हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 248 – क्षणभंगुरता ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 248 क्षणभंगुरता ?

इन दिनों घर पर अकेला हूँ। वॉशिंग मशीन के बजाय हाथ से कपड़े धोने को सदा प्राथमिकता देता रहा हूँ। कपड़े भी दो-चार ही हैं, सो आज भी यही सुविधाजनक लगा।

कपड़ों पर साबुन लगाया। नल हल्का-सा चलाकर कपड़े उसके नीचे डाले। देखता हूँ कि साबुन के झाग से कुछ बुलबुले उठते हैं, कुछ देर पानी पर सवारी करते हैं। कोई जल्दी तो कोई देर से पर फूटता हरेक है।

विशेष बात यह कि इस पूरे दृश्य का चित्र सामने की दीवार पर बन रहा है। इसका कारण यह है कि बाथरूम के दरवाज़े के सामने वॉश बेसिन है। बेसिन पर एक बल्ब लगा है, जिसके कारण बुलबुलों के जन्म  और आगे की यात्रा का छायाचित्र दीवार पर बहुत बड़ा होकर दिख रहा है। इस दृश्य के साथ मानस में चिंतन भी विस्तार पा रहा है।

चिंतन बताता है कि  विसर्जन है, तभी सृजन है। पुरानी इमारतें कभी टूटती ही नहीं तो अधुनातन सुविधाओं वाली गगनचुंबी अट्टालिकाएँ कैसे बनतीं?  जो राजा मानव प्रजाति के आरंभ में होता, सदा वही राजा बना रहता। महान डॉन ब्रैडमैन आज भी क्रिकेट खेल रहे होते। जन्म हरेक पाता पर मृत्यु किसी की नहीं होती। इसके चलते धरती पर संसाधन कम पड़ने लगते। लोग एक दूसरे के प्राणों के ही शत्रु हो जाते।

सार यह कि यह मर्त्यलोक है। इसमें विनाश है तभी जीवन की आस है।  अनेक  ज्ञानी-ध्यानी कहते हैं कि जीवन क्षणभंगुर है। मैं विनम्रता से कहता हूँ, सिक्का पलट दो …, तुम पाओगे कि क्षणभंगुरता में ही जीवन है।

वस्तुत: क्षणभंगुरता वरदान है जीवन के लिए। हर क्षण को जीने का दर्शन है क्षणभंगुरता। समय की सत्ता है क्षणभंगुरता।

वन विभाग के एक अधिकारी मित्र ने एक बार निजी बातचीत में एक सत्य घटना सुनाई थी। मुख्यालय से उनके उच्चाधिकारी आए हुए थे।  उच्चाधिकारी अपने इस अधीनस्थ के साथ वनक्षेत्र के निरीक्षण के लिए निकले। रास्ते में  विशाल बरगद के नीचे एक औघड़ बैठे थे। पास के गाँव के कुछ ग्रामीण अपना भविष्य जानने की आस में उन्हें घेरे हुए थे। उच्चाधिकारी को जाने क्या सूझा!  कुछ व्यंग्य से आदेशात्मक स्वर में औघड़ से बोले, “इन गाँववालों को क्या भविष्य बताता है। बता सकता है तो मेरा भविष्य बता।” औघड़ गंभीरता से बोला, “तेरा क्या भविष्य बताना। तेरे पास अब तीन दिन ही बचे हैं।” उच्चाधिकारी आग-बबूला हो गए। औघड़ को अपशब्द कहे और आगे निकल गए।

संयोग कहें या विधि का लेखा, औघड़वाणी सत्य सिद्ध हुई और उच्चाधिकारी तीन दिन बाद सचमुच चल बसे।

मेरे मित्र ने यह घटना अपनी पत्नी को बताई। उसकी पत्नी ने तुरंत औघड़ बाबा से मिलने की इच्छा व्यक्त की ताकि पूरे परिवार का भविष्य पूछा जा सके। मित्र ने इंकार करते हुए कि जीवन में जो घटना होगा, अपने समय पर घटेगा। उसे पहले से जान लिया तो जीवन जीना ही असंभव हो जाएगा। बाद में औघड़बाबा से मिलने से बचने के लिए उन्होंने अन्य क्षेत्र में स्थानांतरण ले लिया।

कबीर ने लिखा है,

‘पाणी केरा बुदबुदा, अस मानुस की जात।

एक दिना छिप जाएगा,ज्यों तारा परभात।।

आयु का बुलबुला कब फूट जाए, कोई नहीं जानता। अत: हर क्षण जिएँ,  क्षणभंगुरता का आनंद उठाएँ। स्मरण रहे, क्षण-क्षण जीवन है, हर क्षण में एक जीवन है।…इति।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी 🕉️

🕉️ इस साधना में  – 💥ॐ नमो भगवते वासुदेवाय। 💥 मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे 🕉️

💥 ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 195 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain (IN) Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 195 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 195) ?

Captain Pravin Raghuvanshi NM—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’. He is also the English Editor for the web magazine www.e-abhivyakti.com

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc.

Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his Naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Awards and C-in-C Commendation. He has won many national and international awards.

He is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves writing various books and translation work including over 100 Bollywood songs for various international forums as a mission for the enjoyment of the global viewers. Published various books and over 3000 poems, stories, blogs and other literary work at national and international level. Felicitated by numerous literary bodies..!

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 195 ?

☆☆☆☆☆

कभी बेपनाह बरस पड़ी…

तो कभी गुम सी है…

यह बारिश भी

कुछ-कुछ तुम सी है…

☆☆

Sometimes it pours heavily…

and sometimes it seems silent…

this rain is also a bit like you…

☆☆☆☆☆

तुझे याद ना करें तो

बेचैन से हो जाते हैं,

पता नहीं जिन्दगी सासों से

चलती है या तेरी यादों से…

☆☆

If I don’t remember you,

I become restless. 

Knoweth not, whether life

is run by breaths or by your memories…

☆☆☆☆☆

आये  हो  जो  आँखों  में

तो  कुछ  देर  ठहर जाओ,

एक  उम्र  गुजर  जाती है

यूँही एक ख्वाब सजाने में…

☆☆

Now that you’ve come in eyes

then, stay there for a while,

An  epoch  passes  by  in

Realising  such  a   dream…!

☆☆☆☆☆

मेंरे जुनूँ का नतीजा

ज़रूर निकलेगा

इसी सियाह समुंदर से

नूर निकलेगा…

☆☆

Result of my passion

Will definitely come out

From the same dark sea only

The effulgence shall emerge…

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ The Grey Lights# 53 – “Angels Never Die…” ☆ Shri Ashish Mulay ☆

Shri Ashish Mulay

? The Grey Lights# 53 ?

☆ – “Angels Never Die ☆ Shri Ashish Mulay 

On meadows of mind

Horses of vices ride

flowers bloom again

from the strength of sky

Angels never die

 *

*Night pulls me down

darkness rules the town

I see everything clearly

moon rises in my eye

Angels never die

 *

Turns without a sign

wheel of destiny is fine

carves the own path,

virtues that never cry

Angels never die

 *

Try the best I can

When worst is rained upon

life is just a short while

for even if I die

Angels never die

© Shri Ashish Mulay

Sangli 

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ स्वर्गीय पिता से संवाद… ☆ श्री अजीत सिंह, पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन ☆

श्री अजीत सिंह

(हमारे आग्रह पर श्री अजीत सिंह जी (पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन) हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए विचारणीय आलेख, वार्ताएं, संस्मरण साझा करते रहते हैं।  इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। आज प्रस्तुत है श्री अजीत सिंह जी द्वारा पितृ दिवस पर स्वर्गीय पिताजी के साथ उनका आभासी संवाद ‘स्वर्गीय पिता से संवाद…’।)

☆ आलेख – स्वर्गीय पिता से संवाद… ☆  श्री अजीत सिंह, पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन ☆

पितृ दिवस पर स्वर्गीय पिता जी के साथ मेरा एक आभासी संवाद (virtual conversation)  हुआ। वे शायद स्वर्ग में हैं और स्वर्ग का कोई सही पता ठिकाना मुझे नहीं मालूम। मुझे लगता है कि स्वर्ग मात्र मेरे मानसिक पटल (mental space) पर है।

पिताश्री स्वर्गीय चौधरी मुगला राम

पिताजी से मैंने पूछा कि वे वहां पर कैसे हैं। हम सब यहां उन्हें याद करते हैं और उनके आशीर्वाद की कामना करते हैं कि यहां कब आयेंगे।

पिताजी का स्वर्ग में भी काफी बड़ा परिवार है। वे इसका जिक्र करते हैं। मैं उन्हें यहां के परिवार के बारे में बताता हूं।

पिताजी कहते हैं कि वे स्वर्ग में अपने परिवार के साथ खूब ठाठ कर रहे हैं। अंत में वे मुझसे पूछते हैं कि मैं स्वयं कब उनके पास जा रहा हूं।

ये सारा किस्सा मैने एक कविता/गीत के रूप में वानप्रस्थ संस्था द्वारा आयोजित कार्यक्रम में प्रस्तुत किया।

☆ स्वर्गीय पिता जी के साथ एक आभासी संवाद (virtual conversation) ☆

बाब्बू  बैठा कौन से देस

बदल कर भेस

बता कद आवेगा।

भेज कोई चिट्ठी या संदेश

 बता कद आवेगा।

*

पितृ पूजा पे कुनबा

आगया सारा,

वे पूछे हाल तुम्हारा।

बता कद आवेगा।

*

मां भी जाली,

जाली दो बड़नी बांहन,

दो छोटे बीरन भी,  जा लिए वहां

तेरे चार पोते,  नहीं  हैं यहां।

दो बेटी , तेरी विधवा बैठी,

बस एक का सही सुहाग।

बता कद आवेगा।

बाब्बू बैठा कौनसे देस

बदल कर भेस

बता कद आवेगा।

भेज कोई चिट्ठी या संदेश

 बता कद आवेगा।

*

एक पोता तेरा अफसर बंग्या,

एक दूजा ट्राला ऑपरेटर,

तीन पोते  जमींदारी करते,

चलावें ट्रैक्टर और थ्रेशर।

तेरा एक पड़पोता  अमरीका में

दूजा गया ऑस्ट्रेलिया।

एक पोती, एक द्योती तेरी बनी प्रोफेसर,

एक द्योति बनी बीमा मैनेजर

बता कद आवेगा।

बाब्बू बैठा कौनसे देस

बदल कर भेस

बता कद आवेगा।

भेज कोई चिट्ठी या संदेश

 बता कद आवेगा।

*

(अब बाब्बू कहता है)

तेरी मां भी मेर पास,

तीन और रानियों के साथ।

जगबीर  भरे हुक्का,

सुखपाल सुनावे  हाल,

यहां पूरा है जमाल।

पोते सिल्लू, प्रदीप, वेद यहां

घूम रहे हैं।

कुछ तो पी के यहां झूम रहे हैं।

*

बेटा लयूं सु सुरग के ठाठ

देखूं सु तेरी बाट

बता तू कब आवेगा ।

तेरी उम्र अठत्तर होगी,

तेरे बी पी शुगर होगी,

कितने दिन और है जीना,

बता  कब आवेगा ।

*

बाब्बू बैठा कौनसे देस

बदल कर भेस

बता कद आवेगा।

पितृ पूजा पे कुनबा

आगया सारा,

वे पूछे हाल तुम्हारा।

बता कद आवेगा।

*

(पिता कथन)

बेटा लयूं सु सुरग के ठाठ

देखूं सु तेरी बाट

बता कब आवेगा ।

तेरी उम्र अठत्तर होगी,

तेरे बी पी शुगर होगी,

कितने दिन और है जीना,

बता कब आवेगा ।

☆ ☆ ☆ 

© श्री अजीत सिंह

पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन हिसार।

मो : 9466647037

(लेखक श्री अजीत सिंह हिसार से स्वतंत्र पत्रकार हैं । वे 2006 में दूरदर्शन केंद्र हिसार के समाचार निदेशक के पद से सेवानिवृत्त हुए।)

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलिल प्रवाह # 195 ☆ सॉनेट – सीता ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है सॉनेट – सीता…।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 195 ☆

☆ सॉनेट – सीता ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

वसुधातनया जनकदुलारी।

रामप्रिया लंकेशबंदिनी।

अवधमहिष वनवासिन न्यारी।।

आश्रमवासी लव-कुश जननी।।

क्षमामूर्ति शुभ-मंगलकारी।

जनगण पूजे करे आरती।

संतानों की विपदाहारी।।

कीर्ति कथा भव सिंधु तारती।।

योद्धा राम न साथ तुम्हारे।

रण जीते, सत्ता अपनाई।

तुम्हें गँवा, खुद से खुद हारे।।

सरयू में शरणागति पाई।।

सियाराम हैं लोक-हृदय में।

सिर्फ राम सत्ता-अविनय में।।

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

१२-४-२०२२

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोंगटी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘सोंगटी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(गालगागा गालगागा गालगागा गा)

सोंगटी मी या पटावर खेळते आहे

खेळताना नेहमी मी हासते आहे

*

हार किंवा जीत या खेळात ठरलेली

रात्र सरुनी सूर्य येईल थांबते आहे

*

का करू मी काळजी सार्‍या जनाची या

कोण कसले भोवताली जाणते आहे

*

ज्या प्रमाणे कर्म ज्याचे फळ तसे मिळते

पात्र मीही ज्या फळाला चाखते आहे

*

चूक झाली एकदा जी ना पुन्हा व्हावी

याचसाठी मी सदा सांभाळते आहे

*

खेळताना वाटला प्रारंभ सुंदरसा

वाकडी मज वाट मधली वाटते आहे

*

हात तू माझा कधी धरशील का देवा

भिस्त सारी मी तुझ्यावर सोडते आहे

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढाळ मन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ ओढाळ मन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

मन आभाळ आभाळ,

कधी सान, कधी विशाल!

कधी पाण्याचा डोह,

कधी सागर  नितळ!

*

कधी असे ते पाखरू,

तेजापाशी झेपावलेले

कधी असे ते निश्चल,

कूर्मापरी स्थिरावलेले!

*

कधी अतीच चपळ,

निमिषातच दूर धावे!

कधी असते निश्चल,

वज्रासारखे एक जागे!

*

मना तुझा ठाव,

घेता येईना जीवाला!

फिरते मीही तुझ्या संगे,

गिरकी सोसेना ती मला!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

अल्प परिचय

शिक्षण – MSc, MA, B.Ed (English literature).

मूळअमरावती. पुण्यात स्थायिक.

English मध्ये 50च्या वर कविता व short philosophical write ups लिहिल्यानंतर Divine Meet नावाचे booklet प्रकाशित झाले.

मराठीत पण कविता, ललित, चारोळ्या व निवडक दासबोध निरूपण असे अमृतकण नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

🌳 विविधा 🌳

☆ ✍️सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सहजता म्हणजे नैसर्गिकता..

म्हणजेच कृत्रिमतेच्या विरुद्ध…

साधा सरळ विचार व आचार. काहीही मनात आले, येऊ द्यावे शांतपणे विचार करत करत कोणतीही कृती न करता विचारांना निघून जाऊ द्यावे. त्याची जागा दुसर्याने घेतली तरीही हाच प्रकार चालू ठेवावा.

काही दिवस असे केले की कोणत्याही विचारांकडे तटस्थपणे पहाणे जमते. काहीही विशेष परिणाम दिसत नाहीत व मग जी कृती केली जाते ती अतिशय संयमाने विचारपूर्वक घडते. परिणाम काहीही असोत, सध्याच समाधान मिळते कारण सहजता येते. कोणताच व कशाचाच अट्टाहास त्यात नसतो. म्हणून जे व जसे घडत जाते त्याकडे विवेकाने पहाण्याची दृष्टी मिळते व कृतीत साहजिकच आनंद मिळतो.

समाधान हे नेहमी अपूर्णतेतच असते हे निश्चित मानावे.

मोठे ध्येय ठरवण्यापेक्षा छोटे काहीतरी निश्चित करावे, ते करत असतानाच जर समाधान मिळाले तर पुढे ठरवलेले पूर्ण होईलच त्याचबरोबर आताचा वेळ सत्कारणी लागेल. क्षणाक्षणाचा आनंद मिळेल.

एखादा चांगला लेख video वाचनात आला की त्याचा त्याच क्षणी आनंद घ्यावा याचा लेखक कोण, त्यांचे इतर लेख कोणते वगैरे नी पाठपुरावा करत बसले तर कदाचित त्यांचे सगळेच साहित्य आवडेल असे नाही, उलट वेळ वाया जाऊ शकतो. एकाचेच एककल्ली वाचन, श्रवण करण्यापेक्षा विविध प्रकार हाताळावेत म्हणजे तो motto टिकून रहातो व जे हवंय, रुचतंय तेच मिळत जातं. तसंही सत्य एकच असतं, ते कोणी कसंही मांडू देत. यात स्वत: चीच आवड जपली जाते व अट्टाहासाचा त्रागा वाचतो.

आताचा आनंद‌ उद्यावर किंवा इतर कुठे कसा असेल? हे उमगले की शांतता येते. हे लिहिणे सुध्दा कोणताही कशाचाही जोर नाही. जे जे जसे असेल ते तसे तसे मनापासून स्वीकारणे‌ हा साधा सरळ योग आहे.

तुलना, अपेक्षा, मोठमोठी स्वप्ने आपले आताचे आयुष्य बिघडवत असतील तर ते पूर्ण झाले तरी काय उपयोग?

पूजा हा ध्यानाचा सगळ्यात मोठा राजमार्ग!!! पण तिथेही हेच, असेच, ह्यानेच, त्यानेच, हा देव तोच देव, ही उपासना ती उपासना मग मन भरकटते व पूजा फळत नाही. एक श्लोक भगवंताकडे बघत आनंदाश्रूसकट म्हंटल्या गेला व कृतज्ञता जाणवली की झाली पूजा!!!

इतकं साधं सरळ असताना नको त्या उपचारात अडकणे म्हणजे कृत्रिमताच.

आईवर निबंध लिहून, तिला भारी भेटवस्तू देण्यापेक्षा “आई” ही “कृतज्ञ हाक” तिला गहिवरून टाकणार नाही का?  देवाचेही अगदी तसेच आहे.

तो आपल्या आतच असल्यामुळे सगळे जाणतो व अनैसर्गिक जे आहे ते तो‌ ओळखतो सुध्दा!! हेच सत्य आहे.

आपणच आपले खूष रहायचे तर तो‌ आतील परमात्मा मनापासून प्रेम करतो व त्याच्यासारखा सतत आनंदी रहाण्याचा आशिर्वाद देतो.

आनंद ही आत्मवस्तू आहे, ती इतरांवर अवलंबून कशी असेल?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माणुसकी… ☆ डॉ. शैलजा करोडे

घड्याळात रात्रीच्या नऊचे ठण ठण ठण ठण टोले पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली. माझ्या समोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं, त्यांचा अंत्यविधी करायचा होता.या पंधरा मजली इमारतीत हजारों कुटुंबे होती, पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं. जो तो आपापल्या कोषात मग्न. दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल, काम्युटरवरील WhatsApp, Facebook book, Twitter, Instagram च्या आभासी जगात व्यस्त.

सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली. प्रत्येकाचे RIP, भावपूर्ण श्रध्दांजली, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती, ओम शांती सारख्या मेसेजेसनी WhatsApp फुल झालं. Vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं, केलंय आपण सांत्त्वन हीच धारणा सगळ्यांची. पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही, मदत करणे तर दूरच.

बरे माझे नातेवाईकही भरपूर, सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे. बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.

“चांगल्या डाॅक्टरला दाखवा, ट्रिटमेंट करा, काळजी करु नका,  होतील बाबा बरे, अशा संदेशांनी, होय संदेशच, आभासी जगातला. कोणी video call वरही बोलले, पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.

प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची.कोणाच्या घराचं बांधकाम, मुलांच्या परीक्षा, नोकरीतून रजा न मिळणं, कोणाचा भराला आलेला शेती हंगाम, अर्थात कोणी येणार नव्हतंच.

“अहो, काहीतरी करा ना. रात्र वाढतेय, पिंटू ही पेंगुळलाय, पण झोपत नाहीय. आजोबांना सारखं उठवायला सांगतोय, कसं समजावू त्याला.”

“होय ग, मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला”

साडेनऊचा टोला घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं, जुन्या काळातलं, ठण ठण टोल देणारं, माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं, अनेक वेळां दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं…

दुपार पासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले. जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले, “नाही जमणार हो मला यायला, माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे, त्याला आणायला जायचंय.”

चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो. अरे भाईसाहब, मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे, उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे…

तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला, “आलो असतो रे, पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी. प्रबोधनात्मक भाषण तर असतेच, पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस. धीर धर,स् वतःला सांभाळ.”

सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर, अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा अशौच (मयतीत जाणं,सुतकीय कार्य) प्रसंगी आज नाही येता येणार मला.

शेजारचा “स्वामीनाथन” नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील “सुत्रावे” वीकएंडला गेलेला….

दुसर्‍या माळ्यावरील “कोटनाके” कवी संमेलनासाठी जाणार होते. प्रत्येकाची काही ना काही कामे. घाबरू नको, येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.

काय करू..? आज पावसानेही हैराण केलेलं. दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती, आता त्याचाही जोर वाढला होता, मला तर भडभडून आलं.

मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती, पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 

शेवटी मनाचा निग्रह करून उठलो, माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता. हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.

“संतोष” माझा काहिसा कापरा, आर्त, दाटलेला, अवरूध्द स्वर ऐकून तो म्हणाला, “काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी”

अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही. मदतच नाही मिळाली रे मला कोठे.”

“ओह…बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका. माझे चार दोस्त आताच बोलावतो. करू आपण सगळं व्यवस्थित”. त्याने फटाफट मोबाईल वरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.

ये महेश, येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील ? होय आपल्या बाबासारखेच आहेत ते. या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे. दिनेश, शिवा आणि मधुकरलाही सांगशील…

सगळं कसं फटाफट झालं पाहिजे, रात्र वाढतेय, पाऊसही हैराण करतोय.

संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्या पासुन तर तिरडी बांधण्या पर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.

“मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो” “अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा, माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही, बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही.

चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली. बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला. संतोषनं मला सावरलं, माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत, मला मुखाग्नी द्यायला लावला. पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला. बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला. चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला, “चला दादानु, घरी चला… वहिनी वाट बघत्याल “संतोषनं मला घरी सोडलं. 

“येतो दादा”…

“थांब संतोष” मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या, “घे संतोष”…

हे काय दादानु, पैसे नकोत मला.” 

“अरे तुम्ही खर्च केलात, वेळेवर धावून आलात, ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती, याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे. पण शेवटी हा व्यवहार आहे. घ्या हे पैसे”

दादानु…”तुमचे बाबा आमचे बी बाबाच की. नको मला पैसे.

शेवटी काय असतं दादानु, “माणूस मरतो हो, माणुसकी नाही. इथे व्यवहार गौण ठरतो दादा, येतो मी…”

वहिनीस्नी सांभाळा. पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.

बाहेर पाऊसही आता मंदावला होता. बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती… 😥

या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती…..!

नर देह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नेमकं जगावं कसं ?  तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं…! 

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही….! 

आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत… आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…! 

चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं….,! 

“पुढे चला… पुढे सरका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….

खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच… 

पण कुणावर विशेष लोभ नाही…

कोणावर राग तर मुळीच नाही… 

कुणाचा द्वेष नाही… 

कुणाचा तिरस्कार नाही… 

आपला संबंध फक्त तिकिटापुरता… ! 

कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही… 

कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही… 

दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं… 

येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…

मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते…. 

प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं …. 

आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं…. 

पण त्या गावात अडकायचं नाही…. 

आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या “ठेसनावर” जायचं….

“शिंगल” बेल मारली की थांबायचं… “डबल” मारली की निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे…. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…! 

हा शेवटचा स्टॉप आहे….समद्यानी उतरून घ्या… असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की “आपल्या घरी” निघून जायचं…. ! 

उद्या कुठे जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल…. ? हे ठरवणारा वेगळा असतो… 

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही… ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही…

शाश्वत एकच आहे… तो म्हणजे प्रवास…! 

आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… प्रवास सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

वैद्यकीय

  1. नेहमीप्रमाणेच या महिन्यात सुद्धा रस्त्यावर अनेक लोक असे सापडले, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, अक्षरशः हात किंवा पाय कापावे लागले,अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं…. पाण्याबाहेर माशाला काढल्यानंतर तो जसा तडफडेल, तसे तडफडणारे लोक पाहिले… कागद फाटतो तसा, गाल फाटलाय… गळा कापलाय… नारळ फुटतो, तसं डोकं फुटलंय… आणखी हि बरंच काही दिसतं…!

डॉक्टर असून सुद्धा, हे पाहताना माझी चलबीचल होते… शेवटी मी सुद्धा माणूसच आहे…! 

माझ्याही पेक्षा जास्त, तुम्ही सर्व संवेदनशील आहात आणि म्हणून मी असे कोणतेही फोटो / व्हिडिओ शेअर करत नाही…! 

असो… 

पण हि माझी माणसं कालांतराने बरी होतात… रानफुलं हि…. यांना ना पाणी लागत… ना खत लागत… ना मशागत….! 

“प्रेमाचं” आणि “मायेचं” टॉनिक यांना पुरतं…!!! 

जवळपास दोनशे किलोचं साहित्य मी माझ्या गाडीवर आणि बॉडीवर घेऊन रोज फिरत असतो दिवसभर…. पण आतली गोष्ट सांगतो…. माझ्याकडे कोणतंही औषध नसतंच मुळात… ! 

मी फक्त “प्रेमायसिन” आणि “मायामायसिन” हे दोनच टॉनिक घेऊन फिरत असतो…!

हिच दोन औषधे, सर्वच्या सर्व रोगांवर जालीम इलाज आहेत…. !

अं… हं…. !  मेडिकलमध्ये मिळणार नाहीत हि औषधे…  

तुम्ही “तुमचा कप्पा” खोला…  प्रेमायसिन आणि मायामायसिन…  आधीपासूनच निसर्गाने आपल्याला भरभरून दिली आहेत… ती तुम्हाला या कप्प्यात मिळतील….

गरज आहे; ती हि औषधे मनापासून वापरण्याची … !!! 

या औषधांना एक्सपायरी डेट नसते…. कधीही कुठेही ही औषधे वापरता येतात… कोणताही साईड इफेक्ट नाही…. 

झालाच तर फक्त फायदा आणि फायदाच होतो … देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही…! 

Try करके देखो, अच्छा लगता है …!!!

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. एक प्रौढ महिला…. घरात सर्व लोक असूनही, मुलाबाळांनी तिचा गोडवा पातेल्यात काढला,या गोडव्याचा आमरस करून खाऊन झाल्यानंतर, तिला कोय म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं ….
  2. म्हाताऱ्या सासू सोबत जगणारी, एक तरुण महिला; आपल्या मुलांना घेऊन जगण्याची लढाई लढत आहे… नवरा नावाचा प्राणी”बेधुंद” असतो…मुलं आणि सासूला जगवण्यासाठी थोडा वेळ हि ताई काम करते…. थोडा वेळ सासूसह भीक मागते…! (हिच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली आहे)
  3. चुकून मार्ग चुकलेला एक तरुण… !

आपणही आडवाटेवर खूपदा चुकून चुकतो… चुकायची इच्छा कुणाचीच नसते, परंतु परिस्थिती रस्ता चुकायला लावते… मग एखाद्याची आपण वाट पाहतो… कोणीतरी येईल आणि मला रस्ता दाखवेल…

आपण रस्त्यावरच्या एखाद्याला पोटतिडकीनं पत्ता विचारतो…. तेव्हा एखादा “तो”, तोंडातली तंबाखूची गुळणी आवरत, पण अगदी मनापासून आपल्याला सांगतो…”आता सरळ जावा… मंग दोन फाटे फुटतील, तिथं डाव्या हाताला वळा…. थोडं फुड गेला की एक चौक लागंल… चौकातनं उजव्या हाताला वळा… तीतं मारुतीचं मंदिर लागंल… मारुतीच्या मंदिराला वळसा घातला की मंग आलं तुमचं ठिकाण…!”

भेटलेला “हा” आपल्या आयुष्यातला वाटाड्या…!!!

पत्ता सोपाच असतो, परंतु कोणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही…! 

जेव्हा आपण चुकलेलो असतो, तेव्हा एखाद्या अशा पत्ता सांगणाऱ्या “वाटाड्याची” मात्र गरज असते…

आपणा सर्वांच्या मदतीने या तरुणाचा मी वाटाड्या झालो… ! 

या तिघांनाही आपण स्वतंत्रपणे तीन हात गाड्या घेऊन दिल्या आहेत… 

यावर ते भाजीपाला विकतील, लिंबू सरबत विकतील किंवा भंगाराचा व्यवसाय करतील…. काहीही करोत… पण माणसं म्हणून जगतील…!

रस्ता वर्षानुवर्ष तिथेच होता….पोचायचं ठिकाण सुद्धा वर्षानुवर्ष तिथंच जवळच होतं… ते वाट चुकले होते… मी फक्त तुमच्या साथीने;  “वाटाड्या”  होऊन त्यांना वाट दाखवली…. बाकी माझं काहीही कर्तुत्व नाही…. !!! 

4. जिला कुणीही नाही अशी एक मावशी, दोन लहान मुलं पदरात असणारी एक विधवा ताई…. फरशीवर पाणी सांडल्यानंतर ते अस्ताव्यस्त जसं कुठेही दिशाहीन फिरतं तसाच दिशाहीन फिरणारा एक तरुण….!

तिघेही गटांगळ्या खात होते…. फक्त एका काडीचा आधार हवा होता… आपल्या सर्वांचे वतीने तिघांनाही हा काडीचा आधार दिला आहे. 

 तिघांनाही छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीने आर्थिक मदत केली आहे. 

वरील सहा जणांच्या आयुष्याविषयी जर लिहायचं ठरवलं तर सहा स्वतंत्र पुस्तक होतील….! 

तुटून फुटून गेली होती ही माणसं…. पण हरकत नाही, आयुष्याला आकार द्यायला स्वतःला तोडून फोडूनच घ्यावं लागतं…! 

भीक न मागता यांना काम करायला सांगितलं आहे… त्यांना हे सुद्धा सांगितलं आहे की, फक्त नशिबावर विश्वास ठेवू नका… निसर्गाने सुद्धा हाताच्या रेषांआधी प्रत्येकाला बोटं दिली आहेत…. ती काम करण्यासाठी… मेहनत करण्यासाठी… भविष्य बघण्यासाठी नव्हे…! 

शैक्षणिक 

दुसरी- तिसरी -पाचवी, सातवी- बीबीए – कम्प्युटर सायन्स – यूपीएससी… आमची मुले या इयत्तांमध्ये शिकतात…! 

या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत…! 

माझ्या आयुष्यावर जे पुस्तक लिहिलं आहे…. ते आपण विकत घेतलं आणि म्हणून मी या मुलांच्या फिया भरू शकलो…! 

जी मुलं राहिली असतील त्यांच्या फीया जूनच्या पहिल्या आठवड्यात भरणार आहोत…! 

ज्यांना या अगोदर शाळाच माहीत नव्हती, अशा सर्व मुला मुलींना मॉडर्न स्कूल, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन देत आहोत. 

यातला एक जाणता मुलगा परवा रागाने मला म्हणाला, ‘असल्या भिकारी आई बापाच्या घरात माझा जन्म झाला म्हणून माझं आयुष्य वाया गेलं… चांगल्या घरात जन्मलो असतो तर माझ्या आयुष्याची अशी वाट नसती लागली… मला जर वरदान मिळालं; तर मी पहिल्यांदा आई बाप बदलेन…’ 

त्याला फक्त इतकंच सांगितलंय…. ‘आतापर्यंत भर समुद्रात जे जहाज तुला घेऊन आलंय त्या जहाजाला विसरू नकोस… या जहाजाविषयी कृतज्ञता बाळग… नाहीतर इथपर्यंत सुद्धा आला नसतास…. वादळ आलं; की दिशा बदलायची असते बाळा… जहाज नव्हे…! 

डोळे तपासणी

ज्यांना डोळ्यांचे काही त्रास आहेत, अशा सर्वांना आपण महिन्यातील एका दिवशी, एका ठिकाणी जमा करतो आणि त्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन डोळे तपासणी / ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे एक तर त्यांना चष्मा मिळतो किंवा डोळ्यांचं ऑपरेशन होतं. 

परंतु आमच्याकडे असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतके शारीरिक त्रास आहेत की, त्यांना आमच्याबरोबर, आमच्या गाडीत बसून तिथं येणं सुद्धा जमत नाही… ऑपरेशन आणि तपासणी तर दूरच…

अशांसाठी आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे. रस्त्यावरच डोळे तपासणी करून आम्ही रस्त्यावरच आता त्यांना चष्मे द्यायला सुरुवात केली आहे. 

जवळपास अंधत्व आलेल्या माझ्या या लोकांना जेव्हा दिसू लागतं… तेव्हा माझ्या नजरेत नजर घालून माझ्याशी ते मायेनं बोलतात… आणि त्या प्रत्येक डोळ्यात मला मग सूर्य दिसतो…. ! 

सुरकुतलेले खरबरीत हात मग किरण होऊन माझ्याकडे झेपावतात…. आणि हे किरण, माझ्या मस्तकाचे, गालाचे आणि हाताचे मुके घेतात…! 

आणि मग सुर्य आकाशात नाही… तो आपल्या आई – बाबा,आजी आणि आजोबाच्या डोळ्यात आपल्याच घरी आहे हे उमगतं…! 

कोण म्हणतं सूर्याजवळ जाणं अशक्य आहे…? आपले बाबा आणि आजोबा यांच्या जवळ एकदा मनापासून जाऊन बघा… सूर्य तिथे भेटेल…! 

चंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही यानाची गरज नाही… आईचे / आजीचे पाय एकदा मांडीवर घेऊन बघा…. चंद्र तिथे भेटेल…!!

जे काही थोडंफार करू शकलो तुमच्या साथीनं, त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून आनंदाश्रू गालावर ओघळले… 

अश्रूंचा हा खारट स्वाद कोणत्याही मिठाई पेक्षा कमी नव्हता…! 

माझ्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण केवळ तुम्हा सर्वांमुळे आले आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर…!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares