आपल्या समुहातील लेखिका व कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांच्या ‘मन’ या कवितेस ,मध्यवर्ती “ज्येष्ठ नागरिक संघटना, पुणे (अॅस्काॅन, पुणे)” यांनी आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक (विभागून) मिळाला आहे.आपल्या समुहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ??
आज आपण त्या कवितेचा आनंद घेणार आहोत.
आपल्या समुहातील लेखिका व कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे याचे ‘ई अभिव्यक्ती’ परिवारातर्फे
☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-4) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
घरात बेला-सुदेश सोफ्यावर बसून होते. त्यांना जेवायचीच काय पण एकमेकांबरोबर बोलायचीही इच्छा होत नव्हती. अंथरुणावर पडले खरे, पण झोपच लागत नव्हती. तळमळत कुशीवर कुशी बदलणं चालू होतं. बेला उठूनच बसली. सुदेश ला विचारू लागली, “समिधा वाचेल ना रे. डॉक्टरांनी तर चोवीस तास धोक्याचे आहेत म्हणून सांगितलंय. “आठवल्यासारखं पुढं बोलू लागली,” तशी चांगली आहे रे ती… आता घर म्हणजे थोडं भांड्याला भांडं लागणार चकी…पण त्यामुळे एवढं मोठं पाऊल उचलायचं? बिचाऱ्या मीनूचा विचार पण डोक्यात आला नसेल?” तिची बेचैनी बोलताना वाढतच चालली होती.
सुदेशनं तिला धीर देत थोपटलं.या सगळ्या गदारोळात कादंबरीचा शेवट होण्याऐवजी नवीन कादंबरीची सुरुवातच झालीय या विचारानं तो स्वतःशीच हसला. बेलाच्या हे गावीच नव्हतं. सुदेशला हसताना पाहून तिला आश्चर्य वाटलं,
“काय झालं?” तिनं विचारलं. काही नाही.. त्याने नकारार्थी मान हलवली.
“झोप आता. दमली आहेस खूप” तो म्हणाला.
**
बहुतेक पहाट झाली होती. किरण चा फोन आला.
“समिधाला शुद्ध आलीय. मी आणि प्रकाश हॉस्पिटलात चाललोय. तू येतेस ?”
“मी? हॉस्पिटलात? अजिबात नाहीss!” बेला एकदम ठामपणे म्हणाली. असा काय पराक्रम गाजवला ग तिनं की तिच्या दर्शनाला जायचं आपण?…. स्वतः आरामात ट्रीटमेंट घेत पडली असेल. डॉक्टर, चार चार नर्सेस तिच्या दिमतीला असतील…. आम्ही मात्र इथे रात्रभर तळमळत बसलोय. रागानं तिनं मोबाईल सोफ्यावर फेकून दिला. आपण एवढे का तिरसटतोय?… तिचं तिलाच कळेना. काल सकाळी मुरगळलेल्या पाय आता जोरात दुखू लागलाय म्हणून?… की बोजड झालेल्या समिधाला पूर्ण शक्तीनिशी ओढत नेल्यामुळे हात दुखताहेत म्हणून?… दिवसभराच्या विचित्र घटनाक्रमामुळं मन थकलंय म्हणून?… की रात्रभराच्या जागरणामुळं तारवटल्यागत झालंय म्हणून?… खरं कारण तिला जाणवलं नाही.तरी देहाला त्याची कल्पना होती.
तिच्या डोळ्यात एकदम अश्रू दाटून आले. सुदेशन तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत तो तिला धीर देत राहिला. थोड्यावेळाने अश्रू थांबले.
मन थोडं शांत झालं. सहज सोफ्यावरचा मोबाईल उचलून घेण्यासाठी तिनं हात पुढे केला. पण फोन बरोबर अर्धवट लिहून ठेवलेला एक कागद तिच्या हातात आला. ‘बरोबर! समिधानं वाजवलेली बेल ऐकून दरवाजा उघडायला आपण गेलो. तेव्हा हा कागद सोफ्यावर ठेवला होता.’ तिला आठवलं. कादंबरीचा संदर्भ आठवला.
थोडं नाराजीनं ती म्हणाली, “सुदेश मी पैज हरलेच की रे.”
“कसली पैज?” लक्षात आलेलं असूनही तो हसून म्हणाला.
“ती रे s… कादंबरी पूर्ण करायची.”
“वेडाबाई, जीवनातला एवढा थरार…. एक भयंकर नाट्य तू अनुभवलंस… प्रसंगाला धैर्याने सामोरी गेलीस… कागदावरच्या साहित्यापेक्षा ते खूप मोठं काम होतं. हो ना बेला, अन् साहित्य काय, कला काय हे सगळं शेवटी मानवी जीवनासाठी, जीवन सुंदर बनवण्यासाठीच असतं ना?” सुदेश म्हणत होता.
तिचे डोळे चमकले. ती समाधानानं हसली मानेनच’ हो, म्हणाली.
“जिंदगीऔर मौत” यात काल एक भयंकर युद्ध चालू होतं. तू जिंदगीला साथ दिलीस. एका व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर ओढून काढण्यासाठी जीवाच्या शर्थीने प्रयत्न केलेस. अगं एकच काय पण असल्या दहा कादंबऱ्या जरी ओवाळून टाकल्या तरी त्या कमीच पडतील. तुझ्यातल्या माणुसकीनं सगळ्या पैजा तू जिंकल्या आहेस”….. सुदेशचा प्रत्येक शब्द तिच्या मनाला स्पर्शून जात होता. शांत झालेल्या तिच्या मनाला हे बोलणं कधीच संपू नये असं वाटत राहिलं.
अवंती नगरात सुबुद्धी व दुर्बुद्धी नावाचे दोन व्यापारी होते. त्या दोघांनी दुसऱ्या देशात जाऊन भरपूर धन प्राप्त केले. तिकडून आल्यानंतर स्वनगराजवळच असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली कोणालाही कळू न देता खणून ते धन ठेवले व स्वगृही परतले. एक दिवस दुर्बुद्धीने एकट्यानेच ते झाडाखाली पुरलेले धन खणून काढले व स्वतःच्या घरी नेऊन ठेवले.
दुसऱ्यावेळी जेव्हा दोघे एकत्र त्या ठिकाणी गेले व त्या वृक्षाखाली खणले, तेव्हा त्यांना ते गुप्तधन मिळाले नाही. तेव्हा दुर्बुद्धीने सुबुद्धीचे मनगट पकडून म्हटले, “तूच इथे लपून येऊन एकट्याने सर्व धन हरण केलेस आणि काही माहिती नाही असे नाटक करून इथे धन खणण्यास आलास. आता माझ्या वाटणीचे धन मला परत दे.” “खरेच मी काहीही जाणत नाही” असे सुबुद्धीने वारंवार शपथेवर सांगून सुद्धा तिकडे दुर्लक्ष करीत दुर्बुद्धीने त्याला न्यायाधीशाकडे नेले आणि त्यांस सांगितले की, “आम्ही दोघांनी एकत्रितपणे खणून ठेवलेले गुप्तधन ह्या सुबुद्धीने एकट्याने पळविले. तेव्हा माझा वाटा ह्याने परत द्यावा”.
न्यायाधीशांनी दुर्बुद्धीला विचारले की, “ तुम्ही दोघांनी मिळून ठेवलेले गुप्तधन सुबुद्धीने एकट्याने घेतले असे तू सांगतोस. याची काही साक्ष तू देऊ शकतोस का?” दुर्बुद्धी उत्तरला, “ ज्या वृक्षाच्या मुळाशी धन ठेवले तोच याची साक्ष देईल.” न्यायाधीश म्हणाले, “ ठीक आहे. उद्या वृक्षाजवळ येऊन विचारूया”.
नंतर दुर्बुद्धीने रात्रीच आपल्या वडिलांना एकांतात नेऊन झाडाच्या ढोलीत लपवले व त्यांना बजावले की, “न्यायाधीशाने झाडाजवळ येऊन जर विचारले तर सुबुद्धीने सर्व धनाचे अपहरण केले असे सांगा”.
ठरल्याप्रमाणे न्यायाधीश सकाळी आपल्या सहकाऱ्यांबरोबर झाडाजवळ आले व ” इथे खणून लपवून ठेवलेले धन कोणी चोरले?” असे त्यांनी विचारले. “ सर्व धन सुबुद्धीने पळविले” असा ढोलीतून आवाज आला. तो आवाज ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. न्यायाधीशांनी क्षणभर विचार करून त्या ढोलीत थोडे गवत ठेवून ते पेटवून दिले. ढोलीतअसणाऱ्या दुर्बुद्धीच्या वडिलांना अग्नी व धुरामुळे श्वास घेणे अवघड झाले व त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे न्यायाधीशांना दुर्बुद्धीचे कपट लक्षात येऊन, यानेच सर्व धन हरण केले याची खात्री पटली व त्यांनी सगळे धन सुबुद्धीलाच दिले. धननाश व पित्याचा मृत्यू यामुळे खूप दुःखी झालेला दुर्बुद्धी स्वतःला दोष देत घरी परतला.
तात्पर्य – जो दुसऱ्याचा घात करण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्याचा ईश्वरच घात करतो.
थंडी वाढत चाललीय. गारठाही. काकडायला होतय. माणसं पशू, पक्षी, प्राणी सगळेच गारठलेत. व्हरांड्यात छोट्या चार वर्षाच्या प्रणवला स्वेटर घालत होते. आमच्या घरासमोर रेन ट्रीचं झाड आहे. समोर खूप मोकळी जागा आहे. तिथे भोवतीनं अंतरा-अंतरावर रेन ट्रीची झाडं उभी आहेत. खूप लोक त्यांना शिरीषाची झाडं असंही म्हणतात. झाडं खूप मोठी आहेत. बर्याच वर्षांपूर्वी लावलेली असणार. थंडी सुरू झाली की पानगळ सुरू होते.
स्वेटर घालून घेता घेता, समोरच्या झाडाकडे बघत प्रणव म्हणाला, `आई, ती पानं खाली पडताहेत बघ! म्हणजे झाडांना जास्तच थंडी वाजत असेल ना!’ त्याच्या बोलण्याचं मला हसूच आलं. `खरंच की!’ मी म्हंटलं. पण त्याच्या बोलण्यामुळे माझं लक्ष अभावितपणे समोरच्या झाडाकडे गेलं. एरवी झाड पानांनी अगदी भरगच्च दिसतं. आता मात्र त्याच्या माथ्यावरची हिरवी छत्री विरविरित झालीय. नुसती विरविरितच नाही, तर आता त्या छत्रीला खूपशी भोकंसुद्धा पडलीत. त्या भोकातून आभाळाची धुरकट निळाई दिसतीय. इतक्यात एक करड्या रंगाचा पक्षी तिथे आला आणि एका फांदीवर बसला. बराच वेळ दिसत राहिला. एरवी झाडांच्या गच्च गर्दीत छान छपून राहतो तो. आज मात्र तो माझ्या बल्कनीतून अगदी स्पष्ट दिसतोय. मनात आलं, काय वाटत असेल बरं त्या पक्षाला? आपण आसरा घ्यायला या झाडाच्या घरात आलो खरे, पण त्याने तर आपल्याला लपवून ठेवण्याऐवजी, आपल्या घराच्या भिंतींच्या, पानांच्या वीटाच काढून घेतल्या. आता आपण सहजपणे घास होऊ शकू, एखाद्या शिकारी पक्षाचा, किंवा मग एखाद्या शिकार्याच्या मर्मभेदी बाणाचा.
माझं लक्ष पुन्हा तिथल्या झाडांकडे गेलं. सर्वच झाडांची पानगळ होते आहे. तिकडे बघता बघता एकदमच एक गोष्ट जाणवली. एरवी पानांची घनदाट घुमटी सावरत मिरवणारी ही झाडं सगळी एकसारखीच वाटायची. पण आता पानगळीमुळे ही झाडं आकसलीत. आता त्यांच्या आकृत्या, रूप-स्वरूप नीट दिसतय. त्यांच्य रुपाचं वेगळेपण जाणवय. प्रत्येकाचं वेगवेगळं व्यक्तिमत्व लक्षात येतय.
झाडांकडे पाहता पाहता, मला एक कविता सुचली. `अवलिया’.
`ओलांडुनिया पाचही पर्वत एक अवलिया आला कोणी भणंग, भटका, लक्तरलेला, तुटकी झोळी हाती घेऊनी’
हा अवलिया म्हणजे शिशिर ऋतू. पाच ऋतुंचे पाच पर्वत ओलांडून तो या भूमीवर आलाय. आता दोन महिने या भूमीवर त्याचेच साम्राज्य, पण तो सम्राटासारखा कुठे दिसतोय? तो तर दिसतोय भणंग भिकार्यासारखा. जीर्ण-शीर्ण, मलीन-उदासीन. त्याची झोळीही विरविरित, फाटकी-तुटकी, धुक्याची. तो थंडी-गारठा घेऊन आलाय. त्याच्या येण्याने जमिनीला भेगा पडल्याहेत. माणसाच्याही हाता-पायांना कात्रे पडलेत. ओठ फुटलेत॰ गाल खडबडीत झालेत. अवघं शरीरच कसं रुक्ष-शुष्क झालय. जमिनीप्रमाणेच.
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्या नद्या आता आटल्या आहेत. आकसल्या आहेत. जणू त्यांच्या थेंबांचे मोती-दाणे त्या फकिराने झोळीत भरून घेतलेत. फुलांच्या पाकळ्या, झाडांची पानेही त्याने ओरबाडून घेतलीत. आपल्या झोळीत टाकलीत. त्यामुळे जमिनीप्रमाणे वृक्षांच्या सावल्याही सुकल्या आहेत. त्याची झोळी भरली. आता तो पुन्हा निघून चाललाय आपल्या देशात. इथे सृष्टी मात्र बापुडवाणी होऊन बसलीय. पण ही स्थिती कायम थोडीच राहणार आहे? फाल्गुन सरता सरता नव्हे, फाल्गून लागता लागताच पुन्हा चमत्कार होणार आहे. त्यावेळी झाडे निष्पर्ण झाली असली, तरी गुलमोहर, पळस, पांगारा, शेवरी आपल्या माथ्यावर रत्नमाणकांची फुले मिरवणार आहेत.
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ७) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
चतूर सुजन राग कहत
बागेसरी शास्त्र विहीत
खर हर प्रिय मेल जनित
पंचम अति अल्प गहत…….
समवादी खरज रहत
रात त्रितीय प्रहर रमत
म ध संगत चितको हरत…..
शास्त्रकारांनी केलेले हे बागेश्रीचे वर्णन!
अतिशय मधूर स्वरांची ही रागिणी काफी थाटांतून उत्पन्न झालेली,मध्यम आणि षड् ज वादी व संवादी सूर असून गंधार,धैवत व निषाद कोमल आहेत. आरोहांत पंचम पूर्णपणे वर्ज्य.मप(ध)मप(ग)इतकाच पंचमाचा उपयोग.
आकाशांत पुनवेचा चंद्रमा उगवला आहे,त्याच्या शीतल प्रकाशाने आसमंत न्हाऊन निघाला आहे आणि तुडूंब भरलेल्या सभागृहांत हरीप्रसाद चौरसियांसारख्या दिग्गज कलाकाराने बासरीतून बागेश्रीचे स्वर काढले आहेत,श्रोते देहभान विसरून
म(ध)(नि)सां,(ध)(नि)सां अशा कोमल सुरांच्या वर्षावात चिंब भिजताहेत, हा सोहळा कसा वर्णावा? कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकून विरहाने व्याकूळ झालेल्या राधेची झालेली सैरभैर अवस्था, तिच्या मनांतील शंका कुशंका हेच भाव जणू काही या बागेश्रीतून बोलके झाल्यासारखे वाटतात, आणि “मोहे मनावन आये हो, सगरी रतिया किन सौंतन घर जागे” या पारंपारिक बंदीशीची आठवण येते. जयपूर घराण्याच्या गायकीतून ही विरहावस्था चांगलीच जाणवते.
कुमार गंधर्वांनी याच बागेश्रीच्या सुरांतून वेगळा भावाविष्कार दाखविला. “टेसूल बन फूले रंग छाये, भंवर रस ले फिरत मदभरे”
पळसाचे बन फुलले आहे, भ्रमर फुलांतील मधुसेवनाचा आनंद घेत आहेत, हे सांगणारे निसर्गाचे चित्र त्यांनी ह्या बंदीशीतून रेखाटले.
“फेर आयी मौर मेरे अंबूवापे” ह्या बंदीशीत त्यांनी निसर्गचक्र अविरत फिरतच असते हा भाव दाखविला. याचाच अर्थ असा चैतन्य, समृद्धी ही वातावरण निर्मीति बागेश्रीच्या सुरावटींतून केली.
“जा रे बदरा तू जा” ही प्रभा अत्र्यांची बंदीश मनाला भुरळ पाडणारी आहे. नाजूक भावनांची जपणूक करणार्या बागेश्रीच्या सुरांवर हळुवार मींड हा अलंकार चांगलाच खुलतो.
या रागावर आधारित बरीच नाट्यपदे आणि सुगम भावगीते आपल्या परिचयाची आहेत. सौभद्रातील “बहुत दिन नच भेटलो सुंदरीला” हे बागेश्रीतील गाजलेले पद! तरूण आहे रात्र अजुनी(सुरेश भटांची गझल) आणि(घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा) हा ज्ञानेश्वरांचा अभंग र्हुदयनाथ मंगेशकरांनी बागेश्रीच्या आधारावरच संगीतबद्ध केला. मृदुल करांनी छेडीत तारा, नाम घेता तुझे गोविंद ह्या भक्तीगीतांवरही बागेश्रीचीच छाया आहे. राधा ना बोले ना बोले, आजा रे परदेसी,घडी घडी मेरा दिल धडके, जा जा रे बालमवा ही हिंदी चित्रपटांतील गाजलेली गाणी या बागेश्री रागावर आधारीतच आहेत.
हमे कोई गम नही था (बेगम अख्तर), एक दीवाने को आये है समझाये कही (जगजीत सिंह), चमनमे रंगे बहार उतरा (गुलाम अली) हे गझल आजही रसिकांचे मन लुभावणारे आहेत.
कलाकारांचे व रसिक गणांचे अतिशय प्रेम असलेला हा राग! वागीश्वरी ह्या मूळ शब्दांतून अपभ्रंशित शब्द बागेसरी व त्यानंतर बागेश्री ! सरस्वतीची मधूर, प्रेमळ, भावूक वाणी!
(वरिष्ठ साहित्यकार एवं अग्रज श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी स्वास्थ्य की जटिल समस्याओं से उबर रहे हैं। इस बीच आपकी अमूल्य रचनाएँ सकारात्मक शीतलता का आभास देती हैं। इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना कुछ गीत अनमने से…)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ संजय दृष्टि ☆ लघुकथा – सपना ☆
बहुत छोटा था जब एक शाम माँ ने उसे फुटपाथ के एक साफ कोने पर बिठाकर उसके सामने एक कटोरा रख दिया था। फिर वह भीख माँगने चली गई। रात हो चली थी। माँ अब तक लौटी नहीं थी। भूख से बिलबिलाता भगवान से रोटी की गुहार लगाता वह सो गया। उसने सपना देखा। सपने में एक सुंदर चेहरा उसे रोटी खिला रहा था। नींद खुली तो पास में एक थैली रखी थी। थैली में रोटी, पाव, सब्जी और खाने की कुछ और चीज़ें थीं। सपना सच हो गया था।
उस रोज फिर ऐसा ही कुछ हुआ था। उस रोज पेट तो भरा हुआ था पर ठंड बहुत लग रही थी। ऊँघता हुआ वह घुटनों के बीच हाथ डालकर सो गया। ईश्वर से प्रार्थना की कि उसे ओढ़ने के लिए कुछ मिल जाए। सपने में देखा कि वही चेहरा उसे कंबल ओढ़ा रहा था। सुबह उठा तो सचमुच कंबल में लिपटा हुआ था वह। सपना सच हो गया था।
अब जवान हो चुका वह। नशा, आलस्य, दारू सबकी लत है। उसकी जवान देह के चलते अब उसे भीख नहीं के बराबर मिलती है। उसके पास फूटी कौड़ी भी नहीं बची है। एकाएक उसे बचपन का फॉर्मूला याद आया। उसने भगवान से रुपयों की याचना की। याचना करते-करते सो गया वह। सपने में देखा कि एक जाना-पहचाना चेहरे उसके हाथ में कुछ रुपये रख रहा है। आधे सपने में ही उठकर बैठ गया वह। कहीं कुछ नहीं था। निराश हुआ वह।
अगली रात फिर वही प्रार्थना, फिर परिचित चेहरे का रुपये हाथ में देने का सपना, फिर हड़बड़ाहट में उठ बैठना, फिर निराशा।
तीसरी रात असफल सपने को झेलने के बाद भोर अँधेरे उठकर चल पड़ा वह शहर के उस चौराहे की तरफ जहाँ दिहाड़ी के लिए मज़दूर खड़े रहते हैं।
आज जीवन की पहली दिहाड़ी मिली थी उसे। रात को सपने में उसने पहली बार उस परिचित चेहरे में अपना चेहरा पहचान लिया था।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