image_print

मराठी साहित्य – विविधा ☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे  विविधा  ☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆ आपले मन काय विचार करते याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. तसे पाहता मन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य  भाग आहे. जे दिसत नाही पण अस्तित्वात आहे ते आपले मन. आपल्या मनात सतत विचारांचा कल्लोळ चालूच असतो. मग हे विचार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात.  आपल्यात तयार  होणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही मनातूनच उगम पावत असते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी आपणास प्रथम आपल्या मनाची तयारी ठेवावी लागते. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास प्रयत्नासोबत आपल्या मनाची भक्कम साथ हवी असते.  लोक नकळतपणे बोलतात..  बघा ..  " मनात आले तर करेन, नाहीतर नाही करणार "  आपले मन काय विचार करते याच्यावर आपले वागणे अवलंबून असते. मनात येणाऱ्या  बऱ्या-वाईट विचारांवर आपली वर्तणुक ठरत असते.  पण आपल्या मनास वाईट कृत्यांपासून परावृत्त करणे हे आपल्याच हातात असते. मन जर वाईट मार्गाने धावत असेल तर त्याला लगाम घालण्याचेही आपल्याच हाती असते. अर्थात अस्तित्वात नाही पण आपणासी संलग्न आहे अशा मनाचे दोर हे आपल्याच हाती असतात. आपणास जर स्वतःचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत असे प्रभावी  घडवायचे असेल...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्व सुलोचना – एक सात्विक पर्व संपले ” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर  मनमंजुषेतून  ☆ “स्व सुलोचना - एक सात्विक पर्व संपले ” ☆ सौ राधिका भांडारकर ☆ (३०जुलै १९२८—०४जुन २०२३) सिनेसृष्टीतील एक सात्विक पर्व संपलं. एक वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्यामागे हरपली.  एका महान कलावंताची प्रेमस्वरूप सफर संपली. जिचं नाव घेताच कपाळी रेखीव चंद्रकोर, नाकात नथ, डोईवर काठाचा पदर, आणि डोळ्यात शीतल चंद्रप्रकाश असलेली एक अत्यंत तेजस्वी,  कर्तव्यनिष्ठ, करारी, तितकीच प्रेमळ, आणि सात्विक स्त्रीची मुद्रा नकळत उभी राहते, ती म्हणजे चित्रपट सृष्टीचा एक मोठा कालखंड गाजविणाऱ्या श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचीच. चित्रपटसृष्टीत  त्या सुलोचना दीदी  म्हणून प्रसिद्ध होत्या. चार जून २०२३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आणि अभिनयाचं एक दिव्य पर्व समाप्त झालं. १९४३ साली  हिंदी चित्रपट सृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी अभिननयाची  सुरुवात केली.  त्यानंतर राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढी बरोबरही त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी जवळजवळ ३०० हून अधिक मराठी — हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं,  कटी पतंग हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. चित्रपटात त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांची  भाषा इतकी शुद्ध...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामाचं नाम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर  मनमंजुषेतून  ☆ रामाचं नाम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ कोणीही भेटलं की तो "श्रीराम" म्हणायचा. सोसायटीच्या वॉचमनपासून कंपनीच्या मालकापर्यंत सगळ्यांनाच हे ठाऊक होतं, आणि आताशा तर तो दिसला की आपसूकच तेही त्याच्या निमित्ताने रामनाम घेत असत. साधना वगैरे नाही, पण रोज एक माळ रामनाम तो घ्यायचा. त्याच्या मित्राला काही हे आवडायचं नाही, पटायचं नाही. "का करायचं असं ? याने तुला काय फायदा होतो ? तू हे कशासाठी करतोस ?" वगैरे प्रश्नांची तो मित्र याच्यावर सरबत्ती करायचा.  तो एरवी त्या मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा, हसून सोडून द्यायचा. पण एके दिवशी मित्र खनपटीलाच बसला, "तुला काय मिळतं हे सारखं राम राम करून ? तुला काय तो राम दर्शन देतो का असं केल्याने ?" "काही मिळण्यासाठी कशाला रामाचं नाव घ्यायचं ?" तो शांतपणे म्हणाला. "आणि दर्शन होण्याचंच म्हणशील तर अजून काही ते दर्शन झालं नाही, हे खरंच आहे. पण ते राहू दे. सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचं आहे. कुठे जाऊ ? मदुराई छान आहे का रे ?" हा एकदम पर्यटनात कुठे घुसला, मित्राला बोध झाला नाही. पण मदुराई छान आहे हे त्याने ऐकलं...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव 🌈 इंद्रधनुष्य 🌈 ☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆ नमस्कार मैत्रांनो, आज ३ जून २०२३, म्हणजेच ‘जागतिक सायकल दिन’ आहे. त्या निमित्याने आमच्या संकुलात गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एका उपक्रमाची आठवण झाली. त्याविषयी सांगेनच, पण आधी जाणून घेऊ या खास दिवसाबद्दल. सायकल चालवणे हा व्यायामाचा एक स्वस्त आणि मस्त प्रकार आहे. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा जागतिक सायकल दिवस (वर्ल्ड बायसिकल डे) म्हणून घोषित केला. आता सायकल चालवण्याचे मुख्य फायदे बघू या. नियमित सायकल चालवल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण तर होतेच पण वयानुसार कमी झालेली ही शक्ती वृद्धिंगत होते. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती फार महत्वाची असते. सायकलिंग वजन कमी होण्यास मदत करते. चयापचय सुधारणे, स्नायू मजबूत करणे याशिवाय चरबी जाळणे, या सर्वांतून प्रति तास सुमारे ३०० कॅलरीज जाळल्या जातात. सायकलिंगमुळे हृदयाची तंदुरुस्ती वाढते. नियमित सायकल चालवल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. दररोज नियमितरित्या फक्त 30 मिनिटे सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्के कमी होतो,...
Read More

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कूर्मजयंती निमित्त —… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

 वाचताना वेचलेले  ☆ कूर्मजयंती निमित्त —… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆ कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. – मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व — कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते. कासवाचे गुण १) कासवाला ६ पाय असतात, तसेच माणसाला ६ शत्रू असतात. — काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर  — कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते.  त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे  २) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातून प्रेम देवून वाढवते. त्याच प्रमाणे देवाने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी ही भावना आहे.  ३) कासव आपल्या अष्ट अंगांनी नमस्कार करते.  त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते. ४) कासव ज्याप्रमाणे...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी  विविधा  ☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆ स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसेच माणसांच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही खूप दिवसांनी मला निवांत वेळ मिळालेला.. म्हणजे मी तो काढलेला होता अगदी प्रयासाने. स्वतःसाठी वेळ असतोच कुठे आपल्याला या धावपळीच्या जगात ?. घर, नोकरी, मुलं बाळं, नातेवाईक, सण समारंभ यातच गुरफटुन गेलेलो असतो आपण.. स्वतःकडे बघायला वेळच नसतो. स्वतःसाठी वेळ काढावा असे मनात पण येत नाही. बरं ते असो... खूप उबग आला होता सगळ्याचा. अगदी सगळ्याचा. खोटं खोटं हसण्याचा, खोटं आनंदी आहे सुखी आहे हे दाखवण्याचा. कंटाळला होता जीव. घुसमट असह्य होत होती. काही सेकंद माझी मलाच भीती वाटली. सगळे मुखवटे फाडून टाकून जावे. . कुठे तरी अशा शांत ठिकाणी जिथे मी आहे तशीच मला दिसेन. देखावे करावे लागणार नाहीत. आपण कसे आहोत हे आपले आपल्याला कळत असतेच ना. जगाला दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? या विचाराने मन सुन्न झाले. नकळत पायात चप्पल चढवली आणि अशीच चालत निघाले न थांबता. कुठे जायचे असा विचारही...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कोसळलेली आभाळं सावरताना…!” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके    मनमंजुषेतून  ☆ “कोसळलेली आभाळं सावरताना...!” —  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆ मानवी जीवनाच्या डोईवर मृत्यू नावाचं आभाळ कायमच कोसळण्याच्या बेतात असतं. जन्माच्या सोहळ्याची सांगता मृत्यूच्या अभ्रछायेखाली होताना दशदिशा काळवंडून गेलेल्या असतात. हे आभाळ कोसळतं तेव्हा मनाच्या पृष्ठभागावरचं सर्वच जमीनदोस्त होतं... आणि मनाच्या खोल समुद्राचा तळ भूकंपाच्या धक्क्यानं शतविक्षत होतो... आणि वेदनेच्या लाटा उसळी मारून वर येऊ पाहतात. हा अनुभव मरणा-याला येऊच शकत नाही, मात्र मरणा-याच्या रक्त-नात्यांना हा अनुभव विस्कटून टाकतो. अशा वेळी खांद्यावर ठेवला गेलेला हलका हात, पाठीवरून अलगद फिरणारी मायेची बोटं, कपाळावरून डोक्यावर हळूहळू स्पर्शत जाणारा एखाद्या थरथरत्या हाताचा तळवा. . वेदनांकित तळहाताच्या उपड्या पृष्ठभागावर एखाद्या हाताची सहज थपथप आणि कुणीतरी अतीव सहवेदनेने मारलेली मिठी... किती मोठा दिलासा असतो ! शब्द तर नंतर आणि तेही बिचारे गलितगात्र झालेले ! संवेदनेच्या फुलांतून सहवेदनेचा सुगंध अवतरतो तेव्हा आभाळ सुखावून जात असावं ! आपली स्वत:ची दु:खं एकवेळ सुसह्य असतीलही, पण दुस-याच्या दु:खाला सामोरं जाणं म्हणजे जणू श्वास रोखून पाण्याखालून चालत जाऊन पैलतीर गाठण्याएवढं गुदमरून टाकणारं. आणि एरव्ही हाताच्या अंतरावर दिसणारे हे...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक पर्यावरण दिन-५ जून २०२३… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव 🌈 इंद्रधनुष्य 🌈 ☆ ♻️ जागतिक पर्यावरण दिन-५ जून २०२३… 🌻 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆ नमस्कार मैत्रांनो, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) च्या नेतृत्वाखाली १९७३ पासून दर वर्षी ५ जूनला 'जागतिक पर्यावरण दिन' आयोजित केला जातो. २०२३ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे 'Beat Plastic Pollution' अर्थात 'प्लास्टिक प्रदूषणावर मात करा', कारण वाढते प्लास्टिक प्रदूषण हे पर्यावरण प्रदूषणाचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी ४०० दशलक्ष टनांहून अधिक प्लास्टिकचे उत्पादन केले जाते, त्यातील निम्मे प्लास्टिक एकदाच वापरण्यासाठी (एकल वापर प्लास्टिक अर्थात सिंगल यूज प्लास्टिक) डिझाइन केलेले आहे. म्हणूनच आजच्या काळाची नितांत गरज बनलेल्या २०२३ च्या थीमच्या अंतर्गत प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याविषयी सार्वजनिक व निजी क्षेत्र तसेच नागरिकांचा सहभाग असलेले जागतिक उपक्रम राबवल्या जातील. प्लास्टिक प्रदूषणाची कारणे प्लॅस्टिकचे उत्पादन करतांना जीवाश्म इंधन वापरतात, जे ग्रीन हाऊस गॅस (कार्बन डाय ऑक्साईड) बाहेर टाकते आणि जागतिक तापमान वाढवते. एकल वापर प्लास्टिक, मुख्यत्वे करून प्लॅस्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ आणि पाण्याच्या बाटल्या यांचा अतिरेकी वापर हे वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. प्लास्टिक कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन (मुख्यत्वे...
Read More

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे वाचतांना वेचलेले  ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆ " गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?" सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले. " विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल. " सखीने उदार मनाने मला सवलत दिली. मी म्हणाले, "गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. " सखी: "उदाहरण दे. " हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून, मनात ठेवून मी म्हटले, " भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?" सखी: "कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो. " मी: "बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा. भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर 🌸 विविधा 🌸 ☆ “आधुनिक वटपौर्णिमा...” ☆ सौ राधिका भांडारकर ☆ आधुनिक म्हणजे नेमके काय? जुन्या चालीरीतींना डावलणे, परंपरा मोडणे, जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध  दर्शविणे...काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे अधुनिकता का? खरं म्हणजे आधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं...त्यातली भूमिका, कारणं, आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी, वातावरणाशी, जीवनपद्धतीशी  त्याची सांगड घालून प्रथेचं उचित नूतनीकरण करणं म्हणजे आधुनिकीकरण.... हा अर्थ मला अधिक पटतो...आधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे– तर पुनर्बांधणी. वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला... पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे ,पत्नीने पतीला दीर्घायुष्य मिळावे,आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत !! मग उपास, वडाची पूजा ,वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या..वगैरे वगैरे.. मग त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा… वास्तविक हिंदू संस्कृतीत कुठल्याही सणाशी , व्रताशी कुठलीतरी  कथा ही असतेच...मात्र या कथांच्या माध्यमातून एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो. तो समजून घेणं म्हणजे आधुनिकता.. आणि आजची स्त्री हा विचार करते. कारण ती शिक्षित आहे. विचारक्षम आहे. परंपरेतला अंधश्रद्धेचा ,फोलपणाचा भाग ती डावलू शकते...आजची स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही, विधीपूर्वक...
Read More
image_print