(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आप प्रत्येक मंगलवार,साप्ताहिक स्तम्भ -यायावर जगत के अंतर्गत सुश्री ऋता सिंह जी की यात्राओं के शिक्षाप्रद एवं रोचक संस्मरण आत्मसात कर सकेंगे। इस श्रृंखला में आज प्रस्तुत है आपका यात्रा संस्मरण – मेरी डायरी के पन्ने से…स्पेन, पुर्तगाल और मोरक्को… का पहला भाग )
मेरी डायरी के पन्ने से… स्पेन, पुर्तगाल और मोरक्को… भाग – 1
2015 अक्टोबर इस साल हमने स्पेन, पुर्तगाल और मोरक्को घूमने का कार्यक्रम बनाया।
इस बार हम तीन सप्ताह हाथ में लेकर निकले थे।यात्रा के आने – जाने के दो दिन अलग ताकि पूरे इक्कीस दिनों का पूरा आनंद लिया जा सके। हमने बहुत सोच-समझकर तीनों देशों की भौगोलिक सुंदरता और ऐतिहासिक विशेषताओं को ध्यान में रखकर देखने योग्य स्थानों का चयन किया।
सच पूछिए तो किसी भी देश में अगर हम अच्छी तरह से घूमना चाहें तो दो महीने तो अवश्य ही लग जाएँगे पर यह हमेशा संभव नहीं होता। अगर हमारे देश के समान या उससे भी बड़ा देश हो तो और अधिक समय लग जाएगा। इसलिए विदेशों में घूमते समय सबसे पहले अपनी खर्च करने की आर्थिक क्षमता को जाँचना आवश्यक होता है फिर रुचि अनुसार शहरों का चयन किया जाना चाहिए। चूँकि हमारे पास इक्कीस दिन थे तो हमने भी अपनी रुचि अनुसार दर्शनीय स्थानों की सूचि बना ली थी और उसी के आधार पर सभी जगह रहने की सुविधानुसार व्यवस्था भी कर रखी थी। विदेश यात्रा के दौरान सुनियोजित बजट बना लेना उपयोगी और आवश्यक होता है क्योंकि हम विदेशी मुद्रा पर निर्भर करते हैं।
हमारी पहली मंजिल थी पुर्तगाल या पोर्त्युगल। हम पुर्तगाल की राजधानी लिस्बन पहुँचे। हम यहाँ तीन दिन रहे। हमारा अधिक उत्साह उस पोर्ट को देखने का था जहाँ से 1497 में वास्को डगामा चार जहाजों के साथ भारत के लिए रवाना हुए थे और पहली बार योरोप और भारत के बीच समुद्री मार्ग खुल गए थे। साथ ही हमारे देश में योरपीय दासता का इतिहास का अध्याय भी प्रारंभ हुआ था।
हम दोपहर तक उस विशाल पोर्ट पर रहे, पत्थरों से बने पुराने ज़माने के लाइट हाउस पर चढ़कर दूर तक समुद्र को निहारने का आनंद लिया। आस पास कई छोटी -छोटी जगहें हैं उन्हें देखने का आनंद उठाया।
लिस्बन शहर समुद्री तट पर बसा है। यहाँ के कई संग्रहालयों से हमें काफी जानकारी मिली। यहाँ पर अधिकतर दर्शनीय स्थल विभिन्न क्रूज़ द्वारा ही किए जाते हैं। कुछ प्रसिद्ध किले भी हैं । इस शहर के अन्य दर्शनीय स्थानों का भ्रमण कर हम उनके बाज़ार देखने गए।
कई अलग प्रकार के फल, शाक और सब्ज़ियाँ देखी जो हमारे देश से अलग हैं। छोटी -छोटी लाल तेज़ गुच्छों में मिर्ची देखने को मिली।इसे यहाँ पिरिपिरि कहते हैं।
इस पिरिपिरि के साथ हमारे देश का एक पुराना इतिहास भी जुड़ा है।हमारे देश में पुर्तगालियों के आने से पूर्व केवल कालीमिर्च की पैदावार होती थी ,हरीमिर्च जिसका उपयोग नित्य अपने भोजन में आज हम करते हैं वह पुत्रगालियों की ही देन है। वे मिर्च पहले गोवा में ले आए और 17वीं शताब्दी में शिवाजी की सेना इसे देश के बाकी हिस्सों में ले जाने में सफल हुई।आज हमारे देश में कई प्रकार की मिर्चियाँ उगाई जाती हैं।
लिस्बिन देखकर हम प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण शहर अल्बूफेरिया देखने के लिए रवाना हुए। यह यात्रा हमने यूरोरेल द्वारा की क्योंकि इन दोनों शहरों के बीच का अंतर 255 कि.मी.है और अढ़ाई घंटे का समय लगता है।यहाँ बसें भी चलती हैं पर समय अधिक लग सकता है।
हम अल्बूफेरिया में हम चार दिन रहे। यह सुंदर शहर समुद्र और पहाड़ों के बीच बसा है।
यहाँ हमने कई किले देखे जो अपने समय का इतिहास बयान करते हैं। पुरानी छोटी-बड़ी तोपें अब भी किले की शोभा बनी हुई हैं। यह ऐतिहासिक शहर है।पहाड़ी इलाका होने के कारण सड़कें संकरी और टाइल्स लगी हुई हैं। छोटी -छोटी बसें इन सड़कों पर चलती हैं पर किले तक जाने वाली चढ़ाई चलकर ही चढ़नी पड़ती है।
किले के प्रारंभ में सोवेनियर की दुकानें हैं।चाय-नाश्ता कॉफी की छोटी -छोटी सुसज्जित टपरियाँ हैं। यहीं पर पहली बार क्रॉसें खाने का स्वाद मिला।
दूसरे दिन हमने एक बड़े जहाज़ द्वारा समुद्र पर सैर करने का आनंद लिया।इस बड़े जहाज से उतरकर समुद्र के बीच हमें छोटे लाइफबोट में बिठाया गया और समुद्र में स्थित गुफाओं का दर्शन कराया गया। यह एक अनूठा अनुभव था। छोटे मोटर बोट या लाइफबोट आसानी से गुफाओं के भीतर प्रवेश कर सकते हैं। यहाँ की गुफाएँ ऊपर से खुली -सी हैं जहाँ से सूरज का प्रकाश स्वच्छ जल पर आ गिरता है।मोटर बोट से जहाज़ पर चढ़ना एक भारी कठिन काम था। विशेषकर जब जल से मन में भय हो! इन गुफाओं के पास हमें ऊदबिलाव के अनेक परिवार दिखे।ये बहुत शर्मीले प्राणी हैं तथा झुंड में ही रहते हैं।इन्हें तकलीफ न हो या वे डिस्टर्ब न हों इसलिए लाइफबोट का उपयोग किया जाता है जो चप्पू द्वारा चलाया जाता है।
इस शहर का एक पहाड़ी हिस्सा भी है जो अपनी प्राकृतिक सुंदरता के लिए प्रसिद्ध है,हम तीसरे दिन यहाँ के बहुत खूबसूरत जंगल देखने के लिए निकले। यह पहाड़ी इलाका है और यहाँ बड़ी तादाद में वे वृक्ष उगते हैं जिनसे कॉर्क बनाया जाता है। हमें कॉर्क बनाने की फैक्ट्री, शराब बनाई जाने वाली फैक्ट्री आदि देखने का यहाँ मौका भी मिला। हमारे स्वदेश लौटने के कुछ माह बाद इस विशाल सुंदर जंगल में भीषण आग लगी और जंगल के राख हो जाने का समाचार मिला।हम इस बात से बहुत आहत भी हुए।
इस शहर में कई संग्रहालय भी हैं जहाँ अनेक प्रकार की मूर्तियाँ और पेंटिंग्स देखने को मिले। निरामिष भोजन के लिए हमें थोड़ी तकलीफ अवश्य हुई अन्यथा यह खूबसूरत देश है। सुंदर चर्च हैं।लोग देर से उठना और देर रात तक खाने -पीने में विश्वास करते हैं, जिस कारण यहाँ के लोगों की सुबह देर से प्रारंभ होती है। पुर्तगाल के पुराने शहरों को देखकर आपको हमारे देश का खूबसूरत गोवा अवश्य स्मरण हो आएगा।
☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️
रात्री अकराच्या बसने टोकियोला जायचे होते. आमचा जपान रेल्वे पास या बससाठी चालत होता. तीस जणांची झोपायची सोय असलेली डबल डेकर मोठी बस होती. बसण्याच्या जागेचे आरामदायी झोपण्याच्या जागेत रूपांतर केले आणि छान झोपून गेलो. पहाटे साडेपाच-सहाला जाग आली. सहज बाहेर पाहिले. अरे व्वा! बसमधून दूरवर फुजियामा पर्वत दिसत होता. निळसर राखाडी रंगाच्या त्या भव्य पर्वताच्या माथ्यावर बर्फाचा मुकुट चकाकत होता. सारे खूश झाले. ट्रॅफिक जॅममुळे टोक्यो स्टेशनला पोहोचायला नऊ वाजले. स्टेशनवरच सारे आवरले. आज आम्ही फुजियामाला जाणार होतो व उद्याची टोक्यो दर्शनची तिकीटं काढली होती. आजची रात्र आम्ही टोक्योचे एक उपनगर असलेल्या कावासकी इथे सीमा आणि संदीप लेले यांच्याकडे राहणार होतो. त्यामुळे जवळ थोडे सामान होते.
फुजियामाला जाताना हे सामान नाचवायला नको म्हणून आम्ही ते टोक्यो स्टेशनवरील लॉकरमध्ये ठेवायचे ठरविले. जपानमध्ये सर्व रेल्वे स्टेशन्सवर लॉकर्सची व्यवस्था आहे. आपल्या सामानाच्या साइजप्रमाणे लॉकर निवडून त्यात सामान ठेवायचे. किती तासांचे किती भाडे हे त्यावर लिहिलेले असते. सामान ठेवून लॉकरला असलेली किल्ली लावून ती किल्ली आपल्याजवळच ठेवायची. मात्र सामान परत घेताना योग्य ते भाडे त्या लॉकरला असलेल्या होलमधून टाकल्याशिवाय लॉकर उघडत नाही. तिथल्या एका लॉकरमध्ये सामान ठेवून आम्ही फुजियामाला जाण्यासाठी निघालो. तीन-चार गाड्या बदलून, अनेकांना विचारत शेवटी माथेरानसारख्या छोट्या गाडीने कावागुचिकोला पोहोचलो.फुजियामा इथे असलेल्या पाच लेक्सपैकी हा एक लेक आहे. तिथून फुजियामाचे सुंदर दर्शन होत होते. हळूहळू थंडी, बोचरे वारे वाढू लागले. तेव्हा परतीचा तसाच प्रवास करून टोक्यो स्टेशनवर आलो.
जगातले सर्वात वर्दळीचे स्टेशन म्हणून टोक्यो ओळखले जाते. जमिनीखाली आणि जमिनीवर पाच-सहा मजले अवाढव्य रेल्वे स्टेशन्सचे जाळे पसरले आहे. दररोज लक्षावधी लोक या स्टेशन मधून जा- ये करत असतात. त्या प्रचंड वाहत्या गर्दीत आम्ही हरवल्यासारखे झालो. आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर उतरलो तिथून सकाळी आम्ही ज्या दिशेच्या गेटजवळ सामान ठेवले होते, तो लॉकर काही सापडेना. त्यात भाषेची मोठीच पंचाईत. सगळेजण त्या गर्दीत लॉकर शोधत बसायला नको म्हणून आम्ही तिघे- चौघे एका ठिकाणी बसून राहिलो. लॉकर शोधायला गेलेल्या दोघा जणांना लॉकर सापडून परत आम्ही सर्व एकमेकांना सापडण्यात चांगले दोन तास गेले.
ट्रीपचा शेवटचा दिवस टोक्योदर्शनचा होता. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडतच होता .आयफेलटॉवरसारख्या असणाऱ्या टोक्यो टॉवरवरून शहराचे दर्शन घडले. जपानचा पारंपारिक चहा समारंभ पाहिला. तो हिरव्या रंगाचा, भातुकलीच्या कपांमधून दिलेला कोमट चहा आपल्याला आवडत नाही पण सुंदर किमोनोमधल्या त्या बाहुल्यांसारख्या स्त्रिया, चहा बनविण्याचे हळुवार सोपस्कार वगैरे पाहायला गंमत वाटत होती. नंतर एम्परर गार्डनमध्ये थोडे फिरून जेवायला गेलो. एका मोठ्या हॉटेलात सर्वांसाठी बार्बेक्यू पद्धतीचे जेवण होते. टेबलावर प्रत्येकाजवळ छोटीशी शेगडी ठेवलेली होती. त्यावर कांदा, बटाटा, वांगी, रताळे, मशरूम, लाल भोपळा, लाल मिरची असे सारे गरम गरम भाजून दिलेले होते. जोडीला भात, हिरवा चहा, रताळ्याचा गोड पदार्थ असे आमचे शाकाहारी जेवण होते. परंतु काड्यांनी जेवायची कसरत काही जमली नाही. मग काटे- चमचेच वापरले. त्या दिवशी त्या हॉटेलात बरीच लग्नं होती. ती पाहायला मिळाली. लग्नाच्या वऱ्हाडात उंची किमोनो घालून जपानी गजगामिनी मिरवत होत्या.
आता पाऊस थांबला होता. सुमिडा नदीतून क्रूझने सहल करायची होती. बसमधून तिथे जाताना टोक्योचा आपल्या फोर्टसारखा विभाग दिसला. तेरा ब्रिजच्या खालून आमची क्रूज गेली. ब्रिजवरून कुठे रेल्वे तर कुठे रस्ते होते. इकडून तिकडे सतत वाहतूक चालू होती. बोटीतून उतरल्यावर दोन्ही बाजूंच्या खरेदीच्या दुकानांवर एक नजर टाकून नंतर पॅगोडा पाहिला. टोक्योदर्शनच्या बसमधून उतरण्यापूर्वी गाइडला “आरीगाटो गोसाईमास” म्हटले. म्हणजे जपानी भाषेत त्याचे आभार मानले.
जपानी लोक हे अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि शांत वृत्तीचे आहेत. आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा याचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. हा देश सतत भूकंपाच्या छायेत वावरत असला तरी कुठेही भीतीचा लवलेश नसतो. सर्व नवीन बांधकामे भूकंपाला तोंड देण्यास योग्य अशीच बांधलेली आहेत. नियमाप्रमाणे प्रत्येक घरामध्ये दरवाज्याजवळ पिण्याच्या पाण्याच्या दोन बाटल्या, बॅटरी, मेणबत्त्या, काड्यापेटी, एका वेळचे घरातील सर्वांचे कपडे व थोडी बिस्किट्स, चॉकलेट्स अशी जय्यत तयारी एका बॅगमध्ये करून ठेवलेली असते. जपानमधील राहणीमान खूपच खर्चिक आहे. इथे सगळीकडे झाडे, फुले आहेत पण सारी झाडे, फुले अगदी सैनिकी शिस्तीत वाढल्याप्रमाणे आहेत. नैसर्गिकरित्या वाढलेले, फळाफुलांनी डवरलेले असे एकही झाड आढळत नाही. जपानी लोक ठरवतील तसेच झाडांनी वाढायचे, फुलांनी फुलायचे, बोन्सायरुपाने दिवाणखाने सजवायचे! तरुण पिढीवर अमेरिकन जीवनशैलीचा फार मोठा प्रभाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचं वेड व प्रचंड महागाई यामुळे लग्न, मुलंबाळं, एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कमी होत आहे. जपानमध्ये अतिवृद्धांची संख्या वाढते आहे तर लहान मुलांची संख्या कमी होत आहे. कोणी सांगावे, उद्या जपानी शास्त्रज्ञ यावरही काही उपाय शोधून काढतील.
आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पहाटेच्या थोड्याशा पावसाळी धुक्यातून उगवत्या सूर्यदेवाचे लांबलचक किरणांचे हात आम्हाला निरोप देत होते. डोळ्यांपुढे दिसत होते–
सुश्री ऋता सिंह जी शिक्षिका हैं। पिछले चालीस -पैंतालीस वर्षों से हिंदी अध्ययन कर रही हैं। हिंदी के साथ -साथ मराठी, अंग्रेज़ी ,पंजाबी तथा मातृभाषा बाँगला भाषा पर भी अच्छी पकड़ है। पिछले सोलह वर्षों से लैंग्वेज कन्सल्टेंट ऍन्ड टीचर ट्रेनर के रूप में भी सेवा प्रदान करती आ रही हैं। बच्चों के मन में हिंदी भाषा के प्रति प्रेम निर्माण करने हेतु भाषा पर विविध खेलों द्वारा अपनी छोटी – सी संस्था चलाती हैं। छात्रों को भाषा सीखने में आसानी हो इसलिए कई खेलों का निर्माण किया है। आपने देश -विदेश का प्रचुर भ्रमण किया है। यात्रा वर्णन पर लेख लिखने में आनंद लेती हैं। कहानी, कविता ,संस्मरण आदि सभी क्षेत्र में लिखने में रुचि रखती हैं। हिंदी आंदोलन परिवार, पुणे द्वारा हिंदी श्री से 2021 में सम्मानित की गई हैं।
प्रकाशित पुस्तकें –
खेल -खेल में सीखें हिंदी ( भाग 1 से 5)
नानीमाँ की झोली से – सचित्र द्विभाषीय पुस्तकें (दो प्रकाशित हुईं हैं )
प्रतिबिंब – कविता संग्रह
पुरानी डायरी के फटे पन्ने – कहानी संग्रह
स्मृतियों की गलियों से – संस्मरण संग्रह
अनुभूतियाँ – कहानी संग्रह
(सुश्री ऋता सिंह जी का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत। आपने हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख साझा करना स्वीकार किया है। इसके लिए हार्दिक आभार। अब आप प्रत्येक मंगलवार,साप्ताहिक स्तम्भ -यायावर जगत के अंतर्गत सुश्री ऋता सिंह जी की यात्राओं के शिक्षाप्रद एवं रोचक संस्मरण आत्मसात कर सकेंगे। इस श्रृंखला में प्रस्तुत है आपका यात्रा संस्मरण – मेरी डायरी के पन्ने से…नागालैंड… .)
भारत तीर्थस्थलों का देश है। साथ ही अनेक राज्य अपनी संस्कृति, त्योहार खान-पान की विविधता और विशेषता के लिए भी प्रसिद्ध है। धर्म,जाति,भाषा,आहार सब कुछ अलग अलग होने के बावजूद भी संपूर्ण देश एक अदृश्य सूत्र से बँधा है और वह है भारतीयता।
इसी सूत्र और रंगीन भूमि के त्योहारों का आनंद लेने इस वर्ष 2022 में हमारे परिवार ने नागालैंड की यात्रा का निर्णय लिया।
अब संपूर्ण भारत में यातायात के साधन भरपूर उपलब्ध हैं। पर्यटक तो अब नियमित रूप से विमान, रेलगाड़ी तथा अपनी मोटरगाड़ी द्वारा भी यात्रा करते दिखाई देते हैं। हमारे महामार्ग अत्यंत सुलभ, सुंदर और सुविधाजनक बनाए गए हैं। सभी राज्य अब महामार्गों द्वारा जुड़े हुए भी हैं।
नागालैंड में प्रतिवर्ष हॉर्नबिल फेस्टीवल मनाया जाता है। यह त्योहार प्रति वर्ष 1 दिसंबर से 10 दिसंबर तक मनाया जाता है। इस स्थान में सत्रह आदिवासी (ट्राइबल कम्यूनिटी) वास करते हैं। इस भूभाग पर हॉर्नबिल नामक पक्षियों की प्रजाति बहुसंख्या में पाए जाते थे। यहाँ के नागा जाति के आदिवासी अपने सिर पर हॉर्नबिल पक्षी के पंख लगाते हैं। इन पंखों को प्राप्त करने की उत्कट इच्छा ने आज इस सुंदर पक्षी की प्रजाति को प्रायः विलुप्त होने के कगार पर लाकर खड़ा कर दिया।
सन 2000 में यहाँ पर पहली बार सभी आदिवासी प्रजातियाँ एकत्रित हुईं और पहली ही बार फेस्टीवल मनाया गया। इसका मूल उद्देश्य था नागा आदिवासियों की आपसी मतभेदों को दूर करना, उनकी संस्कृति से राष्ट्र के अन्य प्रदेशों को परिचित कराना तथा देश की मुख्य धारा से उन्हें जोड़ना। इस उत्सव ने न केवल नागा जन जातियों की संस्कृति को पुनर्जीवित किया बल्कि नागालैंड की सुंदरता से पूरे संसार को परिचित भी कराया।
नागालैंड भारत के उत्तरी -पूर्व राज्यों में से एक है। यहाँ के सभी राज्य सदा से ही उपेक्षित रहे और भारत के बाकी राज्यों से कुछ हद तक कटे भी रहे। सन 1962 में इसे अलग राज्य का स्टेटस मिला। फिर भी राज्य उपेक्षित ही रहा।
सन 2000 से हॉर्नबिल फेस्टीवल देखने के लिए दर्शकों की संख्या बढ़ने लगीं तो होटल और होम स्टे की व्यवस्था भी होती रही। बड़ी संख्या में होटल खुले और विदेशों से भी यात्री इस रंगीन उत्सव का आनंद लेने आने लगे। नागावासियों का उत्साह बढ़ा,शहर स्वच्छ बनते रहे और लोगों को काम मिलने लगा। इस तरह वे अपनी पहचान बनाने लगे, भारत के मानचित्र ही नहीं संसार के मानचित्र पर उनकी चमक और पहचान बनी। बल्कि नागा आदिवासियों की संस्कृति फिर एक बार जागृत हुई।
आपको नागालैंड के निवासी भारत के अन्य राज्यों में कम ही दिखाई देंगे। वे सेल्फ शफीशियंट प्रजातियाँ तो हैं ही साथ ही उनसे बातचीत करने पर एक और बात सामने आई कि वे भारत के अन्य राज्यों में अपने अलग चेहरे,कद -काठी और भोजन आदि के कारण सहर्ष स्वीकृत नहीं हैं। यह अत्यंत दुख की बात है।
कोहीमा नागालैंड की राजधानी है। पर यह शहर पहाड़ों से घिरा होने के कारण यहाँ पर रेलवे और हवाई अड्डे की व्यवस्था नहीं है। इस शहर से सत्तर किलोमीटर की दूरी पर दीमापुर नामक शहर है। यहाँ एक छोटा -सा हवाई अड्डा है, रेलगाड़ी की सुविधा उपलब्ध है। यह नागालैंड का सबसे बड़ा शहर है। ऑटोरिक्शा, टैक्सियाँ और प्राइवेट टैक्सियाँ भी उपलब्ध हैं। सभी पर्यटक दीमापुर तक आते हैं और आगे की यात्रा टैक्सियों द्वारा पूरी करते हैं।
दीमापुर शहर की भीतरी सड़कें खास ठीक नहीं क्योंकि उपेक्षित राज्य होने के कारण रास्तों की मरम्मत संभवतः कभी की ही न गई होगी। लेकिन हॉर्नबिल फेस्टीवल के चलते दीमापुर से कोहीमा तक का रास्ता बहुत ही सुंदर और शानदार बनाया गया है जिस कारण डेढ़ -दो घंटों में टैक्सी द्वारा कोहीमा पहुँचा जा सकता है। यहाँ सड़कों के किनारे लोकल फलों की दुकानें दिखाई देती हैं। मीठे और सस्ते अनन्नास का हमने भरपूर स्वाद लिया। यहाँ लंबे -लंबे अनन्नास काटकर, मसाले लगाकर एक पतली बाँस की सलाख उसमें ठूँस देते हैं जिससे इसे खाने में सुविधा हो जाती है। हमने बचपन को याद करते हुए इसका आनंद लिया।
हॉर्नबिल फेस्टीवल कोहिमा में आयोजित किया जाता है। कोहिमा से 12 किलोमीटर की दूरी पर किसामा नामक छोटा -सा कस्बा है जहाँ पिछले 22 वर्षों से उत्सवों का उत्सव हॉर्नबिल फेस्टीवल मनाया जाता आ रहा है।
यहाँ की आबादी ईसाई धर्म को मानती है। 2022 का वर्ष इस दृष्टि से भी महत्वपूर्ण रहा कि इस राज्य में ईसाई धर्म की नींव रखे 150 वर्ष पूरे हुए हैं। इसका भी हर्षोल्लास सुसज्जित शहर को देखकर लगाया जा सकता है। क्रिसमस इनका सबसे बड़ा त्योहार है।
हर भारतीय को नागालैंड आने से पूर्व ILP ( Internal line of permit) लेने की अनिवार्यता होती है। यह ऑनलाइन उपलब्ध है। अगर आप इस उत्सव का हिस्सा बनना चाहते हैं तो जुलाई के महीने में ही बुकिंग कर लें कारण ऑक्तूबर माह से सभी होटल और होम स्टे बुक हो जाते हैं। हमने सितंबर में बुकिंग की थी और हमें ऊँची कीमत भरनी पड़ी। पाँच हज़ार वाले कमरे पंद्रह हज़ार में बुक होते हैं। इससे बचा जा सकता है।
हमारी यात्रा पुणे से प्रारंभ हुई,दिल्ली होते हुए हम दीमापुर पहुँचे। लोग अपने शहरों से गुवाहाटी पहुँचकर भी रेल द्वारा दीमापुर पहुँच सकते हैं।
दीमापुर लकड़ी और बेंत से बननेवाले वस्तुओं के कुटीर उद्योगों का शहर है जो अपने आप में देखने लायक स्थान है। इसके आसपास कुछ गाँव भी हैं। इन गाँवों की महिलाएँ घर-घर में सुंदर, आकर्षक, टिकाऊ विविध प्रकार की टोकरियाँ, फल रखने के बास्केट और हाथ करघे पर कई प्रकार की वस्तुएँ बुनती हैं। इन्हें बनाने में बहुत समय लगता है। यह इस क्षेत्र का सबसे बड़ा उद्योग है। हॉर्नबिल फेस्टीवल के दौरान बड़ी मात्रा में इन वस्तुओं और बेंत के फर्नीचर आदि की बिक्री होती है। हम इन्हीं गाँवों को देखना चाहते थे। हम जब गाँवों में पहुँचे तो तैयार माल हॉर्नबिल फेस्टीवल के लिए पैक किए जा रहे थे।
दीमापुर के बाज़ार में घूमने पर ही यहाँ के लोगों के खानपान के तौर – तरीकों से हम परिचित हुए। नागा जाति के लोग दुबले-पतले तथा कद के छोटे होते हैं। शारीरिक श्रम तथा जलवायु के कारण हाई प्रोटीन डायट इनकी आवश्यकता होती है। इस कारण बाज़ार में आपको कई प्रकार के जीवित कीड़े, इल्लियाँ,रेशम कीड़े, मछलियाँ, मेंढक, टिड्डे, घोंघें, केंचुएँ,आदि दिखाई देंगे। साथ ही यहाँ के निवासी सुअर तथा कुत्ते के माँस का भी बड़ी मात्रा में सेवन करते हैं। इसे डेलिकेसी कहते हैं। कुत्ते का माँस होटलों में नहीं दिए जाते परंतु सुअर का माँस बहुप्रचलित है। यह उनका भोजन है अतः उसका सम्मान करना हम सबका धर्म है।
हम दो सखियाँ शाकाहारी हैं, हमें शाकाहारी भोजन आसानी से ही प्राप्त हुए हैं। लोग अफवाह फैलाते हैं कि शाकाहारी भोजन की यहाँ व्यवस्था नहीं है। यह ग़लत है। हमें शाक सब्ज़ियाँ और कई प्रकार के फल बाज़ार में दिखाई दिए। होटलों ने उत्तम शाकाहारी भोजन, सूप,सलाद आदि की व्यवस्था की और हम दोनों सखियों ने इसका भरपूर आनंद लिया।
यहाँ के लोग भात खाना पसंद करते हैं। भोजन में मसाले के रूप में कई जड़ी-बूटियों तथा शाक का उपयोग करते हैं। यहाँ शराब की दुकानें नहीं हैं। यहाँ के लोग घर -घर में राइस बीयर बनाते हैं। यह उनकी बहुप्रचलित मदिरा है।
तीन दिन दीमापुर में रहने के बाद हम लोगों ने खोनोमा होते हुए कोहिमा जाने का फैसला लिया।
खोनोमा एक छोटा – सा गाँव है जिसे एशिया का ग्रीनेस्ट विलेज कहा जाता है। वास्तव में यहाँ रहनेवाले गाँव वासी इस बात से वाकिफ़ हैं और वे अपने गाँव को बहुत साफ़ -सुथरा रखते हैं। जगह -जगह पर बेंत से बने कूड़ेदान के रूप में टोकरियाँ रखी दिखाई दी। इस गाँव को देखने के लिए बड़ी संख्या में लोग आते हैं जिस कारण यहाँ एक गाइड सेंटर भी खोला गया है, जहाँ पर प्रति सदस्य दो सौ रुपये देकर पैंतालीस मिनट में पूरा गाँव चलकर दिखाए जाने की व्यवस्था की गई है। गाँव में तीन हज़ार लोग रहते हैं। सभी ईसाई धर्म को मानते हैं। यह अंग्रेज़ों की देन है। आदिवासियों को वे अपने धर्म का जामा पहना कर गए और वे अपनी प्राकृतिक पूजा-पाठ से विमुख हो गए। खैर यहाँ धर्मों पर विवाद या झगड़े नहीं। यहाँ एक विशाल गिरिजाघर है और सभी उत्साह से क्रिसमस मनाते हैं। इस छोटे से गाँव में छह पाठशालाएँ हैं। शाम होते होते चार बजे बादल नीचे उतर आए और हरियाली से भरे जंगलों के पेड़ पौधों को ओस की बूँदों से सजाने लगे। यहाँ चार साढ़े चार तक अंधकार हो जाता है। ठीक उसी तरह यहाँ प्रातः भी साढ़े चार बजे सूर्यदेव दर्शन देते हैं। यहाँ से आगे हम छह किलोमीटर की दूरी पर कोहिमा पहुँचे।
कोहिमा छोटा सा शहर है, यहाँ खास दर्शनीय स्थल नहीं है। सुभाषचंद्र बोस इस शहर में कभी रहे थे और नागाओं का उन्हें साथ मिला था,इस इतिहास का वहाँ कहीं उल्लेख नहीं है। इस बात का हमें बहुत दुख हुआ। यहाँ एक विशाल वॉर सेमिट्री है जहाँ ब्रिटिश सैनिकों के कब्र बने हुए हैं। पर्यटक इस स्थल को देखने जाते हैं। यहाँ दुकानें सात बजे तक खुल जाती है और चार बजे तक सब बंद भी कर दिए जाते हैं।
अर्ली टू बेड,अर्ली टू राइज़ यहाँ का मूल मंत्र है। लोग स्वस्थ,परिश्रमी तथा हँसमुख हैं।
हमें पूरे पर्यटन के दौरान एक भी भिखारी नज़र नहीं आया। यह एक बहुत बड़ी बात है। यहाँ आज भी संयुक्त परिवार की प्रथा है। घर के बड़े बूढ़ों का सम्मान सभी करते हैं। बुजुर्ग अपने घर के छोटे बच्चों के साथ काफी समय व्यतीत करते हैं।
हॉर्नबिल फेस्टीवल इस राज्य का आकर्षण बिंदु है, सभी वस्तुएँ बहुत कीमती हो जाती हैं। पाँच -छह किलोमीटर की यात्रा के लिए पाँचसौ रुपये लोकल टैक्सियाँ लेती हैं।
यहाँ मेरू,उबेर या ओला टैक्सियाँ नहीं चलतीं बल्कि काली-पीली टैक्सियाँ शेयर में चलती हैं। ये सुविधा सर्वत्र उपलब्ध है। यही लोकल ट्रान्सपोर्ट है। सड़कें पहाड़ी और संकरी हैं जिस कारण छोटी गाड़ियाँ बहुसंख्यक हैं। यहाँ गाड़ी पर कैरियर लगाने की इज़ाज़त नहीं है।
हॉर्नबिल फेस्टीवल
1 दिसंबर से यह पर्व प्रारंभ हुआ। पर्व प्रारंभ होने के कई माह पूर्व तैयारी शुरू होती है। यहाँ हर नागा आदिवासी अपने तौर-तरीके और खानपान की व्यवस्था के साथ अपने आवास की व्यवस्था का रेप्लिका प्रस्तुत करता है इसे मोरॉन्ग कहते हैं। इस वर्ष 17 प्रजातियों में से छह प्रजातियों ने हिस्सा नहीं लिया है। ये छह प्रजातियाँ मुख्य नागालैंड राज्य से अलग होने की माँग रखते हैं।
किसामा में पहुँचकर पर्यटक नागा जातियों के मोरॉन्ग पर जाकर समय व्यतीत कर सकते हैं। उनके साथ बातचीत कर तस्वीरें खींच सकते हैं। उनके भोजन का आनंद ले सकते हैं। वस्त्र तथा आभूषण भी खरीद सकते हैं। नागा अत्यंत मिलनसार जाति हैं। वे पर्यटकों के साथ समय बिताना भी पसंद करते हैं।
इस वर्ष देश के उपराष्ट्रपति श्री धनकड़ जी सपत्नीक इस उत्सव के लिए उपस्थित हुए। शाम को चार बजे कार्यक्रम प्रारंभ हुआ। विशाल मैदान के एक तरफ मंच बना हुआ है तथा तीनों ओर पर्यटकों के बैठने की सुविधाजनक व्यवस्था है। स्वच्छ शौचालय की भी व्यवस्था है। ऑस्ट्रेलिया, फ्रांस और इंग्लैंड के राजनीतिक उच्च पदाधिकारी तथा राज्यपाल इस वर्ष आमंत्रित थे। शहर के प्रमुख चर्च के मुख्य पादरी ने सभी को शुभकामनाएँ दी तथा प्रार्थना से कार्यक्रम प्रारंभ हुआ। नागालैंड के मुख्यमंत्री, पर्यटन विभाग के मंत्री, मान्यवर धनकड़ जी तथा विदेश से आए आमंत्रित सदस्यों ने अपने विचार प्रकट किए।
1 तारीख को कुछ ही नृत्य प्रस्तुत किए गए। एक नागा छात्रा ने गिटार पर राष्ट्रगीत बजाकर सबको मंत्र मुग्ध कर दिया।
2 तारीख सुबह 10 बजे से दर्शक एकत्रित होने लगे। 11.30 बजे तक विविध नागा प्रजातियों ने अपने नृत्य प्रदर्शन किए। फिर मोरॉन्ग दर्शन तथा नागा भोजन के लिए 1.30 बजे तक समय दिया गया। फिर कुछ नृत्य प्रदर्शन हुए और फिर शाम को 3बजे से अंग्रेज़ी और बॉलीवुड संगीत पर वहाँ के निवासियों ने नृत्य प्रदर्शित किए। इस तरह दस दिन कार्यक्रम चलते रहे।
नागाप्रजातियों के वस्त्र अत्यंत रंगीन होते हैं। लाल, काला और सफेद मूल रंग हैं। इन कपड़ों की बुनाई भी अलग तरीके से होती है। हर प्रजाति के स्त्री -पुरुष के सिर पर मुकुट जैसा पहना जाता है इसे हेडगीयर कहते हैं। हरेक के अस्त्र-शस्त्र अलग होते हैं। उनके गीत और उनकी पुकार भी अलग होती है। वे नृत्य प्रस्तुत करते समय खूब आवाज़ करते हुए आते हैं। वे नंगे पैर चलते हैं तथा पुरुषों का ऊर्ध्वांग वस्त्रहीन होता है। स्त्री -पुरुष के वस्त्र घुटने तक ही होते हैं। कुछ प्रजातियाँ अपने पैरों पर पेंटिंग करते हैं। सभी खूब आभूषण पहनते हैं।
हर प्रजाति अत्यंत अनुशासित दिखाई देती है।
प्रतिदिन जो नृत्य प्रस्तुत किए गए उनमें उनके जीवन के विविध पहलुओं को दर्शाया गया।
फसल काटे जाने, खलिहान में रखे जाने की कथा नृत्य द्वारा प्रस्तुत की गई।
नवविवाहित दंपत्ति विवाह में आए मेहमानों को उपहार देकर विदा करते हैं इस प्रचलन को नृत्य के रूप में प्रस्तुत किया गया।
अपने अस्त्र-शस्त्र का प्रयोग युद्धाभ्यास में किस तरह उपयोग में लाया जाता था तथा वॉर क्राय कैसी ध्वनि होती थी यह भी दर्शाया गया। कुल मिलाकर यह आनंददायी उत्सव रहा है।
आज नागालैंड के आदिवासी शिक्षित हैं, वे अलग अलग जगह पर नौकरी करते हैं। इसकारण अलग -अलग प्रकार के नृत्य के लिए अलग अलग अकादमी बनी हुई हैं जहाँ आज के छात्र-छात्राएँ नृत्य सीखने जाते हैं।
यहाँ की लिखित भाषा अंग्रेज़ी है। बाकी सबकी बोलियाँ अलग हैं। यहाँ के निवासी ऊँची आवाज़ में बात नहीं करते। पर्यटकों का सम्मान करते हैं तथा स्वभाव से अत्यंत मिलनसार होते हैं।
हमारी आगे आसाम और मेघालय की यात्रा तय थी इसलिए तीन दिन हम दीमापुर में रहे फिर तीन दिन हमने हॉर्नबिल फेस्टीवल का आनंद लिया और फिर अगली यात्रा के लिए रवाना हुए। अगली यात्रा काजीरंगा, शीलाँग, चेरापूंजी आदि स्थानों की ओर थी। अतः हम पुनः दीमापुर लौट आए। एक रात रहकर अगली यात्रा प्रारंभ की।
☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️
क्योटो इथे एक बौद्ध मंदिर पाहिले. जगातले सगळ्यात मोठे लाकडी बांधकाम असे त्याचे वर्णन केले जाते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सहाव्या शतकात तिथे भारतातून नागार्जुन आणि वसुबंधू नावाचे बौद्ध भिक्षू आले होते, असे तिथे लिहिले होते. नंतर बुद्धाचे १००० सोनेरी पुतळे असलेले व मधोमध भगवान बुद्धाची शांत भव्य मूर्ती असलेले देऊळ पाहिले. त्या मूर्तीपुढील पुतळ्यांची नावे इंद्र, गंधर्व, नारायण, विष्णू, लक्ष्मी अशी आहेत पण त्यांचे चेहरे विचित्र दिसतात. एका पॅगोडामध्ये छताला भव्य सोनेरी कमळांची नक्षी आहे. पाऊस सुरू झाल्याने उरलेले क्योटो दुसऱ्या दिवशी बघण्याचे ठरले.
क्योटो रेल्वे स्टेशनवर जायला म्हणून एका बसमध्ये चढलो. पण सकाळी जिथे उतरलो होतो ते स्टेशन कुठे दिसेना. कसे दिसणार? कारण आम्ही अगदी विरुद्ध दिशेच्या बसमध्ये बसलो होतो. आमची काहीतरी गडबड झाली आहे हे आजूबाजूच्या जपानी लोकांच्या लक्षात आले पण भाषेची फार अडचण! अगदी थोड्या जणांनाच इंग्रजी समजते. पण तत्परतेने मदत करण्याची वृत्ती दिसली. एका जपानी माणसाला थोडेफार समजले की आम्हाला क्योटो स्टेशनवर जायचे आहे. बस, डेपोमध्ये गेल्यावर त्याने खाणाखुणा करून सांगितल्याप्रमाणे आम्ही धावत पळत त्याच्या मागे गेलो. त्याने आम्हाला योग्य बसमध्ये बसवून दिले.
दुसऱ्या दिवशी क्योटोला जाऊन गोल्डन टेम्पलला गेलो. एका तळ्याच्या मध्यावर संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढविलेला पॅगोडा आहे. सभोवतालच्या तळ्यात त्याचे सोनेरी प्रतिबिंब चमकत होते. चारी बाजूंनी झाडीने वेढलेल्या पर्वतराजीत राजघराण्याचे हे देऊळ आहे .नंतर जवळच असलेल्या सिल्व्हर टेम्पलला गेलो. असंख्य फुलझाडांच्या आणि शिस्तीने राखलेल्या झाडांमध्ये हे देऊळ आहे .डोंगरातून वरपर्यंत जाण्यासाठी वृक्षराजींनी वेढलेल्या पाऊलवाटा आहेत. स्वच्छ झऱ्यांमधून सोनेरी, पांढरे ,तांबूस रंगांचे मासे सुळकन इकडे तिकडे पळत होते.
जेवण आटोपून नारा इथे जाण्यासाठी छोट्या रेल्वे गाडीत बसलो. स्वच्छ काचांची छोटी, सुबक गाडी छोट्या छोट्या गावांमधून चालली होती. हिरवी, पोपटी डोलणारी शेती, आखीवरेखीव भाजीचे मळे, त्यात मन लावून कामं करणारी माणसं, टुमदार घरं, घरापुढे छान छान मोटारगाड्या, रंगसंगती साधून जोपासलेला बगीचा असे चित्रातल्यासारखे दृश्य होते. नारा येथील हरीण पार्क विशेष आकर्षक नव्हते. जवळच असलेल्या लाकडी, भव्य तोडाजी टेम्पलमध्ये ७० फूट उंचीची भगवान बुद्धाची दगडी मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला तशाच भव्य पंचधातूच्या, पण सोनेरी मुलामा दिलेल्या बुद्धमूर्ती आहेत.देवळाचे प्रचंड लाकडी खांब दोन कवेत न मावणारे आहेत . जुन्या पद्धतीची जपानी बाग पाहिली. झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या मध्यावर अगदी आपल्या कोकणातल्यासारखा लाकडी रहाट फिरत होता. पूर्वी ही रहाटाची शक्ती वापरून धान्य दळण्यासाठी त्याचा उपयोग करीत असत. बागेमध्ये अनंत व जास्वंदीची झाडे सुद्धा होती.
आज मियाजिमा व हिरोशिमा इथे जायचे होते. शिनकानसेनने म्हणजेच बुलेट ट्रेनने हिरोशिमा इथे उतरून मियाजिमा इथे गेलो. तिथून छोट्या बोटीने जाऊन पाण्यावर तरंगणारा पाच मजली शिंटो पॅलेस पाहिला.हे छोटेसे बेट पर्वतराजींनी वेढलेले आहे. त्यावरील घनदाट वृक्ष फॉल सीझनच्या रंगाने सजू लागले होते.
क्रूझने परत मिआजिमा स्टेशनला येऊन जपान रेल्वेने हिरोशिमाला आलो. जगातला पहिला अणुबॉम्ब जिथे टाकला गेला ते ठिकाण! मानवी क्रौर्याचे अस्वस्थ करणारे स्मारक! अगदी खरं सांगायचं तर तेथील म्युझियम, तिथे दाखवत असलेला माहितीपट आम्ही फार वेळ बघू शकलो नाही. लोकांचे आक्रंदन, जळणारे देह, कोसळणाऱ्या इमारती यातील काहीही फार वेळ बघवत नाही. मानवतेवर कलंक लावणारे असे ते विदारक चित्र पाहून डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात. मनुष्य इतका क्रूर बनू शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. तिथल्या लहान मुलांच्या स्मारकाजवळ काचेच्या मोठ्या चौकोनी पेट्या ठेवल्या होत्या. अणुबॉम्बला विरोध आणि जागतिक शांततेला पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण तिथे ठेवलेल्या पांढऱ्याशुभ्र कागदांचे पक्षांचे आकार करून त्या पेट्यांमध्ये टाकायचे. आम्हीही तिथे नाव पत्ता लिहून आमचा शांततेला पाठिंबा दर्शवीत कागदाचे काही क्रेन्स करून त्या काचेच्या पेटीत टाकले. तत्परता म्हणजे एवढी, की आम्ही जपानहून परत येण्याच्या आधीच आम्ही शांततेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल हिरोशिमाच्या मेयरचे आभारदर्शक पत्र घरी येऊन पडले होते.
आज हिमेजी कॅसल बघायला जायचे होते. कोबेच्या सान्योमिया स्टेशनवरून हिमेजीला जाताना अकाशी येथील सस्पेन्शन ब्रिज पहिला.अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसकोच्या गोल्डन ब्रीजपेक्षासुद्धा हा ब्रीज लांबीने जास्त आहे. हिमेजी स्टेशनला उतरून तिथला भव्य, संपूर्ण लाकडी राजवाडा बघायला गेलो. त्याच्या बाहेरील प्रांगणात बोन्सायचे आणि सुंदर फुलांचे मोठे प्रदर्शन भरले होते. मोठ्या वृक्षांची हुबेहूब छोटी प्रतिकृती करण्याची ही जपानी कला! अगदी छोट्या, सुंदर आकारांच्या कुंड्यांमधून वाढवलेले छोटे वृक्ष, त्यांना आलेली छोटी फळं, छोटी जंगलं, दगडातील डोंगरातून वाहणारे झरे सारे पाहात रहावे असे होते. डेलिया, जरबेरा, सूर्यफुलांचे विविधरंगी ताटवे होते.
आज सकाळी कोबेमध्येच घराजवळील रोपवे स्टेशनला जायचे होते. आम्ही राहात होतो, तिथून दहा मिनिटांच्या अंतरावर ओरिएंटल हॉटेल नावाची भव्य वास्तू होती. हॉटेलमधल्याच रस्त्याने बुलेट ट्रेनच्या शिनकोबे स्टेशनला जाण्याचा मार्ग होता. हॉटेलच्या लॉबीमध्ये दोन्ही बाजूला फर्निचर, कपडे, खेळण्यांची आकर्षक दुकाने होती. शिनकोबे क्लब होता. लहान मुलांना खेळायची जागा होती. छोटे पब, रेस्टॉरंट होते. जमिनीखालील दोन मजल्यांवर ग्रोसरी व फळे फुले यांची दुकाने होती. तिथून भुयारी रेल्वेच्या स्टेशनला जाता येत होते आणि आमचा रोपवेला जाण्याचा मार्ग हॉटेलच्या रस्त्यामधून एका बाजूला होता. एखाद्या जागेचा जास्तीत जास्त, अत्यंत सोयीस्कर व नेटका उपयोग कसा करून घ्यायचा याचे हे एक उत्तम उदाहरण वाटले.
रोपवेने डोंगरमाथ्यावर गेलो.फुजिसान म्हणजे फुजियामा पर्वत सोडला तर इथे कुठचाही डोंगर उघडा- बोडका नाहीच. वृक्षांची लागवड करून, ते जोपासून सारे हिरवे राखले आहे. डोंगर माथ्यावरील हर्ब पार्कमध्ये औषधी वनस्पती, भाज्या वाढविल्या आहेत. त्यात गवती चहा, पुदिना, तुळस, माका, ब्राह्मी, आले, मिरी वगैरे झाडे जोपासली होती. मोठ्या काचगृहातून केळीची लागवड केली होती. कारंजी ,झरे ,फुलांचे गालिचे होते. डोंगर माथ्यावरून साऱ्या कोबे शहराचा नजारा दिसत होता.
☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️
सूर्यदेवांची उबदार किरणं पृथ्वीवर जिथे पहिली पावलं टाकतात तो देश जपान! किमोनो आणि हिरव्या रंगाच्या चहाचा देश जपान! हिरोशिमाच्या अग्नीदिव्यातून झळाळून उठलेला देश जपान! साधारण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी या जपानला जायचा योग आला. आम्ही मुंबईहून हॉंगकॉंगला विमान बदलले आणि चार तासांनी ओसाका शहराच्या कंसाई विमानतळावर उतरलो. आधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा आविष्कार इथूनच पहायला मिळाला. जपानने कंसाई हे मानवनिर्मित कृत्रिम बेट भर समुद्रात बांधले आहे व त्यावर भलामोठा विमानतळ उभारला आहे. हे कृत्रिम बेट सतत थोडे थोडे पाण्याखाली जाते आणि दरवर्षी हजारो जॅक्सच्या सहाय्याने ते वर उचलले जाते. विमानातून उतरून कस्टम्स तपासणीसाठी दाखल झालो. शांत, हसऱ्या चेहऱ्यांच्या जपानी मदतीमुळे विनासायास त्या भल्यामोठ्या विमानतळाबाहेर आलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. आमचे मित्र श्री.अरुण रानडे यांच्याबरोबर टॅक्सीने त्यांच्या घरी कोबे इथे जायचे होते.
त्या मोठ्या टॅक्सीच्या चारही बाजूंच्या स्वच्छ काचांमधून बाहेरची नवी दुनिया न्याहाळत चाललो होतो. एकावर एक असलेले चार-पाच एक्सप्रेस हायवे झाडांच्या, फुलांच्या, दिव्यांच्या आराशीने नटले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या आकाराच्या दहा मजली इमारती होत्या. त्यांच्या पॅसेजमध्ये एकसारखे, एकाखाली एक सुंदर दिवे लागले होते. असं वाटत होतं की, एखाद्या जलपरीने लांबच लांब रस्त्यांची पाच पेडी वेणी घातली आहे. त्यावर नाना रंगांच्या पानाफुलांचा गजरा माळला आहे. दोन्ही बाजूंच्या दिव्यांच्या माळांचे मोत्याचे घोस केसांना बांधले आहेत. कंसाई ते कोबे हा शंभर मैलांचा, सव्वा तासाचा प्रवास रस्त्यात एकही खड्डा नसल्याने अलगद घरंगळल्यासारखा झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून निघालो. अनघा व अरुण रानडे यांचे कोबेमधले घर एका डोंगराच्या पायथ्याशी पण छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर होते. तिथून रेल्वे व बस स्टेशन जवळपासच होते. आम्ही आसपासची दुकाने, घरे, बगीचे न्याहाळत बसस्टॅंडवर पोहोचलो. कोबे हिंडण्यासाठी बसचा दिवसभराचा पास काढला. बसने एका मध्यवर्ती ठिकाणी उतरून दाईमारू नावाचे चकाचक भव्य शॉपिंग मॉल तिथल्या वस्तूंच्या किमतींचे लेबल पाहून फक्त डोळ्यांनी पाहिले. नंतर दुसऱ्या बसने मेरीकॉन पार्कला गेलो. बरोबर आणलेले दुपारचे जेवण घेऊन पार्कमध्ये ठेवलेली चारशे वर्षांची जुनी भव्य बोट पाहिली. संध्याकाळी पाच वाजताच इथे काळोख पडायला लागतो. समुद्रावर गेलो. तिथून कोबे टॉवर व समुद्राच्या आत उभारलेले सप्ततारांकित ओरिएंटल हॉटेल चमचमतांना दिसत होते. नकाशावरून मार्ग काढत इकॉल या हॉटेलच्या अठराव्या मजल्यावर जाऊन तिथून रात्रीचे लखलखणारे कोबे शहर, कोबे पोर्ट ,कोबे टॉवर पाहिले. त्यामागील डोंगरांची रांग मुद्दामहून वृक्ष लागवड करून हिरवीगार केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे सारे दृश्य विलोभनीय वाटत होते.
आज रविवार.क्योटो इथे जायचे होते. मुंबईहून येतानाच आम्ही सात दिवसांचा जपानचा रेल्वे पास घेऊन आलो होतो. भारतीय रुपयात पैसे देऊन हा पास मुंबईत ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, चर्चगेट इथे मिळतो. ही सोय फार छान आहे. जेव्हा आपण जपान रेल्वेने पहिला प्रवास करू त्यादिवशी हा पास तिथल्या स्टेशनवर एंडॉर्स करून घ्यायचा. त्या दिवसापासून सात दिवस हा पास जपान रेल्वे, बुलेट ट्रेन व जपान रेल्वेच्या बस कंपनीच्या बसेसनासुद्धा चालतो. आज बुलेट ट्रेनचा पहिला प्रवास आम्हाला घडणार होता. घरापासून जवळच असलेल्या शिनकोबे या बुलेट ट्रेनच्या स्टेशनवर पोहोचलो. रेल्वे पास दाखवून क्योटोच्या प्रवासाची स्लीप घेतली. स्टेशनवर बुलेट ट्रेन सटासट येत जात होत्या. आपल्याला दिलेल्या कुपनवर गाडीची वेळ व डब्याचा क्रमांक दिलेला असतो.तो क्रमांक प्लॅटफॉर्मवर जिथे लिहिलेला असेल तिथे उभे राहण्याची खूण केलेली असते. तिथे आपण सिंगल क्यू करून उभे राहायचे. आपल्या डब्याचा दरवाजा बरोबर तिथेच येतो. दरवाजा उघडल्यावर प्रथम सारी उतरणारी माणसे शांतपणे एकेरी ओळीतच उतरतात. तसेच आपण नंतर चढायचे व आपल्या सीट नंबरप्रमाणे बसायचे. नो हल्लागुल्ला! गार्ड प्रत्येक स्टेशनला खाली उतरून प्रवासी चढल्याची खात्री करून घेऊन मगच ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे एका बटनाने लावतो. नंतर शिट्टी देउन, ‘ सिग्नल पाहिला’ याची खूण करून गाडी सुरू करण्याची सूचना ड्रायव्हरला देतो. सारे इतक्या शिस्तीत, झटपट व शांतपणे होते की आपणही अवाक होऊन सारे पाहात त्यांच्यासारखेच वागायला शिकतो. या सर्व ट्रेन्समधील सीट्स आपण ज्या दिशेने प्रवास करणार त्या दिशेकडे वळविण्याची सहज सुंदर सोय आहे. ताशी २०० किलोमीटरहून अधिक वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनचा प्रवास म्हणजे एक चित्तथरारक अनुभव होता.( या गतीने मुंबईहून पुणे एका तासाहून कमी वेळात येईल.) तिकीट चेक करायला आलेला टी.सी. असो अथवा ट्रॉलीवरून पदार्थ विकणारी प्रौढा असो, डब्यात येताना व डब्याबाहेर जाताना दरवाजा बंद करायचा आधी कमरेत वाकून प्रवाशांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.
☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग-4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
साद उत्तराखंडाची
केदारनाथहून जोशीमठ या ( त्या वेळेच्या )रम्य ठिकाणी मुक्काम केला. इथे श्री लक्ष्मी नृसिंहाचे सुंदर देऊळ आहे. आम्हाला नेमका नृसिंह जयंतीच्या दिवशी दर्शनाचा लाभ झाला या योगायोगाचे आश्चर्य वाटले व आनंद झाला. जोशीमठहून एक रस्ता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जातो. गढवाल हिमालयातील ही विविध फुलांची जादूई दुनिया ऑगस्ट महिन्यात बघायला मिळते. लक्ष्मणप्रयाग किंवा गोविंदघाट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावरून गेलं की घांगरिया इथे मुक्काम करावा लागतो. नंतर खड्या चढणीचा रस्ता आहे. वाटेत पोपटी कुरणं आहेत. हिमधवल शिखरांच्या पार्श्वभूमीवर निळी, पिवळी, गुलाबी, जांभळी, पांढरी अशा असंख्य रंगांची, नाना आकारांची अगणित फुलं मुक्तपणे फुलत असतात. घांगरीयाहून हेमकुंड इथे जाता येते. इथे गुरुद्वारा आहे. मोठा तलाव आहे. आणि अनेकानेक रंगांची, आकारांची फुले आहेत. लक्षावधी शिख यात्रेकरू व इतर अनेक हौशी साहसी प्रवासी, फोटोग्राफर ,निसर्गप्रेमी ,वनस्पती शास्त्रज्ञ या दोन्ही ठिकाणांना आवर्जून भेट देतात.
जोशीमठ इथून रुद्रप्रयागवरून बद्रीनाथचा रस्ता आहे. रुद्रप्रयागला धवलशुभ्र खळाळती अलकनंदा आणि संथ निळसर प्रवाहाची मंदाकिनी यांचा सुंदर संगम आहे. बद्रीनाथचा रस्ता डोंगर कडेने वळणे घेत जाणारा, दऱ्याखोऱ्यांचा आणि हिमशिखरांचाच आहे. आत्तापर्यंत अशा प्रवासाची डोळ्यांना, मनाला सवय झाली असली तरी बद्रीनाथचा प्रवास अवघड, छाती दडपून टाकणारा आहे. अलकनंदा नदीच्या काठावरील बद्रीनाथाचे म्हणजे श्रीविष्णूचे मंदिर जवळ जवळ अकरा हजार फुटांवर आहे. आदि शंकराचार्यांनी नवव्या शतकात या मंदिराची स्थापना केली असे सांगितले जाते. धो धो वाहणाऱ्या अलकनंदेच्या प्रवाहाजवळच अतिशय गरम वाफाळलेल्या पाण्याचा स्रोत एका कुंडात पडत असतो. मंदिरात काळ्या पाषाणाची श्रीविष्णूंची सुबक मूर्ती आहे. तसेच कुबेर, गणेश, लक्ष्मी, नरनारायण अशा मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर पॅगोडा पद्धतीचे आहे व ते सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेले आहे. मूर्तीच्या दोन हातात शंखचक्र आहे व दोन हात जोडलेल्या स्थितीत आहेत. मूर्तीला सुवर्णाचा मुखवटा आहे. डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर लाकडी असून दरवर्षी मे महिन्यात त्याला रंगरंगोटी करतात. नवव्या शतकात आदि शंकराचार्यांनी बांधलेल्या या मंदिराचे तेराव्या शतकात गढवालच्या महाराजांनी पुनर्निर्माण केले. या मंदिराच्या शिखरावरचे सोन्याचे पत्रे इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी चढविले असे सांगितले जाते.
आम्ही पहाटे उठून लॉजवर आणून दिलेल्या बदलीभर वाफाळत्या पाण्याने स्नान करून मंदिराकडे निघालो. बाहेर कडाक्याची थंडी होती. थोडे अंतर चाललो आणि अवाक् होऊन उभे राहिलो. निरभ्र आकाशाचा घुमट असंख्य चांदण्यांनी झळाळत होता. पर्वतांचे कडे तपश्चर्या करणाऱ्या सनातन ऋषींसारखे भासत होते. त्यांच्या हिमशिखरांवरून चांदणे ओघळत होते. अवकाशाच्या गाभाऱ्यात असीम शांतता होती. नकळत हात जोडले गेले. डोळ्यातून पाणी वाहू लागले. आत्तापर्यंतच्या प्रवासाची दगदग,श्रम साऱ्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मनात आलं की देव खरंच मंदिरात आहे की निसर्गाच्या या अनाघ्रात, अवर्णनीय, अद्भुत सौंदर्यामध्ये आहे?
मंदिरात गुरुजींनी हातावर लावलेल्या चंदनाचा गंध अंतर्यामी सुखावून गेला. शेषावर शयन करणाऱ्या, शांताकार आणि विश्वाचा आधार असणाऱ्या पद्मनाभ श्री विष्णूंना हात जोडताना असं वाटलं की,
या अमूर्ताची संगत सोबत
जीवनगाण्याला लाभू दे
गंगाप्रवाहात उजळलेली श्रद्धेची ज्योत
आमच्या मनात अखंड तेवू दे
हा आमचा प्रवास जवळजवळ वीस बावीस वर्षांपूर्वीचा! त्यानंतर दहा वर्षांनी हे व माझे एक मेहुणे पुन्हा चारधाम यात्रेला गेले. माझा योग नव्हता. परत आल्यावर यांचे पहिले वाक्य होते, ‘आपण जो चारधामचा पहिला प्रवास केला तोच तुझ्या डोळ्यापुढे ठेव. आता सारे फार बदलले आहे. बाजारू झाले आहे. प्लास्टिकचा भयानक कचरा, वाढती अस्वच्छता, कर्णकटू संगीत, व्हिडिओ फिल्म, वेड्यावाकड्या, कुठेही, कशाही उगवलेल्या इमारती यांनी हे सारे वैभव विद्रूप केले आहे’. त्यावेळी कल्पना आली नाही की ही तर साऱ्या विनाशाची नांदी आहे.
यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये केदारनाथला महाप्रलय झाला. झुळझुळणाऱ्या अवखळ मंदाकिनीने उग्ररूप धारण केले. हजारो माणसे मृत्युमुखी पडली. शेकडो माणसे, जनावरे वाहून गेली. नियमांना धुडकावून बांधलेल्या मोठमोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, जमीनदोस्त झाल्या. मंदाकिनीच्या प्रकोपात सोनप्रयाग, गौरीकुंड, रामबाडा इत्यादी अनेक ठिकाणांचे नामोनिशाण उरले नाही. अनेकांनी, विशेषतः लष्करातील जवानांनी प्राणांची बाजी लावून अनेकांना या महाप्रलयातून सुखरूप बाहेर काढले.
मंदाकिनी अशी का कोपली? या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वतःकडेच बोट दाखवावे लागेल. मानवाचा हव्यास संपत नाही. निसर्गाला ओरबाडणे थांबत नाही. शेकडो वर्षे उभे असलेले, जमिनीची धूप थांबविणारे ताठ वृक्ष निर्दयपणे तोडताना हात कचरत नाहीत .निसर्गनियमांना धाब्यावर बसून नदीकाठांवर इमारतींचे आक्रमण झाले. त्यात प्लास्टिकचा कचरा, कर्णकर्कश आवाज, अस्वच्छता यांची भर पडली. किती सोसावे निसर्गाने?
उत्तराखंडाला उत्तरांचल असंही म्हणतात. निसर्गाने आपल्याला बहाल केलेले हे अनमोल दैवी उत्तरीय आहे. या पदराने भारताचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण केले आहे. तीव्र थंडीपासून बचाव केला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आपल्याला बहाल केला आहे. उत्तरांचलचे प्राणपणाने संरक्षण करणे हे आपले उत्तरदायित्व आहे.
जलप्रलयानंतर असे वाचले होते की, एक प्रचंड मोठी शिळा गडगडत येऊन केदारनाथ मंदिराच्या पाठीशी अशी टेकून उभी राहिली की केदारनाथ मंदिराचा चिरासुद्धा हलला नाही. मंदिर आहे तिथेच तसेच आहे. फक्त तिथे आपल्याला पोहोचवणारी वाट, तो मार्ग हरवला आहे. नव्हे, नव्हे. आपल्या करंटेपणाने आपणच तो मार्ग हरवून बसलो आहोत .सर्वसाक्षी ‘तो’ म्हणतो आहे,’ तुम्हा मानवांच्या कल्याणासाठी ‘मी’ इथे जागा आहे. तुम्ही कधी जागृत होणार?
☆ मी प्रवासिनी क्रमांक 41 – भाग-3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
साद उत्तराखंडाची
हरिद्वारहून चारधाम यात्रेची सुरुवात झाली. गढवाल निगमच्या बसने हरिद्वारपासून हनुमान चट्टीपर्यंत गेलो . तिथून जानकी चट्टीपर्यंत जंगलातील खूप चढावाचा रस्ता चढायचा होता.( आता बसेस जानकी चट्टीपर्यंत जातात .)दुपारी दोन अडीच वाजता आम्ही चढायला सुरुवात केली तेव्हा आकाश निरभ्र होतं. चार वाजता अकस्मात सारं बदलून गेलं .हां हां म्हणता चारी बाजूंनी काळे ढग चाल करून आले. गारांचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. थंडीने हृदय काकडू लागलं. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा दाट काळोख, वारा आणि पाऊस होता. डावीकडील दरीतून अंधार चिरत येणारा रोरावणार्या यमुनेचा आवाज जिवाचा थरकाप करीत होता. बरोबरच्या ग्रुपमधील कोण कुठे होते त्याचा पत्ता नव्हता. सारंच विलक्षण अद्भुत वाटत होतं. एका पहाडी माणसाने आम्हाला खूप मदत केली. ‘आस्ते चलो, प्रेमसे चलो, विश्वाससे चलो’ असे सांगत धीर दिला. रस्ता दाखविला. सोबत केली. वाटेत कुणी त्याचा गाववाला भेटला की दोघं एकमेकांना ‘जय जमुनामैया’ असं अभिवादन करीत. सर्वजण कसेबसे, थकूनभागून, संपूर्ण भिजून गढवाल निगमच्या जानकी चट्टीच्या निवासस्थानी आलो. कोणी कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. तिथल्या माणसाने जी खिचडी वगैरे दिली ती खाऊन ओल्या कपड्यातच कशीबशी उरलेली रात्र काढली. पहाटे लवकर उजाडलं. सूर्याच्या सोनेरी किरणांनी पर्वतांच्या माथ्यावरचे बर्फ सोन्यासारखे चमकू लागले .इतकं सगळं शांत आणि स्वच्छ होतं की कालचं वादळ ‘तो मी नव्हेच’ म्हणंत होतं.फक्त आजूबाजूला कोसळलेल्या वृक्षांवरून कालचा वादळाची कल्पना येत होती.
जानकी चट्टीहून यमुनोत्रीपर्यंतचा सहा- सात किलोमीटरचा रस्ता उभ्या चढणीचा, दरीच्या काठाने जाणारा आहे. हिरवेगार डोंगर, बर्फाच्छादित शिखरे आहेत.चालत किंवा घोड्यावरून अथवा दंडी म्हणजे पालखीतून किंवा कंडीतून जाता येते .कंडी म्हणजे आपण आसाममध्ये पाठीवर बास्केट घेऊन चहाची पाने खुडणाऱ्या बायका पाहतो तशाच प्रकारची निमुळती बास्केट असते. त्यात आपल्याला बसवतात आणि पाठीवर घेऊन ती शिडशिडीत ,काटक माणसे तो उभा चढ चढतात. या दुर्गम प्रदेशातील जीवन खडतर आहे. अज्ञान, गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांचे कष्टमय जीवन पर्यटकांवरच अवलंबून असतं.
यमुनोत्रीचे देऊळ बारा हजार फुटांवर आहे. निसर्गाचं आश्चर्य म्हणजे जिथे यमुनेचा उगम होतो, तिथेच गरम पाण्याचे कुंडसुद्धा आहे. त्यात तांदुळाची पुरचुंडी टाकली की थोड्यावेळाने भात शिजतो. अनेक भाविक हा प्रयोग करीत होते .अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत खूप यात्रेकरू इथे येतात. त्यानंतर बर्फवृष्टीमुळे मंदिर सहा महिने बंद असते.
यमुनोत्री ते गंगोत्री हा साधारण अडीचशे किलोमीटरचा रस्ता दऱ्यांच्या काठावरून नागमोडी वळणाने जातो. पहाडांना बिलगून चालणारी ही अरुंद वाट, पहाडातून खळाळत येणारे निर्मल, थंडगार पाण्याचे झरे ,लाल- जांभळ्या फुलांनी डवरलेले खोल दरीतले वृक्ष सारे हजारो वर्षांपूर्वी भगीरथाने गंगावतरणासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची आठवण करून देतात. यमुनोत्री व गंगोत्रीचा हा परिसर उत्तरकाशी जिल्ह्यात येतो. उत्तरकाशी हे एक नितांत रमणीय ठिकाण आहे. उत्तरकाशीमध्ये शिवाचे प्राचीन मंदिर आहे. इथले मॅग्नेलिया वृक्ष मंद मधूर सुवासाच्या, पांढऱ्या, तळहाताएवढ्या कमलांसारख्या फुलांनी डवरलेले होते.
गंगोत्री मंदिरापर्यंत बस जाते .बर्फाच्छादित शिखरे व गंगेचा खळाळणारा थंडगार प्रवाह इथे आहे. गंगेचा खरा उगम हा गंगोत्रीच्या वर २५ किलोमीटरवर गोमुख इथे आहे. अतिशय खडतर चढणीच्या या रस्त्यावरून काहीजण गोमुखाकडे चालत जात होते. तिथे प्रचंड अशा हिमकड्यातून भागिरथीचा( इथे गंगेला भागिरथी म्हटले जाते) हिमाच्छादित प्रवाह उगम पावतो.
गंगोत्रीहून गौरीकुंड इथे आलो. तिथे गरम पाण्याचे कुंड आहे. असंख्य भाविक त्यात स्नान करीत होते .तिथली अस्वच्छता पाहून आम्ही नुसते हात पाय धुवून केदारनाथकडे निघालो .गौरीकुंडापासूनचा १४ किलोमीटरचा चढ छोट्या घोड्यावरून ( पोनी ) पार करायचा होता. एका बाजूला पर्वतांचे उभे कातळकडे, निरुंद वाट आणि लगेच खोल दरी असा हा थोडा भीतीदायक पण परिकथेसारखा प्रवास आहे. खोल दरीतून मंदाकिनी नदीचा अवखळ हिमशुभ्र प्रवाह कधी वेडी- वाकडी वळणे घेत तर कधी उड्या मारत धावत होता. फार चढणीच्या वेळी घोड्यावरून उतरून थोडे पायी चालावे लागते. त्यावेळी पर्वतांच्या कपारीतून धावत येणारे धबधबे, झरे दिसतात. त्यांचे शुद्ध, मधुर, गार पाणी पिता येते. झऱ्याच्या पाण्याने निसरड्या झालेल्या अरुंद पाय वाटेवरून चालताना आजूबाजूचे उंच पर्वतकडे, हिरवी दाट वृक्षराजी ,अधूनमधून डोकावणारी हिमाच्छादित शिखरे, दरीच्या पलीकडच्या काठाला संथपणे चरणाऱ्या शेकडो गुबगुबीत मेंढ्यांचा कळप हे सारे नितळ गूढरम्य वातावरण आपल्याला या अनादी, अनंत, अविनाशी चैतन्याचा साक्षात्कार घडविते.
केदारनाथचे चिरेबंदी मंदिर साधारण ११००० फुटांवर आहे. इथे मंदाकिनी नदीचा उगम होतो. अशी कथा आहे की कुरुक्षेत्राची लढाई झाल्यानंतर पाचही पांडव पापक्षालन करण्यासाठी तीर्थयात्रा करीत होते. त्यांना पाहून भगवान शंकराने रेड्याचे रूप घेतले व आपले तोंड जमिनीत खुपसले. म्हणून इथले केदारनाथाचे लिंग नेहमीच्या शाळुंका स्वरूपात नसून फुगीर पाठीसारखे आहे. इथल्या महाद्वारापुढे नंदी आहे. नंदीच्या मागे मोठी घंटा आहे. महाद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. गाभाऱ्यात तुपाचे नंदादीप अहोरात्र तेवत असतात. इथे अभिषेक करण्याची पद्धत नाही. त्या ऐवजी लिंगावर तुपाचे गोळे थापतात. सभामंडपाच्या भिंतीत पाच पांडव, द्रौपदी, कुंती, पार्वती, लक्ष्मी अशा पाषाणमूर्ती आहेत. इथून जवळच आदि शंकराचार्यांची समाधी आहे. इथे सतत बर्फ पडत असल्याने मंदिरात जाण्याची वाट ही बर्फ बाजूला करून बनविलेली असते.दोन्ही बाजूंचे बर्फाचे ढिगारे न्याहाळत अलगद वाटचाल करावी लागते. अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत हे मंदिर उघडे असते व नंतर सहा महिने बंद असते.
☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
साद उत्तराखंडाची
जिम कार्बेट ते रानीखेत हे अंतर तसं कंटाळवाणं आहे. रानीखेत हे भारतीय लष्करातील नावाजलेल्या कुमाऊँ रेजिमेंटचं मुख्य ठिकाण आहे. रानीखेतमधील कुमाऊँ रेजिमेंटच्या म्युझियममध्ये भारतीय लष्करातील धाडसी, निधड्या छातीच्या वीरांची यशोगाथा बघायला मिळते. दोन परमवीर चक्र व तीन अशोक चक्राचे मानकरी यात आहेत. रानीखेतहून कौसानीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावर सारख्या उंचीचा काळपट हिरवा गालिचा पसरल्यासारखे चहाचे मळे आहेत. कौसानीला चहाची फॅक्टरी पाहिली. तिथे विकत घेतलेला चहा मात्र आपल्याला न आवडणारा गुळमुळीत चवीचा निघाला. रानीखेत- कौसानी रस्त्यावर जंगलामध्ये लाल बुरांस म्हणजे होडोडेंड्रॉन वृक्षाची लालबुंद फुलं सतत दिसतात. या फुलांच्या गोडसर सरबताचा उन्हाळ्यात औषधासारखा उपयोग होतो अशी माहिती मिळाली. कौसानीतल्या आमच्या हॉटेलच्या बगीच्यात किंबहुना तिथल्या बहुतांश बगीच्यात , हॉटेलात शोभेच्या जाड पानांची अनेक झाडे, कॅक्टसचे वेगवेगळे शोभिवंत प्रकार होते. यातील एका प्रकारच्या कॅक्टसच्या खोडांचा पल्प काढून त्यापासून प्लायवुड बनविले जाते असे तिथल्या हॉटेल मॅनेजरने सांगितले.
‘पृथ्वीचा मानदंड’ असे ज्याचे सार्थ वर्णन कवी कुलगुरू कालिदासाने केले आहे तो ‘हिमालयो नाम नगाधिराज’ म्हणजे भारताला निसर्गाकडून मिळालेलं फार मोठं वरदान आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल या साऱ्यांना हिमालयाचा वरदहस्त लाभला आहे. अशा अफाट हिमालयाच्या उत्तुंग पहाड रांगांना वेगवेगळी नावे आहेत. धौलाधार, पीरपांजाल, कुमाऊँ ,गढवाल अशा विविध रांगांच्या अनंत हातांनी हिमालय आपल्याला बोलावत राहतो. एकदा हिमालयाच्या प्रेमात पडलं की अनेक वेळा तिथे जायचे योग येतात.
साधारण वीस- पंचवीस वर्षांपूर्वी चारधाम यात्रेचा बेत केला. हरिद्वारपासून हरिद्वारपर्यंत असं चारधाम प्रवासाचे बुकिंग गढवाल निगमतर्फे केलं होतं. यात्रा सुरू होण्याआधी चार दिवस डेहराडून एक्सप्रेसने डेहराडूनला पोहोचलो. डेहराडून ही उत्तराखंडाची राजधानी गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यात वसली आहे. भरपूर पाऊस, आकाशाला भिडणारे वृक्ष, डोंगरउतारावरची छोटी छोटी घरं, नाना रंगांची फुलझाडं असणाऱ्या डेहराडूनमध्ये अनेक नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी, पेट्रोलियम रिसर्च इन्स्टिट्यूट, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जीऑलॉजी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट अशा संस्था तसेच लष्कराला अनेक प्रकारचे साहित्य पुरविणारी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. आम्हाला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बघायला मिळाली. तिथे पुरातन मजबूत वृक्षांचे ओंडके गोल कापून ठेवले होते. त्या खोडांच्या अंतरेर्षांवरून त्या झाडाचं वय कितीशे वर्ष आहे, त्याचे उपयोग, सध्या या जातीचे किती वृक्ष आहेत अशी माहिती तिथे सांगितली.
तिथून मसुरीला गेलो. साधारण साडेसहा हजार फुटावरील मसुरीला हिल स्टेशन्सची राणी म्हणतात. स्क्रूसारख्या वळणावळणांचा मसुरीचा रस्ता केव्हा एकदा संपतो असं झालं होतं. डोंगरकपारीतली एकावर एक वसलेली चढती घरे पाहत मसुरीला पोहोचलो. मसूरी हेसुद्धा शैक्षणिक व औद्योगिक केंद्र आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) मधील यशस्वी उमेदवारांना इथे ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’मध्ये ट्रेनिंग दिलं जातं. सुप्रसिद्ध डून स्कूल तसेच मोठी ॲग्रीकल्चर यूनिव्हर्सिटी आहे. रोपवेने गनहिलला गेलो. इथून संपूर्ण मसुरी, डून व्हॅली व दूरवर हिमालयाच्या शिवालिक रेंजेस दिसतात. मसुरीला मोठे बगीचे व मासेमारीसाठी तलाव आहेत. इथून हिमालयातील लहान- मोठ्या ट्रेकिंगच्या मोहिमा सुरू होतात. त्यांचे बेस कॅम्पस् व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथे आहे. आमचे सीडार लॉज खूप उंचावर होते. सभोवती घनदाट देवदार वृक्षांचे कडे होते. मसुरीहून दुसऱ्या दिवशी केम्प्टी फॉल्स बघायला गेलो. गोल गोल वळणांच्या रस्त्याने दरीच्या तळाशी पोहोचलो. खूप उंचावरून धबधबा कोसळत होता. त्याच्या थंडगार तुषारांनी सचैल स्नान झाले. हौशी प्रवाशांची गर्दी मुक्त मनाने निसर्गाच्या शॉवरबाथचाआनंद घेत होती.
मसुरीहून हरिद्वारला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला गेलो. तिथल्या झुलत्या पुलावरून पलीकडे गेल्यावर अनेक आश्रम होते. साधू, बैरागी, शेंडी ठेवलेले परदेशी साधक यांची तिथे गर्दी होती. इथे गंगेच्या खळाळत्या थंडगार पाण्याला खूप ओढ आहे. गंगाघाटाच्या कडेने बांधलेल्या लोखंडी साखळीला धरून गंगास्नानाचा आनंद घेतला. संध्याकाळी हरिद्वारला गंगेच्या घाटावर आरती करून दीप पूजा केली.
☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ साद उत्तराखंडाची ✈️
शाळेत असताना हिंदीच्या पाठ्यपुस्तकात ‘चांदणी’ नावाची एक गोष्ट होती. अलमोडा पहाडात राहणाऱ्या अबूमियांची चांदणी नावाची एक खूप लाडकी बकरी होती. कापसासारख्या शुभ्र, गुबगुबीत चांदणी बकरीच्या कपाळावर एकच काळा ठिपका होता. एकदा चरण्याच्या नादात चांदणी एकटीच पहाडात दूर दूर जाते. चुकलेल्या चांदणीला अबूमिया हाकारत राहतात आणि शेवटी नाइलाजाने इतर बकऱ्यांना घेऊन उदास मनाने घरी परततात. पहाडात सैरभैर फिरणाऱ्या चांदणीची गाठ एका कोल्ह्याशी पडते. चांदणी प्राणपणाने कोल्ह्याशी झुंज देते. पण…….! चांदण्याने निथळलेला गुढरम्य अलमोडा पहाड, तिथली घनदाट वृक्षराजी, चांदणीची आर्त साद आणि एकाकी झुंज दीर्घकाळ स्मरणात राहिली. त्यानंतर खूप वर्षांनी हिमालयातील अलमोडा पर्वतराजी पाहण्याचा योग आला तेव्हा चांदणीची आठवण झाली.
पूर्वीच्या उत्तर प्रदेशचे २००० साली विभाजन करून उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. डेहराडून ही या राज्याची राजधानी. गढवाल आणि कुमाऊँ असे उत्तराखंडचे दोन भाग पडतात. गढवालचे टेहरी गढवाल आणि पौरी गढवाल असे दोन मोठे विभाग आहेत, तर कुमाऊँ टेकड्यांमध्ये नैनीताल, अलमोडा हा पूर्वेकडचा भाग येतो. उत्तराखंडाच्या उत्तरेकडे तिबेट, पूर्वेकडे नेपाळ आणि पश्चिम व दक्षिणेकडे उत्तर प्रदेश राज्य आहे.
आम्ही लखनौहून रात्रीच्या ट्रेनने काठगोदाम इथे सकाळी पोहोचलो. काठगोदामहून नैनीताल हा साधारण दोन तासांचा रस्ता अतिशय सुंदर आहे पण आमची बस अर्ध्यावाटेमध्ये बिघडल्याने मेकॅनिकची वाट पाहण्यात बराच वेळ गेला. शेवटी तिथेच उतरून पहाडाच्या माथ्यावरच बरोबर आणलेलं जेवण घेतलं. एका बाजूला खोल दरी होती. लांबवर कुमाऊँ पहाडांची रांग दिसत होती. सगळ्या दऱ्या डोंगरांवर साल, देवदार आणि पाईन वृक्ष ताठ मानेने उंच उभे होते. गाडी दुरुस्त होऊन थोडा प्रवास झाल्यावर डोंगर आडोशाच्या एका छोट्या टपरीत चहासाठी थांबलो. पण कसले काय? भन्नाट वाऱ्याने तिथे थोडा वेळसुद्धा थांबू दिले नाही. टपरीवाल्याचे टेबलांवरचे, छपरावरचे प्लास्टिक उडून गेले. टेबल- खुर्च्या थरथरायला लागल्या. पाऊसही सुरू झाला. धावत पळत कसेबसे गाडीत येऊन बसलो. नैनितालला पोहोचायला रात्र झाली.
आमचं हॉटेल नैनी लेकच्या समोरच होतं. लंबगोल प्रचंड मोठ्या नैनीतालच्या भोवती रमत- गमत एक फेरी मारली. तलावात बोटिंगची सोयही आहे. वातावरणात थंडी होती आणि डोक्यावर ऊन होते. मॉल रोडवर प्रवाशांना हाकारणारी शेकडो दुकाने आहेत. तिबेटी स्त्रियांच्या दुकानातील असंख्य स्वेटर्स, आकर्षक कपडे, परदेशी वस्तू, वस्तूंच्या भावावरून घासाघीस सारे हिल स्टेशनला साजेसे होते. नैना देवीचं दर्शन घेतलं. दुपारी भीम ताल, सात ताल बघायला बाहेर पडलो. बसमधून घनदाट वृक्ष आणि कुमाऊँ रेंजची दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं न्याहाळत चाललो होतो. आमचा गाईड चांगला बोलका व माहीतगार होता. कालच्या सोसाट्याच्या भन्नाट वाऱ्यात ठामपणे उभ्या असलेल्या वृक्षांबद्दल विचारलं. तर त्याने पाईनवृक्षाचे एक पडलेले फळ आणून दाखविले. त्या फळाच्या देठाशी जो चिकट द्रव होता तो म्हणजे राळ. या राळेपासून टर्पेंटाईन बनवलं जातं. इथल्या गावातून दिव्यात घालण्यासाठीसुद्धा राळ वापरली जाते. पाईनचे लाकूड पटकन पेट घेते म्हणून थंडीच्या दिवसात शेकोटीसाठी याचा वापर करतात. या लाकडापासून बनवलेली झाकणं स्वयंपाकाच्या भांड्यांवर ठेवतात. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत पदार्थ बराच वेळ गरम राहू शकतो अशी छान माहिती त्याने सांगितली. भीमतालवर जाण्यासाठी उतरलो पण तिथे पोहोचू शकलो नाही. मुसळधार पाऊस सुरू झाला. थंडीने हृदय काकडले. कसेबसे हॉटेलला परतलो.
दुसऱ्या दिवशी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान बघायला निघालो. जाताना खोल दऱ्यांमधील अनेक छोटेमोठे जलाशय दिसत होते. त्यात स्वच्छ निळ्याभोर आकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे ते नीलमण्यांसारखे भासत होते. पुढचा रामनगरपर्यंतचा रस्ता पहाडी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गव्हाची आणि मोहरीची मोठी शेती होती. भरपूर आम्रवृक्ष होते. आपल्याइथला हापूस आंब्याचा सिझन संपत आला की बाजारात येणारे दशहरी, केशर, नीलम, लंगडा आंबे हे उत्तराखंड, उत्तर प्रदेशचे असतात. थंडगार पहाडावरून सपाटीवर आलो होतो. भरपूर वृक्ष आणि हवेतला ओलसर दमटपणा यामुळे घामाघूम झालो होतो .एका धाब्यावर गरम चविष्ट पराठा खाऊन मोठा ग्लास भरून दाट मधुर लस्सी घेतली आणि पोटभरीचे जेवण झालं. अभयारण्यच्या आधी ‘जीम कॉर्बेट’ म्युझियम आहे. पुढे थोड्या अंतरावर छोटासा धबधबा आहे. रंगीबेरंगी पक्षी, सुगरणीची घरटी, हरणे, रान कोंबड्या यांचं दर्शन झालं. तीन-चार फूट उंच वारूळं रस्त्याच्या दोन्ही कडांना होती. ड्रायव्हरने जंगलवाटा धुंडाळल्या पण व्याघ्रदर्शन झाले नाही. दूरवर चरणारे जंगली हत्ती, मोर, गरुड दिसले. कडूलिंबाचे प्रचंड मोठे वृक्ष होते.
☆ मी प्रवासिनी क्रमांक 38 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
काळं पाणी आणि हिरवं पाणी
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून बसने निघालो. जारवा आदिवासींच्या जंगलात जायचे होते. त्या संरक्षित जंगलात जाण्या- येण्याच्या वेळा ठराविक असतात. सर्व प्रवासी बसेसना एकदम एकत्र सोडण्यात येतं. त्या जंगल विभागाशी पोहोचेपर्यंत दुतर्फा आंबा, फणस, नारळ, सुपारी, केळी, एरंड, भेंडी अशी झाडं व विविध प्रकारचे पक्षी दिसत होते. संरक्षित जंगल विभागात साधारण ३०० जारवा आदिवासी राहतात. बंद काचेच्या धावत्या बसमधून त्यातील काही आदिवासी दिसले. स्त्री व पुरुषांच्या फक्त कमरेला झाडाच्या सालींचे उभे उभे पट्टे रंगवून कमरेच्या दोरात अडकवलेले होते. पुरुषांच्या हातात तिरकमठा होता व स्त्रियांच्या कडेवर छोटी मुलं होती. लोखंड खूप तापवलं तर त्याचा जसा तांबूस काळा रंग दिसतो तसा त्यांचा तकतकीत रंग होता. काही छोटी मुलं बसमागे धावत होती. सरकारतर्फे त्यांना कपडे, धान्य देण्याचा प्रयत्न होतो. मानव वंशशास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करीत असतात पण सारे त्यांचे रीतीरिवाज सांभाळून, त्यांचा विश्वास संपादन करून करावं लागतं.
जंगल ओलांडल्यावर थोड्यावेळाने आम्ही बसमध्ये बसूनच बार्जवर चढलो. पलिकडे उतरल्यावर स्पीड बोटीने, लाईफ जॅकेट घालून, ‘बाराटांगा’ वन विभागात पोहोचलो. दुतर्फा मॅनग्रोव्हजचे घनदाट जंगल आहे. नीलांबर गुंफा बघायला जाताना स्पीड बोटीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या मॅनग्रोव्हज् व इतर झाडांची सुंदर दाट हिरवी कमान तयार झाली होती. हे गर्द हिरवे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. हजारो वर्षी पाणी या गुंफेमध्ये ठिबकल्याने त्यांचे नैसर्गिक आकार तयार झाले आहेत.
१. एलिफंट बीच २. एलिफंट बीचला जाताना वाटेत दिसलेले एक बेट ३. समुद्री कोरल्स
हॅवलॉक आयलँडला जायला लवकर उठून सहाची बोट पकडली. तिथल्या हॉटेलवर आज मुक्काम होता. जेवून दुपारी राधानगर समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तीव्र उन्हामुळे समुद्राचे पाणी व वाळू चकाकत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलजवळच्या बीचवर फिरायला गेलो . अंदमानच्या जवळजवळ सर्व बेटांवर सदाहरित जंगलं व किनाऱ्याजवळ खारफुटीची दाट वनं आहेत. किनारे प्रवाळाने समृद्ध आहेत. विविध पक्षी आहेत. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरील शंख- शिंपले, कोरल्स बाहेर नेण्यास बंदी आहे. इथला निसर्ग लहरी आहे आणि बंगालचा उपसागर सदैव अस्वस्थ असतो.
हॅवलॉकवरून छोट्या होडीतून ( डिंगीतून ) एलिफंट बीचसाठी केलेला प्रवास थरारक होता. वाटेतल्या एका डोंगराचं टोक गरुड पक्षाच्या नाकासारखं पुढे आलं आहे. त्यावर दीपगृह आहे. एलिफंट बीचवर नितळ समुद्रस्नानाचा आनंद घेतला. पूर्वी इथे लाकडाचे भले मोठे ओंडके वाहण्यासाठी हत्तींचा उपयोग करीत म्हणून या किनाऱ्याला ‘एलिफंट बीच’ असं नाव पडलं. आता तिथे हत्ती नाहीत. तिथून हॅवलॉक आयलँडला परत आलो.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॅवलॉक बंदरात छान गोरीगोमटी कॅटामरान उभी होती. हलत्या बोटीच्या बंद काचेतून तसंच वरच्या डेकवरून सूर्यास्त टिपण्यासाठी सगळ्यांनी कॅमेरे सरसावले होते. एकाएकी सारं बदललं. आकाश गडद झालं. सूर्य गुडूप झाला. जांभळे ढग नंतर दाट काळे झाले. कॅटामरान जोरजोरात उसळू लागली. टेबल टेनिसचा चेंडू उडवावा तसा समुद्र बोटीला उडवत होता. सारे जण जीव मुठीत धरून बसले. बऱ्याच परदेशी प्रवाशांना, लहान मुलांना उलट्यांनी हैराण केलं. ‘समुद्री तुफान आया है’ असं म्हणत बोटीचा स्टाफ धावपळ करीत साऱ्यांना धीर देत होता, ओकाऱ्यांसाठी पिशव्या पुरवीत होता. दीड तास प्रवासापैकी हा एक तास भयानक होता. निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे हे दाखविणारा होता.
पोर्ट ब्लेअरला तुफान पावसाने स्वागत केलं. आभाळ फाडून वीज कडाडली. जीव घाबरला, पण आता पाय जमिनीवर टेकले होते. किनाऱ्यावर सुखरूप उतरलो म्हणून त्या अज्ञात शक्तीचे आभार मानले. आकाशातून बरसणाऱ्या धारा आता आशीर्वादासारख्या वाटत होत्या.