मराठी साहित्य – विविधा ☆ ते सुंदर दृश्य…..!! ☆ सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

☆ विविधा ☆ ते सुंदर दृश्य…..!! ☆ सौ. सुजाता काळे ☆

त्यादिवशी संध्याकाळी नेहमी प्रमाणे 6.10 ची ट्रेन पकडली. एकाद तासात मी माझ्या डेस्टीनेशन पोहचणार होते. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8.05 च्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6.10 ची ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासाभरात पोहोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून टी. सी. कधीच आमची अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे.

हे गेलं 25 वर्षे सुरू आहे.

गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीची, आचार -विचाराची, पेहरावाची, संस्कृतीची व रंगाची…..

आजही मी गडबडीत एस-4 डब्यात शिरले. मधल्या एका बर्थवर बसले. माझ्या समोरच्या बर्थवर एक जोडपे बसले होते. तिच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्याच्या अंगावर पांघरून घेतले होते.

त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले.

तो गोरापान. कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता. भाषा थोडी फार गावाची. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किचिंतसे बाहेर. मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल. केसांचा भला मोठा आंबाडा. चेह-यावर केसांच्या बटा. बाळाला थोपटत थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदीचं गावंढळ. .. ‘ दुदु गाईच्या गोट्यामंदी, दुदु बाळाच्या वाटीमंदी….’ पण तो तिच्या या गाणं गाण्याने भयंकर चिडला होता. तिच्यापासून लांब बसला होता. त्याच्या चेह-यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्र वाटले. त्याने तिला गप्प बसायची खूण केली पण तिचं पालुपद चालूच राहीले. मग त्याने न राहवून तिला बडबड करायला सुरुवात केली….. तुला केव्हांच सांगतोय गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या भसाड्या आवाजात गातीस? डब्यातले लोक बघतायेत. तुझ्या बरोबर कुठं पण जायची लाज वाटते. कुठं कसं वागायचं ते कळतंच नाही. तरीच हजारदा आण्णांना म्हणालो होतो की नका लावू हिच्याशी लग्न. पण त्यांनी नाही ऐकलं. मला मरण्याची धमकी दिली. मित्राला दिलेला शब्द, लेकापेक्षा जास्त मोठा होता. लेकाचा विचारच केला नाही. ना रंग ना रूप… ना शिक्षण ना, ना वागायचं भान. उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.

शिक्षण म्हणे काय तर पाचवी पास..!! त्याची बडबड सुरु तर हिची गाणं सुरू. मी न राहवून त्याला सांगितले की ती बाळाला झोपतेय. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्याच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे. चांगली नोकरी आहे. वडिलांनी जोर धरून त्याचे लग्न त्यांच्या मित्रांच्या मुलीबरोबर लावून दिले. तो म्हणाला, अहो मॅडम हिला चार चौघात घेवून जायला आवडत नाही. शिक्षणाचे राहू द्या, पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी. माझे मित्र माझ्यावर हसतात. माझी मस्करी करतात. हिला कुठे काय करावे ते कळतं नाही. त्याच्या बोलण्यात खंत होती.

मी पण नकळत कधी दोघांची तुलना करू लागले, मला कळालेच नाही. खरंच तो दिसायला देखना. गोरा, नाकी डोळी छान. शिकलेला. शिष्टाचार पाळणारा. आणि ती काळी, दात पुढे असणारी , कमी शिकलेली. गावात वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला चार चौघात टोचून बोलला पण तिने तोंडातून अवाक्षर ही काढला नाही. निमूटपणे ऐकून घेत होती. प्रत्युत्तर दिले नाही. मी नकळत त्याच्या बाजूने विचार करत होते. मी पण मनाला समजावले की ही मलाही आवडली नाही. मी उगाचचं रागाने तिच्याकडे पाहिले.

एवढ्यात तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले. मी पाहिले की तिचे बाळं वडिलांसारखे सुंदर आहे. गोंडस आहे. रडण्या-या बाळाला त्याने पटकन उचलले. तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण बाळ काही शांत होईना.

त्याने उगी उगी करत चार इंग्रजी शब्द पण झाडले. माय डियर, कीप क्वायट. बेबी… बेबी… बी क्वायट… तरीही बाळ रडायचे थांबेना. तिने चार पाच वेळा बाळाला घेण्याच्या प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळानं कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले.

बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिने बाळाला जवळ घेतले. आपला पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेह-यावर मातृत्वाच जे भाव होते, जे समाधान होते ते पाहून मला माझी लाज वाटली. कारण हिच्यावर थोड्या वेळा पूर्वी तिच्या बद्दल मनात राग धरला होता.

तिच्या चेह-यावर अप्रतिम आनंद होता. आई आपल्या मुलाला अमृतपान करवते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते. त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते…!!

आई गोरी आहे की काळी! आई शिक्षित की अशिक्षीत! ती…. ती सुंदर आहे की असुंदर ! आई ती आईच असते….नऊ महिने त्रास सोसून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळयात सुंदर असते…. स्वतःच्या बाळाची भूक शमवणारी आई…!! त्यादिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले….!!

 

© सुजाता काळे

पाचगणी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्पर्श ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ स्पर्श ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

स्पर्श म्हणले की किती प्रकारचे स्पर्श मनाला स्पर्शून जातात नाही? प्रेमाचा, आपुलकीचा, हक्काचा, आश्वासनाचा, धीर देणारा, हवा हवासा वाटणारा, नको वाटणारा.

जेव्हा शुभमंगल होऊन हक्काचा जोडीदार येतो आणि सप्तपदी च्या वेळी  हातात हात घेतो तेव्हा जाणवतो, तो त्याच्या सोबतीचा स्पर्श.  त्याचा हळुवार लाडिक स्पर्श प्रेमात पाडतो तर प्रोत्साहित स्पर्शाने दहा हत्तींचे बळ देऊन जातो, आणि सारे अडथळे कसे चुटकी सरशी दूर करतो त्याच्या मिठीत तर स्वर्ग सुख ही ठेंगणे भासते आणि सारे सुख दुःख विरघळून जाते.

आपल्याला स्पर्शाची ओळख अगदी आईच्या गर्भात असल्या पासून होऊ लागते. किंबहुना असं ही म्हणता येईल की, आईला बाळाच्या स्पर्शाची ओळख आपलं बाळ उदरात असल्या पासून होत असते. तो अनोखा, हवा हवासा वाटणारा, आनंद देणारा स्पर्श. त्या मारलेल्या पहिल्या लाथेच्या स्पर्शाने आई सुखावून जाते, आणि मन वाट पाहू लागते की कधी एकदा आपले बाळ आपल्या कुशीत येतय आणि त्याच्या कोमल हाताने आपल्याला स्पर्श करतय.

आणि जेव्हा आपले नवजात बालक आपल्याला पहिल्यांदा स्पर्श करते तेव्हा ते तर, स्वर्ग सुख!!! मग आई आपला चेहरा  मुद्दामून त्याच्या हाता जवळ नेते जेणेकरून त्याने आपले मऊ हात फिरवावेत. त्या नवजात बालकाला कुशीत घेतल्यावर तरी अस वाटतय जणू सारे सुख आपल्या मिठीत सामावलेले आहे.

कालांतराने मुलं मोठी होतात आणि नोकरीला जाऊ लागतात तेव्हा वडीलांनी पाठीवरून फिरवलेला, हिंम्मत देणारा स्पर्श, हे सांगणारा की हो पुढे मी आहे.

आईच्या स्पर्शात तरी माया, वात्सल्य, कौतुक, विश्वास, आधार सारे काही सामावलेले असते.

वृद्धापकाळात सुखावून जातो आपल्या नातवंडांचा जादूवाला स्पर्श. जर नातवंडांनी आजीच्या गुडघ्याला तेल लावून मालीश केले तर ती सुखावलेली आजी दहा मैल चालून येते. मुलांनी किंवा मुलींनी प्रेमाने फिरवलेला पाठीवरून प्रेमाचा स्पर्श आपण एकटे नाही आहोत ह्याची जाणीव करून जाते.

स्पर्शात अनेक आजार बरे करण्याची शक्ति आहे म्हणून तर खूप महत्व आहे स्पर्श थेरपीला. मसाज केल्यानंतर जे सुख मिळते ते खूप सुखावणारे असते, आराम देणारे असते व दाह कमी करणारे असते..

असे अनेक स्पर्श आहेत जे आपल्या स्मरणात राहतात, जसे शाळेत गेल्यावर बाईंनी कौतुकाने फिरवलेला कींवा बाई ओरडल्या नंतर आपल्या मैत्रिंणीने किंवा मित्राने हळूच आपला हात हातात घेतल्यावरचा आधाराचा स्पर्श.  महाविद्यालयात नकळत झालेला पण मग तो हवाहवासा वाटणारा मोहरून टाकणारा किंवा नको असलेले तिटकारा येणारा स्पर्श. दाह कमी करणारा किंवा दाह देणारा स्पर्श.

थोडक्यात इतकंच म्हणता येईल की स्पर्शात लाख मोलांचे बळ असते, जे आजारी माणसाला निरोगी बनवतो, निराधारा व्यक्तीला आधार देऊन जातो. एखाद्याला प्रोत्साहन तर एखाद्याचा आधार बनुन जातो. एखाद्याला प्रेम जिव्हाळा देऊन जातो. एक सुखाची झप्पी जणू.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

१९७७ मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहिशीझाली.  `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्‍या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.

आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी आण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्‍या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले,  की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना,  त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळू हळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून आण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात आण्णांना नेमके काय हवे,  कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, आण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.

वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा आण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता आण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात आण्णांची बोलण्याची, लिहिण्याची घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.

प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं,  हाही आण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळू हळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं,  पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. आण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वास्वानींच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कतृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी `मानवतेचा दीपस्तंभ’ या दोन भागात केले. या सार्‍या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.

उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, आण्णांना लेखनात मदत करत राहिली. आण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. आण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा,  असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर आण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली,  कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या ८९ जुलैमध्ये कालवश झाल्या.

क्रमश: —-

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” व ”चन्दन” (बालकविता संग्रह) – प्रा. सौ. सुमती पवार ☆ प्रतिक्रिया – सौ. सारिका पाटील

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” व ”चन्दन” (बालकविता संग्रह) – प्रा. सौ. सुमती पवार ☆ प्रतिक्रिया – सौ. सारिका पाटील ☆ 

प्रा. सौ. सुमती पवार

प्रतिक्रिया – पुस्तक “चांदणं” व ”चन्दन” (बालकविता संग्रह)

वैशाली प्रकाशनने प्रकाशित केलेले वरील दोन बालगीत संग्रह नुकतेच माझ्या वाचनात आले.. या आधीची  तुमची काही पुस्तकं मी वाचली आहेत..

लहान मुलांवर चांगले संस्कार करणारे आपले लेखन असते हे तुमच्या “संस्कार” नावाच्या पुस्तकातून माझ्या मनावर बिंबल्या पासून मी तुमच्या पुस्तकांचा शोध घेत असते नि वरील दोन्ही अतिशय सुंदर बालगीत संग्रह माझ्या हाती लागल्यावर मला खूपच आनंद झाला..

आपण हाडाच्या शिक्षिका आहात हे आपल्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते..तसेच विषयांची विविधताही थक्क करणारी आहे. जवळ जवळ सर्वच विषयांवर आपण लेखन केले आहे.. आपल्या कविता यमकात असल्या मुळे गेय तर आहेतच पण प्रत्येक बालगीत कोणता तरी नवा संस्कार मुलांवर करते हे विशेष आहे…

चंदन व चांदणे हे दोन्ही संग्रह अतिशय वाखाणण्या जोगे आहेत यात शंकाच नाही. देशभक्तीचे बाळकडू तर हेच पण निसर्गातले विविध विषयही शिकवण देणारेच आहेत.

“देश तुम्हाला स्मरतो,”  या कवितेत आपण म्हणता.. “प्राणपणाने करतो रक्षण इंच इंच भूमी प्रजाच सारी भारत भू ची आहे पहा नामी….” अशी किती उदाहरणे द्यावित तेवढी कमीच पडतील…

मराठी बालविश्वात आपण मोलाची भर घालत आहात यात मुळीच शंका नाही…

आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा….?

स्नेहांकित

सौ. सारिका पाटील, नाशिक

संपर्क –  प्रा. सौ. सुमती पवार ,नाशिक, मो ९७६३६०५६४२, [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 80 ☆ मी टू : अंतहीन सिलसिला ☆ डॉ. मुक्ता

डॉ.  मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  एक अत्यंत विचारणीय  स्त्री विमर्श मी टू : अंतहीन सिलसिला।  यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 80 ☆

☆ मी टू : अंतहीन सिलसिला ☆

‘मी टू’ एक सार्थक प्रयास, शोषित महिलाओं को न्याय दिलाने की मुहिम, वर्षों से नासूर बन रिसते ज़ख्मों से निज़ात पाने की अचूक मरहम… एक अंतहीन सिलसिला है। बरसों से सीने में दफ़न चिंगारी ज्वालामुखी पर्वत की भांति सहसा फूट निकलती है, जो दूसरों के शांत-सुखद जीवन को तहस-नहस करने का उपादान बन, अपनी विजयश्री का उत्सव मना रही होती है, विजय पताका लहरा रही होती है, जिससे समाज में व्याप्त समन्वय व सामंजस्यता का अंत संभाव्य है। भारतीय लोकतंत्र के चौथे स्तंभ ने शोषित मासूमों में अन्याय के विरुद्ध आवाज़ उठाने का साहस जगाया है, क्योंकि अन्याय व ज़ुल्म सहन करने वाला, ज़ुल्म करने वाले से अधिक दोषी व अपराधी  स्वीकारा जाता है। औरतों की ‘मी टू’ में सक्रिय प्रतिभागिता होने पर, समाज के हर वर्ग के रसूखदार सदमे में हैं, क्योंकि किसी भी पल उन पर उंगली उठ सकती है और वे हाशिए पर आ सकते हैं। वैसे तो हर औरत इन हादसों की शिकार होती है। बचपन से लेकर वृद्धावस्था तक कदम-कदम पर उसकी अस्मत पर प्रहार किया जाता है और उसे इन विषम परिस्थितियों से जूझना पड़ता है…मुंह बंद कर के रहना पड़ता है ताकि परिवार का रूतबा कायम रह सके।

आइये! ज़रा दृष्टिपात करें  इसके स्याह पक्ष पर…  बहुत सी महिलाएं अपना स्वार्थ साधने हेतु निशाना दाग़ने से नहीं चूकतीं। वे धन- ऐश्वर्य पाने, झूठी पद- प्रतिष्ठा बटोरने व अधिकाधिक सुख-सुविधा जुटाने के निमित्त, लोक-मर्यादा की परवाह न करते हुए, हर सीमा का अतिक्रमण कर गुज़रती हैं। जैसे 498 ए के अंतर्गत दहेज मांगने के इल्ज़ाम में, पति व ससुराल पक्ष के लोगों को कटघरे खड़ा करना, जेल की सीखचों के पीछे पहुंचाना या दुष्कर्म के झूठे आरोप लगाने का दम्भ भरना, अपनी कारस्तानियों का सबके सम्मुख सीना तान कर दम्भ भरना..सोचने पर विवश करता है… आखिर किस घने स्याह अंधकार में खो गयी है ममता की सागर, सीने में अथाह प्यार, असीम वफ़ा व त्याग समेटे नि:स्वार्थी, संवेदनशील, श्रद्धेय नारी…जिसकी तलाश आज भी जारी है। मी टू के झूठे आरोप लगा कर या दुष्कर्म के झूठे आरोप लगाकर पैसा व धन- सम्पत्ति ऐंठने का प्रचलन बदस्तूर जारी है, जिसके  परिणाम- स्वरूप आत्महत्या के मामले भी सामने आ रहे हैं, जो समाज के लिए घातक हैं; मानव-जाति पर कलंक हैं… शोचनीय हैं, चिन्तनीय हैं, मननीय हैं, निन्दनीय हैं।

एक प्रश्न मन में कुलबुलाता है…आखिर इतने वर्षों के पश्चात्, इन दमित भावनाओं का प्राकट्य क्यों… यह दोषारोपण तुरन्त क्यों नहीं? इसके पीछे की मंशा व प्रयोजन जानने की आवश्यकता है, जिसका ज़िक्र पहले किया जा चुका है। इस संदर्भ में उन महिलाओं की चुप्पी व तथाकथित कारणों पर प्रकाश डालने की अत्यंत आवश्यकता है कि सुप्रीम कोर्ट का निर्णय आने के पश्चात् सहसा यह विस्फोट क्यों?

प्रश्न उठता है क्या ‘मी टू’ वास्तव में विरेचन है…उन दमित भावनाओं का, अहसासों का, जज़्बातों का, जो उनके असामान्य व्यवहार को सामान्य बना सकता है। वे लोग,जो शराफ़त का नकाब ओढ़े, समाज में ऊंचे-ऊंचे पदों पर काबिज़ हैं, उनकी हक़ीक़त को उजागर करने का माध्यम है, उनके जीवन के कटु यथार्थ को प्रकट करने का मात्र उपादान है, साधन है। क्या यह आधी आबादी को न्याय दिलाने का एकमात्र उपाय है?

आइए! इस विषय के सकारात्मक व नकारात्मक पहलुओं पर चर्चा करें…क्या यह दोनों पक्षों के हित में है… शायद नहीं। वास्तव में आरोपी पक्ष पर इल्ज़ाम लगाने पर, कीचड़ के छींटे हमारे उजले दामन को भी मैला करते हैं और दोनों परिवारों की इज़्ज़त ही दांव पर नहीं लगती, उनके घरों का सुख-चैन, शांति व सुक़ून भी नदारद हो जाता है। यहां तक कि चंद आत्महत्याओं के मामलों ने तो अंतर्मन को इस क़दर झिंझोड़ कर रख दिया कि सुप्रीम कोर्ट की सोच पर भी पुन:चिंतन करने की आवश्यकता का विचार मन में सहसा कौंधा, क्योंकि इससे मानसिक आघात व हंसते-खेलते परिवारों में ग्रहण लगने की अधिक संभावना है।शेष निर्णय व दायित्व आप पर।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी,

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – समय ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि – समय  ☆

समय को ढककर

अपने दुशाले से

खेलता हूँ छुपाछुपी,

खुद ही छिपाता हूँ

खुद ही ढूँढ़ता हूँ,

हौले से दुशाला हटाता हूँ,

समय को न पाकर

चौंक जाता हूँ,

फिर देखता हूँ

समय उतरा बैठा है

हर आँख में..,

अब आँख

खुली रखो या बंद,

क्या अंतर पड़ता है,

समय सर्वव्यापी हो चुका!

©  संजय भारद्वाज

प्रात:8:50 बजे, 21.6.2020

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ किसलय की कलम से # 32 ☆ खुद की आलोचना पर आत्मावलोकन ☆ डॉ विजय तिवारी ‘किसलय’

डॉ विजय तिवारी ‘किसलय’

(डॉ विजय तिवारी ‘ किसलय’ जी संस्कारधानी जबलपुर में साहित्य की बहुआयामी विधाओं में सृजनरत हैं । आपकी छंदबद्ध कवितायें, गजलें, नवगीत, छंदमुक्त कवितायें, क्षणिकाएँ, दोहे, कहानियाँ, लघुकथाएँ, समीक्षायें, आलेख, संस्कृति, कला, पर्यटन, इतिहास विषयक सृजन सामग्री यत्र-तत्र प्रकाशित/प्रसारित होती रहती है। आप साहित्य की लगभग सभी विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी सर्वप्रिय विधा काव्य लेखन है। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं।  आप सर्वोत्कृट साहित्यकार ही नहीं अपितु निःस्वार्थ समाजसेवी भी हैं।आप प्रति शुक्रवार साहित्यिक स्तम्भ – किसलय की कलम से आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपका एक सार्थक एवं विचारणीय आलेख  “खुद की आलोचना पर आत्मावलोकन”.)

☆ किसलय की कलम से # 32 ☆

☆ खुद की आलोचना पर आत्मावलोकन ☆

मानव के दुर्गुण जब समाज के सामने आते हैं तब उसकी निन्दा होना स्वाभाविक है। यदि किसी की आलोचना होती रहे तो वह निन्दित-दुर्गुणों की ओर ध्यान अवश्य देगा और उनके निराकरण के उपाय भी सोचेगा। वहीँ निन्दा से घबराए इन्सान अक्सर समाज में अपनी प्रतिष्ठा नहीं बना पाते। वैसे किसी ने सच ही कहा है कि निन्दा की सकारात्मक स्वीकृति एक बड़े साहस की परिचायक है। यदि इन्सान अपनी ही निन्दा अर्थात आत्मावलोकन करना स्वयं शुरू कर दे और उन पर अमल करे तो इसे हम “सोने पर सुहागा” वाली कहावत को चरितार्थ होना कहेंगे। मन से दुर्गुण रूपी मैल के निकल जाने से इन्सान में चोखापन आता है। स्वयं की बुराईयों को नज़र अन्दाज़ करने वाले इन्सान को कभी भी नीचा देखना पड़ सकता है, लेकिन इन्सान अपने आप में सद्विचार और परिवर्तन लाता है तब वह दूसरों को भी सुधारने या सद्मार्ग की ओर प्रेरित करने का हक़ प्राप्त कर लेता है। यही कारण है कि ऐसे इन्सान के समक्ष कोई भी दुर्गुणी ज्यादा देर तक टिक ही नहीं पाता। यह कहना भी उचित है कि कोई भी व्यक्ति सर्वगुण सम्पन्न हो ही नहीं सकता और यदि सर्वसम्पन्न है तो वह मानव नहीं देवता कहलायेगा।

हम सभी ये जानते हुए भी कि सद्कर्मी सर्वत्र प्रशंसनीय होते हैं, फिर भी हमारी प्रवृत्ति सद्कर्मोन्मुखी कम ही होती है। हम अपने गुणों का बखान करने के स्थान पर यदि आत्मावलोकन करें और बुराईयों को दूर करने का प्रयत्न करें तो निश्चित रूप से हमारे अन्दर ऐसे परिवर्तन आयेंगे जिससे हम समाज में कम से कम एक अच्छे इन्सान के रूप में तो जाने जायेंगे।

अंत में निष्कर्ष यही निकलता है कि अपनी निन्दा या आलोचना को सदैव सहज स्वीकृति देते हुए उस पर आत्मावलोकन करें, आत्म चिंतन करें और जो निष्कर्ष सामने आएँ उनका अनुकरण करें तो इन्सान कभी भी दुखी या निराश नहीं रहेगा।

© डॉ विजय तिवारी ‘किसलय’

पता : ‘विसुलोक‘ 2429, मधुवन कालोनी, उखरी रोड, विवेकानंद वार्ड, जबलपुर – 482002 मध्यप्रदेश, भारत
संपर्क : 9425325353
ईमेल : [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज # 79 ☆ लघुकथा – बहुमूल्य☆ डॉ. भावना शुक्ल

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं  एक भावुक एवं विचारणीय लघुकथा  “बहुमूल्य। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 79 – साहित्य निकुंज ☆

लघुकथा – बहुमूल्य

मैं रोज घर से निकलते समय गाय की रोटी ले जाती और गेट के कोने में रख देती। कभी -कभी रात का बचा खाना भी रख देते।  सोचते चलो गाय के पेट में चला जायेगा। एक दिन  मैं अपना चश्मा घर पर ही भूल गई। आगे जाकर याद आया। वापस लौटी तो क्या देखती हूँ ?  5 – 6 साल के दो बच्चे मेरा रखा खाना उठा रहे थे। जैसे ही मुझे देखा तो छुपाने लगे । मैंने कहा..” क्या बात है बच्चों? आप लोग ये क्या कर रहे हैं ?”

तब लड़की बोली…” आंटी आप जो खाना रोज रख जाती है, हम लोग उठाकर ले जाते हैं। हमारे पिता को दिखता नहीं है। पिता की तबीयत भी ठीक नहीं रहती। हम रोज आपके आने का इंतजार करते हैं। जिस दिन आप नहीं आती हम लोग भूखे रह जाते है।

उनकी बातें सुनकर आंख से आंसू निकल पड़े। हम सोच में पड़ गए। बचा हुआ खाना कितना बहुमूल्य है?

 

© डॉ.भावना शुक्ल

सहसंपादक…प्राची

प्रतीक लॉरेल , C 904, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब  9278720311 ईमेल : [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष # 69 ☆ संतोष के दोहे☆ श्री संतोष नेमा “संतोष”

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.    “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  “संतोष के दोहे। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार  आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 69 ☆

☆ संतोष के दोहे  ☆

अलबेली सी लग रही, दुनिया की अब चाल

स्वारथ में लिपटे सभी, यह जन-जन का हाल

 

छलिया मोरे मन बसे, कहलाते चित चोर

मुझको मोहन दीखते, जित देखूं उत ओर

 

अक्सर फँसती  पूंछ ही, गज निकले आसान

काज न समझें लघु कभी, होते सभी महान

 

पूस माह जाड़ा बढ़े, कपकपाये शरीर

बड़े-बूढ़े संभल रहें, दुर्बल  है तासीर

 

आया समय अवसान का, याद करें भगवान

जीवन के नव दौर में, कभी न आया ध्यान

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ मेरा गाँव… ☆ श्री जयेश वर्मा

श्री जयेश वर्मा

(श्री जयेश कुमार वर्मा जी  बैंक ऑफ़ बरोडा (देना बैंक) से वरिष्ठ प्रबंधक पद से सेवानिवृत्त हुए हैं। हम अपने पाठकों से आपकी सर्वोत्कृष्ट रचनाएँ समय समय पर साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता मेरा गाँव…।)

☆ कविता  ☆ मेरा गाँव… ☆

क्यों मन जिद करता है…

जाने को तुमसे दूर..

बुलाता है मुझे, अब, भी…

वो, गाँव का सूरज……

पगडंडियों पर लेटी वो धूप..

 

आँचल सम्हालती.. मुस्काती चन्दा….

जिससे मैं मिलने को आतुर…

क्यों मन जिद करता है..

जाने को तुमसे दूर…

 

क्यों मन कभी गाँव के आसमां में उड़ता,

कभी धरती को नापता, दौड़ दौड़,

क्यों भरता है कुलांचे, ये मन,

झील की  लहरों को,

ताकता, एकटक,

 

कभी भगवत शरण में,

रमने की इच्छा,

कभी बुलाती, मुझे

गाँव के मंदिर की राम धुन,

 

मुझे शहर नहीं भाता,

गाँव ही बुलाता, हरदम,

इसलिए मन ज़िद करता,

जाने को तुमसे दूर..

 

©  जयेश वर्मा

संपर्क :  94 इंद्रपुरी कॉलोनी, ग्वारीघाट रोड, जबलपुर (मध्यप्रदेश)
वर्तमान में – खराड़ी,  पुणे (महाराष्ट्र)
मो 7746001236

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares