श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९  जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शिवाजीराव अनंतराव भोसले (१५ जुलै १९२७ ते २९ जून २०१० )

शिवाजीराव भोसले यांचा जन्म सातारा जिल्हयात कलेढोण इथे झाला. त्यांचे कॉलेजचे शिक्षण पुण्याला वाडिया कॉलेज व कोल्हापूरला राजाराम कॉलेज इथे झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेचाही त्यांनी लाभ घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या लॉ कॉलेजमधून घेतली.

फलटणयेथील मुधोजी कॉलेजमध्ये त्यांनी मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान हे विषय शिकवले. अवघड विषय सहज, सोपा करून ते शिकवत. पुढे याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्यपदाची धुराही संभाळली.

शिवाजीराव भोसले उत्कृष्ट व्याख्याते होते. भारतीय तत्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविन्द, स्वामी विवेकानंद, छ्त्रपती शिवाजी महाराज इ. विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्याने देत.  विवेकानंदांचे शिला स्मारक उभारण्याच्या वेळी शिला स्मारक समितीच्या वतीने त्यांनी देशभर व्याख्याने दिली.

शिवाजीराव भोसले यांचे साहित्य

१.    कथा वक्तृत्वाची २. जागर (खंड १ आणि २) ३. दीपस्तंभ, ४. देशोदेशीचे दार्शनिक    ५. मुक्तिगाथा महामानवाची,  ६. यक्षप्रश्न, ७. स्वामी विवेकानंद, ८. हितगोष्टी

पुरस्कार, मान-सन्मान

१.    आदर्श शिक्षक म्हणून राज्य पुरस्कार, २. सातारा भूषण, ३. फलटण भूषण ४. विद्याव्यास पुरस्कार, ५. रोटरीचा जीवन गौरव पुरस्कार, ६. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, ७. श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार,  ८. भारती विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार ९. चतुरंग प्रतिष्ठान – मानपत्र

शिवाजीराव भोसले – स्मृती पुरस्कार

पुण्याची, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृतीसमिती दर वर्षी १५ जूनला त्यांच्या नावाचा         

स्मृती पुरस्कार देते. आत्तापर्यंत या समीतीतर्फे बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, साहित्यिक द.मा. मिरासदार, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, डॉ. ह.वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांना पुरस्कार मिळाले आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

दिगंबर बाळकृष्ण मोकाशी – ( २७ नोहेंबर १९१५ – २९ जून ८१)

दि. बा. मोकाशी हे ख्यातनाम मराठी कथाकार व कादंबरीकर होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण इथे झाला. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले व पुण्यात रेडियो दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. लामणदिवा हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९४७ मधे प्रसिद्ध झाला. 

दि. बा. मोकाशी यांचे अन्य साहित्य – कथा

१.    कथामोहिनी, २. आमोद सुनासी आले, ३. वणवा, ४. चापलूसी, ५. एक हजार गायी,  ६. आदिकथा,  ७. माऊली, ८. तू आणि मी हे त्यांचे काही कथासंग्रह 

कादंबरी –१. स्थलयात्रा, २. पुरुषास शंभर गुन्हे माफ, ३. देव चालले, ४ आनंद ओवरी, ५. वात्सायन

 यापैकी आनंद ओवरी व वात्सायन या कादंबर्याप चरित्रात्मक असून त्या अनुक्रमे संत तुकाराम व वात्सायन यांच्या जीवनावरच्या आहेत.

प्रवासवर्णन – पालखी व अठरा लक्ष पाऊले.  या पुस्तकातून प्रवास वर्णनापेक्षा समाज जीवनाचे दर्शन घडवण्यावर अधीक भर दिला आहे.

अर्नेस्ट हेमिंगवे यांच्या ‘फॉर हूम द बेल्स टोल्स’ या सुप्रसिद्ध कादंबरीचा ‘घणाघणती  हा उल्लेखनीय अनुवाद त्यांनी केला आहे.

दि. बा. मोकाशी  यांनी लहन मुलांसाठीही पुस्तके लिहिली.

विविध अंनुभूतीतून माणूस शोधण्याचा प्रयत्न ते आपल्या कथा -कादंबर्यांठमधून करतात. व्यक्तीच्या अंतर्मनाचा शोध  ते घेतात.  भावचित्रणातील नाजुकपणा व हळुवारपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम त्यांच्या कथा –कादंबर्यांतमधून झालेला दिसतो. जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळीवरून अनुभव घेऊन त्यामध्ये संगती शोधण्याचा प्रयोग त्यांनी आपल्या लेखनातून केलाय.

दि. बा. मोकाशी  यांनी गूढकथा, पिशाच्च कथा,  रहस्य कथा अशा वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या आहेत.

‘संध्याकाळचे पुणे’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक. संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रुपे त्यांना दिसली, त्याचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी या पुस्तकात घडवले आहे.

पुरस्कार-

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार दि. बा. मोकाशी यांच्या गुपित, पालखी, स्थलयात्रा, आमोद सुनासी आले, देव चालले, जमीन आपली आई या पुस्तकांना मिळाला आहे.

त्यांच्या आनंद ओवारीचे भाषांतर अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेत यांनी केले आहे. ‘देव चाललेचे भाषांतर प्रमोद काळे ( इंग्रजी) यांनी केले आहे. त्याच प्रमाणे या पुस्तकाचा अनुवाद हंगेरीयन व ओरिया भाषेतही झाला आहे. अमृतानुभव या ललित लेखाचा अनुवाद इंग्रजीत झाला आहे.त्याचप्रमाणे कामसूत्रकार वात्सायन आणि पालखीचाही इंग्रजीत अनुवाद झाला आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर  (18 फेब्रु. 1911 – 29 जून 2000)

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म पुण्यातील येरवडा इथे झाला. ते भारतीय भूदलात कॅप्टन होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबर्यान लिहिल्या.

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे प्रकाशित साहित्य

कादंबर्याॅ – १.उधळल्या प्रभा दशदिशा, २. कळस चढवला मांदिरी ३. दख्खनचा दिवा हरपला, ४. घटकेत रोविले झेंडे, ५. नवरत्ने हरपली रणांगणी, ६. पेशवाईतील कर्मयोगी, ७.राघो भरारी, ८. राज्य तो छत्रपतींचे, ९.शर्थीने राज्य राखले, इ. त्यांच्या कादंबर्या  प्रकाशित आहेत.

कथा संग्रह – काळदरीतील वीरगळ

प्रवास वर्णन –  अरुणाचलच्या सीमेवरून

याशिवाय बाहिरी ससाणा (भयकथा), महाभारत एक पर्व, हेर नयन हे नृपतीचे अशी आणखीही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शिवाजीराव भोसले या विद्वान आभ्यासकाचा, श्रेष्ठ वक्त्याचा आणि लेखकाचा आज स्मृतीदिन. त्याचप्रमाणे आज नामवंत लेखक दि. बा. मोकाशी आणि कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचाही आज स्मृतीदिन त्या निमित्त या तिघांनाही  भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments