श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  २९ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी.

पां.गो.पारखी हे मागच्या शतकातील मराठीतील कवी व निबंधकार होते. त्यांनी पुणे येथे संस्कृत पाठशाळेत अध्ययन केले होते.

कालिदासाचे संस्कृत ॠतूसंहार वर आधारित त्यांनी षड़्ऋतूवर्णन हे पुस्तक लिहिले.तसेच अनेक ताम्रपट, शिलालेख, चिनी प्रवाशांचे ग्रंथ इत्यादीचा अभ्यास करून निबंधलेखन केले आहे.त्यांनी भावगुप्तपद्म या टोपणनावाने काव्य लेखनही केले आहे.

पांडुरंग शास्त्री यांची ग्रंथसंपदा:

बाणभट्ट याच्या संस्कृत ‘कादंबरी’चे भाषांतर.

काव्य– अलंकारार्पण, कृष्णकुमारी,बोधामृत, श्रीकृष्णलीला

कादंबरी– मंजुघोषा,मुक्तामाला,

निबंध– बाणभट

याशिवाय अनेक इंग्रजी ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे.

 29मार्च1911रोजी पांडुरंग गो. पारखी यांचे निधन झाले.

 

 डाॅ.पद्माकर विष्णू वर्तक:

श्री.वर्तक हे  व्यवसायाने डाॅक्टर होते. एम.बी.बी.एस.झाल्यानंतर त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये एम.डी.केली.शल्यचिकित्सका अभ्यास केला. काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यावर त्यांनी रामायण आणि महाभारताचे संशोधन यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. ऋग्वेद,महाभारत यांचा अभ्यास करून रामायणाचा काळ ठरवला. त्यांनी अध्यात्म व योग यांच्या संशोधनेसाठी ‘अध्यात्म संशोधन मंदिर’ स्थापन केले. तसेच प्राचीन भारतीय विज्ञानाचा शोध घेण्यासाठी ‘वेद विज्ञान मंडळ’ स्थापन केले.

वर्तक यांची ग्रंथसंपदा:

वास्तव रामायण

स्वयंभू(महाभारतावर आधारित)

तेजस्विनी द्रौपदी

युगपुरूष श्रीकृष्ण

पातंजल योग

दास मारूती? नव्हे, वीर हनुमान

संगीत दमयंती परित्याग(नाटक) इत्यादी

29मार्च2019 ला श्री.वर्तक यांचे निधन झाले.

 

शंकर नारायण जोशी :

श्री.शंकर नारायण जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे झाला.त्यांचे शिक्षण  पाचवड,कुरंदवाड,जमखंडी येथे झाले.परंतु वडिलांच्या निधनामुळे त्यांना इंग्रजी तिसरीतच शिक्षण सोडावे लागले.नंतर पुणे येथे ज्ञानप्रकाश  व आर्यभूषण छापखान्यात त्यांना मुद्रित तपासणीचे काम मिळाले. या कामामुळेच त्यांना वाचनाची व विशेषतः इतिहास वाचनाची गोडी लागली.त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला.लोकमान्यांच्या दौ-याच्या वेळी ते लोकमान्यांचे स्वयंसेवक म्हणून काम करू लागले.1916 मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांना काम मिळाले व त्यांचा इतिहासाचा अभ्यास सुरू झाला.इतिहास विषयक सूची व शकावल्या तयार करण्याचे किचकट काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.मध्ययुगीन ग्रामव्यवस्था,वतनदार,

राज्यव्यवस्था याविषयी संशोधन करून शोधनिबंध सादर केले.याशिवाय शिवाजी महाराजांवर व अनेक थोर व्यक्तींवर त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली.

शं. ना. जोशी यांची ग्रंथसंपदा:

मुळशी पेट्यासंबंधी ऐतिहासिक माहिती

राजवाडे लेखसंग्रह(संपादन)

राजवाडे लेख संग्रह संकीर्ण निबंध भाग 1 व 2

शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड 3

शिवचरित्र साहित्य खंड 5

संभाजी कालीन पत्रसारसंग्रह

मराठेकालीन समाजदर्शन इ.इ.

 

कै.शं.ना.जोशी,पद्माकर वर्तक व पांढरा.गो.पारखी यांचा आज  स्मृतीदिन.या तीनही अभ्यासू,संशोधक साहित्यिकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments