मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरणारे वर्ष मी… कवी – मंगेश पाडगांवकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सरणारे वर्ष मी… कवी – मंगेश पाडगांवकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(वर्षाच्या निरोपाची मंगेश पाडगांवकरांची सुंदर कविता)

मी उद्या असणार नाही

असेल कोणी दूसरे

मित्रहो सदैव राहो

चेहरे तुमचे हासरे

 

झाले असेल चांगले

किंवा काही वाईटही

मी माझे काम केले

नेहमीच असतो राईट मी

 

माना अथवा नका मानु

तुमची माझी नाळ आहे

भले होओ , बुरे होओ

मी फक्त ” काळ ” आहे

 

उपकारही नका मानु

आणि दोषही देऊ नका

निरोप माझा घेताना

गेट पर्यन्त ही येऊ नका

 

उगवत्याला ” नमस्कार “

हीच रीत येथली

विसरु नका ‘ एक वर्ष ‘

साथ होती आपली

 

धुंद असेल जग उद्या

नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला

खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला

 

शिव्या ,शाप,लोभ,माया

यातले नको काही

मी माझे काम केले

बाकी दूसरे काही नाही

 

निघताना ” पुन्हा भेटु “

असे मी म्हणनार नाही

” वचन ” हे कसे देऊ

जे मी पाळणार नाही

 

मी कोण ? सांगतो

” शुभ आशीष ” देऊ द्या

” सरणारे वर्ष ” मी

आता मला जाउ द्या।

(संकलन माधव विद्वांस)

🙏💦🌸💦🙏

प्रस्तुती : श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नव वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नव वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

कॅलेंडर बदलतं नि वर्ष नवं येतं

सांगा बरं काय घडतं ?

बदलतात का सूर्य-चंद्र ?

 

नाही हो !सृष्टी नाही बदलत.

एक मात्र नक्कीच घडतं

बदलतं आपलं मन.

 

नवी आशा,नवोन्मेष,संकल्पांचंं दालन

भविष्याचा वेध घेण्या,एक नवं कारण

जीवनाला उभारी देतं,स्वागतोत्सुक मन

चित्तवृत्ती बदलण्याचं,ठरतं एक साधन.

 

कौटुंबिक जिव्हाळा ते वृद्धिंगत करतं

नववर्ष मनामनांना, नव्यानं सांधतं .

 

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 154 ☆ नूतन वर्ष ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 154 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… नूतन वर्ष ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(पाश्चात्य परंपरेची, नवीन वर्षाची सुरुवात आज झाली…. त्या निमित्ताने ह्या काही ओळी…)

नूतन वर्षाची, सुरुवात झाली

सूर्य किरणे, प्राचिवर प्रसवली

मंजुळ स्वरात, कोकिळा वदली

नवीन वर्षाला, सुरुवात झाली

चाफा सुंदर, फुलू लागला

मोगरा सुगंधी, बहरून आला

झाले जे ते, विसरून जावे

नव्याने पुन्हा, तयार व्हावे

पुन्हा नवी दिशा, पुन्हा नवा डाव

करा सावारा-सावर, टाका आपला प्रभाव

होणारे सर्व आता, छान छान व्हावे

चांगले योग्य, तेच घडून यावे

मनोभावे करावी, प्रार्थना देवाला

सुखी ठेव बा, चालू या घडीला

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? काव्यानंद ?

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆

छातीत फुले फुलण्याची

वार्‍यावर मन झुलण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

डोळ्यात ऋतुंचे पाणी

मौनात मिसळले कोणी

वाळूत स्तब्ध राहताना

लाटेने गहिवरण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

तू वळून हसलीस जेव्हा

नक्षत्र निथळले तेव्हा

मन शहारून मिटण्याची

डोळ्यात चंद्र टिपण्याची …

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

ज्या चंद्र कवडशा खाली

कुणी साद घातली ओली

मग चंद्र वळून जाताना

किरणात जळून जाण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

पाऊस परतला जेव्हा

नभ नदीत हसले तेव्हा

कोरड्या मनाने कोणी

गावात परत येण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

थबकून थांबल्या गाई

की जशी शुभ्र पुण्याई

त्या जुन्याच विहिरीपाशी

आईस हाक देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

गावाच्या सीमेवरती

जगण्याच्या हाका येती

त्या कौलारु स्वप्नांना

आयुष्य दान देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

हे गाणे जेव्हा लिहिले

मी खूप मला आठवले

शब्दास हाक देताना

आतून रिते होण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 – श्री अरुण म्हात्रे 

काही काही गोष्टी आपल्या समोर येण्याच्या वेळा किती अचूक असतात असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं. वर्षाचा शेवटचा महिना   मला आठवणींचा महिना  वाटतो… वर्षभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे आपल्या नजरेसमोरून तरळत जात असतात. वर्ष आणि वय जसं उलटत जातं तसं भूतकाळाची वही भरायला सुरुवात होते.

या वहीतल्या प्रत्येक पानावर वर्षभरातले अनेक प्रसंग आपल्याही नकळत लिहिले जातात… गंमत म्हणजे काही प्रसंग लिहायचं ठरवलं नसलं तरीही आपसूकच लिहिले जातात. आणि एका छोट्याशा ज्योतीनं सारा आसमंत नजरेत यावा तसे ते प्रसंग कुठल्यातरी एका छोट्याशा जाणिवेतून स्मृतीतल्या एखादा दिवस, विशिष्ट प्रहर लख्ख उजळवून टाकतात.

अरुण म्हात्रे यांच्या या कवितेत या कवीच्या स्मृतिकोषात अशाच काही आठवणी बद्ध झालेल्या आहेत. ज्या साध्या दिवसांनाही ‘विशेष पण’ बहाल करून गेल्या आहेत. प्रत्येकाचा भूतकाळ हा तसा रमणीय असतो. पण कवी हा भूतकाळ ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत जास्त ‘रमणीय’ असते. कारण त्याला गेलेल्या वेळेची किंमतही माहिती आहे आणि आत्ताच्या वेळेचीही जाण असते. ऋतुंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गा इतकंच सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे बघण्याची ताकद कवी आत्मसात करतो, किंबहुना ते त्याचं बलस्थान असतं.

आर्तता, आत्मीयता, आत्ममग्नता आणि त्याचवेळी आत्मसमर्पणता अशा सगळ्यांच भावना तो कवितांमधून मांडत जातो. इतक्या सहज की जणू सागराच्या लाटेनं जोमाने उसळुन आपलं वेगळेपण सिद्ध करावं आणि ते लक्षात येईस्तोवर समुद्रात तितक्याच वेगाने मिसळून जावं. ‘क्षणाचा जन्म’ आणि ‘क्षणाचा मृत्यू’ इतक्या सुंदर पद्धतीने कवी मांडतो की जणू कविता ही त्याची प्रेयसी असावी आणि तिचं वर्णन करण्याची शब्दांची अहमिका लागलेली असावी.

या कवितेतील ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’ या ओळीतून आपल्यालाही दोन वेळांमधला आणि दोन परिस्थिती, मनस्थिती यांतला फरक चटकन जाणवतो.

मला तर ही कविता कवितेलाच उद्देशून लिहिलीय असं वाटतं. जणू तो कवितेलाच सांगतो आहे ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’. एका टप्प्यावरती आल्यावर कवीनेच आपल्या कवितांकडे तटस्थपणे बघण्याचा आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो याच पद्धतीने तिच्याशी बोलेल.

घटना जेव्हा वर्तमानात घडत असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना अर्थ असतोच असं नाही. अनेकदा काळ उलटून गेल्यावर त्या घटनांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या कवितेतल्या सगळ्या कडव्यांमधून कवीला हेच मांडायचं असावं.

येणाऱ्या नव्या वर्षाकडे आशेने पाहताना मागील वर्षातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी देखील आपण आता अशाच नजरेने पाहतो आणि आपल्याला त्या तेव्हा साधा वाटलेल्या घटनाही, आता विशेष वाटतात. ही जगण्यातली गंमत कवीला खूप छान उमगलेली असते.

मला भावलेली कविता अशी आहे. तुम्हाला ती आणखीन वेगळ्या प्रकारे भावू शकते. कारण आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अखेरचा आठवडा…अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? कवितेचा उत्सव ?

☆अखेरचा आठवडा…अज्ञात ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

निरंतर माळेतून

एक मोती गळतो आहे..

तारखांच्या जिन्यातून

डिसेंबर पळतो आहे ..

काही चेहरे वजा अन्

बर्‍याच आठवणी जमा..

वयाचा पक्षी

आभाळी दूर उडतो आहे ..

हलकी हलकी उन्हे

अन् आक्रसलेल्या रात्री..

गेलेल्या क्षणांवर

पडदा हळूहळू पडतो आहे..

मातीचा देह

मातीत मिळण्यापूर्वी..

हर मुद्द्यावर

इतका का आडतो आहे..

अनुभवण्या पूर्वीच

सुटून जात आहे आयुष्य..

एक एक क्षण जणू

ढग बनून उडतो आहे..

तारखांच्या जिन्यातून

डिसेंबर पळतो आहे ..

     …चला…

 

या वर्षाचा हा अखेरचा…. आठवडा

खुप सारे धन्यवाद..!!

तुमच्या या मैत्रीची साथ

यापुढे ही अशीच कायम असू द्या…

नव्या वर्षात नव्या उमेदीने

पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…🍫🍫🤝

 

कवि  अज्ञात

प्रस्तुती – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तूच… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ तूच… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 फुलणारे फूल ,

कधीतरी सुकणार !

हे माहीत असूनही,

फुलाचा सुगंध घ्यायला,

तूच शिकवलेस मला !…..१

 

    समईची जळणारी ज्योत,

     तेल, वात संपल्यावर

    विझून जाणार !

    पण समई सारखे मंद तेवायला,

    तूच शिकवलेस मला!…..२

 

 येणारा प्रत्येक क्षण

  पुन्हा येणार नाही,

हे माहीत असूनही,

प्रत्येक क्षण आनंदाने जगायला,

तूच शिकवलेस मला!…..३

 

    आयुष्याचे दान मला दिल्यावर,

     ते इतरांना कसे वाटावे,

    दुसऱ्यासाठी कसे झिजावे,

      तूच शिकवलेस मला !…..४

 

हा प्रत्येक क्षण कारणी लागावा,

 म्हणून झुरतंय मन ,

त्याला मार्ग दाखव ,

  हेच विनविते तुला..!…..५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “आयुष्ययात्रा…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “आयुष्ययात्रा…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गोजिरवाणे  बालपण इवले

त्याच्यापुढती बाल्य पहूडले

अगदी थोडे मोठे शैशव

कौमार्याच्या आधी ठाकले ।।

तारूण्याचे रसरशीत पर्ण हे

पूर्ण  वाढीने मोठे जाहले

प्रौढत्वाकडे झुकलेले  जे

पिवळसरपण तयास आले ।।

जरा वय वाढताच पुढती 

सुवर्णाची झळाळी लाभली

इथवर जगण्याची  शरिरी

कृतकृत्यता  तया लाभली ।।

म्हातारपण  येता देहाला

काया सारी शुष्क जाहली

आणि शेवटी सुकता कुडी

इतिकर्तव्यता इथेच झाली ।।

सारे इथेच डोळ्यासमोरी

पर्ण सांगते  जीवनचक्रा

तुमचे, आमचे, त्यांचे, तिचे

अशीच असते आयुष्य यात्रा ।।

जगण्याच्या साऱ्याच अवस्था

मनापासूनी जगून घ्याव्या

पुढती पुढती चालत असता

मागील अनुभव ध्यानी घ्यावा ।।

वळून पाहता येते केवळ

आयुष्यी मागे फिरणे नाही

जी जी अवस्था जे देते ती

कडू-गोड शिदोरी सोबत घ्यावी ।।

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे

प्रेषित निघून जातात कालातीत विचारांचे ठसे ठेवत

आम्ही मात्र काळाच्या पडद्यावर रक्तलांच्छित ठसे ठेवतो

ते सुळावर चढतात आमच्या कल्याणा साठी

त्यांच्या विचारांना आम्ही सुळी देतो स्वार्थासाठी

ते आपलाच क्रूस वागवतात खांद्यावर स्वतःच्याच

आम्ही जबाबदारीचे ओझेही पेलत नाही स्वतःच्याच

मृत्यूनंतरही ते पुन्हा प्रकटतात आमच्या भल्यासाठी

मारेकरी मात्र सतत जन्म घेतात क्रौर्यासाठी 

एकदा क्रूरपणे त्यांना प्रत्यक्ष मारण्यासाठी

 मग अधिक क्रूरपणे विचारांना मारण्यासाठी.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण -…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण …” ☆ श्री सुनील देशपांडे

आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !

आज त्यांची पुण्यतिथी 

त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये  गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.

आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या  कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात. 

पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर  रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा  ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.  

आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच. 

परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’  खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?

या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’

असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी  म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती  त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….

म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी

“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

हिरवं पान

कधीतरी पिकणारच,

पिकलं पान

कधीतरी गळणारच,

गळलं पान

मातीला हे मिळणारच. 

झाड कधी कण्हतं का?

कधी काही म्हणतं का?

गिरक्या गिरक्या घेत घेत

नाचत जातं पिकलं पान,

कविता पिवळी पिवळी धमक

वाचत जातं पिकलं पान!

नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप

बोरकर एकदा म्हणाले

सिगारेटचा सोडीत धूर 

“सत्तर संपली तरी माझ्या

गळ्यात तरुणताजा सूर!

तीन मजले चढून आलो

असा दम अजून श्वासात

– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”

कवितांतून

रंग रंग झरू लागले

प्रत्येक क्षण

आनंदाने भरू लागले!

घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,

धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!

पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस

पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत

उभा होता किती वेळ,

रंगून जाऊन बघत होता

बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!

रस्त्यावरच उभं राहून दोघांनी

मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!

मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,

जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!

खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! 

आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?

नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?

अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?

थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?

तुम्ही काय घ्यायचं

ते तुम्ही ठरवा,

तुम्ही काय प्यायचं

ते तुम्ही ठरवा!

त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:

वय तुमचं साठ असो, सत्तर असो,

तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;

मोरासारखा अंधार फुलून आल्यावर

मजा आणते थोडीशी काजूफेणी!

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

 

आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता  रसिकार्पण.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा

 

डोळे भरत त्यांची आठवण

आपण आज काढतोच ना?

दोन कविता आठवून आठवून

त्यांच्यासाठी म्हणतोच ना ?

डोळे गाळत बसायचं की कविता म्हणत बसायचं

तुम्हीच ठरवा

 

सरत्या वर्षाच्या काळोखात 

अंधार गडद होत असतो

नव्या वर्षाच्या प्रकाशात

त्यांचं काव्य उजळत असतं

अंधारात गडप व्हायचं की काव्यानंदात उजळायचं

तुम्हीच ठरवा

 

पाडगांवकर हयात नाहीत

असंही म्हणता येतं

पाडगांवकर मनात आहेत

असं सुद्धा म्हणता येतं

हयात नाहीत म्हणायचं की मनात आहेत म्हणायचं

तुम्हीच ठरवा.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा. 

 

———- श्रद्धापूर्वक  — सुनील देशपांडे.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “डोळे —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “डोळे —” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

कोणी कोणी म्हणती मला

रे आंधळाच तू कसा असा

      नाहीत डोळे तरीही तू रे

      आनंदाने जगशी कसा ….

 

कळेना मला हसू की रडू

भाबड्या अशा प्रश्नाला

        काय जहाले नसले डोळे

        विचारीत मी सतत मनाला ….

 

वात्सल्याचा फिरतो जेव्हा

पाठीवरती कधी तो हात

          पाठच माझी होते डोळे

          ओलावती जे आतल्या आत ….

 

मित्रत्वाचा जेव्हा मिळतो

हातामध्ये माझ्या हात

            हातच माझे होती डोळे

            आनंदाने ओसंडत ….

 

माथ्यावरती ठेवे कोणी

आशिर्वचाचा जेव्हा हात

             माथ्यावरती किलकिल डोळे

             कृतज्ञतेने भरून जात ….

 

स्पर्शाच्या डोळ्यांनी पहातो

खळबळ किती ती मनामनातली

              भेटे कधी तो शुद्ध स्नेह अन

              कुठे विखारी आग आतली ….

 

कानांच्या डोळ्यांनी दिसे ती

अंदाधुंदी जगतामधली

               वाटे हे तर बरेच झाले

               पापणी आहे मम मिटलेली ….

 

डोळे असुनी त्यावर झापड

किंवा कोणी बांधे पट्टी

                वा करिती ती डोळेझाक

                कोठे गेली सम्यक दृष्टी ? ….

 

डोळस कैसे त्यासी म्हणावे

आंधळेच हे असुनी डोळे

                चेहेऱ्यावरती नसले तरीही

                सहस्त्र मजला ‘डोळस’ डोळे ….

 

सगुण मूर्त जरी परमेशाची

पाहू न शकतो डोळे भरुनी

                निराकार तो निर्गुण ईश्वर

                प्रकटे नित मम हृदय-लोचनी …….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares