मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” 

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा

जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.

त्याला आपलं म्हणावं,

 त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते- पथ्य असते.

 

ज्याच्याजवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर 

आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू

येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते 

फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर 

विठ्ठल म्हणतो का …..

या या फार बरं झालं !

माहूरवरून रेणुका मातेचा 

किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरीबालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !

मग आपण का जातो ?

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ….म्हणून !

हाही एक प्रकारचा” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? किंवा आपण नेलेले तो काय घेतो?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

किती रोड झालीस ? कशी आहेस ? 

सुकलेला दिसतोस, काय झालं? —

नाही म्हणत.

 

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच “आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ

भेटल्यानंतर बोलण्याची ओढ 

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ

निरोप घेण्याआधीच पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं  त्याला आपलं म्हणावं 

मग ते नातं चुलत, मावस असलं तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे ” आपलेपणा! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात

आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात, 

तो आपला असतो , 

” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी ” सख्ख ” होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का? 

 

आता एक काम करा —–

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या

सख्ख्या नातेवाईकांची 

झालं न धस्सकन 

होतयं न धडधड 

नको वाटतंय न यादी करायला ….

 

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—– कोणी कितीही झिडकारलं तरी—-

 

कारण …रागराग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही 

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं..

 

संग्राहिका : सुश्री मानसी आपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

शिक्षणानं सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं. वस्तू, माणसं, आकडे, इतिहास ह्यांची कोठारं म्हणजे मेंदू. स्मरणशक्ती, स्मृती ह्यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस. नीर-क्षीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि भक्तीसाठी मनाचे, कमळाच्या पानाचे द्रोण निर्लेप हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो.

वपु काळे. ~’ तू भ्रमत आहासी वाया..’ 

संग्राहिका : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वय असतं का पावसाला?☔ ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

हो असतं की…….

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षाचा असतो..

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षाचा असतो..

ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो..

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची..

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची..

नंतर नंतर पाऊस  मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात ,आणि नातवंडांना ओरडतो पण, की अरे भिजू नका रे पावसात..

आपल्यासोबत बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं…

 

किती पहावा पाऊस

धुके चष्म्यात दाटले

किती गेले पावसाळे

थोडे डोळ्यात उरले..

 

वय पावसाला नाही

वय मला भिववीते

अशा सर्दाळ हवेत

संधी वाताला मिळते. 

 

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 26 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 26 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३७.

प्रवास संपत आला असं वाटलं होतं,

माझ्या शक्तीची मर्यादा गाठली असं वाटलं होतं,

माझ्या समोरचा मार्ग संपलाय असं वाटलं होतं,

शिदोरी संपलीय आणि शांत विजनवासात आसरा घ्यावा असं वाटलं होतं. . . .

 

आता वाटतंय तुझ्या माझ्यावरील मर्जीला

अजून शेवट नाही.

जुने- पुराणे शब्द तोंडातून

बाहेर पडायचे थांबतात,

तेव्हा  ऱ्हदयातून नवी धून निघते,

जुने मार्ग नजरेआड होतात,

तेव्हा आश्चर्ययुक्त  नवा प्रदेश दिसू लागतो.

 

३८.

‘तू मला हवास, तू मला हवास. . . . . ‘

असंच सतत माझं काळीज

चिरंतनपणे घोकीत राहो.

तुझं अस्तित्व विसरायला लावणाऱ्या

सर्व वासना मिथ्या, पोकळ आहेत

 

रात्रीच्या अंधारात

प्रकाशाची विनवणी दडलेली असते.

तसाच तू हवास, फक्त तू हवास. . .

ही हाक माझ्या अजाणपणाच्या

गर्भात दडलेली असावी

 

सर्व शक्तिनिशी वादळ शांततेला धडक देतं

तेव्हा त्याला शांततेची ओढ असते.

तसेच माझी बंडखोरी तुझ्या प्रेमाशी टक्कर घेते,

तेव्हा सुध्दा ‘ तू हवास’ फक्त ‘तू हवास’ अशी

साद ती घालते.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थनेचे शब्द – सुश्री हेमलता फडणीस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रार्थनेचे शब्द – सुश्री हेमलता फडणीस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात, तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो… ( का इंग्रजी मेसेजचा हा अनुवाद.)

एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.

नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे.

हा दिनक्रम रोजचाच झाला होता.

देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्याला वाटू लागली. त्याला वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य.

तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !—-असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्याची बेचैनी वाढू लागली. एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर तो तेथे पोहोचला. तिचा नित्यक्रम संपण्याची त्याने वाट पाहिली. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणाला, मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ?

ती एकदम म्हणाली, “प्रार्थना”.

पुजाऱ्याने जरा साशंकतेनेच  विचारले, तुला एखादी प्रार्थना येते?

“नाही” असे ती म्हणाली.

“ मग तू डोळे मिटून रोज काय करतेस ?” असे त्याने हसून विचारले.

अगदी निरागसपणे ती म्हणाली, “ मला कोणतीच प्रार्थना येत नाही पण मला,” a,b,c,d पासून z पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या alphabets च्या बाहेर असूच शकत नाही.  ही alphabets तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना. “

—ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली.  ती दिसेनाशी होईपर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होऊन उभा राहिला.

ज्याची आपण मनोभावे पूजा करतो, अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा.

@ fb~हेमलता फडणीस

(अगा बावन्न वर्णा परता। कोण मंत्रु आहे पांडुसूता।। —ज्ञानेश्वरी ) 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आभार माना… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आभार माना… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचे सुद्धा आभार माना, कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसं वागायचं व कसं जगायचं हे अचूकपणे शिकायला मिळतं.

समोरच्या व्यक्तीने तुमच्याबरोबर काय आणि का केले हा विचार करण्यात वेळ दवडू नका. कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला उत्तर देईल व त्याला त्याच्या कर्माची फळं भोगण्यासाठी भाग पाडेल. कधीकधी शांत राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात.

लक्षात ठेवा– जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील.  अशावेळी खाली बघू नका, तर अजून उंच उडा. त्यामुळे त्यांनी भिरकावलेले दगड तुमच्यापर्यत पोहोचणारच नाहीत. जर परिणामांचा विचार करत बसाल तर आलेला क्षण निसटून जाईल आणि प्रत्येक क्षण जगून पाहिलात तर परिणाम स्विकारायला सोपं जाईल.

श्री सोमेश्वर व्यसन व मधूमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र लोटे ता.खेड जि.रत्नागिरी 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 25 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 25 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३५.

जिथं मन मुक्त असेल, माथा उन्मत्त असेल,

ज्ञान मुक्त असेल,

 

घरांच्या क्षुद्र भिंतींनी जगाचे तुकडे झाले नसतील,

सत्याच्या गाभाऱ्यातून शब्दांचा उच्चार होईल,

 

अथक परिश्रमांचे हात

 पूर्णत्वाप्रत उंचावले जातील,

 

मृत सवयींच्या वालुकामय वाळवंटात

बुध्दीचा स्वच्छ झरा आटून गेला नसेल,

 

सतत विस्तार पावणाऱ्या विचार

आणि कृती करण्याकडेच

तुझ्या कृपेने मनाची धाव असेल,

 

हे माझ्या स्वामी, त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गात

माझा देश जागृत होऊ दे.

 

३६.

माझ्या ऱ्हदयातील दारिऱ्द्य्याच्या

मुळावर घाव घाल

 

सुख आणि दुःख आनंदानं सोसायची

शक्ती मला दे.

माझं प्रेम सेवेत फलद्रूप करण्याची शक्ती दे.

 

गरिबापासून फटकून न वागण्याची अगर

धनदांडग्या मस्तवालासमोर शरण न जाण्याची

शक्ती मला दे.

 

दैनंदिन क्षुद्रतेला ओलांडून उंच जाण्याची

शक्ती मला दे आणि

प्रेमभावनेनं तुझ्या मर्जीप्रमाणं तुला शरण

जाण्याची शक्ती मला दे.

इतकीच माझी प्रार्थना आहे!

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक कागदाचं पान असतं…!! – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  एक कागदाचं पान असतं…!! – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कसं आहे ना? 

एक कागदाचं पान असतं…!!

 ‘श्री’ लिहिलं, की पूजलं जातं …

 प्रेमाचे चार शब्द लिहिले, की जपलं जातं…

काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं…

 

एक कागदाचं पान असतं…!!

 

कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं…

कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं…

कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं…

आणि कधी तर  निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं…

 

एक कागदाचं पान असतं….!!

 

जे लेखकाच्या लेखणीला हात देतं…

जे चित्रकाराच्या  चित्राला साथ देतं…

जे व्यापाऱ्याच्या  हिशोबाला ज्ञात ठेवतं…

आणि हो, वकिलांसोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं…

 

एक कागदाचं पान असतं…..!!

 

पेपरवेट ठेवला, की एकदम गप्प बसतं…

काढून घेतला, की  स्वच्छंदी फिरतं आणि 

कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं…

 

एक कागदाचं पान असतं…..!!

 

ज्यावर बातम्या छापल्या, की वर्तमानपत्र बनतं…

प्रश्न छापले, की  प्रश्नपत्रिका बनतं…

विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं…

तर कधी आदेश~संदेश लिहिले, की तेच टपालही बनतं…

 

एक कागदाचं पान असतं….!!

 

 माणसाच्या जीवनांत आणि त्यांत खूप साम्य असतं…!!

 

एक कागदाचं पान असतं…!!

जन्माला आला तर birth certificate असतं

निधन पावला तर Death certificate असतं

 

एक कागदाचं पान असतं ——–

– अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्राद्वारे मनोगत — अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆`

? वाचताना वेचलेले ?

☆ पत्राद्वारे मनोगत — अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

प्रिय सखी, 

माझे  मनोगत पत्राद्वारे व्यक्त करते कारण भेट दुरापास्त झालीय. 

आधी थोडी प्रस्तावना —

मनोगत म्हणजे विचार शेअर करणे, पुष्कळ वेळा आपल्याला मनमोकळेपणाने  काही  सांगायचं असतं ,कधीकधी समोरासमोर सांगणं अवघड असतं. अर्थात समोरासमोर मनातले विचार, भावना सांगताना ,मांडताना वाटतं हा शब्दांचा गैरअर्थ तर काढणार नाही, दुखावला तर जाणार नाही .हिरीरीने मुद्दा मांडताना कधीकधी वाद वाढत जातात आणि रूपांतर भांडणात होते. अशा वेळेस कागदावर उतरलेले शब्द जास्त प्रभावी ठरतात .पत्राद्वारे व्यक्त केलेले मनोगत जितके रंजक असू शकते तितके ते भावनाप्रधान, मनापर्यंत पोचणारे  देखील असते. असो. प्रस्तावना पुरे.

मध्यंतरी आपला ग्रुप जमला होता .हसणं खिदळणं गप्पाटप्पा अनेक विषय हाताळून  झाले .प्रवास, बालपण, गमती जमती, वाचन, देव ,सत्संग वगैरे वगैरे. हळूहळू पुरुष राजकारणावर आणि आम्ही मैत्रिणी कुकिंग या आवडत्या विषयावर आलो. टिप्सची देवाण-घेवाण झाली. मला एक गंमत वाटते, हे पुरुष राजकारणावर  इतके हिरीरीने मुद्दे मांडत असतात, यांचा सगळा आवेश चार भिंतीतच. कोण चूक कोण बरोबर– काहीच कळत नाही. पण खरं सांगू,  राजकारण हे मला थोडीफार माहिती असण्याइतपतच मर्यादित आहे. कितीही राग आला, वाईट वाटलं तरी माझी धाव कुंपणापर्यंतच.  मग कशाला वाफ दवडवा.  

सध्या सत्संग, देव देव यांचे प्रस्थ पण फारच वाढले आहे. सारखे उपदेशानुरुप मेसेजेस. अरे चांगलं बोला, चांगलं वागा ,चांगला विचार करा– हाच खरा सत्संग– माझ्या घरातच देव आहे अशी श्रद्धा बाळगणं हेही तितकेच महत्वाचे 

नं ! तासन्तास रांगेत उभे राहून मंदिरात जायचं ,देव दिसतो न दिसतो तोच  हकालपट्टी. दान पेटीत पटकन दान करायचे– त्यापेक्षा सत्पात्री दान करावं .विशेषतः विद्यार्थी वर्गाची मला गंमत वाटते. चार-पाच तास रांगेत उभा राहून कधीकधी अनवाणी सिद्धिविनायक किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, त्यापेक्षा तोच वेळ अभ्यासासाठी सत्कारणी लावला तर जास्त उपयोगी नाही का पडणार ! 

—-हळूहळू गप्पांचा ओघ आजच्या पिढीवर आला आणि ठेवणीतलं वाक्य ‘ आमच्या वेळेस असं नव्हतं ‘, या समेवर येऊन थांबला. 

तुला काय वाटतं , आजची पिढी म्हणजे नातवंडं फार हुशार आहेत ,चौकस आहेत. माहितीची महाद्वार दररोज उघडत आहेत, त्यामुळे जास्तच डोळस होण्याची गरज आहे. एखादी गोष्ट सांगितली तर पटकन विश्वास ठेवणार नाहीत ,  प्रश्न विचारतील समजून घेतील आणि मगच ते काम करतील

आपल्या पिढीत असं नव्हतं. एखादी गोष्ट सांगितली तर ती बरोबरच असेल, मग ती करायची, प्रश्न विचारायचे नाहीत   असा अलिखित नियम— अर्थात यामुळे आपलं काही वाईट झालं नाही, बिघडलं नाही.  पण आता माहितीच्या कक्षा इतक्या रुंदावल्यात आणि  सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध होत आहे. 

आपण नाही का गं  एखादं औषध आणलं की त्याचे कंटेंट्स, साईड इफेक्ट याचा शोध घेतो. मग ही तर पुढची पिढी यांची चौकसवृत्ती जरा जास्तच. 

खरं सांगू,  आता नात्याची चौकट बदलली आहे .आधी नात्याचा पाया भावनेवर उभारलेला होता. आता माहिती हा नात्याचा पाया झाला आहे. काळाचा महिमा.

माझी या पिढीबद्दल तक्रार नाही. पण यांच्या खर्चिक वृत्तीबद्दल जरा प्रश्नचिन्ह आहे. हातात मुबलक पैसा असल्याने मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या आहेत. या पिढीला आपल्यापेक्षा खूप टेन्शन्स, प्रेशर आहेत. सगळ्यांची तारेवरची कसरतच आहे. या सर्व गोष्टींशी लढता-लढता जीवनात अनावश्यक आहारांचा कधी शिरकाव झाला आणि तो अमर्यादित कधी झाला हे लक्षातच आले नाही किंवा येत नाही. जंक फुडचा अतिरेक आणि त्यात स्विगी ,झोमॅटो यासारख्या सुविधा आळशीपणात भर घालत आहेत .वाचन संस्कृतीचा ओघ कमी होतोय. असो, धिस इज लाईफ.

शंकराचार्यांच्या गुरूने दिलेला ,’ कोणत्याही परिस्थितीत आनंदात रहा ‘ हा मंत्र आत्मसात करायचा प्रयत्न करून तर बघू या.

मी माझं मन छान मोकळं केलं. अगं मैत्रिणी असतातच कशाला — गुपितं आणि मनातले विचार व्यक्त करायलाच 

ना ! चल लवकर  भेटूया.—– बाय . 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विचारांचे आऊटपुट… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ विचारांचे आऊटपुट…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

आपण जो जो विचार करतो तो आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होत असतो…… त्यामुळे त्याच विचाराचे आऊटपुट आपल्याला मिळत असते…

हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याचा अवकाश…. अंतर्मन तुम्हाला तसेच आऊटपुट देऊन ते तुमच्या हातुन कधीच होऊ देणार नाही अशी व्यवस्था करते….

किंवा, मला नशापाणी केल्याशिवाय चैन पडत नाही, त्याशिवाय झोप येत नाही असले विचार केल्यावर अंतर्मन तसेच फळ आपल्याला बहाल करत असते….

अमकी एखादी गोष्ट मी सहजच करुन दाखविन असे विश्वासाने म्हणण्याचा अवकाश….. मग ती गोष्ट कितीही अवघड असो….अंतर्मन ती गोष्ट सहजच करुन दाखवते…. 

हा अंतर्मनाचा चमत्कार होय…. 

अण्णा हजारेंनी जे विश्वासाने उपोषण चालवले आहे, त्या साऱ्या गोष्टीत त्यांचे अंतर्मनच त्यांच्या पाठीशी आहे… 

हा अंतर्मनाचा मोठ्ठा चमत्कार आपण व सारे जग पाहतच आहे…

आपण सतत नकारात्मकच विचार करत आलो आहोत व आपल्या मुलाबाळांनाही आपण असेच नकारात्मक पणेच वागवत आलो आहोत………  

हे तुझ्या हातून होणारच नाही…

तू अजून बच्चा आहे…. 

असले धंदे करुन काय  तुझे पोट भरणार आहे का…. 

तू अगदी बावळटच आहेस ….. गधा आहेस…. तुला अक्कल नाही… 

उगाच मोठ्या मोठ्या गप्पा मारु नकोस…

तुला कवडीचे ज्ञान नाही….

उगाच बकवास करु नकोस……

मुर्ख कुठला…तुझी  लायकी नाही…. 

मोठे झाल्यावर कळेल तुला….

मुकाट्याने तुझा अभ्यास कर….

नको तो उपदव्याप  करु नको…त्यात तुला यश येणार नाही….

उगाच मोठेपणाचा आव आणू नकोस…..

वगैरे बोलून आपण आपल्या पाल्यास अगदी नकारात्मक विचारांचा असा नेभळट करुन टाकतो….. 

त्यांचे अंतर्मन आपण अंकुरीत होण्याच्या अगोदरच कोमजून टाकतो…. 

मग त्याला तसेच आऊटपुट मिळाल्यास नवल नाही….

 

मित्रांनो… 

असे काही करु नका… 

मुलांना तेजस्वी व कणखर मनाचे घडवण्यात आपलाच सहभाग असला पाहिजे… 

कारण आपला पाल्य खूप काळ आपल्या संपर्कात असतो, त्याला मनाने समृद्ध व बलवान बनवा…

त्याला देशाचे कणखर नागरिक बनवा… 

त्याचे अंतर्मन बलवान कसे होईल याकडे लक्ष द्या…

आपल्या चिमुकल्याला अंतर्मन जागृतीच्या साधना करायला सांगा….

जप तप, तीर्थाटण आदिंपेक्षा अंतर्मन कसे जागृत होईल याकडे लक्ष द्या… 

त्याच्या हातून काहीही वाईट होणार नाही हे ही आवर्जून पहा…

 

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares