मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं,

” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडे पाहिलं.

 ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.

कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!

काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, ” राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेऊ. तेव्हा द्या.”

थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, ” काका एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “

सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गांवात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”

कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला.

काका म्हणाले,  ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही… तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले  “माझं बाळ…! ” …. हे असं घडल्यापासून. ह्या गावातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो “

कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं– ” पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”

” ते ही केलं पण… जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच याची शाश्वती नाही “

हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, ” काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!”

सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले, ” विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल…  रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय….. विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीये . “

यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली, म्हणाला, ” काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडे जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदलली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले 

” दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “*

कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं, ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “

काकांनी स्मित केलं, ” दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “

हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले..!

काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही … पण त्याला एकाच प्रेमाची गरज .. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” ..  हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!

…. सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले ….. अगदी अनाहूतपणे …!!

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सहजच गप्पांचा, चर्चेचा फड रंगला की बायकांचे किंवा पुरुषांचे एक वाक्य ऐकायला येते, “एखादी मुलगी असावीच बघा. ” मलाही दोन मुलेच आहेत मग कुणीपण म्हणते, “मुलगी एक हवी होती बघा!”पण मी म्हणते का?मुलीला माया असते, अमुक तमुक… म्हातारपणी एखादे विसाव्याचे ठिकाण असावे.. वगैरे. पण खरेच असे असते का? मुली प्रेमळ असतात न मुले नसतात, हा शोध कुणी लावला?(माझी दोन्ही मुले प्रेमळ आहेत आणि आईच्या सेवेसाठी तत्पर असतात)असे कोणतेच विधान सरसकट करता येत नाही. मुली प्रेमळ, मुले कठोर, किंवा मुली सेवा करतात, मुले टाकून देतात.. खरे तर व्यक्ती परत्वे स्वभाव, संस्कार भिन्न असतात. अमुक एक जात, पंथ, धर्म चांगला/वाईट असे काहीच नसते, प्रत्येक जाती, धर्म पंथात वेगवेगळ्या आचार विचार आणि स्वभावाची माणसे असतातच.

तसेच आपल्या अपत्याबाबत देखील असते. मुळात आपल्या म्हातारपणी काठी व्हावीत, आपली सोय व्हावी म्हणून मुले जन्माला घालणे चूक आहे. मनुष्य हा प्राणी आहे आणि तो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यासारखाच दुसरा प्राणी किंवा जीव निर्माण करतो. समाज टिकवण्यासाठी एका जिवातून दुसरा जीव तयार होतो. मुलांचे पालन पोषण नीट करून सुसंस्कृत बनवून त्यांना सशक्त सुदृढ बनवणे व एक बलशाली राष्ट्र बनवणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच त्याला त्याच्या कलेने  योग्य ते शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवणे हेही कर्तव्य आहे. हे करत असताना स्वतःही स्वतःसाठी जगत, स्वत:बरोबर कुटुंबाला वेळ देणे, मुलांना वेळ देणे आणि मुलं सज्ञान झाली की आपण आपण वानप्रस्थाश्रम याचा अर्थ स्वतःचे उर्वरित पूर्ण  आयुष्य समाधानात, आनंदात घालवणे ही आजच्या काळातील अतिशय महत्वाचे आहे. पण हे घडताना दिसते अतिशय दुर्मिळ. उलट ‘आम्ही तुला लहानाचे मोठे केले, ‘यावं त्यांव करून पालक सतत पाल्याभोवती भुण भुण लावतात, जेष्ठ झाल्यावर तर अजूनच जास्त.

याच्या विरुद्ध पालक कितीही चांगले वागले तर मुले त्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतात आणि अशा पालकांना पण उतारवयात दुःख होते. एकूण मुली आहेत म्हणून आनंदी आनंद आणि मुले म्हणजे दुःखच दुःख असे काहीच नाही. चांगले पालक मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट असते तशीच मुले चांगली, सद्गुणी निघणे हेही भाग्यावरच अवलंबून आहे असेच चित्र आता सगळीकडे दिसत आहे, कारण भारतीय समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर आला आहे, यात ग्रामीण, शहरी फरक  राहिला नाही.

परवाच ऐकलेली दोन उदाहरणे सांगते. मुलींनी वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळावा म्हणून आईवडीलांवर केस घातली. वडिलांना मानसिक धक्का बसून अर्धांग झाला. एकुलता एक भाऊ बिचारा खाजगी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंब चालवत आहे.

दुसरे उदाहरण वडिलांचा वार्धक्याने मृत्यू झालाय. तिन्हीसांज झाली आहे. टिपटीप पाऊस आहे, अंत्ययात्रेला माणसे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे, इतक्यात मुलगा दिसत नाही म्हणून शोध घेतला जातो, तासभर शोधूनही तो मिळत नाही(दारू पिऊन कुठल्या कोपऱ्यात पडला होता कोण जाणे!)शेवटी वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. काय करायची असली मुले-मुली असून?ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

आजकाल किती मुली मोठ्या झाल्या की घरची सर्व कामे करून आईला विश्रांती देतात?मी तर म्हणेन हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच, उलट शिक्षण चालू आहे तोवर आईच सगळं करते, पुढं नोकरी लागते, लग्न होते मग वर्षभराच्या सर्व बेगमी(चटण्या, उन्हाळी पदार्थ)मुली आईकडूनच करून घेतात. काही मुली राहिलेलं शिक्षण परत माहेरीच राहून पूर्ण करतात आणि आईच सर्व मुलीचे पाहते, घरकाम पाहते. आई आपल्या अपत्यावरील प्रेमाखातर सर्व आनंदाने करते पण मुलीला आपल्या आईबद्दल कणव कधी वाटणार?अशी बरीच उदाहरणे आसपास दिसतात.

