मराठी साहित्य – विविधा ☆ करोनाचे धडे…☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ करोनाचे धडे… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

थांब……

तुला शिकवीन चांगलाच धडा…

तुझ्या पापाचा भरलाय घडा….

असं म्हणत कोणीसं आलं… ती नक्कीच फुलराणी नव्हती… पुरुषाच्या आवाजातला राक्षस होता तो! ‘करोना’ नाव त्याच!! ‘ती फुलराणी’ नाटकातील मंजुळेचं फर्मास स्वगत ऐकलेले आम्ही लोक.. या करोनाच्या भयावह स्वगतानं हादरून गेलो. फुलराणी स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रह्मघोटाळ्यात सापडलेली होती, तर करोनानं आम्हालाच ब्रह्म संकटात टाकलं……

‘ये करो ना’ ‘वो करो ना’ असे धडे देत या अतिसूक्ष्म विषाणूनं आम्हाला हैराण करून टाकलं. फुलराणीनं अशोक मास्तरच्या नावानं जितकी बोटं मोडली नसतील तेवढी आम्ही याच्या नावाने रोज मोडतोय हल्ली… अगदी फसवा आणि मायावी राक्षस आहे हा! आपले अणुकुचीदार दात विचकत आला आणि काही न बाइंच बोलत सुटला….

माणसा रे माणसा तू असा रे कसा?

भोग कर्माची फळं रडत ढसाढसा.

आमचं काय चुकलं म्हणून शाप देतोय हा आम्हाला? हो, आणि हा कोण आमच्याविषयी अभद्र बोलणारा? आमच्या प्रश्नार्थक मुद्रेकडं बघून लगेच म्हणाला, ‘पेराल तसे उगवेल’ आमच्या सगळं डोक्यावरून गेलं. आता त्यांनं आमचा माजच काढला.

माज तुझा उत्तरला तरी अजून तोरा

भिकेला लागशील सुधार जरा पोरा.

एव्हाना आमचा माज उतरला होता.आम्ही त्याला साक्षात दंडवत घातला. गयावया करून हात जोडले. क्षमा मागून, आमचे काय चुकले? असा प्रश्न विचारला. आम्ही शरणागत झालेलं पाहून विजयी मुद्रेनं तो आता गझल गाऊ लागला.

युही बेसबब न फिरा करो

कोई शाम घर मे भी रहा करो

कोई साथ भी न मिलेगा जो गले लगोगे

ये नये मिजाज का शहर है

जरा फासले से मिला करो.

आमच्या घराघरात नांदणारा मना-मनाला दुखवणारा नाती संपुष्टात आणणारा हा राक्षस आणि त्याचा डाव आम्ही ओळखला. तो आम्हाला आमच्या आप्तस्वकीयांना भेटायचं नाही असा कायदा करतोय याचा आम्हाला राग आला त्याचा हा कायदा आम्हाला नामंजूर होता पण काय करणार अडला नारायण….

आता तो निसर्गाचे गुणगान गायला लागला आणि आम्हाला कोसू लागला.

निसर्गाला धरलयंस वेठीला

कंटाळलाय तो तुझ्या अत्याचाराला

कळत कसं नाही तो सूड उगवतोय

कृतघ्न तू तुला धडा शिकवतोय.

निसर्गाला शरण यायला हवं हा धडाच तो शिकवत होता. मनोमन पटलं देखील! निसर्ग  सर्वांना समान वागणूक देणारी सर्वश्रेष्ठ देवता…. आम्ही पुन्हा हात जोडले.

करोना राक्षसाचे आमच्यावरील आरोप म्हणजे जणू एक एक परमाणूच!

माणसानंच माणसाला डंख मारलाय

माणुसकीलाच संपवलस तू .

मोठा समजतोस स्वतःला

असा रे कसा निर्दयी तू?

त्याचा रोख आमच्याच एका प्रजातीकडे आहे हे आम्ही ओळखलं पण त्यात आमचा काय दोष? ओल्याबरोबर सुकंही जळतं म्हणतात ना? तेच खरं.

पहिली लाट माझं येणं

दुसऱ्या लाटेवर स्वार होणं

तिसऱ्या लाटेची भीती असणं

याचं कारण तुझं वागणं

प्रत्येक गोष्टीला तो आम्हाला जबाबदार धरत होता. आम्ही एकमेकाकडे बघू लागलो,स्वतःलाही निरखू लागलो.

शेतकरी तुझा पोशिंदा

शेतात झालाय क्वारनटाईन

निसर्गावर निर्भर तो

झालांय अगदी हवालदिल

खरंच अन्नदाताच तो! त्याला आम्ही कशी वागणूक देतो? त्याच्या अशिक्षित असण्याचा कसा फायदा घेतो? त्याच्या श्रमाची किंमत आम्ही कशी करतो? आम्ही आता लाजून मान खाली घातली.

चंगळवादाचं प्रतीक तू

गरज तुझी संपत नाही

ओरबाडून घ्यायची तुझी वृत्ती

शोषण करायची तुझी प्रवृत्ती

आम्ही गरजेपेक्षा जास्त साठवतो,नासवतो, वाया घालवतो हे आमच्या लक्षात आलंच आहे.आमची झुकलेली मान वर येईचना..

ओढवलेली आर्थिक मंदी

विनाशाची ही तर नांदी

परिस्थिती कोलमडली

मानसिकता बिघडली

आमच्या संसाराचं गणित खरंच बसेना झालंय.ओढाताण व्हायला लागलीये. राक्षस खरंच बोलत होता.

पैसा नाही सर्व काही

माणुसकी असे मोठी

संस्कृती परंपरा प्रथा यांचा

संचय हवा तुझ्या गाठी.

रग्गड पैसा असूनही एकाच तिरडीवर अनेक देह जळत असलेले आम्ही याची देही याची डोळा पाहतो आहोत राक्षस आमचे डोळे उघडू पाहत होता.राक्षसाचा सूर आता समजावणीच्या झाला होता त्यामुळे आमच्याही डोक्यात थोडं थोडं शिरायला लागलं होतं.

आरोग्याला प्रथम मान

अन्नपूर्णेचा करा सन्मान

समतोल आहार नियमित व्यायाम

हाच आहे खरा आयाम

आरोग्याची त्रिसूत्री सांगायलाही तो विसरला नाही आता आम्ही पद्मासन घालून बसलो.

राग लोभ मोह मत्सर

सर्वांना आवर घालून

निर्मळ विचारांना आत घे

मनाचं कवाड उघडून

राक्षस अध्यात्म शिकवू लागला होता.ज्याची आता आम्हाला खरंच गरज होती. आम्ही तल्लीन होऊन ऐकू लागलो.

जान है तो जहान है

मंत्र मोठा या घडीला

डॉक्टर देतात जीवाला जीव

स्वतःचा जीव लावून पणाला

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असं ज्यांचं वर्णन करावं ते डॉक्टर रोज संकटयुद्धावर असतात. आम्ही सुरक्षित घरात बसतो. याचा विचार न करता आम्ही जे मारहाणीचे प्रकार अवलंबले आहेत,ते पाप आम्ही कुठे फेडावं? आम्ही दोन्ही गालांवर चापट्या मारून तोबा तोबा केलं.

आत्मनिर्भर तुझ्या देशांनं

सिद्ध केलं स्वतःला

सकारात्मक विचारसरणीचा

धडा दिला महासत्तांना

देशाभिमानाची जाणीव झालेल्या आम्ही मान वर केली. जयहिन्दचा नारा लावला. ऊर भरून आलं आमचं..

तुझा ग तुझा म तुझा भ तुझा न…..

असं म्हणत तो आमच्या भोवती फेर धरून नाचू लागला. तो आता आणखी कोणता धडा शिकवणार याकडं आमचं लक्ष लागून राहिलं होतं

लाव पणाला शास्त्र तुझं सोडून भूक-तहान

लाव सत्कारणी वेळ तुझा द्याया जीवनदान

स्वयंसूचना ऐकून तू वाचव हा जहाँ

दे नारा अभिमानानं मेरा भारत महान

असे अनेक धडे देणारा असा हा करोना राक्षस,’विश्वात शांती नांदावी म्हणून पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना स्मरा’ असं तर सांगत नाही ना?

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं – या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला. आता इथून पुढे)

त्याला पहिलंबक्षीस तर मिळालंच, पण त्यानंतर जो घरी येईल, त्याच्या पुढे मिहीरचा कीर्तनाचा लाईव्ह शो सुरू झाला. त्याच्या महेश मामानी जेव्हा हा शो पाहिला, तेव्हा त्याच्या मनात आलं, यंदा मे महिन्याच्या सुट्टीत पोराकडून अध्र्या-पाउण तासाचं कीर्तन बसवून घेतलं पाहिजे. पण मग हा कार्यक्रम ठरला, मग मामाला वाटलं,  या कार्यक्रमासाठीच त्याचं कीर्तन बसवून घ्यावं. कार्यक्रमात एक वेगळेपणा.

महेश,  मालतीचे वडील काळेबुवा प्रख्यात कीर्तनकार. त्यांचे घराणेच कीर्तनकाराचे. गावोगावी कीर्तन करत ते फिरायचे. घरची थोडी शेतीही होती. उत्सव, जत्रा-यात्रांच्या वेळी त्यांना कीर्तनासाठी खूप निमंत्रणे यायची.

काळेबुवांना पाच मुले. चार मुली आणि महेश एकटाच मुलगा. तो बारावी पास झाला आणि त्याने डी.एड. केलं. मग गावातल्याच प्राथमिक शाळेत नोकरीला लागला.  शाळेत नोकरी करत करत त्याने गावातल्या शेतीतही लक्ष घातले आणि घराण्याची कीर्तनाची परंपराही जपली. त्याने वडलांसारखं पूर्ण वेळ कीर्तनाला वाहून घेतलं नसलं, तरी अनेक वेळा, अनेक निमित्ताने तो कीर्तन करी. याशिवाय गावात असेल तेव्हा दररोज रात्री सात ते आठ या वेळात कीर्तन करी. कीर्तनाची जुनी परंपरा त्याने जपली असली,  तरी त्याने कीर्तनाचा बाज मात्र बदलला होता. अर्थात् कीर्तनातील रसवत्ता त्याने कायम ठेवली होती. त्याच्या कीर्तनाचे विषय आधुनिक असतात. अंध:श्रद्धा निर्मूलन,  पर्यावरण, राष्ट्रीय समस्या,  सामाजिक प्रश्न इ. विषयांवर तो कीर्तन करतअसे. आपल्या भाच्याची,  मिहीरची गायन आणि वक्तृत्वातील गती पाहून त्याने त्याला या कलेत तरबेज करायचे ठरवले. मालती भावंडात सगळ्यात लहान. उत्तम गुणाची पण सुमार रुपाची. मोठ्या तिन्ही बहिणींची लग्ने झाली. बेताच्या रुपामुळे तिच्या लग्नात, म्हणजे पसंत पडण्यातच अडचणी येत होत्या. मोठ्या बहिणींची लग्ने झालेली. घरचं सगळं तीच बघायची. घरचं संभाळून शाळेतही जात होती. ती एस. एस. सी. ला बसली आणि कुणा मध्यस्थाने मनोहरचं स्थळ सांगितलं. मुलगा कापडाचा व्यापार करतो, असं त्यांना कळलं. मालतीला त्यांनी होकार दिला. मग काळेबुवांनी मुलाची फारशी चौकशी केली नाही. तिची परीक्षा झाली आणि त्यांनी तिचं लग्न करून टाकलं. मुलीच्या जबाबदारीतून ते रिकामे झाले. यात्रा-जत्रा करायला  मोकळे  झाले.

मालतीचं लग्न म्हणजे एक प्रकारची तडजोड होती. मनोहर दिसायला सुरेख,  म्हणून तर त्याचं नाव मनोहर ठेवलं. त्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी. तो भावंडात मोठा. बाकीची भावंड त्याला आप्पा म्हणत. मग बाकीचेही त्या आप्पाच म्हणत. बाकीचे भाऊ चांगले शिकले, पण मनोहर मात्र फारसा शिकला नाही. स्वभावाने गरीब. लोकं सांगतील ती कामं करायचा. इतरांच्या मदतीला धावायचा. पण शालेय शिक्षणात मात्र त्याला गती नव्हती. बाकीचे भाऊ शिकेशिकेपर्यंत वडील गेले. पुढे ती भावंड नोकरीला लागली. आपापल्या नोकरीच्या गावी निघून गेली. त्यांची लग्न-कार्य झाली. मनोहर काहीच मिळवत नव्हता. घरची इस्टेटही नव्हती. मग याचं लग्नं कसं करायचं? तोपर्यंत कुणी तरी त्याला एका कापड विक्रेत्याकडे नोकरी मिळवून दिली. त्याने बाजारच्या दिवशी रस्त्यावर याला कापड व तयार कपडे विकायला बसवलं. विक्री होईल, तसे पैसे. जवळपासच्या ज्या गावचा बाजार असेल, तिथे तो कपड्यांची गाठोडी घेऊन जायचा आणि बाजारात विकायला बसायचा. आता अशा मुलाला मुलगी तरी कोण देणार? काळेबुवांच्या कीर्तनाला येणार्‍या एका कापड व्यापार्‍याने त्यांना मनोहरचं स्थळ सांगितलं. मालती त्यावेळी एस. एस. सी. ला बसली होती. मनोहरच्या आईला वाटलं, मुलगी सुमार रुपाची असेना का, एस. एस. सी. होईल. नोकरी करेल. मुलाचा संसार मार्गी लागेल. त्यांनी सामान्य रुपाची मालती पसंत केली आणिमनोहरचं लग्न लावून दिलं. पण त्यांची मनिषा काही पूर्ण झाली नाही. मालती पास झाली नाही. पुन्हा आक्टोबर, पुन्हा मार्च ती परीक्षेला बसली,  पण गणित, इंग्रजीनं तिच्या यशाचा मार्ग रोखून धरला, तो धरलाच. इंदूतार्इंचा हिरमोड झाला. आता त्यांना प्रत्येक कामात मालतीच्या चुका दिसू लागल्या. त्या` ‘वेंधळी’  म्हणूनच तिला हाक मारत. त्या आरडा-ओरडा करायला लागल्या,  की ती आणखीनच गोंधळून जाई. खरं तर लग्नाच्या आधीही घरात ती सगळं करायची. पण इंदूतार्इंना तिचं काहीच पसंत पडत नसे. नावडतीचं मीठ आळणी म्हणतात ना! मनोहरची कमाई खात्रीची नव्हती. एक दिवस इंदूतार्इंनी दोघांना घराच्या बाहेर काढलं. `तुमचं तुम्ही मिळवा आणि तुमचं तुम्ही खा.’ त्या म्हणाल्या.

`पण आई आम्ही जायचं कुठे?’ मनोहर म्हणाला.

`कुठेही जा. दाही दिशा मोकळ्या आहेत तुम्हाला. नाहीच कुठे थारा मिळाला तर मष्णात जा.’  मालतीच्याबाबतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. त्याचं वैफल्य जहरी शब्द घेऊन बाहेर पडत होतं. `साधं एस.एस.सी. होता नाही आलं तुला.’

आता मात्र मालतीदेखील चिडली. शब्दाने शब्द वाढले. वादाचं भांडणात रुपांतर झालं.

मालती म्हणाली, `मी एस. एस. सी. पर्यंत तरी आले.  तुमच्या मुलाला सातवीच्या पुढे ही जायला जमलं नाही. मुलगा व्यापार करतो,  म्हणालात. रस्त्यावर बसतो, नाही म्हणालात. फसवलंत तुम्ही आम्हाला.’

`आणि एक दिवस…’ मिहीरचं निरुपण चालू होतं. वसूची कथा तो आख्यानातून ऐकवत होता. `एक दिवस त्या महामायेने,  त्या कडकलक्ष्मीने, वसूच्या सासूने, वसुंधरेला हाताला धरून घरातून बाहेर काढलं…. पण वसू डगमगली नाही. भावाला जेव्हा हे कळलं,  तेव्हा तो वसूला म्हणाला, `घरी चल. अर्धी, तिथे चतकर भाकरी खाऊ, पण एकमेकांना धरून राहू.’  त्यावर वसू म्हणाली, `भाऊराया, मला माहीतआहे,  मला ठेच लागली,  की तुझ्या डोळ्यात पाणी येतं. पण अरे,  माहेर किती  दिवसांचं? ‘ वसू पुढे म्हणाली, `असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली’… माहेर सुखाचं खरं, पण किती काळ? `क्षणभरी पहुडाया अनंताने हंतरली.’  बरं का श्रोते हो, एक अहिराणी ओवी आहे. माहेर कशासाठी? .. तर… `पावलीनी चोळी, एक रातना विसावा…’

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ओतून दिलेला चहा मोरीत  वाहत होता .पाण्यात मिसळून त्याचा रंग बदलत होता ,मी टक लावून पाहत होतो.पाहता पाहता मी माझ्या बालपणीच्या आठवणीत केव्हा गेलो कळलेच नाही……….

सकाळ झाली की आमचा सर्व भावंडांचा घोळका अंगणातील चुली भोवती जमायचा .लाकडे पेटवून या चुलीवर पाणी गरम करणे,सकाळचा चहा हे सर्व सोपस्कार याच चुलीवर व्हायचे.पण खरं तर या चुलीचा फायदा हिवाळ्यात हात शेकण्यासाठी व चर्चा करण्यासाठी अधिक व्हायचा.कधी कधी याच चुलीवर गोवऱ्यांच्या राखेत  भरतासाठी वांगी किंवा हुरड्याची कणसे भाजली जायची .पण आमच्यासाठी रोजचा आनंददायी प्रसंग म्हणजे सकाळचा या चुलीवर तयार होणारा चहा.आम्ही सात बहीण भाऊ,आत्या आई बाबा आणि वेळेवर येणारा आगंतुक असा दहा बारा लोकांचा चहा आमची आई मांडायची,चहा मांडायची म्हणजे गंजात तितके कप पाणी टाकायची,त्यात रेशन दुकानातून मिळालेली दोन मुठी साखर टाकली जायची. त्यात ब्रुक ब्रँड कंपनीची फुल छाप चहापत्ती टाकली जायची.या चाहापत्तीच्या  दहा पैसे किमतीच्या पुड्या किराणा दुकानात मिळायच्या.शिलाई मशीन द्वारा या पुड्यांच्या माळा कंपनीचं बनवीत असे, दिवाळीतील उटण्याचा पुड्या प्रमाणे त्या दुकानात लटकलेल्या असतं. आमच्या आईचं गणित असे होते की एका वेळेसच्या चहा साठी एक पुडी टाकायची ,असे हे लाल रसायन चुलीवर उकळायचे,लवकर उकळी यावी म्हणून आम्ही भावंडं फुंकनिने फुंकून जाळ वाढविण्याचा प्रयत्न करायचो. उकळी येईपर्यंत चहाकडे पहात राहणे हा आम्हासाठी आनंददायी अनुभव असायचा.सुरवातीला बुडबुडे यायचे नी मागून उकळीचा भोवरा.तो पर्यंत कुणीतरी दहा पैशाचे दूध ग्लासात विकत आणले असायचे ,ते चहाच्या रसायनात टाकले की बस चहा तयार…..चहा तयार झाला की आम्ही भावंडं आपापली भांडी पुढे करायचो.बहुदा त्या मोठ्या वाट्या असायच्या.मोठ्यांना कपबशी भरून चहा दिला जायचा त्याचा आम्हाला हेवा वाटायचा.आम्हाला त्यामुळे कमी चहा मिळेल असे उगीच वाटायचे.आमच्या भांड्यात आईने थोडा जास्त चहा टाकावा म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असायचा.त्यात भांडणे व्हायची व एखाद्याचा चहा सांडायचा मग सर्व भावंडं त्याला आपला थोडा थोडा चहा दयायचे.  रात्रीच्या शिळ्या पोळ्या मग आम्ही या चहात तुकडे करून टाकत असू.थोड्या वेळात त्या मस्त नरम होत.त्याचा आस्वाद आम्हाला अमृततुल्य वाटायचा.

चहाचा एक थेंबही वाया जात नसे.भलेही या चहात भरपूर दूध, विलायची,मसाले अद्रकं नसेलही पण आम्हाला फरक पडत नसे.त्यामुळेच कदाचित आज मोरीत टाकलेल्या चाहाबद्दल हळहळ वाटली असावी.पोरांना चहाची खरी किंमत व आनंद कसा कळेल.चूक त्यांची नाही,गरिबी त्यांच्या वाट्याला आलीच नाही.         

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गभस्तिनी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गभस्तिनी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

गभस्तिनी ही महर्षि दधीचि  यांची पत्नी, महर्षी अगस्ती यांची मेहुणी व लोपामुद्राची बहीण होती. उत्तर प्रदेशात नैमिषारण्याजवळ सीतापुर येथे दधीची ऋषींचा आश्रम होता. पतीसमवेत ती आनंदाने रहात होती. आश्रमाजवळ अनेक वृक्ष पक्षी व प्राणी होते. त्यांच्यावर हे पती-पत्नी खूप प्रेम करत. आश्रमात कोणीही आले तरी गभस्तिनी  आनंदाने त्यांचे स्वागत करत असे. दाधीचि ऋषींच्या हाडांमध्ये वज्र तेज होते. वृत्रासुर राक्षसाचा वध करण्यासाठी इंद्रादी देवांनी त्यांना अस्थि दान करण्यास सांगितले. ऋषींनी आनंदाने अस्थिदान केले. कामधेनूने त्यांचे सर्व मांस चाटून टाकले. तिथे फक्त त्यांचे केस आणि त्वचा उरली. त्यावेळी गभस्तिनी गंगा नदीचे पाणी आणण्यासाठी गेली होती. ती परत आल्यावर तिला आपले पती दिसेनात. तिने अग्नीला विचारले माझे पती कुठे आहेत? अग्नीने सर्व प्रसंग सांगितला. तिला खूप वाईट वाटले. ती पतिव्रता होती. मी आता सती जाणार असे तिने सर्वांना सांगितले. परलोकात मला माझे पती भेटतील असे ती म्हणू लागली. इंद्राने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तू गरोदर आहेस. तुला सती जाण्याचा अधिकार नाही. पण ती अत्यंत हुशार होती. आपल्या ज्ञानाच्या सहायाने तिने कुणाचीही मदत न घेता स्वतःचा गर्भ स्वतःच बाहेर काढला. व पिंपळाच्या झाडाकडे गेली. खरं तर तिथे खूप वृक्ष होते. पण पिंपळ हा सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे तो 24 तास प्राणवायू बाहेर टाकत असतो. त्याची पाने फुले फळे खाण्यायोग्य असतात याचे पूर्ण ज्ञान तिला होते. तिने आपला गर्भ पिंपळाला अर्पण केला व सांगितले या माझ्या होणाऱ्या बाळाला भाऊ बहीण नाहीत. तूच त्याचे पालन पोषण आणि रक्षण कर. व तिने अग्नीला वंदन केले. स्वतःच चिता रचली. व पतीचे केस आणि त्वचा यासह तिने अग्निप्रवेश केला. तिची आज्ञा शिरसावंद्य मानून पिंपळ वृक्षाने त्या गर्भाची देखभाल पालन पोषण केले. नऊ महिने होताच त्यातून एक बालक जन्माला आले. पिंपळ वृक्षाची पाने फुले फळे खाऊन ते वाढू लागले. तेच पिप्पलाद ऋषी.

गभस्तिनीला आपले बाळ पाहता आले नाही. पण बाळाच्या जन्माची पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी पिंपळ वृक्षाकडे सोपवून पतीबरोबर सती जाणे हा पत्नीधर्म तिने  निभावला. आजचे टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेट मदर, सिझेरियन हे तंत्रज्ञान तिच्या अगाध ज्ञानापुढे फिके आहे. अशी ही न भूतो न भविष्यती आदर्श पत्नी आदर्श माता. कोटी कोटी नमन

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#118 ☆ अभी थे वे, अब नहीं है…..☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत हैं एक भावप्रवण कविता “अभी थे वे, अब नहीं है…..”)

☆  तन्मय साहित्य  #118 ☆

☆ अभी थे वे, अब नहीं है….. ☆

अभी थे वे, अब नहीं है

जिंदगी का, सच यही है।

 

आज तो उनने, सुबह की चाय पी थी

और सब को, रोज जैसी राय दी थी

सुई-धागा हाथ में ले, सिल रहे थे,

बाँह कुर्ते की फटी, निरुपाय सी थी।

उलझते से, क्षुब्ध टाँके

कुछ कहीं, तो कुछ कहीं है

जिंदगी का सच यही है….

 

कह रहे थे, काम हैं कितने अधूरे

कामना थी, शीघ्र वे हो जाएँ पूरे

हैं सभी अंजान हम अगली घड़ी से,

एक पल में ध्वस्त सब मन के कँगूरे।

एषणाओं से भरा मन

अनगिनत खाते-बही है

जिंदगी का सच यही है….

 

कल नहा कर जब,अगरबत्ती जलाई

प्रार्थना के संग, फूटी थी रुलाई

बुदबुदाते से स्वयं, कुछ कह रहे थे,

किस अजाने से, उन्होंने लौ लगाई।

दिप्त मुखमुद्रा विलक्षण

जो दिखी वह अनकही है

जिंदगी का सच यही है….

 

बुलबुले हँसते-विहँसते जो खिले ये

कौन से पल बून्द बन जल में मिले ये

क्रम यही बनने-बिगड़ने का निरंतर,

जिंदगी के सर्वकालिक सिलसिले ये।

श्वांस सेतु, बटोही का

देहावरण शाश्वत नहीं है

जिंदगी का सच यही है

अभी थे वे, अब नहीं है।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से#11 ☆ गीत – जाने किस गांव में ☆ डॉ. सलमा जमाल

डॉ.  सलमा जमाल

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 22 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक लगभग 72 राष्ट्रीय एवं 3 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन। ) 

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है। 

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर गीत  “जाने किस गांव में”। 

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 11 ✒️

?  गीत – जाने किस गांव में  —  डॉ. सलमा जमाल ?

होकर दीवानी मैं ढूंढती ही रही,

कभी इस गांव में, कभी उस गांव में ।

वो मिले ही , नहीं छुप गए हैं कहां,

जाने किस शहर में ,पेड़ों की छांव में ।।

 

इस ज़माने में उनको पाने के लिए,

मैंने सब कुछ किया, पर वफ़ा ना मिली ,

हर तरफ़ से मुझको ही शिकस्त मिली,

एक के बाद एक , हर प्यार के दांव में ।

होकर दीवानी ————- ।।

 

मुझको मंज़िल अभी तक मिली ही नहीं ,

चलते चलते अभी तक थकी ही नहीं ,

मेरे पैरों में कांटे चुभे अनगिनत ,

आज इस गांव में, तो कल उस पांव में ।

होकर दीवानी ————- ।।

 

एक ज़माना था दोनों ही दीवाने थे,

प्यार के दरिया से दोनों अनजाने थे ,

बदनसीबी नहीं है तो फिर और क्या ,

मैं हूं मझधार में ,वो जाने किस नाव में ।

होके दीवाने ————— ।।

 

मेरी राहें अलग ,उनकी मंज़िल जुदा ,

“सलमा”आज कहती है , हाफ़िज़ ख़ुदा ,

बेरहम दुनिया ने डाली हैं बेड़ियां ,

मेरे भी पांव में, उनके भी पांव में ।

होकर दीवाने ————– ।।

 

© डा. सलमा जमाल 

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – salmakhanjbp@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा- बुतयुग ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – लघुकथा- बुतयुग  ??

सारे बदहवास थे। इस तरह की बीमारी इससे पहले न देखी, न सुनी। उस लेटे हुए आदमी के अंग एक-एक कर धीरे-धीरे पत्थर होते जा रहे थे।

अचानक एक औरत की चीख सन्नाटे को चीरने लगी। एक आदमी बालों से पकड़कर औरत को लात, मुक्कों से बेदम मार रहा था। वह चीख रही थी, मदद की गुहार लगा रही थी। भीड़ चुप थी। आदमी ने हैवान की मानिंद चाकू से कई वार औरत पर किए।

औरत अब लोथड़ा थी। आदमी जा चुका था। भीड़ मर चुकी थी।

उधर शोर उठा, ‘ अरे आदमी बुत में बदल गया, आदमी बुत में बदल गया।’ लेटा हुआ आदमी ऊपर से नीचे तक पूरा पत्थर हो चुका था।

बुत युग की यह शुरुआत थी।

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ शब्द मेरे अर्थ तुम्हारे – 10 – प्रेम, युद्ध और राजनीति ☆ श्री हेमन्त बावनकर

हेमन्त बावनकर

☆ शब्द मेरे अर्थ तुम्हारे – 10 ☆ हेमन्त बावनकर

☆ प्रेम, युद्ध और राजनीति

यदि

‘प्रेम’ और ‘युद्ध’ में

सब ‘उचित’ है*

और

प्रेम, युद्ध और राजनीति में भी

सब ‘उचित’ है

इसका तात्पर्य है कि,

‘राजनीति’ में

सब ‘उचित’, ‘अनुचित’ 

और

सब ‘अनुचित’, ‘उचित’ ।

 

संभवतः

लोकतान्त्रिक समाज में

परस्पर ‘प्रेम’ के लिए

स्त्री और पुरुष का होना आवश्यक नहीं।  

‘युद्ध’ के लिए

राष्ट्रों का होना आवश्यक नहीं।  

और

परस्पर ‘राजनीति’ के लिए भी

राष्ट्रों का होना आवश्यक नहीं।  

 

संभवतः

लोकतान्त्रिक समाज में

धर्म, जाति और मानवीय संवेदनाओं  

की भुजाओं से निर्मित

‘त्रिकोण’ के तीन कोण हैं

प्रेम, युद्ध और राजनीति।  

 

अब

आप स्वयं तय करें  

कि आप

‘त्रिकोण’ के अंदर हैं,

‘त्रिकोण’ के बाहर हैं

या

तटस्थ हैं।

 

  * “All is fair in love in war” (प्रेम में सब उचित है) भावना का सबसे प्रथम उपयोग 1579 में प्रकाशित कवि जॉन लिली के उपन्यास “Euphues: The Anatomy of Wit” में किया गया था।   स्त्रोत – इंटरनेट

 

© हेमन्त बावनकर, पुणे 

2 फ़रवरी  2022

मो 9833727628

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी # 17 – परम संतोषी भाग – 3 ☆ श्री अरुण श्रीवास्तव

श्री अरुण श्रीवास्तव 

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे।  उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आपने ‘असहमत’ के किस्से तो पढ़े ही हैं। अब उनके एक और पात्र ‘परम संतोषी’ के किस्सों का भी आनंद लीजिये। आप प्रत्येक बुधवार साप्ताहिक स्तम्भ – परम संतोषी   के किस्से आत्मसात कर सकेंगे।)     

☆ कथा – कहानी # 17 – परम संतोषी भाग – 3 ☆ श्री अरुण श्रीवास्तव 

जब संतोषी साहब उर्फ सैम अंकल ब्रांच में घुलमिल गये तो उनको पता चला कि यहाँ ३ और ६ दोनों तरह के महापुरुष पाये जाते हैं. 3 याने मिलनसार, मस्तमौला और मनोरंजक व्यक्तित्व के स्वामी और दूसरे विमुख और विरक्त रहने वाले आत्मकेंद्रित पुरुष जिन्हें ६ भी कहा जाता है. ३ अंक वाले तो जहाँ होते हैं, महफिलें गुलजार हो जाती हैं, विनोदप्रियता इनका सहज स्वभाव होता है जो मनोरंजन के साथ साथ सहजता भी संप्रेषित करता रहता है. लोग इनका सानिध्य और उन्मुक्त स्वभाव पसंद करते हैं. संतोषी जी स्वयं भी इसकी जीती जागती मिसाल थे और स्वाभाविक रूप से ऐसी कंपनी पसंद भी करते थे पर वे, इसे आप गुण या दुर्गुण कुछ भी कहें पर ६ अंक वालों को “मुझे तुमसे कुछ भी न चाहिए, मुझे मेरे हाल पे छोड़ दो” गाना गाने का मौका कभी नहीं देते थे.

ऐसे ६ अंक वाले सज्जन “सेल्फ कंप्लेंट सेक्शन” का प्रमुख पद पाने की योग्यता के धनी होते हैं. इनकी शिकायतें शायद जन्म से ही शुरु हो जाती हैं पर माता इसे स्वाभाविक शिशु रुदन मानकर इन्हें दुग्धपान कराते रहती हैं और पिताजी इनकी हर उचित/अनुचित मांग पूरी करते रहते हैं कि बच्चा अब तो खुश होगा. पर बच्चा कभी खुश नहीं होता क्योंकि उसका फोकस पाने से ज्यादा नहीं पा सकने पर रहता है. शिकायत करना पहले मनचाहा फल पाने का प्रयास होता है जो बाद में स्वभाव कब बन जाता है, पता नहीं चलता.ऐसे लोगों का जन्म से यह विश्वास बन जाता है कि अगर रोयेंगे नहीं तो मां दूध नहीं पिलायेगी. असंतोष अपने साथ ईर्ष्या भी लेकर आता है जब सामने वाले की उपलब्धियां इन्हें कुंठित कर देती हैं और ये कभी मानने को तैयार ही नहीं होते कि सफलता हमेशा निष्ठा, योग्यता और श्रम का ही वरण करती है. जो सफल होते हैं, उच्च पदों को सुशोभित करते हैं वे वास्तव में चयनकर्ताओं और चयन प्रक्रिया में उपलब्ध व्यक्तियों में सर्वश्रेष्ठ ही होते हैं. ये बात अलग है कि ६अंक वालों का नेगेटिव एटीट्यूड इसे मानने को तैयार नहीं होता और उन्हें अयोग्य मानकर उनका उपहास करता रहता है. पर जीतने वाला ही सिकंदर कहलाता है भले ही ६ अंक वालों की नज़र में वो मुकद्दर का सिकंदर हो. ऐसे लोगों को हमेशा सैम अंकल यही कहते कि रेस में दौड़ने से ही जीत मिलती है, धावकों की आलोचना करने से नहीं. अगर यह क्षेत्र तुम्हारे लायक नहीं है तो रेस का मैदान बदलने का हक और मौका हमेशा सबके पास होता है. या तो फिर जहाँ रहो जो मिला उस पर मेरी तरह खुश रहो या अपने अंदर मैदान बदलने का साहस पैदा करो.सुरक्षा कायरों का कवच होती है, अभिमन्यु साहस का प्रतीक थे जो महाभारत में अपनी चक्रव्यूह भेदने की अधूरी शिक्षा के बाद भी रणभूमि में कूद गये और अपने कर्तव्य का पालन किया. युद्ध हमेशा सैनिकों के साहस, आशा, उम्मीद और कर्त्तव्य परायणता की भावना से लड़े जाते हैं. इसलिए ही शहीद, अमरत्व और सम्मान दोनों पाते हैं.

वैसे तो ये कथा बैंक के प्रांगण की कहानी है पर इसके माध्यम से जीवन और मानव स्वभाव पर भी कलम चल रही है.

कथा रंग ला रही है तो रंग में भंग होगा नहीं. विश्वास रखिए जारी रहेगी, दवा के डोज़ के रूप में ….

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी # 94 ☆ बुंदेलखंड की कहानियाँ –5 – दोई दीन से गए … ☆ श्री अरुण कुमार डनायक

श्री अरुण कुमार डनायक

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है.

श्री अरुण डनायक जी ने बुंदेलखंड की पृष्ठभूमि पर कई कहानियों की रचना की हैं। इन कहानियों में आप बुंदेलखंड की कहावतें और लोकोक्तियों की झलक ही नहीं अपितु, वहां के रहन-सहन से भी रूबरू हो सकेंगे। आप प्रत्येक सप्ताह बुधवार को साप्ताहिक स्तम्भ बुंदेलखंड की कहानियाँ आत्मसात कर सकेंगे।)

बुंदेलखंड कृषि प्रधान क्षेत्र रहा है। यहां के निवासियों का प्रमुख व्यवसाय कृषि कार्य ही रहा है। यह कृषि वर्षा आधारित रही है। पथरीली जमीन, सिंचाई के न्यूनतम साधन, फसल की बुवाई से लेकर उसके पकनें तक प्रकृति की मेहरबानी का आश्रय ऊबड़ खाबड़ वन प्रांतर, जंगली जानवरों व पशु-पक्षियों से फसल को बचाना बहुत मेहनत के काम रहे हैं। और इन्ही कठिनाइयों से उपजी बुन्देली कहावतें और लोकोक्तियाँ। भले चाहे कृषि के मशीनीकरण और रासायनिक खाद के प्रचुर प्रयोग ने कृषि के सदियों पुराने स्वरूप में कुछ बदलाव किए हैं पर आज भी अनुभव-जन्य बुन्देली कृषि कहावतें उपयोगी हैं और कृषकों को खेती किसानी करते रहने की प्रेरणा देती रहती हैं। तो ऐसी ही कुछ कृषि आधारित कहावतों और लोकोक्तियों का एक सुंदर गुलदस्ता है यह कहानी, आप भी आनंद लीजिए।

☆ कथा-कहानी #94 – बुंदेलखंड की कहानियाँ – 5- दोई दीन से गए … ☆ श्री अरुण कुमार डनायक

॥ दोई दीन से गए पाँडे , हलुवा मिला ना माँडे ॥

इस कहावत का अर्थ है  दोनों इच्छाओं में से किसी  एक भी का पूर्ण न होना और इसके पीछे जो कहानी है वह इस प्रकार है: 

गाँव में एक  पाण्डेजी  रहते थे । ज्यादा पड़े लिखे न थे अत: पूजा पाठ में तो न बुलाए जाते पर जब कभी आसपास के गावों में ब्राह्मण भोजन होता तो उन्हे भी बुलावा भेजा जाता। ऐसा ही एक निमंत्रण  पांडेजी को अपने गाँव से कुछ दूर स्थित दूसरे गाँव से मिला।  रास्ते भर वे सुस्वादु भोजन की कल्पना करते जा रहे थे कि आज हलुवा और पूरी को भोग लगेगा। पांडेजी को रास्ते में चलते चलते अचानक चावल बनने की खुशबू आई और चावल का माँड, जो उन्हे अत्यंत प्रिय था, पीने की लालच में  उस घर की ओर मुड़ गए। गृह मालकिन ने किवाड़ की ओट से पांडेजी को पायं लागी करी और आने का मंतव्य पूंछा। पांडेजी ने  घर तक पहुँचने की बात बताते हुये माँड पीने की इच्छा बताई। गृह मालकिन कुछ कह पाती तभी पांडेजी ने गाँव में आयोजित भोज की चर्चा करते हुये कुछ लोगों को सुना और वे उन्ही के पीछे पीछे भोज स्थल की ओर चल पड़े।  भोज स्थल पर लोगों ने पांडेजी को देखा और कह उठे अरे ये तो फलाने के दरवाजे पर खड़े थे और उसके यहाँ  माँड पीने की बात कर रहे थे। इतना सुनना था की भोज के लिए आमंत्रित अन्य ब्राह्मणों ने पांडेजी को खान पान की मर्यादाओं का पालन न करने का दोषी मानते हुये उनके साथ  भोजन करने का  बहिष्कार कर दिया और पांडेजी भोजन करने से वंचित हो गए।  इस प्रकार उन्हे न तो माँड पीने मिला और ना ही हलुवा खाने। तभी से यह कहावत चलन में है कि

॥ दोई दीन से गए पाँडे, हलुवा मिला ना माँडे ॥

©  श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares