कोणताही दुर्गुण वाईटच. पण त्यातही अहंकार अधिक बोचरा. काटेरी. अहंकारी व्यक्तीच्या सहवासात येणाऱ्या कुणालाच तो सुखावह नसतो. तो टोचणारा,अस्वस्थ करणाराच असतो. गंमत म्हणजे या अहंकाराचे काटे अहंकारी व्यक्तीला मात्र त्याचे मन बधीर केलेलं असावं तसे कधीच बोचत नसतात.अर्थात या बधिरतेमुळे ती बोच जाणवली नसली, तरी त्या अहंकाराचे दुष्परिणाम मात्र त्याला सोसावे लागतातच.
‘हा अहंकार नेमका येतो कुठून?’ हा वरवर गहन वाटणारा प्रश्न. पण अहंकार मुळात बाहेरून कुठून येत नसतोच. कुणीतरी ओवाळून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं म्हणतात.ते अनवधानाने जर कुणी ओलांडलं, तर त्याला ‘लागीर’ होतं असा एक (गैर)समज आहे. यालाच ‘बाहेरचं’ लागीर असं म्हणतात.तसंच अहंकाराला ‘आतलं’ लागीर म्हणता येईल.
सद्गुण आणि षडरिपू दोन्हीही प्रत्येकाच्या मनोभूमीत बीजरूपाने अस्तित्वात असतातच. आजूबाजूची परिस्थिती, संस्कार, विचार करायची पद्धत, यावर त्यातील सद्गुण अंकुरणार की षड् रिपू हे अवलंबून असतं. सुसंगत, घरचं आणि आजूबाजूचं आनंदी वातावरण, परस्पर-सामंजस्य, यामुळे विचारांनाही एक चांगलं वळण लागतं, जे सद्गुणांच्या जोपासणीला पूरक ठरतं.ती सकारात्मकता अर्थातच षड् रिपूंच्या वाढीला मारक ठरणारी असते.कुसंगत,आत्मकेंद्री विचार, स्वार्थ, संस्कारांचा अभाव, यासारख्या अनुकूल घटकांमुळे निर्माण होणारं वातावरण मात्र दुर्गूणांच्या वाढीस पोषक ठरतं.अशा वातावरणात षड् रिपूंपैकी ‘मद’ म्हणजेच गर्व स्वतः अंकुरतानाच अहंकारालाही स्वतःसोबत मिरवीत वाढू लागतो.
अनपेक्षित यश आनंददायी असतंच. सूज्ञ माणसं त्या आनंदाची क्षणभंगुरता जाणून असल्याने ते त्यात फार काळ तरंगत रहात नाहीत. त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवरच टिकून रहातात. अहंकारी माणसाला मात्र एवढंसं यशही पचवता येत नाही. आनंदाने बेभान झालेल्या त्याला मग स्वर्ग फक्त दोन बोटेच उरतो.
अहंकार कशाचाही असू शकतो.स्वतःच्या देखण्या रूपाचा, वडिलोपार्जित धनसंपत्तीचा, कार्यकर्तृत्त्वाचा, यशाचा,पद आणि प्रतिष्ठेचा, त्यामुळे मिळत असणार्या मान-मरातबाचा, सत्तेचा.. अगदी कशाचाही.अहंकार त्या व्यक्तीच्या दृष्टीने मारकच. अहंकार असेल तिथे समाधान राहूच शकत नाही.
माणूस खरंतर समाजप्रिय प्राणी.एकटेपण त्याला कधीच रुचत नसतं. माणसाच्या जगण्याचा परीघ लहान असो वा मोठा तो सच्चे मित्र, हितचिंतक, नाती-गोती यांनी समृद्ध असावा असंच प्रत्येकालाच वाटत असतं. अहंकारी व्यक्तीलासुद्धा ही अभिलाषा असतेच. पण त्याच्याच अहंकारीवृत्तीमुळे माणसे त्याच्यापासून नकळत दुरावत जातात. त्याच्याभोवती गर्दी नसते असे नाही, पण ती असते फक्त त्याचा अहंकार कुरवाळणाऱ्या ‘होयबां’चीच! त्यामुळे मनात आकारू लागलेला अहंकाराचा कांटा योग्यवेळी उपटून फेकून देण्याऐवजी, तोंड देखल्या स्तुतीने तो वाढतच जातो. आणि त्या क्षणापासूनच अहंकारी व्यक्तीची विनाशाकडे वाटचाल सुरु होते.
अहंकार म्हणजे अहंभाव नव्हे तर अहंभावाचा अतिरेक. अहंभाव भल्याबुऱ्या प्रत्येकाच्या मनात असतोच. आणि तो वाईट असण्याचा प्रश्नही नाही कारण तो ‘आपला’ चाॅईस नसतोच. ‘मी’ आणि ‘माझं’ याची जाण प्रत्येक माणसाला त्याच्या न कळत्या वयापासून नैसर्गिकरीत्याच असते.आपले आणि परके यातला फरक त्या वयापासूनच त्याला व्यक्त करता आला नाही तरी समजत असतोच. म्हणूनच आईला चिकटून बसलेल्या बाळाला जर गंमतीने कुणी ‘आई माझीs’ असं म्हटलं तर ते बाळ लगेच कावरंबावरं होत आपल्या बोबड्या बोलांनी ‘नाईsआई माजीs’ असं म्हणत ओठ काढून रडवेलं होतं. आई,बाबा,ताई, दादा,खेळणी,ठराविक दुपटं,वय वाढेल तसे स्वतःचे कपडे,गोष्टींची पुस्तकं, पांघरूण,खेळणी, वाटणीचा खाऊ हे सगळं मनोमन ‘माझं माझं’ म्हणून जपतच ते लहानाचं मोठं होत असतं. ‘मी’पणा, अहंभाव हा असा न कळत्या वयापासून आपला प्रत्येकाचाच स्थायीभाव असतो. हा अहंभाव हेच अहंकाराचे बीज! ते अंकुरलं,वाढत गेलं,तरच त्याचं अहंकारात रूपांतर होतं.आणि अर्थातच ते हानिकारक ठरतं.
ठराविक मर्यादेपर्यंतचा अहंभाव म्हणजे स्वाभिमान.तो मात्र व्यक्तिविशेष ठरणारा असतो. पण त्या पुढे होणारी अहंपणाची अतिरेकी वाढ स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात व्हायला कारणीभूत ठरते.
यापासून बचाव व्हावा म्हणूनच ‘अहंकाराचा वारा न लागो ‘ अशी प्रार्थना प्रत्येकानेच स्वत:साठी करायला हवी आणि त्यादिशेने प्रयत्नही !
अहंकाराची लागण न होण्यासाठी प्रत्येकाने जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. जगायचं का? कशासाठी?कसं? हा विचार करून प्रत्येकाने जगण्याचं प्रयोजन ठरवायला हवं.
जगणं म्हणजेच जीवन. मग ते येईल तसं, जमेल तसं जगायचं कि अट्टाहासाने फक्त स्वतःसाठी जगायचं ते व्यक्तिपरत्त्वेच ठरत असतं.
ज्याना जीवन खर्या अर्थाने कळलेले आहे ते आनंदासाठी जगत नसतात, तर आनंदाने जगत असतात. त्यांच्या प्रत्येक पावलावर, लहान-सहान गोष्टीतही त्यांना आनंद सापडत जातो. तो फार शोधावा लागतच नाही.न शोधताही सापडतो.
आनंद तर प्रत्येकाला हवाच असतो. पण प्रत्येकाच्या आनंदाची त्याच्या गुणात्मकते नुसार प्रतवारी मात्र ठरलेली असते.सगळ्यांचे सगळेच आनंद सारख्या प्रतीचे नसतात. आनंद क्षणभंगुरच असतात,पण त्या अत्यल्प काळातही ते मनाला रिझवून, समाधान पेरुन जातात. असे आनंद निर्भेळ असतात. कर्तव्यपूर्तीतून मिळणारा आनंद कृतार्थता देणार असतो. दुसर्याचं दुःख हलकं करून मिळणारा आनंद उदात्त असतो. दुसर्याच्या आनंदाने स्वतःही आनंदी होण्यातला आनंद दुसऱ्याचा आनंद द्विगुणित करणारा असतो.
आनंद कुठे कसा शोधायचा, मिळवायचा हे प्रत्येकाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. ज्यांना जीवन म्हणजे काय हे कळले आहे, ती वरवर सरळ साधी वाटणारी माणसंही जगताना स्वतःचा विचार करतात तसेच आपल्या सोबत असणाऱ्या इतरांचाही.
आत्मकेंद्री,अहंकारी माणसं मात्र फक्त स्वतःचाच विचार करीत आनंद मिळवायचा अट्टाहास करतात. त्यामुळे तो आनंद निर्भेळ नसतो.भेसळयुक्त असतो. वरवर पहाणार्याला जरी असा आत्मकेंद्री माणूस यशस्वी, श्रीमंत, सुखी-समाधानी वाटला तरी आतून तो एकलकोंडा, दुःखी,पोखरलेलाच असतो.
अहंकारी माणूस ‘जीवन म्हणजे काय हे न कळलेला’ या अर्थाने मला अज्ञ,अजाण वाटतो. कारण त्याचा विचार स्वतःपलिकडे कधी जाऊच शकत नाही.
जीवन कळलेल्या माणसाचं नेमकं जगणं कवीवर्य बा.भ. बोरकर यांनी त्यांच्या एका कवितेत अतिशय सुंदर रीतीने शब्दबद्ध केलेले आहे.त्या कवितेतली या मोजक्याच ओळीही मी अहंकारी माणसाला ‘अज्ञ’, ‘अजाण’ कां म्हणतो ते अधोरेखित करणारी आहे.
‘जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो ‘
असं असताना ‘मी’पणालाच कवटाळून बसणाऱ्या अहंकारी माणसाला ‘अज्ञ’च म्हणायला हवं ना?
(कथासूत्र : रोजची प्यायची वेळ झाली, तशी दगड्याची तब्येत बिघडत चालली. दादल्याने त्याला सांभाळलं, सावरलं…..)
आतापर्यंतच्या आयुष्यात दगड्या कोणाच्या खिसगणतीतही नव्हता. आताही काही कमवत नसल्यामुळे उठताबसता त्याचा उद्धार व्हायचा.
त्यामुळे आज अचानक सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं आणि घरचे, बाहेरचे सगळे आपल्याला भाव द्यायला लागले, म्हटल्यावर दगड्याला नशाच चढली आणि ती दारूपेक्षाही कितीतरी मोठी, पॉवरबाज होती.
हळूहळू शेजारच्या गावांतही हे मारुतीचं कळलं.मग आपापल्या समस्या घेऊन तिकडचेही लोक यायला लागले.
रात्री लोक घरी गेल्यावर म्हातारीने दगड्याला जेवायला वाढलं.
उभं राहून राहून दगड्याचे पाय दुखत होते. पण त्याची रोजची वेळ झाली होती.
“मी जरा भायेर जावून येतो,”तो म्हणाला.
पण म्हातारीने अडवलं त्याला,”आरं, येडा का खुळा तू ? द्येव आंगात यिवून बसलाय आणि हा चाल्ला पियायला. मारुतीचा क्वोप झाला तं गदा हाणील त्यो डोस्क्यात.”
“व्हय भावजी. हुबं ऱ्हाऊन ऱ्हाऊन दमलायसा.गरम गरम ज्येवण ज्येवून झोपा आता निवांत. उद्या सकाळपासून लोकं येयाला लागतील. मग परत हुबं ऱ्हावं लागणार.”
चिमीला एवढं गोड बोलताना पाहून दगड्यालाच नव्हे, तर म्हातारीलाही नवल वाटलं.
हात- तोंड धुतल्यावर दादल्याने मुंबईला भावड्याला फोन लावला, “आरे, आपल्या घरात चमत्कार झालाय. दगड्याच्या आंगात मारुतीराया आलाय. त्याचा चेहरा बघितलास, तर दगड्या म्हणून वळखूच येईत न्हाय. द्येवच दिसतोय. तवा तू ताबडतोब निघून ये.”मग त्याने भक्तांची गर्दी वगैरे सगळं सांगितलं.
“पण मला लगेच निघायला नाय जमणार. उद्या सकाळी डॉक्टरसायबांना सांगतो, दुसऱ्या कंपाउंडरची सोय करतो आणि मग निघतो.”
रात्री पांघरायला दगड्याला घरातली स्पेशल वाकळ मिळाली.
भावड्याने फोन ठेवला, तेव्हा तो विचारात पडला,’मारुतीला यायचं होतं, तर तो दादल्याच्या अंगात आला असता. या बेवड्याच्या अंगात कशाला येईल तो?’
त्याला मध्यंतरी दवाखान्यात आलेल्या पेशंटबाईची आठवण झाली. तिच्या ओठाभोवतालचा भाग सुजला होता. ती सेम मारुतीसारखी दिसत होती. मग डॉक्टरांनी औषध देऊन तिला बरं केलं. तोंडाची सूज उतरली आणि ती नॉर्मल झाली. आता उद्या डॉक्टरांनाच विचारूया, असं ठरवून भावड्या झोपला.
सकाळी डॉक्टर म्हणाले, “बरोबर आहे, तू म्हणतोस ते. मारुतीला अंगात यायचंच असतं, तर तो मोठ्या भावाच्या अंगात आला असता ना. या दारुड्याची निवड का केली असती त्याने?त्या बाईंसारखी यालाही ऍलर्जी झाली असणार. हे बघ. मी गोळ्या देतो त्याला. पण बरं होईपर्यंत त्याला अजिबात दारू पिऊ देऊ नकोस.दुसरं म्हणजे तुझ्या घरची माणसंपण ‘मारुती, मारुती ‘ करताहेत. त्यांना हे ऍलर्जी -बिलर्जी, गोळ्या-बिळ्या काही सांगू नकोस. तूच त्याला गुपचूप, कोणाच्या नकळत औषधं देत जा.”
“काय पंत, आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून !”
“अरे मोऱ्या वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी !”
“काय केबल गेली की काय तुमची पंत ?”
“अरे केबलला काय धाड भरल्ये मोऱ्या ? व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स !”
“पंत, मग तुमचा खास सखा सोबती आज मुका कसा काय बुवा ?”
“अरे काय सांगू तुला मोऱ्या, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट. दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्यांनी.”
“पंत, बजेट हाच सध्याचा एकमेव गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय ?”
“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा शब्द सुद्धा नीट उच्चारता येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार ? “
“पंत सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार ?”
“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी कुठूनही चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना ? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला बंद t v. आता कसं शांत शांत वाटतंय !”
“पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”
“माझे कसले बुवा त्यात नुकसान ? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय ?”
“अहो पंत, पण सरकारने कर सवलत किती दिली, काय स्वस्त होणार, काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल ?”
“कसे म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी लंपास करून तूच वाचतोस, होय ना ?”
“काय पंत मी…. “
“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते ? “
“नाही खरच माहीत नाही मला, कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे.”
“तुला सांगतो मोऱ्या, अरे ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करत असतं आणि या पिशवीला ते ‘बुजेत’ म्हणत. बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे, बरं का मोऱ्या !”
“कोणता किस्सा पंत ?”
“मोऱ्या, १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री, सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले असतांना, त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला आणि तेव्हा पासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला बघ !”
“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास ! बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “
“अरे मोऱ्या इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना ? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून ?”
“तसच काही नाही पंत, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “
“होतात तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या ! नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते ! You know, public memory is very short.”
“हो, पण आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि…… “
“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना ? अरे पण म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे तोंड कडवट होतेच, त्याचे काय ? “
“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पंत पण…… “
“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट सांभाळतांना घरच्या होम मिनिस्टरची काय हालत होते, हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का ?”
“हो बरोबर पंत, या बाबतीत सगळ्याच होम मिनिस्टरना माझा सलाम ! महागाईचा कितीही भडका उडाला, तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच जाणोत ! पंत पटल तुमच म्हणण.”
“पटल ना मोऱ्या, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती !”
“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला नाही पटत पंत !”
“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे मोऱ्या ? सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या मार्गाने दोन हातांनी वेगळ्याच नावाने काढून घ्यायच ! आता तो आकडयांचा खेळ नकोसा वाटायला लागलाय. अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे ! मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”
“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना !”
“तू तसा ऐकण्यातला नाहीस ! तुला आता शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांव ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसा करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियम आहे ! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम !”
“ऐकलंस का मनमित्रा, आज कुठे भटकायला जायचं नाही बरं ! इथेच माझ्याबरोबर राहायचं.”
“का बरं”
“आज ना, मला माझ्याशी संवाद करायचा आहे. माझ्याबद्दलंच लिहायचंआहे”.
“अरे बापरे ! स्वतःबद्दल लिहिण्याएव्हडी मोठी कधी झालीस तू?”
“तसं नाही रे! पण माझ्या एका मैत्रीणीने खूपच आग्रह केला म्हणून……”
“आलं लक्षात. म्हणजे नाव मैत्रीणीचं आणि गाव तुझं.”
“थोडंस तसंच म्हण ना . मलाही माझ्या छोट्याश्या लेखन संसारात डोकावून बघायला आवडेल ना!”
” मला वाटतं की तुझ्या लेखन संसारापेक्षा तुझा वाचन संसारच मोठा आहे.”
“अगदी खरं! वाचनाची खूप आवड. लहानपणी बाबुराव अर्नाळकर यांच्या धनंजय- छोटूच्या, लहान अक्षरातल्या रहस्यकथा सतत वाचल्यामुळे डोळ्याला फार लवकर चष्मा लागला तो कायमचा!
“आणि दिवाळीच्या दिवसात, रात्री उशिरापर्यंत, गॅलरीमधे आकाश कंदीलाच्या प्रकाशात दिवाळी अंक वाचत बसल्याबद्दल अनेक वेळा आईचा ओरडा खाल्लास तो आठवत नाही का?”
“आठवतो तर! पण वाचन कायम राहिलं. रहस्यकथा मागे टाकून त्या वयात आवडलेल्या इसापनीती, अरेबियन नाईटस्,नंतर खांडेकर, फडके यांचा टप्पा ओलांडून पुलं, गोनीदा, र.वा दिघे, जी.ए.कुलकर्णी अशा अनेक नामवंत साहित्यिकांचा सहवास वाचनातून घडला. ऐतिहासिक, पौराणिक कादंबऱ्यांची गोडी लागली.”
” कविता पण आवडायच्या ना?”
“हो तर! कॉलेजच्या उमलत्या वयात काव्यानंदात रमले. अनेक कविता तोंडपाठ होत्या. इंदिरा संत, पद्मा गोळे, सरोजिनी बाबर, शांता शेळके, बापट करंदीकर पाडगावकर यांची कवीसंमेलनं यात मैत्रिणींबरोबर रमून गेले. आरती प्रभू, ग्रेस, मनमोहन यांच्या गूढरम्य कवीतेबद्दलही आकर्षण होते. अलीकडे तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेले प्रणव सखदेव, किरण गुरव, मेघना पेठे, मोनिका गजेंद्रगडकर यांचे साहित्यही वाचले.
” या सगळ्या वाचनात जास्त भर कशावर होता?”
“मला आत्मचरित्रं वाचायला खूप आवडतात. अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध लेखक /लेखिकांची आत्मचरित्रं वाचून जीवनाच्या अनेक प्रवाहांचे दर्शन झाले.”
” आत्मचरित्रातून त्या व्यक्तीचा जीवनप्रवास संपूर्णपणे उलगडून दाखविला जातो असं वाटतं का तुला?”
” आत्मचरित्रं सत्याच्या खूप जवळ जाणारी असतात. तरीही प्रत्यक्ष जीवन जगणे आणि त्यावर लिहिणे यात थोडाफार फरक असणारच! अनेकांचे संघर्ष, त्यांची धडपड, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवलेले यश हे सारं माणसाची जीवनावरील श्रद्धा आणि ध्येय गाठण्याची धडपड आपल्याला खूप काही शिकवतं. एक खंत मात्र आहे.”
“कसली?”
“माझं इंग्रजी वाचन खूप कमी आहे. मुलाने आणि नातवाने, मी इंग्रजी साहित्य वाचावं, त्या भाषेतले विविध विषयांवरील समृद्ध, सविस्तर अनुभव घ्यावे, लेखनाचा आवाका म्हणजे काय, हे मला समजावे म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्या आग्रहामुळे मी जेमतेम सात-आठ इंग्रजी कादंबऱ्या, पुस्तकं वाचू शकले. फाऊंटन हेड, रुटस््, लिटल प्रिन्स, लिटल वुमेन वगैरे मध्ये सहज रमले. पण हात पटकन वळतो तो मराठी साहित्याकडेच!”
“अगदी वाचन एके वाचन चालू होतं का?”
“अजिबात नाही. लहानपणापासून अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रम बघण्या- ऐकण्याची संधी मिळाली. अहमद सेलर बिल्डिंगच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे, नाटकं, चक्री व्याख्यानं, अभिरूप न्यायालय यांची मेजवानी मिळाली. अशा उत्सवातून आणि शाळेच्या वत्कृत्व स्पर्धेत भाग घेतल्यामुळे सभाधीटपणा आला. त्याचा चांगला फायदा झाला.”
“आठवतंय का ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक?”
“हो अरे. गणेशोत्सवात मोठ्या माणसांनी केलेल्या या नाटकात एक छोट्या मुलीची छोटीशी भूमिका होती. ती करण्यासाठी माझी निवड झाली. खूप मजा आली. बक्षीसही मिळालं.”
“मला वाटतं त्या वेळी टीव्ही वगैरे भानगड नव्हती.”
“छे अरे! टीव्ही कुठला, रेडिओवरच्या गाण्यांचे स्वर सुद्धा लांबून कानावर यायचे. पण आम्ही बरोबरीच्या मुलामुलींनी खूप मजा केली. सुट्टीमध्ये सागर गोटे, विटी- दांडू, गोट्या लगोरी, दोन आणे तास भाड्याची सायकल घेऊन फिरवणे —-“
“आणि आरडा-ओरडा करून खुणा करत खेळलेले पत्ते आठवतात ना?”
“हो. पण संध्याकाळी परवचा, रामरक्षा, इतर स्तोत्र हे मात्र म्हणावंच लागे.”
“मला वाटतं तेंव्हा मनाच्या मशागतीसाठी खूप चांगले वेगळे मार्ग होते.”
“अगदी बरोबर. आम्ही दादरचा लोखंडी ब्रीज ओलांडून अमर हिंद मंडळ इथे जात असू. गोविंदस्वामी आफळे यांची किर्तने, सुधीर फडके यांचे गीत रामायण , वासंतिक व्याख्यानमाला यांचा आनंद घेतला. प्राध्यापक शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांच्यापासून धनश्री लेले यांच्या पर्यंत अनेकांच्या वक्तृत्वाने कान तृप्त झाले.”
“सिनेमा, नाटक, संगीत यांची आवड होती ना”?
” हो.साहित्य संमेलने, चतुरंगचे कार्यक्रम यांना हजेरी लावली. ह्यांच्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकायला आवडू लागले. अशी आवड असणारा आमचा एक छोटा ग्रुप तयार झाला. एन.सी.पी.ए. मध्ये पाहिलेले ‘हयवदन’, टाटा थिएटरमध्ये पुलंच्या सुसंवादासह अशोक रानडे यांनी उलगडलेली आणि ‘फैय्याज’ यांच्या स्वरांनी सजलेली बैठकीची लावणी, पुलं आणि सुनीताबाई यांनी शिवाजी मंदिरमध्ये बा.भ.बोरकर यांच्या कवितांचे केलेले वाचन सारेच अविस्मरणीय!
“तुम्ही वरळीच्या नेहरू सेंटरलासुद्धा जात होतात ना?”
“नेहरू सेंटरमध्ये कमलाकर नाडकर्णी, काझी साहेब यांच्या उत्तम आयोजनामुळे अनेक प्रकारची नाटके, शास्त्रीय संगीत, झाकीर हुसेन, हेमामालिनी अशा अनेकांच्या दर्जेदार कार्यक्रमांचे साक्षीदार झालो दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, सावरकर सभागृह इथले कार्यक्रम ऐकले.भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांच्यामुळे घराजवळच सांस्कृतिक कार्यक्रमांची गंगा अवतरली आहे. इतक्या समृद्ध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चांदणभरल्या आभाळातून आनंदाचे अमृतकण वेचता आले ही भाग्याची गोष्ट.”
“म्हणजे लिखाणासाठी सुपीक जमीन तयार होती म्हणायची”.
“तसं म्हणायला हरकत नाही पण मी लेखनाचा कधी विचारच केला नव्हता”.
“मग ‘लिहावं’ असं का वाटलं?”
“त्याचं काय झालं, ‘मनस्विनी’ म्हणून आमच्या बँकेच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. दर महिन्याला आम्ही एकत्र जमतो. एखादा विषय ठरवून त्यावर प्रत्येकीने बोलायचे, इतर माहितीची देवाण-घेवाण, कविता वाचन, तसेच प्रत्येकीने दिलेल्या वर्गणीतून एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी देतो. अगदी खारीचा वाटा!
एकदा गणपतीसाठी चिवडा करायचा म्हणून मी दाणे भाजत होते. तेवढ्यात एका मनस्विनीचा फोन आला. ती म्हणाली,’ पुष्पा, लोकसत्ता- चतुरंगमधील ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ ही लेखमाला तू वाचतेस ना?’ मी म्हटलं, ‘हो’. अगदी आवडीने. तर ती हक्काने म्हणाली, ‘तर मग ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ या लेखमालेसाठी तुला, आपली ‘मनस्विनी आणि तू’ यांच्या नात्यावरील लेख लिहायचा आहे. तू तो लिही आणि ‘चतुरंगला’ पाठव. मी काही म्हणायच्या आधीच तिने फोन ठेवून दिला आणि नंतर मी केलेला फोन उचलला नाही. माझ्यावर जबाबदारी टाकून ती मोकळी झाली.”
( ई-अभिव्यक्ति में सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी का हार्दिक स्वागत।sअब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।)
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक सार्थक एवं विचारणीय रचना “लेखा जोखा… ”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।
आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 88 ☆ ब्रेक और ब्रेकर…☆
सीरियल देखते हुए बीच ब्रेक में कितने सारे कार्य हो जाते हैं। 20- 22 मिनट के अंतराल में 4 ब्रेक होने से सोचने – समझने का मौका मिलता है। दिमाग जो सीरियल में घुसा रहता है अचानक से फिर धरातल में लौटता है। सोचिए अगर ये ब्रेक न होता तो हम पूरी तरह से उसी समस्या में डूब कर मनोरोगी बन चुके होते। अब समझ में आया कि आधे घण्टे की पढ़ाई के बाद ब्रेक क्यों लेना चाहिए। कोई भी कार्य हो समय- समय पर रिलेक्स करना ही चाहिए।
रोड में तरह- तरह के ब्रेकर इसीलिए बनाये जाते हैं ताकि भागती हुई गाड़ी कन्ट्रोल में रह सके। ऐसा ही कुछ इस बार के चुनावों में भी देखने को मिल रहा है किसी को पहली बार टिकट के रूप में ब्रेक मिल रहा है तो किसी का चुनावी करियर भी दाँव पर लगा हुआ है। उसे किसी भी सूची में टिकट नहीं दिया गया। वो बस बेसब्री से इंतजार किए जा रहा है कि शायद बाद में कोई लाभ मिलेगा। इस सबमें प्रत्याशी किस दल का नुमाइंदा है ये भी तय नहीं रहता है। दरसल टिकट ही उनके जीवन मूल्य व राष्ट्रवाद को तय करता है। इन सबमें मतदाता कहाँ खो जाता है , उसकी सारी योजनाओं व उम्मीदों में लगा हुआ ब्रेक कब दूर होगा, वर्चुअल रैली सुनने के लिए बैठी भीड़ बस इंतजार में रहती है कि मंत्री जी की वाणी में विराम लगे और वो वहाँ से उठकर अपने बैठने की कीमत व भोजन पा सके। दरसल लोगों को एकत्रित करके लाने का ये सिलसिला शुरू से ही चला आ रहा है।
सारे दौर के नामांकन के बाद भी जिनकी गाड़ी को गति नहीं मिलती है, वे राज्यसभा की ओर निगाह जमा लेते हैं आखिर उनकी सेवा का प्रतिफल तो मिलना ही चाहिए। लोग गठबंधन पर गठबंधन किए जा रहे हैं। मजे की बात इन चुनावों में विचारों के मूल्यों को प्रमुखता न देकर टिकट को वरीयता मिल रही है। इसी की कीमत पर मूल्यों का निर्धारण हो रहा है। मतदाता भी किसकी ओर से बोलें, किसके गुणगान करें ये उन्हें आखिरी समय पर ही पता चलेगा। कुछ भी कहें इस व्यवस्था ने मतदाताओं को जागरूक तो बना ही दिया है। अब उन्हें किस का बटन दबाना है, ये तो वक्त किस करवट बैठता है यही तय करेगा। वे तो चुनावी आंकड़ों के विश्लेषण पर नजर जमाए हुए हैं।
सकारात्मकता का यही लाभ होता है कि अवसरवादी भी अवसरों की तलाश में आखिरी दम तक एड़ी चोटी का जोर लगाने से नहीं चूकता है। कुछ भी कहें इस बार परिवार बाद, भाई – भतीजा बाद पर लगाम कसी है। उम्मीद है कि अगले चुनावों में जातिगत समीकरणों पर भी रोक लगेगी। हम सब बस मतदाता है ये चिंतन जिस दिन मतदाता करने लगेंगे उस दिन से दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र में सही मायनों में जनजागरण शुरू होगा।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये।
संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 9
वसंत पंचमी :
वसंतपंचमी माँ सरस्वती का अवतरण दिवस है। पौराणिक आख्यान है कि ब्रह्मा जी सृष्टि की रचना तो कर चुके थे पर सर्वव्यापी मौन का कोई हल ब्रह्मा जी के पास नहीं था। तब माँ शारदा प्रकट हुईं। निनाद, वाणी एवं कलाओं का जन्म हुआ। जल के प्रवाह और पवन के बहाव को में स्वर प्रस्फुटित हुआ। मौन की अनुगूँज भी सुनाई देने लगी। आहद एवं अनहद नाद गुंजायमान हुए। चराचर ’नादब्रह्म’ है।
अनादिनिधनं ब्रह्म शब्दतवायदक्षरम् ।
विवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जगतोयतः॥
अर्थात् शब्द रूपी ब्रह्म अनादि, विनाश रहित और अक्षर है तथा उसकी विवर्त प्रक्रिया से ही यह जगत भासित होता है। शब्द और रस का अबाध संचार ही सरस्वती है। शब्द और रस के प्रभाव का एकात्म भाव से अनन्य संबंध है। इसका एक उदाहरण संगीत है। आत्म और परमात्म का एकात्म रूप संगीत है। संगीत को मोक्ष की सीढ़ियाँ माना गया है। महर्षि याज्ञवल्क्य इसकी पुष्टि करते हैं-
वीणावादनतत्वज्ञः श्रुतिजातिविशारदः।
तालश्रह्नाप्रयासेन मोक्षमार्ग च गच्छति॥
वैदिक संस्कृति के नेत्रों में समग्रता का भाव है। कोई पक्ष उपेक्षित नहीं है। यही कारण है कि वसंत पंचमी रति और कामदेव का उत्सव भी है। इस ऋतु में सर्वत्र विशेषकर खिली सरसों का पीला रंग दृष्टिगोचर होता है। प्रकृति का चटक पीला रंग आकर्षित करता है पुरुष को। प्रकृति और पुरुष का एकात्म होना मदनोत्सव है।
समग्रता की अपरिमेय परिधि में स्वदेश, संस्कृति व धर्मनिष्ठा की पतंग गगन की ऊँचाइयों पर होती है। इस ऊँचाई का अनन्य प्रतीक है वीर हकीकत राय। धर्म परिवर्तन न करने के कारण केवल 15 वर्ष की आयु में इस बालक को 1734 में वसंतपंचमी के दिन फाँसी पर लटका दिया गया था। हकीकत राय का स्वाभिमानी शीश सदा ऊँचा रखने के लिए अनेक भागों में इस दिन पतंग ऊँची उड़ाने का चलन भी है।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जीका हिन्दी बाल -साहित्य एवं हिन्दी साहित्य की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य” के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक अतिसुन्दर एवं प्रेरणास्पद लघुकथा “राम जाने”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 106 ☆
☆ लघुकथा- राम जाने☆
बाबूजी का स्वभाव बहुत बदल गया था। इस कारण बच्चे चिंतित थे। उसी को जानने के लिए उनका मित्र घनश्याम पास में बैठा था, “यार! एक बात बता, आजकल तुझे अपनी छोटी बेटी की कोई फिक्र नहीं है?”
बाबू जी कुछ देर चुप रहे।
“क्या होगा फिक्र व चिंता करने से?” उन्होंने अपने मित्र घनश्याम से कहा, “मेरे बड़े पुत्र को मैं इंजीनियर बनाना चाहता था। उसके लिए मैंने बहुत कोशिश की। मगर क्या हुआ?”
“तू ही बता?” घनश्याम ने कहा तो बाबूजी बोले, “इंजीनियर बनने के बाद उसने व्यवसाय किया, आज एक सफल व्यवसायी है।”
“हां, यह बात तो सही है।”
“दूसरे बेटे को मैं डॉक्टर बनाना चाहता था,” बाबू जी बोले, “मगर उसे लिखने-पढ़ने का शौक था। वह डॉक्टर बन कर भी बहुत बड़ा साहित्यकार बन चुका है।”
“तो क्या हुआ?” घनश्याम ने कहा, “चिंता इस बात की नहीं है। तेरा स्वभाव बदल गया है, इस बात की है। ना अब तू किसी को रोकता-टोकता है न किसी की चिंता करता है। तेरे बेटा-बेटी सोच रहे हैं कहीं तू बीमार तो नहीं हो गया है?”
“नहीं यार!”
“फिर क्या बात है? आजकल बिल्कुल शांत रहता है।”
“हां यार घनश्याम,” बाबूजी ने एक लंबी सांस लेकर अपने दोस्त को कहा, “देख- मेरी बेटी वही करेगी जो उसे करना है। आखिर वह अपने भाइयों के नक्शे-कदम पर चलेगी। फिर मेरा अनुभव भी यही कहता है। वही होगा जो होना है। वह अच्छा ही होगा। तब उसे चुपचाप देखने और स्वीकार करने में हर्ज ही क्या है,” कहते हुए बाबूजी ने प्रश्नवाचक मुद्रा में आंखों से इशारा करके घनश्याम से पूछा- मैं सही कह रहा हूं ना?
और घनश्याम केवल स्वीकृति में गर्दन हिला कर चुप हो गया।