मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-२ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-२ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

आता मी थोडं आजच्या विषयाकडे वळते. नव्या नवीन काळाची काय आवाहन आहेत? मगाशी म्हटलं तसं की प्रश्नांमध्ये सतत काही ना काही तरी बदल होत असतो कारण समाजही सतत बदलत असतो. तर सध्या एकूणच नव्या बदलत्या या प्रवाहाबद्दलच्या व्यसनाधीनतेच्या प्रश्नाच्या बाबतीत मला थोडं तुम्हाला आता सांगायचंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाधीनतेचा जो वयोगट आहे तो आता थोडा कमी व्हायला लागलाय. लहान वयातच आता मुलांना व्यसन लागायला लागले आहे. पूर्वी साधारण प्रौढ लोक म्हणजे 25-30 च्या पुढचे असे रुग्ण आमच्याकडे यायचे. त्यांचीच संख्या जास्ती असायची. पण अलीकडे आम्ही बघतो आहोत की, 14-15 वर्षापासूनच्या सुद्धा मुलांमध्ये हा प्रॉब्लेम वाढायला लागलाय. त्यात सर्व प्रकारची व्यसनं आहेत. ड्रग्स आहे, दारू पण आहे आणि ज्याला आपण वर्तनात्मक व्यसन म्हणतो तेसुद्धा या वयोगटांमध्ये वाढायला लागले आहे. म्हणजे फोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स वगैरे, या गोष्टींमध्ये.

बरोबर एक वर्षांपूर्वी मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये एक पुण्यामध्ये घडलेली घटना सगळ्यांनी नक्की पेपरमध्ये वाचली असेल… पोर्षे कारचं जे प्रकरण झालं त्यात एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन जोरात गाडी चालवली आणि एक्सीडेंट झाला. त्यात दोनजणांचा मृत्यू पण झाला. अगदी परवाच त्याला या घटनेला एक वर्ष झालं. नंतर त्या मुलाशी बोलणं करण्याची आमच्यावर ती जबाबदारी आली. त्या घटनेबद्दल थोड्या लोकांना थोडासा धक्का बसल्यासारखं झालं. एवढ्या लहान वयात सुद्धा मुलांमध्ये व्यसनाधीनता कशी वाढते? आमच्याकडे खूप अशा घटना आम्ही बघतोय. लोकांच्या मनात असा प्रश्न नेहमी येतो की, असं काय होतंय की लहान वयामध्ये मुलं व्यसनाकडे वळताहेत? याचे कारण असं सांगता येईल की, *कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं याला आता एक समाजामध्ये प्रतिष्ठा यायला लागलेली आहे. * 

माझे बाबा एका खूप छोट्या गावात गावातले. त्यांच्या गावांमध्ये एकच असा माणूस होता की जो बाबा लहान असताना दारू प्यायचा आणि त्याला एकदम असं तोंड लपवून गावात फिरायला लागायचं. कारण त्याला खूप लाज वाटायची की तो दारू पितो. आता मात्र उलट झाले आहे. हल्ली लहान गावांमध्ये सुद्धा बार असतात. पार्ट्या करणं याला एक प्रकारची खूप प्रतिष्ठा आलेली आहे. पूर्वी कोणी नवीन घर बांधलं तर ‘आम्ही कसं देवघर केलं’ हे लोकांना अभिमानाने दाखवलं जायचं. आता ‘आम्ही हॉलमध्ये कसा बार केलाय’ हे दाखवलं जातं. दुसरं म्हणजे हिंदी पिक्चरचा खूप प्रभाव असतो. हे जे टीनेजर असतात त्यांच्या दृष्टीने असे काही आदर्श असतात ते जास्ती करून फिल्मस्टार वगैरे. ते जे करतात त्यांचा अनुकरण करायची प्रवृत्ती या मुलांमध्ये खूप दिसते. एक असाच मुलगा आमच्याकडे आला होता. त्याला लहान वयातच व्यसन लागलं आणि त्याने असं आम्हाला सांगितलं की, ‘शाहरुख खान हा माझा आदर्श आहे. त्याची फॅशन, बोलण्याची स्टाईल, या सगळ्याचे तो अनुकरण करत होता. त्याने असं बघितलं होतं की पिक्चरमध्ये तो कसा पितो, त्याने वाचलं होतं की शाहरुख खान चेन स्मोकर आहे आणि मग तो त्याचं तस्संच अनुकरण करायला लागलेला होता. तर हा एक खूप प्रभाव दिसतो हल्ली मुलांवर. तुम्ही अलीकडचे कुठलेही पिक्चर बघा त्याच्यामध्ये हिरोच नाहीतर हिरोईनसुद्धा त्यांना जर का काही प्रॉब्लेम वगैरे आला तर त्या दारू पिताना दाखवतात. पूर्वी फक्त हिरोलाचं दारू पिताना दाखवायचे, पण अलीकडच्या काळात हिरोईनना सुद्धा काही प्रॉब्लेम आला तरी दारू पिताना दाखवतात. इव्हन त्यांना काही एन्जॉय करायचंय तर पार्टीत दारू पिताना दाखवतात. हे सगळं बघून मुलांना संदेश काय मिळतो की, तुम्हाला दुःख झालंय, टेन्शन आलंय ना तर तुम्ही दारू प्या, म्हणजे तुमचं टेन्शन जाईल किंवा तुम्हाला सेलिब्रेट करायचंय ना, तुम्हाला एन्जॉय करायचाय ना, तर तुम्ही दारू प्या. हे दोन अतिशय चुकीचे संदेश मुलांपर्यंत अशा गोष्टीतनं मिळत असतात. ते लहानपणापासूनच मुलं बघत असतात.

… तर हे खूप मोठं सामाजिक कारण आहे की लहान वयात आता एकूणच व्यसनाधीनतेचे प्रमाण का वाढतय त्याचं. याला समाजिक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे त्याला एक प्रकारचं ग्लॅमर यायला लागलेलं आहे. मुलं हे जसं पिक्चर्स मध्ये बघतायेत तसं घरीसुद्धा बघतात. याबाबतीतलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगते आमच्याकडच्याच एका मुलाचं. एकदा असं झालं की एक वडील त्यांच्या तेरा वर्षाच्या मुलाला घेऊन आमच्याकडे आले होते. मुलगा आणि ते बरोबरच बसले होते. ते सांगायला लागले की, “माझा मुलगा तेरा वर्षाचा आहे आणि तो सिगरेट ओढायला लागलाय. मला त्याच्या तोंडात सिगरेटचा वास आला म्हणून मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलो आहे. ” 

मी मुलाला म्हटलं की, “तू थोडं बाहेर बस. मी आधी तुझ्या वडिलांशी बोलते. ” तो बाहेर गेल्यानंतर मी वडिलांना पहिलाच प्रश्न विचारला, “तुम्ही सिगरेट ओढता का? ” तर वडील म्हणाले, “हो, मी ओढतो. ” मुलगा ते लहानपणापासून बघतच होता की, वडील पण सिगरेट ओढतात. म्हणून मी त्यांना म्हटलं की, “तुम्ही आधी सिगरेट सोडा. म्हणजे मुलगाही सिगरेट पिणार नाही. ” तर त्यांचं यावर म्हणणं होतं की, ‘एवढ्या लहान वयात त्याने सिगरेट पिऊ नये. मी मोठा झाल्यावर सिगरेट प्यायला लागलो. ” आता बोला!!! 

आपण जे सांगतो ना ते मुलं ऐकत असतात. आपण जसे वागतो तसे मुलं वागण्याचा प्रयत्न करत असतात. पण आजकाल ना या सगळ्या मुलांच्या कामांमध्ये मला एक गोष्ट मुलांच्या बाबतीत खूप दिसून येते की, मुलांमध्ये ना एक वेगळीच दैवी देणगी असते. आपण जसे डोळे बंद करतो ना तसे मुलांना कानपण बंद करता येतात! आपण पालक त्यांना लेक्चर द्यायला लागतो तेव्हा त्यांचे कान एकदम बंद होतात. त्यांचं लक्षच नसतं, आपण काय सांगतोय याच्याकडे. पालक म्हणून खूप काही गोष्टी त्यांना सांगतात, लेक्चर देतात, पण मुलांचं लक्ष आपण काय सांगतोय त्याच्याकडे अजिबातच नसतं. आपल्या वागण्याकडे मात्र मुलांचं लक्ष असतं. त्यामुळे पेरेंटिंगच्या बाबतीत मी पालकांना एक वाक्य नेहमी सांगते… माझं ते अतिशय आवडतं वाक्य आहे. *पालक म्हणून आपल्याला जे वाटतं की आपल्या मुलांनी करावं ते आधी आपण करायला पाहिजे तरच ती मुलं करतील. आपल्याला वाटतं ना मुलांनी रोज व्यायाम करावा, मग आपण आधी करायचा. आपल्याला वाटतं की, मुलांनी कुठलंच व्यसन करू नये, मग आपणही करू नये. मगच मुलं आपलं अनुकरण करतील.* 

आत्ताही जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की स्वतः वडील सिगरेट ओढत होते आणि त्यांच्या मुलाला ते घेऊन आले होते. मग अर्थातच आम्हाला बरीच सेशन्स वडील आणि मुलाची घ्यायला लागली. असंसुद्धा कित्येक वेळा होतं की मुलं सांगतात, ‘लहानपणापासून मी बघतोय की माझे वडील रोज संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आल्यावर दारू पितात. मी लहान असताना एकदा विचारलं की, ‘बाबा तुम्ही हे रोज काय पिता? ‘ तर बाबा म्हणाले की, ‘मी ना औषध पितोय. मला ऑफिसच्या कामाचा खूप स्ट्रेस असतो, टेन्शन असतं आणि म्हणून हे माझं औषध आहे. ते घेतलं की मी रिलॅक्स होतो. ‘ मुलाने हे लक्षात ठेवलं की टेन्शन आलं की त्यातून मुक्त व्हायला हे चांगलं औषध आहे. मुलगा बारावीत गेला. त्याला पण अभ्यासाचं, करिअरचं, पुढं काय करायचं याचं, एक्झामचं अशी अनेक टेन्शन्स सुरू झाली. मग काय! वडिलांचा घरात बार होताच. त्याच्यातनं त्याने दारू प्यायला सुरुवात केली. पौगंडावस्थेतल्या मुलांना व्यसनं खूप पटकन लागतात. हा मुलगा अल्कोहोलिक झाला आणि एवढंच नाही तर पुढे त्याला कॉलेजमध्ये इतरही व्यसनं लागली. यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, पालक मुलांना काय सांगतात हे खूप खूप महत्त्वाचे आहे. चुकीचे संदेश दिले तर त्याचा मुलांवरती दुष्परिणाम होऊ शकतो. हे खूप मोठं आव्हान आहे. आताशा लहान वयामध्ये मुलांना व्यसन का लागायला लागले आहे त्यामागे पालकांचं वागणं हे एक कारण आहे. लहान वयात जेव्हा व्यसन लागतं तेव्हा त्यांचं करिअर, त्यांचं आरोग्य… शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतात.

या वयातल्या मुलांमध्ये आता गांजाचे पण व्यसन खूप वाढते आहे. गांजाच्या बाबतीत मुलांच्या मनात खूप गैरसमज असतात. कुठे कुठे वाचलेलं असतं सगळ्यांनी. त्यांच्याशी आम्ही काहीही बोलायला लागलो की, आमच्यापेक्षा भरपूर जास्त माहिती त्यांनी गुगलवरती वगैरे गोळा केलेली असते. त्यामुळे आम्हाला सतत आमचं ज्ञान अपडेट करत राहायला लागतं. कारण त्यांच्यासमोर आम्हाला असं निरुत्तर होऊन वगैरे चालत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की, मुलांनी गांजाच्या बाबतीमध्ये माहिती गोळा केलेली असते… अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये गांजा लीगल आहे, तिथे त्याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे मग काय होतं ते घेतलं तर? तेव्हा आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं की, आपल्या देशात हे कायदेशीर नाही… गांजा बेकायदेशीर आहे. त्यांची जी काही वेगळी कारणं आहेत ती त्यांना समजावून सांगायला लागतात. आपल्या देशाला ते परवडणार नाही त्याला कायदेशीर मान्यता देणं. दुसरं एक मुलांनी वाचलेलं असतं की, गांजा सेवन हे कधीतरी आपण करू शकतो. जसं सोशल ड्रिंकिंग म्हणतात ना, कधीतरी पार्टीत पिता येते दारू वगैरे तसं गांजापण कधीतरी घेता येतो. त्याचं व्यसन लागत नाही. यावर कुठेतरी त्यांनी रिसर्च वाचलेला असतो की गांजात औषधी गुणधर्म आहेत म्हणून. मग आम्हाला त्यांना दुसरे रिसर्च दाखवायला लागतात की, नाही त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तर हेही सांगायला लागतं की, प्रत्येक औषधी गोष्ट स्वतः घ्यायलाच पाहिजे असं नाही. त्यातले काही घटक काढून औषधांमध्ये वापरले जातात. पण एकूणच गांजाचा व्यसन आता मुलांमध्ये वाढताना दिसतंय. त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. शारीरिक तर आहेत, पण गांजाच्या बाबतीत आम्ही बघतो की, मेंदूवरती त्याचा खूप परिणाम होतो. अतिशय जास्ती चिडचिड वाढते, त्याच्यामुळे मेमरी लॉस होतो, असे अनेक दुष्परिणाम गांजाच्या व्यसनामुळे होत असतात. हा एक ज्वलंत प्रश्न आता बनत चाललेला आहे.

– क्रमशः भाग दुसरा

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

नीरव शांतता! होय, पहाटेची नीरव शांतता! ज्यात रव नाही, आवाज नाही, सगळे कसे स्तब्ध. आकाशात धूसर चंद्रबिंब, अंधुक चांदणे, हवेत बोचरी थंडी. गर्द सर्द धुके. शुभ्र दुलई लपेटून घेतलेली अवनी. रात किड्यांची किरकिर. अधून मधून, दवबिंदूंचा सडा चोहीकडे पसरलेला. हिरवीगार गवत पाती, त्यावर दवबिंदू चिकटलेले.

चंद्रकिरणात मोत्यांचे दाणे होऊन चमकतं होते. ते जसं काही आपल्या तोऱ्यात ऐटीत मिरवत होते. अगदी अमूल्य दागिन्यांच्या कोंदणात बसलेला वाटतं होता.

अजुनी रातकिड्याचे साम्राज्य होतच. सोबत रात पक्ष्यांची फडफड चालूच होती. थंडगार वाऱ्याची झुळूक, अंगावर काटा आणणारी होती. ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज, एखाद्या सौभाग्यवतीच्या चूड्यागत किणकिणत होता. झाडावर, वेलीवर चमकणारे काजवे. कुठे कुठे फुलू पाहणाऱ्या कुंद कळ्या उमलत होत्या. पश्चिमेला लककणारा शुभ्र शुक्रतारा, त्याचं लोभस व्यक्तिमत्व, हिऱ्याच्या खड्यागत पाजळणारे शुभ्र दुधाळ रेषा! टप्पोऱ्या मोगऱ्या सारखा शुक्रतारा, समवेत गगनातील असंख्य तारका,

चमचमणाऱ्या चंद्रकळा साडीगत आकाशाच रुपड सजलेलं होत. नखशिकांत शांत श्रान्त अवनीचे रूप, मुके पण बोलके होते.

गर्द झाडी पलीकडे डोंगर रांगा. आकाशात दिसणारी नक्षत्रे जणू स्वर्गच पृथेवर अवंतरला आहे की काय, असं वाटणारे विहंगम दृश्य, जें डोळ्यातपण सामावत नव्हते.

उगवतीचे साक्ष देणारे, काही बदलणारे, आकाशी, किंचित जांभळा, केशरी, किंचित तांबूस छटानी उघडत असताना, किरमिजी रंग मध्येच पारवा रंगानी उजळीत होता. तर पाण्यात बर्फ वितळल्यासारखा शुक्रतारा अस्पष्ट होत लुप्त पावत होता. मध्येच पक्ष्यांचा थोडा आवाज, हालचाल. चिमण्यांचा चिवचिवाट, इतर पक्ष्यांची वर्दळ वाढत होतीच.

कडेला प्राजक्ताचा सडा लक्ष वेधून घेत होता. त्याचा चोहीकडे सुगंध पसरला होता. बाजुलाच शुभ्र तगर उमलू पहात होती. त्याच्या अर्धोन्मिलीत पाकळ्यांवर फुलंपाखरांचे गुंजारावं चालू होते. जास्वंद लाल भडक रंगात उमलला होता. मध्येच वटवाघूळ आपले अस्तित्व दाखवत आडवी तिडवी गवसणी घालत बाजूच्या झाडावर लुप्त होत होता. रानफूलं टवटवीत बहरली होतीच. वेलीवर विविध रंगाची फुलं चित्त वेधून घेत होती.

ओढ्याच्या कडेला मोरांच्या केका साद घालत होत्या. त्याचे ऐटीत मान वर करून चालायचे पदललित्यपूर्ण होत.

निळसर मान, डोके, डोक्यावर तुरा, मोरपीसांचा रंग तर अप्रतिम! कोणत्याही कारखान्यात तयार नं होणारा रंग!!  मध्येच भारद्वज पक्षी हा विचारमग्न वाटतं होता. त्याची शोधक नजर काहीतरी शोधत होती. उगवतीला झुंजू मुंजू झालं असेल नसेल, तसे चिमण्यांचा चिवचिवाट जास्त वाढला होता. शुभ्र बगळे एका रांगेत मिरवणूक काढीत, शिस्तीत एकाच वेगात मार्गक्रमण करीत होते.

तांबड फुटलं तसं घराचे आळसावलेले दरवाजे उघडू लागले. घराघरात दिवे लागले आणि छपरातून धूर बाहेर पडू लागला. काही ललना सडा समार्जन साठी बाहेर आल्या. पलीकडे मंदिरातून घंटेचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. छपरातून येणारा धूर आणि दाट धुके एकत्र मिसळून हवा कुंद करीत होत्या.

नमाजाची बांग आणि कोंबड्याची बांग एकत्र ऐकू येत होती. त्यातच परव्याची घुटर घूम, चिमण्याचा चिवचिवाट, घंटानाद ह्याचा सरगम. पृथेला जाग आल्याची नांदी होती. त्यात शुभ्र धुक्याची चादर आणि बोचरी थंडी जाणवत होतीच.

सोनेरी किरणांची वरात, सहस्त्रकर रश्मीनें बाहेर पडत होती. काही कवडसे धारण करीत, अवनीला अलिंगन देत. तिच्या मस्तकाचे चुंबन घेत. लालिमा पसरली होती. त्यातच गाई, म्हशीचे हंबरणे, त्यांच्या गळ्यातील घुंगरूचे आवाज येत होते.

पांणंदीकडे जाणारी वाट, त्या वाटेवर वर्दळ वाढली होती. काही धुसर आकृत्या, शेतीकडे जाणारे काही शेतकरी पण त्यात दिसतं होते. धुक्यात भिजलेल्या पाऊल वाटा, बैल गाडीचे चाकूर पडलेली वाट. परत तोच तो भारद्वाज परत पांणंदीच्या कडेला तांबडे डोळे लाल् सर पंख घेउन उभा होता. कदाचित शुभ दर्शन देण्यासाठी अवतरला होता. पांदीच्या दोहो बाजूनी शेंड एकमेकांना गच्च मिठीत घेउन बसलेली. गुंतलेली. ते कमी म्हणून काय, त्यातच अनेक लता वेलींनीआपला संसार उभा केलेला होता शेंडच्या आधाराने. त्या वेलीवर पांढरी आणि लाल चुटुकदार पाने पाहुन डोळ्यास समाधान देत होते.

