ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
रेव्ह. नारायण वामन टिळक
(6डिसेंबर 1861 – 9 मे 1919) हे कवी, लेखक, शिक्षक व समाजसुधारक होते.
त्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा व समाजाला लागलेल्या जातिभेदाच्या किडीमुळे शुद्रांवर होणारे अत्याचार यामुळे त्यांच्या मनात खूप खळबळ माजली. त्यांनी बौद्ध, इस्लाम, ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केला.प्रार्थना समाज व आर्य समाजाशीही ते संलग्न होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर महात्मा फुलेंचाही प्रभाव होता.
नंतर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सर्वांचा विरोध स्वीकारून तो अंमलात आणला.
टिळकांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई यांना त्या काळात लिहावाचायला शिकवले. लक्ष्मीबाईंनीही त्याचे चीज केले. त्यांनी साध्यासोप्या भाषेत लिहिलेले ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र हे आजही सडेतोड व उत्कृष्ट आत्मचरित्राचा एक उत्तम नमुना म्हणून लोकप्रिय आहे.
कालांतराने लक्ष्मीबाईंनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
महादेव रानडे, ज्योतिबा फुले इत्यादी मोजक्या समाजसुधारकांप्रमाणे टिळकांनाही आपल्या पत्नीची उत्तम साथ लाभली.
टिळक कॉलेजमध्ये गेले नाहीत. पण इंग्रजी डिक्शनरीतील असंख्य शब्द पाठ करून त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली.
ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापूर्वी, टिळकांनी काही काळ हिंदू धर्माचा व त्यातील कर्मकांडांचा अन्वयार्थ सांगणाऱ्या ‘ऋषि’ या मासिकाचे संपादन केले. त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता. पण सामाजिक व धार्मिक सुधारणांकडे त्यांचा कल होता.
ते उत्तम कीर्तनकार होते. प्रथम हिंदू व नंतर ख्रिस्ती धर्माच्या संदर्भातही त्यांनी कीर्तने केली.लक्ष्मीबाई यांच्यासह अनेक हिंदू व नंतर ख्रिस्ती कीर्तनकारांना त्यांनी कीर्तन करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी मार्गदर्शनपर ‘कीर्तन कलाप’ ही पुस्तिका त्यांनी लिहिली.
मुलांसाठीच्या ‘बालबोधमेवा’ या ज्ञान-मनोरंजनपर मासिकात त्यांनी अनेक लेख-कविता लिहिल्या.
त्यांनी भरपूर साहित्यनिर्मिती केली. त्यांना ‘महाराष्ट्राचा ख्रिश्चन वर्ड्सवर्थ’ म्हटले जाई. तर त्यांनी चर्चसाठी लिहिलेल्या असंख्य स्तोत्रे व कवितांमुळे त्यांना ‘पश्चिम भारतातले टागोर’ म्हणून ओळखले जाई.
त्यांचे ‘अभंगांजली’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
त्यांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहायला सुरुवात केली. पण 10 अध्याय लिहून झाल्यानंतर दुर्दैवाने त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली. लक्ष्मीबाईंनी पुढचे 64अध्याय लिहून ते कार्य पूर्ण केले.
याशिवाय त्यांच्या ‘वनवासी फूल’, ‘सुशीला’, ‘माझी भार्या’, ‘बापाचे अश्रू’, ‘प्रियकर हिंदीस्तान’ वगैरे 2100 कविता प्रसिद्ध आहेत.
त्यांना त्यांच्या कवितांसाठी व वक्तृत्वासाठी अनेक पारितोषिके मिळाली होती. यांत सुवर्णपदकाचाही समावेश आहे.
त्यांचा नातू अशोक देवदत्त टिळक याने टिळकांवर ‘चालता बोलता चमत्कार’ ही चरित्रपर कादंबरी लिहिली.
☆☆☆☆☆
डॉ. केशव नारायण वाटवे
डॉ. केशव नारायण वाटवे (19 एप्रिल 1895 – 9 मे 1981)हे मराठीचे प्राध्यापक व लेखक होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण औंध (सातारा) येथे व नंतर एम. ए. पर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले.
वाटवे संस्कृत व मराठी साहित्याचे अभ्यासक होते. त्या साहित्याची सूक्ष्म व रसिक परीक्षणे करून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांत ‘नलदमयंती काव्य’ (छंदोबद्ध काव्य), ‘पंडिती काव्य’, ‘प्राचीन मराठी पंडिती काव्य’, ‘रसविमर्ष’, ‘संस्कृत नाट्यसौंदर्य’, ‘संस्कृत साहित्यातील विनोद’, ‘माझी वाटचाल’ (आत्मचरित्र) वगैरे पुस्तकांचा समावेश आहे.
त्यांच्या ‘रसविमर्ष’ या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर पारितोषिक, भोर येथील शंकराजी नारायण पारितोषिक, डेक्कन सोसायटीचे इचलकरंजी पारितोषिक हे पुरस्कार मिळाले. हा ग्रंथ मुंबई, पुणे, नागपूर, कर्नाटक, गुजरात येथील विद्यापीठांनी बी. ए. व एम. ए. ला लावला.
ते शरद तळवलकरांचे सासरे लागत.
रेव्ह. नारायण वामन टिळक व डॉ. केशव नारायण वाटवे यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली.🙏
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक महाराष्ट्र नायक, लेखक :वि. ग. जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग 16 – मी कोण होऊ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आपल्याकडची सामाजिक परिस्थिति बघून नरेंद्र ने सामाजिक कामात लक्ष घालायचे ठरवले होतेच .त्याप्रमाणे शहरातील सामाजिक घडामोडींवर तो लक्ष ठेऊन होता. यावेळी ब्राह्मो समाजाचे काम पण सुरू झाले होते. हिंदू धर्मातील बराचसा भाग कालबाह्य रूढीवर आधारलेला होता. असे दिसत असले तरी आधुनिक काळात उपयोगी असलेल्या अशा पुष्कळ गोष्टी भारतीय अध्यात्मविचारात होत्या. आणि पश्चात्यांकडच्या चांगल्या गोष्टी आपण स्वीकाराव्यात अशाही होत्या. त्या समाजाला माहिती करून देणं आवश्यक होतं.
मग राजाराम मोहन राय यांनी सुवर्ण मध्य काढून ब्राह्मो समाज स्थापन केला. इथे पारंपरिक धर्मात सुधारणा करण्याचा उद्देश होता. धर्म सुधारला तर आचरण सुधारेल, आचरण शुद्ध झाले तर, सामाजिक प्रगतीचा पाया घातला जाईल. पुढे पुढे अनेक सुधारणा व कार्य या ब्राह्मो समाजाने केलं. त्यात जातीभेद निर्मूलन, सर्व मानव समानता, स्त्री शिक्षणाला महत्व, विवाहाची वयोमार्यादा वाढवणे, मिशनर्यांच्या कार्याला आळा घालणे अशी कामे होत होती. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन हे तरुणांच्या स्फूर्तीस्थान बनले होते.
ब्राह्मो समाजाचे काम नरेंद्रला आवडत होते. सामाजिक सुधारणा या उद्दिष्टामुळे तो याकडे आकर्षित झाला होता. पण त्याची अध्यात्माची ओढ तशीच कायम होती. ती कमी नाही झाली. ईश्वर विषयक जिज्ञासा पण कायम होती. उलट जस जसे वाचन होत होते, अनुभव मिळत होता तसतसे त्याची चिकित्सक वृत्ती जास्तच धारदार झाली होती. कारण त्याच्या अंत:करणात अध्यात्मिकतेचा नंदादीप लहानपणापासून सतत तेवत राहिला होता. याही काळात त्याची ध्यानधारणा चालूच होती.
रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर त्याला आपल्या भावी जीवनाचे प्रश्न सतावत असत. जीवनात आपण काय करावयाचे? कोण व्हायचे? आपल्याला काय साध्य करायचे आहे ? आणि मग त्याच्या डोळ्यासमोर याचे उत्तर म्हणून दोन चित्रं उभी राहत. एक म्हणजे, लौकिक जीवनात सर्वार्थाने यशस्वी आणि कीर्तीमंत झालेला कर्तृत्ववान पुरुष. ज्याच्याकडे उत्तम ज्ञान आहे, समाजात ज्याला श्रेष्ठ स्थान आहे. सत्ता अधिकार आहे. पायाशी लक्ष्मी दासी होऊन उभी आहे. असा यशस्वी पुरुष.
आणि दुसरे चित्रं म्हणजे, याच्या अगदी उलटे. अंगावर भगवी वस्त्रे घालून हातात दंड, दुसर्या हातात कमंडलू, निर्मोही, निर्लेप आणि तृप्त वृत्तीने संचार करणारा सर्वसंगपरित्यागी सन्यासी. आपण संकल्प केला तर असा सन्यासी होऊ शकू. ते आपल्याला शक्य आहे अशी त्याला खात्री पण वाटत असे. संन्यासी का यशस्वी पुरुष? असा प्रश्न आलटून पालटून त्याच्या मनात सतत येत असायचा. असा विचार करता करता केंव्हा झोप लागायची ते कळायचेही नाही.
“शय्या भूमितलं दिशो~पि वसनं ज्ञानामृतं भोजनं” असे भर्तृहरींनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘भूमी हीच शय्या, मोकळ्या दिशा हेच अंगावरील वस्त्र, आणि अमृतरूप आत्मज्ञान हेच भोजन’. असा पूर्णकाम संन्यासी एक साक्षात्कारी पुरुष असतो. साक्षात्कारी पुरुष म्हणजे ज्याला ईश्वराचे दर्शन झाले आहे तो. नरेंद्रला वाटे ईश्वर दर्शनाचा मार्ग कोण सांगू शकेल? ज्याला स्वताला ईश्वराचे दर्शन झाले आहे तोच आणि इथेच त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण होई की, आपल्याला असे सांगणारा कोणीतरी भेटावा ज्याने देव पहिला आहे. अशी तळमळ त्याला सतत अस्वस्थ करीत असे. जे अधिकारी व श्रेष्ठ असे भेटत त्यांनाही तो जाऊन थेट प्रश्न विचारात असे. हे जाणून घ्यायला तो व्याकुळ व्हायचा.
याच वेळी नरेंद्रच्या लग्नासाठी विषय सुरू झाला होता. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ बाबू यांनी नरेंद्रला सर्व प्रकारे सांगून बघितले, चांगली स्थळ आणली. अनेक विद्वान व वडीलधार्यांनी समजाऊन सांगितले. पण नरेंद्रचा विवाहाला नकार कायम होता.
या वयात आपल्या आयुष्याचा इतका गंभीर पणे विचार करणे खरच किती आश्चर्याची गोष्ट होती. आजचा ग्रज्युएट होत असलेला तरुण आज त्याच्या आयुष्याच्या अशा वळणावर काय विचार करतो ? भविष्याबद्दल त्याला काही अंदाज बांधता येतात का? असा विचार मनात येतो.
कडूस पडलं होतं अजून देवाला गेलेल्यांचा पत्ता नव्हता.तिनं कुलूप काढलं, जळणाचा भारा चुलीपुढं टाकला अन म्हसरं दावणीला बांधली.तेव्हा लाईटची सोय नव्हती, तिनं चिमणी पेटवली अन गोठ्यात ठेवली.रांजापशी हातपाय -तोंड धुतलं अन पदरानं तोंड पुसत देवाजवळ गेली.दिवा लावून चुलीजवळ एक चिमणी लावून टेम्भ्यावर ठेवली.राख केर भरून चुलीवर पाणी ठेवलं गावाला गेलेल्या माणसांच्या पायावर ओतायला ! आता चांगलं च अंधारून आलेलं, गोठ्यात म्हशी धडपडत होत्या, गोदून मोठी कासांडी घेऊन धार काढायला सुरुवात केली इतक्यात बैलगाडी थांबल्याचा आवाज आला.
“गोदे s भाकरीचा तुकडा आण गं…”चंपाबाईने आवाज दिला ;तशी दुधाची कासांडी घेऊन गोदा लगबगीने गोठयातून धावली.अंधारात नीटसे काही दिसत नव्हतं म्हणून तिनं चिमणी वर धरली…अंधुक चित्र स्पष्ट झालं नवऱ्याच्या कपाळाला बाशिंग बघून गोदा हादरली. तिच्या हातापायातल अवसान गळाल.
“पण नवरी कोण ?”
डोईपासून पायापर्यंत लपेटलेल्या परकाळ्यातून तिला स्पष्ट काही दिसेना.गोदूच्या सर्वांगातून सरसरून भीतीची लहर शहारली, तिचं पाय लटलट कापू लागलं, डोळ्यापुढं गच्च अंधार दाटला, अंगातून जणू जीव कुणी काढून घेतेय असं झालं.जड पावलांनी तिने आत जाऊन भाकरीचा तुकडा आणला अन नवरा नवरीवरून उतरून टाकला. पायावर पाणी घातलं. उंबऱ्यातून आत आल्यावर पर काळ्यातील चेहरा नीट दिसला अन ती चरकली, “ही तर धुरपा ! चंपा आत्यानं डाव साधला तर!” गोदाला काही सुचेना अनपेक्षीत धक्क्याने गोदाच्या अंगातील त्राण नाहीसे झाले तिला हुंदका अनावर झाला पण पदराने तोंड दाबून धरून अंधारल्या कोपऱ्यात तिनं आसवाना वाट करून दिली. तिची एकुलती एक आशा दुर्दैवाच्या अंधारात विलीन झाली.
चंपाबाईने घरातून बक्कळ दूध, शेवया, तूप गूळ आणून नवरा नवरीला खायला घातल्या.देवाच्या आणि थोरल्या माणसांच्या पाया पडून गोदाच्या सवतीचा संसार सुरु झाला. गोदा कोपऱ्यात बसून सगळं टिपत होती.आज तिच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं किंवा तितकी गरजही नव्हती.गोदूच्या परवडी ला इथूनच सुरुवात झाली. तीच्या आसवाना थोपवायला अंधाराशिवाय कुणी नव्हतं, तिला एकदम परकं परकं वाटू लागलं.’कधीतरी आपली कूस उजवल ही भाबडी आशा मेली.दिवसभराचा कामाचा शीण आणि डोळ्यापुढला अंधार.. गोदू अस्वस्थ झाली, तिथंच पटकारावर ती आडवी झाली पण तिची झोप उडली होती, आडात जाऊ की विहिरीत उडी टाकू ?तिला काही कळेना.भल्या पहाटे दाराची हलकेच कडी काढून गोदूने माहेरचा रस्ता धरला.
एव्हाना गावभर बुवाच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.जेमतेम शे- दोनशे लोकवस्तीच गाव, वरच्या आळीला पाणी सांडलं तर वगुळ ईशीपर्यंत जायचा ! गोदीच्या भावाच्या कानावर ही गोष्ट गेलीच पण जगराहाटीत तो एकटा थोडाच वेगळा होता ?बुवाच्या जागी तो असता तर त्यानं पण तेच केलं असतं ! गोदूची मनःस्थिती ओळखून तो शांत राहिला, आठ दिवस गोदुला ठेऊन घेऊन चार समजुतीच्या गोष्टी सांगून गोदुला घेऊन भाऊ सासरी आला अन गोदुला परत सासरघरी सोडून परत फिरला.
“गोदे, तू बी आपलीच हैस, दुघी बी गुण्या गोविंदानं भनी भनी हून नांदा, डोसक्यात काय राख घालू नकू, धुरपी तुजी धाकली भण म्हणून पदराखाली घे.” चम्पाबाईन समजूत घातली. ” असं करा, धुरपी घर सांभाळल अन तू दार -मंजी गुरढोर जळण -काटूक, सांडलं -लवंडल..”
आत्याबाईंनी दुजोरा दिला.गोदुला कुणाबर बोलायची इच्छा नव्हती.सगळ्यांनी तिचा घात केला होता, तिच्या संसारात इस्तु पुरला होता.तिनं टोपल्यातली भाकरी फडक्यात गुंडाळली अन गुरांना सोडून ती रानात निघाली.आता फक्त पोटावारी राबणारी ती एक राकुळी होती वांझोटपणाचा शिक्का बसलेली..भाकड जनावरासारखी !
वर्षात धुरपीचा पाळणा हलला अन आधीच घरादाराची लाडकी धुरपी अजूनच कौतुकाची झाली कारण बुवाच्या वंशाला दिवा मिळाला होता.गोदी अजूनच आपलेपणा पासून दूर फेकली.गोदीनं एक दिवस पाळण्यातलं बाळ उचलून कडेवर घेतलं त्याचं पटापट मुकं घेतलं, गोदुला मायेचा पान्हा फुटला, प्रेमाचा पाझर हृदयात ओसंडून गेला इतक्यात धुरपी ओरडली…”अग अगं ठेव त्याला खाली..तुझ्या वांझोटीची नजर हुईल तेला..” गोदिला असंख्य नांग्या दंश करून गेल्या, तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं; पण तिनं स्वतःची समजूत घातली, परिस्थितीशी जुळवून घेतलं होतं. धुरपीला लहान बहीण म्हणून धरलं होतं गपचूप बाळाला पाळण्यात ठेऊन ती बाहेर गेली.
धुरपी पक्की होती. आणि चंपात्तीचा बळकट आधार होता. तीनं नवरा, सासू सासरे घर दार सगळंच कब्जात ठेवलं होतं अन गोदुला मोलकरीण म्हणून! गोदुन आपलं बाजलं गोठ्यातच एका कोपऱ्यात ठेऊन दिलं होतं.गुरं चारून येऊन गोठ्यात बांधायची, दिलं तेव्हढं खायचं न गप बाजल्यावर येऊन पडायचं.
दिवस जात होते त्यांच्या गतीनं, धुरपीन अजून दोन मुलांना जन्म दिला, घरदार धुरपीवर खुश होतं.यशोदाबाई अन मालक काशीला गेलं अन तिकडंच पटकीच्या साथीत सापडून संपलं.धुरपी आता सगळ्यांची मालकीण झाली.चम्पा आत्ती पाठिंब्याला भक्कम होती.घरात धुसफूस वाढली, धुरपी गोदुला नीट खायला प्यायला दीना की धडूतं !मरमर काम करून पोट भरंना की गोदी बोलायची.गोदीच तोंड दिसायचं पण धुरपीचा आतला खेळ कुणाला समजत नव्हता.घरातली भांडण एके दिवशी इशीत गेली आणि बुवानं गोदिला चाबकाने फोडलं ;धुरपीला तेच हवं होतं.उपाशी अनुशी गोदी कळवळत गोठ्यात जाऊन झोपली.
त्यादिवशीपासून धुरपीला जास्तच चेव चढला अन मुद्दामच गोदीला ती पाण्यात पाहू लागली.मरमर दिवसभर गुरांचं केलं तरी तिला वाटीभर दूध खायला मिळत नव्हतं का पोटभर अन्न मिळत नव्हतं.धडुत म्हणलं तर वर्षातून एक माहेरचं कोरं लुगडं मिळायचं ते फाटलं की धुरपीच जुनं चिंधकाला चिंधुक जोडून गोदी चालवायची.दिवस कुठलेच घर बांधून रहात नाहीत त्यांच्या गतीने ते कधी चालतात कधी पळतात.धुरपीची पोरं मोठी झाली पण त्यांना कष्टाची सवय लागली नाही.हळूहळू जमिनी कुळांच्या घशात जाऊ लागल्या.पोटभर चांगलं चुंगल खाणे, परीट घडीची कपडे घालून गावकी अन राजकारण यातच पोरांचे दिवस जात होते.दुष्काळ पडला अन्न अन्न होऊ लागले अन होती नव्हती तेवढी जमीन सावकाराकडे गहाण पडली.राहतं घर तेवढंच सुरक्षित राहिलं.कुणी म्हणायचे, ‘गोदी ची हाय लागली, ‘ कुणी म्हणायचं, ‘ चंम्पिची शिकवण भारी पडली.’गुरासारख्या कष्टानं गोदीची हाड कातडं एक झालं.
दुष्काळ सम्पला, पोरांची लग्न लागली.धुरपीच्या सुना कष्टाळू होत्या कुणी रोजगार करी, कुणी जनावरे हिंडवी आणि परपंच पुढं चालवत ;पण मुलं बाळं झाल्यावर कमतरता भासू लागली, धुसफूस वाढली, प्रत्येकानं मग आपली चूल वेगळी केली.बुवा न दोन बायका एकीकडं अन बाकी पोरं दुसरीकडं अश्या माणसांच्या पण वाटण्या झाल्या.
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर विचारणीय व्यंग्य ‘लाउडस्पीकर और हम’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 139 ☆
☆ व्यंग्य – लाउडस्पीकर और हम ☆
लाउडस्पीकर की ईजाद इसलिए हुई थी कि दूर बैठा कोई आदमी यदि बात को सुनना चाहे जो वंचित न रहे। लेकिन अब लाउडस्पीकर का प्रयोग ऐसी बातों को हमारे कान में ठूँसने के लिए होता है जिन्हें हम सुनना नहीं चाहते।
दिन के कोलाहल में तो हम इस ज़ुल्म से बच लेते हैं, लेकिन रात को बचने का कोई रास्ता नहीं रहता। रात को शहर सन्नाटे में होता है। दो मील दूर की आवाज़ भी साफ सुनाई देती है। हम आधे नींद की आगोश में होते हैं। तभी वह शुरू होता है— ‘ठक ठक’ ‘हेलो माइक टेस्टिंग, वन टू थ्री फोर।’
और इसके बाद, ‘हाज़रीन, अब मैं आपके सामने शहर के मशहूर गायक तानसेन को पेश करता हूं, जिनकी आवाज़ में मुकेश की खनक, रफी की लोच और तलत का सोज़ है। तो सुनिए हाज़रीन, मशहूर गायक तानसेन को।’
मशहूर गायक तानसेन आते हैं और खाँसने खूँसने के बाद मुकेश, रफी और तलत की सामूहिक कब्र खोदना शुरू कर देते हैं। हम अपनी खटिया पर छटपटाते हैं क्योंकि बच निकलने का कोई रास्ता नहीं होता। मेरे जैसे लोग जिन्हें थोड़ा सुर ताल का ज्ञान है और भी ज्यादा कष्ट भोगते हैं।
उद्घोषक महोदय ऐसे उतार-चढ़ाव और ऐंठी ज़ुबान में घोषणा करते हैं जैसे अमीन सायानी के असली वारिस वे ही हों।
किसी रात को पुरुष स्वरों में कोई सोहर शुरू हो जाता है। खासे बेसुरे कंठ हैं लेकिन शुरू हो जाते हैं तो खत्म ही नहीं होते। जच्चा-बच्चा को मेरी हार्दिक शुभकामनाएँ, लेकिन सोचता हूँ भगवान ने कान दिये तो कान के ढक्कन क्यों न दिये? कान को दुनिया का कचरादान बना दिया।
रात को गाने वाला बड़े फायदे में रहता है। दिन को तो शायद उसे आठ श्रोता भी न मिलें, लेकिन रात को उसे अपनी-अपनी खटिया पर अवश पड़े आठ दस लाख श्रोता मिलते हैं। मैं कल्पना करता हूँ कि इस गायक के सामने कितने श्रोता होंगे? दो चार होंगे? या फिर वह हमीं खटिया वालों को लक्ष्य करके अँधेरे में तीर मार रहा है?
कहीं से ‘हेलो हेलो’ के बाद कोई पाँच छः साल के चिरंजीव गाने लगते हैं—‘ऐं ऐं मेरे अंगने में। ऐं मेरे अंगने में।’ फिर माइक पर कुछ झगड़ा सुनाई पड़ता है— ‘अब हम गायेंगे।’ ‘नहीं, अभी हम गायेंगे।’ फिर कोई दस बारह साल वाली कुछ मोटी आवाज़ शुरू हो जाती है।
कभी किसी लड़की की शरमाती, झिझकती आवाज़। कल्पना कर सकते हैं कि कैसे नाखून से ज़मीन को खुरचते हुए, सिर झुकाये गा रही होगी। ठीक है भई, पिताजी ने लाउडस्पीकर के पैसे दिए होंगे। गाओ, खूब गाओ। सुनने के लिए हम तो हैं ही।
कहीं किसी विदुषी का प्रवचन चल रहा है— ‘ईश्वर में बिलीव किए बिना मुक्ति नहीं मिलेगी। यह माया सब यूज़लेस है। इससे अपने को मुक्त होना है, फ्री होना है। ईश्वर की शरण में आये बिना पीस और हैपीनेस नहीं मिलने वाली। यह बच्चे क्यों डिस्टर्ब कर रहे हैं? बिल्कुल साइलेंट हो जाइए।’
किसी कोने में कोई नेता गरजते हैं। सब वही बातें जिन्हें सुनते सुनते हम बौरा गये। उन शब्दों के अर्थ घिस गये, लेकिन उन्हीं सिक्कों को चला रहे हैं। विपक्ष की खिंचाई कर रहे हैं, चीख रहे हैं, चिल्ला रहे हैं।
यह सारे भयानक स्वर हमारे कानों से टकरा रहे हैं, नींद हराम कर रहे हैं, चैन हराम कर रहे हैं। समझना मुश्किल है कि ये स्वर शहर के किस कोने से आते हैं।
इस अत्याचार से यह साबित होता है कि लाउडस्पीकर सिर्फ चोंगा ही नहीं है, वह एक हथियार भी है। जिस को परेशान करना हो उसके घर की तरफ लाउडस्पीकर का चोंगा घुमा दो और दो दिन तक चौबीस घंटे चालू रखो। यंत्रणा देने का यह नायाब तरीका है। चोंगे का शिकार बचकर जा भी कहाँ सकता है? ‘हम हाले दिल सुनाएंगे, सुनिए कि न सुनिए।’
हमारी कोई खुशी लाउडस्पीकर बजाये बिना पूरी नहीं होती। भाषण के लिए लाउडस्पीकर अनिवार्य है, भले ही कमरा इतना छोटा हो कि श्रोताओं से फुसफुसा कर भी बात की जा सके। दूसरी तरफ ऐसे शूरवीर हैं जो आठवीं संतान के जन्म पर भी भोंगा लगा लेते हैं।
इसलिए लाउडस्पीकर के अत्याचार से निजात पाना आसान नहीं लगता। सुनते रहो और दाँत पीसते रहो। पीसते पीसते दाँत टूट जाएंगे। इटली में पीसा की झुकती हुई मीनार के आसपास मोटर के हॉर्न बजाने पर प्रतिबंध लगा दिया गया था ताकि शोर के दबाव से मीनार और न झुक जाए। लेकिन यहाँ आवाज़ें मीनार से ज्यादा कीमती आदमी की दुर्गति कर रही हैं।