सूचनाएँ/Information – ☆ साहित्यिक कार्य के लिए श्रीओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ सम्मानित ☆

सूचनाएँ/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ साहित्यिक कार्य के लिए श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ सम्मानित ☆

रतनगढ़। श्री राम मंदिर में भगवन राम की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा के अवसर पर सोमवंशी क्षत्रिय समाज द्वारा साहित्यिक कार्य के लिए श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को शाजापुर में एक भव्य सामाजिक कार्यक्रम में भारत भर से पधारे अतिथियों के सम्मुख सम्मानित किया गया।

इस अवसर पर रमेश मनोहरा जावरा को भी शाल श्रीफल देकर कर सम्मानित किया गया है। स्मरण रहे कि श्री ओमप्रकाश क्षत्रिय को आजादी के 75 वे अमृत महोत्सव पर समर्पित भारत कथा माला के 28 राज्य व 9 केंद्र शासित प्रदेशों की प्रकाशित पुस्तकों में ’21 श्रेष्ठ बालमन की कहानियां (मध्यप्रदेश)’ का संपादन कार्य कर कहानियों की दृष्टि से सर्वोत्कृष्ट संकलन प्रस्तुत किया गया हैं। इस संकलन में मध्यप्रदेश साहित्य अकादमी के निदेशक डॉ विकास दवे, देवपुत्र के संपादक श्री गोपाल महेश्वरी सहित मध्यप्रदेश के अनेक बाल साहित्यकारों की कहानियां  सम्मिलित की गई है।

💐 ई- अभिव्यक्ति परिवार की ओर से श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” इस उपलब्धि के लिए हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं 💐

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 16 (21-25)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #16 (21 – 25) ॥ ☆

रघुवंश सर्ग : -16

 

अब देख सरयू के तट और जल को, जहाँ स्नान सुविधा औं पूजा नहीं है।

वानीर कुंजों से घिर गये उन्हें देख मन दुखता है, अच्छा लगता नहीं है।।21।।

 

अतः छोड़ तुम अब कुशावती नगरी को, स्वकुल-राजधानी अयोध्या में आओ।

ज्यों तव पिता राम, तज मानवी देह, परम तत्व में मिल हुए एक भाव।।22।।

 

सुन प्रार्थना उस नगर देवता की कहा कुश ने-हे देवि ऐसा ही होगा।

सुन देवी उत्तर हुई लुप्त चुपचाप, खुशी हो के अपनी तजी रूप-आभा।।23।।

 

प्रातः सभा में कहा कुश ने वृत्तांत निशि का सभी सभासद ब्राम्हणों से।

जिनने समझ-राजधानी ने कुश का वरण कर लिया है दिया आशीष मन से।।24।।

 

कर वेदपाठी? द्विजों के हवाले, कुश रानियों सहित निकले अयोध्या।

पीछे थी सेना कि ज्यों मेघमाला के चलता है पीछे बवण्डर पवन का।।25।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्नरंजन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वप्नरंजन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

 जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी

मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी.                           || धृ ||

 

 झुकवून नेत्र खाली, रोखून ते पहाणे,

जणू पाहिलेच नाही, असले तुझे बहाणे,

 पदरास  पीळ भरता, नेहमीच तु दिसावी      ||१||

 

 तू रेखीता कपोली, ती चंद्रकोर लाल,

मुखचंद्र लाजुनी ग, होईल लाली लाल,

जास्वंदी सम लाली, गाली सदा दिसावी  ||२||

 

आषाढ मोकळा तू, झटकू नकोस वेडे,

हरवून भान जाते, वेल्हाळ प्रेम वेढे

गजऱ्यांस माळताना, खिडकीत तू दिसावी ||३||

 

जा तू खूशाल आता, झुकवून नेत्र खाली,

काळीज फेकले मी, वाटेत भोवताली,

 तुडवीत काळजाला, जाता सदा दिसावी ||४||

 

ते दक्ष लक्ष जेव्हा, डोळ्यात रंगते ना!

पाहू नको, कि पाहू? माझे मला कळेना,

 प्रीती तुझी न माझी, अद्वैत आज व्हावी ||५||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #109 – एकटं एकटं वाटतं हल्ली…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 109 – एकटं एकटं वाटतं हल्ली…!

एकटं एकटं वाटतं हल्ली कातरवेळी.

ओठावरती त्याच ओळी त्याच वेळी…!

 

तिची सोबत तिची आठवण बरेच काही

मांडून बसतो सारा पसारा अशाच वेळी…!

 

उडून जातो सूर्य नभीचा डोळ्यादेखत

तेव्हाच येते रात्र नभावर चंद्राळलेली…!

 

दाटून येतो अंधार थोडा चहू दिशानी.

अताशा मग फाटत जाते स्वप्नांची झोळी…!

 

डोळ्यांमधूनी वाहून जाते मग टिपूर चांदणे

बघता बघता मग रात्र ही सरते एकांत वेळी…!

 

एकटं एकटं वाटतं हल्ली कातरवेळी

ओठावरती त्याच ओळी त्याच वेळी…!

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रावळगाव…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆रावळगाव…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

रा व ळ गा व

भारतीय चॉकलेट, गोळ्यांसाठीचा एक मोठा पण तुलनेने थोडा विस्मृतीत गेलेला ब्रॅण्ड म्हणजे रावळगाव. एका पिढीचा शाळेत जायचा कंटाळा सुसह्य़ करण्याचं काम या ब्रॅण्ड्सच्या पानपसंद, मँगो मुड, कॉफी ब्रेक या आणि अशा अनेक चॉकलेट व गोळ्यांनी केलं. त्या ब्रॅण्ड्सची ही कहाणी.

सोलापूर जिल्ह्य़ात जन्माला आलेल्या हिराचंद वालचंद यांना अभ्यासाची फारशी गोडी नव्हती. व्यावसायिक होण्याचं स्वप्न मात्र त्यांना खुणावत राहायचं. वडिलांचा पारंपरिक अडतीचा व्यवसाय सोडून ते आपलं व्यावसायिक नशीब आजमावायला थेट बांधकाम व्यवसायात शिरले. फाटक नावाच्या बांधकाम व्यावसायिकाशी भागीदारीत फाटक-वालचंद बांधकाम व्यवसाय त्यांनी सुरू केला. बार्शी लाइट रेल्वेसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामात त्यांना ब्रिटिशांचा दुजाभाव खटकत होता. मर्जीतील ब्रिटिश कंपन्यांना संधी देत भारतीयांना डावलण्याच्या ब्रिटिशनीतीला ठोस उत्तर देण्याची वालचंद यांची इच्छा होती. त्यांनी शेतकी जीवन लहानपणापासून पाहिलं होतं. आणि शेतकी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर हा शेतीप्रधान भारत देश ब्रिटिशांना पुरून उरेल अशी त्यांची भावना होती. याच भूमिकेतून त्यांनी नाशिक जवळील रावळगाव येथे तब्बल दीड हजार एकर उजाड नापीक जमीन स्वस्तात घेतली. अनेक कृषीतज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, अभियंते यांना हाताशी धरून त्या नापीक जमिनीचं रूपांतर काहीच वर्षांतच उपजाऊ  कसदार जमिनीत झालं. तिथे उसाची लागवड करण्यात आली. १९३३ मध्ये भारतातील पहिला साखर कारखाना रावळगाव येथे उभा राहिला. थोडासा दुर्लक्षित असा तो भाग त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह विकसित झाला. याच कारखान्याच्या जोरावर १९४० मध्ये रावळगाव चॉकलेट, गोळ्यांचं उत्पादन सुरू झालं. अगदी तसंच शेतकी प्रारूप त्यांनी पुण्याजवळील कळंब इथे राबवलं. ज्या परिसराला सध्या आपण वालचंदनगर म्हणून ओळखतो.

गोळ्या, चॉकलेट यांचं विलक्षण अप्रूप असण्याच्या काळात रावळगाव टॉफीजना लोकप्रियता मिळाली. बदलत्या काळानुसार आपली संस्कृतीही बदलत गेली. वाढदिवस, त्यानिमित्ताने शाळेत गोळ्या वाटणं, घरी जंगी मेजवानी साजरी होणं हे सारं रुजत असताना घाऊक प्रमाणावर चॉकलेट किंवा गोळ्यांची पाकिटं खरेदी करणंही अनिवार्य झालं. ८०/९० च्या दशकातील पिढीला आई-बाबांनी अशाच निमित्ताने घरी आणलेली रावळगाव चॉकलेटची थैली नक्की आठवत असेल. हिरव्या, लाल चकचकीत आवरणातली ती चॉकलेट्स म्हणजे वाढदिवस धमाल साजरा होणार याची ग्वाही असायची. त्या चॉकलेट्सवर विशिष्ट नाव नसायचं तर रावळगाव अशी छान लफ्फेदार अक्षरं असायची. या घाऊक खरेदीबरोबर शाळेजवळच्या दुकानातील हाका मारून बोलावणाऱ्या बरण्यांमध्ये रावळगावचं पानपसंद, मँगो मूड खुणावायचं. महागडी चॉकलेट भेट देऊन मैत्री करण्याचा तो काळ नव्हता. पण खिशातील पानपसंद, मँगो मूडने शाळेतील कितीतरी मैत्रीबंध पक्के केले. खिसा अशक्त असेल तर फक्त स्वत:पुरतं गोळी घेणंही लपून राहायचं नाही. लालभडक झालेली जीभ दगा द्यायची. ‘‘एकटीनेच पानपसंद खाल्लंस ना? आता मी देते का बघ’’ अशा धमक्या मिळायच्या.

रावळगाव हे ब्रॅण्डनेम मनावर ठसण्यात त्यांच्या जाहिरातीचा वाटाही मोठा होता. मँगो मूडच्या जाहिरातीतला तो गवतातला तरुण आणि नंतर पिकल्या मिशीचा आंबा आठवून बघा. पानपसंदच्या जाहिराती हिंदी असल्या तरी मराठी कलाकारांच्या दर्शनाने त्या अधिक जवळच्या वाटत. ‘शादी और तुमसे? कभी नहीं’ असं रागात म्हणणाऱ्या अर्चना जोगळेकर किंवा हातात लाटणं घेऊन ‘देखो मुझे गुस्सा मत दिलाओ, अपनी बिवीपे हुकूम चलाते हो?’ असं खडसावणाऱ्या भारती आचरेकर पडद्यावर दिसत. मग पानपसंद समोर येई. सोबत आवाज ‘पान का स्वाद गजब की मिठास’ आणि तीच वाक्यं लाडेलाडे बोलली जात. या जाहिरातीसुद्धा रावळगाव गोळ्यांइतक्या गोड होत्या.

नंतर अनेक परदेशी कंपन्यांच्या मार्केटिंगचा झंझावात आला आणि आपली ही देशी बनावटीची चॉकलेट्स गोळ्या कुठेतरी मागे पडली. आजही रावळगाव चॉकलेट वितरित होतात पण सध्याची पिढी त्या स्वादापासून अनभिज्ञ आहे. मध्यंतरी एका सर्वेक्षणात कोणती भारतीय चॉकलेट्स परत बाजारात यावीशी वाटतात? या प्रश्नाला अनेकांनी इतर गोळ्यांसह पानपसंद, मँगो मूड हे दिलेलं उत्तर बोलकं आहे.

रावळगाव गोळ्यांची टॅगलाइन आहे, स्वीट स्माइल ऑन मिलीअन्स ऑफ फेसेस. ही टॅगलाइन अनेक अर्थाने खरी होती. गोळ्या, चॉकलेट यांच्या गोडव्यासोबत तुलनेने स्वस्त अशी ही चॉकलेट सर्व थरांतील मंडळींना परवडत.

आज ७८ वर्ष जुना असा हा ब्रॅण्ड काहीसा झाकोळलाय, पण तरीही स्मृतींच्या पडद्यावर त्याच्या आठवणी लख्ख आहेत. लहान वयातील अप्रूप असणारे वाढदिवस, मैत्रीच्या आणाभाका, भांडणांची मिटवामिटवी यांचा हा गोड साक्षीदार म्हणूनच आजही केवळ नावाच्या उच्चाराने चेहऱ्यावर हसू फुलवतो.

– अनामिक (सोर्स व्हाॅटसअप)

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(ताईच्या यशस्वी गीतरामायणानंतर)

‘भक्तीचा ठेवा ‘ या कार्यक्रमानंतर ताईला ओळख मिळू लागली.ही कल्पना पात्रे सरांचीच.

“तुमच्यावर संत वाङमयाचे संस्कार आहेत.तुमच्या गळ्यात भजन, ओव्या छान उतरतात.

भावपूर्ण. श्रद्धायुक्त. अगदी मंदीराच्या गाभार्‍यात डोळे मिटून बसावं इतकं छान! आवडेल लोकांना.

या बाबतीतहीताई साशंकच होती. अजुन जाहीररित्या कार्यक्रम करण्यास मन धजावत नव्हतं.

नको. उगीच हसं व्हायचं. मी आहे तिथेच बरी आहे.

मला इतकंच पुरे. पण कार्यक्रमाची सगळी जबाबदारी सरांनी उचलली. अगदी वर्तमानपत्रातल्या जाहिरातीपासूनते छोट्या अॉडीओ व्हिडीओ क्लीप्सच्या माध्यमातून आॅनलाईन प्रमोशन पर्यंत.

आणि खरोखरच कार्यक्रम जनमानसात ठसला.

लोकांना प्रचंड आवडला. लोक ताईशी कनेक्ट व्हायला लागले. कार्यक्रम संपल्यानंतर श्रोते पडद्यामागे आवर्जून भेटायला येत.

एकदा एका वृद्ध स्त्रीने ताईच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले,”तुझ्या गळ्यातून संतांची वाणीच उतरते.

देव तुझं भलं करो! “

तर कधी कुणी म्हणत,”साक्षात् गिरीधराची मीराच उभी राहिली.”

मनात खूप समाधान होतं. काहीतरी मिळवल्याचा. गवसल्याचा हर्ष होता.

पण विश्वास बसत नव्हता.

यशाच्या पहिल्या पायरीवरही ताई गंभीर होती.

शिडी चढायची तिला घाई नव्हती.

सकाळीच हर्षलशी फोनवर बोलणे झाले होते.

“आई पीट्सबर्गच्या महाराष्ट्र मंडळात तुझा कार्यक्रम त्यांना ठेवायचा आहे. डेट्राॅईट, सॅनहोजे, फ्लोरीडा वरुनही विचारणा झाली आहे. तुझ्या तारखा कळव. इथले लोकल वादक तुला साथ देतील. तरीही तुझ्याबरोबर कितीजणं येणार ते सांग. मंडळच स्पॉन्सर करेल. बाकीचं मी पाहतो. लवकर निर्णय कळव. सगळ्यांचे व्हीसा वगैरे व्हायला वेळ लागेलच.”

सगळंच अविश्वसनीय वाटत होतं. हे सगळं आपल्याबाबतीत घडतंय् हे पचत नव्हतं.

आज मन गच्चं भरलं होतं. भावनांचा कल्लोळ झाला होता. डोळे सारखे भरुन येत होते.

मंचावर नारळ फुटला. फुलं उधळली. ऊदबत्यांचा सुवास दरवळला. वाद्ये जुळवली जात होती. निवेदन संपले.

अन् हळुहळु पडदा वर सरकत गेला. सभागृह स्तब्ध झाले. टाळ्यांचा गजर झाला. स्वागत, प्रास्ताविक झाल्यानंतर ताई पोडीअमजवळ आली.

तिने नम्रपणे रसिक श्रोत्यांना अभिवादन केले.

सुरेख हिरव्या काठांची क्रीम कलरची रेशमी साडी. गळ्यात ठसठशीत मोत्यांची माळ. कानात कुड्या. चेहरा प्रसन्न, हसरा, शालीन. साक्षात् सरस्वती.

 “जोहार मायबाप!! जोहार मायबाप!!”

तिचा गळा दाटला होता.तिनं एक आवंढा गिळला.

“माझे पपा नेहमी म्हणायचे, “साहित्य संगीत कला विहीन:। साक्षात् पशुपुच्छ  विषाण हीन:।। पण आपल्यातल्या कलागुणांची ओळख व्हावी लागते. वाळा म्हणजे तसं पाहिलं तर शुष्क गवतच ना? पण त्यावर पाणी शिंपडताच शीतल सुगंध दरवळतो.”

मग ताई बोलतच राहिली. आठवणींच्या लडी ऊलगडत  राहिल्या. तिच्या अवघड न्यूनगंडातून

चाचपडत सुरु झालेल्या संगीत प्रवासाची कहाणी श्रोतेही मनापासून ऐकत राहिले.

पपांच्या आठवणींने ताईचे मात्र डोळे अखंड झरत होते.

मिटल्या डोळ्यासमोर दोन तेज:पुंज डोळे नजरेनेच तिला आशिर्वाद देत होते. ढगातल्या किरणांच्या साक्षीनं एक स्वप्न साकारत होतं.

समाप्त.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आत्महत्या करावी वाटते…संजय आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  आत्महत्या करावी वाटते…संजय आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“आत्महत्या करावी वाटते”, म्हणून एकजण डॉक्टरांकडं गेला. डॉक्टर माझे मित्र. त्यांनी समुपदेशनासाठी त्याला माझ्याकडं पाठवलं.

“आत्महत्या करायचीच आहे”, यावर गडी ठाम होता. त्याला त्याची कारणं होती. ती कारणं अगदी तकलादू नव्हती. जगावंसं वाटू नये, अशी कारणं होती ती. विष्ण्ण, खिन्न करणारी आणि उपाय आवाक्यातही नसणारी अशी कारणं होतीच ती.

मुळात तो तसा बुद्धिमान. विचारी. कलासक्त. पन्नाशीच्या उंबरठ्यावर. पण, अशा वळणावर उभा होता की आता जगाचा निरोप घेणं अधिक सोईचं. आगामी काळ फारच कठीण. इतके सारे गुंते होते आयुष्यात की त्या प्रत्येकावर काम करत बसण्यापेक्षा अलगद जगाचा निरोप घेणं चांगलं. त्याचं लॉजिक काही अगदीच चुकीचं नव्हतं.

आमच्या गप्पा सुरू झाल्या.

यथेच्छ गप्पा ठोकल्या.

दोनेक तास गप्पा झाल्यावर त्याला म्हटलं, “यार. मजा आली. उद्या भेटू.”

त्यावर तो म्हणाला, “अहो, पण मला आत्महत्या करायची होती. म्हणून मी आलो होतो तुमच्याकडे. समुपदेशनासाठी. तुम्ही त्यावर काही बोललाच नाहीत.”

मी म्हटलं, “अरे हो. विसरलोच. बोलू पुढच्या वेळी. घाई कुठं आहे. एक फक्त करा. आपण बोलल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नाही.”

त्यानंही तसं आश्वासन दिलं.

*

या गोष्टीला काही महिने उलटले.

आज तो मित्र पुन्हा भेटला.

“यार, काय मूर्खासारखा विचार करत होतो मी? आत्महत्या वगैरे…”

तोच हसायला लागला.

मग मनसोक्त गप्पा झाल्या.

*

दरम्यानच्या काळात नेमकं काय घडलं?

माझ्याकडं येऊन तो म्हणाला होता, “मी आत्महत्या करणार म्हणजे करणार.”

मी म्हणालो होतो, “जगावं की मरावं हा ज्याचा-त्याचा निर्णय. माझी विनंती एकच. मला नव्वद दिवस दे. आपण बोलत राहू. त्यानंतर तुला हवं ते कर. तू जगत राहिलास तरी जगात क्रांती होणार नाही आणि मेलास तरी कोणाला काही फरक पडणार नाही. पण एवढी पन्नास वर्षं म्हणजे १८००० दिवस जगलास ना! आणखी नव्वद दिवस मरू नकोस. बाकी आपण बोलू.”

आम्ही नव्वद दिवसांचा कार्यक्रम आखला.

त्याला सांगितलं, “तुझ्या हातात ९० दिवस आहेत. म्हणजे दोन हजार तास. त्यातले हजारेक तर झोपेत आणि बाकी असेच गेले. उरले हजार तास. नाही तरी, मरायचेच आहे. हे हजार तास वापरू ना मस्त.”

सुरूवात आम्ही केली तीच मुळी माथेरानात.

कारण, त्याच्या माथेरानातल्या आठवणी मोठ्या रम्य होत्या!

रम्य माथेरानात आम्ही दोन दिवस राहिलो.

त्याला आवडणारी वाइन. मासे. असं भरपेट खाल्ल्यावर तो झोपी गेला.

दुस-या दिवशी सकाळी सकाळी त्याला घेऊन बाहेर पडलो. हिवाळा होता तेव्हा. धुक्याच्या दुलईत पहुडलेलं माथेरान आणि शांत तळ्याकाठी निःशब्द बसलेलो आम्ही.

‘तुझी लायकी काय, माझी लायकी काय आणि आपल्या सभोवताली जे विसावले आहे, त्याचे मोल काय! किती मिळतंय आपल्याला… आपली लायकी नसतानाही! जोवर तू जिवंत आहेस, तोवर ही सुखं तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. तेव्हा, यार धमाल करत राहा.”

एवढंच त्याला सांगितलं आणि आनंदानुभव घेऊन आम्ही परत फिरलो.

दुस-या दिवशी त्याच्या सोसायटीचं गेट टुगेदर होतं. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला गायचं होतं. पण, दडपण होतं. ‘जमेल का? नाही चांगले गायलो, तर लोक काय म्हणतील?’

“काही का म्हणेनात? आपल्याला कुठं जगायचंय? गेलं उडत जग. गायचं आणि निघायचं. जगायचं त्यांना आहे. आपल्याला निघायचं आहे. आपल्याला काय फरक पडतो? ते हसतील वा खिदळतील. आपल्याला कुठे आहेत त्यांच्या जगण्याचे नियम? आपल्याला तर मरायचंय.”

तो बिन्धास्त मनापासून गायला.

ग्रेट नाही, पण लोकांना चक्क आवडलं. त्यालाही भारी वाटलं.

पुढच्या दिवशी त्याला घेऊन गेलो, ते अशा घरात.

जिथं कोरोनामुळं घराची पार वाताहात झालेली.

बाप मेला. आई मेली. तीन कच्चीबच्ची उरली.

आणि, एक म्हातारी.

त्यांना जेवण घेऊन गेलो.

ती पोरं याला बिलगली.

यानं मग त्यांना गोष्टी सांगितल्या. शाळेतल्या कविता म्हणाला. एका सामाजिक संस्थेनं या मुलांची जबाबदारी घेतलेली. हा म्हणाला, “माझी सगळी इस्टेट यांच्या नावानं करतो.”

म्हटलं, “इस्टेट सोड. तू त्यांना वेळ दे. प्रेम दे. ही तीन आयुष्यं उभी राहातील.”

दुस-या दिवशी त्याला फोन केला.

तर, काही शेड्यूल ठरण्याच्या आधीच हा त्या गोतावळ्यात जाऊन रमलेला.

आता मला तो शेड्यूल सांगू लागला.

“अरे, हिला पुस्तकं आणायचीत. त्याला कॅडबरी आवडते. मधली जी आहे ना, ती अप्रतिम चित्रं काढते. तिला रंगपेटी आणायचीय. म्हातारीचे पाय दुखताहेत. मी गुगलवर सर्च केलं. ते अमुक तेल चांगलं आहे. तुला काय वाटतं?”

दिवस असेच गेले.

त्याला मी सांगितलं-

“नव्वद दिवस होऊन गेले. आता, हवं तर तू मरू शकतोस.”

तो म्हणाला,

“मूर्ख आहेस का तू? त्या पोरांना आणि म्हातारीला घेऊन मला माथेरानला जायचंय.”

मी म्हटलं, “साला तू काही मरत नाहीस!”

तर म्हणतो कसा –

“मरायला आयुष्य पडलंय. थोडं जगू तर दे. “

 

– संजय आवटे

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#128 ☆ कविता – जैसे हैं हम, दिखते कब हैं… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक विचारणीय कविता “जैसे हैं हम, दिखते कब हैं…”)

☆  तन्मय साहित्य  #128 ☆

☆ कविता –  जैसे हैं हम, दिखते कब हैं… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

हम अपने को, लिखते कब हैं

जैसे हैं हम, दिखते कब हैं!

 

जो मन आया लिखा पराया

तुम्हें पसन्द, गीत वह गाया

रचा वही, जिससे मतलब है

जैसे हैं हम…..

 

आदर्शो की, बातें कर ली

ढेर पोथियाँ, हमनें भर ली

विविध विधा,अद्भुत करतब है

जैसे हैं हम…..

 

जिससे कलम पकड़ना सीखा

अब अपने सम्मुख वह फीका

ज्ञान स्वयं का, बहुत विशद है

जैसे हैं हम…..

 

भाव-भंगिमाओं, अभिनय में

स्वमुख उच्चरित निज परिचय में

सबसे ऊँचा, अपना कद है

जैसे हैं हम…..

 

जलसों में, हाजरी जरूरी

रखते सब से, निश्चित दूरी

हर संस्था में, अपने पद हैं

जैसे हैं हम, दिखते कब हैं

हम अपने को लिखते कब हैं।

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से # 23 ☆ कविता – महलों के स्वप्न — ☆ डॉ. सलमा जमाल ☆

डॉ.  सलमा जमाल 

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 22 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक लगभग 72 राष्ट्रीय एवं 3 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।  

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक कविता  “महलों के स्वप्न ”। 

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 23 ✒️

?  कविता – महलों के स्वप्न — डॉ. सलमा जमाल ?

यह जर्जर गिरता हुआ मकान,

और है मेरी जर्जर काया ।

बेटा करता शहर मजदूरी,

अब तक ना घर लौट के आया ।।

 

खपरैल से टपकता है पानी,

भरभरा कर गिर गई दीवारें।

पन्नी में हाथ लगा खड़े हैं ,

पानी निकाल निकाल के हारे ।।

 

चारों तरफ भर गया है पानी,

पलंग पर रखी है आटा बोरी ।

गीली लकड़ी जले ना चूल्हा,

सब दुखों की जल जाए होरी ।।

 

है ऐसी सरकार करें क्या?

कुछ भी ना सहायता पाई ।

बांस, बल्ली, खपरैल ना पन्नी,

घर-घर बेरोजगारी छाई ।।

 

 कभी तो होगी दूर ग़रीबी ,

‘सलमा’ सुख जीवन में आयेंगे ।

लाल मेरा लौटेगा कमाकर,

महलों के स्वप्न सजायेंगे।।

© डा. सलमा जमाल

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – कालजयी☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – लघुकथा – कालजयी ??

कितना धीरे धीरे चढ़ते हैं आप..! देखो, मैं कैसे फटाफट दो-दो सीढ़ियाँ एक साथ चढ़ रहा हूँ..! लिफ्ट खराब होने के कारण धीमी गति से घर की सीढ़ियाँ चढ़ रहे दादा जी से नौ वर्षीय पोते ने कहा। दादा जी मुस्करा दिए। अनुभवी आँख के एक हिस्से में अतीत और दूसरे में भविष्य घूमने लगा।

अतीत ने याद दिलाया कि बरसों पहले, अपने दादा जी को मंदिर की सीढ़ियाँ चढ़ाते समय यही बात उन्होंने अपने दादा जी से कही थी। उनके दादा जी भी मुस्करा दिए थे।

भविष्य की पुतली दर्शा रही थी कि लगभग छह दशक बाद उनके पोते का पोता या पोती भी उससे यही कहेंगे। दादा जी दोबारा मुस्करा दिए।

© संजय भारद्वाज

प्रात: 4:34 बजे, 18.4.22

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares