हिन्दी साहित्य – कविता ☆ मैं “मिली” ☆ डॉक्टर मिली भाटिया

डॉक्टर मिली भाटिया

(सुप्रसिद्ध चित्रकार एवं लेखिका डॉ मिली भाटिया जी को बसंत पंचमी पर्व पर उनके चित्रकला विषय में  शोध “भारतीय लघुचित्रों में देवियों का अंकन” पर डॉक्टरेट से सम्मानित किये जाने पर एवं आज 18 फरवरी को आपके 35वे जन्मदिवस पर  ई- अभिव्यक्ति परिवार की और से हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। सत्रह वर्ष की आयु में माँ के निधन के पश्चातआँखों में आजीवन रहने वाले केरटोकोनस नेत्ररोग के होते हुए भी यह उपलब्धि प्रेरणास्पद है।

आज प्रस्तुत है आपकी कविता मैं “मिली”

 ☆ कविता ☆ मैं “मिली” ☆ डॉक्टर मिली भाटिया ☆ 

हवाओं से बातें करती हूँ

सपनो की दुनिया में

रंगो को भरती हूँ

मैं “मिली”

 

खोई खोई सी रहती हूँ

ज़िन्दगी से उलझती हूँ

दिल की सुनती हूँ

मैं “मिली”

 

आसमान से बातें करती हूँ

फूलों की मुस्कुराहट को

काग़ज़ पर उकेरती हूँ

मैं “मिली”

 

चिड़िया सी चहकती हूँ

चंचल-शोख़ सी थी कुछ

खामोशी से अब बातें रखती हूँ

मैं “मिली”

 

तारों से सुलझती हूँ

बादलों सी बरसती हूँ

काग़ज़ को कलम से सजाती हूँ

मैं “मिली”

 

अब भी बस

खोई खोई सी रहती हूँ………..!!

मैं “मिली”

 

© डॉक्टर मिली भाटिया

रावतभाटा-राजस्थान

मोबाइल न०-9414940513

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.५४॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.५४॥ ☆

तस्माद गच्चेर अनुकनखलं शैलराजावतीर्णां

जाह्नोः कन्यां सगरतनयस्वर्गसोपानपङ्क्तिम

गौरीवक्त्रभ्रुकुटिरचनां या विहस्येव फेनैः

शम्भोः केशग्रहणम अकरोद इन्दुलग्नोर्मिहस्ता॥१.५४॥

 

आगे तुम्हें हिमालय से उतरती

कनखल निकट मिलेगी जन्हुकन्या

सगर पुत्र हित स्वर्ग सोपान जो बन

धरा स्वर्ग संयोगिनी स्वयं धन्या

धरे चंद्र की कोर को उर्मिकर से

उमा का भृकुटि भंग उपहास करके

फेनिल तरल , मुक्त मधुहासिनी जो

जहाँ केश से लिप्त शंकर शिखर के

 

शब्दार्थ    ..  कनखल… हरिद्वार के निकट एक स्थान

जन्हुकन्या..गंगा नदी

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 66 – स्मृती चिन्ह…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #66 ☆ 

☆ स्मृती चिन्ह…! ☆ 

कविसंमेलन गाजवून

घरी गेल्यावर

माझी माय ,

माझ्या हातातल्या स्मृती चिन्हांकडे

निरखून बघते . . . !

माझ्या चेह-यावरचा आंनद

काही क्षण डोळ्यात

साठवते … !

आणि हळूच विचारते

आज तरी . .

नाक्यावरच्या वाण्याचा

उधारीचा प्रश्न मिटणार का..?

मी चेह-यावरच आनंद

तसाच ठेऊन

दहा बाय दहाच्या खोलीत

ठेवलेल्या सगळ्या स्मृती चिन्हांवर

नजर फिरवतो,

तेव्हा वाटतं

ह्या स्मृती चिन्हांच्या बदल्यात

जर वाण्याच्या उधारीचा प्रश्न

मिटला असता तर किती

बरं झाल असतं….!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाडे ☆ सुश्री मानसी चिटणीस

 ☆ कवितेचा उत्सव ☆ झाडे ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆ 

दिवसाच्या ऐन भरात

सळसळणारी ती….

मिटल्या पापण्यांच्या मध्यान्ही,

पांघरतात वेदनांचे पांढरेधोप शेले…

अन् रात्र होताच विरघळू लागतात

त्यांच्या सदेह सावल्यांचे पिसारे

संथ जलाशयांच्या किनारी…

झाडे,

स्थितप्रज्ञ होतात..,निमग्न होतात आराधनेत

उमलणा-या प्रत्येक प्रज्ञेच्या अस्तित्वासाठी

मांडतात आपल्या पानांची आसने…

अन् नम्र होतात

स्वतःचे कणे त्या प्रज्ञेला बहाल करून…..

तेव्हाच कदाचित…

झाडे….

बोधिवृक्ष  होतात….

 

©  सुश्री मानसी चिटणीस

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अ ल क ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये

सौ. राही पंढरीनाथ लिमये

(गेली वीस वर्षे मासिकात कथा, कविता लिहिते. ललना, माहेर, उत्तम कथा, मानिनी, प्रपंच दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.)

 ☆ जीवनरंग ☆ अ ल क ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆ 

1) पंचवीस वर्षे पलंगावर लोळागोळा होऊन पडलेल्या आणि नुकत्याच शांत झालेल्या मुलाच्या देहाकडे शीलाताई शांतपणे पहात होत्या. मनात भावनांचा कल्लोळ होता पण चेहरा निर्विकार होता. सगळे शोक व्यक्त करत होते. हळुच त्या देवघरात गेल्या. बाळकृष्णाला हात जोडले. तुझे आभार कसे मानू?अनंत उपकार केलेस. रोज तुला प्रार्थना करत होते माझ्या आधी माझ्या या गोळ्या ला ने.लाज राखलीस. खरा सखा झालास.आता मागे काही चिंता नाही. मी सुखाने डोळे मिटीन.

2) ती त्याच्या फोटो समोर उभी राहुन म्हणाली तुला माहितेय माझी मैत्रीण मला म्हणाली हल्ली तु शब्दातुन छान व्यक्त होतेस.ती आता माझी गरज झाली का रे? तु असताना कुठल्याही परिस्थितीत असणारी तुझी भक्कम साथ.तुझ्यावरचा दृढ विश्वास हा च मोठा भावनिक आधार होता. आता तो मी शब्दातुन शोधतेय का?सांग ना. तो फोटोतुन हसत होता. तिचे डोळे भरून आले.

अल्याड पल्याड चं हे अंतर–‐—-‘.

3) रात्री उशिरा फोन वाजला. बस दरीत कोसळली होती. तो रेस्क्यु टीम मध्ये होता. ती म्हणाली सांभाळून हं.त्याने तिला जवळ घेतलं. तुझा हा च शब्द मला सुरक्षित ठेवतो.तो भराभर निघुन गेला. ती दारातून अभिमानाने बघत होती. ती देवघरात आली. समई लावली आणि हात जोडून उभी राहिली. काही सांगायचं नव्हतच.कारण सांभाळून ह्या तिच्या शब्दातल॔ सुरक्षा कवच देवाच्या आशीर्वादाचच तर होतं.

 

सौ. राही पंढरीनाथ लिमये

मो  नं 9860499623

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – कल्पक योजना ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – कल्पक योजना ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

?लघु बोध कथा?

कथा २०. कल्पक योजना

यवन देशात ‘महमूद सुलतान’ नावाचा राजा होता. परदेशात जाऊन युद्ध करण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याच्या प्रजेला खूप त्रास होत होता. त्यामुळे देश ओसाड, रिक्त झाला. जनता देश सोडून जाऊ लागली. तेव्हा त्याच्या मंत्र्याने ‘काहीतरी उपाय करून राजाची विवेकबुद्धी जागृत केली पाहिजे’ असा पक्का निर्धार केला. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो राजाशी संवाद साधत असे, तेव्हा तेव्हा तो म्हणत असे, “मी पूर्वी एका सिद्धपुरुषाची सेवा केली होती. त्याच्या कृपेमुळे मी पक्ष्यांची भाषा शिकलो. पक्षी जे बोलतात ते सगळे मला कळते.”

एकदा शिकारीहून परत येताना राजाने मार्गात एका वृक्षावर बसलेल्या घुबडांचे बोलणे ऐकून मंत्र्याला उद्देशून म्हटले, “अरे, तू पक्ष्यांची भाषा जाणतोस ना? तर हे दोन घुबड काय बोलत आहेत ते मला सांग.” खरोखरच ते बोलणे समजत आहे असे भासवत मंत्र्याने काही वेळ ते कूजन ऐकले आणि राजाला म्हणाला, “महाराज, आपण ते बोलणे ऐकणे योग्य नाही.” “जे काही असेल ते पण तू मला सांगितलेच पाहिजेस” असा आग्रह राजा करू लागला तेव्हा विनयपूर्वक मंत्री सांगू लागला.

“महाराज, या दोन घुबडांपैकी एका घुबडाला कन्या तर दुसऱ्याला पुत्र आहे. दोघांचाही त्यांच्या विवाहासाठी प्रयत्न चालू आहे. पुत्र असलेल्या घुबडाने दुसऱ्या घुबडाला शेवटी विचारले की ‘माझ्या पुत्राला कन्या देताना पन्नास उजाड गावे देणार का?’ ‘देवाच्या कृपेने आमचे सुलतान महमूद सुखाने राज्य चालवीत आहेत. तेव्हा आमच्याकडे उजाड गावांना काहीही तोटा नाही. आपण पन्नास उजाड गावे मागीतलीत, मी पाचशे देईन’ असे कन्या असलेले घुबड म्हणाले.”

मंत्र्याचे बोलणे ऐकून दुःखी झालेल्या राजाने तत्काळ उजाड गावांचे नूतनीकरण केले व विनाकारण युद्धे करणे थांबवून प्रजेला सुखी केले.

तात्पर्य –चातुर्याने आखलेली योजना सफल होतेच.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

विश्वविधात्याने विश्वाच्या पसा-यातील अनुरेणू एवढा नगन्य तुकडा आपल्या हाती सुपूर्द करून आपल्याला या धरेवर जीवन व्यथीत करायला या मोहमयी धरेवर धाडले आहे. याची आपणास जाणीव असायलाच हवी. इथे धाडतानाही त्याने आपल्याला रिक्त हातानेच पाठवले आणि इथून निघताना ही रिक्त हातानेच परतण्याची सक्त ताकीद देऊन ठेवली आहे. ती मोडण्याचे धाडस आपण करूच शकत नाही. कारण त्याने आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातातच ठेवली आहे. इथे येतानाही विधात्याने आपल्याकडून आयुष्याच्या मर्यादेचा करार करून परतीची आपणास माहीत नसणारी तारीख  नोंदवून ठेवली आहे. तिचेही आपण उल्लघण करू शकत नाही. आपण इतके दुबळे आहोत हे माहिती असूनही माणूस किती तोरा मिरवतो यांचा आपल्या सहीत सर्वांचं अनुभव आहे.आध्यामवाद्यानी याचीअनेक वेळा जाणीव करून देवून ही कोणीच फारसा जागा होताना दिसत नाही. करण माणूस हा शेवटी माणूस च आहे. चतूर आहे. कर्तृत्व संपन्न आहे.सगळे मान्यकरूनही तो आपणच आपली तयार केलेली “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” ही म्हण विसरायला तयार नाही. कारण तो सातत्याने प्रयत्नवादीच राहीला आहे.पुढेही अनेक पिढ्या तो तसाच रहाणार आहे.त्याला माहीत आहे.आपल्या हाती ” काळ थोडा आणि सौंगे फार” आहेत. सामर्थ्याची दारू ठासून भरलेल्या शिवाय आयुष्याच्या रणांगणावर कर्तव्याच्या तोफा विजयी उन्मादाने धडाडत नाहीत.

इवल्याशा कर्तव्याचा साकव बांधून संकटाचा महासागर पार करायला निघालेलो आम्ही लोक आहोत.सामना महाबलीशी आहे.जिंकण्याची आशा तर

मूळीच नाही.पण जन्मताच मरण पदराशी बांधून घेतल्याने विजय पराजयाची तमा बाळगून लढण्याने काय हाशील होणार आहे.मग आहे ते कर्तव्य सोडून कशाला पळ काढायचा? लढा,कटा,मरा.  निदान त्या मुळे तरी संघर्ष करणा-यांच्या यादीत तुमचे नाव नोंदवले जाईल.तुमची पुढची पिढी ठरवेल ते योग्य की आरोग्य ते.फक्त एक लक्षात ठेवा तुमची लढाई लोक कल्याणासाठीच असायला हवी.देह तुमचाच आहे.तो असातसा खर्ची पडणारच आहे.पण जाता जाता काळाने दिलेली भेट स्विकारताना आनंदी व्हायला आणि समाधानाने जयला काय हरकत आहे.

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

छोट्या बोटीतून जाताना आम्हाला भीती वाटत होती,पण त्या बोटीवर काम करणारे लोक मात्र लीलया या होडीतून त्या होडीत जा -ये करत होते.

दूरवर दिसणारी छोटी छोटी बेटं हिरवीगार दिसत होती. त्या हिरवाईचे प्रतिबिंबच जणू पाण्यात दिसत होते! या बीच वर काचेच्या बोटीतून समुद्रात खोलवर घेऊन जातात, तेव्हा पायाशी असलेल्या काचेतून समुद्राच्या तळाशी असलेले तर्हेतर्‍हेचे रंगीबेरंगी मासे, कोरल्स, कासवं आणि खूप रंगीत रंगाचे दगड-गोटे आणि काय काय पहात होतो ते सांगता येत नाही. त्या बोटीतून बाहेर पडल्यावर आम्ही तिथे स्नाॅर्केलिंगही केले. समुद्राच्या तळातील दौलत बघता-बघता चार पाच तास कसे गेले कळलंच नाही.

या नंतर पोर्टब्लेअर चा मुक्काम संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी राॅस आयलंड बघण्यासाठी निघालो.

क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मारवा~पूरिया या प्रसिद्ध जोडीतील पूरिया या रागाविषयी आपण आज विचार करू या.

मागील लेखांत आपण पाहीले आहे की मारवा पूरिया सोहोनी ही एकाच कुटुंबातील सख्खी भावंडे! परंतु वादी~ संवादी स्वरांच्या भिन्नतेमुळे प्रत्येकाचे चलन स्वतंत्र, अस्त्तित्व स्वतंत्र! पूरियांत गंधार व निषाद ह्या स्वरांना अधिक महत्व आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी हा राग सादर केला जातो. मध्यम जरी तीव्र असला तरी मारव्याची उदासीनता पूरियांत नाही. मात्र ह्याची प्रकृती काहीशी गंभीरच! अधिकतर पूरिया मंद्र व मध्य सप्तकात गायिला वाजविला जातो, म्हणजेच हा पूर्वांगप्रधान राग आहे. स्वरांच्या वक्रतेमुळे हा राग मनाला मोहवितो. जसे~”नी (रे)ग, (म)ध ग(म)ग, ध नी  (म)ध ग(म)ग,” अशा प्रकारे वक्र स्वररचना आढळते. नि (रे)सा, ग(म)ध नी (रे)सा/सा नी ध (म)ग (रे)सा असे याचे आरोह/अवरोह आहेत. ‘ग, नी (रे)सा, नि ध नि (म)ध (रे) सा’ या स्वरसूमूहावरून पूरियाची तात्काळ ओळख पटते. या रागाचे पूर्ण चलनच वक्र आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खाॅं यांच्याविषयी असे सांगितले जाते की मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषदेत बडे गुलाम अली यांनी अल्लादिया खाॅं, फैय्याज खाॅं, हाफीज अली खाॅं यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मारवा आणि पूरिया हे दोन राग एकापाठोपाठ गायले होते, आणि त्यांचे गायन ऐकून बूजूर्ग मंडळी अगदी अवाक झाली. एका रात्रीतच बडे गुलाम अलीना मुंबईत प्रसिद्धी मिळाली.

वियोग,शृंगाररसोपयुक्त असा हा पूरिया,कारूण्यपूर्ण श्रृंगार हाच या रागाचा स्थायीभाव!

शूद्ध पूरियांतील गाणी सहसा सांपडत नाहीत, परंतु ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’, ‘मुरलीधर शाम हे नंदलाला’, ‘क्षणभर उघड नयन देवा’ ही काही भावगीते, भक्तीगीते पूरिया रागावर आधारित  म्हणून उदाहरणादाखल देता येतील. “जिवलगा राहीले दूर घर माझे” ह्या भावगीतांत पूरियाचे स्वर असले तरी त्याबरोबर धनाश्री येऊन तो पूरिया धनाश्री झाला आहे. पूरियांत नसलेला पंचम ह्यांत आहे. सूरत और सीरत या चित्रपटांतील ‘प्रेम लगन’, आई मिलनकी रात मधील कितने दिनो की बात आई सजना रात मिलनकी, ‘रंगीला मधील ‘समा ये क्या हुआ, रुत आ गयी रे रुत छा गई रे’ ही काही बाॅलीवूड गाणी पूरिया धनाश्रीची उदाहरणे सांगता येतील ह्या गाण्यांकडे पाहीले असता पूरिया हा करूणरसप्रधान शृंगार वर्णन करणारा राग असल्याचे सर्वसामान्यांच्याही लक्षात येते.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 83 – सांझ होते ही…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(वरिष्ठ साहित्यकार एवं अग्रज श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी स्वास्थ्य की जटिल समस्याओं से  सफलतापूर्वक उबर रहे हैं। इस बीच आपकी अमूल्य रचनाएँ सकारात्मक शीतलता का आभास देती हैं। इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना सांझ होते ही ….। )

☆  तन्मय साहित्य  #83 ☆ सांझ होते ही ….

सांझ होते ही यादों का, दीपक जला

रात भर फिर अकेला ही जलता रहा,

बंद  पलकों  में, आए  अनेकों  सपन

सिलसिला भोर तक यूं ही चलता रहा।।

 

शब्द  हैं  सब  अधूरे, तुम्हारे बिना

अर्थ अब तक किसी के मिले ही नहीं,

स्वर्ण बासंती मधुमास जाने को है

पुष्प अब तक ह्रदय के खिले ही नहीं,

 

सीखते सीखते प्रीत के पाठ को

प्रार्थना भाव से रोज पढ़ता रहा।

सिलसिला भोर तक…

 

नर्म सुधीयों का एहसास ओढ़े हुए

कामनाओं का, निर्लज्ज नर्तन चले,

दर्द है  कैद,  संयम  के  अनुबंध में

प्रीत की रीत को जग सदा ही छले,

 

प्रेम  व्यापार  में  मन अनाड़ी  रहा

दांव पर सब लगा हाथ मलता रहा।

सिलसिला भोर तक ….

 

है विकल सिंधू सा, वेदना से भरा

नीर निर्मल मधुर पान की प्यास है,

चाहे बदरी बनो या नदी बन मिलो

बूंद स्वाति की हमको बड़ी आस है,

 

मन में  ऐसे  संभाले  रखा  है तुम्हें

जिस तरह सीप में रत्न पलता रहा।

सिलसिला भोर तक यूं ही चलता रहा।।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश0

मो. 9893266014

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares