मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शाॅवर…’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘शाॅवर…’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

वर्षभर .चाललेलं बंगल्याचं काम आता संपलंच होतं. कधी पण ठेकेदार सांगेल, ‘‘आता पुढच्या कामावर जा.’’ त्याला रखमा अन् धर्माची तयारी असायली हवी. त्याच विचारात रखमा होती. तेवढ्यात गणू येऊन तिला बिलगला. म्हणाला,

‘‘आये, कवा यायाचं आपल्या नव्या घरात र्‍हायाला?’’

‘‘कुठलं रं नवं घर?’’

‘‘ह्योच की आपला बंगला. तू अन् बानंच बांधलाय न्हवं? तू घमेले वहायची, बा भित्ती बांधायचा. मंग? आता झाला ना पुरा?’’

रखमाला हसावं का रडावं कळंना. ‘‘आरं बाबा ह्यो आपला न्हाय बंगला. काम झालं. आता जावं लागंल म्होरल्या कामावर.’’

हे ऐकताच गणुनं भोकाड पसरलं. हातपाय आपटत म्हणू लागला, ‘‘न्हाय! म्या न्हाय येणार. हे आपलं घर हाय. हिथंच र्‍हायाचं.’’ असं म्हणून तो पळत सुटला.

रखमा तिच्या टपरीत आली. बराच वेळ झाला, तरी गणू येईना. ती हाका मारून दमली. शेवटी बंगल्यातच आहे का बघावं म्हणून हाका मारतच आत शिरली. पाण्याचा जोरात आवाज आला. ती बाथरुमपाशी आली. तिथं गणूचा जलोत्सव चालू होता. शॉवर सोडून त्याखाली नखशिखांत भिजत-नाचत होता. ओरडत होता. त्या आवाजात त्याला आईचा आवाजही आला नाही.

आता मात्र रखमा जोरात ओरडली, ‘‘आरं एऽ मुडद्याऽ, कवाधरनं हाका मारतीया… चल घरी.’’ गणुला कुठलं ऐकू यायला?

रखमानं पुढं येऊन शॉवर बंद केला. खस्कन त्याच्या दंडाला धरून ओढत, फरफटत टपरीत घेऊन आली. त्याचा अवतार पाहून त्याचा बापही ओरडला, ‘‘कुठं रे गेला हुता, एवढं भिजाया?’’

‘‘अवं, बंगल्याच्या मोरीत नाचत हुता. वरचा पावसाचा नळ सोडून.’’

लुगड्यानं, गणुचं अंग, डोकं खसाखसा पुसत रखमा करवादली!

‘‘काऽय?’’ धर्मा ओरडला.

‘‘जाशील का जाशील परत?’’ म्हणून रखमानं त्याला जोरदार थप्पड मारली.

एवढा वेळ आनंदात नहाणारा गणू, आता मुसमुसून रडू लागला. त्याला कळतच नव्हतं आपल्याल घरात जायला आपल्याला बंदी का? ‘‘चल मुकाट्यानं भाकरटुकडा खाऊन घे!’’

‘‘मला न्हाय खायाची भाकर.’’ असं म्हणून गणू तणतणत उठला.

‘‘जाऊ दे. जाऊ दे. भूक लागली की चट् खाईल.’’ … गणूचे लाड करायला, त्याच्याकडं ना वेळ होता, ना पैसा.

गणू मनानं अजून बंगल्यातच होता. शॉवरखालची आजची अंघोळ त्याच्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा प्रसंग होता. त्या आनंदातच जमिनीवर पसरलेल्या फरकुटावर तो झोपून गेला. त्या इवल्याश्या जिवाला अंघोळीनं नाही म्हटलं तरी थकवाच आला. पण त्या आनंदातच त्याला झोप लागली.

झाकपाक करून रखमा त्याच्याशेजारी लवंडली. पोर उपाशी झोपलं म्हणून तिला गलबलून आलं. ‘‘काय बाई यडं प्वार’’ थोडंसं कौतुकानं, थोडं काळजीनं तिनं त्याला जवळ ओढलं. पोटातलं पोर लाथा मारत होतं. रखमाला बाळंतपणाची काळजी वाटू लागली.

दुसर्‍याच दिवशी ठेकेरादानं सांगितलं, ‘‘8 दिवसांनी मुहूर्त हाय मालकाचा. बंगला साफसूफ करून घ्या. आता दुसर्‍या कामावर जायला लागंल. धर्माच्या पोटात धस्स झालं. पण ते चुकणार नव्हतंच. संध्याकाळी त्यानं रखमाला सांगितलं, ‘‘आरं देवा’ म्हणत तिचा हात पोटावर गेला. पण त्यांनी मनाची तयारी केली.

वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी शर्मा कुटुंब बंगल्यात आलं. तोपर्यंत गणू रोज बंगल्याच्या ओट्यावरच झोपायचा. आई-बापाशी त्यानं पूर्ण असहकारच पुकारला होता. आई-बापालाही त्याची मनधरणी करायला वेळ नव्हता.

बंगल्याची वास्तुशांत झाली. त्यात शर्मांचं सारं कुटुंब राबत होतं. संध्याकाळी धर्माला अन् गणूला कापड अन् रखमाला साडीचा आहेर मिळाला. गोडाचं जेवण झालं. दुसर्‍या दिवशी धर्मा अन् रखमाचा मुक्काम दुसर्‍या कामावर हालला. किती समजावून सांगितलं रखमानी, पण गणू त्यांच्याबरोबर गेला नाही. त्याचा एकच हेका होता, ‘‘आपला बंगला सोडून म्या येणार न्हाय.’’ राहू दे हितंच. पोटात कावळे कोकलतील तेव्हा येईल चट्! मुकाट्यानं!

दोघांनी विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर घेतलं अन् मुक्काम हलवला. रखमाचा जीव तुटत होता, पण करणार काय? इथल्या टपरीचे पत्रेही काढले होते. संध्याकाळी त्याला घेऊन जाऊ म्हणून ती काळजावर दगड ठेवून निघाली. गणूने ढुंकूनही तिकडे लक्ष दिलं नाही.

बंगल्याचे मालक मनिष शर्मा आणि सुनिता शर्मा, हे साधं-सुधं प्रेमळ दांपत्य होतं. गडगंज श्रीमंत तेवढंच मनानंही श्रीमंत अन् दिलदार! मनिष शेअर ब्रोकर होता. घरातच त्याचं ऑफिस होतं. सुनिता घरकाम सांभाळून त्याला मदत करत होती. त्यांना श्वेता नावाची 4 वर्षाची गोड मुलगी होती. तिची गणूशी लगेच गट्टी जमली.

आईबाप गेल्यावर श्वेताशी खेळण्यात गणूचा दिवस गेला. रात्री गणू बंगल्याच्या ओट्यावरच झोपला. झोपण्याचं फटकूर त्यानं ठेवून घेतलं होतं. तसा तो हिंमतीचाच!

पहाटे मनिष आणि श्वेताही बाहेर आले तेव्हा त्याला गणू दिसला. पाय पोटाशी घेऊन झोपला होता. मनिष तिला म्हणाला, ‘‘देखो ये बच्चा सोया है । उसे कुछ शॉल वगैरे देना । श्वेतानेही स्वतःची शाल आणून त्याच्या अंगावर घातली.

सकाळी गणूला जाग आली. अंगावरच्या त्या मुलायम शालीने तो हरखून गेला. त्या मुलायम स्पर्शाने आईच्या पातळाचा स्पर्श आठवला. डोळे भरून आले. श्वेताने त्याला विचारलं, ‘‘रोते क्यौं?’’ आपल्या इवल्याशा हाताने त्याचे डोळे पुसले. आता तर त्याला आणखीनच रडू यायला लागलं. तिने आईलाच बोलावून आणलं. ‘‘देखो भैय्या रोता है.’’

सुनिताने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला विचारलं, ‘‘काय झालं, भूक लागली का? तू आईबरोबर नाही गेला का?’’

तो फक्त रडत राहिला. सुनिताने त्याला विचारलं, ‘‘चाय पिओगे?’’ तो काहीच बोलला नाही. सुनिता त्याला चहा देण्यासाठी आत गेली. श्वेता त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली. पेस्ट देऊन म्हणाली, ब्रश करो. यहा पानी है ।‘

ती बाथरुम पाहून गणू एकदम मूडमध्ये आला. त्यानं नुसतेच दात घासले, खुळखुळ करून तोंड धुतलं.

चहा पिऊन गणूला तरतरी आली. श्वेता सारखी त्याच्या मागेमागेच होती. घरात तिला खेळायला कुणीच साथीदार नव्हतं. मूळचं राजस्थानातलं हे कुटुंब! फारसे आप्तस्वकीय जवळ नव्हते. कामाच्या व्यापात सुनितालाही श्वेताकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यामुळे गणू म्हणजे तिच्यासाठी हवाहवासा होता. तसंही त्यांना माणसांचं मोल होतंय. सारा दिवस श्वेता गणूच्या मागंमागंच होती. लकाकत्या डोळ्यांचा, तल्लख बुद्धीचा गणू, मोठा तरतरीत होता. हा बंगला आपलाच आहे अन् तो सोडून जायचं नाही ह्या निर्धारामुळे एवढ्याश्या गणूच्या व्यक्तित्वाला धार आली होती. आत्मविश्वासही होता. एवढ्याश्या गणूच्या व्यक्तित्वानं तिला भारून टाकलं होतं. भैया-भैया करत ती त्याच्या भोवतीच रुंजी घालत होती. गणूबद्दल बालसुलभ निर्व्याज्य प्रेम तिच्या मनात वाटत होतं. तिचे आईवडीलही तश्याच प्रेमानं गणूशी वागत होते.

बघता-बघता दिवस मावळतीला आला. रखमा उतावीळपणे पोटातलं बाळ सांभाळत धावत-धावत आली गणूला न्यायला. बंगल्याची पायरी पण न चढता खालूनच हाक मारत राहिली. गणूला ऐकूही आलं नसावं. ऐकलं तरी त्याला ऐकायचंच नव्हतं म्हणा! श्वेताच त्याच्या आईला पाहून धावत आली. रखमा म्हणाली, ‘‘गणू हाय का?’’ तिनं धावत येऊन गणूला सांगितलं. गणूही धावत बाहेर आला. रखमा म्हणाली, ‘‘चल घरला. तुला न्याया आले मी.’’

गणू तडक म्हणाला, ‘‘म्या न्हाय येणार.’’

श्वेताला काही कळत नव्हतं. श्वेताचे आईवडील दोघेही बाहेर आले. त्यांना गणूच्या आईने सांगितले ती गणूला न्यायला आली आहे. त्यांनी गणूला सांगितलं, पण गणू तेवढाच ठाम होता. नाही जायचं म्हणाला, ते दोघेही म्हणाले, ‘‘राहू दे त्याला. त्याला वाटेल तेव्हा येईल तो.’’ श्वेताला त्यांनी विचारलं, ‘‘जाऊ दे का गणूला?’’ ती तर रडायलाच लागली. रखमाही रडकुंडीला आली. पण गणूला कशाचंच देणंघेणं नव्हतं. शेवटी रखमा माघारी गेली.

आता गणूची चिंताच मिटली. तो बंगल्यातच राहू लागला. श्वेता त्याच्याशिवाय जेवत-खात नव्हती. त्यामुळं त्याच्या पोटाचीही चिंता मिटली. रात्री तो बाहेरच्या ओट्यावर जाऊन झोपला. पण मनिषने त्याला उठवून व्हरांड्यात झोपायला सांगितलं. त्याला अंथरुण, पांघरुण दिलं. दुसर्‍या दिवशी मनिषने गणूसाठी 2 शर्ट-पँट आणले.

गणूवर बहुधा दैव प्रसन्न असावं. त्याच्या अगदी किमान असलेल्या गरजा सहज पूर्ण होत होत्या.

पण ‘‘हा बंगला माझाच आहे’’ हे त्याचं ईप्सित मात्र कसं पूर्ण होणार?

एक आठवड्यानं रखमा अन् धर्मा दोघंही परत आले. रखमाचे दिवस भरत आले होते. तिला कामाला गणूच्या मदतीची गरज होती. पण गणू नाहीच म्हणाला. तो बंगला सोडून जाणं शक्यच नव्हतं. खरंच त्याचं नशीब थोर म्हणून मनिष आणि सुनिता, श्वेता भेटले. त्यांनी मोठ्या मनाने त्याला ठेवून घेतलं. एवढंच नाही, आता जूनमध्ये शाळा सुरू होतील म्हणून त्यांनी गणूच्या शाळेची चौकशी केली. गणू चौथीत गेला होता. त्याला शाळेत पाठवायची पण व्यवस्था त्यांनी केली.

क्रमश: भाग १

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी आणि बायको, आमच्या अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष वयाच्या लेकरांना घेऊन, सामानाने गच्च भरलेली ट्रॉली ढकलत तेवढ्याच गच्च भरलेल्या मॉलमध्ये बिलिंग काऊंटरकडे मार्गक्रमण करत होतो, आणि ते मगाचचे आजोबा परत आमच्याशी बोलायला आले होते.

तशी आजच्या संध्याकाळची सुरुवात काही फारशी चांगली झाली नव्हती. 

आज शुक्रवार होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना लोकांच्या डोळ्यासमोर संध्याकाळी सुरू होणाऱ्या वीकएंडची रम्य दृश्यं तरळत होती, मला मात्र सोमवारी एक अर्जंट प्रेझेन्टेशन होतं, घरी गेल्यावरही तेच काम घेऊन बसायला लागणार होतं हे जाणवत होतं. मुलांना मॉलमध्ये नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यांना काहीतरी थाप मारून टाळायचं, हेही ठरवलं होतं.  

पण घरी पोचलो आणि कळलं की माझ्या सासूबाईंची प्रकृती थोडी बिघडली होती, nothing serious, पण त्या आणि माझे सासरे उद्या इथे आमच्या घरी येणार होत्या. त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणं, तपासण्या करून घेणं अशी कामं होती.

सासू सासरे येणार म्हणून आणि बाकीचीही वाणसामान आदि खरेदी होती, बायकोला एकटीला ते सगळं सामान आणणं जमलं नसतं. त्यामुळे न सुटके मला आल्यापावली परत बाहेर पडावं लागलं. या घटनेला दोन तास होऊन गेले होते, आणि आत्ता आम्ही खरेदी संपवून मॉलमधून निघण्याच्या मार्गावर होतो. 

आमची खरेदी चालू असताना एक t shirt, बर्म्युडा घातलेले मॉडर्न आजोबा लेकरांना बघून आमच्याजवळ आले. त्यांची नातवंडं अमेरिकेत असतात, या दोघांना बघून त्यांना त्यांची आठवण आली, म्हणून ते आवर्जून या दोघांशी गप्पा मारायला आले. 

आज आमच्या मुलांचा सौजन्य-सप्ताह चालू होता बहुतेक. या नव्या आजोबांशी त्या दोघांनी छान गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर हसले – खेळले, enjoy केलं. मुलांना टाटा करून आजोबा त्यांच्या खरेदीला निघून गेले. 

आणि आत्ता आम्ही निघत असताना ते परत आले होते. 

” यंग मॅन, हे सोनेरी दिवस पुन्हा येणार नाहीत,” ते माझ्याशी बोलत होते, ” मला कल्पना आहे की तुमच्या करीअरच्या दृष्टीने ही महत्त्वाची वर्षे आहेत, खूप कामं असतील, पण या लेकरांची ही वयं पुन्हा गवसणार नाहीत. मी पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलं आहे, ती धावपळ – ती रॅट रेस काय असते हे मीही अनुभवलं आहे….. एकदा माझ्या मुलीला तिच्या बाहुल्यांसाठी डॉल हाऊस बनवायचं होतं. शाळेचा प्रोजेक्ट वगैरे नव्हता, तिलाच तिच्यासाठी हे करायचं होतं. मला नेहमीप्रमाणे काहीतरी deadline होतीच. 

तिनं माझ्याकडे डॉल हाऊस करायला मदत करायचा हट्ट धरला. माझ्या कामाच्या व्यापात आणि घाई गडबडीत मी तिला ठाम नकार दिला, आत्ता काही अर्जंट नाहीये, नंतर करू, मी बिझी आहे वगैरे सांगितलं आणि जायला निघालो…. निघालो खरा, पण तिचा तो बिच्चारा चेहरा नजरेसमोरून हलेना. काहीतरी तुटलं आतमध्ये. आणि मी परत फिरलो…. तास दोन तासांचंच काम होतं, डॉल हाऊस पूर्ण झालं. त्याक्षणीचा तिचा तो उत्फुल्ल चेहरा आजही आठवतो. त्या दिवशी काय deadline होती, ते आठवतही नाही, पण ते डॉल हाऊस आता माझ्या मुलीच्या मुलीकडे अजूनही थाटात दिमाखात उभं आहे…. लक्षात ठेव, म्हातारपणी – निवृत्तीनंतर, ऑफिसचं अमुक काम करायचं राहिलं, तमुक काम करायचं राहिलं ही रुखरुख नसेल, पण लेकरांचं बालपण निसटून गेलं ही रुखरुख मात्र नक्की असेल.”

आजोबा निघून गेले, बायको माझ्याकडे सहेतुक पहात होती.

भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, मला गच्च भरलेल्या मॉलमध्ये, गच्च भरलेली ट्रॉली ढकलताना साक्षात्कार झाला. मी काय गमावून बसणार होतो हे ध्यानात आलं. तसं होऊ देता कामा नये हा पक्का निर्धार झाला. आणि मुलांचे हात हातात धरून त्याच निर्धाराने मी पुढे निघालो.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय भारतियांनो… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ माझ्या प्रिय भारतियांनो… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मु. पो.- ६८⁰ द. अक्षांश

दक्षिण ध्रुव, चंद्र 

उपग्रह – चंद्र

ग्रह – पृथ्वी

दि. २३ ऑगस्ट २०२३

माझ्या प्रिय भारतीयांनो, 

सर्वांना माझा स. न. वि. वि.

मी इकडे चांदोमामाच्या घरी सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी आजची चंद्रमोहीम फत्ते केली न् भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. अगदी भारावून गेलोय मी! तब्बल ४० दिवसांचा अथक प्रवास…. लाख्खो किलोमीटरचा! तसं पाहिलं तर, मी खूप दमलोय…. पण तुम्ही सर्वजण माझी खुशाली जाणून घ्यायला उत्सुक असाल आणि काही चांगली गोष्ट झाल्यावर ती आपल्या माणसांना शेअर केली की, आनंद अजून वाढतो ना! म्हणून पोहोचल्याबरोब्बर हे पत्र लिहीत आहे. 

दि. १४ जुलैला अवघ्या भारतीयांच्या साक्षीने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. उण्यापुऱ्या दीडशे कोटी शुभेच्छांचे गोड ओझं सोबतीला होतेच. हुरहूर, उत्सुकता, भीती आणि आपणां सर्वांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा…. यामुळे थोडं दडपण आलं होतं खरं! त्याचबरोबर चांदोबाच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पहिला मान ‘आपल्याला’ मिळणार म्हणून जाम खूष पण होतो !

पृथ्वीमातेपासून दूर जाताना पाय निघत नव्हता. थोडे दिवस तिच्याभोवतीच घुटमळत होतो खरा… पण दि.१ ऑगस्टला मनाचा हिय्या केला आणि चांदोबाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. त्याच्याभोवती फिरत फिरत थोडा अंदाज घेतला. माझा दादा चंद्रयान-२ ने केलेल्या चुका (चुका नव्हे…. थोडा चुकीचा अंदाज) टाळत हळूहळू चांदोबाच्या जवळ जाऊ लागलो. आणि आश्चर्य…. चांदोबाच्या अगदी जवळ गेल्यावर तिथे दादानं, चंद्रयान-२ ने ‘welcome buddy’ म्हणत त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दादाने केलेल्या स्वागतनं मला अजूनच स्फूरण चढलं. योग्य अशी जागा शोधून soft landing करत अलगदपणे चांदोबाजवळ गेलो. अगदी प्रेमभरानं स्वागत केलं त्याने माझं! इतका लांबचा प्रवास हिरीरीने पार पाडल्याबद्दल जवळ घेऊन कौतुकानं माझी पाठ थोपटली. त्यामुळे माझं मन अगदी भरून आलं. आत्ता तिथे पृथ्वीवर तुम्ही सर्वजण माझ्या यशस्वी landing चा सोहळा ‘ Yesssssssss, we have done it ‘ म्हणत जल्लोष करताहात. हळूच डोळ्यांच्या कडांचं पाणी टिपत एकमेकांना wish करता आहात. हे मी इतकं लांबवर असूनही अनुभवतोय. कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मी पूर्ण केलंय, याचं मला खूप खूप अभिमान वाटतोय. आपला भारत- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश ! एकदम भारी वाटतंय बुवा! भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय, हे नक्की…. अर्थात यामागे आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांंचे अपार कष्ट आहेत आणि तुमच्या सदिच्छाही ! 

आणि अरे हो ! रशियाचे चंद्रयान Luna-25 फक्त १० दिवसच प्रवास करुन चंद्रावर पोहोचणार होतं…. तेही माझ्यानंतर निघून माझ्याआधी ! पण उतरताना त्याचं क्रॅश लॅंडिंग झालं. So sorry ! मग माझा ४० दिवसांचा प्रवास ससा-कासवाच्या गोष्टीसारखा ’ slow but steady wins the race ‘ प्रमाणे झालाय; असंच म्हणायला हवं, नाही का ?

असो…. आता थोडा फ्रेश होऊन लगेचच कामाला सुरुवात करणार आहे. फक्त १४ दिवसांच्या कालावधीत करायच्या कामांची भली मोठ्ठी यादी आहे. विक्रम व प्रज्ञान यांच्या मदतीने प्रयोग, अभ्यास, निरीक्षणेही करायची आहेत. इथं पाणी आहे का? हे पहायचं आहे. विविध नमुने गोळा करायचे आहेत. जमलं तर चंद्रयान-२दादाला भेटणार आहे मी. अर्थात इथे घडणारी प्रत्येक गोष्ट मी वेळोवेळी पृथ्वीवर कळवत राहणार आहे. एक गंमत सांगू? इथं गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. त्यामुळे अगदी तरंगत तरंगतच चालल्यासारखं वाटतं इथे ! मज्जाच मज्जा वाटतीय….

फावल्या वेळात चांदोबाशी गप्पा मारायच्या आहेत. ‘ तू एक उपग्रह नाही, आमचा नातलग आहेस. बालगोपाळांचा चांदोमामा आहेस. ते ‘चांदोमामा, चांदोमामा भागलास का?’ म्हणतच जेवतात. अंगाईगीतात तू आहेस. आमची आई तुला भाऊ मानते. तुला पाहिल्यानंतरच आमचा संकष्टी चतुर्थीचा उपवास सुटतो. तुझ्या वाटचालीनुसार भारतीय महिन्याची तिथी, सणवार साजरे होतात. युवतींच्या सुंदर चेहऱ्याला तुझी उपमा देतात( ते कितपत योग्य? इथं आल्यावर मला ते सत्य कळ्ळलं बरं) प्रेमीजन तुझीच साक्ष ठेवून आणाभाका घेतात. अनेक गाण्यांतही तू गुंफला आहेस….’ अशा खूप खूप गोष्टी त्याला सांगणार आहे. 

फारसं लिहीत नाही. बाकीचं नंतर सविस्तरपणे लिहीन. कामासंदर्भातील माहिती व फोटो  updates पाठवत जाईन ! एक सांगू….. हे पत्र लिहिताना माझ्या अंगावर कितीतरी वेळा रोमांच उभे राहिलेत आणि पत्र वाचताना तुमच्याही अंगावर उभे राहणार, हे नक्की ! 

पुन्हा एकदा …. I am proud to be an Indian! 🇮🇳

कळावे,

आपल्या सर्वांचा लाडका,

चांद्रयान -३

पत्ता – 

मु. पो. – प्रत्येक भारतीयाचे हृदय

देश –  भारत

खंड – आशिया

ठळक खूण – कर्क वृत्त 

(हिंदी महासागराजवळ)

ग्रह – पृथ्वी (सूर्यमालेतील तिसरा ग्रह)

मंदाकिनी – आकाशगंगा

लेखक : अज्ञात. 

प्रस्तुती –  सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्रोध जिंकायचा आहे ?… – डाॅ.सुरेश महाजन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ क्रोध जिंकायचा आहे ?… – डाॅ.सुरेश महाजन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

रशियात 90 ते 110 वर्षे वयाची 1कोटी लोक आहेत.…

सकाळी 5 वाजता उठुन….…

10 मिनिट मेडीटेशन 

6 किलोमिटर फिरणे 

अतिशय नियंत्रीत आहार..

खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी

आणि आत्मविश्वास चिकाटी व नियोजन या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा/ गोळी न घेता द्रुष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत. 

या नास्तीक मंडळींना राग /क्रोध  तिरस्कार द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असुनही  माहीत नाही.

एका  संमेलनापासून  त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव.

त्यांच्या मते क्रोध हा लुळा असतो.

राग हा पांगळा असतो …

जसे उकाड्याने शुध्द दुध नासते तसे क्रोधाने स्नेह/ प्रेम/ जीवन नासते…

या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे /ज्ञानेश्वरीचे/ रामायण/ महाभारत/ सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर या वयोवृद्धांनी या सर्वांचा सार एका वाक्यात आम्हाला सांगितला….. 

शांतीने रागाला.. 

नम्रतेने अभिमानाला..

सरळतेने मायेला 

तसेच 

समाधानाने लोभीपणाना जिंकले पाहिजे…

राग/ क्रोधावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन.. 

विनय/संयमाचा त्याग केला की क्रोधाचा जन्म होतो. 

नम्रतेच्या  उंचीला माप नसते. 

ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले असे समजावे.

भारतात मात्र राग/क्रोध दुसर्यावर काढायचा असतो हे गृहीतचं धरले जाते… सर्वात मोठा अधिकारी सहकार्यावर रागावतो. 

हे सहकारी खालच्या  लोकांवर राग काढतात. 

हे लोक घरी येऊन बायकोवर विनाकारण राग काढतात. 

बायको लहान मुलांवर अकारण राग / क्रोध व्यक्त करते. 

निष्पाप मुलं चकित होऊन ते सुध्दा तोचं राग खेळणीला मोडूनतोडून ,  रडून व्यक्त करतात….

म्हणुनच भारतात सर्वात जास्त खेळणी तयार करण्याचे कारखाने आहेत.

संपूर्ण युरोपात राग क्रोध तर नाहीच….

पण दिवसभर हे लोकं

Sorry. 

Thank you.

Welcome किमान शंभरवेळा अगदीच आनंदाने म्हणतात…

याच्या उलट आपल्या कडे असते…

हे लोक देवपूजा कधीच करत नाही पण चोविस तास देशपुजा करतात…

 परिणामी या देशावर गुलामगिरी कधीच आली नाही. 

लंडन ते पॅरिस हा रेल्वेचा 790 किलोमिटरचा समुद्राखालुनचा दोन तासाचा प्रवास चालु असतांना अचानक आमच्या बोगीत दोन सुरक्षा महिला अतिशय नम्रपणे sorry म्हणून मला बाजूला खुर्चीच्या दिशेनं बसण्याची विनंती केली आणि मी बसलेल्या सीटवर एका मशीनद्वारे  किंचित छिद्र पडलेली सीट … फक्त 2 मिनिटात शिऊन स्वच्छ करून आभार मानून अगदी आनंदाने Welcome म्हणून निघून गेल्या…

आपल्या कडे भारतात आपण एस टी ने  /रेल्वेने प्रवास करतो. कागद/ कचरा/ थुंकी टाकून/ काही प्रसंगी सीट खराब करूनचं उतरतो आणि त्या जागी नविन प्रवाशांना Happy Journey प्रवास सुखाचा होवो म्हणुन शुभेच्छा देतो.

हि आहे गुलामगिरीत जगण्याची सवय असलेल्या भारतीयांची मनोवृत्ती….

आम्ही विमानतळावर पोहोचलो नंतर लक्षात आले की आपले मंगळसुत्र हरविले आहे. 

विमानतळावर तक्रार केली. 

एका तासात ऑटोरिक्षात पडलेले मंगळसुत्र आम्हाला अतिशय आनंदाने पोलीसांनी परत केले तेही त्यांनी आमची क्षमा मागून. 

कारण आमच्या देशाची तुमच्या देशात कृपया बदनामी करु नये या एकच अपेक्षेने… 

आपण भारतीय खुप हट्टी. 

हट्ट ही क्रोधाची बहिण. 

ती सदैव मानवासोबत असते.

क्रोधाच्या पत्नीचे नांव हिंसा. 

ती सदैव लपलेली असते. 

अहंकार क्रोधाचा मोठा भाऊ. 

निंदा/ चुगली हया  क्रोधाच्या आवडत्या कन्या. 

एक तोंडाजवळ दुसरी कानाजवळ.

 वैर  हा क्रोधाचा सुपुत्र. 

घृणा ही नात. 

अपेक्षा ही क्रोधाची आई. 

हर्षा (आनंदी) ही आपल्या परिवारातील  नावडती सुन. 

तिला या परिवारात स्थानच नसते. 

प्रत्येक भारतीय हा या परिवाराचा पारंपारिक घटक… 

परिवार त्याला सोडत नाही.. 

त्याला परिवाराला सोडवत नाही. 

अहंकार सुखाने  वाढतो..

दुःखाने कमी होतो.. 

अहंकारी (भारतीय) दुबळा असतो… 

दुबळे (ते वयोवृद्ध रशियन) अहंकारी नाहीत….

… म्हणून नेहमी हसत रहा आनंदी रहा .

लेखक : डॉ सुरेश महाजन, मुंबई

मुंबई  

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्र… लेखिका : सुश्री स्वप्नजा घाटगे – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्र… लेखिका : सुश्री स्वप्नजा घाटगे – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

एकदा सहज मी म्हणाले होते,” त्याचं आणि माझं मैत्र आहे..! “

माझी मैत्रीण पटकन मला म्हणाली,”स्वप्नजा ,मराठी ची विद्यार्थिनी ना तू?तुला मैत्री म्हणायचं आहे का? “

” नाही ग मुली,मला मैत्रचं म्हणायचं आहे..”

ती हसत म्हणाली,” बोला. आता नेहमीप्रमाणे वेगळं काहीतरी सांगणार आमची आद्यजा…”

आद्यजा हे आरतीताईने दिलेलं नांव.

मी तिचा हात हातात घेत म्हणाले,” सखी, मैत्री होत असते,ठरवावी लागत नाही. मैत्र हे सहानुभावाने आत उतरत असतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना..भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे…! ते माझं मैत्र!

मैत्री आणि मैत्र यात फरक आहे थोडा वेलांटीचा.पण यातला गाभा समजून घेतला न, तर आपल्यासारखे आपणच सुखी.

मैत्री दोन समविचारी, समान आवडीनिवडी, सहवास,एखाद्याचा आपल्यावर पडत असलेला प्रभाव…यामुळे होत असते.

पण मैत्र एकमेकांच्या जवळ जसेजसे जाऊ तसतसं फुलतं,बहरतं.हे फुलणं असतं ना, सखे, जाणिवेच्या पल्याड असतं.असतं ते केवळ संवेदन.शब्दांच्या पलिकडे असणारं.

त्यासाठी रोज भेटायची गरज नसते,असते फक्त एकरुप व्हायची गरज!

मी लिहिलेल्या एखाद्या शब्दातून माझ्या मनातील खळबळ,वेदना ओळखते ते माझं मैत्र!

यात परत स्त्री-पुरुष अशी गल्लत करायची नाही.

पांचालीच्या मनातील द्वंद ओळखून तिला अबोल मदत करणारा कान्हा.हे त्याचं मैत्र!

सुदामाने काही मागितले नाही,द्वारकाधीशांनी काही दिलं नाही.पण सुदामाला सारं मिळालं.हे त्याचं मैत्र!

हे असं मैत्र आपल्या आसपास असलं ना, की आपण चिंतामुक्त असतो.

हे स्त्री-स्त्री,स्त्री-पुरुष , किंवा पुरुष-पुरुष असं लेबल लावलेलं नसतंच मुळी.

जो कोणी मैत्रभावाने आपल्या हृदयाशी जोडला जातो तेव्हाच होतं ते मैत्र!

जनाला मदत करणारा,तुकोबांची गाथा परत करणारा,चोखोबांची गुरं राखणारा,नाथांच्या घरी कावड  वाहणारा, पुंडलीकासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहणारा…

सखी,त्याच्याजवळ मैत्रभावाने कोण कोण गेलं, तो त्यांचा झाला…

साध्याच शब्दात बोलूया …मैत्र म्हणजे एकरुपता!

जिथे शब्देविण संवाद असतो ते मैत्र!

मांचा फोनवर आलेला वेगळा आवाज ऐकून कासावीस होणारी माझी लेक.हे तिचं आणि माझं मैत्र!

ती माझी घट्ट मैत्रीण आहे असं म्हणण्यापेक्षा, तिचं अन् माझं  ह्रदयस्थ मैत्र आहे , असं म्हणू या न!

ज्ञानदेव म्हणतात,असं मैत्र विश्वात व्हावं.

हा मैत्रभाव सहजासहजी निर्माण व्हायचा नाहीच, पण अवघडही नाही.

आपण आपल्या परीने प्रयत्न करुन आपल्या भोवतालच्या परिघात का होईना,मैत्रभाव निर्माण करायला हवा.

त्यासाठी

मनाला सतत समजवायला हवं,कुणाचा मत्सर, द्वेष, ईर्षा,वैर,कुणाकुणाच्या माघारी बोलणं करु नकोस.

सखी,हे ह्यातलं थोडसं जरी आपल्याला जमलं, तरी आपण मैत्र या शब्दाच्या जवळ जाऊ शकू.कळलं?

ती मला मिठी मारत म्हणाली,यार हे लईच भारीय…तुझं माझं मैत्र असंच अखंड राहू दे…!

आमेन….असं म्हणत मी तिच्या पाठीवर थोपटत राहिले.

लेखिका : सुश्री स्वप्नजाघाटगे

कोल्हापूर.  मो 8888033332

संकलक: प्रा. माधव सावळे

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ श्रावण तो आला आला…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ श्रावण तो आला आला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

गर्भ रेशमी हिरवागार शामियाना..

पसरला घरा घराच्या अवतीभवती…

निळे पांढरे आभाळ…

हरखून थबकले माथ्यावरती..

मेघडंबरी कोंदणातून…

सुवर्ण रश्मीचे दान सुटले अवनीवरी..

सोनेरी मुकुट शोभले…

तृणपाती तरूवरुंच्या शिरी…

मंद मंदसा हलकासा …

वारा गोंजारून जाई शरीरी..

झुकले तन मान लवून …

आनंद वाहे लहरी लहरी..

खगांनी फुंकली मंजुळ सनई,

अन मधूनच वर्षा बरसून जाई..

खिल्लारे चरती कुरणी…

निर्भर होऊनी रानीवनी..

 उल्हासाची इंद्रधनूची …

तोरणं आकाशी झळकली..

सणवारांची  फुले उमलली…

आनंदाची पालवी बहरली..

बलाकमाला उडती गगनी…

संदेश देण्या माहेरवाशीणी..

सय दाटता मायेची…

मनात गुंजली रूदनगाणी..

माय ती वाट पाही…

दूर दूरच्या लेकीसाठी…

खळबळ माजे तिच्या अंतरी…

खळखळणाऱ्या ओढयातल्या जलापरी..

सांगत आली, वाजत गेली…

गावागावातून वाऱ्याची तुतारी…

.. श्रावण तो आला आला…

 घरोघरी अंगणी नि परसदारी..

..श्रावण तो आला आला…

घरोघरी अंगणी नि परसदारी..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 226 ☆ आलेख – बधाई इसरो… चांद पर भारत 🇮🇳 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 226 ☆

? आलेख –बधाई इसरो… 🚀 चांद पर भारत 🇮🇳?

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक आलेखबधाई इसरो… चांद पर भारत )

आजाद भारत में अंतरिक्ष कार्यक्रम के जनक विक्रम साराभाई हैं। उन्हीं के नाम पर इसरो ने चंद्र मिशन के चंद्रमा पर उतरने वाले लैंडर का नाम विक्रम रखा है। विक्रम शब्द का अर्थ होता है वीरता। बेहद तेज गति के राकेट से धरती से चंद्रमा तक की लम्बी यात्रा के बाद सधे हुये, धीमे धीमे, बिना टूट फूट के चंद्रमा की उबड़-खाबड़ सतह पर सफलता से उतरना सचमुच वीरता का काम है। इसरो का चंद्रयान -2 मिशन अपने इसी चरण में विफल रहा था क्योंकि उसका लैंडर 7 सितंबर 2019 को सॉफ्ट लैंडिंग का प्रयास करते समय लैंडर में ब्रेकिंग सिस्टम में विसंगतियों के कारण चंद्रमा की सतह पर दुर्घटनाग्रस्त हो गया था।

  विक्रम अपने कोख में मिशन के लक्ष्य रोवर प्रज्ञान को संभाले हुये है। प्रज्ञान का अर्थ ज्ञान होता है। लैँडर से रिलीज होकर अब प्रज्ञान चंद्रमा की सतह पर धीमी गति से मजे में १४ दिनो तक लगभग आधा किलोमीटर घूमे फिरेगा। पृथ्वी के ये चौदह दिन चंद्रमा का महज एक दिन होगा।  प्रज्ञान एक रोबोटिक वेहिकल है, जिसमें कृत्रिम बुद्धि युक्त अनेक उपकरण लगे हैं। प्रज्ञान में ६ चके हैं, यह २७ किलो का है। यह मात्र ५० वाट की सौर उर्जा से संचालित होता है। प्रज्ञान,  विक्रम को स्पेक्ट्रो-पोलरिमेट्री तथा फोटो संदेशे देकर अपनी खोज से अवगत करायेगा। विक्रम वह सारी जानकारी चंद्रमा के गिर्द घूमते आर्बीटर के माध्यम से धरती पर इसरो को भेजेगा। चित्र तथा डाटा एनालिसिस से चंद्रमा के दक्षिणी ध्रुव के बारे में हम छिपे हुये रहस्य जान सकेंगे। अनुमान है कि इस क्षेत्र में पर्याप्त मात्रा में बर्फ हो सकती है। जिसका उपयोग भविष्य के मिशन में  ईंधन और ऑक्सीजन निकालने के साथ-साथ पीने के पानी के लिए भी किया जा सकता है।

आंध्र प्रदेश के श्रीहरिकोटा में सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से चंद्रमिशन ३ के लिये लॉन्च वेहिकल मार्क थ्री, अंतरिक्ष की यात्रा पर १४ जुलाई २३ को रवाना किया गया था। चंद्रमा की यात्रा पर भारत के इस सबसे भारी अंतरिक्ष यान, पर सामने की सीट पर सवार होकर चला विक्रम पहले धरती की परिक्रमा करता रहा। फिर पृथ्वी से सबसे दूरी वाली कक्षा से इसे चंद्रमा की ओर भेजा गया। चंद्रमा की कक्षा में पहुच जाने के बाद धीरे धीरे यान की कक्षा की परिधि छोटी की गईं। सबसे निचली कक्षा में विक्रम को प्रोपल्शन मॉड्यूल से अलग कर दिया गया था। बिलकुल तय योजना के अनुसार विक्रम चांद पर उतर गया।

 अन्य देशों के प्रयासों की चर्चा करे तो रॉयटर्स ने रूस की अंतरिक्ष एजेंसी  रोस्कोस्मोस के हवाले से बताया गया है कि लूना 25  नियंत्रण खोकर क्रेश हो चुका है। जापान भी  चंद्रमा की सतह पर उतरने की योजना के साथ लांच की तैयारी में है।

इस तरह भारत के चंद्र प्रोजेक्ट ने दुनियां में फिर से चांद पर खोज को हवा दी है। शीत युद्ध की समाप्ति तथा आर्थिक मंदी से ये अन्वेषण बरसों से बंद थे।

फिलहाल बधाई है बधाई।

भारत की सफलता के लाभ  दुनियां को और सारी मानवता को मिलने तय हैं।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ आओ दिलदार चलें, चांद के पार चलें… ☆ श्री अजीत सिंह, पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन ☆

श्री अजीत सिंह

(हमारे आग्रह पर श्री अजीत सिंह जी (पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन) हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए विचारणीय आलेख, वार्ताएं, संस्मरण साझा करते रहते हैं।  इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। आज प्रस्तुत है आपका एक प्रेरक संस्मरणात्मक प्रसंग ‘आओ दिलदार चलें, चांद के पार चलें…’।)

☆ आलेख – आओ दिलदार चलें, चांद के पार चलें… ☆  श्री अजीत सिंह, पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन ☆

भारतीय सूचना सेवा की नौकरी में आने से कोई दो साल पहले और कुरुक्षेत्र यूनिवर्सिटी से बी एस सी की पढ़ाई पूरी करने के दो साल बाद की एक घटना मेरे ज़हन में आज भी बसी हुई है।

कुरुक्षेत्र यूनिवर्सिटी के हॉस्टल में ही कुछ मित्रों के साथ रहते हुए मैं और मेरे कुछ दोस्त यू पी एस सी की परीक्षाओं की तैयारी में लगे रहते थे। कभी कभार मौज मस्ती के लिए पास के गांवों में रह रहे दोस्तों के पास भी चले जाते थे। ऐसी ही एक पार्टी हमने पास के गांव मिर्ज़ापुर में आयोजित की थी। 21 जुलाई का दिन था 54 साल पहले।

 उस दिन रेडियो पर आंखों देखा हाल  सुनाया जा रहा था। हम सभी ने कुछ ज़्यादा मौज मस्ती नहीं की। बस रेडियो से कान लगाए बैठे थे। टेलीविजन उस वक्त बस दिल्ली में था।

रेडियो सुनते सुनते आधी रात गुज़र गई। एक बज गया। डेढ़ बज गया। पर वो समाचार नहीं मिला जिसका इंतजार था।

और फिर अंतरिक्ष यात्री नील आर्मस्ट्रांग की आवाज़ आई …

… मानव के लिए यह छोटा सा कदम है, पर मानवता के लिए एक बड़ी छलांग…

जी हां पहला मानव चांद पर पहुंच चुका था। बहुत बड़ी घटना थी यह उस समय की। शायद सर्वकालिक।

और हां, कुछ लोग उस समय आदमी के चांद पर पहुंचने की बात को मानते भी नहीं थे।

नील आर्मस्ट्रांग कई साल बाद भारत भी आए थे।

बस भारत का चंद्रयान लैंडर विक्रम भी चांद पर सफलतापूर्वक उतर गया  है। आज भी मैं उतना ही उत्साहित हूं। इसी उत्साह ने पुरानी यादें मस्तिष्क पटल पर लाकर रख दी।

आपने याद दिलाया तो मुझे याद आया….

© श्री अजीत सिंह

पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन हिसार।

23.08.2023

मो : 9466647037

(लेखक श्री अजीत सिंह हिसार से स्वतंत्र पत्रकार हैं । वे 2006 में दूरदर्शन केंद्र हिसार के समाचार निदेशक के पद से सेवानिवृत्त हुए।)

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – हौसला ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – हौसला  ??

अपने दुखों से पूछा मैंने;

क्या तुम असीम हो?

उनकी आँखों में

भय उतर आया,

विस्मित मैंने देखा चारों ओर,

अपने पीछे, अपने

हौसले को खड़ा पाया..!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 164 ☆ आतम ज्ञान बिना सब सूना… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “आतम ज्ञान बिना सब सूना…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 164 ☆

☆ आतम ज्ञान बिना सब सूना… ☆

बिना परिश्रम कुछ भी नहीं मिलता, सही दिशा में कार्य करते रहें। यह मेरे एक परिचित जिन्हें ज्ञान बांटने की आदत है, उन्होंने अभी कुछ देर पहले कही और पूरी राम कहानी सुना दी।

दरसअल उनको किसी ने ब्लॉक कर दिया यह कहते हुए कि इतना ज्ञान सहन करने की सामर्थ्य मुझमें नहीं। अब बेचारे ज्ञानचंद्र तो परेशान होकर घूमने लगे तभी ध्यानचंद्र जी ने कहा मुझे सुनाते रहें , जब जी आए टैग भी करें क्योंकि मैं सात्विक विचारों का हूँ, सकारात्मक चिंतन मेरी विशेषता है। अनावश्यक बातों को एक कान से सुन दूसरे से निकालता जाता हूँ। आँखें मेरी बटन के समान हैं जो केवल फायदे में ही कायदा ढूढ़ती हैं।

पर ज्ञानचंद्र को तो एक ही बात खाये जा रही थी कि लोग सकारात्मकता को तो ब्लॉक कर रहे हैं, जबकि नकारात्मक लोगों के नजदीक जाकर ज्ञानार्जन करने की वकालत करने से नहीं चूकते हैं। और तो और उनका सम्मान कर रहें हैं, अरे भई निंदक की महिमा वर्णित है पर बिना साबुन और पानी के मुफ्त में कब तक मन को स्नान कराते रहोगे, अभी भी वक्त है, सचेत हो अन्यथा किसी और को ज्ञान बटेगा आप इसी तरह ब्लॉक करो बिना ये जाने की लाभ किसमें है। फेसबुक और व्हाट्सएप का बन्दीकरण तो सुखद हो सकता है पर दिमाग में लगा ताला अंधकार तक पहुँचाकर ही मानेगा।

कोई क्षमायाचना को अपना औजार बनाकर भरपूर जिंदगी जिए जा रहा है तो कोई क्षमा को धारण कर सबको माफ करने में अपना धर्म देखता है। कहते हैं क्षमा वीर आभूषण होता है, बात तो सही है, आगे बढ़ने के लिए पुरानी बातों पर मिट्टी डालनी चाहिए। जब मंजिल नजदीक हो तो परेशानियों से दो- चार होना पड़ता है। बस लक्ष्य को साधते हुए माफी का लेनदेन करने से नहीं चूकना चाहिए।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print