मराठी साहित्य – विविधा ☆ “आरोग्यम् धनसंपदा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ आरोग्यम् धनसंपदा” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

लवकर निजे, लवकर उठे

त्यासी आरोग्य संपदा लाभे

सूर्योदयापूर्वी का उठावे? असा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडतो. याचे उत्तर रात्री झोपल्याने शरीराचे चलनवलन थांबते व शरीरात आमवात निर्माण होतो. आमवातामुळे शरीरात जडत्व (सुस्ती) येऊन उष्णता वाढते. सूर्योदयापूर्वी आपल्या भोवतालचे वातावरण संतुलीत असते. सूर्योदयापूर्वी आपण जर उठलो तर शरीराच्या चलनवलनाने शरीरात निर्माण झालेला आमवात व त्यामुळे आलेले जडत्व, उष्णता नाहीशी होऊन आपण दिवसभर आनंदी व उत्साही राहून कमी वेळात जास्त काम करून प्रगती करू शकतो. परंतु जर आपण सूर्योदयानंतर जागे झालो तर सूर्यकिरणामुळे वातावरणात निर्माण झालेली उष्णता यांच्या संयोगामुळे आपल्या शरीरातील तापमान वाढत जाऊन आपल्या शरीरात दिवसभर आळस व अस्वस्थता राहिल्याने काम करण्यात उत्साह राहत नाही. त्यामुळे होणारे सर्व परिणाम भोगावे लागतात. म्हणून सूर्योदयापूर्वी उठावे तेव्हा आरोग्य संपदा लाभते.

समाधानी जीवनासाठी स्वस्थ शरीर ही प्राथमिक गरज आहे.

शरीर व मन हे दोन्हीही निरोगी असणे जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर आरोग्य संपन्न राहण्यासाठी व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार यांची अत्यंत गरज आहे. स्वस्थ शरीरात स्वस्थ मन राहते. बल हे दोघांचेही गमक आहे. म्हणूनच बलसंवर्धन हे सुखाचे आगर आहे. बलाची उपासना हे जीवनाचे सूत्र आयुष्याचा मंत्र आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा त्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी बलभीमाच्या उपासनेची गोडी समाजाला लावली.

लुळ्या, पांगळ्या श्रीमंतीपेक्षा

धट्टी – कट्टी गरिबी चांगली.

उत्तम प्रकृती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. लुळ्या – पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी-कट्टी गरिबी चांगली. कांदा, भाकर खाऊन सुखाने जमिनीवर झोपणारा माणूस गाद्या-गिरद्यांवर लोळणाऱ्या, शारिरीक वेदनेने तडफडणाऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ असतो. प्रकृती स्वास्थ्यासाठी व्यायाम, संयम, योग्य सवयी, व्यसनांपासून अलिप्तता, उत्तम पचनशक्ती त्याचप्रमाणे शांत चित्तवृत्ती, हास्य, विनोद प्रवृत्ती अशी शरीर व मन दोन्ही सुखी करणाऱ्या गोष्टी माणसाने जोपासल्या पाहिजेत.

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।

स्वधर्माचे आचरण करण्यासाठी शरीर प्रकृती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. आपले शरीर हे एक अनमोल स्वयंचलित यंत्र आहे. त्याची निगा राखणे, ते सुस्थितीत ठेवणे जमले की जीवन प्रवास सुखाचा होतो. सुंदर शरीराची योग्य ती काळजी घेतली नाही तर रोगरुपी शत्रू त्याच्यावर हल्ला करतात. शरीर निरोगी असेल तरच जगण्यातला आनंद लुटता येतो. युक्त आहार, विहार, व्यायाम यांच्या द्वारा आरोग्य राखले पाहिजे कारण चांगले आरोग्य हा सुखी व समाधानी जीवनाचा मूलमंत्र आहे.

मर्यादित संतती, पुरेशी संपत्ती, उत्तम संगती, चांगली शरीर प्रकृती व देवाची भक्ती हे सुखी जीवनाचे ‘पंचशील’ आहेत.

आरोग्य हीच संपत्ती होय. रोज फक्त पंधरा मिनिट व्यायाम केला तरी तो आपल्या आयुरारोग्यासाठी पुरेसा ठरतो आणि संजीवक ठरतो. व्यायाम म्हणजे शरीरांतर्गत शक्तींचे जागरण व प्रकटीकरण होय.

आरोग्यासाठी व्यायामाची वाट वहिवाटलीच पाहिजे. व्यायाम हे एक आन्हिक आहे. तो एक आचारधर्म आहे. शरीराच्या रक्षणासाठी ती एक साधनप्रणाली आहे. अंगातील चैतन्य व प्रतिकारशक्ती व्यायामाच्या अभावी लोक पावते. व्यायाम म्हणजे शरीरांतर्गत शक्तीचे जागरण व प्रकटीकरण होय. शरीर हे जीवनाचे, परमार्थाचे व सर्व इंद्रियाचे जणू ते एक सुरेल संगीत आहे. व्यायामात शरीर कष्टवायाचे नसते तर ते कार्यप्रवण करावयाचे असते. अनेक दु:खे केवळ व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात.

योग्य आहार

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।

सहज हवन होते नाम घेता फुकांचे।

जीवन करी जीवित व अन्न हे पूर्णब्रह्म।

उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।

असेल आहार योग्य तरच लाभेल आरोग्य जसे खावे अन्न तसे बनते मन आहार चौरस किंवा समतोल असावा. त्यात प्रथिने, जीवनसत्वे, कर्बोदके, क्षार, खनिजे, शर्करा, स्निग्ध व पिष्टमय पदार्थ, कोंडा किंवा चोथा असणारे पदार्थ यांचा समावेश हवा. सात्विक आचार व विचार यासाठी हवा सात्विक मिताहार. वेगाने अनारोग्याकडे नेते ते म्हणजे फास्टफूड. आपण नको त्या गोष्टी, नको त्यावेळी, नको तितक्या प्रमाणात खात असतो. आहार, मनःशांती व आनंद हे तीन सर्वोत्कृष्ट धन्वंतरी आहेत जे जिभेला रूचते ते पोटाला पचेलच असे नाही. निरोगी राहण्यासाठी पोट नरम, पाय गरम व मस्तक थंड असावे. सर्व रोगांचे मूळ चुकिच्या आहारात व त्यामुळे उद्भवणाऱ्या अपचनात असते. शाकाहार, फलाहार, रसाहार, दुग्धाहार वाढवावा. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ याचे स्मरण ठेवावे.

शरीर एक वरदान

या जगात जिचे सर्वात कौतुक वाटावयास हवे अशी एकमेव गोष्ट म्हणजे आपले शरीर. जीवनातून शरीर वगळले तर मागे उरेल ते शून्य. आपल्या अवघ्या अस्तित्वाचे सार म्हणजे आपले शरीर. देहाला नऊ द्वारे आहेत द्वारे म्हणजे इंद्रिय चार कर्मेंद्रिये, चार ज्ञानेन्द्रिये, वाक् व रसना उरली त्यांचे इंद्रिय एकच म्हणून इंद्रिये नऊ. मानवी शरीर हे माणसाला मिळालेले एक उत्कृष्ट वरदान आहे. पंचमहाभूते, पंचप्राण. पंचज्ञानेन्द्रिये,पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतरेंद्रिये,स्मरणशक्ती, विचारशक्ती या देणग्यांनी युक्त असे हे शरीर म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे. ह्या देणग्यांचा योग्य तो उपयोग केल्यास ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अवस्था होते.

सर्व काही अलबेल असलेल्या शरीराला व जीवनाला वाढत्या वयाची घसरगुंडी थांबविता येत नाही. जीवनाच्या अस्ताकडे घेऊन जाणारा हा प्रवास साठी, सत्तरीनंतर अनेकांना एकाकीपणाने करावा लागतो. व्याधी विकार सतावू लागतात. सुहृदांचा वियोग होतो. मुख्य म्हणजे आपण ‘कालबाह्य’ तर होत नाही ना ही भीती मनात घर करू लागते. वृद्धापकाळातही मनुष्याने समतोल आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी प्राशन यांच्या मदतीने आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहार, विहार, व्यवहार, आचार, विचार यात बदल करून निरोगी तन मनाची साथ ठेवल्यास समाधान प्राप्ती झालीच म्हणून समजा.

Physical Well-being is an essential part of human Well – being.

जवळ जवळ ७०% आजार मानसिक तणावामुळे येतात. म्हणजे ते मनोकायिक (Psy-chosomatic) असतात. त्यांचे निर्माते आपणच असतो.

अनेक शारीरिक विकारांच्या उदा: रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, दमा, पोटातील अल्सर इत्यादींच्या मुळाशी मनाची असमाधानी प्रवृत्ती असते. ती जितकी मनावर अवलंबून असते तितकीच शरीरावर अवलंबून असते. स्वस्त शरीरातच स्वस्त मन राहते.

स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, “आधी फुटबॉल खेळा मगच भगवद्गीता वाचायला घ्या!खेळाने शरीर स्वस्थ राहते व स्वस्थ शरीरामध्येच मनाची एकाग्रता लाभते.”

ज्याला व्यायामाकरिता

वेळ मिळत नाही,

त्याला आजारपणाकरिता

मोठी सवड काढावी लागते.

शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणतेही कार्य करण्याची क्षमता आणि शारीरिक सक्षमता व्यायामाने, आहाराने, योगासनाने, प्राणायामाने, दीर्घश्वसनाने वाढत असते. विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी बुद्धिबळाचा बादशहा बॉबी फिशर शारीरिक क्षमतेसाठी व मानसिक स्वास्थ्यासाठी धावण्याचा व पोहण्याचा सराव करीत असे. एक जुनी म्हण आहे की ज्याला व्यायामाकरिता वेळ मिळत नाही त्याला आजारपणाकरिता मोठी सवड काढावी लागते.आपले शरीर हे सर्व दृष्टीने कार्यक्षम बनले पाहिजे आणि मगच आपण म्हणू शकू आरोग्यम् धनसंपदा!!

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “नच सुंदरी… सुंदरी गं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “नच सुंदरी… सुंदरी गं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, आकाशात, पाताळात, गुन्हेगार लपून बसला असला तरी, सौंदर्यवान पोलिस इन्स्पेक्टर आपल्याला पकडायला येणार आहे समजल्यावर, तोच काय या पृथ्वीवरीलच काय या भूलोकातलेही, सगळेच गुन्हेगार …मग तो किंवा ते कितीही बलदंड, आडदांड, अद्ययावत शस्त्रांनी सुसज्ज असलेले… दहशतवादी असु दे वा गावगुंड..सगळा सगळा बारदाना…आपणहून शरणागती पत्करून स्व:ताला बंदिवान करून घेण्यास पुढे का होणार नाहीत… एक सौंदर्याची खाण असलेली, सळसळत्या तारूण्याची रूपवती जेव्हा पोलीस इन्स्पेक्टरच्या वर्दीत, डोळयाला काळा गाॅगल.. कमनीय नाजूक कमरेला लटकलेली ती सर्विस रिवाॅव्हलर (तीची खरं तर तिला काहीच आवश्यकता नसताना).. हातात छमछम करणारी लाल छडी घेऊन (हि मात्र हवीच हं कारण स्त्री जातीच्या गुणधर्मानुसार तिला मुळातच सगळ्यांना तालावर नाचवायची सवय असल्याने… नव्हे नव्हे त्यात तिचा हातखंडा असल्याने… सगळे तिच्या पुढे झुकले जातात)… करड्या बुटांचा टाॅक टाॅक आवाज करत टेचात नि ठसक्यात वारदात ठिकाणी वा पोलिस स्टेशनमध्ये येते तेव्हा.. तिथला सारा माहोल त्या कमलनिच्या सुंगधानेच बेहोश होऊन जाईल नाही तर काय… अख्खं आपलं आयुष्य तिच्या सहवात जावं हिच एक मनिषा बाळगून तर काही जण कायमस्वरूपी, (ती सतत आपल्याला दिसत राहावी म्हणून) तिच्या समोरच्या जेलमध्ये बंदीवान म्हणून राहायला तयार का नाही होणार… किरकोळ असो वा गंभीर तक्रारची एफ आय आर पोलिस स्टेशनमध्ये  नोंदणी करण्यासाठी  भाऊगर्दी हू म्हणून वाढत का नाही जाणार… एक वेळ तक्रारीची तड नाही लागली तरी हरकत नाही, पण  त्या सौंदयवतीशी प्रत्यक्ष मुलाखत जरी झाली तरी आपल्या तक्रारीचं निवारणं झालं याच समाधान मानून बाहेर पडणाऱ्या अल्पसंतुष्टांची रांग रोजच वाढती का नाही असणार… संथ नि गेंड्यांची कातडी पांघरून निबर असलेला मुळ पोलिसी खाक्याने काम करणारे ते पुरुषी पोलीस दल अशा एका रूपवान पोलीस फौजदार मुळे कामाला नाही का लागणार… बिच्चारे ते तनाला नि मनाला  सुशेगात कामाची सवय झालेली असल्याने.. हया नवयौवना सुंदर फौजदार च्या अदाकारीने थोडेसे जनाची नाही पण मनाची बाळगून कामाला का नाही भिडणार…, कोर्ट कचेरीत लोक अदालत.. वगैरे अनेक ठिकाणी हि सांगेल तोच कायदा पाळणारं नाही का… अहो असं काय करतायं घरीदारी, बाजारी, सरकारी दरबारी सगळ्या ठिकाणी हिचा मुक्त संचार नाही का आपणच तिला प्रदान केला… नारी शक्तीला स्वातंत्र्य, शिक्षण, तेहतीस टक्के आरक्षण… देऊन मोठ मोठ्या पदांवर तिला सन्मानाने वाजत गाजत बसवून (डोक्यावर..), मुळातच माजलेली अकार्यक्षमतेला कार्यप्रवण करण्यास सक्षम असलेली स्त्रीला आपणच  स्विकारले..  तिच्या गुणवतेचाच तेव्हा विचार केला गेला… पण सौंदर्य नि बुध्दी यांचा असंभवनीय संयोग जेव्हा जुळून येतो तेव्हा  एक अनाकलनीय बदल घडून येत असलेला दिसून येतो याचा धक्क्यावर धक्का बसतो  तेव्हा सगळी पुरूष जमात समुळ हादरून जाते… सगळचं हातून निसटून चाललयं याची खंत बाळगत हतबल होते… मग ते क्षेत्र घर संसार पासून अवकाशातील संशोधन असो.. ती कायमच मग अग्रेसर राहते… पृथ्वीवरचा मानवच काय पण देवलोकातील देवगण सुद्धा आता हवालदिल झालेले दिसतात… त्यांना मनातून एकच भीती वाटतेय आता तो दिवस दूर नाही बरं… पृथ्वीवरील अप्सरा देवलोकाचाही ताबा कधी घेतील सांगता येणार नाही… मग आपल्याला जोगी होऊन तिच्या राजमहाली गाणं म्हणत तिची विनवणी करावी लागेल.. ना मांगे ये सोना चांदी… मांगे तेरा दर्शन देवी.. तेरे द्वार खडा एक जोगी…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पसंत आहे मुलगा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ पसंत आहे मुलगा…  भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे

(मी महेशकडे पाहिले पण त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते तो जाम टेन्शनमध्ये दिसत होता. बोलण्यापेक्षा तोंडातला घास भराभर चावण्याचे नाटक तो करू लागला.) — इथून पुढे …. 

मी तर सुन्नच झालो होतो! कसं आणि काय रिऍक्ट करावं तेच मला समजत नव्हतं. तरीपण स्वतःला सावरत मी म्हणालो,” खरं सांगू मावशी, त्यादिवशी तिथे मी माझ्या स्वतः बद्दल काहीच सांगत नव्हतो. महेश, त्याचा गुणी स्वभाव, तुमचे गाव, तुमची शेतीवाडी, महेशची पुढची स्वप्न या सगळ्या बाबतीत मी भरभरून बोललो. ती पार्टी खरोखरच खूप छान होती अन मोठी सुद्धा होती. वाडा केवढा सुंदर आणि भव्य होता! आत शिरताच मी म्हटलं, ” महेशराव आता तुम्ही या भव्यवाड्याचे जावई होणार असं दिसतंय… महेश सुद्धा त्यावर खूप लाजला होता त्यावेळी, शिवाय मुलगी खूप सुंदर देखणी होती. अगदी महेशला शोभेल अशीच होती. बी.ए करते आणि अभ्यासात सुद्धा हुशार होती महेश ने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तिने खूपच छान उत्तरे दिली होती.

ते लोक सुद्धा मोठया उत्सुकतेने महेशची चौकशी करत होते, त्याच्याबद्दल चांगलं बोलत होते मला तर तिथून माघारी येईपर्यंत शंभर टक्के खात्री वाटत होती की, हे लग्न जवळपास जमलेच! महेश पण खूप खुश होता, अगदी वाड्याच्या बाहेर येऊन सगळे लोक आम्हाला टाटा बाय-बाय करत होते. पण पुढे हे भलतेच कसं झाल? मावशी, त्यांनी मला पसंत करण्याचा प्रश्नच येत नाही. मी त्यांना एवढं सुद्धा म्हटलं की, आम्ही दोघे बी.ए.स्सी करतोय. आमच्या लग्नाला अजून खूप वेळ आहे पण महेश घरात थोरला आहे त्याच्या आईवडिलांची इच्छा आहे की मोठ्या मुलाचं लग्न लवकर व्हावं. त्यांच्या त्या हौसे पोटी तर महेश मुलगी पाहायला तयार झाला आहे. शिवाय लग्नानंतरही महेशचं शिक्षण चालूच राहणार आहे. त्याला पी एस आय व्हायचं आहे. मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलं मावशी. पण हे असं घडलंच कसं?” मी माझा प्रमाणिकपणा सिद्ध करण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

” अरे तू त्यांना सगळं सांगितलंस पण जे सांगायचं ते कुठं सांगितलंस? ” महेशच्या आईने भलताच तिरकस प्रश्न विचारला त्याने मी पुरताच गांगरलो.

” म्हणजे, काय नाही सांगितलं मी मावशी? “

” आधी जेवण कर मग सांगते.

” आई…? ” महेश जवळपास आईवर मोठ्याने ओरडलाच होता.

माझं तर जेवणावरून लक्षच उडालं होतं…मी महेशकडे एक कटाक्ष टाकला तर तो लगेच खाली बघून जेवत असल्याचे मला खोटे खोटे भासवत होता.

मला जेवताना घामच फुटला होता! ” मावशी सांगा ना प्लिज मी काय सांगायचं राहिलं ते… “

” अरे काही नाही, आधी जेवण कर. “

मी अस्वस्थ झालो होतो त्यामुळे मी पटकन ताटात हात धुतला.

माझ्याकडून नकळत काय अपराध झाला होता ते मला कळेना. असं काय झालं होतं की ज्याने महेशच लग्न मोडलं होतं? असं काय माझ्याकडून त्या मंडळींना सांगितलं गेलं होतं की, ज्याने त्यांनी महेशला सोडून मलाच पसंत केलं होतं? माझा हेतू स्वच्छ होता. मित्राने सोबत मुलगी पाहिला बरोबर नेलं होतं. नवरदेव तोच होता. मी त्यांना सुरुवातीलाच नवरदेव म्हणून महेशचीच ओळख करून दिली होती. त्याच्याबद्दल जेवढं काही सांगता चांगलं सांगता येईल तेवढं मी सांगितलं होतं. ती मुलगी आपल्या मित्राची पत्नी होणार अगदी आपल्या जिवलग मित्राची पत्नी म्हणजे आपली लाडकी वहिनी असणार त्यामुळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. मग नेमके चुकले कुठे? मावशींचा रोख आणि सगळा रोष तर माझ्याकडेच होता. आत्तापर्यंत त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. महेशला आणि मला त्यांनी कधीच वेगळं मानलं नाही.

तेव्हा हा सगळा नेमका काय प्रकार आहे? ते मला काहीच समजत नव्हते…. याच विचारात हात धुवून ताट बाजूला सारून मी उठून खाटेवर बसलो. महेशने सुद्धा तसेच केले.

मावशी आमच्या दोघांची ताटे घेऊन आत गेल्या आणि बडीशेपचे तबक घेऊन बाहेर आल्या. त्यांनी चमच्याने माझ्या हातावर बडीशेप वाढताच मी अजिजीने म्हटले,  ” मावशी सांगा ना प्लिज माझे काय चुकले ते ?मी त्यांना काय सांगायला पाहिजे होतं? “

” अरे जाऊ दे बाळा ते फार महत्त्वाचं नाही आणखी दोन स्थळं आल्यात महेशला. होऊन जाईल त्यातलं एखादं फायनल. “

” नाही मावशी पण मला कळायलाच पाहिजे माझं काय चुकलं ते! तुम्ही मला आईसारख्या, महेश मला माझ्या भावासारखा आहे. “

” अरे जाऊ दे नको मनाला लावून घेऊस, होतं असं कधी कधी. लहान आहेस तू. नकळत होतं असं कधी कधी, तुझा तरी काय दोष त्यात? “

” नाही मावशी, तुम्ही मला सांगाच काय झालं ते?तुम्हाला माझ्या आईची शपथ! ” मी शे शेवटचे अस्त्र बाहेर काढले तेव्हा त्या पटकन म्हणाल्या, ” तुझी जात…! “

” आई तुला नको म्हटलं होतं ना…? ” महेश नाराजीने म्हणाला कारण त्याला मला दुखवायचं नव्हतं. लग्नापेक्षा जातीपेक्षा त्याला आमची मैत्री मोठी वाटत होती म्हणून तो आईला सुरुवातीपासून अडवत होता.

 ” माझी जात? “

” हो अरे तुझी जात तू त्यांना सांगायला पाहिजे होतीस… मग हे पुढचं काही घडलंच नसतं… म्हणजे त्यांनी तुला पसंत करण्याचा प्रश्नच आला नसता. महेशलाच पसंत केलं असतं… “

 ते ऐकताच मी महेशकडे पाहिलं तर तो माझ्या डोळ्याला डोळा मिळवू शकत नव्हता ! जे काही घडलं ते आमच्या दोघात होतं ते माझ्या लक्षात आलं होतं परंतु मी मावशींना त्याचं उत्तर देऊ शकत नव्हतो की मुलगी पाहायला जाताना रस्त्यातच महेशने मला आवर्जून सांगितलं होतं की तिथे पाहुण्यांनी काही विचारले तर तू तुझी जात सांगू नकोस.आमच्यातलाच आहे असं सांग.तुझी जात सांगू नकोस नाहीतर घोळ होईल. मलाही त्याच्या असं म्हणायचे खूप वाईट वाटले होते परंतू त्याच्या भूमिकेतून कदाचित ते योग्य असेल म्हणून मी त्याला विरोध केला नाही. जिवलग मित्राला इतकं तर सहकार्य आपण नक्की करू शकतो या भावनेने मी त्याला होकार देवून सहकार्य केले.

 आमच्या दोघांचं हे असं ठरलं होतं त्याप्रमाणेच तर मी तसे केलं होतं.तिथे पाहुण्यांनी माझा विषय काढला तेव्हा मी महेशने सांगितलं होतं तसंच सांगितले होते परंतू त्याचा परिणाम असा उलटा होईल हे त्याला बापड्याला तरी काय माहीत होतं ! त्यामुळे आमच्या दोघांच्याही ते प्रकरण चांगलच अंगलट आलं होतं…

महेशला माझी खरी जात माहीत होती परंतू त्या पाहुण्यांना कुठे माहीत होती? त्यांनी दोघांनाही सारखेच जोखले.

त्यांनी माझ्यातले चांगले गुण पाहिले, माझे वागणे बोलणे पहिले अन मला पसंत केलं.

 पण मी माझी खरी जात सांगितली असती तर त्यांनी खरेच असे केले असते काय….?

तसे झाले असते तर कदाचित आम्हा दोघांनाही नाकारलं असतं. हो ना?

खरंच, या दुनियेत माणूस मोठा की त्याची जात? हाच विचार करत महेशच्या घरून थेट एसटीत बसून मी माझ्या घरी परतत होतो…

 – समाप्त –  

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-२  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 

(भावनेच्या भरात हा “वेडा माणूस” स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती.) – इथून पुढे 

याच प्रेमाच्या भावनेतून, 2023 साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही, आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली.

लिस्ट नीट लिहून आणायची, अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत … वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ?  इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही…

ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा….  असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला…

यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही… !

हरकत नाही… जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ?

असो… हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला

एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले.

चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती.

‘डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ?  सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ?  थोडीफार सेवा आम्ही करत होतो, आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?’

सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

मी तुम्हाला माफ नाही करणार…

ते रागानं थरथर कापत बोलत होते…

या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो… पायावर डोकं टेकवलं… आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला !

तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे, हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले, क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले… !

स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करतात… सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी… माझ्याशी ??? भांडला… !!!

यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या.

आता साल उजाडले 2024.

यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर “चॉईस” मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही “चॉईस” नव्हता…!

मी 13 जून 2024 ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला. पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय… !

चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र, चार्टर्ड अकाउंटंट आहेत !

‘हॅलो चिराग सर, कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..’

‘सर बाबा गेले’ पलीकडून मंद आवाज आला.

आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणाच्यातरी पाठी धावतच असतो, सतत फिरत असतो, हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो…

‘अच्छा गेले का ?  बरं पुन्हा कधी येतील ?’ मी हसत बोललो.

‘बाबा गेले सर… परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत … तुम्हाला माहित नाही ?’

माझ्या पायाखालची जमीन सरकली… मी सुन्न झालो… मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना…

भानावर आलो, तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली…

पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो… मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची, निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ?

भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ?

आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?

हे…हे… असं… काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ?

कटारिया साहेब, आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार…!

‘सर काही काम होतं का ?’ फोन अजून चालूच होता, पलीकडून चिराग सरांचा आवाज आला.

‘शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती…’ मी शांतपणे बोललो.

‘ठीक आहे सर, दोन दिवसात पाठवतो.’ तितक्याच शांतपणे उत्तर आले.

दोन दिवसांनी सामान आले, मी बॉक्स खोलले.

आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या…

मी चिराग सरांना फोन केला, म्हणालो, ‘चिराग सर, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे… हि आमची लिस्ट नव्हे, काहीतरी चूक झाली असावी !

चिराग सर म्हणाले, ‘सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी…!’

‘अहो पण, चिराग सर… एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला…’

‘अच्छा… हां… हां…. त्या एक्स्ट्रा वस्तू का ?  त्या मी नाही… बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर …’

फोन कट झाला …!!!

इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला… !

कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले…

पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले.

या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे… ?  चिराग… व्वा…!!!

यानंतर 15 जून 2024 ला सर्व चिल्ल्यापिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले.

नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या… !

या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू ….

बाळांनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे….

आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा… !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “धावा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “धावा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

जनार्दन महाराजांच्या दिंडी बरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली. त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या.त्यांनी सांगितले,

” पहाटे  पवणेपाच  वाजता सारसबागेच्या दारात या”..

अदल्या दिवशीच मी बहिणीकडे रहायला गेले.

बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दीनानाथ मधून घरी आला होता. म्हणून तिची सुन डॉक्टर दीप्ती पुजारी  पहाटे साडेचार  वाजता आम्हाला गाडीने सोडायला  निघाली. रस्त्यावर निरव शांतता होती. अगदी कोणी सुद्धा नव्हतं .

परत जाताना ती एकटी कशी जाईल याची  मला  चिंता वाटली. पण बहीण अत्यंत विश्वासाने म्हणाली,

“अगं पंढरीराया नेईल  तिला सुखरूप घरी .काळजी नको करू.”

अरे खरचं की…त्याच्यावर सोपवलं की मग सोपच होतं…

तिथे गेलो तर  ट्रक ऊभा होता.स्टुल ठेवले होते. त्यावरून ट्रकमध्ये चढलो. पहिल्यांदाच ट्रक मध्ये  बसलो  होतो .त्याची पण गंमत वाटत होती.

ट्रक निघाला..शैलाताईंनी

 

“पाऊले चालती पंढरीची वाट

सुखी संसाराची सोडुनीया गाठ..”

 

म्हणायला सुरुवात केली..आम्ही पण त्यात सुर मिसळला..आनंदाची वारी सुरू झाली..

 

ट्रकने आळंदीच्या अलीकडे सहा  सात किलोमीटर ला सोडले. तिथून वाहनांना बंदी होती. अनेक जण पायी चालत होते .आम्ही पण चालायला लागलो .

 

पुढे जाता जाता एकदम ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा  सजवलेला रथ लांबूनच दिसला. अलोट गर्दी होती .जागेवर ऊभ राहुनच  दर्शन घेतलं. शैलाताई म्हणाल्या

 

“गर्दी कमी झाली की आपल्याला दर्शन मिळेल तेव्हा आपण घेऊ.”

नंतर आमचे शांतपणे छान दर्शन झाले.  आमची दिंडी वारीत सामील झाली.

अभंग ,ओव्या ,आरत्या म्हणत, टाळ वाजवत अत्यंत आनंदात मार्गक्रमण सुरू होते.

कधी पाऊस, वारा, ऊन चालूच होते. पण मजा येत होती . मध्येच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसुन  नाश्ता झाला.

नंतर मात्र भराभर चालायला सुरुवात झाली . दीड वाजता जेवणासाठी थोडा वेळ थांबलो .थोडसंच खाऊन घेतलं आणि पुढे निघालो.

 

आम्ही सगळे पासष्ठच्या पुढच्या वयाचे  होतो. पहाटेच उठलो होतो. तीन वाजल्यानंतर  चालण्याचा वेग थोडा मंदावला.प्रथमच ईतकं पायी चालत होतो.  काही वेळानी पुढच्या आणि  आमच्या दिंडीत अंतर पडले.आम्हाला ते समजत होते.पण पाय  आता जरा दमले होते.

शैलाताई समोर येऊन म्हणाल्या..

 

” आता आपल्याला धावा करायचा आहे”

धावा ?…

आम्हाला काहीच कळेना.

मग त्यांनी नीट  समजावून सांगितले. दिंडीचे दोन भाग केले .मध्ये जागा थोडी मोकळी ठेवली .चालत चालत एका गटाने म्हणायचे..

“आमचा विठोबा “दुसऱ्या गटानी म्हणायचे “आमची रुखमाई”

मग  काय झाली की धमाल सुरू…

 

आधी खालच्या आवाजात म्हणत होतो .नंतर आवाज चढवत चढवत वर नेला .अचानक एका क्षणी शैलाताई म्हणाल्या

“धावा “…..

 

शैलाताईंनी पळायला सुरूवात केली.त्यांच्यामागे आम्ही सर्वजण असलेल्या सर्व  शक्तीनिशी पळायला लागलो.

त्या आवाजाचा,जल्लोषाचा, वातावरणाचा, भक्तीचा ,असा काही परिणाम झाला होता की कित्येक वर्षात न पळालेलो आम्ही धावत सुटलो…..

पुढची दिंडी गाठली आणि उंच आवाजात..

 

” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल

पंढरीनाथ महाराज की जय

ज्ञानदेव महाराज की जय”

असा जयजयकार करीत वारीत सामील झालो. अपार आनंद झाला. थकलेल्या दमलेल्या मनाला उभारी आली.

परमेश्वराची मनापासून आळवणी केली आणि त्याचा धावा केला की तो जवळ येतोच….याची प्रचिती आली.

विठोबा ही आमचाच आणि रखुमाई पण   आमचीच…..

आज हे  सगळे आठवले …

मग  लक्षात आले की..

प्रत्यक्ष जीवनातही  कधीतरी हे घडते.

आपण रेंगाळतो, थोडे बेसावध होतो, थकतो आणि मग मागे पडतो… जीवनाला संथपणा कंटाळवाणेपणा येतो .

आपल्या अंगात शक्ती असते पण काय आणि कसं करायचं हे सुचत नसते.

” आमचा विठोबा आणि आमची रुखुमाई ”  हे साधे शब्द नव्हते  ते म्हणताना ताईंनी आधी आमच्या मनातले चैतन्य जागवले होते.  चेतवले होते  हे आत्ता लक्षात येते.

प्रेरणा देणारं  असं कोणीतरी समोर येतं …आपल्याला शिकवतं, सांगतं, शहाणं करतं…

कधीतरी ते आपलं अंतर्मन सुद्धा असतं .मात्र प्रयत्न आपल्याला कसून सर्व शक्ती पणाला लाऊन  स्वतःलाच करावे लागतात. मग ती गोष्ट साध्य होते.

आतून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची आस मनापासून हवी.

मानस श्रेयस असावे ..

त्यात पाऊले पांडुरंगाच्या वाटेने चालत असतील तर मार्गक्रमण अजून  सोपे होते .

वारीत आपल्या आसपास असलेल्या लोकांना नुसतं बघायचं वृद्ध लोक, म्हाताऱ्या बायका आनंदाने हसत खेळत चाललेल्या असतात . डोक्यावर तुळशी वृंदावन,गाठोडं  ,नाहीतर पिशवी काखेत कळशी , खांद्याला शबनम याचे त्यांना भान नसते…

अधीरपणे ते पुढे पुढे जात असतात त्यांच्या पांडुरंगाला  भेटायला..

अर्थात आपला पांडुरंग कोणता… हे ज्याने त्याने  मनाशी ठरवायचे …

आणि वारकऱ्यांसारखे त्या मार्गाने निघायचे….

मग तो भेटतोच…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्‌ । 

झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१ ॥

*

पावनकर्त्यात पवन  श्रीराम मी शस्त्रधाऱी

नक्र मी जलचरातील सरितेत गंगा सुरसरी ॥३१॥

*

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । 

अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्‌ ॥ ३२ ॥

*

विद्येमधील ब्रह्मविद्या मी तत्ववादही मी

सृष्टीचा समस्त आदी मध्य अंतही मी ॥३२॥

*

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । 

अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३ ॥

*

अक्षरगणातील अकार समासातील द्वंद्व समास मी

अक्षयकाल तथा विराटपुरुष धारणपोषणकर्ता मी ॥३३॥

*

मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्‌ । 

कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥

*

कारण सर्वोत्पत्तीचे सर्वविनाशक मृत्यूचे पार्था मी

नारी कीर्ति लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती क्षमा मी ॥३४॥

*

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्‌ । 

मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥

*

गेय वदांतील बृहत्साम छंदातील गायत्री मी

मासातील मी मार्गशीर्ष ऋतुश्रेष्ठ वसंत मी  ॥३५॥

*

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्‌ । 

जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्‌ ॥ ३६ ॥

*

कुटिलांमधील मी द्यूत प्रभावी पुरुषांचा प्रभाव

जेत्याचा विजय मी सात्त्विकांचा सात्विक भाव ॥३६॥

*

वृष्णीनां वासुदेवोऽस्मि *पाण्डवानां धनञ्जयः । 

मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥

*

वृष्णींमधील वासुदेव मी पांडवांतील धनंजय

मुनींमधील वेदव्यास मी कवींमधील शुक्राचार्य ॥३७॥

*

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्‌ । 

मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्‌ ॥ ३८ ॥

*

शास्त्याचा मी दंड विजीगीषूची नीती मी

गुह्याचा मी मौन ज्ञानीयांचे तत्वज्ञान मी ॥३८॥

*

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । 

न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्‌ ॥ ३९ ॥

*

सजीवोत्पत्ती कारण मजला जाणून घे अर्जुना

चराचरात कोणी ही  वसूनी नसते माझ्याविना ॥३९॥

*

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप । 

एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥

*

मम विभुतींना वा मम तेजाला नाही अंत परंतपा

तुझ्यास्तवे मी सांगितला चरुनीया संक्षिप्त रूपा ॥४०॥

*

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । 

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम्‌ ॥ ४१ ॥

*

कांती शक्ती ऐश्वर्यपूर्ण जे वसते विश्वात

मम तेजाचा अंश तेथ झालासे अभिव्यक्त ॥४१॥

*

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । 

विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत्‌ ॥ ४२ ॥

*

केवळ अंशाने माझ्या धारियले  विश्व समस्त

जाण इतुके चिकित्सका पार्था हेचि ज्ञान समस्त ॥४२॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी विभूतियोग नामे निशिकान्त भावानुवादित दशमोऽध्याय संपूर्ण॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवर्षी नारद… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

 कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ देवर्षी नारद – –… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

 अहो देवर्षिधन्योऽयं  यत्कीर्ति शार्ङ्गधन्वन: |

गायन्माद्यन्निदं तंत्र्या रमयत्त्यातुरं जगत् ||

अहो! हे देवर्षी नारद धन्य आहेत. जे आपली वीणा वाजवीत भगवत-  गुणगायनात तल्लीन होतात व संसारदुःखाने तप्त जीवांना सदा आनंदित करतात.

नर=पाणी. जलदान, ज्ञानदान आणि सर्वांना तर्पण अर्पण करण्यात पारंगत असल्यामुळे त्यांना नारद म्हणतात. ते वेद, उपनिषदांचे पारखे, देवांचे उपासक, पुराणांचे पारखी, आयुर्वेद आणि ज्योतिष शास्त्राचे महान अभ्यासक, संगीत तज्ञ आणि प्रभावी वक्ता आहेत.

आद्य पत्रकार, महागुरू व एकमेव देवर्षी असे नारद मुनी  .देवर्षी नारद हे भगवान विष्णूंचे महान भक्त आहेत. ते विश्वाचे निर्माते ब्रम्हा आणि विद्येची देवी माता सरस्वती यांचे पुत्र आहेत. भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच  देवर्षी ही पदवी मिळालेली आहे कारण देवत्व आणि

ऋषीत्व या दोन्हीचा समन्वय त्यांच्यात होता. त्यांना ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले आहे. त्यामुळे ते  आकाश, पाताळ ,पृथ्वी या तीनही लोकात भ्रमण करून  देव ,संत महात्मे ,इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधू शकत. त्यांची सुखदुःखे जाणून घेत अडचणी निवारण्याचा प्रयत्न करत म्हणूनच ते देवांना जेवढे प्रिय होते तेवढेच ते राक्षस कुळामध्येही प्रिय होते. पृथ्वी आणि पाताळ लोकातील माहिती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम देवर्षी नारद करत म्हणूनच त्यांना आद्य पत्रकार म्हटले जाते. ते सडेतोड पत्रकार होते.  उन्हाळ्यात जल व्यवस्थापनाचा संदेश देताना नारद मुनींनी वाटसरूंसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणपोयी उभारण्याची कल्पना सर्वप्रथम राबवली. त्यांनी अनेक स्मृती रचून त्यात दंड विधान निश्चित करण्याचे काम केले. दंडाच्या भयाने तरी मानवाने गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नये असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या एका हातात वीणा असते तर दुसऱ्या हातात चिपळ्या. त्याद्वारे ते भक्तीचा प्रसार करत. कीर्तन भक्तीचे श्रेय नारद मुनींनाच आहे. नारद मुनी जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तीरसाचा सुगंध देणारे मुनी आहेत .भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रामध्ये पारंगत आहेत. त्यांनी नारद पुराणाची रचना केली. ते स्वतः उत्तम वक्ते आणि श्रोताही आहेत .भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबरीश अशा महान व्यक्तिमत्त्वांना भक्ती मार्गावर त्यांनी नेले. नारद पुराण हे मानवाच्या सहिष्णुवृत्तीचे आदर्श उदाहरणच आहे. सर्व विषयात पारंगत नारद मुनी संगीताचे महागुरू आहेत. वीणा हे त्यांचे प्रिय वाद्य .सनत्कुमार कुलगुरू असलेल्या सर्वात पहिल्या विद्यापीठात नारदांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी सर्व विषयातील त्यांचे प्रभुत्व पाहून सनत्कुमार थक्क झाले होते. गॉड पार्टिकल किंवा ईश्वरीय कणाची संकल्पना त्यांनीच प्रथम मांडली. त्यांनी ज्योतिष विज्ञानाच्या व्यावहारिक  वापराविषयी खगोलीय परिणाम सांगून रचना स्पष्ट केल्या. अतिसूक्ष्म परमाणूंपासून अतिविशाल विष्णू या कर्त्याच्या रूपात भ्रमण करत विश्वाला प्राणवायू प्रदान केला जातो .विष्णू म्हणजे विश्व+ अणु अशी व्याख्या त्यांनी केली.

नारद मुनींनी भृगु कन्या लक्ष्मीचा विवाह विष्णूशी लावून दिला. इंद्राची समजूत घालून ऊर्वशी आणि पुरुरवा यांचे सूत जमवले. महादेवांकडून जालंधरचा विनाश करवला. कंसाला आकाशवाणीचा अर्थ समजावला. इंद्र, चंद्र, विष्णू, शंकर ,युधिष्ठिर, राम,कृष्ण यांना उपदेश देऊन कर्तव्याकडे वळवले. ते ब्रह्माजींकडून संगीत शिकले .ते अनेक कला व विषयांत पारंगत आहेत. ते त्रिकालदर्शी आहेत. वेदांतप्रिय, योगनिष्ठ ,संगीत शास्त्री, औषधी ज्ञाता, शास्त्रांचे आचार्य व भक्ती रसाचे प्रमुख मानले जातात. ते श्रुती- स्मृती, इतिहास, पुराण, व्याकरण, वेदांग, संगीत, खगोल- भूगोल, ज्योतिष ,व योग यासारख्या अनेक शास्त्रांचे प्रचंड गाढे विद्वान आहेत.

त्यांनी पंचवीस हजार श्लोकांचे प्रसिद्ध नारद पुराण रचले. नारद संहिता हा संगीताचा उत्कृष्ट ग्रंथ रचला. नारद के भक्तिसूत्र, बृहन्नारदीय उपपुराणसंहिता,

नारद- परिव्राज कोपनिषद व नारदीय शिक्षेसह अनेक स्तोत्रे देखील त्यांनी रचलेली आहेत.

काही कारणामुळे प्रजापती दक्षाने त्यांना शाप दिला की दोन मिनिटापेक्षा जास्त काळ ते कुठेही राहू शकणार नाहीत. त्यामुळे नारद सतत भ्रमण करत असतात. ब्रह्माजींच्या शापामुळे ते आजीवन अविवाहित राहिले. त्यांच्या नावावर नारदभक्तिसूत्रे, नारद स्मृती, नारदपंचरात्र, संगीत मकरंद, राग निरूपण, पंचसारसंहिता, दत्तील नारदसंवाद असे ग्रंथ आहेत.

कळलावे आणि कलहप्रिय अशी त्यांची ख्याती आहे. पण या दोन्हींतून ते चांगल्याच गोष्टी करत होते.

नारद मुनींच्या काही मिनिटांच्या सत्संगाने वाल्याचा वाल्मिकी झाला. ते महर्षी वेद व्यासांचे गुरु होते.

नारदमुनी अमर आहेत. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ एका वडाची गोष्ट… – लेखक : श्री श्रीनिवास चितळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ एका वडाची गोष्ट… – लेखक : श्री श्रीनिवास चितळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

१९६७  साली चिपळूणला मोठा भूकंप झाला आणि चिपळूणच्या इतिहासाचा शे, दीडशे वर्षाचा साक्षीदार उन्मळून पडला, वडाच्या नाक्यावरचा वड भुईसपाट झाला, काही दिवसांनी एका समारंभात देवळात आधी भंगलेली मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तशी नवीन वडाची फांदी त्या जागी स्थापित केली गेली, आमच्या दादानी घरातील भालावर खडूने लिहिले वड. दिनांक ४/२/१९६७. पूर्वी घरात मुल जन्माला आल कि अशी नोंद, घरातील भालावर खडूने करून ठेवायची जुन्या लोकांना सवय होती, माझ्या जन्माची नोंदही अद्याप तिथे होती. ” २८ मे १९५६, सकाळी ११. २० वाजता सिंधू प्रसूत झाली, मुलगा झाला “.

 चार, पाच  वर्षांनी गावातील स्त्रिया माझ्या चुलत्यांकडे आल्या व म्हणाल्या बन्या काका, वड मोठा झाला आहे, यावर्षी याची पूजा केलीतर चालेल का ? खूप लांब पागेवर पुजेला जायला लागत. दादा म्हणाले ठीक आहे, करतो सोय.

दादा तसेच उठले व वाण्याळीत खेडेकरांकडे गेले व म्हणाले महादेवशेठ, नाक्यावरच्या वडाची मे मध्ये मुंज करायला हवी, वडपौर्णिमेच्या पुजेला मुंज झालेला वड हवा.

महादेवाशेठ म्हणजे राजा माणूस, “बन्या, दणक्यात करू मुंज, सगळी तयारी कर, खर्च वाटेल तेवढा होऊदे “.

मुहूर्त काढला गेला, रीतसर मुंजीच्या पत्रिका छापल्या गेल्या, साग्रसंगीत बहिरीबुवा ते विन्ध्यवासिनी अशी देवाची आमंत्रण झाली. गावाला  सनई चौघाडयासह मिरवणूकीने आमंत्रणाची अक्षत फिरवली गेली, आणि सगळ गाव, तेव्हा लहान होत, घरातील मुलाची मुंज असावी अशा तयारीला लागला.

प्रत्यक्ष मुंजीच्या दिवशी तर धमाल, वडा भोवती मांडव घातलेला होता, प्रवेश दारावर केळीच तोरण, मुलीनी रांगोळ्या काढलेल्या, गावातील नवविवाहित जोडप्याकडे यजमानपद दिलेलं होत. दोन दिवस आधी ग्रहमक झाला होता, घरचे केळवण झाले त्याला शे शंभर माणसांची पंगत उठली होती. देवक ठेऊन झाल, अष्टवरघ्य, मातृ भोजन झाले आणि बरोबर १०. २३ मिनिटांनी कुर्यात बटोर मंगलम झाल, सनई, चौघडे, ताशे यांनी सर्व आसमंत दणाणून गेला. संध्याकाळी पालखीतून वडाच्या प्रतिकृतीची भिक्षाळा निघाली होती.

वड द्विज झाला. यज्ञोपवीत घातलेला, दृष्ट लागू नये म्हणून काजळाची तीट लावलेला, हळदी कुंकू लावलेला तो वड हि बटू सारखा देखणा व तेजःपुंज दिसायला लागला.

खेडेकरशेठ ना एक नवीन पैसा हि खर्च करावा लागला नाही, प्रत्येकाने स्वतःच्या घरच कार्य समजून सर्व सेवा फुकट दिली होती.

बासुंदी पुरीचा व १५० माणसांचा जेवणाचा खर्च मुंबई, पुण्यात स्थायिक झालेल्या चिपळूणकरानी उचलला होता.

त्या नंतर आलेल्या वड पौर्णिमेला स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही रीघ वडावर लागली होती बटू पादोदक तीर्थ घ्यायला.

त्याकाळी माणसं  खूप साधी होती, हि अंधश्रद्धा नाही का अस विचारणारा एकही सूर तिथे नव्हता, होता तो एक उत्कृष्ठ सार्वजनिक कामाचा जल्लोष आणि आनंद.

श्रीनिवास  चितळे 

(फोटोत तो वड दिसतोय, ज्याची ही गोष्ट आहे.)

 

लेखक : श्री श्रीनिवास चितळे 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 142 ☆ लघुकथा – पर्दा ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा पर्दा। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 142 ☆

☆ लघुकथा – पर्दा ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

‘पापा! आज भाई ने फिर से फोन पर बहुत अपशब्द बोले।‘  

‘बेटी! उसकी बात एक कान से सुनो, दूसरे से निकाल दिया करो।‘

‘पर आप दोनों से भी हर वक्त इतने अपमानजनक  ढंग से  बात करता है,अनाप- शनाप बोलता रहता है आपके लिए।‘

‘इकलौता बेटा है  हमारा, हमसे बात नहीं करेगा क्या? थोड़ा कड़वा बोलता है पर ?  पिता मुस्कुराकर – ‘अपने भाई साहब की बातों को  प्रवचन की तरह सुना करो, जो नहीं चाहिए, उसे छोड़ दो। ‘

‘हमसे सहन नहीं होता है अब यह सब, फोन नहीं उठाऊँगी उसका, बात ही नहीं करनी है हमें उससे। ‘

‘ऐसा नहीं कहते बेटी! एक ही तो भाई है तुम्हारा।‘ 

‘और मेरा क्या? मैं भी तो इकलौती बहन हूँ उसकी ?

‘भाई के मान – सम्मान का ध्यान रखो बेटी!‘

‘मेरा मान-सम्मान?’

‘तुम अपना कर्तव्य करो, बस—-’

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ श्री रणधीर की मूल पंजाबी सात कविताएँ   ☆ भावानुवाद – डॉ. जसप्रीत कौर फ़लक ☆

डॉ जसप्रीत कौर फ़लक

☆ कविता ☆ श्री रणधीर की मूल पंजाबी सात कविताएँ  ☆  भावानुवाद – डॉ. जसप्रीत कौर फ़लक 

श्री रणधीर

(भारतीय साहित्य अकादमी, (पंजाबी काव्य) 2023 का युवा कवि पुरस्कार विजेता रणधीर की चर्चित काव्य पुस्तक “ख़त जो लिखने से रह गए” में से चुनिन्दा कविताओं का अनुवाद करते हुए प्रसन्नचित हूँ। उनकी यथार्थ से जुड़ी हुई कविताएँ पाठकों को अपनी ओर आकर्षित करने में समर्थ हैं। समाज की कुरीतियों के सामने नये प्रश्न चिन्ह खड़े करती हैं। उनकी कविताएँ देखने में  छोटी हैं किन्तु, उनके भावार्थ का कैनवस बहुत विशाल है। ये प्रेम की अनुभूतियों को नये ढंग से परिभाषित करती हैं। उनकी रचनाओं में से जो जीवन दर्शन की तस्वीर उभरती है उसमें अपनी मर्ज़ी के रंग भरे जा सकते हैं। पंजाबी साहित्य को भविष्य में उनसे बहुत सी उम्मीदें हैं। मुझे पूर्ण विश्वास है कि यह अनुवादित रचनाएँ हिन्दी पाठकों को आनन्दित करेंगी।)

१.  साँचा

होता तो यूँ ही है

एक साँचा होता

एक मनुष्य होता

एक पंछी होता

मोटा-पतला

चलता-फिरता

साँचों के आगे आ बैठता।

 

पर साँचे क्रूर ही होते हैं

उड़ान, क़द, आकार नहीं देखते

लाभ-हानि नहीं झेलते

अपना नाप नहीं बदलते।

 

उड़ान को, परों को

ख़यालों को, ज़रूरतों को, अभाव को

सब कुछ भिक्षा-पात्र में बदल देते हैं

 

मनुष्य ऐसे ही तो नहीं

सीधा चलने लगता

सच-झूठ

पाप-पुण्य कहने लगता

 

होता तो यूँ ही है

बस एक साँचा होता….

 

२. बारिश बनाम कीचड़

खिड़की से बाहर

बारिश हो रही है

 

मैं अपने

कोट और टाई की तरफ़ देखता

डरते-डरते देखता हूँ

बड़े साहब की आँखों की तरफ़

बरसात

जिनके लिए बदबू है

बस कीचड़ और कुछ भी नहीं

 

मेरा मन उड़ कर

बारिश में भीगने को करता है

झुक जाता हूँ

कोट और टाई के बोझ के नीचे

सहम जाता हूँ

बड़े साहब की आँखों में

कीचड़ देख।

३. मैं और वह

अक्सर वह कहता

कि इन्सान के पास

बुद्धि हो

कला हो

महकते फूल हों

जागता आकाश हो

भागता दरिया हो

 

मैं अक्सर महसूस करता

इन्सान के पास

आँख हो

सिर हो

पैर हों

हाथ हों

इन्सान…

सफ़र, दरिया, आकाश, सूरज

स्वयं ही बन जाता।

 

४. प्रेम कविताएं

प्रेम में लिखी कविताएं

प्रेम ही होती हैं

छल-कपट से मुक्त

शोर से दूर

दोष/गुण से परे

चुप-चाप लिखी रहती हैं

पानी के सीने पर

 

एक रात

उतर जाता है आदमी

इस गहरे पानी में

हर खुलते रास्ते को बंद कर

गुम हो जाता है

इसके  गहरे धरातल में

 

आदमी डूब जाता

ऊपर उठ

तैरने लगती हैं कविताएं

निकल जाती हैं

दूर कहीं…

किसी और देश

किसी अनजाने सफ़र पर

 

आदमी को

डूबना ही पड़ता

तांकि तैरती रह सकें हमारे सीने पर

प्रेम  कविताएं।

 

५ . बूँद

मैंने

बारिश की हर बूँद के साथ

महसूस किया

कितने सागरों-दरियाओं को

स्पर्श का अनुभव।

 

६.  तेरे मिलने से पहले

तेरे मिलने से पहले

यह नहीं था

कि हँसता नहीं था

पंछी चहचहाते नहीं थे

दरिया बहते

फूल महकते नहीं थे

या ऋतुओं का आना-जाना नहीं था

यह भी नहीं

कि जीता नहीं था।

 

बस तेरे मिलने से पहले

मैं अर्थहीन था

साँसों से भरा

अहसास से विहीन

फूल की छुअन का अहसास

रंग-ख़ुशबू के नज़दीक ही जानता

पंछियों की बोली की ताल से

बे-ख़बर

इस गाती महकती धुन को रिकॉर्ड करता।

 

जंगलों में भटकता

पेड़ों के बराबर

साँस लेने में असमर्थ

पतंग की उड़ान को

डोर से ही देखता

हाथों की प्यास से अनजान

पानी की मिठास को

जीभ से ही चखता

जी रहा था मैं।

 

तेरे मिलने से पहले

मैं जीवन के इस तरफ़ ही था

तेरा मिलना

कोई दिव्य करिश्मा था

या चमत्कार कोई

जिसने हुनर दिया

इन्सान की हाथों की लकीर से

पार झाँकने का

चुप में मुस्कुराने का

जीवन को बाहों में भर कर

आलिंग्न करने का।

 

वैसे तेरे मिलने से पहले भी

जीता था मैं

मन चाहे रंगों की बात करता

साँस लेता

दूर खड़ा सब कुछ देखता।

 

७. ख़त जो लिखने से रह गए

उन दिनों में

मैं बहुत व्यस्त था

लिख नहीं सका तुझे ख़त

 

कई बार प्रयत्न किया

कोई बोल बोलूँ

शब्द घड़ूँ

पर

शब्द घड़ने की रुत में

पहुँच गया कान छिदवाने

“गोरखनाथ” के टीले

गली-गली घूमता

भटकता

फटे कान  ठीक करवाने

या वालियों का नाप देने के लिए

 

कुछ भी था

मैं बहुत व्यस्त था

इश्क़ को योग बनाने में

योग से इश्क जगाने में

 

अगली बार जब नींद खुली

मेरे पास मशक थी

घनेईया बाबा

पिला रहा था घायलों  को पानी

मैं दूर से ही

दोस्त-दुश्मन गिन रहा था

गिनती के जोड़-घटाव में

रुक गया

मेरे ख़तों का कारवाँ ।

 

उम्मीद नहीं छोड़ी

समय बीतता गया

किसी न किसी तरह

स्वयं को घसीट लाया

तेरे दर तक

चौंक गया

रास्ते की चकाचौंध देख

चुंधियाई आँखों से

शामिल हो गया अन्धी भीड़ में

जो जा रही थी

कहीं मकान गिराने

कहीं अबला की इज़्ज़त लूटने

कहीं बच्चों को अनाथ करने

मेरा क़ुसूर बस इतना था

कि चल पड़ा

उस भीड़ के साथ

नहीं तो उस समय

मैं ज़रूर लिखता तुझे ख़त

 

थोड़ी दूर आ कर

दम लेते हुए सोचा

अब है सही मौक़ा

शब्द उच्चारण का

अचानक देखते ही देखते

मेरे हाथ गले के टायर हो गए

धू-धू करते धधक गए

मेरे सहित कई और लोगों ने

शब्द खो दिए

 

तेरी शिकायत सिर-माथे

मुझे मुआफ़ करना

उम्मीद करता हूँ

सदी के इस साल में

लिख सकूँगा तुझे वो

“ख़त जो लिखने से रह गए”।

कवि – श्री रणधीर 

भावानुवाद –  डॉ. जसप्रीत कौर फ़लक

संपर्क – मकान न.-11 सैक्टर 1-A गुरू ग्यान विहार, डुगरी, लुधियाना, पंजाब – 141003 फोन नं – 9646863733 ई मेल – [email protected]

≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares