मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 3 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 3 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(आपला एवढा श्रीमंत मुलगा असल्या साध्या पायजमा शर्टात बघून पोटात तुटले शलाकाच्या…)  इथून पुढे —

नितिन समोर आला आणि म्हणाला, “ बाबा, जरा आत या.” त्याच्या वॉर्डमध्ये नितीनने त्याला नेले. सगळ्या भिंती सुंदर सुंदर चित्रांनी सुशोभित झाल्या होत्या. “ बाबा, हे मी काढलंय. आवडलं का?” डोळ्यात पाणीच आलं  शलाका आणि सुशीलच्या. लहान मुलाच्या डोळ्यात असते तशा अपेक्षेने नितीन आईवडिलांकडे बघत होता. सुशीलने त्याला पोटाशी धरले. “ किती रे सुंदर काढलं आहेस बाळा ! अजूनही वेळ गेली नाही. तू होऊ शकतोस चांगला आर्टिस्ट.”  नितिन काहीच बोलला नाही,आणि निघून गेला तिथून. सुशील तिथल्या संचालकांना भेटला. ते म्हणाले,” नितीन सुधारतोय  आणखी वेळ लागेल, पण नक्की बाहेर येईल यातून तो. नक्की बरा होईल.  मग ठरवू त्याचे काय करायचे ते.” 

नितीनला पूर्ण एक वर्ष लागलं यातून बाहेर यायला. तो पूर्ण वर्षभर त्या संस्थेत राहिला. तिथल्या साध्या सुध्या लोकांत अगदी मिसळून गेला. त्याला घरची आठवणही आली नाही कधी. एकदा अचानक आजोबा आजी त्याला भेटायला आले. नितिनला इतका आनंद झाला. आजोबांना मिठी मारून तो रडायला लागला. 

“ आजोबा, मला माफ करा. मी तुमच्या कोणत्याच अपेक्षा पुऱ्या नाही करू शकलो. बहकत गेलो आणि स्वतःच्या हाताने नुकसान करून घेतलं. तुम्ही परोपरीने सांगत होतात, “ नितीन, तुला हवं तेच करिअर कर . आयुष्य तुझं आहे,, तुला हक्क आहे हवं ते करायचा. ” पण मी ऐकलं नाही. आईच्या महत्वाकांक्षेपुढे माझं  काही चाललं नाही .अर्थात मी तिला दोष देत नाही. माझ्याच भल्यासाठी ती हे सांगत होती ना. पण मला ते  झेपलं नाही आजोबा !” आजोबांनी नितीनला जवळ घेतलं. त्याचे डोळे पुसले. “ नितीन, मागचं सगळं आता विसरून जायचं. तू आणखी एक वर्ष असा छान राहिलास, तर मी तुला सरप्राईज देणार आहे.”  आजोबांना बरे वाटले. आपला नातू आता नक्की मार्गी लागणार याची खात्री वाटत होती त्यांना. ते संचालकांना भेटून आले. त्यांनीही नितीनबद्दल समाधान व्यक्त केले. म्हणाले, “आजोबा, या मुलांवर लक्ष ठेवावे लागते. कधी ती पटकन पुन्हा व्यसनाकडे झुकतील, सांगता येत नाही. सलग पाच वर्षे गेली की मग बहुतेक तो धोका टळतो. मला खात्री आहे, तुम्ही त्याला नक्की वर काढाल. “  

शलाका घरी आली की अतिशय निराश होई. बाकीच्या डॉक्टरांची मुले बघितली की ती अस्वस्थ होई. कुणालचा मुलगा लंडनहून एफ.आर. सी.एस. होऊन आला.

नीलिमाची  पूर्वा  डेंटिस्ट झाली..  या बातम्या ऐकून कासावीस व्हायची शलाका. यात आपला मुलगा कुठेच नाही याचे शल्य तिला टोचत राही. आपलं काय चुकलं याचा विचार करून वेड लागायची पाळी येई शलाकाला. सुशीलने तिला समजावणेही हल्ली सोडून दिले होते. दोन वर्षांनी नितीन घरी आला. एक महिना त्याला सगळ्यांनी त्याचा स्वतःचा वेळ दिला. तो अगदी पूर्वीचा नितीन झालाय, ही खात्री पटली सगळ्या घराला. एक दिवस नितीन आजोबांच्या खोलीत गेला आणि म्हणाला, “ आजोबा, मला तुम्ही सरप्राईज देणार होतात ना? तुम्हाला मी आता त्यासाठी योग्य झालोय असं वाटतंय का? “ आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं.. “. हो रे माझ्या बाळा. आपण उद्याच जाऊया तुझं सरप्राईज बघायला !” 

दुसऱ्या दिवशी गाडी काढून सगळे कुटुंब एका इमारतीपाशी गेले. आजोबा म्हणाले,” नितिन, इथेच रहात होतो बरं का आम्ही पूर्वी ! इथे  चाळ होती, तिथेच तुझे बाबा डॉक्टर होईपर्यंत राहिले. ती चाळ पडली आणि ही मोठी  इमारत उभी राहिली, त्यात मला तीन खोल्या मिळाल्या. आम्ही आमच्या जुन्या खोल्या विकल्या नव्हत्या. चल आत !”

 दुसऱ्या मजल्यावर  नवीन कोरा ब्लॉक तयार होता. “ नितीन, इथे तू तुझा स्टुडिओ काढ. तू उत्तम आर्टिस्ट आहेस. अरे, तुझ्या हातातली कला तर नाही ना कोणी काढून घेतली? नसली डिग्री तुला तर नसली ! ही तुला आजोबा आजीची भेट ! “ सुशील शलाका थक्क झाले. त्यांच्या आणि नितीनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “ आजोबा, मी जिवापाड मेहनत करीन. तुम्हाला अपयश कधीही देणार नाही.” नितीनने आजोबांना मिठी मारली. “ बाबा, कमाल आहे तुमची हो ! मलाही पत्ता लागू दिला नाहीत कधी? किती ग्रेट असाल बाबा “ सुशीलने साष्टांग नमस्कार घातला आईवडिलांना. शलाकाने आजींना मिठी मारली. “ आजी, कसे फेडू उपकार तुमचे मी? माझा मुलगा तुमच्यामुळे माणसात आला.” 

या गोष्टीला आता सात आठ वर्षे झाली. आज नितीनचा स्टुडिओ नाव कमावून आहे. खूप मोठ्या पुस्तकांची कव्हर्स तो करतो. त्याच्या हाताखाली आणखी दहा आर्टिस्ट काम करतात. नितिनच्या, ‘ विनायक आर्टस् ‘ च्या  कामासाठी लोक सहा सहा महिने थांबायलाही तयार असतात.  पूर्वीचा नितीन आता कुठे गेला, हे कोणालाही आठवत नाही. नितीनने आपल्या आजोबांचे नाव स्टुडिओला दिलंय. ‘ विनायक आर्टस् ‘ . आजोबा आजी नितीनचं यश बघून सुखासमाधानाने  देवाघरी गेले.  नितीन त्यांना कधीही विसरू शकत नाही. आज नितीन प्रतिष्ठित जाहिरात स्टुडिओ असलेल्या लोकांमध्ये गणला जातो. त्यानेच मुखपृष्ठ करावे म्हणून लेखक हटून बसतात. त्याच्या सुंदर म्यूरल् नी मोठ्या उद्योगपतींचे हॉल सुशोभित झाले आहेत. कधी नितीन एकटा असला, की आपले मागचे दिवस आठवतो, सरळ उठून त्या व्यसनमुक्ती  केंद्रात जाऊन तिथल्या मुलांना भेटतो. त्यांना आपली कहाणी न लाजता सांगतो, आणि ‘ कधीही असे व्यसनात अडकू नका रे मुलांनो,’ असे कळवळून  सांगतो.

 नितीनने चोवीस तास आपल्या कलेला वाहून घेतले आहे. त्याने लग्न केले नाही, आणि करणारही नाही.  तो म्हणतो, ‘ मला आता वेळ नाही, आणि त्या व्यापात पडायचेच नाही मला.’ 

 शलाका सुशीलने हॉस्पिटल चालवायला दिले आणि सुशील  हौसेने नितीनच्या स्टुडिओचे सगळे आर्थिक व्यवहार बघतो.

एका अक्षरशः मातीमोल होणाऱ्या आयुष्याचे,  शंभर नंबरी सोने होण्याची किमया नितीनच्या आयुष्यात घडली….. फक्त त्याच्या आजी आजोबांच्या दूरदृष्टीने….. त्यांनी त्याच्यावर टाकलेल्या  गाढ विश्वासाने !

नितीन कायम त्यांच्या  ऋणातच आणि स्मृतीतच रहाणे पसंत करतो.

— समाप्त — 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोणत्याही आजारावर औषध नकोच… लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ कोणत्याही आजारावर औषध नकोच... लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कोणत्याही आजारावर औषध नकोच…. फक्त योग आसन….विश्वास ठेवा….

सप्रेम नमस्कार….

मी डॉ .मनिषा सोनवणे…! मेडिकल डॉक्टर …. आणि योग शिक्षिकाही ……!!! 

1999 साली डॉक्टर झाले तेव्हा असं वाटलं, की चला आता भराभर सगळे पेशंटस् बरे करण्याची  आपल्याला जादुची छडी मिळाली….मी हवेत होते….

पण दवाखान्यात प्रत्यक्ष पेशंटस् चेक करायला सुरुवात केल्यावर माझे पाय जमीनीवर आले…. 

कित्येक आजारांवर allopathy मध्ये औषधं उपलब्धच नाहीत…. जी औषधे आहेत त्यांचे साईड इफेक्ट्स इतके की भी क नको पण…..! कितीही औषधं दिली तरी तात्पुरतं बरं वाटून पेंशंट पुन्हा काही दिवसांनी दारात हजर…. देणेक-यांसारखा…. 

मी खूप विचार करायचे, यावर काय उपाय करता येईल… ?

मी स्वतः आयुर्वेद पारंगत असल्यामुळे allopathy च्या जोडीला आयुर्वेदिक औषधंही देवू लागले…. 

आता फरक थोडा जास्त होता… पण  चिवट आजार म्हणावे तसे काही पिच्छा सोडत नव्हते… पेशंटस्चा आणि माझाही….!

मग मी योगाचा आधार घेऊ लागले…. प्रत्येक आजारावर योगाचे एक आसन देऊ लागले… आणि काय आश्चर्य…. चिवट आजाराचा प्रत्येक पेशंट पुन्हा तोच आजार घेऊन यायचा बंद झाला की…. ! 

मग मी उलटा प्रयोग चालू केला… आजारांवर औषधी देण्याऐवजी मी फक्त योगाचे आसन सांगू लागले… आणि जवळपास प्रत्येक आजार हळुहळु बरा होऊ लागला… कुठल्याही गोळी औषधांशिवाय…

तशी मी डॉक्टर असूनही योग शास्त्रातली पदवी घेतली आहे, त्यानिमित्ताने या विषयाचा माझा ब-यापैकी अभ्यास झालाय.  शिवाय मुळात डॉक्टर असल्यामुळे योग आणि शरीर शास्त्र यांची मी सांगड घालायला लागले…. 

मी प्रयोग करत गेले, आणि १० वर्षांच्या माझ्या या प्रयोगातून मी माझ्यापुरतं एक टेक्निक डेव्हलप केलंय Disease wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने …. 

मग मी माझ्या पुण्यातल्या  पाषाणच्या योगा सेंटरमध्ये  केवळ Disease Wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने घेवू लागले…. एकही औषध न देता…..

… डायबेटीस, हृदयाचे आजार, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, फ्रोझन शोल्डर, अती चिंता, तणाव, डिप्रेशन, पी. सी. ओ.डी., महिलांचे इतर आजार यावर एकही गोळी न देता केवळ योगाची ठराविक आसनं घेऊन  हे आजार बरे होतात यावर कुणाचाच विश्वास बसत नाही…. पण हे १०० टक्के खरंय…!!!

 योगासन ट्रीटमेंटपूर्वीचे रिपोर्टस् आणि योगासन ट्रीटमेंटनंतरचे रिपोर्टस् यात जमीन अस्मानाचा फरक असतो…. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे पेशंटस् च्या चेह-यावर रोगमुक्त झाल्याचं समाधान…. एका डॉक्टरला आणखी काय हवं असतं….? 

आपल्या या प्राचीन योगशास्त्राला अनुसरुन आपण आपली जीवनशैली ठेवली तर, कदाचित कोणत्याही आॕपरेशनची भिती भविष्यात उरणार नाही….!

जुनाट सर्दी, दमा, वजन वाढवणं किंवा कमी करणं, थायराॕइड … हे फक्त योगासनाने शक्य आहे. ? होय आहे….यामागे शास्त्रीय कारणं आहेत…. म्हणून हे आजार फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने करवून घेतलेल्या  योगाच्या आसनाने बरे होतात….. १०० टक्के नाही… ११० टक्के …!!!

लोकांनी गोळ्या औषधींच्या नादी लागून हजारो रुपये घालवू नये….

गोळ्या औषधी घेऊन स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवू नये… 

एक आजार बरा करण्यासाठी इतर १० आजार मागे लावून घेऊ नयेत …. 

याचसाठी हा सर्व लेखन प्रपंच …. !!! 

तेव्हा चला ….  योगासनाने सर्व आजार घालवू आणि तुमच्या सध्याच्या चालू असलेल्या गोळ्या औषधींना करु बाय बाय….कायमचा…..!!! 

लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे

ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वर मंदीर समोर, सोमेश्वर वाडी, पुणे  मोब – 8308315494 / 9422017342

प्रस्तुती – डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १६ ते २४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १६ ते २४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्‌सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व 

देवता – १६-२३ अप् (पाणी); २४ अग्नि; 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी ती मुख्यतः जलदेवतेला उद्देशून हे अप् सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील सोळा ते तेवीस या ऋचा अप् (पाणी) आणि चोविसावी ऋचा अग्नि यांचे आवाहन करतात. या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी  अप् (पाणी) आणि  अग्नि या देवतांना उद्देशून रचलेल्या सोळा ते चोवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद :

अ॒म्बयो॑ य॒न्त्यध्व॑भिर्जा॒मयो॑ अध्वरीय॒ताम् । पृ॒ञ्च॒तीर्मधु॑ना॒ पयः॑ ॥ १६ ॥

यजमानाच्या या यज्ञाच्या माता प्रेमळ

मोद वर्धिती मधुर करोनी जलास अपुल्यातील 

आशीर्वच देऊन ऋत्विजा मार्गासी जात

कर्तव्याची जाण ठेउनी अपुल्या मार्गे वहात ||१६||

अ॒मूर्या उप॒ सूर्ये॒ याभि॑र्वा॒ सूर्यः॑ स॒ह । ता नो॑ हिन्वन्त्वध्व॒रम् ॥ १७ ॥

सन्निध असती त्या सूर्याला अहो भाग्य त्यांचे

भास्कर जवळी त्यांच्या उजळाया जीवन त्यांचे

त्या तर साऱ्या अमुच्या जननी हित अमुचे चिंतित

आशिष देऊनीया यज्ञाला यशाप्रती नेवोत ||१७||

अ॒पो दे॒वीरुप॑ ह्वये॒ यत्र॒ गाव॒ः पिब॑न्ति नः । सिन्धु॑भ्य॒ः कर्त्वं॑ ह॒विः ॥ १८ ॥

कपिला अमुच्या प्राशन करिती पवित्र तोय जयांचे

आपदेवते कृतज्ञतेने आमंत्रण द्यायचे 

सरितांमधुनी अखंड वाहे अमुचे जीवन  

नतमस्तक होऊन तयांना हवीचे अर्पण ||१८|| 

अ॒प्स्व१न्तर॒मृत॑म॒प्सु भे॑ष॒जम॒पामु॒त प्रश॑स्तये । देवा॒ भव॑त वा॒जिनः॑ ॥ १९ ॥

हे जल आहे अमृतसम दिव्य सर्वगुणी 

ओखदमयी हे निरामयी हे बहुगुणी  संजीवनी

देवांनो यज्ञासी यावे त्वरा करोनी झणी

स्तवन कराया या उदकाचे सुरातुन गाउनी ||१९||  

अ॒प्सु मे॒ सोमो॑ अब्रवीद॒न्तर्विश्वा॑नि भेष॒जा । अ॒ग्निं च॑ वि॒श्वश॑म्भुव॒माप॑श्च वि॒श्वभे॑षजीः ॥ २० ॥

अग्निदेव हा सकलांसाठी दयाळू शुभंकर्ता

राखुनिया अंतर्यामी  जल आरोग्याचा दाता

रोगांचे परिहारक दिव्य उदक श्रेष्ठ बहुगुणी

ज्ञानी केले आम्हाला हे सोमाने सांगुनी ||२०||

आपः॑ पृणी॒त भे॑ष॒जं वरू॑थं त॒न्वे३मम॑ । ज्योक् च॒ सूर्यं॑ दृ॒शे ॥ २१ ॥

जलशक्ती हे तुला प्रार्थना आरोग्या द्यावे

अनंतकाली आम्हासी सूर्याचे दर्शन व्हावे

निरामयाच्या वरदानास्तव  दिव्यौषधी मिळावे

प्रसन्न होऊनी आम्हावरती आशीर्वच हे द्यावे ||२१||

इ॒दमा॑प॒ः प्र व॑हत॒ यत् किं च॑ दुरि॒तं मयि॑ । यद्वा॒हम॑भिदु॒द्रोह॒ यद्वा॑ शे॒प उ॒तानृ॑तम् ॥ २२ ॥

पवित्र पावन निर्मल असशी जलाचिया देवते

दुर्गुण दुष्टावा शत्रुत्व नष्ट करी माते

असत्य वर्तन माझ्या ठायी त्याचे क्षालन करा

जीवनास या कृपा करोनी नेई उद्धारा ||२२||

आपो॑ अ॒द्यान्व॑चारिषं॒ रसे॑न॒ सम॑गस्महि । पय॑स्वानग्न॒ आ ग॑हि॒ तं मा॒ सं सृ॑ज॒ वर्च॑सा ॥ २३ ॥

सर्व जलांनो तुमच्या पायी शरणार्थी झालो

मधुर रसांशी तुमच्या ठायी एकरूप झालो 

जलनिवासि हे अनला देवा प्राप्त येथ होई 

तव तेजाचे दान करोनी कृपावंत होई ||२३||

सं मा॑ग्ने॒ वर्च॑सा सृज॒ सं प्र॒जया॒ समायु॑षा । वि॒द्युर्मे॑ अस्य दे॒वा इंद्रो॑ विद्यात्स॒ह ऋषि॑भिः ॥ २४ ॥

गार्ह्यपत्यदेवा आम्हाला दे आभा संतती

दीर्घायुचा आशिष देई हात ठेवुनी माथी 

तुम्ही दिधले वैभव अमुचे देवांना हो ज्ञात

सर्व ऋषींसह देवेंद्राही होऊ देत विदित ||२४||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/kMVENAZAqj8

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 16 – 24

Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 16 – 24

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

कधी नळाला पाणी नसतं…

कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं…

 

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

 

कधी जागा नसते . .

कधी जागा असून स्पेस नसते . .

कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची ऊब नसते . .

 

कधी डब्यात आवडती भाजी नसते . .

कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . .

दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

 

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . .

कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते . .

 

कधी काही शब्द कानावर पडतात . .

कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

 

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . .

कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

 

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . .

कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

 

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . .

कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

 

कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. .

कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

 

कधी पैसा असला, की नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली, की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत, म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?

 

ताण घेतला तर तणाव . .

आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते.

 

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात रहावं

या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं ….  –

 

लेखक : श्री विजय बोंगिरवार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ न उमजलेले अश्रू… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ न उमजलेले अश्रू … ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही… 

मग डोळेच येतात धावून नि भावनेचा ओघ घेतात सामावून.. क्षणभर होते त्यांची कालवाकालव अन आसवांची करतात जमवाजमव.. 

तरारलेले अश्रू पूर्ण डोळे एकेक थेंब ओघळू लागतात..

पाहशील का एकदाच डोळयात माझ्या,दिसतेय का तुला अर्थपूर्ण हळवी भावना असे मुके हुंदके सांगत असतात.. ओथंबलेली डोळ्यातली आसवं पापणीच्या किनाऱ्यावर जलबिंदूची नक्षी काढतात.. 

अन तर्जनी नकळत फिरते तिथे अलगद अलवारपणे टिपून घेते किनाऱ्यावर साचलेले अश्रूबिंदू… 

एखादा उन्मळून वाहिलेला भावनेचा कड गालावरून जेव्हा स्यंदन करत ओघळतो.. 

भर भावुकतेचा वाहून गेला तरी सल त्याचा उरी टोचतच राहतो…

आणि आणि या आवेगाची आठवण जेव्हा जेव्हा त्या क्षणाला येते तेव्हा तेव्हा ही अशीच आसवांची रिमझिम बरसून जाते… 

मन गलबलून येते नि… 

काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही.

.फक्त डोळेच सांगुन जातात सर्व काही…

समजण्या पलिकडचे जे कदापि उमजतच नाही… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 116 ☆ लघुकथा – भगवान का क्या सरनेम है? ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है  स्त्री विमर्श आधारित एक विचारणीय लघुकथा ‘भगवान का क्या सरनेम है?’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 116 ☆

☆ लघुकथा – भगवान का क्या सरनेम है? ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

कक्षा में टीचर के आते ही विद्यार्थी ने एक सवाल पूछा – मैडम! नेम और सरनेम में क्या ज़्यादा इम्पोर्टेंट होता है? 

‘मतलब’? – मैडम सकपका गईं फिर थोड़ा संभलकर बोली – यह कैसा सवाल है निखिल? 

पापा कहते हैं कि किसी को उसके सरनेम से बुलाना चाहिए, नाम से नहीं। सरनेम इम्पोर्टेंट होता है। 

लेकिन क्यों? नाम से बुलाने में कितना अपनापन लगता है। नाम हमारी पहचान है। माता- पिता कितने प्यार से अपने बच्चे का नाम रखते हैं। 

 मैम! पर पापा कहते हैं कि सरनेम हमारी सच्ची पहचान होता है। हम किस जाति के हैं, धर्म के हैं, यह सरनेम से ही पता चलता है। दूसरों को इसका पता तो चलना चाहिए। 

अच्छा स्कूल में आपस में दोस्ती करने के लिए नाम पूछते हो या सरनेम? वैशाली! तुम बताओ। 

मैम! नेम पूछते हैं। 

मेरे पापा ने बताया कि सरनेम हमारा गुरूर है, नेम से बुलाओ तो सरनेम हर्ट हो जाता है। वह बड़ा होता है ना! – अक्षत ने कहा। 

कक्षा के एक बच्चे ने कुछ कहने के लिए हाथ उठाया। हाँ बोलो क्षितिज! मैडम ने कहा। 

मैम! भगवान का क्या सरनेम है? 

©डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 146 ☆ श्रद्धा लभते ज्ञानम्… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका कीhttps://www.e-abhivyakti.com/wp-admin/post.php?post=53412&action=edit# प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “श्रद्धा लभते ज्ञानम्…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 146 ☆

☆ श्रद्धा लभते ज्ञानम्

जब कोई वस्तु या व्यक्ति हमारी कल्पना के अनुरूप होता है, तो अनायास ही उसकी हम उसकी ओर आकर्षित होने लगते हैं। मानव की यह प्रवृत्ति तब घातक सिद्ध होने लगती है,जब यह एक तरफा होकर, जुनून की हद तक बढ़ जाए, इस समय मनुष्य, विवेक से अंधा होकर सही गलत का फर्क भूल जाता है और मन में वांछित पाने की चाहत और बलवती हो जाती है।

वनवास के दौरान माता सीता भी स्वर्ण मृग के प्रति आकर्षित हुईं जबकि वो ये जानती थीं कि ऐसा होना संभव नहीं है और तो और भगवान श्री राम भी उनकी इच्छा पूरी करने के लिए चल दिये। ये सब आकर्षण का माया जाल है जिसके प्रभाव से बड़े – बड़े संत महात्मा भी नहीं बच सके।

लगभग सभी जीव जंतु स्नेह की भाषा समझते हैं। खासकर मनुष्य जो ईश्वर की अनुपम कृति है वो हमेशा सुखद वातावरण ही चाहता है। ये बात अलग है कुछ लोग परिस्थितियों के आगे घुटने टेक देते हैं तो वहीं कुछ संघर्ष कर विजेता के रूप में सबके प्रेरक बनते हैं। कहा जाता है- श्रद्धा लभते ज्ञानम्। सही है जब हमारी  सोच विकसित होगी तभी श्रद्धा, विश्वास और धैर्य पनपेंगे। क्या आपने कभी सोचा कि हममें से अधिकांश लोग सकारात्मक पोस्ट ही क्यों पढ़ते हैं व शेयर करते हैं ?

 कारण साफ है, हर व्यक्ति मानसिक सुकून चाहता है। जैसी संगत होगी वैसा ही हमारा स्वभाव बनने लगता है अतः केवल अच्छाई से जुड़ते हुए आगे बढ़ते चलें, परिणाम सुखद होगा।

अधिकतर लोग पैसे के लिए हाय- हाय करते दिखते हैं, पूरी उम्र बीत जाने के बाद भी वही ढाक के तीन पात। कारण साफ है कि आप ने अपने कार्यों का मूल्यांकन कभी नहीं किया अन्यथा आपको पैसे की तलाश में भटकना नहीं पड़ता।

यहाँ पर भी श्रद्धा आपकी सहेली बन आत्मविश्वास बढ़ाने का कार्य खूबसूरती से करेगी। अपने अंदर हुनर पैदा करें और उसे तराशने में पूरे मनोयोग से जुट जाएँ। देखते ही देखते कई राहें आपके सामने होगीं और कार्य से अधिक का परिणाम अवश्य मिलेगा। बस बोले नहीं कार्य करें क्योंकि कार्य जब बोलेंगे तभी शुभ फल मिलेंगे और कर्म ,धर्म व मर्म सभी आप के अनुसार चलने लग जायेंगे।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विस्मय ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – विस्मय ??

रोज़ निद्रा तजना,

रोज़ नया हो जाना,

सारा देखा-भोगा

अतीत में समाना,

शरीर छूटने का भय

सचमुच विस्मय है,

मनुष्य का देहकाल ;

अनगिनत मृत्यु और

अनेक जीवन का

अनादि समुच्चय है..!

© संजय भारद्वाज 

17 सितम्बर 2017

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक।

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी ⇒ जाको राखे सांइया… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “जाको राखे सांइया”।)  

? अभी अभी ⇒ जाको राखे सांइया? श्री प्रदीप शर्मा  ? 

अक्सर टॉयलेट में हम अकेले ही होते हैं, विचार कहीं भी हो, आँखें हर जगह निगरानी रखती है।मच्छर , खटमल और कॉकरोच से हमारी पुश्तैनी दुश्मनी चली आ रही है। जो हमारा खून पीये , अथवा हमारे सुख चैन में खलल डाले, उसके लिए , शत प्रतिशत शाकाहारी होते हुए भी, हमारी आंखों में खून उतर आता है।

होगा किसी के लिए जीवः जीवस्य भोजनम्, कोई निरीह प्राणी कभी हमारा भोजन नहीं बना, फिर भी एक आरोप हम पर सदा लगता चला आया है, कि हमने किसी का भेजा चाट लिया, अथवा किसी का दिमाग ही खा गए।लेकिन क्या करें, हम भी मजबूर हैं।।

वैसे आत्म रक्षा और सुरक्षा हेतु, अस्त्र, शस्त्र का उपयोग तो शास्त्रों द्वारा भी मान्य है, लेकिन यह आदमी कितना महान है, राजा महाराजा और वीर बहादुर, सदियों से जंगल में जा जाकर, जंगली जानवरों का शिकार करते चले आए हैं। इतना ही नहीं, उन्हें पिंजरे में कैद कर, सर्कस में करतब दिखलाने से भी बाज नहीं आए। आज के सभ्य समाज में, खैर है, जंगली जानवरों के शिकार पर प्रतिबंध जरूर है, लेकिन यह इंसान जंगल में भी मंगल मनाने लग गया है। आज जंगल का राजा, शेर नहीं इंसान है। अगर प्रोजेक्ट टाइगर नहीं होता, तो कहां रह पाते जिंदा आज, बेचारे ये वन्य जीव।

नियति का चक्र भी बड़ा विचित्र है। अत्याधुनिक हथियारों और सुरक्षा प्रयत्नों के बावजूद आज भी हमारी समस्या बेचारे मच्छर, मक्खी और कॉकरोच का आतंक है। कभी अहिंसक मच्छरदानी हमें मच्छरों से बचा भी लेती थी, लेकिन आज ऑल आउट, कैस्पर, कछुआ छाप अगरबत्ती और करेंट वाली रैकेट के बावजूद मच्छर हैं कि खत्म होने का नाम ही नहीं लेते। छिपकली और कॉकरोच जैसे कीड़ों के लिए घरों में आए दिन, पेस्ट कंट्रोल करवाना पड़ता है।।

गर्मी में हमारी तरह कीड़े भी अक्सर मॉर्निंग वॉक, इवनिंग वॉक और रात्रि को सैर सपाटे के लिए निकला करते हैं। बस ऐसे ही एक शुभ मुहूर्त में हमारी नज़र टॉयलेट में सैर करते, एक मिनी कॉकरोच पर पड़ गई। बस क्या था, अचानक हमारे अंदर का जानवर जाग उठा, और हमने उसे मन ही मन चेतावनी भी दे डाली, खबरदार अगर टाईल्स की यह लक्ष्मण रेखा पार की। तुम्हारी मौत आज हमारे हाथों निश्चित है।

छठी इंद्रिय विरले प्राणियों में ही होती है। शायद कॉकरोच में कण कण में भगवान वाला अंश अवश्य होगा, जिसने मेरी मौन चेतावनी को पढ़ लिया और उस कॉकरोच को प्रेरणा दी, बेटा अबाउट टर्न ! और वह कॉकरोच चमत्कारिक ढंग से टाईल्स की लक्ष्मण रेखा पार करने के पहले ही, विजयी मुद्रा में वापस मुड़कर अपनी जान बचाने में कामयाब हुआ, और मैं एक पराजित योद्धा की तरह, अपने किये पर पछताने के अलावा कुछ ना कर सका।।

मुझे खुशी है, ईश्वर ने मुझे एक सोची समझी, नासमझी भरी, जीव हत्या से बाल बाल बचा लिया। हम कौन होते हैं किसी को मारने और अभय दान देने वाले, जब हम सबका मालिक एक है, और हम उसके हाथों की महज कठपुतली। किसी ने ठीक ही कहा है, जाको राखे साइयां, मार सके ना कोय ..!!

    ♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 209 ☆ आलेख – कला एवं साहित्य में स्वास्थ्य चेतना… ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक आलेख – कला एवं साहित्य में स्वास्थ्य चेतना…

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 209 ☆  

? आलेख कला एवं साहित्य में स्वास्थ्य चेतना ?

कहा गया है कि धन गया तो कुछ नहीं गया, स्वास्थ्य  गया तो कुछ गया और चरित्र गया तो सब कुछ गया. यद्यपि यह उक्ति चरित्र के महत्व को प्रतिपादित करते हुये कही गई है किन्तु इसमें कही गई बात कि “स्वास्थ्य गया तो कुछ गया” रेखांकित करने योग्य है.  हमारा शरीर ही वह माध्यम है जो जीवन के उद्देश्य निष्पादित करने का माध्यम है. स्वस्थ्य तन में ही स्वस्थ्य मन का निवास होता है. और निश्चिंत मन से ही हम जीवन में कुछ कर सकते हैं. कला और साहित्य  मन की अभिव्यक्ति के परिणाम ही हैं. स्वास्थ्य और साहित्य का आपस में गहरा संबंध होता है. स्वस्थ साहित्य समाज को स्वस्थ रखने में अहम भूमिका अदा करता है.  साहित्य में समाज का व्यापक हित सन्नहित होना वांछित है. और समाज में स्वास्थ्य चेतना जागृत बनी रहे इसके लिये निरंतर सद्साहित्य का सृजन, पठन पाठन, संगीत, नाटक, फिल्म, मूर्ति कला, पेंटिंग आदि कलाओ में हमें स्वास्थ्य विषयक कृतियां देखने सुनने को मिलती हैं. यही नहीं नवीनतम विज्ञान के अनुसार मनोरोगों के निदान में  कला चिकित्सा का उपयोग बहुतायत से किया जा रहा है. व्यक्ति की कलात्मक अभिव्यक्ति के जरिये मनोचिकित्सक द्वारा  विश्लेषण किये जाते हैं और उससे उसके मनोभाव समझे जाते हैं. बच्चों के विकास में कागज के विभिन्न आर्ट ओरोगामी, पेंटिग, मूर्ति कला, आदि का बहुत योगदान होता है. स्वास्थ्य दर्पण, आरोग्य, आयुष, निरोगधाम, आदि अनेकानेक पत्रिकायें बुक स्टाल्स पर सहज ही मिल जाती हैं. फिल्में, टी वी और रेडियो ऐसे कला माध्यम है जिनकी बदौलत साहित्य और कला का व्यापक प्रचार-प्रसार हो रहा है.जाने कितनी ही उल्लेखनीय  हिन्दी फिल्में हैं जिनमें रोग विशेष को कथानक बनाया गया है. अपेक्षाकृत उपेक्षित अनेक बीमारियों के विषय में जनमानस की स्वास्थ्य चेतना जगाने में फिल्मों का योगदान अप्रतिम है.

फिल्म आनंद में कैंसर के विषय में, फिल्‍म ‘पा’ में औरो नाम के एक बच्‍चे की कहानी है जिसकी उम्र 13 साल है और जिसे प्रोजेरिया नाम की बीमारी हो जाती है. इस बीमारी में व्‍यक्ति बहुत तेजी से बूढ़ा होने लगता है. फिल्म गुप्त रोग में स्त्री पुरुष संबंधो के बारे में, फिल्म तारे जमीन पर में ईशान अपने बोर्डिंग स्कूल में कुछ भी ठीक से नहीं कर पाता है, सौभाग्य से, एक नया कला शिक्षक उसे यह पता लगाने में मदद करता है कि उसे डिस्लेक्सिया है और वह उसकी क्षमता को पहचानने में मदद करता है, फिल्म हिचकी में रानी मुखर्जी ने एक ऐसी टीचर का किरदार निभाया जिसे टॉरेट सिंड्रोम हैं.  इस बीमारी में महिलाओं को बार-बार हिचकी आने के चलते बोलने और समझने में दिक्कत होती है. इसी तरह पिकू में कांस्टीपेशन का, गजनी में एमनेसिया नामक बीमारी का, माई नेम इज खान में  एस्परगर सिंड्रोम को लोगों के सामने पेश किया गया. एस्परगर सिंड्रोम एक तरह का परवेसिव डेवलपमेंट डिसऑर्डर है.  इसका मरीज गुमनामी में रहना पसंद करता है.   शुभ मंगल सावधान में नपुंसकता पर, ए दिल है मुश्किल में टर्मिनल कैंसर पर, जनजागृति पैदा करने में कलात्मक सफलता देखने मिलती है.ढ़ेरों फिल्में स्वास्थ्य के विभिन्न पहलुओ पर केंद्रित हैं.  साहित्य में हम देखते हैं कि अनेक उपन्यास कहानियां समय समय पर नायक या नायिका की टी बी, कैंसर या किसी अन्य बीमारी पर केंद्रित होने के कारण मर्मांतक, हृदय स्पर्शी और काल जयी बन गयी. स्वास्थ्य संबंधी साहित्य अत्यंत लोकप्रिय है. हर अखबार कोई न कोई स्वास्थ्य परिशिष्ट या स्तंभ अवश्य चलाता है. इस पृष्ठभूमि के संदर्भ में मेरा अभिमत है कि कला एवं साहित्य में स्वास्थ्य चेतना हमेशा से बनी रही है. किन्तु समय के साथ यह और जरूरी हो गया है कि कला एवं साहित्य में स्वास्थ्य संदर्भो पर और काम किये जायें. कोरोना आपदा एक आकस्मिक वैश्विक स्वास्थ्य समस्या का विस्फोट था. रचनाकारों ने इसका सकारात्मक उपयोग किया. लाकडाउन में लोगों को खूब समय मिला. मैंने कोरोना काल के व्यंग्य लेखों का संग्रह लाकडाउन नाम से संपादित किया. कोरोना जनित कविताओ के कई संग्रह अनेक प्रकाशनो से छपे हैं. पिछले दिनों में योग, इम्युनिटी बढ़ाने के नुस्खों पर भी बहुत सारा लिखा गया है.

 मैं अपने पहले कविता संग्रह आक्रोश से यह कविता उदृत करना चाहता हूं…

अस्पताल

जिंदगी कैद है यहाँ आक्सीजन के सिलेंडर में

उल्टी लटकी है सिलाइन ग्लूकोज या खून की बोतल में

शुगर कोटेड हैं टेबलेट्स और कैप्सूल,

पर जिंदगी बड़ी कड़वी है.

माँस के लोथड़े में, इंजेक्शन की चुभन

जाने कैसी तो होती है अस्पताल की गंध.

सफेद नर्स, डाक्टर- ज्यादा बगुले, कुछ हंस

गले में झूलता स्टेथेस्कोप,

क्या सचमुच सुन पाता है

कितना किसका जिंदगी से नाता है

अनेक व्यंग्य लेखों में भी सहज ही मेरा स्वास्थ्य संबंधी लिखना होता रहा है. उदाहरण के तौर पर मेरा एक व्यंग्य छपा था मेरे परिवार का स्वास्थ्य अभियान, जिसमें स्वास्थ्य उपकरणो के बाजारवाद पर कटाक्ष किया गया है. एक अन्य व्यंग्य है ब्रांडेड वर वधू जिसमें कल्पना की गई है कि मेडिकल रिपोर्टस मिलाकर कम्प्यूटर जी शादियां तय करेंगे जिससे आर एच पाजिटिव निगेटिव लड़के लड़कियों की शादी से थैलेसिमा जैसी समस्याओ का निदान हो सकेगा. ब्लड टेस्ट, प्रदूषण और स्वास्थ्य पर उसके दुष्प्रभाव आदि लेख भी लिखे गये.

जनसंख्या नियंत्रण, कुपोषण के विरुद्ध अभियान, शिशु स्वास्थ्य, शिशु मृत्यु दर को कम करने, चेचक नियंत्रण, पोलियो नियंत्रण आदि आदि मुद्दों पर नुक्कड़ नाटक हमने देखे हैं. गिरिराज शरण अग्रवाल की प्रभात प्रकाशन से प्रकाशित किताब स्वास्थ्य व्यवस्था पर व्यंग्य में वे लिखते हैं ” अस्पताल हो और वह भी सरकारी तो उसका अलग आनंद है, बस आपमें इस अद्भुत पर्यटन स्थल का आनंद लेने की क्षमता होना चाहिये.

परसाई जी के व्यंग्य निंदा रस से अंश पाठ उद्धृत करना चाहता हूं…

निंदा में विटामिन और प्रोटीन होते हैं। निंदा खून साफ करती है, पाचन-क्रिया ठीक करती है, बल और स्फूर्ति देती है। निंदा से मांसपेशियाँ पुष्ट होती हैं। निंदा पायरिया का तो शर्तिया इलाज है। संतों को परनिंदा की मनाही होती है, इसलिए वे स्वनिंदा करके स्वास्थ्य अच्छा रखते हैं। ‘मौसम कौन कुटिल खल कामी’- यह संत की विनय और आत्मग्लानि नहीं है, टॉनिक है। संत बड़ा कांइयाँ होता है। हम समझते हैं, वह आत्मस्वीकृति कर रहा है, पर वास्तव में वह विटामिन और प्रोटीन खा रहा है।

स्वास्थ्य विज्ञान की एक मूल स्थापना तो मैंने कर दी। अब डॉक्टरों का कुल इतना काम बचा कि वे शोध करें कि किस तरह की निंदा में कौन से और कितने विटामिन होते हैं, कितना प्रोटीन होता है। मेरा अंदाज है, स्त्री संबंधी निंदा में प्रोटीन बड़ी मात्रा में और शराब संबंधी निंदा में विटामिन बहुतायत में होते हैं. परसाई जी ने अपने अनेक व्यंग्य लेखों में स्वास्थ्य विषयक विसंगतियां उठाई हैं. उदाहरण के तौर पर बम और बीमारी, बुखार आ गया, चीनी डाक्टर भागा, रामभरोसे का इलाज, निठल्ले की डायरी में अनेक प्रसंगों में परसाई जी के स्वास्थ्य चेतना संदर्भ मिलते हैं. शरद जोशी जी के प्रतिदिन में अनेक मौकों पर, रवीन्द्र नाथ त्यागी जी के व्यंग्यो में अनेकानेक संदर्भो में, मुंशी प्रेमचंद की कहानियों में सहज रुप से अनेक प्रसंगों में हमें नायक या नायिका या रचना के किरदारों की बीमारियों के वर्णन मिलते है.तत्कालीन स्वास्थ्य व्यवस्थाओ, अंधविश्वास, रूढ़ियों पर प्रहार, पुरुषों की अपेक्षा स्त्रियों के स्वास्थ्य, खानपान में भेदबाव को हमेशा से रचनाकारो ने इंगित किया है. और समाज को समय से आगे लाने में अपनी लेखनी से प्रयासरत रहे हैं. 

 दिल्ली में स्वस्थ्य भारत ने ही वर्ष २०१९ में एक राष्ट्रीय लघुकथा संगोष्ठी का आयोजन किया था जिसमें स्वास्थ्य विषयक लघुकथायें ही पढ़ी गई थी. और यह गोष्ठी बहुचर्चित रही थी.

कला चिकित्सा के सिद्धांतों में मानवतावाद, रचनात्मकता, भावनात्मक संघर्षों को सुलझाना, आत्म-जागरूकता को बढ़ावा देना और व्यक्तित्व विकास शामिल है. एक पेशे के रूप में कला चिकित्सा का उदय स्वतंत्र रूप से  संयुक्त राज्य अमेरिका  और यूरोप में हुआ. शब्द “आर्ट थेरेपी”  का प्रयोग 1942 में ब्रिटिश कलाकार एड्रियन हिल द्वारा किया गया था, उन्होंने तपेदिक से उबरने के दौरान पेंटिंग और ड्राइंग से स्वास्थ्य लाभों की खोज की थी. 

साहित्य कला और स्वास्थ्य चेतना परस्पर गुंथे हुये विषय हैं. यद्यपि अब तक इस तरह किसी समालोचक ने स्वास्थ्य साहित्य को इस विभक्त करके कोई रेखांकन नही किया है. यह आयोजन  साहित्य में नितांत नई समीक्षा दृष्टि है. मेरा अभिमत है कि इस दृष्टि को और विस्तार दिया जाये. स्वास्थ्य संबंधी कहानियां, कवितायें, व्यंग्य, नाटको के संग्रह प्रकाशित किये जा सकते हैं. युवा शोधार्थी इन धारणाओ में पी एच डी कर सकते हैं. जन स्वास्थ्य संसद जैसे और भी परिचर्चायें तथा आयोजन और होने चाहिये. जिससे लोगों में निरोगी काया के प्रति जागरूकता का वातावरण सृजित हो.

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares