(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।)
आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा मसीहा ।)
☆ लघुकथा – मसीहा ☆ श्री हरभगवान चावला ☆
पीढ़ियों से प्रजा मसीहाओं के भरोसे रहती आई थी। हर राजा में प्रजा ने मसीहा देखा और हर बार छली गई। प्रजा अकर्मण्य नहीं थी ,पर ‘कर्म करो और फल की चिन्ता मत करो’ के सिद्धांत में उसकी गहरी आस्था थी। प्रजा कर्म करती, फल राजा या दरबारी भोग लेते। अब हालत यह थी कि भूख थी, खेत बंजर हो गये थे। प्यास थी, नदियों में पानी नहीं था। हाथ थे, हाथों के लिए कोई काम नहीं था। लोग बिना किसी पवित्र उद्देश्य के मर रहे थे। प्रजा सदा की तरह मसीहे की प्रतीक्षा कर रही थी।
ऐसी निराशा के बीच प्रजा ने अपने नये राजा में भी मसीहे को देखा। प्रजा का दृढ़ विश्वास था कि यह सचमुच का मसीहा साबित होगा। उसकी वाणी में ओज था, चेहरे पर आत्मविश्वास। वह शेर की तरह चलता था, बाज़ की तरह देखता था, कृष्ण की तरह वस्त्र धारण करता था। प्रजा नये मसीहे की पूजा करने लगी। मसीहे का हर झूठ प्रजा को सच से भी ज़्यादा विश्वसनीय तथा मोहक लगता। हर मसीहे की तरह नया मसीहा भी जानता था (बल्कि औरों से कहीं बेहतर जानता था) कि जैसे प्यार हर व्यक्ति के भीतर सहज ही उपस्थित रहता है, ठीक वैसे ही प्यार से कई गुणा अधिक घृणा भी सहज ही उपस्थित रहती है। उसने पहले प्रजा के भीतर गौरव जगाया कि उसकी प्रजा सर्वश्रेष्ठ है। प्रजा को अपनी क़ीमत समझ में आई। फिर मसीहे ने उनके भीतर की घृणा को कुरेदकर उसमें आग लगा दी। चूँकि घृणा सृष्टि की सर्वाधिक विस्फोटक सामग्री है, सो जल्दी ही आग पूरी रियासत में फैल गई। अब प्रजा रक्त से फाग खेलती है। उसे न रोटी चाहिए, न पानी, न काम। प्रजा ख़ून देखकर अट्टहास करती है और मसीहे की जय-जयकार करती है। उसका दृढ़ विश्वास है कि रक्त की नींव पर जल्दी ही उसके स्वर्णिम भविष्य की भव्य इमारत बनने वाली है।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं “भावना के मुक्तक”। )
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं एक भावप्रवण रचना “साधौ जीवन के दिन चार…”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मोरेश्वर रामचंद्र पराडकर ऊर्फ मोरोपंत किंवा मयूर पंडित (1729 – 15 एप्रिल 1794) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते.
सुमारे 45 वर्षे अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75 हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे.त्यामध्ये ‘आर्याकेकावली’, ‘आर्याभारत’, ‘केकावली’ वगैरे असंख्य ग्रंथांचा समावेश आहे.
त्यांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत. हा प्रकार मराठीत पहिल्यांदा त्यांनीच हाताळला.
‘आर्याभारत’ हे त्यांनी आर्यावृत्तात रचलेले समग्र महाभारत आहे.
विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी त्यांनी 108 रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते.
बारामतीतील त्यांच्या वाड्याच्या एका खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द त्यांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून ते आपली काव्ये सजवत असत.
‘झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु यासम हा ‘ व ‘बालिश बहू बायकांत बडबडला ‘ या त्यांच्या उक्ती आजही वापरल्या जातात.
त्यांचे चरित्र व त्यांच्या काव्याची चर्चा करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
☆☆☆☆☆
डॉ. विनायक रा.करंदीकर
डॉ. विनायक रा. करंदीकर (27 ऑगस्ट 1919 – 15 एप्रिल 2013) हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालय येथे प्राध्यापक होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सचिव होते.
त्यांचा संतसाहित्य, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता. रामकृष्ण मठाशी त्यांचा निकटचा संबंध होता
त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संलग्न विविध संस्थांमध्ये काम केले.
दैनिक ‘तरुण भारत’ प्रकाशित करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते.
त्यांनी मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही केले आहे.
ते पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.
‘कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद’ (आत्मचरित्र),
‘ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण, ‘गोपवेणू’ (कवितासंग्रह), ‘स्वामी विवेकानंद जीवनदर्शन'(स्वामी विवेकानंदांचे त्रिखंडात्मक चरित्र), ‘ज्ञानेश्वरीदर्शन’,’Three Architects of RSS'(इंग्रजी) वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
साहित्य अकॅडमीने प्रकाशित केलेल्या ‘इंडियन मास्टरपीस ‘ या संपादित ग्रंथात त्यांनी ज्ञानदेव- तुकारामांवर लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नड व अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.
कवी मोरोपंत व डॉ. विनायक रा. करंदीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, लोकसत्ता.कॉम – पंकज भोसले.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(शर्ववर्मा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,” महाराज मी तुम्हाला सहा महिन्यात संस्कृत व्याकरण शिकवू शकेन. “) आता पुढे….
गुणाढ्याला ही गोष्ट अशक्य वाटली. त्याने मोठ्या हिरीरीने पैज लावली, “शर्ववर्माने जर सहा महिन्यात राजाला संस्कृत व्याकरण शिकवून दाखवले तर मी संस्कृत,पाली प्राकृत या तिन्ही भाषांचा त्याग करेन. “त्याच्या पैजेला उत्तर म्हणून शर्ववर्मा म्हणाला,”जर मी असे करू शकलो नाही तर पुढची बारा वर्षे डोक्यावर तुझ्या पादुका धारण करून वावरेन. “
….आता पैज जिंकणे ही मोठ्या प्रतिष्ठेची बाब झाली. शर्ववर्मा कुमारस्वामींकडून कातंत्र व्याकरण शिकला होता. हेच ते रोजच्या बोलचालीत उपयोगी पडणारे व्यावहारिक व्याकरण… त्याच्या सहाय्याने त्याने खरोखरच सहा महिन्यात राजाला असे व्याकरण शिकवले की राजाला यापुढे कोणासमोरही बोलताना लज्जित व्हावे लागणार नव्हते.
राजाचाआनंद गगनात मावेनासा झाला. खूप धनदौलत देऊन त्याने शर्ववर्माची पूजा केली आणि त्याला नर्मदा तटावरील भृगुकच्छ (भडोच)देशाचा राजा घोषित केले.
मात्र जलक्रीडा प्रसंग… आणि ओघाने आलेला हा पैजेत हरण्याचा प्रसंग… दोन्हीही गुणाढ्याच्या पुढील आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.त्यामुळे त्याच्या जीवनाची दशा आणि दिशाच बदलून गेली. त्याचा वाईट काळ सुरू झाला. कबूल केल्याप्रमाणे त्याने संस्कृत, पाली,प्राकृत भाषेचा त्याग केला. मौन धारण करून विंध्य पर्वतावर जाऊन त्याने देवी विंध्यवासिनीच्या पूजाअर्चनेत स्वतःला गुंतवून घेतले. कालांतराने तेथील वन-वासीयांकडून तो पैशाची भाषा शिकला. पैशाची भाषा हा प्राकृत भाषेचा उपभेद होता.
गुणाढ्याने तेथे बड्डकहेची (बृहत्कथा)रचना केली. सात वर्षात अथक प्रयास करून सात लाख छंदात त्याने ती लिहून काढली. तीही पैशाची भाषेत! त्यामुळे ती बृहत्कथे ऐवजी बड्डकहा!
विंध्याद्रीच्या घनदाट अरण्यात शाई किंवा भुजपत्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनस्वी गुणाढ्याने मृतप्राण्यांच्या कातड्यावर स्वतःच्या रक्ताची शाई करून ही विशाल कथा लिहिली. लिहिता लिहिता गुणाढ्य ती वाचत असे. ती ऐकण्यासारखी तेथे सिद्ध विद्याधरांचा मेळावा जमा होई. त्यातील गुणदेव आणि नंदी देव हे दोघे त्याचे शिष्य झाले. सात वर्षांनी जेव्हा बृहत्कथा लिहून पूर्ण झाली तेव्हा त्याचा प्रचार प्रसार कसा करावा हा प्रश्न गुणाढ्याला भेडसावत होता. त्याच्या शिष्यांच्या मतानुसार फक्त सातवाहन नरेश सारखा योग्य व्यक्तीच या कथेचा प्रसार करू शकला असता. त्यालाही हा सल्ला आवडला. त्याप्रमाणे दोघे शिष्य राजधानीत राजदरबारी जाऊन पोहोचले. त्यांनी गुणाढ्याच्या कृतीवर सविस्तर माहिती पुरवली. पण सात लाख श्लोकांची इतकी मोठी पोथी… पोथी नव्हे पोथाच….तोही प्राण्यांच्या कातड्यावर … निरस अशा पैशाची भाषेत आणि मनुष्याच्या रक्ताने लिहिलेला!राजाने त्या कृतीकडे पाहण्याचे ही टाळले. अपमान करून त्याने गुणाढ्याच्या शिष्यांना परत पाठवले.
या प्रकारामुळे कवी गुणाढ्य अतिशय दुःखी झाला. जवळच्या एका टेकडीवर त्याने अग्निकुंड तयार केले.उंच उंच उठणाऱ्या ज्वालात आपल्या महान कलाकृतीचे एकेक पान वाचून तो अर्पण करत गेला. त्या श्लोक पठणात इतके माधुर्य होते की अवतीभोवती वनात राहणारे प्राणी,पशू-पक्षी जमा झाले. एकेक पान अग्निकुंडात जळून जात होते… शिष्य डोळ्यात पाणी आणून हे दृश्य बघत होते ….पशुपक्षी खाण्यापिण्याची शुद्ध हरपून स्तब्ध होऊन डोळ्यात पाणी आणून बृहत्कथा श्रवण करत होते.
इकडे राजवाड्यात सामिष भोजनासाठी चांगले मास उपलब्ध होईना. कारण सारे पशुपक्षी निराहार राहिल्याने हाडे-काडे होऊन गेले होते. त्याचे कारण जाणून घेण्यासाठी विचारपूस, तपास सुरू झाला. त्यामुळे राजाला गुणाढ्य करीत असलेल्या काव्य-कथा हवनाची माहिती मिळाली. राजदरबारात घडलेला प्रकार राजाला आठवला. त्याला पश्चाताप झाला.
आपली चूक सुधारण्यासाठी तो ताबडतोब अरण्यात गेला. त्याला काहीही करून गुणाढ्याला व बड्डकहेला वाचवायचे होते. राजाने साष्टांग दंडवत घालून त्याची माफी मागितली. खूप अनुनय विनवण्यानंतर गुणाढ्याने आपले लेखन अग्नीत अर्पण करायचे थांबवले. पण….तोपर्यंत कथेचा एक सप्तमांश भाग….एक लाख श्लोकच शिल्लक राहिले होते.राजा त्याच्या प्रसार,प्रचाराचे आश्वासन देऊन त्याला त्याच्या अमूल्य वाड़मयाला सन्मानपूर्वक
☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिलं-, सगळं अस्ताव्यस्त झालं. कुणी टाळ्या वाजवत होतं. कुणी स्टेजवर काही ना काही फेकत होतं. कुणी फेकण्याचा नुसताच आविर्भाव करत होते. कदाचित त्यांनी आणलेली सामग्री संपली असावी. आता इथून पुढे )
मी माझ्या कादंबरीच्या निर्मितीविषयी माझं मनोगत प्रगट करणार होतो. परंतु बोलण्यासाठी मी तोंड उघडल्यापासून ज्या टाळ्या वाजायला सुरुवात झाली, त्या थांबेचनात. मी खुर्चीवर जाऊन बसेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. सुबोध माझ्या कानाशी कुजबुजत म्हणाला, ‘‘घाबरू नको! मी पोलिसांना फोन करून येतो.” समारंभाचं हे सगळं वातावरण बघून अध्यक्षांनी अध्यक्षीय समारोप न करताच समारंभ संपल्याचं जाहीर केलं.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रातही प्रेक्षक मंडपातलं वातावरण असंच राहिलं. नाव होणं दूरच… आता साहित्यिकांमध्ये एवढी बदनामी आणि अप्रतिष्ठा होईल, की विचारायला नको. सगळ्या समारंभाची चित्तरकथाच झाली.
दुसऱ्या दिवशी झाल्या गोष्टीचा जाब विचारायला हेल्पलाईन फर्ममध्ये मी दरवाजापर्यंत पोचतोय, तोच नकुल तिथून गडबडीने बाहेर पडताना दिसला. त्याचं बहुधा माझ्याकडे लक्ष नसावं. आता हा इथे? म्हणजे… हाही त्याचा कविता संग्रह छापून बसलाय की काय? हातात निमंत्रण पत्रिकाच देऊन आम्हाला आश्चर्याचा धक्का देणार की काय? बिचाऱ्याने माझा प्रकाशन समारंभ व्यवस्थित पार पाडावा, म्हणून केवढी खटपट केली होती. एक दोन टोमॅटो, त्याच्या नि सुबोधच्या अंगावरही फुटले होते. ठीक आहे. त्याच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी मी त्याने केलेल्या मदतीची जरूर भरपाई करीन.
आत गेलो, तर समोर तीच… दगडी सुशीलाजी… मला पाहताच तिने सुरू केलं,
‘‘आपले साडे सात हजार रुपये झाले. उरलेले अडीच हजार अकरा वाजता आमची अकाउंटंट येईल, तिच्याकडून घेऊन जा.”
मला इतका राग आला होता, की माझ्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. कसं तरी रागावर नियंत्रणा मिळवत मी म्हटलं,
‘‘कसले साडे सात हजार? तुम्ही माझे सगळे पैसे परत दिले पाहिजेत. इतकंच नाही, तर अब्रू नुकसानीबद्दल मला काही रक्कम मिळाली पाहिजे. नाही तर मी ग्राहक न्यायालयात जाईन.”
‘‘तसं तुम्ही करू शकणार नाही.” ती दगडी आवाजात म्हणाली.
‘‘का करू शकणार नाही? आम्ही माल एका प्रकारचा मागवला, पण तुम्ही दुसराच पाठवलात. आम्ही मागवले, खास श्रोते नि तुम्ही मात्र पाठवलेत अद्वितीय म्हणजे विध्वंसक श्रोते. माझ्या सगळ्या समारंभाचा बट्ट्याबोळ झाला. विध्वंस झाला. मी पोलिसात जाईन. फिर्याद करेन.”
‘‘महाशय थांबा जरा ! आपला काही तरी गैरसमज होतोय!” तिने रॅकवरून एक फाईल काढली. माझ्यापुढे ती फाईल ठेवली. कागदावर लिहीलं होतं, नूतन सभागृहात खालील लोकांनी जायचे आहे. त्याच्याखाली शंभर नावे व त्यांच्या सह्या होत्या. कार्यक्रमाची वेळ लिहिलेली होती आणि ती मंडळी परतल्यानंतरची वेळ घातलेली होती. ती म्हणाली, ‘‘बघा! नीट बघा! या हिरव्या फाईली आम्ही खास श्रोत्यांसाठी बनवलेल्या आहेत.”
‘‘तरीही आपण काही तरी चूक केलीय. माझ्या समारंभात अद्वितीय श्रोते आले होते.”
‘‘पन्नास अद्वितीय श्रोत्यांचीही ऑर्डर होतीच! हे बघा ना!” तिने एक लाल रंगाची फाईल काढली आणि उघडून माझ्यापुढे धरली. स्थळ – नूतन सभागृह. कार्यक्रमाची वेळ मी दिलेलीच होती. त्याखाली पन्नास नावे आणि सह्या होत्या. येण्या-जाण्याच्या वेळेच्या नोंदीसकट.
‘‘माझा समारंभ उधळून लावायची ऑर्डर? कुणी दिली ऑर्डर?”
‘‘आता आताच ते महाशय इथून गेले.”
‘‘पण तुम्ही ही ऑर्डर स्वीकारलीच कशी?”
‘‘आमची ही फर्म म्हणजे एक प्रकारचं दुकानच आहे, असं समजा ना! ज्या गि-हाईकाला, जेव्हा, जसा माल हवा असेल, तसा आम्ही पाठव्तो. दुकानात नाही, दोन-तीन कितीही गि-हाईकं अनेक प्रकारचा माल मागतात आणि दुकानदारही ज्याला जो माल हवा, त्याला तो देतो.”
‘‘अहो, पण एकाच समारंभार असे भिन्न प्रकारचे श्रोते म्हणजे…”
‘‘दुकानदार नाही, एकाच घरात साखर आणि डी.डी.टी.ची पावडर देत?”
या दगडापुढे डोकं आपटण्यात काही अर्थ नव्हता. चालता चालता एकेक गोष्ट स्पष्ट होत गेली. दंगा झाला तो नकुलच्या प्रास्ताविकानंतर. मगाशी नकुलचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही, असं नसणार. त्याने तसं दाखवलं असणार. पण… पण… हे असं कसं झालं? नकुल तर माझा जीवश्च कंठश्च मित्र! लहानपणी आम्ही शाळेत असताना जीवश्च कंठश्चची व्याख्या गमतीने, कंठ दाबून जीव घेणारा अशी करायचो. त्याचा आता प्रत्यक्ष प्रत्यत घेतला. असाही एक अनुभव. पुढे मागे लेखनात वापरूयात म्हणा!
नंतर मला कळलं, त्या फर्ममध्ये सुबोधच नकुलला घेऊन गेला होता. त्यानंतर असंही कळलं, की सुबोधकडून कंपनीला जेवढ्या ऑर्डर्स मिळतील त्या प्रमाणात त्याचं कमीशन सुबोधला मिळतं. तर असे माझे जान घेणारे जानी दोस्त. त्यांनी माझं केलेलं शोषण माझ्या ‘‘मातीच्या चुली” मधील पात्रांच्या शोषणापेक्षा कमी आहे का हो? वाचकहो, तुम्हीच निर्णय करा! अर्थात त्यासाठी कादंबरी वाचायला हवी. शऱ्याने मुखपृष्ठ बदललं नसेल, तर मूळ पुस्तकाला कव्हर घालून वाचतोय असं समजा.
अजूनही आमची पंचकडी आहे तशीच आहे. म्हणजे… जीवश्च.. कंठश्च. मला काही झाल्याचे मी काही कुणाला दाखवले नाही. तरी पण कधी तरी मी याचा बदला घ्यायचा ठरवलाय. पण कसा? तेच अजून सुचत नाहीये. तुम्ही सुचवाल? एका लेखकाला साहित्यिक बदला घेण्याचा उपाय… सुचवाल कुणी उपाय?