मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 6 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 6 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ऋतू पावसाचा म्हणजे सृजनाचा, नवनिर्मितीचा!  ग्रीष्मातील मरगळलेल्या वातावरणातून बाहेर पडून पावसाच्या धारा बरसू लागल्या की निसर्गसंगीत कानावर पडू लागतं आणि पुन्हा आलेला हा पाऊस मन ओलचिंब करून टाकतो. याच दरम्यान शाळा सुरू होतात. नव्या वर्षाच्या स्वागताला , नवी पुस्तके, वह्या, दप्तरे सजून बसलेली असतात. बघता बघता पाऊस कोसळणं, मग त्यानं थोडी विश्रांती घेणं, मग पुन्हा बरसणं, हे सगळं कसं ठरल्याप्रमाणे  चालू असतं.

मे च्या अखेर पर्यंत एक दोन पाऊस झाले असले तरी मान्सूनचे वेध लागतात ते जूनच्या पहिल्या आठवड्यातच. जूनच्या म्हणजेच थोड्याफार फरकाने ज्येष्ठाच्या सुरूवातीला आकाशातील पांढरेशुभ्र ढग केव्हा निघून जातील आणि गडद निळे, सावळे मेघ केव्हा अवतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. नक्षत्रांच्या हिशेबाने आणि हवामान खात्याच्या अंदाजाने, पावसाच्याआगमनाचा मुहूर्त काढला  जातो. पण ब-याच वेळा तो पावसासारखाच बेभरवशाचा ठरतो.  

त्याच वेळेला आणखी एक गोष्ट अपरिहार्यपणे घडत असते. ती म्हणजे वर्षा सहलीची चर्चा. सुट्टीची संधी साधून किंवा मुद्दाम रजा काढून , ‘कुठतरी’  जाऊन यायचं हे तर ठरलेलंच. पण हे कुठतरी म्हणजे नक्की कुठं. ?आता पंचतारांकित

हाॅटेलांना  आणि शहरांना भेट द्यावी अशी कोणाचीही इच्छा नसते. इच्छा असते ती निसर्गरम्य वातावरणात मनसोक्त हिंडण्याची. निळ्याशार आकाशाखाली पसरलेल्या हिरव्यागार पसा-यात हरवून जाण्याची. कोसळणा-या धबधब्याखाली भिजण्याची.

अशा ओल्याचिंब महिन्यात आणखीही काही गोष्टी महत्वाच्या ठरतात. याच ज्येष्ठ किंवा जून महिन्यात महाराणा प्रताप आणि राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते. तर, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथि असते. थोर समाजसुधारक आगरकर, पू. साने गुरुजी यांचे स्मृतीदिन आणि संत निवृत्तीनाथ व टेंबेस्वामी यांची अवतारसमाप्तीही याच महिन्यातील. शिवाय छ. शिवरायांचा राज्याभिषेक याच महिन्यात संपन्न झाला.

वटपौर्णिमेचे पारंपारिक व्रत आणि  त्यानिमीत्ताने वृक्षांचे महत्व समजून घेण्याचा आधुनिक दृष्टिकोन , वृक्षपूजनाच्या दिवशी याच महिन्यातील पौर्णिमेला सांगितला जातो. महाराष्ट्राच्या काही भागात बेंदूर म्हणजेच पोळा साजरा केला जातो. त्याला कर्नाटकी बेंदूर असेही म्हणतात. याच ज्येष्ठात पुढच्या महिन्यातीतल आषाढी एकादशीचे वेध लागलेले असतात. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलेले असते. अवघा पालखी मार्ग विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जातो.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाचे दिवस या जून महिन्यातही असतात. एक जून हा दिवस आंतरराष्ट्रीय पालक दिन म्हणून साजरा केला जातो . पालकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1994पासून युनोने हा उपक्रम  सुरू केला.

तीन जून हा दिवस 2018 पासून आंतरराष्ट्रीय सायकल दिन म्हणून घोषित झाला आहे. व्यायामाचे महत्व पटवून देतानाच प्रदूषण टाळण्यासाठी जागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. पर्यावरण रक्षण, संवर्धन याचे महत्व पटवून देण्यासाठी 1973पासून पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. सात जून हा दिवस जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून घोषित झाला आहे. प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षित राहीले पाहीजे. सुरक्षित अन्न म्हणजेच उत्तम आरोग्य. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच या संघटनेने दहा जून हा दिवस नेत्रदान दिन म्हणून जाहीर केला आहे. दृष्टीदोष व अंधत्व याविषयी जागृती करून दृष्टीहिनांना दृष्टी प्राप्त करून देणे यासाठी हा दिवस साजरा होतो.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2002पासून बारा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकामगार निषेध दिन म्हणून पाळण्यास सुरवात केली आहे. चौदा वर्षांखालील कामगार मुलामुलींना  बालकामगार म्हटले जाते. त्यांचे शोषण थांबवून ही प्रथा बंद व्हावी यासाठी लक्ष वेधून घेणे महत्वाचे आहे.

मातेप्रमाणेच आपल्या आयुष्यात पित्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृदिन साजरा होतो. भारतीय संस्कृतीत आपण माता पिता देवासमान वंदनीय मानतोच. पण पित्याविषयीची ही भावना सार्वत्रिकपणे व्यक्त करण्याची पद्धत प्रथम अमेरिकेत 1910पासून सुरू झाली. जून महिन्यातील तिसरा रविवार हा पितृदिन असतो.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविधतेने नटलेला असा हा जून (ज्येष्ठ)महिना. सृजनाशक्तीचा आविष्कार घडवणारा, पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देणारा.

‘नेमेची येतो मग पावसाळा ‘ हे खरे आहेच. पण तो खर्या अर्थाने समृद्धी घेऊन येऊ दे एवढीच सदिच्छा !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पिकलं पान – भाग – 2… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

?  जीवनरंग ?

☆ पिकलं पान – भाग – 2… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

( इथे मात्र कित्येकदा सारी नातीगोती असूनही केवळ ‘ घरात नको ‘ म्हणून हकालपट्टी झालेली असते, ते बघून जीव दुखतो.) इथून पुढे —-

 “असं बघ बेटा, आजकाल अगदी लहान मुलांपासून सगळ्यांचे नाही का, निरनिराळे क्लब निघालेत? ते तुमचे रोटरी, जेसीज, लेडिज क्लब, शिवाय फुलापानांसाठीचे गार्डन क्लब, सगळे नावाजलेले आहेत. तसंच एखादं गोंडस नाव द्यावं अशा वृद्धाश्रमांना गं !”

” खरंय आई तुझं ! किती छान विचार मांडते आहेस तू आज !” मी म्हणाले.

” अगं कसलं काय, सहज मनात आलं एवढंच! खरं तर ‘ ओल्ड इज गोल्ड ‘ ही म्हण आम्हा वृद्धांसाठी किती सार्थ आहे बघ नं ! ओल्डचा अर्थ वयस्क , वृद्ध असा घ्यायचा आणि गोल्डचा अर्थ सोनं असा न घेता, सोन्यासारखा पिवळा असा घ्यायचा. मग याच न्यायानं जर वृद्धाश्रमाला ‘ गोल्डन क्लब ‘ असं नाव दिलं तर कानांनाही ऐकायला किती चांगलं वाटेल? सर्व वृद्धांचा अर्थात पिवळ्या पानांचा तो ‘ गोल्डन क्लब ‘ हो नं? ” 

आईच्या विचारांचं मला सकौतुक आश्चर्य वाटत होतं. इतके दिवस वाटायचं, इतर सर्वांच्या आईसारखीच आपली पण आई आहे. प्रेमळ, शांत, कामसू, हसतमुखानं सारं सहन करणारी! पण आज मात्र तिच्या विचारांनी मी अगदी भारावून गेले होते. आईचा सुरकुतलेला हात कुरवाळत मी म्हणाले…..

” हे मात्र खरंय हं आई! वृद्धाश्रमाला ‘गोल्डन क्लब’ म्हणण्याची तुझी कल्पना आणि त्या मागची भावना एकदम झकास आहे बरं का! पण घरातल्या वृद्धांची काय किंवा पिकल्या पानांची काय, गरजच नसते असं मात्र अजिबात नाहीये हं! बाळंतपणात नाही का, विड्याच्या पिकल्या पानांना, औषधी गुणांच्या दृष्टीनं किती महत्त्व आहे? आणि केवड्याच्या कणसाची पिवळी धम्म पानं किती छान सुगंध पसरवत चक्क गणपतीच्या मस्तकावर विराजमान होतात? आई, तसंच घरातही आहे गं ! कित्येक महत्त्वाच्या गोष्टीत घरातील वृद्धांचा सल्ला अतिशय गरजेचा असतो बघ. कडू गोड अशा अनेक अनुभवांनी माणूस वृद्धत्वाला पोहोचतो अन् हेच अनुभव दुसऱ्या पिढीला ठेचा लागू नयेत, म्हणून कामात येतात, हो नं? त्याहीपेक्षा कुणीतरी आपल्यापेक्षा मोठं घरात आहे, या कल्पनेनीच इतरांना आपलं लहानपण जपता येतं. नमस्कारासाठी वाकायला, आशिर्वादाचा हात डोक्यावर ठेवायला, लहानाचं कौतुक करायला घरातले वृद्ध घरातच असायला हवेत नं आई? नाही ते विचार तू डोक्यात नको हं घेऊस !”

आईच्या हातावरील एक एक सुरकुती, बोटांनी मिटवून बघण्याचा वेडा चाळा करत मी आईची समजूत घालून बघितली. तिचं कितपत समाधान झालं, कुणास ठाऊक! पण तिचा मूड मात्र ठीकठाक झाला.

डिंकाच्या आणि मेथीच्या लाडवांचा डबा माझ्या हातात ठेवत, तिनं म्हटलं, ” सध्या थंडी भरपूर आहे, पंधरा दिवसात संपवून टाका बरं का गं!”

मी ही तिच्या समोरच एक लाडू खायला घेत म्हटलं, ” आई, जेव्हापासून तुझ्या हातचे हे लाडू खातेय, तेव्हापासून त्याची चव अगदी सारखीच कशी गं?”

” अगं साऱ्या मेव्यासोबत, आईची तीच माया पण त्यात असते नं, मग चव कशी बदलणार बाळा?”

आम्ही दोघीही मनापासून हसलो. नाश्ता, चहा घेताना मग वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. आईचा मूड चांगला झाला याचंच मला मनापासून समाधान वाटलं.आई घरी जायला निघाली. कुंडीतल्या झाडांना तिच्या सुरकुतल्या हातांनी हलकेच गोंजारलं, अगदी मला गोंजारावं तसं ! झाडांची कापून टाकलेली पिवळी पानं हळूवारपणे ओंजळीत धरून, क्षणभर कपाळावर टेकवली आणि सोबतच्या पिशवीत घालत म्हणाली, 

” घरी गेल्यावर यांना विहिरीत शिरवून टाकेन “—डोळे तुडुंबले होते तिचे.

मी ऑटोरिक्षापर्यंत आईच्या सोबत निघाले. आईने नेहमी सारखाच निरोप घेतला—

” ये बरं का गं घरी ! मुलांना घेऊन निवांतपणे ये रहायला. आणि हो, ‘गोल्डन क्लबचा’ विचार असू दे बरं का मनात !”

एवढं म्हणेस्तोवर रिक्षा निघाली. निरोपाचा हात हलवत, रिक्षा नजरेआड होईपर्यंत मी बघत राहिले. ऑटो दूर दूर जात होती. परत येताना मी आईच्या बोलण्यावागण्याचाच विचार करत होते. 

चार दिवसांनी आई एकाएकीच गेली. झाडाची पिवळी पानं गळून पडावीत, तितकी सहज !

आता मात्र मी सतत विचार करते, ” हिरव्यागार झाडांची शान पिवळ्या पानांमुळे नाहीशी नाही होत, उलट भरल्या घरात वयोवृद्ध व्यक्ती, नमस्कार करायला वाकल्यावर आशीर्वाद द्यायला असाव्यात, तशी ही पिवळी पानं मला वाटायला लागली आहेत.”

–तेव्हापासून झाडांवरची पिवळी पानं छाटणं मी पार सोडून दिलंय आणि आईचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ‘ गोल्डन क्लब’ चा विचार मात्र मनात पक्का केलाय !

— समाप्त —

लेखिका : मीनाक्षी मोहरील

प्रस्तुती : अस्मिता इनामदार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मधमाशा : शत्रू की मित्र ?– लेखक – श्री विक्रांत भिसे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ मधमाशा : शत्रू की मित्र ?– लेखक – श्री विक्रांत भिसे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

एकदा आमच्या स्टुडिओत दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना. त्यांनी पोळं बनवायलाही सुरुवात केलेली.. सुरुवातीला अगदी २०-२५ माश्याच आहेत पाहून आम्ही थोडासा धूर केला आणि त्यांना हाकलवून लावलं. दोन दिवसांनी अचानक पुन्हा त्यांचा वावर सुरु झाला. आम्ही बेचेन झालो. यावेळेस त्या हॉलच्या खिडकीतून स्टुडिओच्या दिशेनं जात होत्या. .. आम्ही पुन्हा धूर केला आणि त्यांचा माग घेतला . ती मधमाश्यांची लाख दीडलाखांची फौज स्टुडिओबाहेर २ फुटांचं  पोळं बांधण्याचं काम शांतपणे करत होती . आम्हाला धस्स झालं–आता  काय? घाबरून/ वैतागून, आता त्यांची विल्हेवाट लावायची म्हणून पेस्ट कंट्रोलवाल्याना फोन केला. त्यांनी २००० रुपये सांगितले, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येतो असे सांगून फोन ठेवून दिला.

हे सगळं करत असताना मनात आलं की त्यांना आपण वाचवू शकतो का आणि कसे ? म्हणजे कोणी संवर्धन करणारे असेल का?

माझा माश्यांवर रिसर्च चालूच होता ज्यात त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी लिहिल्या होत्या. जगाच्या पाठीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर माणूस जेमतेम ४ वर्षेच जगू शकेल असे आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे. हे वाचून आम्ही खाडकन जागे झालो आणि चार दिवसापूर्वीचा  किस्सा आठवला.

आम्ही आमचा मित्र अभिनव काफरेकडे गेलो असता त्यांच्या सोसायटीमध्ये असंच कोणीतरी पेस्ट कंट्रोल करून लाखभर माश्या मारून टाकल्या होत्या. इथे भरदिवसा माणसं मारली जातायत, माशांचं काय. लाखो जीव तडफडत मरत होते. आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. मेलेल्या  लाखो माश्यांचा खच पडलेला पाहून अतिशय वाईट वाटले. बहुतेक तो प्रसंग आठवून आम्हाला त्यांचं  संवर्धन करण्याचं डोक्यात आलं असणार.

माझा रिसर्च सुरु असताना मला “ बी किपर “अमित गोडसे, हा आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून पूर्णवेळ मधमाश्या संवर्धनाच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला तरुण समोर आला. मध काढण्याची, मधमाश्यांना पळवून लावण्यापेक्षा कमी संहारक आणि अधिक शाश्वत पद्धती असू शकते अशी त्याची खात्री होती. त्याच अनुषंगाने त्याने पुण्यातील मधमाशी पालन आणि संवर्धन केंद्र, तसेच खादी ग्रामोद्योगतर्फे महाबळेश्वर येथे चालवल्या जाणाऱ्या केंद्रात रीतसर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुण्यात मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.

त्याला फोन केला. शांतपणे त्याने आवश्यक माहिती जाणून घेतली. यासाठी ४०००/- रुपये घेईन असे सांगितले. जीव घेण्याचे २०००/- आणि जीव वाचवण्याचे ४०००/-???– पण आताशा जगात जीव वाचवण्यापेक्षा जीव घेणं जास्त स्वस्त झालंय. तसं हे कामसुद्धा जोखमीचं होतं. त्यात तो पुण्याहून मुंबईला येणार होता. शेवटी त्यानेच पैसे कमी केले– ३०००/- रुपये सांगितले आणि उद्या १२ वाजेपर्यंत येतो म्हणाला.  त्याला पैशांपेक्षा माशांचा जीव महत्वाचा वाटला असणार, नक्कीच ! पैसे गेले तरी चालतील पण आपण त्यांना वाचवायचं, असा आम्हीही निर्णय घेतला. तो सांगितल्याप्रमाणे बरोबर १२ वाजता स्टुडिओवर आला. आमची थोडी चर्चा झाली. त्याच्या विलक्षण कामाबद्दल जाणून घ्यायला आम्ही दोघेही उत्सुक होतो.

अंगावर कोणत्याही प्रकारचं आवरण न घालता फक्त चेहऱ्यावर मास्क आणि टोपी घालून तो बाल्कनीत उतरला. पहिल्यांदा त्याने केवळ धुराच्या साहाय्याने त्यांना दूर करत, हलक्या हाताने त्यांना गोंजारत तो थेट पोळ्यापर्यंत पोहचला. नुकतंच बनत असलेलं पोळं त्याने करवतीने कापलं. नंतर त्या जागेवर जेल लावून त्याने ती जागा काही महिन्यांसाठी सुरक्षित केली. आता तिथे पुन्हा माश्या येणार नाहीत, १० किलोमीटरच्याबाहेर त्या नवीन जागा शोधतील आणि तिथे पोळं बांधायला सुरुवात करतील असं आम्हाला सांगितलं . हे सगळं तो एवढ्या साध्यासोप्या पद्धतीने हाताळत होता की आम्ही त्याच्याबरोबर तिथेच असूनही एकही माशी आम्हाला चावली नाही. त्यांनाही  कोणत्याही प्रकारचा धक्का बसला नाही आणि लाख दीड लाख माश्यांचे जीव वाचले. मधमाशांबद्दलची एवढी भीती आपल्या मनात लहानपणापासून बिंबवलेली असते की त्यांना पाहून पहिल्यांदा त्यांना मारण्याचाच  विचार आपल्या डोक्यात येतो. पण त्यांना वाचवण्याचं हे काम इतकं शांतपणे होत असलेलं पाहून मी त्याला विचारलं,

” त्यांनी आपल्यावर हल्ला का नाही केला? कारण बहुतांशवेळा आपण त्यांच्या कामात अडथळा आणला तर ते आपल्यावर हल्ला करतात हे पाहून आणि वाचून माहित होतं “. तो म्हणाला… “ आपण त्यांना त्रास द्यायच्या उद्देशाने काही करत नव्हतो आणि हे त्यांना कळतं . दुसरं म्हणजे आपण त्यांना अलगद  /शास्त्रोक्त पद्धतीने हाताळलं– हेच जर आपण त्यांच्यावर जबरदस्ती किंवा वार केला असता तर त्यांनी आपल्याला फोडून काढलं असतं एवढं नक्की !” हे सार इतकं विलक्षण होतं की आम्ही भारावून गेलो.

जीव घेणं जरी स्वस्त असलं तरी जीवनदान देण्याचा सुखद अनुभव त्या पैशांपेक्षा मोलाचा वाटला. आपल्याबरोबर निसर्ग वेगवेगळे प्रसंग घडवून आणतो. पण आपण त्याला  कसा प्रतिसाद देतो, त्याचा स्वीकार करतो की प्रतिकार, हे आपल्या हातात असतं .

हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की अमित गोडसे नावाच्या या अवलियाला आणि त्याच्या मधमाश्यासंवर्धनाच्या कामाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून, अशा लाखो/ करोडो मधमाश्यांचे प्राण वाचावे, संवर्धन व्हावे  व असे अमित गोडसे प्रत्येक शहरात लाखोंच्या संख्येत तयार व्हावेत.

मित यांचे हे काम जास्तीत जास्त शेअर करा आणि मधमाश्यांचं संवर्धन करा.

त्यांना संपर्क करण्यासाठी — Whatsapp – 8308300008 https://www.beebasket.in

लेखक : श्री विक्रांत भिसे 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंकारची शेळी— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ ओंकारची शेळी— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

सुशीला माझी  पेशंट. सारखे येऊन येऊन ह्या बायका माझ्या मैत्रिणी पण झाल्या. मी त्यांना घरचीच एक वाटत असे.

त्यांच्या घरच्या छोट्या मोठ्या समारंभाला मला आवर्जून बोलावत असत. मग लग्नाच्या बांगड्या भरणे असो किंवा हळदीकुंकू असो. मीही त्यांच्या कडे जाणे कधीही टाळले नाही.

सुशीला  फार नीट नेटका संसार करणारी होती. नशिबाने नवऱ्याची साथ चांगली मिळाली होती तिला. गरीबीत का होईना अगदी छान टुकीत संसार चालला होता सुशिलाचा.

सुशिलाचा मुलगा ओंकार गुणी मुलगा होता. शाळेत नेहमी चांगले असत मार्क. एकच मुलगा होता सुशिलाचा पण भलते लाड करुन बिघडवून नाही ठेवला तिने. एक दिवस म्हणाली “ डॉक्टरबाई ओंकार म्हणतोय आपण गाय किंवा म्हैस पाळूया. आहे की जागा आपल्या घरासमोर. मी सगळे करीन त्याचे. मला लै हौस आहे. अहो पण चेष्टा का आहे गाय विकत घेणे– कुठून आणू मी ते हजारो रुपये ? पुन्हा त्याचे वैरण चारा—अशक्य गोष्ट आहे बघा . हा कसला हट्ट . पुन्हा गोठा बांधा– तो एक खर्च होईलच. रोज रोज चाललंय बघा.  कुठून घेतलंय खूळ डोक्यात देव जाणे. 

जनावर पाळणे चेष्टा नाही हो . घरचा सदस्यच असतो तो. ती धार कोण काढणार, दूध कोण विकणार —याला काही समजत नाही . पोराटकी नुसती. “ 

सुशीला खरोखरच वैतागली होती. तिचे अगदी बरोबर होते. आधीच लोकांची कामे करून पिचून निघत होती,

त्यात हा व्याप कोण घेणार अंगावर.  मीही विचारात पडले. एकीकडे कौतुक पण वाटले ओंकारचे. 

आमची मुले या वयात आणखी चांगला मोबाईल हवा– नवे गेम्स हवेत म्हणून हट्ट करतात . पण हा मुलगा गाय म्हैस पाळू म्हणतोय— मलाही हा प्रश्न कसा सोडवावा समजेना. अर्थात हा प्रश्न माझा नव्हता. 

पण आमचे घरातले लोक म्हणतातच –` आपल्या बाईंना सवयच आहे लोकांचे प्रॉब्लेम आपलेच समजून डोके शिणवून घ्यायची.` 

पण मी हे सगळे विसरूनही गेले . आणि माझ्या हजार व्यापात बुडूनही गेले. मुलीच्या परीक्षा, ऍडमिशन्स , 

हॉस्पिटलचे व्याप— एक का व्याप होता मागे माझ्या.

मग एक दिवशी सुशीला परत दवाखान्यात भेटायला आली . म्हणाली “ बाई, दवाखाना झाला की याल का घरी ?ओंकार बोलावतोय तुम्हाला. “

बाहेर ओंकार उभा होता. संकोचाने म्हणाला , “ ताई या ना, गम्मत आहे एक.” 

दवाखाना बंद केल्यावर मी उत्सुकतेने गेले सुशीलाच्या घरी. मोठे टापटिपीचे घर. स्वच्छ ठेवलेला ओटा, 3 खोल्या  अगदी  छान ठेवलेल्या– मला छानसे सरबत दिले, लाडू दिला.

“ अरे ओंकार,ती गम्मत दाखवणार आहेस नं मला ? 

“ बाई, चला मागे अंगणात.” 

मला त्याने अंगणात नेले. तिथे एक पांढरी शुभ्र शेळी बांधलेली. आणि तिची सशासारखी दोन करडे.

मला इतकी मजा वाटली—

सुशीला म्हणाली, “ बाई,गाय म्हैसवरून शेवटी शेळीवर झाली बघा तडजोड. आमच्या पलीकडच्या चाळीत शेळी व्यायली. तिला दोन पिल्ले झाली. मैत्रीण म्हणाली, ` ही  शेळी जा घेऊन तुझ्या ओंकारला. फार हट्ट करतोय ना. 

बघ, सोपी असते  ग शेळी पाळायला. वर दूध देईल, तिची पिल्ले विकता येतील ते वेगळेच उत्पन्न. बघ बाई हवी का.

एक नर आहे, एक मादी. मादी ने ओंकारसाठी – मावशीकडून भेट.

याचे पैसे नको देऊस मला.

घरी येऊन ओंकारला विचारले, तर तो लगेच गेला बघायला . ही शेळी इतकी आवडली त्याला. बारके पिल्ल्लूच की होते हो ते. मी म्हटले, “ ओंकार,हिची सगळी काळजी तू घ्यायची .तरच हो म्हण. आम्ही कोणीही हिचे काहीही करणार नाही बघ. पुन्हा अभ्यासात मागे पडलास तर देऊन टाकणार मी लगेच मावशीला. चालेल का ”

“ ओंकारने त्या पिल्लाला पोटाशी धरले आणि घेऊनच आला बघा. काय लागतंय हो शेळी सांभाळायला. बिचारी काही पण खाती. अहो, वर्षभरात केवढी मोठी झाली सुद्धा. ओंकार टेकडीवर  तिला चरायला सोडतो आणि स्वतः अभ्यास करत बसतो. आता बघा,हिला दोन पिल्ले पण झाली . आहे का नाही आक्रीत ? “ 

सुशीला हसायला लागली. “ हा आणि उद्योग केव्हा केला म्हणायचा.”–आम्ही सगळेच हसलो.

ओंकार म्हणाला, “ दोन्ही पण बोकडच झाले. आता मी ते विकून टाकीन. मस्त किंमत येते बोकडांना. “

ओंकारची आजी पण बाहेर आली . म्हणाली, “ अहो, माझा पण मस्त वेळ जातो या यमनी पायी. यमनी नाव आमच्या शेळीबाईचे. गुणी हो बिचारी. अहो रोज अर्धा लिटर दूध पण देती सकाळ संध्याकाळ. आम्हाला आता बाहेरून दूध नाही घ्यावे लागत. पुन्हा उरलेला भाजीपाला असं काहीही खाते बिचारी. मस्त केले ओंकारने शेळी आणली. बाई, वाईच चहा घेता का शेळीच्या दुधाचा.” 

“ नको,नको,,” मी घाईघाईने म्हटले. मला काही शेळीच्या दुधाचा चहा प्यायचे धैर्य झाले नाही. सगळे हसायला लागले.

ओंकार म्हणाला, “ माझे सगळे मित्र रोज येतात यमनीशी खेळायला. आणि हे दोन बोकड आहेत ना – चंगू मंगू मी दिसलो की उड्या मारतात, खूप खेळतात. आमच्या गुरुजींनी आमचा सगळा वर्ग आणला होता, माझी यमनी आणि पिल्ले दाखवायला. म्हणाले की आपण ओंकारचे कौतुक करू या. किती छान सांभाळ करतोय तो या मुक्या जनावरांचा. “ 

सुशीला म्हणाली, “ अहो बाई आमच्या पलीकडे दोन जुळी मुले झाली . अगदी बारकी बघा वजनाने. जगतात का मरतात अशी स्थिती. डॉक्टर म्हणाले,यांना फक्त शेळीचे दूध पचेल , बाकी कोणतेच नाही. आमच्या ओंकारने, रोज न चुकता दोन महिने स्वतः दूध पोचवले त्यांच्या घरी. आणि ती दोन्ही मुले अगदी छान गुटगुटीत झाली बघा. त्या आईवडिलांनी तर आमचे पायच धरले बघा. “ 

“ माझा शाळेत, 15 ऑगस्टला सत्कार केला,आणि छोटेसे बक्षीस पण दिले हेड सरांनी.” ओंकार अभिमानाने सांगत होता. मलाही अतिशय कौतुक वाटले या सगळ्यांचेच.

सुशीला मला पोचवायला बाहेर आली. म्हणाली, “ बाई आमच्यात एक म्हण आहे—मोठी, खूप खाणारी, जास्त  दूध देणारी, मोठ्या पोटाची म्हैस पाळण्यापेक्षा छोट्या पोटाची म्हैस पाळावी। बेताचे खाणारी,  परवडेल अशी बेतशीर. तिचा खर्चही कमी, देखभाल पण कमीच.” 

किती खरे बोलली सुशीला —-

ही छोटी माणसे आपल्याला जगण्याचे केवढे मोठे तत्वज्ञान अगदी सहज सांगून जातात ना. —-

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माडाचे मनोगत… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  माडाचे मनोगत…  ?  श्री प्रमोद जोशी ☆

(देवगडचे कवी श्री प्रमोद जोशी यांच्या बागेत ५०.. ६० वर्षे वयाचा माड आहे. त्या माडावर सुतार पक्षांनी १-२ नाही, तर १७-१८ भोके पाडली आहेत. तरीही अजून माड   नारळ देतोच आहे— त्या माडाचा फोटो आणि जोशींनी त्या माडावर स्वतः केलेली “ माडाचे मनोगत “ ही कविता — (हा फोटो कृपया मोठा करून पहावा). 

कणा पोखरला तरी,

अजूनही आहे ताठ!

जगण्याची जिद्द मोठी,

जरी मरणाशी गाठ!

माझ्या कण्याकण्यामधे,

किती रहातात पक्षी!

जणू बासरी वाटावी,

अशी काढलेली नक्षी!

त्यांच्या टोचायच्या चोचा,

मला पाडताना भोक!

त्यांची पहायचा कला,

माझा आवरून शोक!

वारा येतो तेव्हा वाटे,

त्यांचे कोसळेल घर!

सरावाचा झाला आहे,

त्यांच्या टोचण्याचा स्वर!

जाता गाठाया आकाश,

नाही जमीन सोडली!

पूल करून देहाचा,

माती-आकाश जोडली!

वय जाणवते आता,

माझा नाही भरवसा!

जगण्याच्या कौलातून,

मरणाचा कवडसा!

घरं सोडा सांगताना,

करकरतो मी मऊ!

पाखरानो शोधा आता,

माझा तरूणसा भाऊ!

सावळांचा भारी भार,

आता मला पेलवेना!

तरी निरोपाचा शब्द,

काही केल्या बोलवेना!

पंख फुटलेले नाही,

नाही डोळे उघडले!

अशा पिल्लासाठी माझे,

प्राण देहात अडले!

जन्म माहेरीचा सरे,

आता चाललो सासरी!

भोकं म्हणू नका देहा,

मी त्या कान्ह्याची बासरी!

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ इतनी सी बात ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ कथा कहानी ☆ “इतनी सी बात”  ☆ श्री कमलेश भारतीय ☆ 

मैं धर्म संकट में फंस गया था।

क्या करूं, क्या न करूं ?

सौ सौ के नोट लूट के माल की तरह कुछ सोफे पर तो कुछ कालीन पर बिना बुलाये मेहमान की तरह बेकद्रे से पड़े हुए थे। इन्हें मेरे गांव का एक किसान यहां फेंक गया था। मेरे लाख मना करने के बावजूद वह नहीं माना था और जैसे उसकी खुशी कमरे में बरस गयी थी, नोटों के रूप में। वह नोटों की बरखा मेरे लिए नहीं, बल्कि उस अधिकारी के लिए थी जिसने मेरे कहने पर उस किसान का बरसों से अटका हुआ काम कर दिया था। उस अधिकारी से मेरी अच्छी जान पहचान थी। इसकी खबर मेरे गांव के किसान को जाने कहां से लग गयी थी और उसने मेरे यहां धरना दे दिया था कि मेरा काम करवाओ और यह आग्रह करना पड़ा कि इस गरीब की सुनवाई की जाये।

मैं समझता था कि मेरा काम खत्म हो गया पर, यह उस काम काज का एक हिस्सा मात्र या कहिए पार्ट वन था। अब इन फेंके गये नोटों का क्या करूं? मेरी कुछ समझ में नहीं आ रहा था। अधिकारी से मेरी अच्छी जान पहचान थी और उसने मेरे कहे का मान रख लिया था उसके बदले में नोट दिखाने की मेरी हिम्मत नहीं पड़ रही थी। किसी के अहसान को नोटों में बदल देने की कला में मैं एकदम कोरा था। मैं किस मुंह से जाओ, ऐसी बात कहूंगा ? वे क्या रुख अपनायेंगे? सारी पहचान एक तरफ फेंक, बेरुखी से कहीं घर से बाहर न कर दें ? पर  किसी के नाम की रकम को मैं अपने पास कैसे रख सकता था ? मुझे क्या हक था उन नोटों को अपनी जेब में रखने का? किसी अपराधी की तरह मैं मन ही मन अपने आपको कोस रहा था। क्रोध नहीं नोट उसे उठा ले जाने को कह दिया ? नहीं कह सके तो अब भुगतो।

सामने पड़े नोट नोट न लग कर मुझे भारी पत्थर लग रहे थे। मैंने भारी मन से नोटों को समेटा और अधिकारी के घर पहुंच गया। खुशी खुशी उन्होंने मेरा स्वागत् किया। पर मैं शर्म से नहा रहा था। अपने आप में सिमटा, सकुचाता जा रहा था। पल प्रतिपल यही गूंज रहा था कि कैसे कहूं ? किस मुंह से कहूं ? क्या सोचेंगे मेरे बारे में ?

शायद मेरी हड़बड़ाहट को अनुभवी अधिकारी की पैनी निगाहों ने भांप लिया था। और कारण पूछ ही लिया। मुझसे संभाला न जा रहा था नोटों का भार। और सारा किस्सा बयान कर कहा कि वह किसान ये नोट आपके लिए मेरे घर फेंक गया है। मैं समझ नहीं पा रहा कि इनका क्या करूं ? आपसे कैसे कहूं ?

अधिकारी ने जोरदार ठहाका लगाया और मेरे कंधे को थपथपाते हुए कहा – बस। इतनी सी बात ? और इतना बड़ा बोझ ? न मेरे भाई। फिक्र मत करो। जैसे वह किसान आपके यहां ये नोट फेंक गया है वैसे ही आप भी मेरे यहां फेंक दो। बस।

मैं कभी नोटों को और कभी अधिकारी को देख रहा था। नोट निकालने पर भी बोझ ज्यों का त्यों बना रहा। बना हुआ है आज तक।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#138 ☆ तन्मय दोहे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का  चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण एवं विचारणीय “तन्मय दोहे… ”)

☆  तन्मय साहित्य # 138 ☆

☆ तन्मय दोहे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

लगा रहे हैं कहकहे, कर के वे दातौन।

दंतहीन बापू खड़े, सकुचाहट में मौन।।

 

मोहपाश में है घिरा , अर्जुन सा जनतंत्र।

कौरव दल के  बढ़ रहे, मायावी षडयंत्र।।

 

बदल रही हैं बोलियां, बदल रहे हैं ढंग।

बौराये से सब लगें, ज्यों  खाएँ हो भंग।।

 

ठहर गई है  जिंदगी, नहीं  पक्ष में वोट।

रुके पाँव उम्मीद के, अपनों से ही चोट।।

 

भूल  गए  सरकार जी, आना  मेरे  गाँव।

छीन ले गए साथ में, मेल-जोल की छाँव।।

 

शकुनि – से   पाँसे  चले,  ये  सरकारी  लोग।

तब-तक खुश होते नहीं, जब-तक चढ़े न भोग।।

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

अलीगढ़/भोपाल   

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – तिलिस्म ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – लघुकथा – तिलिस्म ??

….तुम्हारे शब्द एक अलग दुनिया में ले जाते हैं। ये दुनिया खींचती है, आकर्षित करती है, मोहित करती है। लगता है जैसे तुम्हारे शब्दों में ही उतर जाऊँ। तुम्हारे शब्दों से मेरे इर्द-गिर्द सितारे रोशन हो उठते हैं। बरसों से जिन सवालों में जीवन उलझा था, वे सुलझने लगे हैं। जीने का मज़ा आ रहा है। मन का मोर नाचने लगा है। महसूस होता है जैसे आसमान मुट्ठी में आ गया है। आनंद से सराबोर हो गया है जीवन।

…सुनो, तुम आओ न एक बार। जिसके शब्दों में तिलिस्म है, उससे जी भरके बतियाना है। जिसके पास हमारी दुनिया के सवालों के जवाब हैं, उसके साथ उसकी दुनिया की सैर करनी है।

…..कितनी बार बुलाया है, बताओ न कब आओगे?

लेखक जानता था पाठक की पुतलियाँ बुन लेती हैं तिलिस्म और दृष्टिपटल उसे निरंतर निहारता है। तिलिस्म का अपना अबूझ आकर्षण है लेकिन तब तक ही जब तक वह तिलिस्म है। तिलिस्म में प्रवेश करते ही मायावी दुनिया चटकने लगती है।

लेखक जानता था कि पाठक की आँख में घर कर चुके तिलिस्म की राह उसके शब्दों से होकर गई है। उसे पता था अर्थ ‘डूबते को तिनके का सहारा’ का। उसे भान था सूखे कंठ में पड़ी एक बूँद की अमृतधारा से उपजी तृप्ति का। लेखक परिचित था अनुभूति के गहन आनंद से। वह समझता था महत्व उन सबके जीवन में आनंदानुभूति का। लेखक जानता था तिलिस्म, तिलिस्म के होने का।

लेखक ने तिलिस्म को तिलिस्म ही रहने दिया।

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण # 115 ☆ तीन शिक्षिकाओं की कहानी – 8 ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆

श्री अरुण कुमार डनायक 

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है.

श्री अरुण कुमार डनायक जी ने अपनी सामाजिक सेवा यात्रा को संस्मरणात्मक आलेख के रूप में लिपिबद्ध किया है। आज प्रस्तुत है इस संस्मरणात्मक आलेख श्रृंखला की अगली कड़ी – “तीन शिक्षिकाओं की कहानी”)

☆ संस्मरण # 115 – तीन शिक्षिकाओं की कहानी – 8 ☆ श्री अरुण कुमार डनायक

आज अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर मुझे माँ सारदा कन्या विद्यापीठ की तीन युवतियों की स्मृति हो आई । यह तीनों आदिवासी युवतियाँ इस विद्यापीठ की पुरानी विद्यार्थी तो नहीं है पर अपनी  शैक्षणिक योग्यता के कारण यहाँ नन्ही आदिवासी बालिकाओं को शिक्षित करने के लिए नियुक्त की गई हैं । इन तीनों में एक जज्बा है पढ़ने और पढ़ाने का और शायद इसी उद्देश्य के लिए वे अल्प वेतन पर भी विद्यापीठ में अपनी सेवाएं दे रही हैं । वे तीनों न केवल पढ़ाती हैं वरन छात्रावास और भोजनालय की व्यवस्था भी संभालती हैं और बालिकाओं को खेलकूद, चित्रकला, गायन आदि गैर शैक्षणिक गतिविधियों में व्यस्त रखती हैं ।

अनपढ़ माता पिता हीरालाल बैगा और श्रीमती बाई  की पुत्री रामेश्वरी पिछली शताब्दी के खत्म होने के कोई चार वर्ष पहले पैदा हुई । माँ-पिता के पास पारिवारिक बटवारे में मिली थोड़ी सी कृषि भूमि ग्राम जरहा में है तो उससे प्राप्त उपज और मेहनत मजदूरी से साल भर में तीस हजार के लगभग आमदनी हो जाती है और इसी से तीन भाई ओ तीन बहनों के परिवार का भरण पोषण होता है । रामेश्वरी के पिता को न जाने कैसे प्रेरणा मिली, उसने अपनी संतानों को पढ़ाने का निर्णय लिया। उसकी  छह संतानों में से तीन विज्ञान स्नातक हैं। अपने मझले भाई को जब बीएससी में पढ़ते देखा तो रामेश्वरी की इच्छा भी ऐसा कुछ करने की हो चली। अपने अनपढ़ पिता को उसने अपने सपने के साथ खड़ा पाया और मझले भाई की ही भांति उसने भी अच्छे अंकों के साथ जीवविज्ञान व रसायन शास्त्र विषय लेकर स्नातक की उपाधि अर्जित की। रामेश्वरी बीएड कर प्रशिक्षित शिक्षक बनना चाहती है और उसके इस सपने में आड़े आ रही है धन की कमी । ऐसे पेशेवर अध्ययन के लिए यह सही है कि शैक्षणिक शुल्क की प्रतिपूर्ति छात्रवृति से हो जाती है पर छात्रावास भोजन व अन्य व्यय तो होते हैं, जिसकी व्यवस्था करना  फिलहाल  रामेश्वरी और उसके अभिभावक के बस में नहीं है ।

एक दूसरी शिक्षिका सरिता सोनवानी (गोंड) की कहानी भी अभावों में पली बढ़ी बेटी की कहानी है । उसके पाचवीं पास पिता रत्तीदास ने तीन शादियाँ की । पहली पत्नी चंपा बाई को दो संतान पैदा होने के बाद छोड़ दिया। यही चम्पा, सरिता की माँ है और उसने मेहनत मजदूरी करके अपने दोनों बच्चों को पढ़ाया । अपनी माँ की जीवटता की सरिता बड़ी प्रसंशक है। सरिता का भाई वनस्पति शास्त्र में स्नातकोत्तर है पर बेरोजगार है, बीएड  नहीं कर पा रहा क्योंकि धनाभाव है । सरिता कहती है कि यदि मातापिता साथ रहते तो वह भी बारहवीं उत्तीर्ण करने के बाद उच्च शिक्षा के लिए कालेज जाती। मैंने उससे भविष्य की योजनाओं और विवाह के बारे में जानना चाहा । वह कहती है कि परिवार की आर्थिक स्थितियाँ और बुजुर्ग माँ की देखरेख की भावना उसे भविष्य के सुनहरे सपनों से दूर ले जाती है। यदि भाई को नौकरी मिल गई तब शायद वह विवाह के बारे में सोचेगी । 

एक अन्य गोंड युवती सीता पेण्ड्राम  की कहानी भी जीवटता से भरी है । उसके पिता मोहर सिंह ने भी दो विवाह किए । माँ बाद में मायके आ गई और फिर ननिहाल में रहकर ही उसने अपनी पढ़ाई लिखाई जारी रखी। बारहवीं उत्तीर्ण करने के बाद ट्यूशन पढ़ाकर आगे की पढ़ाई जारी रखी । सरकार की छात्रवृत्ति और अपनी कमाई के दम पर उसने कला संकाय में स्नातकोत्तर की उपाधि अर्जित की और फिर बीएड भी किया । सीता का बचपन कुछ हद तक खुशियों से भरा था, यद्दपि माँ अलग रहती थी पर पिता के यहाँ आना जाना था और पिता तथा सौतेले भइयों ने उसे बराबर स्नेह दिया । ननिहाल के अन्य रिश्तेदारों ने उसे आगे पढ़ने की प्रेरणा दी। विवाह वह करना चाहती है पर आर्थिक स्वावलंबन के बाद। यह बड़ा परिवर्तन शिक्षा के कारण ग्रामीण युवतियों में आया है । धर्मांतरण को लेकर सीता कहती है कि ग्रामीण क्षेत्रों में गुणवत्तापूर्ण शिक्षा  और स्वास्थ्य सुविधाओं के अभाव का लाभ ईसाई मिशनरियाँ उठाती हैं। अक्सर चर्च के प्रतिनिधि बीमार आदिवासियों के पास पहुँच जाते हैं, उन्हे मिशन अस्पताल में भर्ती करवा उनका न केवल इलाज करवाते हैं वरन उनके लिए ईसा मसीह से प्रार्थना भी करते हैं और यहीं से धर्मांतरण की नींव रखी जाती है ।

माँ सारदा कन्या विद्यापीठ की शिक्षिकाएं, यह तीन युवतियाँ एक नए ग्रामीण भारत की तस्वीर पेश करती हैं। वे हमारी बहुत सी समस्याओं के हल करने का मार्ग सुझाती हैं। यह मार्ग निश्चय ही अच्छी शिक्षा, बेहतर स्वास्थ्य सुविधाओं से होकर जाता है। सरकार बालिकाओं के विवाह की उम्र बढ़ाना चाहती है लेकिन शिक्षित युवतियों ने तो विवाह की अपेक्षा आर्थिक स्वावलंबन को महत्ता दी है, ऐसा मैंने कई ग्रामीण युवतियों से चर्चा करने के बाद जाना है।

©श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा कहानी # 38 – जन्मदिवस – भाग – 2 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना  जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। प्रस्तुत है अनुभवों एवं परिकल्पना  में उपजे पात्र संतोषी जी पर आधारित श्रृंखला “जन्मदिवस“।)   

☆ कथा कहानी # 38 – जन्मदिवस – भाग – 2 ☆ श्री अरुण श्रीवास्तव 

शाखा में काम काज भले ही देर से शुरु हुआ था पर स्टाफ की द्रुतगति से काम निपटाने की क्षमता और कस्टमर्स के सहयोग ने समय की घड़ी को भी अंगूठा दिखा दिया था जिसमें उत्प्रेरक बनी मिठाइयों का स्वाद भी कम नहीं था. जब बैंक के सामान्य दिनों की तरह यह दिन भी अपने आखिरी ओवर की ओर बढ़ रहा था तो मुख्य प्रबंधक महोदय के निर्देशानुसार, परंपरा के विपरीत शाखा के मीटिंग हॉल में जन्मदिन मनाने की तैयारियां वहीं लोग कर रहे थे जो इंतजाम अली के नाम से जाने जाते थे हालांकि इस बार उनके वरिष्ठ याने संतोषी साहब उनके साथ नहीं थे. परंपरा और पार्टियां एक दूसरे को बड़ी आसानी से नजरअंदाज कर देती हैं, उसी तरह जैसे क्रिकेट के बैट्समैन के शतक को लोग उसके अगले पिछले रिकॉर्ड को भूलकर इंज्वॉय करते हैं.

शाम को ठीक 5:30 बजे सभी लोग मीटिंग हॉल में आना शुरु कर चुके थे और जो पहले आ गये थे वे व्यवस्था की गुणवत्ता के निरीक्षण में लग चुके थे. चूंकि व्यवस्था बहुत विशालकाय नहीं थी तो सामान्य प्रयास में ही नियंत्रण में आ चुकी थी. ठीक 6बजे मुख्य प्रबंधक महोदय और संतोषी जी ने हॉल में एक साथ प्रवेश किया जो इस छोटे से आयोजन के लिये हर हाल में तैयार हो चुका था. शाखा के 20% “सदा लेटलतीफों” का इंतज़ार छोड़कर, बर्थडे केक और उस पर लगी कैंडल्स का “जन्मदिवस संस्कार” किया गया और केक के रसास्वादन का शुभारंभ संतोषी जी के मुखारविंद से हुआ जो कि होना ही था. इस रस्म में मुख्य प्रबंधक महोदय का उत्साह और सक्रियता प्रशंसनीय रही. सभी खुश थे क्योंकि संतोषी साहब से मिलकर लोग खुश हो ही जाते हैं, आप भी तो. नकारात्मकता से उनका न तो लेना देना था न ही कोई दूर का संबंध. बहरहाल शाखा में एक अच्छी परंपरा की शुरुआत हुई जो सहकर्मियों को पास आने का एक और अवसर प्रदान कर रही थी. यह सकारात्मकता का मिलन समारोह था जो संतोषी जी के सहज व्यक्तित्व से साकार हो रहा था.

शाखा की युवावाहिनी खुश तो थी पर बहुत व्यग्र भी, कारण स्पष्ट था कि ये लोग एक दिन में ही CAIIB के तीनों पार्ट क्लियर करना चाहते थे. पर संतोषी साहब ने उनको प्रेम से समझाया कि आज के इस दिन पर जो मेरे लिये विशिष्ट भी है, मेरे परिवार का भी आपके समान ही अधिकार है. तो इन सुनहरे पलों का एक भाग मुझे उनके साथ भी गुजारने दीजिए. बरस दर बरस बीतते बीतते ऐसा वक्त भी आता है जब बच्चे दूर होकर अपनी अपनी नई दुनियां में व्यस्त हो जाते हैं. बैंक की महफिलें भी साठ के पार उठ जाती हैं और रह जाते हैं पति और पत्नी. पति पत्नी का ये साथ भी सौभाग्य की शर्तो से बंधा होता है कि कौन किसका साथ कब तक निभाता है. तो ये जो वर्तमान है, वह मैं पूरी शिद्दत से जीना चाहता हूँ ताकि मन में कोई पछतावा न रहे.

हालांकि बाद में युवावाहिनी की डिमांड भी पूरी हुई पर उसका वर्णन अभी सोचना और लिखना बाकी है. इसलिए कृपया इंतजार करें, मजबूरी है.

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares