हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 9 (1-5)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #9 (1-5) ॥ ☆

रघुवंश सर्ग – 9

 

संयम नियम पालक आत्मजित में, महारानी दशरथ अग्रगामी

पिता से पा उत्तर कोशल राज्य, शासक हुआ उसका योग्य स्वामी ॥ 1॥

 

संप्राप्त उस राज्य को कुलाचिंत रीति से नगर के साथ ऐसा सँभाला

कि क्रोंच पर्वत विर्दीण कर्ता कुमार सा हुआ वह कीर्तिवाला ॥ 2॥

 

बल दैत्य नाशक सुरेन्द्र मनुवंश के दण्ड धारी दशरथ नृपति को

विद्वान कहते समान धर्मा जल अर्थ से सींचते हैं जो श्रम को ॥ 3॥

 

परम पराक्रमी पर श्शांत अजपुत्र के राज्य में रोग कोई घुस न पाये

फिर शत्रुओं की तो क्या भला बात धरती ने धन धान्य सभी डगाये ॥ 4॥

 

दिग्विजयी रघु से धरा का वैभव बढ़ा  और अज से हुई धान्य पूर्णा

तथैव दशरथ पराक्रमी से न हुई हो समृद्ध, ऐसा हुआ ना ॥ 5॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घन तमी शुक्र बघ राज्य करी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ घन तमी शुक्र बघ राज्य करी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तांबे

घन तमी शुक्र बघ राज्य करी

सध्या झी मराठी चॅनेलवर सारेगमप लिटिल चॅम्पस् ही गाण्याची स्पर्धा चालू आहे. मध्यंतरी एका चिमुरडीने,

‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा

            ताई आणखी कोणाला? चल रे दादा चहाटळा’

हे गाणं सादर केलं. त्या गाण्याने माझं बोट धरलं आणि मला थेट शाळेत घेऊन गेलं. ६वी-७वीचा वर्ग असेल. ऑफ तास असला की गाण्याच्या भेंड्या खेळायच्या  हे अगदी नक्की  ठरलेलं. मग, सुरुवातीलाच काही काही अक्षरांची गाणी आठवून ठेवायची. ‘त’अक्षर आलं की पहिल्यांदाच म्हंटलं जाई, ‘तुझ्या गळा माझ्या गळा …’ सुरुवात कोणी का करेना, दोन्ही गट गाणं म्हणायला लागत.  यात आपोआपच मुलांचा गट, दादाच्या ओळी म्हणे आणि मुलींचा गट ताईच्या ओळी. हे गाणं खरं तर हळुवारपणे ताईची गोड चेष्टा करणारं. पण ते एकमेकांकडे बघून हावभाव करत म्हणताना, कव्वालीच्या जुगलबंदीचं त्याला रूप येई. पुन्हा ‘त’ आलं की ‘तिनिसांजा सखे मिळाल्या हे ठरलेलं. ‘ड’ आलं की पहिलं गाणं असे, ‘डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये. शंख फुंकीत ये… येई रुद्रा.. येई रुद्रा.’ सुरुवात कुणी तरी करे आणि मग सर्व वर्गच त्याला साथ देई. गाणं कोरसमध्ये ‘खणखणत येणार्यां शूलाप्रमाणे’ खणखणित आवाजात गायलं जाई. इतक्या खणखणित आवाजात की शेजारच्या वर्गातून कुणी तरी सांगत येई, ‘डमरू जरा हळू वाजू दे आमच्या वर्गात सरांनी बोलेलेलं आम्हाला ऐकू येत नाही. आमचे आवाज थोडे खालच्या पट्टीत यायचे.  ‘र’ येताच पुन्हा कोरस सुरू व्हायचा.,

‘रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी

ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली.  इथे झाशीच्या राणीचं स्मरणही खणखणत शूल ये, याच जातकुळीतलं करायचं. 

ही भा.रा. तांबे यांची गीतं अगदी दुसरीपासून पाठ्यपुस्तकात असलेली आणि आम्ही अभ्यासलेली आठवताहेत. इयत्ता दुसरीत, ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहूणीया दूर ‘ अशी निखळ निसर्ग  वर्णनाची कविता होती, तर चौथीमधे ‘या बाळांनो यारे या. लवकर भरभर सारे या.’

६वी किंवा ७ वीत ‘रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ‘ ही कविता होती. पुढे बहुतेक ९ वीत ‘मधु मागासी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी ‘ ही रूपकात्मक कविता. आता नवीन लिहिण्याची शक्ती नाही, असे सांगणारी’ (मधू पिळण्या परी रे बळ न करी’ आणि ११वीत होती ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही शाश्वत सत्य उलगडून दाखवणारी कविता॰ अशा कविता आभ्यासल्या होत्या. त्यांच्या कविता सहज पाठ होत. मुद्दाम त्यासाठी पुस्तक डोळ्यासमोर धरून पाठ करायची जरूर नसे. या सगळ्या कवितांची गीतं झाली होती आणि ती ऐकून ऐकून पाठ होतच होती.  

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर ‘मराठी कवितेचा इतिहास’ अभ्यासताना भा. रा. तांबे अर्थात भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता अभ्यासली.  १९३५ साली राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि पुढे याच्या अनेक आवृत्या निघाल्या. ग्वाल्हेर संस्थानचे ते राजकवी होते. वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतले होते. याशिवाय हिन्दी कविता, उर्दू नज्म , गझल याविषयी त्यांचा अभ्यास होता. या दोन्हीचे संस्कार घेऊन ताब्यांनी कविता लिहिल्या. त्यांची कविता साधी, सहज, सुलभ होती. कवितांचा अर्थ सहज समजे. त्यांच्या लेखनाने आनंददायी कवितेची वाट प्रशस्त झाली.त्यांच्या कवितांची गीतरूपे  आकाशवाणीवरून  प्रसारित झाली॰ अजूनही होत आहेत..  आकाशवाणीवर वाजताहेत. कार्यक्रमात गायली जाताहेत..  त्यांच्या शब्दांना स्वरसाजाचे  लखलखीत सुवर्ण कोंदण लाभले आणि त्या कोंदणात त्यांची कविता हिर्या्सारखी झळाळून उठली. त्यांना गीतकाव्याचे प्रवर्तक असं सार्थपणे म्हंटलं जातं. त्यांचं एक गीत आहे, ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी..’ मनाची खिन्नता घालवण्यासाठी ते सांगताहेत, ‘ अंधार घनदाट असला, तरी वर शुक्रतार्या्कडे बघ! बघ. तो कसा अंधारातही तेजाळतो आहे ते! त्या शुक्राप्रमाणेच त्यांची गीते जनमानसावर गारुड करतात. त्यांना आनंद देतात. 

कॉलेजमध्ये असताना आम्हाला त्यांच्या

 ‘तिनिसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला

आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला’, ‘नववधू प्रिया मी बावरते’ झालंच तर ‘ डोळे हे जुलमी गडे’, कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी’,  या सारख्या अनेक गीतांनी मोहवलं होतं.

आज मात्र त्यांच्या शाश्वत सत्य सांगणार्याै ‘मावळत्या दिनकरा’, मधू मागसी माझ्या, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय ‘ सारख्या कविता अधीक जवळिकीच्या वाटू लागल्या आहेत.

आपल्या कवितांनी दैनंदिन जीवनातील दु:खे विसरायला लावणार्याट भा. रा. तांबे यांच्या स्मृतीला नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुगरण — ” बिघडलं ? घडलं.” ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ सुगरण — ” बिघडलं ? घडलं.” ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आमचा दूधवाला  त्याच्याकडची म्हैस व्याली की आम्हाला चीक आणून देतो. ‘पहिल्या दिवसाचा पाहिजे हं.’ त्याला सांगितलेलं आहे. एक दिवस त्याने असाच चीक आणून दिला. चिकाएव्हढं दूध, गूळ, वेलदोड्याची पूड असं  सगळं घालून मी लगेच नेहेमीसारखा खरवस शिजायला ठेवला. पण काय झालं कोण जाणे, वीस मिनिटांनी बघितलं तर चोथा पाणी– बापरे ! आता हा खरवस कोण  खाणार ? सगळ्यांना  वेलदोड्याची तीट लावलेल्या शुभ्र वड्या आवडतात. ‘ मग आता काय करायचं याचं ?’ असा विचार करताकरता  एक युक्ती सुचली. खरवस रवीने चांगला घुसळला. डब्यात भाजलेला रवा होता. अंदाजाने दोन वाट्या, तो भाजलेला रवा त्या घुसळलेल्या खरवसात घातला. नि कुकरमध्ये ठेवला. शिटी न लावता.—-पंधरा मिनिटांनी कुकरचं झाकण उघडलं. आणि –आहा—” मिशन सक्सेसफुल “ — सोनेरी रंगाचा सुंदर सांजा तयार. पूर्वी आपण गुळाचा सांजा करायचो ना तसा. सगळ्यांना बशीतून खायला दिला. उरला तर सांज्याच्या पोळ्या करू असं ठरवलं होतं, पण उरलाच नाही. सर्वांनी आणखी आणखी मागून घेतला. मुलांनी  विचारलं ,     

“आई पुन्हा असा सांजा कधी करणार? ” मी म्हटलं– “खरवस बिघडल्यावर.”

लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070, 9561582372.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा: सर्वोपरि ☆ सुश्री मीरा जैन

सुश्री मीरा जैन 

(सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार सुश्री मीरा जैन जी  की अब तक 9 पुस्तकें प्रकाशित – चार लघुकथा संग्रह , तीन लेख संग्रह एक कविता संग्रह ,एक व्यंग्य संग्रह, १००० से अधिक रचनाएँ देश की प्रतिष्ठित पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित। आकाशवाणी एवं दूरदर्शन से व्यंग्य, लघुकथा व अन्य रचनाओं का प्रसारण। वर्ष २०११ में  ‘मीरा जैन की सौ लघुकथाएं’पुस्तक पर विक्रम विश्वविद्यालय (उज्जैन) द्वारा शोध कार्य करवाया जा चुका है।  अनेक भाषाओं में रचनाओं का अनुवाद प्रकाशित। कई अंतर्राष्ट्रीय, राष्ट्रीय तथा राज्य स्तरीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत। २०१९ में भारत सरकार के विद्वान लेखकों की सूची में आपका नाम दर्ज । प्रथम श्रेणी न्यायिक मजिस्ट्रेट के पद पर पांच वर्ष तक बाल कल्याण समिति के सदस्य के रूप में अपनी सेवाएं उज्जैन जिले में प्रदत्त। बालिका-महिला सुरक्षा, उनका विकास, कन्या भ्रूण हत्या एवं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आदि कई सामाजिक अभियानों में भी सतत संलग्न। पूर्व में आपकी लघुकथाओं का मराठी अनुवाद ई -अभिव्यक्ति (मराठी ) में प्रकाशित। 

हम समय-समय पर आपकी लघुकथाओं को अपने प्रबुद्ध पाठकों से साझा करने का प्रयास करेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा सर्वोपरि। )

☆ कथा-कहानी : लघुकथ – सर्वोपरि ☆ सुश्री मीरा जैन ☆

शाम सात बजने को है    महत्वपूर्ण पूजा का समय  किंतु अब तक चंदना का मंदिर न पहुँचना उपस्थित महिलाओं के मन को अत्यंत विचलित कर रहा था। वैसे कोई बंधन नहीं सभी स्वेच्छा से नियत समय पर पहुँचती और एक साथ  पूजा करती। इनमें भी विधि विधान मे चंदना सबसे आगे। अंततः एक महिला ने चंदना को मोबाइल पर फोन किया।

वार्तालाप के दौरान कथित महिला का स्वर अचानक तीक्ष्ण हो गया-

‘ ये कोई बात हुई हम सभी यहाँ तुम्हारा इंतजार कर रहें है और तुम आराम से सांस्कृतिक कार्यक्रम का लुफ्त उठा रही हो  —-?’

इसके साथ ही महिला ने चंदना का दो मुँहा चरित्र सबको सुनाने हेतु अपने मोबाइल का स्पीकर ऑन कर बातें करने लगी।  महिला ने बिना रुके चंदना को उपदेश का एक लम्बा भाषण दे डाला। अंत मे चंदना ने मात्र कुछ ही शब्दो मे अपनी मंशा जाहिर कर वार्ता की इतिश्री कर दी जिसे सुन अन्य महिलाएं भी चंदना के पक्ष मे खड़ी नजर आयी-

चंदना – ‘ देखिये दीदी ! धर्म पर मेरी पूर्ण आस्था है लेकिन मेरी बिटिया ने यहाँ एक अति महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम हिस्सा लिया है उसे लौटने मे देर हो सकती है इसलिए मै उसके साथ आई हूँ , मेरे लिए बेटी की सुरक्षा सर्वोपरि है ‘.

© मीरा जैन

संपर्क –  516, साँईनाथ कालोनी, सेठी नगर, उज्जैन, मध्यप्रदेश

फोन .09425918116

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

प्राचीवरती सूर्य उगवला

अथांग सागर पुढे पसरला

पाण्यावरच्या लाटांसह हा 

जीवनसागर भासे मजला 

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ५ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज ५ नोव्हेंबर-— चोखंदळपणे एका वेगळ्याच वाटेवरून जात, मराठी साहित्यात निसर्गसाहित्याची अनमोल भर घालणारे वन्यजीव अभ्यासक श्री. मारुती चितमपल्ली यांचा आज जन्मदिन.( सन १९३२ ) वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे केलेल्या नोकरीसह आयुष्यातली ६५ वर्षे जंगलांच्या सान्निध्यात राहून, तेथील प्राणीजीवन , आणि त्या जीवनातले बारकावे टिपून, ते आपल्या अतिशय ओघवत्या शैलीत, बारकाव्यांसहित रेखाटणारे त्यांचे लेखन वाचकांना आवडायलाच हवे असेच— याचे कारण असे की, याविषयीच्या तपशीलवार माहितीला त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनशैलीचे सुंदर कोंदण लाभलेले आहे. 

“ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी —-” ही कविता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शाळेत शिकलेली आहे. पण त्यातले अतीव कारुण्य मनाला अतिशय भिडल्यामुळे जंगलातील पक्ष्यांबद्दल कमालीची आस्था आणि ओढ वाटून, त्या प्राणी-पक्षी यांच्या विश्वाची सखोल माहिती मिळवायची, आणि जनसामान्यांपर्यंत ती आपल्या लिखाणाच्या माध्यमातून पोहोचवायची, हाच आयुष्यभराचा ध्यास घेणारे श्री. चितमपल्ली हे एक विरळेच व्यक्तिमत्व. घरच्यांबरोबर रानवाटा तुडवता तुडवता त्यांना लहानपणापासूनच पक्ष्यांची आणि वन्य प्राण्यांची खूप माहिती मिळाली होती. आणि त्याच जोडीने त्याबाबतच्या त्यांच्या मामाच्या अंधश्रद्धाही समजल्या होत्या. पण चितमपल्ली यांचे वैशिष्ट्य हे की, स्वतः अशा कुठल्याही अंधश्रद्धेचा बळी न होता, त्या माहितीचा त्यांनी संशोधनासाठी उपयोग केला. वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, पक्ष्यांचे विशाल जग, याविषयी त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यासंदर्भात निबंध-वाचनही केले. नोकरीदरम्यान विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली यांच्यासोबत त्यांनी अनेक ठिकाणची जंगलं अक्षरशः पिंजून काढली होती. आणि पुढे  वन्यजीवन संवर्धनासाठी जनजागृती व्हावी म्हणून चळवळही सुरु केली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालकपदही त्यांनी भूषवलेले आहे. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीचे ते सदस्य होते. सन २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

त्यांचे एक खूप मोलाचे काम म्हणजे, त्यांनी जंगल आणि त्याभोवतीचे विश्व यातील कितीतरी घटकांना नवी नावे दिली. या मूळ तेलगूभाषिक माणसाने मराठीच्या समृद्ध शब्दवैभवात आणखी सुमारे एक लाख शब्दांची मोलाची भर घातलेली आहे. पक्षीशास्त्रातल्या अनेक इंग्लिश संज्ञांचे त्यांनी मराठी नामकरण केलेले आहे. उदा. कावळ्यांची वसाहत- ज्याला इंग्लिशमध्ये rookery असे म्हणतात, त्याला त्यांनी ‘ काकागार ‘ असे समर्पक नाव दिले. तसेच ‘ सारंगागार ‘ हे बगळ्यांसारख्या पक्षांच्या विणीच्या जागेचे नाव. फुलांच्या बाबतीत घाणेरीला ( टणटणी ) 

‘ रायमुनिया ’, बहाव्याला ‘ अमलताश ‘ ही नावे त्यांच्यामुळेच लोकांना माहिती झाली आहेत. 

“ आनंददायी बगळे “ ( संस्कृत साहित्यातील काही पक्षी ), “ घरट्यापलीकडे “, “ जंगलाचं देणं “,

“ निसर्गवाचन “, “ पक्षीकोश “, “ रानवाटा “, “ शब्दांचं धन “, अशी त्यांची कितीतरी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. यापैकी “ पक्षी जाय दिगंतरा “ ही  त्यांची अतिशय प्रसिद्ध साहित्यकृती आहे. 

त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही असे—भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार, सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, ‘ रानवाटा ‘ या पुस्तकासाठी उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, म. रा. मराठी विभागाकडून ‘ विं.  दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार “, “ १२ व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार “ इ .  

पुण्याची ‘अडव्हेंचर’ ही गिर्यारोहण संस्था ‘ मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ‘ देत असते. 

“ मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी “ हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले गेले आहे. 

विशेष सांगायला हवे ते हे की, मराठी, तेलगू, गुजराती, उर्दू, जर्मन, आणि रशियन एवढ्या भाषा तर त्यांना अवगत होत्याच, पण परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचा अभ्यास केलेला असूनही, वयाच्या ८४ व्या वर्षी  कालिदास संस्कृत विद्यापीठाचा “ प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण “ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. 

असं विविधांगी व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री. मारुती चितमपल्ली यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी अतिशय आदरपूर्वक वंदन.

☆☆☆☆☆

आज ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती शकुंतला गोगटे यांचा स्मृतिदिन.( १९३० – ५/११/१९९१ ) श्रीमती गोगटे यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा संग्रह असे विपुल लिखाण केलेले आहे. त्यांचे बरेचसे लिखाण सामाजिक विषय डोळ्यांसमोर ठेवून केल्याचे जाणवते. त्यातही, पांढरपेशा मध्यमवर्गाचे जीवन रंगवलेले दिसते. बूमरँग, मर्यादा, सारीपाट, अभिसारिका, समांतर रेषा, त्याला हे कसं सांगू?, सावलीचा चटका, माझं काय चुकलं, मी एक शून्य, दोघी, मना तुझा रंग कसा, झंकार, ही आणि त्यांनी लिहिलेली इतर पुस्तके वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेली आहेत. त्या “ सर्वोत्कृष्ट स्त्री लेखिका “ म्हणून ओळखल्या जात होत्या.

श्रीमती शकुंतला गोगटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दृष्टिकोन ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆ इंद्रधनुष्य ☆ दृष्टिकोन ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

दृष्टिकोन किती महत्वाचा पहा……..गणित तर समजून घ्या…”मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित”  पहा, सोडवा किंवा सोडून द्या,  पण आनंद जरूर घ्या.*

आपण असे मानू या की….

A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

म्हणजेच A=1, B=2, C=3 

असे मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या….

आपण असे म्हणतो की, आयुष्यात  “कठोर मेहनत/ HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.

आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K = 8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे  “ज्ञान” किंवा ‘Knowledge’.

याचे मार्क्स पाहु या

K+N+O+W+L+E+D+G+E = 11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी. 

काही लोक म्हणतात  “नशीब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.

L+U+C+K = 12+21+3+11 = 47%,–“नशीब” तर एकदमच काठावर पास.

काहींना चांगले आयुष्य जगण्यासाठी  “पैसा/MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स?

 13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.

बराच मोठा समुदाय असे मानतो की,  “नेतृत्वगुण/ LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो.  नेतृत्वाचे मार्क्स =

12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, –बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.

मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो?  काही कल्पना करू शकता?…… नाही जमत?—-

मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन/ATTITUDE” 

आता एटिट्यूड”चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू… 

A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%.— पहा– आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य  १००% यशस्वी  होईल आणि आनंदी ही होईल.

“दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल”

संग्राहक : अस्मिता इनामदार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आदिशक्ती चंडिका देवी –  पाटणा ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ आदिशक्ती चंडिका देवी –  पाटणा ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून “नवरात्र उत्सव” म्हटला जातो..हा नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.. नवरात्रीत  देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते..

पाटणा— आदिशक्ती चंडिका देवी

श्री चंडीकादैव्यै नमो नमः

पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले निसर्गाच्या कुशीत वसलेले जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे पूर्वाभिमुख असलेले हेमाडपंथी पुरातन मंदिर…हे आदिशक्तीचे मंदिर बाराव्या शतकात उभारले गेले आहे.  राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. १०ते १२ फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पूर्वाभिमुख करण्यात आलेली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याला अठ्ठावीस कोपरे आहेत तर गाभा-यातील सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे. पाटणादेवीच्या या  मंदिरात असलेली देवीची मूर्ती खूपच भव्य आहे. प्रसन्नमुख असलेल्या देवीचे एकदा दर्शन घेवून समाधान तर होतच नाही तर पुन्हा पुन्हा देवीचे दर्शन घ्यावेसे वाटते… देवीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहून आपण आपले भानच विसरुन जातो…अत्यंत तेजस्वी असे रूप…. हे तेजस्वी रूप डोळ्यांत साठवत आपण तिच्या समोर नतमस्तक होतो.. 

मातेच्या मंदिरासमोर असलेल्या दोन भव्य दिपमाळा ही पाटणा देवी मंदिराची खास ओळख.. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथर्‍यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे… जवळच असलेल्या पाटणा या  गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.. व ओळखले जाऊ लागले..  

आपण ज्या गावातून पाटणादेवी मंदिराकडे जातो ते गाव म्हणजेच पाटणा.. या गावाला ऐतिहासिक व पौराणिक असे महत्त्व आहे. भारताचे महान गणितज्ञ भास्कराचार्य यांची ही जन्मभूमी…

भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबद्दलची माहिती असलेला शिलालेखही येथे आहे. पाटणादेवीच्या मंदिरात बाराव्या शतकामधला एक शिलालेख आजही आपणांस  पाहावयास मिळतो… त्यावर भास्कराचार्यांची वंशावळ कोरलेली आहे. 

मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने  सह्याद्रि पर्वताचे उंच उंच कडॆ, विविध वृक्ष- वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे पांढरेशुभ्र ओढे यामुळे मन अगदी मोहून जाते… 

मंदिराच्या चौथर्‍यावरुन मंदिराच्या भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वतांचे उंच उंच कडे, रंगीबेरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, नागमोडी खळखळ वाहणारे पांढरेशुभ्र ओढे हे सर्व दृष्य पाहताना आपण स्वतःला पूर्णपणे विसरुन निसर्गाशी कधी  एकरुप होऊन जातो हे समजतचं नाही..! अश्या या रमणीय सौंदर्याने नटलेल्या ठिकाणचा इतिहास ही तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे…

घनदाट जंगलातच पर्यटकांना मोहात टाकणारे केदारकुंड सर्वांनाच आकर्षित करतो… येथूनच जवळ केदारेश्वराचे प्राचीन मंदिरही पाहण्यासारखे आहे… नागार्जुन गुंफा व सितान्हाणी या गुंफा तसेच नवव्या शतकात कोरलेल्या जैन लेण्याही आहेत… या लेण्यांच्या पुढे सीतेची न्हाणी नावाची लेणी आहे. ही लेणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे… त्याचप्रमाणे दक्षिणेतील  पुरातन लेणी पितळखोरे सुद्धा याच ठिकाणी आहे. 

असे  विविधतेने नटलेले पाटणा देवीचे मंदिर… अनेकांची ही कुलस्वामिनी आहे. आजही कुळधर्म कुळाचारात बरेच भक्त धवलतीर्थातून देवीचे स्मरण करुन पूजेसाठी तांदळा नेतात.

दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.. दर पौर्णिमेस देवी चंडिका हिची (भगवतीची) महापूजा केली जाते..

चला तर मग…चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी या धार्मिकस्थळाला नक्कीच  भेट द्यायला हवी…

 

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्रघंटा…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ चंद्रघंटा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

मस्तकी चंद्राकार घंटाधारिणी

पूजा तुझी होतसे तृतिय दिनी

सिंह वाहिनी नव अस्त्रेधारिणी

एक वरदहस्त दशभुजांगिनी !

रुप पार्वतीचे स्वरूप शक्तीचे

शांतवृत्ती शिवरुप परिवर्तनी

दूर करिसी संकटे भक्तांची

आशीश देसी महिषासुरमर्दिनी!

कल्याणकारी आशीर्वच देई

अलौकिक जगन्माते रुपदर्शनी!

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – हिंदी माह विशेष – भाषा ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – राजभाषा मास विशेष – भाषा ?

 

नवजात का रुदन

जगत की पहली भाषा,

अबोध की खिलखिलाहट

जगत का पहला महाकाव्य,

शिशु का अंगुली पकड़ना

जगत का पहला अनहद नाद,

संतान का माँ को पुकारना

जगत का पहला मधुर निनाद,

प्रसूत होती स्त्री केवल

एक शिशु को नहीं जनती,

अभिव्यक्ति की संभावनाओं के

महाकोश को जन्म देती है,

संभवतः यही कारण है,

भाषा स्त्रीलिंग होती है!

अपनी भाषा में अभिव्यक्त होना अपने अस्तित्व को चैतन्य रखना है।

©  संजय भारद्वाज

(रात्रि 3:14 बजे, 13.9.19)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 2 (31-35)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 2 (31-35) ॥ ☆

 

ज्यों दाहिने हाथ की नखप्रभा से भूषित हुआ बाण का कड़कपत्र

तूणीर के बाण में हाथ चिपका राजा विवश रह गया ज्यों ही चित्र ॥31॥

 

चिपका हुआ हाथ अवरूद्ध इच्छा, छूना जिसे पाप स हो गया था

राजा प्रतापी मन में विकल था, ज्यों मंत्र कीलित विषधर कोई था ॥32॥

 

मनुवंश के न्यायप्रिय वीर नृप से जो निज दशा पर स्वयं अति चकित थे

उस धेनुधारी महासिंह ने और विस्मित किया मानुसी बात करके ॥33॥

 

रूको महीपाल, हुआ बहुत श्रम वृथा यहाँ अस्त्र रहा तुम्हारा

तरू को गिरा ले भले तेज आँधी बल गिरि शिखर हेतु पर व्यर्थ सारा ॥34॥

 

कैलाश  सम श्वेत वृषभारू रोही शिव के चरण पात से पृष्ठ पावन

कुम्भोदर नाम निकुम्भ का मित्र, जानो मुझे शम्भु का दास राजन ॥35॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138
image_print