सज्ञान झाल्यावर चांगले-वाईट, नैतिक अनैतिक यातला फरक कळण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची व जबाबदारीने वागण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची असते. पालक ठराविक वयापर्यंतच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात तिथून पुढं आपण त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालणे अपेक्षित असते, पण असे होत नाही. आज ढवळलेले सामाजिक वातावरण, गढूळ झालेली माणुसकी, यातून निरक्षीर विवेक जागृत ठेवणे फारच जिकिरीचे झाले आहे. यातून जे तरतात, त्यांची कुटुंबे संतुलित आणि आनंदी राहतात बाकी प्रवाहात गटांगळ्या खातात.

असो, पालकांनीच आता मुलांकडून अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे मुलांवर प्रेम आणि पालन पोषण केलं तर भविष्यात मुलं आपल्यासोबत प्रतिकूल वागली तर दुःख व पश्चाताप होणार नाही. अन्यथा शेक्सपिअर म्हणतोच, ‘माणसाच्या दु:खास तो स्वतः कारणीभूत असतो.’

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रवास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्रवास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला.

बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपविताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले.

त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का? याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या.

तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला.

इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.

साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरूण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला.

तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता. न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले. आणि म्हणाले,

“आजोबा, ” तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले.. ?”

चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

” आपला प्रवास किती घडीचा असतो. ? निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? 

जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”

आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवित राहिले…

“  बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे !

जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस, हाच जीवनाचा गोडवा.. ! त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण.. ! बाळ, या दोन्ही वेळी आपण स्वत: त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे कडू-गोड क्षण.. त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !” 

“ आणि अगं अनेक माणसं भेटतात या प्रवासात.. त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात.. त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले..

काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. आणि कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात.. त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी.., त्यांचा पिंड निराळाच असतो… आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत.. ! जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं.. ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे.. ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही !.. आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. !”

रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत, तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे.., खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.

थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,

” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा.. पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं.., वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !

धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला  असतो.. पण एक मात्र खरं….

 …. व पु एके ठिकाणी लिहितात,

 ” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण “भाळणं ” संपल्यावर उरतं ते “सांभाळणं.. “

…. हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ” जीवन जगणं ” कळलं.. !”

असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहित.. बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले.., सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले,

…. ” अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत.. !” 

मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो.. !”

दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या…. आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव… “

लेखिका : माहीत नाही…( पण विचार…. विचार करण्यासारखे !) 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं…

साधा सर्दी खोकला झाला,

की आलं, तुळशीचा काढा घ्यायचो,

पोट दुखलं की ओवा चावत जायचो,

ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो,

ना टेस्ट, ना स्पेशालिस्टचं झंझट,

ना हॉस्पिटलच्या एडमिशनमध्ये अडकत होतो…

निरोगी आयुष्य जगत होतो..

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

राम राम ला राम राम,

सलाम वालेकुम ला, वालेकुम अस्सलाम,

आणि जय भीम ला जय भीमनेच प्रेमाने उत्तर देत होतो,

ना धर्म कळत होता

ना जात कळत होती 

माणूस म्हणून जगत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

सकाळी न्याहारीला दूध भाकरी,

दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि..

रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,

हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू…. लंचचा चोचलेपणा आणि 

डिनरच्या सोफेस्टिकेटेड उपासमारीपेक्षा दिवसभर भरपेट चरत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो

रामायणात रंगून जात होतो, ‘चित्रहार’सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,

ना वेबसिरीजची आतुरता,

ना सासबहुचा लफडा,

ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो…

खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…

*साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

हुश्श! कालचा अनंत चतुर्दशी चा दिवस आटोपला.. सगळया भाविकांचा निरोप देता घेता इतकी दमछाक झाली म्हणून काय सांगू… आणि तो गजर गुंजतोय अजूनही माझ्या कानात…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… आजवर कित्येक वर्षे विसर्जनाच्या वेळी तुम्ही मला म्हणता आणि मीही तत्परतेने दरवर्षी न चुकता तुमच्याकडे येतोच येतो… यात तसूभरही बदल झाला नाही… कारण तो होणारच नसतो ना… सगळं कसं यांत्रिकपणे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ना ही… हां बदल फक्त सण साजरा करण्याच्या पद्धतीत झाला आहे… दर वर्षी मी नित्य चांगल्या गोष्टी देण्यासाठी हिथं मनात योजून येत असतो… पण इथं आल्यावर मला दिसतं कि आधीच सगळ्या  चांगल्या गोष्टींचा फज्जा उडालेला आहे… मग मी नविन काही न देताच निघतो  आणि तुम्ही तुमचं जुनं एकेक सोडून नव नवीन टुकार गोष्टी दाखवता.. तेव्हा माझ्या मनाला कितीतरी क्लेश होतात… अरे मी तो चौसष्ट कला नि चौदा विद्याचां अधिपती ही माझी ख्याती.. पण ऐकेक तुमच्या अंतरीच्या नाना कळा पाहून मलाच म्हणावेसे वाटते कि रे तेथे कर माझे जुळती… दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी सजावट, वाद्यांचा  गजर, लाऊडस्पीकरच्या किंकाळ्या, छमछमत्या छम्मकछल्लूचां   नाचाचा धांगडधिंगा… यालाच खरच  हल्ली गर्दी जमते फार.. हवसे गवसे नि नवसेच फार… भक्तांच्या  अभिरुचीला पैशाचा पाऊस पडे धुंवाधार… आणि माझ्या  पुजाआरती करायच्या वेळी चार टाळकी जमे पर्यंत होतसे  नित्याची मारामार… मी मात्र मखरात बसून अर्धडोळे उन्मलित अवस्थेत पाहत असतो. ओठावर मंदस्मित आणत असतो.. लबाडांची मागण्यांची बाडची बाड भिडभाड न ठेवता  वाढता वाढे होत जातात… बदल्यात मलाही काही  द्यायचं हेच हेतूपुरस्सर विसरून जातात… अशाने होतील  कश्या पूर्ण तुमच्या मनोकामना.. राजाची बिरुदावलीचं लेबल माझ्या माथी मारून तुमचं उखळ पांढरं करून घेतात… तुम्ही बदललात मग मीच मागे का राहू आजकालच्या जमान्यात… मी ही नुसता देखावा करतो तुमचं ऐकून घेतल्यासारखं करतो.. दहा दिवस माझी करमणूक छान होते.. अन जाताना मी आठवतो यावेळेला नवे काय बरं दिसतं होते… बाकी काही असो दहा दिवस तरी मनापासून नसले तरी माझ्या भक्तीचा गुलाल तो उधळता… आपल्या घरातल्या, गल्लीतल्या, गावातल्या माणसांशी हसून खेळून राहता… तेव्हढचं एक बघून माझा उर भरून येतो… आणि केवळ हेच बघण्यासाठी दरवर्षी इथं येण्याचं मनात ठरवून निरोप घेत असतो… बरे वाटतं  तुमचं आपापसातलं त्या दिवसातले प्रेमाचं भरतं पाहून… मला निरोप देताना जड जातयं तुम्हाला हे कळतंय मला… एक मागणं मी ही मागतो तुमच्या जवळ नाही म्हणू नका मला.. जे दहा दिवस प्रेमाने तुम्ही सगळे एकत्र येऊन घालवले माझ्या सहवासात.. ते पुढच्या वर्षीच्या चतुर्थी पर्यंत तसेच ठेवाल का… तर मग दुखाचा कापूर, नैराश्याच्या अगरबत्या पेटवण्याची गरजच तुम्हाला उरणार नाही.. आनंदाचे निरांजन, समाधानाची समई तेवत राहील  अखंडपणे तुमच्या जीवनात.. दोन हस्तक नि एक मस्तक श्रद्धेने मजजवळ  झुकलेले पुरेसे असते मला.. साधी राहणी नि उच्च विचारसरणी पण तुम्ही करतायं ते अगदी उलटं असते उच्च राहणी नि टुकार विचारसरणी… अरे कुठलाच फापट पसाऱ्याचा सोस नको असतो मजला… चिंता करू नका, तरीही मी हो हो नक्की येईन बरं लवकरच पुढच्या वर्षाच्या चतुर्थीला… तो पर्यंत गणपती बाप्पा मोरया…     

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 175 ⇒ स्वैच्छिक स्वीकारोक्ति… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “स्वैच्छिक स्वीकारोक्ति”।)

?अभी अभी # 175 ⇒ स्वैच्छिक स्वीकारोक्ति? श्री प्रदीप शर्मा  ?

ऐसा लग रहा है, स्वैच्छिक सेवानिवृत्ति की बात हो रही है। जी बिल्कुल सही, बिना सेवानिवृत्ति के वैसे भी कौन स्वीकारोक्ति की सोच भी पाता है। स्वीकारोक्ति स्वैच्छिक हो सकती है, लेकिन सेवानिवृत्ति इतनी आसान नहीं।

एक सेवानिवृत्ति तो स्वाभाविक होती है, ६०-६५ वर्ष तक खून पसीना एक करने के बाद जो हासिल होती है। चलो, गंगा नहा लिए ! होती है, सेवानिवृत्ति स्वैच्छिक भी होती है, हाय रे इंसान की मजबूरियां ! एक सेवानिवृत्ति अनिवार्य भी होती है, जिसे बर्खास्तगी (टर्मिनेशन) कहते हैं।

वे पहले सस्पेंड हुए, फिर टर्मिनेट। पहले सत्यानाश, फिर सवा सत्यानाश। ।

जीवन के बही खाते का, नफे नुकसान का, लाभ हानि और पाप पुण्य का मूल्यांकन सेवानिवृत्ति के पश्चात् ही संभव होता है।

सफलताओं और उपलब्धियों को गिनाया और भुनाया जाता है। असफलताओं और कमजोरियों को छुपाया जाता है। जीवन का सुख भी सत्ता के सुख से कम नहीं होता।

क्या कभी किसी के मन में सेवानिवृत्ति के पश्चात् यह भाव आया है कि, इसके पहले कि चित्रगुप्त हमारे कर्म के बही खाते की जांच हमारे वहां ऊपर जाने पर करे, एक बार हम भी तो हमारे कर्मों का लेखा जोखा जांच परख लें। अगर कुछ डिक्लेयर करना है तो क्यों न यहीं इस दुनिया में ही कर दें। सोचो, छुपाकर क्या साथ ले जाया जाएगा, सच झूठ, सब यहीं धरा रह जाएगा। ।

बड़ा दुख है स्वीकारोक्ति में ! लोग क्या कहेंगे। इस आदमी को तो हम ईमानदार समझते थे, यह तो इतना भ्रष्ट निकला, राम राम। बड़ा धर्मप्रेमी और सिद्धांतवादी बना फिरता था। डालो सब पर मिट्टी, कुछ दिनों बाद ही जीवन के अस्सी वसंत पूरे हो जाएंगे, नेकी ही साथ जाएगी, क्यों मुफ्त में बदनामी का ठीकरा फोड़, अपने ही पांव पर कुल्हाड़ी मार ली जाए।

जरा यहां आपकी अदालत तो देखिए, सबूत के अभाव में गुनहगार छूट जाता है, और झूठी गवाही के आधार पर बेचारा ईमानदार फंस जाता है।

जिसे यहां न्याय नहीं मिलता, उसे ईश्वर की अदालत का इंतजार रहता है। ।

जो समझदार होते हैं, उनका तो अक्सर यही कहना होता है, यह हमारा और ईश्वर का मामला है। उससे कुछ भी छुपा नहीं है। समाज को तो जो हमने दिया है, वही उसने लौटाया है। ईश्वर तो बड़ा दयालु है, सूरदास तो कह भी गए हैं ;

प्रभु मोरे अवगुन चित ना धरो।

समदरसि है नाम तिहारो

चाहे तो पार करो।।

किसी ने कहा भी है, एक अदालत ऊपर भी है, जब उसको ही फैसला करना है तो कहां बार बार जगह जगह फाइल दिखाते फिरें। फिर अगर एक बार भगवान से सेटिंग कर ली

तो इस नश्वर संसार से क्या डरना। कितनी अटूट आस्था होती होगी ऐसे लोगों की ईश्वर में।

और एक हम हैं, सच झूठ, पाप पुण्य, और अच्छे बुरे का ठीकरा सर पर लिए, अपराध बोध में जिए चले जा रहे हैं। तेरा क्या होगा कालिया! जिसका खुद पर ही भरोसा नहीं, वह क्या भगवान पर भरोसा करेगा। गोस्वामी जी ने कहा भी है ;

एक भरोसो एक बल

एक आस विश्वास।

स्वाति-सलिल रघुनाथ जस

चातक तुलसीदास।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

 🌸 विविधा 🌸

☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

‘प्रज्ञा ‘हा शब्द आपल्या ऐकण्यात,  बोलण्यात, वाचण्यात नेहमी येतो. पण त्याच्या अर्थाविषयी अनेकजण अनभिज्ञ असतात. भारतीय मानसशास्त्रात ‘प्रज्ञा’ही संकल्पना अतिशय सुंदर रित्या स्पष्ट केलेली आहे. प्राचीन काळात ऋषिमुनींनी निर्माण केलेले साहित्य ही आपली अशी संपत्ती आहे की त्यामुळे आज भारताचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा वापर सुरू झाला आहे. अशा भारतीय मानसशास्त्रातील एक संकल्पना’प्रज्ञा’. याविषयीचे विचार येथे व्यक्त केले आहेत.

संस्कृत मध्ये ‘प्रज्ञा’असा मूळ शब्द वापरतात. याला पूरक असे ‘प्राज्ञ’व ‘प्राज्ञा’ असेही शब्द आहेत. व्यक्तीचे शुद्ध आणि उच्च विचार युक्त शहाणपण,  बुद्धिमत्ता आणि आकलन म्हणजे ‘प्रज्ञा ‘. ही शहाणपणाची अशी पातळी आहे की तर्काने आणि निष्कर्षाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा उच्च आहे.  प्रज्ञ= प्र +ज्ञ . प्र म्हणजे परिपूर्ण आणि ज्ञ म्हणजे माहीत असणे किंवा संकल्पनेचा अत्यंतिक जवळून अभ्यास करणे.  प्रज्ञा या संकल्पनेविषयी वेद , उपनिषद व योगशास्त्रात संदर्भ सापडतात.

ऐतरेय उपनिषदात प्रज्ञेविषयी खालील श्लोक सापडतो.

तत्प्रज्ञानेत्रम प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञानं ब्रम्ह (iii. i. 3).

जे अस्तित्वात आहे ते म्हणजे शारीरिक व आध्यात्मिक ज्ञान.  या ज्ञानाचे मूळ प्रज्ञा आहे म्हणजे स्वजाणीव किंवा सुषुप्ती.  कौशितकी उपनिषदामध्ये इंद्राने मृत्यूचे वर्णन करताना प्राण आणि प्रज्ञा शरीरात एकत्र राहतात व मृत्यूचे वेळी एकत्रित निघून जातात असे म्हटले आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञानेन्द्रिये काम करू शकत नाहीत.  पंचेंद्रियांची कार्येही प्रज्ञेशिवाय होऊ शकत नाहीत. तसेच प्रज्ञेशिवाय विचार यशस्वी होऊ शकत नाही.

वेदांत सार मध्ये प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

अस्य प्राज्ञात्वम स्पष्टोपाधि तया नती प्रकाशत्वात॥४४॥.  

आत्मा हा निर्गुण असतो.  ईश्वर मात्र सर्व गुणांनी युक्त असतो व चराचरावर राज्य करत असतो पण प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याच्या अज्ञानाचा एक भाग म्हणजे सदोष बुद्धिमत्ता. सुषुप्ति अवस्थेतील आत्मा जेव्हा आनंदमय विज्ञानघन असतो तेव्हा त्याची बुद्धिमत्ता ही प्रज्ञा असते.

मांडुक्योपनिषदात प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

आनंदभुक चेतोमुखःप्राज्ञः॥

प्रज्ञा म्हणजे जागृती अवस्थेत साधन लाभलेल्या(असलेल्या)आशीर्वादाचा आनंद घेणारा उपभोक्ता.

उपनिषद रहस्य या पुस्तकात प्रज्ञाचे इत्यंभूत वर्णन केले आहे. प्रज्ञा ही जगाचे चक्षु असून जगाचा आधारही आहे. प्रज्ञा प्रत्यक्ष ब्रम्ह आहे.  सर्व स्थावर जंगम, वस्तू, पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी व आकाशात उडणारे सर्व पक्षी, सर्व पंचमहाभूते व देवता हे सर्व प्रज्ञेतच अंतर्भूत होतात व प्रज्ञेमुळे जिवंत राहतात असे उपनिषद्काराचे मत आहे.

पतंजली योगसूत्रामध्ये प्रज्ञेचा उल्लेख खालील श्लोकात केलेला आढळतो.  

ॠतंभरा तत्र प्रज्ञा ॥

निर्विचार समाधी विषयी स्पष्टीकरण करताना असे म्हटले आहे की,  ज्ञान हे जेव्हा निष्कर्षाच्या आणि ग्रंथांच्या पलीकडे जाते तेव्हा ते फक्त सत्यानेच भरलेले असते. मन हे शुद्ध असते अशावेळी असलेल्या स्थितीत प्रज्ञा जागृत असते.  

संस्कृतीकोष मध्ये व काही वेबसाईटवर( संदर्भामध्ये दिलेल्या आहेत) प्रज्ञा या संकल्पनेविषयी लिहिताना असे म्हटले आहे की , प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्ञानाचे किंवा जगण्याचे इंद्रिय स्वरूप. प्रज्ञा हे प्राचीन संस्कृत नाम असून त्याचा सखोल अर्थ शहाणपण हाच आहे . प्रज्ञा हे देवी सरस्वतीचे नाम आहे . सरस्वती ही कलेची व वादविवादाची देवता आहे. ऋग्वेदामध्ये प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे आकलन, ज्ञान व संकल्पनेशी  अत्यंत जवळीक असणे असेम्हटले आहे तर महाभारतानुसार,  प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे अध्ययन, संकल्पनेचा शोध असे म्हटले आहे . शतपथ ब्राह्मण व सांख्यायन श्रोत-सूत्र यांच्या नुसार शहाणपण,  ज्ञान,  बुद्धी,  तर्क , आराखडा मांडणे,  साधन वापर या गुणधर्मांसाठी प्रज्ञा हा शब्द वापरला आहे.

बुद्ध संप्रदायानुसार प्रज्ञा किंवा पन्ना( पाली )म्हणजे शहाणपण . याचा अर्थ वास्तवातील सत्याबद्दल असलेली मर्मदृष्टी .  प्र म्हणजे जागृती, ज्ञान किंवा आकलन आणि ज्ञ म्हणजे उत्स्फूर्त ज्ञानाची उच्च, व्यापक, जन्मजात बहरलेली अवस्था होय.

प्रज्ञेचे एकूण तीन प्रकार आहेत.

  1. श्रुतमय प्रज्ञा
  2. चिंतनमय प्रज्ञा
  3. भावनामय प्रज्ञा

श्रुतमय प्रज्ञा म्हणजे असे ज्ञान की जे फक्त ऐकलेले किंवा वाचलेले आहे.  हे ऐकिवज्ञान अनुभूतीच्या स्तरावर उतरलेलं असेलच असे नाही . श्रुतमय ज्ञान प्रेरणा घेण्यासाठी गरजेचं असतं. ज्ञान ऐकल्यानंतर पुढचा टप्पा असतो ज्यात चिंतनाची आवश्यकता असते. या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात आणि चिंतन झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभूती घेतली जाते.  अनुभूतीनंतर जे ज्ञान होते त्याला भावनामय प्रज्ञा म्हणतात.  भावनामय प्रज्ञा सर्वात महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती श्रुतमय प्रज्ञेचा साक्षात्कार करेलही व चिंतन ही करेल पण त्याचा अनुभव घेईलच असे नाही म्हणून प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे स्वानुभवाच्या बळावर जे जे काही उतरते त्याला ‘प्रज्ञा ‘असे म्हणतात.

या संकल्पनेचा एवढा विचार करणे ही सध्याच्या काळातील प्राथमिक गरज आहे. मुलांना कसे वाढवावे याविषयी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना किती सखोल मार्गदर्शन करावे याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन मिळते. प्रत्येक मुलातील ‘प्रज्ञा’जागृत झाल्याशिवाय त्याचा विकास परिपूर्ण होणार नाही व मुले आयुष्यात समाधानी होणार नाहीत म्हणून भारतीय मानसशास्त्रातील संकल्पना सर्वांनी अभ्यासल्या पाहिजेत.

संदर्भ

  1. भारतीय संस्कृती कोश -पंडित महादेव शास्त्री जोशी
  2. उपनिषद रहस्य -गुरुदेव रानडे
  3. प्रवचन सारांश -विपश्यना शिबिर
  4. द प्रिन्सिपल उपनिषद- स्वामी निखिलानंद
  5. http://www. pitrau. com”Meaning of Pradnya”
  6. www. bachpan. com”Meanimg of Pradnya”
  7. Sanskrit Dictionary(revised 2008)-Lexicon (http://www. sanskritlexicon. unikoein. de)
  1. The Golden Book of Upanishads-Kulshreshtha Mahendra

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(तेव्हापासून मंदिरात मी देव शोधत नाही…. मंदिराच्या खाली गाडला गेलेला तो अव्यक्त दगड शोधतोय… !!!) – इथून पुढे — 

भिजलेलं ते ब्लॅंकेट आणि कुजलेली ती पॅन्ट यांना मी आता मनोमन नमस्कार केला…. आणि काय जादू झाली … त्यातला दुर्गंध कुठल्या कुठे पळून गेला… !!! 

आता बाबांच्या मी शेजारी बसलो…. ! चौकशी केली आणि सुरुवातीला सांगितलेली सर्व कर्म कहाणी समजली. मी त्यांना अत्यंत नम्रपणे विचारलं, “ बाबा मी तुमच्यासाठी काय करू ? “ 

ते सुद्धा हात जोडून तितक्याच नम्रतेने म्हणाले, “ तुम्ही माझा जीव घेता का जीव ? “

“ माझं काम जीवदान द्यायचं आहे बाबा “ मी म्हणालो.

ते क्षीणपणे हसले, म्हणाले, “ घ्या हो जीव… एखादं औषध द्या आणि मारून टाका…. कंटाळलो आहे मी आता…. आडबाजूच्या फुटपाथ वर एखाद्याला असं औषध दिलं तर कोणाला कळणार आहे ??? “

बाबांचं आयुष्यातलं मन उडून गेलं होतं …गाण्यातले सूर हरवतात तेव्हा फक्त ते गाणं बेसूर होतं, पण जीवनातलं मन हरवलं की ते आयुष्य भेसुर होतं… ! 

“ बाबा तुमची बायको तुमच्याशी अशी का वागली ?” मी चाचपले…. 

“ जाऊ द्या हो डॉक्टर…  पाऊस संपला की छत्रीचं सुद्धा ओझं होतं…! “

“ म्हणजे ? “

“ अहो तिची माझी साथ तितकीच होती… “

“ तिच्या वागण्याचा त्रास नाही होत तुम्हाला ? “

“ अहो, तिने त्यावेळी जी साथ दिली ती मी प्रसाद म्हणून घेतली… प्रसादाची चिकित्सा करायची नसते… जे मिळालं ते समाधानाने ग्रहण केलं मी…. !  प्रसाद हा जीव शमवण्यासाठी असतो… भूक भागवण्यासाठी नाही… ! “

“ मला नाही कळलं बाबा… “

… “ माझ्या पडत्या काळात तिने मला खूप साथ दिली, खरं तर मी तिचा आभारी आहे डॉक्टर … 

आपण मंदिरात जातो …. गाभाऱ्यात आपण किती वेळ असतो ? दोन पाच मिनिटं …परंतु तीच दोन पाच मिनिटं पुढे कितीतरी दिवस जगायला ऊर्जा देतात… तिची माझी साथ सुद्धा अशीच दोन पाच मिनिटांची… 

गाभाऱ्यात जाऊन आपल्यासोबत कोणी देवाची मूर्ती घरी घेवून येत नाही… तिथं अर्पण करायची असते श्रद्धा आणि परतताना घेवून यायचा, “तो” सोबत असल्याचा विश्वास ! डॉक्टर माझी मूर्ती फक्त हरवली आहे… श्रद्धा आणि विश्वास नाही… ! “

माझ्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू वाहू लागले…

“ जाऊद्या हो डॉक्टर…तुम्ही जीव घेणार आहात ना माझा ?”  विषय बदलत ते म्हणाले. 

“ होय तर… मी तुमचा जीव घेऊन, तुमचे विचार सुद्धा घेणार आहे बाबा…” माझ्या या वाक्यावर कुडकुडणारे हात एकमेकावर चोळत ते गूढ हसले. 

आता शेवटचा प्रश्न ..  “ तुम्हाला तिचा राग नाही येत ? “

ते पुन्हा क्षीणपणाने हसत म्हणाले,.. “ डॉक्टर मी तिला “बायको” नाही, “मुलगी” मानलं…  जोवर माझ्यासोबत होती, तोपर्यंत तिने माझी सेवा केली… आता ती दुसऱ्याच्या घरी गेली… मुलगी शेवटी परक्याचीच असते ना ? “

हे बोलताना त्यांनी मान दुसरीकडे का वळवली… हे मला कळलं नाही… !  मान वळवली तरी खांदयावर पडलेले अश्रू माझ्या नजरेतून सुटले नाहीत…. 

“ मी नवरा नाही होवु शकलो, पण मग मीच तिचा आता बाप झालो….”  ते हुंदका लपवुन बोलले…. ! “ मी तिला माफ केलंय तिच्या चुकीसाठी…” 

मी अवाक झालो… ! 

“ बाबा… ? अहो…. ??  तुम्ही …??? “ माझ्या तोंडून शब्द फुटेनात….“ इतक्या सहजी तुम्ही माफ केलं तिला ? नवरा होता होता, बाप झालात तीचे ??? “

“ डॉक्टर क्षमा करायला काहीतरी कारण शोधावंच लागतं ना हो ? “ ते हसत म्हणाले… 

मी पुन्हा एकदा शहारलो… ! .. एखाद्याला दोषी ठरवण्यासाठी मुद्दामहून कारण शोधलं जातं… आणि  ते माफ करण्यासाठी कारण शोधत होते… ! 

ते पुन्हा हसले…. !  त्यांचं हे एक हसणं,.. हजार रडण्याहून भीषण आणि भेसूर होतं…! 

आता माझे शब्द संपले होते… सर्व काही असूनही मी गरीब होतो, आणि .. आणि  हातात काहीही नसलेले… रस्त्यावर पडलेले ते बाबा खरे श्रीमंत ! 

मनोमन त्यांना नमस्कार करून मी जायला उठलो. 

मला त्यादिवशी पाणी मिळालंच नाही… पण बाबांच्या अश्रूत मी चिंब भिजून गेलो…. ! 

पाणी न पिताही माझी तहान शमली होती… गाडी जवळ आलो…. गाडी गपगुमान चालू झाली… अच्छा…  म्हणजे हा सुध्दा कुणीतरी खेळलेला डाव होता तर….! 

मी घरी आलो…. डोक्यात बाबांचेच विचार…

‘ प्रेम म्हणजे क्षमा… ! ‘ .. आज प्रेमाची नवी व्याख्या समजली…. 

‘ स्वतःसाठी काहीतरी मागणं म्हणजे प्रार्थना नव्हे… जे मिळालंय, त्याबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजे प्रार्थना !’ .. आज प्रार्थनेचीही नवी व्याख्या समजली… 

‘ जे हवंसं वाटतंय ते मिळवणं म्हणजे यश… परंतु जे मिळालंय ते हवंसं वाटणं म्हणजे समाधान !!! ‘

सर्व काही हरवूनही, समाधानी राहून, वर तिलाच दुवा देणाऱ्या बाबांचा मला हेवा वाटला !!! 

जगावं तर सालं अस्स…. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही…. ! 

त्यांच्या “मनात” सुरू असलेलं युद्ध “पानावर” कधीही लिहिले जाणार नाही… 

इथं तेच दुर्योधन होते….तेच अर्जुन होते …आणि कृष्णही तेच होते…! 

…. आयुष्याच्या रणभूमीवर आजूबाजूला सर्वजण असूनही ते बाबा एकटेच होते. 

श्वास चालू असतात, तोपर्यंत एकट्यालाच चालावं लागतं…. श्वास थांबले की मगच लोक आपल्या आजूबाजूला रडत गोळा होतात… आणि आपल्या जाण्याचा हा “सोहळा” पाहायला आपणच शिल्लक नसतो…. ही खरी शोकांतिका  !!! 

आज २३ तारखेला शनिवारी सकाळी पाय आपोआप बाबांकडे वळले… 

…. त्याच ओल्या गाठोड्यात ते तसेच पडले होते… भीष्मासारखे मौन धारण  करून, थंडीनं कुडकुडत…  ! 

त्यांचे डोळे बंद होते… मी गाठोड उघडलं…. अंगावरचं भिजलेलं एक एक कापड काढून टाकलं… आता मला ते ‘ दिगंबर ‘ भासले ! .. उघड्या फुटपाथवर, नागड्या आकाशाखाली मी त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक केला… अंगावरचा मळ हाताने साफ केला….आता अजून कुठली पूजा मांडू ?? .. जखमेतले किडे काढले… दाढी कटिंग केली… पँटमध्ये केलेली मल-मुत्र-विष्ठा साफ केली…. आणि मीच खऱ्या अर्थानं सुगंधित जाहलो…. ! 

मग त्यांना लंगोट बांधला… उघड्या बंब त्या बाबांनी, माझ्या डोक्यावर मायेनं हात ठेवला आणि खऱ्या अर्थाने माझ्या स्टेथोस्कोपचा आज सन्मान झाला…! 

उघडले डोळे जेव्हा त्यांनी, गाईच्या नजरेत मला वासरू दिसले…..  

.. आणि नुकत्याच हातात आलेल्या या वृद्ध बाळामध्ये मला माझेच पिल्लू दिसले…. रस्त्यावरच मग त्याला न्हाऊ घातले….! 

इतक्यात माझ्या कानावर ढोल ताशाचा अगडबंब आवाज आला… आमच्या बाळाच्या जन्माचा सोहळा कोण साजरा करतंय, हे बघायला मी मान वळवली…. पाच दिवसाच्या गणपतीची ती विसर्जन मिरवणूक होती ! 

इकडे बाबांचंही जुनं आयुष्य आम्ही विसर्जित करत होतो…!!!  यानंतर त्यांना स्वच्छ पुसून नवीन पांढरे शुभ्र कपडे घातले. कपडे घालता घालता ते म्हणाले, “ डॉक्टर, आज पुन्हा इकडे कसे आलात ?”

आता मी हसत म्हणालो, “ अहो बाबा, तुमचा जीव घ्यायचा होता ना ? जीव घ्यायलाच आलोय…!”

यावर अत्यंत समाधानाने ते हसले….! 

बाबांना ऑपरेशनसाठी एका हॉस्पिटलमध्ये शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ऍडमिट केलं आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना एखादा व्यवसाय टाकून देऊ किंवा त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करू… ! 

अरे हो… आता तुम्हाला सांगायला हरकत नाही… पण, बाबांच्या इच्छेनुसार शेवटी मी त्यांचा “जीव” घेतलाच आहे… ! आणि आता हा “जीव” मी माझ्या जिवात जपून ठेवला आहे…!! 

कुठवर ??? …. माझ्या जिवात जीव आहे तोवर… !!! 

— समाप्त— 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नदाव बन येहुदा … लेखक : श्री मनीष मोहिले ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

☆ नदाव बन येहुदा … लेखक : श्री मनीष मोहिले ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.

त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाईच्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्पमध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत, अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली.”

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिनला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते, कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधूनमधून त्याला शुद्ध यायची, पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदावचा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटांना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदावने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ प्रयत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्पपर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.

जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदावने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले. 

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे, आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षापूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला नसेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करता सुद्धा, “ नदाव बन येहुदा “ सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.

लेखक : श्री मनीष मोहिले

प्रस्तुती : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळी फुले आणायला गेले आणि बघतच राहिले.त्या मावशींनी एक वृत्तपत्राचा कागद घेतला त्यात फुले,तुळस,बेल ठेवले आणि मोठ्या निगुतीने छान पुडी बांधली.आणि त्यावर छान दोरा गुंडाळला.त्यांची एकाग्रता बघून असे वाटले,जणू त्या खूप मौल्यवान वस्तू किंवा औषध त्यात बांधत आहेत.आणि तसे तर ते  होते.ज्या फुलांनी देवाची पूजा होणार आहे ती असामान्यच!

त्यांनी तो दोरा गुंडाळत असताना मनाने मला पण गुंडाळले ( फसवले नव्हे ).माझे भरकटत चाललेले मन जागेवर आणले.त्या फुलांच्या पुडीमुळे मी मात्र बालपणात पोहोचले.आणि आठवले कित्येक वर्षात आपण अशी कागदी पुडी पाहिलीच नाही.दुकानात जायचे आणि चकचकित प्लास्टिक मध्ये टाकून वस्तू आणायच्या.त्यातील बऱ्याच वस्तू मशीनमध्येच चकचकित कपडे घालून येतात.मग लक्षात आले,माझ्या लहानपणी सर्वच वस्तू कागदाच्या पुडी मधून यायच्या.ही आजची फूल पुडी बघून मन भूतकाळात शिरले.

मला चांगलेच आठवते प्रत्येक दुकानात वस्तू बांधून देण्याचे कागद वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेले असायचे.त्या वरून दुकानदाराची पारख करता यायची.काही दुकानदार त्या कागदांची प्रतवारी करून ठेवायचे.म्हणजे प्रत्येक वस्तू साठी व वस्तूच्या वजना प्रमाणे ( वजना प्रमाणे आकारमान पण बदलायचे ) कागदाचे वेगवेगळ्या आकारात तुकडे करुन ठेवलेले असायचे.काही जण ते लहान मोठे तुकडे वेगवेगळ्या कप्प्यात ठेवायचे.अगदी इस्त्री केल्यासारखे!आणि वस्तूचे वजन करून झाल्यावर मोठ्या काळजीने कागद काढून घ्यायचे.व व्यवस्थित घडीवर घडी घालून पदार्थ त्यात ठेवायचे.त्यावेळी असे वाटायचे जणू हे त्या पदार्थला कपडेच घालत आहेत.  काही जण दुकानातच वेगवेगळ्या सुतळीत किंवा जाड दोऱ्यात सर्व कागदाच्या तुकड्यांचे कोपरे जुळवून ओवून ठेवायचे.त्यातही लहान मोठे अशी वर्गवारी असायची.आही जण मात्र वृत्तपत्राचे गठ्ठेच एका कोपऱ्यात ठेवायचे.व वस्तू मापून झाली की टरकन कागद फाडून त्यात वस्तू गुंडाळायचे.त्या वस्तू कागदात बांधताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असायच्या. 

आतील कागद बाहेरच्या कागदाला आधार देत असायचा.जणू लहानांचे महत्वच सांगत असायचा.त्या नंतर त्यावर दोरा बांधला जायचा.तो दोरा मात्र खूप ठिकाणी एकाच पद्धतीने दिसायचा.बहुतेक तराजूच्या अगदी बाजूला किंवा वरच्या बाजूला मोठे रिळ असायचे.व त्याचे एक टोक खाली लोंबत असायचे.आणि ते टोक ओढले गेल्यावर ते रिळ एकाच लयीत नाचत असायचे!दोरा संपत असेल तरी कोणाच्या तरी उपयोगी पडतो म्हणून त्यालाही आनंद होत असावा.

प्रत्येक दुकानाची पुड्या बांधायची खास शैली असायची.आणि ती बघूनच वस्तू कोणत्या दुकानातून आणली ते समजायचे.हे झाले दुकानदाराचे कौशल्य!

आमचे कौशल्य या पुड्या घरी आल्या नंतरचे!त्या कागदात काय आहे याची इतकी उत्सुकता असायची कारण कागद पारदर्शक नसल्याने आणि त्याला दोऱ्यात गुंडाळल्या मुळे आत काय आहे ते दिसायचेच नाही.ती पुडी दुसऱ्या कोणी आणली असेल तर ही उत्सुकता जरा जास्तच असायची.आणि स्वतः वस्तू आणलेली ( मोठ्यांच्या सांगण्यावरून ) असेल तर पोटात बारीक धडधड व छोटासा गोळा यायचा.कारण आणायला सांगितलेली वस्तू चांगली असेल तर कौतुक व शाबासकी,वस्तू ठीक असेल तर काही नाही पण जर वस्तू नीट नसेल तर जगबुडी झाल्या सारखी बोलणी आणि एक दोन धपाटे ठरलेले असायचे.नीट बघता आले नाही का ते काका कोणती वस्तू देतात? असा आमच्या अकलेचा उद्धार ठरलेला असायचा.आमचे कौशल्य या पुढचे.डब्यात गेलेल्या वस्तूने परिधान करुन आईच्या हाताने सोडलेला कागद घ्यायचा आणि त्यावर हात फिरवून छान सरळ करायचा.तो दोन्ही बाजूंनी वाचायचा.त्या वरची चित्रे बघायची व्यंग चित्रे असतील तर हसून घ्यायचे.सिनेमाच्या जाहिराती असतील तर मोठ्यांच्या चोरुन बघून घ्यायच्या.हो आमच्या लहानपणी तेवढेच करावे लागायचे.त्या नंतर तो कागद पलंगाच्या गादीच्या खाली राहिलेली इस्त्री करायला जायचे.त्यावेळी हे कागद फेकून दिले जात नसत.काही दिवसांनी तो कागद घरातील कोणती जागा मिळवणार आहे ते ठरायचे.म्हणजे काही कागद डब्यांच्या खाली जायचे.काही डब्यांच्या झाकणाच्या आत बसायचे.काहींच्या नशिबात चकलीचे चक्र असायचे तर काहींना तळलेली चकली मिळायची.आणि काही कागद तेलकट डबे,निरांजन पुसणे याच्या कामी यायचे.तिच व्यवस्था पुडी बरोबर आलेल्या दोऱ्याची.तो दोरा सोडल्यावर एखाद्या काडीला किंवा दोरा संपून राहिलेल्या रिकाम्या रिळाला गुंडाळून ठेवला जायचा.आणि योग्य ठिकाणी वापरला जायचा.त्या वेळी भराभर फेकून देणे हा प्रकार नव्हता.आणि हे सगळे करण्यात कोणाला कमीपणा पण वाटत नसे.तेव्हा कोणालाच प्लास्टिक चे वारे लागले नव्हते.आणि हायजीन च्या कल्पना वेगळ्या होत्या.समाजातील गरीब,श्रीमंत सगळेच एकाच दुकानातून व वृत्तपत्राच्याच कागदातून सामान आणायचे.कारण मॉल उदयाला आले नव्हते.विशेष म्हणजे रिड्यूस,रीयूज आणि रिसायकल ही त्रिसूत्री आचरणात आणली जायची.

आयुष्यात किराणामाल या शिवाय अनेक पुड्या यायच्या.कित्येक घरी फूल पुडी यायची ती पानात बांधलेली असायची.भेळेच्या गाडी वरची भेळ पण खायला व बांधून कागदातच मिळायची.आणि भेळ खाण्यासाठी चमचा पण जाड कागदाचाच असायचा.या शिवाय भाजलेले शेंगदाणे,फुटाणे शंकूच्या आकारातील निमूळत्या पुडीत मिळायचे.ती पुडी फारच मोहक दिसायची आणि ती पुडी घरात कोणी आणली की बाळ गोपाळ आनंदून जायचे.देवळातील अंगाऱ्याची चपटी पुडी परीक्षेला जाताना खूप आधार देऊन जायची.त्या वेळी केळी सुद्धा कागदात बांधून यायची.यात अजून विशेष पुडे आहेतच.बघायला आलेल्या मुलीला पेढ्यांचा मोठा पुडा मिळायचा.शिवाय साखर पुड्यात पण त्या ताटांमध्ये साखरेचे पुडे इतर साध्या पुड्यांमध्ये रंगीत कागदात ऐटीत बसायचे.

आता हे वाचून जर कोणाला असे वाटले की मी पुड्या सोडत आहे.तर त्याला माझा इलाज नाही.ज्यांनी तो काळ अनुभवला आहे त्यांना यातील सत्यता नक्कीच पटेल.आणि लहानपणात तेही थोडा फेरफटका मारुन येतील.

तर माझं हे असं होतं.अशी कोणतीही वस्तू मला आठवणीत घेऊन जाते.आणि मी असे काही लिहिते.असो!तुम्ही वाचता म्हणून किती लिहायचे ना?

या पुडीच्या निमित्ताने सगळ्या पुड्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.आणि ही आठवणींची एक पुडी मी सोडून दिली आहे. आता ही पुडी तुम्हाला कोणकोणत्या पुड्यांची आठवण देते ते आठवा बरं!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

२९/९/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares