श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ गिरगांव… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

बदलले सर्व काही, बदलले सारे गिरगांव

उरल्या त्या आठवणी, बदलले आमचे गांव 

 

जुनी प्रेमळ माणसे, अजूनही मनात घोळतात

बालपणाच्या आठवणी, आजही मनात रुळतात

 

पूर्वीचे आपले गिरगांव, हे आपलेसे वाटायचे

एकमेकांशी सगळे कसे, जिव्हाळ्याने वागायचे

 

घराचे दरवाजे, कायम उघडेच असायचे

घरात खास बनले की, शेजाऱ्यांकडे जायचे

 

शेजारधर्म, आचारधर्म, काय तो तेथेच रुजला

लहानपणीच तो प्रत्येकाच्या, मनावर बिंबला

 

पाण्यावरून भांडणे, चाळीत कायम असायची

पण मनात दुस्वासाला, कधी जागा नसायची

 

प्रेमासाठी लांबच्या पल्ल्याची, गरज नसायची

चाळीतच प्रेमाच्या नजरेची, ओळख व्हायची

 

जापनीज गार्डन मुलांसाठी, हक्काचे असायचे

लाल धक्का जोड्यांसाठी, मात्र प्रेमाचे वाटायचे

 

भाड्याची सायकल चालवणे, चैन असायची

बच्चूचा बर्फ गोळा हीच मोठी, ट्रीट वाटायची

 

कुल्फीवाल्याची रविवारी रात्री, वाट बघायची

पत्त्यांच्या डावाशिवाय कधी, झोप नाही यायची 

 

वाड्यावाड्यांमधून टेनिस क्रिकेटच्या, मॅचेस व्हायच्या

मित्र असले तरीही, खुन्नशीने त्या खेळल्या जायच्या

 

हम दो हमारे चार असले तरी, अडचण नसायची

पाहुण्यांसाठीही रहायला घरात, जागा असायची

 

मराठी माणसांनीच भरलेले, आपले  गिरगांव असायचे

मराठी भाषेचाच अभिमान, उराशी बाळगून जगायचे

 

बदलले सर्व काही, बदलले सारे गिरगांव— 

उरल्या त्या आठवणी, बदलले आमचे गांव — 

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

१२-०६- २०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments