मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || माऊली || ☆ श्री आनंदराव रघुनाथ जाधव ☆

श्री आनंदराव रघुनाथ जाधव

परिचय 

आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव – सारस्वत बँक निवृत्त कर्मचारी

कार्यकारी मंडळ सदस्य – महात्मा गांधी ग्रंथालय वखारभाग सांगली

सदस्य – जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल

कार्यवाह – छत्रपती श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ सांगली…

सम्प्रत्ति – कविता लिहण्याची आवड, साहित्य संमेलन सहभाग, सामाजिक कार्याची आवड, महात्मा गांधी ग्रंथालय येथ, काव्य संमेलन आयोजित करण्याचे नियोजन, गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, वृक्षारोपण, रक्तदान, इत्यादी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग

? कवितेचा उत्सव ?

☆ || माऊली || ☆ श्री आनंदराव जाधव ☆

सुर्य अंगणी तुळस

शुभ सकाळी नमन

कर जोडोनी वंदन

प्रेम सुगंधी सुमन

 

दारी रंगली रांगोळी

दिप देव्हारी तेजला

घर सुमंगल झाले

मनी आनंद सजला

 

माय माऊली गंगाई

हाती कंकण वाजते

गाते मधूर भूपाळी

पायी पैंजण शोभते

 

धूप कापूर ‌आरती

टाळ टाळी ही घुमते

नाम देवाचे मंजुळ

सुख गोकुळीं नांदते

© आनंदराव रघुनाथ जाधव

पत्ता  – खणभाग, भारत चौक, शिवगर्जना मार्ग, “श्री ज्योतिर्लिंग”, २०७, सांगली.. संपर्क…८८३०२००३८९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संपले ते दिवस… ☆ मेहबूब जमादार ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ संपले ते दिवस… ☆ मेहबूब जमादार ☆

दोघांतचं बोलू कांही

पण संपले ते दिवस

पुनव चाखल्या यौवनी

आली आता अवस

 

दोघांच्या मिटीत सजणे

रात्रीही भुलून गेल्या

पहाटेचा झाला इषारा

पाकळ्या फुलून गेल्या

 

असता मिठीत दोघे

भोवतीची नव्हती जाण

उशीरा कळले आपणां

पाखरानीं सोडले रान

 

कित्येक गेले दिवस

दोघानां आठव रातीचा

यौवनांत भुलूनी गेलो

अर्थ न कळे जगण्याचा

 

चाखली मजा ती गेली

अन यौवन सरून गेले

तळमळत्या या रातींना

बघ,सारे स्मरून गेले

 

सखे स्मरते सारे,पण

पाय गळाया लागले

झाली जीवनाची सांज

सरण दिसाया लागले…

 

 – मेहबूब जमादार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हॕलो..sss मी वड बोलतोय..! आवाज येतोय ना…! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? कवितेचा उत्सव ?

☆ हॕलो..sss मी वड बोलतोय..! आवाज येतोय ना…! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

मी खूप गुदमरलोय, दमलोय आज, मलाच

आॕक्सीजनची कमतरता जाणवू लागली आहे.

माझ्याभोवती किती ही गर्दी…!

कोरोना विषाणू नाही गेला ना अजूनही..!

सोशल डिस्टन्सींग तर दिसतच नाही

मास्क सुद्धा कुणाच्या तोंडावर मी पाहिला नाही.

मला कोंडल्यासारखं वाटतंय

श्वास घेणं अवघड झालंय

ही कोण सावित्री ? सत्यवानाची सावित्री

कधी माझ्या सावलीत आली..!

ती माझ्याच सावलीत का आली ?

सावली शोधत असेलही आली माझ्या सावलीत..!

मुर्च्छित तिच्या पतीला मिळाला असेल विसावा !

खूप हैराण होतोय मी दरवर्षी या दिवशी..

माझ्या सावलीत आणि माझ्या सारख्या अनेकांच्या

सावलीत सावित्रीजोतीबांची काही दिवस

मुलींची शाळा भरली होती हे मला आठवतंय..!

रविंद्रनाथ टागोरांची शाळा… शांतिनिकेतनही

आमच्या सारख्यांच्या सावलीतच की हो..!

ते खूपच छान, उत्साही, आशादायी दिवस.

मुलांचं बागडणं, पारंब्यांशी झोका घेणं

लपंडावात माझ्या भल्या खोडामागं लपणं

वाह..वाह.. ! खूप अफलातून वाटायचं तेव्हा..!

नका गुंडाळू मला दोऱ्याने

नका करु माझी पूजा

विनातक्रार सात पावलंतरी चाला

जोडीदाराच्या सुखदुःखात सहभागी व्हा !

प्रेमपूर्वक जगण्याचा उत्साह वाढवा..!

मरेपर्यंत एकमेकांना आनंदी ठेवण्याचा

प्रयत्न मिळून करा..!

रोगमुक्त करुन जीवदान देणारे डॉक्टर्स, नर्सेस्

तुमचा अंत काहीकाळ लांबणीवर टाकणारे

हाॕस्पीटलस् यांना आदर द्या..!

दवाखान्याचा खर्च गरीबांना परवडावा यासाठी

काही पावलं उचला..!

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हे प्रश्न कुठे सुटलेत अजून !

विधायक कामासाठी, अनेकांच्या भल्यासाठी

मानवतेकडील वाटचालीसाठी

चर्चेच्या, संवादाच्या अनेक फेऱ्या मारा..!

ग्लोबल वाॕर्मिंग वाढतंय मित्र-मैत्रींणींनो

झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल साधा

तुम्ही माणसं ग्रेट आहात तुमच्या हातात बरंच काही

काही चुकल्यास क्षमा करा

धन्यवाद …!

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

24/06/2021

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रामाणिकपणाचे कौतुक… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रामाणिकपणाचे कौतुक… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

बंडूतात्या सकाळी सकाळीच तयारी करून शहराच्या गावी जायला निघाले. महत्त्वाचे काम असल्याने त्यांच्या सोबत त्यांचे मित्र अप्पाजीही होते. एस.टी.त बसल्यावर आपल्याला काय काय घ्यायचं आहे याचा ते विचार करत होते. बर्‍याच दिवसांनी शहराच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे त्यांच्या छकुलीनेही “आपल्यासाठी काहीतरी आणा” असे बजावले होते.

गाडी वेळेवर पोहोचली. कार्यालयातील त्यांची कामेही लवकरच आटोपली. आपली सर्व कामे आटोपल्यावर  त्यांना घरी जाण्यासाठी बराच वेळ शिल्लक होता. आता  खरेदी करू या असं ठरवून दोघेही बाजारामध्ये गेले. घरी लागणा-या काही वस्तू बाजारातून त्यांनी खरेदी केल्या. आपली छकुली  काय तरी नवीन घेऊन येण्याची वाट पाहत असणार. म्हणून आपल्या मुलीसाठी त्यांनी एक सुंदर फ्रॉक खरेदी केला . मुलीला आवडत असलेला रंग आणि त्यावर असलेला सुंदर गोंडा त्यामुळे तो फ्रॉक बंडूतात्यांना खूपच आवडला होता. केव्हा एकदा घरी गेल्यावर आपल्या मुलीला ती भेट देतो असं त्यांना झालं होतं.  अजूनही गाडीला खूप वेळ होता. त्या दोघांची खरेदी संपलेली होती. आता बस स्टॉपवर बसून राहण्यापेक्षा आपण सिनेमा पाहायला जाऊ असा त्यांनी विचार केला. त्या दोघांनी एक रिक्षा बोलावली आणि त्या रिक्षात बसून ते सिनेमागृहात निघाले. सिनेमाचा वेळ झालेला होता. सिनेमागृहापाशी पोहोचल्यावर बंडूतात्यांनी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि लगेच तिकीट काढायला म्हणून घाईघाईने निघून गेले. त्यांनी सिनेमाची तिकिटं काढली आणि सिनेमागृहात प्रवेश केला. त्यांच्या आवडीच्या विषयावर सिनेमा असल्यामुळे बंडू तात्या सिनेमा पाहण्यात दंग झाले होते.

दरम्यान मध्यंतर झालं आणि सिनेमागृहाच्या लाइट्स सुरू झाल्या. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी भाव दिसू लागले. अप्पाजींनी त्याला विचारलं, “काय रे, काय झालं? तू दु:खी का?”

बंडू तात्या म्हणाले, “आपण बाजारातून  माझ्या मुलीसाठी फ्रॉक घेतला होता. त्या फ्रॉकची पिशवी आता मला दिसत नाही. आता रिकाम्या हाताने घरी गेलो तर छकुली नाराज होईल.”

आप्पाजी म्हणाले, “अरे आता काय करणार ? आता तर आपली जायची वेळ झाली. आपल्याला वेळेवर निघायला हवं. नंतर बस नाही.”

बंडू तात्या आपल्या मित्राला म्हणाले, “चल आपण बाहेर जाऊ आणि थोडा शोध घेवू.”

आप्पाजी  त्याला म्हणाले, “ठीक आहे. पण नीट आठव. नाहीतर आपल्याला उगाच इकडे-तिकडे भटकत राहावे लागेल.”

बंडूतात्यांना मात्र काहीच सुचत नव्हतं. ते लगबगीने बाहेर आले. सिनेमागृहाच्या बाहेर आल्यानंतर इकडेतिकडे शोधक नजरेने पाहू लागले. त्याच वेळी एक गृहस्थ त्यांच्या दिशेने आला आणि त्यांना विचारलं, “काय हो, काय शोधत आहात? मला जरा सांगता का?”

त्या गृहस्थाकडे ते पाहू लागले. ते म्हणाले, “सांगून काय उपयोग आहे? पण सांगतो.  माझी एक किंमती वस्तू हरवलेली आहे आणि ती वस्तू मी जर घरी नेली नाही तर माझ्या मुलीला खूप वाईट वाटेल.”

तो गृहस्थ म्हणाला, “मी एक रिक्षा व्यावसायिक आहे. दुपारी माझ्या रिक्षामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या होत्या . त्यापैकी एकाची पिशवी माझ्या रिक्षामध्ये राहिली. परंतु त्यांचा चेहरा नीट पाहिला नसल्यामुळे मला ते व्यवस्थित आठवत नाहीत. मी शोधू शकत नाही.”

हे ऐकून बंडूतात्यांना बरं वाटलं. ते म्हणाले, “अहो तो मीच आहे. माझीच पिशवी हरवली आहे.”

रिक्षावाला म्हणाला, “माझ्या रिक्षामध्ये ही पिशवी विसरली होती. घरी गेल्यावर माझ्या पत्नीला सापडली.”

“हो पण एवढ्या पिशवीसाठी तुम्ही परत आलात?”

रिक्षावाला म्हणाला, “खरं तर तुम्हाला सोडून मी माझ्या घरी गेलो. घरी गेल्यावर पत्नी पाहते तर ती पिशवी होती. ती पिशवी  बघून माझी बायको म्हणाली, “अहो केवढ्या प्रेमाने सद्गृहस्थाने आपल्या मुलीसाठी सुंदर ड्रेस घेतलेला आहे. आणि ती पिशवी तो आपल्या रिक्षामध्ये विसरला आहे. त्याला खूप वाईट वाटेल. पहिले तुम्ही पुन्हा मागे जा आणि त्याला शोधून काढा. आपल्या मुलीसारखी त्यांची मुलगी त्या वस्तूसाठी वाट बघत असेल.” म्हणून मी पुन्हा तुम्हाला शोधण्यासाठी आलो.”

हे ऐकून बंडूतात्यांना त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल अप्रुप वाटलं. त्याला बक्षीस म्हणून पैसे देऊ केले. मात्र त्याने पैसे घेण्यास नकार दिला.

तो म्हणाला, “अहो आम्ही कष्टाची  भाकरी खातो. आणि त्यामुळेच मी तुम्हाला ही पिशवी परत देण्यासाठी आलो आहे. मला अजिबात नको पैसे.”

बंडू तात्यांना राहवत नव्हतं. त्यांनी त्या रिक्षावाल्याचा पत्ता घेतला आणि त्या रिक्षावाल्याच्या युनियनचा सुद्धा पत्ता घेतला. घरी आल्यावर त्यांनी रिक्षा युनियनच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्या गृहस्थाच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं आणि रिक्षावाल्यांच्या युनियनचे सुद्धा आभार मानले

असेच काही दिवस गेले. एक दिवस त्यांना एक पत्र आले. त्यात लिहिलं होतं, “नमस्कार! आमच्या  रिक्षा युनियन मधील एका रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल तुम्ही कौतुक केलं. आमच्या सहका-यांनाही चांगलं वाटलं. त्याबद्दल त्या रिक्षावाल्याचा एक छोटासा सत्कार आमच्या युनियनच्यामार्फत ठेवलेला आहे. आणि हा सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. येण्या- जाण्याचा जो खर्च आहे तो आमच्या रिक्षा युनियनच्या मार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे.”

बंडूतात्यांना खूप आनंद झाला. आपण लिहिलेल्या पत्रामुळे एका चांगल्या माणसाचा गौरव होतोय याचा त्यांना आनंद झाला. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. कार्यक्रम संपल्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रवास खर्च देऊ केला परंतु त्यांनी तो नाकारला.

” एवढं चांगलं काम तुम्ही केलं. एका प्रामाणिक व्यक्तीचा तुम्ही गौरव केलात. त्यामुळे तुमच्याकडून पैसे घेणे हे मला शोभत नाही. अशाच प्रकारची प्रामाणिक सेवा तुम्ही सर्व जनतेला देत आहात हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.”

प्रामाणिकपणाचे फळ नेहमीच चांगलं असतं.

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरगांव… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ गिरगांव… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

बदलले सर्व काही, बदलले सारे गिरगांव

उरल्या त्या आठवणी, बदलले आमचे गांव 

 

जुनी प्रेमळ माणसे, अजूनही मनात घोळतात

बालपणाच्या आठवणी, आजही मनात रुळतात

 

पूर्वीचे आपले गिरगांव, हे आपलेसे वाटायचे

एकमेकांशी सगळे कसे, जिव्हाळ्याने वागायचे

 

घराचे दरवाजे, कायम उघडेच असायचे

घरात खास बनले की, शेजाऱ्यांकडे जायचे

 

शेजारधर्म, आचारधर्म, काय तो तेथेच रुजला

लहानपणीच तो प्रत्येकाच्या, मनावर बिंबला

 

पाण्यावरून भांडणे, चाळीत कायम असायची

पण मनात दुस्वासाला, कधी जागा नसायची

 

प्रेमासाठी लांबच्या पल्ल्याची, गरज नसायची

चाळीतच प्रेमाच्या नजरेची, ओळख व्हायची

 

जापनीज गार्डन मुलांसाठी, हक्काचे असायचे

लाल धक्का जोड्यांसाठी, मात्र प्रेमाचे वाटायचे

 

भाड्याची सायकल चालवणे, चैन असायची

बच्चूचा बर्फ गोळा हीच मोठी, ट्रीट वाटायची

 

कुल्फीवाल्याची रविवारी रात्री, वाट बघायची

पत्त्यांच्या डावाशिवाय कधी, झोप नाही यायची 

 

वाड्यावाड्यांमधून टेनिस क्रिकेटच्या, मॅचेस व्हायच्या

मित्र असले तरीही, खुन्नशीने त्या खेळल्या जायच्या

 

हम दो हमारे चार असले तरी, अडचण नसायची

पाहुण्यांसाठीही रहायला घरात, जागा असायची

 

मराठी माणसांनीच भरलेले, आपले  गिरगांव असायचे

मराठी भाषेचाच अभिमान, उराशी बाळगून जगायचे

 

बदलले सर्व काही, बदलले सारे गिरगांव— 

उरल्या त्या आठवणी, बदलले आमचे गांव — 

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

१२-०६- २०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सावित्रीही बदलते आहे… श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सावित्रीही बदलते आहे… श्री सतीश मोघे  ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सावित्रीही बदलते आहे…

(कुपी अत्तरी)

दिनू त्याच्या ८६ वर्षाच्या आईकडे पाहून हसत म्हणाला, “आता पुरे वटसावित्रीचा उपवास..

केलास आता इतकी वर्षे..आणि खरच बाबा तुला सात जन्म हवे आहेत का? “

“ त्यांना माझ्याविषयी काही वाटत नाही..हे ठाऊक आहे मला..पण घेतला वसा टाकायचा नाही. इतकी वर्षे पूजा..उपवास केला वटसावित्रीचा..उद्याही करणार “ …आई काहीशा तटस्थ निश्चयी स्वरात उत्तरली..

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो काय? आई सर्व आटोपून एका कागदावर हिरव्या स्केच पेनने वडाचं झाड काढून पूजा करत बसलेली..दिनूला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले…

अजूनही बिछान्यावर असलेल्या  आपल्या सावित्रीला  हलकेच जागे करून त्याने ती बातमी दिली. सावित्री म्हणाली,

“ मीही करणार आहे पूजा..मागणार आहे तुलाच सात जन्म..पण देवाला काही अटी..पण.. परंतू घालणार आहे..’

दिनूने विचारलं ‘कोणते पण?’ तशी तिने कविताच त्याच्यासमोर सारली.. म्हणाली ‘ तुला कवितेतलं चटकन कळतं,म्हणून रात्री जागून केली आहे..फार यमक..मीटर पाहू नकोस…भावार्थ समजून घे..आणि पटतं आहे का सांग. पटलं तरच आज पूजा आणि उपवास…”

दिनूने कविता वाचली मात्र..त्याच्या लक्षात आलं..सावित्री बदलते आहे…किमान आता वेदना ..अपेक्षा व्यक्त तरी करायला लागली आहे..

तो म्हणाला,

“ मी तुला समजून घेईन…. सात जन्मीची साथ सखये कुणी पाहिली..

याच जन्मी सुख सारे सारे देईन तुजला….”

हे दिनूकडून ऐकलं मात्र.. दिनूची सावित्री आन्हिक वगैरे आटोपून पूजेला बसली..हाच दिनू सात जन्म मिळावा म्हणून…

(कुपी अत्तरी)

 

आपणही सावित्रीची ही कविता वाचू या…

वटपौर्णिमा…

 

देवासमोर ठेवणार 

काही माझे ‘पण’

करून वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

एक साकडं त्याला

आहे मी  घालणार

‘रोल’  आमचा बदल  

आहे मी  सांगणार

प्रार्थना करणार आहे

 अशी विलक्षण

करून वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

देवाला सांगणार

जोडी हीच राहू दे

कर त्याला स्त्री नी

 पुरुष मला होउ दे

मलाही करायची आहे

 थोडी   तणतण

करून वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

मला कर राजा नी

 त्याला कर राणी

येउ दे थोडेसे

 त्याच्या डोळा पाणी

ह्यालाही भासुदे 

माहेराची चणचण

करून वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

येऊ दे ह्याला पाळी

न पोट ह्याचं दुखु दे

झोपून राहावंसं वाटतं

ह्याला थोडे कळू दे

पाय किती दुखतात 

नि तापासारखी कणकण

करून वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

नऊ महिने एक बाळ

 याच्या पोटात येऊ दे

नाकी नऊ कशी येते

 ह्यालाही ते कळू दे

नाही वैतागला गडी

तर हरेल मी काय पण

करून वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

कळेल याला का येतो

स्वयंपाकाचा   कंटाळा

हजारो वेळा ती चिकट

कणिक सारखी मळा

नको वाटेल त्याला ती

भांड्यांची खणखण

करुन वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

होईन मी जावई

माझा मग थाट 

सून झाल्यावर ह्याची

लागेल पुरती वाट

थांबणार नाही सासरी

मग हा एकही क्षण

करून वडाची पूजा

साजरा करेन मी सण

 

रात्री बेरात्री मी

खुशाल बाहेर पडेल

सातच्या आत घरात

 यायचं याला  म्हणेल

पेटून उठेल ह्याच्या

 रक्ताचा कणनकण

करुन वडाची पूजा 

साजरा करेन मी सण

 

माझा रोल प्ले केला

 की समजेल माझं दुःख

समजून घेईल मग मला 

मिळेल थोडे सुख

साता जन्माची ती सारी

थांबून जाईल वणवण

करुन वडाची पूजा 

साजरा करेन मी सण

………आपणही सांगू या आपल्या सावित्रीला..’मी समजून घेईन तुला आणि देईल सुखाला.. फक्त role तेवढा नको बदलू या..please..

 

(वरील कविता सौ. सविता सतीश मोघे यांची आहे…इतर पात्र काल्पनिक 😊)

…सतीश मोघे

  (कुपी अत्तरी)

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कानवसा – ☆ सुश्री उषा जनर्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – कानवसा –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

विसावली एक पक्षिणी

झाडाच्या एका फांदीवर

काय चालले तिच्या मनांत

कुठे असावे तिचे कोटर..?

कावरे बावरे चित्त तिचे

नजर बावरी दूर दूरवर

वाट पहात असावी ती

पिले उडाली तरी कुठवर..?

बसली आहे तरु शलाकेवर

भवतीच्या निसर्ग परिसरात

परी काहूर माजे मनी तिच्या

काय चाले कोवळ्या अंतरात..?

शुष्क कोरडेपणात मोहवी

हरित पालवीची नक्षी

कुणी पहात होता का तिज

तिच्या एकांताचा साक्षी..?

येतील कधी पिले परतूनी

आशा डोकावी नयनांत

तयां संगे मग घेईल फिरूनी

मोदीत झेप उंच गगनांत..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – आज का रांझा…☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ कथा कहानी ☆ लघुकथा – आज का रांझा… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(सन् 1972 में उन दिनों के लोकप्रिय अखबार वीर प्रताप द्वारा आयोजित लघुकथा प्रतियोगिता में मेरी यह लघुकथा सर्वप्रथम रही थी। आज आपकी अदालत में – कमलेश भारतीय)

उन दोनों ने एक दूसरे को देख लिया था और मुस्कुरा दिए थे । करीब आते ही लड़की ने इशारा किया था और क्वार्टरों की ओर बढ़ चली । लड़का पीछे पीछे चलने लगा ।

लड़के ने कहा -तुम्हारी आंखें झील सी गहरी हैं ।

-हूं ।

लड़की ने तेज तेज कदम रखते इतना ही कहा ।

-तुम्हारे बाल काले बादल हैं ।

-हूं ।

लड़की तेज चलती गयी ।

बाद में लड़का उसकी गर्दन, उंगलियों, गोलाइयों और कसाव की उपमाएं देता रहा । लड़की ने हूं भी नहीं की ।

क्वार्टर खोलते ही लड़की ने पूछा – तुम्हारे लिए चाय बनाऊं ?

चाय कह देना ही उसकी कमजोर नस पर हाथ रख देने के समान है, दूसरा वह बनाये । लड़के ने हाँ कह दी । लड़की चाय चली गयी औ, लड़का सपने बुनने लगा । दोनों नौकरी करते हैं । एक दूसरे को चाहते हैं । बस । ज़िंदगी कटेगी ।

पर्दा हटा और ,,,,

लड़का सोफे में धंस गया । उसे लगा जैसे लड़की के हाथ में चाय का प्याला न होकर कोई रायफल हो, जिसकी नली उसकी तरफ हो । जो अभी गोली उगल देगी ।

-चाय नहीं लोगे ?

लड़का चुप बैठा रहा ।

लड़की से, बोली -मेरा चेहरा देखते हो ? स्टोव के ऊपर अचानक आने से झुलस गया । तुम्हें चाय तो पिलानी ही थी । सो दर्द पिये चुपचाप बना लाई ।

लड़के ने कुछ नहीं कहा । उठा और दरवाजे तक पहुंच गया ।

-चाय नहीं लोगे ?

लड़की ने पूछा ।

-फिर कब आओगे?

– अब नहीं आऊंगा ।

-क्यों ? मैं सुंदर नहीं रही ?

और वह खिलखिला कर हंस दी ।

लड़के ने पलट कर देखा,,,

लड़की के हाथ में एक सड़ा हुआ चेहरा था और वह पहले की तरह सुंदर थी ।

लड़का मुस्कुरा कर करीब आने लगा तो उसने सड़ा हुआ चेहरा उसके मुंह पर फेंकते कहा -मुझे मुंह मत दिखाओ ।

लड़के में हिम्मत नहीं थी कि उसकी अवज्ञा करता ।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ मुक्तक – ।। आओ मिल कर दुनिया की कहानी नई लिखते हैं ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवा निवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना आओ मिल कर दुनिया की कहानी नई लिखते हैं।)

☆ मुक्तक – ।। आओ मिल कर दुनिया की कहानी नई लिखते हैं ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆ 

[1]

आओ मिल कर कहानी , नई लिखते हैं।

जीवन रंग ढंग रवानी, नई लिखते हैं।।

सबके लिए सरोकार, की बात हैं करते।

जीने का सलीका जिंदगानी, नई लिखते हैं।।

[2]

बात मेहरबानी की हर, किसी के लिए हो।

कम परेशानी हर, किसी के लिए हो।।

अधिकार और कर्तव्यं , का मेल हो खूब।

दुनिया दीवानी सी हर, किसी के लिए हो।।

[3]

कड़ी से कड़ी जोड़ कर, जंजीर बनाते हैं।

मेहनत से मिल कर ,चलो तक़दीर बनाते हैं।।

कण कण में जहाँ पर, प्रेम हो बिखरा हुआ।

दुनिया की ऐसी कोई ,नई तस्वीर बनाते हैं।।

[4]

हमदर्द हमसाया कोई ,समाज नया रचते हैं।

हमराह सा अब रिवाज़, कोई नया रचते हैं।।

प्यार की हर रीत ,प्रेम की प्रथा हो जहाँ पर।

हमदम मेरे दोस्त का,कोई साज़ नया रचते हैं।।

[5]

स्नेह प्रेम प्यार के हम सब, बनते चित्रकार हैं।

दोस्ती और दुआ के बनते, हम दस्तकार हैं।।

महाभारत पांसे नहीं, लाते रमायण के आदर्श।

स्वर्ग सरीखी दुनिया के, बनते अब शिल्पकार हैं।।

 

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – राष्ट्रीय एकात्मता में लोक की भूमिका – भाग – 12 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – राष्ट्रीय एकात्मता में लोक की भूमिका – भाग – 12 ??

दुनिया के कुछ हिस्से ऐसे हैं जहां एक बार जाने के बाद वे आपके मन में बस जाते हैं और उनकी याद कभी नहीं मिटती। मेरे लिए भारत एक ऐसा ही स्थान है। जब मैंने यहां पहली बार कदम रखा तो मैं यहां की भूमि की समृद्धि, यहां की चटक हरियाली और भव्य वास्तुकला से, यहां के रंगों, खुशबुओं, स्वादों और ध्वनियों की शुद्ध, संघन तीव्रता से अपने अनुभूतियों को भर लेने की क्षमता से अभिभूत हो गई। यह अनुभव कुछ ऐसा ही था जब मैंने दुनिया को उसके स्याह और सफेद रंग में देखा, जब मैंने भारत के जनजीवन को देखा और पाया कि यहां सभी कुछ चमकदार बहुरंगी है।

– किथ बेलोज़ (मुख्य संपादक, नेशनल जियोग्राफिक सोसाइटी

‘ मैं भारत के अनेक राज्यों में घूमा. वहाँ मैंने एक भी व्यक्ति ऐसा नहीं देखा जो भिखारी हो, चोर हो. ऐसी विलक्षण सम्पदा देखी है मैंने इस देश में, ऐसे उच्चतम मौलिक विचार, इतने काबिल/गुणी व्यक्ति देखे हैं कि मुझे नहीं लगता कि हम कभी इस देश को गुलाम बना पाएँगे, जब तक कि हम इस देश की अध्यात्मिक एवं सांस्कृतिक विरासत को नष्ट ना कर दें, जो इस देश की वास्तव में रीढ़ है।

और इसलिए मेरा प्रस्ताव है कि इस देश की वर्षों पुरानी ‘शिक्षा प्रणाली‘ और यहाँ की ‘संस्कृति‘ को बदल दिया जाए, क्यूंकि जब भारतीय ये सोचेंगे कि जो कुछ भी विदेशी है और ब्रिटेन का है, वह अच्छा और बेहतर है उनके स्वयं से, तब ये भारतीय अपना अपनी पौराणिक संस्कृति और स्वाभिमान को खो बैठेंगे और तब ये लोग वो बन जाएंगे जो हम उन्हें बनाना चाहते हैं, एक वास्तविक गुलाम भारत !‘

 – भारत का दौरा करने के बाद 1835 में ब्रिटिश संसद में दिए गये अँग्रेज मैकाले के भाषण के अंश। ( ये दस्तावेज संग्रहित हैं ) 

भारत में बीस लाख देवी-देवता हैं और वे सभी की पूजा करते हैं। धर्म के मामले में बाकी सभी देश कंगाल हैं, भारत ही करोड़पति है।

 – मार्क ट्वेन

क्रमशः…

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares