मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 34 ☆ माझीया प्रियाला प्रीत कळेना… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 34 ☆ 

☆ माझीया प्रियाला प्रीत कळेना… ☆

 

माझीया प्रियाला प्रीत कळेना

मज तया वांचून रहावेना

काहीच काम करवेना…

 

माझीया प्रियाला प्रीत कळेना

व्याकुळ मन, भान हरपले

त्याने माझी चित्त चोरले…

 

माझीया प्रियाला प्रीत कळेना

दिवस माझा, जाता जाईना

आता काहीच, बोलवेना…

 

माझीया प्रियाला प्रीत कळेना

शब्दाला आकार येईना

डोळ्यातील नीर, थांबेना…

 

माझीया प्रियाला प्रीत कळेना

अबोल भावना, काळ क्षेपवेना

अन्यत्र लक्ष, कसेच लागेना…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

परिचय 

शिक्षा – B.Com., A.T.D.A.M.

कला शिक्षक – राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सांगली.
पुरस्कार –  
  1. राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार (2008 व 2019)
  2. राज्य पर्यावरण विभाग चा सृष्टी मित्र पुरस्कार  (2019)
  3. शिक्षण मंडळ कराड यांचा साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार (2019)
  4. कर्मव्रती पुरस्कार (2018) वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी.सांगली .

साहित्य पुरस्कार –

  1. आम्ही तुमचे सोबती या पुस्तकास तीन पुरस्कार
  2. उत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती पुरस्कार (2012) मराठी बालकुमार साहित्य सभा,कोल्हापूर.
  3. बालनाट्य लेखन पुरस्कार, सांगली शिक्षण संस्था (शताब्दी महोत्सव)
लेखन –
  1. आम्ही तुमचे सोबती…एकांकिका
  2. शाळेला चाललो आम्ही…पथनाट्य
  3. स्वरा बोलू लागली…कथासंग्रह
  4. वाघोबाचे दुकान….कविता  संग्रह
  5. कोंडमारा….कविता संग्रह
  6. अनेक दैनिके,मासिके यातून नियमित लेखन व पुरस्कार प्राप्ती
  7. प्रकल्पात व सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग,सल्लागार,संचालक

 ☆ जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

विभा ठाणे रेल्वेस्टेशनवर उतरली सकाळचे आठ सव्वा आठ वाजले होते. आजवर सिनेमांतून, सिरियल मधून, कथा कादंबरीतून, वाचलेले मुंबई शहर आज प्रत्यक्ष बघत होती. गर्दीचा सागर उसळला होता.या अफाट गर्दीत तिला ओळखणारे कोणी नव्हते. शेजारच्या गीता काकूंची बहिण निर्मला तिला घ्यायला स्टेशनवर येणार होती.त्यांचा फोटो मोबाईल मध्ये बघितला होता. त्यांना फोन केला नाॅटरिचेबल आला. गीता काकूंचा फोन ऐंगेज येत होता.आता काय करावे सुचत नव्हते.आपण नवखे आहोत हे दाखवायचे नाही. असे ठरवून ती वावरत होती. पण चिंता चेहऱ्यावर दिसत होती. दोन-तीन वेळा ट्राय केल्यावर गीता काकूंचा फोन लागला एकदाचा. इथली अडचण तिने सांगितली आणि एका बाकावर बॅग जवळ घेवून बसली. मनात विचार आला…. समजा निर्मला अंटीची भेट झाली नाही तर ?आपले काय होणार? या अनोळखी शहरात कुठे जाणर? परत घरी जाणे शक्य नाही. आजवर या शहरा बद्दल किती तरी वाचले होते. इथं लोक कसे फसवतात, लुबाडतात. काही सूचत नव्हते. तेव्हा दुसरे मन म्हणत होते, काही तरी मार्ग निघेल. थोडा धीर धर.तेवढ्यात फोनची रिंग वाजली. निर्मला अंटीचा फोन होता. त्याची भेट झाली. त्याच्या बरोबर घरी गेली. इथं राहून कोणत्याही परिस्थितीत तिला दोन चार दिवसांत स्वत:च्या राहण्यांची सोय करायची होती. तिच्या घरात आधीच सहा माणसे होती. छोट्या जागेत त्यांनी विभाला आसरा दिला. हिच मोठी गोष्ट होती. शाळकरी मुले,ही दोघे जाॅबला, तिचे सासू सासरे घरी कागदी पिशव्या तयार करत होते.भली माणसे होती. विभाला त्यांनी घरच्या सारखे वागवले. त्यांने ती सुखावली आणि भारावली. विभा घराच्या शोधासाठी निर्मला अंटी बरोबर बाहेर पडे. घर भाड्यांने देणे आहे. या जाहिरातीतील बहुतेक घरे पालथी घातली.

अशीच एक जाहिरात वाचून तिने घर गाठले. बेल वाजली. एका तरुणाने दार उघडले केस विस्कटलेले, डोळे तारवटलेले, डोळ्यात झोप, अंगात बनियान, टाॅवेल गुंडाळलेला बहुदा तो नुकताच झोपेतून उठलेला असावा किंवा झोप मोड झाली असेल……..

आपल्या काय करायचं ते “चौधरी इंथच राहतात ना.”

तो म्हणाला “कोण हव आहे?”

“जागा भाड्याने द्यायची आहे ना?”

“पेंईग गेस्ट हवा आहे.”

“मी बघू शकते जागा.”

“कोणासाठी?”

“अर्थात माझ्यासाठी”

“नाही मिळणार.”

“का?”

“मी पुरुष भाडेकरू ठेवू इच्छितो.”

“तसा जाहिरातीत उल्लेख नव्हता.”

“राहिला असेल, पण मी तुम्हाला पेंईग गेस्ट म्हणून नाही ठेवू शकत.तुम्ही एक स्त्री आहात.”

“स्त्री आहे हा गुन्हा आहे का?”

“नाही. पण मी अविवाहित आणि ही रिस्क मी घेवू इच्छित नाही. तेव्हा मला फोर्स करू नका.”

चार पाच दिवस झाले. तंगडतोड करते आहे. एक घर धड  मिळाले नाही.हक्काचा निवारा मिळण्यांची आशा अंधुक होताना दिसत आहे. आता जर माघार घेतली तर मला पुन्हा गाशा गुंडाळून गावाकडे जावे लागेल आणि ते अजिबात परवडणारे नाही. चार दिवसात किती नमुने  बघितले. काहीनी तोंडावर दार लावून घेतलं, काहीजण कुलूप लावून पसार झालेले, तर काही ठिकाणी मी जायच्या आत जागा गेलेली. एखाद्या लाॅजवर रहावं म्हणून चौकशी केली तर कळले तिथे साधे फ्रेश होण्यासाठी तासाला सहाशे, सातशे रूपये मोजावे लागतात. आपल्य सारख्याच ते काम नव्हे. एका दिवसात सगळा पगार जायचा.एवढ्या प्रयत्ना नंतर नशिबाने या घराचा पत्ता मिळाला आहे. आता पर्यंत अनुभव लक्षात घेता, ‘आर या पार’ ही जागा हातची घालवायची नाही.

“मी जाते. पण एक मिनिट माझे ऐकाल आणि योग्य वाटले तर निर्णय तुमचा.”

ही पोरगी भलतीच स्मार्ट दिसते. वेगळा स्पार्क आहे हिच्यात  ऐकून तर घेवू. तिचे मत मानण्याची थोडीच जबरदस्ती आहे.

“हं बोला. दोनच मिनिटात.माझ्याकडे जास्त वेळ नाही.”

“थॅक्स हं. मला सांगा. दोन पुरूष एकत्र राहू शकतात, दोन स्त्रिया एकत्र राहू शकतात तर एक पुरुष आणि एक स्त्री का एकत्र राहू शकणार नाहीत. त्यांची मने स्वच्छ असतील, काही गोष्टी सुरूवातीस स्पष्ट केल्या तर मित्रा प्रमाणे का नाही राहता येणार. “दिल दोस्ती दुनियादारी” टी.व्ही. वर बघितलं ना तुम्ही.”

“हे बोलायला सोपे वाटते. जीवन म्हणजे टी.व्ही वरील मालिका नव्हे. प्राॅक्टिकली हे शक्य नाही. दोन अनोळखी स्त्री पुरुष दहा मिनिटे जरी जवळून चालत गेले तरी लोकांच्या भुवया टउंचावतात. वेगळा अर्थ काढतात. तुम्ही तर एकत्र राहण्यांच्या गोष्टी करता आहात. हे शक्य नाही.”

“आपली गरज महत्त्वाची. आपल्या गरजेला लोक मदत करतात का? तमाशा बघत वेळ घालवतात पण दोन मिनिटे मदत करणार नाहीत. उलट जाताना फुकटचा सल्ला देतील. ती गोष्ट वेगळीच. आपल्या कृतीने दोघांच्या गरजा भागत असतील तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष का द्यायचे. या मताची मी आहे.”

“पण उद्या आपल्या वर शितोंडे उडतील, आपल्या बद्दल लोक वाईट बोलतील त्याच काय?”

“आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो म्हणजे झाले. मी दुनियेची चिंता करत नाही. तुम्हाला आर्थिक गरज आहे म्हणून ही जाहिरात दिली ना? पेंईग गेस्ट स्त्री की पुरुष हा प्रश्न माझ्या दृष्टीने गौण आहे.तुमचा आर्थिक भार हलका होणे महत्त्वाचे.माझी तयारी आहे.तुम्ही ही हो म्हणावे.मी मित्रा सारखी राहीन  हे प्राॅमिस आहे माझे.”

या मुलीच्या बोलण्याची तडफ, तिचे विचार वेगळेच आहेत. खर बोलते ती. तसे ही तिच्या अब्रुसाठी मी नाही म्हणत होतो. तिच जर शंभरावर एक टक्का तयार असेल तर, काय हरकत आहे? जमल तर बघू, नाही तर जागा खाली करायला सांगू पण त्यासाठी आपण ही तिला लेखी करारात बांधून घेतले पाहिजे. नंतर कोणते झंगट नको. आपली अजिबात ओळख नाही, कुणाच्या माहितीतील नाही. केवळ विश्वासाच्या भरोश्यावर निर्णय घेतला पाहिजे.

“ठिक आहे. मी विचार करीन,पण एक लेखी करार करु. तो जर मोडला गेला तर मात्र घर सोडावे लागेल.”

“मला मान्य आहे. पण हे पक्के ना?”

तिथून बाहेर पडताना विभा पिसा पेक्षा ही हलकी झाली. मनावरच ओझं कमी झालं. आता ती तिच्या उद्दिष्टा जवळ आली होती. इथं परक्या ठिकणी उपर राहणं किती अवघड असते हे ती अनुभवत होती. निर्मलाचे उपकार न फेडण्या सारखे होते, कोण कुठली  ती. ना नात्याची ना गोत्याची. तरी पाच सहा दिवस आसरा दिला. मायेन ठेवून घेतले. इथली माहिती दिली. चार ठिकाणी वेळ काढून माझ्यासाठी आली. चार ठिकाण हौसेने दाखवली. जेव्हा नाव प्रवाहात जाणार तेव्हाच धक्का देणे महत्त्वाचे असते. तो आधार मला दिला.

त्या तरुणाचा काय निर्णय येईल, सांगता येत नाही. मला पेंईग गेस्ट म्हणून ठेवून घेईल का नाही माहित नाही. पण तिथं राहणे म्हणजे…. पदरात निखारे बांधून घेण्या सारखे होते. प्रथमदर्शनी ती व्यक्ती सभ्य वाटली. ती तशीच असावी यासाठी प्रर्थना करू शकते चार दिवसांत मी कंपनी जाॅईन करीन. त्यापूर्वी मला निवारा मिळणे आवश्यक आहे. तसे ही मी बारा तास बाहेर असणार. झोपण्यासाठी घर हवं.तिच वेळ घातक असते. सगळे पुरुष वाईट नसतात. संशय घेऊन लागलो तर जगणे मुश्किल होवून जाईल. माझ्या या धाडसाला कोणी वेडेपणा म्हणू  शकेल किंवा आणखी काही पण. माझा माझ्यावर विश्वास आहे. एस.टी., रेल्वे, सिनेमागृह, गर्दीत, तिथे अवतीभवती अनेक पुरूष असतात. आपल्याला सगळ्या पुरुषां बद्दल असे काही वाटते का? आपण तिथे समजूतीने वागतो ना. दुसरीकडे जागा मिळेल ही, पण तेवढा वेळ नाही. किती दिवस निर्मला अंटीकडे रहायचं.’ ऊस गोड लागला म्हणून मूळा पर्यंत खाऊ नये’ त्यानां त्रास देणे मला आवडणार नाही. जसे असेल तसे सामोरे जावे लागणार.

ठरल्या प्रमाणे करारावर सह्या करुन ती रहायला आली. त्यांने तिला खोलीची आणि घराची दोन किल्या दिल्या. ही तुमची खोली. मी रोज संध्याकाळी कामावर जातो. पहाटे घरी येतो. माझ्या किल्लीचा वापर मी करेन. तुम्ही तुमच्या सोईने बाहेर ये जा करु शकता. मला कोणता ही त्रास होता कामा नये. मी पहाटे घरी आलो की दिवसभर झोपतो. मला दंगा आवडत नाही. या गोष्टी मी करारात लिहिलेल्या आहेत, वाचलेल्या असतील. मी बॅंकेचा नंबर देतो तिथे भाडे भरा. त्यासाठी ही माझी वाट बघायची गरज नाही. तुम्ही जेवण तयार करण्यासाठी किचनचा वापर करू शकता. मी घरात जेवण करत नाही. मला हे इथं क ते तिथे का? असे विचारायचं नाही. तुमच्या काही सूचना असतील तर सांगा. तिने बोलणे टाळले, तो रात्रभर घरात नाही हीच मोठी गोष्ट होती. तिने आपले साहित्य लावले. देवाचा फोटो ठेवला.” इथं किराणा मालाचे दुकान कुठे आहे ते सांगा. मी साहित्य घेऊन येते”. त्याने माहिती दिली. तिने घर लावले. तो संध्याकाळी कामावर गेला. रात्री तिला या नवख्या जागेत झोप येत नव्हती. घरची आठवण येत होती.आपल्या घराची ऊब या घरात शोधत होती.

पहाटे पहाटे डोळा लागला.तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. आपला दरवाजा तो ठोठवणार नाही ना? कुलूपाची दुसरी किल्ली त्याकडेआहे. जर तो आत आला तर मी काय करणार?  तिने उश्या जवळ चिलीस्प्रे ठेवला होता तो हातात घेतला, तो जवळ आला तर चिलीस्प्रे डोळ्यात उडवायचा आणि बाहेर पडायचे. एक मोठी काठी ही हाताशी ठेवली होती. आपण आपल्या तयारीत असावे. काय भरोसा. कोण? कधी? कसे? वागेल? तिची छाती थडथडायला लागली. डोळे मिटून घेतले. जीवाचा कान करून ती बाहेरील हलचाली टिपू लागली. तो आला पाणी प्याला आणि झोपी गेला. तेव्हा तिला हायसं वाटलं.

क्रमशः

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सॉरी (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ सॉरी (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मला त्यांना सॉरी म्हणावं लागलं, पण मनात विचार आला, माणसं आताशी कसला विचार करू लागलीत. असं झालं होतं रस्त्यावर खूप गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. मी विचार करत होतो, इतकी गर्दी का झालीय? हळू हळू कडेकडेने मी माझी बाईक घेऊन पुढे जात राहिलो. माझ्या असं लक्षात आला, की बरेचसे लोक आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवण्यात मश्गुल झाले आहेत. मी आणखी थोडा पुढे गेलो. माझ्या लक्षात आलं, की पुढे एक ट्रॅक्टर ट्रॉली चाललीय. तिच्यावर बरंच सामान आहे. ते दोरीने बांधलेलं आहे. पण एका बाजूला ते जरा जास्तच झुकलय. इतकं झुकलय… इतकं झुकलय की वाटतय, ट्रॉली आत्ता उलटतीय की मग उलटतीय. ट्रॅक्टरच्या तरुण ड्रायव्हरला याची कल्पना नाहीये.

मी पटकन माझी बाईक पुढे घेतली आणि ट्रॅक्टरच्या तरुण ड्रायव्हरला म्हंटलं, ‘आपल्या ट्रॉलीवर लादलेलं सामान इतकं एका बाजूला झुकलय की ट्रॉली कधीही उलटू शकेल.’

त्याने माझे आभार मानले आणि ‘आता नीट करतो’,  असं म्हणत ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला थांबवला.

मी त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरशी बोलत असेलेलं अनेकांनी पाहीलं होतं. त्यापैकी काही जण माझ्याजवळ  येऊन म्हणाले, ‘आम्ही ती ट्रॉली उलटण्याचा व्हिडिओ बनवणार होतो. आपण सगळी माजाच घालवून टाकलीत.’ आणखीही काय काय बोलले ते लोक.

मी त्यांना सॉरी म्हंटलं आणि पुढे निघालो.

 

मूळ कथा – ‘सॉरी’ –   मूळ  लेखक – श्री विजय कुमार,

सह संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका), अंबाला छावनी 133001, मोबाइल 9813130512

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – “निवेदिता” भाग-3☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – “निवेदिता” भाग-3 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

सिंध प्रांतात जन्मलेले पाकिस्तानी नागरिक पण मनानं, विचारानं पक्के भारतीय असणारे “तारिक फतेह” यांची मुलाखत बघत होते. एके ठिकाणी ते म्हणाले, “आपली संस्कृती केवढी महान आहे याची जाणीव भारतीयांनाच नसेल, तर दुसरा कुणी काय इलाज करणार यावर?”

हे ऐकून मला भगिनी निवेदितांची आठवण आली. मूळच्या आयरिश, पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या नोबल कुटुंबातील मुलगी “मार्गारेट नोबल” विवेकानंदांची व्याख्यानं ऐकून त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला भारतात आली आणि “भगिनी निवेदिता” झाली हे बहुधा सगळ्यांना माहीत असतं. पण त्यांच्या कार्याची व्याप्ती इतिहासाचं पाठ्यपुस्तक आपल्याला सांगत नाही. निवेदता मुळात एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यामुळे भारतात त्यांनी विवेकानंदांच्या सांगण्यावरून प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. स्त्रीशिक्षणाचं हे कार्य अवघडच होतं आणि निराशा पदरात टाकणारं. पण त्यांनी ते मोठ्या उत्साहाने केले.. वाढवले. कलकत्त्यात प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी “Do’s” and “Don’t s” चे पोस्टर्स बंगालीत ठिकठिकाणी लावले. घरोघरी जाऊन, रस्त्यावर स्वतः स्वच्छता केली, औषधफवारणी केली. वाड्यावस्त्यांमधून हिंडून लोकांची शुश्रुषा केली.

सशस्त्र क्रांतीकारकांच्या त्या आश्रयस्थान होत्या; ज्या क्रांतीकारकांमधे विवेकानंदांचे भाऊही होते. त्या काळी नुकत्याच सुरू झालेल्या “रामकृष्ण मिशन” ला सरकारचा रोष ओढवून घेणं परवडणारं नव्हतं कारण कार्य थांबून चालणार नव्हतं. म्हणून रामकृष्ण मिशन ने अधिकृतपणे निवेदितांचा मिशनशी काही संबंध नाही असं पत्रक काढलं. पण मिशनच्या संन्यस्त कार्यकर्त्यांनी त्यांना व्यक्तिगत आयुष्यात सदैव साथच दिली आणि निवेदितांनी विवेकानंदांच्या आईला अखेरपर्यंत सांभाळले.

त्यांना चित्रकलेची उत्तम जाण होती. अनेक नामवंत चित्रकार त्यांना मानत. निवेदितांचा सदैव आग्रह असे, की भारतीय कलाकारांनी आपलं भारतीयत्व सोडू नये. मग ती कला चित्रकला असो, संगीत असो, साहित्य असो…. या सर्व क्षेत्रात भारतीय संस्कृती इतकी समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे, की इतरांचं अनुकरण करण्याची भारतीयांना गरज नाही. फक्त कलाकारांनी नव्हे, तर एकूणच भारतीयांनी आपली संस्कृती सोडू नये. पाश्चिमात्यांचं आंधळं अनुकरण करू नये हा त्यांचा आग्रह होता. चित्रकलेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान मोठं होतं. (प्रत्यक्ष चित्रांच्या स्वरुपात नाही.. तर अनेक नामवंत चित्रकारांना केलेल्या मार्गदर्शनाच्या स्वरूपात)

इंग्लंडच्या पार्लमेंटमधे भारताबद्दल माहिती देऊन इंग्रजांकडून त्याच्यावर अन्याय होतोय हे निवेदितांच्या व्याख्यानांमुळंच लोकांना कळलं.

आयुष्याच्या संध्याकाळी त्या काहीशा एकट्या पडलेल्या होत्या. अंतकाळचे त्यांचे शब्द होते, “बोट बुडतेय.. पण मला सूर्योदय होताना दिसतोय”

भारताला स्वातंत्र्य मिळालं.. पण भारतीयांमध्ये स्वत:च्या संस्कृतीबद्दल अभिमान असावा हे त्यांचं पोटतिडकीने सांगणं कितपत यशस्वी झालं…. कुणास ठाऊक!

कारण संस्कृती म्हणजे फक्त नऊवारी साडी आणि नथ किंवा धोतर नव्हे.. देवदेवतांसाठी किंवा महापुरुषांसाठी, सणवारांच्या निमित्ताने काढलेल्या उन्मादी रॅल्या नव्हेत.. जी पिढ्यानपिढ्या रक्तातून सळसळते आणि विचार, विवेकाच्या काठांमधून वाहते ती संस्कृती निवेदितांना अभिप्रेत होती.

काही वर्षांपूर्वी कोलकत्याला गेले, तेव्हा पूर्ण शहरात निवेदितांच्या खुणा शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कालौघात हे शहर, हा देश त्यांना विसरणं स्वाभाविकच आहे… हे समजून घेतोच की आपण! मीही घेतलं.

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 13 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 13 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

प्रात्यक्षिक परीक्षेची माझी तयारी जोमाने सुरु होती.  माझी त्या  बद्दलची मनातली भीती ही पूर्ण निघून गेली. केव्हा एकदा परीक्षक येतात आणि माझी परीक्षा घेतात याची मला उत्सुकता लागून राहिली.

मनामध्ये लेखी परीक्षेची मात्र धाकधूक होतीच. आत्तापर्यंत पूर्ण दृष्टी गेल्यानंतर चौथी ते बीए पर्यंतच्या सगळ्या परीक्षा मी खालच्या वर्गातील लेखनिक अर्थात रायटरच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. आता मात्र एम ए या परीक्षेसाठी असणारा अभ्यास, हा वरच्या पातळीवरचा होता. त्यासाठी मला संदर्भग्रंथ ही वाचून घ्यावे लागणार होते. त्यासाठी रोज दुपारी गोखले काकून बरोबर तीन ते साडेचार पर्यंत जोरदार वाचन सुरू झाले होते. आमची खरी कसरत होती ती तत्त्वज्ञानाचे गाढे, जाडजूड पुस्तक वाचताना आणि ऐकताना. त्यामधली गूढ तत्वे, अवघड विचार बोजड नावे आणि त्यातल्या संकल्पना मधली जटिलता डोक्यात लवकर शिरू शकत नव्हती. आम्हाला हे जड जाते,  लवकर लक्षात येत नाही हे समजल्यावर आम्हा दोघींनाही हसू येत होते. पण नेटाने वाचन मात्र आम्ही सुरुच ठेवले. हा किचकट अभ्यास सुरू असताना अधेमधे कधी आई,  तर कधी बाबा आम्हाला वेलची घातलेला चहा, आल घातलेलं थंडगार लिंबू सरबत देऊन आम्हाला उत्साही करत असत. गोखले काकू जेव्हा वाचन करत असत, त्यावेळी मी माझ्या टेप रेकॉर्ड वर त्याच्या कॅसेट्स बनवून घेत असे आणि मला वेळ मिळाल्यावर ते ऐकून माझ्या मेंदूमध्ये मी सेव्ह करून ठेवत होते. असा सगळ्या विषयांचा माझा अभ्यास वेग घेत होता.

