मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

☆ जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सकाळी लवकर उठून आपले आवरले. स्वत:पुरता नाष्टा करून खाल्ला. आज ऑफिसचा पहिला दिवस होता. पिकअप् करण्यासाठी तिने हा पत्ता ऑफिसला दिला होता.गाडी आली ती गेली. नेहमीच्या सवयी प्रमाणे सम्यक दुपारी उठला अंघोळ आवरुन,  हाॅटेलात जेवून आला. आज घर कसे झकपक होते. प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथे. एका बाईच्या हाताची जादू. घराला घरपण लगेच येते. बाई जेवढ्या प्रेमाने घर आवरते तेवढ्या प्रेमाने पुरूषाला जमत नाही.हे मानलं मी. तो स्वत:वर हसला आणि पुन्हा झोपला. विभा संध्याकाळी घरी आली तेव्हा तो नव्हता. हा लपंडाव आहे. हे घर फक्त झोपायला हवं आहे का? तिने निवांत आपले आवरले, पिठलं भात तयार करून खाल्ला. ती झोपली. आज चांगली झोप लागली. याच रूटीन मध्ये आठवडा कसा गेला समजले नाही आज रविवार मी घरात. तो ही घरात. आपण आपले आवरावे आणि

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जावे. या विचारात ती आवरत होती. तो अंघोळीला गेला होता. तेव्हा बेल वाजली. मी का दार उघडू? माझ्या ओळखीचे कोणी नाही. तिने दुर्लक्ष केले. पुन्हा बेल वाजली तो आतून ओरडला दार उघडा. मी दार उघडले तर दोन मुले होती दारात त्यांचे मित्र असावेत मला पाहून ती गडबडली. मला बघून वेगळाच अर्थ काढला

“साॅरी, न.. सांगताच आलो. येतो आम्ही. सम्याला सांग.अज्या, जॅकी आले होते.”

मी काही बोलायच्या आत सम्यक टाॅवेल गुंडाळून बाहेर आला तो दिसताच “लेका…भावा…पार्टी पाहिजे. आम्हाला न सांगता वहिनी आणलीस.”

“ती वहिनी नाही. पेईंग गेस्ट आहे.”

“सम्या आम्ही सकाळी घेत नाही. काही पण पुड्या सोडतोस. अशी कोणी मुलगी पेईंग गेस्ट म्हणून राहिलं होय.”

ही चर्चा अजून वेगळ्या वळणावर जायच्या आत विभा म्हणाली “होय हे खरे आहे. मी पेईंग गेस्ट म्हणून राहते इथं.”

मित्र घरात आले मी बाहेर पडले. हे गृहित होते. लोक बोलणार. दुसरीकडे घर शोधत राहू चांगले मिळाले की हे घर सोडू. मंदिरात बसून तिने घरी फोन केला. “आई कशी आहेस?”

“मला काय होतंय? तू कशी हायस पोरी. जेवलीस का? तुला हवा मानवली का? जागा मिळाली का? काम कसे आहे? “आई काळजीने चौकशी करत होती. कुशल मंगल विचारत होती. दोघीच्या मायेला पुर आला होता. आईचे आतडे ते लांब गेलेल्या मुलींची काळजी वाटणार.” नवीन शहरात हायस जीवाला जप. तूझ्यावर घर हाय बघ. काही झालं तरी नोकरी महत्त्वाची. तवा जपून रहा. नीट काम कर. सांभाळून रहा.”

“माझी काळजी करू नकोस प्रकाश शाळेत जातो का बघ. त्यांचा अभ्यास घे. बाबांची काळजी घे. फोन ठेवते.” आईशी बोलल्यावर वेगळी ऊर्जा मिळाली. आजवर आईने आपल्यासाठी किती कष्ट उपसले ते आठवले. दिवसरात्र राबून तिने आपल्या शिकवले घर सांभाळले. बाबांचा काही उपयोग नाही. आयुष्यभर कडक इस्त्रीचे कपडे घालून ते पुढारीपणा करत हिंडले. आई होती म्हणून माझे शिक्षण झाले. आता प्रकाशला शिक्षण देण्याची, घर चालवण्याची जबाबदारी माझी आहे. आई नेहमी म्हणायची ‘पोरी तूला चांगली नोकरी लागली की माझी दगदग संपेल बघ. मग प्रकाशची काळजी नाही. तूला कमावलं पाहिजे. तू घराची काळजी घेतली पाहिजे. तुझ्या जीवावर आहे आता सगळं घर.’

विभा ऑफिस मधून घरी आली तर सम्यक घरीच झोपून होता. तिने हाक मारली तरी तो उठला नाही. जवळ जावून पाहिले तर तो कन्हत होता. त्याच्या अंगात ताप असणार. आपण चौकशी केली तर आपण करार मोडला जाणार, आपल्या घर खाली करावे लागणार. काय करू? तिने पुन्हा हाक मारून उठवले तसा तो उठला. तिने चहा बिस्किटे दिली त्याला थोडी हुशारी आली. समोर उभे राहून दवाखान्यात पाठवले औषध खायला घातले. रात्री त्याच्यासाठी मऊ खिचडी केली दोन तीन दिवस चांगली देखभाल केली त्यांच्यात सुधारणा झाली.

“मी हे घर कधी सोडू?”

या प्रश्नाने तो गोंधळला “का?”

“मी आपण आजारी असताना तुमच्या जीवनात ढवळाढवळ केली. करार मोडला, नियमानुसार मला गेले पाहिजे.”

“ही…. ढवळाढवळ चांगली होती. यासाठी घर सोडायची गरज नाही. ती माणुसकी होती. तुमचा मला काही त्रास नाही. तुम्ही राहू शकता.”

“मग मी काही विचारलं तर चालेल. करार मोडणार नाही ना.”

“मी काल इथं एक कागद पाहिला तुम्ही तर डिग्री होल्डर दिसता. मग हे काम?”

“ती मोठी कहाणी आहे. संकट येतात तेव्हा एकटी येत नाहीत. काही वेळा जगण्याची उमेद संपवतात. दोन तीन वर्षांपूर्वी एका अपघातात माझे आई-वडील दोघे गेले. क्षणात मी पोरका झालो. आमचे कुटुंब मध्यप्रदेश मधील वडील एकूलतेएक तिकडे ही कोणी नातेवाईक नव्हते मला काही सुचत नव्हते, मी नुकताच एका कंपनीत जाॅईन झालो होतो.ती नोकरी सोडून जाणार कुठे मी? नाही म्हणायला हे हक्काचे छप्पर होते. पण घरात जीव रमत नव्हता. जरा कुठे सावरत होतो तेवढ्यात मी ज्या  कंपनीत नोकरीला होतो ती कंपनी बंद पडली. नोकरी गेली. घरी बसून बसून वेड लागायची वेळ आली.मी गावभर फिरत राहिलो. रात्री ही घरी यावे असे वाटत नव्हते. मग नाईट क्लबला जावू लागलो. मग तिथेच नोकरी मिळाली. आता रात्रीचा दिवस करतो अन् दिवसांची रात्र हे बरं अंगवळणी पडलय.”

“तुम्ही पुन्हा दुसऱ्या कंपनीत प्रयत्न का केला नाही.”

“आता पुन्हा कुठे श्री गणेश  करायचा? मला भीती वाटते चांगुलपणाची. आहे ते बरं आहे. जास्त अपेक्षा नाहीत जीवनाकडून.”

इंजिनीअर असून हा एका नाईट क्लबवर काम करतो हे काही तिच्या पचनी पडले नाही.

त्या दिवशी सम्यकच्या नांवे एक अपाॅईमेंटलेटर आले त्याला बेंगळुरूला जाॅयनिंग करायचे  होते. तो आश्चर्यचकित झाला. मी कुठेही ऍप्लिकेशन केले नव्हते, तर मला हे पत्र कसे आले. त्याने तिला विचारले तूला काही माहिती आहे. ती गालात हसली तसा तो समजला बोला हे पत्र कसे आले?

“तुम्हाला आनंद झाला नाही?”

“पण हे कसे शक्य आहे?”

“त्यात अवघड काम आहे? तुमची डिग्री चांगली, तुमचा कामाचा अनुभव चांगला, ती प्रमाणपत्रे इथंच मिळाली, मी फक्त दोन तीन कंपन्यात माहिती पाठवली. तुमचे काम झाले. जीवनात उमेद हारून चालत नाही. स्वत:ला ओळखलं पाहिजे. ‘चलती नाम गाडी है’?”

“खरच माझा माझ्यावरचा विश्वास संपला होता. माझे स्वप्न पूर्ण झाले. मी खुप आनंदी आहे. आता माझ्या गुणांचे चीज होईल. मला उद्या निघायला पाहिजे.”

“आणि मला ही हे घर सोडावे लागले. मी तयारी करते.”

“ते का?”

“तुम्ही बेंगळुरूला जाणार. तर मला ही घर सोडावे लागेल ना.”

“नाही मी एकटाच जाणार. ह्या घरात तुम्ही रहायचं. हे घर तुम्ही सांभाळणार आहात. हा माझा निर्णय आहे. यावर चर्चा नको.”

समाप्त.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

अंधेरीत आमचा टु बीएचके पुढे मोठी बाल्कनी म्हणजे जवळ जवळ एक रुमच ती. आम्ही आता दोघं senior citizen. घर खायला उठायचे. मुलं आपापल्या संसारात US ला सेटल. आम्ही दोघंच 24 तास घरी. मनांत एक विचार आला. माझा 40 वर्षापूर्वीपासूनचा एक काॅलेजचा ग्रुप 5,6 जणांचाहोता. आता सगळ्यांचे life partner add होऊन double झाला. सगळे एकमेकांत छान मिसळू लागले. पुढे सगळ्यांची मुलं पण साधारण एकाच  वयोगटातील असल्यामुळे त्या सगळ्यांचे पण छान जमत होते. आमचे असे एक कुटुंब झालं होतं. मधून मधून पिकनिकला. गेट-टु-गेदर करा. हे चालूच असायचे. कोणाच्या अडी-अडचणीला, सुखदुःखात आम्ही धावून जात होतो.  मज्जेला तर सगळे होतोच. सगळ्यांची मुले मोठी झाली. नोकरी धंद्यासाठी इकडे तिकडे  पांगली.  त्यांची लग्ने झाली. मुली सासरी दुस-या ठिकाणी गेल्या.

आता काॅलेजचा मुळचा ग्रुप पण जवळपास सगळ्या जबाबदारीतून आपल्या पार्टनर सकट मोकळा झाला. निदान म्हणायला तरी. कोणाचा लाईफ पार्टनर अर्ध्या वाटेवर जग सोडून गेला होता. तसे आम्ही सगळे मुंबईतच आणि विशेष म्हणजे योगायोगाने का होईना पार्ले, अंधेरी, सांताक्रुझला रहात होतो. ग्रुपमधल्या एका मैत्रिणीचा निलिमाचा ब्लाॅक तर आमच्या बिल्डींग मध्ये आमच्याच मजल्यावर होता. तो विचार मनांत आला.  पतीराजांशी चर्चा केली. ते म्हणाले माझी हरकत नाही. आपल्या  मुलांशी फोनवर बोलून त्यांचे पण मत घे. आणि मग तुझ्या मित्रमैत्रिणीं बरोबर बोल. पण मला नाही वाटत ते आणि त्यांची मुलं तयार होतील. पण मी म्हटलं विचारुन तर बघू या. माझ्या मुलांना माझी कल्पना आवडली. दोघांनीही ग्रीन सिग्नल दिला. लवकर तयारीला लागा.  म्हणून सल्ला पण दिला.

सगळ्यांना मी एका शनिवारी रात्री घरी रहायलाच बोलावले. पत्ते खेळलो, गाण्याच्या भेंड्या खेळलो. मग विषय काढला. माझ्या मनांत एक विचार आहे तुम्हाला पटतो का बघा? आता आपल्या पैकी बहुतेकांच्या घरात आपण sr. Citizen चअसतो. अगदी एकटं एकटं वाटते. तशी माझी आणि निलीमाची जागा 12,13 जणांसाठीं पुरेशी आहे. मी निलीमाशी पण बोलून घेतले आहे.  तिला आणि तिच्या अहोना पण माझी कल्पना पटली आणि आवडली आहे. तर आपण एक महिना हा प्रयोग करुन बघू या का?

क्रमशः …

सौ. शशी नाडकर्णी -नाईक

फोन नं.8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

सरस्वती आमच्या साक्षरता वर्गात रोज यायची.

ऊंच, सडसडीत, अनवाणी, विस्कटलेले केस, ठिकठिकाणी जोड लावून शिवलेलं मळकट लुगडं. पण डोळ्यात विलक्षण चमक. काम करून करून घट्टे पडलेले हात पण ओंजळीत ओली स्वप्नं!!

तांबापुरा झोपडपट्टीत राहण्यार्‍या, मोलमजुरी करणार्‍या महिलांना, कित्येकवेळा आमच्या वर्गात येण्यासाठी, विनवण्या कराव्या लागायच्या.. शिकाल तर वाचाल.. हे जीव तोडून पटवून द्यावं लागायचं..

त्यांची न येण्याची कारणंही खूप होती. दारु पिण्यार्‍या नवर्‍याचा धाक, मारझोड. वस्तीतल्याच लोकांकडून मिळणारे टोमणे… संशय… एक ना अनेक.

पण सरस्वती मात्र या सगळ्यांवर मात करून, धावत पळत आमच्या क्लासला यायची…. पाटीवर छान अक्षरं गिरवायची… धडे वाचायची.. कविता म्हणायची.

समजलं नाही तर प्रश्न विचारायची… तिची जिद्द पाहून मीही थक्क व्हायचे…  लहान असतानाच एका बिजवराशी तिचं लग्न लावलं गेलं… सुख म्हणजे काय असतं हे कधी कळलंच नाही… ना माहेरी ना सासरी.. जीवन म्हणजे नुसता चिखल….

एक दिवस ती मला म्हणाली, “ताई मला यातून सुटायचंय्.. मला माझ्या जगण्याचा अधिकार मिळवायचाय्… मला तर एक चांगलं आयुष्य जगायचच आहे आणि जमेल तेव्हढं माझ्यासारख्यांनाही मला बरोबर घेऊन चालायच्ंय्….”

आमच्या साक्षरता वर्गातून तिच्या स्वप्नांना एक पायरी मिळाली फक्त.. पण तिचा प्रवास खूप लांबचा होता. खाचखळग्यांचा दगड गोट्यांचा होता… पण तिची पावलं घट्टं होती… मधून मधून ती मला भेटायला यायची…

ग्राम पंचायतची निवडणुक तिने लढवली… ती जिंकली… सरपंच झाली. महिला सरपंचाचा मान तिला मिळाला… तिने हे सरपंचपद नाकारावं म्हणून तिला अनेक धमक्यांना सामोरं जावं लागलं… पण ती ढळली नाही…. तिने अत्याचारित महिलांसाठी अल्पबचत गट तयार केले… बँकांकडून सहाय्य मिळवलं…  अनेकांच्या गुणांचं संकलन करून या माध्यमातून तिने त्यांना सक्षम बनवण्याचा विडा ऊचलला… अंगणवाडीतही तिचा महत्वपूर्ण सहभाग  होता…

बघता बघता सरस्वतीच्या स्वप्नांचा आलेख ऊंच ऊंच होत गेला…. आता ती सरस्वती बाई झाली होती…

ती एका गळीत समाजाची आधारभूत बनली होती…. “माय” माऊली संबोधली जाऊ लागली….. मी टीव्ही लावला…. ऊंच माझा झोका या कार्यक्रमात तिचा सत्कार होणार होता…. पुरस्कार चिह्न हातात घेऊन आपलं मनोगत व्यक्त करणार्‍या  सरस्वतीच्या डोळ्यात आजही तीच चमक होती….. मी ऐकत नव्हतेच एक ऊंच गेलेला झोका पाहत होते…. फक्त…. पाहता पाहता डोळे भरले… या झोक्याला मी फक्त एक हलका धक्का दिला होता……!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१९/०१/२०२१

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-2 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-2 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबा हरहुन्नरी होते. ते चांगले लेखकही होते. त्यांची पत्रे वाचणे हा माझा एक हळवा अनुभव असायचा. कविताही करायचे. विशेष म्हणजे त्यांच्या कविता छंदोबद्ध,  शार्दूलविक्रीडित वृत्तात असायच्या. अप्रतिम अक्षर, मराठी आणि इंग्लिश पण. घोटीव, मोत्यासारखे. बघत रहावे असे. घडलेले प्रसंग, आयुष्यातला एखादा ह्दयस्पर्शी प्रसंग इतका छान वर्णन करून सांगायचे की आम्ही गुंग होऊन ऐकत रहायचो. ते एक उत्तम नाट्यकर्मी होते. त्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात देवमाणूस,  तुझे आहे तुजपाशी,  सारं कसं शांत शांत अशा अनेक नाटकातून त्यांनी कामे करून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट घेतला आहे. ते एक उत्तम हार्मोनियम वादक होते. तसेच नाट्यसंगीत ही त्यातल्या ताना आणि आलापांसह म्हणायचे. एकदा बाबा एक नाट्यगीत बाहेरच्या खोलीत म्हणत होते,  आतून आईला वाटले, रेडिओवर लागलंय, म्हणून आई म्हणाली “अहो, रेडिओ जरा मोठा करा..”

चित्रकला हा त्यांचा आणखी एक गुण. त्यांनी कोळशानी रेखाटलेलं रविंद्रनाथ टागोरांचे रेखाचित्र इतके हुबेहूब आहे कि टागोरांच्या चित्राच्या डोळ्यांतून व्यक्त होणारे वात्सल्यपूर्ण भाव अजूनही,  इतक्या वर्षांनी सुद्धा तसेच जाणवतात. राजूनं ते रेखाचित्र जपून ठेवले आहे.

आमची आजी, म्हणजे बाबांची आई गेली, तेव्हा सगळ्यांत लहान आत्या 2 वर्षाची होती. ती एकसारखी आई आई म्हणून रडत होती. तिला आई दाखवावी म्हणून या भावानं, आजीचा अंगठ्याच्या वरच्या पेराएवढा लहान फोटो होता,  त्यावरून पेन्सिलीने फोटो म्हणजे आजीचं चित्र काढलं. आईचं इतकं खरं आणि तंतोतंत रूप बघून सगळीच भावंडे आईला बघून रडू लागली. ही आठवण एकदा बाबांनीच सांगितली आहे. आजीचा तो एकच फोटो आमच्या घरात कोल्हापूर ला उज्वलनं, माझ्या भावानं जपून ठेवलाय.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ लेखनी सुमित्र की – दोहे ☆ डॉ राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम दोहे।)

✍  लेखनी सुमित्र की – दोहे  ✍

कुछ भी रचता है नहीं, यह कैसा है दौर ।

नाम बहुत से ले लिए, मन कहता है और ।।

 

जूठन खाकर आपने, किया बड़ा अहसान ।

मुझे बनाया भीलनी, आप बने भगवान।।

 

ऐसा था सोचा नहीं, किया नहीं  अहसास ।

सागर ने भी कंठ में, जमा रखी है प्यास।।

 

सफर बहुत ही कम हुआ, छुआ न कोई छोर।

गर चाहे तो खींच ले, कठपुतली की डोर।।

 

है विशेष क्या मानना, शब्द हुए असमर्थ।

शायद वे भी सोचते, कहना भी है व्यर्थ।।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 34 – सभी अधूरी इच्छायें …☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज पस्तुत है आपका अभिनव गीत “सभी अधूरी इच्छायें… । )

☆ साप्ताहिक स्तम्भ # 34 ।। अभिनव गीत ।।

☆ सभी अधूरी इच्छायें … ☆

वह विस्थापित हँसी

पोपले मुँह में थी अटकी

जहाँ झुर्रियों को टटोलती

उम्र दिखी लटकी

 

सभी अधूरी इच्छायें

आँखों के गिर्द खड़ीं

संवेदन के साथ याद-

की थीं पंक्तियाँ बडीं

 

फिसल-फिसल जाती है

हाथों से, हिसाब ढोती

छड़ी स्वयम्‌ शब्दार्थ

खोजती, है भटकी-भटकी

 

रहे-सहे बालों से उलझे

वायुजनित झोंके

जहाँ याद आते हैं

रह-रह बीत चुके मौके

 

जो मूरत भविष्य की

गढ़ कर बड़े हुये सपने

वहीं लग रही समय गये

है वह चटकी- चटकी

 

इसी असंभव के विरुद्ध

जीवन भर लड़ा किये

और अँधेरों में बाले हैं

लाखों-लाख दिये

 

पड़े चारपाई पर बाकी

दिन गिनते-गिनते

जिसे देखने बेटे क्या

छाया तक ना फटकी

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

12-12-2020

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ पराक्रम दिवस विशेष – महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस – भाग – 3☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

(ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए चार भागों में क्रमबद्ध प्रस्तुत है पराक्रम दिवस के अवसर पर श्री संजय भारद्वाज जी का विशेष  ज्ञानवर्धक एवं प्रेरणास्पद आलेख महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस। )  

Subhas Chandra Bose NRB.jpg

☆ पराक्रम दिवस विशेष – महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस – भाग – 3 ☆

(केंद्र सरकार ने उनके जन्मदिवस को पराक्रम दिवस के रूप में मनाने का निश्चय किया है। इस अवसर पर नेताजी पर लिखा अपना एक लेख साझा कर रहा हूँ। यह लेख राष्ट्रभाषा प्रचार समिति की पुस्तक ‘ऊर्जावान विभूतियाँ’ में सम्मिलित है– संजय भारद्वाज )

फरवरी 1942 में जापान ने सिंगापुर को युद्ध में परास्त कर दिया। स्थिति को भांपकर नेताजी ने 15 फरवरी 1942 को आजाद हिंद रेडिओ के माध्यम से ब्रिटेन के विरुद्ध सीधे युद्ध की घोषणा कर दी। द्वितीय विश्वयुद्ध में धुरिराष्ट्र, मित्र राष्ट्रों पर भारी पड़ रहे थे। पर 22 जून 1941 को जर्मनी ने अकस्मात् अपने ही साथी सोवियत संघ पर आक्रमण कर दिया। यहीं से द्वितीय विश्वयुद्ध का सारा समीकरण बिगड़ गया। एक नीति के तहत सोवियत संघ युद्ध को शीतॠतु में होनेवाले नियमित हिमपात तक खींच ले गया। स्थानीय स्तर पर सोवियत सैनिक हिमपात में भी लड़ सकने में माहिर थे, पर जर्मनों के लिए यह अनपेक्षित स्थिति थी। फलतः नाजी सेना पीछे हटने को विवश हो गई।

बदली हुई परिस्थितियों में जर्मनी द्वारा विशेष सहायता मिलते न देख नेताजी ने जर्मनी छोड़ने का निर्णय किया। वे बेहतर समझते थे कि भारत को मुक्त कराने का यह ‘अभी नहीं तो कभी नहीं’ का समय है।

नेताजी ने अब जापान से सम्पर्क किया। उनकी जर्मनी से जापान की यात्रा किसी चमत्कार से कम नहीं थी। संकल्प और साहस की यह अदम्य गाथा है। नेताजी 9 फरवरी 1943 को जर्मनी के किएल से जर्मन पनडुब्बी यू-180 से गुप्त रूप से रवाना हुए। यू-180 ने शत्रु राष्ट्र ग्रेट ब्रिटेन के समुद्र में अंदर ही अंदर चक्कर लगाकर अटलांटिक महासागर में प्रवेश किया। उधर जापानी पनडुब्बी आई-29 मलेशिया के निकट पेनांग द्वीप से 20 अप्रैल 1943 को रवाना की गई। 26 अप्रैल 1943 को मेडागास्कर में समुद्र के गहरे भीतर दोनों पनडुब्बियां पहुँची। संकेतों के आदान-प्रदान और सुरक्षा सुनिश्चित कर लेने के बाद 28 अप्रैल 1943 को रबर की एक नौका पर सवार होकर नेताजी तेजी से जापानी पनडुब्बी में पहुँचे। जर्मनी से जापान की यह यात्रा पूरी होने में 90 दिन लगे। साथ ही द्वितीय विश्वयुद्ध में एक पनडुब्बी से दूसरी पनडुब्बी में किसी यात्री के स्थानातंरण की यह विश्व की एकमात्र घटना है।

जापान में नेताजी, वहाँ के प्रधानमंत्री जनरल हिदेकी तोजो से मिले। तोजो उनके व्यक्तित्व, दृष्टि और प्रखर राष्ट्रवाद से इतने प्रभावित हुए कि उन्होंने नेताजी का विशेष भाषाण जापान की संसद ‘डायट’ के सामने रखवाया।

जापान में ही वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी रासबिहारी बोस भारतीय स्वाधीनता परिषद चलाते थे। रासबिहारी ने सुभाषबाबू से मिलकर उनसे परिषद का नेतृत्व करने का आग्रह किया। 27 जून 1943 को दोनों तोक्यो से सिंगापुर पहुँचे। 5 जुलाई 1943 को सिंगापुर के फरेर पार्क में हुई विशाल जनसभा में रासबिहारी बोस ने भारतीय स्वाधीनता परिषद (आई.आई.एल.) का नेतृत्व नेताजी को सौंप दिया। जापान के प्रधानमंत्री तोजो भी यहाँ आई.आई.एल.की परेड देखने पहुँचे थे। यहीं आजाद हिन्द फौज की कमान भी विधिवत नेताजी को सौंपने की घोषणा हुई। कहा जाता है कि इस जनसभा में जो फूलमालाएं नेताजी को पहनाई गईं, वे करीब एक ट्रक भर हो गई थीं। इन फूल मालाओं की नीलामी से लगभग पचीस करोड़ की राशि अर्जित हुई। विश्व के इतिहास में किसी नेता को पहनाई गई मालाओं की नीलामी से मिली यह सर्वोच्च राशि है।

इस सभा में अपने प्रेरक भाषण में नेताजी ने कहा- ‘भारत की आजादी की सेना के सैनिकों !…आज का दिन मेरे जीवन का सबसे गर्व का दिन है। प्रसन्न नियति ने मुझे विश्व के सामने यह घोषणा करने का सुअवसर और सम्मान प्रदान किया है कि भारत की आजादी की सेना बन चुकी है। यह सेना आज सिंगापुर की युद्धभूमि पर-जो कि कभी ब्रिटिश साम्राज्य का गढ़ हुआ करता था- तैयार खड़ी है।…

एक समय लोग सोचते थे कि जिस साम्राज्य में सूर्य नहीं डूबता, वह सदा कायम रहेगा। ऐसी किसी सोच से मैं कभी विचलित नहीं हुआ। इतिहास ने मुझे सिखाया है कि हर साम्राज्य का निश्चित रूप से पतन और ध्वंस होता है। और फिर, मैंने अपनी आँखों से उन शहरों और किलों को देखा है, जो गुजरे जमाने के साम्राज्यों के गढ़ हुआ करते थे, मगर उन्हीं की कब्र बन गए। आज ब्रिटिश साम्राज्य की इस कब्र पर खड़े होकर एक बच्चा भी यह समझ सकता है कि सर्वशक्तिमान ब्रिटिश साम्राज्य अब एक बीती हुई बात है।…

मैं नहीं जानता कि आजादी की इस लड़ाई में हममें से कौन-कौन जीवित बचेगा। लेकिन मैं इतना जानता हूँ कि अन्त में हम लोग जीतेंगे और हमारा काम तब तक खत्म नहीं होता, जब तक कि हममें से जीवित बचे नायक ब्रिटिश साम्राज्यवाद की दूसरी कब्रगाह-पुरानी दिल्ली के लालकिला में विजय परेड नहीं कर लेते।…

जैसा कि मैंने प्रारम्भ में कहा, आज का दिन मेरे जीवन का सबसे गर्व का दिन है। गुलाम के लिए इससे बड़े गर्व, इससे ऊँचे सम्मान की बात और क्या हो सकती है कि वह आजादी की सेना का पहला सिपाही बने। मगर इस सम्मान के साथ बड़ी जिम्मेदारियाँ भी उसी अनुपात में जुड़ी हुई हैं और मुझे इसका गहराई से अहसास है। मैं आपको भरोसा दिलाता हूँ कि अँधेरे और प्रकाश में, दुःख और खुशी में, कष्ट और विजय में मैं आपके साथ रहूँगा। आज इस वक्त में आपको कुछ नहीं दे सकता सिवाय भूख, प्यास, कष्ट, जबरन कूच और मौत के। लेकिन अगर आप जीवन और मृत्यु में मेरा अनुसरण करते हैं, जैसाकि मुझे यकीन है आप करेंगे, मैं आपको विजय और आजादी की ओर ले चलूँगा। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि देश को आजाद देखने के लिए हममें से कौन जीवित बचता है। इतना काफी है कि भारत आजाद हो और हम उसे आजाद करने के लिए अपना सबकुछ दे दें। ईश्वर हमारी सेना को आशीर्वाद दे और होनेवाली लड़ाई में हमें विजयी बनाए।… इंकलाब जिन्दाबाद!…आजाद हिन्द जिन्दाबाद!’

क्रमशः … भाग – 4

©  संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 
संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 80 ☆ व्यंग्य कविता – आटा, डाटा और टाटा ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी   की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है । आज प्रस्तुत है एक व्यंग्य  कविता “आटा, डाटा और टाटा“। ) 

☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 80

☆ व्यंग्य कविता – आटा, डाटा और टाटा☆

देखिए एक रोटी का आटा

गरीब का,

जियो जी भर कर दे रही डाटा

अमीर का,

देखिए हो रहा है ये घाटा

जनता का,

देखिए कर रहे हैं आंटा-सांटा

नेताओं का,

देखिए हर दम मिले चांटा

बाबाओं का,

देखिए मंत्री कर रहे हैं टाटा

हर काम का,

देखिए हो रहा है ये घाटा

अपने देश का,

 

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३०॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३०॥ ☆

 

वेणीभूतप्रतनुसलिला ताम अतीतस्य सिन्धुः

पाण्डुच्चाया तटरुहतरुभ्रंशिभिर्जीर्णपर्णैः

सौभाग्यं ते सुभग विरहावस्थया व्यञ्जयन्ती

कार्श्यं येन त्यजति विधिना स त्वयैवोपपाद्यः॥१.३०॥

वेणि सृदश क्षीण सलिला वराकी

सुतनु पीत जिसका पके पत्र दल से

विरह में तुम्हारे , सुहागिन तुम्हारी

तजे क्षीणता दो उसे पूर जल से

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकदातरी ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

एकदातरी

एकदातरीअसं व्हावं

गारा वेचत हरवून जावं

 

दाटलैल्या धुक्याचं पांघरुण घ्यावं

श्रावणसरीत न्हाऊन घ्यावं

 

हिरवाई पाहताच मोहरुन जावं

स्रुष्टीतील नवलाईत हरवून जावं

 

वादळवार्यात गुंगुन जावं

सुखाच्या वर्षावात बेभान व्हावं

 

दुःखाचे घावही सोशित राहावं

स्वतःबरोबर दुसर्याच्या दुःखातही सहभागी व्हावं

 

आभाळमाया आठवत आठवत

क्षमाशील धरतीला उमजून घ्यावं

 

जीवनातील विविध रंगात मनस्वीपणे रंगून जावं

 

एकदातरी प्रत्येकानच जीवन भावुकतेने अनुभवावं.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares