हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत…. उत्तर मेघः ॥२.३२॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत …. उत्तरमेघः ॥२.३२॥ ☆

सा संन्यस्ताभरणम अबला पेशलं धारयन्ती

शय्योत्सङ्गे निहितम असकृद दुःखदुःखेन गात्रम

त्वाम अप्य अस्रं नवजलमयं मोचयिष्यत्य अवश्यं

प्रायः सर्वो भवति करुणावृत्तिर आर्द्रान्तरात्मा॥२.३२॥

जो भूषण विहीना गहन दुख क्षीणा

सुनिकटस्थ शैय्या मृदुल गात्रवाली

तुम्हें देख फिर नयन आंसू भरेगी

मृदुद हृदय घन ! अति दयावान भारी

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्री शरणकुमार लिंबाळे –  हार्दिक अभिनंदन  ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन

?? श्री शरणकुमार लिंबाळे –  हार्दिक अभिनंदन ??

‘अक्करमाशी’ या आत्मकथनाचे लेखक श्री शरणकुमार लिंबाळे यांना के.के.बिर्ला फाउंडेशनचा यावर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

ई-अभिव्यक्ती मराठी समुहाकडून श्री.लिंबाळे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. श्री. विजय तेंडुलकर व श्री. महेश एलकुंचवार यांच्यानंतर श्री.लिंबाळे हे तिसरे मराठी लेखक आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे.

या सारस्वताचे मनःपूर्वक अभिनंदन ?

? ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ?

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीरंग खेळतो रंग ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ श्रीरंग खेळतो रंग ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

श्रीरंग खेळतो रंग, गोपिका दंग

जाहल्या चिंब, भिजूनिया अंग

श्रीरंग खेळतो रंग, श्रीरंग खेळतो रंग.

 

गातात गीत रानात, धरूनिया हात

देऊनी साथ, एक तालात, एक सुरात

गातात गीत रानात, नादांचे होती अभंग

श्रीरंग खेळतो रंग.

 

रंगात रंग उधळिती, कितीक त्या रीती

प्रीती अन् भक्ती, वात्सल्य पहा मिसळती

रंगात रंग उधळिती, मनी भाव असे उत्तुंग

श्रीरंग खेळतो रंग.

 

घन श्याम बरसतो आज, एक नवतेज

चढतसे सहज, सृष्टीवर साज

घन श्याम बरसतो आज, बरसती तृप्तीचे थेंब

श्रीरंग खेळतो रंग.

 

सृष्टीच गोपी अन् गोप, एक नव रूप

विणूनिया चैतन्याचा गोफ, विहरती समीप

सृष्टीच गोपी अन् गोप, लाभता गोपालांचा संग

श्रीरंग खेळतो रंग.

 

कधी एकचित्त जाहले, कुणा ना कळले

कसे मिसळले, मन मनात विरून गेले

कधी एकचित्त जाहले, मनास नलगे थांग

श्रीरंग खेळतो रंग.

 

शब्द न उरले, नुरली भाषा, शब्दातीत झाले

भाव मनीचे खुलले, तनमन कृष्णरूप जाहले

शब्द न उरले, नुरली भाषा, मौनातून जुळती बंध

श्रीरंग खेळतो रंग.

 

श्रीरंग सहज खेळतो, सहज निर्मितो

सहज भंगितो, सहज तो चराचरी वसतो

श्रीरंग सहज खेळतो, रंगात असूनी निःसंग

श्रीरंग खेळतो रंग, श्रीरंग खेळतो रंग.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 65 – समन्वय ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 65 – समन्वय ☆

समन्वय  सुख दुःखाचा

मार्ग सुलभ जगण्याचा।

मन बुद्धी या दोहोंचा

मेळ घडावा सर्वांचा।

 

यश कीर्तीच्या शिखरी

उत्तुंग मनाची भरारी।

परी असावे रे स्थिर

ध्येय असावे करारी |

 

घेता सुखाचा अस्वाद

राहो दुःखीतांचे  भान।

क्षण दुःखी वा सुखद

मिळो समबुद्धी चे दान

 

हक्क कर्तव्य कारणे

राही  सदैव तत्पर ।

लेवू हक्काची भूषणे

करू कर्तव्ये सत्वर ।

 

जीवन उत्सवा आवडी

प्रेम रागाची ही जोडी।

लाभो द्वेषालाही थोडी

प्रेम वात्सल्याची गोडी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हिमालय ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी 

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)

☆ कवितेचा उत्सव ☆ हिमालय ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

ओढ लागली हिम शिखरांची .

देव भूमीच्या ऐश्वर्याची

गिरी शिखरांच्या सौंदर्याची

हिम राशींच्या वर्षावाची ॥ धृ ॥

 

ऋषीमुनींच्या पदस्पर्शाची

गंगेच्या त्या दिव्य जलाची.

पार्वतीच्या तपोभूमी ची

अन् शिवशंभूच्या भेटीची

हिमालयाच्या भव्यतेची, दिव्यतेची, उतुंगतेची ॥ १ ॥

 

हिम शिखरांची उंची गाठता

मी पण माझे गळून जावे

देवभूमीच्या दिव्यदर्शनी

स्वत्व माझे सरून जावे

गिरीशिखरांच्या सौंदर्याने

गर्वाचेही गर्व हरण व्हावे.

ऋषि मुनींच्या पदस्पर्शाने

जीवन माझे पावन व्हावे ॥ 2 ॥

 

शुभ्र हिमकण पडता गाली

सर्वस्वाचे भान हरावे

हिमराशींच्या वर्षावाने

निसर्गाशी समरस व्हावे.

पाहुनी शुभ्र हिमकळ्या

हिम देवीचे मन पुलकीत व्हावे.

गंगेच्या त्या दिव्य जलाने

विचारधन अभिमंथित व्हावे ॥ 3 ॥

 

पार्वतीसम तप आचरिता

शिवशक्ति चे मिलन व्हावे

शिवशंभूच्या भेटीने जिवाशिवाचे ऐक्य घडावे

अनुभूती येण्या रिमालयाच्या

भव्यतेची

दिव्यतेची

उतुंगतेची

मन माझे शिवशंकर व्हावे

शिवशंकर व्हावे.

 

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पवित्र पैसा….भाग 3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ताराचंद चे ते वाक्य “पैसे रत्ना नाम की वेश्या भेजती है” दिवसभर मला बेचैन करीत राहिले.  दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ताराचंद च्या झोपडीचा दरवाजा ठोठावला. मला पाहून ताराचंद निर्विकार चेहऱ्याने म्हणाला सर मुझे पता था, आप जरूर आओगे, पैसे वापस करने आयेना सर आप….. इसीलिए मै नहीं बता रहा था….. मी काहिच बोललो नाही….. थोडा वेळ शांततेत गेल्यावर मी पलंगावर बसत म्हणालो….. ताराचंद तू सोच रहा है, मैं उनमें से नहीं हूँ, मै पैसे वापस नहीं करूंगा, और मै तुझ पर गुस्सा भी नहीं हूँ …….

ताराचंद ला आनंद झाला हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मी ताराचंद ला विस्वासात घेत म्हणालो क्यो आज चाय नही पिलाएगा….. क्यो नही सर म्हणत ताराचंद ने चहाची ऑर्डर दिली. मला थोड़ा वेळ हवा होता तो चहा मुळे मिळाला.

चहाचा कप खाली ठेवत मी विषयाला हात घातला. ताराचंद जी आप एक काम करो, मुझे उस रत्ना बाई से मिलना है, औंर ये काम आपको करना है. माझ्या या अनपेक्षित बोलण्याने ताराचंद अवाक झाला…. नहीं सर आपका उससे मिलना सही नहीं रहेगा. आपका रुतबा और पोस्ट क्या सर, नहीं….. सर मै ये काम नहीं करूंगा.

त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो ताराचंद डर मत जो महिला गरीब बच्चियों का पढाई खर्चा देती हैं, वह महान है, उसके वेश्या होने से मुझे फरक नही पड़ता, मिलवा मुझे।

ताराचंद ला माझे बोलणे पटले. काही वेळ विचार करून तो म्हणाला, सर मुझे समय दो उसी से बात करके मै बताता हूँ.

मै कोशिश जरूर करूंगा, पक्का.

त्याच्या कडे विश्वासदर्शक नजर टाकून मी निघालो.

बरोबर तिसऱ्या दिवशी ताराचंद चां फोन आला, सर कल दोपहर् को चलेंगे. पर सर मैं  अभी भी कहता हूँ, वहाँ आपका जाना सही नहीं है.

ताराचंद तू मेरी चिंता मत कर, मिलवा मुझे. ठीक है सर म्हणून त्याने फोन ठेवला.

ताराचंद ला कार मध्ये घेऊन मी निघालो गावच्या बाहेर निघाल्यावर ताराचंद म्हणाला सर अपने को वणी जाना है.

वणी हे गाव वीस किलोमिटर अंतरावर होते. गावाच्या आधी वेश्यांची वस्ती आहे हे मला माहीत होते. कार तिकडे वळविताच टीनेच्या छपराची काही घरे व झोपड्याची वस्ती दिसू लागली. वस्तीत शिरताच अनेक डोळे आमच्यावर रोखलेले जाणविले. एका टपरीवजा हॉटेल समोर गाडी उभी करण्याची खुण ताराचंद ने केली. खाली उतरताच हे लक्षात आले की अनेकांची ताराचंद शी ओळख आहे. अरे क्या मामु कहा थे, बहोत दिन हुये आये नहीं. हॉटेलच्या मालकाने ताराचंद ला आवाज दिला. ताराचंद आत जाऊन त्याचा कानाशी लागला. त्याबरोबर हॉटेल मालकाने मोठ्या अदबीने मला आत बोलाविले. तो पर्यंत नोकराने कपडा मारून बाकडे पुसले, मीही अंग चोरुन बसलो. सर आप बैठिए म्हणून ताराचंद समोरील वस्तीत दिसेनासा झाला. दोन तीन वारांगणानी तो पर्यंत माझा अंदाज घेतला पण हॉटेल मालकाने खुण करून, कामका नहीं हा संदेश दिला. दहा मिनिटांनी ताराचंद एका प्रौढ महिलेसोबत परत येताना दिसला. गोरा रंग व शरीराने स्थूल झाली असली तरी आपल्या तारुण्यात ती सुंदर होती हे जाणवत होते. जवळ येताच ताराचंद ने माझी ओळख करून दिली.

अम्मा येहीच सर है. जिसका मैने कल जिक्र किया था. दोन्ही हात जोडून ती म्हणाली गुरुजी मीच रत्ना हाये. ताराचंद ने तुमचे खूप गुणगान केले, तुमच्या बद्दल लई सांगितले त्यानं. म्हणूनच मी हो म्हणाली. काय बोलावे हे न सुचल्याने मी तिच्याकडे पहातच राहिलो. ताराचंद नेच समोरच्या बाकावर तिला बसविले. स्वतःला सावरून मी बोलणे सुरू केले. रत्नाबाई तुम्ही आमच्या महाविद्यालयातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करता म्हणून तुमचे आभार मानायला मी आलोय. मला तुमचा आदर वाटतो. रत्ना काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ सरकतो आहे हे मी ओळखलं.

एक निस्वास सोडून रत्ना बाई बोलू लागली…..गुरुजी तुम्हाला पाहून मला आमच्या खेडकर गुरुजींची आठवण झाली. बेळगाव जवळच्या वेश्या वस्तीत माझा जन्म झाला बाप कोण होता माहित नाही पण माझी आई सुंदर होती. ती वेश्या असली तरी मी शिकून मोठी व्हावं असं तिला वाटे. आमच्या वस्तीत एका संस्थेची शाळा होती त्यात आम्ही सर्व वेश्यांची मुलेच होतो. खेडकर गुरुजी तिथेच शिकवायला होते. आमच्यावर खूप जीव लावायचे. मी त्यात सर्वात हुशार, मी शिकून मोठी व्हावे म्हणून गुरुजींनी मला दहावीच्या परीक्षेला बसविले पण वस्तीतून विरोध सुरू झाला. गावातील शाळेच्या हेडमास्तरने ही विरोध केला. खेडकर सरांनी खूप मदत केली पण त्यांचे वस्तीपुढे चालले नाही. शेवटच्या पेपरला वस्तीने मला जावू दिले नाही कोंडून ठेवले. त्यादिवशी खेडकर सरांजवळ मी खूप रडली. माझी आई बिमार पडली टी. बी. होऊन ती महिण्याभरात मेली. माझ्या समोर जीवनाचा प्रश्न उभा राहिला या धंद्या शिवाय पर्याय नव्हता. पण शिक्षणाची आवड संपली नाही. आज माझा कोठा आहे. आठ दहा पोरी धंदा करतात. पैसे कमावले वाटते कुण्या गरीब पोरीचे शिक्षण सुटु नये. प्रयत्न सुरू केला. गावातील शाळेत जाऊन पैसे देण्याचा प्रयत्न केला हेड मास्तर बाई होती पण अंगावर धाऊन आली म्हणाली तुझा गंदा देह अन् गंदा पैसा उचल नी बाहेर हो. तुझी छाया शाळेवर नको. खूप वाईट वाटले. मी शरीर विकून पैसा मिळविला म्हणून तो अपवित्र होतो का गुरुजी. जमिनीत आपण अनाज पिकवितो. तीच जमीन अफु गांजा, जहर ही पिकाविते म्हणून जमीन अपवित्र होते का गुरुजी तुम्हीच सांगा. हा ताराचंद यायचा वस्तीवर ओळख झाली माणूस इमानदार आहे, त्याच्यासमोर मन मोकळं केलं शपथ दिली माझं नाव नाही सांगायचं, त्यानेही मदत केली गुरुजी तुमच्या कालेजात पाच पोरी. चंद्रपुरात दहा पोरींचा शाळेचा खर्च करते तीन पोरी नागपूरला नर्सिंग च ट्रेनिंग घेत आहे गुरुजी मी माझा धंदा बदलू शकत नाही. पण माझ्या शिक्षणाची माझ्या आईची इच्छा अशा रीतीने मी पुरी करतेय. तुम्हीच सांगा गुरुजी गरीब पोरींचे शिक्षण घडविणारा माझा पैसा खरंच अपवित्र आहे काय……. रत्ना बाईंचा डोळ्यात आलेलं पाणी गालावर ओघळल. आपल्या पदराने पुसत ती म्हणाली गुरुजी आणखी एक गोष्ट तुम्हाला शपथ आहे विद्येची, ही गोष्ट त्या पोरींच्या मायबापाला कळू देऊ नका. नाहीतर ते मुलींना घरी बसवतील पण माझा अपवित्र पैसा स्वीकारणार नाही. रत्ना बाई   हात जोडून उठली. मी म्हणालो बाई तुमचा पैसा कधीच अपवित्र ठरू शकत नाही गरीब पोरींना शिक्षणाची दारे उघडणारा पैसा गंगे सारखा पवित्र आहे. तो पवित्रच आहे. रत्ना बाई पलटून केव्हा निघाली कळलेच नाही, पण तिचे डोळे भरून आले हे पाठमोरी असूनही मला जाणवले. ती दिशेनाशी होई पर्यंत मी पाहत राहिलो. डोक्यात मात्र विचार सुरू होता रत्नाच्या पवित्र पैशाचा.

समाप्त.

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रीत…एक सुखसाधन..!! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ रीत…एक सुखसाधन..!☆ श्री अरविंद लिमये ☆ 

रीत आणि विपरीत यातील फरक नेमका अधोरेखित करतो तो रीतसर हा शब्द!

रीतसर म्हणजे उचित.जे रीतीला धरुन नसेल,म्हणजेच योग्य नसेल ते सगळं अनुचित. म्हणजेच विपरीत.

हे इतकं सगळं सोपं असलं तरी त्यातही एक मेख आहेच. उचित-अनुचित ठरवायचं कसं आणि कुणी? तसं तर रीत कुणीच ठरवत नाही. ती ठरते. रीत त्यातली सोय,योग्यायोग्यता पाहून अनुभवानुसार आवश्यक ते बदल करुन हळूहळू स्विकारली जाते. पुढे काळाच्या कसोटीवर ती खरी उतरली की आपसूकच रुढ होते. मग ती गोष्ट त्यापध्दतीनेच करायचा प्रघात पडतो आणि मग त्या रुढ पध्दतीचीच रुढी बनते.

काळ बदलला की काळानुसार हळूहळूच पण तरीही या रुढीत फरक पडत जातोच. पण ते बदल रुढ होईतोवर रीतीनुसार करायलाच हवं म्हणून त्यामागचा उद्देश लक्षात न घेता अंधानुकरणाने मूळ रीत पाळली जातेच. कारण एखादी गोष्ट रीतसर झाली नाही तर मनालाच रुखरुख लागून रहाते.

रीत म्हणजे प्रघात, शिरस्ता, रिवाज, परिपाठ, कार्यपध्दती आचारपध्दती. अशा या रिवाज, पध्दतीनाच ‘रीतभात’ ही म्हणतात. पूर्वी नव्या नवरीच्या सासरघरी तिच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांचं बारीक लक्ष असायचं. कांही खटकलं तर ‘माहेरच्यानी हिला कांही वळणच लावलं नाही’ असं म्हंटलं जायचं. हे ‘वळण’ लावणं म्हणजेच करण्यासवरण्याची, वागण्या बोलण्याची शिस्त म्हणजेच रीत समजावून सांगणं. इथे ‘रीतसर’ म्हणजे व्यवहारातील ‘शहाणपण’.

कांही रीती कुलाचाराच्याही असतात. लग्न किंवा शुभकार्यानंतरचं बोडण किंवा गोंधळ हे अशा कुलाचारांचंच एक उदाहरण. कुलाचारांच्या जाती-पोटजातींनुसार विविध रीती असतात व त्या असंख्य तडजोडी करुन कां होईना पण पाळल्याही जातात.

कांही रीती वैयक्तिक पातळीवर वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ स्वैपाक. पदार्थ एकच पण तो बनवण्याची कृती, पध्दत प्रत्येकीची वेगळी. त्या कृती, रीतींनुसार चवी चांगल्या तरीही वैविध्य जपणाऱ्या असतात.

रीत जेवायला बसण्याची, जेवण करण्याची, झोपण्या-उठण्याच्या वेळा पाळण्याची, अंथरुणं घालण्या-काढण्याची अशा अनेक प्रकारच्या कार्यपद्धतीची असते. या रीतीभाती कौटुंबिक पातळीवरच्या. म्हणूनच प्रत्येक घरच्या त्या त्या घरची वैशिष्ठे जपणाऱ्या. वातावरण साळढाळ असणाऱ्या घरी अशा गोष्टीतली शिस्त बरीचशी शिथिल म्हणूनच सोयीची, सुखावह असते. शिस्त कडक, काटेकोर असेल तर ते घर चित्रासारखं सुंदर दिसलं, तरी त्या घरातील आनंदाचा करडा रंग फारसा सुखावह नसतो. घरगुती कार्यपध्दतीतील रीतीभाती घरपण जपणाऱ्या मात्र हव्यातच.

तसंच आॅफिसमधल्या कार्यपध्दतीना, रीतीना काटेकोर नियम असतात. त्यात चालढकल करायची नाही या शिरस्त्यामुळे त्या नियमांचा उद्देशच लक्षात न घेता नियमानुसार काम करण्याचा अट्टाहास ‘लालफितीचा कारभार’ म्हणून बदनाम होतो, तर नियम आणि व्यवहार यांची सांगड घालणारा एखादा अधिकारी शिस्तबध्द काम करुनही लोकप्रिय होतो.

रीती जशा व्यक्ति, कुटुंब, आॅफिसपातळी वरच्या तशाच त्या सामाजिक स्तरावरच्याही असतात. त्या जनरीत, लोकरीत, परंपरा या नावांनी ओळखल्या जातात.

सरकारदरबारी रीतीना शिष्टाचार (protocol) म्हणतात.

निसर्गाच्या रीतीना निसर्गनियम म्हणतात आणि त्यानुसारच सृष्टीक्रम नियत असतो.

अशारितीने सर्वपातळींवरच रीतींचं महत्त्व वादातीत आहे हे खरं, पण निसर्गनियमानुसार काटेकोर वागणं आणि मानवनिर्मित रीतींचं फार अवडंबर न माजवता त्याचा उद्देश लक्षात घेऊन तारतम्य बाळगणं हेच सुखावह ठरणारं असेल..! रीती पाळणं हे ओझं न वाटता आनंददायी ठरणारं असायला हवं. तरचं त्यांचं बंधन न वाटता त्या सुखसाधन म्हणून सहजपणे स्विकारल्या जातील आणि जोपासल्याही..!!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २४) – ‘एकमेवाद्वितीय आशाबाई’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २४) – ‘एकमेवाद्वितीय आशाबाई’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

आपलं बालपण आणि मग पर्यायानं जगणं समृद्ध करण्यात अनंत गोष्टींचा हातभार असतो. माझ्या पिढीच्या बालपणाचा विचार केला तर ‘आकाशवाणी केंद्र’ आणि त्यामुळं वाट्याला आलेले दर्जेदार सूर, शब्द, विचार ह्या गोष्टींचा वाटा फारच मोलाचा आहे. म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींत खूप वैविध्य होतं… फक्त सुराचा विचार केला तरी किती विविध सूर ह्या रेडिओ नावाच्या अद्भुत यंत्रानं आयुष्यात आणले. किशोरीताई, भीमसेनजी, कुमारजी, जसराजजी, शोभाजी, आशाबाई, लताबाई, सुधीर फडके, सुमनताई, वाडकरजी, अनुराधाजी हा प्रत्येकच आणि असे अनेक सूर म्हटलं तर किती वेगळे पण तितकेच देखणे! गुलाब, मोगरा, शेवंती, अबोली, जाई-जुई अशा प्रत्येकच फुलाचं सौंदर्य वेगळं… त्यांत तुलना कशी आणि कोणत्या निकषावर करणार!? माझ्याही मनात ह्या प्रत्येक सुरानं सौंदर्याची व्याख्या जास्त गडद आणि विस्तृत करत नेली. त्यांचे ऋण हे शब्दातीत आहेत.

मागच्या आठवड्यात आशाबाईंना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान घोषित झाला. खरंतर, मुळातच दैवी अंशानं सन्मानित झालेल्या व्यक्तींना मिळालेला कोणताही सन्मान, पुरस्कार हा त्या पुरस्काराचाच दर्जा वाढवणारा असतो. त्यामुळं त्याविषयी लिहिण्याचं काही प्रयोजनच नाही. मात्र ह्या बातमीच्या निमित्तानं पुन्हा आपसूक माझ्या मनोविश्वातला ‘आशा भोसले’ हा अमाप देखणा कोपरा धुंडाळला गेला. आशाबाईंच्या गळ्यातल्या बहुपैलुत्वाविषयी मी नव्यानं काही लिहावं इतका माझा वकुब नाही. म्हणून माझ्या त्या सुराशी असलेल्या नात्याला निरखावं हा सोपा मार्ग मी निवडला. आशाबाईंचा सूर हा खूप आपुलकीनं आपल्याला हृदयाशी धरतो असं मला वाटतं. एखाद्या शब्दलेण्याच्या अर्थाकाराशी एकरूपत्व साधत त्या भावविश्वात एका असोशीनं स्वच्छंदपणे किंबहुना स्वैरपणे स्वत:ला झोकून देण्याचा आशाबाईंच्या सुराचा जो स्वभावधर्म आहे त्याला अक्षरश: तोड नाही! अशा त्या झोकून देण्यातलं उन्मुक्तपणच मग ऐकणाऱ्याला आवेगानं येऊन भिडतं आणि तिथेच आशाबाई ह्या ‘एकमेवाद्वितीय’ ठरतात.

तैयार, संस्कारी गळा हे तर गाणाऱ्याचं माध्यम! मात्र आपल्या सुरानं ऐकणाऱ्याच्या भावविश्वात घरटं बांधणं हे अलौकिकत्वाचं देणं आणि ते फेडताना ज्या काळजातून तो सूर उमटतो त्या काळजाचंही तावून-सुलाखून निघणं ओघानं आलंच! म्हणूनच तर ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ हे गाताना हुंदके देत ढसाढसा रडणाऱ्या आशाबाई आणि त्यामुळं त्यादिवशी कितीतरीवेळा स्थगित झालेलं रेकॉर्डिंग, ही कथा ऐकायला मिळते. अशी संवेदनशीलता राखल्याशिवाय तो सूर ऐकणाऱ्यांची मनं आरपार छेदून जाणं कसं शक्य होईल!? एखाद्या सुरातल्या रसरशीत जाणिवाच तर ऐकणाऱ्याच्या मनात उतरतात आणि जाणिवांची ती अपार तरलता आशाबाईंच्या सुरांत लख्ख दिसते, म्हणून त्या आपल्या काळजाशी इतक्या सहजी संधान बांधू शकतात.

कोणताही गीतप्रकार असो… प्रत्येकच गीत `हे आशाबाईच गाऊ शकतात’ असं वाटायला लावतं, ह्याचं कारण म्हणजे केवळ त्यांना लाभलेला दैवी सूर नव्हे तर त्यांचा समर्पणभाव! पाणी जसं स्वत:चं वेगळं अस्तित्व विसरून आपल्याला येऊन मिळणाऱ्या रंगात रंगून जातं तसं आशाबाई त्या-त्या रचनेच्या शब्द-सुरांशी एकाकार होऊन जातात आणि मग तिथं काहीच ‘टिपिकल’ न उरता खास त्या-त्या रचनेचा असावा तोच रंग आशाबाईंच्या सुरांतून ओतप्रोत ओसंडत राहातो. ह्या सुराच्या किती आणि कायकाय आठवणी सांगाव्या… आणि सांगायला गेलंच तरी त्या कुठून सुरू कराव्या आणि कुठं व कसं थांबावं तरी!…

‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी’, ‘झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी’, ‘नाच रे मोरा नाच’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ अशी गीतं ऐकताना अगदी लहान, गोंडस, गोबऱ्या गालांचं मूल ज्यांच्या सुरांतून हसताना स्पष्ट जाणवतं तोच सूर ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला’ ह्या शब्दांना न्याय देताना तसूभरही मागं राहात नाही. ‘अजि मी ब्रम्ह पाहिले’, ‘ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर’ ह्या शब्दांतलं ब्रम्ह ज्यांच्या सुरांतून प्रकट होतं, ‘हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते’ ह्या शब्दांतला मीरेचा प्रेमभाव ज्या सुरांतून झरलेला ऐकताना डोळ्यांच्या कडा ओलावतात, ‘जन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम’ ह्या भाबड्या शब्दांतला अतूट भक्तिभाव जे सूर स्पष्ट दाखवतात तेच सूर ‘जा जा जा रे नको बोलू जा ना’, ‘हवास मज तू, हवास तू’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ ‘चढाओढीनं चढवित होते, बाई मी पतंग उडवित होते’, ‘एक झोका चुके काळजाचा ठोका’, ‘येऊ कशी प्रिया’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ असे कित्येक अनोखे भावही अगदी नेमकेपणी टिपून ते आपल्या मनात उतरवतात. ह्यातल्या कुठल्याच रंगात रंगून जाताना तो सूर जराशीही गल्लत करत नाही.

‘तरुण आहे रात्र अजुनी’ मधल्या ऐन तारुण्यात वैधव्य भाळी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचा तो मूक आकांत, ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ ऐकताना श्वासांत जाणवू लागलेली थरथर, ‘का रे दुरावा का रे अबोला’ मधली ती काळजाला हात घालणारी मनधरणी,  ‘देव जरी मज कधी भेटला’ मधे उतरलेलं मूर्तिमंत आईचं काळीज, ‘नभ उतरू आलं’ मधलं त्या सुराचं झिम्माडपण, ‘गेले द्यायचे राहून’ मधली जखम भळभळत ठेवणारी खंत, ‘दिसं जातील दिसं येतील’ मधल्या संयमी सुरांतून डोकावणारा आशावाद, ‘केव्हांतरी पहाटे’ मधल्या सुरांतला गूढ चांदणभास, ‘मल्मली तारुण्य माझे,  तू पहाटे पांघरावे’ मधली ती प्रणयोत्सुकता, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ म्हणत त्या परमोच्च शक्तीला घातलेली विरक्तीभरली साद, ‘पाण्यातले पाहाता प्रतिबिंब हासणारे’ ऐकताना ओठांवर येणारं लाजरं हसू आणि मनात उमलणारे ते नवखे भाव, ‘भोगले जे दु:ख त्याला’ मधली मन कुरतडणारी वेदना,

‘खेड्यामधले घर कौलारू’ मधली डोळ्यांसमोर सुरम्य खेडं उभं करणारी रमणीयता, ‘समईच्या शुभ्र कळ्या’मधलं एक अगम्यपण, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ म्हणतानाचं सुरूपता वाट्याला न आल्यातलं दुखरेपण आणि एके क्षणी सत्य उमजल्यावर सुरांत उतरलेला त्या पिल्लाच्या देहबोलीतला डौल, ‘मी मज हरपुन बसले गं’ म्हणतानाचं ते सुराचं हरपलेपण, ‘स्वप्नात रंगले मी’ ऐकणाना आपलं भावविभोर होत गुंगून जाणं, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हां’ मधल्या अपूर्णतेतल्या गोडीनं अवघा जीव व्यापून टाकणं… हा प्रत्येक आणि असे अजून कित्येक भावरंग नेमकेपणी अनुभवताना आपण आशाबाईंच्या सुराचं न फेडता येण्यासारखं देणं लागतो.

आजच्यासारखी ‘ब्रेक-ब्रेक के बाद’ रेकॉर्डिंगची सोय उपलब्ध नसताना ‘जिवलगा कधी रे येशील तू’ सारखी पाच रागांत बांधलेली अवघड रचना सहजसुंदर सुरांत पेलणं, ‘घनरानी साजणा’ मधली सुराची जितकी उंची तितकीच खोलीही सहजी जपणं, ‘चांदणे शिंपीत जाशी’ मधली चंचलता सांभाळतानाही सुराचं नेमकेपण जपणं, वडील मा. दीनानाथांच्या शैलीत त्यांनी सादर केलेली नाट्यपदं अशा कित्येक गोष्टी दैवदत्त देखण्या सुराला आशाबाईंनी मेहनतीनं पाडलेले पैलूही दाखवतात… अर्थात मी करत असलेलं हे सगळंच वर्णन म्हणजे मुळाक्षरं गिरवत असलेल्या चिमुरड्यानं अनभिज्ञतेच्या कोषात असताना एखाद्या प्रतिभासंपन्नतेची स्तुती करण्याइतकं बालिश आहे. मात्र ह्या असामान्य सुरावर वेडं प्रेम करायला तर कोणत्याच गुणवत्तेचा निकष लागू होत नाही. त्याच प्रेमभावानं आज मी ‘ज्योतीनं तेजाची आरती’ असा प्रकार केलाय. अक्षरश: तसाच प्रकार… म्हणून केवळ बसल्याबसल्या मनात सहजी उमटलं ते लिहीत गेले, एक सामान्य पण वेडं प्रेम करणारी रसिक म्हणून! त्यांच्या सगळ्या कामाचा हा धावता आढावा म्हणावं इतकाही ह्याचा आवाका नाही. त्यांचा उर्दू, हिंदी ह्या भाषांचा अभ्यास आणि त्यातलं अजोड असं सांगितिक कर्तृत्व ह्या गोष्टीकडे वळायचं तर यादी संपता संपणार नाही. मराठीतलीच आधी कुठं संपलीये म्हणा!

आशाबाई, तुमच्या सुराविषयी, तुमच्या संगीतप्रवासाविषयी नुसतं लिहायच्या कल्पनेनंही दमछाक होतेय! तुमचा सूर, त्याचं अलौकिकत्व, समर्पणभावानं तुमचं त्याच्याशी तादात्म्य पावणं हे आम्ही फक्त अनुभवावं आणि त्या दिव्य अनुभूतीच्या ऋणात राहावं! तुम्ही आणि तुमचा सूर चिरंतन होवो, ही त्या विश्वनियंत्याकडे आम्हा संपूर्ण ई-अभिव्यक्ती परिवाराची मन:पूर्वक प्रार्थना!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ स्वदेश दीपक : कहानी से नाटक में आकर दृष्टिकोण व्यापक हुआ ☆ श्री कमलेश भारतीय

श्री कमलेश भारतीय

जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता

☆ संस्मरण ☆ स्वदेश दीपक : कहानी से नाटक में आकर दृष्टिकोण व्यापक हुआ ☆ श्री कमलेश भारतीय ☆ 

(स्वदेश दीपक से मैंने अम्बाला छावनी उनके घर जाकर इंटरव्यू की थी दैनिक ट्रिब्यून के लिए। तब उपसंपादक की जिम्मेदारी थी। कभी सोचा नहीं था कि इंटरव्यूज पर आधारित कोई पुस्तक बन सकती है। पर एक फाइल सन् 2013 में हाथ लगी अपनी ही तो सारी इंटरव्यूज एक जगह मिलीं। उलट पलट कर देखा तो लगा यह तो एक पुस्तक है -यादों की धरोहर। इस रूप में सामने आई पर तब स्वदेश दीपक का इंटरव्यू नहीं मिला। पुराने समाचार की कटिंग से काम चलाया। अब कोरोना के एकांत और अकेलेपन के दिनों में अचानक बेटी रश्मि के हाथ मेरी सन् 1991की चंडीगढ़ एडमिनिस्ट्रेशन की डायरी लग गयी। पन्ने पलटने पर मैं हैरान। स्वदेश दीपक से इंटरव्यू के सारे नोट्स इसी डायरी में मिले। उनके साथ ही इसी डायरी में अम्बाला के राकेश वत्स और दिल्ली में मोहन राकेश की धर्मपत्नी अनिता राकेश के भी इंटरव्यूज के नोट्स देखे तो मन उस समय में पहुंच गया। जहां राकेश वत्स व अनिता राकेश के इंटरव्यूज मिल गये थे लेकिन स्वदेश दीपक का नहीं।  तो  सोचा फिर से कल्पना करूं कि मैं स्वदेश दीपक के सामने उनके घर बैठा हूं। अभी अभी गीता भाभी चाय के प्याले रख गयी हैं। ऊषा गांगुली भी कोलकाता से आई हुई हैं जो उनके नाटक कोर्ट मार्शल को मंचित करने की अनुमति मांग रही हैं। बीच में ब्रेक लेकर हमारी इंटरव्यू शुरू हो जाती है। लीजिए : एक बार नयी कोशिश। – कमलेश भारतीय

मैंने विधा बदल ली। कथाकार से नाटककार बन गया। इससे मुझे यह अहसास हुआ कि मेरा दृष्टिकोण व्यापक हो गया। सीधे दर्शकों के सम्पर्क में आया।  नाटक कोर्ट मार्शल ऊषा गांगुली बंगाली में अनुवाद कर मंचित करने जा रही हैं। बातचीत आपके सामने हो रही है। पंजाब से केवल धालीवाल चंडीगढ़ में इसे पंजाबी में मंचित करने जा रहा है। रंजीत कपूर काल कोठरी तो अल्काजी शोभायात्रा का मंचन करेंगे।

स्वदेश दीपक इस सबसे उत्साहित होकर कहने लगे कि कमलेश , देखो। कहानी प्रकाशित होती है तो दो लेखकों के खत आ गये और हम खुश हो लिए। इससे खुलेपन की ओर ले जा रहे हैं मुझे मेरे नाटक। खुलेपन की ओर यात्रा।

-नाटक से क्या हो जाता है?

-सीधा संवाद। विचार तत्त्व। मानवीय मूल्य। कहानी पढ़ने पर हम इतने उत्तेजित नहीं होते जबकि कोर्ट मार्शल को मंचित देख उत्तेजित होते दर्शक देखे हैं।

-दर्शक अच्छे नाटक का स्वागत् करते हैं?

-क्यों नहीं? दर्शक देखते भी हैं और ग्रहण भी करते हैं। नाटकों के माध्यम से पुनर्जागरण होता रहा है। यह कोई नयी बात नहीं।

-क्या ताकत है नाटक की?

-सामाजिक व राजनीतिक बुराइयों के खिलाफ लड़ने के लिए लिखे हुए शब्द से बोला हुआ शब्द ज्यादा कारगर साबित हो रहा है।

-आपमें कथाकार से नाटककार बन कर क्या बदलाव आया?

-अकेला सा , कटा सा महसूस कर रहा था। जीवन व्यतीत कर रहा था। अब कुछ बढ़िया महसूस कर रहा हूं।

-नाटकों का संकट क्या है आपकी नज़र में?

-सबसे बड़ा संकट यह है कि नब्बे प्रतिशत लोग किसी मिथ को लेकर नाटक लिखते हैं। लिखे जा रहे हैं – कबीर , कर्ण , अंधा युग  की परंपरा। मिथ को आधुनिक जीवन के साथ जोड़ कर लिखने के लिए मिथ का उपयोग नहीं किया गया। सामाजिक जीवन की मुश्किलें , राजनीति का हमारे जीवन में बढ़ता दखल , एक ही लाठी से सबको हांकते चले जाते राजनेता। समय आ गया है कि साफ साफ बात कही जाए। आड़ या ओट लेने का समय नहीं।

-नये नाटक शोभायात्रा के बारे में कुछ बताइए?

-सन् 1984 से शुरू होता है शोभायात्रा। मिथ में कहता हुआ। राजा रानी की कहानी कह कर। हिंदी में घबराहट पता नहीं क्यों है साफ बात कहने की। जबकि इसे साहसपूर्वक भी कह लिख सकते हैं। मैं पूजा भाव से किसी को नहीं देखता। राजनैतिक सत्यों को छिपा कर कहने का अब कोई अर्थ नहीं रहा। शोभायात्रा -एक प्रकार से है दुखों की यात्रा। मिथ तोड़ने की आवश्यकता है। भारत को सोने की चिड़िया कहा जाता है जिसमें दूध दही  की नदियां बहती हैं। इस तरह की चुनौतियों को स्वीकार न करना ही सबसे बड़ा संकट है हिंदी में। नाटकों में। गिरीश कार्नाड जैसा आदमी भी मिथ का प्रयोग करता है।

-आप मिथ के विरोधी हैं?

-नहीं। मैं मिथ का विरोधी नहीं। मिथ को जीवन में उतार पाएं तो। नहीं तो नहीं कहें। बस। मशीनी मार्का लेखन की जरूरत क्या है? राजनीति जब लेखन पर हाॅवी हो जाती है तब लेखक की दृष्टि संकरी गली में चली जाती है। राजनीतिक विचारधारा को जब आरोपित कर देते हैं तब लेखन मशीनी होने लगता है।

-आपकी कहानियां मनोविज्ञान को जोड़  कर चलती हैं। कैसे?

-मनोविज्ञान जीवन से ही निकला है। विचार तत्त्व भूख से नहीं जुड़ा हुआ। धर्म के नाम पर लोगों को मारा जा रहा है। विदेशों को बेचने की तैयारी है। राजनीति से सेंकने की कोशिश जारी है। इसलिए ये खतरे हैं। बहुराष्ट्रीय कंपनियां हैं जो हमारे जनजीवन को बुरी तब तरह प्रभावित करने लगी हैं। सब्जबाग दिखा रही हैं युवाओं को। हिंदुस्तान में ऐसे नहीं चल सकता। लेखक के लिए ये सारे उपकरण उपयोगी हैं। तब जाकर साहित्य बनता है कमलेश भाई।

-क्या कहानी में ताकत नहीं रही पाठक को झिंझोड़ कर रख देने की?

-कहानी की ताकत से इंकार नहीं। साप्ताहिक हिंदुस्तान में प्रकाशित मेरी अपाहिज कहानी पर भी खूब चर्चा मिली। पर नाटक की बात कुछ और है। खेला जाए तभी महत्त्वपूर्ण बनता है। दर्शक से जुड़ना नाटक से ही संभव हुआ।

-साहित्यिक उत्सवों में आप दिखाई नहीं देते। अपने ही नाटक के मंचन को दर्शकों से छुप कर देखते हैं। क्यों?

-साहित्यिक उत्सवों में जाना समय नष्ट करना है। कोई नयी बात नहीं होती। साहित्यिक पंडे नयी बात नहीं बताते। रास्ता नहीं दिखाते युवा लेखकों को।

-युवा लेखकों को कोई मंत्र?

-साहित्य में किसी की सीढ़ी पकड़ कर चलने वाला जल्दी लुढक जाता है। आलोचकों को खुश करने में विश्वास न रखें। विचारधारा लेखक को सौंपी जा रही है। जो साहित्य किसी विशेष विचारधारा के लिए लिखा जायेगा वह अपनी मौत मारा जायेगा। साहित्यिक मूल्यांकन तो दर्शक या पाठक ही करेगा।

-टेली फिल्मों का अनुभव?

-सुरेन्द्र शर्मा ने तमाशा कहानी पर टेली फिल्म बनाई। महामारी और तुम कब आओगे पर टेली फिल्में बनीं। नम्बर 57 स्क्वाड्रन पर आकाश योद्धा  स्वीकृत हो गया है। प्राइम टाइम के लिए। धीमान निर्देशित करेंगे।

स्मरण रहे कि वायुसेना में भी एक समय स्वदेश दीपक कार्यरत रहे। बाद में अंग्रेजी प्राध्यापक बने।

-किसने प्ररित किया नाटकों की ओर?

-अम्बाला के एम आर धीमान निर्देशक ने। उन्होंने कहा कि मैं कहानियां ही नहीं , नाटक लिख सकता हूं। नाटक की तकनीकी बारीकियां समझाईं। पहला नाटक इन धीमान को ही समर्पित। नाटककार बनने की प्रेरणा धीमान ने ही दी।

-कोई और अनुभव जो नये रचनाकारों को देना चाहें।

-लेखन में जल्दबाजी न करें। किसी बड़े रचनाकार की छत्रछाया न ढूंढें। चीज़ को अपने अंदर पकने दें। कई बार तीन तीन वर्ष तक एक कहानी को पकने में लगे। विचारधारा ओढ़ी हुई न हो। मैं कभी किसी गुट का हिस्सा नहीं बना। इसलिए कोई दुख भी नहीं है। पाठक और दर्शक से कोई उपेक्षा नहीं मिली। बहुत प्यार मिला। मिल रहा है।

-कोई पुरस्कार?

-बाल भगवान को जयशंकर प्रसाद पुरस्कार। उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी सन् 1989 पुरस्कार। और भी बहुत सारे।

यह इंटरव्यू संपन्न। और मैं जैसे एक सपने से जागा। अभी अभी तो मेरे सामने बातें कर रहे थे और डायरी पर मैं नोट्स ले रहा था और अभी कहां चले गये स्वदेश दीपक? जब से गये हैं कुछ खबर नहीं।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष, हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – लघुकथा ☆ धारावाहिक लघुकथाएं – शादी-ब्याह#2 – [1] लक्ष्मी जी [2] भुतहा घर ☆ डॉ. कुंवर प्रेमिल

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों  से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। अब तक 350 से अधिक लघुकथाएं रचित एवं ग्यारह  पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं (वार्षिक) का सम्पादन एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है,जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। 
आपने लघु कथा को लेकर एक प्रयोग किया है।  एक विषय पर अनेक लघुकथाएं  लिखकर। इस श्रृंखला में आज से शादी-ब्याह विषय पर हम  प्रतिदिन  आपकी दो लघुकथाएं धारावाहिक स्वरुप में प्रस्तुत कर रहे हैं। आज प्रस्तुत है आपकी दो लघुकथाएं  “लक्ष्मी जी “एवं “भुतहा घर”।  हमें पूर्ण आशा है कि आपको यह प्रयोग अवश्य पसंद आएगा। )

☆ धारावाहिक लघुकथाएं – शादी-ब्याह#2 – [1] लक्ष्मी जी [2] भुतहा घर ☆

[1]

लक्ष्मी जी

सदियों से नारी को जेवर एवं गृहलक्ष्मी का ओहदा देकर औरत को बना रहा था आदमी।

अब वह सब खत्म। लक्ष्मी जी तो वह अब बनी है। बड़े बड़े ओहदे पर है। बड़ी बड़ी तनख्वाहें पा रही है।अब उसके पास बंगला है, कार हैं, बैंक बैलेंस है।अब आदमी औरत के सामने बौना हो गया है।

दो औरतें बिंदास चर्चा कर रही थीं। अपने सोने के मोटे मोटे कंगन एक दूसरे को दिखा रही थीं।

[2]

भुतहा घर

‘सास नहीं ससुर नही। देवर ननद, भाई भौजाई कुछ नहीं। लड़की राज करेगी’ माँ बोलीं।

‘तो मैं क्या भूतों के संग रहूँगी?  पति क्या चौबीस घंटे घर में रहा आएगा?’

‘नेवर – नो -‘

‘घर अकेले से नहीं रिश्तेदारों से भरता है। मायके वाले ही रिश्तों की गलत नींव रखते हैं।’

माँ चुप्पी लगा गयी।

 

© डॉ कुँवर प्रेमिल

एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print