अर्थ समजायला सुलभ जावे म्हणून मी या श्लोकाची खालीलप्रमाणे विभक्त मांडणी केली आहे.
आ ब्रह्यन् ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्
आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति
व्याधी महारथो जायताम्
दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः
पुरंध्रिर्योषा जिष्णू रथेष्ठाः सभेयो
युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां
निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु
फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्
योगक्षेमो नः कल्पताम्
सुलभ अर्थ –
हे ब्रह्मात्म्या , आमच्या देशात समस्त वेदादी ग्रंथांनी देदीप्यमान विद्वान निर्माण होवोत. अत्यंत पराक्रमी, शस्त्रास्त्रनिपुण असे शासक उत्पन्न होवोत. विपुल दुध देणाऱ्या गाई आणि भार वाहणारे बैल, द्रुत गतीने दौडणारे घोडे पैदा होवोत.
तैलबुद्धीच्या स्त्रिया जन्माला येवोत. प्रत्येक नागरिक श्रेष्ठ वक्ता, यशवंत आणि रथगामी असो. या यज्ञकर्त्याच्या गृहात विद्या, यौवन आणि पराक्रमी संतती निर्माण होवो. आमच्या देशावर आमच्या इच्छेनुसार वर्षाव करणारे जलद मेघ विहारोत आणि सर्व वनस्पती फलदायी होवोत.
आमच्या देशातील प्रत्येकाच्या योगक्षेम पूर्तीसाठी त्यांना प्राप्ती होवो.
(काही संदर्भ- लंडन येथील नदीचे नाव- थेम्स, त्या नदीवर एक मोठा ऐतिहासिक पूल आहे- टाॅवर ब्रिज. या पुलाच्या बाजूंना दोन मोठे टाॅवर असून राजघराण्यातील व्यक्ति बोटीने जाताना मध्यभागातून तो उघडला जातो.त्या नदीवर एक मोठा दुसरा पूल असून त्याला लंडन ब्रिज म्हणतात. मी त्यावर मी लिहिलेली एक कविता )👇🏻