टी म वी म्हणजे ज्या विद्यापीठाचे परीक्षा देत होते त्यांचेही सहकार्य मला खूप लाभले होते. पेपर मध्ये प्रश्नांचा अंदाज येण्यासाठी, मी फोन करून आधीच्या परीक्षांचे पेपर्स मागवून घेत असे.  ते हि ते लगेच पाठवून देत. थोड्या वेळ झाला तरी माझा फोन लगेच गेलाच म्हणून समजा. त्यांनाही माझा आवाज ओळखीचा झाला होता. मी पूर्ण अंध असूनही स्वतः फोन करते याचे कौतुक वाटून ते मला त्वरित मदत करत असत.

प्रत्यक्ष परीक्षा देण्याकरता, मला रायटर ची जुळवाजुळव आधीच करून ठेवावी लागणार होती. मला लेखनिक असा हवा होता की त्याचे अक्षर चांगले असेल, जो मी  सांगितल्या सांगितल्या त्याच वेगाने भरभर लिहून काढेल. तो किंवा ती माझ्यापेक्षा वयाने आणि शिक्षणाने लहान असेल. परमेश्वर कृपेने श्रद्धा म्हस्कर नावाची मुलगी मला भेटली, माझी मैत्रीण झाली आणि तिने माझे पेपर्स, माझ्या मनाप्रमाणे उत्तम तऱ्हेने लिहून काढले. लेखी परीक्षा अशी कडक होती ज्यामध्ये मी आणि श्रद्धा हॉलमध्ये दोघीच असू आणि परीक्षक आमच्या मागेच बसलेले असत. मी सांगते ती प्रत्येक ओळ न् ओळ, शब्दन शब्द श्रद्धा लिहिते ना,  आणखी दुसरे काही वाचत तर नाही ना,  यावर त्यांची कडक नजर असे. अशा तऱ्हेने माझी.  प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा उत्तम रित्या पार पडली.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 83 ☆ व्यंग्य – लफड़े बाबू और परीक्षा की घड़ी  ☆ डॉ कुंदन सिंह परिहार

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है आपका एक  बेहद मजेदार व्यंग्य  ‘लफड़े बाबू और परीक्षा की घड़ी  ‘। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 83 ☆

☆ व्यंग्य – लफड़े बाबू और परीक्षा की घड़ी

बैंक के वरिष्ठ क्लर्क लफड़े बाबू के यहाँ सबेरे से ही गहमागहमी है। बरामदे में आठ दस कुर्सियाँ डाल दी गयी हैं। दोस्त-रिश्तेदार सहानुभूति जताने और लफड़े बाबू के डिपार्टमेंट को कोसने के लिए बारी बारी से आकर उन पर बैठ रहे हैं। बीच में चेहरे पर भारी शिकायत का भाव लिये खुद लफड़े बाबू विराजमान हैं।

वजह यह थी कि लफड़े बाबू पिछले दिन बैंक में पैसों की हेराफेरी करने के मामले में सस्पेंड कर दिये गये थे। कुछ खातों में बरसों से जमाकर्ताओं के लाखों रुपये पड़े थे जिन्हें निकालने कोई नहीं आ रहा था। लफड़े बाबू से पैसों का यह दुरुपयोग नहीं देखा गया, सो उन्होंने अपने बीस पचीस साल के अनुभव का सदुपयोग करते हुए उस पैसे को निकाल लिया और उसे प्रत्यक्ष रूप से अपने विकास में और परोक्ष रूप से देश के विकास में लगा दिया। यह काम धीरे धीरे तीन चार साल में संपन्न हुआ, लेकिन कुछ विघ्नसंतोषी लोगों ने तिल का ताड़ बना दिया और लफड़े बाबू खामखां सस्पेंड हो गये।

अब लफड़े बाबू हर आने वाले के सामने कैफ़ियत दे रहे थे—-‘ज़माना खराब है। सही काम का गलत नतीजा निकलता है। ठीक है, हमने हेराफेरी की। लेकिन हमारी नीयत और हमारा इरादा तो देखिए। लाखों रुपये बेमतलब खाते में पड़े हैं। कोई धनी-धोरी नहीं। हमने सोचा इस बेकार पड़े पैसे को किसी काम में लगा दिया जाए तो क्या गलत किया?आखिर उससे चार आदमियों को धंधा रोजगार मिला। उनका भला हुआ। बताइए क्या गलत किया?’

सामने बैठे शुभचिन्तक सहमति में सिर हिलाते हैं।

लफड़े बाबू दुख और शिकायत के भाव से कहते हैं, ‘पचीस साल की सर्विस पर एक मिनट में पानी फेर दिया। ठीक है, आप एक्शन लीजिए, लेकिन आदमी की पोज़ीशन और उसकी सीनियरिटी पर भी गौर कीजिए। गधे घोड़े सब बराबर कर दिये। आज आखिर मेरी क्या इज्ज़त रह गयी स्टाफ के सामने? अखबार वालों को देखिए, वे अलग मज़ा लेने में लगे हैं।’

शुभचिन्तक फिर सिर हिलाते हैं, कहते हैं, ‘ठीक कहते हैं। बहुत गलत हुआ। बड़ा अन्याय है। ‘

लफड़े बाबू कहते हैं, ‘डिपार्टमेंट वालों को भी क्या दोष दें। ये जो सब कायदे कानून हैं, सब बाबा आदम के ज़माने के बने हुए हैं। आदमी का कसूर देखा और छपी छपाई सज़ा दे दी। अब ज़माना कहाँ से कहाँ पहुँच गया तो ये नियम कायदे भी बदलना चाहिए। अगर आदमी हेराफेरी कर रहा है तो यह देखना चाहिए कि उसका इरादा और उद्देश क्या है। अगर इरादा अच्छा है तो सज़ा की क्या तुक है? लेकिन सब लकीर के फकीर हैं, पढ़े-लिखे मूरख। इनको कैसे समझाया जाए? हमारी सारी पोज़ीशन एक मिनट में धो कर धर दी।

‘डिपार्टमेंट कहता तो हम एक मिनट में सारा पैसा लौटा देते। जब कर नहीं तो डर काहे का? लेकिन कुछ समझना-पूछना ही नहीं है तो हम क्या करें भई?’
हमदर्द फिर सहानुभूति में सिर हिलाते हैं।

लफड़े बाबू फिर दुखी हो जाते हैं। कहते हैं, ‘सब कुछ ऐसा बढ़िया चल रहा था। खामखां लोगों ने परेशानी पैदा कर दी। यह सब कारस्तानी उस मिचके बाबू की है।’
हमदर्द पूछते हैं, ‘कौन मिचके बाबू?’

लफड़े बाबू जवाब देते हैं, ‘है एक। चश्मे के पीछे आँखें मिचकाता रहता है, इसलिए सब मिचके बाबू कहते हैं। अपने को बड़ा ईमानदार समझता है। जब देखो तब फाइलों में घुसा रहता है। एक फाइल से निकलेगा, दूसरी में घुस जाएगा। उसी की करतूत है। उसी ने फाइलों में घुसकर हमें फँसाया है।’

शुभचिन्तक कहते हैं, ‘बड़ा गड़बड़ आदमी है। आपको बेमतलब चक्कर में डाल दिया।’

लफड़े बाबू कहते हैं, ‘बड़ा घटिया आदमी है। इसी ने भिंगे बाबू को भी फँसाया था। बेचारे आठ-दस साल से धीरे-धीरे थोड़ा-थोड़ा पैसा खा रहे थे। किसी को हवा नहीं थी, लेकिन इसने सूँघ लिया और सीधे-सादे आदमी का कैरियर चौपट कर दिया। बेचारे को जेल हो गयी। अंधेर है।’

शुभचिन्तक फिर अपनी सहमति जताते हैं।

लफड़े बाबू कहते हैं, ‘इस आदमी को ठीक ज़रूर करूँगा। साले का हुलिया बिगाड़ दूँगा। ज़रा इस मामले से बरी हो जाऊँ फिर देखता हूँ। बना बनाया कैरियर बिगाड़ दिया।’

शुभचिन्तक विदा लेने के लिए खड़े होते हैं। हाथ जोड़ते हुए कहते हैं, ‘यह आपकी परीक्षा की घड़ी है, लफड़े बाबू। आप इससे तप कर, सोना बनकर निकलेंगे, ऐसा हमारा पक्का विश्वास है।’

लफड़े बाबू भी हाथ जोड़ते हैं, कहते हैं, ‘हौसला बढ़ाने के लिए धन्यवाद। इस परीक्षा से मैं निश्चय ही तप कर, बेहतर बन कर निकलूँगा। आप देखना, इससे मेरी पर्सनैलिटी में और निखार आएगा। जो होता है, अच्छे के लिए होता है। अपनी नीयत ठीक रखना चाहिए।’

 

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ पराक्रम दिवस विशेष – महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस – भाग – 2☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

(ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए चार भागों में क्रमबद्ध प्रस्तुत है पराक्रम दिवस के अवसर पर श्री संजय भारद्वाज जी का विशेष  ज्ञानवर्धक एवं प्रेरणास्पद आलेख महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस। )  

Subhas Chandra Bose NRB.jpg

☆ पराक्रम दिवस विशेष – महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस – भाग – 2 ☆

(केंद्र सरकार ने उनके जन्मदिवस को पराक्रम दिवस के रूप में मनाने का निश्चय किया है। इस अवसर पर नेताजी पर लिखा अपना एक लेख साझा कर रहा हूँ। यह लेख राष्ट्रभाषा प्रचार समिति की पुस्तक ‘ऊर्जावान विभूतियाँ’ में सम्मिलित है– संजय भारद्वाज )

16 जनवरी 1941 को  सुभाषबाबू जियाउद्दीन नामक एक पठान का रूप धरकर नजरकैद से निकल भागे। वे रेल से पेशावर पहुंचे। भाषा की समस्या के चलते पेशावर से काबुल तक की यात्रा उन्होंने एक अन्य क्रांतिकारी के साथ गूंगा-बहरा बनकर पहाड़ों के रास्ते पैदल पूरी की।

काबुल में रहते हुए उन्होंने ब्रिटेन के कट्टर शत्रु देशों इटली और जर्मनी के दूतावासों से सम्पर्क किया। इन दूतावासों से वांछित सहयोग मिलने पर वे ओरलांदो मात्सुता के छद्म नाम से इटली का नागरिक बनकर मास्को पहुंचे। मास्को में जर्मन राजदूत ने उन्हें विशेष विमान उपलब्ध कराया। इस विमान से 28 मार्च 1941 को सुभाष बाबू बर्लिन पहुंचे।

यहाँ से विश्वपटल पर सुभाषचंद्र बोस के रूप में एक ऐसा महानायक उभरा जिसकी मिसाल नामुमकिन सी है। बर्लिन पहुँचकर नेताजी ने हिटलर के साथ एक बैठक की। हिटलर ने अपनी आत्मकथा ‘मीन कॉम्फ’ में भारतीयों की निंदा की थी। नेताजी ने पहली मुलाकात में ही इसका प्रखर विरोध किया। नेताजी के व्यक्तित्व का ऐसा प्रभाव हिटलर पर पड़ा कि ‘मीन कॉम्फ’ की अगली आवृत्ति से इस टिप्पणी को हटा दिया गया।

9 अप्रैल 1941 को नेताजी ने जर्मन सरकार के समक्ष अपना अधिकृत वक्तव्य प्रस्तुत किया। इस वक्तव्य में नेताजी का योजना सामर्थ्य और विशाल दृष्टिकोण सामने आया। देश में रहते हुए तत्कालीन नेतृत्व जो कुछ नहीं कर पा रहा था, यह वक्तव्य, वह सब करने का ऐतिहासिक दस्तावेज बन गया। इस दस्तावेज में निर्वासन में स्वतंत्र भारत की अंतरिम सरकार के गठन की घोषणा, स्वतंत्र भारत के रेडिओ का प्रसारण, धुरि राष्ट्रों और भारत के बीच सीधे सहयोग, भारत की इस अंतरिम सरकार को ॠण के रूप में जर्मनी द्वारा आर्थिक सहायता उपलब्ध कराया जाना और भारत में ब्रिटिश सेना को परास्त करने के लिए जर्मन सेना की प्रत्यक्ष सहभागिता का उल्लेख था। हिटलर जैसे दुनिया के सबसे शक्तिशाली शासक के साथ समान भागीदारी के आधार पर रखा गया यह वक्तव्य विश्व इतिहास में अनन्य है। नेताजी को जर्मनी की सरकार ने बिना शर्त समर्थन देने की घोषणा की। जर्मनी के आर्थिक सहयोग से बर्लिन में फ्री इंडिया सेंटर (आजाद भारत केंद्र) और आजाद हिंद रेडिओ का गठन किया गया।

2 नवम्बर 1941 को फ्री इंडिया सेंटर की पहली बैठक नेताजी की अध्यक्षता में हुई। इसमें चार ऐतिहासिक निर्णय लिए गये-

  1. स्वतंत्र भारत में अभिवादन के लिए ‘जयहिंद’ का प्रयोग होगा। इस बैठक से ही इस पर अमल शुरु हो गया।
  2. भारत की राष्ट्रभाषा हिंदुस्तानी होगी।
  3. ‘सुख चैन की बरखा बरसे, भारत भाग है जागा’ (रचनाकार हुसैन) भारत का राष्ट्रगीत होगा।
  4. इसके बाद से सुभाषचंद्र बोस को ‘नेताजी’ कहकर सम्बोधित किया जाएगा।

कोलकाता से निकल भागने के बाद आजाद हिंद रेडिओ के माध्यम से नेताजी पहली बार जनता के सामने आए। विश्व ने नेताजी के सामर्थ्य पर दाँतों तले अंगुली दबा ली। आम भारतीय के मन में प्रसन्नता की लहर दौड़ गई। बच्चा-बच्चा जिक्र करने लगा कि देश को स्वाधीन कराने के लिए नेताजी सेना के साथ भारत पहुँचेंगे।

देश की आजादी के अपने स्वप्न को अमली जामा पहनाने की दृष्टि से नेताजी ने ब्रिटेन की ओर से लड़ते हुए धुरि राष्ट्रों द्वारा बंदी बनाए गए भारतीय सैनिकों को लेकर भारतीय मुक्तिवाहिनी गठित करने का विचार सामने रखा। हिटलर से बातचीत कर इन सैनिकों को मुक्त कराया गया। जर्मनी में पढ़ रहे भारतीय युवकों को भी मुक्तिवाहिनी में शामिल किया गया। जर्मन सरकार के साथ इन सैनिकों को जर्मन इन्फेंट्री में प्रशिक्षण देने का अनुबंध किया गया। नेतृत्व का समर्पण ऐसा कि सैनिक पृष्ठभूमि न होने के कारण स्वयं नेताजी ने भी इन सैनिकों के साथ कठोर प्रशिक्षण लिया। इस प्रकार भारत की पहली सशस्त्र सेना के रूप में जर्मनी की 950वीं  रेजिमेंट को ‘इंडियन इन्फेंट्री रेजिमेंट’ घोषित किया गया। नेताजी ने इस रेजिमेंट को निर्वासन में भारत की स्वतंत्र सरकार का पहला ध्वज प्रदान किया। यह ध्वज काँग्रेस का तिरंगा था, पर इसमें चरखे के स्थान पर टीपू सुल्तान के ध्वज के छलांग लगाते शेर को रखा गया। ‘इत्तेफाक, इत्माद और कुर्बानी’ (एकता, विश्वास और बलिदान) को सेना का बोधवाक्य घोषित किया गया। रामसिंह ठाकुर के गीत ‘कदम-कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा’ को आजाद हिंद फौज का कूचगीत बनाया गया।

क्रमशः … भाग – 3

©  संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 
संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 82 ☆ अपरिग्रह ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।

श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली  कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 82 ☆ अपरिग्रह ☆

नये वर्ष के आरंभिक दिवस हैं। एक चित्र प्राय: देखने को मिलता है। कोई परिचित  डायरी दे जाता है। प्राप्त करनेवाले को याद आता है कि बीते वर्षों की कुछ डायरियाँ ज्यों की त्यों कोरी की कोरी पड़ी हैं। लपेटे हुए कुछ कैलेंडर भी हैं। डायरी, कैलेंडर जो कभी प्रयोग ही नहीं हुए। ऐसा भी नहीं है कि यह चित्र किसी एक घर का ही है। कम या अधिक आकार में हर घर में यह चित्र मौज़ूद है।

मनुष्य से अपेक्षित है अपरिग्रह। मनुष्य ने ‘बाई डिफॉल्ट’ स्वीकार कर लिया अनावश्यक  संचय। जो अपने लिये भार बन जाये वह कैसा संचय?

विपरीत ध्रुव की दो घटनायें स्मरण हो आईं। हाउसिंग सोसायटी के सामने की सड़क पर रात दो बजे के लगभग दूध की थैलियाँ ले जा रहा ट्रक पेड़ से टकराकर दुर्घटनाग्रस्त हो गया। भय से ड्राइवर भाग खड़ा हुआ। आवाज़ इतनी प्रचंड हुई कि आसपास के 500 मीटर के दायरे में रहनेवाले लोग जाग गये। आवाज़ से उपजे भय के वश कुत्ते भौंकने लगे। देखते-देखते इतनी रात गये भी भीड़ लग गयी।  सड़क दूध की फटी थैलियों से पट गयी थी। दूध बह रहा था। कुछ समय पूर्व भौंकने वाले चौपाये अब दूध का आस्वाद लेने में व्यस्त थे और दोपाये साबुत बची दूध की थैलियाँ हासिल करने की होड़ में लगे थे। जिन घरों में रोज़ाना आधा लीटर दूध ख़रीदा जाता है, वे भी चार, छह, आठ जितना लीटर हाथ लग जाये, बटोर लेना चाहते थे। जानते थे कि दूध नाशवान है, टिकेगा नहीं पर भीतर टिक कर बैठा लोभ, अनावश्यक संचय से मुक्त होने दे, तब तो हाथ रुके!

खिन्न मन दूसरे ध्रुव पर चला जाता है। सर्दी के दिन हैं। देर रात फुटपाथ पर घूम-घूमकर ज़रूरतमंदों को यथाशक्ति कंबल बाँटने का काम अपनी संस्था के माध्यम से हम करते रहे हैं। उस वर्ष भी मित्र की गाड़ी में कंबल भरकर निकले थे। लगभग आधी रात का समय था। एक अस्पताल की सामने की गली में दाहिने ओर के फुटपाथ पर एक माई बैठी दिखी। एक स्वयंसेवक से उन्हें एक कंबल देकर आने के लिए कहा। आश्चर्य! माई ने कंबल लेने से इंकार कर दिया। आश्चर्य के निराकरण की इच्छा ने मुझे सड़क का डिवाइडर पार करके उनके सामने खड़ा कर दिया था। ध्यान से देखा। लगभग सत्तर वर्ष की अवस्था। संभवत: किसी मध्यम परिवार से संबंधित जिन्होंने जाने किस विवशता में फुटपाथ की शरण ले रखी है।… ‘माई! आपने कंबल नहीं लिया?’ वे स्मित हँसी। अपने सामान की ओर इशारा करते हुए साफ भाषा में स्नेह से बोलीं, ‘बेटा! मेरे पास दो कंबल हैं। मेरा जीवन इनसे कट जायेगा। ज़्यादा किसलिये रखूँ? इसी सामान का बोझ मुझसे नहीं उठता, एक कंबल का बोझ और क्यों बढ़ाऊँ? किसी ज़रूरतमंद को दे देना। उसके काम आयेगा!’

ग्रंथों के माध्यम से जिसे समझने-बूझने की चेष्टा करता रहा, वही अपरिग्रह साक्षात सामने खड़ा था। नतमस्तक हो गया मै!

कबीर ने लिखा है, “कबीर औंधि खोपड़ी, कबहुँ धापै नाहि/ तीन लोक की सम्पदा, का आबै घर माहि।”

पेट भरा होने पर भी धापा हुआ अथवा तृप्त अनुभव न करो तो यकीन मानना कि अभी सच्ची यात्रा का पहला कदम भी नहीं बढ़ाया है। यात्रा में कंबल ठुकराना है या दूध की थैलियाँ बटोरते रहना है, पड़ाव स्वयं तय करो।

© संजय भारद्वाज

शनि. 23 जनवरी, अपराह्न 2:10 बजे

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 38 ☆ नवगीत – याद की फसलें कहें…. ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताeह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी  द्वारा रचित  ‘नवगीत – याद की फसलें कहें…’। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 39 ☆ 

☆ नवगीत – याद की फसलें कहें…. ☆ 

अनेक वर्णा पत्तियाँ हैं

शाख पर तो क्या हुआ?

अपर्णा तो है नहीं अमराई

सुख से सोइये

बज रहा चलभाष सुनिए

काम अपना छोड़कर

पत्र आते ही कहाँ जो रखें

उनको मोड़कर

किताबों में गुलाबों की

पंखुड़ी मिलती नहीं

याद की फसलें कहें, किस नदी

तट पर बोइये?

सैंकड़ों शुभकामनायें

मिल रही हैं चैट पर

सिमट सब नाते गए हैं

आजकल अब नैट पर

ज़िंदगी के पृष्ठ पर कर

बंदगी जो मीत हैं

पड़ गये यदि सामने तो

चीन्ह पहचाने नहीं

चैन मन का, बचा रखिए

भीड़ में मत खोइए

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 38 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM

Captain Pravin Raghuvanshi, NM

☆ Anonymous Litterateur of Social Media # 38 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 38) ☆ 

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

☆ English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 38☆

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

उड़ने दो मिट्टी को फ़लक तक

आखिर  कहाँ  तलक  उड़ेगी,

हवाओं ने जब साथ छोड़ा तो,

आखिर जमीन पर ही गिरेगी !!

 

Let the soil fly high in the sky

How  far will  it  keep  flying,

When  the  wind  deserts  it,

It’ll fall  on  the ground  only!!

 ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

उसने  भी  हँस  के  यूँही

आज पूछ  लिया मिज़ाज

लगता है  कि  उम्र भर के

रंज-ओ-ग़म याद आ गए हैं…

 

Today,  laughingly, she  just

inquired about my well-being

Felt, as if surfaced again are

the age old grief and sorrow

 ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

बस इतनी  सी बात

समुंदर को खल गई

एक कागज़ की नाव

मुझपे कैसे चल गई…

 

The sea just could

not tolerate it that

how could a paper

boat  ever sail on it…

 ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ 

अब  उस  मुकाम  पे आ

पहुँची  है  जिंदगी  जहाँ,

चीजें तो बहुत सी पसन्द हैं

मगर चाहिए कुछ भी नही…

 

Now the life has reached

that point where many

likeable things are there

but nothing is required…

 ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares