काळजातून उमटते ती काळजी.ती वाटत असते. दडपणापोटी निर्माण होते तीही काळजीच.पण ती नकारात्मक छटा असणारी.मनाला लागून रहाणारी आणि मग हळूहळू मन:स्वास्थ्यच पोखरु लागणारी.काळजातली काळजी त्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधून ते प्रश्न निर्माण करणाऱ्या कारणांचं निराकरण करण्यासाठी आवश्यकच असते आणि मदतरुपही ठरते.पोखरणारी काळजी मात्र उत्तरंच दिसू नयेत इतका मनातला अंधार वाढवत रहाते आणि त्या अंधारात स्वत: मात्र ठाण मांडून बसून रहाते.या उलट काळजातली काळजी स्वत:च प्रकाश होऊन मनातली रुखरुख कमी करणाऱ्या प्रकाशवाटेचा मार्ग दाखवते.
काळजी निर्माण करणारी कारणं असंख्य आणि त्या कारणांचे प्रकारही वेगवेगळे.इथे समतोल मनाने परिस्थितीचा विचार करुन योग्य निर्णय घेणे आणि ते अंमलात आणणे या प्रोसेसमधे ‘वाटणारी काळजी’ सहाय्यभूत ठरते,आणि ‘पोखरणारी काळजी’ अडसर निर्माण करते.त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली,तरी काळजी करण्यात वेळेचा अपव्यय न करता काळजीपूर्वक निर्णय घेणेच हितावह ठरते.
काळजी वाटायला लावणारी अनेक कारणे बऱ्याचदा अपरिहार्य असतात.वृध्दांच्या बाबतीत आणि विशेषत: त्यांच्या एकाकी वृध्दापकाळात निर्माण होणारे प्रश्न काळजी इतकेच विवंचना वाढवणारेच असतात. अशावेळी नेमका प्रश्न समजून घेऊन एखादा सक्रिय आपुलकीचा, प्रेमाचा,आधाराचा स्पर्शही त्या प्रश्नांची तिव्रता कितीतरी पटीने कमी करु शकतो.त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सपोर्ट सिस्टीमचा आपणही एक भाग होण्यासाठी आवश्यक आहे फक्त थोडी माणूसकी आणि सहृदयता.
☆ देवदासी लक्ष्मीपूजन …भाग 2☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(तोच धागा पकडून मी त्याच्याकडे माझ्या प्रेमाचा विषय काढायचे ठरविले.) इथून पुढे —
” मला तुला काहीतरी सांगायच आहे. तुला वेळ असेल तर बोलू का ” मी धिटाईने बोलायचे ठरविले.
” बोल ना”
” तू आत्ता ज्या देवदासींबद्दल बोललास त्यांना मी खूप जवळून बघितले आहे. वयाच्या १० वर्ष्यांपर्यंत मी त्यांच्यां बरोबर राहिले आहे. माझी आई देवदासी होती. महाराष्ट्र कर्नाटकाच्या वेशीवरच आमचे गांव आहे. त्या गावात आमची देवदासी घराणी खूप आहेत. पाच वर्षांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला. माझ्यासाठी ती खूप महान होती. नकारात्मक परिस्थितीमध्ये तिने माझ्यासाठी सगळ्या देवदाशींशी आणि समाजाशी लढा दिला आणि मला बाहेर काढून शिक्षण दिले. आज तुझ्यासमोर उभे राहून माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझा स्विकार करशील का असे विचारण्याची हिम्मत ही माझ्या आईमुळेच होत आहे. अजय माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझे उत्तर पाहिजे आहे.”
अजय हादरला होता. अनपेक्षितपणे मी त्याच्यासमोर टाकलेल्या बॉम्बने तो बिथरला होता. तो फक्त माझ्याकडे बघत होता. दोन मिनिट्स शांततेत गेली आणि अजय काही न बोलताच उठून निघायला लागला.
” हे काय अजय. ” मी त्याच्या हाताला धरून त्याला परत बसविले.
“अजय असं तू काही न बोलता जाऊ नकोस. जे काही मनात असेल ते स्पष्ट सांग” माझ्या आवाजाचा स्तर बदलला होता.
” अजय गेल्या वादविवाद स्पर्धेत तू मोठ्या रुबाबात ‘सामाजिक रूढी आणि बदल’ ह्या विषयावर तावातावाने मनापासून बोलला होतास ते सगळे खोट होते का ? आज जेंव्हा प्रत्यक्ष जीवनात निर्णय घ्यायची वेळ आली तर असा पळून का जातोयस. मला माहिती आहे तुलाही मी आवडते पण माझ्या घराण्याविषयी माझ्या आईविषयी सगळे ऐकल्यावर असा मागे का जातोस. माझ्या नशिबात माझ्या आईचे प्रेम जास्त नव्हते. तुझ्या आईला माझी आई मानून तिच्या कुशीत विसावण्याची मी स्वप्न बघितली आहेत. अजय खरंच मी आपला संसार सुखाने करीन माझ्या प्रेमाचा स्विकार कर.” माझ्या मनातले कळवळीने मी अजयला सांगितले.
अजय तसाच काहीतरी विचार करत एकटक माझ्याकडे बघत होता. त्याच्या तोंडावाटे काहीच शब्द बाहेर पडत नसले तरी त्याच्या मनात खूप काही चालले आहे असे मला जाणवत होते. त्याला मी आवडत असले तरी माझे देवदासी घराणे त्याच्या घरच्यांना, त्याच्या आईला पटेल का असा कदाचित तो विचार करत असेल असे मला वाटत होते. त्याच्या मनातील द्वंद्व त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. परत अजय टेबलावरून उठला आणि जायला निघाला. माझ्या तोंडावाटे अचानक शब्द बाहेर पडले ” अजय, नको रे जाऊस मला सोडून ” अजय तसाच पुढे चालत राहिला. दहा पावले पुढे गेलेला अजय अचानक थांबला आणि मागे फिरून परत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ” आज पर्यंत मी तुला कधीच माझ्या घरच्या गोष्टींबद्दल बोललो नाही. माझ्या घरी माझी फक्त आई आहे. आज जो काही मी आहे, माझे विचार, माझे आचार हे सर्व तिने दिलेले आहेत. तिच्या शब्दाबाहेर मी नाही आणि म्हणूनच परवा लक्ष्मी पूजन आहे तेव्हा तू मला भेट, मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन आणि आईच्या समोर उभी करीन. तुम्ही दोघी जो निर्णय घ्याल त्याला माझा होकार असेल. ”
☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या.) इथून पुढे —-
संध्याला राहावलंच नाही. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाऊन तिनं विचारलं, ‘‘तू शानूला सांगितला नव्हतास का आजचा आपला प्लॅन?’’
‘‘ताई, सांगितलं होतं गं. सगळ्यांबरोबर तू असायलाच हवीस, असंही म्हटलं होतं. पण हल्ली मुलींना त्यांच्या प्रोग्रॅममध्ये अडवलेलं आवडत नाही. ‘आमच्या मैत्रिणींच्या गेट टुगेदरचं काय?’ असं म्हणाली.’’
‘‘तू नक्की आईच आहेस ना तिची? घरातल्या कार्यक्रमांसाठी आपण घरी असलंच पाहिजे, शेवटी सगळी आपली माणसं आहेत, हे ठणकावून सांगायची हिंमत होत नाही का तुझी? की मुलांसमोर आपली ‘इमेज’ सांभाळायच्या नादात संस्कार आणि शिस्त गुंडाळून ठेवलीय माळ्यावर? तिच्या बाहेर जाण्याला माझा विरोध नाहीये. दोन कार्यक्रमांचं वेगवेगळ्या दिवशी नियोजन करणं, इतकं साधं आहे ना हे! तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मुलांशी बोला ना घडाघडा.’’ संध्याचं म्हणणं बहिणीला पटलं होतं, पण… हा ‘पण’च फार अवघड होता.
——————————————————————————————————–
‘‘पप्पा, आनंदाची बातमी आहे. आम्ही नवीन ‘एस.यू.व्ही.’ घेतली काल. येतो दुपारी दाखवायला.’’ मनोजरावांचा जावई शंतनू फोनवर सांगत होता. त्यांनी जावयाचं अभिनंदन तर केलं, पण नंतर चिंतेत पडले. नुकताच नव्वद लाख रुपयांचा फ्लॅट घेतलाय, घरात दोन स्कूटर आणि चक्क दोन कारही आहेत. मग पुन्हा ही गाडी का घेतली असावी? त्याच्या आईवडिलांशी किंवा आपल्याशी न बोलता इतका मोठा खर्च?
‘‘तुम्ही का त्रास करून घेताय? तो जावई आहे, त्यांचा त्यांचा संसार आहे. आपण नको बाई बोलायला!’’ सासूबाई बोलल्याच.
‘‘मुलगी-जावई काय फक्त कौतुक करवून घ्यायलाच आहेत का? मुलासारखं मानतो ना आपण त्याला? ढळढळीत दिसतंय की अवाजवी खर्च चुकीचे आहेत. मग हक्कानं आपलं मत सांगायला नको? गरज जेव्हा लालसेचं रूप घेते ना, तेव्हा अनिर्बंध वर्तणुकीला प्रारंभ होतो बघ. फ्लॅटसाठी दहा लाख ज्या हक्कानं दिले आपण त्यांना, त्याच हक्कानं त्यांच्याशी बोलायला हवं. नको तिथे मूग गिळून बसल्यावर त्यांचं चुकतंय हे त्यांना कोण ऐकवणार?’’ मनोजराव म्हणाले.
तनया असो, शानू असो किंवा मनोजरावांचे जावई आणि मुलगी… घरातील मोठ्या मंडळींना आता आपण बोलावं की नाही, असं वाटणं चुकीचं नाही का? जीव तोडून प्रेम करणाऱ्या ज्येष्ठांची जीभ शिस्त आणि संस्कारांच्या बाबतीत अडखळणं, हे बेलगाम जीवनशैलीला खतपाणी घालणारं आहे.
लग्नानंतर मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते… अगदी मान्य! पण समोरचा चुकतोय हे दिसत असूनही न बोलणं हा अतिरेक ठरेल. ही वेळ येऊच नये, म्हणून उधळणाऱ्या घोड्यांचे लगाम त्याआधीच आवळले गेले पाहिजेत.
मुलीनं एखाद्या विशिष्ट पार्टीला जाणं अजिबात पटत नसताना आईचं तिला नकार देताना चाचरणं वाईट नाहीये का? ठोंब्या मुलांना ‘बाब्या’ बनवत लोळत पडू देणं आणि बापानं त्यांची कामं करणंही वाईटच. खर्चाला दिलेल्या पैशांचा हिशेब विचारताना वडिलांची जीभ अडखळणंही वाईट. ‘मी तुझ्यावर मुळीच अविश्वास दाखवत नाहीये, पण तू या रकमेचा कसा विनियोग केलास ते मला सांग,’ असंही म्हणता येतं की! ‘पहिला मोबाइल उत्तम चालतोय ना, मग दुसऱ्या मोबाइलचा विषय आता अजिबात काढायचा नाही. त्यापेक्षा हवा तर एखादा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग लाव, मी पैसे देतो.’ हे कमावत्या मुलाला सांगताना वडिलांना अवघडल्यासारखं वाटणं चुकीचं. ‘मैत्रिणीशी फोनवर नंतर बोल. आधी मला या कामात मदत कर,’ हे सांगायला आईनं का कचरावं? करोनामुळे निदान स्वच्छतेच्या बाबतीत बरीच जागरूकता आलीय. नाहीतर महाविद्यालयातून आलेली मुलं न चुकता आल्याबरोबर हातपाय धूत होती का? जर उत्तर ‘नाही’ असेल तर त्याला जबाबदार कोण? नुकतंच शाळेतून आलेलं पोर आल्या आल्या मित्राला फोन करून आजचा गृहपाठ विचारत असे, तर ‘सोन्या, तुझं शाळेत बाईंच्या बोलण्याकडे लक्ष नसतं का? अजिबात असं मित्राला फोनवर विचारायचं नाही. वर्गात नीट लक्ष द्यायचं,’ हे आई-बाबा सांगत नसतील तर ते चुकीचंच नाही का?
मुलं आपलं ऐकत नाहीयेत किंवा आपल्याला अजिबात न विचारता निर्णय घेत आहेत, हे जेव्हा पहिल्यांदा जाणवतं, तेव्हाच त्यांच्याशी निवांत बोलण्याची गरज असते. ‘तू हे करायचं नाही म्हणजे नाही!’ असं बिनबुडाचं वाक्य फेकल्यास मुलं तात्त्विक मुद्द्यांवर वाद घालून पालकांना नक्कीच निरुत्तर करू शकतात. त्यासाठी त्यांना समजेल, रुचेल, अशा पद्धतीनं समजावून सांगणं गरजेचं आहे. पूर्वी मुलांना सांभाळणं किती सोपं होतं नाही? वडिलांची नुसती चाहूल लागली तरी असतील नसतील तिथून येऊन पुस्तक हातात घेऊन बसत. ‘तोंड वर करून’ बोलायची हिम्मत नसायची (अर्थात त्यामुळे फार कमी घरांमध्ये पितापुत्रात मैत्रीचे संबंध होते हेही मान्य करावं लागेल). पूर्वी मिळतंय त्यात हवी तेवढी मजामस्ती चालायची, पण अवाजवी मागण्यांना थारा नसे. करंजी-लाडूला लज्जत होती! कष्टाची किंमत होती. नात्यांची कदर होती. दिनचर्येला आकार होता. ‘नाही’चा आदरयुक्त धाक होता. पण आज मैत्रीचे संबंध राखताना तो ‘बडगा’, पालकांचा वाटणारा एक प्रकारचा धाक मिळमिळीत झालाय असं नाही वाटत?
आपल्याच मुलांशी वागताना आपण अत्यंत सुधारलेल्या, नवीन विचारांचे पालक आहोत, मुलांना संपूर्ण मोकळीक देणारे आहोत, त्यांना स्वतंत्र विचारांचे पंख देणारे आहोत, मग आता काही गोष्टींना विरोध केल्यास आपलं दुटप्पीपण उघडं पडेल, अशी भीती वाटते का पालकांना? मग वाटू देत की! पण जिथे हस्तक्षेपाची गरज आहे तिथे बोललंच पाहिजे.
आजच्या मुलांच्या वागण्यातला सगळा समतोल बिघडलाय असं जर वाटत असेल, तर नक्कीच त्याला कारणीभूत आहे पालकांचा चाचरता संस्कार आणि परिणामी ओशाळलेली शिस्त! तुम्हाला काय वाटतं?
समाप्त
ले: अपर्णा देशपांडे
प्रस्तुती : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“अगं सुनबाई आज तू कशी काय आलीस, नेहमी मोरू येतो पेपर द्यायला !”
“पंत मीच यांना म्हटलं, आज मी पेपर देऊन येते.”
“बरं बरं, पण त्या मागे काही खास कारण असणारच तुझं, होय ना ?”
“बरोब्बर ओळखलत पंत, नेहमी तुम्ही यांना सल्ले देता नां, आज मला तुमचा सल्ला हवाय.”
“अगं मी कसले सल्ले देणार, काहीतरी अनुभवाच्या जोरावर बोलतो इतकंच ! बरं पण मला सांग मोरू बरा आहे ना?”
“त्यांना काय धाड भरल्ये ? मी पेपर नेवून देते म्हटल्यावर परत डोक्यावर पांघरूण घेऊन आडवे झालेत!”
“असू दे गं, दमला असेल तो!”
“त्यांना दमायला काय झालय, सगळे नवीन शौक व्यवस्थित चालू आहेत त्यांचे घरातल्या घरात, गुपचूप !”
“मोऱ्याचे कसले नवीन शौक ? मला काही कळेल असं बोलशील का जरा ?”
“पंत, मला नक्की खात्री आहे, यांना पण त्या कोण आर्यन का फार्यन सारख, बॉलिवूडला लागलेलं नको ते व्यसन लागलंय!”
“काय बोलतेस काय तू ? मोऱ्या आणि ड्रग्जच्या आहारी ?”
“हो नां, म्हणून तर मला डिवोर्स हवाय यांच्या पासून आणि तो कसा मिळवायचा हेच विचारायला मी तुमचा पेपर परत करायच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आले !”
“अगं अशी घायकुतीला येऊ नकोस, मला जरा नीट सांगशील का, तुला असं वाटलंच कसं की मोऱ्या ड्रग्जच्या आहारी गेलाय म्हणून ?”
“अहो पंत, तुम्हाला म्हूणन सांगते, कोणाला सांगू नका, हे हल्ली अंघोळ करून बाहेर आले, की रोज बेडरूम मधे जातात आणि आतून कडी लावून अर्ध्या पाऊण तासाने बाहेर येतात !”
“यावरून तू डायरेक्ट मोऱ्या ड्रग्ज घेतो या निष्कर्षांवर येवून, एकदम डिवोर्सची भाषा करायला लागलीस ?”
“पंत एवढच नाही, हे बाहेर आले की बेडरूम मधून एक उग्र वास आणि धूर जाणवतो मला !”
“मग त्याला तू विचारलंस का नाही, हा धूर आणि उग्र वास कसला येतोय म्हणून ?”
“विचारलं ना मी पंत, मी सोडते की काय त्यांना !”
“मग काय म्हणाला मोऱ्या ?”
“मला म्हणाले, सध्या मी सर्दीने हैराण झालोय आणि त्यावर एक घरगुती उपाय करतोय म्हणून !”
“अगं मग तसंच असेल ना, उगाच तू त्याला ड्रग्जच व्यसन लागलंय….”
“पण पंत, तो उपाय माझ्यासमोर करायला काय हरकत आहे यांना ? बेडरूम मधे बसून कडया लावून कशाला करायचा ? ते काही नाही मला डिवोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे!”
“ठीक आहे, ठीक आहे, तुला डिवोर्स हवाय ना, मी तुला मदत करीन, तू काही काळजी करू नकोस, ok !”
“पंत मला वाटलंच होतं तुम्ही मला मदत कराल म्हणून.”
“हो, पण त्याच्या आधी मला सांग, मोऱ्याला पगार किती मिळतो महिन्याला ?”
“तसं बघा, सगळं हप्ते, टॅक्स जाऊन तीस एक हजार मिळतो !”
“आणि तो सगळा तो तुझ्या हातात आणून देतो की त्याच्या जवळच ठेवतो ?”
“अहो हे पगार झाल्या झाल्या लगेच माझ्या हातात देतात मी तो देवा समोर ठेवून नंतर माझ्याकडेच ठेवते बघा पंत !”
“आणि मोऱ्याला खर्चाला….”
“ते मागतात तसे मी त्यांना देते की !”
“मग आता तू निश्चिन्त मनाने घरी जा, कसलीच काळजी करू नकोस !”
“पण पंत माझ्या डिवोर्सच काय ?”
“अगं तुझ्या मोऱ्याला मी अर्ध्या चड्डीत असल्या पासून ओळखतोय! त्याला सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही आणि आज एकदम तू ड्रग्ज…”
“पण पंत माणूस बदलतो मोठा झाल्यावर वाईट संगतीत, तसं काहीस…”
“अगं एक लक्षात घे, मोऱ्याचा पाच वर्षाचा पगार एकत्र केलास तरी त्यातून पाच ग्राम पण ड्रग्ज येणार नाहीत !”
“काय सांगताय पंत, तुम्हाला कसं कळलं ?”
“अगं पेपर मधे बातम्यातून कळते ना त्या ड्रग्जची किंमत, त्यामुळे तू डोक्यातून मोऱ्याच्या ड्रग्जच्या व्यसनाचं खूळ काढून टाक ! ती सगळी बड्या मशहूर पैशाने सगळी भौतिक सुख विकत घेणाऱ्या धेंडांची व्यसन ! आपण निम्न मध्यमवर्गीय, महिन्याची तीस तारीख गाठता गाठता काय काय दिव्य करायला लागतात ते आपल्यालाच ठाऊक !”
“ते सगळं बरोबर पंत, पण मग त्या धुराच आणि उग्र वासाच काय ?”
“अगं कोकणातली ना तू, मग तुला सर्दी वरचा घरगुती उपाय माहित नाही ?”
“खरंच नाही माहित पंत !”
“अगं तो दीड शहाणा बेडरूम मध्ये ओव्याची धूम्रनलिका ओढत असणार, दुसरं काय !”
“धूम्रनलिका म्हणजे ?”
“अगं ओव्याची सिगरेट बनवून ओढत असणार आणि त्याचाच तुला उग्र वास आला असणार आणि धूर दिसला असणार, कळलं !”
“अग्गो बाई, किती वेंधळी मी, उगाच सुतावरून स्वर्ग गाठायला गेले ! धन्यवाद हं पंत, आज तुम्ही माझे डोळे उघडलेत ! आता मी या जन्मात डिवोर्सची भाषा करणार नाही ! येते पंत, नमस्कार करते !”
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय लघुकथा ‘वाह रे इंसान !’डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस विचारणीय लघुकथा रचने के लिए सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 77 ☆
☆ लघुकथा – वाह रे इंसान ! ☆
शाम छ: बजे से रात दस बजे तक लक्ष्मी जी को समय ही नहीं मिला पृथ्वीलोक जाने का। दीवाली पूजा का मुहूर्त ही समाप्त नहीं हो रहा था। मनुष्य का मानना है कि दीवाली की रात घर में लक्ष्मी जी आती हैं। गरीब- अमीर सभी घर के दरवाजे खोलकर लक्ष्मी जी की प्रतीक्षा करते रहते हैं। खैर, फुरसत मिलते ही लक्ष्मी जी दीवाली- पूजा के बाद पृथ्वीलोक के लिए निकल पडीं।
एक झोपडी के अंधकार को चौखट पर रखा नन्हा – सा दीपक चुनौती दे रहा था। लक्ष्मी जी अंदर गईं, देखा कि झोपडी में एक बुजुर्ग स्त्री छोटी बच्ची के गले में हाथ डाले निश्चिंत सो रही थी। वहीं पास में लक्ष्मी जी का चित्र रखा था, चित्र पर दो-चार फूल चढे थे और एक दीपक यहाँ भी मद्धिम जल रहा था। प्रसाद के नाम पर थोडे से खील – बतासे एक कुल्हड में रखे हुए थे।
लक्ष्मी जी को याद आई – ‘एक टोकरी भर मिट्टी’ कहानी की बूढी स्त्री। जिसने उसकी झोपडी पर जबरन अधिकार करनेवाले जमींदार से चूल्हा बनाने के लिए झोपडी में से एक टोकरी मिट्टी उठाकर देने को कहा। जमींदार ऐसा नहीं कर पाया तो बूढी स्त्री ने कहा कि एक टोकरी मिट्टी का बोझ नहीं उठा पा रहे हो तो यहाँ की हजारों टोकरी मिट्टी का बोझ कैसे उठाओगे ? जमींदार ने लज्जित होकर बूढी स्त्री को उसकी झोपडी वापस कर दी। लक्ष्मी जी को पूरी कहानी याद आ गई, सोचा – बूढी स्त्री तो अपनी पोती के साथ चैन की नींद सो रही है, जमींदार का भी हाल लेती चलूँ।
जमींदार की आलीशान कोठी के सामने दो दरबान खडे थे। कोठी पर दूधिया प्रकाश की चादर बिछी हुई थी। जगह – जगह झूमर लटक रहे थे। सब तरफ संपन्नता थी ,मंदिर में भी खान – पान का वैभव भरपूर था। उन्होंने जमींदार के कक्ष में झांका, तरह- तरह के स्वादिष्ट व्यंजन खाने के बाद भी उसे नींद नहीं आ रही थी। कीमती साडी और जेवरों से सजी अपनी पत्नी से बोला – ‘एक बुढिया की झोपडी लौटाने से मेरे नाम की जय-जयकार हो गई, बस यही तो चाहिए था मुझे। धन से सब हो जाता है, चाहूँ तो कितनी टोकरी मिट्टी भरकर बाहर फिकवा दूँ मैं। गरीबों पर ऐसे ही दया दिखाकर उनकी जमीन वापस करता रहा तो जमींदार कैसे कहलाऊँगा। यह वैभव कहाँ से आएगा, वह गर्व से हँसता हुआ मंदिर की ओर हाथ जोडकर बोला – यह धन – दौलत सब लक्ष्मी जी की ही तो कृपा है।‘
जमींदार की बात सुन लक्ष्मी जी गहरी सोच में पड गईं।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी द्वारा लिखित एक विचारणीय आलेख ‘अमेरिका में छुट्टियाँ’। इस विचारणीय आलेख के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 124 ☆
अमेरिका में छुट्टियाँ
अभी सालभर में मात्र 11 छुट्टियाँ अमेरिका में है ।
इन छुट्टियों को इस तरह डिज़ायन किया गया है की कम छुट्टियों में याद सबको कर लिया जाए.
अमेरिका के सारे राष्ट्रपतियों की याद में प्रेसिडेंट डे मना लिया जाता है.
सिवल वार में शहीद हुये लोगों के लिए मेमोरीयल डे होता है.
सैनिकों को सम्मान देने के लिए वेटरन डे.
श्रम शक्ति के लिए लेबर डे , कोलंबस डे , मूल निवासी रेड इंडियन्स को धन्यवाद देने के लिए थैंक्स गिविंग डे. क्रिसमस, न्यू year और स्वतंत्रता दिवस है ही.
इन छुट्टियो में भी कई फ़िक्स डेट में नहीं होतीं , बल्कि सोमवार या शुक्रवार को मना ली जाती हैं. जैसे कोलंबस डे 8 ऑक्टोबर से 14 के बीच जो सोमवार हो, उसमें माना जाएगा. रविवार छुट्टी होती ही है साथ में सोमवार भी छुट्टी हो गई तो फ़ायदा यह होता है कि लोगों को लम्बा वीकेंड मिल जाता है,
इससे पर्यटन को भी बढ़ावा मिलता है ।
ईस्टर , गुड फ़्राइडे आदि की छुट्टी वहाँ नहीं होती ।
छुट्टियों के मामले में इतने न्यून दिवस वाले देश अमेरिका में संसद में विधेयक आया है कि दीपावली को राष्ट्रीय छुट्टी घोषित किया जाए.
यद्यपि हिंदू अमेरिका में बमुश्किल 1 % हैं , पर सांसद का तर्क है कि दीवाली विश्व का त्योहार है. बुराई पर अच्छाई की जीत, अंधेरे पर उजाले की जीत.
अतः , हर अमेरिकन को यह रोशनी का पर्व मनाना चाहिए.
अमेरिका इसीलिए विश्व मे सर्वोच्च है क्योंकि वे अच्छी बात सीखने और स्वीकार करने में नहीं हिचकते. सारी दुनिया की अच्छाई स्वीकार कर उसे अमेरिकन कर देते हैं.
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक सार्थक एवं विचारणीय रचना “रिव्यू के व्यू”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।
आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 75 – रिव्यू के व्यू ☆
आजकल किसी भी कार्य की गुणवत्ता उसकी रेटिंग के आधार पर तय होती है। लोगों ने क्या रिव्यू दिया ये सर्च करना कोई नहीं भूलता। इसे साहित्यकारों की भाषा में समीक्षा कह सकते हैं। हमारे कार्यो को कसौटी पर कसा जाता है। हम लोग तो भगवान श्रीराम व श्रीकृष्ण तक के गुण दोषों का आँकलन करने से नहीं चूकते तो भला इंसानी गतिविधियों को कैसे छोड़ दें।
वैसे इसका सबसे अधिक उपयोग पार्सल वाली सर्विसेज में होता है।कोई होटल सर्च करने से लेकर कपड़े, किताबें, ट्रैवेल एजेंसी या खाना मंगवाना आदि में पहले लोगों के विचारों को पढ़ते हैं कितनी रेटिंग मिली है उसी आधार पर दुकानों का चयन होता है। मजे की बात है कि डॉक्टर व हॉस्पिटल भी इससे अछूते नहीं रहे हैं। मैंने एक डॉक्टर का नाम जैसे ही गूगल पर डाला तो सैकड़ों कमेंट उसकी बुराइयों में आ गए, पर मन तो बेचारा है वो वही करता है जो ठान ले। बस फिर क्या उसी के पास पहुँच गए दिखाने के लिए। बहुत सारी जाँचों के बाद ढेर सारी दवाइयाँ लिखी गयीं पर सब बेअसर क्योंकि डॉक्टर रोग को समझ ही नहीं पाए थे। तब जाकर समझ में आया कि रेटिंग की वेटिंग पीछे थी और रिव्यू कमजोर थे पर अब तो रिस्क ले लिया था सो मन मार कर रह गए।
ऐसा ही पुस्तकों के सम्बंध में भी होता है, जिसकी ज्यादा चर्चा हो उसे ही अमेजॉन से आर्डर कर दिया जाता है। सबसे ज्यादा बिकनी वाली पुस्तकें व उसके लेखक सचमुच योग्य होते हैं। बेचने की कला ने ही विज्ञापन को जन्म दिया है और उसे खरीदने पर विवश हो जाना वास्तव में समीक्षा का ही कमाल होता है।
पत्र पत्रिकाओं में सबसे पहले लोग पुस्तक चर्चा ही पढ़ते थे। अपनी तारीफ करवाने हेतु बूस्ट पोस्ट कोई नई बात नहीं है। आखिर जब तक लोगों को जानकारी नहीं होगी वे कैसे सही माल खरीदेंगे। साहित्य में तो आलोचना का विशेष महत्व है कई लोग स्वयं को आलोचक के रूप में स्थापित करके ही आजतक विराजित हैं। जब चिंतन पक्ष में हो तो समीक्षा की परीक्षा अच्छी लगती हैं किंतु जब विपक्ष में बैठना पड़े तो मन कसैला हो जाता है। खैर जो भी हो गुणवत्ता का ध्यान सभी को अवश्य रखना चाहिए।
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जीका हिन्दी बाल -साहित्य एवं हिन्दी साहित्य की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य” के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा “विजय”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 94 ☆
☆ लघुकथा — विजय ☆
“पापाजी! आपके पास इतनी रीवार्ड पड़े हैं, आप इनका उपयोग नहीं करते हो?”
“बेटी! मुझे क्या खरीदना है जो इनका उपयोग करुँ,” कहते हुए पापाजी ने बेटी की अलमारी में भरे कपड़े, सौंदर्य प्रसाधन वाले सामान के ढेर को कनखियों से देखा। जिनमें से कई एक्सपायर हो चुके थे।
“इनमें 25 से लेकर 50% की बचत हो रही है। हम इसे दूसरों को बेचकर 50% कमा सकते हैं।”
” हूं।” धीरे से करके पापाजी रुक गए।
तब बेटी ने कहा,” आप मुझे अपना फोन दीजिए। मैं आपको 50% की बचत करके देती हूं।”
” मेरे लिए कुछ मत मंगवाना। मुझे बचत नहीं करना है,” पापाजी ने जल्दी से और थोड़ी तेज आवाज में कहा,” मैं इतनी सारी बचत कर के कहां संभालता फिरूंगा।”
यह सुनते ही बेटी का पारा चढ़ गया, ” पापाजी, आप भी ना, रहे तो पुराने ही ख्यालों के। आप को कौन समझाए कि ऑनलाइन शॉपिंग से कितना कमा सकते हैं?”
” हां बेटी, तुम सही कहती हो। पुराने जमाने के हम लोग यह सब करते नहीं हैं, नए जमाने वाले सभी यही सोचते हैं कि वे खरीदारी करके 50% कमा रहे हैं,” कहते हुए पापा जी ने बेटी को अपना मोबाइल पकड़ा दिया, ” बेटी, तुझे जो उचित लगे वह मंगा लेना। मुझे तो अब इस उम्र में कुछ बचाना नहीं है।”
(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं। जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे ।
आज प्रस्तुत है एक भावप्रवण गीत “बीते बचपन की यादें ”