मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३३ – परिव्राजक ११. निश्चय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३३ – परिव्राजक ११. निश्चय ☆ डाॅ. नयना कासखेडीकर

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एक ऐतिहासिक आणि सौंदर्यपूर्ण नगररचना असलेल्या जयपूर शहरात स्वामीजी खूप कमी काळ राहिले. जयपूर मध्ये एक सभापंडित व्याकरणाचे जाणकार होते. त्यांनी पंडितांकडून पाणीनीच्या व्याकरणातील सूत्रे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पंडितजींनी अनेक प्रकारे समजावून सांगून ही तीन दिवसाच्या प्रयत्नांनंतर सुद्धा स्वामीजी आकलन करू शकले नाहीत. पंडितजी त्यांना म्हणाले, “स्वामीजी माझ्याजवळ शिकल्याने आपला विशेष फायदा होईल असे वाटत नाही. तीन दिवस झाले, मी तुम्हाला एक सूत्रही समजावून देऊ शकलो  नाही. आपण हा प्रयत्न थांबवावा. या बोलण्याने स्वामीजी या सुत्राचा अर्थ समजण्यासाठी, निश्चय करून एकांतात तीन तास बैठक मारून बसले आणि सूत्राचा अर्थ लक्षात आल्यावर खोली बाहेर येऊन, तो पंडितजींना सुबोध शैलीत म्हणून दाखवला. एव्हढंच नाही तर सूत्रा मागून सूत्र आणि अध्याया मागून अध्याय त्याच पद्धतीने ते वाचत राहिले. पंडितजी आश्चर्यचकीत झाले. एकदा ही आठवण सांगताना स्वामीजींनी म्हटले आहे, “मनाचा पूर्ण निर्धार असेल तर, काहीही साध्य करणं शक्य असतं. एखादा पर्वत असावा आणि त्यातील मातीचा कण अन कण वेगळा करावा अशा प्रकारे मनुष्य कोणताही कठीण विषय आत्मसात करू शकतो”. अशा प्रकारे दोन आठवड्यात शक्य तेव्हढे त्यांनी पंडितजिंकडून शंका निरसन करून घेतले होते. या आधी पण वराहनगर मठात त्यांनी दोन वर्ष पाणिनी च्या व्याकरणाचा अभ्यास केला होता.

जयपूर संस्थानचे लश्कर प्रमुख सरदार हरिसिंग यांच्याकडे काही दिवस स्वामीजी राहिले होते. त्यांच्या प्रवसातला हा अनुभव अत्यंत वेगळा होता. हरिसिंग यांचा भारतीय तत्वज्ञानाचा खूप चांगला अभ्यास होता. ते वेदांती होते, परब्रम्ह मनात असत. मूर्तिपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. ते साकाराचे पक्के  विरोधक आणि निराकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या बरोबर तासन तास अनेक चर्चा होत होत्या. सगळे ज्ञान काही फक्त बुद्धीच्या जोरावरच मिळत नसते, काही वेळा ते भावनिक पातळीवर सुद्धा मिळते. कारण ते जाणिवेच्या पातळीवरचे असते. असाच अनुभव स्वामीजींनी हरिसिंग यांना दिला.

एका संध्याकाळी ते दोघ फिरायला बाहेर पडले होते. त्याच रस्त्यावर समोरून भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक चालली होती. यात भक्त आर्त स्वरात आणि भावभक्तीने भजने म्हणत होती. दोघेही ती मिरवणूक पाहत थांबले असताना, स्वामीजींनी हरिसिंगना स्पर्श केला आणि म्हटले, “तो पहा साक्षात भगवंत आहे”. हरिसिंग देहभान हरपून एकटक बघू लागले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या. क्षणात ते एका वेगळ्याच विश्वात गेले. हरिसिंग यांनी हा अनुभव घेतल्या नंतर स्वामीजींना म्हणाले स्वामीजी माला साक्षात्कारच झाला. तासण तास चर्चा करून मला जे उमगलं नव्हतं, ते सारं मला आपल्या या स्पर्शाने ध्यानात आणून दिलं. श्रीकृष्णाच्या त्या मूर्तीत मला खरोखर जगच्चालक प्रभुंचं दर्शन घडलं”. असाच अनुभव स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरात कालिमातेचं दर्शन घेताना घेतला होता. साकारावर विश्वास न ठेवणार्‍या स्वामीजींना हा अनुभव आला होता.

आता स्वामीजी जयपूरहून अजमेरला गेले. राजस्थान मधलं एक महत्वाचं ठिकाण. संपूर्ण भारतात एकमेव असं ब्रम्हदेवाचं मंदिर इथे आहे. त्याचं दर्शन आणि मोईनूद्दीन चिस्ती या दर्ग्याचं दर्शन घेऊन तिथला मुक्काम हलवला आणि राजस्थानच्या वळवंटातल्या साडेपाच हजार फुट उंचीच्या अबुच्या पहाडावर आले. त्यावेळी हा परिसर अतिशय शांत, उन्हाळ्यात तर हवा थंड आणि आल्हाददायक आणि अनेक संस्थांनिकांची प्रासादतुल्य  निवासस्थाने होती. ब्रिटिश रेसिडेंटचा मुक्काम यावेळी इथे असे. त्यामुळे ते ऐश्वर्याचं लेणं भासत असे. पण याचा स्वामीजींना काही फरक नव्हता पडणार कारण त्यांना यात काहीच रस नव्हता. त्यांना हवी होती शांतता आणि एकांत स्थान. त्यांना आकर्षण होतं अशा ठिकाणी ध्यानधारणा करण्याचं. चम्पा ही गुहा त्यांना सापडली आणि त्यात ते राहू लागले.

रोज संध्याकाळच्या शांत प्रहरी स्वामीजी तलावाच्या काठाने चक्कर मारत. इतर संस्थांचे कोणी न कोणी तिथे येत जात असत. एकदा खेत्री संस्थानचे मुन्शी जगनमोहन लाल आले. ते उत्तम कार्यप्रशासक होते. त्यांना राजस्थानी, पर्शियन, संस्कृत, इंग्रजी या भाषा उत्तम येत होत्या. त्यांनी आपले खेत्रीचे राजा अजितसिंग यांना स्वामीजींनी भेटावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यांची भेट ठरली.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊलं खुणा ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

? विविधा ?

🌼 पाऊलं खुणा 🌼 सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

– आज घरं कसं रिकामं-रिकामं वाटतं. अगदी पाहुणे येऊन गेल्यावर वाटत तसंच!मनंही थोडं उदासच.

श्रावण कधी संपला कळलंच नाही.

अन् आतां किती पटकन् गौरी-गणपती आले अन् गेलेही. खरंच, रोजच्या दिवसाला कशी चक्र॔ लावलेली असतात नाही?तरी, त्याच्या पाऊलखुणा असतातच.

आमची एकुलती एक लेक सासरी गेली अन् घराबरोबर मनंही उदासलं.

तेव्हा आम्ही निर्णय घेतला, आपणही श्रीमहालक्ष्मी म्हणजे ‘गौराई ‘आपल्या घरी आणायच्या. ‘श्रीगणेशा’बरोबर  ‘गौराई’म्हणजे, आनंदाची पर्वणीच!

आज किती वर्ष झाली, प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने, गौरी -गणपती घरी आणल्या. त्याच्या येण्यानं जणूं दूरदेशी गेलेला मुलगाच भेटायला येतो. लाडक्या लेकी ‘ गौराई ‘माहेरपणाला येतात., असंच वाटत. आमची लेक मदतीला येते., नातवंडही यायला लागली. मग सगळा उत्साहच!

वाजत गाजत गणराय मखरात बसतात. ‘गौर’ कशाच्या पावलांनी आली–समृध्दीच्या, . धनंधान्यांच्या..

विद्येच्या.. आरोग्याच्या.. पावलांनी आली, म्हणत घरभर, हळदी-कुंकवाच्या पावलांवरुन या गौराई फिरवून आणायच्या. छानशा आराशीत, मखरात बसवायच्या. नवीनसाड्या-दागिन्यांनी सजवायच्या. बाजूला अखंड तेवत राहील अशी समई ठेवायची. पुढे ओटीचे खणं, फळं, हळदी-कुंकवाचे करंडे,

कुंची घातलेलं त्यांच बाळ अन् धान्याच्या राशी, फराळाची तबकं, सुरेखशी रांगोळी, याने सगळं मंगलमय होत जात. मग, नुसती धांदल, गडबड…, श्रीगणेश अन् गौराईची पूजा, नैवेद्य, आरती, ..सवाष्ण, ब्राह्मण.. याचा आनंद आगळाच!शब्दात न सांगता येणारा..

रात्री सगळं आवरल्यावर निवांतपणे गौराईपुढे ‘ लक्ष्मी स्तोत्र, गणरायाच्या पुढे अथर्वशीर्ष म्हणतांना डोळे पाझरु लागतात. गणरायात कधी मला लाड करवून घेणा-या, व. प्रसन्न हंसणा-या मुलाचा भास होतो, तर कधी.. घरादारावर मायेची सावली धरणारं प्रेमळ, वडिलधारी कुणी वाटत. गौराईंपुढे बसून एकटक त्याच्या डोळ्यांकडे पाहतांना वाटत.. अरे, ही तर आपली आईच दोन रुपातली!तिचीच प्रेमळ, धीर देणारी..

कधी वाटत या तर माझ्या लेकीच.. ज्येष्ठा-कनिष्ठा.. आमच्या लेकीसारख्या मनाची जागा व्यापणा-या, आईशी संवादून, सुख-दु:खाचे क्षणं वाटून घेणा-या, कां प्रिय सख्या?माहेर-सासरच्या आठवणी जागवणा-या.. श्रीमहालक्ष्मीचीच ही दोन रुप.. गौराई.. ! म्हणजे ‘स्त्री’रुपचं.

मग तीआई-जगज्जननी असो कि, सखी, लाडाची लेक असो, तीन दिवस कोडकौतुक करवून घेणारी माहेरवाशीण. !

नकळत डोळे टिपले जातात. मनं आनंदाने बहरतेच. मनांतले ‘सल’अलगद रिते होतात तिच्यापुढे.

मग कोण काय म्हणतंय याची चिंता कशाला?त्या सगळं पाहताहेत.. त्याच्या डोळ्यांच्या कोप-यात पाण्याचं तळं साठत. ओठांच्या पाकळीत हसूं उमलून सांडत आहे. हे सारे क्षणं फक्तं नी फक्त माझे अन् त्यांचेच! तीन दिवसांनी त्या, श्रीगणेशा’बरोबर आपला निरोप घेणार हेही माहित असत. ‘ पुनरागमनायच ‘ म्हणून त्यांच्यावर अक्षतां टाकतांना नेहमीच गळा भरुन येतो. सगळं छान पार पडल्याच समाधानही असत.

एक एक आराशीच्या वस्तू, फराळाची तबकं, जाग्यावर जातात. त्याच्या साड्या, दागिने पेटीत जातात. हळदी कुंकवाची धामधूम थंडावते. एक सुनंपण येत. वाटत..

त्या वळून पाहताहेत, आमच्या लेकी सारख्याच. !अन् नकळतं मनांत शब्द उमलतात…

नका खंतावू मनांत, 

एकमेकां आम्ही इथं..

तुमच्या पाऊलंखुणा,

घरंभर जिथं-तिथं..

घरंभर जिथं-तीथं..

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांताक्लॉज… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सांताक्लॉज… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन 

सांताक्लॉजला बघताच गरीब वस्तीतल्या त्या सगळ्या मुलांमध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. काही क्षणात तिथल्या सगळ्या मुलांच्या हातात सुंदर सुंदर भेटी होत्या. बिल्लूने मात्र या भेटी घेण्यास नकार दिला. सांताक्लॉजने अतिशय प्रेमाने विचारले, `बेटा तुला या भेटी का नकोत? काय कारण? तुला हवय तरी काय?’

बिल्लू अतिशय भोळेपणाने म्हणाला, `मला भेटवस्तू नकोत. त्यापेक्षा तुम्ही मला सांताक्लॉजच करा ना!’

सांताक्लॉज बनलेल्या पीटरने विचारले, `बेटा, इतक्या चांगल्या भेटी सोडून तुला सांताक्लॉज का व्हावसं वाटतय?’

बिल्लू प्रथम गप्प बसला, पण पीटरने पुन्हा पुन्हा विचारले, तेव्हा तो म्हणाला, `अंकल मला खूप थंडी वाजते. मी डोक्यापासून पायापर्यंत लोकरीचे कपडे कधी घातलेच नाहीत. फक्त त्यासाठीच… ‘

मूळ हिन्दी कथा – सांता क्लॉज – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा, काटे वाळकं वेलीवर लोम्बकळत, बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.) इथून पुढे —-

आषाढाच्या भुरभुरीने पिकं गुढघ्याइतकी झालेली असत. श्रावणातील ऊन पावसाच्या खेळात पिकांना चांगलाच बहर यायचा. कुणाची कडधान्य फुलकळीला यायची तर काही कडधान्यांच्या फुलातून मूग, चवळी, श्रावण घेवडा, उडदाच्या कोवळ्या कोवळ्या शेंगांचे घोस लटकत. वेगवेगळ्या रंगांचे कीटक, भुंगे गुंजारव करत पिकांवर बसायची. रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे भिरभिरायची. काळ्या, शंखाच्या गोगलगायी चमचमीत वाटा सोडत इकडून तिकडे फिरत. पक्ष्यांचे आनंदी किलबिलाट रानोमाळ घुमत असत.

शेतातून आलेल्या बायका रात्री फेर धरून पंचमीची गाणी गात-

सासुरवासाच्या कथा सांगणारी आणि माहेरच्या आठवणी जागवणारी. ठिकठिकाणी झाडाला झोपाळे झुलायचे. शेताच्या कामातून थोडी सवड मिळालेली असायची. हिरव्याकंच कचगड्याच्या काकणाचे हातभर चुडे लेऊन बायका झोपाळ्यावर हिंदोळत रहायच्या. पंचमीची गाणी शिवारभर पिकांवर लहरत रहायची…

भादव्याला पावसाची उघडीप मिळाली असली तरी ढगांचे पुंजके आकाशातून वस्ती करायचेच. अंगणात गौरीच्या रोपांना लाल, पांढरी, गुलाबी फुले यायची. त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी भिरभिरत रहायच्या.

ऊन चांगलंच भाजून काढायचं. पिकात शिरलं की गदमदुन जायचं. मूग, उडीद, अळसुंद(चवळीसारखेच पण तोंड काळे असते. देशी चवळी पूर्ण लाल असते किंवा पूर्ण पांढरी तोंड लाल)काळे श्रावण, कुशीचे हुलग्याच्या शेंगा वेलीवर तटतटू लागायच्या. बायका कम्बरेला वट्या बांधून वाळल्या शेंगा तोडू लागायच्या. जोंधळा कम्बरेला लागायचा. घरोघरी ओल्या मूग, अळसुंद, काळ्या श्रावणाची आमटी उसळ असायची. तोडून आणलेल्या शेंगा उन्हात वाळत पडायच्या, त्यांचा तटतट आवाज होऊन बी खाली पडायचे, टरफल मुरगळुन बाजूला व्हायची. उन्हाच्या रटाने लाल, पांढऱ्या अळ्या बाहेर पडू लागायच्या, चिमण्या त्यावर टपलेल्या असायच्या. जवळच्या बांबूच्या आड्यातल्या, कौलारू घराच्या वळचणीतून भुरदिशी चिमण्या यायच्या आणि बाहेर पडलेल्या अळ्या गट्टम करायच्या.

शेंगा चांगल्या वाळल्या की बडवून वाऱ्याला लावून स्वच्छ झाडून पाखडून किडके, मरके कडधान्य काढून स्वच्छ कडधान्ये पुन्हा कडकडीत ऊन खाऊन गरजेपुरती डब्यात बसायची, पुढील वर्ष्याच्या बियासाठी गाडग्या मडक्यातल्या, कणगीतल्या राखेत विसवायची आणि गरजेपेक्षा जास्त असतील तर बाजारात चार पैसे मिळवून द्यायची, तेलामीठाला हातभार.

कडधान्ये विसाव्याला ठेवेपर्यंत अश्विन येऊन टपकायचा. अंगणातल्या उंच उंच झेंडूच्या शेंड्याला फांदीच्या टोकातून इवल्या इवल्या कळ्या डोकवायच्या.

तुरीला फुलं-कळ्या यायला सुरुवात व्हायची. माळाच्या मटकीला कुठं फुलं कुठं शेंगा लागायच्या. जोंधळा पोटरीला आलेला असायचा, कधी निसवत असायचा. निसवलेल्या कणसावर इवली इवली फुले दिसायची. असंख्य मधमाशा कीटक इकडून तिकडे कणसावर भिरभिरत रहायचे. खाली पडलेल्या फुलांवर मुंग्या तुटून पडायच्या. भुईमूगाला पिवळी पिवळी फुले लागत. बहराला आलेली पिके वाऱ्यावर डोलायची. पिकातल्या वाऱ्याचा एक अनामिक नाद सगळ्या शिवारभर घुमत रहायचा. वाऱ्याच्या साथीने डुलणारे शेत पाहून शेतकरी मनही आनंदाने फुलून यायचे.

ढगांच्या प्रचंड गडगडाटात  हत्तीचा पाऊस हजेरी लावून गेलेला असे. निवळसंख ओढे, ओघळी खळखळ वाहत असत. शेते जीव्हळून पांदीतून पाणी वहात असे. शेतातली कारळाची पिवळीधम्मक फुले वाऱ्यावर डुलत असत. सूर्यफूले एकेका पाकळीने उमलू लागत. उमललेली पिवळीजर्द फुले शेताला शोभा आणत. भुंगे, मधमाश्या फुलांना मिठी मारून बसत. जुंधळा हुरड्याला येई. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून हुरडा भाजला जाई. टपोरी कणसे खुडून आगीवर खरपूस भाजून सुपात चोळून पाखडून त्यावर चटणी मीठ टाकून चविष्ट हुरडा शेतकऱ्याच्या घरात हमखास असे. मक्याची कणसात दूध भरलेलेअसे. उकडून, भाजून, सोलून, गरम फुपुट्यात खरपूस वाफवलेली कणसे पोटभर खायला मिळत. भूमीपूजनाला धपाटी, कढी, वडी, कडाकणी, बाजरीचं उंड, भेंडी, दही भाताचा नैवेद्य शेताला दाखवला जाई आणि काढणीला आलेली पिकं काढायची धांदल सुरू होई.

सरत्या अश्विनात आणि निघत्या कार्तिकात डासं वारं भिरभिरत असे. आकाश निरभ्र झालेले असे. डास्या वाऱ्याने त्वचा तटतटू लागायची. थंडीची चाहूल लागायची. भुईमुगाची पाने काळपट तपकिरी रंगावर यायची. उंच उंच जोंधळ्याच्या डोलत्या पिकांवर पाखरांचे थवे भिरभिरायचे. मचाणी बांधल्या जायच्या, गोफणी तयार व्हायच्या. म्हातारे कोतारे, तरणे शेतावर वस्ती करत, कुणी पहाटेच उठून पाखरं राखायला जायचे. शेताशिवारातून हाकाट्यांचे आवाज, रिकाम्या डबड्यांचे आवाज घुमू लागत.

पावसाने उकणून गेलेल्या खळ्यांची डागडुजी होई.

कार्तिकच्या मध्यावर किंवा शेवटी गाव ओस पडत. खुडणी कापणीला जोर येई. कणसं खुडायची, जोंधळा पाडायची एकच धांदल उडायची. धारदार विळे बोट कापत तर कधी पायात सड घुसत. आसपासच्या औषधी पाल्याला चुरून रस काढून जखमेवर लावून चिंधकाची दशी काढून पट्टी बांधली जाई. शेंगा काढणीला नांगराची तजवीज आणि तोडणीला बायका, पोरांना शेंगाच्या रोजावर बोलवायची धांदल उडे. शेंगांचा सॉड (उतार)बघून एकूण गोळ्यांची संख्या ठरे. जितका उतार जास्त तितकी गोळ्यांची संख्या जास्त. १४, १८, २० अश्या संख्येत गोळे ठरायचे. दिवसभर रोजगाऱ्याने तोडलेल्या शेंगांचे समसमान गोळे करून त्यातला १ गोळा म्हणजेच पाटी, अर्धी पाटी किंवा दीड पाटी शेंगा दिवसभर शेंगा तोडणाऱ्यास मिळत. दिवसभर नांगरलेल्या शेतातले वेल वेचणे, ढीग घालणे मग शेंगा तोडायच्या. माणसांच्या आवाजाने राने गजबजून जात.

मागतकरी झोळ्या घेऊन रानातून हिंडत. कुणाच्या शेतातून शेंगा, कुणाच्यातून कणसे मागत हिंडत. बऱ्याचदा कणसांची चोरी व्हायची, कधी तोडून ठेवलेल्या शेंगांचीही चोरी व्हायची.

पांढऱ्याखड शेंगा पोतीच्या पोती भरून गाडीतून घरला येत. खळ्यात मोत्यासारख्या धान्याची रास पडे. धान्याच्या पोत्यांच्या थप्पी जोत्यावर येऊन पडत. जेवढी थप्पी मोठी तितकी शेतकऱ्यांची छाती अभिमानाने फुलून येई. सहा-सात महिने रात्रंदिन गाळलेल्या घामाचे चीज होई आणि उरलेल्या कामाची लगबग होई.

जोंधळ्याच्या पेंड्यांची बुचाडे लागत, शेंगांचे भुस्काट निवाऱ्याला बसे. तुरीच्या शेंगा गडद तपकिरी होत. पाला पाचोळा वेचून जनावरांपुढे पडे.

तूर मटकी काढून झाली की खरिपाचा हंगाम संपे पण माणसांच्या आणि गुरांच्या वर्षभराच्या पोटा पाण्याची सोय होई. खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.

क्रमशः …

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणोबा… ☆ सुश्री ज्योत्स्ना डासाळकर ☆

सुश्री ज्योत्स्ना डासाळकर

?  विविधा ?

गणोबा… ☆ सुश्री ज्योत्स्ना डासाळकर 

श्रावण अमावास्या झाली की कोल्हापूरच्या गल्ल्यातून आवाज घुमू लागतो भावल्या घ्या गनुबं…. हा आवाज ऐकला की घरच्या आयाबाया लगबगीने बाहेर येतात आणि आवाज देणाऱ्या कुंभार मावशीला थांबवून त्यांच्या डोक्यावरची जड बुट्टी उतरून खाली घेतात. वर झाकलेला मेणकापड, त्याखालचं सुती कापड बाजूला सरकवली की डोळे दिपून जातील अशा बाहुल्या म्हणजे हरतालिकांचे रंगीत जोड दिसतात. त्याच्याबरोबरच असते ती निव्वळ काळ्या मातीची  अनाकर्षक अशी पाच ते सहा इंचाची एक आकृती. लांबून बघितलं तर एखादा पंचकोन वाटावा अशी, पण उचलून घेतल्यावर लक्षात येते की, तळपायाला तळपाय जुळवून घातलेली इवलीशी  मांडी जमिनीला समांतर पसरलेले इवले हात, त्यातला उजवा हात रिकामा, डाव्या हातात मसुराएवढी गोळी ( तो म्हणजे लाडू म्हणे) आणि त्या मूर्तीचा चेहरा बघितला की एवढा वेळ अनोळखी वाटणाऱ्या आपल्या नजरेत अचानक ओळख दिसते. नुसती ओळख नाही तर वात्सल्याची भावना दाटून येते– कारण तो चेहरा असतो गजमुख, त्याचे छोटेसे सुपासारखे कान, डोक्यावर किरीट — ओळख पटते — गणोबा!

होय गणोबाच ! हा गणपती विघ्नहर्ता- मंगलमूर्ती- वरद विनायक- वगैरे सगळ्या विशेषणांच्या पलीकडचा. कारण हा गणोबा असतो तो गौरीचा बाळ. गणू हे त्याचं नाव, पण माहेरी येणाऱ्या लेकधनिणीचा पोरगा, त्याला नुसतं नावाने कसं बनवायचं म्हणून आदरार्थी लावलेला ज्योतिबा खंडोबा यांच्याप्रमाणे बा नावाचा प्रत्यय म्हणून तो ‘ गणोबा. ’ 

वास्तविक भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव म्हणजे पार्थिव गणपती व्रत. या व्रताची मूळ देवता म्हणजे हा गणोबा, कारण पूर्णब्रम्ह ओमकार आपल्या उदरी पुत्ररूपाने यावा यासाठी माता पार्वतीने श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अशी रोज मातीची गणरायाची मूर्ती घडवून व्रत केले आणि त्याचे फलस्वरूप म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गिरीजात्मज अवतार झाला. याची स्मृती म्हणून दरवर्षी आपण हे पार्थिव गणपती व्रत करतो. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला. आपले सगळे सणवार हे निसर्गाशी, पर्यावरणाशी मिळतेजुळते असे आहेत. नुसते मिळतेजुळते नव्हे तर एकरूप आहेत. जे सृष्टीत घडतं आहे त्याची संपूर्ण जाणीव आणि सृष्टीच्या बदलाबद्दलची कृतज्ञता यांचा समन्वय म्हणजे आपले सण.

गणोबा हा नेहमी काळ्या मातीचा घडवतात. हा गणोबा गणेशाच्या जन्माच्या कथेचे रहस्य देखील उलगडतो. आपणा सर्वांना माहिती आहे की, पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून (अर्थात हा मळ म्हणजे अंगावरच्या त्वचेचा घाणीचा थर नव्हे, तर स्नानापूर्वी लावलेल्या केशर चंदनाच्या उटीचा थर)– तर त्या थरापासून पार्वतीने स्वतःचा गण तयार केला. गणोबासाठी वापरली जाणारी माती ही नदीच्या गाळाची असते. श्रावण भाद्रपद म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ संचित झाल्याचे दिवस. हा गाळ शेतीसाठी किती उपयुक्त असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. या गाळाच्या मातीतच गणेशाची जन्मकथा उलगडते. पृथ्वी म्हणजे साक्षात जगन्माता पार्वती. या पार्वतीच्या अंगावरचा मळ पावसाच्या धारांनी धुवून निघतो आणि मैदानी प्रदेशात स्थिरावतो. हा गाळ जणू संपन्नता घेऊन येतो. म्हणूनच की काय, कुंभार बांधव याच गाळापासून या पार्थिव गणपतीची निर्मिती करतात.

खरंतर व्रत-विधीप्रमाणे यजमानाने स्वतःच्या हाताने असा मातीचा गणपती घडवणे अभिप्रेत आहे. पण मूर्ती शास्त्रानुसार गणरायाची मूर्ती घडवणे हे सगळ्यात अवघड काम आहे, कारण त्याची सोंड- हात- पाय- लंबोदर यांचा समन्वय साधणे नवख्या माणसाला शक्य होत नाही. बरेचदा सोंड गळून पडते आणि गणपतीचा मारुती होतो. म्हणूनच ‘ करायला गेलो गणपती झाला मारुती ‘ अशी म्हण प्रचलित झाली असावी. म्हणून या कामात कुंभार बांधवांचे सहाय्य घेण्याची पद्धत निर्माण झाली आणि हा पार्थिव गणपती कुंभार वाड्यातून येऊन आपल्या घरामध्ये विसावू लागला.

 माणसाला मुळातच सौंदर्याचे आकर्षण. या आकर्षणापोटी आणि कुंभार बांधवांच्या अंगभूत कलेमुळे पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये फरक पडत गेला. हाताच्या ओंजळीत मावणाऱ्या काळ्या गणोबापेक्षा चित्रकारांनी चितारलेला, मंदिरात मूर्तिकारांनी घडवलेला गणपती भक्ताच्या मनाला भुरळ पडू लागला आणि मग चतुर्भुज सिंहासनाधिष्ठित अशा गणरायाच्या मूर्तींची निर्मिती सुरू झाली. मग वेगवेगळे रंग आले आणि या रंगात देवाची वस्त्रं, अलंकार, शरीर रंगवलं जायला लागले. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आलं तसं मूर्तींचे आकार वाढत गेले. पुढे जशी नैसर्गिक माती कमी पडू लागली, किंवा मूर्तीच्या भंग पावण्याच्या भीतीमुळे टिकाऊ मूर्तीची मागणी वाढू लागली, तशा साच्यातून घडणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्माण व्हायला लागल्या. मूर्तिकारांचे, भक्तांचे काम सोपे झाले.

 पण नकळत मूळ व्रताचा उद्देश बाजूला पडत चालला. पण त्याची स्मृती म्हणून आजही कितीही मोठी मूर्ती आवडली तरी या मूर्तीच्या उजव्या हाताला या काळ्या गणोबाचं स्थान असतंच. त्याचं स्थान उजव्या हाताला असतं, हे तो या व्रताचा मूळ अधिकारी असल्याचं खरे लक्षण आहे. वास्तविक गणोबा गणपती दोन नाहीत. गणोबा ही व्रताची शास्त्रोक्त मूर्ती, तर मोठी मूर्ती आपल्या हौसेची. आजही गौरीपूजनादिवशी याच गणोबाला गौरीच्या पदरात ठेवला जातो. संचारी गौर अपत्यप्राप्तीचा अभिलाष असणाऱ्या स्त्रीच्या ओट्यात याच गणोबाला देते. तिच्या दृष्टीने जिला गणोबा खेळवता आला तिला आई होण्याचा सन्मान मिळाला, कारण गौरीचं हे अवखळ बाळ सांभाळणं किती अवघड आहे हे फक्त गौरीलाच माहिती आहे. — असा हा काळा सावळा पण  जिव्हाळ्याचा लाडका गणोबा !

“ श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः “

माझं माहेर खानदेशातलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादे !! लग्न करून कोल्हापूरला आल्यावर गणेशचतुर्थीच्या २-३ दिवस आधीच * गणूबा घ्या ओ गनुबा… भावल्या घ्या हो भावल्या * अशी तार स्वरात हाक कानी पडली.. मला आश्चर्य वाटलं- ‘ अगंबाई गणपती असे दारावर विकायला येतात?’ सहज कुतुहल म्हणून  त्या बाईला बोलावलं आणि  पहिल्यांदाच या गनुबाचं– नव्हे गणोबाच दर्शन घेऊन झालं. कारण मला वाटतं महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर- सांगली भागातच *गणोबा” ची मूर्ती पूजण्याची पद्धत असावी. खूप मोठमोठ्या मूर्तींबरोबर तर गणोबा फुकट मिळतो म्हणे !! आणि तो गणोबा पण मोठ्या गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान होतो.. उत्सवमूर्ती होऊन !

आणि मग हा गणोबा गौराई पुत्र.. गौरीजागरणाच्या गाण्यातून अधिक बाळरूपात भेटला- गन्या गन्या गनेशा !! गणानं घुंगरू हरवलं…. किंवा गण्या हटून का बसला? — अशासारखी ती गाणी — खास “ गणोबा “  साठी म्हटली जाणारी.

© सुश्री ज्योत्स्ना डासाळकर

एडवोकेट

मो. नं. ९५१८७७८८२४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 27 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 27 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७.

5     वाचताना वेचलेले:

भावार्थ गीतांजली…. प्रेमा माधव कुलकर्णी

गीतांजली भावार्थ

 

४१.

तुझे अस्तित्व नाकारून ते तुला धुडकावतात,

धूळभरल्या पथावरून तुझ्या बाजूने जातात,

पूजासाहित्य पसरून

मी किती वेळ तुझी वाट पाहतोय.

येणारा – जाणारा माझी फुलं घेऊन जातो.

माझी फुलांची दुरडी बहुधा रिकामी झाली.

 

सकाळ गेली, दुपार गेली,

सायंसमयी झोपेनं माझे डोळे

आता जड होऊ लागलेत.

घराकडे परतणारे माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकतात,

मला हसतात. मी शरमते.

माझा पदर चेहऱ्यावर ओढून मी भिकारणीप्रमाणं बसते.

ते मला प्रश्न विचारतात,

“काय पाहिजे?”

तेव्हा मी नजर वळते.

त्यांना काय सांगू?

 

माझ्या सख्या,या सर्वांमागे सावलीत

तू कुठे आहेस?

त्यांना काय सांगू? ‘येणार’ असं मला आश्वासन दिलंस आणि मी तुझी वाट पाहतेय.

हुंड्यासाठी हे दारिद्र्य मी जपलंय असं कसं सांगू?

ते मनातच मी ठेवलंय, बंदिस्त केलंय.

 

या गवतावर बसून आकाशाकडे

टक लावून पाहत राहते.

सर्वत्र प्रकाश भरून राहिलाय.

तुझ्या रथावर सोनेरी पताका फडफडताहेत.

आ वासून रस्त्याच्या कडेला थांबून

ते सगळेजण पाहताहेत. . . .

आणि तू येत आहेस.

 

तू रथातून उतरून येशील. वासंतिक वाऱ्यानं

थरथरणाऱ्या पाण्याप्रमाणं फाटक्या कपड्यातील ही भिकारी मुलगी धुळीतून उचलून तुझ्या शेजारी

बसवून घेशील.

 हे ते अवाक होऊन पहात राहतील.

 

वेळ सरकत राहतो, पण तुझ्या रथाच्या चाकांचा आवाज नाही!

विजयाच्या घोषणा देत,

गोंगाट करीत किती मिरवणुका गेल्या.

या सर्वांच्या मागे तूच होतास का?

 

निरर्थक इच्छा करीत उरस्फोट करीत,

तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ती मीच का?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #157 ☆ व्यंग्य – एक और त्रिशंकु ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर व्यंग्य ‘एक और त्रिशंकु’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 157 ☆

☆ व्यंग्य – एक और त्रिशंकु

पुराणों में एक कथा राजा त्रिशंकु की है जिन्हें ऋषि विश्वामित्र ने सशरीर स्वर्ग भेज दिया था। उन्हें इंद्र ने वापस ढकेला तो विश्वामित्र ने पृथ्वी और स्वर्ग के बीच उनके लिए अलग स्वर्ग का निर्माण कर दिया और वे वहीं लटके रह गये।

दूसरी कथा युधिष्ठिर की है। आयु पूरी कर जब वे दूसरे लोक गये तो उन्हें अश्वत्थामा की मृत्यु के संबंध में मिथ्याभाषण के दंडस्वरूप कुछ देर के लिए नरक जाना पड़ा। वहाँ नरकवासियों ने प्रार्थना की कि उन्हें कुछ देर और वहाँ रखा जाए क्योंकि उनको छू कर आने वाली हवा से उन्हें सुख मिल रहा था।

अब नेताजी की बात। छः बार दल-बदल करने और छत्तीस अपराधों में नामित होने के बाद भी स्वच्छंद विचरते नेताजी अचानक संसार से मुक्त हुए तो सीधे नरक पहुँचे। नेताजी दुखी हुए क्योंकि उन्हें पूरी उम्मीद थी कि उनके अपराधों के बावजूद उन्हें स्वर्ग में प्रवेश मिल जाएगा, जैसे वे दल बदल कर हर कैबिनेट में घुसने में सफल होते रहे थे। लेकिन ऊपर उनकी कोशिशें कारगर नहीं हुईं।

नेताजी के आने से एक गड़बड़ यह हुई कि नरक में अचानक भयानक दुर्गंध फैलने लगी। थोड़ी ही देर में नरकवासी उस दुर्गंध से त्रस्त हो गये। लोग अचेत होकर गिरने लगे। खोजने पर पता चला कि वह दुर्गंध नेताजी की आत्मा से निर्गमित हो रही थी।

दुर्गंध को रोकने के सारे प्रयास विफल होने पर तय हुआ कि नरकवासियों के हित में नेताजी को वापस धरती पर भेज दिया जाए, जहाँ वे आत्मा के ही रूप में कुछ दिन रहें। दुर्गंध कुछ कम होने पर उन्हें पुनः नरक में खींचने पर विचार होगा।

दुर्भाग्य से यह खबर पृथ्वी पर लीक हो गयी और वहाँ खलबली मच गयी। लोग मन्दिर- मस्जिद में इकट्ठा होने लगे। प्रार्थना के द्वारा ऊपर संदेश भेजा गया कि नेताजी से बमुश्किल-तमाम मुक्ति मिली है, अतः उन्हें किसी भी सूरत में धरती पर न भेजा जाए। यह भी कहा गया कि नेताजी खुराफाती स्वभाव के हैं, अतः उनकी आत्मा यहाँ किसी के शरीर में जबरन घुसकर उसकी आत्मा को अपने काबू में कर लेगी और उसे अपने मंसूबों के हिसाब से चलाने लगेगी। लोगों ने प्रभु से यह भी कहा कि यदि नेताजी की आत्मा को पृथ्वी पर भेजा गया तो लोगों का भरोसा ईश्वर पर से उठ जाएगा और उनकी पूजा-अर्चना बन्द हो जाएगी।

यह संदेश ऊपर पहुँचा तो वहाँ सभी चिन्ता में पड़ गये। विचार-विमर्श के बाद तय हुआ कि फिलहाल नेताजी को ऋषि विश्वामित्र द्वारा राजा त्रिशंकु के लिए बनाये गये स्वर्ग में भेज दिया जाए,जहाँ एक के बजाय दो हो जाएँगे। निर्णय होते ही नेताजी की आत्मा को त्रिशंकु के स्वर्ग में ढकेल दिया गया।

दो तीन दिन बाद ही ऊपर राजा त्रिशंकु की गुहार पहुँची—‘हमें यहाँ से निकाला जाए। हम पृथ्वी पर वापस जाने के लिए तैयार हैं। अब हमारी स्वर्ग में रहने की इच्छा मर गयी है।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 108 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM

Captain Pravin Raghuvanshi, NM

?  Anonymous Litterateur of Social Media # 108 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 108) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him. हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>  कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 108 ?

☆☆☆☆☆

सुकुँ से…

इसलिए भी हूँ,

कि धोका सिर्फ़

खाया है दिया नहीं…

 

Always at peace, I am

because, despite being

repeatedly deceived…

I’ve never cheated anyone

☆☆☆☆☆

आओ, सिर्फ नज़रों से

ही बात करते हैं…,

लफ़्ज़ अक्सर उलझनों

में डाल देते हैं…

Come, let’s just talk

by eyes only,

Words often create

confusions only…!

☆☆☆☆☆

 रात क्या होती है

हमसे पूछिए ना,

आप तो सोये और…

बस सुबह हो गई…

 

What is the night,

just ask me,

You just sleep

and it’s morning…  

☆☆☆☆☆

हर तरफ से…

सिर्फ वाह वाह मिले,

जिन्दगी …

कोई शायरी तो नहीं…!

Accolades would shower

from all over…,

Life is jus not ‘Shayari’,

– a poetic recital…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 154 ☆ समझ समझकर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ आपदां अपहर्तारं ☆

आज की साधना

श्रीगणेश साधना, गणेश चतुर्थी तदनुसार बुधवार 31अगस्त से आरम्भ होकर अनंत चतुर्दशी तदनुसार शुक्रवार 9 सितम्बर तक चलेगी।

इस साधना का मंत्र होगा- ॐ गं गणपतये नमः

साधक इस मंत्र के मालाजप के साथ ही कम से कम एक पाठ अथर्वशीर्ष का भी करने का प्रयास करें। जिन साधकों को अथर्वशीर्ष का पाठ कठिन लगे, वे कम से कम श्रवण अवश्य करें। उसी अनुसार अथर्वशीर्ष पाठ/ श्रवण का अपडेट करें।

अथर्वशीर्ष का पाठ टेक्स्ट एवं ऑडियो दोनों स्वरूपों में इंटरनेट पर उपलब्ध है।

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

☆  संजय उवाच # 154 ☆ समझ समझकर ?

प्रातः भ्रमण कर रहा हूँ। देखता हूँ कि लगभग दस वर्षीय एक बालक साइकिल चला रहा है। पीछे से उसी की आयु की एक बिटिया बहुत गति से साइकिल चलाते आई। उसे आवाज़ देकर बोली, ‘देख, मैं तेरे से आगे!’  इतनी-सी आयु के लड़के के ‘मेल ईगो’ को ठेस पहुँची। ‘..मुझे चैलेंज?… तू मुझसे आगे?’  बिटिया ने उतने ही आत्मविश्वास से कहा, ‘हाँ, मैं तुझसे आगे।’ लड़के ने साइकिल की गति बढ़ाई,.. और बढ़ाई..और बढ़ाई पर बिटिया किसी हवाई परी-सी.., ये गई, वो गई। जहाँ तक मैं देख पाया, बिटिया आगे ही नहीं है बल्कि उसके और लड़के के बीच का अंतर भी निरंतर बढ़ाती जा रही है। बहुत आगे निकल चुकी है वह।

कर्मनिष्ठा, निरंतर अभ्यास और परिश्रम से लड़कियाँ लगभग हर क्षेत्र में आगे निकल चुकी हैं। यूँ भी जन्म देने का वरदान पानेवाली का, जन्म पानेवाले से आगे होना स्वाभाविक है। ‘वह’ शृंखला की अपनी एक रचना स्मृति में कौंध रही है,

वह माँ, वह बेटी,

वह प्रेयसी, वह पत्नी,

वह दादी-नानी,

वह बुआ-मौसी,

चाची-मामी वह..,

शिक्षिका, श्रमिक,

अधिकारी, राजनेता,

पायलट, ड्राइवर,

डॉक्टर, इंजीनियर,

सैनिक, शांतिदूत,

क्या नहीं है वह..,

योगेश्वर के

विराट रूप की

जननी है वह..!

हमारी शिक्षा व्यवस्था लड़के का विलोम लड़की पढ़ाती है। लड़का और लड़की, स्त्री और पुरुष विलोम नहीं अपितु पूरक हैं। एक के बिना दूसरा अधूरा। महादेव यूँ ही अर्द्धनारीश्वर नहीं कहलाए। कठिनाई है कि फुरसत किसे है आँखें खोलने की।

कोई और आँखें खोले, न खोले, विवाह की वेदी पर लड़की की तुला में दहेज का बाट रखकर कथित  संतुलन साधनेवाले अवश्य जाग जाएँ। आँखें खोलें, मानसिकता बदलें, पूरक का अर्थ समझें अन्यथा लड़कों की तुला में दहेज का बाट रखने को रोक नहीं सकेंगे।

समझ समझकर समझ को समझो।…इति।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी   ☆  ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 107 ☆ गीत : भाग्य निज पल-पल सराहूँ… ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित गीत : भाग्य निज पल-पल सराहूँ…)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 107 ☆ 

☆ गीत : भाग्य निज पल-पल सराहूँ… ☆

भाग्य निज पल-पल सराहूँ,

जीत तुमसे, मीत हारूँ.

अंक में सर धर तुम्हारे,

एक टक तुमको निहारूँ…..

 

नयन उन्मीलित, अधर कंपित,

कहें अनकही गाथा.

तप्त अधरों की छुअन ने,

किया मन को सरगमाथा.

दीप-शिख बन मैं प्रिये!

नीराजना तेरी उतारूँ…

 

हुआ किंशुक-कुसुम सा तन,

मदिर महुआ मन हुआ है.

विदेहित है देह त्रिभुवन,

मन मुखर काकातुआ है.

अछूते प्रतिबिम्ब की,

अँजुरी अनूठी विहँस वारूँ…

 

बाँह में ले बाँह, पूरी

चाह कर ले, दाह तेरी.

थाह पाकर भी न पाये,

तपे शीतल छाँह तेरी.

विरह का हर पल युगों सा,

गुजारा, उसको बिसारूँ…

 

बजे नूपुर, खनक कँगना,

कहे छूटा आज अँगना.

देहरी तज देह री! रँग जा,

पिया को आज रँग ना.

हुआ फागुन, सरस सावन,

पी कहाँ, पी कहँ? पुकारूँ…

 

पंचशर साधे निहत्थे पर,

कुसुम आयुध चला, चल.

थाम लूँ न फिसल जाए,

हाथ से यह मनचला पल.

चाँदनी अनुगामिनी बन.

चाँद वसुधा पर उतारूँ…

 

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

१५-६-२०१६

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares