ने अपने मानस में जनसाधारण की सरल भाषा में मानव जीवन को सुखी और समृद्ध बनाने नई राह दिखाने के लिये आदर्श प्रस्तुत किये। तुलसीदास जी ने अपने गुरु नरहरिदास से रामकथा सुनी थी। वाल्मीकि रामायण में रामकथा विस्तार से दी गई है। इसी में उन्होंने दुखी और निरीह समाज को उठाने अैर उसे जीवन-संबल देने को तेजस्वी मर्यादा पुरुषोत्तम राम की जीवन गाथा को सरल भाषा में प्रस्तुत करने का निश्चय कर रामचरितमानस की रचना की। राम में उन्हें एक चरित्रवान, दुष्टों का नाश करने वाला, सुख-समृद्धि का प्रदाता, नायक व सुयोग्य न्यायप्रिय राजा मिला। परिवार को एक प्रेमल आज्ञाकारी पुत्र, भाई तथा सुयोग्य पति दिखा।

शैव व वैष्णव पंथानुयायियों के मतभेदों को दूर कर समन्वयकर्ता मिला और भक्तों के मन को शांति देने वाला सर्वजन हितकारी देवता मिल गया। इसी दृष्टि से इन्होंने राम को शिव का उपासक  और शिव को राम का उपासक बताया इस रूप में एक समन्वयकर्ता भी मिल गया जो समाज में एक नई चेतना देने में सरलता से मान्य हो गया।

क्रमशः…

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९  जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९  जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शिवाजीराव अनंतराव भोसले (१५ जुलै १९२७ ते २९ जून २०१० )

शिवाजीराव भोसले यांचा जन्म सातारा जिल्हयात कलेढोण इथे झाला. त्यांचे कॉलेजचे शिक्षण पुण्याला वाडिया कॉलेज व कोल्हापूरला राजाराम कॉलेज इथे झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेचाही त्यांनी लाभ घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या लॉ कॉलेजमधून घेतली.

फलटणयेथील मुधोजी कॉलेजमध्ये त्यांनी मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान हे विषय शिकवले. अवघड विषय सहज, सोपा करून ते शिकवत. पुढे याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्यपदाची धुराही संभाळली.

शिवाजीराव भोसले उत्कृष्ट व्याख्याते होते. भारतीय तत्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविन्द, स्वामी विवेकानंद, छ्त्रपती शिवाजी महाराज इ. विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्याने देत.  विवेकानंदांचे शिला स्मारक उभारण्याच्या वेळी शिला स्मारक समितीच्या वतीने त्यांनी देशभर व्याख्याने दिली.

शिवाजीराव भोसले यांचे साहित्य

१.    कथा वक्तृत्वाची २. जागर (खंड १ आणि २) ३. दीपस्तंभ, ४. देशोदेशीचे दार्शनिक    ५. मुक्तिगाथा महामानवाची,  ६. यक्षप्रश्न, ७. स्वामी विवेकानंद, ८. हितगोष्टी

पुरस्कार, मान-सन्मान

१.    आदर्श शिक्षक म्हणून राज्य पुरस्कार, २. सातारा भूषण, ३. फलटण भूषण ४. विद्याव्यास पुरस्कार, ५. रोटरीचा जीवन गौरव पुरस्कार, ६. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, ७. श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार,  ८. भारती विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार ९. चतुरंग प्रतिष्ठान – मानपत्र

शिवाजीराव भोसले – स्मृती पुरस्कार

पुण्याची, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृतीसमिती दर वर्षी १५ जूनला त्यांच्या नावाचा         

स्मृती पुरस्कार देते. आत्तापर्यंत या समीतीतर्फे बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, साहित्यिक द.मा. मिरासदार, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, डॉ. ह.वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांना पुरस्कार मिळाले आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

दिगंबर बाळकृष्ण मोकाशी – ( २७ नोहेंबर १९१५ – २९ जून ८१)

दि. बा. मोकाशी हे ख्यातनाम मराठी कथाकार व कादंबरीकर होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण इथे झाला. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले व पुण्यात रेडियो दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. लामणदिवा हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९४७ मधे प्रसिद्ध झाला. 

दि. बा. मोकाशी यांचे अन्य साहित्य – कथा

१.    कथामोहिनी, २. आमोद सुनासी आले, ३. वणवा, ४. चापलूसी, ५. एक हजार गायी,  ६. आदिकथा,  ७. माऊली, ८. तू आणि मी हे त्यांचे काही कथासंग्रह 

कादंबरी –१. स्थलयात्रा, २. पुरुषास शंभर गुन्हे माफ, ३. देव चालले, ४ आनंद ओवरी, ५. वात्सायन

 यापैकी आनंद ओवरी व वात्सायन या कादंबर्याप चरित्रात्मक असून त्या अनुक्रमे संत तुकाराम व वात्सायन यांच्या जीवनावरच्या आहेत.

प्रवासवर्णन – पालखी व अठरा लक्ष पाऊले.  या पुस्तकातून प्रवास वर्णनापेक्षा समाज जीवनाचे दर्शन घडवण्यावर अधीक भर दिला आहे.

अर्नेस्ट हेमिंगवे यांच्या ‘फॉर हूम द बेल्स टोल्स’ या सुप्रसिद्ध कादंबरीचा ‘घणाघणती  हा उल्लेखनीय अनुवाद त्यांनी केला आहे.

दि. बा. मोकाशी  यांनी लहन मुलांसाठीही पुस्तके लिहिली.

विविध अंनुभूतीतून माणूस शोधण्याचा प्रयत्न ते आपल्या कथा -कादंबर्यांठमधून करतात. व्यक्तीच्या अंतर्मनाचा शोध  ते घेतात.  भावचित्रणातील नाजुकपणा व हळुवारपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम त्यांच्या कथा –कादंबर्यांतमधून झालेला दिसतो. जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळीवरून अनुभव घेऊन त्यामध्ये संगती शोधण्याचा प्रयोग त्यांनी आपल्या लेखनातून केलाय.

दि. बा. मोकाशी  यांनी गूढकथा, पिशाच्च कथा,  रहस्य कथा अशा वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या आहेत.

‘संध्याकाळचे पुणे’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक. संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रुपे त्यांना दिसली, त्याचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी या पुस्तकात घडवले आहे.

पुरस्कार-

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार दि. बा. मोकाशी यांच्या गुपित, पालखी, स्थलयात्रा, आमोद सुनासी आले, देव चालले, जमीन आपली आई या पुस्तकांना मिळाला आहे.

त्यांच्या आनंद ओवारीचे भाषांतर अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेत यांनी केले आहे. ‘देव चाललेचे भाषांतर प्रमोद काळे ( इंग्रजी) यांनी केले आहे. त्याच प्रमाणे या पुस्तकाचा अनुवाद हंगेरीयन व ओरिया भाषेतही झाला आहे. अमृतानुभव या ललित लेखाचा अनुवाद इंग्रजीत झाला आहे.त्याचप्रमाणे कामसूत्रकार वात्सायन आणि पालखीचाही इंग्रजीत अनुवाद झाला आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर  (18 फेब्रु. 1911 – 29 जून 2000)

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म पुण्यातील येरवडा इथे झाला. ते भारतीय भूदलात कॅप्टन होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबर्यान लिहिल्या.

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे प्रकाशित साहित्य

कादंबर्याॅ – १.उधळल्या प्रभा दशदिशा, २. कळस चढवला मांदिरी ३. दख्खनचा दिवा हरपला, ४. घटकेत रोविले झेंडे, ५. नवरत्ने हरपली रणांगणी, ६. पेशवाईतील कर्मयोगी, ७.राघो भरारी, ८. राज्य तो छत्रपतींचे, ९.शर्थीने राज्य राखले, इ. त्यांच्या कादंबर्या  प्रकाशित आहेत.

कथा संग्रह – काळदरीतील वीरगळ

प्रवास वर्णन –  अरुणाचलच्या सीमेवरून

याशिवाय बाहिरी ससाणा (भयकथा), महाभारत एक पर्व, हेर नयन हे नृपतीचे अशी आणखीही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शिवाजीराव भोसले या विद्वान आभ्यासकाचा, श्रेष्ठ वक्त्याचा आणि लेखकाचा आज स्मृतीदिन. त्याचप्रमाणे आज नामवंत लेखक दि. बा. मोकाशी आणि कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचाही आज स्मृतीदिन त्या निमित्त या तिघांनाही  भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दान.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ दान.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्याचे दान मिळाले,

  भगवंताच्या कृपेने !

मानव जन्म मिळाला,

  करू आपण त्याचे सोने!!१!!

 

दानात दान मोठे,

 असे अन्नदान !

भुकेल्या माणसास द्यावे,

  अन्नाचे समाधान !!२!!

 

तहानलेल्याला द्यावे,

 ओंजळ भरुन पाणी!

जलदानाइतके  जगी,

 श्रेष्ठ नाही कोणी!!३!!

 

 अवयवदानाची महती,

   आरोग्यसेवा सांगते!

 गरजू अन् पीडिताला,

  स्वास्थ्य मिळवून देते!!४!!

 

 ज्यास नाही नेत्र तो,

   अवघ्या सृष्टीस पारखा !

 नेत्रदान देणारा तो,

    बने त्याचा दृढ सखा !!५!!

 

 कुणी देई किडनी दान,

   मिळे एखाद्यास जीवदान!

 प्रत्येक अवयव  माणसाचा,

   घेई आशीर्वादाचे दान !!६!!

 

 रक्तदान श्रेष्ठ दान,

  जगवी एखाद्याचा प्राण!

हे शरीर अपुले असे,

  एक दातृत्वाची खाण !!७!!

 

 हिंदू संस्कृती सांगे सतत,

   दानाचीच  महती !

बळीराजा ने दिली दान,

   तीन पावलात धरती !!८!!

 

दानशूर कर्णाने दिले,

 कवच कुंडलाचे दान !

दानाच्या महतीत मिळे,

 कर्णाला अत्युच्च स्थान!!९!!

 

पुराण असो वा शास्त्र,

 दानाची महती थोर !

या भूतली प्राणीमात्रात,

 दातृत्वाचा भाव अपार !!१०!!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 138 ☆ आजचे अभंग… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 138 ?

☆ आजचे अभंग… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती अहंकार।असतो मनात

दर्प  स्वभावाचा । जाईचना ॥

 

अरे विठूराया। गळो हे मीपण

आलेले बालंट। भयंकर ॥

 

पितळ उघडे। कधीचे पडले

तरीही तो-यात। रहावे का ?

 

ज्याने तारीयले। चिखली बुडता

ज्ञान  त्यासी देती। पोहण्याचे ॥

 

टाळीले सर्वांना। लिहिताना लेख

सारेच कर्तृत्व । स्वतःचेच ॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढस्य प्रथम दिवसे ! ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

? विविधा ?

आषाढस्य प्रथम दिवसे ! ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

अगदी परवा, परवापर्यन्त, आमच्या बंगलीच्या टेरेसवरुन, हाताच्या अंतरावर ही आमच्या आवारातील, विविध झाडांच्या, हिरव्या रंगाच्या विविध छटा दर्शविणारी हिरवाई मला दिसत होती.

बांबूच्या झाडाच्या त्या फांद्यांना स्पर्श करावे, म्हटले तरी, अगदी पाय उंचावून उभे राहून देखील, त्या फांद्या मला स्पर्श करू देत नव्हत्या, वाऱ्याच्या हलक्याश्या झोताने, जवळ येऊन, वाकुल्या दाखवीत त्या पुन्हा दूर पळून जात होत्या. कितीतरी कधीही न बघितलेले, रंगबिरंगी पक्षी , मधूरगुज करीत होते. ते देखील, ह्या खोडीचा आनंद लुटत असावेत. नव्हे, नव्हे ते आनंदित होत होतेच.

पण आज….आज मी पाठमोरा उभा असताना, त्या बांबूच्या एका फांदीची धारदार, इवलीशी, लवलवती पाती वाऱ्याच्या हलक्याशा गार झोताने आपणहून जवळ येऊन, मस्त मस्त, डोलत डोलत, माझ्या मानेला,पाठीला अन् खांद्याला करवती सारखा क्षणिक, खरखरीत स्पर्श करून पट्कन माघारी जात होती.

अशी माझी खोडी काढून ती पाने माझे लक्ष वेधू इच्छीत होती कां?

बांबूची ती तरारणारी, थरथरणारी, धारदार पाती, अंगाला, थरथरत, थरथरत बोचरा स्पर्श करून काही सुचवू इच्छीत होती कां?

त्या बरोबरच, जांभुळाची ती गर्द हिरवी, आकाराने लहान चमकदार, लकाकणारी दाट पाने, मला आज शांत, संयमी, धीरोदात्त अशीच भासत होती.

त्यातच, दोन्ही झाडांच्या फांद्यात, तो गुंतून, तजेलदार पानापानांतून, फुलणारा टप्पोरा पांढरा शुभ्र चाफा, सर्वांच्या अध्ये मध्ये, फांद्या फांद्यांच्या गर्दीत, गुंतत अन् गुंफत आपला हर्षोल्लास अभिव्यक्त करीत, आपली सुखद उपस्थिती नोंदवून, आपले अस्तित्त्व दर्शवीत होता. एखाद्या लहान खेळकर, खोडकर, मुलाने , फोटो काढताना जसे मध्ये मध्ये, उड्या मारीत, माझा पण, माझा पण, असा हट्ट करावा अगदी तस्साच..उनाड !

आणि, ….आणि आमच्या आवारातील, ह्या तिघांच्या, बरोबरीने एका कडेला उभा असलेला तो एकाकी शांत, धीरोदात्त, नारळाचा वृक्ष… श्री वृक्ष.! कडेवर अनेक श्री फलांचे ओझे सहजी घेत तो लेकुरवाळा निर्विकार उभा होता. हत्तीच्या कानाच्या, मंद हालचालीप्रमाणे, त्या श्री वृक्षाच्या मोठ्ठाल्ल्या झावळ्या, हळू हळू, डुलत होत्या. अन् तो, तटस्थपणे ध्यानस्थ होऊ पाहणारा, मौन, शांत, तृप्त, अन् पोक्त तपस्वी श्रीवृक्ष ,अध्यात्मिक अनुभूती दाखवीत होता .

अचानकच काही दिवसातच झालेला हा बदल मी उत्सुकतेने न्याहाळीत होतो.

अन् लाजत, मुरडत, चाहूल न जाणवू देत, ती संध्याकाळ आली. पक्षी थव्या थव्याने पश्चिम दिशेला परतीला जाऊ लागले. मावळतीला जाणाऱ्या त्या, तेजोगोलाची सुवर्णमय किरणे, इमारती, इमारतीवर, हिरवाई, हिरवाईवर अंकित होत, होत पसार होवू लागली, त्या बरोबरच पित प्रकाशाने न्यालेली पाने, हळूहळू कडेकडेने स्वर्णांकित होत, उर्ध्व दिशेने वेगाने जाऊ लागली. आवारातील चारही झाडांच्या फांद्या एकमेकांना स्पर्शून, जणू खांद्याला खांदा लावून, लयबद्ध, डोलत डोलत, गात गात एकमेकांच्या भावनांना मम् म्हणत होत्या.

हे एक त्यांचे समूह गानच असावे, नाही ? की ती एक सामूहिक सरगम असेल ? कारण, मी बघितले, सर्वच भवताल आनंदाने डोलत होता. सर्वच परिवेश उल्हासित होत होता. दृष्टी क्षेपातील, सभोवतालची सर्वच हिरवाई जणू पाय स्थिर ठेऊन ,शरीर, मनाने डोलत होती. तन्मयतेने नृत्य करीत होती. मनोमन मी ही न डोलतो तर नवल !
पण मग हा अधिरपणा कां? कशासाठी ? कशाची वार्ता? कुणाच्या स्वागताची तयारी?

पण, दुजोरा दिला…

त्या येणाऱ्या पश्चिमेच्या गार वाऱ्याने, अस्मानातील त्या ढगांच्या हालचालींनी, दूरवर वाजणाऱ्या त्या नगाऱ्याने… वार्ता दिली..

हो ! त्या आषाढाची, नेमेची येणारी पहिली सर झेलण्यासाठी होता तर एवढा खटाटोप ?

ती समर्पिता, तप्त धरित्री ग्रीष्म ऋतुचा एवढा ताप झेलल्यानंतर, एक दिलासा मिळविण्यासाठी, एक दिलासा देण्यासाठी, मृद्गंध प्रसृत करण्यासाठी, ती हिरण्मयी देखील आतुर झालेली आहे. हे त्या हिरवाईच्या स्पर्शा स्पर्शातून, चर्ये,चर्येतून सुचवीत होती.

हो, त्या सरींच्या आगमनाची प्रतीक्षा आहे तर,,!

त्या पहिल्या वहिल्या सरीची सर कशालाच नाही. ती पायाला नुपूर बांधून थुई थूई नाचणारी, पहिली सर! त्यात भिजून नाचणारे ते शैशव ! ती शब्दात व्यक्त न झालेली, पहिल्या वहिल्या कोवळ्या प्रेमाची अनुभूती अन् अभिव्यक्ती !

त्या मृण्मयीचा, तो सर्वत्र दरवळणारा हिरण्मयी मृद्गंध !

त्या सरीची, त्या क्षणाची आतुरतेने सर्व वाट बघत आहेत.

आम्ही देखील…

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पिकलं पान – भाग – 1… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

?  जीवनरंग ?

☆ पिकलं पान – भाग – 1… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

त्या दिवशी दुपारची गोष्ट. मी नुकतीच दुपारचा चहा वगैरे घेऊन, छान फुरसतीत घरातच कुंड्यांमधून तयार केलेल्या माझ्या बागेतील झाडं निरखत कौतुकानी त्यांना गोंजारत होते. झाडांच्या अध्येमध्ये दिसणारी पिवळी पानं माझ्या नजरेला पटकन बोचली. मी आतून कात्री घेऊन परत समोर आले तर आई घरात शिरत होती.

खूप दिवसांनी आईला आलेली बघून मी जाम खुश झाले. तिला खुर्चीवर बसायला लावत मी म्हटलं, ” आई गं, एवढं हातात घेतलेलं पूर्ण करून घेते पटकन, मग मस्तपैकी गप्पा मारत ऐसपैस बसू हं ! ” 

मी हातातल्या कात्रीने कुंडीतल्या झाडांची पिवळी पानं सपासप छाटत बोलत राहिले—

” बघ नं आई, इतकी छान घनदाट, हिरवीगार झालीयेत झाडं। पण या पिवळ्या पानांमुळे झाडांची सारी शानच नाहीशी होतेय ! म्हणून आज ठरवून, सगळी पिवळी पानं छाटून टाकण्याचा उद्योग चालवलाय मी! “

माझं वाक्य संपून दोन तीन मिनिटं झाली तरी आई काहीच का बोलत नाही म्हणून मी मागे वळून पाहिलं तर, आई कसल्यातरी विचारात गढल्यासारखी, एकटक नजरेने, कापून टाकलेल्या पिवळ्या पानांकडे बघत बसली होती. तिचे डोळे मात्र पाण्याने काठोकाठ भरलेले दिसले. मला काहीच कळेना !

तेवढ्यात आई मनाशीच बोलल्यासारखी म्हणाली ” खरंच, पिवळी पानं हिरव्यागार झाडांची सारी शोभाच नाहीशी करतात. तुमच्या हिरव्यागार बहरलेल्या सुंदर संसारात आम्ही वृद्ध मंडळी पण पिवळ्या पानांसारखी विशोभित दिसत असू, नाही गं? पण पिवळ्या पानांसारखं आम्हाला काढून टाकता येत नाही. आपोआप गळून पडेल म्हणून वाट बघावी लागते एवढंच!”

” आई, काहीतरीच हं तुझं ! उगाच नाही नाही ते विचार डोक्यात घेऊन, नाराजीचाच सूर तू आजकाल लावत असतेस. अगं पिवळी झालेली झाडांची पानं कापण्याची लहानशी गोष्ट ती काय, आणि तुझे विचार कुठल्याकुठे जाऊन पोहोचले बघ ! आताशा तू खूपच बदललीयेस, हळवी झालीयेस. काय झालंय गं आई? “

मी हातातली कात्री तिथेच ठेवून, आईच्या जवळ जाऊन बसले. लहानपणीसारखा तिच्या बांगड्यांशी खेळ करत राहिले. पण आईचा मूड गेला तो गेलाच. मात्र तिच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरू होती. खरं तर इतक्या लहानशा घटनेनी तिनं एवढं अस्वस्थ का व्हावं, हाच विचार मनात मी करत होते. तोच स्वत:हूनच ती परत बोलायला लागली.

” अगं मी घरातून निघताना, असलं काही सुद्धा माझ्या मनात नव्हतं.पण तुला असं ते पिवळी पानं सपासप कापताना बघून सहजच माझ्या मनात विचार आला आणि लगेच तो बाहेर पडला सुद्धा ओठातून ! बघ बेटा जरा तूच विचार कर… वाढत्या वयाबरोबर, आयुष्याच्या तिन्हीसांजेला मी कदाचित हळवी झालेही असेन, पण शांतपणे विचार केलास तर तुलाही माझं म्हणणं पटेल बघ ! कुणी मुद्दाम नाही गं करत, पण आपोआप, नकळताच आम्हा वृद्धांना किंचित का होईना वेगळी वागणूक वाटेला येतेच बघ ! ‘ आमच्या घरी नं वृद्ध, वयस्कर मंडळी आहेत ‘ असं कुणी म्हटलं तर

त्यात आदर, प्रेम जाणवतं, पण आधीच परावलंबी विद्रुप वृद्ध व्यक्तींना कुणी, ‘ म्हातारे, बुढ्ढे, थेरडे ‘ असले शब्द वापरले की मन अगदी खोलवर घायाळ होऊन जातं बघ! जितकी जास्त वर्ष जगणार तितका जास्त हा अनुभव येणार आणि मनाचा हळवेपणा जास्त वाढणार! ” आई बोलता बोलता किंचित थांबली म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला.

” आई, असं काय गं आज? वेगळेच विचार डोक्यात घेऊन तू पार अस्वस्थ झालीयेस ? काही घडलंय का वेगळं विशेष?”

” नाही गं, असं काहीच नाही. आज उगाच बोलावंसं वाटलं झालं! घरात आपण अडगळीपेक्षा ‘नकोसे ‘आहोत, ही भावना मनात जागी होणं किती दु:खदायक असतं? दिवसेंदिवस वृद्धाश्रमसुद्धा किती बोकाळलेत बघ की ! बरं, त्याला तरी वृद्धाश्रम का गं म्हणायचं? “

” आई, अगं असं काय ? आपला काही संबंध आहे का त्याच्याशी?” मी खरंच काय बोलावं न समजून काहीतरीच बोलले होते, हे मलाही जाणवलं. आईनी तिचं बोलणं पुढे सुरू ठेवलं.

” अगदी अनाथाश्रमासारखाच वृद्धाश्रम हा शब्दही केविलवाणा वाटतो, पोरका वाटतो. त्या निष्पाप मुलांना निदान, त्यांचे आई-वडील कोण आहेत याची जाणीव तरी नसते.इथे मात्र कित्येकदा सारी नातीगोती असूनही केवळ

‘ घरात नको ‘ म्हणून हकालपट्टी झालेली असते, ते बघून जीव दुखतो.”

क्रमशः…

लेखिका : मीनाक्षी मोहरील

प्रस्तुती : अस्मिता इनामदार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 4 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 4 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

शनिवार संध्याकाळ! 

पुण्यातल्या गर्दीतून साठेसाई गावातल्या आमच्या शेतावर गेल्यावर हळूहळू मन निवत जातं. संध्याकाळी परिसरातले बदल टिपत टिपत निवांत चालत होतो.  

अचानक लक्ष गेले अंगांगाने फुललेल्या, बहरलेल्या रानजाईच्या वेलीकडे. वा! कमाल! मंत्रमुग्ध केले तिने… तिच्या सुगंधाने मन मदहोश झाले… ‘ तू… तेव्हा तशी… बहराच्या बाहूंची… ‘ ही ग्रेस यांची कविता आठवली. तो क्षण कॅमेरात टिपून घेण्याचा मोह आवरला नाही… 

हा आनंद! झुळूक… तापल्या भाळावर, थंड वाऱ्याची!

शेतावरच्या आमच्या वॉचमन सखीला मी हे फोटो मोठ्या अप्रूपानं दाखवले. ती सहज म्हणाली,” ती पांढरी फुलं व्हय? ” तिच्यासाठी तो नेहमीचाच सिलसिला होता, उमलणे – कोमेजणे… त्यात काही नवल नव्हते. 

तिच्या आणि माझ्या आनंदाच्या कल्पना किती वेगळ्या आहेत!  सापेक्ष आहे बुवा सगळे!

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी, खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोयंडाच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला….. मै हुँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू… आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्या दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर…. कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर… मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात…. जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग….. अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती हे सहज विसरून जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत… घरात… समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं… दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण…. काय उपयोग. मित्र कायमचा गेला.

आपणही जरूर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा. ही विनंती  आहे.

संग्रहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २४ – भाग १ -वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल  ✈️

जॉर्डेनिअन एअरवेजने अमान इथे विमान बदलून स्पेनची राजधानी माद्रिद इथे पोहोचलो. माद्रिदहून आम्ही पोर्तुगालमधील पोर्टो या शहरात आलो. युरोपमधील जवळजवळ सर्व देश एकमेकांना अत्यंत उत्तम आठ पदरी महामार्गांनी व शानदार रेल्वे मार्गाने जोडलेले आहेत.’शेंगेन व्हिसा’ असल्याने (ब्रिटन सोडून ) सहजतेने एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करता येतो. माद्रिद ते पोर्टो  या चारशे किलोमीटरच्या प्रवासात बसच्या स्वच्छ काचेतून दुतर्फा ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ दिसत होते. डोंगर पायथ्याशी भातशेतीची आणि लुसलुशीत कोवळ्या पोपटी गवताची खूप मोठी कुरणे होती. त्यात वाळलेल्या सोनेरी गवताच्या दुलया गुंडाळून ठेवल्या होत्या.जॅकारंडाचे वृक्ष हळदी व जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरले होते. ऑलिव्ह, कॉर्क, पाम, ओक, पाईन  अशा वृक्षांची दाटी होती. याशिवाय संत्री, सफरचंद, द्राक्षे यांच्या मोठ्या मोठ्या बागा होत्या. शेतांमधून कारंज्यांसारखी स्प्रिंकलर्स होती. खूप मोठ्या सोलर प्लेट लावलेल्या होत्या. डोंगरमाथ्यावर पवनचक्क्यांच्या रांगा भिरभिरत होत्या.

पोर्टो हे प्राचीन, नऊशे वर्षांपूर्वीचे सुंदर शहर डोरो नदीच्या मुखाजवळ आहे. १९९७ मध्ये युनेस्कोने या शहराचा वर्ल्ड हेरिटेज मध्ये समावेश केला आहे. एकेकाळी इथूनच पोर्तुगालचा राज्य कारभार चालत असे. नव्या जगाच्या शोधार्थ निघालेल्या धाडसी दर्यावर्दींसाठी जहाजांचे बांधकाम पोर्टो येथील गोदीमध्येच झाले. पोर्टोमधील खूप उतार असलेल्या दगडी रस्त्यांवरून ट्रॅमपासून सर्व प्रकारची वाहने धावत होती. या अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकमेकींना चिकटलेल्या सलग इमारती आहेत. छोट्या घरांच्या दर्शनी भागावर सुंदर डिझाईनच्या ग्लेझ्ड टाइल्स लावल्या आहेत. या टाइल्समुळे सर्व ऋतूंमध्ये  घराचे संरक्षण होते असे गाईडने सांगितले. या घरांना नळीची कौले  होती आणि अगदी छोट्या जागेत, खिडकीत  तर्‍हेतर्‍हेची फुलांची झाडे सौंदर्यपूर्ण रीतीने जोपासली होती. चौरस्त्याच्या मधोमध सुंदर पुतळे आहेत. इथल्या सांता क्लारा चर्चच्या अंतर्गत लाकडी नक्षीकामावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे.उंच मनोऱ्यांवर मोठी घड्याळे आहेत.छोट्या बागांमधील दगडी चौथर्‍यावर, स्त्रिया, मुले, इतिहासातील पराक्रमी पुरुष, दर्यावर्दी यांचे पुतळे आहेत. प्रसिद्ध शिल्पकारांच्या शिल्पांची म्युझियम्स आहेत.

पोर्टोची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे डोरो नदीवर बांधलेले वैशिष्ट्यपूर्ण देखणे पूल! स्पेनमध्ये उगम पावलेली डोरो नदी पोर्तुगालमध्ये येऊन अटलांटिक महासागराला मिळते. निळसर रंगाच्या, समुद्राप्रमाणे भासणाऱ्या लांबरुंद डोरो नदीवरील पूल म्हणजे स्थापत्यशास्त्रातील कलात्मक सौंदर्याचे नमुने आहेत. मारिया पाया हा ६० मीटर लांबीचा, नदीवरून रेल्वे वाहतूक करणारा पूल हा संपूर्णपणे धातूचा (metallic structure) बांधलेला आहे. एकाच लोखंडी कमानीवर तोललेल्या या पुलाचे डिझाईन गुस्ताव आयफेल ( पॅरिसच्या सुप्रसिद्ध आयफेल टॉवरचे वास्तुशास्त्रज्ञ ) यांनी केले आहे. १८७७ मध्ये पूर्ण झालेला हा पूल अजूनही उत्तम स्थितीत असून तो वापरात आहे.आयफेल यांचे शिष्य टोफिलो सिरींग यांनी या नदीवर डी लुईस हा पूल १८८६ मध्ये बांधला. वाहनांसाठी असलेला हा दुमजली पूल आपल्या गुरुंप्रमाणे त्यांनी मेटलचा व एकाच कमानीवर तोललेला असा बांधला  आहे. यावरून सतत वाहतूक चालू असते. त्याशिवाय आणखी तीन  सिमेंट काँक्रीटचे पूल बांधण्यात आले आहेत. नदीचे विहंगम दृश्य बघण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांना जोडणाऱ्या केबलकारची सोय करण्यात आली आहे. नदीतून जुन्या पद्धतीच्या, पसरट तळ व उंच टोकदार डोलकाठी असलेल्या रिबेलो नावाच्या होड्यांतूनही वाहतूक चालते.

पोर्टोची आणखी एक खासियत म्हणजे इथली जगप्रसिद्ध ‘पोर्ट वाइन ‘. पोर्टोच्या आसपासच्या परिसरातील व डोरो व्हॅलीतील द्राक्षांपासून ही गोडसर  चवीची रेड वाइन बनविली जाते. मोठ्या लाकडी पिंपांतून (बॅरल्स ) साठविली जाते व जगभर निर्यात होते.

भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Endured Anguish… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem Endured Anguish… We extend our heartiest thanks to the learned author  Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit,  English and Urdu languages for sharing this classic poem.  

☆ Endured Anguish… ?

Smelted constantly

in the blazing inferno,

Amalgamated ceaselessly

in the virulent acid…

 

Endured anguish of

the gory bloodbath,

Ever inflicting carnage

mutilated sensibilities…

 

Shell-shocked are they

on my enduring silence

instead of expected

hysterical cachinnations…

 

How ruefully oblivious

are they of the onerously

ever-painstaking process

of making the pure gold…!

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

 

Pune

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares