मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

वहिनी गेल्या. नंतर आण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते  पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरी निमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. आण्णाचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून,  मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने आण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे.  आण्णांची आई बनून तिने आण्णांना जेवू घातले.

वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. आण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी,  आई-वडील,  भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्‍यांची ख्याली-खुशाली विचारून,  घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी आण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. आण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’  आण्णा म्हणायचे,  म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, `मग तुमचं कोण करणार?’  ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’  पण ती म्हणायची,  ‘मी वहिनींना वचन दिलय,  शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार!’

उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. आण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं  केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् तीदेखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.

आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’  म्हणायचा. पण आण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलय.. देहदान केलय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात,  आपली वास्तु,  जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं,  हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती,  त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरुऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात,  त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर,  आई-वडील,  भाऊ,  मुलगा या सार्‍यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता आण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. `ऋणानुबांधाच्या गाठी’ हेच खरं!

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १५) – ‘लोकसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १५) – ‘लोकसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

विविध प्रसंगी आपल्या मनातील विविध अशा विशिष्ट भावना प्रकट करण्याची, व्यक्त होण्याची मानवाची सहज ओढ त्यानं आपली बोली भाषा आणि सहजस्फूर्त सूर-लयीच्या आधारानं भागवली आणि आज ज्याला आपण लोकसंगीत म्हणतो त्याची निर्मिती झाली. सामान्य लोकांच्या जीवनातून सहजपणे ज्याची निर्मिती होत गेली ते लोकसंगीत! लोकसंगीत हा शब्दच आपल्याला सांगतो कि हे लोकांचे संगीत आहे… त्यामुळं त्याची मालकी कुण्या एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण समाजाची आहे, त्याच्या निर्मितीचे श्रेय हे संपूर्ण समाजाचं आहे. हे संगीत सर्वसामान्य लोकांच्या जीवनातून सहजी, उत्स्फूर्तपणे उपजलं आणि तितक्याच सहजी ते त्यांच्या ओठी खेळत, विकसित होत राहिलं.

मुळातच मानवाच्या जगण्याशी संगीत किती सहजी बांधलं गेलं आहे ह्याचा विचार केला तर स्वस्थ मन:स्थितीत सहजपणे गुणगुणणं, विविध भावना आवाजांतून व्यक्त करत असताना त्या भावनेनुसार आवाजात होणारे चढ-उतार, अत्यानंदानं गिरक्या घेणं, नाचणं, एखादी धून कानांवर आल्यावर स्वयंप्रेरणेनं पायानं धरला गेलेला ठेका किंवा टाळ्या वाजवत साधलेली लय, आनंदानं किंवा संतापानंही व्यक्त होताना सहजपणे विशिष्टप्रकारे केलेले हातवारे, आनंदानं उड्या मारणं किंवा संतापानं दाणदाण पाय आपटणं, डोळ्यांच्या, पापण्यांच्या, अंगप्रत्यंगांच्या विशिष्ट हालचालींतून शब्दांशिवायही भावना व्यक्त करणं अशा कितीतरी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या क्रिया आठवतील.

ह्या सर्व क्रिया ‘सूर, ताल, लय’ ह्या संगीतातील मूलतत्वांपैकी कुठल्या ना कुठल्या तत्वाशी आपसूक जोडल्या गेलेल्या आणि म्हणूनच ‘संगीत’कलेशी नातं सांगणाऱ्या आहेत, असं  म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढं शब्दसंपदा प्राप्त झाल्यावर बुद्धिमान व कल्पक मानवाच्या जगण्यातल्या अंगभूत संगीताला छान आकार प्राप्त होत गेला.

माणसाच्या दैनंदिन जीवनात उठल्यापासून झोपेतोवर संगीतच कसे सामावलेले आहे ह्याचा विचार करताना लक्षात येईल कि, पूर्वीच्या काळी पहाटे घरोघरी स्त्रिया जात्यावर धान्य दळताना ओव्या म्हणायच्या. ह्या ओव्यांतून त्यांची सुख-दु:खं, आशा-निराशा, स्वप्नं, काळजी अशा विविध भावना आपसूक व्यक्त होत असत आणि अवजड जातं ओढताना त्यांना होणारे श्रमही हलके होत असत. अतीव शारिरिक कष्ट करताना होणारे श्रम हलके करण्याचं श्रमगीत हे एक उत्तम साधन आहे. शेतकरी गीतं, कोळीगीतं इ. श्रमगीतांचेच प्रकार!

पूर्वीच्या काळी लोकांनी नदीवर स्नान करताना सूर्याला अर्घ्य देताना म्हटलेले ओंकार, श्लोक, पूजेच्यावेळी घंटानाद करत म्हटलेली आरती, जेवणापूर्वी म्हणायचे श्लोक, दिवसभर कामकाजाच्या वेळेस श्रम हलके करण्यासाठी गुणगुणणं किंवा गाणी गाणं, मुलांनी शाळेत एका लयीत म्हटलेले पाढे, ठेक्यात म्हटलेल्या कविता, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी म्हटलेली शुभंकरोती आणि एकूणच लयदार परवचा, ‘त्याच्या’ आळवणीत गायलेलं भजन, लहान मुलाचं रडं थांबवण्यासाठी टाळ्या-टिचक्या वाजवण्यापासून, ‘अलेलेले’ अशा लयदार उद्गारांपासून ते खुळखुळ्याचा घेतलेला आधार व त्यांना निजवताना गायली गेलेली अंगाई अशा कितीतरी गोष्टींत संगीतच तर सामावलेलं आहे.

मानवप्राण्याच्या सामुहिक जीवनाला जेव्हां सुरुवात झाली तेव्हांपासून लोकसंगीत अस्तित्वात आलं. लोकसंगीत हे समूहाचे, समूहाकडूनच निर्मिले गेलेले आणि समूहासाठीच सादर केले जाणारे संगीत आहे. ह्यातील सामूहिक हे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच त्याचे निर्मितीश्रेयही व्यक्तिगत नाही तर सामूहिक आहे. हे संगीत फक्त कोण्या एका व्यक्तीसाठी, ठराविक वर्गासाठी नव्हे तर प्रत्येकच व्यक्तीसाठी म्हणजे संपूर्ण समूहासाठी आनंददायक, अर्थवाही असते. ह्यातील शब्द व स्वररचना अगदी सहजस्फूर्त साधी-सोपी असल्याने संपूर्ण समूह, सगळे लोक त्याच्याशी जोडले जाऊ शकतात.

वर उल्लेखिलेल्या मानवाच्या भावाभिव्यक्तीतील ‘उपजत’ संगीतातूनच त्याच्या जगण्यातीत विविध प्रसंगांनुसार, त्या-त्या कालमानातील जीवनपद्धतीनुसार, त्या-त्या मातीतील संस्कृती व समाजव्यवस्थेनुसार, चालीरितींनुसार, विकसनशीलतेतून उदयास आलेल्या विविध संकल्पनांनुसार लोकसंगीताचे विविध प्रकार उदयास आले. जगण्यातल्या विविध प्रसंगी मनात निर्माण होणाऱ्या विविध भावनांशी जोडलं गेलेलं संगीत म्हटल्यावर मानवाच्या जगण्याचं, संस्कृतीचं प्रतिबिंब त्यात असणं अगदीच साहजिक आहे. खरंतर, संस्कृतीचा फार मोठा भाग हा संगीतानं व्यापलेला आहे हे लक्षात येईल.

माणसाच्या जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक प्रसंगी त्यानं आपल्या भावाभिव्यक्तीसाठी घेतलेल्या संगीताच्या आधारातून जन्मलेले लोकसंगीताचे विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रकार तर अक्षरश: अनंत आहेत. ह्याची कारणमीमांसा करायला गेलं तर जाणवतं कि, मनात निर्माण होणारी कोणतीही भावना नेमकेपणी व्यक्त करण्यासठी संगीत हे सहजस्फूर्त व अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आल्यावर बुद्धिमान मानवाने प्रसंग व त्यानुरूप भावनांचं नेमकं वर्णन करू शकणाऱ्या साध्या-सोप्या बोली भाषेतील शब्द आणि उत्स्फूर्त संगीतधून ह्यांची घातलेली ही सुरेख सांगड आहे. मानवाच्या अनुभूतीतून निर्माण होणारं हे संगीत असल्यानंच लोकसंगीत ‘सजीव अभिव्यक्ती’ असल्याचं मानलं जातं आणि ही अभिव्यक्ती जितकी सजीव तितकं दर्जेदार तिने त्या-त्या देशाचं प्रतिष्ठित संगीत साकार केलं आहे.

क्रमशः ….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 27 ☆ सात्विक संतोषी बड़े भारत के सब गांव ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  की एक भावप्रवण कविता  “सात्विक संतोषी बड़े भारत के सब गांव“।  हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 27 ☆

☆ सात्विक संतोषी बड़े भारत के सब गांव ☆

 

सात्विक संतोषी बड़े भारत के सब गांव

जिनकी निधि बस झोपड़ी औ” बरगद की छांव

बसते आये हैं जहां अनपढ़ दीन किसान

जिनके जीवन प्राण पशु खेत फसल खलिहान

 

अपने पर्यावरण से जिनको बेहद प्यार

खेती मजदूरी ही जहाँ जीवन का आधार

सबके साथी नित जहां जंगल खेत मचान

दादा भैया पड़ोसी गाय बैल भगवान

 

जन मन में मिलता जहां आपस का सद्भाव

खुला हुआ व्यवहार सब कोई न भेद दुराव

दुख सुख में सहयोग की जहां सबों की रीति

सबकी सबसे निकटता सबकी सबसे प्रीति

 

आ पहुंचे यदि द्वार पै कोई कभी अनजान

होता आदर अतिथि का जैसे हो भगवान

हवा सघन अमराई की देती मधुर मिठास

अपनेपन का जगाती हर मन में विश्वास

 

मोटी रोटी भी जहां दे चटनी के साथ

सबको ममता बांटता हर गृहणी का हाथ

शहरों से विपरीत है गावो का परिवेश

जग से बिलकुल अलग सा अपना भारत देश

 

मधुर प्रीति रस से सनी बहती यहां बयार

खिल जाते मन द्वार सब पा मीठा व्यवहार

गांव खेत हित के लिये  रहें सदा जो तैयार

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी , रामपुर , जबलपुर

[email protected]

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – शाश्वत ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

निठल्ला चिंतन – 

☆ संजय दृष्टि – शाश्वत ☆

…मृत्यु पर इतना अधिक क्यों लिखते हो?

…मैं मृत्यु पर नहीं लिखता।

…अपना लिखा पढ़कर देखो।

…अच्छा बताओ, जीवन में अटल क्या है?

…मृत्यु।

…जीवन में नित्य क्या है?

… मृत्यु।

…जीवन में शाश्वत क्या है?

…मृत्यु।

… मैं अटल, नित्य और शाश्वत पर लिखता हूँ।

©  संजय भारद्वाज

(11.42 बजे, 22.1.2020)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – लघुकथा ☆ अप्रत्यक्ष इलाज ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव

डॉ कामना तिवारी श्रीवास्तव

(आज  प्रस्तुत है  डॉ कामना तिवारी श्रीवास्तव जी  की एक सार्थक लघुकथा अप्रत्यक्ष इलाज  

☆ लघुकथा – अप्रत्यक्ष इलाज ☆

“माँ अमित से कहो मेरा सामान न छुआ करें मुझे पसंद नहीं है” सुमित बड़बड़ाया।

माँ बोली ..”तुम्हारा छोटा भाई ही तो है और तुम कितने चिड़चिड़े हो।”

अगले दिन सुमित ऑफिस के लिए तैयार हुआ रुमाल रखने के लिए जेब में हाथ डाला तो एक कागज था निकाल कर पढ़ा “हैव ए नाइस डे फ्रॉम खुशबू।” उसे बड़ा अच्छा लगा। अब वह जितनी बार कपड़े निकालता जेब में से पुर्जे में कुछ ना कुछ अच्छा लिखा होता। तुम्हारा स्वभाव बहुत अच्छा है, तुम बहुत अच्छे हो। ऐसी ही छोटी-छोटी पंक्तियों से थोड़े ही दिनों में उसका स्वभाव पूरी तरह बदल गया। गुस्सा हवा हो गया।

एक दिन उसने भाई को अलमारी से कपड़े निकालते देखा तो प्यार से कहा तुम मेरा सारा सामान मुझसे बिना पूछे ले सकते हो बस कपड़े मैं तुम्हें निकाल कर दूँगा।

फिर माँ से पूछ कर लॉन्ड्री के कपड़ों के बहाने खुशबू को ढूंढने गया।

काउंटर पर सरदार अंकल और एक अपाहिज लड़की बैठी थी उसने पूछा ..”मेरे कपड़े कौन धोता प्रेस करता है?”

अंकल जी बोले ..”बेटा यह तो मेन शॉप है यहां से कितने सारे धोबी के यहां  कपड़े जाते हैं बता नहीं पाऊँगा।” उसके जाते ही सरदार जी ने बाजू में बैठी लड़की से कहा ..”बेटा तुम्हें ढूंढते हुए यहां तक आ गया पर तुम्हें पहचान नहीं पाया।”

खुशबू बोली ..”अंकल दरअसल हमारी कल्पना हकीकत से बहुत ज्यादा खूबसूरत और परफेक्ट होती है। वो तो  एक दिन इसकी मम्मी को यहां फोन पर बात करते सुना कि मेरा बेटा बहुत चिड़चिड़ा है। मैं बहुत दुखी हूँ तब मैंने सोचा कि मैं चल तो नहीं सकती पर अपने शब्दों से ही किसी के जीवन को बदल दूं और कई बार अप्रत्यक्ष रूप से किया गया इलाज बहुत कारगर होता है लेकिन अब से उस पुर्जे की जरूरत नहीं पड़ेगी।”

© डॉ कामना तिवारी श्रीवास्तव

मो 9479774486

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -7 – सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)

☆ जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -7 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी☆ 

(सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी)

(सुश्री शिल्पा मैंदर्गी  के जीवन पर आधारित साप्ताहिक स्तम्भ “माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे” (“मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”) का ई-अभिव्यक्ति (मराठी) में सतत प्रकाशन हो रहा है। इस अविस्मरणीय एवं प्रेरणास्पद कार्य हेतु आदरणीया सौ. अंजली दिलीप गोखले जी का साधुवाद । वे सुश्री शिल्पा जी की वाणी को मराठी में लिपिबद्ध कर रहीं हैं और उसका  हिंदी भावानुवाद “मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”, सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी जी कर रहीं हैं। इस श्रंखला को आप प्रत्येक शनिवार पढ़ सकते हैं । )  

सुबह सुबह जल्दी, सूरज निकलने से पहले एक कली धीरे-धीरे खिल गई। आपकी प्रस्तुति कह गई। रात कब की चली गई है। जल्दी-जल्दी सुबह होने लगी। याने मेरे मन के नृत्य सीखने के विचारों का नया जन्म हुआ। इस कली के हलके से हवा में खिलने लगे, धनश्री दीदी के विचारों जैसे ।

सच तो यह है कि भरतनाट्यम नृत्यप्रकार सीखना सिर्फ और सिर्फ आँखो से देख कर सीखना यही कला है। इसलिये मुझे और दीदी को बहुत परेशानियों का सामना करना पडा। फिर भी दीदी ने मेरे मन के तार जगाने शुरू किए। हम दोनों के ध्यान में एक बात आ गई, शरीर एक केवल माध्यम हैं, आकृति है। शरीर के पीछे याने आंतरिक शक्ति के आधार से, हम बहुत कुछ सीख सकते है। दीदी के बाद मैंने स्पर्श, बुद्धि, और मन की आंतरिक प्रेरणा, प्रेमभाव के माध्यम से नृत्य सीखना शुरू कर दिया। सीखते समय हस्तमुद्रा के लिये हमारे सुर कैसे मिल गये पता भी नही चला।

नृत्य सीखने के अनेक तरीके होते है। उसमे अनेक कठिनाइयाँ और संयोजन रहते हैं, जैसे कि दायाँ हाथ माथे पर रहता है तब बायाँ पैर लंबा करना, बयान हाथ कमर पर होता है तो, दायें पैर का मण्डल करके भ्रमरी लेते वक्त दायाँ हाथ माथे पर रखकर बयान हाथ घुमाकर बैन ओर से आगे बढ़न और गोल-गोल घूमना। गाने के अर्थ के अनुरूप चेहरे के हाव-भाव होने चाहिये। ऐसे अनेक कठिनाइयों का सामना कैसे करना चाहिए यह सब दीदी ने बडे कौशल्य के साथ सिखाया है। सच में अंध व्यक्ति के सामने रखा हुआ पानी का लोटा लेलो कहने को दूसरों का मन हिचकताहै, फिर भी इधर तो अच्छा नृत्य सिखाना है।

नृत्य की शिक्षा जैसे-जैसे आगे बढ़ रही थी, वैसे-वैसे अनेक   कठीनाईयोंका सामना करना पडता है। आठ-नौ बरस सीखने के बाद अभिनय सीखने का वक्त आ गया। उधर भी दीदी ने अपने बुद्धिकौशल्य से छोटे बच्चों को जैसे कहानियाँ सुनाते है, उनके मन में भाव पैदा करते है और उसका इस्तेमाल करते है, वैसा ही सिखाया।

मेरी सब परेशानियों मे बहुत बडी कठिनाई थी, मेरी आवाज की। नृत्य में घूमकर मुझे लोगों के सामने आने के लिए मेरा चेहरा लोगों के सामने हैं या नहीं, सामनेवाले देख सकते है या नहीं, यह मुझे समझ में नही आता था। फिर भी दीदी ने इन कठिनाइयों का सामना भी आसानी से किया। आवाज की दिशा हमेशा मेरे सामने ही रहना चाहिए, उसके आधार से फिर दो बार घुमकर सामने ही आती थी।

दीदी के कठिन परिश्रम, अच्छे मार्गदर्शन, मेरे मेहनत रियाज और साधना का मिलाप होने के बाद मैं गांधर्व महाविद्यालय की ‘नृत्य विशारद’  पदवी, ‘कलावाहिनी’ का ५ साल का कोर्स, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ की नृत्य की एम.ए. की पदवी सफलता से प्राप्त की। जिसकी वजह से मैं विविध क्षेत्र में, मेरे अकेली का स्टेज प्रोग्राम कर सकती हूँ। ऐसे मेरी यश और कुशलता बहुत वृत्तपत्र और दूरदर्शन तथा अन्य प्रसार माध्यमों ने सविस्तार प्रस्तुत किए हैं।

प्रस्तुति – सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी, पुणे 

मो ७०२८०२००३१

संपर्क – सुश्री शिल्पा मैंदर्गी,  दूरभाष ०२३३ २२२५२७५

 

Please share your Post !

Shares

English Literature – Weekly Column☆ Samudramanthanam – 26 – Amrit ☆ Mr. Ashish Kumar

Mr Ashish Kumar

(It is difficult to comment about young author Mr Ashish Kumar and his mythological/spiritual writing.  He has well researched Hindu Philosophy, Science and quest of success beyond the material realms. I am really mesmerized.  I am sure you will be also amazed.  We are pleased to begin a series on excerpts from his well acclaimed book  “Samudramanthanam” .  According to Mr Ashish  “Samudramanthanam is less explained and explored till date. I have tried to give broad way of this one of the most important chapter of Hindu mythology. I have read many scriptures and taken references from many temples and folk stories, to present the all possible aspects of portrait of Samudramanthanam.”  Now our distinguished readers will be able to read this series on every Saturday.)    

Amazon Link – Samudramanthanam 

☆ Weekly Column – Samudramanthanam – 26 – Amrita ☆ 

Finally, the day has come for which Sura and Asura join their hands, for which they were doing all efforts from ages.

Out of the ocean of milk ‘Kshirasāgara’ emerged a radiant golden pot. “I am the Lord of Good Health and Medicine,” he announced. “Here is the amrita that you seek. Those who drink it will gain strength and immortality.”

There was a great cheer as the devas and Asuras realized that their task was over. Both Lords Indra and Bali stepped forward to take the pot.

“As it was our idea, we will drink it first,” said Indra, tugging it to the right.

“Without us, you would not have had the strength to churn the ocean,” retorted Bali, tugging it to the left. “Give it to us first.”

And so on, it went, back and forth, right and left. Tempers flared and it almost came to blows, four drops split from the pot and fall over earth. Those four drops of amrita fall on ‘Haridwar’, ‘Paryagraj’, ‘Ujjan’ and ‘Nasik’ and these four are places where Kumbh melas are organised. Kumbh means a pot.

Suddenly, from out of nowhere, appeared a beautiful maiden such as they had never seen! Her dark eyes were like blue lotuses and her air of mystery enchanted devas and Asuras alike. It was Lord Vishnu, who took the form of a lovely girl, to divert the attention of the Asuras.

Smiling sweetly and coyly, she took the pot from them. “Silly men, why quarrel over this?” she scolded playfully. “Sit down and I will serve it equally amongst you.”

Meekly they sat down, devas facing north and Asuras facing south, as the beautiful maiden danced between them. Flirting outrageously with the Asuras, she distracted them while she slyly served the amrita to the devas. Soon, all the devas had received the magic potion and there was not a drop left for the Asuras.

The beautiful maiden then threw down the pot and, laughing scornfully, vanished as suddenly as she had appeared.

© Ashish Kumar

New Delhi

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३५॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३५॥ ☆

 

पत्रश्यामा दिनकरहयस्पर्धिनो यत्र वाहाः

शैलोदग्रास त्वम इव करिणो वृष्टिमन्तः प्रभेदात

योधाग्रण्यः प्रतिदशमुखं संयुगे तस्थिवांसः

प्रत्यादिष्टाभरणरुचयश चन्द्रहासव्रणाङ्कैः॥१.३५॥

 

वहां सूर्य के अश्व सम नील हय हैं

जहां शैल सम उच्च गय मद प्रदर्शी

सुनिर्भीक रणवीर भट अग्रगामी

असिव्रण अलंकृत रुचिर रूपदर्शी

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टाक ☆ श्री मुबारक बाबू उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

 

☆ कवितेचा उत्सव ☆ टाक ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆

वारा नसतांही

पांगले ते पक्षी

आसमंतातच

कोरीतच नक्षी

 

प्रखर बाणांच्या

ऊन्हांच्या त्या झळा

घसा कोरडाच

सोशितच कळा

 

गावातून वाहे

काळेनिळे पाणी

तेजाब ते पित

करपली वाणी

 

झाडांच्या  झुंडीत

रासच पानांची

बासरी अबोल

बेचैन कान्हाची

 

जागोजागी दिसे

सांडलेले पंख

चांदणेही आले

मारीतच डंख

 

पक्षी घालेनात

नदीकाठी गस्ती

झाडात फुलेना

पाखरांची वस्ती

 

गर्दीत मिळेना

कोणालाच थारा

सुकुनच गेला

ममतेचा झरा

 

गावोगावी उडे

टाररस्ता घुळ

कापीतच गेले

झाडांचेच मुळ

 

बेचैन  होऊनी

सारे मारी हाक

पानावर आज

चालेनाच टाक

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोपी – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गोपी – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

आमचा प्रवास सुरू होता. बाहेर घाटातून वळण घेत आमची टॅक्सी धावत होती. माझे मन सुद्धा कासावीस होऊन हेलकावे खात होते. या चिमुरड्याला काय वाटत असेल? “गोपी, भूक लागली का? बिस्किट खाणार की कुरमुरे खाणार?” संभाषण कसं वाढवायचं तेच मला समजत नव्हतं.

“नाही ग आत्या, भूक नाहीये.  मला ना, आमच्या तिथल्या छोट्या मांजराच्या पिला ची आठवण येते ग. तिकडे ना, दुपारी मी आणि तेच असायचो. त्याची आई त्याला सोडून गेली होती. मीच त्याला बशीतून दूध पाजत होतो. आता मी तर इकडे आलो. त्याला आता कोण दूध देणार?” माझा हात घट्ट दाबत गोपी मला विचारत होता.

त्याचे ते निरागस, प्रेमाचे बोल ऐकून मला भडभडून आलं. त्या पिल्लाची आणि गोपी ची अवस्था एकच होती.पण त्या पिलाची काळजी त्याला पोखरून टाकत होती. पिल्ला च्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. आपल्या पप्पां वरच्या गाढ विश्वासाने गोपी माझ्याबरोबर आला होता. त्याला खात्री होती, आपण आता सुखरूप आहोत. आजी-आजोबा आपली वाट पाहत आहेत. त्यांना भेटायला त्याचे मन अतुर झाले होते. तेवढेच पिल्लाच्या आठवणीने त्याचे मन  कातर ही होत होते.

खरच, ही साधी जाणीव मोठ्यांमध्ये का बरे नसावी? तू तू, मै मै च्या जमान्यात प्रेम, आपुलकी, ओढ, मायेचा ओलावा  कसा मिळवायचा या फांदीवरून कोसळणार्‍या नाजूक फुलांनी?

क्रमशः —-

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares