आपल्या देशात प्राचीन काळापासून राजघराण्यातील खूप शूर स्त्रियांनी राज्याचे रक्षण करण्यासाठी शत्रूंना परास्त केल्याचा इतिहास आपण वाचतो .पण झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा कित्तूरची राणी चन्नम्मा यापेक्षा जास्त नावे आपल्या लक्षात राहत नाहीत. तर कुणाकुणाचे आपण नावही ऐकलेले नसते. अशीच एक अनभिज्ञ राणी,जिने पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाचे नियम मोडून आपल्या पोलादी पंजाने शत्रूला नामोहरम करून पन्नास वर्षे राज्य केले. त्या काश्मीरच्या-राणी दिद्दाचे हे चरित्र.
उत्तर भारतात (आजचे हरियाणा, पूर्ण पंजाब, राजौरी, पुंछ या भागावर) तेव्हा लोहार वंशाचे राज्य होते .लोहार समाज त्या काळी खूप प्रतिष्ठीत होता. युद्धासाठी जरुरी असलेली शस्त्रास्त्रे आणि शेतीची अवजारे बनवणे हे त्यांचे काम असायचे. एका शहराचे लाहोर हे नाव सुद्धा ‘लुहार’ या शब्दावरूनच पडले होते.
ईसवी सन 958 मध्ये लोहार वंशात एक अतिशय सुंदर कन्यारत्नाचा जन्म झाला. पण राजा सिंहराज व राणीने आनंदोत्सव साजरा केला नाही. कारण ती दुर्दैवी बालिका जन्मताच एका पायाने अपंग होती.निष्ठुर आई-वडिलांनी तिचा त्याग केला. तिला कायमचेच एका दाईच्या सुपूर्द करून टाकले.त्या प्रेमळ दाई मॉंच्या दुधावरच ती सुंदर चिमुरडी मोठी झाली. दाईमॉंने तिला राजकन्येसारखे वाढवले. तिच्या योग्य शिक्षणाची व्यवस्था केली आणि छोटीशी द़द्दा पण आपल्या अपंगत्वाला अडथळा न मानता युद्ध कलेत पारंगत झाली. खेळामध्ये प्रवीण झाली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याचा तिने अभ्यास केला. या सगळ्यात व्यस्त असलेल्या तिचे वय वाढत चालले होते. त्या काळात, साधारण हजार वर्षांपूर्वी सव्हिस वर्षाची अपंग कुंवारी मुलगी… म्हणजे ती वाया गेलेलीच असणार तिचे नाव उच्चारणे पण महापाप आहे,असा समज सर्वत्र होता.
पण दैवाच्या योजना माणसांना थोड्याच माहीत असतात!
एके दिवशी शिकारीच्या दरम्यान काश्मीरचा राजा क्षेमगुप्त याच्या ती दृष्टीस पडली आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच तो सौंदर्यवती दिद्दाच्या प्रेमात पडला. ती लंगडी आहे हे माहीत झाले असूनही क्षेमगुप्ताने तिच्याशी विवाह केला.
दिद्दाचे भाग्य चक्रच पालटले. आता ती एका मोठ्या राजघराण्याची…. ज्यांच्या राज्याची सीमा इराणपर्यंत पसरली होती…. कुलवधू झाली होती. तिचे सुखी आयुष्य सुरू झाले. तिला पतीचे प्रेम व आदर आणि अभिमन्यूच्या रुपाने सुंदर पुत्र ही लाभला.क्षेमगुप्ताला राजकारणात विशेष रुची नव्हती. त्याने दिद्दाची बुद्धिमत्ता व व्यवहार कुशलता पहिली आणि राज्यकारभारात लक्ष घालण्याची तिला प्रेरणा दिली. नंतर तर तिच्या कर्तृत्वावर प्रसन्न होऊन तिचा सन्मान करण्यासाठी सुवर्णमुद्रा पण त्याने काढली .आपल्या पत्नीच्या नावाने ओळखला जाणारा तो पहिलाच राजा म्हणावा लागेल.कारण तो नंतर राजा दिद्दाक्षेमगुप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.
चतुर, चाणाक्ष पराक्रमी दिद्दाने कित्येकदा आक्रमण करून आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केले. बहुतेक जगात प्रथमच तिने ‘कमांडो’ सैन्याचा विकास केला.तसेच युद्ध जिंकण्यासाठी गोरिल्ला युद्ध (गनिमी कावा) तंत्राचा वापर केला.
माझा स्वभाव कृतीशील आहे. सतत काही ना काही करण्यासाठी माझं मन प्रवृत्त होत असतं. एकेकदा फरपट व्हावी एवढी ही कृतिशीलता! माझ्या समवेतच्या लोकांनादेखील ती अस्वस्थ बनवते. त्याच्या जोडीला मला सगळ्याचीच खूप घाई असते. ही घाई मला थांबू देत नाही, रमू देत नाही कशातही.
‘ चला …’ अशी हाक माझ्या आतून वारंवार उचल खात असते. कुठे जायचंय? कुठे पोचायचंय? आणि तिथे पोचल्यावर तरी मिळणार आहे का आनंद? की पुन्हा, चला…? माझ्या आनंदाला माझ्याच स्वभावातल्या अशा काही गोष्टी ग्रहण लावतात.
कसा बनला असेल हा स्वभाव?
मला स्वतःवर काम करायला आवडते. मानसशास्त्र हा काही माझा विषय नाही. पण मला जर आनंदाचा शोध घ्यायचा झाला तर मला माझ्या मनाबद्दल समजून घ्यायला हवे ना?
प्रश्न पडायला लागल्यापासून या संदर्भात काहीही ऐकू आलं तर मी कान टवकारते. पुस्तकं, लेक्चर्स, वर्कशॉप्स, अभ्यास गट अशा मिळेल त्या मार्गाने मी शोध घेत रहाते. जिवंत रहाण्यासाठी मला ते आवश्यक वाटते. कुठून कुठून काही काही समजत जातं आणि पावलापुरता प्रकाश मिळतो.
आपल्या स्वभावातल्या गमती जमती समजतात आणि त्यातून मार्ग काढायच्या युक्त्याही समजतात.
लहानाचं मोठं होत असताना, आपल्या काही गरजा पूर्ण होत नाहीत, मनाजोगे घडत नाही. त्या वेळी आपल्या हातात काहीच नसतं. या प्रकारच्या भावनांच्या वादळांतून वाट काढताना, जाणता अजाणता काही मार्ग शोधले जातात.
जसं की संतापी अभिव्यक्ती, स्वतःला दोष देत राहणं, मनाला लावूनच न घेणं अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण स्वतःला वाचवतो. आजूबाजूच्या इतर माणसांचे अनुकरण आणि प्रभाव देखील असतात या निवडीवर. त्या त्या वेळी आपण काढलेल्या मार्गांची, patterns ची नंतर सवयच होऊन जाते.
खरं तर आज तसं वागायची गरज नसते. पण ते patterns अगदी पक्के भिनलेले असतात आपल्यात. स्वभावच बनून गेलेला असतो तो! पण स्वभाव बदलता येतो हे मी अनुभवातून सांगते.
शालेय वयात विविध कारणानी जोपासल्या गेलेल्या माझ्यातल्या न्युनगंडावर मात करण्यासाठी शोधलेला हा मार्ग असू शकतो, हे आता समजते. आता वयाच्या या टप्प्यावर गरज नाहीये या ‘घाईची’ आणि स्वतःची फरपट करणा-या ‘कृतीशीलतेची’ देखील! उलट ह्या दोन्ही गोष्टी, एकाग्र होऊन माझे आकलन, समज एकत्र बांधण्याच्यामध्ये, आनंदाच्या वाटेवर अडथळाच बनत आहेत.
हे लक्षात येणं खूप भारी आहे! आता मी सांगू शकते माझ्या मनाला…
☆ मी प्रवासिनी क्रमांक २३ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
एक जिद्दी देश— इस्त्रायल
‘सी ऑफ गॅलिली’च्या एका किनाऱ्यावर खूप मोठ्या परिसरात, सुरेख झाडा-फुलांचा सान्निध्यात, थोड्या उंचीवर एक छान चर्च आहे. ख्रिश्चन धर्मियांसाठी हे एक पवित्र ठिकाण आहे. येशू ख्रिस्त या परिसरात राहिला होता, इथल्या टेकड्यांवरून त्याने प्रवचने दिली असे मानले जाते.
गेले दोन- तीन दिवस आम्ही ‘सी ऑफ गॅलिली’च्या किनाऱ्यावरील एका हॉटेलात मुक्कामाला होतो. उगवत्या सूर्याची किरणे गॅलिलीच्या निळ्या-निळ्या लाटांवर स्वार होत आणि आसमंत सोनेरी प्रकाशाने भरून जाई. दिवसभर स्थलदर्शन करताना दुपारचे कडकडीत उन्ह नकोसे होई तर संध्याकाळी हॉटेलच्या गच्चीवरून गॅलिलीचा किनारा मुला माणसांनी फुललेला दिसे. गॅलिलीवरून आलेला ताजा वारा आणि लिची ज्यूस किंवा चहा कॉफीबरोबर घेतलेल्या ( घरच्या ) चकल्या, चिवड्याच्या समाचार यामुळे संध्याकाळ सुखद होई. आज गॅलिलीचा निरोप घेऊन इस्रायलच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावरील हैफा इथे जायचे होते.
इस्त्रायलच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. हैफा हे समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर शहर व्यापारी व औद्योगिक ठिकाण तसेच महत्त्वाचे बंदर आहे. दोन विद्यापीठे, सागर संशोधन संस्था, कला, नौकानयन आणि पुरातत्व संशोधनाशी संबंधित म्युझियम आहेत. प्रागैतिहासिक काळापासून ऑटोमन साम्राज्यापर्यंतच्या अनेक खाणाखुणा या शहराने जपल्या आहेत.
हैफा, तेल अव्हिव्ह, बहाई गार्डन्स
हैफाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र किनाऱ्यावर बहाई वर्ल्ड सेंटर व जगप्रसिद्ध बहाई गार्डन्स आहेत. पर्शियामध्ये राहणारा बहाउल्ला हा या पंथाचा संस्थापक आहे. स्त्री- पुरुष समानता, मानवता हा एकच जागतिक धर्म , एकच ईश्वर, गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी नाहीशी करणे अशी या पंथाची उदात्त तत्वे आहेत. जगातील बहुतांश देशांत या पंथाचे अनुयायी आहेत. आपल्याकडे दिल्लीला बहाई पंथाचे ‘लोटस टेंपल’ आहे. बहाउल्लाच्या या विशिष्ट विचारांच्या शिकवणुकीमुळे त्याला पर्शियातून हाकलले गेले . तो हैफा जवळील एकर या ठिकाणी आला. इसवी सन १८९२ मध्ये बहाउल्लाचा मृत्यू झाला.
आम्ही बसने माउंट कारमेलच्या माथ्यावर पोचलो. प्रवेशद्वारातून खाली उतरण्यासाठी दगडी जिने आहेत दोन जिने उतरून खाली आलो आणि समोरच्या पोपटी- हिरव्या, एकाखाली एक उतरत जाणाऱ्या देखण्या बागा बघुन चकीतच झालो.माउंट कारमेलच्या साडेसातशे फूट उंचीवरून समुद्रकिनारी असलेल्या बहाउल्लाच्या मंदिरापर्यंत १८ सुंदर, भव्य बागा एकाखाली एक उतरत गेल्या आहेत. आम्ही उभ्या होतो तिथपासून समुद्र किनाऱ्यावरील मंदिरापर्यंतच्या सर्व बागा, तळाशी असलेले शुभ्र संगमरवराचे मंदिर, त्याचा लालसर ग्रॅनाईटचा घुमट, त्यावरील सोनेरी टाईल्स सूर्य प्रकाशात चमकताना दिसत होत्या. पलीकडल्या निळ्या- हिरव्या भूमध्य समुद्रात मोठ्या बोटी बंदरात शिरण्यासाठी वाट पाहत उभ्या होत्या.
२०० फूट ते १२०० फूट रुंद असलेल्या या बागांच्या मधोमध उतरते दगडी जिने, पूल, छोटे-छोटे बोगदे कल्पकतेने आखले आहेत. झाडा फुलांनी डवरलेल्या त्या बागांच्या मध्ये लहान-मोठी कारंजी आहेत. बागांच्या कडेने मूळ डोंगरावर असलेली रानटी पण रंगीत फुलांची झाडे आणि तिथल्या मूळ वृक्षांच्या प्रजाती यांचे संवर्धन केलेले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश, निळा हिरवा समुद्र, उतरत्या देखण्या बागा आणि निस्तब्ध , हिरवी शांतता असे एक सुंदर निसर्ग चित्र मनावर कोरले गेले.
माऊंट कारमेलच्या उत्तर भागातील उतारावरून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी उतरत्या बागांचे डिझाईन करण्याचे काम १९८७ मध्ये कॅनडिअन वास्तुशास्त्रज्ञ फरिबोर्झ साबा यांना देण्यात आले तर मंदिराचे डिझाईन कॅनेडियन वास्तुशास्त्रज्ञ विल्यम मॅक्सवेल यांनी केले आहे. मंदिराचा शुभ्र संगमरवरी बाह्यभाग हा इटलीमधून तयार करून आणण्यात आला. मंदिराचे घुमटाचे खांब लालसर ग्रॅनाईटचे आहेत आणि त्यावर सोन्याच्या पत्र्याने मढविलेल्या टाईल्स बसविल्या आहेत. हे काम हॉलंडमध्ये करण्यात आले. जगभरचे प्रवासी आवर्जून या बागा बघण्यासाठी येतात .मागील वर्षी या बहाई गार्डन्सना साडे सात लाख लोकांनी भेट दिली.
जाफा आणि तेल अव्हिव्ह ही आता जुळी शहरे झाली आहेत. तेल अव्हिव्ह ही इस्त्रायलची आर्थिक, औद्योगिक ,व्यापारी, सांस्कृतिक राजधानी आहे. भूमध्य समुद्रकिनारी असलेल्या या देखण्या शहरात इस्त्रायलच्या एकूण ८२ लाख लोकसंख्येपैकी ४५ लाख लोक राहतात. आपल्या मरीन ड्राईव्हसारख्या सागर किनारी अनेक देशांचे दूतावास, सरकारी कार्यालये, उच्चभ्रू वस्ती आहे. गॅलिलीच्या पश्चिमेकडील हा समृद्ध विभाग आहे. या विभागात संत्री-मोसंबी, ऑलिव्ह, ॲव्हाकाडो अशी फळे व शेती होते. भूमध्य समुद्राच्या सुंदर किनाऱ्यावर सागरी खेळांची सुविधा आहे. अनेक संशोधन केंद्रे आहेत.
तेल अविव इथून जेरुसलेम इथे पोहोचलो. इथल्या हॉटेलात प्रवाशांची सतत ये-जा होती पण कुठेही गडबड गोंधळ नव्हता. जेरूसलेमला पोहोचलो त्या रात्री आम्ही तिथल्या प्राचीन किल्यात ‘साउंड ॲ॑ड लाईट’ शो पाहिला. किल्ल्याच्या आवारात बसण्याची व्यवस्था होती. किल्ल्याच्या भिंती, बुरुज, दरवाजे, उंच-सखलपणा या विशाल पार्श्वभूमीवर प्रोजेक्टर्स, स्पीकर्स, आणि कम्प्युटर्स यांच्या सहाय्याने हे ४० मिनिटांचे, खुर्चीला खिळवून ठेवणारे, प्राचीन काळाची सफर घडविणारे नाट्य उभे केले गेले. किंग डेव्हिड व किंग सॉलोमनचा कालखंड, जेरुसलेमचा नाश व पुनर्निर्माण, घोडे,उंट, व्यापारी, योद्धे, सामान्य नागरिक, रोमन काळ, चर्चेस, धर्मगुरू, इस्लामी कालखंड, ऑटोमन साम्राज्य आणि सध्याचे जेरुसलेम असा भव्य कालपट यात उलगडला आहे.स्केर्झो या फ्रेंच कंपनीने या शोची अतिशय देखणी आणि कल्पक उभारणी केली आहे.
दुसऱ्या दिवशी ‘नान दान जैन इरिगेशन प्रोजेक्ट बघायला गेलो. उपलब्ध जमीन, पाणी, हवामान आणि मातीचा कस याचा संपूर्ण अभ्यास व पिकांच्या जातींचे संशोधन करून ड्रिप इरिगेशनने पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढेच पाणी व खत पुरविण्याची पद्धत इस्त्रायलने प्रयत्नपूर्वक राबवली आहे. त्यामुळे थोड्या जागेत भरपूर पीक घेतले जाते व नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य उपयोग केला जातो. जगभरातील शंभराहून अधिक देशात ‘नान दान जैन इरिगेशन’ कंपनीने तांत्रिक सहाय्य केले आहे. ड्रिप इरिगेशन, मायक्रो स्प्रिंकलर्स, हरितगृह उभारणी करून उत्पादन वाढीसाठी क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. तिथल्या प्रोजेक्ट मॅनेजरने सुरुवातीलाच अगदी अभिमानाने सांगितले की,’ आत्ता तुम्ही जे पाणी प्यायलात ते अर्ध्या तासापूर्वी भूमध्य सागराचे पाणी होते. आता आम्ही ‘सी ऑफ गॅलिली’चे गोडे पाणी पिण्यासाठी अजिबात वापरत नाही, and we can’t afford to waste a single drop of water.’
वाढती लोकसंख्या, गोड्या पाण्याची वाढती मागणी, कमी पाऊस, पाण्याचा उपलब्ध साठा याचा भविष्यकालीन वेध घेऊन इस्त्रायलने समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी मोठे प्लांट्स उभारले आहेत. यासाठी रासायनिक प्रक्रियेचा वापर करतात. इस्त्रायलमध्ये प्रत्येक घरातील सिंक, बेसिन, बाथरुम यांचे पाणी प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाते.सतत संशोधन, नवनवीन तंत्रज्ञान व त्याचा रोजच्या जीवनासाठी आवर्जून वापर हे इस्त्रायलचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जिन्होने साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक से यह स्तम्भ लिखने का आग्रह स्वीकारा। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका पारिवारिक जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं।
आज प्रस्तुत है फारूक अफरीदी, कविता मुखर द्वारा पुस्तक “चटपटे शरारे” की समीक्षा।
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 110 ☆
☆ “चटपटे शरारे” … संपादन… फारूक अफरीदी, कविता मुखर ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆
चटपटे शरारे
राही रेंकिंग २०२० में चयनित व्यंग्यकारों का व्यंग्य संकलन
संपादन… फारूक अफरीदी, कविता मुखर
संयोजक… प्रभात कुमार गोविल, डॉ. संजीव कुमार
प्रकाशक… इंडिया नेटबुक्स प्रा लिमि नोएडा
मूल्य ४००रु, पृष्ठ २०४
चर्चाकार.. विवेक रंजन श्रीवास्तव
शतक एक ऐसी संख्या है जो एक मान्य मुकाम की उद्घोषणा के रूप में स्थापित हो चुकी है. क्रिकेट में शतकीय पारी, उम्र में १०० बरस की जिंदगी, परीक्षाओ में १०० अंको के पूर्णांक वगैरह वगैरह… वर्ष २०१५ से राही सहयोग संस्थान नामक संस्था ने स्वैच्छिक रूप से कुल पचपन सदस्यों का एक समूह बनाया. इन सदस्यों में कुछ शिक्षक, विद्यार्थी, शोधार्थी, संपादक, समीक्षक, सामान्य रूचि शील पाठकों के रूप में कुछ साहित्यानुरागी गृहणियाँ थी । पुस्तकालय कर्मी, प्रकाशक और प्रतिष्ठित पुस्तक विक्रेता तक शामिल थे और शेष इंटरनेट सर्फर्स थे । प्रबुद्ध साहित्यिक प्रबोध कुमार गोविल जी की इस पहल का उद्देश्य था कि हिन्दी पाठकों को हिन्दी दिवस के अवसर पर हिन्दी जगत के १०० सक्रिय श्रेष्ठ रचनाकारों से एक रेंकिंग के जरिये परिचित करवाना. २०१५ से प्रारंभ यह इरादा अब तक लगातार मूर्त रूप ले रहा है, और अब इसकी गूंज वैश्विक हो चली है.
वर्ष २०१७ की इस रैंकिंग के तीसरे वर्ष में लगातार चुने गए साहित्यकारों के विस्तृत साक्षात्कारों पर आधारित एक किताब “ हरे कक्ष में दिनभर ” प्रबोध कुमार गोविल के संपादन में प्रकाशित हुई.इंडिया नेटबुक्स प्रा लिमि नोएडा के संस्थापक श्री संजीव कुमार एक प्रयोगधर्मी साहित्यकार भी हैं, उनके सहयोग से वर्ष २०२० की राही रैंकिंग सूची में चयनित व्यंग्यकारो, कवियों, लघुकथाकारो, कहानीकारो आदि के विधावार रचना संकलन प्रकाशित किये गये. वरिष्ठ व्यंग्यकार फारूक अफरीदी एवं सुश्री कविता मुखर के संपादन में चटपटे शरारे शीर्षक से राही रेंकिंग २०२० में चयनित व्यंग्यकारों का व्यंग्य संकलन प्रकाशित हुआ है.
यह संकलन अपने आप में इस दृष्टि से अनूठा है कि इसमें सर्वश्री अरविंद तिवारी, डा गिरिराजशरण अग्रवाल, गिरीश पंकज, गोपाल चतुर्वेदी, गोविंद शर्मा, डा ज्ञान चतुर्वेदी, हरीश नवल, डा हेतु भारद्वाज, ईश मधु तलवार, लालित्य ललित, प्रभात गोस्वामी , डा नरेंद्र कोहली, प्रेम जनमेजय, रामदेव धुरंधर, डा सूर्यबाला, तेजेन्द्र शर्मा तथा विभूति नारायन राय जैसे स्वनाम धन्य सुस्थापित व्यंग्यकारो के चुटीले व्यंग्य ही नही, उन व्यंग्य लेखों पर समकालीन व्यंग्यकारो की समीक्षात्मक विस्तृत टिप्पणियां भी पुस्तक में संग्रहित हैं. इस तरह शोधार्थियों हेतु एक प्रारंभिक कार्य पहले ही कर सुलभ कर दिया गया है. विभिन्न संकलित व्यंग्य रचनाओ पर की गई टिप्पणीयों में सर्वश्री पिलकेंद्र अरोड़ा, डा उषारानी राव, डा चित्तरंजन कर, सुरेश अवस्थी, भारती पाठक, डा मंगत बादल, बुलाकी शर्मा, अजय अनुरागी, रास बिहारी गौड़, राजेंद्र मोहन शर्मा, राजेश कुमार, सवाई सिंह शेखावत, अर्चना चतुर्वेदी, सुभाष चंदर, बसंती पंवार, अनूप घई, ब्रजेश कानूनगो, हेतु भारद्वाज, डा आभा सिंह, बी एल आच्छा, सुनीता शानू, और विजी श्रीवास्तव जैसे सक्रिय पाठक व लेखक महत्वपूर्ण हैं. एक नियत समय सीमा में चयनित व्यग्यकारों से रचनायें प्राप्त कर उन पर देश भर में फैले रचनाकारों से विशद टिप्पणियां बुलवाकर उन्हें संपादित कर किताब का स्वरूप देना श्रमसाध्य साहित्यिक कार्य है, जिसे संपादक द्वय ने पूरी जिम्मेदारी से कर दिखाया है. श्री फारूक अफरीदी जी का विस्तृत संपादकीय स्वयं में व्यंग्य की वर्तमान स्तिथियों का पूरा लेखा जोखा है. कविता जी ने अपने संपादकीय में संकलित रचनाओ पर गंभीर टिप्पणियां की हैं. कुल मिलाकर चटपटे शरारे वर्ष २०२० के व्यंग्य परिदृश्य का शोध दस्तावेज निरूपित किया जा सकता है.
यह जानकारी देना प्रासंगिक होगा कि वर्ष २०२१ के चयनित व्यंग्यकारों के व्यंग्य संकलन पर मेरे तथा श्री अरुण अर्नव खरे के संपादन में कार्य चल रहा है. जल्दी ही यह संकलन भी प्रकाशित होगा, इससे पहले मैं पाठकों को चटपटे शरारे खरीद कर पढ़ने की सलाह दूंगा.
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – चिरंजीव
महाराष्ट्र और कुछ अन्य राज्यों में वटसावित्री आज पूर्णिमा को मनाई जाती है। आज वटवृक्ष का पूजन होता है। इस संदर्भ में कोरोनाकाल में जन्मी यह कविता देखिए-
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(साहित्यकार श्रीमति योगिता चौरसिया जी की रचनाएँ प्रतिष्ठित समाचार पत्रों/पत्र पत्रिकाओं में विभिन्न विधाओं में सतत प्रकाशित। कई साझा संकलनों में रचनाएँ प्रकाशित। राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय मंच / संस्थाओं से 150 से अधिक पुरस्कारों / सम्मानों से सम्मानित। साहित्य के साथ ही समाजसेवा में भी सेवारत। हम समय समय पर आपकी रचनाएँ अपने प्रबुद्ध पाठकों से साझा करते रहेंगे।)
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख – “पहचान”।)
☆ आलेख ☆ पहचान ☆ श्री राकेश कुमार ☆
आज प्रातः काल में मोबाईल दर्शन से ज्ञात हुआ कि श्री के के का रात्रि निधन हो गया। मैसेज भेजने वाले को हमने अपनी अनिभिज्ञता जाहिर की और कहा हमारा संगीत में ध्यान नहीं हैं। कुछ समय के पश्चात सभी टी वी चैनल वाले उनके गीत सुना रहे थे। गीत प्रायः सभी सुने हुए थे, और जुबां पर भी थे। देश के सभी बड़े नेताओं ने संवेदनाएं व्यक्त की। चैनल वाले भी उन से संबंधित जानकारी देते रहे।
हमने मन ही मन विचार किया इनका नाम और चेहरा कभी नही सुना/देखा। अंतर्मन में अपनी आयोग्यता को लेकर नए आयाम तय करने में लगे रहे।
उनको पहचान न पाने के कारण खोज में लगे हुए थे। तभी विचार किया- क्या स्वर्गीय के के ने किसी भी विज्ञापन में कार्य किया था?
क्या किसी रियलिटी शो में प्रतियोगी या जज के रूप में टी वी पर आए थे?
क्या उनके साथ कभी कोई विवाद हुआ था?
यदि इन सब का उत्तर ना है, तो फिर हम उनको कैसे पहचानते?
वर्तमान समय में अकेले काम से आपकी पहचान नहीं बनती हैं। आपको सोशल मीडिया में कार्यशील रहना होता हैं। बिग बॉस या अन्य किसी टीवी शो में छोटे स्क्रीन पर नजर आना होगा। किसी विवाद में आपका नाम है, तो लोग आपको चेहरे से पहचानने लग जाएंगे।
ये सब केके के साथ नहीं था। वो सिर्फ आवाज़ के जादूगर थे। इसलिए वो एक अच्छे इंसान बनकर ही रह गए। पुरानी कहावत भी है “जो दिखता है, वो ही बिकता है।
(ई-अभिव्यक्ति में युवा साहित्यकार श्री केशव राजेंद्र प्रसाद शुक्ल जी का हार्दिक स्वागत है। आप लखनऊमें पले बढ़े और अब पुणे में सॉफ्टवेयर इंजीनियर हैं। आपको बचपन से ही हिंदी और अंग्रेजी कविताएं लिखने का शौक है। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता लोग।)