शिवाय अनेक रंगीं बेरंगी फुलं पाखराची गर्दी झालेली. रंग लुब्ध पाखरे रुंजी घालण्यात गुंग होती. त्यांना मधुरसाची चटक जाणवत होतीच. मध्येच कुठं तरी फडया निवडुंग आपल्या ताठ मानेने काट्यासह अस्तित्व दाखवत होता. बाभळीची झाडे त्यात भरीस भर म्हणून शोभून दिसतं होती. आपला कणखर मजबूत बांधा त्यांना प्रिय असावा. पिवळ्या जर्द फुलांची आरास आणि लोंबणाऱ्या लांब शेंगा असंख्य काटेरी जाळ विणलेला हा प्राणी अगदी तटस्थपणे दिमाखात उभा होता, अगदी पुराण पुरुषा सारखा! त्याच्या अंगावर असलेल्या अनेक गाठी मुळे प्रांजळं वाटतं होता. त्याच्या गाठीतून झिरपणारा चिकट स्त्राव, त्यावर फिरणाऱ्या शिस्तबद्ध काळ्या मुंग्या!

तशी ही पायावाट तुडवून तुडवून मळवाट झालेली. धुरळा आणि दहिवर ह्यांनी चिकट झालेली होती.

मध्येच आम्र वृक्षावर कुहू कुहू अशी साद येत होती. आंब्याला आलेला मोहर त्यातून निघणारा सुगंध जाणवत होता. लहान लहान कैऱ्या लांब देठावर बसून हेलकावे घेत होत्या. नजर पण खेचून घेत होत्या. सोबत राघू मैनेची जोडी त्यांच्याच दिमाखात! हिरव्या कैऱ्यावर चोच मारत मिठू मिठूची भाषा आळवीत होता. लाल लांब बाकदार चोच पोपटी अंगरखा घातलेली जोडी सालसपणे आपल काम चोखपणे करत होती.

जवळच्या विहिरीवर येणारा मोटेचा आवाज, पाटात पडणारे पाणी सळसळत जातं होत. बैलाच्या घुंगरांचा आवाज आणि मोटकऱ्याची गाणी शांतता भग्न करीत होती.

विहिरीच्या कडेला भिंतीतून फुटलेला पिंपळ विहिरीवर छत्र धरण्यासाठी अवतरला असावा. त्याच्या फांद्यावर लोंबकळणारी असंख्य सुगरणीची घरटी, अधोमुखी होती. घरट्यात असणारे चिमुकले जीव खाली वर करत आपल्या आईची वाट बघत होते. काहीतरी खायला मिळेल अशा आशेने धडपड करीत होते.

पाटातील पाण्यात बगळे चोच मारून खाद्य आराधना करण्यात त्यांचा थवा मशगुल. अवचित मोरांची फडफड आणि केका घुमत होत्या.

सकाळ होऊन एक कासरा भर सुरव्या वर आलेला.

तसं थंडीच्या हवेत ऊबदारपणा जाणवू लागला. पांदीच्या वाटेवरील वर्दळ वाढू लागली. मळ्यात चाललेली काम झोपडीतून येणारा धूर त्याची साक्ष देत होता.

वाड्या वस्तीवर जाग आली. तशी गावात अन गावकुसा बाहेर वर्दळ वाढली. एव्हाना सुरव्या देवाने धरतीवर लाल मळवट भरला होता. धुक्याची चादर कमी होऊन, हवेत ऊबदारपणा जाणवत होताच. लोक उन्हात येऊन बसू लागले. थंडीत उब हवी होती. पांणंदी कडे वर्दळ वाढत होती. थंडी आणि धुक्याने मातीत ओलावा धरला होता. धुके ओसरले होते. पाणंदीत बैलगाडी, जनावरे ओढ्या कडे चरायला जातं होती. मध्येच शेळ्या, मेंढरं आणि सोबत कुत्रा असं तांडा धनगर हाकीत होता. मेंढया मध्येच तांडा सोडून हिरव्या चार्यावर लुब्ध होत होत्या. त्यांना परत हाकून धनगर वाट तुडवत होता. त्याच्या हातात लांब काठी, आणि खांद्यावर घोंगड त्यावर पुढ माग अडकवलेली शिदोरी होती.

वरच्या अंगाला शेतमळा फुलला होता. गव्हाच रान हिरवगार होत. त्याला लागून मका, कणसं टरारून फुगली होती. कोबीचे गड्डे वर येऊ बघत होते.

 त्याला लागून पिवळा धमक झेंडू उठून दिसतं होता. एकूण नजारा मन पवित्र करीत होता. बाजूला अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा ओढा वहात होता. त्याच पाणी झुळझूळ वाहत होतच. पाण्यात काही पक्षी विहार करत, आपले खाद्य शोधत होते. ओढ्याच्या दोन्ही बाजूला गच्च हिरवी गार झाडी, त्यात ह्यो लपलेला ओढा. दाट हिरव्या गार झाडीत पक्ष्यांची अनेक घरटी नांदत होतीच.

मनमोहक मोर लांडोर सुखनैव बांगडतं होते. अवचित उतरणारे त्यांचा समूह लक्ष वेधत होता. खंड्या ओढ्या कडेला बसून एखादी मासोळी अबदार चोचित पकडून खाद्य संस्कृती जोपसत होता. अधून मधून लाव्हा व तित्तर उडत जातं होते अन गप्प होत होते.

ओढ्याच्या दोन्हीही कडेला असणारी हिरवीगार शेती. त्यातील घरे सुद्धा टूमदार वाटतं होती. मका, गहू, हळद, मिरची, आणि ऊस त्यात सर्व प्रकारच्या भाज्या व काही ठिकाणी फुलांचे ताटवे इत्यादीनी डोळ्यात स्वर्गीय सुख आनंद भोगणारा बळीराजा, त्यात त्यांना मिळालेले निसर्गाचे वरदान.

अधून मधून कुठतरी झाडाखाली चालेलल मोराचे नृत्य. हे निसर्ग वैभव सुख त्यांना कायमच मिळत होत. एवढंच नव्हे तर सर्प आणि सर्पिण ह्यांचं गळ्यात गळा घातलेलं शृंगार नृत्य पण त्यांच्या नशिबी होत. विविध पक्ष्यांचे आवाज ओढ्यातील पाण्याचा आवाज यांची जुगुलबंद ध्वनी नेहमीचीच. त्यात त्यांना अप्रूप असं काही वाटतं नव्हतं! दोन्हीही बाजूला ओढ्यात धुनी भांडी घासली जातं होती. तेथील बायकांचा राबता पण नेहमीचा. मध्येच कोणी बाल चमू येऊन पाण्यात मनसोक्तपणे जल क्रीडा करीत होता.

त्यांचं बालपण असं जपलं जातं होत. घरातील झाडून सारी जनावरे येथेच येऊन पाणी पीत होती. चरत होती. दुभतं देत होती. दही दुधाचा महापूर ओसंडून वाहत होता. मूळबाल खाऊन राबून धष्ट पुष्ट होत होती.

ओढ्याचा उतरणीला शेळ्या मेंढया यांचा मुक्त संचार. मुबलक खाद्य मीळत होत. 

चुकून एखाद सलिंद्र बाहेर पडत होत. काहीवेळा नागराजच दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणी मात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो ‘ चं साम्राज्य मुक्तपणे नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!

क्रमशः… 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट ☆

डॉ. स्वाती बापट

अल्प परिचय 

डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

  • मूळ गाव सोलापूर येथेच प्राथमिक, माध्यमिक व वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण.
  • पतीच्या सैनिकी सेवेनिमित्त भारतात ठिकठिकाणी तात्पुरते वास्तव्य.
  • गेल्या तीस वर्षांपासून आजतागायत पुण्यात बालरोगतज्ज्ञ म्हणून व्यवसाय.
  • एकंदर जीवनातील, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आधारलेले विपुल स्फुटलेखन स्वतःच्या ५ ब्लॉग्सवर प्रकाशित.

??

☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट

आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदीजींनी काही काळापूर्वी ही घोषणा केली आणि त्याचे देशभरामध्ये बरेच पडसाद उमटले. राजकारणामध्ये कोणता नेता काय घोषणाबाजी करतो आणि त्या घोषणा प्रत्यक्षात किती पाळल्या जातात, याबाबत आपण कोणीच न बोललेले बरे. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” ही घोषणा मात्र माझ्या मनाला भावली होती.

माझ्या मते, वरकमाई करणे ही एक वृत्ती किंवा स्थायीभाव असतो. ज्याच्यामध्ये तो असतो, तो कुठे ना कुठेतरी उफाळून येतोच. यावरून लहानपणी ऐकलेली एक गंमतशीर गोष्ट आठवली. एका राजाच्या दरबारामध्ये एक खाबूनंदन, लाचखोर कर्मचारी होता. त्याला कुठल्याही खात्यात नेमले तरी तो वरकमाई करत असल्याच्या तक्रारी राजाकडे यायच्याच. पण त्या चतुर माणसाला कधीही रंगेहाथ पकडता आलेले नसल्याने राजाला त्याला कामावरून काढूनही टाकता येत नव्हते. शेवटी राजाने त्याला समुद्रकिनारी बसायला सांगितले आणि प्रत्येक दिवसभरामध्ये समुद्रात उठणाऱ्या लाटा मोजण्याचे काम दिले. थोड्याच दिवसांत पुन्हा या महाशयाविरुद्ध राजाकडे तक्रारी यायला सुरुवात झाली. समुद्राच्या काठी बसून हा कुणाकडून आणि कशी लाच खात असेल? या बद्दल राजाला भलतेच कुतूहल वाटले. “राजाने मला समुद्राच्या लाटा मोजण्याचे काम दिलेले आहे. तुमच्या जहाजाच्या हालचालीमुळे, या सरकारी कामात व्यत्यय येत आहे’ अशी सबब सांगून हा महाभाग किनाऱ्यावर आलेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाकडून पैसे खात होता! त्यामुळे पैसे खाण्याची वृत्ती असलेला मनुष्य कुठल्या तरी मार्गाने पैसे खाणार हे निश्चित.

आनंदने, म्हणजे माझ्या नवऱ्याने, २६ वर्षे सेनाधिकारी म्हणून नोकरी केली, आणि कर्नल पदावर असताना, त्याने ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सैन्याच्या नोकरीमधे वरकमाई करण्याचे प्रसंग तसे कमीच येतात. त्यातून सैन्याच्या शिस्तीमधे असे काही करताना पकडले गेल्यास कडक कारवाई होण्याची जबरदस्त भीती असतेच. तरीदेखील, ‘लाचखोरी’ हा स्थायीभाव असलेल्या, सैन्यातल्याही काही लोकांबाबत, लाच खाणे, लाच देणे किंवा इतरही गैरप्रकार क्वचितप्रसंगी कानावर येतातच. आनंदने चार वर्षे, अलाहाबाद येथील सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB), म्हणजेच सेनाधिकारी निवड समितीवर काम केले. तीन अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमधील तो एक सदस्य असे. त्याकाळी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर काही भुरट्या एजंट लोकांचा सुळसुळाट होता. सेनाधिकारी होण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अलाहाबाद स्टेशनवर उतरल्या-उतरल्या हे एजंट लोक गाठत असत. “आम्ही तुमची निवड करून देण्यासाठी मदत करू. परंतु, त्यासाठी निवड समितीतील अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागतात. सेनाधिकारी म्हणून तुमची निवड न झाल्यास, तुमच्याकडून घेतलेली अर्धी रक्कम तुम्हाला परत मिळेल” असे आमिष दाखवून अनेक उमेदवाराकडून ते एजंट पैसे घेत असत. प्रत्यक्षात, सेनाधिकारी निवडण्याची प्रक्रिया अत्यंत निष्पक्षपणे होईल याची दक्षता घेतलेली असते. त्यासाठी निवडसमितीवरील अधिकाऱ्यांवर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बरीच बंधनेही घातलेली असत. परंतु, सेनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये सरसकट लाचखोरी चालत असल्याचा गैरसमज उमेदवारांमधे पसरवून, मधल्यामधे ते लबाड एजंटस भरपूर कमाई करत असत. कधी-कधी निवडसमितीच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्नही व्हायचा. त्या काळात आनंदलाही एक-दोन वेळा लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. लाच घेण्याच्या किंवा देण्याच्या सक्त विरोधात असल्यामुळे, आनंद त्या प्रलोभनाला कधीच बळी पडला नाही.

वैयक्तिक पातळीवर ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा! ‘ हे तत्व काटेकोरपणे पाळणे आपल्या देशामधे तसे अवघडच आहे. या घोषणेचा पहिला भाग, म्हणजे लाच न खाणे, एकवेळ शक्य आहे. कारण त्या गोष्टीवर बऱ्याच अंशी स्वतःचे नियंत्रण असू शकते. पण काही ‘मलईदार’ सरकारी खात्यांमधे, लाच न खाणारा कर्मचारी इतरांना नकोसा असतो. कधी-कधी अशा कर्मचाऱ्याला वरचेवर बदली, सहकाऱ्यांकडून होणारी कुचेष्टा, वरिष्ठाकडून अपमानास्पद वागणूक, अशा अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आजही कित्येक सरकारी कामांमधे, लाच दिल्याशिवाय योग्यप्रकारे आणि वेळच्यावेळी काम होत नाही हे आपण ऐकतो. म्हणूनच, सामान्य माणूस, ‘ना खाने दूंगा’ हे तत्व सहजी पाळू शकत नाही. किंबहुना, सर्वसामान्य भारतीय नागरिकाला लायसेन्स काढण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, सर्व कामे, थोडीफार लाच देऊन करून घेण्यामध्ये फारसे काही गैर वाटत नाही. परंतु दुर्दैवाने, लाच देऊनसुध्दा एखादे काम व्यवस्थित होईलच याची खात्री नसते. १५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामधे वास्तव्यास असलेल्या एका अमराठी सेनाधिकाऱ्याला येथील रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) हवे होते. अनेक वेळा विहित नमुन्याचा अर्ज आणि योग्य शुल्क भरूनही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला त्याला काही केल्या मिळत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने एका एजंटला गाठले व ६००० रुपये देऊन आपले काम करून घेतले. पण प्रत्यक्षांत जेंव्हा त्याच्या हातात दाखला आला तेंव्हा त्यावर ‘भारत देशाचा रहिवासी’ इतकेच लिहून आले होते! झालेल्या चुकीबाबत चौकशी केली असता त्या एजंटने हात वर केले. त्यानंतर त्या एजंटने पुन्हा ६००० रुपये उकळले आणि मगच त्या अधिकाऱ्याला दाखला मिळाला!

आमच्यापुरते बोलायचे तर, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा ‘ या तत्वाचे पालन करण्यासाठी मी आणि आनंद, कसोशीने प्रयत्न करतो. लाचखोरीच्या संदर्भातील ही घोषणा आठवण्यासाठी एक कारण नुकतेच घडले. काही दिवसांपूर्वी एका रिसॉर्टमधे, सुमारे ऐंशी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आमच्या मुलाचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ झाले. लग्नाचे मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटच्या रात्री, आम्ही एक कॉकटेल पार्टी ठेवलेली होती. त्या रिसॉर्टकडे मद्यविक्रीचा कायमस्वरूपी परवाना नसल्यामुळे आमच्या पार्टीसाठी एका दिवसाचा परवाना काढणे आवश्यक होते. एक्साईज खात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून आणि ३८०० रुपये शुल्क भरून तो परवाना मिळवता येतो, ही खात्रीशीर माहिती आनंदला मिळालेली होती. परंतु, रिसॉर्टवाल्यानी तो परवाना काढून देण्यासाठी १५००० रुपये मागितले. अर्जासोबत लागणाऱ्या विहित शुल्काव्यतिरिक्त वरचे पैसे ‘एक्साईज’ खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावेच लागतात, त्याशिवाय परवाना मंजूर होतच नाही’ अशी माहिती रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने पुरवली. अर्थात लाच घेणे-लाच देणे, हे आमच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याने आम्ही योग्य मार्गानेच परवाना काढायचे ठरवले.

कार्यक्रमाच्या बरेच दिवस आधी आनंदने त्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. ते करतानाही बऱ्याच बारीक-सारीक अडचणी आल्या. त्या साईटवर अपलोड करावी लागणारी कागदपत्रे व फोटो अमुक इतक्या आकाराचेच आणि तमुक फॉरमॅटमधेच असणे अनिवार्य होते. ती कागदपत्रे योग्य आकार व फॉरमॅटमधे बसवून साईटवर अपलोड करेपर्यंत, तो सर्व्हर डाऊन होई. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागे. अशा अनंत अडचणी पार करत-करत शेवटी एकदाचा तो अर्ज त्या वेबसाईटवर अपलोड झाला. त्यानंतर परवाना शुल्क भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याच दुसऱ्या एका वेबसाईटवर जाणे आले. त्यामध्येही अनेक अडचणी पार केल्यानंतर अखेर ते शुल्क भरले गेले. एक-दोन दिवसातच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला फोन आला, “साहेब, तुम्ही परवान्यासाठी आमच्या रिसॉर्टच्या नावे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर इथल्या एक्साईज ऑफिसातून मला असे सांगण्यात आले आहे की गावातल्या काही संघटना ओल्या पार्ट्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे परवाना मिळायला अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण कार्यालयात येऊन भेटावे असे तिथल्या कर्मचाऱ्याने मला सांगितले आहे. ” मात्र आनंदने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर ऑनलाईन परवाना मंजूर झाला व आनंदने घरीच त्याचा प्रिंटाऊटही काढून घेतला. दुसऱ्या दिवशी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला पुन्हा फोन आला, “साहेब, एक्साईज डिपार्टमेंटच्या क्लार्क बाईंनी सांगितले आहे की ऑफिसात पैसे भरून परवान्याची प्रत घेऊन जा. त्यासाठी मला पाच-दहा हजार रुपये सोबत घेऊन जावे लागेल. तर कसे करायचे? ” आनंदने त्या व्यवस्थापकाला सांगितले, “त्या ऑफिसमधील क्लार्क बाईंना ठणकावून सांगा की योग्य शुल्क भरून मंजूर झालेल्या परवान्याची प्रत माझ्याकडे आहे. तरीही वर काही पैसे हवे असल्यास त्या बाईंनी तसे लेखी द्यावे किंवा मला मेसेज करावा. ” त्यानंतर मात्र आनंदला कुणाचाही फोन आला नाही, आणि सर्व नियमांचे पालन करून आम्ही आयोजित केलेली कॉकटेल पार्टीही निर्विघ्नपणे पार पडली.

लग्नाच्या निमित्ताने ठरवलेले सर्व कार्यक्रम आनंदात पार पडावे, अशी आमची इच्छा होती. “देऊन टाका ना वरचे पाच-दहा हजार रुपये. परवाना मिळवण्याची कटकट तरी वाचेल. ” असा सल्ला देणारे लोकही आम्हाला भेटले. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” या तत्वाला मुरड घालायला आम्ही तयार नव्हतो. आमचा बराच वेळ आणि श्रम खर्ची पडले असले तरी ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद त्याहून खूप मोठा होता.

लाच देणे-घेणे हे अनेक देशवासीयांच्या रक्तात भिनले आहे हे पदोपदी जाणवते. आपल्यापैकी प्रत्येकाने थोडी अधिक धडपड करून, जर “ना खाऊंगा ना खाने दूंगा’ हा मंत्र जपला तरच काहीतरी फरक पडेल असे वाटते.

© डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-१ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-१  (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

सगळ्यांना नमस्कार, आज मला या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी आधी सर्व संयोजकांचे आभार मानते. मला हा खूप मोठा माझा एक सन्मान वाटतोय. हा एक खूप छान योग माझ्यासाठी आहे. एकतर माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट यांचं अनेक वर्षांपूर्वी याच व्याख्यानमालेमध्ये भाषण झालं होतं. त्यामुळे ती पण एक माझ्यावरती जबाबदारी आहे. दुसरं म्हणजे या मुक्तांगणच्या खालीच मी मुक्ता इथे बोलतीये. या मुक्तांगणलासुद्धा पु ल देशपांडे यांनी देणगी दिली होती आणि माझं जे पुण्यातील मुक्तांगण आहे ते सुद्धा पु ल देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून सुरू झालं. त्यामुळे मला आजच्या या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद वाटतोय.

आज मला बोलायचं की, आजच्या काळात व्यसनमुक्तीची आव्हाने कशी वाढली आहेत त्याबद्दल. त्याविषयीच्या बातम्या टीव्हीमध्ये आपण ऐकत असतो. कोणाला तरी कसं व्यसन लागलं, त्यामुळे त्यांचं जीवन कसं बहकलं, आपल्या ओळखीत कुणी असतं. पेपरमध्ये आपण वाचत असतो की, दारू पिऊन एखाद्या माणसाच्या हातून काय कृत्य झालं. व्यसनामुळे किती प्रकारचे दुष्परिणाम होत असतात, त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना असते. अलीकडे असं दिसून येत की, वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी व्यसनाधीनता हा प्रश्नसुद्धा कारणीभूत असतो. असे खूप मनातील सामाजिक बोलायचे ठरवले आहे. बेरोजगारी असेल, गरिबी असेल, डोमेस्टिक व्हायलन्स, असे कितीतरी सामाजिक प्रश्न आता आपल्या सगळ्यांच्या मनात येतील आणि त्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी कारणीभूत अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे हा व्यसनाधीनतेचा खूप मोठा एक सामाजिक प्रश्न आहे. याच्या बाबतीत आपण काही करू, असे माझी आई म्हणजे डॉ. अनिता अवचट हीला वाटत होते. ती एक मानसोपचार तज्ञ होती. तेव्हा ती पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत होती. सुरुवातीला अगदी असं व्हायचं… म्हणजे अगदी 80 सालाच्याही आधी ती 70 च्या दशकामध्ये काम करायला तिने सुरुवात केली, तेव्हा ज्यांना दारूच्या व्यसनाची समस्या आहे ते पेशंट तिच्याकडे हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी यायचे. कारण मानसोपचारासाठी त्याकाळी वेगळी अशी महाराष्ट्रामध्ये कुठली सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे मग मनोरुग्णालयामध्येच अशा व्यसनाधीन रुग्णांवरती तेव्हा उपचार केले जायचे. तेव्हा साधारण 1983-84 मध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनाची लाट पूर्ण जगामध्ये खूप मोठी लाट तेव्हा आली. ब्राऊन शुगर हा शब्द खरंतर तेव्हा आपण ऐकलेला होता आणि तेव्हासुद्धा सुरुवातीला असं वाटायचं की श्रीमंतांच्या अति लाडावलेल्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. आपल्या याच्याशी काय संबंध? अशीच साधारण लोकांची प्रतिक्रिया असायची.

तर असं झालं की, माझ्या आई-बाबांच्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचा मुलगा इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. होस्टेलला तो राहायचा आणि त्याला हे ब्राऊन शुगरचं व्यसन लागलं. या मुलाला त्याचे आई-बाबा आमच्याच घरी घेऊन आले. त्याला माझ्या आई-बाबांनी घरीच उपचार दिले आणि या मुलाशी बोलत असताना बाबांना म्हणजे डॉ. अनिल अवचट यांच्या असं लक्षात आलं की, हा प्रश्न आता खूप वाढत चाललेला आहे. मग बाबांनी असं ठरवलं की ह्याच्यावरती काहीतरी माहिती घ्यायची आधी. तेव्हा डॉक्टर आनंद नाडकर्णी मुंबईला काम करत होते याच्या बाबतीत. तिथे माझे बाबा गेले, तिथे राहिले. अनेक व्यसनाधीन लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या कुटुंबीयांना भेटले आणि ‘गर्दच्या जाळ्यात’ नावाची एक लेखमाला तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये लिहिली. मग पुढे त्याचं ‘गर्द’ नावाचे पुस्तक प्रकाशित झालं. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्या आई-बाबांना बोलवून घेतलं आणि ते असं म्हणाले की, “आम्ही जर का काही आर्थिक मदत देऊ केली तर तुम्ही काही याच्यावरती काम कराल का? ”

हे काम करायला पाहिजे याची गरज आई-बाबांच्या लक्षात आलीच होती. कारण ते सगळं लेख वगैरे वाचल्यानंतर खूप लोक आमच्याकडे विचारायला लागले होते की, आमच्या मुलाला व्यसन आहे, आमच्या ओळखीत कोणाला तरी व्यसनी झाला आहे, त्यांच्यावर तुम्ही उपचार करा. एकदा तर असं झालं होतं की, एक वडील एकदा आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाची कुठली तरी एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणून ते मुलांना पुण्यात घेऊन आले आणि त्या मुलाने त्यांना आत्ताच सांगितलं की, ‘मला अमुकअमुक ड्रगचं व्यसन आहे आणि आत्ता मला विड्रॉवल सिम्प्टमचा त्रास होतोय. आता मला हे ड्रग मिळाले नाही तर मी ती एंट्रन्स एक्झाम कशी देऊ? ‘ तर ते वडील आमच्या घरी आई-बाबांना असं विचारायला आले होते की, त्यांना हे ड्रग कुठे मिळेल? म्हणजे ते विकत घेतील आणि या मुलाला देतील. मग तो त्या परीक्षेला ते जाईल. हे सगळं ऐकून माझ्या आई-बाबांना धक्के बसत होते. या प्रसंगावरून त्यांनी पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी जी मदत देऊ केली त्यांच्या देणगीतूनच तेव्हा 29 ऑगस्ट 1986 या दिवशी हॉस्पिटलमधल्याच एका बिल्डिंगमध्ये मुक्तांगणाची स्थापना झाली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये पु ल तेव्हा असं म्हणाले होते की, ‘आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय. तर या केंद्राची भरभराट होवो, अशा शुभेच्छा देणं योग्य होणार नाही? कारण व्यसनमुक्ती केंद्राची भरभराट होणे ही काही चांगली गोष्ट नाहीये. तर मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की, इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. मग या ठीकाणी आपण एक संस्कृतीक केंद्र निर्माण करूया. ‘ खरंच, किती मोठ्या शुभेच्छा होत्या त्या! तेव्हा खरं तर मी कॉलेजमध्ये शिकत होते. मी हा कार्यक्रम एक विद्यार्थिनी म्हणूनच अटेंड करत होते. जी नवीन टीम तयार होत होती त्या सर्वांनाच एक प्रेरणा देण्याचं काम या पू लं च्या शुभेच्छांनी तेव्हा घडत होतं. अशा तऱ्हेने मुक्तांगणची सुरुवात झाली.

मी म्हटलं तसं की तेव्हा महाराष्ट्रामध्ये असं कुठलाच व्यसनमुक्ती केंद्र नव्हतं. त्यामुळे माझ्या आई-बाबांनी तेव्हा असं ठरवलं की इथे उपचार घेण्यासाठी जे लोक येतील आपण त्यांच्याकडूनच शिकून इथली जी उपचार पद्धती आहे ती तयार करूया आणि मग तेव्हा जे रुग्ण यायला लागले त्यांच्याशी माझे आई-बाबा चर्चा करायचे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे उपचार इथे मिळाले तर तुम्हाला बरं वाटेल, तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? अशा पद्धतीने काम करत गेल्यामुळे या सगळ्याचाच एक वेगळाच फायदा झाला. त्यामुळे मुक्तांगणमध्ये आम्ही कुठल्याही बाहेरच्या देशातल्या उपचार पद्धतीचं अनुकरण केलेलं नाहीये, तर मुक्तांगण मधले जे उपचार आहेत ते पूर्णपणे आपल्या भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. इथे येणाऱ्या पेशंटना आम्ही रुग्णमित्र म्हणतो. त्यामुळे इथे जे रुग्णमित्र येतात त्यांना खूप आपलेपणा वाटतो. मुक्तांगणमध्ये खूप बरं वाटतं सगळ्यांना. इथे जे उपचार केले जातात ते आम्ही कुठल्यानाकुठल्या पद्धतीने आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित ठेवतो. सर्व धर्मांचे सण साजरे करतो, पण कुठल्याही धर्माचा बडेजाव वगैरे किंवा मूर्तिपूजा या गोष्टी मुक्तांगणामध्ये केल्या जात नाही. पण सण मात्र सर्व धर्मांचे साजरे केले जातात. त्यांची आम्ही संस्कृतीशी अशी काहीतरी सांगड घालतो की व्यसनमुक्तीचा संदेश त्यातून देता येईल. समजा दसरा असेल तर आम्ही व्यसनाच्या रावणाचे दहन करतो, वगैरे. असं काही ना काही तरी संस्कृतीशी रिलेटेड केलं जातं. अशा पद्धतीने मुक्तांगण हे जवळजवळ 38-39 वर्षांपासून कार्यरत आहे.

मुक्तांगणमध्ये साधारणपणे चार पातळ्यांवरती काम केलं जातं. सर्वात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे ज्यांना व्यसनाची समस्या आहे अशा लोकांना उपचार देण्यासाठी आम्ही 30 दिवस म्हणजे एक महिनाभर ऍडमिट करून घेतो. पूर्णपणे स्ट्रक्चरर्ड अशी एक उपचार पद्धती त्यांच्यासाठी तयार केली आहे. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक… हो, कुटुंबालाही सहभागी करून घेतलं जातं. अशा प्रकारे ज्याला आपण होलिसस्टिक म्हणतो तसे परिपूर्ण असे उपचार त्यांच्यामध्ये दिले जातात. तीस दिवसात खरंच त्याला बरं वाटतं का? काहींना वाटतं काहींना वाटत नाही त्यांच्यासाठी तीस दिवसानंतरसुद्धा पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. काही लोकांच्या बाबतीत असं असतं की, ते कुटुंबातनं बाहेर पडलेले असतात किंवा नोकरी गेलेली असते. कोणीच त्यांना विचारत नसतं. तर असे जे आमचे रुग्णमित्र आहेत ते दीर्घकाळसुद्धा राहू शकतात. मुक्तांगणमध्ये राहून तिथे काम करतात किंवा बाहेर नोकरी बघतात आणि परत रहायला येतात. अशाप्रकारे उपचारानंतरसुद्धा ते आमच्या संपर्कात असतात. त्यासाठी महाराष्ट्रात 24 ठिकाणी मुक्तांगणांची संपर्क केंद्र आहेत, पाठपुरावा केंद्र आहेत. म्हणजे डिस्चार्ज नंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या पुनर्वसनाला मदत केली जाते. पुनर्वसनानंतरचं आमचं तिसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे समाजामध्ये जनजागृती करणे. सगळ्यांनाच एक वाक्य माहिती आहे की, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ एखादा आजार झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा सोपं आहे की तो आजार होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. म्हणून मग वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, कारखाने अशा ठीकठिकाणी आमची एक टीमच आहे की ती तिथे जाऊन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीचं काम करते. व्यसन लागू नये म्हणून काय करायचं याबाबतीत मुलांशी संवाद साधला जातो, पालकांशी संवाद साधला जातो. चौथं महत्त्वाचं काम म्हणजे ज्यांना या विषयात काम करायचे आहे अशा लोकांना प्रशिक्षण देणं. त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रेनिंग सेंटर पण आहे. तर *उपचार, पुनर्वसन, जनजागृती आणि प्रशिक्षण या चार पातळ्यांवरती मुक्तांगणमध्ये काम केलं जातं. *

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सेवानिवृत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

सेवानिवृत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

नोकरीनंतर निरुपयोगी म्हणजेच ‘रिटायर्ड’ झाल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर वेळ घालवणे ही एक भीषण समस्या बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकांनी विविध मार्ग आणि पद्धती शोधून काढल्या आहेत.

  • काही ‘कष्टाळू ब्रँड’चे लोक निवृत्ती नंतर लगेचच चित्रपटातील ‘रामू काकां’च्या भूमिकेत येतात आणि सकाळी लवकर उठून खांद्यावर टॉवेल टाकून घराची साफसफाई आणि स्वयंपाकघर साफ करायला लागतात.
  • उरलेल्या दिवसात ते त्यांच्या बायकोसाठी ‘वाहन चालक’ म्हणून सेवा देतात आणि बाजारात खरेदी किंवा चित्रपट वगैरे दाखवतात. अशा लोकांच्या पत्नींनी पूर्वजन्मात काही चांगले कर्म केले असावे, ज्याचे फळ म्हणून त्यांना ही सुखासीन परिस्थिती प्राप्त झाली आहे.
  • असेही काही लोक आहेत जे निवृत्तीनंतर अचानक अतिधार्मिक बनतात आणि ते यापूर्वी कधी मंदिरात डोकावलेही नसले तरीही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास विविध मंदिरात पूजा आणि भजन कीर्तन करण्यात घालवतात. अशा लोकांना आपण नोकरीस असताना केलेल्या सर्व गैरकृत्यांच्या पापांतून आता निस्तरले जात असल्याची भावना होत आहे.
  • सेवानिवृत्तांचा असा आणखी एक वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये निवृत्तीनंतर अचानक वाल्मिकी आणि तुळशीदासांचे आत्मे प्रवेश करतात आणि ते रातोरात ‘कवी’ च्या भुमिकेत येतात. हे लोक सोशल मीडियावर असे विचार लिहितात की त्यांचे मित्र या काव्य-प्रदूषणाने त्रस्त राहतात पण नाइलाजाने ‘व्वा व्वा’ म्हणणं भाग पडतं.
  • अशी काही थोर माणसे सुद्धा बघायला मिळतात, ज्यांच्यात ‘राजकारणाचा किडा’ नेहमी धुमाकूळ घालत राहतो आणि नोकरीच्या कार्यकाळात ‘आपण जनतेत खूप लोकप्रिय होतो, ‘ असा त्यांना भ्रम निर्माण होतो आणि निवृत्त होताच ते एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी हातमिळवणी करतात व एखाद्या गटात सामील होऊन निवडणूक लढवतात आणि निवडणुकीत आपटले की ते खूप संतापतात, पण त्यांना हे क्वचितच माहीत असते की नोकरीत असताना त्यांची होणारी विचारपूस किंवा त्यांना ‘मिळणारा मान, होणारा आदर’ हा त्यांच्या आसनस्थ पदामुळे त्यांच्या लाळघोटेपणा करणाऱ्या चमच्यांनी पसरवलेला खोटा आभास होता. मग ते अनेकदा पक्षाच्या कार्यालयाबाहेर लाह्या किंवा चणे खात असताना दिसतात.
  • निवृत्त वृद्धांचा एक मोठा वर्ग असा देखील आहे जे कुटुंबात कदाचित ‘नकोशे झालेले’ आहेत आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो. सकाळी दहा वाजता ते स्वत:ची व कुटुंबातील सर्वांची बँकेची पासबुके जमा करतात आणि कुठल्यातरी बँकेत प्रवेश करून त्या पासबुकांच्या नोंदी काढण्यात आणि बँकेच्या वातानुकूलित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी दिवसाचे एक दीड वाजवतात. हे लोक बँकेच्या ग्राहकांपेक्षा जास्त तेथील कर्मचारी असल्यासारखे दिसतात आणि बँक कर्मचाऱ्यांचे जगणे ते कठीण करुन सोडतात.
  • वरील सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने सेवानिवृत्त लोकांची आवडती ठिकाणे म्हणजे शेजारची उद्याने, जिथे ते सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या बहाण्याने जमतात आणि त्यांच्यापैकी कोणीही नोकरीत असताना आपापल्या क्षेत्रात कधीही सकारात्मक काम केले नाही, हे साफ विसरून सरकारला शिव्याशाप देण्याचे त्यांचे आवडते कार्य करत राहतात व दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत असतात.
  • आमच्या अनेक सेवानिवृत्त बांधवांना हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ घरातच राहायला आवडते. अशा लोकांसाठी त्यांच्या सुना व मुलांनी वेळ घालवण्याचे चांगले साधन शोधून ठेवले आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे सोपवून सर्व काळजींपासून मुक्त होऊन ते ऑफिस, मार्केट आणि थिएटरमध्ये जातात आणि हे निवृत्त भाऊ लगेच ‘आजोबा’ च्या भूमिकेमध्ये येतात आणि आपल्या मुलांसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि कामाचे व मौल्यवान असल्याचे सिद्ध करतात.
  • ज्यांची मुले-मुली कुठेतरी परदेशात आहेत, तिथे गेल्यावरही हे लोक महिनोनमहिने उत्तम ‘बाळ संगोपन’ सेवा दिल्याबद्दल कृतज्ञ होत आहेत.
  • यांतील असेही काही आहेत की निवृत्त झाल्यावरही ज्यांचे चेहरे मोहरे अजूनही तेजस्वी, ओजस्वी आणि समाधानाच्या ओघवत्या तेजाने चमकत आहेत. अशांच्याभोवती त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी ते सतत लोकांच्या गर्दीने वेढलेले आहेत. त्यांना आदराने, भेटवस्तू दिल्या जात आहेत.
  • काही सेवानिवृत्त लोक त्यांचे नोकरीत असतानाचे ‘कारनामे’ ऐकवण्यासाठी ‘श्रोते’ शोधत बागेत फिरतात, कारण बायको त्यांच्या या भाकडकथांना कंटाळालेली असते आणि मुलगा व सून मोबाईलमधून डोकंही वर काढत नाहीत.
  • काही सेवानिवृत्त लोक कार्यालयातील सवय झालेल्या फुकट चहाची तलफ भागवण्यासाठी जवळपासच्या चौकातील चहाची टपरी आणि जुन्या मित्रांच्या शोधात फिरत आहेत. घरात तर शुगर आणि वाढत्या वयाचे दाखले देत त्यांच्या चहा पिण्यावर बंधन घालण्यात आले आहे.

मला आशा आहे की आपण या वर्णनात स्वत: कुठे बसतो ते शोधत आहात.

मी स्वतः माझी जागा आणि काम निवडण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहे. उंट कोणत्या बाजूवर बसणार हे बघू या..

तुम्हा सर्वांचे निवृत्ती नंतरचे जीवन सुखमय, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो

हीच सदिच्छा…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-२ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-२ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

डोईचा पदर आला खांद्यावरी…  

संत जनाबाईंच्या अभंगात विठ्ठलाचे वर्णन आहेच. पण त्यासोबतच स्त्री चं वागणं, जगणं, तिची अगतिकता याचं खूप छान वर्णन आहे. त्यात स्त्रीच्या मुक्तीसाठी असलेल्या रचना तर आपल्याला अंतर्मुख करून जातात.

डोईचा पदर आला खांद्यावरी ” हा अभंग हे त्यावरचं उत्तम उदाहरण आहे.

आपल्या विपुल रचनेत “नामयाची दासी जनी ” ही नाममुद्रा धारण करणारी जनाबाई सर्व वारकरी स्त्री संतांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ती महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा विशेषतः स्त्रीजीवनाचा एक भाग कायमचा बळकावून बसली आहे. विठ्ठलाने सगुणरूपाने तिच्याबरोबर दळणकांडण धुणीभांडी, झाडलोट, शेणगोठा ही ग्रामीण कष्टकरी स्त्रीची नित्य कामे करीत राहणे, तिच्या फाटक्या गोधडीत झोपणे, तिच्यासोबत ताककण्या खाणे, तिची वेणीफणी करणे या प्रकारच्या वर्णनाच्या शेकडो ओव्या आजही ग्रामीण स्त्रीच्या मुखी गुंजत आहेत. महत्वाचे म्हणजे ही वर्णने जनाबाईंच्या अभंगांतूनही आली आहेत.

“तुळशीचे वनी जनी उकलिते वेणी

हाती घेऊनिया लोणी सेवा करी चक्रपाणी “

किंवा

“जनी बैसली न्हायाला पाणी नाही विसणाला

हाती घेऊनी घागरी देव निघाले तातडी”

ही लोकपरंपरेतील जात्यावरची एक ओवी. इथे आशय आणि रचनेत सारखेपणा आढळतो.

गोदाकाठच्या गंगाखेड येथील दमा आणि करूंड या शूद्र भगवतभक्त दांपत्यांची जनी ही नवसाची लेक. पांडुरंगाच्या दृष्टांतानुसार ती पाच वर्षांची होताच तिला दामा शिंप्याच्या स्वाधीन केले गेले. पुढे त्यांचा लेक नामा म्हणजेच संत नामदेव महाराज जे मोठे विठ्ठल भक्त झाले. त्याची दासी म्हणवून घेत जनाई जगली. जनाईचा जन्ममृत्यू काळ याबद्दल नेमके संदर्भ उपलब्ध नाहीत. परंतु नामदेवांच्या बारशाला प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिणी बाळंतविडा घेऊन आल्याचे ती वर्णन करते. म्हणजे नामदेव महाराजांपेक्षा ती खचितच पाच सात वर्षांनी तरी मोठी असावी. पुढे इ. स. १३५० मध्ये संत नामदेव महाराजांसोबतच ती पायरीच्या चिऱ्यात अंतर्धान पावली अशी लोकश्रद्धा आहे.

“पंढरी पंढरी, विठुरायाची नगरी ” म्हणून साद घालणाऱ्या ग्रामीण स्त्रीला पंढरपूर, विठ्ठल, रखुमाई, संतजन हा सर्व गोतावळा आपला जीवीचा माहेरचा जिव्हाळा वाटतो.

 ” रुक्मिणी कालविते, निरशा दुधामधी केळं

देवाला आवडतं जनाचं ताक शिळं “

अशा ओवीतून विठ्ठल आणि जनाबाई यांच्या नात्याचे सूचन होते.

 ” आषाढीला मी नाही गेले, कर्तिकीला गं जाईन

देव पंढरीचा गं विठू, विटे उभा मी पाहीन

गोपाळपूरा जाया जनाईला गं झालं ऊन

देवा या विठ्ठलानं, यानं लाविलं गं चिंचबन “

किंवा

” इठ्ठलाच्या गं देवळात मी होईन पारवा

देवाच्या नावाचा मी गं वेचीन सरवा “

अशा ओव्यांबरोबर जनाबाईच्या निमित्ताने, उपेक्षित श्रमकरी स्त्री आपल्या मानसविश्वात विठ्ठलाबरोबरच एक वेगळा प्रपंच थाटून त्यात रंगून बसली असावी असे वाटते. अनेक स्त्रियांच्या मनात घर करून राहणारी जनाई वास्तवात मात्र बेघर होती. तिचं वास्तव जीवन अत्यंत खडतर आणि उपेक्षित होतं.

दामाशेटकडे आल्यानंतर लगेचच तिचे आईबाप गेले. ही घटनाही जनाईच्या अभंगातून येते.

” माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला

मी तुझे गा लेकरू, नको मजसी अव्हेरू “

जनाईला संत नामदेव महाराजां बद्दल असलेला आदर आणि भक्तिभाव तिने परोपरीने वर्णन केलाच आहे. तेवढीच ज्ञानदेवां विषयी असलेली ओढ तिने व्यक्त केली आहे. ते तिच्या अभंगांमधून जाणवते.

दासी शब्दाविषयी बोलायचे तर जनी किंवा नागी (नामदेवांची पुतणी) तिचाही उल्लेख दासी असाच आहे. दासीचा अर्थ शिष्या असा घ्यायला हरकत नाही. कारण खुद्द ज्ञानेश्वरांनी ” म्हणे निवृत्तीदासु ” म्हणत आपले शिष्यत्व विनम्रभावे अधोरेखित केलेले आहे.

विठ्ठलाच्या लेकुरवाळेपणाचे खूप सुरेख वर्णन जनाबाई करतात.

” विठु माझा लेकुरवाळा

संगे गोपाळांचा मेळा ॥*

निवृत्ती हा खांद्यावरी

चोखा जीवा बरोबरी

बंका कडियेवरी

नामा करांगुली ही घरी ॥

 *

जनी म्हणे गोपाळा

करी भक्तांचा सोहळा ॥

जनाई संत नामदेवांच्या घरी त्यांची शिष्या म्हणून राहत असे.

” दळिता कांडिता तुज गाईन अनंता ”

म्हणणारी जनाई आपल्याला कळते.

जनाईला तिच्या प्रत्येक कार्यात विठ्ठलाने मदत केली. तोही अभंग फारच सुरेख आहे.

” माळ पदक विठ्ठल

विसरला भक्ताघरी

झाली पदकाची चोरी

आला आळ जनीवरी “

जनाईने आधीच शूद्र त्यात स्त्री म्हणून उपेक्षा होणे यात अस्वाभाविक काहीच नाही असे लिहीले आहे. पुढे संतसहवासाने तिला जो थोडाफार आधार मिळाला त्यात ती धन्यता मानते.

“स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास

साधुसंती ऐसे मज केले”

“विदुर सात्विक माझिये कुळीचा “ असा ती उल्लेख करतेच. तसेच चोखामेळा, रोहिदास यांच्या विषयी तिला अभिमान वाटतो. संत आणि देव ती एकरूप मानते. जनाईचे देवाशी एवढे एकरूपत्व आहे की,

” देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते,

देवाविण नाही रिते ॥

याचा साक्षात अनुभव ती घेते.

 जनाबाईला संतांनी आधार दिला असला तरी, जनसामान्यांनी तिच्या चारित्र्यावर आक्षेप घेतले असणारच. म्हणून अखेर निर्धाराने तिला सांगावेसे वाटते,

 ” डोईचा पदर आला खांद्यावरी

भरल्या बाजारी जाईन मी ॥

 *

हाती घेईन टाळ खांद्यावर विना

आता मज मना कोण करी ॥

पंढरीच्या वाटे मांडियले पाल

मनगटावर तेल घाला तुम्ही ॥

जनी म्हणे देवा मी झाले वेसवा

रिघाले केशवा घर तुझे ॥

अशावेळी असं म्हणणारी जनाबाई ही मीराबाईचीच सखी वाटते.

जननिंदेच्या भयापासून स्वतःला मुक्त करणारी जनाई! देहाची सुरक्षितता आणि त्यासाठी पाळावी लागणारी जनमर्यादा तिने कधीच कस्पटासमान मानली. ती जीवन्मुक्तच होती.

स्त्री ही विवाहित असली काय, अविवाहित, किंवा विधवा असली काय? देहसंबद्ध असे तिचे चारित्र्य, लोकनिर्बंध, लोकसमज, आणि लोकेच्छा हा एकूणच स्त्री जीवनाला एक मोठा अडसर होता, आहे आणि राहणार आहे. याच्या आधारे स्त्रीला समाज जीवनातून उठवू शकतो. हे लोकापवादाचे दडपण स्त्रीमनावर सतत टांगते असते. ते एक शस्त्र असते. सीता द्रौपदीसह अनेक स्त्रिया याच मापदंडाने दंडिल्या गेल्या आहेत. स्त्री संतांचेही तेच झाले. मुख्य म्हणजे त्यांचे संतत्व सिद्ध होईपर्यंतच्या वाटचालीचे काय? नंतर याच समाजाने त्यांचा उदोउदो केला. म्हणूनच जनाई म्हणते – – – –

” स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास “!!!

अतिशय परखड पण मौलिक काव्यरचना करणारी संत जनाबाई म्हणूनच मला आवडते. भारतीय संत साहित्यात ” स्त्री मुक्तीच्या साहित्याची “ भर घालणारी ही संत स्त्री, तिचे काव्य, अभंग आणि विचारधन आजच्या काळालाही लागू आहेत.

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी पूजा अपूर्ण आहे! —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ माझी पूजा अपूर्ण आहे! —  लेखक – अज्ञात ☆ अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे

पूजेसाठी रोज मी सोवळे स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज देवांवर मी पाणी घालतो, अभिषेक करतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ दिवा लावतो!

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

— का.. कसं कोण जाणे.. एक दिवस माझं मलाच हे सगळं जाणवलं.. खरं तर खटकलंच. मग मी स्वतःच स्वतःला विचारलं – – 

बघ तुला जमतं का? ……

तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी. जीभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र ताबा मिळव, बघ तुला जमतं का…

तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस.. इच्छा तुझी. तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात, बघ तुला जमतं का…

तू सोवळं मान किंवा नको मानूस, हक्क तुझा.. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र, बघ तुला जमतं का…

तू १ माळ जप, स्वाध्याय कर, शास्त्र वाच किंवा नको वाचूस.. निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच, बघ तुला जमतं का…

तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस.. आवड तुझी, त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमधे देव पाहायला नक्की शिक, बघ तुला जमतं का???

माझी मनोमन पक्की खात्री झाली आहे आता की …. माझी पूजा अपूर्णच आहे ….

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आजी, आजची आणि कालची – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ आजी, आजची आणि कालची – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

काही दिवसांपूर्वी एका मॉल मध्ये गेलो होतो. ठाण्याचा अतिशय सुप्रसिद्ध मॉल. तरुणाईची पसंती असलेला. कुटुंबवत्सल जोडप्यांची आवडीची जागा.

 मुलांना घेऊन फिरायला, खरेदीला आणि खादाडीला भरपूर वाव देणारी आणि त्यासोबतच खिसा हलका करणारी. पोरांच्या भाषेत hangout आणि chill करण्यासाठी perfect place.

 या मॉल नामक जागेच्या मी जरा दहशतीतच असतो. एक तर भयंकर तंगडतोड होते उगाचंच. चकाचक दुकानं आणि नावाजलेले brands बघत नुसतं गरगर फिरतो आपण.

नको असलेल्या अनेक वस्तू, महागडे कपडे, चपला आणि बरंच काही ओझं घेऊन मग सगळ्यात वर असलेल्या खादाडीच्या विभागात पोहोचतो.

खाण्याचे एवढे विविध प्रकार पाहून हा भुलभुलैय्या बरा, की चक्रव्यूह बरा, अशी शंका यावी अशी परिस्थिती.

अशा गोंधळलेल्या अवस्थेतच लेकीने सूत्रं हातात घेतली आणि मॅकडॉनल्ड्स च्या दुकानात ती अदृश्य झाली. मी आणि बायको बावचळलेल्या अवस्थेत इकडेतिकडे बघत बसलो शुंभासारखे. माझ्या भिरभिरणाऱ्या नजरेला तेवढ्यात ‘ ते ‘ दिसले.

एक आधुनिक, पण नवथर आज्जी आणि दोन नातवंडं, साधारण एकाच वयाची. जुळी असावीत बहुतेक, असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं.

लाल T-Shirt, (बायकोच्या मते टोमॅटो रंग, लाल नव्हे) जीन्स आणि तोकडे, रंगवलेले केस. पायात Nike चे बूट आणि खांद्याला भारी पर्स लटकावलेली आजी.

पोरांची वेशभूषा पण आजीच्या पेहरावाला साजेशी. उच्चभ्रू, सुखवस्तू कुटुंबाचे प्रतिनिधी, तिघेही.

आजीच्या हातात पिशव्या पण होत्या खरेदीच्या. नातवंडांना घेऊन आली होती धमाल करायला ही नव्या युगाची नवी आजी. काळ कुठलाही असला तरी दुधाच्या सायीवरची माया मात्र अबाधित असते याची खात्री पटवून देणारी.

मुलांना दटावून, शांत बसा, मी आलेच असं म्हणून आजीही अदृश्य झाली मॅकडोनाल्डस मध्ये. पोरांची चुळबूळ, खोडकरपणा सुरूच होता, पण नशिबाने जागा सोडून पळत नव्हती इकडे तिकडे.

गोंडस, लोभस छानशी मुलं होती अगदी. टुकुरटुकूर बघत होती इकडेतिकडे विस्फारल्या डोळ्यांनी. आजीबरोबर यायचा असा त्यांचा पहिलाच अनुभव असावा बहुतेक. मी बघत होतो त्यांच्याकडे आणि माझीच तंद्री लागली.

मलाही माझी आजी आठवायला लागली. नऊवारी लुगडं नेसलेली, पायात चपला अगदी कधीतरीच घालणारी, पांढऱ्या केसांचा सुपारीएवढा का होईना पण अंबाडा घालणारी. अंघोळीला अंग धुणं, पोलक्याला झंपर, नाहीतर चोळी म्हणणारी. आमची सालस आजी.

आजची आजी घेऊन आली होती नातवंडांना मॅकडोनाल्डस मध्ये खाऊ घालायला. आमच्या आजीच्यावेळी ही असली चैन नव्हती आणि आमची तशी कधी अपेक्षाही नव्हती.

तसलं काही नव्हतंच हो तेंव्हा. खेळून दमल्यावर आजी काहीतरी खायला द्यायची. कधी राजगिऱ्याचे लाडू, कधी एखादा रव्याचा लाडू, घावन नाहीतर थालीपीठ, पोह्याचा पापड कुस्करून घातलेले दडपे पोहे किंवा कधी पोळीचा लाडू. काहीच नाही तर गुळ घातलेले दही दूध पोहे, आणि आम्ही खात असताना बघत बसायची कौतुकाने.

माझी दहावीची परीक्षा होती, तेंव्हा आमच्याकडे मुक्कामाला होती दहा दिवस आणि रोज नवा पदार्थ करून खाऊ घालायची पेपर संपवून आल्यावर.

अमृताची चव असायची तिच्या साध्यासुध्या घरगुती पदार्थाना. इतर काही सोडा, पण बाहेरचे वडे, भजी आणि सामोसे पण खाल्लेले नाही स्मरत मला.

नाही म्हणायला, पुण्यात असताना, रविवारी सकाळी एकाद्या छानश्या बेकरीचे गरमागरम पॅटिस मात्र असायचे बदल म्हणून, कधीतरी. ते पण भारी वाटायचे तेंव्हा.

आता टाळ्याला चिकटणारं त्यातलं वनस्पती तूप, प्राण कंठाशी आणतं. नको वाटतं खायला, पण तेंव्हा ती परमोच्च चैन असायची.

आज्या नऊवारीतून पाचवारीत संक्रमित झाल्या. त्यावेळी पण प्रचंड विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलं म्हणे, पण म्हणतात ना, change is the only constant in life ‘ या न्यायाने विरोधावर मात करून त्या जिंकल्या.

पुढची अवस्था होती पंजाबी ड्रेसची. तो बदल मात्र बऱ्यापैकी विनासायास झाला आणि आता जीन्स वाली आजी पण समाजाने विनातक्रार स्वीकारली. आपल्या समाजाची ती प्रगल्भता आहे, निश्चितच.

अंबाडा ते दोन वेण्या, मग एका वेणीचा शेपटा आणि आता पार्लर मध्ये जाऊन छानपैकी कापलेले, रंगवलेले केस. हे स्थित्यंतर पण जाणवण्याजोगं.

आजोबांचं पण तसंच संक्रमण झालं असणार. कोट, टोपी, पगडी, उपरणं ते सदरा लेंगा, शर्ट पॅन्ट आणि आता जीन्स, शॉर्ट्स आणी t-shirt.

हम बदल रहें है. निश्चितच.

तेव्हढ्यात लेकीची हाक आली, बाबा… दोन हातात दोन बर्गर चे ट्रे, त्यात fries आणि Coke असं सगळं सावरीत ती येत होती. मी उठून ते घेतलं तिच्याकडून आणि ती तिसरा ट्रे आणायला पळाली.

आधुनिक आजी पण ते सगळं सावरीत त्यांच्या टेबलाकडे वळली आणि नातवंडांशी गप्पा मारत, ते खाण्यात तिघेही गुंग झाले.

मी पण मग दडपे पोहे आणि घावन विसरून बर्गर हाती घेतला. French Fries, ketchup मध्ये dip करून खायला लागलो. पर्यायच नव्हता.

विचार केला, उसासे टाकून काय उपयोग? जमाना बदल रहा है, हमें भी बदलनाच पडेगा.

चला, ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ ही केशवसुतांची तुतारी आठवून बदल स्वीकारून मार्गक्रमण करुया. त्यातच सुख आहे…

लेखक : श्री पराग गोडबोले 

 (९३२३२ ७७६२०)

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आलोच पहा… कविवर्य ग. ल. ठोकळ – संकलनकर्ता – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ आलोच पहा… कविवर्य ग. ल. ठोकळ – संकलनकर्ता – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

कविवर्य ग. ल. ठोकळ ह्यांची माझ्या बालपणी खेड्यातील शाळेत ऐकलेली कविता विस्मृतीत गेली होती आणि फक्त पहिली ओळ आणि पायजमा, अर्ध्या बटनपट्टी चा फुल शर्ट आणि गांधी टोपी अश्या वेशातील गुरुजींनी मदर इंडिया तल्या दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा ह्या गाण्याची चाल लावून दिलेली आठवत होती. खूप काळ अनेक ठिकाणी शोधल्या नंतर सापडली एकदाची.

लाही लाही करायला लावणाऱ्या, शरीराची काहिली करणाऱ्या ह्या उन्हाळ्यात कविवर्य ठोकळांचा शब्द न शब्द मनाला भिडतो.

☆ जतन करून ठेवण्यासारखे काहीतरी… ☆

 आलोच पहा ग्रीष्म अशी दे ललकारी

 ओतीत सुटे आग नभी सूर्य दुपारी

 या ऊन झळा या करिती तप्त शरीरा

 आता कुठला शितळसा विंझण वारा

 कासाविस हो जीव, ती सूर्य करांनी

 घामेजूनी अंगांग निघे चिंब भिजोनी

 देई फिरताना चटके ऊन फुपाटा

 अंगात भरे पूर्णपणे शीण गाळाठा

 एकेक तरू लागतसे पार झडाया

 कोठून मिळावी हिरवी पाखर माया

 खाऊन उन्हाळा सुकली ही वनराई

 दृष्टीस पडेना हिरवे चार कुठेही

 काळी ठिकळे आणिक हे कुंपण काटे

 या वाचून शेतात दुजे काही न भेटे

 या शुष्क तृणांनी भरल्या पाऊल वाटा

 रानात दिसे जीर्ण उभा लाकूडफाटा

 बारीक ढगाळी दिसती सुन्न आभाळी

 रोडाऊनी ओढ उघडी होत लव्हाळी

 झाडांवर पक्षी दिसती केविलवाणी

 आणिक पिकांची सरली साखरराणी

 ओहोट कधी घेईल हा तीव्र उन्हाळा

 देईल कधी पाणकळा सुख जीवाला…

कविवर्य ग. ल. ठोकळ (१९३१)

संकलक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मृत्यू गरजेचा आहे का?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मृत्यू गरजेचा आहे का?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, _

“साधूमहाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?“ 

साधू म्हणाला, “ हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील. “ 

ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही. ” त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, “ छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. “

त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, “ ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल. ”

साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, “आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करु.? “

राजाने त्या युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले, तर तो म्हणाला, “ अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडेतीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा. ”

साडेतीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणाला, “ मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत. ”

यावर राजा म्हणाला, “ पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय? ” यावर पणाजोबा म्हणाले, “आमच्या घरात दिवसरात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने, गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे. ”

तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, “ तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत.

मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा जवळचीच माणसे आपल्याच माणसांच्या जीवावर उठली असती. ”

साधू म्हणाला, “ मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे! “

स्वतः बदला, जग बदलेल!!

 १) स्नान करताना नाम घेतले तर ते ‘तीर्थस्नान’ होईल!

 २) भोजन करताना नाम घेतले तर तो ‘प्रसाद’ होईल!

 ३) चालताना नाम घेतले, तर ती ‘तीर्थयात्रा’ होईल!

 ४) स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो ‘महाप्रसाद’ होईल!

 ५) झोपताना नाम घेतले तर ती ‘ध्याननिद्रा’ होईल!

 ६) काम करताना नाम घेतले तर ते कर्म ‘भक्ती’ होईल!

 ७) घरात नाम घेतले, तर ते घर ‘मंदिर’ होईल!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares