image_print

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी   विविधा  ☆  हाचि नेम आता...संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण - सुश्री विभावरी कुलकर्णी ☆  काव्यानंद ☆तुकाराम गाथा - अभंग ☆ हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥ बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥ रसग्रहण  मला जाणवलेला व उमगलेला अर्थ....... मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे. आता हाच माझा नेम (निश्चय केला, व्रत घेतले  किंवा मी ठरवले ) आहे.गोविंदा जवळ आहे,तिथून माघारी फिरायचे नाही. संसाराचा मोह धरायचा नाही. त्या गोविंदाच्या घरात मोठ्या प्रयासाने ( जप,तप,नामस्मरण, सदाचारी वर्तणूक, भूतदया इ.मुळे) आले आहे.व माझ्या वर्तणुकी मुळे पट्टराणी झाले आहे. त्या सावळ्या परब्रह्माला मनापासून वरले आहे.आता तेथून माघारी फिरणे नाही. त्या बलवान म्हणजे सर्वव्यापी,सर्वांना जीवदान देणारा,चिंता हरणारा व षडरिपूं पासून दूर नेणारा असा जो गोविंद आहे त्याचा सहवास लाभला आहे.म्हणून आता कोणतेही भय,चिंता राहिली नाही. यात गोविंद हा शब्द अचूक वापरला आहे. गो म्हणजे गायी पण त्याचा अजून एक इंद्रिये असाही अर्थ आहे.गोविंद म्हणजे इंद्रियांचा व्यवहार जाणतो व त्याचे नियमन  (...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर  काव्यानंद   ☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆ काव्यानंद: ☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆      ए आई मला पावसात जाऊ दे     एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे..   मेघ कसे बघ गडगड करिती विजा नभातून मला खुणविती  त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे..    बदकांचा बघ थवा नाचतो बेडूक दादा हाक मारतो  पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे .   धारे खाली उभा राहुनी  पायाने मी उडविन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे      ए आई मला पावसात जाऊ दे  एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे… रसग्रहण:  हे बालगीत सुप्रसिद्ध कवियत्री कै. वंदना विटणकर यांचे आहे. वंदना विटणकर यांनी प्रेम गीते, भक्ती गीते, कोळी गीते, बालगीते लिहिली.  जवळजवळ ७०० गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या बालकथा, बालनाट्ये आणि बालगीते खूप गाजली आहेत.  त्यापैकीच  "ए ! आई मला पावसात जाऊ दे.." हे आठवणीतले बालगीत. या बालगीतात ध्रुव पद आणि नंतर तीन तीन ओळीचे चरण आहेत.  प्रत्येक चरणात, पहिल्या दोन ओळीत यमक साधलेले आहे.  जसे की करिती— खुणाविती, नाचतो —मारतो, राहुनी— पाणी. ...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्यूपत्र…. – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर   काव्यानंद    ☆ माझे मृत्यूपत्र... – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆ (देशभक्त वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.) माझे मृत्युपत्र या कवितेचे रसग्रहण. सावरकरांना न ओळखणारा या पृथ्वीतलावर विरळाच. भारतमातेच्या मुकुटातील हा दैदिप्यमान हिराच.mयांचे अमरत्व म्हणजे यांचा जाज्वल्य देशाभिमान, देशभक्ती, उदात्त देशप्रेम होय. भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला तोडण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवासमोर शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत  मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन. असा हा तेजस्वी तारा भारतीय क्षितिजावर चमकत राहिला.. स्वातंत्र्य वीर सावरकर हे उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.यांनी साहित्याच्या सर्व दालनात प्रवेश केला.यांचे साहित्य सर्व व्यापी आहे. माझे मृत्युपत्र हे यांचे वहिनीस  लिहिलेले पत्रात्मक काव्य‌ आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना इंग्रजांनी पकडले. त्यांना पन्नास वर्षांची काळया पाण्याची शिक्षा जाहीर केली. यातून आपली सुटका नाही.हे त्यांनी जाणले. हे‌ कटू सत्य वहिनीला कसे सांगायचे? घरची परिस्थिती मोठी प्रतिकूल होती.१९०९मध्ये त्यांच्या ‌मोठया भावाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचा चार वर्षांचा मुलगा देवाघरी गेलेला. अशा‌ परिस्थितीत ही मर्मभेदी गोष्ट कशी‌ सांगावी या विचारात ते असताना काव्य प्रतिभा हात जोडून उभी‌ राहिली.असा हा...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे  काव्यानंद  ☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆  सुश्री शोभना आगाशे ☆ ☆ पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ निर्गुणाचे डहाळी। पाळणा लाविला। तेथे सुत पहुडला। मुक्ताईचा॥ निज निज बाळा। न करी पै आळी। अनुहात टाळी। वाजविते॥ तेथे निद्रा ना जागृती। भोगी पै उन्मनी। लक्ष तो भेदूनी। निजवतो॥ निभ्रांत पाळी। पाळणा विणुनि। मन हे बांधुनि। पवन दोरा॥ एकवीस सहस्र। सहाशे वेळा बाळा। तोही डोळा। स्थिर करी॥ बालक चुकले। सुकुमार तान्हुले। त्याने पै सांडले। मायाजाळ॥ जो जो जो जो। पुत्राते निजवी। अनुहाते वाव। निःशब्दांची॥ अविनाश पाळणा। अव्यक्तेने विणला। तेथे पहुडला। योगिराज॥ निद्रा ना जागृती। निजसी काई। परियेसी चांगया। बोले मुक्ताबाई॥ – संत मुक्ताबाई  ☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण/अर्थ चवदा वर्षांच्या मुक्ताबाईंच शिष्यत्व १४०० वर्षांच्या चांगदेवांनी, श्री ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून पत्करलं. त्यानंतर गुरूमाऊलीच्या भूमिकेतून मुक्ताबाईंनी चांगदेवांना उद्देशून हा उपदेशपर पाळणा रचला. मुक्ताबाई म्हणतात, निर्गुणाच्या फांदीवर तुझा पाळणा मी बांधला आहे जेणेकरून निर्गुण भक्तीच्या मार्गाने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान तुला मी देईन. आता तू हट्ट न करता झोप त्यासाठी मी अनाहत टाळी वाजवते आहे. आहत म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींच्या (वस्तु, विचार, भाव, अहंकार, इच्छा इ.) एकमेकांवरील आघातामुळे निर्माण होणारा नाद म्हणजेच द्वैत तर अनाहत जो आहत नाही तो म्हणजे अद्वैत....
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार  काव्यानंद  ☆ या झोपडीत माझ्या... कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆ ☆ या झोपडीत माझ्या... कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ राजास जी महाली    सौख्ये कधी मिळाली    ती सर्व प्राप्त झाली    या झोपडीत माझ्या....   भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभूनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या..   पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या     जाता तया महाला     'मज्जाव'शब्द आला     भीती न यावयाला      या झोपडीत माझ्या.      महाली मऊ बिछाने    कंदील श्यामदाने     आम्हा जमीन माने      या झोपडीत माझ्या..      येता तरी सुखे या     जाता तरी सुखे जा     कोणावरी ना बोजा      या झोपडीत माझ्या     पाहून सौख्य माझे        देवेन्द्र तो ही लाजे         शांती सदा विराजे          या झोपडीत माझ्या.. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  - कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ या झोपडीत माझ्या... कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆ झोपडी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती झोपडपट्टी,झोपड्यांची गळकी वस्ती,दुःख, दैन्य,दारिद्र्य,बकाल वस्ती आणि तिथली व्यसनाधीनता,अस्वच्छता, गुन्हेगारी.थोडक्यात जिवंतपणी नरक. मोठमोठ्या शहरात अशाच प्रकारचे चित्र असते.आणि बऱ्याचदा झोपड्या हटत नाहीत त्याला झोपडपट्टीचे एक राजकारण असते.बऱ्याचदा बेरकी माणसांच्या  परिस्थितीची ती एक ढाल असते. राष्ट्रसंत तुकडोजी...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर  काव्यानंद  ☆ कर्ण… शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री शोभना आगाशे अल्प परिचय   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून एम बी बी एस व एम डी (पॅथाॅलाॅजी) या पदव्या प्राप्त. त्याच महाविद्यालयात २००७ पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत. सन १९६८-६९ मधे आकाशवाणी सांगलीच्या महाविद्यालयीन कविसंमेलनात सहभाग. 'सावळ्या' हा काव्यसंग्रह प्रकाशित. टागोर रचित इंग्लिश 'गीतांजली' चा काव्यानुवाद 'गीतांजली जशी भावली तशी' प्रकाशित. ☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆          हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।          जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।          तुमच्या तेजाचा अंश मी सतत वागवला काळजात।          त्या दिव्य तेजाने  दिपले लोक, पण मी जळत राहिलो अंतरात।।          गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले।          आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले।।          हे भास्करा, तुम्हाला माझ्यावरचा अन्याय पाहून काय वाटले?          परोपकार करताना मी धरणीमातेला अनावधानाने सतावलं।          तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं।।          हे हिरण्यगर्भा तुम्हाला हे योग्य का वाटलं?          ‘रथहीन, शस्त्रहीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना।          कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?।।          भर राजसभेत द्रौपदीनं माला सूतपुत्र म्हणून...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

डॉ निशिकांत श्रोत्री  काव्यानंद  ☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆ ☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे  ||ध्रु||   स्थावर-जंगम तेही सोडा देह नसे आपुला क्षणभंगुर तो मिथ्या तरीही मोह उगा ठेविला आत्म्याचे अस्तित्व चिरंतन अंतरी जाणावे कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे   ||१||   आयुष्यातिल खस्ता आणिक कष्टा ज्या भोगले फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले सेवा हाची धर्म जाणुनी माझे नाही म्हणावे कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे  ||२||   काय अपुले काय नसे हे अता तरी उमगावे मोह वासना त्यात गुंतुनी घुटमळुनी का ऱ्हावे मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारुनी द्यावे कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे ||३||   सहा रिपूंच्या फेऱ्यामध्ये सदैव भिरभिरणे नसणे अन् नाहीसे होणे यात चिमटुनी जगणे आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे  ||४|| ©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४ [email protected] ☆ निरोप – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆ निरोप :  विरक्तिपर विचारांची भावमधुर कविता - अमिता कर्णिक-पाटणकर सिद्धहस्त साहित्यिक-कवी डॉक्टर निशिकांत श्रोत्री  यांची ' निरोप ' ही कविता वाचली व प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकलीही. तेव्हापासून...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

डॉ निशिकांत श्रोत्री  काव्यानंद  ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆ ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ तुमच्या पायी आलो मजला दावा परमार्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ   ||ध्रु||   जीवन सारे व्यतीत केले मानव सेवेत नव्हती कसली जाण काय आहे अध्यात्म परउपकार न मजला ठावे अथवा ना स्वार्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||१||   दारी आले त्यांच्या ठायी तुम्हांस देखियले नाही आले त्यांच्यातुनिया तुम्हांस जाणीले तुम्हाविना ना काहीच भासे जीवनात अर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||२||   जाणीव आता पैलतिराची शिरी असो हात नाही कसली आंस असो द्या तुमचीच साथ कृपा असावी उजळावे हो जीवन न हो व्यर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ॥३॥ ©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४ ☆ दावा परमार्थ - डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद - श्री श्रीकांत पुंडलिक ☆ कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे. माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, "कोsहं?" या प्रश्नापासून सुरू झालेलं...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे अल्प परिचय  बॅंकेतून रिटायर झाल्यावर काही वर्षे एका खाजगी कंपनीत काम केले. कामाच्या व्यस्ततेमुळे मागे पडलेली वाचनाची आवड परत सुरू केली. कविता लेखनाची सुरुवात झाली. कवितेचे रसग्रहण हा प्रांत ही आवडू लागला आहे.  काव्यानंद  ☆ वचन देई मला... डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆ डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहात कवीने प्रेम विषयक विविध भाव वेगवेगळ्या कवितांतून वाचकांसमोर उलगडले आहेत. उदात्त ,शाश्वत ,समर्पित प्रेम तर कधी विरहाग्नीत होरपळणारे तनमन ,प्रतारणेतून अनुभवाला येणारे दुःख ,कधी प्रेमाच्या अतूटपणाबद्दल असलेला गाढ विश्वास आणि त्या विश्वासातून एकमेकांकडे मागितलेले वचन अशा विविध प्रेमभावना अत्यंत तरल पणे व तितक्याच बारकाव्याने आणि समर्थपणे काव्य रसिकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. या संग्रहातील वचन देई मला ही कविता अशीच प्रेमात गुंतलेल्या, रमलेल्या, प्रेमावर विश्वास असलेल्या प्रियकराचे भावविश्व आपल्यासमोर साकारते. साधारणतः प्रियकर प्रेयसीला विसरतो अशी मनोधारणा असते.या कवितेचे वैशिष्ट्य असे की येथे प्रेयसी विसरेल अशी शंका प्रियकराच्या मनात आहे.रुढ मनोभावनेला छेद देणारी ही कविता लक्षवेधी ठरते. कवितेतील प्रेयसी जर  कवितेतील प्रियकराला विसरली तर त्याच्या स्मृतीत तिने एक तरी अश्रू...
Read More

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित  काव्यानंद  ☆ लिम्ब... शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ☆ लिम्ब... शांता शेळके ☆ निळ्या निळ्या आकाशाची पार्श्वभूमी चेतोहार भव्य वृक्ष हा लिंबाचा शोभतसे तिच्यावर   किती रम्य दिसे याचा पर्णसंभार हिरवा पाहताच तयाकडे लाभे मनाला गारवा   बलशाली याचा बुंधा फांद्या सुदीर्घ विशाला भय दूर घालवून स्थैर्य देतात चित्ताला   उग्र जरा परी गोड गन्ध मोहरास याच्या कटु मधुर भावना जणु माझ्याच मनीच्या   टक लावून कितीदा बघते मी याच्याकडे सुखदुःख अंतरीचे सर्व करीते उघडे!   माझ्या नयनांची भाषा सारी कळते यालाही मूक भाषेत आपुल्या मज दिलासा तो देई   स्नेहभाव आम्हातील नाही कुणा कळायाचे ज्ञात आहे आम्हांलाच मुग्ध नाते हे आमुचे ! - शांताबाई शेळके ☆ काव्यानंद - लिम्ब....शांताबाई शेळके ☆ शांताबाई शेळके यांच्या आत्मपर कवितांपैकी एक कविता--लिम्ब  (अर्थात  कडुलिम्ब!) निसर्गाचा आणि मानवी मनाचा संबंध हा अनादी कालापासूनचा आहे.आपल्या आनंदाच्या उत्सवात माणूस निसर्गाला विसरलेला नाही आणि आपल्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी निसर्गासारखा दुसरा मित्र नाही.'आपुलाच वाद आपणाशी' हा सुद्धा निसर्गाच्या सहवासातच होतो.त्यामुळे शांताबाईंसारख्या कवयित्रीने निसर्गाशी साधलेली जवळीक आणि संवाद समजून घेण्यासारखा आहे. 'लिम्ब' ही  कविता वाचल्यावर प्रथमदर्शनी ती  निसर्ग कविता वाटते.असे वाटण्याचे कारण म्हणजे कवितेचे शिर्षक आणि पहिली तीन कडवी.पहिल्या तीन कडव्यात बाईंनी  लिंबाच्या झाडाचे फक्त वर्णन केले आहे.बलशाली बुंधा असलेला,विशाल फांद्या...
Read More
image_print