मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वो दिन भी क्या दिन थे… लेखक : डॉ. संदीप खारकांडे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆

सुश्री नीलाम्बरी शिर्के

? मनमंजुषेतून ?

☆ वो दिन भी क्या दिन थे… लेखक : डॉ. संदीप खारकांडे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆

(Yadon ke purane album mein chhupa ke rakhe hain humne woh din…) 

फुल पँटचचं  माझं दरवर्षीच स्वप्नं दोन हाफ पँट्स मध्ये दुभंगलं जायचं (जे दहावी नंतर पुर्ण झालं) म्हणजे आमच्या पप्पांचा तसा शिरस्ता असायचा, एका फुल पँटच्या कपड्यात दोन हाफ पँट्स होतात, हाफ बाह्यांचा शर्ट अर्धा मीटर कापड वाचवतो, तेवढाच शिलाईचा खर्च पण वाचतो.दोघा भावाभावांना एकाच तागयातले कापड, त्यामुळे शर्ट पँट शेम शेम,राम बलराम    

शिसपेन्सिली  .. त्या पण अर्ध्या अर्ध्या कापून वापरायच्या .. उद्देश एवढाच की महाशयांनी हरवली तर अर्धीच जावी , त्या नवीन पेन्सिली कापलेल्या पाहिल्या की उगीचच वाईट वाटायचं,असो ..

असं सगळं काटकसरीचं बालपण होतं ..

तसा मी ७-८ वी ला असल्यापासून मला बच्चनच्या खुप गोष्टींचं आकर्षण  होतं सिनेमे खूप नाही बघितले तरी पण … 

त्याचे costumes .. दीवार मधलं त्याचं जॅकेट ..  त्याच्या त्या फुटभर bottoms असणार्‍या पँट्स .. brittles नावाचा त्याचा कपाळाच्या मधून पडलेला भांग, घोड्याच्या डोळ्याला लावलेली झापडं तसे झाकलेले दोन्हीही कान असा त्याचा तो hair cut .. तरी पण आवडायचा,सिलसिला मधले high neck चे t shirts इत्यादि इत्यादि .. अशा एक ना अनेक गोष्टीच आकर्षण .. एकदा तरी तशी बच्चनस्टाइल करावी ..तसं जॅकेट .. तशी bellbottom घालावी नी कुठेतरी मिरवून यावं.. 

sholay मधला जय, शराबी मधला विकी, दीवार मधला विजय आणिक काय काय .. यातलं एक तरी नाव आई वडीलांनी का ठेवलं नाही आपलं, इथपर्यंत सुद्धा  पतंग उडायचे .. 

सगळी स्वप्नवत दुनिया .. लहानपणीची perceptions काही औरच असतात,कुणाला काहीही वाटो ‘दुनिया गयी भाड मे’ .. ‘मला काही फरक पडत नाही अशी’ 

पण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच बरं का.. 

यापुढची बच्चनची कोणतीच ‘रेखा’ मी पार केली नाही.  

लेखक : डॉ. संदीप खारकांडे 

प्रस्तुती : सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… आई – भाग – ४४ / २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… आई – भाग – ४४ / २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

(आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय.”) इथून पुढे — 

आई जितकी कडक आणि कठोर शिस्तीची होती तितकीच गंमतीदारही होती. तिला नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच बघायला मनापासून आवडायचे. त्यात ती इतकी रमायची, इतकी गुंतायची की पडद्यावर जे काय घडत आहे ते काल्पनिक आहे, अभिनय आहे हेही ती विसरून जायची.

एकदा आम्ही सारे मणीरत्नम् चा एक चित्रपट पाहायला गेलो होतो. बहुतेक “बॉम्बे” हाच असावा. त्यात एक मुसळधार पावसाचा सीन होता. तो कोसळणारा पाऊस पाहून आई चटकन उठली आणि म्हणाली “अगंबाई गच्चीत वाल वाळत घातलेत की.. ” तेव्हा माझी धाकटी बहीण आईला हसत म्हणाली, “अगं आई हा चित्रपटातला पाऊस आहे. खरा नव्हे. तुझे वाल नाही भिजणार या पावसाने. ”

खेळात तिला नेहमी जिंकायलाच हवं असायचं. हरलेलं तिला चालायचंच नाही. क्रिकेटची मॅच बघताना सुद्धा कोणाचं शतक हुकलं, कोण शून्यावर आऊट झाला, तिच्यामते कोणी धाव घेऊ शकत होता आणि तरीही त्याने ती घेतली नाही तर तिची हळहळ प्रचंड असायची. तिच्या शेजारी बसून मॅच बघताना आम्हाला खूपच गंमत यायची. तिच्या कमेंट्स ऐकायला मजा वाटायची. टेलिव्हिजन तर खूप नंतर आला पण रेडिओवर पण ती त्याच आत्मियतेने क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकत बसायची आणि भारताची हार होत आहे असं वाटलं की रेडिओ धाडकन बंद करायची.

तिला स्वतःलाही खेळायला खूप आवडायचं.

एकदा माथेरानला सहलीला गेलो असताना तिने तिथल्या कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्त्री पुरुष संयुक्तपणे आणि एकेरी खेळत होते. त्यात आईने दोन्ही विभागात विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हा तिला झालेला आनंद माझ्या आजही लक्षात आहे. एक लहान मुल तिच्यात कुठेतरी दडलेलं असावं.

आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे जायचो तेव्हा सगळे मिळून आम्ही पत्त्यातला “झब्बू” हा खेळ आवडीने खेळायचो. एका डावात आईला सतत “झब्बू” मिळत होता आणि तिच्या हातातली पानं वाढत होती. ती हरणार हे निश्चित होतं. त्यावेळी तिने चिडून हातातले पत्ते टाकून दिले आणि रागात म्हणाली, ” तुम्ही खेळा. मला नाही खेळायचं. ” 

त्या दिवशी मात्र आईने खेळात फार रडी खाल्ली होती पण आयुष्याच्या खऱ्या खेळात मात्र तिने कधीच रडी खाल्ली नाही. ती नेटाने लढत राहिली. जिंकेपर्यंत हरत राहिली पण तिने तिचा आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. आमच्या घराच्या मागच्या जागेत एका नवीन वास्तूचे बांधकाम चालू होते. ज्याच्या भरवशावर पप्पा ते बांधकाम करत होते त्यानेच पप्पांना फसवले. घुसखोरी करून त्याने त्या वस्तूत मालकी हक्क गाजवायला सुरुवात केली. अनेक वर्ष कोर्टात केस चालली. तारखांवर तारखा पडत होत्या पण विजयाची माळ काही गळ्यात पडत नव्हती. त्याच दरम्यान पप्पांचं निधन झालं आणि ध्यानीमनी नसताना आईवर फार मोठी जबाबदारी पडली पण आम्हा सर्वांच्या लक्षात राहील इतका कणखरपणा आणि खंबीरपणा आईने त्यावेळी दाखवला. तोपर्यंत तिचेही वय झाले होते आणि सतत जिजी आणि पप्पांच्या अदृश्य संरक्षक कवचातच ती राहिली होती पण यावेळेस ती आत्मविश्वासाने बाहेर पडली. कोर्टाची एक एक पायरी नेटाने चढत राहिली. त्यानंतरही कितीतरी वर्ष ही केस चालली पण अखेर ती जिंकली. त्या दिवशीचा तिचा आनंद अवर्णनीय होता. तिने हात उंचावून तो व्यक्तही केला. जणू काय तिने विश्व करंडकच जिंकला होता.

जिजी गेल्यानंतर आधारवृक्ष कोसळलेल्या वेलीसारखीच तिची अवस्था झाली असावी. शेवटच्या श्वासापर्यंत जिजीचा जीव आईच्यातच गुंतलेला होता. शेवटच्या क्षणी जिजी जे म्हणाली ते मात्र काहीसं गूढ होतं पण आईच्या डोक्यावर हात ठेवून ती म्हणाली होती, ” मालू सांभाळून, जपून राहा, माझ्यामागे तुला अकरा वर्ष जगायचं आहे. ”

ती अकरा वर्षं आईच्या आयुष्यातली खूप महत्त्वपूर्ण होती. त्याकाळात ती महिला मंडळात जात असे. तिथे होणाऱ्या कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये, सोहळ्यांमध्ये मनापासून भाग घेत असे. अनेक बक्षीसंही तिने मिळवली. तिच्या या गुणांचे दर्शन तसं आम्हाला खूप उशिरा घडलं कारण आम्ही नेहमी पप्पांच्याच कर्तुत्ववानतेला सलाम केला. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणतात तसंच काहीसं आईच्या बाबतीत झालं असेल.

याठिकाणी मला आईची एक आठवण सांगावीशी वाटते.

पपांकडे झोटींग नावाचा एक विद्यार्थी गणित शिकायला यायचा. हा झोटींग अतिशय “ढ” होता. त्याला साध्या बेरजा वजाबाक्या जमत नसत. पपा एक दिवस त्याला चिडून म्हणाले, ” अरे बाबा! तुला टांगासुद्धा हाकलता येणार नाही. ”आईला पपांचं हे बोलणं बिलकुल आवडलं नाही. झोटींग गेल्यावर आई पपांना ठामपणे म्हणाली, ”अहो सगळीच मुलं हुशार नसतात. हुशार मुलांना कुणीही शिकवेल पण झोटींगसारख्या मुलाला आत्मविश्वास मिळवून देणं ही तुमचीही कसोटी होती. त्यात तुम्ही सपशेल नापास! ”

पपा पूर्णपणे निरुत्तर होते.

नंतरच्या काळात मी एक दिवस आईला सहज विचारलं, ”आई तू हे सगळं सुरुवातीपासून का नाही केलंस? आमच्यासाठी तू फक्त खमंग कुरकुरीत चकल्या करणारी, चवदार भाजणीची ढीगभर थालीपीठं थापणारी, तेलावरच्या पातळ, मुऊसूत पुरणपोळ्या आणि तत्सम बरंच काही करणारीच का राहिलीस? आयुष्याच्या उत्तरार्धात तू तुझ्याठायी असलेल्या गुणांचं, छंदांचं जतन करतेस हेच आधी केलं असतंस तर?”

तेव्हा आई चटकन म्हणाली, ”बाळांनो! तेव्हा माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या, मला तुम्हाला घडवायचं होतं. तुमची जडणघडण तुमची भविष्यं ही महत्त्वाची नव्हती का? माझ्यासाठी तेच महत्त्वाचं होतं आणि बाकी सारं दुय्यम होतं.”

आज जेव्हा मी आजच्या काळातल्या स्त्रीचा आणि त्या काळातल्या स्त्रीचा विचार करते तेव्हा कुणाचं पारडं जड, कुणाचं हलकं याचं मोजमाप करता येत नाही पण आई म्हणजे नक्की काय याचं आकलन मात्र कुठलेही अवजड, अलंकारिक, नित्य नियमाचे, घासलेले शब्द न वापरताही मला होते.

जे तेव्हा कळलं नाही ते आता कळतं. ”हा रंग गडद आहे. हा नाही शोभणार तुला. हे फिक्या रंगाचंच कापड घे. ”

तयार होउन बाहेर पडताना ती हमखास मला हटकायची. ”हे काय केस नाही नीट विंचरलेस? नुसती झिपरट दिसतेस. जा कंगवा घेउन ये. ” तेव्हा आईचा मला प्रचंड राग यायचा. पण आता त्यापाठीमागची आईची मायेची भावना जाणवते. आपलं हे सावळं, सौंदर्यात काहीसं डावच असलेलं लेकरुही चारचौघात सुंदर दिसावं एव्हढाच तिचा भोळा भाव होता. कारण “ती आई होती म्हणोनि.. ”

अखेरच्या काळात कुठलाही गीताभ्यास न केलेली माझी आई संपूर्ण विरक्त, तटस्थ झालेली होती. ज्या वास्तूत ती राहत होती ती तिच्या वडिलांनी तिला दिलेली अनमोल भेट होती पण तोही पसारा पेलवण्याची शक्ती न उरल्यामुळे आणि आपल्याच मुलींच्या भविष्याचा विचार करून आणि आपल्या मागे कुठल्याही प्रकारचे कलह होऊ नयेत या भावनेने आम्हा लेकी- जावयांवर विश्वास ठेवून तिने तिची अनमोल वास्तू विकण्याचाही निर्णय घेतला आणि बजावलाही. तेव्हा म्हणाली मात्र, ”आता मला घर नाही. ”थोडी गहिवरली. पण आम्ही तिला लगेच म्हणालो,” आता तुला पाच हक्काची घरं आहेत.” 

जेव्हा ती गेली तेव्हा तिने आम्हा पाचीजणींना जवळ घेतले. आमचे मुके घेतले. म्हणाली, ”मी भाग्यवान आहे. मी तृप्त आहे. माझ्या परिपूर्ण आणि सुखी जीवनासाठी मी ईश्वराची आभारी आहे. आता तुमचा निरोप घेते. सुखी रहा. एकमेकींवरची माया कायम ठेवा. आनंदाने जगा.” 

त्रिभुवनातली सारी संपत्ती जरी एकत्र केली तरी त्याची किंमत तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या त्या दोन थेंबांच्या किंमतीपेक्षा कमीच राहील कारण ते एका मातेचे, आशीर्वाद देणारे अनमोल अश्रू होते. त्यात संस्कारांची अजोड ठेव होती. ती गेली पण आमच्या अंगणात आनंदी जीवनाचं झाड लावून गेली.

एक गूढ मागे राहिलं. ३१ डीसेंबर २००५ साली तिचं निधन झालं. जिजीच्यानंतर बरोबर अकरा वर्षांनी.

पपा गेले, जिजी गेली, आई गेली आणि आमचं बालपण काळाच्या ओघात वाहून गेलं.

 – क्रमश: भाग ४४ / २  – भाग ४४ समाप्त..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-४ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-४ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

काही उदाहरणं सांगता येतील की, काय काय प्रकारचे नियम आपण ठेवू शकतो. एक तर रात्री एक वेळ ठरवायची आठ-नऊ जी ठरवली असेल त्या नंतर कोणीच कुठलाच स्क्रीन वापरायचा नाही… टीव्ही असो लॅपटॉप असो की फोन. अवघड वाटतं ना कधी कधी ऐकायला! तर कोणीच स्क्रीन वापरायचा नाही, हे करता येईल. याचा फायदा असा होतो की, झोप शांत लागते. आपण स्क्रीनकडे बघत राहिलो ना तर आपल्या मेंदूला संदेशच जात नाही की आता रात्र झालीय. आता झोप यायला पाहिजे. कारण सतत आपण प्रकाशाच्या सोर्सकडे बघत असतो. जेव्हा अंधार होतो तेव्हा मेंदूला संदेश जातो की रात्र झाली आता झोप यायला पाहिजे. तर रात्री किती वाजता फोन बंद करायचा याचा एक नियम घरी ठरवता येईल. मग त्याच्यानंतरचा जो वेळ असेल तो आपण सगळे मिळून एकत्र गप्पा मारू शकतो, एखादा गेम खेळू शकतो वा असंचं काहीतरी… अभ्यास, वाचन या सगळ्या गोष्टी करता येतील. अजून एक नियम असा करता येईल की आपण जिथे झोपतो त्याच्या शेजारी फोन ठेवायचा नाही. बहुतेकांना सवय असते फोनवर गजर लावायची. समजा रात्रीबेरात्री जर का जाग आली तर आपण बघतो की काही मेसेज आलाय का वगैरे. झोपेतून जाग येऊन प्रकाशाकडे परत बघणं हे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी ती खूप घातक गोष्ट असते. अजून एक गोष्ट आपल्याला माहिती नसते की या सगळ्यांमध्ये त्यातून निघणारी रेडिएशन्स शरीरासाठी घातक असतात. म्हणून अशाप्रकारे फोन सतत आपल्या जवळ असणारे चुकीचे आहे. रात्री तर लांबच ठेवायला पाहिजे. म्हणून आम्ही कित्येक वेळा असं पालक सभेत सांगतो की, गजराचं घड्याळ होतं ना पूर्वी तसं आणा सगळ्यांनी आणि आता ते घड्याळ वापरायला लागा. अजून एक नियम की संध्याकाळी मुलांनी मैदानी खेळ खेळायला जायला हवे. मुलांचे व्हिडिओ गेम वगैरे काही असेल ते खेळायला एक आपण टाईम लिमिट ठेवू शकतो. मुलं कोणते गेम खेळतात त्याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. कारण हे गेम प्रचंड एडीक्टिंग असतात. त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. मुलं जे गेम खेळतात त्याच्यात मारणं, रक्तपात या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मुलांमध्ये या गोष्टी विषयी काही वाटेनासे होते. आणि म्हणूनच मित्रांमध्ये थोडे जरी मतभेद झाले, भांडण झाले तरी एखाद्याचा ते प्रत्यक्ष खूनही करतात. या सगळ्यांचे प्रमाण खूप वाढत जाते. त्यांना गेम जिंकण्याचंही त्यांना व्यसन लागतं. त्यामुळे गेमसाठी एक टाइम लिमिट पाहिजे. आपली मुलं कुठला गेम खेळतात त्याच्यावरती पालकांचे लक्ष पाहिजे. असे अनेक प्रकारचे नियम आम्ही आजकाल पालकांना सांगत असतो.

शेवटी मला जे लोक नेहमी विचारत असतात की, कोणी व्यसनाकडे वळूच नये म्हणून त्यासाठी एकूणच तुम्ही काय उपाय सांगू शकता? आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुटुंबात आपण सर्वांनी रात्रीचे जेवण जर का एकत्र केलं तर खूप छान संवाद होऊ शकतो. अर्थातच तेव्हा पालकांना मला एक वेगळी सूचना द्यायला लागते की, जेवताना मुलांचे मार्क, अभ्यास हा विषय काढू नका. आज दिवसभर मी काय केलं, आज माझ्या ऑफिसमध्ये किंवा दिवसभरामध्ये खूप छान गोष्ट काय झाली असा पालकांनी संवाद साधायला सुरुवात केली की मग मुलांना पण ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे काही घरांमध्ये एटिट्युड बदलते. मुलं मग आज काय झालं, त्याच्याबद्दल मला कृतज्ञता कशी वाटते, असं खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी बोलतात. त्याच्यामुळे संवाद चांगला होऊ शकतो. टेकडीवर जाणं, एकत्र व्यायाम करणे, या गोष्टींनी एक संवाद चांगला होऊ शकतो. मुलं जे प्रश्न विचारतात त्यांना योग्य उत्तर देणं महत्वाचा असतो अन्यथा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

याबाबतीतली आमच्याकडे आलेली एक केस सांगते. आमच्याकडे आलेला एक मुलगा आठवीपर्यंत अगदी छान गुड बॉय प्रकारचा म्हणतात असा होता. एकदा तो शाळेतून घरी येत होता. आठवीत असताना त्यांनी बघितलं की, त्याच्या शाळेतली काही मोठी मुलं होती ती सिगरेट ओढत होती. त्याला पण उत्सुकता निर्माण झाली. घरी आल्यावर अगदी इनोसंटली त्यानं आईला विचारलं की, ‘आई माझ्या शाळेतली मुलं सिगरेट ओढत होती. मी पण ओढून बघू कसं वाटतं सिगरेट ओढल्यावर ते? ‘ 

हे ऐकल्यावर आई एवढी भडकली आणि त्याला एवढी रागवली की विचारता सोय नाही. पण मुलाची उत्सुकता काही शमली नाही. आईच्या चिडण्यामुळे तो प्रश्न त्याच्या मनात तसाच राहिला. दुसऱ्या दिवशीच सिगरेट ओढणाऱ्या त्या मुलांना त्याने तो प्रश्न विचारला. तर ती मुलं म्हणाली, ‘ तू आता मोठा झाला आहेस तेव्हा ओढायलाच पाहिजे सिगरेट. ‘ असं म्हणून त्याला सिगारेट ओढायला दिली. ती त्याच्या व्यसनाची सुरुवात होती. जनरली कुठलाही व्यसनाची सुरुवात ही सिगरेट, तंबाखूपासून होते. तशी त्या मुलाची झाली आणि मग पुढे त्याच्या आयुष्यामध्ये इतर व्यसनंसुद्धा त्याला लागली. खरं तर त्याची आई त्याला समजेल अशा भाषेत छान उत्तर देऊ शकली असती आणि त्याने ऐकलंही असतं. खूप निरागसपणे तो हा प्रश्न विचारत होता. आईने त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगितले असते तर त्याला व्यसन लागले नसते. समजा तिला उत्तर येत नसेल तर ती डॉक्टरकडे किंवा एखाद्या एक्सपर्टकडे मुलाला घेऊन जाऊ शकली असती. त्याचे काय काय दुष्परिणाम होतात त्यांच्याकडून त्याला कळले असते. पण तिने संवादाची खूप छान संधी गमावली. सांगायचा मुद्दा हा की, मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा कुठलाही प्रकारच्या व्यसनाबाबत योग्य उत्तर देणे, योग्य माहिती मुलांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे.

दुसरी गोष्ट आपल्या प्रत्येकालाच असं वाटत असतं की, आपण आनंदी राहावं. पण त्यासाठी नशा करायला हवीच असे नाही. आनंद हा काही फक्त वाईट गोष्टीतूनच मिळवायला पाहिजे असं नाही आणि तो काही खरा आनंद नसतोच. कारण नशेतून जो आनंद मिळतो तो खूप क्षणिक आनंद असतो. पण त्याची व्यसनाधीन माणसाला खूप मोठी किंमत द्यायला लागते. आनंद मिळवण्यासाठी खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत. वेगवेगळे छंद आहेत, वाचन आहे, वेगवेगळे खेळ, व्यायाम, संगीत अशा कितीतरी गोष्टी असू शकतात. तर अशा प्रकारे कुठल्यातरी छंदांमध्ये मुलांना आपण गुंतवू शकतो. आपण स्वतःही अशा प्रकारे आनंद घेऊ शकतो. तुम्ही माझ्या बाबाची पुस्तके वाचली असतील तर त्यातून तुम्हाला कळले असेलच की, बाबांना खूप वेगवेगळे छंद होते. बासरी वाजवायचा, चित्र काढायचा, ओरिगामी, लेखन वगैरे तर होतंच. अनेकदा घरी पण बाबा नेहमी असं म्हणायचे की, माझी सिगरेट कुठली तर माझी बासरी हीच माझी सिगरेट आहे! मग सकाळी बाबांच्या असा ठरलेला डायलॉग असायचा… आता मी तिचा एक झुरका मारतो आणि मग बासरी वाजवायचे. मग किती चांगला धूर यायचा ना त्या बासरीतून सुरांचा! काही नुकसान होत नाही अशा नशेतून, उलट आनंदच मिळतो. म्हणून मी नेहमी म्हणते की, नशा अशा गोष्टीतनं आली पाहिजे ज्याच्यामुळे आपलं नुकसान व्हायला नको आणि इतरांचही नाही. आनंदामध्ये सर्वांना सहभागी करून घेता आलं पाहिजे. व्यायाम केल्यामुळे पण एक प्रकारे नशा आल्याचा आपल्याला फिल येतो. अशा प्रकारे जेव्हा चांगल्या पर्यायी नशा मिळतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात किती चांगले बदल घडू शकतात याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, राहुल जाधव त्याचं नाव. काही वर्षांपूर्वी राहुल आमच्याकडे झाला तेव्हा त्यांना दारू बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचं सुद्धा व्यसन होतं. तो मुंबईचा होता… डोंबिवलीला रहाणारा होता. मुंबईच्या गॅंगवॉरबद्दल ऐकलं असेल तर त्या तो गॅंग मध्ये होता. गणपती वगैरे आले की त्यामुळे जी काही नोकरी मिळेल ती पण त्याची नोकरी जायची. फ्रस्ट्रेशन प्रचंड वाढत होतं, चिडचिड वाढत होती. राहुल म्हणाला की, ‘मी एवढ्या जोरात पळतो पोलीस कायम माझ्या मागे असले तरी मी धूम ठोकायचो. ‘ त्या त्याच्या पाळण्याच्या गुणामुळेच फुल मॅरेथॉन मध्ये पळायचं त्याचं एक स्वप्न होतं. जेव्हा त्यानं ती पूर्ण केली आणि तो त्या पोलीस स्टेशनला गेला, जिथे त्याला कायम हजेरी द्यायला जायला लागायचं आणि अपमान वगैरे केले जायचा. तिथे तो ते मेडल आणि फोटो घेऊन जेव्हा गेला तेव्हा त्या पोलिसांनी त्याला सॅल्यूट ठोकला. तेव्हा राहुल खूप बरं वाटलं, आनंद झाला. रोज तो 50 किलोमीटर पेक्षा जास्त पळत असतो. कोविडच्या आधीच्या वर्षांमध्ये मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून ते थेट दिल्लीच्या इंडिया गेट पर्यंतचे अंतर त्याने 21 दिवसांमध्ये कापलं. मुंबई ते दिल्ली पळताना तो वाटेतल्या सर्व गावांमधील व्यसनमुक्ती केंद्रांना भेट देत गेला. तिथे त्याने मोटिवेशनल लेक्चर्स दिली. आता राहुल आमच्याकडेच काम करतो. त्याचे लग्न झालेय. राहुलवर आता एक वेब सिरीज येणारेय. आमच्याकडे अशी हजारो उदाहरणे आहेत की व्यसन सोडल्यानंतर त्यांचं आयुष्य किती चांगलं बदललंय. एवढेच करायला लागतं की त्यांना काहीतरी दुसरं एक चांगलं काम करण्याच्या मार्गाची ओळख करून द्यायला लागते. त्याची ओळख झाल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून जातं.

असं असलं तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यसनाधीनता हा प्रश्न तर वाढतो आहे. पण आपण त्याचा प्रतिबंध कसा करायचा, प्रिव्हेन्शन कसं करायचं याचे उपाय सुद्धा आपल्या हातात आहेत. आपण पालक म्हणून, कोणी शिक्षक असा, तुमच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असाल, आपल्या प्रत्येकाला जे जे शक्य आहे असा प्रत्येकजण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. जे आपल्या सहवासात येतात त्यांच्याशी संवाद साधून त्यांना व्यसनातून बाहेर पडायला आपण मदत नक्कीच करू शकतो. आज मला खूप आनंद होतोय की या कार्यक्रमाला या भागातले खूपसे :मुक्तांगण मित्र’ सुद्धा इथे उपस्थित आहेत. इथे सांगली भागामध्ये कोणालाही असं वाटलं की कोणाला व्यसनाची समस्या आहे तर इथल्या मित्रांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर मला खूप छान वाटतंय एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण खूप छान आणि शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. हा माझा खूप मोठा सन्मान आहे की हा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.

— समाप्त —

संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 698 ⇒ घराना ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “घराना।)

?अभी अभी # 698 ⇒ घराना ? श्री प्रदीप शर्मा  ?

मेरा नाम राजू, घराना अनाम, बहती है गंगा,

जहां मेरा धाम …

लेकिन सभी जानते हैं, कपूर खानदान के इस चिराग का भी एक सेमी क्लासिकल फिल्म संगीत का घराना था, जिसमें शंकर जयकिशन, शैलेंद्र हसरत और मुकेश ने मिलकर जो गीतों की बरसात शुरू की थी, उसने मेरा नाम जोकर तक थकने का नाम नहीं लिया था। और जहां तक नाम का सवाल है, तो पृथ्वी थिएटर से शुरू इस कपूर परिवार के अभिनय का करिश्मा आज भी कायम है।

घराना गर्व और गौरव का विषय है, अच्छे घराने की बहू के लिए ही गृह लक्ष्मी जैसे विशेषणों का प्रयोग किया जाता था। राजघरानों में आज हम भले ही केवल होलकर और सिंधिया राजघरानों तक ही सिमटकर रह गए हों, लेकिन शास्त्रीय संगीत के घरानों की बात तो कुछ और ही है।।

नृत्य और संगीत हमें स्वर्ग की नहीं, गंधर्व लोक की देन हैं, सवाई गंधर्व और कुमार गंधर्व इनके प्रत्यक्ष प्रमाण हैं। आप मानें या ना मानें, संगीत के घरानों और राजघरानों का आपसी संबंध बहुत पुराना है। आइए कुछ संगीत घरानों की चर्चा करें।

भारतीय शास्त्रीय संगीत और नृत्य की वह परंपरा है जो एक ही श्रेणी की कला को कुछ विशेषताओं के कारण दो या अनेक उप श्रेणियों में बाँटती है।।

घराना (परिवार, कुटुंब), हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत की विशिष्ट शैली है, क्योंकि हिंदुस्तानी संगीत बहुत विशाल भौगोलिक क्षेत्र में विस्तृत है, कालांतर में इसमें अनेक भाषाई तथा शैलीगत बदलाव आए हैं। घराना शब्द हिंदी शब्द ‘घर’ से आया है जिसका अर्थ है ‘घर’। यह आमतौर पर उस स्थान को संदर्भित करता है जहां संगीत विचारधारा की उत्पत्ति हुई; उदाहरण के लिए, ख्याल गायन के लिए प्रसिद्ध कुछ घराने हैं: दिल्ली, आगरा, ग्वालियर, इंदौर, अतरौली-जयपुर, किराना और पटियाला।

इसके अलावा शास्त्रीय संगीत की गुरु-शिष्य परंपरा में प्रत्येक गुरु व उस्ताद अपने हाव-भाव अपने शिष्यों की जमात को देता जाता है। घराना किसी क्षेत्र विशेष का प्रतीक होने के अलावा, व्यक्तिगत आदतों की पहचान बन गया है, यह परंपरा ज़्यादातर संगीत शिक्षा के पारंपरिक तरीके तथा संचार सुविधाओं के अभाव के कारण फली-फूली, क्योंकि इन परिस्थितियों में शिष्यों की पहुँच संगीत की अन्य शैलियों तक बन नहीं पाती थी।

हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत के गायन के लिये प्रसिद्ध घरानों में से निम्न घराने शामिल होते हैं: आगरा, ग्वालियर, इंदौर, जयपुर, किराना, और पटियाला।

सबसे पुराना ग्वालियर घराना है। तानसेन भी ग्वालियर से ही आए थे। हस्सू हद्दू खाँ के दादा नत्थन पीरबख्श को इस घराने का जन्मदाता कहा जाता है। दिल्ली के राजा ने इनको अपने पास बुला लिया था।।

जरा इन गायकों और उनके घरानों पर भी गौर कर लिया जाए ;

१. मेवाती घराना – पंडित जसराज

२.पटियाला घराना – उस्ताद बड़े गुलाम अली खां, बेगम अख्तर, निर्मला देवी और परवीन सुल्ताना

३. जयपुर अंतरौली घराना – मल्लिकार्जुन मंसूर, किशोरी अमोनकर और अश्विनी भिड़े।

४. किराना घराना – भीमसेन जोशी 

५. आगरा घराना – जितेंद्र अभिषेकी

इन घरानों की शुद्धता, मर्यादा और अनुशासन का पालन शिष्यों को भी करना पड़ता है। गुरु शिष्य परम्परा यूं ही फलीभूत नहीं होती।

ना मिलावट ना खोट यही शास्त्रीय संगीत की पहचान है। एक भी सुर गलत नहीं।

धारवाड़, कर्नाटक से आए, घराने की बंदिश से अपने को मुक्त रखते हुए, लोक संगीत को शास्त्रीय संगीत की ऊंचाईयों तक पहुंचाने वाले कुमार गंधर्व स्वयं अपने आपमें एक घराना हैं।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी

चांगदेव पासष्टी वाचली. चांगदेवानी संत ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवले. त्याचे उत्तर म्हणून संत ज्ञानेश्वरानी त्याच कागदावर ६५ ओव्या लिहून चांगदेवाना पाठविल्या. ६५ ओव्यात केलेला आत्मबोध म्हणून चांगदेव पासष्टी. यावरून पत्र या प्रकाराविषयी मनात कुतुहून निर्माण झाले. पत्र म्हटलं की एक ठराविक साचा डोळ्यासमोर येतो. सुरुवातीला मायना, मध्ये मजकूर व शेवट समारोपाचे शब्द व लिहिणाऱ्याचे नाव किंवा सही. पण येथे तर कोरे पत्र. मला वाटते भारताच्या इतिहासातले हे एकमेव कोरे पत्र असावे. आणि त्याच कागदावर त्याला संत ज्ञानेश्वर उत्तरही पाठवतात. ये हृदयीचे ते हृदय घातले असा हा उपदेश. ‘तत् त्वं असि’. जगातले अक्षर वाङ्मय ठरला. येथे चांगदेवानी कोरे पत्र पाठवून आपली योग्यता सिद्ध केली आहे. कोरेपण म्हणजे रितेपण, स्वच्छपणा, निरहंकारता आणि ज्ञानग्रहण क्षमता. हा पत्रातील नि:शब्द भाव संत ज्ञानेश्वरानी ओळखला आणि म्हणून त्यावर ज्ञानाची अक्षरे उठली.

दुसरे पत्र डोळ्यासमोर येते ते रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेले पत्र. श्रीकृष्णाच्या रूपागुणाचे, सामर्थ्याचे, कर्तुत्वाचे वर्णन करणारे आणि श्रीकृष्णांबरोबर विवाहाची तीव्र इच्छा व्यक्त करणारे प्रेमपत्रच हे. रुक्मिणीने सात श्लोकात लिहून एका ब्राह्मण सेवकाबरोबर पाठवूण दिले आणि त्वरीत उत्तराची अपेक्षा ही व्यक्त केली. कारण घरातल्यांनी शिशुपाला बरोबर लग्न ठरवले होते. गडबड सुरू होती. ‘कुठून व कसे माझे हरण करा’ हे कळवणारे मोठ्या चातुर्यांना दिलेले उत्कट श्रीकृष्ण प्रेम व्यक्त करणारे हे पत्र. इतके की श्रीकृष्ण उत्तराच्या फंदात न पडता लगेच सैन्य घेऊन कौडिण्यपूरला निघाले. मोठे युद्ध करून रुक्मिणीचे हरण केले. पुढे विवाह झाला. असे हे कौंडिंण्यपूरहून द्वारकेपर्यंत आलेले पत्र.

आणखी आठवतो तो समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यामधील पत्रव्यवहार. गुरुशिष्यांमधील हा पत्र व्यवहार. ‘ निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ अशी सुरुवात असलेल्या पंधरा ओव्यातील हे पत्र. हे मराठी पत्र साहित्याचे भूषण असेच आहे. शिवाजी महाराजांचा यथार्थ गौरव त्यात समर्थ करतात. राजकर्तव्य, परमार्थ उपदेश आणि हे राज्य ‘श्रीं’ चे आहे ही जाणीवही दिली आहे. स्वराज्याची प्रेरणा दिली.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १६८१ मध्ये संभाजी राजांना हृदय पिळवटून टाकणारे ओवीबद्ध पत्र समर्थांनी लिहिले. ‘उग्र स्थिती सांडावी, सौम्य स्थिती धरावी’, अशा शब्दात शिवरायांकडून प्राप्त झालेल्या श्रेष्ठ वारशाची त्यांना आठवण करून दिली. संभाजी महाराजांच्या वर्तनाने स्वराज्याला हादरा बसणार की काय या घोर चिंतेने व्याकुळ झालेल्या विरागी संताचे ते पत्र. त्यावरून त्यावेळच्या खरा इतिहास कळतो.

अशाप्रकारे पत्र हा एक वाङ्मय प्रकार आहे. त्यात वैविध्य आहे मुख्यत: याचे दोन प्रकार दिसतात, औपचारिक व अनौपचारिक. औपचारिक म्हणजे संस्थात्मक, कार्यालयीन कामकाजाविषयी, ठराविक पद्धतीने लिहिलेली आणि अनौपचारिक ही घरगुती, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, जवळच्या संबंधितांना लिहिलेली. अनौपचारिक पत्रे प्रेम आणि भावना व्यक्त करतात. पत्र हे संदेश कळविण्याचं एकमेव साधन त्यांकाळी होते.

इंग्रजांच्या काळात भारतात पत्र वाटण्याची पोस्टाची सुनियोजित पद्धत सुरू झाली. तीच सध्या ही प्रचलित आहे. यापूर्वी माणसांबरोबर तर कधी घोडेस्वारांबरोबर लखोट्यात घालून पत्रे पाठविली जात. पक्षांबरोबर पत्रे पाठवल्याचे उल्लेखही आढळतात. हे सर्व त्रासाचे होते. पण आता वाहनांच्या सोयीमुळे पोस्टाचे पत्र वाटण्याचे काम सुलभ झाले आहे. खेडोपाड्यापर्यंत पत्राद्वारे संपर्क साधता येतो.

अनौपचारिक पत्राला विषयाचे बंधन नाही. लिहिणारा आणि वाचणारा दोघांचे हृदय त्यात ओतलेले असते. त्यामुळे कधी आनंद तर कधी दुःख. हळूहळू या पत्राना साहित्याचे रूप आले. साने गुरुजींची श्यामची पत्रे, सुधेस पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. कवी अनिल व कुसुमावती देशपांडे यांच्यामधील पत्र व्यवहारांचे संकलन झाले. नेहरूंचे इंदिरेस पत्रे प्रसिद्ध आहेत. विनोबांची पत्रे पुस्तक आहे. तसेच रवींद्रनाथ टागोर, चिपळूणकर, कर्वे, आंबेडकर, लक्ष्मीबाई टिळक इत्यादी मोठ मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या पत्रांचे खंड प्रसिद्ध झाले आहेत. वर्तमानपत्रातही वाचकांची पत्रे’ असे एक सदर असते. एकंदरीत पत्र लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पत्रात उमटते. पु. ल. देशपांडे यांची बोलकी पत्रे अपूर्वाई व पुर्वरंग मध्ये आहेत.

आता e mail, whatsapp यामुळे पारंपरिक पत्र पद्धत लोप पावल्यात जमा झाली आहे. पत्रांना दोन-चार ओळीचे स्वरूप आले. भावभावनांचे काम emojis करतात. मुले ‘आईचे पत्र हरवले. ते मला सापडले’ असा खेळ खेळत तोही काळाच्या पडद्याआड गेला. पत्र ज्या वर लिहितात ती पोस्टाची कार्डे, आंतर्देशीय, पाकिटे ही ही पुराण वस्तू म्हणून म्युझियममध्ये बघावी लागतील. ‘हाय पत्रा तुझी कहाणी! ‘

 ©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण…आई.. – भाग – ४४/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण…आई.. – भाग – ४४/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले. मातृत्व या शब्दाची, या व्याख्येची, भावनेची खरी व्याप्ती आणि जाणीव तेव्हाच झाली जेव्हा मी स्वतः आई झाले. तेव्हा कळलं “माता अनंताची” म्हणजे नक्की काय? मुलांना जन्म दिला की आई ही पदवी जरूर मिळते पण आईपण म्हणजे केवळ मुलाला जन्म देण्यापुरतंच नसून ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक संगोपनात, जडणघडणीत, त्यास सुविचारी, संस्कारी करण्यात सामावलेलं असतं आणि ही आयुष्यभराची अखंड विस्तृत प्रणाली आहे. असं आईपण निभावताना जेव्हा जेव्हा माझी दमछाक झाली तेव्हा तेव्हा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात हेच उद्गार घुमले, ” आई! तू कसं केलंस गं? मला तर दोनच मुली आहेत. तू आम्हा पाचही बहिणींचं काटेकोरपणे संगोपन कसं केलस? आमची आजारपणं, रात्रीची जागरणं, आमच्या आवडीनिवडी, खाणंपिणं, वेण्याफण्या सतत आमच्यासाठी.. अगदी अंतर्वस्त्रांपासून ते सुंदर डिझायनर्स पोशाख शिवणे प्राथमिक वर्गातला अभ्यास घेणे, शाळेत जाताना आमचं दप्तर भरणं, मधल्या सुट्टीतला डबा देणं, त्यानंतरही आमच्या उमलत्या वयातले मूडस, शैक्षणिक टप्पे, प्रेमप्रकरणं, लग्नं, बाळंतपणं एक ना अनेक. तुझ्या या अफाट कार्याची यादी सुद्धा करणे मला जमणार नाही. प्रत्येक वयाचे टप्पे ओलांडताना तू आमच्याबरोबर खंबीरपणे असायचीस, डोळसपणे, जाणीवपूर्वक असायचीस म्हणूनच आमच्या जीवनातील अनेक वेगवेगळी वळणं आम्ही सहजपणे पार करू शकलो. तेव्हा मी तुला केवळ गृहीत धरले. आईपणा व्यतिरिक्त तुझ्यात असलेलं एक निराळं व्यक्तिमत्व आम्हाला तेव्हा ना कळलं ना कळून घेण्याची आम्हाला गरज वाटली. एक व्यक्ती म्हणून आयुष्याबद्दल तुझी काही निराळी कल्पना, विचार होते का हा कधी विचारही आम्ही केला नाही.”

आता उपकृत भावनेने जेव्हा मी आईचा विचार करते तेव्हा ती वेगवेगळ्या अनेक रूपात उलगडत जाते.

खरं म्हणजे विसाव्या शतकातला पूर्वार्ध म्हणजे १९२०/२१ चा काळ एकंदरच खूप वेगळा होता. विशेषतः स्त्रियांसाठी. त्या काळात आई ग्रँटरोडच्या “सेंट कोलंबस” या कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी होती. तिला मराठी सोबत इंग्रजीचेही उत्तम ज्ञान होते. शिवाय मुंबईसारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण नगरीत तिचे बालपण गेले. आजोबांची शिस्त, टापटीप आणि काहीसं पाश्चात्त्य पद्धतीचं वळण तिच्या नसानसात भिनलेलं होतं त्या तुलनेत, आईचं पप्पांशी लग्न झाल्यानंतरचं वातावरण खूप वेगळं होतं. ठाण्याच्या धोबी गल्लीतल्या, फारशा सुविधा नसलेल्या एकमजली घरात आणि ज्या घरात माझ्या आजीचा प्रभाव होता तिथे तिने स्वतःला कसे सामावून घेतले असेल? सुरुवातीला तर त्या घरात इलेक्ट्रिसिटी नव्हती, स्वयंपाकासाठी चूल होती, शेगडी होती. माझ्या आठवणीत चुलीवर गरमागरम भाकऱ्या करणारी आई अजूनही आहे. ज्या बोटांनी आईने अनेक सुंदर पेंटिंग्स केली होती, कित्येक विणकामं, भरतकामं केली होती त्याच हाताने चुलीतली लाकडं पेटवून अथवा सांजवेळी रात्र होण्याच्या आत कंदीलाच्या काचा पुसून घासलेट भरून वाती पेटवताना तिला कधी वैषम्य वाटले असेल का? की त्यावेळी आजूबाजूच्या बहुतांश स्त्रियांचे आयुष्य असेच होते…? “रांधा वाढा उष्टी काढा” याच समूहातले मग आपल्या आईने वेगळा सूर का लावला नाही हा विचार बालपणीतरी आमच्या मनात येण्याचा संभवच नव्हता आणि तिने जर वेगळा सूर लावला असता तर आमच्या आयुष्याचं काय झालं असतं या विचाराने आता माझ्या अंगावर काटा सरसरतो तेव्हा मातृत्वाची खरी व्याख्याही कळते.

वास्तविक त्या काळातही ती रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी करत होती. जात्याच ती खूप हुशार आणि मेहनती होतीच. मनात आणलं असतं तर तिने तिथे विशेष कामगिरी करून उच्चपदी पोहोचून स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य, ओळख आणि अस्तित्व मिळवलं असतं पण आमच्या जडणघडणीचं एक महत्त्वाचं “जूं” जणू तिच्या मानेवर तिनं पेललं आणि या सर्व स्वकेंद्रित जाणिवांतून ती सहजपणे बाहेर पडली.

“आई! खूप वेळा आणि या क्षणी मला एक अपराधी भावना स्पर्शून जाते. आमच्या संपूर्ण जडणघडणीवर पप्पांच्या विद्वत्तेचा, शिकवणीचा, त्यांच्या नाना प्रकारच्या आवडी आणि रसिकतेचा पगडा निश्चितच आहे. तसेच जिजी म्हणजे आमची आजी.. जिच्या मायेच्या अखंड प्रवाहाची शीतलता आम्ही आयुष्यभर अनुभवली आणि नकळत का होईना आमच्या मनी सतत जिजी आणि पप्पांच्याच आठवणी सहजपणे येत असतात पण खरं म्हणजे जिजी आणि पप्पा आमच्यासाठी संरक्षक भिंती होत्या तर तू आमचं छत होतीस.”

आईला जेव्हा मी निराळेपणाने पाहते तेव्हा जाणवते ती आईची मुळातली सौंदर्यदृष्टी. जिजी आणि पप्पांच्या मधली आई एक व्यक्ती म्हणून फार वेगळी होती. त्याचं कारण तिच्या जडणघडणीची पार्श्वभूमीच निराळी होती. तरीही तिने कधीही कसलाही अहंकार बाळगला नाही. सासू म्हणून तिने जिजीला आणि पती म्हणून पप्पांचा तिने सतत मान राखला आणि समांतरपणे तिने तिची शिस्त, टापटीप, स्वच्छता, घर अडचणीचं असलं तरी कसं सुंदर राखावं याचे धडे नकळत आम्हाला गिरवायला लावले.

“आई रागवेल, आई ओरडेल आईला हे आवडणार नाही” हे भय आम्हाला अनेकदा जिजीच्या कुशीत शिरायला लावायचं पण आईच्या धाकदपटशाने आमच्या आत, कुठेतरी सैरावैरा मोकाट वाढलेलं गवत माळ्याने कात्रून छान आकार द्यावा तसा आकार आम्हाला नक्कीच मिळवून दिला. आईच्या प्रेमाची आणि जिजीच्या मायेची जातच वेगळी होती आणि आज मी या दोघांचं महत्त्व जाणते कारण मी एक आई आणि एक आजी याचा भिन्नपणे या दोन्ही भूमिका जगताना विचार करू शकते. आई आईच असते आणि आजी आजीच असते. दोघीही फक्त प्रेमच करतात पण दोघींच्या प्रेमाचे रंग वेगळे असतात.

सुट्टीच्या दिवसात आई आम्हाला विणकाम, भरतकाम, पेंटिंग्स करायला शिकवायची. एकदा मी विणलेली एक कलाकृती पाहून ती मला म्हणाली, ” हे काय असं विणून ठेवलेस? किती सैल आहे ते? सुईवरचे टाके घट्ट टाकले की वीणही घट्ट होते. मग टाके असे सुटत नाहीत. सारं उसवून पुन्हा विणायला घे. ” आईचं हे सहजपणे उच्चारलेलं वाक्य माझ्यासाठी कायम ब्रह्मवाक्य ठरलं. आयुष्यातली अनेक नाती जपताना माझी जेव्हा जेव्हा होरपळ झाली तेव्हा आईचे हे शब्द नेहमीच कानी राहिले. नात्यांची वीण कशी घट्ट ठेवावी याची महान शिकवण आईने आम्हाला वेळोवेळी दिली ती तिच्या वागण्यातूनही. तिने सासरची माहेरची सगळी नाती प्रेमपूर्वक आणि कर्तव्य बुद्धीने सुद्धा जपली.

आईच्या आणि जिजीच्या नात्यातला घट्टपणा आणि ठिसूळपणा दोन्हीही गंमतीदार होता. जिजीने आईवर आणि आईने जिजीवर मनापासून प्रेमच केलं. दोघींच्यात मतभेद होत, खटके उडत पण आईला कधी कुठून घरी परतायला उशीर झाला तर जिजी लगेच देव पाण्यात ठेवायची. ” का गं? मालू रस्ता तर चुकली नसेल ना? ” असं सतत आम्हाला विचारत राहायची. आईच्या बाबतीत ते खरंही होतं. आईला कधी कधी पटकन रस्ते समजायचे नाहीत. एकदा तर ती “ढग्यांचं घर कुठे आहे? ”… तेव्हा आम्ही नुकतेच नवीन घरात राहायला गेलो होतो.. असं विचारत घरी पोहचली होती. हा विनोदाचा भाग वगळला तरी जिजीला आई विषयी वाटणारी काळजी विलक्षण होती. आईला ही जिजीचं कितीही पटलं नाही तरी तिने जिजीच्या मनाविरुद्ध किंवा तिला विचारल्याशिवाय कधीही काहीही केले नाही. या पाठीमागे आईच्या मनात जिजीविषयी एक कृतज्ञतेचा भाव नक्कीच होता. वयाच्या सोळाव्या वर्षी वैधव्य आलेल्या या स्त्रीने एक तपस्विनीची भूमिका अंगीकारून चार महिन्याच्या तिच्या मुलाला एक परिपूर्ण जीवन बहाल केले होते आणि आज जे काही आम्ही सारे आहोत ते केवळ तिच्यामुळेच ही भावना आईच्या मनातून कधीही पुसली गेली नाही. नकळत आईने एक प्रकारचा सगळ्यांना जोडून राहण्याचा, समजून घेण्याचा संस्कार आम्हाला दिला. पप्पांची सगळी जीवाभावाची नाती तिने त्याच आंतरिक भावनेने जपली. आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय. ”

– क्रमशः भाग ४४ / १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-३ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-३ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

आपल्याला वाटते की फक्त पुरुषांमध्ये व्यसनाचा प्रॉब्लेम असतो. पण आता असं राहिलेलं नाहीये. आता महिलांमध्येसुद्धा हा प्रश्न खूप वाढायला लागलेला आहे. मी जेव्हा मुक्तांगण मध्ये काम करायला लागले… 1994 साली छोट्या छोट्या कामाची माझ्या आईने माझ्यावर जबाबदारी दिली होती. त्यात एक जबाबदारी अशी दिली होती की, जे विद्यार्थी येतात त्यांना दारू आणि ड्रग्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सगळी माहिती द्यायची. त्यांच्याशी बोलायचं, त्यांना कम्फर्टेबल करायचं, वगैरे. आमच्याकडे तेव्हा स्वीडनहून काही विद्यार्थी प्रशिक्षणासाठी आलेले होते. मी त्यांना सगळं दाखवलं. त्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला की, ‘आत्ता जे तू सगळं दाखवलं तर ह्याच्यात आम्हाला सगळे पुरुष पेशंट दिसले. बायका कुठे आहेत? बायकांना तुम्ही कुठे ठेवता? ‘ तर 94 साली मला या प्रश्नाचं एकदमच आश्चर्य वाटलं. मी म्हटलं की, ‘नाही आमच्या देशात बायका व्यसन करत नाहीत. म्हणून फक्त पुरुषच आमच्याकडे असतात. तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं; पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. आमच्याकडे महिलासुद्धा रुग्ण म्हणून हळूहळू यायला लागल्या. मग 2009 साली आम्हाला एक वेगळं काम महिलांसाठी सुरू करायला लागलं. तेव्हा असं झालं की, जेव्हा पेपरमध्ये आलं की मुक्तांगणमध्ये असं महिलांसाठीच केंद्र सुरू होतंय तर खूप लोकांनी लगेच अभिनंदनाचे फोन केले. आम्ही तेव्हा सांगितलं की, ‘प्लीज, आमचा अभिनंदन करू नका. आम्हाला खूप वाईट वाटतंय की आपल्याला महिलांसाठी असं काहीतरी काम… व्यसनमुक्तीचं काम सुरू करायची वेळ येतेय. ‘ एकंदरीत काय तर महिलांमध्येसुद्धा हा प्रॉब्लेम वाढतोय. महिलांमध्ये झोपेच्या औषधांचं खूप प्रमाण आहे. पेन किलरच्या गोळ्या खाणं तर सगळ्या वयोगटांमध्ये दिसतेय. लहान मुलींमध्ये जर का बघितलं तर दारूचं व्यसन आहे. झोपेची औषधं हे जे दुसरं कारण आहे ते महिलांच्या बदलत्या मानसिकतेमध्ये आहे. पूर्वी एखाद्या महिलेला समजा काहीतरी खूप निराश वाटतंय, दुःख होतंय, तर ती काय करायची की रडून मन मोकळं करायची. कोणाकडे तरी जाऊन बोलायची. बोललं की बरं वाटायचं. रडलं की बरं वाटायचं. पण आम्ही आमच्या रुग्णमैत्रिणींशी जेव्हा बोलतो तेव्हा असं दिसतं की, आता रडता कामा नये. मी आता स्ट्रॉंग आहे, तर मी रडता कामा नये किंवा माझे दुःख मी दोन लोकांशी बोलले तर लोकांना काय वाटेल आणि म्हणून ते बोललं जात नाही. आपले प्रॉब्लेम्स हे मनातच साठवून ठेवले जातात. मग जेव्हा ते मोठ्या प्रमाणात मनात साठवले जातात तेव्हा त्याचा खूप कोंडमारा होतो. परिणामी व्यसन करणे वगैरे अशा चुकीच्या गोष्टी सुरू होतात. म्हणून जेव्हा महिलांसाठी खास करून आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतो, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा मी त्यांना आवर्जून सांगते की जेव्हा काही प्रॉब्लेम येईल तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलून मोकळ्या व्हा. इथेही मला सगळ्यांना सांगायचे आहे की, जेव्हा आपल्याला काही टेन्शन येतं तेव्हा पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे तर कोणाला तरी विश्वासात घेऊन ते सांगितलं पाहिजे, रडलं पाहिजे. आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अधून मधून रडणं खूप चांगली गोष्ट आहे.

आधुनिक व्यसनामध्ये आणखी एक वाईट गोष्ट वाढीस लागली आहे ती म्हणजे ऑनलाईन जुगार. त्याचबरोबर पॉर्नोग्राफीचं व्यसनही आजकाल खूप वाढतंय. व्हिडीओ गेम्स खेळले जातात. सोशल मीडियामधील वर्तनात्मक व्यसनाचं प्रमाण आता लोकांमध्ये खूप वाढते. सुरुवातीला आम्ही बघायचो की हे प्रमाण तरुण मुलामुलींमध्ये जास्ती असायचं. पण अलीकडे सगळं सर्व वयोगटांमध्ये हे व्यसन वाढायला लागले आहे. याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. एकदा असं झालं… 2009-10 च्या आसपासची गोष्ट असेल. एक वडील आमच्याकडे आले आणि ते म्हणाले, ‘माझ्या मुलाला ऍडमिट करा. त्याला व्यसन लागले आहे. ‘ मग आम्ही विचारले की कसलं? तर ते म्हणाले की, त्याला कम्प्युटरचे व्यसन लागलेय. त्यावर आम्ही म्हटलं की, ‘तो काही दारू पीत नाहीये, सिगरेट ओढत नाही की तंबाखूही खात नाही. यापैकी तो काहीच करत नाहीये. कॉम्प्युटर वगैरे असं काही व्यसन नसतं. म्हणून त्यावर आम्ही उपचार वगैरे करत नाही. ‘ पण त्या वडिलांनी आम्हाला जेव्हा तपशीलात जाऊन तो काय करतो याची हकीकत सांगितली तेव्हा आमच्या लक्षात आलं की, होss, याला पण व्यसनच म्हणायला हवे. पुढे ते असं म्हणाले की, ‘त्याला टेक्नॉलॉजीची खूप आवड होती. म्हणून कॉलेजमध्ये गेल्यावर कम्प्युटर घेऊन दिला. मग त्याला तेच वेड लागलं. सारखं तो तेच करत बसायचा. रात्रंदिवस त्याचं ते चालायचं. ज्युनिअर कॉलेजमध्ये असतांना त्यांना कॉलेजमध्ये बोलावण्यात आलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तो परीक्षेला जात नाही. कारण अभ्यासच करत नाहीये. लेक्चर्स अटेंड करत नाहीये. सारखं त्याचं तेच कॉम्प्युटर कॉम्प्युटर चाललेलं आहे. मग आमच्याही लक्षात आलं की, जसं दारू किंवा ड्रगचं व्यसन असतं तसंच कॉम्प्युटरचंही. व्यसनी व्यक्तीला दारू किंवा ड्रग्ज मिळाले नाही तर त्या व्यक्तीला त्रास होतो. तसेच या मुलाच्या बाबतीत पण होत होतं. आई-वडिलांनी ते त्याच्याकडून काढून घेऊन सगळं बंद केलं. पण असं जेव्हा केलं तेव्हा त्याने प्रचंड थयथयाट केला. तो अगदी अस्वस्थ झाला. झोप न येण्याचा त्याला प्रचंड त्रास सुरू झाला. याला मानसिक आजार म्हणायचं. कारण जसं व्यसन मिळालं नाही तर सतत त्याची तल्लफ येते, क्रेविंग येत राहते, तसंच या मुलाला कॉम्प्युटरचं तीव्र आकर्षण निर्माण झालं होतं.

एवढं सगळं आमच्या लक्षात आल्यावर आम्ही त्या मुलाला ऍडमिट केलं. ती आमची पहिली केस होती… म्हणजे ‘इंटरनेट एडिक्शन डिसऑर्डर’ची… IAD ची. मी जेव्हा याचा अभ्यास केला. आम्ही इंटरनेटवर त्याची माहिती घेऊ लागलो. तेव्हा आम्ही सगळे सहकारी एकमेकांना चिडवायचो की, एका इंटरनेट एडिक्शनच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच इंटरनेटवरनं त्याची माहिती घ्यावी लागतेय. आमच्या लक्षात आलं की अमेरिका, चीन, कोरियामध्ये हे व्यसन खूप पसरलेलं आहे. आम्ही त्याच्यासंबंधी अशा अनेक केसेस वाचल्या. खरं तर तेव्हा मला असं वाटलं होतं की आपल्या देशात एवढ्या टोकाला नाही जाणार. पण बऱ्यापैकी टोकाला जाणाऱ्या केसेस आम्ही बघत असतो. दरम्यान एक आई-वडील आमच्याकडे आले. ते प्रचंड घाबरलेले होते. ‘आमच्या मुलाला लगेच तुम्ही ऍडमिट करून घ्या. ‘ त्यांनी असं सांगितलं की त्यांचा मुलगा आई-बाबा रात्री झोपायला गेले की, तो मुलगा कम्प्युटरवर टक लावून बघत गेम खेळत बसायचा. आपण सगळेच झोपताना मुलांना सांगतो ना की झोपा आता, जास्ती वेळ कॉम्प्युटरवर गेम खेळत बसू नका, तसं त्यांनी त्याला सूचना दिल्या आणि झोपायला गेले. सकाळी जेव्हा आईबाबा उठले आणि मुलाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी बघितलं की, अजूनही तो मुलगा असच कॉम्प्युटरकडे टक लावून लावून बघतोय आणि गेम खेळतोय. त्या मुलाने युरीन पास केलीये, हे त्या मुलाला कळलं पण नाहीये, इतका तो त्याच्यामध्ये गुंतला गेला होता. ते पाहून त्याचे आई-वडील इतके घाबरले की ते लगेच आमच्या मागे लागले…. आमच्या मुलाला लगेच तुम्ही ऍडमिट करून घ्या.

तसंच ऑनलाईन जुगारबद्दल. आयपीएलच्या वेळेला वाचत असाल तुम्ही ते ड्रीम इलेव्हन आणि काय काय! ऑनलाइन रमी आणि काय काय वेगवेगळे प्रकार असतात. एक उदाहरण सांगते, गरीब घरातला 21 वर्षांचा एक मुलगा आमच्याकडे आला होता. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा होता. त्याने ऑनलाईन जुगारात 67 लाख रुपये घालवले होते. मी नेहमी सगळ्यांना सांगते की, आपणच आपल्याला तपासून बघायचं की आपण व्यसनाधीन बनण्याच्या मार्गावरती आहोत का नाही ते… तुम्ही सगळ्यांनी घरी गेल्यानंतर गुगलवर एक टेस्ट शोधा. तिचे नाव आहे… IAT (इंटरनेट एडिक्शन टेस्ट) 20 प्रश्न आहेत फक्त. ते प्रश्न सोडवा आणि उत्तरावरून तुम्हालाच कळेल की तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आहारी किती गेला आहात ते.

इंटरनेट आहे म्हणून आपल्याला भरपूर माहिती मिळते. शॉपिंगपासून सगळ्या गोष्टी मॅनेज करणे आपल्याला शक्य झालं. त्याचा वापर आपण किती करायचा हे जर कळलं नाही तर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. आम्ही पालक सभेमध्ये वगैरे बोलतो किंवा पालक आणि मुलं एकत्र येतात तेव्हा याचं व्यसन लागू नये म्हणून आम्ही सगळ्यांनाच सुचवतो की, प्रत्येक घराने इंटरनेट वापराचे किंवा फोन वापरण्याचे नियम करायचे आणि ते नियम सगळ्यांनी पाळायचे. जे नियम मुलांना तेचं पालकांनासुद्धा आहेत. कारण काही पालकांच्या बाबतीत दिसून येते की ते मुलांना जे सांगतात तसे ते मात्र वागत नाहीत. त्याचं एक उदाहरण सांगते, एका आठ-नऊ वर्षाच्या मुलीला तिची आई घेऊन आली होती. ती मुलगी खूप फोन वगैरे वापरत होती. तर मी तिच्याशी जेव्हा बोलत होते तेव्हा मुलगी मला म्हणाली की, ‘तुम्ही आधी माझ्या आईला सांगा की ती रोज ऑफिसमधून आल्यानंतर टीव्ही बघत बसणार नाही. माझ्याशी बोलेल, खेळेल. संध्याकाळी मला सांगते की खाली खेळायला जा, पण ती मात्र मोबाईल घेऊन बघत बसलेली असते. तिला पण तुम्ही सांगा की, मी जर मोबाईल बघायचा नसेल तर तिने पण मोबाईल बघायला नको. ‘ म्हणून आम्ही आवर्जून सगळ्या पालकांना पण सांगतो की, तुम्ही पण हे नियम पाळायचे.

– भाग तिसरा.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हक्काचं ठिकाण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ हक्काचं ठिकाण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

“एक दोन तरी असायलाच हवीत हक्काची ठिकाणं.

“अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय? “

” काही नाही रे… “

” नाही कसं? काय झालंय? बोल ना.. “

आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं. एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं.

हेच.. हेच ते “हक्काचं_ठिकाण”.. My Happy Place!!

फक्त आठवून बघा अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत? मनाला उभारी, खराखुरा विसावा देणारी.. एक एक आठवत चला. एकदम फ्रेश वाटेल! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील. कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसलं जातं, भावासोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी.. तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा… sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं!

अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात. आई वडील तर खास हक्काचेच. त्याशिवाय मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण,

भावजय, दीर, नणंद, cousins, नातेवाईक.. कुणीही असू शकतं तुमचं हक्काचं ठिकाण, Your true Happy Place!

जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी! किंवा अगदी एखादा व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं!

निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं. मन हलकं हलकं होऊन जातं. अगदी मोरपिसासारखं! तिथे कुठलाच आडपडदा नसतो किंवा show-off ही नसतो. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतलं जातंच, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केलं जात नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत, मन मोकळं वाटतं.

“तुमको देखा, तो ये खयाल आया

जिंदगी धूप, तुम घना साया! “

ही हक्काची ठिकाणंही अगदी अशीच.. सावली देणारी, विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या जिवाला आणि मनाला! आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी. म्हणून जास्त विश्वास!

अशी हक्काची ठिकाणं अगदी जिवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त! ती हरवायला नकोत, आयुष्याच्या गडबडीत. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी.. म्हणूनच “तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं, ” हे त्यांना नक्की सांगायालाच हवं.

कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं, की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल, जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल? कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार?

आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं! नाही का?

“खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना जरूर शेअर करा आणि सांगा ‘खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत’! “

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

… (काहीवेळा नागराजाचं दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणीमात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो

चं साम्राज्य मुक्तपणे

नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!) …

आजूबाजूला साखर कारखाने असले तरी, बरीच गुऱ्हाळ गूळ करण्यात पटाईत.

गुऱ्हाळाच्या बाजूने जाताना त्याचं एक प्रकाराचा विशिष्ट वास येत होता. त्यांचं काम सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चालत होत. येणारा जाणारा उसाचा रस पिऊन तृप्त पणे ढेकर देत जातं होता. जाताना गरम गूळ व काकवी पण घेउन जातं असे. त्याला कोणताही मज्जाव नव्हताच.

तस दिस कासराभर वर सरकलेला. सुरव्या डोक्यावर आलेला. राबणारे हात पाय, मर्गळलेल्या अवस्थेत. अंगावर घामाच्या धारा, अंग काळ मेचकूट झालेलं. अंगावर अर्धी चड्डी आणि मांजरपाटाचे खोळ उर्फ बदामशर्ट कपडे पण रापलेले. कळकट झालेले.

सगळे राबणारे कष्टकरी, शेतकरीआपापल्या पाणवठ्यावर आली यथेच्छ मनसोक्त गार पाण्यात अंघोळ केली. अंग घासणीला चपटा दगड होताच. कोणी विहिरीत कोणी ओढ्यावर, कोणी शेतातील पंपावर. असं सगळे चांलेले.

अंघोळ होताच त्यांची पावलं तरतर आपापल्या पालाकडे वळली. त्यांच्या अंगात तर तरी आलेली. पोटात भूख लागलेली. केव्हा एकदा भाकर खाईन असं झालेलं.

कष्टकऱ्यांनी घरून आणलेली शिदोरी सोडलेली. काही जणांच्या बायका डोईवरून बुट्टीत जेवण बांधून आणलेलं. त्या पण आपल्या धन्यासोबत जेवण करत असतं. राबणारी गडी जेवण करून सुस्त होत. वाम कुक्षी साठी तिथंच झाडाखाली आडवे होत असतं.

काहीजण चंची सोडून सुपारीचे खांड तोंडात टाकीत, पानाचं देठ खुडून त्याला अंगठ्यानं चुना लावून तोंडाखाली दाबत असतं. त्यावर तंबाकूची चिमठ पण अलगद ओठा आड करत असतं. घटकाभर विश्रांती झाली की, परत ताजेतवाने होत अन कामाला लागतं असतं.

कोण भांगलण, कोण कोळपणी, कोण पाणी पाजण, अशी सगळी काम करत. इकडे त्यांच्या बायका पण जनावरांना चारायला सोडून घरात हातभार लावत असतं. काही बायका मळ्यातील माळवं तोडून आपली टोपली भरून घेत असतं. घरात थोडी ठेवून उरलेले माळवं बाजारात विकत असतं.

दिवस मावळत होता, तश्या सावल्या ही जरा लांबलचक पडत होत्या. दिवस मावळायला आला.

मावळतीला सप्तरंगाची उधळण चालू होतीच. हवेत गारठा जाणवू लागतं होताच.. पिवळा, नारंगी, निळा, केशरी, सूर्य एकदम मोठा लाल भडक दिसतं होता.

कातरवेळ, सांज वेळ जवळ येत होती. सूर्य मावळला. पक्ष्यांची गडबड चालू झाली. आपापल्या घराकडे परतण्यांची घाई सुरु होतीच. चित्र विचित्र आवाज असमंतात निघत होते. मध्येच पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ शिस्तबद्ध पण जरा वेगाने मावळतीकडे जातं होती. जणू शुभ्र फुलांचा हार घेउन रान देवतेला घालण्यासाठी निघाले होते. मध्येच खंड्या उच्च स्वरात निनादत होता. सुतार पक्ष्याची टकटक थांबलेली. एव्हाना सायंकाळ होऊन थंडी वाढलेली. तश्यातच कातरवेळ साधत काही तरुणाई अंधाराचा फायदा घेत, अडोश्याला गप्पा मारत दिल जमाई चालली होती. गुपचूप कारभार चालू होता.

तारांगण सजल होत. वट वाघूळ परत आडव्या तिडव्या रेषा काढत झाडात गप्प होत होती. घुबडाचा विशिष्ट आवाज भय कम्पित करत होता.

टिट्वीच्या केकटण्याने शांतता भन्ग करीत होत्या.

बरीच मंडळी आपल्या पांदीच्या रस्त्याने घर जवळ करीत होती. दोन्हीही कडच्या उंच झाडीत रातकीड्यांची सनई चालू होती. रस्त्याने जाणारी जनावरे त्यांच्या गळ्यातील वाजणारे घुंगुराचे आवाज लायबद्ध ध्वनीने रस्ता मोकळा करून देत होता. थंडीने आता धुक्याची चादर घातली होती. मोरांच्या केका परत साद देत होत्याच. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज गावची वेस आल्याचे साक्ष्य देत होता. गावात सगळीकडे दिवाबत्ती केल्याने धुसर लाल प्रकाश धुक्यात दिसतं होता. घरातील छपरातून धुराचे लोट चुली पेटल्याची खात्री होती. धूर आणि धुके यामुळे हवेत कुंद पणा जाणवत होताच.

जनावर आपापल्या जागी दावणीत गेली. मालकांनी त्यांना दोरखंडनी बांधलं.

पुढ्यात कडवळ ची वैरण टाकून दिली. काहीजण चरवीत पाणी घेउन धारा काढत बसलं. समोर पेंड ठेवली. आणि म्हसराच्या पाठीवर थाप मारून काचळ पाण्यानी धुवून घेतलं. दुधाची कासंडी भरताना चूळ चुळ आवाज घुमत होता. धारा काढून, घरी दूध ठेऊन, उरलेले दूध डेअरीत घालण्यासाठी मोर्चा वळवला. दूध घालून झाल्यावर चौकातल्या वडाच्या पारावर जोतो येऊन बसकण मारत होताच. गावातील अबाल वृद्ध आधीच येऊन बसलेली.

तस वडाचे झाड हे जणू त्यांना आधारवडच होता. वडाच झाड हे कित्येक वर्षांपासून त्यांचा आणि त्यांच्या सुख दुःखाचा सोबती होता. कित्येक गावच्या डोई ह्या वडानी पाहिल्या होत्या.

बरीच मंडळी जमली होती. त्यांच्या शिळोप्याच्या गप्पा टप्पा चालू होत्या. लहान मुले पण इकडून तिकडे हुंदडत होती. वडाच्या परंब्या धरून मूलं त्याला लोम्बकाळत होती.

कष्ट करून कामानी दमलेले हात चिलीम पेटवून आस्वाद घेत होती. चिलीम एका हातातून दुसऱ्या हातात फिरत होती.

कोण चंची सोडून पान तंबाकुची देवाण घेवाण करीत होती. कोण तंबाकूंचा बार भरून अंतराळी बोलत होता. वडाच्या झाडाला ही गम्मत नवी नव्हती. त्यालापण हा विरंगुळा वाटतं होता. त्यांच्या गप्पा तो कित्येक वर्षे ऐकत होताच.

एव्हाना थंडीची लाट वाढली होती. प्रत्येकजण आपल्या मनातील दुःख ओकत होता. हे सार पुराण पुरुष वड ऐकत होता. त्यालाही त्या गोष्टीची सवय झाली होती. वेळ होईल तस प्रत्येकाने आपापली घर जवळ केली. घरात आल्यावर दरवाजे पण बंद केले.

वड एकटाच थंडीत स्तब्ध राहिला होता. धुक्याची शालं त्यांनी पण पांघरली होती. त्यालाही एकटा राहायची सवय झालेली. उन्ह पाऊस, थंडी वारा, धुके, दिवस रात्री आणि चांदणं ह्याची त्यानं कधीच तक्रार केली नव्हती. गावच्या कित्येक पिढ्या त्यांनी बघितल्या पण पुराण पुरुषाने सगळ्यांना आश्रय दिला. आश्रय देण्यात तो धन्यता मानत होता. कित्येक पक्ष्यांची घरटी त्यानं अंगा खांद्यावर खेळवली. साप माकडासारखे प्राणी अंतकरणाने जवळ केले. तो पुराण पुरुष एकमेव सर्व घटनाचा साक्षीदार होता! आहे!!  आणि राहील!!! 

 – समाप्त –

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर

सध्या ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच भेडसावत असतो. टू व्हीलर वाले / फोर व्हीलर वाले जॅममधून सुटका करून घेण्याकरता नवनवीन पर्याय शोधत असतात. आणि बरोबरच आहे – म्हणतातच ‘necessity is the mother of invention’. सिग्नल तोडणे, उलटीकडून जाणे, स्पीड लिमिट न पाळणे, लेन तोडणे, या पर्यायांची संध्या चांगलीच चलती आहे. सगळ्यांच्या समोर एकच ध्येय असतं – मी कसा पुढे जाईन? इतरांशी या “मी” ला काहीही देणे घेणे नसते.

मध्यंतरी एक पर्याय पुढे आला आणि तो म्हणजे, फुटपाथवरून टू व्हीलर नेणे. थोडासा जरी ट्रॅफिक अडला, की, लगेच बाईकवाले भराभर बाजूच्या फुटपाथवर गाड्या चढवतात आणि वाटेल तेव्हा पुन्हा रोडवर येतात. फुटपाथवर ‘keep left’ किंवा ‘speed limit’ ही बंधने नसतात, त्यामुळे सगळेच आबादी – आबाद असते.

शहरांमध्ये आता बहुतेक रस्त्यांवर छान फुटपाथ केलेले आहेत. पण त्यावर चालणाऱ्यांपेक्षा, इतर लोकांचेच राज्य असते. त्यामुळे चालणारे फुटपाथवरून मार्ग शोधत शोधत पुढे जात असतात. चालणाऱ्यांना रस्ता क्रॉस करणे अशक्य झाले आहे, रस्त्यावर चालणे अशक्य आहेच, आणि फुटपाथवर पण चालायला जागा नाही, म्हणून म्हणतात, रस्त्यावरचा सगळ्यात बिचारा प्राणी म्हणजे चालणारी मंडळी.

आणि आता बाईकवाले फुटपाथवर आल्यामुळे, पायी चालणाऱ्यांची बिचारेपणाची लेव्हल अजूनच खालावली आहे. बिचारी मंडळी नेहेमीच वर बघतात आणि देवाकडे मदतीची अपेक्षा करतात. आणि झालं असचं – चालणाऱ्यांची याचना वर पोहोचली – देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथ पर चलना भी नसीब नही! देवाला अडचण समजली आणि सगळ्या फुटपाथवर दोन्ही बाजूला, अधे – मधे, स्टीलचे चकचकीत खांब बसले. चालणारे खुश झाले. खांबामधून गाडी घालता येत नाही, म्हणून टू व्हीलर वाले नाराज झाले आणि पुन्हा रस्त्यावर आले.

कॉम्प्युटर वर व्हायरस – अँटी व्हायरस जसे सुरूच असते, तसेच देवाकडे ऋषी- मुनी पण साकडे घालत असतात आणि दानव पण. आता टू व्हीलर वाल्यांनी वर बघून याचना केली – ‘देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथपर बाईक चलाना भी नसीब नही’. वरच्याला सगळ्यांचीच काळजी असते, कारण सगळी त्याचीच लेकरे. देवांनी तथास्तु म्हटले आणि टू व्हीलरकरता पर्याय पुढे आला —

आम्ही मेन रोडनी मार्केट कडे चालत निघालो होतो. फुटपाथ वर खांबांमुळे टू व्हीलरची वर्दळ नव्हती, त्यामुळे बिन्धास चालत होतो. पुढच्या चौकात, डावीकडच्या रस्त्यावर बरीच गर्दी दिसली. काय आहे? हे, बघायला म्हणून आम्ही डावीकडे वळलो. थोडं पुढे छोटं ग्राउंड आहे. तिथे एका परदेशी कंपनीने तयार केलेल्या फूटपाथ – फ्रेंडली बाईकचा डेमो दाखवणार होते. नावावरून काहीच अर्थ बोध होत नव्हता. बघितल्याशिवाय उत्सुकता संपणार नव्हती. मी आणि काही पर्याय नसल्यामुळे बायको, गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. कुणिही प्रेमात पडेल, अशी एक नवी कोरी दणकट बाईक समोरच दिमाखात उभी होती.

तिथले मार्केटिंग मॅनेजर (महेश) जाहिरातपर भाषण करत होते. टू व्हीलरवाल्यांकरता खुशखबर – खुशखबर. फुटपाथवर बाईक चालवा. एका भाग्यवान व्यक्तीला पहिली फ्री ट्रायल मिळणार! नंतर काही जणांना मिळणार, पेड ट्रायल. कोण आहे तो भाग्यवान? हीच वाक्ये पुन्हा पुन्हा ऐकवणे सुरु होते. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर, ‘मीच तो भाग्यवान’ असे भाव दिसत होते. बायको म्हणाली, तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्हाला ती गाडी पेलवणार नाही. ‘कौन है वो भाग्यशाली’, ‘कौन है वो भाग्यशाली’, अशा गर्जना सुरु होत्या. मी गाडीकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. गाडीचे वजन माझ्या वजनाच्या तिप्पट तरी नक्कीच असणार. नेहेमी म्हणजे इतरवेळेला, मी कितीही भाग्यशाली असलो, तरी, आज, ‘तो मी नव्हेच’ हे पक्के होते.

“वो कौन है”… “वो कौन है”…., किसको ट्रायल दी जाय, असं म्हणत म्हणत, महेश चौफेर नजर टाकत होते. माझ्यावर त्याची नजर स्थिर झाली, आणि, “यही तो है वो” अशी जाणीव महेशला आतून झाली असावी. लगेचच त्यांनी हात माझ्याकडे करून, “सर, आप आगे आईये” अशी घोषणा केली. महेश नक्की कुणाला सर म्हणतोय हे समजण्याकरता मी आजूबाजूला बघायला लागलो. बाजूचा मुलगा म्हणाला, “काका यु आर लकी”, तुम्हालाच बोलावलं आहे. हे काम आपलं नव्हे, हे मला चांगलं समजतं होतं, पण आलेली संधी वाया का घालवायची! हा पण विचार मनात आला. द्विधा मनस्थिती असली, की, मी नेहेमी अंतर मनाचा सल्ला घेतो.

मी (मनात डोकावून) : काय करू?

आतून : जा बिन्धास, मी आहे.

मी : ती बाईक पेलणं मुश्किल आहे.

आतून : भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आज तर तुझ्या मागे बसणार आहे.

माझं आतल्या मनाशी बोलणं बायकोच्या लक्षात आलं असावं. तिनी मला बेस्ट लक दिलं आणि मी लगीच पुढे गेलो. महेशनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या.

ग्राउंडमध्ये फुटपाथसारखा लांबपर्यंत भाग आखून तयार केला होता. त्यावर, फुटपाथवर लावले आहेत, तसे स्टीलचे खांब लावलेले होते. महेशनी त्या फुटपाथवर बाईक आणली. मला डेमो समजावून सांगितला आणि बाईकवर बसायला सांगितले. गाडी स्टॅन्ड वरुन काढून, पलीकडे पाय टाकतांना, माझा थोडा तोल गेल्यासारखे जाणवले, पण तेवढ्यापुरतेच, कारण लगेच जाणवलं, की, मागे कुणीतरी बसले आहे. मागे आहे, याची खात्री करायला, मी दोन्ही पाय थोडे वर उचलले, पण गाडी स्थिर होती. मी बिन्धास झालो.

मी बाईक सुरु केली आणि २०-२५ फुटावर असलेल्या स्टीलच्या खांबांपर्यंत नेली आणि थांबवली. तिथे महेशचा सहकारी उभा होता. सीटच्या खाली असलेलं एक बटन त्यांनी दाबलं. बटन दाबताच हँडलचे दोन्ही भाग आतल्या बाजूला फोल्ड झाले. मी हळूहळू बाईक खांबातून थोडी पुढे नेली, आणि सीट खालचे बटन दाबले. हॅण्डल पुन्हा अनफोल्ड झाले. गाडी सुरु करून मी पुढे निघालो. एन्ड पॉइंटला पोहोचलो आणि गाडी मागे वळवली. खांबांपर्यंत आलो, गाडी थांबवली, बटन दाबून हॅण्डल फोल्ड केले, गाडी पुढे घेऊन हॅन्डल अनफोल्ड करून गाडी पुढे सुरु केली आणि महेशपर्यंत पोहोचलो. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवून गाडीचं आणि माझं कौतुक केलं. मी खाली वाकून टाळ्या आणि कौतुक माझ्या मागे बसलेल्या मनातल्या व्यक्तीकडे पास केल्या.

महेशच्या टीममधल्या एका सुंदरीनी मला मोठा बुके दिला आणि बाईकवर माझ्या मागे बसून सेल्फी काढला. महेशनी मला एक गिफ्ट बॉक्स दिला. मी सगळ्या टीमचे आभार मानले.

महेश : सर, ही गाडी लवकरच मार्केटला येईल. तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल या फॉर्ममध्ये भरून द्या. तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिल्या जाईल. तुम्ही स्वतः गाडी घ्या किंवा ऑफर कुणाला पास करा.

मी फॉर्म भरून दिला, मला बुके देणाऱ्या मॅडमला थँक्स म्हणालो. आणि महेशला आणि सगळ्या उपस्थितांना हात घालून बाय-बाय केले, आणि आम्ही निघालो.

परत जात असताना डोक्यामध्ये सहज विचार आला – अशा सुधारणांमुळे टू व्हीलरवाल्यांची जरी सोय होणार असेल, तरी अशा पळवाटा कुणाच्याही अंतर-मनाला नक्कीच पटणार नाहीत. स्वतःच्या सोयीकरता नियमातून पळवाट कशी काढता येईल, हीच आपण काळाची गरज तयार केली आहे आणि आम जनतेच्या काय गरजा आहेत, हे लक्षात घेऊनच शोध लावणारे त्यावर काम करत असतात. आणि म्हणूनच फुटपाथ फ्रेंडली बाईक तयार होतात. पळवाटांमुळे माझा थोडा वेळ वाचतही असेल, पण अपघात वाढतात हे नक्की. या अपघातात, आज कदाचित मी नसेन, पण उद्याच्या अपघाताचे काय? परवाचे काय? तेव्हाच्या अपघातात आपण असू शकतो, आपली बायको / मुले / आईवडील / जिवलग असू शकतात, हा विचार जर मनात रुजला, तर सगळेच चित्र बदलू शकते. जर प्रत्येकानेच ठरवले, की, मी वाहतुकीचे सर्व नियम पाळणार, तर बदल्यात मिळणार काय आहे? मिळणार आहे, अपघात शून्य वाहतूक.

आणि त्याकरता आपण प्रत्येकानी म्हणजे प्र – त्ये – का – नी काय करायचे आहे, तर अगदी सोपे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. काय आहेत ते नियम? तर, सिग्नल पाळणे / नो एंट्रीत न जाणे / स्पीड लिमिट पाळणे / आणि अर्थात फुटपाथवर गाडी न घालणे.

या सगळ्यामुळे आपला जाण्याचा वेळ थोडा वाढेल, थोडे लवकर निघावे लागेल. हा बदल स्वीकारून जर आपण वर बघून जर प्रार्थना केली : देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान – ट्रॅफिक के सभी नियम फॉलो तो कर रहे है, लेकिन ट्रॅव्हल का टाईम बहुत बढ गया है.

आपली प्रार्थना ऐकून देव नक्कीच तथास्तु म्हणेल. आणि योग्य असा छान पर्याय बाहेर येईल. आपल्या सगळ्यांच्या या अशा मानसिक बदलाकरता सगळ्यांना शुभेच्छा आणि..

फुटपाथ फ्रेंडली बाईकला – बाय बाय.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares