ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २७ फेब्रुवारी – संपादकीय  ?

 

कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आले.

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून ” १ मे ” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी.  हा छोटासा फरक सर्व मराठी प्रेमींना माहिती असावा म्हणून मुद्दाम स्पष्ट करावेसे वाटले.

आपण सर्व मराठी प्रेमी, मराठी भाषेचा विकास,संवर्धन आणि प्रसार होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया.मराठीचा सार्वत्रिक वापर जेव्हा जास्तीत जास्त दिसून येईल तेव्हाच मराठी भाषेचा ख-या गौरव होईल.

आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.त्यांचे काव्य,नाटक,लेखन हे लोकप्रिय तर झालेच पण नव साहित्यिकांना स्फुर्तीदायकही ठरले. देशभक्ती,सामाजिक आशय, प्रेम, निसर्ग प्रतिके, किंवा स्फूर्ती देणा-या शब्दांनी फुललेली त्यांची कविता असो किंवा त्याची कथा,कादंबरी,निबंध,ललित लेख ,नाटक यासारखे गद्य लेखन असो,या सर्वातून  मानवतावाद आणि सामाजिक बांधिलकीची जाण  अगदी सहजपणे दिसून येते.कविवर्य वसंत बापटांनी कवी कुलगुरू या शब्दात त्यांना गौरवले आहे.नटसम्राट सारख्या अजरामर नाट्यकृतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली.साहित्य चळवळ जीवंत ठेवण्यासाठी त्यानी दिलेले योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.

आज त्यांचा जन्मदिवस.त्या निमित्त त्यांची एक कविता वाचून आपले मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करूया.कविता अर्थातच कवितेचा उत्सव या सदरात.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ कबुली ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

 

☆ कवितेचा उत्सव ☆ कबुली  ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

मी आहे

शब्दलंपट-

शब्दांच्या  वारांगना

सज्ज्यावर उभ्या राहून

खुणावतात मला,

कोठल्यातरी दाहक रसायनात

वितळतात सारे प्रतिकार

आणि मी जातो ते बहिष्कृत दरवाजे लोटून

सरळ आत

अर्थाचा हिशेब न करता

 

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कुसुमाग्रज … ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

| कुसुमाग्रजा ज्ञानपीठ मानकरी तू

  वैविध्याचा असे चित्रकार तू

  तव प्रतिभेची गरुड भरारी

  साहित्य शारदेचा असे पुजारी |

 

| काव्याची फुलवुनी फुलबाग

  विशाखा, जीवनलहरी, वादळवेल

  अन्यायाचा दूर करूनी रोग

  फुलविशी समता बंधुत्वाची वेल |

 

| सामाजिक प्रेमाची ज्योत घेऊन

  जपे माणुसकीचा मंत्र महान

  दुर्दम्य आशेला देउनी अग्रस्थान

 कोलंबसचा गायीला अभिमान  |

| नटसम्राटाचा जणू तू विधाता

  शोकांतिकेचा जणू तू निर्माता

  यशो शिखरावर ही कलाकृती

  रसिक मने जिंकल्याची घेई पावती |

| तव कल्पकतेची किमया भारी

 पृथ्वीच्या प्रेम गीताची उंची न्यारी

 सूर्य पृथ्वीची जोडी गोजिरी

 अमर प्रणय गीताची मूर्ती साजिरी |

 | नाटक, काव्याला यशो मंदिरात बसविले

   कथा कादंबरीला  अंगाखांद्यावर खेळविले

   विविध पुरस्कारांनी तुजला भूषविले

   मातृभाषेचे निशाण उंचविले |

| वर्षा मागून वर्षे सरली

  परी तव कीर्ती ज्योत अमर जाहली

  अजरामर आहे तव साहित्य कलाकृती

  जोवरी आहे शशांक आदित्यची महती |

 

वारजे पुणे.

ई मेल- VidyaParadkar0901@gmail.com

मो.नंबर – 91-9225337330 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्वास मराठी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्वास मराठी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

(रोही पंचाक्षरी रचना)

रोमारोमांत

मनामनांत

माय मराठी

वसे श्वासांत..१

 

असे प्राचीन

भासे नवीन

मायबोलीशी

घट्ट ही वीण..२

 

फुले पालवी

रूप भुलवी

साहित्यातून

मने मोहवी..३

 

नाद घुमतो

नित्य गर्जतो

देश विदेशी

डंका वाजतो..४

 

लोभसवाणे

रूप देखणे

फिके पडते

शुभ्र चांदणे..५

 

भाषा थोरवी

किती वर्णावी

माय माऊली

मनी जपावी..६

 

माज मराठी

साज मराठी

गौरवास्पद

माझी मराठी..७

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी माय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

इंग्रज आले राहून गेले

कौतुक त्यांचे ठेवून गेले

त्याचे सण  साजरे करतो

डोक्यावर घेऊन नाचत बसतो

 

होळी झाली गावठी गड्या

डिसेंबर एंडला मारू उड्या

पाडवा गेला अंधारात

जानेवारीचा धरला हात

 

मराठी माऊली विसरून गेलो

इंग्रजी मावशीचे लाडके झालो

फॅशन  फॅशन खेळत बसतो

आपल्या संस्कृतीला आपण हसतो

 

इंग्रजी म्हणतो किती महान

तिच्याकडे ठेवतो डोके गहाण

असे करुन साधले काय

मराठी मायेची आहेना माय

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषेचे वैविध्य ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ भाषेचे वैविध्य ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ‘ बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी झाली’. हा प्रकार बेळगावात नवीन नाही. ‘ बेळगाव म्हणजे कानडी व मराठी वादाची पेटती भट्टी आहे ‘ असं पु. ल. नेहमी म्हणायचे. पण त्या बातमीमुळे भाषेविषयी काही लिहावे असे वाटले.

दर वीस मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. ही भाषा म्हणजे मूळ भाषा नसून ती बोलीभाषा असते. फरक बोलीभाषेत असतो.मूळ भाषा एकच असते. काही शब्द वेगळे असतात, काही ठिकाणी उच्चार, हेल यात फरक असतो. बेळगाव मधे मराठी भाषिक खूप आहेत.पण त्यांची मराठी आणि महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी यात खूपच अंतर आहे. बेळगावात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर कन्नड भाषेचा खूप प्रभाव आहे.

मराठी भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाते ती भाषा, त्यातले हेल, उच्चार वेगवेगळे जाणवतात. पुण्यामधे साधारणपणे शुद्ध मराठी पहिल्यापासूनच बोलली जाते. सातारा, कोल्हापूर भागात वेगळेच टोन ऐकू येतात.सोलापूरची बोलीभाषा तर खूपच वेगळी आहे. त्यावर कन्नड आणि तेलुगू दोन्ही भाषांची छाप आहे.

शहरात आणि खेडेगावात तीच मराठी भाषा किती वेगळी वाटते. खेडेगावात तर असे काही शब्द वापरले जातात ते शहरातील लोकांना माहीतही नसतात. धुळे, नाशिक इथली बोली औरंगाबाद, किंवा एकूणच मराठवाड्यातील बोलीभाषा यात खूपच फरक आहे. खानदेशच्या भाषेवर तिथल्या स्थानिक अहिराणी भाषेचा जास्त प्रभाव आहे. ही अहिराणी भाषा गुजराती व मराठी यांचे मिश्रण आहे असे म्हणतात.विदर्भातल्या मराठी भाषेचा वेगळाच बाज आहे. मुंबईत हल्ली जी मराठी बोलतात तिच्यात निम्मे हिंदी , इंग्रजी शब्द घुसडलेले ऐकू येतात. शुद्ध पुणेरी मराठी असा लौकिक आजवर मिरवणाऱ्या पुण्यातल्या मराठी भाषेतही अलिकडे हिंदी इंग्रजी  प्रचुर शब्द येतात.

काळानुसार तर भाषेत फारच बदल होतात. प्रत्येक संतांच्या काळात जी जी बोली भाषा होती तीच त्यांच्या साहित्यातून प्रतीत झाली आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात खूप जण स्थलांतरित होतात. त्यांची भाषा कालांतराने बरीच बदलते.तिथल्या भाषेचे संस्कार या भाषेवर होतात. त्यांच्या भाषेच्या टोनमधे आपली मूळ भाषा बोलली जाते. तिकडून पुन्हा ते जेव्हा मूळ स्थानी येतात तेव्हा हा वेगळेपणा जास्त जाणवतो.एखादे मराठी कुटुंब काही कारणाने बरीच वर्षे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इकडे राहिले तर ते परत महाराष्ट्रात येतात ते तिकडच्या भाषेचे मिश्रण घेऊनच!! ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे.

आम्ही काशी, गया, प्रयाग , अयोध्या यात्रेला गेलो होतो. काही मराठी पुरोहित वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते मराठी बोलतात. पण ते अस्खलित मराठी वाटत नाही.तर त्यांच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव आहे. त्यात चूक काहीच नाही. एके ठिकाणचे गुरूजी आमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येत होते. ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहतात. त्यातही ते मराठी भाषा विसरलेले नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू आहे. हे त्यांचेच श्रेय आहे.

परवा एका टीव्ही चॅनल विषयी काही वाचनात आले.ते आहे तामिळनाडूचे! नाव आहे ” दक्षिणी मराठी” . त्या चॅनल वर ते माहिती देतात की, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी अळगिरी नायक या राजाकडून तंजावर जिंकून घेतले.  साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी  अनेक मराठी सरदार, त्यांची घराणी तंजावर येथे नेली.  हे लोक तिथेच स्थायिक झाले. ते मराठीच बोलत असत. पण काही काळानंतर त्या मराठीवर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृत भाषेचा शिवाय दक्षिण भारतातील  मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ या सर्व भाषांचा प्रभाव पडत गेला. ती तंजावर मराठी  या नावाने प्रसिद्ध झाली.  तीच त्यांची बोली भाषा बनली.

हे लोक अजूनही गुढीपाडवा, संक्रांतीला तिळगूळ घ्या गोड बोला,  अंबाबाईचा गोंधळ हे सण मराठी पद्धतीने साजरे करतात म्हणे! ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने आता बरेच लोक महाराष्ट्र, गुजरात, उत्तरेकडची राज्ये ,दिल्ली दक्षिणेत इतरत्र, एवढेंच काय पण परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू येथे या लोकांची संख्या कमी झाली आहे. पण ते तंजावर मराठीच बोलतात. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे.. या दक्षिणी मराठी चॅनेल च्या माध्यमातून त्यांचा आपल्या मूळ मातीशी संबंध टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक मराठी लोक आमचे चॅनल पाहतात. तुम्ही आम्ही एकच आहोत हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

भारतात, किंबहुना जगातही अशा काही मराठीपासून उत्पन्न झालेल्या भाषा असतीलच. त्यांच्या विषयी समजले तर अजूनच आपल्या ज्ञानात भर पडेल.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

केवढी विशेषणे … कमाल आहे. आणि प्रत्येक गोष्ट पटते.   

 

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निर्गवी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडुची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची !

 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रविकिरणही मोहात पडले ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? रविकिरणही मोहात पडले  ?   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

चुलीवरच्या खमंग भाकरीचा

खमंग वास हवेत पसरता

रविकिरणही मोहात पडले

जाळीदार झरोक्यातुन येते झाले

उजळून टाकले तयांनी

कष्ट करणारे दोन्ही हात

सोन्यासम झळकु लागली

भाकरीपिठासह तीची परात

चुल आपल अग्निहोत्र

शांतपणे चालुच ठेवते

अन्नपूर्णा समोर बसुन

आयुष्य सरकवत  रहाते

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ पंखुरी भर बसंत ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ कविता ☆ पंखुरी भर बसंत ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(कभी प्रखर लेखिका मणिका मोहिनी के संपादन में निकलने वाली पत्रिका ‘वैचारिकी संकलन’ में यह कविता प्रकाशित हुई थी । आज खोजने कुछ निकला फाइलों से और मिल गयी यह पुरानी कविता। – कमलेश भारतीय)

कभी किसी दिन

ऐसा भी होता है कि

लाल गुलाब खिलते ही

सिर्फ एक पंखुरी छोड़कर

सारे का सारा झर जाता है !

बाकी बची उम्मीद की तरह

सिर्फ एक पंखुरी

टहनी पर टंगी रहती है !

जो लोगों की नज़र में

बहुत भद्दी दिखती है !

पर ,,,,

कश्मीर से कन्याकुमारी तक

जब

आने वाले मौसम की तरह

दंगे व कर्फ्यू का कहर

शहरों से

लाल गुलाब की सभी पंखुरियों की तरह

सारी खुशियां झाड़ देता है

तब

सिर्फ पंखुरी भर बसंत ही

उम्मीद जगाता है कि

यह दौर जल्द खत्म होगा ।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ #130 – आतिश का तरकश – ग़ज़ल – 18 – “दरमियाँ” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं । आज से प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “दरमियाँ …”)

? ग़ज़ल # 18 – “दरमियाँ…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

निभाने को हमें कुछ बचा ही नहीं,

दरमियाँ हमारे सच बचा ही नहीं।

 

इतने हिस्सों में बँट चुके हैं हम,

मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं।

 

ईमान रिश्तों की साझा नींव है,

सच्चा इंसान कोई बचा ही नहीं।

 

माना तुम ज़मीन पर खड़े हुए हैं,

पैरों के नीचे तल बचा ही नहीं।

 

दिल का दर्द किससे बयाँ करूँ मैं,

हमसाया मेरा कोई बचा ही नहीं।

 

दर्द समझ सकता कोई तो हमारा,

हमनफ़स अब कोई बचा ही नहीं।

 

चहलक़दमी साथ कर सकता कोई,

हमराह अपना कोई बचा ही नहीं।

 

मेरे साथ गीत गुनगुनाता कोई,

हमनवा ऐसा कोई बचा ही नहीं।

 

अब तो सफ़र तनहा ही कटना है,

हमसफ़र हमारा कोई बचा ही नहीं।

 

दिले बीमार लाइलाज हुआ अब तो,

क़ाबिल चारागर कोई बचा ही नहीं।

 

दिल के टुकड़ों को अब क्या सँभालू,

तीमारदार अब कोई बचा ही नहीं।

 

दिल से सदा आती सुनाई देती है,

अब चलो आतिश कुछ बचा ही नहीं।

 

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares