(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित सॉनेट – मातृभाषा।)
आज एक मे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. महाराष्ट्र दिन.
आज राजभाषा दिन.
आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन.
आज जागतिक हास्य दिन.
💐 ई-अभिव्यक्तीचे सर्व साहित्यिकांना आणि रसिक वाचकांना या बहुरंगी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
नारायण गणेश तथा नानासाहेब गोरे.
नानासाहेब गोरे यांचा जन्म कोकणातील.त्यांनी पुण्यात शिक्षण पूर्ण केले.ते स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय होतः.1942 च्या लढ्यातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला होता.
स्वातंत्र्योत्तर काळातही ते राजकारण व समाजकारण यात सक्रीय होते.त्यांनी सुरूवातीपासूनच समाजवादी विचारसरणी स्विकारली होती.त्यांनी पुण्याचे महापौर पद भूषविले होते.तसेच लोकसभेत समाजवादी पक्षातर्फे लोकप्रतिनिधित्वही केले होते.शिवाय भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त म्हणूनही काम केले होते.
हे सर्व करत असताना त्यांनी लेखनकार्यही चालू ठेवले होते.त्यांनी राजकीय,सामाजिक,,कथा,प्रवासवर्णन,निबंध असे विविध प्रकारचे लेखन केले होते. 1981 ते 1984 या काळात त्यांनी साप्ताहिक साधना चे संपादक पद भूषविले होते.
नानासाहेबांची साहित्य संपदा :
करवंदे..पत्रलेखन
सीतेचे पोहे
डाली
गुलबक्षी
शंख आणि शिंपले
चिनारच्या छायेत
काही पाने,काही फुले इ.
अनुवाद:
जवाहरलाल नेहरू आत्मकथा
सर्वपल्ली राधाकृष्णन् कृत गांधीजींचे विविधदर्शन
मेघदूत
राजकीय लेखन :
कारागृहाच्या भिंती—तुरुंगातील दैनंदिनी
समाजवादच का
भारतीय पूर्व सरहद्द
तापू लागलेलं हिम
साम्राज्यनाही व विश्व कुटुंबवाद.
01 मे 1993 ला वयाच्या 86व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जागतिक हास्य दिन 🤡 विनोद आणि आपण !🤡 श्री प्रमोद वामन वर्तक
‘टवाळा आवडे विनोद’ हे विनोदाच्या बाबतीत खुद्द रामदास स्वामींनी साधारण सतराव्या शतकातच म्हणून ठेवले आहे, हे आपल्याला ज्ञात असेलच ! आणि जर ते तसं ज्ञात नसेल, तर आपला विनोदाचा पाया अजून कच्चा आहे, असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो ! अर्थात जेव्हा त्यांच्या लेखणीतून हे वचन उतरले तो काळ, सामाजिक परिस्थिती आणि तेंव्हाची त्यांनी केलेली टवाळाची व्याख्या ही त्याच काळाला लागू होती, ह्या माझ्या वेगळ्याच संशोधनाशी आपण नक्कीच सहमत व्हाल !
मी असे म्हणतो आहे त्याचे कारण हे आहे, की टवाळ हा शब्द आजकाल कोणी वापरताना दिसतच नाही ! किंबहुना हा शब्द आताच्या काळी अस्तंगत झाल्यातच जमा आहे ! आत्ताचे जे काही विनोद आपण ऐकतो, बघतो अथवा एकमेकांस सांगतो, त्यांची जर पातळी बघीतली तर, टवाळ हा शब्द त्याच्या पुढे फार म्हणजे फारच मवाळ ठरावा !
विनोदाला एक पातळी असावी, तो कुठे, कधी, कोणा समोर आणि कसा सादर करावा हे एक शास्त्र आहे ! हे माझ्या प्रमाणे अनेकांचे मत असले, तरी या मता बद्दल दुमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा त्या हट्टी लोकांचा असा दावा असतो, की विनोद हा विनोद असतो, त्याला कसली आलीयं पातळी ? विनोदाला पातळीचे परिमाण लावून कसे चालेल ? मग त्यात गंमत ती काय ? वगैरे वगैरे. असो. ज्याला त्याला त्याची पातळी लखलाभ ! आपण उगाच कशाला आपली पातळी सोडून त्यांच्या सारखे खालच्या पातळीवर जा ?
फार पूर्वी कुठे तरी पुसटसे वाचल्याचे आठवतंय, की अलम दुनियेत कित्येक शतकांपूर्वी, म्हणजे मानवाला लिहिता वाचता यायला लागल्यावर, फक्त सतरा विनोद त्यांच्या मूळ स्वरूपात अस्तित्वात होते, एकमेकास सांगितले जात होते ! त्या नंतर जस जशी मानवाची विनोदबुद्धी बहरत गेली, फुलत गेली तसं तशी प्रत्येकाने आपापल्या परिने त्यात भर घातली अँड रेस्ट इज द हिस्टरी ! माझ्या विनोदाचा प्रकाश फार दूरवर पोहोचत नसल्यामुळे, या माझ्या वाचिक माहितीवर विनोदाचे जाणकारच जास्त प्रकाश टाकू शकतील !
टीव्हीवर सध्या ‘ईनोदी’ म्हणून ज्याचा गाजावाजा केला जातो अशा अनेक कार्यक्रमांनी, मालिकांनी नुसतं धुमशान घातले आहे ! डॉक्टरकी चालत नसल्याने, आपल्या एकट्याच्याच जीवावर एखादे चॅनल चालते, अशी ‘हवा’ ज्याच्या डोक्यात गेली आहे, त्याचा प्रोग्रॅम जरी चालू असला, तरी मी चॅनेल बदलतो आणि चक्क बातम्या बघणे पसंत करतो ! त्यात बातम्या देणाऱ्याची बातमी सांगण्याची पद्धत, बोलतांना कानावर पडणारे त्यांचे किंवा तिचे शुद्ध उच्चार किंवा स्क्रीनवरच शुद्ध मराठी वाचून माझी जास्त चांगली निखळ करमणूक होते ! हॊ, उगाच खोटं कशाला बोला !
विनोद आणि माणूस यांचे एक अतूट नातं आहे !
आपल्याला वरचं वाक्य थोडं खटकलं का ? तुमचं बरोबर आहे, नेहमी आपल्याला विनोद आणि मराठी माणूस यांचे एक अतूट नाते आहे, असे वाचण्याची सवय झाली आहे ! त्यात मी थोडा बदल केला इतकच ! कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा विनोदबुद्धी असतेच असते, फक्त एखादा विनोद आकलन करायची कुवत कमी जास्त असल्यामुळे, त्याला एखादा विनोद कळण्यास वेळ लागतो, त्यामुळे त्याची हसण्याची प्रतिक्रीया त्याच्या आकलनशक्ती प्रमाणे उशिरा किंवा अजिबातच येत नाही ! याचा अनुभव आपण कधीतरी घेतला असेलच, बघा आठवून !
आपल्या मराठीत अनेकानेक दिग्गज विनोदी लेखक होऊन गेले, पण विनोद आणि पु.ल. आणि पु.ल. म्हणजेच विनोद, हे समीकरण माझ्या पिढीच्या एव्हढे डोक्यात गेले आहे, की ती जागा माझ्या मते, दुसऱ्या कोणास घेण्यासाठी किती काळ जावा लागेल, हे सांगणे कठीणच आहे ! पु.लंचे विनोदी लिखाण हे खरोखरच अजरामर आहे आणि हल्लीची काही तरुण मंडळीसुद्धा त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडली आहेत, पडत आहेत हे पाहून पु.लं. बद्दलचे आमच्या पिढीचे प्रेम सार्थकी लागले असंच म्हणावंसं वाटतं !
कुठल्याही मानसिक दुःखावर एखादी विनोदी कथा, कविता वाचणे, ऐकणे या सारखा रामबाण ऊपाय नाही, अस हल्लीच वैद्यक शास्त्र सुद्धा सांगत ! इतका विनोदाचा सकारात्मक परिणाम माणसाच्या मनावर होतो ही निखळ विनोदाची जादूच म्हणायची !
आज काल प्रत्येकालाच रोज कुठल्या ना कुठल्या विवंचना भेडसावत असतात, त्यामुळे सकारत्मक विचार करणारी माणसे रोजच्या जीवनात वावरतांना, घडणाऱ्या प्रत्येक घटनेत विनोद शोधात असतात ! अशा लोकांच्या बाबतीत इतर सामान्य लोक त्याला, “याला कुठल्याच गोष्टीचे गांभिर्य नाही, हा सगळ्या गोष्टी हसण्यावारीच नेतो” असे म्हणून नावं ठेवत असतात ! पण माझ्या मते अशा तऱ्हेने जगणारे लोकच, वरकरणी तरी इतरांना कायम आनंदी अथवा सुखी वाटतात, हीच तर खरी अशा लोकांच्या स्वभावातली मेख आहे !
आपणा सर्वांना सुद्धा असाच विनोदाचा सुंदर नजरिया, आपल्या रोजच्या जीवनात लाभो आणि आपले उर्वरीत आयुष्य सुद्धा हसत खेळत व्यतीत होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !
अचानक तिला माणसाच्या ओरडण्याचा आवाज आला.हाय…!! हूर्रे….!! असा आवाज पुढे पुढे सरकत होता. तिच्या तिक्ष्ण डोळ्यानीं हे पाहिलं.तिनं क्षणात आपलं घरटं जवळ केलं.तो शिकारी हातात गलोरी घेवून पक्षांना व खारी नां टिपत होता.ती भ्याली.तिचं सारं अंग कंपित झालं.
तिचं घरटं उंचावर होत.भोवती घनदाट फांद्या होत्या.त्यामूळे तिला भिती नव्हती.ती घरट्याबाहेर येवून हे सारं न्याहाळत होती. खाली पानांचा सळसळ असा आवाज अजूनही येत होता. शिकारी त्याच्या टप्प्यात आला होता.हातात असलेल्या गलोरीने खारीवर नेम धरत होता.सारं वन जागं होवून चित्कारत होतं.
सर्वानी आपआपली सुरक्षीत जागा पकडली होती.एरव्ही शांत असलेलं वन निरनिराळया आवाजांनी त्रस्त होऊन गेलं होतं.ती घरट्यातून पहात होती,शिका-याला दोन पारव्यांची फक्त शिकार करता आली होती.हळूहळू तो ओढ्याकडे सरकत निघून गेला होता.
एरव्ही शांत असणारं वन आज शहारून गेलं होतं. पण हल्ली फळांच्या,पक्षांच्या आशेपोटी शिका-यांचा राबता वाढू लागला होता. शिकारी वनांतून निघून जाईपर्यत वनांत स्मशान शांतता नांदायची.
पण वानरं शिका-याची छेड काढायचे.शिका-यानं दगड मारला की ते ऊजवीकडे वळत.ऊजवीकडून दगड आला की ते डावीकडे वळत.शिका-याचा दगड काय त्या वानरांना लागत नसे.
एखदा तर भलताच प्रसंग घडला.एका रागीट असलेल्या नर वानरांनं सरळ शिका-याच्या डोक्यावर झेप घेवून दूस-या झाडावर क्षणांत उडी घेतली.बिचारा शिकारी कांही कळण्याआधी खाली पडलां.तो कसाबसा धडपडत उठला.क्षणांत त्यानं ओढा जवळ केला.इकडे वानरानीं ते पाहील.आनंदात ते ख्यॅ ख्यॅ….. करत सगळ्या झाडांवर नाचू लागले.झाडं डोलाय लागली.परत तो शिकारी या वनांत दिसला नाही.
एरव्ही ती वानरांना शिव्या घालायची.पणआज तिला खरच आनंद झाला होता.आज तिनं घडलेला सारा प्रसंग तिच्या सहका-यानां सांगितला.त्याही आनंदल्या.
बघता बघता महिना लोटला होता. आज तिच्या पिल्लांनी डोळे उघडले होते. तिला फार मोठा आनंद झाला होता. आज पिल्लांनी त्यांची आई पाहिली होती.बाहेरचं जग ती पहाणार होती.अजूनही त्यानां स्वत:चं अन्न मिळविण्यास आठ-दहा आठवडे लागणार होते.तोवर आईच्या दुधावरच त्यांच संगोपन होणार होतं.
आज तिनं मनसोक्त पिल्लानां दूध पाजल. पिल्लांमूळे तिला सावध रहावं लागायचं. वनांत मोर, लांडोर असल्यामुळें तिला भिती नव्हती. चूकून कावळ्याचं,घारीचं लक्ष गेलं तर? हा विचार तिच्या मनांचा ठाव घेई. त्यामूळे सहसा ती झाडावरून खाली उतरत नसे.
तिच्या सहकारी खारीनीं बरेच घरटे बदलले, पण तिनं तिचं घरटं बदललं नव्हतं. एव्हढं तिला ते सुरक्षीत वाटायचं. त्यातूनही कांही गडबड झाली तर सगळ्या खारी चित्करायच्या. चिर्र…चिर्र…असा आवाज सगळ्या वनांत घूमायचा.
पावसाळा संपून थंडीची चाहूल अवघ्या वनाला लागली होती. तिनं वाळलेलं गवत आणून घरट्यात बिछानां केला होता.तिचं घरटं म्हणजे एक मोठं बीळंच होतं.पाऊस व वा-यापासून मुळांत ते सुरक्षीत होतं.
पिल्लं हळूहळू बोलू लागली होती.तिला त्या हळूवार चित्कारण्याचा आनंद वाटू लागला.किमान तिला पिल्लानां भूक लागल्याचं कळू लागलं होतं.जरी ती दुस-या झाडांवर गेली तरी पिल्लांच्या आवाजामुळे ती झेप टाकून पिल्लांकडे येत होती. पिल्लानां पाजत होती.
ऊन डोक्यावर आलं की ती सरसर झाडावरून खाली उतरायची.बुंध्याजवळ दोन्ही पायांवर बसून ती अंग पुसायची.शेपटी दोन्ही बाजूस झुलवायची.कानोसा घेत ओढ्याकडे जायची.क्षणात ती पाणी पिवून घरट्याकडे सरकायची.
ती ओढ्यावर फार वेळ थांबत नसे.जर थांबलीच तर पुढच्या दोन्ही हातानीं डोक्यावर पाणी घ्यायची.डोकं चोळायची.क्षणात निघून घरट्याकडे झेप घ्यायची.
सगळ्या वनांवर गारवा पसरला होता. दिवसा काय वाटत नसे पण रात्री वनांत थंडी वाजे.